☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ११ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
विस्तीर्ण, ओसाड माळावरचे सप्तपर्णीचे दोन प्रचंड वृक्ष पाहून रविंद्रनाथांच्या वडिलांनी तो माळ विकत घेतला व तिथे ‘शांतिनिकेतन’ नावाची छोटीशी बंगली बांधली. तिथे ते दोघे, रविंद्रनाथ व त्यांचे वडिल राहू लागले. वडिलांबरोबर रविंद्रनाथांनी हिमालयात भ्रमंती केली. या तीन महिन्यांच्या प्रवासात ते त्यांच्याकडून खूप कांही शिकले. शाळेच्या भिंतींतून मुक्तता झाल्यानंतरच शिक्षणातील आनंद त्यांना गवसला. आणि शांतिनिकेतन च्या निर्मितीचं बीज त्यांच्या मनात रुजले.
शाळा सुरू करण्यासाठी ते १९०१ साली पत्नी व दोन मुलांसह शांतिनिकेतनात आले. तिथला शाळेचा व कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी त्यानी; जग्गनाथपुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या हौसेने बांधलेला बंगला विकून टाकला. त्यांच्या पत्नीने आपले सर्व दागिने विकले.
निसर्गाला गुरू मानून, मुलांच्या मनातलं कुतूहल जिवंत ठेऊन, मुलांना समजणाऱ्या भाषेतून, त्यांच्या ओळखीच्या, आवडणाऱ्या प्रसंगवर्णनातून दिलेलं शिक्षण जास्त उपयुक्त ठरेल याबद्दल गुरूदेवांना खात्री होती. त्यासाठी त्यांनी स्वतः पाठ्यपुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेले ‘सहज पाठ’ आजही प. बंगालमधील शाळांत शिकविले जातात.
‘साधन’ असणाऱ्या पुस्तकांना ‘साध्य’ मानणाऱ्या परिक्षा पद्धतीचा त्यांना तिटकारा होता. त्यांच्या मते बुद्धीचा विकास म्हणजे कल्पनाशक्ती, सर्जनशील मुक्त विचार व जिज्ञासा यांचा विकास!
विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे यावर ते ठाम होते. एखादी व्यक्ती व्यावसायिक शिक्षण किंवा बौद्धिक शिक्षण किंवा मानवता केंद्रित शिक्षण निवडेल किंवा कुणी एखादा ब्रह्मचर्य पाळून आत्मसाक्षात्कार, व्यक्तित्वाचा व चारित्र्याचा विकास हे उद्देश ठेऊ शकतो. यासाठी त्यांनी ब्रह्मचर्य आश्रम सुरू केले होते. निरोगी शरीराचे महत्त्व ओळखून योग, खेळ यांचे शिक्षण अनिवार्य हवे अशी त्यांची धारणा होती.
अध्यापन वास्तविक व व्यावहारिक असले पाहिजे; कृत्रिम आणि सैद्धांतिक नको, यावर त्यांचा भर होता. टागोरांच्या मते, व्यक्ती स्वतःला मातृभाषेत जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकते व योग्यरित्या संवाद साधू शकते. म्हणून त्यांनी शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेवर जास्त भर दिला आहे.
ग्रामीण लोकांच्या गरिबीची चिंता त्यांना होती. शिक्षणाद्वारे गरिबी दूर झाली पाहिजे. त्यासाठी त्यांच्याशी संबंधित क्षेत्रातील विषयात त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले तर ते कुशल कारागीर बनू शकतात. याचसाठी त्यांनी श्रीनिकेतन ही संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू केली.
—–
☆ गीत : ३१ ☆
“PRISONER, tell me, who was it that bound you? ”
“It was my master, ” said the prisoner. I thought I could outdo everybody in the world in wealth and power, and I amassed in
my own treasure-house the money due to my king. When sleep overcame me I lay upon the bed that was for my lord, and on waking up I found I was a prisoner in my own treasure-house. “
“Prisoner, tell me who was it that wrought this unbreakable chain? ”
“It was I, ” said the prisoner, “who forged this chain very carefully. I thought my invincible power would hold the world captive leaving me in a freedom undisturbed. Thus night and day I worked at the chain with huge fires and cruel hard strokes. When at last the work was done and the links were complete and gunbreakable, I found that it held me in its grip. “
WHEN it was day, they came into my house and said, “We shall only take the smallest room here. ”
They said, “We shall help you in the worship of your God and humbly accept only our own share of his grace”; and then they took their seat in a corner and they sat quiet and meek.
But in the darkness of night I find they break into my sacred shrine, strong and turbulent, and snatch with unholy greed the offerings from God’s altar.
तांडव हा एक प्राचीन नृत्यप्रकार आहे. हे पुरुषप्रधान नृत्य असून ते शिवाने प्रवर्तित केले. संगीत रत्नाकरात (७. ५. ६) दिलेली तांडवाची उत्पत्ती अशी…
प्रयोगमुद्धतं स्मृत्वा स्वप्नयुक्तं ततो हरः।
तण्डुना स्वगणाग्रण्या भरताय व्यदीदृशत्।।
लास्यमस्याग्रतः प्रीत्या पार्वत्या समदीदृशत्।
बुध्दवाथ ताण्डवं तण्डोर्मर्त्येभ्यो मुनयोsवदन्।।
अर्थः- नंतर शिवाने आपण पूर्वी केलेले उद्धतनृत्य आठवून ते आपल्या गणातील अग्रणी असलेल्या तण्डूकरवी भरतमुनींना दाखविले. तसेच लास्य हे नृत्यही पार्वतीकरवी मोठ्या आवडीने भरतापुढे करवून दाखविले. तण्डूने करून दाखविले ते “तांडव” असे जाणून भरतादी मुनींनी ते नृत्य मानवांना शिकविले.
काही काव्य ग्रंथातून दुर्गा, गणेश, भैरव, श्रीराम इ. च्या तांडवाचे वर्णन आढळते. रावणविरचित शिवतांडव स्तोत्राखेरीज आदि शंकराचार्य रचित दुर्गा तांडव (महिषासुर मर्दिनी संकटाविमोचन स्तोत्र), गणेश तांडव, भैरव तांडव तसेच श्रीभागवतानंद गुरु रचित श्रीराघवेंद्रचरितम् मधे राम तांडव स्तोत्र आहे. असे म्हणतात की रावणाच्या भवनातील पूजन समाप्त झाल्यावर शिवाने, महिषासुराला मारल्यानंतर दुर्गा मातेने, गजमुखाच्या पराभवानंतर गणेशाने, ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदल्यानंतर आदिभैरवाने तर रावणवधाच्या वेळी श्री प्रभुरामचंद्राने तांडव केले होते.
वरील सात प्रकारांपैकी गौरीतांडव आणि उमातांडव ही दोन्ही उग्र स्वरूपाची नृत्ये आहेत. या नृत्यात शिव हा ‘भैरव’ अथवा ‘वीरभद्र’ या स्वरूपात असतो. त्याच्या सोबत उमा अथवा गौरी असते. तो जळत्या चितांनी युक्त अशा स्मशान भूमीत भूतगणांच्या साथीने हे भयानक नृत्य करतो.
(संदर्भः- अ. भा. सं. कोष, खं. ४ पृ. ७३)
संध्यातांडवाचे वर्णन शिवपुराणातील “शिवप्रदोषस्तोत्रा”त आहे. त्यावर आधारित “संध्यातांडव” ही कविता रसिकांसाठी पुढे देत आहे. तिची गुणवत्ता वाचकांनी ठरवावी.
या कवितेतील पहिल्या कडव्यात ‘ळ’ आणि ‘र’ या वर्णांच्या प्रयोगाकडे, साधलेल्या अनुप्रासाकडे वाचकांनी विशेष लक्ष द्यावे. आजपर्यंत कविश्रेष्ठ गदिमांचे “घननीळा लडिवाळा” हे एकमेव गीत “ळ ” या वर्णाच्या योजनेसाठी उदाहरण म्हणून सांगितले जाते. या पृष्ठभूमीवर या कवितेतील ‘ळ’ या वर्णाच्या अनुप्रासाचे महत्व. बघा कसे वाटते ते.
आपला अभिप्राय मात्र प्रार्थनीय आहे आणि त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करतोय.
☆ “संध्या तांडव” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
(राग शंकरा)
☆
भूत गणांचा संघ घेउनी स्मशान भूमिवरी
‘संध्या तांडव’ करितो भैरव सवे सती गौरी।।धृ।।
*
चिता भस्म चर्चिले तनूवर गळा व्याळ माळ
जटाभार माथ्यावर त्यावर चंद्रकोर शीतल
रुंडमाळ, करमाळ रुळतसे विशाळ वक्षावरी
संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।१।।
*
धडाडणाऱ्या चिता भयंकर वाऱ्यावर हलती
कभिन्न काळी भुते नाचती फेर धरुनि भवती
रक्त-कृष्ण वर्णाचे मिश्रण विचित्र भयकारी!
संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।२।।
*
सिद्ध सदाशिव नृत्यालागी त्रिशूळ सरसावुनी
ब्रह्मा दे करताल, वाजवी मृदंग शारङ्पाणी
लक्ष्मी गाई, इंद्र वाजवी रत्नांकित बासरी
संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।३।।
*
घुमू लागले डमरू डिम् डिम्, मृदंग धिं धिं धिगि धिक्