मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – ८ ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -८ ?

!!श्रीराम समर्थ!!

देवी महिषासुरमर्दिनी

श्रीक्षेत्र तुळजापूर येथे

नवरात्रातील महाष्टमीला -श्रीतुळजा भवानी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा बांधली जाते.

देवी भगवतीने महिषासुराचा वध कसा केला याचे वर्णन आज मुक्तछंद काव्यात गुंफून आई भवानी मातेच्या चरणी सविनय अर्पण! इदं न मम !!

?? ?☘️???

 

त्रिभुवन सुंदरी आदिमाया पार्वती!

रविकिरणांसम तेजोमय कांती !

गळा मुण्डमाळा जपमाळा एका हाती !

कमलासनस्थिता जगदंबा भगवती!

महिषासुरा वधण्या देवांनी दिली शक्ती!!

 

आला धावून महिषासुर सेनापती चिक्षूर!

करी वर्षाव बाणांचा देवी भगवती वर !

भगवतीने केले बाणांनी चिक्षूरास जर्जर !

चिक्षूराने फेकला त्रिशूल भद्रकालीवर !

चिक्षूरदैत्याचा केला तिने चक्काचूर !!

 

होताच चिक्षूराचा वध आला धावून चामर

त्रिनेत्री देवीने गदाप्रहारे केला त्याचा चक्काचूर !!

 

ताम आणि अंधक दैत्याना बाणांनी मारिले!

उग्रवीर्य महाहनू यांची मस्तके उडविली आकाशी त्रिशूले !

उग्रदैत्यास वृक्षपाषाणाने करालास मुष्टिप्रहारे!

उग्रास्य उग्रवीर्य महाहनू दैत्यांच्या मुंड्या उडविल्या तलवारे !

मुंडके बिडालाचे धडावेगळे केले तलवारे !

दुर्धर-दुर्मुख यांची वाट यमलोकी बाणप्रहारे !!

 

ऐकून हाहा:कार महिषासुर झाला चिंताक्रांत !

रुप घेऊनी रेड्याचे थैमान घातले रणांत!

हल्ला केला सिंहासनी देवी झाली क्रोधित !

हाती घेऊन त्रिशूल धावली महिषासुरावर !

पकडून पायी चेपिले केला शूलप्रहार मानेवर !

अखेर मोहित करून खड्गे मारिला महिषासुर!!

 

आनंदी झाले सर्व त्रिभुवन सुरवर !

देवतांना संजीवन देणाऱ्या मातेचा केला जयजयकार !!

 

आई महिषासुरमर्दिनीचा उदोउदो

आई भवानीचा उदोउदो

आई जगदंबेचा उदोउदो

आई अंबाबाईचा उदोउदो

आई रेणुकेचा उदोउदो

 

उदो उदो उदो उदो उदो उदो उदो ऽऽऽ

!!श्रीजगदंबार्पणमस्तु!!

क्रमश:. ….

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 58 – रंग…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #58 ☆ 

☆ रंग…! ☆ 

आई . . . .

मी चित्र काढत असताना

तू..

माझ्या आयुष्यात भरलेले

सारेच रंग..

मी चित्रात भरण्याचा

प्रयत्न करतो… .

पण..

कितीही प्रयत्न केला..,

तरी

तू माझ्या आयुष्यात

भरलेले सारेच रंग

मला चित्रात भरणं

कधी जमलंच नाही

कारण…

तू माझ्या आयुष्यात

भरलेल्या रंगापुढे

हे रंग नेहमीच

अपुरे पडतात…!

अपुर्ण वाटतात. . . !

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ईमान ☆ श्री शरद कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ ईमान ☆ श्री शरद कुलकर्णी☆ 

येवो मरण कधीही,

निघो कधीही फर्मान,

शब्दांशी ईमान,

असो देवा./

 

देण्या हयात दाखले,

ठरो लिखाण पुरेसे,

एरव्हीचे जिणे,

परिशिष्ट/

 

काही संकल्प-विकल्प,

बाकी उमर अत्यल्प,

कवी म्हणून ओळख,

राहो नित्य/

 

करा झणी अवलंब,

नको उगाच विलंब,

भरा अनुशेष,

दयाघना/

 

©  श्री शरद कुलकर्णी

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक्सचेंज ऑफर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

श्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ एक्सचेंज ऑफर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मॉर्निंग वॉकहून परततांना, वाटेवरच्या एका हॉलकडे आपोआपच लक्ष जात असे. वेगवेगळ्या प्रदर्शनांसाठी आणि सेल्ससाठीच तो हॉल बांधलायया विचाराने रोजच हसू यायचं. आज तो हॉल आठ वाजताच उघडलेला होता, आणि तिथे माणसांची रांग लागलेली होती. उत्सुकतेपोटी तिथे जरा रेंगाळले. दारावर एक पाटी टांगलेली दिसली ….” फ्री एक्सचेंज ऑफर “…. कुणातर्फे  ते काही लिहिलेलं नव्हतं. रविवार असल्याने तिथे थोडा वेळ घालवायला हरकत नव्हती. म्हणून जाऊन त्या रांगेत उभी राहिले. सगळ्यांच्याच हातात काही जुनाट वस्तू होत्या. चेहेऱ्यावर उत्सुकता ओसंडून वाहत होती. हॉलच्या दारात एक दणकट माणूस उभा होता. संयोजक असावा. थोड्याच वेळात त्याने पहिल्या २५-३० माणसांना आत बोलावलं. त्यात शेवटचा नंबर माझा होता.

” हातातलं सामान त्या शेल्फात ठेवा, आणि तिथे मध्यभागी ठेवलेल्या मोठ्या टेबलभोवती उभे रहा “…. त्याने जणू हुकूमच सोडला. हॉलमध्ये इतर एकही वस्तू नसल्याने आधीच्या उत्सुकतेच्या जागी फसवल्याचा संशय दिसायलालागला होता…. दार बंद करून संयोजक तिथे आला. त्याने प्रत्येकाला एकेक थाळी दिली. डोळे बंद करायला सांगितले. मग जादूची छडी फिरवावी तशी हातातली काठी सगळ्यां-भोवती फिरवली. त्याचा डोळा चुकवून मी हातातली थाळी टेबलखाली सरकवली, आणि गुपचुप त्याच्याचमागे  लपले.

…..” आता प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात अजिबात नकोशी आणि असह्य वाटणारी फक्त एक गोष्ट डोळ्यासमोर आणा आणि थाळीत हात ठेवा. आणि आता थाळी टेबलवर ठेवा..हां, आता ऐका. तुम्ही स्वतःची थाळी सोडून बाकीच्या पैकी तुम्हाला जी थाळी आवडेल ती एक थाळी उचलायची आहे. आणि कोणालाही रिकाम्या हाताने परत जाता येणार नाही. वेळ मर्यादित आहे. कळलय? आता उघडा डोळे “… आता प्रत्येकाच्या थाळीत काही ना काही दिसायला लागलं ….. प्रचंड गोंधळून सगळे नुसतेच टेबलभोवती फिरायला लागले… दचकत होते …. माना नकारार्थी हलत होत्या. मी नीट निरखून त्या टेबलकडे पाहिलं, आणि प्रचंड दचकले…..बाप रे …..नकोशा गोष्टी? त्रास, चिंता आणि दुःख यांची केवढी व्हरायटी होती त्यावर …. विद्ध झालेली मने…. पोखरलेले मेंदू…. मनावरचे खोलवर घाव आणि मनाच्या भळाभळा वहात असणाऱ्या जखमा, काळवंडलेल्या विझलेल्या असहाय्य नजरा…असाध्य रोगांच्या वेदनांनी तडफडणारे अवयव …. कुठे घरावरचे छप्पर टिकवतान्ना त्राण संपलेले हात पाय….. भुकेने तडफडणारे पोटाचे हताश खड्डे आणि त्यांना धरून लोंबकळणाऱ्या काही आशाळभूत नजरा…. तर कुठे स्वतःची संपत्ती चोरीला जाऊ नये म्हणून तगमगणारी अधाशी मने…. बाप रे बाप…. ते सगळं बघतांना असह्यतेखेरीज कुठली भावना जाणवतच नव्हती. डोळे विस्फारून सगळे नुसतेच टेबल भोवती फिरत होते. तिथून निसटण्याची संधी शोधत होते. … तेवढ्यात संयोजक हातातली काठी उगारत ओरडला…..”चला घ्या पटापट कुणाला काय चालणार आहे ते. बाहेर रांग वाढते आहे.”

सगळेच एव्हाना रडकुंडीला आले होते. तो आणखी मोठ्याने ओरडला.. “आवरा …. आणखी पाच मिनिटं देतो. उचला पटकन हवी ती थाळी. एवढी चांगली एक्सचेंज ऑफर पुन्हा कधीही मिळणार नाही तुम्हाला. ” आता सगळ्यांचा नाईलाज झाला. त्याची पाठ वळताच प्रत्येकजणच घाई -घाईने टेबलजवळ गेला, आणि गुपचुप स्वतःचीच थाळी शोधून उचलून निघू लागला. सगळ्यांची ती धावपळ तिरक्या नजरेने पहात, खट्याळपणे गालातल्या गालात हसत असलेला तो, त्याच्यामागेच लपलेल्या मला स्पष्ट दिसत होता. टेबलवरच्या सगळ्या वस्तू संपल्या, तशी खालच्या रिकाम्या थाळी कडे तीक्ष्ण नजर टाकत त्याने गर्रकन वळून माझ्याकडे पाहिलं. भीतीने मी थरथरायला लागले, तसा गडगडाटी हसत तो म्हणाला, ” लबाडी केलीस नामाझ्याशी? पण चल, माफ करतो तुला. कारण या सगळ्यांमध्ये तू एकटीच विवेकी आणि विचारी दिसतेआहेस…” आणि कौतुकाने त्याने माझ्या पाठीत धपाटा घातला …….

……….. आणि मी दचकून खाडदिशी जागी झाले. बाप रे ….. म्हणजे हे सगळं स्वप्न होतंतर. पण मग प्रकर्षाने जाणवलं की, त्या स्वप्नाइतकं विदारक वास्तव दुसरं कुठलंच नसावं.

‘परदुःख शीतल’ असं मला तरी यापुढे कधीच वाटू शकणार नाही हे मात्र नक्की. कारण मनापासून पटले होते की……. दगड मातीचे असोत, की दुःख वेदनांचे असोत, डोंगर दुरूनच साजरे असतात.

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सृजनाचा सोहळा ☆ डाॅ.मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆  सृजनाचा सोहळा ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

ग्रीष्माच्या तप्त झळा अंगाची लाहीलाही करत असतात. कधी एकदा पावसाळा सुरू होतो आहे म्हणून आपण वाट बघत असतो. आणि अशाच वेळी आकाशात मेघ दाटून येतात. झरझर धारा बरसू लागतात आणि ही जलधारा तृप्तीचे क्षण निर्माण करत सर्व सृष्टीला सृजनत्वाचे दान देत असते. पावसाळा म्हणे सृजनत्वाचा सोहळा! असे काहीसे अलवार- हळूवार विचार मनात घोळत असतानाच अचानक एका सृजनत्वाची प्रचिती आम्हाला आली. अर्थात् या सृजनत्वासाठी कोणत्याही ऋतूची गरज नसते बरं का! आता कसे ते सोदाहरणच बघा.

त्याचे झाले असे की परवाच आमच्या पुतणीचा फोन आला. “काकू, च्यवनप्राश कसा करतात ग? माझ्याकडे पाच- सहा किलो आवळे आहेत घरचे. सुपारी, लोणचे, मोरावळा सर्व करुन झाले. आता पाऊस पडल्यामुळे उरलेले आवळे उन्हात वाळवता येणार नाहीत. म्हणून च्यवनप्राश करायचे ठरवलंय.” अस्मादिक आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे तिने आम्हाला फोन केला होता. बोलता बोलता ती पुढे म्हणाली, “यू नळीवर बऱ्याच रेसिपी आहेत ग, पण नक्की बरोबर कोणती ते लक्षात आले नाही म्हणून फोन केला.” तिने हे सांगितल्यावर आम्ही उत्सुकतेने यू- नळी उघडून बघितली तर भूछत्रासारख्या च्यवनप्राशच्या अनेक रेसिपी उगवलेल्या दिसल्या. सृजनत्वाचे विविध आविष्कार बघून आपण साडे- चार वर्षे हे  आयुर्वेदाचे ज्ञान घेण्यात फुकट घालवली आहेत याची उपरती झाली. औषधे तयार करताना त्यावर होणारे अग्नीचे संस्कार, औषधी द्रव्ये, काळ, त्याचा परिणाम या सर्व संकल्पना आमच्या गुरुनी आणि पर्यायाने आमच्या ग्रंथोक्त गुरुनी पण का बरे आपल्याला शिकवल्या असतील असा प्रश्न उगीचच मनात उद्भवू लागला. अर्थात ही आमच्या भाबड्या मनाची प्रतिक्रिया होती बरे. कोणाचा अवमान करण्याचा आम्हा पामराचा बिलकूल इरादा नाही हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे. अन्यथा पु.ल. देशपांडे म्हणतात तसे “ राजहंसाचे चालणे जरी डौलदार असले तरी सामान्य लोकांनी चालूच नये की काय?” याच धर्तीवर आम्हाला प्रश्न विचारले जातील की “यांनी आयुर्वेदाचे ज्ञान घेतले म्हणजे सर्व हेच जाणतात आणि आम्ही सामान्य लोकांनी यात पडूच नये की काय?” असे काही ज्ञान पाजळण्याचा आमचा बिलकूल हेतू नाही बरं का! त्यामुळे अगदी “बाजार जैसा च्यवनप्राश” या रेसिपीमधून साध्य होत असेल ( सिद्ध होतो का ते आम्हाला माहीत नाही.) तर त्यांनी जरुर हा सोहळा आनंदाने साजरा करावा.

तर हे सृजनत्वाचे सोहळे यू- नळीवर हल्ली जागोजागी दिसतात. सुरुवातीला आम्हाला जणू काही अलिबाबाच्या गुहेतील खजिना सापडल्यासारखे वाटले. म्हणजे अमुक बिस्किटापासून केलेला तमुक तमुक केक, अमुक ऐवजी वापरून केलेले ढमुक, अमुक पासून केलेला तमुक खरवस, इन्स्टंट याव आणि इन्स्टंट त्याव! पहिल्यांदा आम्हीसुद्धा  हौसेने या सोहळ्यात हिरिरीने भाग घेतला. आता माझी मुले आणि नवरा किती खूष होतील या कल्पनेने आधीच आमच्या सर्जनशीलतेसाठी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. पण अमुक बिस्किटापासून तयार केलेले तमुक पुडिंग घरच्या तमाम मंडळीनी “बी- कॉम्प्लेक्सच्या औषधासारखे लागतेय” म्हणून रिजेक्ट केले. एवढेच कशाला? दारातल्या आमच्या मोत्याने तर एकदाच वास घेतला आणि   चार दिवस सरळ अन्नसत्याग्रह केला. मनीमाऊने तर दोन दिवस घरच सोडले. एकदा अमुक बिस्किटाचे आईसक्रीम डीट्टो अमूलसारखे लागते म्हणून केले तर एक – एक चमचा खाऊन मुलांनी ते आमच्या शीतकपाटदेवालाच नैवेद्य म्हणून ठेऊन दिले. शेवटी तो देवही कंटाळला आणि त्यानेही तोंड उघडून संपूर्ण कपाटभर दुर्गंधी सोडली  तेव्हा ते आमच्या रोजच्या कचराकलशात समर्पित करावे लागले. अशावेळी मला लहानपणी दारावर येणाऱ्या भरतकामाच्या सुया विकणाऱ्या विक्रेत्यांची आठवण येते. कापडावर ते इतक्या भराभर त्या विशिष्ट सुईने आणि रेशमाच्या दोऱ्याने सुंदर नक्षीकाम करायचे की आपल्यालाही ते सहज जमणार म्हणून आम्ही ती सुई विकत घ्यायचो. पण हाय रे दैवा! तो विक्रेता निघून गेल्यावर आमची ती सुई कापडातून सुद्धा आरपार जायची नाही तर नक्षीची गोष्टच दूर!

डाएटचे तर इतके सोहळे आहेत की नक्की कुठल्या सोहळ्याने आपले वजन कमी होईल ते समजतच नाही. एकजण सांगतो- भरपूर पाणी प्या, तर दुसरा सांगतो की शरीराला आवश्यक तेवढेच पाणी प्या- नाहीतर किडन्या खराब होतील. एकजण सांगतो सकाळी उठल्या उठल्या लिंबू- मध- पाणी प्या, तर दुसरा सांगतो की सकाळी उठल्यावर एक फळ खा. एक सांगतो भात अजिबात खाऊ नका तर दुसरा सांगतो की जिथे जे पीक उगवते तेच जास्त खाल्ले पाहिजे. म्हणून पंजाबातील माणसाने भरपूर गहू आणि कोकणातील माणसाने भरपूर भात खाल्ला पाहिजे. तर एक म्हणतो भरपूर सॅलड खा आणि दुसरा म्हणतो कच्च्या भाज्या अजिबात खाऊ नका. एक सांगतो मोड आलेली कडधान्य खा तर दुसरा म्हणतो बिलकुल खाऊ नका. एक सांगतो दर दोन तासांनी खा तर दुसरा म्हणतो की फक्त दोनदाच खा. आणि या सर्वांबरोबर त्यांनी सांगितलेले विश्लेषण सुद्धा आपल्याला पटत असते. मग यापैकी कुठला सृजनत्वाचा सोहळा आपल्याला लागू होतो हे ठरवण्यात आपले शरीर इतके सृजन(की सूजन)शील होते की ते सृजन उतरवण्यासाठी सुजनाचे दरवाजे टोकावे लागतात.

‘व्यासो$च्छिष्टं जगत् सर्वम् ‘ म्हणजे “व्यासमुनींनी  या जगातील सर्व विषयांना स्पर्श केला आहे” असे कधीतरी आम्ही ऐकले होते. तसेच काहीसे या सृजनत्वाच्या सोहळ्याचा बाबतीत आमच्या लक्षात आले. पाककला, चित्रकला, संगीत, नाट्य अशा जवळजवळ चौसष्ठही कलांमध्ये हा सोहळा आपली सर्जनशीलता दाखवत यू- नळी, मुखपुस्तक, कायप्पा, अशा अनेक माध्यमातून संचार करत आम्हा रसिकांना अधिकाधिक सोहळ्याचा आनंद लुटण्यास प्रवृत्त करत असतो. म्हणूनच जसे आम्ही सुरुवातीला नमूद केले की ऋतू पावसाळा म्हणजे सृजनाचा सोहळा! तसाच हा अंतरजालाच्या मायाजालाचा पावसाळा…. ज्यात आम्ही अनुभवतो नवनवीन सृजनत्वाचे सोहळे!

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घर ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ घर ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

परवा मी एका माझ्या मैत्रिणी च्या घरी गेले होते . घर कसले ते छोटा महालच म्हणा की. खूप प्रशस्त खोल्या होत्या. मोठा सुंदर दिवाण खाना,ज्यात सुबक नक्षी केलेल्या पेंटिंग, देखणे झुंबर, आरामदायी खुर्च्या अश्या विविध गोष्टी होत्या. तिथून आत मोठे स्वयंपाकघर होते. ते ही नाना गोष्टीने नटलेले. एकसारख्या सुरेख काचेच्या बरण्या, स्टील चे डबे, मायक्रो वेव्ह, तो भला मोठा कट्टा त्यावर फूड प्रोसेसर, एका बाजूला एक शोकेस ज्यात काचेची भांडी नीट मांडलेली. थोडक्यात काय सगळ्या वस्तू जिथल्या तिथे.

प्रशस्त बेड रूम, स्टडी रूम, दू मजली प्रशस्त मोठे घर आणि सुंदर मोठी गच्ची . घराला रंग ही सुंदर दिलेला होता. एकूण काय कुठेच कमतरता काढण्यासारखी नव्हती. मी सहज म्हणले मैत्रिणीला काय सुंदर घर आहे ग तुझं. त्यावर जे तिने मला उत्तर दिले त्यांनी मी अवाक झाले, पाहतच राहिले तिच्या कडे.

चार वीटांपासून, दगड आणि माती पासून बांधलेल्या सुबक खोल्या म्हणजे का घर ?चार माणसे एकत्र राहणे म्हणजे का घर ? नक्की घर तू कश्याला म्हणतेस, असा प्रति प्रश्न तिने मला केला. ती म्हणाली माझ्या मते घर म्हणजे उबदार खोल्या माणसाच्या सहवासातून तयार झालेल्या. एकमेकांसाठी आपण आहोत ही जाणीव होणे म्हणजे घर. हे घर नाही काही हे कोर्ट आहे. येथे केवळ ऑर्डर आणी ऑर्डर एवढच असते. या घरात माणस रहात नाहीत तर नियम राहतात. भावनांना काडीचीही किम्मत नाही इथे. जिवंत माणसांपेक्षा निर्जीव वस्तू जास्त जपल्या जातात इथे.मग हे घर कसे ?

घर म्हणजे नुसत्या चार भिंती नव्हेत,तर त्यात मायेची ऊब लागते. घर म्हणजे एकमेकांची मन समजून घेऊन राहणे. प्रत्येकाच्या भावनांचा आदर करणे.

मायेच्या प्रेमाचा हात जेव्हा निर्जीव भिंतींवरून फिरतो तेव्हा तीही सुखावते. त्यात ही जीव येतो.तेव्हा बनते घर.

चार आपुलकीचे शब्द जेव्हा घरभर घुमतात तेव्हा वास्तू देवताही प्रसन्न होते आणि घराला घरपण येते.

जेव्हा घरच्या स्त्रीला मान मिळतो तेव्हाच अन्नपूर्णा आनंदाने नांदते,तथास्तू म्हणते, तेव्हा बनते घर.

तिच्या मते घरातली प्रत्येक वस्तू जागच्या जागी नक्की असावी. पण म्हणून घर शो पीस नक्की नसावे. शिस्त नक्की असावी पण हुकुमशाही नसावी.

घरात गेल की भिरभिरणार्या नजरा नसाव्यात तर प्रसन्न भीती विरहित चेहेरे असावेत.

कधी कधी भिंतींवर रेखाटलेले एखादे चित्र ही घराला घरपण देऊन जाते हे तिचे सहज बोलणे मला फार भावले. हास्याने सुख नांदते, नाही तर घर म्हणजे पायात घातलेली बेडी वाटू लागते. तिच्या मते आपली कोणीतरी घरी वाट पाहत आहे ही जाणीव म्हणजे घर. एकमेकांच्या प्रेमाने घट्ट बांधलेली नात्यांची वीण म्हणजे घर. एकमेकांवरचा विश्वास, आधार म्हणजे घर.

रुसवे फुगवे पण ते न टिकणारे म्हणजे घर.अहंकार , मी म्हणीन तसेच, हुकुमशाही, दडपशाही नी घर नाही बनत . आपण जिथे मोकळा श्वास घेऊ शकतो, दिलखुलास हसू शकतो, आपली मत न घाबरता मांडू शकतो ते घर.ती त्या दिवशी खूप भरभरून, मनापासून आणि खर बोलत होती.

आणि तिचे ते बोल ऐकुन मला ही पटले उमगले माझ घर लहान असले तरी प्रेमाने, आपुलकीने भरलेले आहे. आमच्या मनाची वीण इतकी घट्ट आहे की आमच्या मुळे घर बनले आहे. त्याच्या मुळे आम्ही नाही. घर वाट पाहते आमच्या सहवासाची. कारण त्याला आमच्या मुळे घरपण मिळाले आहे.

घर प्रेमानी सजलेल असाव

आपुलकीने नटलेल असाव

मायेचा ओलावा असावा

विश्वासाचा एक सुंदर धागा असावा

जिथे हक्काची एक हाक असावी

मायेची एक थाप असावी

आधार असावा एकमेकांचा,

नुसती दिखाव्याची नाती नसावी

सहज मनाच्या कोपऱ्यातून? 

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

22.8.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सकारात्मक विचार – यशस्वी करिअरसाठी कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ सकारात्मक विचार – यशस्वी करिअरसाठी कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी खऱ्या अर्थाने उत्सुक असणाऱ्यांनी पुढील कानमंत्र अवश्य आचरणात आणायला हवेत.

नावे लक्षात ठेवणे —

जर तुम्हाला असे वाटत असेल की, लोकांमध्ये तुम्ही प्रिय व्हायला हवेत, तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे इतरांची नावे लक्षात ठेवणे. हे तुमच्यासाठी फार आवश्यक आहे. जगातील कुठल्याही भाषिकाला आणि कोणत्याही देशातील रहिवाशाला जर सर्वात प्रिय काय असेल तर ते स्वत:चे नाव होय. स्वत:च्या नावाइतका महत्त्वाचा आणि गोड शब्द दुसरा असूच शकत नाही. खरे म्हणजे आपल्या संपर्कात आलेल्या लोकांची नावे लक्षात ठेवणे हे तुमच्या करिअरमधील महत्त्वाचे कौशल्य आहे आणि तुम्ही ते आत्मसात केले पाहिजे.

एखाद्या व्यक्तीची कितीही काळानंतर भेट झाली अन् तुम्ही त्या व्यक्तीला नावाने हाक मारलीत तर आपोआपच त्याच्या मनात तुमच्याविषयी आपुलकी निर्माण होते.

नेपोलियन बोनापार्ट या महान योद्ध्याचा पुतण्या तिसरा नेपोलियन, जो फ्रान्सचा सम्राट होता, अभिमानाने सांगत असे की, कामाच्या प्रचंड तणावातही तो इतरांची नावे लक्षात ठेवू शकत असे. याविषयी त्याचे तंत्र अगदी सोपे होते. जर एखाद्याचे नाव त्याला नीट ऐकू आले नाही, तर तो मोकळेपणाने समोरच्या व्यक्तीला म्हणायचा, ” माफ करा मला तुमचे नाव स्पष्ट ऐकू आले नाही.” आणि त्यानंतर सांगितलेले नाव तो लक्षात ठेवायचा. संभाषणादरम्यान समोरच्या अनोळखी माणसाचे नाव वारंवार उच्चारून ते नाव लक्षात ठेवणे ही त्याची खुबी होती.

चांगले श्रोते बना ….

स्वत:बद्दल बोलायला सर्वांनाच आवडते. पण ते मन:पूर्वक ऐकणारा श्रोता त्यांना हवा असतो.

जर तुम्ही चांगले संभाषणकर्ते बनू इच्छित असाल तर आधी चांगले श्रोते बना. समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. अधूनमधून “हो का?”  “असं का?”  “त्या प्रसंगी तुम्ही कसे वागलात?” असे प्रश्न विचारा म्हणजे समोरचा माणूस आणखी उत्साहाने बोलू लागेल; आणि तुमच्या ध्यानीमनी नसतांना असे अनेक मित्र आपसूकच तुम्हाला मिळतील.

इतरांमध्ये खऱ्या अर्थाने स्वारस्य दाखवा

सुप्रसिद्ध रोमन कवी पब्लीअस सायरस याने म्हटले आहे की, इतरांनी आपल्या गोष्टीमध्ये स्वारस्य दाखवावे असे वाटत असेल तर आधी आपण इतरांच्या गोष्टीत स्वारस्य दाखवायला हवे. एक चांगला श्रोता होणे हे तर पुष्कळ महत्त्वाचे आहेच. पण त्यानंतरची पायरी म्हणजे इतरांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी इतरांच्या सुखदु:खात आस्था दाखवून खऱ्या अर्थाने समरस होता आले पाहिजे. कुणाचे कौटुंबिक प्रश्न असतील तर कुणाचे नोकरीतील प्रश्न असतील. त्यासंबंधी आस्थेवाईकपणे चौकशी करून, त्याविषयी काळजी व्यक्त करून दिलासा द्यायला हवा. “कुणीतरी आपली काळजी करणारे आहे,” या विचाराने माणसाला दिलासा मिळतो, धीर येतो; आणि यातूनच कधीही न तुटणारी नाती आणि प्रेमाचे बंध निर्माण होतात. आपल्या करिअरच्या यशस्वीतेसाठी हीसुद्धा एक गुरुकिल्ली आहे.

टीका करू नका.

परिस्थिती कुठलीही असू द्या, प्रसंग कोणताही असू द्या. पण कुणावरही, कधीही उघडउघड टीका करू नका. नापसंती दर्शवू नका किंवा सरळसरळ तक्रारीचा सूर काढू नका. त्याऐवजी अप्रत्यक्षपणे समोरच्या व्यक्तीची चूक त्याच्या नजरेत आणून द्या. नकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रगती होत नसते. इतरांना त्यांच्या चुकांबद्दल संशयाचा फायदा द्या. दोषी व्यक्ती आपोआपच स्वत:चे तोंड लपवील.

माझ्या तरुण मित्रांनो,  वर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही अमलात आणल्या तर तुमचे करिअर यशस्वी झालेच म्हणून समजा.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: ukbhaiwal@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

अध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता ☆ पद्यानुवाद – अष्टदशोऽध्याय: अध्याय (26) ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

अध्याय 18  

(सन्यास   योग)

(कर्मों के होने में सांख्यसिद्धांत का कथन)

(तीनों गुणों के अनुसार ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धि, धृति और सुख के पृथक-पृथक भेद)

 

मुक्तसङ्‍गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।

सिद्धयसिद्धयोर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते॥

 

धैर्य और उत्साह से, लिप्ति मान से मुक्त

हानि-लाभ, दुख-हर्ष से सात्विक कर्म विमुक्त ।।26।।

 

भावार्थ :  जो कर्ता संगरहित, अहंकार के वचन न बोलने वाला, धैर्य और उत्साह से युक्त तथा कार्य के सिद्ध होने और न होने में हर्ष -शोकादि विकारों से रहित है- वह सात्त्विक कहा जाता है॥26॥

He who is free from attachment, non-egoistic, endowed with firmness and enthusiasm and unaffected by success or failure, is called Sattwic.

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८

vivek1959@yahoo.co.in मो ७०००३७५७९८

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 67 ☆ रास्ते बदलो, मुक़ाम नहीं ☆ डॉ. मुक्ता

डॉ.  मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  एक अत्यंत विचारणीय  आलेख रास्ते बदलो, मुक़ाम नहीं।  यह डॉ मुक्ता जी के  जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन।  कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें। )     

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 67 ☆

☆ रास्ते बदलो, मुक़ाम नहीं 

यदि सपने सच न हों, तो रास्ते बदलो, मुक़ाम नहीं। पेड़ हमेशा पत्तियां बदलते हैं, जड़ें नहीं। मानव स्वतंत्र है, यह सपने देखता है और उन्हें साकार करने में अपनी संपूर्ण ऊर्जा-शक्ति को झोंक देता है। परंतु कई बार वह सफल हो जाता है और कई बार उसे असफलता का मुख देखना पड़ता है। सफल होने पर फूला नहीं सकता और असफल होने पर अकारण अवसाद में घिर जाता है। उसे यह संसार व रिश्ते- नाते मिथ्या भासने लगते हैं और निराशा रूपी गहन अंधकार में फंसा व्यक्ति, लाख चाहने पर भी उनके जंजाल से मुक्ति नहीं प्राप्त कर सकता। अक्सर धैर्य खो देने की स्थिति में वह थक-हार कर बैठ जाता है और अपने लक्ष्य को भी भूल जाता है। अकर्मण्यता उसे घेर लेती है और निराशा की स्थिति में वह अपने लक्ष्य से किनारा कर लेता है, जो कि ग़लत है।

सफलता प्राप्ति के केवल दो मार्ग नहीं होते; तीसरा विकल्प भी होता है। सो! मानव को उस विकल्प की ओर ध्यान देना चाहिए, क्योंकि ऋतु-परिवर्तन के समय वृक्ष अपनी पत्तियां बदलते, हैं जड़ें नहीं। पतझड़ के पश्चात् वसंत का आगमन अवश्यंभावी है। उसी प्रकार दु:ख के पश्चात् सुख, रात के पश्चात् दिन व अमावस के पश्चात् पूनम का आना निश्चित है। जो आया है, अवश्य जाएगा; फिर निराशा क्यों? यह संसार एक मुसाफ़िरखाना है। हर इंसान यहाँ अपना क़िरदार अदा कर चल देता है और यह सिलसिला कभी थमने का नाम नहीं लेता। संघर्ष प्रकृति का आमंत्रण है, जो उसे स्वीकारता है, आगे बढ़ जाता है। ईश्वर ऑक्सीजन की तरह होता है, उसे आप देख भी नहीं सकते और उसके बिना रह भी नहीं सकते। इसलिए कहा जाता है कि यदि ज़िंदगी को समझना है, तो पहले मन को समझो, क्योंकि जीवन हमारी सोच का साकार रूप है। जैसी सोच, वैसा ही जीवन। असंभव इस दुनिया में कुछ भी नहीं। हम वह सब कुछ कर सकते हैं, जो हम सोच सकते हैं और जो हमने आज तक सोचा हैं नहीं, उसे साकार रूप प्रदान करने का सामर्थ्य भी हम में है। सो! मानव सपने देखने को स्वतंत्र है। इसलिए कलाम जी ने खुली आंखों से स्वप्न देखने की सीख दी है अर्थात् जो सपना आप संजोते हो, उसे पूरा करने के लिए सभी पहलुओं सोच-विचार करें और स्वयं को उसमें खपा दें, जब तक आप उसे पूरा नहीं कर पाते…तब तक निरंतर लगे रहे। अक्सर गलियों से होकर हम सही रास्ते पर आते हैं और कोई रास्ता इतना लंबा नहीं होता। यदि आपकी संगति अच्छी है, तो आप निष्कंटक मार्ग पर अबाध गति से बढ़ते चले जाते हैं। ‘ क़िरदार की अज़मत को न गिरने दिया हमने/ धोखे तो बहुत खाए, परंतु धोखा न दिया हमने।’ इसलिए सदैव सत्कर्म करें और अहं को अपने निकट न आने दें। ‘घमंड मत कर ऐ! दोस्त/ सुना ही होगा, अंगारे राख ही होते हैं ‘ के माध्यम से मानव को सचेत किया गया है। जो जन्मा है, उसकी मृत्यु अवश्यंभावी है…यही जीवन का कटु सत्य है। धधकते अंगार अर्थात् अहंनिष्ठ व्यक्ति का अंत भी वही है। अच्छी किताबें, अच्छे लोग तुरंत समझ में नहीं आते, उन्हें पढ़ना पड़ता है। इसी प्रकार जीवन के यथार्थ को समझने के लिए यह जानना आवश्यक है कि मानव शरीर पांच तत्वों से बना है और अंत में उसे उनमें ही मिल जाना है। एक बूंद से जन्मा शरीर, अंत में एक मुट्ठी राख में परिवर्तित हो जाता है। जो इस रहस्य को जान जाता है, उसे न कोई खौफ़ रहता है, न ही कोई अहंकार/ न ही कोई ठौर ठिकाना/ मिट्टी था मैं, मिट्टी ही हूं और फिर मिट्टी में मिल जाना है। इसलिए मानव को यह सीख दी गई है कि आप इस तरह जिएं कि आपको कल मर जाना है और इस तरह सीखें कि आपको सदा जीवित रहना है। यह जीवन एक पाठशाला है। मानव हर दिन कुछ न कुछ नया सीखता है, क्योंकि ज्ञान अनंत है, अथाह है। जितना इंसान इसे सीखने का प्रयास करता है, डूबता चला जाता है। वास्तव में सीखने के लिए तो कई जन्म भी कम हैं।

जिस प्रकार सुगंध के बिना पुष्प, तृप्ति  के बिना प्राप्ति, ध्येय के बिना कर्म एवं प्रसन्नता के बिना जीवन व्यर्थ है, उसी प्रकार ज्ञान के अभाव में मानव जीवन भी पशु-तुल्य है। वह केवल पेट भरने के लिए उपक्रम करता है तथा अपने परिवार से इतर  कुछ भी नहीं सोचता। स्वर्ग व नरक की सीमाएं निश्चित नहीं हैं, परंतु हमारे विचार व कार्य-व्यवहार ही स्वर्ग- नरक का निर्माण करते हैं। इसलिए कहा जाता है कि ख़्याल करने वाले सही मार्गदर्शक को ढूंढिए, क्योंकि इस्तेमाल करने वाले तो खुद ही आपको ढूंढ लेंगे। वैसे खुद को पढ़ना संसार में सबसे कठिन कार्य है, परंतु प्रयास अवश्य करना चाहिए। सो! मन को शांत रखने का हुनर सीखिए और दूसरों के दिल में जगह बनाइए। इसलिए ज़रूरत से अधिक सोचने से बेहतर है कि ज़रूरत से अधिक व्यस्त रहें। यही मानसिक तनाव से मुक्ति का मार्ग है। सो! प्रभु की इबादत कीजिए, जहां ज़रूरतों का ज़िक्र न हो अर्थात् जो मिला है, उसके प्रति आभार प्रकट करें।

इसे संदर्भ में कलाम जी का यह कथन अत्यंत सार्थक है। यदि आप किसी से संबंध बनाए रखना चाहते हैं, तो उसके बारे में जो आप जानते हैं, उस पर विश्वास कीजिए; न कि आपने जो उसके बारे में सुना है। ‘दोस्ती के मायने, कभी ख़ुदा से कम नहीं होते/ अगर ख़ुदा करिश्मा है, तो दोस्त जन्नत से कम नहीं होते।|’ वास्तव में इंसान, इंसान को धोखा नहीं देता, बल्कि उम्मीदें ही धोखा देती हैं, जो वह दूसरों से करता है। इसलिए ऊंचाई पर हैं जो, वे प्रतिशोध की अपेक्षा परिवर्तन की सोच रखते हैं।

सो! खुशी प्राप्त करने का पहला उपाय है कि अतीत की बातों के बारे में न सोचा जाए, क्योंकि वे हमें आज की खुशियों से महरूम कर देती हैं। इसके साथ ही मानव को खुद को बदलने की सीख दी गई है। यदि आप संसार में दूसरों से बदलने की अपेक्षा करोगे, तो आप विजयी नहीं हो सकोगे, पराजित हो जाओगे तथा जीवन में कुछ भी नहीं कर पाओगे। आजकल लोग समझते कम, समझाते अधिक हैं। तभी तो मामले सुलझते कम, उलझते अधिक हैं। यहां मैं सरदार पटेल की उक्ति का ज़िक्र करना चाहूंगी कि |कठिन समय में कायर बहाना ढूंढते हैं और बहादुर व्यक्ति रास्ता खोजते हैं।’ इसलिए बनी-बनाई लीक पर न चलकर, अपने रास्ते का निर्माण स्वयं करो। संसार में वही व्यक्ति सफल होता है, जो अपनी नवीन राहों का निर्माण स्वयं करता है और दाना मांझी की भांति |एकला चलो रे’ में विश्वास रख, निरंतर आगे बढ़ता चला जाता है, जब तक वह अपनी मंज़िल को प्राप्त नहीं कर लेता। इसके लिए आवश्यकता है, आत्मविश्वास, कठिन परिश्रम व उस जज़्बे की, जो आपको बीच राह में थक-हार कर बैठने नहीं देता। आप अपने हृदय में यह निश्चय कर लो कि आप में यह करने की क्षमता व सामर्थ्य है, तो आप तब तक चैन से नहीं बैठेंगे, जब तक आपको अपने लक्ष्य की प्राप्ति नहीं हो जाती। असंभव शब्द तो मूर्खों के शब्दकोश में होता है और वीर पुरुष ‘जो ठान लेते हैं, वही कर गुज़रते हैं।’ आप में साहस है; आप जो चाहें कर सकते हैं। इसलिए जीवन में निराशा का दामन मत थामिए, अन्य विकल्प की तलाश करें, मंज़िल आपकी प्रतीक्षा में पलकें बिछाए बैठी होगी।

 

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत।

पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी,  #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com

मो• न•…8588801878

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry (Classical Translation) ☆ बेहतरीन शायरियाँ – लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में…. /I don’t  feel  inspirited at all in this desolated abode… – बहादुर शाह ज़फर ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present a Classical Translation of Mughal emperor Bahadur Shah Zafar’s Classical Shayari “लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में…”  Mughal emperor Bahadur Shah Zafar had composed this very soulful immortal ghazal, when he was imprisoned in Burma, away from his motherland, where he eventually died.

In Capt. Pravin Raghuvansi ji  wordsI always had a great desire to do an English paraphrasing of it, while retaining its spirit and emotions… ” 

We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit,  English and Urdu languages) for this classical translation.

बहादुर शाह ज़फर 

 ☆ लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में …. ☆ 

कैप्टेन  प्रवीण रघुवंशी:  बहादुर शाह ज़फर की एक बहुत भावपूर्ण, अमर कालजयी रचना है: “लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में…” बड़ी इच्छा थी कि इसका एक भावानुवाद किया जाये… .

 

लगता नहीं है जी मेरा

उजड़े  दयार  में

किस  की  बनी  है

आलम-ए-ना-पायेदार में

 

बुलबुल को बाग़बां से

न  सैय्याद से  गिला

क़िस्मत में क़ैद थी लिखी

फ़सल-ए-बहार  में

 

उम्र-ए-दराज़ माँग के

लाये थे चार दिन

दो आरज़ू में कट गये,

दो इंतज़ार में…

 

कह दो इन हसरतों से

कहीं  और जा  बसें

इतनी जगह कहाँ है

दिल-ए-दाग़दार  में

 

है कितना बदनसीब

ज़फ़र दफ़्न के लिये

दो  गज़  ज़मीन भी

न मिली कू-ए-यार में

 

☆ I don’t  feel  inspirited at all in this desolated abode …. ☆

(Captain Pravin Raghuvanshi: Mughal emperor Bahadur Shah Zafar had composed a very soulful immortal ghazal, when he was imprisoned in Burma, away from his motherland, where he eventually died:  “Lagta nahi hai jee mera ujde dayar mei…”

I always had a great desire to do an English paraphrasing of it, while retaining its spirit and emotions… Here’s an attempt…

 

I don’t  feel  inspirited at all

in this desolated abode, but

Whose happiness has  ever

lasted in this transient world

 

Nightingale has no complaint

With the  gardener or fowler

When  destiny  itself scripted

its captivity in peak of spring

 

Was  granted  four  days

of  life  as  a  benefaction…

Two were spent in desires,

while remaining two in wait

 

Please  tell  these desires to

settle down somewhere else

There isn’t enough room left

in this overly blotched heart

 

How  much  unfortunate,  I,

Zafar*  is, who couldn’t  find

Two yards of land for  burial

In the street of dear homeland!

*Zafar – India’s last Mughal emperor, Bahadur Shah, also known as Zafar, died in a British prison in Burma, longing for his country….

© Captain (IN) Pravin Raghuanshi, NM (Retd),

Pune

≈  Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

 

Please share your Post !

Shares