मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “टाईपरायटर आणि एका भारतीय पिढीचा इतिहास…” –  लेखक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “टाईपरायटर आणि एका भारतीय पिढीचा इतिहास” –  लेखक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे

गोदरेजच्या टाईपरायटरने एका भारतीय पिढीचा इतिहास लिहिला!! 

टाईपरायटर आता अडगळीत गेला आहे. 

कम्प्युटर, स्मार्टफोनच्या युगात जुनाट टाईपरायटर मशीन वापराणार तरी कोण? * *पण या एका मशीनने भारतातल्या २ पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय करून दिली होती. 

 स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडून नोकरी मिळवून देण्यात याच मशीनचा हातभार होता हे तुम्हाला माहित आहे का? या लहानशा मशीनने आधुनिक भारताचा इतिहास लिहिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आज आपण याच टाईपरायटर मशीन विषयी जाणून घेणार आहोत. ही माहिती वाचून आपण टाईपरायटरकडे एका नव्या दृष्टीने बघू यात शंका नाही.

****

१९४० च्या काळात भारत टाईपरायटर परदेशातून मागवत असे. परदेशातून येणाऱ्या टाईपरायटर मध्ये अमेरिकेतून येणाऱ्या टाईपरायटर्सची संख्या जास्त होती. यात अमेरिकेची रेमिंग्टन ही कंपनी अग्रगण्य समजली जायची. टाईपरायटर वगळता रेमिंग्टनचा आणि भारताचा आणखी एका बाबतीत संबंध आहे. रेमिंग्टन शस्त्र बनवणारी कंपनी आहे. या कंपनीनेच १८५७ साली गाय आणि डुकराची चरबी असलेल्या बंदुका तयार केल्या होत्या. त्यांच्या या घोटाळ्यामुळेच भारतात १८५७ चा उठाव घडून आला.

****

तर, ही रेमिंगटन कंपनी जवळजवळ १९१० पासून खास भारतासाठी मराठी, गुजराती, उर्दू, अरेबिक आणि गुरुमुखी अशा स्थानिक भाषांमधले टाईपरायटर तयार करत होती. स्थानिक भाषा लिहिता येत असल्याने टाईपरायटर भारतात प्रचंड प्रसिद्ध होते. लेखक, पत्रकार, राजकारणी टाईपरायटरचा नियमित वापर करत.

पण भारताला हवा होता आपला स्वतःचा स्वदेशी टाईपरायटर. ही कल्पना १९४८ सालीच सुचवण्यात आली होती, पण पुढे जाऊन ज्या कंपनीने पहिला भारतीय टाईपरायटर बाजारात आणला ती गोदरेज कंपनी त्यावेळी एका अत्यंत महत्वाच्या कामात गुंतली होती. हे काम होतं भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘मतदान पेटी’ तयार करण्याचं.

****

भारतीय टाईपरायटरचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी १९५५ साल उजाडावं लागलं. गोदरेज ही टाईपरायटर बनवणारी भारतातलीच नव्हे तर आशिया खंडातली पहिली कंपनी ठरली. या पहिल्यावहिल्या टाईपरायटरला नाव मिळालं “गोदरेज प्राइमा”.

आज आपण टाईपरायटरला तितकसं महत्व देणार नाही, पण त्याकाळी ही गोष्ट आधुनिक आणि स्वतंत्र भारताचं प्रतिक मानली गेली. आपल्याला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्ष उलटून गेली होती आणि एवढ्या कमी वेळात भारतीय इंजिनियर्सनी संपूर्णपणे स्वदेशी असा टाईपरायटर तयार केला होता. ही बाब स्फूर्तिदायक ठरली.

काही वर्षातच परदेशी टाईपरायटरच्या जागी ‘गोदरेज प्राइमा’ने संपूर्ण भारत व्यापला. ऑफिस म्हटलं की टाईपरायटर आलाच आणि तिथला तो परिचित असा खडखडचा आवाजही आलाच. या सगळ्या गोष्टींची सुरुवात १९५५ नंतर झाली. सरकारी कार्यालये, कोर्ट, संरक्षण यंत्रणा या गोदरेज टाईपरायटर वापरण्यात पहिल्या क्रमांकावर होत्या.

****

त्याकाळी रेमिंग्टन व्यतिरिक्त हाल्डा (Halda), ओलीवेटी (Olivetti), स्मिथ-कोरोना (Smith-Corona), अॅड्लर-रॉयल(Adler-Royal), ऑलम्पिया (Olympia), नाकाजिमा (Nakajima) या कंपन्या सुद्धा प्रसिद्द होत्या. गोदरेजने फारच कमी वेळात या प्रसिद्ध कंपन्यांना टक्कर द्यायला सुरुवात केली.

गोदरेजचा खप किती होता याची कल्पना येण्यासाठी एक उदाहरण बघूया. त्याकाळी भारतभरातून जवळजवळ १, ५०, ००० टाईपरायटर्सची मागणी असायची. पण कंपनीकडून फक्त ५०, ००० टाईपरायटर्स तयार केले जायचे. भारताबाहेरही गोदरेज प्राईमाचे ग्राहक होते. श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मोझांबिक, अंगोला, मोरोक्को या देशांमध्ये या टाईपरायटर्सचा प्रचंड खप होता.

****

टाईपरायटर आणि महिला सबलीकरण:

टाईपरायटर हे पहिल्यांदा महिलांशी जोडलं गेलं ते अमेरिकेत. अमेरिकन रेमिंग्टन कंपनीने असा विचार केला होता की टाईपरायटरचा सर्वाधिक उपयोय हा महिलांकडून होईल. या विचाराने त्यांनी महिलांसाठी फुलांचं डिझाईन असलेले टाईपरायटर बाजारात आणले. ही कल्पना चांगलीच प्रसिद्ध ठरली. महिला मोठ्या संख्येने टाइपिंगच्या कामाकडे वळल्या.

या ट्रेंडने त्याकाळी उच्चांक गाठला होता. १९१० साली अमेरिकेतील जवळजवळ ८१ टक्के टाईपिस्ट या महिला होत्या. टाईपरायटरने मोठ्या प्रमाणात अमेरिकन महिलांना काम मिळवून दिलं. पण अमेरिकेत याचा एक विपरीत परिणामही झाला. त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या पोर्नोग्राफिक मासिकांमध्ये “टाईपरायटर गर्ल” हा एक नवीन विषय बनला होता. भारतात असा कोणताही प्रकार घडला नाही. उलट या एका मशीनने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं. १९६० नंतरच्या चणचणीच्या काळात अनेक संसार या स्त्रियांच्या मदतीवर उभे राहिले. नोकरी करणारी बायको ही कन्सेप्ट इथून सुरू झाली. पाचवारी साडी, सायकल आणि टायपिंग मशीन या तीन गोष्टी म्हणजे आधुनिक भारतीय स्त्रीचे प्रोफाइल बनले. भारतीय महिलांना घराचा उंबरठा ओलांडून स्वतःच्या पायावर उभं करण्यात टाईपरायटरचा खूप मोठा हातभार लागला.

****

गोदरेज टाईपरायटरची भारतातली प्रसिद्धी

भारतात गोदरेज प्राईमा सुपरहिट का ठरलं? याचं एक प्रमुख आणि गमतीदार कारण आहे. भारतीयांना गोदरेज टाईपरायटरचा खडखडाट प्रचंड आवडला होता. हीच बाब इतर कंपन्यांनी लक्षात घेतली नाही. तसं पाहायला गेलं तर गोदरेज टाईपरायटरचा हा एक अवगुण म्हणता येईल, पण त्यानेच गोदरेजला भारतभर पोहोचवलं.

दिल्लीच्या ‘परवाना प्राधिकरण’ (driving licence authority)च्या ऑफिस बाहेर बसणारे ६० वर्षीय सतीश कालाकोटी गोदरेजच्या सुवर्णकाळाबद्दल सांगताना म्हणतात की, “जर्मन एरिका कंपनी त्यांच्या आवाज न करणाऱ्या आणि टाईप करण्यास अगदी सोप्प्या टाईपरायटर्ससाठी प्रसिद्ध होती. पण मी गोदरेजचा आवाज करणाऱ्या टाईपरायटरची निवड केली. ” सतीश कालाकोटी आजही दिल्लीत टाईपरायटरवर काम करतात. गोदरेज टाईपरायटरचा सुवर्णकाळ जगलेल्या मोजक्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो. भारतात टाईपरायटर म्हणजे प्रतिष्ठेचं चिन्ह समजलं जायचं. आजचा मध्यमवर्गी तरुणवर्ग बाइक किंवा कारची स्वप्न बघतो तर त्यावेळचा तरुणवर्ग हा टाईपरायटरची स्वप्न बघायचा. मॅट्रिक पास झालं की टायपिंग, शॉर्टहँड आणि नोकरीत रुजू असा प्रघातच पडलेला होता.

****

त्याकाळच्या गोदरेजच्या जाहिरातीचा मजकूरही बघण्यासारखा आहे. १९५० साली गोदरेजने आपल्या जाहिरातीत म्हटलं होतं, “Godrej presents The all-Indian Typewriter, ”. आणखी एका जाहिरातीत “Today’s typewriter with the touch of tomorrow” हे वाक्य होतं. गोदरेजची टीव्हीवर येणारी ही जाहिरात जुन्याजाणत्या लोकांना नक्कीच नॉस्टॅल्जिक करेल.

****

कॉम्प्युटर आणि टाईपरायटरचा उतरता काळ

कम्प्युटरने टाईपरायटरच्या सुवर्णयुगाचा अंत केला. २००० पासून टाईपरायटरची जागा कम्प्युटरने घेतली. कम्प्युटरच्या लाटेने गोदरेज कंपनीला जबरदस्त धक्का दिला होता. गोदरेज ही टाईपरायटर बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी तर होतीच, पण गोदरेज कंपनीच शेवटचा टाईपरायटर बनवणारी कंपनी पण ठरली.

गोदरेजने त्यांचा शेवटचा टाईपरायटर १२, ००० रुपयांना विकला होता. २०११ साली त्यांचा मुंबईचा टाईपरायटर तयार करणारा कारखाना कायमचा बंद झाला. यावेळी ५०० टाईपरायटर कारखान्यात पडून होते. गोदरेजच्या पुण्याच्या कारखान्याची अशी दश झाली नाही. कारण हा कारखाना पुढे रेफ्रिजरेटर तयार करण्यासाठी नव्याने वापरण्यात आला.

तर मित्रांनो, गोदरेजच्या टाईपरायटरने अशा प्रकारे स्वातंत्र्यानंतरच्या एका संपूर्ण पिढीचा इतिहास लिहिला.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नवीन संवत्सराचे नाव “पराभव” का? – लेखक : श्री वैभव साठे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ नवीन संवत्सराचे नाव “पराभव” का? – लेखक : श्री वैभव साठे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

कालनिर्णयचे “मागील पान ” वाचताना १९ मार्च २०२६ ला सुरु होणाऱ्या नवीन संवत्सराचे नाव “पराभव” असे आहे असे वाचले. २०२५ संवत्सराचे नाव “विश्वावसू” असे छान होते. मनात विचार आला, सौर वर्षाचे नाव कोणी पराभव असे कसे ठेवेल. मग थोडासा रिसर्च सुरु केला आणि छान माहिती मिळाली:

संवत्सर म्हणजे हिंदू पंचांगातील एक सौर-वर्ष, ज्याला स्वतंत्र नाव दिलेले असते. ख्रिस्ती संवताप्रमाणे (२०२६ इ. स.) फक्त आकडे न वापरता,

हिंदू कालगणनेत ६० वर्षांचा एक नामांकित चक्र वापरला जातो. याला म्हणतात: षष्टी‑संवत्सर चक्र (६० वर्षांचे चक्र)

या ६० वर्षांना नावे आधीपासून निश्चित केलेली आहेत. नेमकी ६० वर्षेच का? यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे.

गुरू आणि शनी या ग्रहांचा ग्रहपरिभ्रमण (rotation) कालावधी सुमारे गुरू(बृहस्पती) ११. ८६ (~ १२) वर्षे आणि शनीचा परिभ्रमण काळ २९. ४६ (~ ३०) वर्षे आहे. १२ आणि ३० चा ल. सा. वि. (LCM) ६० आहे त्यामुळे साधारण ६० सौर वर्षांनंतर गुरू‑शनी यांची परस्पर स्थिती पुन्हा जवळजवळ तशीच होते.

म्हणून हा ६० वर्षांचा चक्र खगोलशास्त्रावर आधारित आहे.

या ६० संवत्सरांची निश्चित यादी ही यादी कधीही बदलत नाही. संवत्सर चक्र नेहमी याच क्रमाने सुरू होते:

कोणत्या वर्षाला कोणते नाव कसे ठरते? यासाठी कलियुग कालगणना वापरली जाते. हिंदू कालगणनेनुसार: कलियुगाचा आरंभ — इ. स. पू. ३१०२ मध्ये झाला.

त्या दिवसापासून दरवर्षी संवत्सराचे नाव एकाने पुढे सरकत जाते. ६० नंतर पुन्हा पहिल्यापासून सुरू होते.

षष्टी‑संवत्सर चक्र (६० संवत्सरे)

१) प्रभव २) विभव ३) शुक्ल ४) प्रमोदूत ५) प्रजापती ६) आंगिरस ७) श्रीमुख ८) भाव ९) युव १०) धातु ११) ईश्वर १२) बहुधान्य १३) प्रमाथी १४) विक्रम १५) वृष १६) चित्रभानु १७) स्वभानु १८) तारण १९) पार्थिव २०) व्यय २१) सर्वजित २२) सर्वधारी २३) विरोधी २४) विकृति २५) खर २६) नंदन २७) विजय २८) जय २९) मन्मथ ३०) दुर्मुख ३१) हेमलंबी ३२) विलंबी ३३) विकारी ३४) शार्वरी ३५) प्लव ३६) शुभकृत ३७) शोभकृत ३८) क्रोधी ३९) विश्वावसु ४०) पराभव ४१) प्लवंग ४२)कीलक ४३) सौम्य ४४) साधारण ४५) विरोधिकृत ४६) परिधावी ४७) प्रमादी ४८) आनंद ४९) राक्षस ५०) नल ५१) पिंगल ५२) कालयुक्ति ५३) सिद्धार्थी ५४) रौद्र ५५) दुर्मती ५६) दुंदुभी ५७) रुधिरोद्गारी ५८) रक्ताक्षी ५९) क्रोधन ६०) अक्षय

ही यादी सूर्यसिद्धांत, आर्यभटीय, व पारंपरिक पंचांगांनुसार प्रमाणित आहे

प्रत्येक संवत्सर हिंदू नववर्षापासून (गुढीपाडवा / उगाडी) लागू होतो. ६० वर्षांनंतर चक्र पुन्हा प्रभव पासून सुरू होते

गंमत म्हणजे चिनी पंचांगातही ६० वर्षांचे फिरते चक्र आहे. परंपरागत चिनी पंचांगात ६० वर्षांचे चक्र वापरले जाते, याला गान्झी (干支) चक्र म्हणतात.

हे चक्र २००० हून अधिक वर्षांपासून अखंडपणे वापरले जात आहे. हे चक्र दोन स्वतंत्र चक्रांच्या संयोगातून तयार होते:

१) १० स्वर्गीय कांड्या (Heavenly Stems – 天干)

या कांड्या पंचमहाभूत तत्त्वे (five elements) आणि स्त्री‑पुरुष (Yin–Yang) गुणधर्म दर्शवतात.

२) १२ पार्थिव शाखा (Earthly Branches – 地支)

या शाखा म्हणजेच प्रसिद्ध चिनी राशी प्राणी:

उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, शेळी, माकड, कोंबडा, कुत्रा, डुक्कर.

६० वर्षांचे चक्र का होते?

दरवर्षी १ स्वर्गीय कांडी पुढे जाते आणि १ पार्थिव शाखा पुढे जाते. १० आणि १२ यांचा ल. स. वि. (LCM) = ६०

त्यामुळे तोच कांडी‑शाखा संयोग प्रत्येक ६० वर्षांनी पुन्हा येतो.

उदाहरण

१९८४ = Jia‑Zi (लाकूड उंदीर वर्ष) → नवीन ६० वर्षांच्या चक्राची सुरुवात

२०२४ = Jia‑Chen (लाकूड ड्रॅगन)

२०४४ = Jia‑Shen (लाकूड माकड)

२०८४ = Jia‑Zi पुन्हा (चक्र पूर्ण)

म्हणजे “ड्रॅगनचे वर्ष” असे म्हणताना,

त्यामागे तत्त्व + प्राणी + स्त्री‑पुरुष गुणधर्म यांचा एक पूर्ण संयोग असतो.

६० वर्षे हा आकडा पंचांगाचा योगायोग नाही. तो मानवी स्मृतीचा नैसर्गिक नियम आहे.

मानवी पिढी (generation) म्हणजे एकाच काळात जन्मलेले लोक, जे समान सामाजिक, आर्थिक, राजकीय अनुभवांतून गेलेले असतात.

साधारणपणे एका पिढीचा कालावधी: २०–२५ वर्षे असतो. ३ पिढ्या = आजी‑आजोबा → पालक → मुले: ३ × २० ≈ ६० वर्षे

म्हणजे ६० वर्षांत एक संपूर्ण कुटुंबीय अनुभव‑चक्र पूर्ण होते

६० वर्षानंतर अनुभवांची पुनरावृत्ती इतिहासात वारंवार दिसते:

युद्धे

आर्थिक मंदी

सामाजिक आंदोलन

मूलभूत मूल्यांचे चक्र

हेच कारण आहे की अनेक इतिहासकार म्हणतात: “History repeats itself every 2–3 generations. ”

भारत आणि चीनसारख्या संस्कृतींनी ६० वर्षांना पूर्ण कालचक्र मानले आहे.


लेखक : वैभव साठे, अटलांटा, अमेरिका 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १७ आणि १८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १७ आणि १८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक – १७ – – 

मनी मानव व्यर्थ चिंता वाहाते ।

अकस्मात होणार होऊनि जाते ।

घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।

मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥१७॥

अर्थ :

संसारात माणूस अनेक व्यर्थ चिंता करत बसतो. परंतु जे घडायचे असते ते अकस्मात घडूनच जाते. कारण प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार सुखदुःख भोगावे लागते. हे सत्य काही लोकांच्या लक्षात येत नाही आणि ते मात्र त्याबद्दल सतत दुःख करत राहतात.

आधीच्या श्लोकात आपण गेलेल्या व्यक्तीचा जो शोक करतो, तो शोक मोह किंवा लोभातून निर्माण होतो असे समर्थ सांगतात. या श्लोकात ते पुढे एक वेगळाच पैलू उलगडतात. माणूस आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या चिंतांनी त्रस्त असतो. परंतु चिंता करून फारसा उपयोग नसतो, कारण जे घडायचे आहे ते कर्मानुसार घडणारच असते.

माणसाचे आयुष्य चिंतांनी भरलेले असते. चिंता नाही असा दिवस फार क्वचितच येतो. विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तीर्ण होऊ की नाही याची चिंता असते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकरी मिळेल की नाही याची काळजी वाटते. पुढे लग्न होईल की नाही, संसार कसा होईल, मुलं चांगली निघतील का, म्हातारपणी आपली काळजी कोण घेईल? अशा अनेक चिंता माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत सतावत असतात. या चिंतेच्या ओझ्याखाली तो आयुष्य जगत राहतो.

परंतु समर्थ सांगतात की अशा प्रकारची व्यर्थ चिंता करण्याचा काही उपयोग नाही. कारण आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या कर्मानुसारच घडत असते. आपले कर्म चांगले असेल तर त्याचे चांगले फळ मिळते, आणि दुष्कर्म केले असेल तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. बाभळीचे झाड लावून आंब्यांची अपेक्षा करणे जसे अशक्य आहे, तसेच दुष्कर्म करून चांगल्या परिणामांची अपेक्षा करणेही व्यर्थ आहे.

महाभारतातील दुर्योधन आणि दुःशासन यांनी नीतीने वागणाऱ्या पांडवांविरुद्ध अनेक कटकारस्थाने रचली. त्या दुष्कृत्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले आणि अखेर महाभारताच्या युद्धात संपूर्ण कौरववंश नष्ट झाला. कर्माच्या नियमानुसार फळ मिळते याचे हे ठळक उदाहरण आहे.

आपले जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली एक सुंदर आणि अनमोल भेट आहे. या भेटीचा आपण सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे, वाईटकडून चांगल्याकडे अशी आपली वाटचाल व्हायला हवी.

जीवनाला अनेकदा रंगमंचाची उपमा दिली जाते. त्या रंगमंचावर प्रत्येकाला एक भूमिका मिळालेली असते. त्या भूमिकेचे प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे सादरीकरण करणे हेच आपले कर्तव्य आहे. एखादा शिक्षक असेल तर त्याने आदर्श शिक्षक होण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असलेली व्यक्ती आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करत असेल तर तेच तिचे खरे साधन आहे.

आपल्या वाट्याला आलेले कर्म म्हणजेच आपला स्वधर्म आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात —

“स्वये आचरिता स्वकर्म ।

ते स्वकर्म स्वयं होई ब्रह्म ॥”

म्हणूनच माणसाने आपले कर्म उत्तम करणे आवश्यक आहे. जीवनात येणारी सुखदुःखे ही आपल्या प्रारब्धानुसारच येतात हे ज्यांच्या लक्षात येते, ते शहाणे लोक त्यांचा शांतपणे स्वीकार करतात. ते व्यर्थ चिंता करत बसत नाहीत.

परंतु जे या तत्त्वाला समजून घेत नाहीत, ते मात्र दुःख आणि खेद यांच्या गर्तेत अडकून पडतात. स्वधर्म विसरला की माणूस विकारांच्या आहारी जातो, आसक्ती वाढते आणि त्यातून निर्माण होणारी कर्मे त्याला अधिकाधिक बंधनात अडकवतात. परिणामी तो जन्ममृत्यूच्या चक्रात गुरफटत राहतो.

जर आपण खरोखरच हे मानत असू की जीवन ही परमेश्वराने दिलेली अनमोल भेट आहे, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आपण सुंदर उपयोग करायला हवा. आपल्या कर्तृत्वाने जीवनपथ उजळून टाकायला हवा. कर्तव्य करताना फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने कर्म करणे आणि ते परमेश्वराला अर्पण करणे हीच जगण्याची खरी रीत आहे. अन्यथा तेच कर्म बंधनकारक ठरून दुःखाला कारणीभूत होते.

स्वसंवाद : 

  • मी माझ्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांबद्दल खूप चिंता करतो का?
  • जे काही घडते ते माझ्या संचिताचे फळ आहे हे मी मान्य करतो का?
  • माझ्या हातातील वर्तमानकाळ मी चांगल्या कर्मासाठी वापरतो आहे का?
  • स्वधर्माचे पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो का?
  • कर्तव्य करताना मी फळाची अपेक्षा ठेवतो का, की निरपेक्ष भावनेने कर्म करण्याचा प्रयत्न करतो?

– – – 

श्लोक क्र. १८ – – – 

मना राघवेंवीण आशा नको रे |

मना मानवाची नको कीर्ति तू रे|

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे |

तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे|१८|

अर्थ: हे मना एका रामाशिवाय (परमेश्वराशिवाय) तू कशाचीच आशा ठेवू नकोस. माणसाच्या ठिकाणी वासना ठेवून तू त्याची स्तुती (कीर्ति गाऊ नकोस) करू नकोस. वेद, शास्त्रे आणि पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात, त्याचेच वर्णन करणे (स्तुती करणे) योग्य (म्हणजे श्लाघ्यवाणे)आहे. कारण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तोच तुला तारू शकेल.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला आपण व्यर्थ चिंता करीत बसतो असे सांगतात. कारण होणारी गोष्ट पूर्वसंचितानुसार घडणारच असते. पण मग चिंता करायची नाही तर काय करायचे त्याचे उत्तर या श्लोकात आपल्याला मिळते. आपल्याला कोण मदत करेल? कोणाची आशा ठेवायची? कोणाची स्तुती गायची? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या श्लोकात मिळतात.

मनुष्याचा जन्मच वासनेच्या पोटी होतो. त्यामुळे वासना पूर्णपणे सोडणे सोपे नाही. परंतु ईश्वरप्राप्ती शिवाय ठेवलेल्या इतर वासना किंवा कामना दुःखाला कारणीभूत होतात. म्हणून समर्थ सांगतात की हे मना (मानवा)एका भगवंतावाचून तू दुसऱ्या कशाचीही वासना किंवा अपेक्षा ठेवू नकोस.

आपली भारतीय संस्कृती ही मुलत: अध्यात्मप्रधान आहे. ईश्वरप्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे असे अध्यात्मात मानले जाते. सारी वेद, शास्त्रे आणि पुराणे परमेश्वराचे वर्णन करतात आणि परमेश्वराचा महिमा गातात.

परंतु माणसाच्या ठायी असलेल्या देहबुद्धीमुळे त्याला मानवी जीवनातच धन्यता वाटते. इतर श्रेष्ठ व्यक्तींकडे पाहून आपले जीवनही तसेच असावे असे त्याला वाटल्यास नवल नाही. समाजामध्ये लोक थोर व्यक्तींची प्रशंसा करतात. पूर्वीच्या काळी राजे लोक तर आपल्या दरबारात आपली कीर्ती गाण्यासाठी भाट ठेवत असत. आजही वरिष्ठांची खुशामत करण्याची मानसिकता समाजामध्ये रूढ झाली आहे. आपला फायदा करून घेण्यासाठी किंवा स्वार्थ साधण्यासाठी लोक वरिष्ठांची स्तुती करताना दिसतात. अशा प्रकारच्या स्तुतीने ऐहिक जीवनात थोडाफार फायदा होतही असेल. पण त्याला स्वाभिमानाने जगणे म्हणता येणार नाही. ही एक प्रकारची लाचारीच आहे. दुसऱ्याची स्तुती जरूर करावी. गुणग्राहकता आपल्याजवळ असावी परंतु ती स्वार्थापोटी नसावी. लोकांची मानसिकता अशी असते की ते स्वार्थापोटी आज आपली स्तुती करतील परंतु उद्या त्यांचा स्वार्थ साधत नाही असे दिसले की ते निंदा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.

परंतु संकटकाळी किंवा अंतिम प्रसंगी श्रीमंत माणसे, वरिष्ठ लोक किंवा नातेवाईक यापैकी कोणीही उपयोगी पडत नाही. मोक्षमार्गावर वाटचाल करणे, आत्मदर्शन किंवा परमेश्वराची प्राप्ती करून घेणे हे जे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे, अशा प्रसंगी केवळ परमेश्वराचेच सहाय्य आपल्याला होत असते. त्याच्याच कृपेने जीवनातील संकटांना आपण धैर्याने तोंड देऊ शकतो.

महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना परिचित आहे. या कठीण प्रसंगातून आपल्याला सोडवतील म्हणून द्रौपदीने सुरुवातीला दरबारातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा पितामह भीष्म, द्रोणाचार्य आदींना विनंती केली. तिचे पती असलेल्या पांडवांची देखील तिला आशा होती. परंतु यापैकी तिच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. तेव्हा तिने आर्ततेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तोच तिच्या मदतीला धावून आला. म्हणून आशा करायची ती परमेश्वराची.

हे मानवा, स्तुती करायचीच असेल तर संत, सद्गुरु किंवा परमेश्वराची कर. त्यांचेच गुणगान गा असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. वेदांनी, शास्त्रांनी आणि पुराणांनी त्या परमेश्वराची स्तुती गुणांचे वर्णन केले आहेत. समर्थ ज्या राघवाची स्तुती करायला आपल्याला सांगतात, तो राघव म्हणजे परमेश्वर सर्व सृष्टीत विराजमान आहे. राघव हा शब्दच किती सुंदर आहे! राघव म्हणजे चैतन्य! हे चैतन्य सर्व चराचरात भरलेले आहे. चैतन्याची अनेक रूपे असतात. त्याला नावेही वेगवेगळी असतात. पण मूळ चैतन्य एकच असते. ते आपल्याला पाहता आले पाहिजे. आपण त्याचेच गुणगान करावे. तोच आपली जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करील.

स्वसंवाद : 

  • माझ्या आयुष्यात मी खरोखर कोणावर आशा ठेवतो — माणसांवर की परमेश्वरावर?
  • स्वार्थ साधण्यासाठी मी कधी कोणाची खुशामत तर करत नाही ना?
  • दुसऱ्याच्या गुणांची प्रशंसा करताना माझ्या मनात स्वार्थ तर नसतो ना?
  • माझ्या दैनंदिन जीवनात परमेश्वराचे स्मरण किंवा स्तवन याला किती स्थान आहे?
  • ऐहिक यशापेक्षा आत्मिक प्रगती अधिक महत्त्वाची आहे हे मला खरोखर पटते का? (क्रमशः)

 

– क्रमशः श्लोक १७ आणि १८. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ब्रह्मध्वज ते राष्ट्रध्वज” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ब्रह्मध्वज ते राष्ट्रध्वज” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

परंपरा, प्रतीक आणि स्वाभिमानाची उंच पताका

आकाशाला स्पर्शणारा अभिमान

… भारताचा राष्ट्रीय ध्वज — केशरी, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी निळे अशोकचक्र.

आपण त्याला तिरंगा म्हणतो; पण रंगांच्या दृष्टीने तो खरे तर चौरंगा आहे.

अशोकचक्रांकित हा ध्वज म्हणजे आपल्या राष्ट्राची जणू देवताच.

तो भारताच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आत्म्याचा तेजस्वी प्रतीक आहे.

निरभ्र निळ्या आकाशात डौलाने फडकणारा ध्वज पाहिला की मन भरून येते; छाती अभिमानाने फुलते आणि मस्तक आदराने आपोआप झुकते.

ध्वज म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नसतो.

तो असतो राष्ट्राच्या अस्मितेचा उंचावलेला स्वर.

रणांगणातील पताका

भगवाध्वज आणि जरिपटका

महाराष्ट्राला शिवछत्रपतींच्या परंपरेतून लाभलेला जरिपटका हा स्वाभिमानाचा ध्वज.

पूर्वी युद्धभूमीवर सैन्याच्या अग्रेसर रेषेत हा भगवा झेंडा घेऊन धावणाऱ्या वीराला “बिनीचा सरदार” किंवा “बिनीचा स्वार” म्हणत. याच शब्दावरून बिनिवाले हे आडनाव प्रचलित झाले.

रणांगणावर ध्वज फडकत आहे, याचा अर्थ सैन्य अजून पराभूत झालेले नाही.

बिनीचा स्वार पडला तरी दुसरा वीर पुढे सरसावून ध्वज उचलत असे.

कारण फडकता ध्वज म्हणजे सैन्याचा आत्मसन्मान.

ध्वजाचा तात्त्विक अर्थ

ध्वज म्हणजे उपस्थितीची खूण.

अग्नीला धूम्रध्वज असे म्हणतात, कारण —

“यत्र यत्र धूम्रः तत्र तत्र अग्निः”

जिथे धूर दिसतो, तिथे अग्नी असतो.

ध्वज म्हणजे अस्तित्वाची घोषणा.

रामायणातील ध्वज

रामायणकाळात इक्ष्वाकू वंशाच्या ध्वजावर कोविदार (कांचन) वृक्षाचे चिन्ह होते.

अयोध्येतील नव्या राममंदिरावरही याच परंपरेचा ध्वज फडकतो.

रघुवंशाचा ध्वज रक्तारुण वर्णाचा, कमळासारखा लालसर होता आणि त्यावर सूर्यज्वालेसारखी शमीपत्रे होती. म्हणूनच रामाचा ध्वज अरुणध्वज म्हणून ओळखला जातो.

रावणाच्या ध्वजावर मानवी कवटीचे चिन्ह होते.

कुंभकर्णाच्या ध्वजावर शेषनाग,

मेघनादाच्या ध्वजावर सिंह,

तर प्रहस्ताच्या ध्वजावर सर्प.

या पताका म्हणजे त्या त्या योद्ध्यांच्या सामर्थ्याची जाहीर घोषणा.

महाभारतातील ध्वज

महाभारतातील प्रत्येक योद्ध्याची स्वतःची ध्वजपताका होती.

श्रीकृष्ण — गरुडध्वज

अर्जुन — कपिध्वज (हनुमान)

युधिष्ठिर — चंद्र-नक्षत्र

सहदेव — हंस

नकुल — सुवर्णपृष्ठी हरिण

भीष्म — ताडपत्र व तारे

द्रोण — वेदी आणि धनुष्य

कृपाचार्य — वृषभ

दुर्योधन — नाग

घटोत्कच — गिधाड

या पताका म्हणजे त्या त्या योद्ध्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख.

ध्वजात दडलेल्या कथा

जगातील प्रत्येक राष्ट्राच्या ध्वजात त्याच्या इतिहासाची एखादी आठवण किंवा शौर्यकथा दडलेली असते.

– – अमेरिकेच्या ध्वजावरील ५० तारे तेथील राज्यांचे प्रतीक आहेत, तर १३ पट्टे त्यांच्या प्रारंभीच्या वसाहतींची स्मृती जपतात.

– – दक्षिण गोलार्धातील अनेक देशांच्या झेंड्यांवर सदर्न क्रॉस हा तारकासमूह दिसतो. भारतीय २७ नक्षत्रांमध्ये याचा समावेश नसला तरी पुराणकथांमध्ये त्यालाच स्वर्ग आणि मृत्युलोक यांच्या मध्ये लटकणारा त्रिशंकू असे संबोधले जाते.

– – ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, सामोआ आणि ब्राझील यांच्या ध्वजांवर हा तारकासमूह दिसतो.

काही ध्वजांची प्रतीके

जपानचा ध्वज

पांढऱ्या पार्श्वभूमीवरचा लाल सूर्य — उगवत्या सूर्याच्या देशाची ओळख.

चीनचा ध्वज

लाल पार्श्वभूमीवर एक मोठा आणि चार छोटे तारे — क्रांती आणि समाजरचनेचे प्रतीक.

नेपाळचा ध्वज

दोन त्रिकोणांचा असलेला जगातील एकमेव राष्ट्रीय ध्वज — हिमालयाची प्रतीकात्मक आकृती.

जर्मनीच्या ध्वजात तीन आडवे पट्टे आहेत : काळा – लाल – सोनेरी (पिवळसर).

रंगांचा अर्थ:

काळा – दडपशाही व संघर्षातून उभा राहिलेला इतिहास

लाल – स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान व क्रांतीची भावना

सोनेरी – स्वातंत्र्य, एकता आणि उज्ज्वल भविष्य.

श्रीलंकेचा ध्वज

तलवार धारण केलेला सिंह आणि चार पिंपळाची पाने — सिंहली परंपरा आणि बौद्ध मूल्यांचे प्रतीक.

इतर ध्वज

अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय संस्थाचे सुद्धा आपापले ध्वज असतात. त्यांचे कार्यकर्ते हे ध्वज घेऊन अभिमानाने मिरवतात.

ब्रह्मध्वज आणि गुढी

—- नवनिर्मितीची पताका

ब्रह्मध्वज म्हणजे ब्रह्मतत्त्व, ज्ञान किंवा सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचे प्रतीक असलेला ध्वज.

लोकपरंपरेत याच ब्रह्मध्वजाचे रूप म्हणजे गुढी.

म्हणजे ब्रह्मध्वज हा तात्त्विक शब्द, आणि गुढी हा लोकजीवनातील व्यवहारातील शब्द.

गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, अशी भारतीयांची श्रद्धा आहे. या सृष्टीउदयानाच्या आनंदाप्रीत्यर्थ ब्रह्मध्वज उभारण्याची प्रथा आहे.

वसंत ऋतू — नवनिर्मितीचा काळ.

झाडांना पालवी फुटते, फुले उमलतात.

सृष्टीच्या या नवउदयानिमित्त घरासमोर उभारली जाणारी गुढी म्हणजे नवनिर्मितीचा उत्सव.

समारोप

उंचावलेली पताका

ध्वज हा केवळ कापडाचा तुकडा नसतो.

तो असतो इतिहासाची आठवण, संस्कृतीची ओळख आणि स्वाभिमानाचा उंचावलेला स्वर.

रणांगणात तो शौर्याची शपथ असतो.

राष्ट्रात तो अभिमानाची ओळख असतो.

आणि गुढीच्या रूपाने तो नवनिर्मितीचा मंगल संदेश देत असतो.

म्हणूनच नववर्षाच्या या पवित्र क्षणी आपण ब्रह्मध्वजाला वंदन करतो —

ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।

प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु ॥

 

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९४८

‘पराभव’ नाम संवत्सर

विक्रम संवत् २०८२–८३

सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

 

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ५७ / ५८ / ५९ / ६० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ५७ / ५८ / ५९ / ६० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद महाराज की जय!!!

नारद भक्ति सूत्रे ५७

उत्तरस्मादुत्तरस्मात्पूर्वपूर्वा श्रेयाय भवति ||५७ ||”

अर्थ:

भक्तीच्या या तीन प्रकारांपैकी आधी सांगितलेले प्रकार हे नंतरच्या प्रकारांपेक्षा उत्तरोत्तर जास्त कल्याणकारी आहेत.

विवेचन:

तामस गुणी भक्ति, राजस गुणी भक्ति आणि सात्विक भक्ति याबद्दल आपण मागील सूत्रात थोडा विचार केलेला आहे. तरी आपण काही मुद्दे पाहू.

तमोगुणी साधकाची भक्ति सकाम असते. तो अर्थार्थी असतो. प्रपंच आणि प्रपंचातील वस्तूंच्या भोगांचे त्याला आकर्षण असते. अनेक सुखसुविधा अर्थात उत्तम भोग भोगता यावेत म्हणून तो ईश्वराकडे वळतो.

रजोगुणी भक्तास प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पाहिजे असतात. प्रपंचातील आणि परमार्थ मार्गातील विविध अनुभवांनी त्याची थोडी तयारी झालेली असते. जग नश्वर आहे, त्यातील सूखे खऱ्या अर्थांनी आपल्याला समाधान देऊ शकणार नाहीत याची अल्पशी अनुभूती त्याला आलेली असते. त्यामुळे भगवंत जसा ठेवेल तसे राहण्याचा प्रयत्न तो करीत असतो.

सत्वगुणी साधकाची भक्ति निष्काम असते. त्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागलेली असते.

असा भक्त जरी प्रपंचात रहात असला तरी त्याची प्रपंचाची आसक्ती सुटलेली असते, परिणामी त्याची अंगी खरे वैराग्य येते.

याचा थोडा वेगळा विचार केला तर या तीन पायऱ्या आहेत असे आपल्या लक्षात येईल.

१. जागे होणे म्हणजे जीवनाचे ध्येय निश्चित करणे.

२. ध्येय प्राप्तीसाठी कार्य करणे. त्यासाठी आवश्यक गोष्टींचा अंगिकार आणि त्याज्य गोष्टींचा बहिष्कार. इथे साधकाला आपल्या दोषांची जाणीव होते.

३. साधक आपले दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करू लागतो.

आपला देश कृषीप्रधान आहे. वरील तीन गोष्टी करणे म्हणजे शेतातील तण, खराब गवत आणि कचरा बाहेर काढून टाकणं. यातून शेताची अर्थात मनरूपी शेताची मशागत होऊन त्यातून चित्त शुद्ध होऊ लागते. चित्तशुद्धी होणे हा परमार्थ मार्गातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गौणी भक्तीतून साधक मुख्य भक्तीकडे जाऊ लागतो, त्याची साधना हळूहळू उच्च पातळीवर जाऊ लागते…!

जय जय रघुवीर समर्थ 

— 

नारद भक्ति सूत्रे ५८

अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ ||५८||”

अर्थ : इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग जास्त सुलभ आहे.

विवेचन:

भगवंत प्राप्तीच्या इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग अधिक सुलभ आहे असे सर्व संत आपल्याला सांगतात. याचा विचार आपण या आधी पंचविसाव्या सूत्रात केलेला आहे. या सूत्रात आपण भक्तिमार्गाचे सोपेपण अर्थात सुलभता पाहणार आहोत.

योगमार्गात मनुष्याला अनेक गोष्टी अत्यंतिक काटेकोरपणे कराव्या लागतात. कारण त्या मार्गात तसेच विधिविधान आहे असे आपल्या लक्षात येईल. योगमार्गात आधी शरीरावर ताबा मिळवून मग मनावर ताबा मिळवावा लागतो. त्यासाठी त्याला युक्त आहार विहार करावा लागतो. भगवंत गीतेत म्हणतात –  

निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि |

मोजूनि करितो त्यास योग हा दुःख नाशन||”

(गीताई ०६. १७)

सध्याच्या काळात आहार, विहार आणि यथायोग्य झोप घ्यायला मिळणे शक्य आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे सामान्य साधकाला योगमार्ग कठीण ठरू शकतो.

आधी कथन केल्याप्रमाणे मनुष्य कर्म सुद्धा योग म्हणून करू शकतोच असे नाही. तर तो बरेच वेळा करून टाकत असतो, उरकत असतो. अशी कर्म करून मुक्ति मिळू शकेल का? अर्थात सामान्य मनुष्याला, साधकाला कर्म करणे साधू शकते, पण *कर्मयोग* साधणे मात्र जिकिरीचे ठरते.

ज्ञान मार्ग हा बुद्धीचा मार्ग आहे. याची सुरुवात साधन चतुष्ट्याने होते. साधक वैराग्यशील असावा लागतो. अनेक ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास अंगी मुरावा लागतो. इतके सगळे करून ज्ञानप्राप्ती झाली तर त्याचा अभिमान होण्याची शक्यता जास्त असते, असे सर्व संत सांगतात. सर्व संत सांगतात की भगवंताला अहंकार बिल्कुल चालत नाही.

भक्तीमार्ग हा सर्व सामान्य माणसांसाठी अगदी राजमार्गासारखा आहे. या मार्गाला अर्थात भक्तीला राजविद्या असेही म्हणतात. विद्या, संपत्ती, कुळ, वर्णाश्रम, वेदाध्ययन, कठोर तपश्चर्या इत्यादींची भक्तीला अपेक्षा नाही.

सर्वसामान्य मनुष्य आपल्या जवळच्या नातेवाइकांवर, आपल्या आवडत्या वस्तूंवर प्रेम करीत असतो. ते प्रेम कधी स्वार्थी असते तर कधी निःस्वार्थी. प्रेम म्हणजे काय हे दाखवता येत नसले तरी त्या प्रेमाची अनुभूती कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाने घेतलेली असते. हेच प्रेम भगवंताकडे वळवले की त्याचे भक्तित रूपांतर होते.

संत तुकाराम महाराज या प्रेमाने भगवंत कसा जवळ येतो याचे वर्णन पुढील अभंगात करतात. — – 

*”प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥२॥ सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुलती ॥३॥ तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥४॥”*

(अभंग क्रमांक 432, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ५९

प्रमाणान्तरस्यानपेक्षत्वात् स्वयं प्रमाणत्वात् (च) ||”

अर्थ : भक्ति कोणत्याही प्रमाणावर म्हणजे पुराव्यावर अवलंबून नाही तर ती स्वतः सिद्ध आहे, म्हणून ती इतर मार्गांपेक्षा सोपी आहे.

विवेचन : कर्मयोग, ज्ञानयोग यांच्याशी तुलना करताना नारद मुनी २६ व्या आणि ३० व्या सूत्रांत याचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये भक्ति स्वयं फलप्रभा आहे असे म्हटले आहे. अर्थात तिला कोणतेही प्रमाण देण्याची गरज नाही.

प्रमा म्हणजे ज्ञान. ज्यामुळे ज्ञान होते, ते प्रमाण. प्रमाणा मध्ये ज्ञानाचा उगम होतो. भारतीय तर्कशास्त्रात तीन प्रमाण मानली गेली आहेत.

१. प्रत्यक्ष

२. अनुमान

३. शब्द किंवा आप्तवाक्य

  1. इंद्रियांना अनुभवाला येणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणतात. (Perception)
  2. निरीक्षणावर आधारित निष्कर्ष काढणे म्हणजे अनुमान.
  3. ज्याच्यावर आपला विश्वास आहे, जो आपला हितचिंतक आहे, निःस्वार्थी आहे, त्याचे म्हणणं आपण मान्य करतो. खरे मानतो, ते आप्त वाक्य.

परमार्थ मार्गात जर कर्ममार्ग, ज्ञानयोग अथवा योगमार्गाने जायचे असेल त्यासाठी किमान त्या त्या विषयाचे प्राविण्य अथवा पात्रता (अर्हता) अंगी येणे गरजेचे ठरते.

याउलट भक्तिमार्गात कसलीच लौकिक पात्रता लागत नाही. अनेक संत निरक्षर होते, अनेक संत श्रीमंत होते, अनेक संत अतिशय गरीब होते, काही संतांनी एका नामस्मरणाशिवाय कोणतेही साधन केलेलं नाही. भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्माला आला, अनेक स्त्री संत आहेत. रामाच्या प्रमुख भक्तांपैकी विभीषण राक्षस, हनुमंत वानर तर शबरी वनवासी होती, पण तिघांनी आपापल्या परीने भक्ति करून रामाची प्राप्ती करून घेतली. रामाने तर हनुमतांचा भरतासारखा भाऊ म्हणून गौरव केला.

ज्याप्रमाणे मातेला आपल्या वात्सल्याचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही, त्याप्रमाणे भक्ताला आपल्या भक्तीचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ६०

शान्तिरूपात् परमानंदरूपाच्च ||६०||”

अर्थ : भक्तीमध्ये स्वभावतः शांति असल्याने आणि ती अपार आनंद रूप असल्यामुळे ती इतर साधनांपेक्षा सुलभ आहे.

विवेचन : सर्वसामान्य मनुष्य आपल्या आयुष्यात कधी प्रयत्नाने तर कधी प्रारब्धाने अनेक गोष्टी मिळवतो. पण मनःशांती मिळवणं त्याला जमतेच असे नाही.

बालपणी त्याला नवनवीन खेळणी मिळाली की सुखशांती मिळेल असे वाटते, थोडा मोठा झाला की त्याला रंगीबेरंगी कपडे, चैनीच्या वस्तू मिळाल्या की सुखशांती मिळेल असे वाटते, मग ही मालिका संपता संपत नाही आणि मनुष्याला शांती लाभत नाही…

अनुदिनी अनुतापें तापलो…! “ अशी त्याची स्थिती होऊन जाते. याचा अनुभव जवळजवळ प्रत्येकाने कमीअधिक प्रमाणात नक्की घेतला असेल.

साधक भक्तिमार्गात लागला की मात्र त्याला शांतीचा लाभ होऊ लागतो. “जितकी भक्ति तितकी प्राप्ति” या न्यायाने तो जितका भक्ति मध्ये रमतो, तितका तो मनाने शांती अनुभवू लागतो. भक्ति म्हणजे शीतगृह असे म्हटले तरी वावगे होऊ नये. तिथे गेले की कोणी कसाही असो, त्याला शांती मिळाल्याशिवाय रहात नाही. भक्तिसाधना दृढ होऊ लागली की साधक निःशंक आणि निर्धास्त होऊ लागतो. आपली काळजी घेणारे, आपल्याला खंबीर आधार देणारे आपले सद्गुरू आहेत, याची त्याला खात्री पटते. साधनेच्या पुढील पडावात त्याच्या लक्षात येते की सर्व काही भगवंतच करतो. आपल्या हातात काहीच नाही आणि भगवंत माझ्या भल्या साठीच सर्व काही करीत आहे, अशी त्याची धारणा होऊ लागते. त्यामुळे तो तटस्थपणे भगवंताची लिला पाहू लागतो. मग त्याचा आनंद, त्याचे समाधान, त्याची शांती कधीही भंग पावत नाही. संत तुकाराम महाराज याचे वर्णन पुढील अभंगात करतात.

आनंदाचे डोही आनंदतरंग |

आनंदचि अंग आनंदाचे || धृ. ||

*

काय सांगों जालें कांहीचियाबाई 

पुढें चाली नाहीं आवडीनें || ||

*

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा |

तेथिचा जिव्हाळा तेथें बिंबे || ||

*

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा |

अनुभव सरिसा मुखा आला || ||

(अभंग क्रमांक २५८२, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ

– भक्ती सूत्र क्र. ५७ / ५८ / ५९ / ६० 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “‘वाघनख’ – – NOM DE GUERRE!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “वाघनख’ – – NOM DE GUERRE!” ☆ श्री संभाजी बबन गायके

कर्नल विश्वासराव शिंदे 

दैत्य हिरण्यकश्यपला मारायला नृसिंह अवतारात देवाला हातांच्या बोटांच्या नखांचा वापर करावा लागला… असाच एक राक्षस कलियुगात जन्माला आला होता… यावेळी त्याने ‘अफझल’ म्हणजे ‘श्रेष्ठ(? )’ असं नाव धारण केलं होतं! कलियुगातल्या नृसिंहानेही अर्थात स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेबांनीही नखांनीच अफझलची आतडी बाहेर काढून त्याला यमसदनी धाडले! फक्त ही नखं महाराजांच्या हातांच्या बोटांची नव्हती… बोटांमध्ये अंगठीसारखी घातलेली… धातूची होती! माजलेल्या अफजलचं पोट फाडायला मानवी नखं पुरेशी ठरली नसती… म्हणूनच धातूच्या वाघनखांची योजना महाराजांनी केली होती! हे छोटंसं शस्त्र डोंगराएवढा शत्रू मातीत घालायला पुरेसे ठरले होते!

वर्ष १९८५. भारतीय सैन्यात मराठा लाईट इन्फंट्रीची २१वी बटालियन उभारण्यात आली… भारतीय सैन्यातील विविध रेजिमेंटस, बटालियन्सचा विचार करता ही बटालियन तशी ‘तरुण’ किंवा नवी कोरी म्हणावी अशी होती. सीमापारचे शत्रू तर आहेतच, परंतू देशांतर्गत शत्रू सुद्धा काही कमी नाहीत. उत्तर-पूर्वेकडे देशाला विशिष्ट असा शेजार लाभलेला आहे. विघटनवादी शक्ती या देशांच्या सीमावर्ती भागांत तसेच त्यांच्या सीमांत लपून भारताविरोधात सशस्त्र कारवाया करीत असतात.

घनदाट जंगले, हिंस्र श्वापदे, विषारी कीटक, सततचा पाऊस यांची पर्वा न करता या भागांत आपल्या सैनिकांना काम करावे लागते. इथं समोरासमोरची लढाई लढली जाऊच शकत नाही. इथं आवश्यकता आहे गनिमी काव्याची… गुरील्ला पद्धत! गनिम-ई-कावा म्हणजे शत्रूचे हुलकावणी देणारे युद्ध आणि गुर म्हणजे युद्ध आणि ईला म्हणजे छोटे… छोटे युद्ध! यामागे कमी संख्येत, अचानकपणे प्रकट होत मोठ्या सैन्यावर वायुवेगाने हल्ला करून निघून जाणे, अशी पद्धत असते. आणि हीच पद्धत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा प्रमुख भाग होती, असं दिसून येतं.

१९९०. उत्तर भारतात वाढता विघटनवाद लक्षात घेऊन खास उत्तर-पूर्वी राज्यांसाठी असं स्वतंत्र दल उभारण्याची गरज भासली. त्यावेळी लेफ्टनंट जनरल विजय ओबेराय (सेवानिवृत्त) त्यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल होते आणि त्यांच्याकडे एक बटालियन स्पेशल फोर्स म्हणून प्रशिक्षित करण्याचे दायित्व दिले गेले… त्यांनी २१वी बटालियन निवडली!

गुरील्ला पद्धतीच्या युद्धासाठी सैनिकांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देणे अनिवार्य असते. म्हणून प्रशिक्षणाचा स्तर अत्युच्च ठेवावा लागतो. या दलाचे नावच स्पेशल फोर्सेस अर्थात विशेष सामर्थ्य असणारी दले असे आहे. भारतीय सैन्यात शिपाई म्हणून भरती होणे हीच मोठी कठीण बाब असते. स्पेशल फोर्सेस मध्ये या भरती झालेल्या, प्रशिक्षित सैनिकांनाच सहभागी करून घेतले जाते. विविध रेजिमेंटस, बटालियन्स मधील सैनिक आणि अधिकारी या दलांत प्रवेश करण्यासाठी स्वयंप्रेरणेने येतात… कारण यांत निवड म्हणजे एक मोठा बहुमान समजला जातो!

प्रशिक्षण कालावधी तीन ते पाच महिन्यांचा असू शकतो. यात पहिले पस्तीस दिवस सततचे शारीरिक प्रशिक्षण, डोळ्यांवर पट्टी बांधून एकत्रित येऊन कवायती करणे इ. चा समावेश तर असतोच. त्याचबरोबर स्वयंपाक करणे, संदेशवहन प्रशिक्षण, इमारती उध्वस्त करणे, तातडीचे वैद्यकीय सहाय्य देणे, अंधारातून, पाण्यातून, जंगलातून रस्ते शोधणे, आणीबाणीच्या स्थितीत अन्न, पाणी शोधणे, विषारी प्राणी हाताळणे आणि शस्त्रे चालवणे. चार चार दिवस पिण्याच्या पाण्याशिवाय राहणे, एक लिटर पाण्यावर तीन दिवस काढणे, सात सात दिवस न झोपता काम करीत राहणे! पाठीवर किमान दहा किलो वजन बाळगणे तर नेहमीचे. चालणे तर असतेच परंतू संपूर्ण युद्धसामग्री घेऊन दहा ते चाळीस किलोमीटर्स चालणेसुद्धा नेहमीचे. विविध भाषा गरजेनुसार शिकवल्या जातात. सैन्यात भरती होताना आणि पुढे प्रत्यक्ष सेवेत खडतर आयुष्य जगत असलेले सैनिकही या प्रशिक्षण सोडून जाण्याचे प्रमाण मोठे असते. प्रशिक्षणाच्या या टप्प्यावर प्रशिक्षण सोडून जाण्याचे प्रमाण सुमारे वीस टक्के असते.

पंचेचाळीसाव्या दिवसापासून आणखी कठीण टप्पा येतो. छत्तीस तास सतत व्यायाम, कसरत करणे, शत्रूच्या प्रदेशात घुसणे तिथून बाहेर पडणे याचा सराव, तीस किलोचे युद्धसाहित्य, चाळीस किलोचे इतर साहित्य घेऊन चालणे दहा किलोमीटर्स वेगाने चालणे, चाळीस ते पंच्याऐंशी किलो वजनाच्या जड वस्तू हलवणे, इकडून तिकडे घेऊन जाणे, पाण्यात बुडी मारून राहणे शिकवताना हात पाय बांधले जातात, पाण्यासंबंधी प्रशिक्षणात पहिल्या सोळा तासांत पिण्यासाठी पाण्याचा एक थेंब किंवा अन्नाचा एक कण दिला जात नाही. आणि या अवस्थेत स्मरण शक्ती, निरीक्षण शक्तीची परीक्षा घेतली जाते. हे झाल्यावर पुन्हा दहा किलोमीटर्स चालणे, सहा तास व्यायाम करणे, शत्रूवर छापा घालणे, जंगलात वास्तव्याची तयारी करणे, जखमी सैनिकांना संकटातून घेऊन येणे इत्यादी इत्यादी गोष्टी सर्वसाधारणपणे शिकवल्या जातात.

५६व्या दिवशी, सतरा किलो वजन घेऊन १०० किलोमीटर्स अंतर चालणे… यासाठी तेरा ते पंधरा तासांचा वेळ लागू शकतो… शिवाय इतर आणखीही प्रशिक्षणे असतात… प्रत्येक मिनिट आणि मिनिट शिकत राहावे लागते… आणि शेवटी अतिरेकी विरोधी कारवाईचे आव्हानात्मक प्रशिक्षण दिले जाते. वाळवंट, बर्फाळ प्रदेश, जंगली प्रदेश, पर्वतीय प्रदेश यांमधील कारवायांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम असतातच. शिवाय विमानातून उडी घेत शत्रू प्रदेशात शस्त्रे घेऊन उतरणे हा भागही असतोच…

एवढे सर्व केल्यावरच Maroon Berete प्राप्त होते… काचेच्या पेल्यातील पेय पिऊन झाल्यावर त्या प्याल्याचा तुकडा चाऊन खाल्ला की प्रशिक्षण पूर्ण केले असे समजले जाते. आणि मगच स्पेशल फोर्सेसचा लढवय्या तयार होतो! परंतू सर्वांत महत्वाची बाब म्हणजे स्वत:ची ओळख लपवून म्हणजे जवळजवळ अदृश्य राहूनच या योद्ध्यांना कामगिरी करावी लागते… They don’t exist so that we can! अर्थात इतरांसाठी ते अस्तित्वात नसतातच. पण त्यांचे हे अस्तित्वात नसणे हे देशातील नागरीकांच्या अस्तित्वात राहण्यासाठी असते!

२१ मराठा चे रुपांतर स्पेशल फोर्समध्ये करण्याचे ठरल्यावर निवड चाचणी झाली. सुमारे दोनशे सैनिक आणि काही अधिकारी स्वयंस्फूर्तीने पुढे आले. यांपैकी केवळ १७ टक्के लोकच प्रशिक्षणात टिकले! विशेष बाब म्हणून इतरांना दुसरी संधी देण्यात आली… तरीही हे प्रमाण पंचवीस टक्क्यांच्या वर जाऊ शकले नाही… इतके प्रशिक्षण जबर होते!

२१ मराठा मध्ये त्यावेळी लेफ्ट. कर्नल राजीव परमार नावाचे अनुभवी उप-प्रमुख अधिकारी कार्यरत होते. चाळीस वर्षे वय असलेले परमार साहेब पदोन्नती घेऊन इतर बटालियन, रेजिमेंटमध्ये जाऊ शकले असते… पण जिथे माझे सैनिक तिथेच मी असेन या दृढ संकल्पामुळे परमार साहेबांनी स्पेशल फोर्समध्ये स्वयंप्रेरणेने नाव नोंदवले… प्रशिक्षणात पद आणि अनुभव याचा विचार न करता सर्वांना समान प्रशिक्षण घ्यावे लागते… या कठीण प्रशिक्षणादरम्यान परमार साहेबांना मृत्यूने गाठले!

२१ मराठाचे स्पेशल फोर्सेस दलात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी रत्नागिरीतल्या मोरावणे गावात जन्मलेल्या कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांच्या समर्थ खांद्यांवर देण्यात आली. कर्नल शिंदे यांच्या रूपाने त्यांच्या घरातील ही पाचवी पिढी सैन्यात कार्यरत होती. त्यांचे वडील श्री. भास्करराव शिंदे Bombay Sappers मध्ये होते किंबहुना त्यांनीच Bombay Sappersची ४११, Para Field Company उभारली होती!

कर्नल विश्वासराव शिंदे साहेबांनी पुण्याच्या वाडिया महाविद्यालयातून पदवी घेऊन पुढे Indian Military Academy, देहरादून येथे सैन्याधिकारी प्रशिक्षणास प्रवेश मिळवला व त्यातून ते १९७२ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या १४व्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. सध्या सेवानिवृत्त असलेल्या शिंदे साहेबांनी वयाच्या ६८व्या वर्षी विमानातून १५०० फुटावरून parachute jump करून दाखवली होती. अशा अनेक कामगिरी त्यांच्या नावावर आहेत. विविध पदांवर सेवा बजावलेल्या कर्नल शिंदे साहेबांनी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष दलास प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अत्यंत प्रभावीरीत्या पार पाडलेली आहे!

२१ मराठा बटालियन स्पेशल फोर्स मध्ये रुपांतरीत करण्यासाठी शिंदे साहेबांनी पूर्ण ताकदीनिशी काम केले… आणि सामान्य जवानांतून विशेष योद्धे निर्माण केले.. आणि या शेकडो जवानांनी, अधिका-यांनी मणिपूर, म्यानमार सीमा इत्यादी ठिकाणी अनेक बलिदाने देत जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करून म्यानमारमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांचा शोध घेऊन म्यानमार मध्ये घुसून त्यांना संपवण्याची कामगिरी या फोर्सने २०१५ मध्ये केली होती… Surgical Strike नावाने ही मोहीम प्रसिद्ध आहे. एखादा टोकदार भाला जसा अजिबात आवाज न करता थेट, अचूकपणे लक्ष्य भेदतो… यात चूक करण्याची सुतराम संधी नसते… त्याला Silent Spear म्हणतात… म्हणूनच या २१ स्पेशल फोर्सळा Silent Spear असंही म्हणतात. २०२३ पर्यंत सुमारे ३३ जवान, अधिकारी यांनी या प्रदेशात बलिदान दिले असून तीन कीर्ती चक्रे, १७ शौर्य चक्रे, ५४ सेना मेडल्स, १९५ उत्कृष्ट कामगिरी प्रशस्तीपत्रके अशी कमाई केलेली आहे. होय, शौर्यासाठी मिळवलेली पदके, पारितोषिके मोठ्या अभिमानाने सांगितली जातात… पण यासाठी प्राणांचे बलिदानही द्यावे लागते!

देशासाठी बलिदान देणारे हुतात्मा कर्नल संतोष महाडिक हे याच दलाचे अधिकारी होते. प्रसिद्ध सैन्याधिकारी ब्रिगेडीअर सौरभ सिंग शेखावत (निवृत्त) यांनी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात मोठी कामगिरी करून दाखवल्याचे सर्वश्रुत आहेच!

भारतीय सैन्यातील या स्पेशल फोर्सेस वेगवेगळ्या टोपणनावांनी (moniker) ओळखल्या जातात, त्यांची स्वत:ची परिचय-चिन्हे आहेत. Red Devils, Predators, Russel’s Vipers, Mighty Daggers, Pirates, Mountain Rats, Desert Scorpions, Vipers, Dirty Dozens अशी ही विविध नावे आहेत… याला Nom De Guerre असं संबोधन आहे. म्हणजे युद्धातलं नाव. २१ मराठा बटालियनच्या स्पेशल फोर्सचं असं नाव देण्याची वेळ आली तेंव्हा कर्नल विश्वासराव शिंदे साहेबांनी एक मराठी, आगळंवेगळं आणि अत्यंत अभिमानास्पद नाव सुचवलं… वाघनख!

जय हिंद! जय हिंद की सेना!

 

माहिती संकलक व लेखक : संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणरागिणी ‘दीपिका अधाना’ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ रणरागिणी ‘दीपिका अधाना’ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले

“कर्तव्यापुढे मृत्यूची भीतीही फिकी पडते!” हरियाणातील फरीदाबादच्या २३ वर्षीय वैमानिक दीपिका अधाना हिने अटीतटीच्या प्रसंगात दाखवलेले धैर्य आज संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरत आहे. युएई (UAE) मधून १६९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याची जबाबदारी जेव्हा तिच्यावर आली, तेव्हा परिस्थिती अत्यंत भयानक होती.

मोहिमेवर निघण्यापूर्वी दीपिकाने आपल्या कुटुंबाला फोन केला आणि ती भावनिक होऊन म्हणाली, “आई, काका… कदाचित मी पुन्हा दिसणार नाही, मला शेवटचं बघून घ्या. ” पण तिच्या कुटुंबाने खचून न जाता तिला लढण्याचं बळ दिलं!

या ऐतिहासिक उड्डाणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विमानातील सहाही क्रू मेंबर्स महिला होत्या. कॅप्टनपासून ते क्रू सदस्यांपर्यंत सर्वांनीच या संकटात पोलादी जिद्द दाखवली. मानाचा मुजरा!

एटीसीशी संपर्क तुटला अन… : उड्डाणादरम्यान काही काळ एटीसीशी (ATC) संपर्क तुटल्याने सर्वांचाच श्वास रोखला गेला होता. मात्र, दीपिकाने डगमगता विमान नियंत्रित केलं आणि अवघ्या एका तासात सर्व प्रवाशांना घेऊन दिल्ली गाठली.

जेव्हा विमान दिल्लीच्या विमानतळावर उतरलं, तेव्हा प्रवाशांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. १६९ भारतीयांसाठी दीपिका आणि तिची टीम साक्षात ‘देवदूत’ बनून आली होती.

२३ वर्ष हे वय खेळण्या-बागडण्याचं असतं, पण दीपिकाने या वयात मृत्यूला डोळ्यांत डोळे घालून आव्हान दिलं. हीच खरी ‘नारीशक्ती’ आहे!

“स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता १६९ भारतीयांचे प्राण वाचवणाऱ्या या वाघिणीचा – दीपिका अधानाचा हा पराक्रम घराघरात पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा! ” 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांच्या इंग्रजी गीतांजलीला सुप्रसिद्ध आयरिश कवी विल्यम बटलर यीट्स यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे. या कवितांनी त्यांना भारावून टाकलं आहे. या कवितांचा आधारभूत पाया म्हणजे प्राचीन भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञान, त्यातील साधेपणा, भाबडेपणा, खरेपणा, पारदर्शकता, स्वयं मूल्यांकन करण्याचा धीटपणा, निरपेक्ष समर्पणाची भावना यांच्या कवितेतून होणाऱ्या दर्शनाने ते स्तिमित झाले आहेत. टागोरांच्या कवितांचा गर्भितार्थ, त्यातील तत्वज्ञान त्यांच्या मनाला भिडलं आहे. म्हणूनच त्यांनी एवढी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली असावी. यीट्स यांना देखील सन १९२३ मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. 

केवळ गीतांजलीतील कविताच नाही तर रविंद्रनाथांच्या पूर्ण आयुष्याच्या दर्शनाने यीट्स भारावून गेले आहेत. टागोरांच्या आयुष्याबद्दल च्या कल्पना, आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन त्यांना अद्भुत वाटतो. 

त्यांच्या मते रविंद्रनाथांचे वडील, भाऊ व इतर कुटुंबीय देखील असाधारण होते. भारतीय तत्वज्ञानाची अध्यात्मिक बैठक, शतकानुशतके चालत आलेला भक्तिमार्ग, बंगालचे साहित्य आणि कलेमध्ये रमलेले जनजीवन या सर्वांचे सार म्हणजे गीतांजली, असे त्यांना वाटते. 

तासनतास निसर्गाकडे बघत राहणे, जगण्याचे, व्यवहाराचे भान विसरणे हे रविंद्रनाथांच्या असामान्य असण्याचे दाखले आहेत असं त्यांचं मत आहे. 

विश्वविधात्याबद्दलच्या टागोरांच्या भावना निर्व्याज आहेत. त्यांना कसलाही राजकीय वा सामाजिक गंध नाही असं यीट्सना खात्रीपूर्वक वाटतं आणि यामुळेच ते युरोपियन तत्वज्ञांपेक्षा वेगळे आहेत असं ते म्हणतात. 

ते म्हणतात की, गीतांजलीची खरी थोरवी, तिच्या साधेपणात आहे. मोजके शब्द, खऱ्या भावना आणि स्वतःच्या मनात डोकावून घेतलेला हा चैतन्याचा शोध आहे. रविंद्रनाथ कवी म्हणून कसे उमलत गेले याबद्दल लिहितांना ते म्हणतात, ” वयाच्या १५ ते २० वर्षे या कालावधीतील त्यांच्या कविता साध्या, सोप्या व जास्त करून निसर्गाविषयी आहेत. वयाच्या २५ ते ३५ वर्षे या टप्प्यामधील कविता प्रेम आणि शोक या दोन मूलभूत भावनांविषयी भाष्य करतात आणि त्यानंतरच्या काळात ते हळूहळू अध्यात्माकडे वळतात.” 

कोणताही हेतू मनात न धरता टागोरांनी त्या त्या वेळच्या आपल्या सच्च्या भावनांना शब्दरूप दिलं आहे. त्यावेळी हे पुस्तक कोण वाचेल, कोण त्याचा अभ्यास करेल, त्याचा परिणाम काय होईल असे कोणतेही विचार त्यांच्या मनात नव्हते. यीट्सना रविंद्रनाथ एखाद्या निरागस बालकासारखे वाटत. कोणत्याही लौकिक गोष्टींनी, विचारांनी त्यांना बंदिस्त केलेले नव्हतं. 

‘देव काय आहे’ या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या कवितांमधून खूप सोप्या प्रकारे मिळतं. वर्षानुवर्षे हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो पण टागोरांच्या कविता वाचून आपल्याला समजतं की इतकी वर्षे देव आपल्या मधेच होता, फक्त आपल्याला ते माहित नव्हतं. आपल्या सगळ्या शुद्ध भावना म्हणजेच देवत्व म्हणजेच देव. हे मान्य करण्यासाठी लागणारी प्रामाणिक निरागसता हा टागोरांच्या लिखाणाचा गाभा आहे. स्वत:शी संपूर्ण पारदर्शक राहून, एखाद्या बालकाप्रमाणे मनाची कवाडं सताड उघडी ठेवून घेतलेला स्वत:मधल्या देवत्वाचा शोध म्हणजे गीतांजली आहे व हीच टागोरांची थोरवी आहे, असं कविवर्य यीट्सना वाटतं.

—–

☆ गीत ४६ ☆

I KNOW not from what distant time thou art ever coming nearer to meet me. Thy sun and stars can never keep thee hidden from me for aye.

In many a morning and eve thy footsteps have been heard and thy messenger has come  within my heart and called me in secret. 

I know not why to-day my life is all astir, and a feeling of tremulous joy is passing through my heart. 

It is as if the time were come to wind up my work, and I feel in the air a faint smell of thy sweet presence. 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४६ ☆

ठाऊक नाही कधी, सौंदर्य तुझे मज भावले

सूर्य अन् तारे तुजला, ना लपवू शकले

*

कितीक दिवस मी ऐकते, पदरव तुझा तो

प्रेषित तुझा, हृदयात माझ्या, हळूच डोकावतो

*

आज अचानक कां थरथरे मी आतुनी

हृदयातील कंपने, आनंद लहरी उठवुनी,

*

मज सांगती चल आता, कर्म इथले संपले

तुझा सुगंध येता, अस्तित्व तव जाणले

*

ठाऊक नाही मी कधी तुजकडे आकर्षिले

किती काळ लोटला, भेटीसाठी चालले

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ४७ ☆

THE night is nearly spent waiting for him in vain. I fear lest in the morning he suddenly come to my door when I have fallen asleep wearied out. Oh friends, leave the way open to him ⎯ forbid him not. 

If the sound of his steps does not wake me, do not try to rouse me, I pray. I wish not to be called from my sleep by the clamorous choir of birds, by the riot of wind at the festival of morning light. Let me sleep undisturbed even if my lord comes of a sudden to my door. 

Ah, my sleep, precious sleep, which only waits for his touch to vanish. 

Ah, my closed eyes that would open their lids to the light of his smile when he stands before me like a dream emerging from darkness of sleep. 

Let him appear before my sight as the first of all lights and all forms. The first thrill of joy to my awakened soul let it come from his glance. And let my return to myself be 

immediate return to him. 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४७ ☆

व्यर्थ रात्र गेली, त्याची पाहता वाट

मी असे निद्राधीन, होता भली पहाट

*

नका उठवू विनवितो, आला तो जरी दाराशी

पाखरांनो नका गाऊ, पवना नको पंगा नीरवतेशी

*

निद्रेच्या तमातून तो, स्वप्नासम उलगडू दे

त्याचीच पहिली प्रतिमा, मम नयनी उमटू दे

*

मनाचे जागेपण, त्याच्या तेजातून निथळू दे

जागृती येण्याआधी, नंदनवन त्याचे गाठू दे

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ४८ ☆

THE morning sea of silence broke into ripples of bird songs; and the flowers were all merry by the roadside; and the wealth of gold was scattered through the rift of the clouds 

while we busily went on our way and paid no heed. 

We sang no glad songs nor played; we went not to the village for barter; we spoke not a word nor smiled; we lingered not on the way. We quickened our pace more and more as the time sped by. 

The sun rose to the mid sky and doves cooed in the shade. Withered leaves danced and whirled in the hot air of noon. The shepherd boy drowsed and dreamed in the shadow of the banyan tree, and I laid myself down by the water and stretched my tired limbs on the grass. 

My companions laughed at me in scorn; they held their heads high and hurried on; they never looked back nor rested; they vanished in the distant blue haze. They crossed many meadows and hills, and passed through strange, far-away countries. All honour to you, heroic host of the interminable path! Mockery and reproach pricked me to rise, but 

found no response in me. I gave myself up for lost in the depth of a glad humiliation ⎯ in the shadow of a dim delight. 

The repose of the sun-embroidered green gloom slowly spread over my heart. I forgot for what I had travelled, and I surrendered my mind without struggle to the maze of shadows and songs. 

At last, when I woke from my slumber and opened my eyes, I saw thee standing by me, flooding my sleep with thy smile. How I had feared that the path was long and 

wearisome, and the struggle to reach thee was hard!

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४८ ☆

पक्ष्यांची गीते, जागी सकाळ झाली

साज फुलांचा लेऊन, उषा नटली

*

ना खेळलो, ना हसलो, ना बोललो

ना उद्यमा गेलो, ना वाटेत रेंगाळलो

*

न कांही पाहिले, न कांही ऐकले

शोध घेता तुझा, मन पुढे धावले

*

ढगांतून सोनेरी प्रभा पसरली

तरी ना आनंदाची गाणी गायिली

*

माथ्यावर सूर्य, पाऊले वेगात निघाली

नाचऱ्या पानांनी उगाच गिरकी घेतली

*

गुराखी सावलीत पेंगुळले, हाती लाठी

गवतावर पहुडलो मी, पाण्याच्या काठी

*

अनंताच्या वाटेवरचे सहप्रवासी मज हसले

अनेक देश, टेकड्या, कुरणे; पार करण्या गेले

*

वेगात, न पलटता, अदृश्य झाले क्षितिजापार

व्यर्थ यत्न उठण्याचा केला, ऐकून तो तिरस्कार

*

शाल पांघरून आरामाची, घेतले निद्रेचे सुखासन

विसरलो, काय होते या प्रवासाचे प्रयोजन

*

जागा झालो, साक्षात् तू पडलास दृष्टी

स्मित हास्य तुझे, तूच निर्मिल्या या सृष्टी

*

मी वेडा, तुला भेटण्या वणवण करीत होतो

त्या सौंदर्या, त्या गीतांना पारखा होत होतो

– क्रमशः भाग १६.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “2FA”: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन  ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

“2FA”: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

घराला दोन कुलुपे लावता – – 

– – मग सोशल मीडियाच्या अकाउंटला दोन कुलुपे का नाहीत?

घराच्या सुरक्षेसाठी एक लाकडी दरवाजा बिल्डर देत असतोच. पण आपण त्याला सांगून बाहेरून एक लोखंडी दरवाजा (सेफ्टी डोअर) बसवतो ना? आणि दोन्ही दरवाजाला कुलुपे लावतो ना? का लावतो? तर एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणून न?

मग जशी घराची काळजी घेता तशीच तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटची पण घेतली पाहिजे न! जसे घरी चोरी झालेली आपल्याला झेपत नाही तसेच सोशल मीडिया अकाउंट हॅक झालेलेही झेपत नाही. मग त्यासाठीच सोशल मीडिया अकाउंटला दुहेरी सुरक्षा आजच बसवा. ज्याचे नाव आहे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)… ही प्रणाली तुम्ही ऍक्टिव्ह केल्यानंतर प्रामुख्याने तुमचे अकाउंट हॅक होण्याचा धोका संपुष्टात येतो. अर्थात ज्यांनी ऑलरेडी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऍक्टिव्ह केले आहे त्यांना दंडवत आहेच पण असेही अनेकजण आहेत ज्यांना हे माहीतच नाही किंवा माहित आहे पण कसे करायचे ते माहित नाही, त्यांच्यासाठी हि पोस्ट आहे. यामध्ये महत्वाचे असे ईमेल अकाउंट, व्हाट्स अप अकाउंट आणि फेसबुक अकाउंट यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर देतोय. नीट पाहून घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करा. 

*

ईमेलसाठी :

स्टेप 1: तुमच्या ईमेल अकाउंटमध्ये लॉग इन करा

स्टेप 2: तुमच्या अकाउंटच्या सेटिंग्स किंवा प्रोफाइल सेटिंग्समध्ये जा.

उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा > मग अकाउंट सेटिंग्स > मग सिक्युरिटी.

स्टेप 3: –टू फॅक्टर ऑथेंटिकेशन” किंवा “2FA” शोधा आणि त्यावर क्लिक करा. “Enable” किंवा “सक्षम करा” बटणावर क्लिक करा.

स्टेप 4: – तुमचा फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप (उदा. Google Authenticator, Authy) निवडा. फोन नंबर निवडल्यास, तुमच्या नंबरवर व्हेरिफिकेशन कोड येईल.

स्टेप 5: तुम्हाला मिळालेला व्हेरिफिकेशन कोड एंटर करा. – “Verify” बटणावर क्लिक करा.

स्टेप 6: तुम्हाला बॅकअप कोड मिळतील. ते सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा. – हे कोड तुम्हाला तुमचा फोन नसताना अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी मदत करतील.

स्टेप 7: 2FA सक्षम झाले आहे का ते तपासा – त्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग आउट करा आणि पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न करा. – तुम्हाला 2FA कोड मागितला जाईल. तसे झाले की समजा सर्व सेट झाले आहे 

*

व्हाट्सअपसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)

स्टेप 1: तुमच्या फोनमध्ये व्हाट्सअप ओपन करा.

स्टेप 2: सेटिंग्स मध्ये जा, उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा > मग सेटिंग्स > मग अकाउंट > टू-स्टेप व्हेरिफिकेशन.वर क्लिक करा 

स्टेप 3: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम (ऍक्टिव्ह) करा त्यासाठी “Enable” बटणावर क्लिक करा. – तुमचा फोन नंबर व्हेरिफाई करा.

स्टेप 4: आता तिथे सहा डिजिट पिन (पासवर्ड) सेट करा आणि पुष्टी करा.म्हणजे ओके द्या. 

– हा पिन सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा.

स्टेप 5: ईमेल आयडी सेट करा (वैकल्पिक)

– तुम्हाला हवे असल्यास, ईमेल आयडी सेट करा जेणेकरून तुम्हाला पिन रीसेट करण्यासाठी मदत होईल.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम केल्याने तुमच्या व्हाट्सअप अकाउंटची सुरक्षा वाढते. 

*

फेसबुक साठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)

स्टेप 1: तुमच्या फोनमध्ये फेसबुक ओपन करा.

स्टेप 2: सेटिंग्स मध्ये जा तिथं उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील तीन लाइनवर क्लिक करा > सेटिंग्स & प्रायव्हसी > सेटिंग्स > सिक्युरिटी आणि लॉगिन.तिथं क्लिक करा. 

स्टेप 3: “टू फॅक्टर ऑथेंटिकेशन” किंवा “2FA” शोधा आणि त्यावर क्लिक करा.

-ते “Enable” किंवा “सक्षम करा” बटणावर क्लिक करा.

स्टेप 4: फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप निवडा

– तुमचा फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप (उदा. Google Authenticator, Authy) निवडा. फोन नंबर निवडल्यास, तुमच्या नंबरवर व्हेरिफिकेशन कोड येईल.

स्टेप 5 : तुम्हाला मिळालेला व्हेरिफिकेशन कोड एंटर करा. नंतर “Verify” बटणावर क्लिक करा.

झालं काम!

*

डॉ. डीडी क्लास : पाच दहा मिनिटांचे काम आहे पण तुमचं अकाउंट हॅकिंगचे टेन्शन कायमचे नष्ट करणार आहे. त्यामुळे नक्की करा. शिवाय घरच्यांनाही हे सांगून त्याचेही अकाऊंट सुरक्षित करा. वाटल्यास हि पोस्ट सेव्ह करून नंतर इतरांना पाठवून त्यांनाही सजग करा. 

©️ डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor : transcendental-technologies, Asso. with Pune University (SPPU)

5) Mentor : Canadian Asso. for Security and Intelligence Studies – CANADA

6) Mentor : Direct Action International – UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महापुरुषांचा पराभव… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ महापुरुषांचा पराभव… ☆ राधिका भांडारकर ☆

विजय – पराभव, यश – अपयश, जिंकणं – हरणं या सर्वांमध्येच एक सूक्ष्म रेषा असते जी यशातलंही अपयश किंवा अपयशातलं यश, जिंकण्यातलं हरणं, हरण्यातलं जिंकणं ठरवत असते.

जगाच्या इतिहासात असे अनेक महापुरुष होऊन गेले, ज्यांचे विचार, कार्य किंवा लष्करी प्रतिभा विशाल असूनही त्यांना त्यांच्या अंतिम किंवा एखाद्या मोठ्या संघर्षात भीषण पराभवाला सामोरे जावे लागले.

फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट ज्याने युरोप जिंकला पण वॉटर्लूच्या लढाईत तो पराभूत झाला आणि त्याला आपले साम्राज्य गमवावे लागले.

विसाव्या शतकातील सर्वात शक्तिशाली हुकूमशहा हिटलर यांनी जर्मनीला एका मोठ्या युद्धाच्या खाईत लोटले पण शेवटी त्याचा स्वतःचाच पराभव झाला.

अलेक्झांडरने बहुतेक ज्ञात जग जिंकले परंतु भारतीय उपखंडातला प्रतिकार आणि सैन्याची झालेली दमणूक यामुळे त्याच्या विजयाची मोहीम खंडित झाली.

रोमन सम्राट नीरो याच्या राज्यातील अस्थिरतेमुळे त्यालाही सत्ता गमवावी लागली आणि त्याचा अंत शोकांतिक झाला.

अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि वर्णद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या अब्राहम लिंकन यांचाही त्यांच्याच देशात खून झाला.

गॅलिलिओ, टॉलस्टाॅय, साॅक्रेटीस यांच्यासारख्या महापुरुषांनाही प्रस्थापित सत्तेपुढे हार मानावी लागली.

महात्मा गांधीजी नाही पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा म्हटले जाते. वैचारिक पातळीवर ते विजयी झाले पण राजकीय स्तरावर मात्र पराभूत झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनाही मुंबई आणि भंडाऱ्यातून दोनदा पराभूत व्हावे लागले.

मुळात महापुरुषांना विशिष्ट जातीत आणि गटात वाटल्यामुळेही ते पराभूत ठरले. त्यांच्या अनुयायांच्यातल्या स्पर्धा त्यास कारणीभूत ठरल्या.

एकंदर या सर्वांचा विचार करत असताना सहज मनात येते पराभूत असूनही या सर्व व्यक्ती मानवी मनातून दूर झाल्या नाहीत कारण एकेकाळचा इतिहास त्यांनी त्यांच्या धोरणाने घडवला होता.त्यांच्या पराभवाची कारणेही विविध होती.

मात्र *महापुरुषांचा पराभव* या विषयाचा विचार करताना, त्याची कारणे ठरवताना तो नक्की कुणामुळे आणि कशामुळे झाला याचा अभ्यास करताना, तो दोन ठळक भागात करावा लागतो एक त्यांच्या तत्त्वांचा त्यांच्याच अनुयायांकडून झालेला पराभव आणि दुसरा म्हणजे त्यांची तत्त्वेच, अति महत्त्वाकांक्षा त्यांच्या वैयक्तिक अपयशाची किंवा पराभवाची मूलभूत कारणे ठरू शकतात.

एखाद्या महान व्यक्तीचा त्यांच्या अनुयायांकडूनच कसा पराभव होतो याचा विचार करताना काही ठळक बाबी मनात उतरतात. कुठलीही व्यक्ती ही तिच्या कर्माने महान ठरते. प्राप्त परिस्थितीकडे निराळ्या दृष्टिकोनातून बघून समाजावरची संकटे दूर करण्याचा किंवा समाज उद्धाराचा त्या व्यक्तीचा प्रयत्न असतो. त्या कार्यामुळेच ती व्यक्ती महान ठरते. छत्रपतींनी स्वराज्याच्या प्राप्तीला नेहमी “श्रींची इच्छा” असे म्हटले कारण कार्य श्रेष्ठ असते. व्यक्ती कार्यामुळे महान बनते.

कार्यापेक्षा जास्त कुठलीच व्यक्ती श्रेष्ठ नसते. महापुरुषांच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्यांचे अनुयायी मात्र त्यांनी आरंभिलेले कार्य पुढे नेण्याऐवजी त्या महापुरुषाची पूजा करण्यात धन्यता मानतात. इथूनच व्यक्ती पूजेला सुरुवात होते आणि महापुरुषांच्या तत्त्वांचा पराभवही सुरू होतो. त्यांच्या तत्त्वांना काळानुरूप बदलतं स्वरूप देण्याऐवजी, अथवा त्यातील निकड, गरज समाजाला समजावण्याऐवजी त्यांचे (त्या व्यक्तींचे) फक्त पुतळे उभारण्यात धन्यता मानतात आणि एक प्रकारे समाजाची दिशाभूल होऊन वैचारिक कुजवणूकही होते. पर्यायाने महापुरुषाचे कार्य, कार्यकारणता, उद्देश हे सर्व विरून जाते. केवळ गळ्यात पुष्पमाळा घालून कोनाड्यात बसवलेलं देवत्त्व त्यांना दिलं जातं. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजर्‍या केल्या जातात. कधी त्यांच्याविषयी केलेल्या विधानांचा त्यांच्या अनुयायांकडून निषेध वगैरे होतो.

थोडक्यात व्यक्तीपूजन होते. जेव्हा कार्यापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ होते तिथेच महापुरुषांचं अपयश मोजलं जातं आणि याला जबाबदार त्यांचे अनुयायी असतात. गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांचे उदात्त विचार, पराकोटीची सामाजिक बांधिलकी, नैतिकतेचा आग्रह, यांच्याशी जेव्हा त्यांच्याच अनुयायांयांकडून प्रतारणा होते किंवा त्यांच्या वागण्यात विसंगती आढळते तेव्हा नाईलाजाने म्हणावे लागते की महापुरुषांचा पराजय त्यांचे अनुयायीच करत असतात.अधिक तीव्रतेने, अथवा कठोरपणे असंही म्हणता येईल की ज्यांना आपण या महापुरुषांचे अनुयायी म्हणतो ते प्रत्यक्षात फक्त राजकीय फायद्यासाठी त्यांचे “तोंडीलावणं” करतात तेव्हा या महापुरुषांचे झालेले आत्मिक पराभव जाणवतात.

याच विषयाच्या दुसऱ्या भागात “अनुयायी” हा घटक दूर ठेवला तर त्या व्यक्तीच्या आचारसंहितेतच कुठेतरी त्यांच्या पराजयाची बीजे सापडतात आणि यासाठी मला पुराणकालीन युगपुरुषांचाही वेध घ्यावासा वाटतो. प्रजाहितदक्ष, मर्यादापुरुष श्रीरामाचे चरित्र वाचतानाही त्यांनी केलेल्या “सीतेच्या त्यागाचं”समर्थन ओढूनताणूनच करावं लागतं.

पुराणातल्या महापुरुषांचा विचार माझ्या मनात जेव्हा येतो तेव्हा नकळत आणि अगदी अलगद माझं मन महाभारतातल्या महापुरुषांचा विचार करू लागतं. महाभारतातल्या कथा लहानपणापासून जशा सांगितल्या गेल्या तशा स्वीकारल्या गेल्या पण त्यानंतर जेव्हा जाणीवा काहीशा प्रगल्भ होत गेल्या तेव्हा महाभारतात गणल्या जाणाऱ्या थोर, धोरणी, कर्तव्यनिष्ठ शब्दकठोर, वचनबद्ध महापुरुषांविषयी संदेह निर्माण होऊ लागला. त्यात द्रोणाचार्य, अश्वत्थामा, युधिष्ठीर, कर्ण हे सुद्धा सारे महापुरुषच होते पण कुठे ना कुठे ते पराभूत होते, त्यांची कुठल्या ना कुठल्या प्रकारची महानताच त्यांना पराभूत करण्यासाठीचे कारण ठरली असे ठामपणे वाटतं.

त्यापैकी एका व्यक्तीचा मला या लेखात जाणीवपूर्वक परामर्श घ्यावासा वाटतो आणि ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी आजन्म ब्रह्मचर्य आणि हस्तीनापूरच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याची भीषण शप्पथ घेतली होती ते कुरू साम्राज्याचे पितामह, एक महान योद्धे आणि नीतीज्ञ. त्यांची जीवनकथा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांच्या प्रतिज्ञा, कुरु साम्राज्यात घडलेल्या प्रसंगाशी त्या त्या वेळच्या त्यांच्या भूमिका, त्या भूमिकांना दिलेलं वचनबद्धतेचं उदात्त कवच, कुरुक्षेत्रातल्या लढाईतलं त्यांचं सेनापतीपद आणि धोरण या अनेक बाबींचा एखाद्या विस्तृत कॅनव्हासवर मांडणी करून आढावा घेतला तर हा महापुरुष पराभूतच होता हे जाणवतं.

देवव्रत ते भीष्म ते भीष्माचार्य ते पितामह हा त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या भूमिकेवर नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह आकारतं. सोमवंशातील राजा शंतनु आणि गंगा यांचा पुत्र आणि महाभारतातील अत्यंत विख्यात असा एक महापुरुष म्हणजे भीष्म. मूळ नाव देवव्रत परंतु सत्यवती नामक धीवर कन्येवर त्यांच्या वडिलांचे मन बसले आणि तिच्याशी विवाह व्हावा म्हणून “माझ्याच मुलाला राज्य प्राप्त व्हावे” या तिच्या अटीला त्यांनी मान्यता दिली त्याचवेळी देवव्रतने ब्रह्मचर्याची शपथ घेतली आणि या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना भीष्म असे उपनाव प्राप्त झाले आणि तेच प्रख्यात झाले. या प्रतिज्ञेपासूनच खरं म्हणजे भविष्यातल्या त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला. रणविद्या, राजनीती, अर्थशास्त्र, अध्यात्म, धर्मनीती इत्यादी क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अलौकिक होते.

“सर्वशास्त्रवेत्ता” म्हणूनच त्यांना मानले जायचे. कुरुवंशातील शंतनूपासून दुर्योधनापर्यंत अनेक पिढ्यांची त्यांनी काळजी घेतली. चित्रांगद आणि विचित्रवीर्य या सावत्र भावांचे ते संरक्षक बनले. आंबा, अंबिका, अंबालिका या राजकन्यांचे स्वयंवर त्यांनी जिंकले पण या मुली त्यांनी त्यांचा सावत्र भाऊ विचित्रवीर्यासाठी जिंकून आणल्या. स्वीकारलेल्या तत्त्वांचे काटेकोर पालन करणे हा त्यांचा स्वभाव म्हणून आमरण ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी ते अशा रीतीने चिकटून राहिले.

परशुरामांनी अंबेशी विवाह करण्याची त्यांना आज्ञा केली होती पण तीही त्यांनी पाळली नाही परिणामी अंबा सूडबुद्धीने ग्रासली गेली आणि कुरुक्षेत्री याच अंबेने शिखंडीच्या रूपात पुनर्जन्म घेऊन अर्जुनासोबत लढताना भीष्मास हरवले. शिखंडी रुपातल्या अंबेकडून म्हणजेच एका स्त्री कडून आलेल्या बाणांचा भीष्मांनी प्रतिकार केला नाही म्हणूनच ते रणांगणात अखेर कोसळले.

दु:शासनाने भर दरबारात केलेली द्रौपदीची विटंबना हा महापुरुष थांबवू शकला नाही हा केवढा तरी मोठा कलंक या महान विद्वान व्यक्तीवर कायमचा लागलेला आहे.
द्रौपदीने त्यांना प्रश्न केला होता, ” जुगारात हरलेल्या युधिष्ठीरास मला पणाला लावायचा काय अधिकार होता? वस्त्रहरणाच्या वेळी पितामह तुम्ही मौन धारण करून न्यायाच्या दरबारात माझा अपमान का केलात? ”

द्रौपदीचा हा प्रश्न म्हणजे भीष्माच्या आचारसंहितेवर आणि न्यायाच्या उल्लंघनावर केलेला थेट आरोप होता. त्यांचा कायदेशीरपणा आणि नीतिमत्तेवरच तिने प्रश्नचिन्ह उभे केले होते आणि इथेच या महापुरुषाचा दारुण पराभव अधोरेखित होतो.

“कुरुवंशाचे खाल्लेले मीठ विरोधास रोकतं” हे त्यांनी केलेलं त्यांच्या मौनाचं समर्थन अत्यंत पांगळं नव्हतं का? कौरवांचे दोष दिसत असतानाही युद्धात त्यांच्याच बाजूने लढणे, ज्या कुलाचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली ते कुल नष्ट होण्याची चिन्हे दिसत असतानाही केवळ प्रतिज्ञेला चिकटून राहण्यासाठी असत्य, अधर्माविषयी मौन बाळगणं हे या महापुरुषाच्या नैतिक पराभवाचं मूळ कारण आहे.

युद्धानंतर इच्छामरणी, मृत्युला उत्तरायण सुरू होईपर्यंत थांबवणारे, शरपंजरी पहुडलेले पितामह भीष्म कृष्णास प्रश्न विचारतात.

“एका क्रूर वास्तवास मला का सामोरे जावे लागत आहे? इतिहास माझ्याकडे कोणत्या दृष्टीने बघेल? ” त्यावेळी कृष्ण सांगतात, ” कुरुक्षेत्रातील रक्तपात हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी गरजेचा होता. जरी त्यात पितृतुल्य व्यक्तींचा वध होणे वेदनादायी होते.” श्रीकृष्ण पुढे सांगतात, ” जेव्हा क्रूरता आणि अधर्म मर्यादा ओलांडतात तेव्हा प्रतिज्ञा, वचनबद्धता, शब्दकठोरता हा आत्मघाती मार्ग ठरतो. पितामह! तुमच्या वैचारिकतेत नैतिकता असली तरी वास्तविक लवचिकता नव्हती. असत्य आणि अधर्म दिसत असतानाही तुम्ही तुमच्या विचारांची माघार पत्करली असती तर आज हा रक्तपात नव्हे हे युद्धच वाचले असते. पितामह! म्हणून नेमके इथेच तुम्ही खऱ्या अर्थाने पराभूत झालात.”

एका महापुरुषाचा पराभव कलियुगात किंवा युद्धाच्या काळात हेच सूचित करेल की भीष्माचार्यांसारख्या जुन्या नियमांपेक्षा अन्यायाविरुद्ध लढण्याचे कृष्णा सारखे धोरणच उपयुक्त आहे. कृष्ण -भीष्म यांच्या संवादातून हेच स्पष्ट होते की न्यायाच्या रक्षणासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. स्वीकृत धोरणांना छेद द्यावे लागतात. जे भीष्मासारख्या ज्ञानी पुरुषाला का समजू शकले नाही?

महापुरुषांचा पराभव याविषयाचा विचार करतांना भीष्माचार्यांचे उदाहरण प्रातिनिधीक स्वरूपातले आहे.

वर्तमानात होणाऱ्या निवडणुकांचा, युद्धांचा, युद्धात कोसळणाऱ्या अथवा हत्या होणाऱ्या त्या त्या देशांतील नेत्यांचा, त्यांच्या पराभवाचा विचार भविष्यात जेव्हा कधी होईल तेव्हा त्यांच्याही पराभवाची कारणे अशीच त्यांचे अनुयायी, राजकीय आणि वैयक्तिक स्तरावर तपासली जातील हे नक्कीच.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares