आपली प्रिय व्यक्ती सोडून गेल्यावर तिचे स्मरण म्हणजे आठवणींचा गोफ असतो. पण आठवणींचा मामलाही वाटतो तेवढा सरळ नाही. कोणत्या आठवणी मनात जोजवायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे आपल्या हाती कुठे असतं? कारण काही आठवणी कितीही विसरू म्हटलं तरी कायमचा पिच्छा पुरवत राहतात. कधी कधी एखादी छोटी गोष्ट मोठ्यातल्या मोठ्या स्मृतींची शृंखला मनात चालू करते. या आठवणीतलं बरं काय, वाईट काय यांची निवड मेंदूतील न्यूरॉन्सच्या चाळण्याच करत असतात.
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३१ व ३२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ती सूत्र क्र. ३१ व ३२
राजगृहभोजनादिषु तथैव दृष्टत्वात ॥ ३१ ॥
न तेन राजपरितोषः क्षुच्छांतिर्वा ॥ ३२ ॥
अर्थ : राजवाडा असो भोजन जो पर्यंत आपण त्याची अनुभूती घेत नाही, तोपर्यंत राजा असण्याचा आनंद आणि अन्नाची खरी चव कळू शकत नाही.
विवेचन:
ज्ञान हे भक्तीचे साधन आहे हे जे काही लोकांचे मत मागे सांगितले त्याचा प्रतिवाद करण्यासाठी व भक्ती ही स्वयं-फलरूपा आहे या आपल्या मताच्या पुष्टीसाठी नारदमुनी येथे दृष्टांत देतात. वरील दोन्ही सूत्रांचा एकमेकांशी अन्योन्य संबंध असल्यामुळे त्याचा येथे एकत्रच विचार केला आहे.
या सूत्रात राजवाड्याचे उदाहरण दिलेले आहे. मनुष्य राजवाडा पाहायला गेला, त्याने संपूर्ण राजवाडा पाहिला, राजवाड्याची पूर्ण माहिती घेतली. त्याला राजवाड्याचा संपूर्ण इतिहास आणि भूगोल माहित झाला. इतके सर्व त्याने केले म्हणजे त्याने राजाची मर्जी संपादन केली असे होत नाही. राजाची मर्जी संपादन करण्यासाठी त्याला वरील माहितीचा उपयोग होण्याची शक्यता आहे. पण राजाची मर्जी संपादन करण्यासाठी त्याला राजाची सेवा करावी लागेल, पहा पटतंय का?
एक उदाहरण पाहू.
एका राज्यात एका मनुष्याने चोरी केली. शिपायांनी त्याला पकडले आणि कैदेत टाकले. यथावकाश त्याची राजापुढे सुनावणी झाली. राजाने त्याला सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. कैदेत असताना त्याला राजाच्या बागेत काम दिले गेले. तो मनुष्य बागकाम करण्यात कुशल होता. त्याने आधी जो बगीचा होता, त्यात चांगली वाढ केली. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे लावली. त्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला. एकदा राणी त्या बागेत विहार करण्यासाठी आली. तिला तेथील फुले फार भावली. तिने तेथील कामगाराची चौकशी केली. या चोराचे नाव सांगितले गेले. राणीने त्याचे बागकाम पाहून राजाकडे त्याच्यासाठी शिफारस केली. राणीच्या आग्रहामुळे राजाने त्याची शिक्षा माफ केली आणि त्याला त्या बागेचा प्रमुख माळी केले.
इथे आपल्या लक्षात येईल की नुसती माहिती घेऊन उपयोग होत नाही, पण सेवेने मात्र प्रचंड लाभ होऊ शकतो.
एखाद्याने पाकशाळेत प्रवेश घेतला. श्रीखंड कसे करायचं याची कृती त्याने तोंडपाठ केली. पण, जोपर्यंत तो ते श्रीखंड तयार करून चाखत नाही, तोपर्यंत त्याचा खरा फायदा शून्य.
भक्तीच्या ज्ञानाने किंवा ज्याची भक्ती करावयाची त्याच्या ज्ञानाने भक्तिसुखाची प्राप्ती होत नाही किंवा ती त्या ज्ञानावर अवलंबूनही नाही. भक्तीत ज्ञान असेल आणि असावे हे ठीक आहे पण ज्ञान झाल्याने किंवा ज्ञानाच्याद्वारे भक्तीची प्राप्ती होतेच असे नाही, म्हणून ज्ञान हे भक्तीचे साधन नाही. कारण भक्ती ही ‘स्वयंफलरूपा’ आहे. भक्तीच भक्तीचे साधन आहे. भक्ती केल्यानेच भक्तीप्रेमानंदाचा लाभ होतो. जे जे साध्य असते त्याचे साधन त्याच्यापेक्षा वेगळे असते असा सर्वसाधारण नियम असता भक्तीचे साधन भक्ती स्वतःच कशी असू शकेल अशी त्यावर शंका येईल. त्यावर श्रीनारदांचे उत्तर असे की ती परमप्रेमरूपा आहे आणि प्रेम हे अनुभवरूप आहे – म्हणजे अनुभवानेच कळणारे आहे, शब्दज्ञानाने नव्हे. कोणतेही सुख हा अनुभवाचाच विषय असतो, ज्ञानाचा नसतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
*”भक्तीप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥
आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्यां ॥२॥
तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥३॥”*
(अभंग क्रमांक १०९९, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)
सुखाची साधने कळल्याने सुख होत नाही तर सुखाचा अनुभव घेतल्याने सुख होते. राजवाडा पाहून त्यातील सुखाच्या अनेक साधनाचे ज्ञान होऊन त्यापासून राजाला जे सुख होते ते आपल्याला होईल काय? त्याचा अनुभव घेण्यानेच ते सुख आपणास कळेल. त्याचप्रमाणे भोजनाचेही आहे. जेवल्याशिवाय पोट भरत नाही. भक्ति केल्याशिवाय भक्ति कळत नाही.
इथे संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग पाहू.
प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥ १ ॥
*
कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ २ ॥
☆ तुका म्हणे – जळो जैसा प्रेमरंग… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
जळो जैसा प्रेम रंग / जया भुलोनि पतंग //१//
सासूसाठीं रडे सून / भाव अंतरीचा भिन्न //२//
मैंदा मुखीचा कोवळा / भाव अंतरी नीराळा //३ //
तैसी वृंदावनकांती / उत्तम धरूं नये हाती //४//
बक ध्यान धरी / दावी सोंग मत्स्य मारी //५ //
तुका म्हणे सर्प डुले / तैसा कथे माजी खुले // ५ //
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
पतंग दिव्याच्या प्रकाशाने नटलेल्या लोभसवण्या ज्योतीच्या बाह्य स्वरूपावर भुलतो. प्रेमाने तिच्यावर झडप घालून मरून जातो. या प्रेमाला प्रेम कसे म्हणायचे. कायम जाच करणारी सासू मेली की सून हंबराडा फोडून रडताना दिसते. पण तिच्या रडण्याचा भाव खरा नसून भिन्न विचाराचा असतो. अतिशय मधूर आणि रसाळ वाणीत बोलणा-या कपटी माणसाच्या मनात कपटी कांगावाच भरलेला असतो. वृंदावन नावाचे वरून सुंदर दिसणारे फळ मनमोहक दिसते पण ते आतून कडवट व विषारी असते त्याला आपण हातात सुध्दा धरू नये. जलाशयाच्या किंवा नदिच्या काठावर डोळे झाकून उभा असणारा बगळा पाहून तो जप तप ध्यान करतो आहे असे भासवतो पण तो तेथे मासे मारण्यासाठी उभा असतो. त्याच प्रमाणे हरीकथा किंवा किर्तन ऐकणारा नास्तिक माणूस पुंगी वाजताना ऐकून डुलणा-या सापासारखे सोंग करून दाखवत असतो. हे लक्षात घ्यावे आणि मगच तशा माणसाशी पुढील व्यवहार सावध होऊन करावेत.