मराठी साहित्य – विविधा ☆ ऐसे दास्यत्व पत्करावे ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?विविधा ?

☆ ऐसे दास्यत्व पत्करावे ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

ऐसे दास्यत्व पत्करावे !

हनुमान म्हणजे रामरायाचा दास! प्रभुरामाच्या चरणी अगदी लीनतेनं बसणारा… आज्ञाधारक, बुद्धिमान, चपळ, साहसी अशी अनेक विशेषणं ल्यायलेला… याच हनुमानाची एक गोष्ट ऐकली जिनं त्याचं महत्त्व माझ्या मनावर बिंबवलं, त्याच्या उपासनेसाठी प्रवृत्त केलं. कीर्तनकार बुवा म्हणाले … हनुमानचं कर्तृत्व इतकं मोठं की त्यानं लक्ष्मणाप्रमाणेच रामाच्या शेजारी असायला हवं. तरीही तो पायाशीच… का… तर दास म्हणून नव्हे; प्रभुश्रीराम म्हणतात की जो कुणी माझ्याकडे मागणं किंवा गाऱ्हाणं सांगताना नतमस्तक होईल. त्याची नजर आधी माझ्या पायाशी असणाऱ्या या धर्मवीर, कर्तव्यदक्ष हनुमंताकडे जाईल. त्यानं हनुमंताची आराधना करावी. तोच तुमचं मागणं मनोवेगे माझ्यापर्यंत पोहोचवेल. दुसऱ्याच्या दुखाःशी समरस होण्यासाठीची भावोत्कटता हनुमानाजवळ प्रचंड आहे. त्यामुळे शक्य झालं तर तोच तुमचं मागणं पूर्ण करेल.’ हे ऐकताच मन हनुमाच्या विचारांत गुरफटलं… खुद्द रामानेच असं म्हणल्यावर हनुमानाशी जरा जास्तच गट्टी झाली.

दास्यत्व पत्करणं या शब्दाला आपल्याकडे एका संकुचित दृष्टीकोनातूनच पाहिलं जातं. पण मनुष्याच्या प्रगतीसाठी दास्यत्व किती महत्त्वाचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हनुमानासारखं अद्वितीय उदाहरण नाही. 

पुढे कळतेपणी या सगळ्याबद्दल वेगळीच जाणीव झाली. हेच राम आणि हनुमंत वेगवेगळ्या रूपांत दिसू लागले. ‘मन’ म्हणजे हनुमंत आणि ‘बुद्धी’ म्हणजे राम. थोडक्यात बुद्धीपुढं मनानं नतमस्तक व्हावं. कुणीही कितीही नाकारलं तरी आपल्या मनाचे आपण दास असतो हे शंभर टक्के खरं. बुद्धी नेहमी योग्य-अयोग्य जाणून आपल्याला तसा सल्ला देते पण मन… वाहवत जातं… बुद्धीला आततायीपणानं प्रत्युत्तर देतं आणि पस्तावतं. या पस्तावणाऱ्या मनानं हनुमानाचा आदर्श ठेवावा. बुद्धीरुपी रामाचं वेळीच महात्म्य जाणावं. मन चंचल पण सामर्थ्यवान… तर बुद्धी सखोल पण अविचल… आणि जेव्हा या दोन्ही परस्परपूरक गोष्टी एकत्र येऊन काही कार्य घडतं तेव्हा हमखास यश मिळतंच.

अलीकडे तर मन आणि बुद्धी यांची फारच ताटातूट होत आहे. भवताल अस्वस्थ… अनपेक्षित घटनांनी भरलेला… त्यावर कसं व्यक्त व्हावं, त्याच्याशी कसा सामना करावा हे कळणं आकलनापलीकडलं. त्यामुळे मनाची चंचलता इतकी वाढली की बुद्धीलाही भ्रम व्हावा. अशावेळी मनानं दास्यत्व पत्करावं. स्वतःच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून तिला सहकार्य करावं. कारण संकट येतं ते मनाच्या कमकुवतपणामुळे आणि परतवलं जातं तेही मन कणखर झाल्यावरच. जिथं राम आणि हनुमान एक होऊन लढतात तिथं संकट एकटं असो की दशमुखी त्याचा नाश होणारच. म्हणूनच या भवतालातून तारून जाण्यासाठी हनुमानाची उपासना करावी. कारण जिथं रावण नसेल तिथं प्रभूराम असेलच असं नाही पण जिथं भक्त हनुमान असेल तिथं प्रभूराम असणारच.

मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।

वातात्मजं वानरयुथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग २ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग २ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(शर्ववर्मा मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,” महाराज मी तुम्हाला सहा महिन्यात संस्कृत व्याकरण शिकवू शकेन. “) आता पुढे….

गुणाढ्याला ही गोष्ट अशक्य वाटली. त्याने मोठ्या हिरीरीने पैज लावली, “शर्ववर्माने जर  सहा महिन्यात राजाला संस्कृत व्याकरण शिकवून दाखवले  तर मी संस्कृत,पाली प्राकृत या तिन्ही भाषांचा त्याग करेन. “त्याच्या पैजेला उत्तर म्हणून शर्ववर्मा म्हणाला,”जर मी असे करू शकलो नाही तर पुढची बारा वर्षे डोक्यावर तुझ्या पादुका धारण करून वावरेन. “

….आता पैज जिंकणे ही मोठ्या प्रतिष्ठेची बाब झाली. शर्ववर्मा कुमारस्वामींकडून कातंत्र व्याकरण शिकला होता. हेच ते रोजच्या बोलचालीत उपयोगी पडणारे व्यावहारिक  व्याकरण… त्याच्या सहाय्याने त्याने खरोखरच सहा महिन्यात राजाला असे व्याकरण शिकवले की राजाला यापुढे कोणासमोरही बोलताना लज्जित व्हावे लागणार नव्हते.  

राजाचाआनंद गगनात मावेनासा झाला. खूप धनदौलत देऊन त्याने  शर्ववर्माची पूजा केली आणि त्याला नर्मदा तटावरील भृगुकच्छ (भडोच)देशाचा राजा घोषित केले.

मात्र जलक्रीडा प्रसंग… आणि ओघाने आलेला हा पैजेत हरण्याचा प्रसंग… दोन्हीही गुणाढ्याच्या पुढील आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.त्यामुळे त्याच्या जीवनाची दशा आणि दिशाच बदलून गेली. त्याचा वाईट काळ सुरू झाला. कबूल केल्याप्रमाणे त्याने संस्कृत, पाली,प्राकृत भाषेचा त्याग केला. मौन धारण करून विंध्य पर्वतावर जाऊन   त्याने देवी विंध्यवासिनीच्या पूजाअर्चनेत स्वतःला गुंतवून घेतले. कालांतराने तेथील वन-वासीयांकडून तो पैशाची भाषा शिकला. पैशाची भाषा हा प्राकृत भाषेचा उपभेद होता.

गुणाढ्याने तेथे बड्डकहेची (बृहत्कथा)रचना केली. सात वर्षात अथक प्रयास करून सात लाख छंदात त्याने ती लिहून काढली. तीही पैशाची भाषेत! त्यामुळे ती बृहत्कथे ऐवजी बड्डकहा!

विंध्याद्रीच्या घनदाट अरण्यात शाई किंवा भुजपत्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे मनस्वी गुणाढ्याने मृतप्राण्यांच्या कातड्यावर स्वतःच्या रक्ताची शाई करून ही विशाल कथा लिहिली. लिहिता लिहिता गुणाढ्य ती वाचत असे. ती ऐकण्यासारखी तेथे सिद्ध विद्याधरांचा मेळावा जमा होई. त्यातील गुणदेव आणि नंदी देव हे दोघे त्याचे शिष्य झाले. सात वर्षांनी जेव्हा बृहत्कथा लिहून पूर्ण झाली तेव्हा त्याचा प्रचार प्रसार कसा करावा हा प्रश्न गुणाढ्याला भेडसावत होता. त्याच्या शिष्यांच्या मतानुसार फक्त सातवाहन नरेश सारखा योग्य व्यक्तीच या कथेचा प्रसार करू शकला असता. त्यालाही हा सल्ला आवडला. त्याप्रमाणे दोघे शिष्य राजधानीत राजदरबारी जाऊन पोहोचले. त्यांनी गुणाढ्याच्या कृतीवर सविस्तर माहिती पुरवली. पण सात लाख श्लोकांची इतकी मोठी पोथी… पोथी नव्हे पोथाच….तोही  प्राण्यांच्या कातड्यावर … निरस अशा पैशाची भाषेत आणि मनुष्याच्या रक्ताने लिहिलेला!राजाने त्या कृतीकडे पाहण्याचे ही टाळले. अपमान करून त्याने गुणाढ्याच्या शिष्यांना परत पाठवले.

या प्रकारामुळे कवी गुणाढ्य अतिशय दुःखी झाला. जवळच्या एका टेकडीवर त्याने अग्निकुंड तयार केले.उंच उंच उठणाऱ्या ज्वालात आपल्या महान कलाकृतीचे एकेक पान वाचून तो अर्पण करत गेला. त्या श्लोक पठणात इतके  माधुर्य होते की अवतीभोवती वनात राहणारे प्राणी,पशू-पक्षी जमा झाले. एकेक पान अग्निकुंडात जळून जात होते… शिष्य डोळ्यात पाणी आणून हे दृश्य बघत होते ….पशुपक्षी खाण्यापिण्याची शुद्ध हरपून स्तब्ध होऊन डोळ्यात पाणी आणून बृहत्कथा श्रवण करत होते.

इकडे राजवाड्यात सामिष भोजनासाठी चांगले मास उपलब्ध होईना. कारण सारे पशुपक्षी निराहार राहिल्याने हाडे-काडे होऊन गेले होते. त्याचे कारण जाणून घेण्यासाठी विचारपूस, तपास सुरू झाला. त्यामुळे राजाला गुणाढ्य करीत असलेल्या काव्य-कथा हवनाची माहिती मिळाली. राजदरबारात घडलेला प्रकार राजाला आठवला. त्याला पश्चाताप झाला.

आपली चूक सुधारण्यासाठी तो ताबडतोब अरण्यात गेला. त्याला काहीही करून गुणाढ्याला व बड्डकहेला वाचवायचे होते. राजाने साष्टांग दंडवत घालून त्याची माफी मागितली. खूप अनुनय विनवण्यानंतर गुणाढ्याने आपले लेखन अग्नीत अर्पण करायचे थांबवले. पण….तोपर्यंत कथेचा एक सप्तमांश भाग….एक लाख श्लोकच शिल्लक राहिले होते.राजा त्याच्या प्रसार,प्रचाराचे आश्वासन देऊन त्याला त्याच्या अमूल्य वाड़मयाला सन्मानपूर्वक

 आपल्या राजधानीत घेऊन आला.

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग १ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग १ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

इसवी सन पूर्व दोनशे ते तीनशे असा कालखंड … त्यावेळी विंध्य पर्वताच्या दक्षिणेस म्हणजेच साधारण हल्लीचा गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा भाग….त्या काळात तेथे सातवाहन वंशाचे राज्य होते. तर त्यापैकी एका सातवाहन राजाच्या कारकिर्दीत घडलेली ही कहाणी आहे. प्रतिष्ठान( पैठण)प्रदेशात एक छोटेसे गाव होते सुप्रतिष्ठित….तेथे सोमनाथ शर्मा नावाचे एक विद्वान पंडित राहत असत. त्यांचा नातू म्हणजेच गुणाढ्य… तो लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान होता.दक्षिणापथ येथे विद्या प्राप्त करून तो आपल्या गावी परतला. या प्रतिभावान विद्वान तरुणाला सातवाहन नरेशाने मंत्रिपद बहाल केले.

असेच एकदा सातवाहन राजा आपल्या राण्यांबरोबर राजमहालाशेजारी असलेल्या वापीवर (मोठी विहीर) जलक्रीडा करीत होता. एक राणी त्याने उडवलेल्या पाण्याच्या माऱ्याने त्रासुन गेली होती. ती एकदम राजाला म्हणाली,

“मोदकैस्ताडय!”

राजाने ह्या संस्कृत वाक्याचा अर्थ केला होता की मला मोदकांनी( लाडूंनी) मारा. त्यामुळे त्याने ताबडतोब खूप सगळे लाडू आणण्याचा आदेश  सेविकांना दिला. हे बघून ती राणी हसली आणि म्हणाली,” राजन् येथे जलक्रीडेत लाडूंचे काय काम? मी म्हणाले होते ‘मा उदकैःताडय’ म्हणजेच माझ्यावर पाणी मारू नका… आपणास तर संस्कृत व्याकरणातील संधीचे नियम सुद्धा येत नाहीत. शिवाय आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन माझ्या वाक्याचा अर्थ पण लावू शकला नाहीत”. ती राणी संस्कृत पारंगत विदुषी होती. तिने राजाला बरेच काही ऐकवले. ते ऐकून बाकीच्या राण्या पण हसू लागल्या. राजा एकदम लज्जीत झाला. पाण्यातून चुपचाप बाहेर येऊन तो आपल्या महालात निघून गेला. ही गोष्ट त्याच्या जिव्हारी लागली होती. तो एकदम मौन झाला. त्याने ठरवले जर संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवता आले नाही तर तो प्राणत्याग करेल. त्या नंतर राजाने दरबारात जायचे सोडले. इतरांशी बोलणे सोडले.इतकेच काय तो त्या दिवशी जेवला नाही की झोपला नाही.

दुसऱ्या एका शर्ववर्मा नावाच्या मंत्र्यांकडून गुणढ्याला ही हकिकत समजली. राजाचा झालेला अपमान..त्याची पूर्वीपासूनच संस्कृत शिकण्याची असलेली इच्छा याबाबत सर्व समजले. त्यानंतर तो व शर्ववर्मा  योग्य वेळ पाहून राजाला भेटायला गेले. दोघे राजाला बोलते करण्याचा प्रयत्न करू लागले. राजाचा उदास चेहरा पाहून शर्ववर्मा खोटे-खोटे त्याला स्वतःला पहाटेच्यावेळी पडलेले स्वप्न सांगू लागला. त्याच्या स्वप्नात आकाशातून पृथ्वीवर आलेले कमळ… त्याच्या पाकळ्यांना स्पर्श करणारा देव कुमार….त्या स्पर्शाने उमललेल्या कमळातून प्रकट झालेली साक्षात सरस्वती माता ….आणि राजाच्या मुखात शिरून तिने तेथे केलेले वास्तव्य… असे बरेच काही होते. त्याच्या या स्वप्नावर राजाचा विश्वास बसला नाही. पण तो बोलता झाला. म्हणाला,” मी मोठ्या प्रदेशाचा नरेश आहे. अपार धन संपत्ती माझ्याकडे आहे. पण विद्येशिवाय लक्ष्मीला शोभा नसते.” गुणाढ्याकडे वळून तो म्हणाला, “एखादी व्यक्ती परिश्रमपूर्वक किती दिवसात मला व्याकरणासहित संस्कृत शिकू शकेल?”

गुणाढ्य म्हणाला,” राजन्, व्याकरण म्हणजे भाषेचा आरसा… नियमित अभ्यास केला तरी व्याकरण शिकायला बारा वर्षे लागतात. पण मी तुम्हाला सहा वर्षात संपूर्ण व्याकरण शिकवेन. “गुणाढ्य  कोणत्या प्रसंगामुळे राजाला शुद्ध संस्कृत शिकायची तीव्र इच्छा झाली आहे हे ताडू शकला नाही. त्याला ही जाणिव झाली नाही की राजाला महापंडित व्हायचे नाहीय तर फक्त व्यवहारात बोलताना उपयोगी पडेल इतपत संस्कृत भाषेचे व्याकरण शिकायचे आहे. शर्ववर्माच्या मनात तसाही गुणाढ्याबद्दल द्वेष होताच, त्यात ही आयती चालून आलेली संधी!….मोठ्या आत्मविश्वासाने तो म्हणाला, “महाराज मी आपल्याला सहा महिन्यात व्याकरण शिकवू शकतो. “

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विलक्षण श्रीमंत मराठी भाषा… ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ विलक्षण श्रीमंत मराठी भाषा… ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

विलक्षण श्रीमंत मराठी भाषा…

रस्ता – मार्ग

* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.

* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

खरं – सत्य

*  बोलणं खरं असतं.

* सत्याला  सोबत पुरावा जोडावा लागतो.

घसरडं – निसरडं

* पडून झालं की घसरडं.

* सावरता येतं ते निसरडं.

अंधार – काळोख

* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.

* निसर्गात जाणवतो तो काळोख.

पडणं – धडपडणं

* पडणं हे अनिवार्य.

* धडपडणं हे कदाचित सावरणं.

पाहणं – बघणं

* आपण स्वत:हून पाहतो.

* दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.

पळणं – धावणं

* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.

* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.

झाडं – वृक्ष

* जे माणसांकडून लावलं जातं ते झाड.

* जो आधीपासूनच  असतो तो वृक्ष.

खेळणं – बागडणं

* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.

* जे मुक्त असतं ते बागडणं.

ढग – मेघ

* जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग.

* जे नक्की बरसतात ते मेघ.

रिकामा – मोकळा

 * वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा.

* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.😊

निवांत – शांत

*कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.

* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.

आवाज – नाद

* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.

* जो घ॔टेचा होतो तो नाद.

झोका – हिंदोळा

* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका.

* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.

स्मित- हसणं

* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.

* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.

अतिथी – पाहुणा

* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.

* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.

घोटाळा – भानगड

* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.

* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.

आभाळ- आकाश

भरून येतं ते आभाळ.

निरभ्र असत ते आकाश.

आहे की नाही आपली अमृताशीही पैजा जिंकणारी ही मातृभाषा,अतिशय श्रीमंत??😊🙏

 

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फाटकी झोळी…  ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ फाटकी झोळी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

आजवरच्या इतिहासात अनेक समाजसुधारकांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी जनजागृतीचे व्रत स्वीकारले.सामान्य माणसावर नकळत होणारे अन्याय नाहीसे होऊन त्याचे जगणे अधिक डोळस आणि सुखकर व्हावे यासाठी त्यांचा अविरत संघर्ष सुरू असायचा.

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम ही सलग चार शतकांच्या प्रदीर्घ काळात महाराष्ट्राला लाभलेली संतपरंपरा ! या मांदियाळीतील प्रत्येक संतमहात्म्याचे आयुष्य प्रचंड विरोध, त्याग आणि संघर्ष यांनी व्यापलेले होते. सकल जनांना निखळ समाधानाचा मार्ग प्राप्त व्हावा यासाठी ते सातत्याने जनजागृती करीत राहिले.

भारतीय संस्कृतीला अपेक्षित असणाऱ्या मूल्यांचे रोपण समाजमनात करीत, त्यांच्या उन्नतीसाठी जनजागृती करीत या थोर व्यक्तींनी आपली उभी आयुष्यं खर्ची घातलेली आहेत. तरीही ‘खऱ्या अर्थाने जागृती झाली आहे असे म्हणता येईल का?’ हा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती आजही सभोवताली दिसून येते. अंधाराचे स्वरूप बदलले तरी भोवताली मिट्ट काळोखच असावा अशीच परिस्थिती आजही भोवताली दिसून येतेच.

तेराव्या शतकापासून आजच्या बाविसाव्या शतकापर्यंत प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतरही सर्व संतमहात्म्यांच्या जनजागृती करणाऱ्या अभंग-रचना आणि मौलिक ग्रंथ भांडार अनेक पिढ्या प्राणपणाने जपणारे आपण खऱ्या अर्थाने जागृत झालेलो आहोत कां?की अजूनही आर्थिक न् भौतिक स्तर उंचावूनही समाजमन सुप्तावस्थेतच राहिले आहे ? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे उत्साहवर्धक असणे शक्यच नाही ही वस्तुस्थिती आहे.यात दोष नेमका कुणाचा? जनजागृतीचं अखंड व्रत प्राणपणाने जपत भरभरु‌न देणाऱ्या संतमहात्म्यांचा की ते दान घेणारी आपली झोळीच फाटकी असणाऱ्या समाजमनाचा ??

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाणमाय… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆पाणमाय… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

पाणमाय।

याही गोष्टीला झाली 10 वर्षे.

अचानक माझा गुडघा दुखायला लागला.

गेले ऑर्थोपेडिक  मित्रा कडे.

त्याने सगळे xray काढले, म्हणाला, काय करतेस ग व्यायाम.

म्हटले रोज  जाते की बाबा तळजाई चढायला.

म्हणाला, उद्यापासून ते बंद.

अरे बाबा, मग करू तरी काय या गुडघ्याला.. म्हणाला, येते का पोहायला, पोहायला सुरवात कर, नाहीतर खरे नाही त्या गुडघ्याचे.

अरे बाप रे.

आता शाळेत असताना पट्टीची पोहणारी मी आता, साठी नंतर कुठे जाऊ पोहायला.

पण इलाज नव्हता.

चौकशी केली आणि जवळच एक सुंदर तरणतलाव सापडला.

हा माझ्या घराजवळ, आणि पुन्हा Covered होता.

म्हणजे12 महिने मी पोहू शकणार होते लगेच पैसे भरले.

पहिल्या दिवशी पाण्यात उतरताना आणि उतरल्यावर अशी भीति वाटली.

मला नुसता वॉटर वॉक घ्यायचा होता. काठावर सर बसले होते.

सर कसले, 25 वर्षाचा मुलगाच.

म्हणाले, मॅडम, येतंय ना, पोहायला मग करा की सुरवात.

देवाचे नाव घेऊन सुरवात केली आणि काय आश्चर्य.

शरीर बेटे, मुळीच विसरले नव्हते, हो काहीही.

 किती आनंदात मी पोहायला लागले.

 वावा. फार् मजा वाटली.

मग हळूहळू माझ्या सारख्या, बायका भेटल्या.

सगळ्या जणी माझ्या वयाच्या, थोड्या लहान मोठ्या.

आमची मुले आणि महिला अशी  बॅच होती.

एरव्ही वर्षातले जवळजवळ 8 महिने हा तलाव केवळ आमचाच असायचा.

 

पण एप्रिल मध्ये परीक्षा झाल्या, की छोटी छोटी मुले पोहायला येऊ लागायची.

ती आमच्या बरोबरच असायची.

मग काय. आमचे सर अगदी बिझी असायचे या पोरांना शिकवण्यात.

किती मनापासून शिकवायचे सर त्यांना.

4 वर्षांपासूनची मुले यायची शिकायला.

आई वडिलानाच किती हौस.

काठावर बसून सूचना करायचे.

आणि पोहून वर आले, की लगेच छानसा बाथरोब, आणि डब्यातील खाऊ.

कौतुक तर कित्ती.

आधी रोज रडारड, मग सर म्हणायचे अरे काही नाही होत. बघ बघ.

तो दादा कसा पोहायला लागला.

तुला हसतील की सगळे, भित्रा म्हणून.

काही मुले तर रडून रडून तलाव डोक्यावर घ्यायची.

आमच्या  बॅच ला  ध्रुव यायचा.

अगदी, बारीक, गोरापान, आणि चारच वर्षाचा जेमतेम.

बाहेर असेपर्यंत, बडबड.

सरांनी पाण्यात घेतले की आक्रोश सुरू.

आईबाबा, मावशी, आजी. , सर्वांना हाका मारूनमोठमोठ्याने रडायचा मग आम्ही पोहत असलो की सरांना म्हणायचा.

ही मावशी माझ्या मध्ये येतेय तिला बाजूला करा.

मग सर म्हणायचे मावशी, ध्रुव पोहतोय, बाजूला व्हा हं.

असे करत ध्रुव मस्त पोहायला लागला.

 त्याचे रडणे, थरथर कापणे बघून एकदा मी त्याच्या वडिलांना विचारले होते,

अहो, इतका लहानआहे ध्रुव, का घाई करताय त्यालापोहणे शिकवायची किती रडतोय तो रोज.

ते हताश पणे म्हणाले, काय सांगू हो, तुम्हाला, घरी 3 वाजले की हा मला पोहायला न्या असा टाहो फोडून डोके उठवतो मग इथे आणले की गप्प बसतो.

ते, मी सर आणि इतर सगळ्या हसायलाच लागलो आणि ध्रुव लाजून वडिलांच्या मागे लपला होता.

साधारण पंधरा दिवसात सगळी मुलं सरांनी तरबेज करून टाकलेली असायची मग शेवटच्या दोन तीन दिवसात मुलांचे आजीआजोबा, कौतुकाने आपल्या नातवंडांचे पोहणे बघायला यायचे. मग एकच गोंधळ.

आजी बघ ना मी कशी उडी मारतो आजोबा माझा विडिओ घ्या ना.

आजीआजोबा कौतुकाने विडिओ काढायचे इतर वेळी शूटिंग ला बंदी असायची.

ते जून पर्यंत चे 4 महिने नुसते गडबडीने असत.

मग तो पर्यंत आमचीही या छोट्या दोस्तांशी मैत्री झालेली असे.

नावानिशी आम्ही त्यांना ओळखू लागलेले असू  मग शेवटच्या दिवशी, ती मुले आमचा निरोप घेत.

मावशी बाय बाय.

आता उद्या शाळा सुरू आमची.

आता पुढच्या वर्षी येणार हं नक्की आम्ही तुम्ही सगळ्या पण असणार ना एखादी निकिता, इशिता, श्लोक, समर्थ विचारायचे.

हो तर. आम्ही बाराही महिने येतो रे, तुम्ही नक्की या हं.

मग आम्ही त्यांच्या साठी घरून खाऊ नेलेला त्यांना देत असू पुन्हा पूल रिकामा व्हायचा.

काही दिवस मग आम्हाला करमायचे नाही.

पुन्हा आमच्या आम्ही,आमचे पोहोणे सुरू करत असू सर ही मुकाट हरवल्या सारखे काठावर बसून असत.

 या दोन वर्षात,कोरोना मुळे सर्व तलाव बंद होते किती  किती मिस केले आम्ही या आमच्या दोस्ताला.

दोन वर्षे तलाव पूर्ण रिकामा केलेला होता.

तो नुसत्या रिकाम्या खोली सारखा तलाव बघून वाईटच वाटले.

पण आता आम्हाला सगळ्यांना मेसेज आले.

आपला तलाव सुरू झाला या.

आम्ही एकमेकींना फोन केले आणि लगेच जायला लागलोही खूप आनंद झाला, ते स्वच्छ निळेशार तुडुंब भरलेले नितळ पाणी बघून.

मला या तलावाने, काय दिले नाही?

तर सगळेसगळे दिले.

माझा उत्साह परत दिला.

माझे गुडघे थाम्बले.

मला खूप छान मैत्रिणी मिळाल्या.

तिथली माणसे आमची दोस्तच झाली.

माझ्या आणि मैत्रिणींच्याही, खूपशा तक्रारी नाहीशाच झाल्या आपले जी ए कुलकर्णी म्हणतात, तसे पाणी ही पाणमाय आहे.

तुम्ही तिच्या कुशीत शिरलात की ती तुमच्यावर आपले उबदार पांघरूण घालते.

आई सारखे प्रेमच करते पाणी तुमच्यावर.

त्यात नसतो स्वार्थ, नसतो काही हेतू.

पाणमायच ती.

या पाणमायेची ओढ लागते.

 दुपारी 3 वाजले की आमची पावले तलावा कडे वळतातच.

बाहेर धुवाधार पाऊस पडत असतो.

आणि ते धारा नृत्य बघत आम्ही निवांत पोहत असतो.

खूपच थंडी पडली की मग म्हणतो अग काल 6 होते की temperature. मग आता, जरा नको ना यायला.

की मग आम्ही पुन्हा थोडे थांबतो की पुन्हा आमचं पोहोणे सुरू होतं.

ही पाण मायेशी जमलेली गट्टी या जन्मी तरी सुटायची नाही.

 

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भय ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

परिचय

नँशनल असोसिएशन फाँर दि ब्लाईंड या संस्थेच्या सभासद. अंधांचे बचतगट  १० वर्षांपासून चालवितात. महाराष्ट्रातील पहिला प्रयोग म्हणून याला मान्यता मिळाली आहे. स्वतः अंशतः अंध. अपंग सेवा केंद्र, सांगली व सांगली महापालिका या दोन्ही चे ‘प्रेरणा पुरस्कार’ मिळाले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा सांगली यामध्ये सक्रिय कार्यकर्ती म्हणून काम.

चमत्कारामागील विज्ञान यासाठी ‘हसत खेळत विज्ञान’ या नाटयप्रयोगात अभिनय, तसेच चळवळीची गाणी म्हणणे, इतरही अनेक कामे या समितीतर्फे केली जातात. जटानिर्मुलन, सत्यशोधक विवाह, भोंदूबाबा पकडणे याकामात  सहभाग असतो.

कविता, लेख लिहून सादर करतात. काही अंधांसाठीचे व्हाँटस अँप ग्रुपवर असे कविता लेख रेकॉर्डिंग करून पाठविते.

काही एकट्या रहाणाऱ्या जेष्ठांची बँकेची कामे करते.

लग्नसमारंभात मंगलाष्टके रचून म्हणते तसेच काहीइतरही खास समारंभासाठी गाणी लिहून सादर करतात.

नँब शाखा सांगलीवरही  मागणीवरून गीत लेखन केले आहे.

?  विविधा ?

☆ भय ☆ सुश्री त्रिशला शहा 

जीवन खूप सुंदर आहे. जगताना प्रत्येक गोष्टीचा पुरेपुर आनंद घेत गेलो तर दुःखाचा लवलेशही उरणार नाही, दुर्दैवाने ज्या वाईट घटना घडतात, त्यांना मागे टाकून जीवनाची पुढील वाटचाल करीत राहिलो तर आयुष्य खूप सुंदर होईल हे नक्की, परंतु या वाटचालीत काही वेळा मात्र भयदायी असतात. अगदी लहान असताना बालपणात एक भय आपली पाठ सोडत नाही, ते म्हणजे बागुलबुवा. थोडा जरी हट्ट केला, रडून निषेध नोंदवला तर घरातील आई, आजी, बाबा हे सगळे एकच भिती घालतात, “तो बघ बागुलबुवा आला “मग आम्ही आपल घाबरून गप्प!शिकत असताना शाळेतील शिक्षकांची भिती, परिक्षेची भिती, अभ्यास कितीही चांगला झाला तरी निकालाची भिती. यशस्वीपणे पास झालो तर नोकरीची भिती, नोकरी चांगली लागली तर बाँसची भिती. लग्न झाल्यावर तर विचारुच नका. पैसे पुरवायची भिती, मुलांच्या शिक्षण, पालनपोषणाची जबाबदारी युक्त भिती कायमच असते. सगळं सुरळीत झालं, आयुष्यातील बऱ्यापैकी जबाबदाऱ्या पार पाडल्यावर एक मोठी भिती आपल्या मनात ठाण मांडून बसते ती म्हणजे असलेल्या किंवा होणाऱ्या आजाराची भिती. त्यातून परत जोडीदाराची काळजीयुक्त भिती असतेच. हे सगळं निभावताना वार्धक्यात मुलं आपल्याला बघतील कि नाही हि भिती तर मरेपर्यंत सुटतचं नाही. एकूण काय भय आपली पाठ सोडत नाही. जीवन आहे तिथे आनंद, उत्साह, सुख असतेच, आनंदाने जीवन जगावे हेही खरेच पण त्याच्या जोडीला दुःख, भय हे सुध्दा आहे.  याच वाटचालीत जगत असताना हे सुध्दा लक्षात ठेवावे वाटते, ‘भय इथले संपत नाही.’

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तो आणि तो… सुश्री वंदना चिटनविस ☆ प्रस्तुती – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

? वाचताना वेचलेले ?

☆ तो आणि तो… सुश्री वंदना चिटनविस ☆ प्रस्तुती – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

लग्न गाठीच नव्हे तर माणसा माणसातल्या सगळ्याच गाठी कुठल्यातरी अद्भुत शक्तीनुसार पडतात कि काय अस झाल खर. नाझ फाऊंडेशन च्या दिल्ली हायकोर्टा समोरच्या याचिकेत, २-७-२००९ च्या मा. न्यायमूर्ती अजीत शहांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंत ‘ त्या दोघांचं’, ‘त्या दोघींच’, ‘त्यांच’,’त्यांच’ आणि ‘त्यांच ‘ जग कस ढवळून समाजासमोर आल. त्यांचा एक समूह(LGBTQ) म्हणून विचार व्हायला लागला. जणू काही मानवाची नवी प्रजातीच भारतात नव्यान सापडल्यासारख झाल. समलिंगी, तृतीय पंथी, , उभयपंथी , लिंगभेदाच्या पलीकडचे, अलैंगिक , बृहद्लैंगिक , स्त्रीपुरूष या दोन्ही जाणीवांची सरमिसळ झालेले , विरूद्धलिंगी वेशभूषा करू इच्छिणारे, ज्यांची लैंगिक ओळख काळानुसार बदलते असे, ,अशा एकूण , सामान्यांपेक्षा वेगळ्या , बावीस लैंगिक ओळखी आहेत हे कळल. त्या प्रकरणातला अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ६-९- २०१८ च्या न्यायनिर्णयानंतर भारतीय घटनेच्या कलम १४१ /१४२ प्रमाणे ‘कायदा’ झाला आणि तेव्हा पासून कलम ३७७ भा.दं.वि . अंतर्गत समलिंगी संबंध हा आता भारतात गुन्हा नाही

तोपर्यंत ही, स्त्री चा मासीक धर्म, कुमारीमाता, विधवांच शोषण, तरूणांचे विवाह पूर्व संबंध, यासारखी न बोलायची गोष्ट होती. म्हणजे अगदि , ” हालचाल करत नाहीये,डोळे मिटून निपचित पडला आहे,प्रतिसाद देत नाही” अशा त्या पोपटासारखी. दिसतय पण ‘मेला’ म्हणायच नाही.

फार पूर्वी फडक्यांची ‘मन शुद्ध तुझ’ वाचल्याच आठवत होत. ‘बेगम बर्वे ‘ पाहिल होत. ‘ त्यांच्या’ रॅलीजचे चित्रविचित्र फोटो अगदि अदभुत काही तरी पाहिल्या सारखे पहायचे. रेल्वेत,ट्रॅफिकला कोणी कानाशी टाळ्या वाजवल्या तर एकतर घाबरून जायचं, नाहीतर ते नकोस वाटायच हे सार्वत्रिक. काही हिंदी सिनेमात बटबटीत व्यक्ती रेखा त्याही आधी यायला लागल्या होत्या. प्रादेशिक चित्रपटात संवेदनपूर्ण चित्रणहि आली. मराठीत ‘जोगवा’ , बंगालीत ‘नगरधन’ ही चटकन् आठवणारी उदाहरण. दीपा मेहतांचा ‘फायर’ वेगळ्याच कारणांसाठी गाजला आणि त्यामुळे तेव्हा पहायला मिळाला नाही. आश्चर्य वाटल जेव्हा, सख्त सेन्साॅरशिप असलेल्या पाकिस्तानचा ‘ बोल ‘ चित्रपट पाह्यला होता. धाडसीच होता. मनात उत्सुकता भरभरून. तरी पण ‘ तो’ विषय नकोच. असं. बर्याच पुरोगामी ‘रिपोर्ताज’ पद्धतीने लेखन करणार्या पत्रकार लेखक मंडळी नी लिहिलेल हळूहळू बाहेर यायला लागल . शिखंडी, विष्णुचा मोहिनीअवतार, इतिहासात, जनानखान्यात नेमणूका होत असलेल्या हिजरा व्यक्ती , जोगत्ये अशा विषयावर सामाजिक , वैद्यकीय अंगाने बरच वाचायला मिळायला लागल.

मग प्रकाशातल्या व्यक्ती व्यक्त व्हायला लागल्या. त्यातून कलावंत, पत्रकार, मोठी घराणी , राजेरजवाडे, बुद्धी जीवी घरातल्या व्यक्ती, अभिनेते, लेखक अशा अनेक स्तरातील अभिव्यक्ती कळायला लागली. त्यांच साध म्हणण होत ,”आम्ही असेच आहेत, वेगळे असू पण अनैसर्गिक नाही. दोषी नाही. रंग, रूप, पालक, जात , जन्माने लाभते,तसच हे. आम्हाला तुमच्यासारखच निवडीच स्वातंत्र्य नव्हत. आम्हाला वगळू नका, तिरस्कार करू नका.”

आपल उच्च आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय जगही बोलक व्हायला लागल. चक्क टी.व्ही वर मुलाखती दिसायला लागल्या. स्टॅडअप काॅमेडियन यावर विनोद करायला लागले, त्यावर श्रोतेहि हसायला शिकले. रोस्ट्स व्हायला लागले. हे एक वेगळ्या पद्धतीच , वेगळ्या संवेदनांच, प्रामूख्याने शारिरीक शोषणावर उभ असलेलं , तिरस्कारान भरलेल , बहुतेकवेळी पालकांनीच नाकारलेल , क्वचित डोळसपणे स्वीकारलेल अशाअनेक आयुष्यांचं ,मनाचं,भावनांचं प्रतिबिंब ,साहित्यात, समाजात, दृकश्राव्य माध्यमात स्पष्ट दिसायला लागल. जणू आतापर्यंत त्यांना फक्त देहच होते. उच्चशिक्षित , प्राचार्य पदावर गेलेल्या व्यथित व्यक्तीच निवेदन वाचण्यात आल.पोलीस खात्यात नेमणुका झाल्याची उदाहरणं दिसायला लागली. दुःखाला वाचा फोडणारी व या चळवळीतील कार्यकर्त्यांची आत्मचरित्र वाचताना मती गुंग झाली. हे काय, कसल्या पातळीवरच दुःख असेल? कस सोसत असतील ती घुसमट?अस वाटायला लागल. विषय, मध्यमवर्गाच्या बंद दारातून आत आला. मधेच यासंदर्भात एड्सची भीतीपण दाखवली गेली. कुणी त्यांना ‘सैतानाची मुल ‘असहि संबोधलं. ‘पैसे काय मागतात, धडधाकट तर असतात.’ अशी एक खुसपुस पुढे आली. पण अलिकडे तर यांच्यासाठी नोकर्यात आरक्षण, काॅर्पोरेट जगताची जबाबदारी, उद्योजक स्वयंनिर्भरता यांची पण चर्चा चालू झालीय. स्कूटरवर असताना चौकात थांबल्यावर कानाशी टाळी वाजवणारी दीपा( ही रोज वेगळ नाव सांगते) आता मला घाबरवत नाही. चहासाठी 10 रूपये मागते आणि दिले तर “थॅन्क्यू काकू” म्हणते. बघणारे पोलीस पण हसून तिला घालवतात. मनाची दारं थोडी किलकिली झाली आहेत ती पूर्ण पणे उघडायला हवी .थोडा वेळ लागेलच. सवय ही काही लवकर लागत नाही. पिढ्यानपिढ्याचा सामाजिक, वैचारिक गोंधळ निस्तरायचा आहे. एकेकाळच्या बहिष्कृतांना सामावून घ्यायची आपल्या सर्वांवर जबाबदारी आली आहे . नियतीच्या हातून तुटलय पण आपण सांधायला हवच. होईल .होण अटळ आहे. संधिप्रकाश संपून उजाडेल. उम्मीदपे दुनिया कायम है |

 – सुश्री वंदना चिटनविस, नागपूर.

संग्रहिका –  सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग १२-  संगीत -१ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग १२-  संगीत -१  डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

महाविद्यालयात शिकत असताना गंभीर विषयावरील ग्रंथ वाचनाच्या खालोखाल नरेंद्रच्या आयुष्यात स्थान होतं ते संगीताला. तो स्वत: संगीताचा आनंद घेत असे आणि इतरांनाही तो तेव्हढ्याच मुक्तपणे देत असे. अनेक वेळा मित्र जेंव्हा आग्रह करत असत तेंव्हा, नरेंद्र लगेच प्रतिसाद देत असे. त्याचा सूर लागला की सगळीकडे निस्तब्ध शांतता पसरून त्या स्वरमाधुर्यात सगळेजण डुंबून जात.

विश्वनाथबाबूंनी नरेंद्रचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास रायपूरच्या वास्तव्यातच सुरू केला होता. त्याला अनेक भाषेतली गीतं शिकवली होती. त्यांनी नरेंद्रला, ध्रुपद, धमार, ख्याल, टप्पा, ठुमरी, बंगाली कीर्तन शामसंगीत व बाउल संगीत हे लोकसंगीताचे प्रकार पण शिकविले. नरेंद्रची ही तयारी करून घेतल्यावर त्यांनी कलकत्त्याला परतल्यावर, पुढे योग्य गुरूंकडे रियाझ आणि धडे घेण्यासाठी व्यवस्था केली होती. आई भुवनेश्वरीदेवीं चा आवाज पण चांगला होता. आई वडिलांच्या सान्निध्यात तसे संगीताचे संस्कार नरेंन्द्रवर लहानपणापासूनच होत होते. लहानपणी आपली आज्जी रायमणीच्या घरात त्याचा कधी कधी रियाझ चालत असे. दत्त घराण्याला संगीताचं वरदान लाभल होतं. सन्यासी झालेले नरेंद्रचे आजोबा दुर्गाप्रसाद उत्तम गायक होते. त्यांचा वारसा विश्वनाथबाबू चालवत होतेच. ते दर आठवड्याला गुणीजनांना बोलवून त्यांच्या बैठका भरवायचे, सर्वदूर प्रवासात संगीतातले नवनवीन प्रकार ऐकून व पाहून आल्यावर तसे संगीत, गायकांना ऐकवायचे. असे म्हणतात की, ‘ठुमरी’ प्रकार बंगाल मध्ये विश्वनाथ बाबूंनीच परिचित करून दिला.  

तीव्र बुद्धिमत्तेबरोबर रसिकता आणि अभिजात अभिरुची हे गुण असल्यानेच युवावस्थेत येता येताच नरेंद्रने गायन वादन कौशल्य आत्मसात केले होते आणि कुटुंबातही याची ख्याती पसरु लागली. त्याच्या धीरगंभीर आणि सुरेल आवाजाने लोक आकर्षित होत. “स्वरांच्या माध्यमातून त्यातील सौंदर्याच्या आविष्कारा बरोबरच रसिक श्रोत्यांच्या मनात विशिष्ट भाव निर्माण झाला पाहिजे. श्रोत्यांची आणि स्वत: गायकाची अशी भावसमाधी लागणे, गायनाचे सूर थांबल्यावरही तिचा परिणाम श्रोत्यांच्या मनात रेंगाळत राहणे आणि त्यांचे मन एका उदात्त वातावरणात पोहोचणे हे संगीताचे खरे उद्दीष्ट आहे” असे नरेंद्रचे मत होते. त्यांचा हा व्यासंग केवळ मैफिली पुरताच मर्यादित नव्हता.

श्री रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र ची पहिली भेट झाली त्याचं कारण, नरेंद्रचं गाणं हेच होतं. नरेंद्रचं  संगीत हेच या दोघांच्या मधल्या अतूट संबंधांचा सेतू होता.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गीतरामायण.. एक सुखद अनुभव… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? मनमंजुषेतून ?

☆ गीतरामायण.. एक सुखद अनुभव… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आयुष्यातील एक सुखद अनुभव.  गीतरामायण.

आधुनिक वाल्मिकी कविवर्य ग. दि.माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांचे गीत रामायण माझ्या विशेष जिव्हाळ्याचे आहे. एप्रिल १९५५ मध्ये या गीतरामायणाचे पहिले गीत प्रसारित झाले आणि १९५५ मध्ये माझा जन्म झाला. नकळत त्या गीतांशी नाळ जोडली गेली असणारच. मला आठवते बारा तेरा वर्षांची असताना पुन्हा ही सर्व गाणी वर्षभर आकाशवाणीवर सादर होत होती. तेव्हा रेडिओ वरून ऐकत ऐकत सर्व गाणी लिहून घेतली होती.  पुढे त्याचे पुस्तक घेतले.बहुतेक सर्व गाणी मला पाठ होती.

बाबुजी सुधीर फडकेंचे गीतरामायण मैफिलीत अगदी त्यांच्या गादीसमोर बसून ऐकलेले आहे.त्यांची सही जपून ठेवली आहे.

सुधीर फडके, पुरुषोत्तम जोशी यांचे निवेदन मनाला भुरळ घालत होते. वयाबरोबर या गीतरामायणाची ओढ वाढतच गेली, जी आजही टिकून आहे. शहरापासून लांब राहत असल्याने कधी संधीच मिळाली नव्हती. पण कधीतरी या गीतरामायणाच्या सादरीकरणाचा भाग होण्याची तीव्र इच्छा होती.गीतरामायणाला पन्नास वर्ष पूर्ण होताना ही इच्छापूर्ती झाली.

२००५ साली सुवर्णमहोत्सवी वर्ष होते.सांगलीत श्री. फडणीस सर आणि त्यांचे सहकारी सुवर्णमहोत्सवानिमित्त मोठा कार्यक्रम करणार होते. मला त्याचे निवेदन करण्यासाठी विचारणा झाली. अनपेक्षितपणे हे सुवर्णदान माझ्या झोळीत पडले.

दोन दिवस कार्यक्रम करून ३६ गाण्यांचे सादरीकरण आम्ही केले. खूप मोठा बहारदार कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दोन्ही दिवशी नाट्यगृह तुडुंब भरून आवारात गर्दी झाली होती. कार्यक्रम अप्रतिम झाला. लोकांकडून कौतुकाची पसंती भरभरून मिळाली. अतिशय आनंद झाला. एका वेगळ्याच तृप्तीने मन भरून गेले.

आणखीन तीन चार ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही सादर केला.माझी इच्छा रामरायानेच अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण केली होती. माझ्या वयाची पन्नाशी  गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवाबरोबर अशी दणक्यात साजरी झाली. ही गोष्ट माझ्या मर्मबंधातली ठेव बनून राहिली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares