मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 68 – जननी – जनक ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 68 ☆

☆ जननी – जनक ☆

माझ्या आईचा मी विचार करते तेव्हा मला खुपच चकीत व्हायला होतं, त्याकाळात सगळ्याच बायका गृहकृत्यदक्ष वगैरे असायच्या, माझी आई सुशिक्षित कुटुंबातली तिची आई सामाजिक कार्यकर्ती, वडील कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर होते, निवृत्त झाल्या वर शेती करत होते ते कोकणातले आमराई ,भातशेती वगैरे ! खुप मोठा बंगला, आईचं लग्न घाटावरच्या भरपूर शेतीवाडी असलेल्या घरात झालेलं! पण ती आम्हा सख्या चुलत सहा भावंडांना घेऊन शहरात बि-हाड करून आमच्या  शिक्षणासाठी राहिली. आजोबा त्या काळात त्या भागातले मोठे बागाईतदार, त्यामुळे आईच्या हाताखाली कायम दोन तीन बायका असायच्या पण स्वयंपाक मात्र ती स्वतः करायची ! तिनं आम्हा बहिणींना कधीच घरातली कामं करायला लावली नाहीत, ती भरतकाम, विणकाम, खुपच सुंदर करायची, हौस म्हणून मशीनवर कपडे शिवायची, सुंदर  स्वेटर विणायची! स्वयंपाकात सुगरण होती, या कुठल्याच कला तिने मला शिकवल्या नाहीत किंवा मी शिकले नाही. पण तिला वाचनाची आवड होती तिची वाचनाची आवड आमच्यात उतरली, आणि पुढील काळात मी लेखन करू लागले, फार जाणीवपूर्वक तिनं काही आमची जडणघडण केली नाही, पण आरामशीर आयुष्य तिच्यामुळे मी जगत होते हातात काॅफीचा कप, आणि जेवायला ताट ही कामवाली देत असे. आई सतत आजारी असायची तरी  तिचा कामाचा झपाटा मोठा होता.

मी स्वयंपाक लग्नानंतर करायला शिकले, लग्नाच्या आधी आजीने भाकरी करायला शिकवली होती, कधीतरी चपात्या ही करत होते….. पण तिच्या सारखं प्रत्येक पदार्थ निगुतीनं करणं मला कधी जमलं नाही पण तिच्या हाताची चव मात्र माझ्या हातात उतरली आहे. भरतकाम, विणकाम, शिवण मी ही केलंय पण तिच्या इतकं सुबक नसे….. तरीही नूतन शेटे च्या ओळीप्रमाणे आज म्हणावंसं वाटतं अस्तित्व आज माझे….त्या तूच एक कारण….आपलं अस्तित्व हे आपल्या आईवडिलामुळेच! माझं हस्ताक्षर वडिलासारखं सुंदर आहे. कुरळे केस वडिलांसारखे आहेत, वडिलांची तब्येत एकदम चांगली होती, आखाडा गाजवलेले पहिलवान होते ते!

मधुमेह, संधीवात हे आजार अनुवंशाने आईकडून आलेले, आणि आता जाणवतं हे आजार तिने कसे सहन केले असतील??

आरामशीर, सुखवस्तू आयुष्य आईवडीलांमुळे जगता आलं ही कृतज्ञता आहेच! पण मला लहानपणी आईवडीलांचा नेहमीच धाक आणि दराराच होता.

 

आई बाप असतात

फक्त जन्माचे धनी

आयुष्याचे गणित

सोडवायचे ज्याचे त्यानी

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुठे कुठे क्षितिजाशी ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ कवितेचा उत्सव ? कुठे कुठे क्षितिजाशी ?  सुश्री प्रज्ञा मिरासदार 

 

दूर कुठे क्षितिजाशी टेकडीच्या माथ्यावर |

शांत रम्य जागी उभे एक शिवाचे मंदिर ||१||

 

चार वृक्ष भोवताली दिसे वनश्रीची शोभा |

गाभाऱ्यात तेज फाके शिवपिंडीची ती प्रभा ||२||

 

पलिकडे शांत नदी जळ संथ संथ वाहे |

उतरत्या सांजवेळी सूर्य डोकावून पाहे ||३||

 

एक भगवी पताका मंदिराच्या वर डुले |

शांत नदीपात्रामध्ये दूर दूर होडी चाले ||४||

 

भक्तिरंगी परिसर होई सांजेच्या वेळेला |

पक्षी येती झाडांवर भक्तगण आरतीला ||५||

 

भास्कराचा लाल गोळा बुडताना पाण्यावर |

येई क्षितिजाभोवती लाल केशरी किनार ||६||

 

मंद नंदादीप तेवे शंकराच्या गाभाऱ्याशी |

दिसतसे संध्याराणी कुठे कुठे क्षितिजाशी ||७||

 

नंदादीपाच्या तेजाने जाई भरून गाभारा |

झाला निशेच्या अधीन रम्य आसमंत सारा ||८||

 

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – ऑनलाईन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – ऑनलाईन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

“हॅलो”…

“हॅलो, नमस्कार. मी ऑनलाईन गिफ्ट सर्व्हिस मधून बोलतो आहे. सांगा मी तुमची काय सेवा करू शकतो?”

“मला माझ्या मुलाला देण्यासाठी एखादं चांगलं गिफ्ट सुचवाल का ?”

“हो हो, नक्कीच. काय वय आहे तुमच्या मुलाचं?”

“अठ्ठावीस वर्ष”

“ओ.के. गुड. सॉरी मॅडम, पण तुम्हाला गिफ्ट किती रुपयांपर्यंत घ्यायचं आहे ते सांगता का ?”

“साधारण ४०० ते ५०० रुपयांपर्यंत.”

“ठीक आहे. मग तुम्ही त्यांना एखादा चांगला बॉडी स्प्रे भेट देऊ शकता मॅडम.”

“नको. तो स्प्रे वापरत नाही. आणखी काही सुचवाल का?”

“हो नक्कीच मॅडम. भेट देता येतील अशा पुष्कळ वस्तू आहेत आमच्याकडे. तुम्ही त्यांना एखादा चांगला गॉगल देऊ शकता. चालेल का?”

“आणखी काय काय आहे ?”

“वॉलेट देण्याची कल्पना कशी वाटते तुम्हाला?”

“नाही. ते पण नाही चालणार त्याला.”

“हरकत नाही. मग एखादा चांगला शर्ट घ्या मॅडम त्यांच्यासाठी.”

“हो हो, शर्ट चालेल.”

“ओ. के. गुड. साधारण कोणता रंग आवडेल तुम्हाला ?”

“असं करा, तुम्हाला जो रंग चांगला वाटेल, त्या रंगाचाच शर्ट पॅक करून पाठवून द्या.”

“ठीक आहे मॅडम. तुमचा पत्ता सांगता का ?”

“हो सांगते… मि. संजय मित्रा, 304 रेव्हेन्यू स्ट्रीट, लोधी सर्कल, कोलकाता.”

“आई …. तू ?”

“हो, मीच. बाळा, घरी तू माझ्याशी कधीच इतकं गोड बोलत नाहीस. आणि त्यासाठी माझं आईचं मन तळमळत होतं. म्हणून मग विचार केला की फोनवरून तुझ्याशी असं बोलावं. आता मनाला खूप छान, शांत वाटतंय बाळा. Thank you …..”.

 

मूळ हिंदी कथा : डॉ. लता अग्रवाल

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनातले महासागर ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ मनातले महासागर ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

मनाच्या महासागरात जेव्हा फिरून आले तेव्हा अनेक रंगांनी नटलेल्या लाटांची भेट झाली. काही ना खूप जगण्याची उमेद होती तर काही अगदी दमून गेल्या होत्या. काही निराश तर काही उत्साहाने सळसळत होत्या.

काही स्वपनात हरवल्या होत्या तर काही वास्तव्याशी चार हात करत होत्या.

काहीना हासरा मुखवटा घालता येत होता. पण काहीना खूप प्रयत्न करून ही ते जमत नव्हते.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अश्या अनेक लाटा येतात. काही सुखावून जातात तर काही आवाज न करता सगळ विस्कटून जातात. मागचा पसारा आपल्याला आवरायला सोडून जातात.

अश्या अनेक रंगांनी नटलेल्या लाटा प्रत्येकाच्या मनात दडलेल्या आहेत फक्त काहींच्या रंगबिरंगी तर काहींच्या बेरंग आहेत.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सरला वहिनी ☆ सौ अंजली गोखले

 ☆ जीवनरंग ☆ सरलावहिनी ☆ सौ अंजली गोखले  ☆

सरला वहिनी, आमच्या गल्ली मधले एक धमाल व्यक्तिमत्व ! गोऱ्या गोऱ्या पान अन् वजनदार. चालताना थुलथुलीत दंड हलायचे. चार पावले चालल्या की दम लागायचा. पण त्याही अवस्थेत बोलायची हौस दांडगी. बोलण्यातून, वागण्यातून सहज घडणारा विनोद त्यांच्या लक्षातही येत नसे.

एकदा सकाळी उठल्या बरोबर घरातली साखर संपल्याचे लक्षात आले. पिशवी अन् पर्स घेऊन दुकानाकडे धावल्या. दुकानाची पायरी चढता चढता दम लागलेल्या आवाजात दुकानदाराला म्हणाल्या, “लांबूनच पाहिलं मी तुम्ही उघडे आहात ते. बर झालं बाई तुम्ही उघडे आहात.” दुकानदाराला हसावे की रडावे समजेना. तेवढ्यात तिथली एक मुलगी म्हणाली,” काकू, तुम्हाला दुकान उघडे आहे असे म्हणायचेय ना?” “तेच ते! द्याहो मला साखर लवकर. चहा झाला नाही अजून”. सरलावहिनी म्हणाल्या. आपल्या बोलण्याने घडलेल्या विनोदाकडे साफ दुर्लक्ष्य केलं त्यांनी.

असेच एकदा सरलावहिनींचे मिस्टर बाहेर गेले असताना मिस्टरांचे एक मित्र आले. सरला वहिनींना काय बोलायला कोणीही चालतं. गप्पा रंगल्या. थोड्या वेळाने च हा करण्याचे त्यांच्या लक्षात आले. “बसा हं. पटकन चहा करते.” म्हणत त्यांच्या स्पीडने उठल्या आणि त्यांच्याच स्पीडने चहाची कपबशी घेऊन आल्या. गंमत म्हणजे खुर्चित बसून आपणच तो गरमागरम चहा घेतला. समीरचे मित्र गालातल्या गालात हसत म्हणाले,”वहिनी, आता माझा मित्र आल्यावर मलाही चहा करा” “अग्गो बाई, तुम्हाला दिलाच नाही का मी चहा? खरच, हे आल्यावर करते हं” इति वहिनीबाई !

बायकांना काही ठराविक वयानंतर स्वयंपाक, खाणीपिणी, कप बशा विसळणे अगदी नको वाटते. सर ला वहिनींचे तसेच झाले. यातून सुटका मिळणार कशी? दोन्ही मुली आपल्या सासरी रमलेल्या. त्यांना आईची आठवण कामापुरती ! यांना विश्रांती – बदल कसा मिळणार? अखेर सरला वहिनींनीच एक युक्ति – काढली. “अहो, हल्ली मला खूप दमल्या सारखं होतय. छातीत धडधडतं. मी डॉक्टरांकडे जाऊन येते”. “हो का? अग इतका त्रास होतोय तर बोलली का नाही?” त्यांचेमिस्टर म्हणाले “उद्या जाऊ आपण. आज मित्राकडे जमणार आहोत आम्ही”. सरलावहिनी पटकन ठसक्यात म्हणाल्या, “उद्या नको. माझी मी आजच जाऊन येते.”

रात्री मिस्टर आल्यावर म्हणाल्या, “जाऊन आले ह. B.P. वाढलय खूप माझे. डॉक्टरांनी ८-१० दिवस बेडरेस्ट सांगितली आहे. आपण दोन वेळचा डबा लावूया.” मिस्टरांनी मान हालवली. नेमके दुसऱ्या दिवशी सकाळी फिरून येताना डॉक्टर भेटले त्यांना. डॉक्टरांकडे त्यानी सरला वहिनीच्या तब्येतीची चवकशी केली. डॉक्टर म्हणाले, “अहो, कित्येक दिवसात वहिनी आल्याच नाहीत”.

घरी आल्यावर सरला वहिनींना बोलावून मिस्टर म्हणाले, “अग आत्ताच डॉक्टर भेटले होते. तुला BPचा नाही, जास्त वजनाचा problem आहे म्हणाले. व्यायाम झटून काम आणि खाणे कमी करायला सांगितलेय.”

बिचाऱ्या सरला वहिनी. औषध गोळ्या न घेताच त्यांचे तोंड कडू कडू झाले.

©️ सौ अंजली गोखले 

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं रसग्रहण☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆  काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं  रसग्रहण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

विरह आणि प्रेम ही भावना एखाद्या व्यक्तीपुरतीच मर्यादीत असत नाही. एखादा प्रसंग, एखादे ठिकाण, एखादी आठवण ही सुद्धा मनात अशी घर  करून बसलेली असते की मनाला थोडासा धक्का द्यायचा अवकाश, त्या उफाळून वर येतात. घडून गेलेल्या प्रसंगाची,  सहवासाची, आवडत्या ठिकाणाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आपले मन किती संवेदनशील आहे, आपल्यावर कोणते संस्कार झाले आहेत आणि आपण ते किती टिकवून ठेवले आहेत यावरच ही प्रेमाची, विरहातून निर्माण होणार्या आर्ततेच्या भावनेची तीव्रता अवलंबून असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांची ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ ही कविता.

जीवनाविषयी अखंड आशावादी असणारा, तार्यांशी करार करणारा, क्रांतीचा जयजयकार करणारा हा कवी जेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखदुःखाशी समरस होतो, अंतर्मुख होतो तेव्हा …

परस्पर विरोधी परिस्थितीचे नेमके वर्णन कवीने या कवितेत केले आहे. प्रलोभन आणि संयम यात होणारे द्वंद्व  कवितेत सहजपणे दिसून येते. नेमक्या शब्दांच्या वापरामुळे कवी मोजक्या शब्दात खूप काही सांगून जातो. विजेच्या दीपांना तारकादळे म्हटल्यामुळे त्यांची संख्या, व्याप्ती सहजपणे डोळ्यासमोर येते. श्रीमान इमारतींचा थाट हे शब्द वाचल्यावर मरिन ड्राइव्ह सारखा सागर किनारा आठवत नाही का ? लालस विलासापेक्षा करूण विलासच मन आकृष्ट करून घेतो.

लयबद्ध, प्रवाही अशी ही कविता वाचून झाल्यावर आपण त्यातून लगेच बाहेर पडू शकत नाही. आपण ती कविता पुन्हा वाचतो आणि मनात विचारांचे तरंग उठू लागतात. आपल्यालाही काहीतरी आठवते. हे आठवायला लावणं, विचार करायला लावणं हेच कवितेचं यश आहे.

जाता जाता आठवण होते ती आणखी एका कवितेची. स्वा. सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेची. ‘नभी नक्षत्रे’ किंवा ‘प्रासाद इथे……आईची झोपडी प्यारी’ या सारख्या ओळी सहज आठवतात. किंवा गदिमा यांच्या “धुंद येथ मी” या गीतातील शब्दही मनात गुणगुणले जातात. एक चांगली कविता वाचताना दुसर्या एक दोन चांगल्या कविता आठवाव्यात आणि आपला काव्यानंद वाढत जावा ही कविच्या कलाकृतीची यशस्विता नाही काय ?

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

अध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता ☆ पद्यानुवाद – अष्टदशोऽध्याय: अध्याय (16) ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

अध्याय 18  

(सन्यास   योग)

(कर्मों के होने में सांख्यसिद्धांत का कथन)

 

तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः ।

पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ।।16।।

करने वाले को अगर कर्ता का अभिमान

तो समझो वह मंदमति ,है उसको अज्ञान।।16।।

 

भावार्थ :  परन्तु ऐसा होने पर भी जो मनुष्य अशुद्ध बुद्धि (सत्संग और शास्त्र के अभ्यास से तथा भगवदर्थ कर्म और उपासना के करने से मनुष्य की बुद्धि शुद्ध होती है, इसलिए जो उपर्युक्त साधनों से रहित है, उसकी बुद्धि अशुद्ध है, ऐसा समझना चाहिए।) होने के कारण उस विषय में यानी कर्मों के होने में केवल शुद्ध स्वरूप आत्मा को कर्ता समझता है, वह मलीन बुद्धि वाला अज्ञानी यथार्थ नहीं समझता।।16।।

 

Now, such being the case, he who, owing to untrained understanding, looks upon his Self, which is isolated, as the agent, he of perverted intelligence, sees not.।।16।।

 

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८

vivek1959@yahoo.co.in मो ७०००३७५७९८

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार # 53 ☆ आंधी ☆ सुश्री नीलम सक्सेना चंद्रा

सुश्री नीलम सक्सेना चंद्रा

(सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी  सुप्रसिद्ध हिन्दी एवं अङ्ग्रेज़ी की  साहित्यकार हैं। आप अंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय /प्रादेशिक स्तर  के कई पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं । हम आपकी रचनाओं को अपने पाठकों से साझा करते हुए अत्यंत गौरवान्वित अनुभव कर रहे हैं। सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार शीर्षक से प्रत्येक मंगलवार को हम उनकी एक कविता आपसे साझा करने का प्रयास करेंगे। आप वर्तमान में  एडिशनल डिविजनल रेलवे मैनेजर, पुणे हैं। आपका कार्यालय, जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है।आपकी प्रिय विधा कवितायें हैं। आज प्रस्तुत है आपकी  एक भावप्रवण रचना “आंधी”। )

आप निम्न लिंक पर क्लिक कर सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी के यूट्यूब चैनल पर उनकी रचनाओं के संसार से रूबरू हो सकते हैं –

यूट्यूब लिंक >>>>   Neelam Saxena Chandra

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार # 53 ☆

☆  आंधी ☆

जब पता होता है ना

कि हम सही पथ पर हैं

और सच्चाई हमारी साथी है,

तो ज़हन के भीतर

एक आंधी सी चलने लगती है

जो हर अंग को जोश और उत्साह से

रंगीन गुब्बारे की तरह भर देती है,

खोल देती है सारे दरवाज़े

जो वक़्त ने बंद कर दिए होते हैं,

लॉक डाउन कर देती है

सभी नकारात्मक विचारों का

और दिमाग के सारे तालों की

चाबी ढूँढ़ लाती है!

 

‘गर तुम्हें अपने पर

पूरा भरोसा है

तो चल जाने दो आंधी,

बिना किसी डर के और भय के!

पहले बड़ी उथल-पुथल होगी,

पर फिर धीरे-धीरे

जैसे-जैसे आंधी थमेगी

सब हो जाएगा साफ़!

 

हो सकता है

तब तुम झूलने लगो

धनक के सात रंगों के झूलों पर!

 

© नीलम सक्सेना चंद्रा

आपकी सभी रचनाएँ सर्वाधिकार सुरक्षित हैं एवं बिनाअनुमति  के किसी भी माध्यम में प्रकाशन वर्जित है।

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि ☆ आह्वान ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ संजय दृष्टि  ☆ आह्वान 

कह दो उनसे

संभाल लें

मोर्चे अपने-अपने,

जो खड़े हैं

ताक़त से मेरे ख़िलाफ़,

कह दो उनसे

बिछा लें बिसातें

अपनी-अपनी,

जो खड़े हैं

दौलत से मेरे ख़िलाफ़,

हाथ में

क़लम उठा ली है मैंने

और निकल पड़ा हूँ

अश्वमेध के लिए…!

 

©  संजय भारद्वाज 

(कविता संग्रह योंही से)

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 75 ☆ व्यंग्य – बिजली बैरन भई ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, अतिरिक्त मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) में कार्यरत हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है।  उनका कार्यालय, जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। आज प्रस्तुत है श्री विवेक जी का  एक विचारणीय  व्यंग्य बिजली बैरन भई।  इस विचारणीय आलेख के लिए श्री विवेक रंजन जी  का  हार्दिकआभार। )

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 74 ☆

☆ व्यंग्य – बिजली बैरन भई

ज्यादा नहीं कोई पचास सौ बरस पुरानी बात है, तब आज की तरह घर-घर बिजली नहीं थी, कितना आनंद था। उन दिनों डिनर नहीं होता था, ब्यारी होती थी। शाम होते ही लोग घरों में लौट आते थे। संध्या पूजन वगैरह करते थे, खाना खाते थे। गांव – चौपाल में लोक गीत, रामायण भजन आदि गाये जाते थे। ढबरी,लालटेन या बहुत हुआ तो पैट्रोमैक्स के प्रकाश में सारे आयोजन होते थे।

दिया बत्ती करते ही लोग जय राम जी की करते थे। राजा महाराओं के यहां झाड़ फानूस से रोशनी जरूर होती थी।  और उसमें नाच गाने का रास रंग होता था, महफिलें सजती थी।  लोग मच्छरदानी लगा कर चैन की नींद लेते थे और भोर भये मुर्गे की बांग के साथ उठ जाते थे, बिस्तर गोल और खटिया आड़ी कर दी जाती थी।

फिर आई ये बैरन बिजली, जिसने सारी जीवन शैली ही बदल कर रख दी। अब तो जैसे दिन वैसी रात। रात होती ही नहीं, तो तामसी वृत्तियां दिन पर हावी होती जा रही है। शुरू-शुरू में तो बिजली केवल रोशनी के लिए ही उपयोग में आती थी,फिर उसका उपयोग सुख साधनों को चलाने में होने लगा, ठंडक के लिये घड़े की

जगह  फ्रीज ने ले  ली।  वाटर हीटर, रूम हीटर उपलब्ध हो गए। धोबी की जगह वाश मशीन आ गई ।  जनता के लिये शील अश्लील चैनल लिये चौबीसो घंटे चलने वाला टीवी वगैरह हाजिर है। कम्प्यूटर युग है। घड़ी में रोज सुबह चाबी देनी पड़ती थी, वह बात तो आज के बच्चे जानते भी नहीं आज जीवन के लिये हवा पानी सूरज की रोशनी की तरह बिजली अनिवार्य बन चुकी है। कुछ राजनेताओं ने खुले हाथों बिजली लुटाई, और उसी सब का दुष्परिणाम है कि आज बिजली बैरन बन गई है।

बिजली है, और उसके चाहने वाले ज्यादा, परिणाम यह है कि वह चाहे जब चली जाती है, और हम अनायास अपंग से बन जाते हैं, सारे काम रूक जाते हैं, इन दिनों बिजली से ज्यादा तेज झटका लगता है- बिजली का बिल देखकर। जिस तरह पुलिसवालों को लेकर लोकोक्तियॉं प्रचलन में है कि पुलिस वालों से दोस्ती अच्छी है न दुश्मनी। ठीक उसी तरह जल्दी ही बिजली विभाग के लोगों के लिए भी कहावतें बन गई हैं।

बिजली के साथ एक बड़ी समस्या यह है कि इसे कहीं भरकर नहीं रखा जा सकता, जैसे पानी को टंकी में रखा जा सकता है। किंतु समय ने इसका भी समाधान खोज निकाला है, और जल्दी ही पावर कार्डस हमारे सामने आ जायेंगे। तब इन पावर कार्ड्स के जरिये, बिजली का पेमेंट हो सकेगा, वही कल के प्रति आश्वस्ति के लिये लोग ठीक उसी तरह ढेरों पावर कार्ड खरीद कर बटोर सकेंगे

जैसे आज कई गैस सिलेंडर रखे जाते है। सोचिये ब्लैकनेस को दूर करने वाली बिजली को भी ब्लैक करने का तरीका ढूंढ निकालने वाले ऐसे प्रतिभावान  का हमें किस तरह सम्मान करना चाहिए।

बिजली को नाप जोख को लेकर इलैक्ट्रोनिक मीटर की खरीद और उनके लगाये जाने तक, घर-घर से लेकर विधानसभा तक, खूब धमाके हुये। दो कदम आगे, एक कदम पीछे की खूब कदम ताल हुई और जारी है। सौभाग्य योजना कई के लिए दुर्भाग्य बन रही है, बिल वसूली टेढ़ी खीर होती जा रही है,  बिजली के वोट में बदलने के गुर नेता जी सीख गए हैं। निजीकरण के नाम पर बिजली घर सारा, इंफ्रास्ट्रक्चर बेच वंशी बजाने के  मूड में सरकार है। कर्मचारियों की आवाज आ रही है। बिजली बैरन भई। ग्रिड फेल हो रहा है, बेहाल जनता चिल्ला रही है बिजली बैरन भई

 

© विवेक रंजन श्रीवास्तव, जबलपुर

ए १, शिला कुंज, नयागांव,जबलपुर ४८२००८

मो ७०००३७५७९८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares