मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग पहिला) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग पहिला) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆ 

संध्याकाळचे सहा वाजले असावेत. नेहमीप्रमाणे मी गॅसवर चहाच भांडं ठेवलं.

वासू येईलच इतक्यात. एक तासभर समोरच्या बागेत फिरून सहा वाजेपर्यंत येतोच तो.चहा घेत घेत अर्धा तास Zee Business बघतो. नंतर रात्रीच्या जेवणाची वेळ होईपर्यंत आबांच्या खोलीत पुस्तक वाचून दाखवयाला जातो. मी टेबलवर चहा बिस्किटं ठेवली आणी बागेला पाणी घालायला गेले. थोड्या वेळाने देवापाशी दिवा लावण्यापूर्वी रिकामा कप सिंक मध्ये ठेवला. तेव्हढ्यात . .

“सुधा –s s  सुधा चहा  . . .s s s ”

काय हे? केव्हढा ओरडतोय हा! आणी चहा ? परत ?

“वाजलेत किती बघ.आणी आज स्वारीला पुन्हा तल्लफ आलीय? आत्ताच तर घेतलास.”

“कुठे? तू दिलाच नाहीस? काय हो आबा? घेतला का मी चहा?” अरे, आत्ताच तर रिकामा कप धुतला मी. मग हा चहा प्यायला काय भूत आलं होतं कि काय!”

“विसरतेस तू अलिकडे. दिलाच नाहीस तू चहा मला.”

मी थोड्या घुश्शातचं पुन्हा चहा ठेवला.

रात्री नेहमीप्रमाणे झाकापाक केली. उरलेली पोळी भाजी use and throw च्या डब्यात ठेवली. किचनचे लाईटस् ऑफ केले. दारखिडक्या बंद आहेत ना बघून बेडरुमकडं वळले. WhatsApp चे messages चेक केले.

‘आजही वेदचा मेसेज नाही. आता कानच ओढले पाहिजेत याचे’ असं मनात म्हणत मी चादर अंगावर ओढली… काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी चरफडतच ऊठले. किचनची खिडकी ऊघडी राहिली असावी. छे: छे: स्वत: लाच टपली मारून मी किचन मध्ये आले. आणी… आणी… बघते तर काय …. ?

कोपर्‍यावरच्या घरातल्या बकूमावशी मनलावून पोळी भाजी खात बसल्या होत्या.किचनची खिडकीवार्‍याने ‘थाड  थाड’

वाजत होती .अगबा s s ई s s s. माझ्या

अंगावर सर्रकन काटा आला. या… या… इथे?

..   क्क .. क्क्. ..  क… शा?

 क्रमश:

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  deepapujari@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाटक…एक अपूर्व योगायोग..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ नाटक…एक अपूर्व योगायोग..! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

अगदी न कळत्या वयापासून एक प्रेक्षक म्हणून माझ्या जडणघडणीला सुरुवात झाली त्याला निमित्त ठरलं ते किर्लोस्करवाडीत व्यतित झालेलं माझं बालपण.किर्लोस्करवाडी ही टुमदार काॅलनी.तिथल्या सांस्कृतिक आणि संस्कारक्षम वातावरणातील मोकळे श्वास हेच आमचं (त्या काळातही बाहेरच्या जगात अप्राप्य असणारं) वैभव होतं.माझ्या मनात रुजलेली नाटकाची आवड ही त्या वैभवाचीच देन..!

त्या टुमदार काॅलनीत सुरक्षाव्यवस्थेचा भाग म्हणून बाहेरच्या कुणाचाच परवानगीशिवाय वावर नसे.घरी येणाऱ्या पाहुण्यांनासुध्दा संपूर्ण चौकशी होऊन व रजिस्टरमधे सविस्तर नोंदी करुन घेऊन मगच प्रवेश दिला जात असे.अशा वातावरणामुळे स्थानिकांच्या करमणुकीचं कोणतंच साधन तिथं उपलब्ध नव्हतं.सिनेमा पहायलाही शेजारच्या रामानंदनगरच्या तंबूमधे(टूरिंग टाॅकीज)जावं लागे.तेव्हा रेडिओही घरोघरी नसायचे.

यामुळेच काॅलनीतील नागरीकांची सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन किर्लोस्कर व्यवस्थापनातर्फे पुण्यामुंबईतील व्यावसायिक नाटक कंपन्यांची नाटके निमंत्रित करुन त्याचे खास प्रयोग आम्हाला विनामूल्य दाखवले जायचे.त्या विद्यार्थी दशेत  तिथे पाहिलेली बाळ कोल्हटकरांची ‘वेगळं व्हायचंय मला’,’दुरितांचे तिमिर जावो’,बाबुराव गोखल्यांची ‘करायला गेलो एक’, ‘व-हाडी मानसं’ अशी कितीतरी नाटकं आजही मी विसरलेलो नाहीय.

शेजारच्या कुंडल या गावी त्याकाळी खूप प्रसिध्द असलेली ‘आनंद संगीत मंडळी’ नावाची एक नाटककंपनी होती.खरंतर नाटककंपनी ही संकल्पना नुकतीच लयाला गेलेल्या त्या काळात ही ‘आनंद संगीत मंडळी’ मात्र अद्याप आपला आब राखून कार्यरत होती.किर्लोस्करांतर्फे दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या या कंपनीचा तिथे सलग आठ दिवस मुक्काम असे आणि तो मुक्काम म्हणजे आमच्यासाठी गाजलेल्या संगीत नाटकांची पर्वणी..!माझी पुण्यप्रभाव, मंदारमाला,एकच प्याला सारख्या

सगळ्या गाजलेल्या संगीत नाटकांशी ओळख त्यामुळेच होऊ शकली.

बाबूराव गोखल्यांच्या ‘श्री स्टार्स’या संस्थेचं एक ठळक वैशिष्ठ म्हणजे त्यांच्या जाहिरातीतून जाहीर केली जाणारी नाटक सुरु होण्याची वेळ.प्रयोगाची वेळ रात्री ८वाजून २८ मिनिटे,किंवा ८वाजून १७ मिनिटे अशी एखाद्या शुभकार्याचा मुहूर्त असावा तशी जाहीर केली जायची.आणि तिसरी घंटा रात्री बरोब्बर आठ वाजल्यानंतरच्या नेमक्या त्या मिनिटाला होत असतानाच पडदा उघडला जायचा.नाटकाची अनाउन्समेंट होतानाही पहिला,दुसरा,तिसरा अंक संपण्याच्या आणि पुढचा अंक सुरु होण्याच्या अशाच ‘नेमक्या’ वेळा उदघोषित करून पाळल्याही जायच्या.त्यांची नाटकेही तशीच दर्जेदारही असायची.पण वेळेच्या बाबतीतली त्यांची ती शिस्त मात्र एकमेवाद्वितीयच.वेळेचं हे नियोजन खरंच थक्क करणारं.आज आठवलं तरी हे सगळं अविश्वसनीय आणि म्हणून स्वप्नवतच वाटत रहातं.

याखेरीज तिथल्या सोशलक्लबतर्फे काॅलनीतील हौशी कलाकारानी स्वत: बसवून सादर केलेली असंख्य नाटकेही आनंद देऊन गेलेली आहेत.एका वर्षी स्थानिक हौशी कलाकारांनी बसवलेल्या पु.लंच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकात पुढे कवी आणि गीतकार म्हणून रसिकप्रिय झालेल्या , तेव्हा नवतरूण असलेल्या सुधीर मोघे यानी केलेल्या कवी संजीव या भूमिकेची आठवणही मी विसरलेलो नाहीय.(श्रीकांत आणि सुधीर मोघे हे बंधूद्वय त्याकाळचे वाडीकरच.)

माझ्या न कळत्या वयापासून दर्जेदार नाटके सातत्याने पहायचा योग किर्लोस्करवाडीतील आमच्या वास्तव्यामुळे आला हे खरेच,पण पुढेही नोकरीनिमित्ताने मी प्रथम मुंबईत गेलो तो १९७१-७२चा काळ हा प्रायोगिक रंगभूमीचा पायाभरणीचा काळ तर होताच शिवाय आधुनिक व्यावसायिक रंगभूमीचा भरभराटीचा काळही होता.त्यात योगायोगाने माझे वास्तव्य शिवाजी मंदिरला चालत जाता येईल अशा दादरच्या नूर बिल्डिंग

मधे.त्यावेळच्या पगाराचा विचार केला तर तेव्हाचे नाटकांचे ४-५ रुपयांचे दरही न परवडणारेच वाटायचे.पण बालपणीच मनात पेरली गेलेली नाटकाची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हतीच.मग जमेल तिथे टोकाची काटकसर करत पैसे साठवून शिवाजी मंदिरला जाऊन नाटकं पहायची चैन करावी लागायची.त्यावेळी मी पाहिलेल्या नटसम्राट, संध्याछाया, जास्वंदी,अशा पुढे मैलाचा दगड ठरलेल्या असंख्य नाटकांनी माझ्यातला प्रेक्षक घडवतानाच माझ्याही नकळत माझ्या अभिरूचीला योग्य वळणही लावलं.पुढच्या काळात मी पाहिलेल्या विषवृक्षाची छाया, पुरुष,बॅरिस्टर,गारंबीचा बापू, हयवदन,ऋणानुबंध,सख्खे शेजारी,नातीगोती,हमीदाबाईची कोठी,महासागर यासारख्या असंख्य नाटकांच्या विषयवैविध्य आणि सकस मांडणीने मला कधीच विसरता न येणारा नाट्यानुभव दिलेला आहे.प्रेक्षकम्हणून मला घडवण्यात या सगळ्याच नाटकांचा महत्वाचा वाटा आहे.

या वेळेपर्यंत एक आवड म्हणून कथालेखनाचा व्यासंग जपलेल्या आणि त्यात बऱ्यापैकी स्थिर झालेल्या मला नाट्यलेखन हे एक वेगळंच तंत्र आहे आणि ते आपल्याला जमणार नाही असंच वाटायचं आणि मग मी दुधाची तहान ताकावर भागवावी तसा डोळसपणे नाटके पहात रहायचो.मी नाट्यलेखनाकडे वळलो तेही पुढे खूप वर्षांनंतर.तोही अतिशय अनपेक्षित योगायोगच होता.त्या संपूर्ण प्रवासाबद्दलही सांगण्यासारखं बरंच कांही आहे पण ते पुन्हा कधीतरी…!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 7 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 7 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

 

पहाटेच्या वेळी एकदा एक कळी हळूच आली

आपले मनोगत हळुवार सांगून गेली.

रात्र कधीची संपली,पहाट झाली.

ही कळी म्हणजे माझ्या मनात नृत्य शिकण्या विषयी विचारांनी घेतलेला जन्म. या कळीला हळूवार फुंकर घातली धनश्री ताई रुपी वाऱ्या ने हळूवार फुंकर घालत असताना त्या कळीच्या आणि वाऱ्याच्या झालेल्या एकत्र प्रवासाविषयी थोडेसे.

खरेतर सुरुवातीला भरतनाट्यम हा नृत्यप्रकार शिकणे केवळ आणि केवळ डोळ्यांनी पाहून शिकणे हीच कला आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठा अडसर ताईंच्या आणि माझ्या वाटेत उभा होता.

पण ताईंनी माझं मन नावाचं organजा गं करायला सुरुवात केली. आणि आमच्या दोघांच्याही असं लक्षात आलं की शरीर हे केवळ माध्यम आहे, साधन आहे आणि शरीरा पलीकडे म्हणजे अतिंद्रीय शक्तीच्या आधाराने आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. ताईनी मग स्पर्श, बुद्धीआणि मनातील अंतरिक प्रेमभाव यांच्या माध्यमातून नृत्य शिकवायला सुरुवात केली. अशाप्रकारे नृत्यातील अडवू, हस्त मुद्रा शिकत असताना कधी आमचे सूर जुळून गेले हे कळलेच नाही.

नृत्यामध्ये बरीच अवघड वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असतात. जसे की डावा हात डोक्यावर असताना उजवा पाय लांब करणे, उजवा हात कडेला असताना डाव्या पायाचे मंडल करणे, भ्रमरी घेताना उजवा हात डोक्यावर ठेवूनडावा हात फिरवत उजवीकडून वळणे आणि त्याच वेळी गाण्या नुरूप चेहऱ्यावरचे हावभाव दाखवणे. अशा खूप अवघड अवघड गोष्टी ताईंनी अगदी कौशल्यपूर्ण रीतीने शिकविल्या. खरंतर दृष्टिहीन व्यक्ती ला समोर असलेले पाण्याचे भांडे घे हे सांगताना दुसऱ्याची खूप तारांबळ होते. पण इथे तर अच्छे मृत्य शिकवायचे होते.

नृत्याचे शिक्षण प्रशिक्षण जसजसे पुढे जात होते तसच या नवीन अडचणी समोर येत होत्या.  ८-९ वर्षे शिकल्यानंतर अभिनयाचा भाग आल्यानंतर प्रश्न निर्माण झाला तो अभिनय  शिकविण्या विषयी. पण पण तिथेही ताईंनी आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून घेतला आणि लहान मुलांना गोष्टी सांगून जसे मनात भाव निर्माण केले जातात त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला.

माझ्या अनेक अडचणी मध्ये मला येणारी अडचण म्हणजे आवाजाची .नृत्यात गिरकी घेतल्यानंतर माझे तोंड प्रेक्षकांच्या कडे आहे की बाजूला हे मला कळत नसे. पण या अडचणीवरही ही ताईंनी मात केली आणि आवाजाची दिशा ही नेहमी माझ्यासमोरच ठेवली की ज्याच्या आधाराने माझे दोन फिरून समोरच येत असे.

ताईंचे अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन, त्यांनी घेतलेले कष्ट, माझी मेहनत, रियाज आणि साधना याचा परिपाक असा झाला की मी नृत्यामध्ये गांधर्व महाविद्यालयाची  नृत्य विशारद ही पदवी, कला वर्धिनी चा ५ वर्षा चा कोर्स, टिळक महाराष्ट्र विद्यापीठा ची नृत्यातली एम. ए. ही पदवी,यशस्वी रित्या संपादन केली.ज्यामुळे आज मी अनेक ठिकाणी,माझ्या एकटीचा स्टेज प्रोग्राम करू शकत आहे.

या माझ्या यशाचे कौतुक अनेक वर्तमान पत्रांनी आणि दूरदर्शन वरील अनेक वाहिन्यांनी, प्रसार माध्यमांनी भरभरून केले.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर ! ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

आज त्रिपुरी पोर्णिमा! दसरा दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते. त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो ! तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो.लहानपणी त्रिपुर पहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू!

वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून  गेलेली दिसत असे. गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दिप माळा मी खूप पाहिल्या.

पण… माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला! सासुबाई  सांगत, ‘समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला! त्याकाळी जन्मवेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! आणि लग्नानंतर तारखे पेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला ह्यांचा वाढदिवस साजरा केला जाई!

सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात प्रकाश भावजींचा पुढाकार असे. मग मुले आणि आम्ही सर्वजण पणत्या , मेणबत्या घेऊन त्रिपुर लावण्यात मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या स्निग्ध प्रकाशाने उजळून गेलेले पहाण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे. शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या  तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे नीरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खुपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!

प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस शालीत गुरफटून  घेत डिसेंबर ,जानेवारी येतात, पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.

ह्यांच्या आयुष्याचे 70 त्रिपूर पूर्ण झाले! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो,असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे यांना आयुष्यभर मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरद: शतम्!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 74 ☆ चेत जाओ ! ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।

श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली  कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 74 – चेत जाओ ! 

रेल में भीड़-भड़क्का है। हर कोई अपने में मशगूल। एक तीखा, अनवरत स्वर ध्यान बेधता है। देखता हूँ कि साठ से ऊपर की एक स्त्री है संभवतः जिसके स्वरयंत्र में कोई दोष है। बच्चा मचलकर किसी वस्तु के लिए हठ करता है, एक साँस में रोता है, कुछ उसी तरह के स्वर में भुनभुना रही है वह। अंतर बस इतना कि बच्चे के स्वर को बहुत देर तक बरदाश्त किया जा सकता है जबकि यह स्वर बिना थके इतना लगातार है कि खीज़ पैदा हो जाए। दूर से लगा कि यह भीख मांगने का एक और तरीका भर है। वह निरंतर आँख की ज़द से दूर जा रही थी और साथ ही कान भुनभुनाहट से राहत महसूस कर रहे थे।

किसी स्टेशन पर रेल रुकी। प्लेटफॉर्म की विरुद्ध दिशा से वही भुनभुनाहट सुनाई दी। वह स्त्री पटरियों पर उतरकर दूसरी तरफ के प्लेटफॉर्म पर चढ़ी। हाथ से इशारा करती, उसी तरह भुनभुनाती, बेंच पर बैठे एक यात्री से अकस्मात उसका बैग छीनने लगी। उस स्टेशन से रोज़ यात्रा करनेवाले एक यात्री ने हाथ के इशारे से महिला को आगे जाने के लिए कहा। बुढ़िया आगे बढ़ गई।

माज़रा समझ में आ गया। बुढ़िया का दिमाग चल गया है। पराया सामान, अपना समझती है, उसके लिए विलाप करती है।

चित्र दुखद था। कुछ ही समय में चित्र एन्लार्ज होने लगा। व्यष्टि का स्थान समष्टि ने ले लिया। क्या मर्त्यलोक में मनुष्य परायी वस्तुओं के प्रति इसी मोह से ग्रसित नहीं है? इन वस्तुओं को पाने के लिए भुनभुनाना, न पा सकने पर विलाप करना, बौराना और अंततः पूरी तरह दिमाग चल जाना।

अचेत अवस्था से बाहर आओ। समय रहते चेत जाओ अन्यथा समष्टि का चित्र रिड्युस होकर व्यष्टि पर रुकेगा। इस बार हममें से कोई उस बुढ़िया की जगह होगा।

© संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

writersanjay@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फिरूनी नवी जन्मेन मी ☆ सौ. अंजली गोखले

☆ विविधा ☆  फिरूनी नवी जन्मेन मी ☆ सौ. अंजली गोखले ☆

सकाळपासून गल्लीमध्ये काहीतरी विचित्र हालचाल जाणवत होती. त्या वृक्षाच्या आसपास ज्यांच्या गाड्या होत्या त्या हलवण्यासाठी सगळ्यांना फोन केले गेले. कुऱ्हाडी, मोठाले दोर घेऊन माणसे झाडाभोवती गोळा झाली होती.. सगळेजण  वर बघून बघून निरीक्षण करत होते.  अन ते दृश्य बघून माझ्या मनात चर्र झाले.संशयाची पाल मनात चुकचुकली. आम्हा  मैत्रिणींना जे होऊ नये असे वाटत होते तेच घडणार होते.

काही वर्षापूर्वी मुद्दाम कोणीही वृक्षारोपण न करता समोरच्या बिल्डींगच्या बाहेर एक इवलेसे झाड वाढायला लागले होते. ना कोणी त्याला पाणी घालत होते, ना कोणी त्याची निगा राखत होते.बघता बघता त्याचे खोड गलेलठ्ठ झाले,वेगाने त्याच्या फांद्या इतस्ततः फैलावत गेल्या. छोट्या-छोट्या हिरव्यागार पानांनी डोळ्यांना गारवा दिला.ते झाड अलगदपणे सावली द्यायला लागलं. रखरखीत उन्हामध्ये जाणा येणाऱ्या ला दोन मिनिटांचा का होईना. पण शांतपणा जाणवायला लागला.

झाडाच्या टोकाला झिप्री गुलाबी नाजूक नाजूक फुले डोलायला लागली. आमच्या मनाला ते झाड आनंद,विसावा,गारवा द्यायला लागलं. पण त्याच वेळी याच वाढलेल्या फांद्या मुळे बिल्डिंग मध्ये अंधार पडायला लागला. झाडाच्या पानांची पानगळ होऊन घरामध्ये उडून येऊन कचरा व्हायला लागला. झाडणार्‍या म्युनिसिपालिटीच्या कामगारांनाही त्या वाळक्या पानांचा कचरा त्रासदायक व्हायला लागला. रोज त्या झाडाला शिव्या घालत घालत, झाडून वाळलेली पाने त्याच झाडाच्या बुंध्यापाशी जाळायला सुरूवात झाली. बिचारे झाड ते चटके सहन करत होते. आपला देण्याचा स्वभाव ते सोडत नव्हते  की चटके देणाऱ्याला शिव्याशाप मुळीच देत नव्हते.

एकदा अशीच एक माकडांची टोळी आली. त्या झाडावर उड्या मारुन मारुन धुमाकूळ घालायला सुरुवात केली. बिल्डिंगच्या गॅलरीमध्ये त्यांनी हैदोस घातला आणि झाडाबद्दल चा लोकांचा दुस्वास वाढायला लागला. सगळ्यांना ते नकोसे झाले. त्या झाडाच्या सावली पेक्षा,त्या शीतल गारव्या पेक्षा लोकांच्या डोळ्यांमध्ये तिरस्काराचे अंगारे फुलत गेले.

अखेर बहुमताचा विजय झाला आणि त्या आमच्या लाडक्या,डेरेदार हिरव्यागार वृक्षावर सपासप कुऱ्हाड चालवायला सुरुवात झाली.बघता बघता झाडाच्या फांद्या रस्त्यावर कोसळत होत्या.वेदनांचे घाव झेलत तो वृक्ष निर्दयी माणसापुढे शरण येऊन आपली होणारी कत्तल मुकाट्याने सहन करत होता. ज्या इवल्याशा रूपाचे डेरेदार वृक्षा मध्ये रूपांतर व्हायलाअनेक वर्षे लागली,तोच डेरेदार वृक्ष बिना फांद्यांचा बोका बोका दिसायला लागला काही तासांमध्ये!

हाच तो वृक्ष होता जो हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेत होता आणि आम्हाला हवा असलेला ऑक्सिजन फुकट देत होता. जो आपल्या हिरव्या पानांच्या मदतीने आपले अन्न आपणच बनवत होता. त्यांनी आमच्याकडे कधीही भीक मागितली नव्हती, “द्या हो आम्हाला खायला. द्या हो आम्हाला पाणी प्यायला”. आपल्या मुळां वाटे आपल्यालालागणारे पाणी आपल्या पण तो मिळवत होता. उंच उंच गेलेल्या फांद्यांच्या शेवटच्या पानापर्यंत ते पाणी पोहोचवत होता.

त्याच उंचीपर्यंत पाणी घेण्यासाठी आम्हाला इलेक्ट्रिक मोटर लागते. त्यासाठीचे बिल आम्ही भरतो. एक पैसाही खर्च न करता आपली गरज तो आपणच पूर्ण करत होता. आम्हाला सावली देत होता पण आम्हाला त्याचे हे फायदे, तो उपयोग कधीच दिसला नाही.

एक मताने झाडावर कुऱ्हाड मारून मारून संध्याकाळपर्यंत त्या महान वृक्षाचे होत्याचे नव्हते झाले. रस्त्यावर मोठमोठाल्या लाकडांचा खच पडला होता. निष्प्राण पाने जमिनीवर झोपली होती. पानांचे, फांद्यांचे, खोडाचे श्वास घेणे पूर्णपणे थांबले होते. आता फक्त निर्जीव लाकडे झाली होती.संध्याकाळ पर्यंत टेम्पो मधून लाकडाचे ओंडके भरून भरून नेले गेले. निर्जीव हिरवी पाने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांनी आणखीनच मारून टाकली.

अंधार पडला, रात्र झाली. झाडाच्या त्या रिकाम्या रिकाम्या जागेला मी मनोमन श्रद्धांजली वाहिली. “किती जरी तुझा त्रास झाला तरी तू आम्हाला सावली दिली होतीस रे! आमच्या डोळ्यांना तुझ्या हिरवाईने गारवा दिला होतास.”

रात्री लवकर झोप लागेना. तो प्रचंड वृक्ष डोळ्यासमोरून हलत नव्हता. तेवढ्यात माझ्या कानाशी कोणी कुजबुजले, “अगं वेडे,.. नको मनाला लावून घेऊ. आमचे संपूर्ण आयुष्यच तुमच्याच साठी आहे. आम्ही हवा शुद्ध करतो, तुम्हाला फुले फळे देतो, सावली देतो. थोडं स्पष्ट बोलतो वाईट वाटून घेऊ नको, टेम्पो मधून जी सगळे लाकडे भरून ने ली गेली ना, ती सुद्धा तुमच्या शेवटी तुम्हालाच उपयोगी पडणार आहेत. तुला एक सांगतो तुझ्या घरी एक फुलझाड लाव ना ! येईनच मी तुला भेटायला फुलांच्या रूपात.

इवलेसे रोप माझ्या स्वप्नांमध्ये रुजले आणि वाढायला लागले.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ६) – भैरव ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ६) – भैरव ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

रागांविषयी एक पौराणिक कथा अशी आहे कि, भगवान शंकरांनी पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण आणि (आकाश)ऊर्ध्वदिशा अशा पाच दिशांकडे मुख केले असताना त्यांच्या मुखातून अनुक्रमे भैरव, हिंडोल, मेघ, दीपक व श्री ह्या पाच रागांची उत्पत्ती झाली आणि ‘कौशिक’ ह्या सहाव्या रागाची उत्पत्ती देवी पार्वतीच्या मुखातून झाली. ह्यापैकी ‘भैरव’ ह्या रागाविषयी आज थोडेसे जाणून घेऊया.

मागच्या भागात दहा थाटांविषयी जाणून घेताना ‘भैरव’ हा एक थाटही असल्याचे आपण पाहिले. ज्यावेळी एखाद्या थाटाचे नावच रागाला दिले जाते तेव्हां त्या रागास जनकराग किंवा आश्रयराग असे म्हणतात आणि त्याच थाटातून निर्माण होणाऱ्या इतर नाव असलेल्या रागांना त्या थाटाचे जन्यराग असे म्हणतात. त्यामुळे भैरव हा भैरव थाटाचा जनकराग म्हणता येईल.

भैरव रागाचे आरोह-अवरोह अनुक्रमे, सा (रे) ग म प (ध) नि सां आणि सां नि (ध) प म ग (रे) सा. अर्थात, थाटातल्याच स्वरांनुसार रे आणि ध कोमल व बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत. रागाचा वादी स्वर ध आणि संवादी स्वर रे असून हा प्रात:कालीन ‘संधिप्रकाश’ राग आहे. ह्या रागाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अवरोहात ग वरून रे वार येताना मधे म ह्या सुराला स्पर्श करून यावं लागतं. म्हणूनच भैरवच्या इतर प्रकारांमधेही हा नियम पाळलेला दिसून येतो. दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ह्या रागातील रे आणि ध हे दोन सूर आंदोलित आहेत, त्यामुळेच ह्या रागाची गंभीर प्रकृती अधोरेखित होते असं मला वाटतं.

मुळात आंदोलन म्हणजे काय? पूर्वीच्या काळचं जितके वाजले तितके ठोके देणारं लंबकाचं घड्याळ सर्वांनाच माहिती असेल. त्यातल्याह दोन ठोक्यांच्या मधे तो लंबक एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत फिरायचा. ती दोन टोकं म्हणजे दोन सूर असं आपण समजूया. तर, जो सूर आंदोलित असेल त्याच्या मागच्या/पुढच्या (रागानुसार मागच्या कि पुढच्या सुराला स्पर्श होतो हे बदलते) स्वराला स्पर्श करून पुन्हा त्या सुरावर यायचं, अशा प्रकारे तो सूर गायला जातो. भैरवात ‘रे’ गाताना ‘ग’ ला स्पर्श करून आणि ‘ध’ गाताना ‘नि’ ला स्पर्श करून तो पुन्हापुन्हा गायला जातो. भैरवच्या चलनानुसार वरती जाताना बहुतेक वेळा गमधनिसां असं ‘प’ ला उल्लंघून गायलं जातं.

‘भैरव’ म्हणून त्या रागाची बारीक-सारीक वैशिष्ट्ये सूक्ष्मपणे मांडायची झाली तर अजूनही बरंच काही लिहिता येईल. परंतू, फक्त श्रवणानंद घेणाऱ्या श्रोत्यांना एकदम खूप बारकावे लिहून गोंधळात टाकायला नको म्हणून तितक्या खोलात शिरणे मी मुद्दाम टाळतेय.

कर्नाटकी संगीतात तर मूळ सप्तक हे आपल्या भैरव रागाचे स्वर आहेत. त्यामुळेच कि काय, त्यांच्या पद्धतीत विद्यार्थ्यांना ह्याच रागापासून शास्त्रीय संगीत शिकवायला सुरु करतात. कर्नाटकी संगीतपद्धतीत ह्या रागाचं नाव ‘मायामालवगौळा’ असं आहे. शास्त्रीय संगीतकारांचा हा आवडता राग असला तरी थोडा गंभीर प्रकृतीचा असल्याने सुगम संगीतात ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर आढळून येत नाही.

संसार चित्रपटातील ‘अम्मा रोटी दे’ हे गीत ऐकताना अंगावर काटा येतो इतका भैरवचा प्रभावी वापर तिथं झाला आहे. ‘जागो मोहन प्यारे’ हे गीत भैरव रागाची आठवण करून देते असं मी म्हणेन कारण इतर काही स्वरांचा वापर काही ठिकाणी रचनेत झाला आहे. संगीत स्वयंवर मधील ‘गवळण होऊनिया फिरता’ आणि ‘धाडिला राम राम तिने का वनी?’ह्या नाटकातील ‘मंद मंद ये समीर’ ह्या रचनांचीही ‘भैरव’निमित्ताने आठवण होते… नुसती आठवण म्हटलं कारण रचनेत सगळंच अगदी भैरवबरहुकूम नाही!

अगदी हेच आरोह-अवरोह असणारा परंतू वादी ‘प’ आणि संवादी स्वर ‘सा’ असणारा आणि अर्थातच इतर रागस्वरूप, रागचलन भैरवहून भिन्न असणारा राग म्हणजे ‘कालिंगडा’! ह्या रागात रे आणि ध ला आंदोलन घ्यायचं नाही, असं हा राग शिकवायला सुरू करण्यापूर्वीच गुरुजन सांगतात आणि इतरही बारकाव्यांसहित कसं गायचं व कसं गायचं नाही, हे गाऊनही दाखवतात. पुस्तकात दोन्ही रागांचे आरोह-अवरोह सारखेच दिसतील मात्र गुरुजन त्यात जाणीवपूर्वक राखायचा फरक सांगत त्या-त्या रागाची तालीम देतात. अशी ‘गुरुमुखी विद्या’ मिळाली तरच आपण रागाची शुद्धता राखू शकतो.

कालिंगडा रागावर आधारित मात्र बऱ्याच रचना आढळून येतात. संगीत स्वयंवर नाटकातील ‘मम मनी कृष्णसखा रमला’ हे सुंदर पद ह्याच रागातले! ‘जाळीमंदी पिकली करवंदं’, ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘बुगडी माझी सांडली गं’ अशा प्रसिद्ध लावण्यांमधे ह्या रागाचा वापार दिसून येतो. गंभीर भैरवहून अगदी भिन्न अशी ह्या रागाची चंचल प्रकृती अशा रचनांसाठी पोषक ठरली असावी. बैजू बावरा मधील ‘मोहे भूल गए सावरिया’ ही रचनाही ह्या रागावर आधारित म्हणता येईल. त्याच स्वरांच्या विशिष्ट वापरानुसार बदलत जाणारी दोन्ही रागांची प्रकृती ह्या रचनांच्या आधारेही थोडीफार उमजू शकेल.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आधुनिक शाळेतील एक दिवस ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ आधुनिक शाळेतील एक दिवस ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(सर्व पात्रे आणि लेख काल्पनिक)

चांगली हायस्कुलच्या  ७ वी तील एक वर्ग. शनिवारचा  सकाळचा दिवस. शनिवारची अर्धीच शाळा असल्याने सगळे तसे आनंदातच होते.  हनुमान पूजेचा सेक्रेटरी  लवकरच आला होता. द्रोणागिरी पर्वत उचलून घेऊन जात असलेला हनुमानाचा फोटो  त्याने पेन ड्राईव्ह वरून मेन सर्व्हर  वर उतरवूनन घेतला होता. जे वर्गात येत होते त्यांच्या कडून  डेबिट / क्रेडिट कार्ड घेऊन  तो वर्गणीच्या मागे लागला होता. हळूहळू एक एक जण वर्गात येत होते  आणि आल्या आल्या आपला लॅपटॉप चालू करत होते. संगणक चालू होता क्षणी लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकला की आपोआप हजेरी लागायची.

बंड्या आल्यापासून लॉगीन करण्याचा प्रयत्न करत होता पण  ते होत नव्हते. २-३ दा  तसे झाल्यावर त्याच्या लक्षात आले या महिन्याची फी भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्याने फी भरली नव्हती. शेवटी स्पेशल परमीशन घेण्यासाठी तो तडक मुख्याध्यापकांकडे पळाला.

जग्गू वर्गात आला तेच जरा रागावत. त्यात ‘स्वाइप से  (मशीन) करेंगे सबका स्वागत’ असे म्हणत जेंव्हा मारुती पूजेचा सेक्रेटरी त्याच्या जवळ पोचला  तेव्हा  तो म्हणाला  नाही देत वर्गणी जा.  काल गुरुजींनी रात्री उशीरा व्हाटसप ग्रुप वर घरचा अभ्यास  म्हणून निबंध लिहायला सांगितला होता  ‘व्यसन शाप की वरदान’. जग्गूने या सेक्रेटरीला  मेसेज टाकून  हिंट/मुद्दे  देण्यास सुचवले होते पण त्याचा रिप्ल्याय न आल्याने तो रागावलेला होता.

इकडे चंपा आज लँपटाॅप चा चार्जर आणायला विसरली होती. तिने राणीकडे मागताच तिने नकार दिला. म्हणाली तू माझ्या मेसेजना ग्रुपवर एकदा तरी लाईक देतेस का? मग मी का म्हणून देऊ CHARGR? प्रश्न रास्त होता.

या सगळ्या गडबडीत  वर्ग शिक्षक आले. रिमोट कंट्रोल ने त्यांनी डिजिटल फळा खाली घेतला आणि त्यांचा संगणक चालू करून प्रोजेक्टर  वरून  डिजिटल फळ्याशी लींक केला.  सर्वाना ३०/१२ तारखेवर क्लिक करायला सांगितले.  तत्क्षणी मारुती राया आले. त्यांची डिजिटल पूजा झाली, भीमरूपी स्तोत्र mp3  वर वाजू लागले, आरती झाली  आणि नंतर प्रसाद म्हणून ( प्रत्यक्ष ) खोबरे दिले गेले. त्यानंतर प्रत्येकाच्या संगणकावर आजचे वेळापत्रक पॉप -अप झाले.

पहिलाच तास गणिताचा निघाला. आज सर शिकवणार होते चक्रवाढ जीएसटी आणी रोजचे बदल हे कोष्टक. फळ्यावर दिसणारे आकडे आले तसे गेले. यात मोजक्या हुशार मुलां शिवाय कुणाला काहीही कळले नाही

दुसरा तास होता संस्कृत.  आफळे सर वर्गात आले  आणि त्यांनी भगवद्गीतेतील एक श्लोक  शिकवायला घेतला.  त्यातले ‘सोमरस’ चे वर्णन वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या.. आफळे सरांनी ही मग  मुलांच्या मनातील सर्व प्रश्णांचे वेगवेगळी उदाहरणे सांगून  शंकानिरसन केले.हा तास संपूच नये असं पहिल्यांदाच सगळ्यांना वाटत होते. पण तेवढ्यात संगणकावर  नागरिकशास्त्र  तास पॉप-अप झाला. पण आज कुलकर्णी सर न आल्याने अचानक ‘अमरधाम’ खेळ म्हणून बदल आला.

इंडियन पिनल कोड पासून सुटका झाली म्हणून  मुल आनंदली आणि अगदी  फ़टाफ़ट  त्यांनी डेस्टोप वरचे  ‘अमरधाम अँप’ चालू केले. आज दोन ग्रुप करून पोकेमॉन  खेळायचे यावर वर्गातील तमाम  मुला – मुलींचे  एकमत झाले आणि हा तास कसा संपला ते कळलेच नाही

नशीब महिना अखेर आणि त्यात शनिवार म्हणून  तुम्हाला एवढेच वाचायला मिळालं, पूर्ण  दिवसाचा वर्ग भरला असता तर?  माझं/तुमचं काय खरं नव्हतं

पण  हे वाचतांना एकदा तरी मनाने शाळेत  जाऊन आलात ना?

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नशा ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ नशा ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

नशा म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो एकच प्याला. हे एक अस व्यसन आहे जे बरेचदा जस्ट फॉर फन चालू होते. कधी मित्रांसोबत कधी पार्टी मधे, तर कधी आपण किती निगरघट्ट आहोत हे दाखवण्यासाठी, तर कधी आपले दुःख लपवण्याचे उत्तम साधन म्हणून. मधे एक एड आली होती A cigarette in my hand and I felt like a man. अरे म्हणजे तुम्ही सिगरेट ओढली नाहीत तर तुम्ही पुरुष नाहीत का?का फक्त सिगरेट ओढणारेच पुरुष असतात ? हा आता अर्थात नशा फक्त पुरूषच करतात अस नाही बरका. महिला तर आघाडीवर आहेत इथे ही अगदी कंधेसे कंधा मीलाकर. ही एक नशा झाली जी आपल्याला स्पष्ट दिसते. कारण ह्यात माणूस आपले संतुलन बिघडून बसतो. त्याच्या मेंदू वरचा ताबा उडतो, आणि त्याला आपण काय करतो आहे चूक बरोबर काही कळत नाही. पण अश्या अनेक नशा असतात ज्यांच्या आहारी बरेच जण गेलेले असतात आणि ती गोष्ट केल्या शिवाय त्यांना चैनच पडत नाही.

मला चहाची तल्लफ आली आहे अस तुम्ही बरेचदा बरेच जणांकडून ऐकले असेल. ती काय एक नशाच की. चहाची नशा. माझी आजी ना दर एक दोन तासांनी घोट भर चहा प्यायची, घोटभरच बरका, कधीही कप भर नाही. तिला विचारले असे का पीतेस, तर म्हणायची तल्लफ येते मग तेवढा पुरतो .काहीजणांना खाण्याची नशा असते. आणी खाणे तरी काय तर पिझ्झा, बर्गर, वेफर्स ,. आठवड्यातुन दोन तीनदा तरी ते लागतेच त्यांना. नाही मिळाले तर अगदी मिस करतात ते, म्हणजे नक्की काय मिस करतात हे अजून कळले नाही मला.

आत्ताच्या मुलांना एक भयंकर व्यसन लागले आहे, ते म्हणजे मोबाईल गेम्स खेळायचे. ते खेळता खेळताच त्यांच जेवण होत. आणि जर नाही मिळाला फोन हातात तर चक्क बेचैन होतात ती मुले मग हट्ट, रडारड, बेचैनी. पण मला सांगा त्यांना हे व्यसन लावायला कारणीभूत कोण? त्यांचे पालकच ना, सुरुवातीला मुलं एका जागेवर बसुन जेवावीत म्हणून आईच हातात हे खेळणे देते, का, तिला त्यांच्या मागे मागे फिरायचे नसते म्हणून, आमच्या लहानपणी आया गोष्टी सांगत भरावयच्या. रामायण, महाभारत भीमाची, कृष्णाची म्हणजे मुल एका जागी पण बसतं आणि गोष्टी रुपात त्यांना माहिती रुपी ज्ञान पण मिळत.

काही लोकांना कामाचे व्यसन असते, पैसे मिळविण्याचे व्यसन. पैश्यांशिवाय दुसर काही सुचतच नाही त्यांना, फक्त पैसा मिळवणे आणि त्यासाठी खूप काम करणे हेचव्यसन.वरकोहाॉलीक असतात ही माणसं. एखादा दिवस काम केल नाही तर बेचैन होतात.

अस्वस्थत होतात ही लोकं जणू सारे जग ह्यांच्या कामामुळेच चालू आहे अस वाटत असते ह्यांना.

थोडक्यात काय नशा ही नशाच असते मग ती कशाची ही असो. काही ना कामाची, तर काहींना मोबाईलची, काहीना ड्रग्सची असते तर काहीना आणि कशाची असते.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीची आस ☆ श्रीमती सुधा भोगले

download.jpg

☆ मनमंजुषेतून ☆ भक्तीची आस ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

भक्ती संप्रदायाचा इतिहास जेव्हां वाचनात आला तेंव्हा साहित्याचे मुकुटमणी, संतांचे गुरु ज्ञानेश्वर यांना माऊली कां संबोधतात याची जाणीव झाली. भागवतधर्म म्हणजे काय? शैव व विष्णुरूपी पांडुरंग जो सर्व जातीपातीच्या, उच्चनीच, श्रीमंत, गरीब, विद्वान, सामान्य, सर्वांना एकाछत्राखाली सामावून घेतो.तो साक्षात ईश्वर संतांचा मायबाप, प्रसंगी, दिनांचा कनवाळू विठोबाराया!

आषाढी, कार्तिकीचे महत्व पूर्वापार चालत आले आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी पालख्या घेऊन पंढरपुरला जातात. वर्षाचे बारामहिने एकादशी असतेच, पण या दोन एकादशीना विशेष महत्व आहे. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या सुमारास सूर्याचे दक्षिणायन असल्याने, देवांची रात्र सुरु होते. इथून पुढचे चार महिने चातुर्मास सुरु होतो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आहे.

उदा.कामिका,पुत्रदा,पाशांकुशा,षट्तिला,स्मार्त,भागवत,परिवर्तिनी,इंदिरा,रमा,प्रबोधिनी,मोक्षदा,सफला, आमलकी,वरूथिनी,मोहिनी,पापमोचीनी,निर्जला,योगिनी अशी नावे आहेत.

एकादशी म्हणजे विष्णूचे व्रत.आषाढी,कार्तिकीला पंढरपुरच्या विठोबाचे महत्व! पुंडलिकाची गोष्ट लहानपणी ऐकलेली,वाचलेली होती.पण प्रत्यक्ष पंढरपूर,तेथील मंदिर पाहण्याचा योग सासरघरी आल्यावरच  आला.नाहीतर एकाद्शी दिवशी उपवास करायचा फराळाचे पदार्थ खायचे एवढेच करायचो.

वयाबरोबर जाणतेपण येते,तसे मन प्रगल्भ होते आणि मग इतर गोष्टींची जाण येते. सासरघरचे वातावरण धार्मिक होते.दरवर्षी सासूबाई आळंदीला प्रस्थानाला जात.एकदा पुण्याला पालखी सोहळा पाहिला  होता. शाळेतल्या क्रमिक पुस्तकात संतांची अभंगवाणी समाविष्ट असे.त्यातून जी काही थोडी  बहुत तोंडओळख या ईश्वरभक्तीशी झाली तेवढीच! पण मनातून ईश्वरभक्तीच्या ओढीचे प्रेम जागृत व्हायला आवधीच लागला.

एकदा आमचेकडे,सासूबाईंनी,पंढरपुरला मोठी महापूजा घालायचे ठरवले.मी तशी या साऱ्यालाच नवखी होते.कशाला इतका घाट घालताहेत? असे आपले मला वाटले. सर्वानीच जायचे ठरले.

महापूजा सकाळीच असल्याने भीमेकाठी जाऊन, चंद्रभागेत स्नान करून तयार झालो.मी या सर्व गोष्टी खरोखर आलीप्तपणे  करत होते. पुजेची वेळ झाली.घरचे यजमान पूजेच्या अग्रभागी सोवळे नेसून सिद्द होते.आम्हीही सर्वजण गाभाऱ्यात जमलो.पंच्यामृताच्या कळश्या एकेक हाती घेऊन पुजाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे देवाला स्नान घालणे सुरु होते.सासूबाई मला सांगत होत्या,”अग हात पुढे कर,तू पण देवाचे अंग चोळ,हाताने अंघोळ घाल”!त्यावेळी थोडे उचंबळून आले.साक्षात भगवंताला न्हाऊमाखूघालत होतो. पण जितका आनंद व्हावा तेवढा काही होत नव्हता.भक्तीची आस,भक्तीची कास देवभेटीची आळवणी,श्रद्धा ही सुद्धा जागृत व्हावी लागते. ईश्वराविषयीचे आकर्षण काही कोणी सांगीतल्याने,ऐकल्याने ओतले जात नाही.ते निर्माण व्हावे लागते,मनाच्या खोल गाभाऱ्यातून! जो ईश्वर, जे परब्रह्म,मूळ तुमच्यात वास करुन आहे, जे अंतस्थ आहे, अदृश आहे त्या मूळ जीवात्म्याला,निर्गुण निराकार परब्रहमाशी जोडण्याकरिता मनाचा हुंकार तुमच्या अंतस्थ ह्रदयातून उमटावा लागतो.तो अंतस्थ हुंकार, भक्तीची प्रेमनदी,भक्तीचा पान्हा,साक्षात भगवंताला न्हाऊ घालताना मजजवळ नव्हता,’मी रीतेपणीच गेले आणि रीतेपणीच आले’! म्हणून मला ईश्वरासमीप जाऊनही ते साक्षात ‘परब्रह्म’ भेटले नाही.भाव तेथे देव.भाव तो मनीच नव्हता, मग देव कसा भेटावा?

काही वर्षांनी पुन्हा पंढरीला जाण्याचा योग आला.यात्रा नव्हती.एरवीची एक संध्याकाळ होती.गर्दी तुरळकच होती. थोडा वेळ बारीत उभे राहून दर्शन झाले. गाभारा जवळ जवळ येऊ लागला, या वेळेसमात्र मागच्यापेक्षा मनात भक्तीची, देवाला प्रेमाने भेटण्याची ओढ होती. त्या तरंग लाटा मनात उचंबळू येऊ लागल्या. त्या आनंदाच्या भेट सोहळ्यात, पूर्वीच्या स्मृतीत मी हात वर उंचावून देवाला पाहू लागले, त्याच्या कायेला स्पर्शू लागले. एवढ्यात पुजार॒याचे दम भरलेले शब्द ऐकू आले, ‘बाई, पायाशीच हात लावा !’ अरे बापरे ! महापुजेवेळी साक्षात भगवंताला न्हाऊमाखू घालताना त्याचे अंग चोळले, अंघोळ घातली. बाळकृष्णाला, गोपाळाला पण आता तसा हा उंचावायचा नाही. बरोबर आहे, ‘बा, विठ्ठला, माझे पामराचे डोके तुझ्या चरणी लीनच व्हायला हवे. ते अशावेळी तुझ्या कायेला हात लावून आशीर्वाद का बरे घेणार !’ चूक झाली मायबापा चूक झाली. !’ असे मनाशी म्हणत मी पांडुरंगाच्या चरणी आपले मस्तक लीन केले, टेकवले. पुजाऱ्याने घाई चालवली होती. मी डोळेभरून ईश्वर पहिला. मनी त्याचे रूप आकंठ साठवून माझ्यावर प्रेमाची पाखर घालण्यास विनवले आणि पुन्हा आपल्या संसारी येऊन मग्न झाले. यावेळेस मला ईश्वराच्या सत्चीदानन्दाची जाणीव होऊ लागली. हृदयी ईश्वर भेटीचा प्रकाश होऊ लागला.

अशी ही ईश्वराची भक्ती, हृदयी भाव नसलेल्यांना वेडं करणारी ! भक्तीचा झरा वाहू लावणारी, असीम, उत्कट, अविनाशी ! दरवर्षी आषाढी येते. यावर्षीही आली आहे. पण यावर्षी मनाच्या गाभाऱ्यात वरील रहस्यमय अनुभवांचे गुंजन चालू आहे. जिकडे तिकडे पंढरपूरला पालखी निघाल्याच्या वार्ता कानावर येत आहेत. मन तिकडे हळूहळू ओढ घेत आहे.

शैशवात मनात नसलेला भक्तीचा उगम. हा काही नंतर एकाकी झालेला नाही. बहिर्चक्षूंनी पाहिलेला देव. अंतरमनात वास करीतच होता. परंतु बौद्द्धिक पातळीवर त्याचा विचार केलेला नव्हता. ती अंतरमनातील भक्ती जागृत झाली. बुद्धीने मनाची जागृती एका उंच स्तरावर नेऊन ठेवली. ह्यालाच भक्ती म्हणावं कां? देवाची भक्ती, त्याची आळवणी, त्याचे नामस्मरण सामान्यांनी करावे. हाच खरा सुखाचा मार्ग संतांनी शतकानुशतके दाखविला आहे. भक्तीच्या अशा नवविध पद्धती सांगितल्या जातात. देह हा इंद्रिय सुखाच्या पिंजऱ्यात अडून पडलेला आहे. त्या देहातील जीवात्म्याला त्या परिपूर्ण, अनादी अनंत परब्रह्माशी जोडून जिवाचे सोने होईल तेच खरे अंतिम सुख ! ‘देह जावो अथवा राहो ! पांडुरंगी दृढ भावो ! नुरो मस्तक ! कुटो हे शरीर ! नामाचा गजर सोडू नये ! नामाच्या गजराने, भक्तीने तो कृपाळू ईश्वर भक्तावर आपली कृपादृष्टी करतो. भक्ताच्या चिमुकल्या नामघोषाने फुल नाही फुलाची पाकळीसुद्धा त्याला पुरते. इतका तो दयानिधी कृपाळू आहे. त्याच्याकडे देण्यासाठी खूप आहे, पण आपली झोळी फाटकी असता कामा नये.

म्हणूनच ‘पुंडलिके वरदा हरिविठ्ठल, द्यानोबा तुकाराम,’ ह्या नामघोषात लाखो वारकऱ्यांनी भक्तीची ही उज्ज्वल परंपरा जागृत ठेवली आहे. हजारो वर्षे हे विठ्ठलाचे पाईक अखंड मुखी हरिचे नाम घेत. उन्हापावसाची, दगडाधोंड्यांची पर्वा न करता जिवाचे, देहाचे कवतीक सोडून, मैला मैलांचा प्रवास करीत, आपल्या मनातील नाद्ब्रम्हाला त्या परब्रम्हाशी एकरूप करण्या, भेटवण्या, पंढरपूरला त्या विठूरायाच्या दर्शनाला जातात आणि आपले मस्तक लीन करतात. आपल्या अंतरमनातील उर्जा देवाच्या दर्शनाने तृप्त करून परतात.

वारीला जातो तो वारकरी होतो. आपण पांडुरंगाच्या दर्शनाची आस ठेवली. भक्तीचा भाव ठेवला आणि वारीत मनाने जरी सहभागी झालो तरी आपणही वारकरी होऊ. प्रत्येकाच्या मनातले भक्तीचे स्वरूप जरी वेगळे असले तरी भाव तेथे देव आहेच ! भक्ती तेथे कृपा ! ईश्वराने अनेक प्रसंगी केलेली आपण पाहिली वाचली आहे. म्हणून या आषाढी निमित्त एकादशीला पंढरपूरला जाणार्या वारकऱ्याच्या स्वरात आपलाही स्वर मिसळून म्हणूया टाळी वाजवावी ! गुढी उभारावी !वाट ही चालावी ! पंढरीची.

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares