मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ कविता… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

[वृत्त. वनहरिणी (मात्रा ८+८+८+८)]

मी प्रतिभेच्या प्रासादातिल शब्द हवे ते निवडत जातो

वेगवेगळ्या भाव भावना कविते मधुनी गुंफत जातो

यमक साधते नकळत माझ्या वृत्त बद्घता जमून येते

एक एक मी माझी कविता शब्द कृपेने घडवत जातो

काळ सुखाचा असतो जेंव्हा कविता माझी उजळत असते

प्रेमा मधला गंध लेवुनी मनास माझ्या सुखवत असते

क्षण दुःखाचे असता भवती कविता सुध्दा दुःखी होते

तरि आशेचा किरण होउनी धीर देत मज जगवत असते

 *

तिला शारदा बहाल करते अलंकार शब्दांचे भारी

अभंग होते कधी कविता करून येते विठ्ठल वारी

होते दोहा गीत गझल अन् ओवी सुध्दा कविता बनते

स्वातंत्र्याची मशाल बनते अन् क्रांतीची बने तुतारी

 *

ज्ञानोबाची असते वारी ही नाम्याची असे पायरी

अभंग होउन ही तुकयाचे मुक्त हिंडते दारोदारी

मुक्ताईची कान्हाईची जनामायची गाउन ओवी

दळावयाला कांडायाला घरी आणते तीर्थे चारी

© श्री विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९ आणि १० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९ आणि १० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ९ वा – – – 

नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे |

अति स्वार्थबुद्धी न रे पाप साचे|

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे |

न होता मनासारिखे दुःख मोठे |९|

अर्थ : 

समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात की पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य किंवा पैसा त्याज्य समजावा. पैशाची हाव सुटली की माणूस फक्त स्वार्थाचा विचार करतो आणि त्यातून पापाचाच संचय होतो. आणि ज्यामुळे पापकर्माची फळे भोगावे लागतात असे कर्म खोटे म्हणजे त्याज्य आहे. स्वार्थाची इच्छा धरणारा माणूस त्याच्या मनासारखे झाले नाही की दुःखी होतो.

मागील श्लोकात समर्थांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवून सज्जनांना संतुष्ट करावे असे सांगितले आहे. या श्लोकात समर्थ आपल्याला दुसऱ्याच्या पैशाचा किंवा संपत्तीचा लोभ ठेवू नये असे सांगत आहेत. पुढीलांचे या शब्दाचे अनेक अर्थ होतात. पुढीलांचे म्हणजे पूर्वजांचे असाही अर्थ घेता येतो आणि दुसऱ्यांचे हाही अर्थ या ठिकाणी लागू होतो. त्याचप्रमाणे दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या पिढीसाठीचे. आपल्या पूर्वजांनी कमावलेले धन आयतेच आपल्याला मिळावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु अशा प्रकारची अभिलाषा धरली तर आपल्या कर्तृत्वाला फारसा वाव मिळत नाही. माणूस आळशी बनतो आणि अनेक दुर्गुण त्याच्या अंगात प्रवेश करतात. पूर्वजांच्या संपत्तीसाठी (वारसा हक्कासाठी)होणारी भांडणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भानगडी, कोर्टकचेऱ्या आपणा सर्वांना परिचित आहेत.

स्वार्थ कोणाला चुकला आहे? लहान मुलाला सुद्धा आपला स्वार्थ कळतो. त्यामुळे आपली गरज भागेल एवढे जरूर मिळवावे. परंतु गोंधळ होतो तो अती स्वार्थ बुद्धीमुळे. आपल्या चरितार्थासाठी आवश्यक तेवढा पैसा जरूर मिळवावा. पण पुढील पिढ्यांसाठी त्याचा संचय करू नये असेही समर्थ आपल्याला सुचवत आहेत. गोंदवलेकर महाराज म्हणत, “घरात तीन दिवसांचे अन्न असले म्हणजे चौथ्या दिवसाची चिंता करू नये. ” परंतु प्रत्यक्षामध्ये आपण असे पाहतो की साधारणतः तीन पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती असतानाही लोकांना अधिकाधिक संपत्तीची हाव असते.

पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य किंवा पैसा नको. ते कोणत्याही प्रकारे घेणे म्हणजे एक प्रकारची चोरीच आहे. मग पैसा मिळवायचाच नाही का? प्रापंचिक माणसाला तर पैसा आवश्यकच असतो. अगदी साधू संन्यासी यांना देखील अन्न, वस्त्र, निवारा यांची आवश्यकता असतेच. मग पैसा कसा मिळवावा? याचे उत्तर संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘ जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हे आहे. अशा पद्धतीने पैसा मिळवला तर तो धर्माला मान्य आहे. सरळमार्गी राहून पैसा मिळवता येत नाही अशा प्रकारची साधारण समजूत आहे. परंतु कष्टाने आणि सरळ मार्गाने पैसा मिळवून श्रीमंत झालेल्यांची अनेक उदाहरणे समाजात आहेत. परंतु त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही. पण अशी उदाहरणे आदर्श म्हणून समाजासमोर ठेवली गेली पाहिजेत.

असे म्हणतात की माणसाच्या गरजा पूर्ण करता येतात परंतु हाव पूर्ण करता येत नाही. म्हणून गरजेपुरते असले की माणसाने समाधानी असावे. परंतु तसे होत नाही. म्हणून आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीकडे पहावे असे म्हटले जाते. कारमध्ये फिरणाऱ्या माणसाने मोटरसायकलवर फिरणाऱ्या माणसाकडे पाहून आपण त्यापेक्षा भाग्यवान आहोत असे समजून समाधान मानावे. मोटरसायकलवाल्याने सायकल चालवणाऱ्याकडे, सायकलवर असणाऱ्याने पायी चालणाऱ्याकडे लक्ष द्यावे म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत हे लक्षात येईल. परंतु असे होत नाही. आपण नेहमी उलटच करत असतो. श्रीमंत अतिश्रीमंताकडे पाहत असतो आणि स्वतःला दुःखी करून घेत असतो.

अतिस्वार्थ बुद्धीमुळे आपल्याला अधिक हवे असे वाटत असते आणि मग ते कोणत्याही मार्गाने मिळवण्यात काही गैर वाटत नाही. परंतु असे करत असताना आपण पापकर्मांचाच संचय करत जातो. गैरमार्गाने पैसा कमावणारे लोक समाजात सुखाने जगताना दिसतात. ते पाहून आपणही तसे करावे असे वाटणे साहजिक असते. परंतु कर्माच्या सिद्धांतानुसार अशा लोकांना देखील आपल्या पापाचा हिशेब द्यावाच लागतो. ज्यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप आहेत असे भ्रष्ट नेते एखाद्यावेळी न्यायालयातून निर्दोष सुटतीलाही परंतु नियती हे असे न्यायालय आहे की जिथे आपल्या कर्मांचा योग्य तो हिशेब होतोच. तिथे कोणाचीही सुटका नाही. अधिकाधिक पैसा कमावण्याचा हव्यास लागतो तेव्हा अनेक प्रकारच्या चिंता, दडपण, स्पर्धा यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यातूनच मग दडपण, निद्रानाश, अपचन, रक्तदाब, हृदयविकार यासारख्या अनेक विकारांना निमंत्रण मिळते. त्यामानाने सरळ मार्गाने वागणारा माणूस खाऊन पिऊन सुखी आणि समाधानी असतो. पैशाची, संपत्तीची आणि सत्तेची हाव सुटलेल्या माणसाला जेव्हा त्याच्या मनासारखे होत नाही तेव्हा मोठ्या दुःखाला सामोरे जावे लागते. धनवृद्धीसोबत जर चिंतावृद्धी होत असेल तर काय उपयोग? समर्थांचा इशारा स्पष्ट आहे —

– – द्रव्य मिळव, पण द्रव्याचा दास होऊ नकोस.

– – संपत्ती कमव, पण स्वार्थाचा संचय करू नकोस.

स्वसंवाद : 

  • माझ्या मनात दुसऱ्याच्या संपत्तीबद्दल आकर्षण किंवा हेवा आहे का?
  • मी गरज आणि हाव यातील फरक ओळखतो का?
  • पैसा कमावताना माझा मार्ग प्रामाणिक आणि नीतिमान आहे का?
  • अधिकाधिक मिळवण्याच्या धडपडीत माझे समाधान हरवत तर नाही ना?
  • धनवृद्धीबरोबर माझी चिंताही वाढते आहे का?

– – – 

श्लोक १० वा – – – 

सदा सर्वदा प्रीती रामी धरावी|

दुःखाची स्वये सांडी जीवी करावी|

देहेदुःख ते सुख मानीत जावे| 

विवेके सदा सस्वरूपी भरावे |१०|

अर्थ:

या श्लोकात समर्थ आपल्याला भगवंतावर प्रेम करायला सांगतात. प्रारब्धामुळे जे दुःख आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचे वाईट वाटून न घेता त्या जाणिवेचा त्याग करायला शिकावे. देहाच्या दुःखाला सुख मानण्याचा अभ्यास करावा. योग्य आणि अयोग्याचा विवेक करून आपले मन सस्वरुपी स्थिर करावे.

प्रेम करणे हा मनुष्यस्वभाव आहे. प्रत्येकाचे कोणावर तरी किंवा कोणत्यातरी वस्तूवर प्रेम असते. कंजूष माणसाचे धनावर प्रेम, विषयलंपट माणसाचे विषयावर प्रेम, कोणाला सत्ता प्रिय असते. असे प्रेमाचे विविध विषय असतात. प्रेमातून आनंद मिळतो परंतु हा आनंद चिरकाल टिकणारा नसतो. प्रेमाचा विषय चुकला तर दुःख पदरी पडणारच! मदिरेच्या प्रेमात धुंद होऊन (चित्रपटात दाखवल्याप्रमाणे)देवदास बनण्यापेक्षा भगवंताचे प्रेम लागून त्याचे म्हणजे देवाचे दास होणे कधीही चांगले. या प्रेमातून जो आनंद मिळेल तो चिरंतन असेल. म्हणूनच समर्थ म्हणतात ‘सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. ‘

आपण मनुष्य जन्मात आलो आहोत तेव्हा सुखदुःख हे असणारच. परमेश्वराने जेव्हा मानवी अवतार धारण केला तेव्हा त्याला किंवा संतांना देखील सुखदुःखे चुकली नाहीत. मग आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा! आपण सुखाने आनंदतो आणि दुःखाने दुःखी होतो. परंतु या ठिकाणी दुःखाचा त्याग करायला शिका असे समर्थ आपल्याला सांगतात. थोडक्यात असे म्हणता येईल की दुःखाची जाणीवेला आपल्या मनात स्थान देण्यापेक्षा परमेश्वराच्या चिंतनाकडे जर लक्ष दिले तर दुःख हलके होईल.

हा दुःखाचा त्याग करणे म्हणजे मनाला एक प्रकारचे वळण लावणे आहे. ही गोष्ट सहजासहजी होणारी नाही. त्यासाठी समर्थ सांगतात की देहाला जे दुःख होते त्यालाच सुख मानून पुढे चालावे. याचा अर्थ प्रारब्धाने जे दुःख आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचे वाईट वाटून न घेता त्याचा स्वीकार करावा आणि आपले कर्म करावे. बऱ्याच लोकांना आपल्या आजाराचा आणि दुःखाचा बाऊ करण्याची सवय असते. दुसऱ्यासमोर आपल्या दुःखाचे वारंवार प्रदर्शन करून ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यामुळे फारसे काही साध्य होत नाही. सतत अशी तक्रार करणारी माणसे इतरांना नकोशी होतात. प्रारब्धाने जे दुःख आपल्या वाट्याला आले आहे ते स्वीकारण्याची आणि त्यालाच सुख मानण्याची वृत्ती जेव्हा आपली होईल तेव्हा सुखाचा वेगळा शोध घेण्याची आवश्यकता राहणार नाही. असेल त्या परिस्थितीतही आपण आनंदी, सुखी आणि समाधानी राहू.

आपल्या अवतीभवती जर नजर टाकली तर आपल्याला ज्यांना अनेक प्रकारचे शारीरिक त्रास किंवा व्याधी आहेत असे लोक आपल्या दृष्टीस पडतात. परंतु त्यातील बरेच लोक त्यांचा स्वीकार करून आपले जीवन ध्येय जे आहे त्या मार्गावर वाटचाल करताना दिसतात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना मज्जासंस्थेचा गंभीर आजार झाला तरी देखील त्यांनी आपले संशोधन कार्य सुरूच ठेवले. प्रसिद्ध नृत्यांगना असलेल्या सुधा चंद्रन यांना आपला एक पाय अपघातात गमवावा लागला. परंतु त्यांनी जिद्दीने त्यावर मात केली. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. थोडक्यात सांगायचे तर: या व्यक्तींनी आपल्या शारीरिक मर्यादांना आपली कमकुवत बाजू न बनवता, त्यांना आपली ताकद बनवले. “शरीराला अपंगत्व असू शकते, पण मनाला नाही, ” हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.

म्हणून समर्थ म्हणतात की माणसाने विवेकाची कास धरून स्वस्वरूपाचे चिंतन करावे. मी म्हणजे देह नाही. त्यामुळे देहाला होणाऱ्या दुःखाशी माझा खऱ्या अर्थाने संबंध नसून मी म्हणजे एक आनंदस्वरूप आत्मा आहे अशी भावना मनाशी दृढ करावी. त्यासाठी भोवतालच्या परिस्थितीकडे साक्षी भावाने पाहता यायला हवे. साधकाने आत्मस्वरूपाच्या चिंतनातच (म्हणजेच भगवंताच्या नामस्मरणात)इतके रंगून जावे की त्याला त्यामुळे दुःखाची जाणीव सुद्धा होणार नाही.

स्वसंवाद : 

  • माझे प्रेम नेमके कशावर आहे — नश्वर गोष्टींवर की चिरंतन तत्त्वावर?
  • एखादे दुःख आले की मी त्याचा बाऊ करतो, की शांतपणे स्वीकारून पुढे चालतो?
  • माझ्या देहाच्या त्रासाशी मी पूर्णपणे एकरूप होतो का, की मी त्याचा साक्षी राहू शकतो?
  • विवेकबुद्धी वापरून मी परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांमध्ये फरक करू शकतो का?
  • माझे मन नामस्मरणात किंवा आत्मचिंतनात किती वेळ रमते? (क्रमशः)

 – क्रमशः श्लोक ९ आणि १०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अर्कपत्र पहुडावी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अर्कपत्र पहुडावी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(अष्टाक्षरी)

सूर्याचे तेज नभी

सूर्यकिरण चमचमती

अर्कपत्र पहुडावी

बहु सुंदर होय क्षिती

*

तेज मला मोहविते

जाईन मी त्या तिकडे

मातीवर फुललेले

कनकाचे जणू रुपडे

*

सूर्यवर्त, दिवाकर

अर्कादल म्हणती फुला

सूर्यकमल, सूर्यकांती

काय म्हणू सांग तुला

*

दिशा देई रवीकर तुज

वळशी तू त्या संगे

सूर्योदय सूर्यास्ता

प्रवास हा किती रंगे

*

पाहताच तुझ्याकडे

चैतन्ये सळसळती

चित्रपतंगास मोह

भिरभिरती बागडती

*

पिवळी पिवळी कुरणे

शब्द होती दिवाणे

सूर्यफुला ऐक जरा

कवनाचे नजराणे

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कोरा कॅनव्हास… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कोरा कॅनव्हास… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

कोरा कॅनव्हास घेऊन हाती 

विठ्ठल रुक्मिणी विवाह रेखीला 

भाव सुंदर असा सोहळा 

पण कसा कुणी तो न देखीला 

*

कुठे आहे असे चित्र यावर 

विचारता त्या चित्रकाराला 

म्हणाला पंढरपूरला सारे सोहळ्यास जाता

कसे दिसतील ते इथे तुम्हाला?

*

वसंतपंचमी आहे म्हणूनी

रेखीली सरस्वती हंसवाहिनी

ती पण कुठे दिसत का नाही

सांग झणी मला समजावूनी

*

कसे सांगू तुम्हा का न दिसे ती

चित्रकार तो बोले हसूनी

पहा माझी कला वाढवण्या

बसली माझ्या करात येऊनी||

*

गवत खाणाऱ्या गायीचे चित्र

कुठे आहे विचारता खोदूनी

 म्हणे गवत खाऊन संपले म्हणूनी

गायही तेथून गेली निघूनी||

*

अशा अगणीत चित्रांचे कोलाज

आहे या कोऱ्या कॅनव्हास वरती

मनःचक्षुने पाहता त्याकडे

चित्रे त्यातील स्पष्ट दिसती||

*

दिसते तसे कधीच नसते

म्हणून तर जग फसत असते

करता विचार तर्क शुद्धीने

चित्र त्यावर सहज प्रकटते||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३०५ ☆ गझल… आयुष्य ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३०५ ?

गझल आयुष्य ☆  प्रभा सोनवणे ☆

हे पात्र नदीचे सुशांत.. अवखळ नाही

जगण्यात अता कुठलेही वादळ नाही

*

आयुष्य कधी थांबते का कुणासाठी ?

हृदयात जराही तसली  खळबळ नाही

*

तू ठेव तिथे लपवून तुझी गाऱ्हाणी

सरकार म्हणे आम्हाला कळकळ नाही

*

बाईस विचारा काय पाहिजे आहे ?

गावात तिच्या मुक्तीची चळवळ नाही

*

की मूग गिळावे आणि मूकच रहावे ?

मी त्यांच्या इतकी मुळीच सोज्वळ नाही

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनाचा मागोवा… ☆ प्राची अभय जोशी ☆

प्राची अभय जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ मनाचा मागोवा… ☆ प्राची अभय जोशी ☆

असं वाटतं मन एक…

 

 तेवणारी वात व्हावे,

 काळोख विझवणारे

मातीसारखे सुपीक व्हावे

 सृष्टीला फुलवणारे..

 

मन एक आधार व्हावे,

 कोणाच्या दुःखाचे अन्

खळाळता झरा व्हावे,

 आनंद उधळणारे..

 

मन उंच उडणारा पतंग,

 पक्षांसवे विहरणारे

झाडांमध्ये लपलेल्या,

 घरट्यात डोकावणारे..

 

मन एक आकाश व्हावे,

 इंद्रधनुसम रंगांचे

रिमझिम सोन सरींना,

 ओंजळीत घेणारे.

 

मन एक कृष्ण व्हावे

 गोप गोपींच्या श्रद्धेचे

मैत्रीत भिजलेल्या,

 सुदाम्याच्या पोह्यांचे..

 

मन एक असा मागोवा,

 माझे मीपण सरण्याचा

मनाच्या हिंदोळ्यात विसावा,

 माझ्या मनातील,

 निश्चल भावनेचा…

 निश्चल भावनेचा…

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुनियेतील सारे रंग तिच्याचमुळे…” – (अनुवादित) हिन्दी कवी : अज्ञात ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? मनमंजुषेतून ?

☆ “दुनियेतील सारे रंग तिच्याचमुळे…” – (अनुवादित) हिन्दी कवी : अज्ञात ☆ प्रा.भारती जोगी ☆

स्त्री नेच तर केली आहे ना तिच्या हातांनी, विविध रंगांची उधळण,

पहिल्यांदा फाल्गुनातच शिकली गुलाल उडवणं.

तिनं पहिल्यांदाच जेव्हा अंगण सजवलं रांगोळीने…

तेव्हाच बहुधा भकास, उदास धरती ला ; रंगांत रंगून जाणं,

आणि जगणं कळलं, आपलेसे केले ते रंग तिने.

 

 

तबकात गुलाल घेऊन निघते ना ती…

तेव्हा चेहरेच नाही रंगवत त्याने;

तर… नात्यांचा रंग पार उडालेल्या भिंती

रंगवून टाकते आपलेपणा च्या रंगात!!

 

 

प्रेमाच्या उबदार स्पर्शाची, लालिमा उमटते तिच्या गाली अन् मोहक हास्यात.

वसंताचं सोनसळी तेज आहे डोळ्यांत.

हरित स्वप्नांची शीतल छाया आहे तिच्या पदरात.

आणि मनाच्या गहिरेपणात आहे आकाशाची निळाई.

 

 

ती जेव्हा हळूच येऊन रंग लावते ना कुणाच्या गालाला… तर जणू म्हणते..

तुच तर आहेस ना रे… माझं ; आपलं माणूस! “

 

 

तिनंच तर उदास, एकाकी घरांचे सण-सोहळे बनविले, साजिरं केलं घरांना.

आपलं दु:ख लपवून, हसणं शिकवलं इतरांना.

 

 

घराच्या भिंती भले ही बनविल्या असतील पुरूषांनी…

पण… त्या भिंतींना घर बनवलं ते स्त्रीनेच!! घरातल्या चुलीच्या धगीत,

आपली स्वप्न वितळवून…

त्याच राखाडी रंगात परिवार रंगवला.

 

 

खरं सांगायचं ना तर…

स्त्री फक्त होळी नाही खेळत;तर…

आपलं सगळं जगणंच दुस-याच्या नावात रंगवून टाकते.

आणि येवढं करूनही काय येतं तिच्या वाट्याला??? … तर…

बस्स्… फिकुटलेला पांढरा रंग!!

कारण सत्य तर हेच आहे ना… की…

स्त्री ने सा-या जगात रंगांची उधळण केली, पखरण केली…

पण जगाने मात्र तिच्या जीवनातले सगळे रंग बळकावून तिला बेरंग केले…

(एका भावलेल्या आणि मनाला भिडलेल्या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद)

हिन्दी कवी : अज्ञात 

अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.

पुणे. 

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १४ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १४ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

टागोरांच्या कुटुंबात अनेक सुप्रसिद्ध चित्रकार होते. मात्र रविंद्रनाथांनी वयाच्या पन्नाशीनंतर चित्रं काढायला सुरवात केली. तरीही त्यांनी जवळ जवळ १५ वर्षांच्या कालावधीत अंदाजे २३०० कलाकृती निर्माण केल्या होत्या. त्यांचे कथासंग्रहदेखिल समर्पक चित्रांनी सजवलेले असत.

कलेच्या अभ्यासकांच्या मते टागोरांची चित्रं Art Nouveau या कलाप्रकारामुळे जगापर्यंत पोहोचली. Art Nouveau ही एक कला चळवळ होती. त्यात लोककलेचं मोठ्या प्रमाणात चित्रण असायचं.

१९३० मध्ये टागोरांची ३०० चित्रं असलेली प्रदर्शने युरोपात लंडन, पॅरिस व बर्लिन मधे भरवण्यात आली होती.

त्यांनी आपली अनेक चित्रं निरनिराळ्या कलासंग्रहालयांना भेट दिली होती. बर्लिनच्या नॅशनल गॅलरीला १०० एक पेंटिंग्ज त्यांनी भेट दिली होती. त्यातील अनेक पेंटिंग्स नंतर लंडनमधील संग्रहालयात गेली. जी पाच चित्रं बर्लिनच्या संग्रहालयात शिल्लक होती, त्यात पक्ष्यांची आणि माणसांची चित्रं होती, पैकी एक लाल रोबमध्ये असलेल्या मुलीचंही चित्र होतं. ही चित्रं त्यांनी शाई आणि पाण्याच्या रंगाने काढली होती. असं म्हणतात की नाझींनी ही चित्रं तिथून काढून टाकली. कांही लिलावात खाजगी संग्राहकांना दिली असावीत. कांही चित्रं टागोरांना परत पाठवली असावीत. शेवटी त्यांचं फक्त एकच चित्र बर्लिन येथील संग्रहालयात शिल्लक राहिलंय, हे मात्र खरं!

—– 

☆ गीत ४० ☆

THE rain has held back for days and days, my God, in my arid heart. The horizon is fiercely naked ⎯ not the thinnest cover of a soft cloud, not the vaguest hint of a distant cool shower.

Send thy angry storm, dark with death, if it is thy wish, and with lashes of lightning startle the sky from end to end.

But call back, my lord, call back this pervading silent heat, still and keen and cruel, burning the heart with dire despair.

Let the cloud of grace bend low from above like the tearful look of the mother on the day 

of the father’s wrath.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४० ☆

कोरड्या हृदयात माझ्या, थेंब एक ना पाण्याचा 

कितीक दिस झाले, मागमूस ना मेघाचा

*

दयाघना, थांबव ही उपेक्षा, या व्याकुळ मनाची

करूणेस मी पात्र नसेन तर, बरसात कर क्रोधाची

*

देवा, पाठव वादळ, जे दाविल तांडव मृत्यूचे

थरथरता हे नभमंडल, बसतील फटके विजेचे

*

क्रोधाग्नीने पेटून उठती, कधी कधी बाबा जसे

डबडबलेले डोळे दिसती, आईचे मग मला तसे

*
लवू देत ढग खाली, कृपा प्रसाद बरसणारे

असू देत ते क्रूर, भयानक काळजाला कापणारे

*

परत बोलाव, ती भयाण शांतता, मला घेरणारी

अन् उपेक्षेची धग, निराशेच्या गर्तेत लोटणारी


भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत ४१ ☆

WHERE dost thou stand behind them all, my lover, hiding thyself in the shadows? They push thee and pass thee by on the dusty road, taking thee for naught. I wait here weary hours spreading my offerings for thee, while passers by come and take my flowers, one by one, and my basket is nearly empty.

The morning time is past, and the noon. In the shade of evening my eyes are drowsy with sleep. Men going home glance at me and smile and fill me with shame. I sit like a beggar maid, drawing my skirt over my face, and when they ask me, what it is I want, I drop my eyes and answer them not.

Oh, how, indeed, could I tell them that for thee I wait, and that thou hast promised to come. How could I utter for shame that I keep for my dowry this poverty. Ah, I hug this pride in the secret of my heart.

I sit on the grass and gaze upon the sky and dream of the sudden splendour of thy coming ⎯ all the lights ablaze, golden pennons flying over thy car, and they at the roadside standing agape, when they see thee come down from thy seat to raise me from the dust, and set at thy side this ragged beggar girl a-tremble with shame and pride, like a creeper in a summer breeze.

But time glides on and still no sound of the wheels of thy chariot. Many a procession passes by with noise and shouts and glamour of glory. Is it only thou who wouldst stand in the shadow silent and behind them all? And only I who would wait and weep and wear out my heart in vain longing?

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत ४१. ☆

सावळ्या, उभी मी इथे युगानुयुगे

तू मात्र सावली होऊन, भक्तांच्या मागे

*

अनभिज्ञ ते, ढकलून जाताहेत तुला

माझ्या परडीतली फुले घेऊन, तुला वहायला

*

परडी झाली रिकामी, आता तरी ये माझ्यापाशी

तुझ्यासाठी पसरली ही दारिद्र्याची राशी

*

दिवस सरला, हसताहेत सारी मला

परतताना विचारतात ‘काय हवं तुला’

*

नजर खाली झुकवून ‘कांही नाही’ म्हणते

तुझी वचनं, माझं प्रेम, सारं काही लपवते

*

रात्री नभाकडे पहात, पहुडले होते गवतावर

आकाश उजळलं, तू होतास सुवर्णरथावर

*

अचानक उतरलास, मला उचललेस

तुझ्याजवळ बसवून, अनंताकडे नेलेस

*

सारी माणसं स्तब्ध होऊन पहात राहिली

जीर्ण वस्त्रातील ही भिकारीण, लज्जेने थरथरली

ग्रीष्मातल्या वाऱ्याच्या झुळुकेने जशी वेल सुखावली

*

पण दिवास्वप्नच ते… अचानक मी पुन्हा सत्यात

काळ पुढे सरकला, मी मात्र तिथेच त्या रस्त्यात

*

दिंड्या चालल्या, तुझा जयजयकार करत

तू अजून भक्तांच्या सावलीत, मी मात्र रडत

हृदयाच्या पायघड्या अंथरून, तुझी वाट बघत

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—— 

☆ गीत ४२ ☆

EARLY in the day it was whispered that we should sail in a boat, only thou and I, and never a soul in the world would know of this our pilgrimage to no country and to no end.

In that shoreless ocean, at thy silently listening smile my songs would swell in melodies, free as waves, free from all bondage of words.

Is the time not come yet? Are there works still to do? Lo, the evening has come down upon the shore and in the fading light the seabirds come flying to their nests.

Who knows when the chains will be off, and the boat, like the last glimmer of sunset, vanish into the night?

——

☆ मराठी भावानुवाद : गीत ४२ ☆


सकाळी हलकेच म्हणालास

अथांग सागर, दूरचा प्रवास

फक्त तू अन् मी

अनंताच्या वाटेवर

अन् सारे जग अनभिज्ञ…

*

शांत, संथ लाटातून

वाहणारे माझे गाणे

सुरेल धून होईल,

सागर लाटांसारखी

अन् शब्दबंधनातून मुक्त…

*

बघ, संध्याकाळ झाली

पक्षी घरट्याकडे निघाले

संथावलेली संध्या सुद्धा

निशेच्या कुशीत शिरली

अन् मी तुझ्या प्रतीक्षेत…

*

पण अजून ती वेळ

नाही कां रे आली?

कर्मबंधनातून मुक्ती

नाही कां रे मिळाली?

अन् हेच असावं विधिलिखित…

*

साखळ्या कधी सुटणार?

बोट कधी मुक्त होणार?

का अशीच लुप्त होईल

रात्रीच्या गर्द अंधारात?

अन् माझी आशा, सावळ्यात…

 क्रमशः भाग १४.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत बहार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ वसंत बहार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

प्रथमस्पर्श वसंत हृदयी

प्रेमभाव समजले सखया

तोच वारा, तोच गंध फुलोरा

रहस्य एक कळले सखया.

तुज पहाता ऋतूस भाळले

तुझ्यात मन गुंतले सखया

अन् मी राधा तु कृष्ण गोकुळी

जीवन नवे हसले सखया.

स्वप्नांच्या मैफली नित्य नभात

निद्रानाशी मी फसले सखया

कधी पालवीस, पक्षी बोलांना

प्रश्न मनाशी डसले सखया.

कोण बरे तु राजपुत्र असा

स्पंदन माझे हवसले सखया

याच वसंती हरवून स्वतःला

प्रेमाचे सत्य गवसले सखया.

अजून नजर भिरभिरते हे

श्वास भेटीस असुसले सखया

विरहालाही शपथ विश्वासाची

प्रेम अमर प्रसवले सखया.

तुझे अल्लड अजाण जे छेडणे

दोष मनाचे लहरले सखया

बदनामी होई, ओळख प्रीयाची

तुझ्या वसंती बहरले सखया.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ त्या पेल्याशीच जुळली भाग्यरेषा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? त्या पेल्याशीच जुळली भाग्यरेषा… ? श्री आशिष  बिवलकर ☆

दोन थेंबांस महाग झालो मी,

रिक्त पेल्यास चढे माझी नशा |

सहवास एकमेकांचा लाभला,

पहावेना एकमेकांची ही दशा |

*

जीव त्याच पेल्यावर मी लावला,

त्यात शोधत राहिलो दहा दिशा |

पाठ साऱ्या जगानेच दाखवली,

त्याने दाखवली जगायची आशा|

*

सारं काही माझ्या हातून निसटले,

जगाने केला जीवनाचा तमाशा |

तरी डगमगलो नाही प्रसंगांना,

त्याने शिकवली संघर्षाची भाषा |

*

दिवसभर राबराब राबलो असा,

सुखमय केली त्याने माझी निशा |

क्षीण तनामनाचा दूर केला त्याने,

त्याच्या शिवाय न उरली मनीषा |

*

भले जग कितीही म्हणू दे आता,

हातून केली यानेच याची दुर्दशा |

का करू तमा मी स्वार्थी जगाची,

त्या पेल्याशीच जुळली भाग्यरेषा |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares