प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह’ देशभर साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात याचे विशेष महत्व आहे. या वर्षीच्या- आजच्या ४मार्चला सुरू होत असलेल्या – सुरक्षितता सप्ताहानिमित्त वाचकांना एका कवितेची अल्पशी भेट आणि सर्वांना सुरक्षित जीवन लाभावे ही ईश्वरचरणी ‘यंत्रदासा’ची मनोमन प्रार्थना.
अर्थ : जो कर्मफलाचा त्याग करतो, सर्व कर्मांचाही त्याग करतो, त्यामुळे तो द्वंद्वरहित होतो, अर्थात मायेच्या पलिकडे जातो.
विवेचन : मागील सूत्रात जो योगक्षेमाचाही त्याग करतो, जो निर्मम होतो, संगांचा त्याग करतो तो मायेतून तरून जातो असे सांगितले, या सूत्रात आणखी तीन साधने सांगतात. प्रथम कर्मफलत्याग सांगितला आहे. या साधनाचा मागील साधनाशी संबंध आहे. मानवप्राणी हा या जगात येतो तो कर्ता म्हणून येतो. कर्तृत्वाबरोबर येणारा दुसरा धर्म म्हणजे कर्मफलाचे भोक्तृत्व हा आहे. कोणीही जे कर्म करत असतो ते निष्फळ जावे म्हणून करीत नाही तर त्याचे फळ भोगावयास मिळावे याच हेतूने करीत असतो. यासच फलासक्ती म्हणतात. अशा आसक्तीने मानव कर्मे करतो. जर फल न मिळेल अथवा त्या फलाची आसक्ती नसेल तर कर्मे करण्याकडे प्रवृत्ती होणे कठीण आहे, हे जरी खरे आहे तरी जीव जो कर्मात अडकतो तो या फलासक्तीमुळेच. मी कर्ता हा अभिमान म्हणून मीच या कर्माचे फळ भोगावे ही आसक्ती, यासच कर्माचा बंध म्हणतात, असे श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात.
“तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ॥”
(ज्ञान. १८. २०५)
या फलासक्तीतूनच पुढे रागद्वेषादी विकार, अनुकूल-प्रतिकूल भावना, इत्यादी निर्माण होतात. त्यातल्या त्यात संसारी माणसाची सकाम कर्माकडे विशेष प्रवृत्ती होते ती आणखीही बंधनाला कारण होते. मनुष्याला जन्ममरण प्रवाहात वाहत जावे लागते त्याचे कारणही हे कर्मफळच आहे. याचा परिणाम असा होतो की मनुष्य असो वा साधक जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडतो. आणि मिळणाऱ्या प्रत्येक नव्या जन्मात पुढील जन्माची बेगमी करतो.
माउली म्हणतात,
वृत्ती{ऐ}सें मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहें ॥
(ज्ञान. १७. ५८)
ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्याला फलासक्ती ठेवता येणार नाही. कारण तोही एक मायापरिणामच आहे. म्हणून विवेकी साधक हळूहळू मायेच्या जाळ्यातून सुटण्याकरिता एक एक बंध तोडून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातच ‘कर्मफलंत्यजति’ याचा अंतर्भाव होतो.
कर्माचे चार प्रकार आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य व प्रायश्चित्त. त्यांत साधकाने काम्य कर्मे करू नये असे सांगितले जाते. ज्ञात-अज्ञात पातकक्षालनाकरिता प्रायश्चित्त कर्मे करावीत व नित्यनैमित्तिक कर्मे न केली तर प्रत्यवाय आहे, म्हणून ती टाकू नयेत. अशा प्रकारे जर कर्मे करील तर तो कर्मत्यागीच मानला जाईल. मात्र ती कर्मे निरहंकार वृत्तीने कर्तृत्वमद व फलाशा टाकून करावीत. प्रारब्धाने आलेली किंवा आपली विहित कर्मे अवश्य करावीत. त्यांचा त्याग करणे उचित नाही असे माउली म्हणतात.
१. वेद, ईश्वर, परलोक यावर विश्वास न ठेवणारा तमोगुणी पुरुष अविवेकाने जो विहित कर्माचा त्याग करतो तो तमोगुणी त्याग होतो.
२. शरीराला फार कष्ट होतात, दुःख होते या भीतीने जो कर्मत्याग केला जातो त्यास राजस त्याग म्हणतात
३. जो मनुष्य/साधक आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म कर्तृत्वमद व फलास्वादाची अभिलाषा टाकून करतो त्यास सात्त्विक त्याग म्हणतात.
कर्मत्यागाचे एक सोपे सूत्र सांगता येईल. एखाद्या कंपनीत मनुष्य नोकरी करत असतो. तेथील अधिकारी जे काम त्याला सांगतो, त्यानुसार तो मनुष्य ते काम करीत असतो. त्या कामातून होणाऱ्या लाभहानीकडे त्याचे फार लक्ष नसते. सांगितलेल्या कामात आपल्याकडून छोटीशीही चूक होऊ नये याची दक्षता तो मनुष्य घेत असतो. ते काम त्याने चोख केले की मालक/अधिकारी त्याला मासिक पगार देतो. आणि त्या व्यवसायात त्या मालकाला नफा झाला तर तो दिवाळीला भेटवस्तू (बोनस) पण देत असतो. इथे आपण भगवंताला आपले मालक करावे, त्याच्याकडे नोकरी करावी असे करता आले तर आपले काम अधिक सोपे होईल असे वाटते. संसारातील लाभ हानी स्वाभाविकपणे भगवंताची होईल. आपण त्यातून अलिप्त होऊ शकू. थोडक्यात मनुष्याने भगवंताच्या हातचे उपकरण बनून जावे. त्याला म्हणावं तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन. एकदा कर्तेपण भगवंताकडे दिले (अगदी मनापासून) की लाभहानी हा विषयच रहात नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंच दाई सारखा करावा आणि परमार्थ आई सारखा करावा.
मायेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणिक एक त्याग करावा लागतो, त्याचा विचार पुढील सूत्रात पाहू.
अर्थ: जो वेदांनी सांगितलेल्या विधिनिषेधात्मक कर्मसमूहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या उत्तरोत्तर वाढ शुद्ध, अखंड, एकरस प्रेमाचा लाभ होतो. अर्थात, तो मायेपासून मुक्त होतो.
विवेचन: मागील सूत्रात कर्मफले व ती प्राप्त होण्याकरिता केली जाणारी विहित कर्मे यांचाही तो भक्त त्याग करतो असे सांगितले आहे.
वेद हे अपौरुषेय आहेत. वेदांचे प्रामुख्याने चार अंगे आहेत. पहिले अंग आहे संहिता. दुसरे अंग आहे ब्राह्मण ग्रंथ आणि तिसरे आहे आरण्यके. चौथे आहे वेदांत.
संहितेमध्ये वेदकालीन देवतांचे मंत्र आले आहेत. ब्राह्मण ग्रंथात विविध यज्ञाबद्दल माहिती आलेली आहे तर तिसऱ्या भागात अर्थात आरण्यकात भगवंतासंबंधी चिंतन करून जे अनुभव घेतले, त्याचा उहापोह इथे आढळतो. चौथे आहे वेदांत, यात उपनिषदे येतात. या चारी अंगाचा अभ्यास अनेकांनी केला, पण वेदांचा अभ्यास केला, सर्व वेद तोंडपाठ केले म्हणून त्यांंना भगवंताची प्राप्ती झाली असे होत नाही. तर त्यातील मर्म लक्षात घेतले पाहिजे. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज सांगतात की साधकांमध्ये एक दुर्गुण अवश्य येतो. त्याला परमार्थ छान बडबडता येतो. एक उदा. पाहू. चार धाम यात्रेला जाण्यासाठी एक जण रेल्वेचे तिकीट काढायला गेला. त्याने तिकीट काढले. त्या तिकीट देणाऱ्या माणसाने त्या मनुष्याला चार धाम यात्रेचे संपूर्ण वर्णन करून सांगितले. तसेच कुठे काय करावे? कुठे खरेदी करावी? कोणते हॉटेल स्वस्त आहे? धर्मशाळा कुठे आहेत? ते सर्व सांगितले. या मनुष्याने त्या तिकीट देणाऱ्या मनुष्याला सहज प्रश्न केला की तुम्ही बरेच वेळा यात्रा केलेली दिसते. तर तो तिकीट विकणारा म्हणाला मी एकदाही यात्रा केली नाही. लोकांनी सांगितलेल्या माहितीवरून मी हे सर्व तुम्हाला सांगू शकलो. नुसती माहिती झाली म्हणून उपयोग होत नाही.
वेदांचा, अभ्यास करून मनुष्य नुसती पोपटपंची करणार असेल, तर त्याचा काय उपयोग? त्यात अनुभूती असणे अत्यंत महत्वाचे. इथे तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो.
“वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।”
संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे.
“वेद अनंत अनंत बोलिला । अर्थ इतुकाचि साधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावें ॥२॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतुकाचि निर्धार ॥३॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हाचि होत ॥४॥”
कोणतेही तत्व नुसते पाठ करणे अपेक्षित नाही. तर त्याची अनुभूती घेतलेली असावी. तरच ते आपल्याला कळले असे होते. बाळ नीट चालायला शिकेपर्यंत पांगुळगाडा वापरतो. याच नियमाप्रमाणे ज्ञान प्राप्त करेपर्यंत ‘पांगुळगाडा’ वापरणे अपेक्षित आहे. आणि थोडे अधिक मोठे झाल्यावर त्या ‘पांगुळगाड्या’चा अभिमान न धरता त्याचा त्याग करणे अधिक उचित आहे.
राग म्हणजे प्रेम. राग म्हणजे रंग. अनु म्हणजे मागे जाणे, अथवा… ला शोभणे. भक्ताचे भगवंतावरील प्रेम वाढत जाते, तेव्हा त्याला प्रेमाचा रंग लागला असे म्हटले जाते. भक्त मिरेला कृष्ण भक्तीचा रंग लागला होता, असे म्हटले जाते. साधकाचे असेच व्हावे. *या प्रेमाला अनुराग असे म्हणतात. भिंतीला रंग लागला की आधीचे रंग संपूर्णपणे नष्ट होत असतात. अर्थात त्या साधकाच्या वासना निर्बीज होत असतात.
(काल बेला शेंडे हिच्या लाईव्ह शो ने लोकसत्ताच्या “अभिजात लिट फेस्टची” सांगता गडकरीला झाली. पण तिकीट बारी वरील पाटी बघून (फोटो बघा) डोकं भणाणून गेलं! तेंव्हा कार्यक्रम बघतांना लिहिलेली रचना!)
*
मराठी लिट फेस्टमध्ये
भाषेची पडली बत्तीशी,
जीव सोडला मराठीने
ठाण्यात कालच्या दिवशी!
*
प्रयोग ‘नवीन नाटकाचा’
होता काल हाउसफुल्ल,
बोर्ड बघून गडकरीचा
दांडी मराठीची झाली गुल!
*
‘बेला’चं नवीन नाटक
तिला सुद्धा माहित नसावं,
बोर्ड बघून वाटलं लोकांना
आता हसावं कां रडावं!
*
खरी ‘अभिजात मराठी’
लोकसत्तालाच कळली,
डोळ्यात भरण्या सारखी
*फेस्टची सांगता झाली! *
*फेस्टची सांगता झाली! *
☆
टीप: व्यक्त केल्या गेलेल्या विचारांशी / मतांशी संपादक-मंडळ सहमत असेलच असे नाही..
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
*
रविंद्रनाथ टागोर हे जगातले एकमेव असे कवी आहेत, ज्यांनी रचलेल्या दोन काव्यांना भारत व बांगलादेश या दोन राष्ट्रांनी आपले राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली आहे. परंतु का कोण जाणे, पण त्या काळातील तथाकथित विचारवंतांमध्ये टागोरांबद्दल गैरसमज फार होते व कदाचित ते जाणून बुजून पसरविलेही जात होते. कदाचित टागोर एका उच्चशिक्षित, सुखवस्तू, जमिनदार घरात जन्मले होते, त्यांचे बंधू ब्रिटिश सरकारमधे अंमलदार होते, त्यांच्या वडिलांची उच्च सरकारी अधिकाऱ्यांत उठबस होती म्हणून असेल. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला म्हणून असेल.
सुरवातीच्या काळात ते सरकारवर फारशी जहाल टीका जाहीरपणे करत नसत. जे कांही म्हणायचं ते आपल्या लेखनातून, काव्यातून म्हणत. “जनगणमन अधिनायक जय हे” हे गीत टागोरांनी इंग्रज बादशहाच्या स्वागतासाठी लिहिलं होतं हा गैरसमज आजही कित्येकांच्या मनात आहे. पण त्यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात लिहिलेल्या लेखांना तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. ब्रिटिश युवराज भारतात आले तेव्हा टागोरांनी म्हटलं होतं, “स्वतःच्या बळाचं प्रदर्शन करणाऱ्या राजाचं स्वागत करणं म्हणजे कैद्यांच्या पंगतीला मेजवानी म्हणण्यासारखं आहे. “
ब्रिटिश साम्राज्यशाहीने भारतीयांना स्वत्वहीन करून टाकले होतं व गोऱ्या कातड्याच्या लांगूलचालनात उच्चभ्रू समाज धन्यता मानत होता. यावर १८८४ साली, वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसच्या धुरिणांना उद्देशून लिहिलं होतं की, इंग्रजांपेक्षा स्वतःला हीन दीन समजून वागणारे लोक त्यांच्यापुढे हात जोडून “आम्हाला बरोबरीचा दर्जा द्या” अशी मागणी करणार आहेत काय? आम्ही स्वत:च्या हिमतीवर आपली, आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवू शकणार नाही काय? जे स्वतःचा मान स्वतः राखू शकत नाहीत, त्यांचा मान राखायला परके येणार आहेत काय? का आपण स्वभाषेत बोलत नाही? का स्वदेशी वस्त्रं वापरत नाही? का म्हणून आम्हीच आमच्या मनात स्वदेशाची घृणा बाळगतो? ” असा विचार करणारा व ते बोलणारा, लिहिणारा कवी ब्रिटिश राजासाठी स्वागतगीत लिहिल का?
रविंद्रनाथांनी उत्तम इंग्रजी येत असूनही, वयाच्या पन्नाशी पर्यंत फक्त बंगाली भाषेतून लिहिलं व बंगालीतूनच भाषणं केली. पण त्याचवेळी उत्तम इंग्रजी कविता, धर्मोपसानेचे संस्कृत मंत्र, संत तुकारामांचे अभंग इ, साहित्य आपल्या वंग बांधवांसाठी बंगालीत भाषांतरित केले.
जालियनवाला बागेतील हत्याकांडानंतर त्यांनी आपला ‘सर’ हा किताब परत केला होता हे सर्वांना ठाऊक आहे पण वयाच्या ८०व्या वर्षी मृत्युशय्येवरून त्यांनी लिहिलेले (कृष्ण कृपलानींकडून लिहून घेतलेले), ब्रिटिश राजवटीला सणसणीत चपराक मारणारे त्यांचे अनावृत्त पत्र मात्र कुणाला फारसे ठाऊक नाही. दुर्दैवाने त्यानंतर दोनच महिन्यांनी ते वारले. पण या पत्रात त्यांनी “आधी भारतीयांचे शोषण थांबवा, त्यांना स्वतंत्र करा आणि मगच नाझींच्या विरुद्ध लढायला बोलवा” अशी जी मागणी केली होती त्याचाच स्फोट म. गांधींच्या ८ ऑगस्ट १९४२च्या ‘चले जाव’च्या भाषणात झालेला दिसला.
मनाला झोंबणाऱ्या भावनांना आपल्या गीतातून वाचा फोडणाऱ्या या महाकवीची “आमि भय करबोना” सारखी गीतं गात हजारो बंगाली तरूण वंगभंगाच्या चळवळीत पोलिसांच्या लाठ्या खात होते. “आमार शोनार बांगला” “ऍकला चलो रे” ही त्यांची सुप्रसिद्ध स्फूर्तीदायक गाणी याच चळवळीतली!
(संदर्भ – रविंद्रनाथ: तीन व्याख्याने, ले. पु ल देशपांडे)
—–
☆ गीत : ३७ ☆
I THOUGHT that my voyage had come to its end at the last limit of my power, ⎯ that the
path before me was closed, that provisions were exhausted and the time come to take
shelter in a silent obscurity.
But I find that thy will knows no end in me. And when old words die out on the tongue,
new melodies break forth from the heart; and where the old tracks are lost, new country is revealed with its wonders.
प्रेमासारख्या नाजुक विषयाचा बाजार मांडायला ह्या फिरंग्यांना सांगायला नको. ह्यांच्या व्हँलेंटाईन डेवरून मला गझलनवाजांचा एक शेर वजा किस्सा आठवला…
एकदा एक मूर्ख शायर
सूर्यास म्हणतो की….
भास्करा, कीव मजला
येऊ लागते कधी मधी,
रात्र प्रणयाची तू रे
पाहिली आहे कधी ?
तेव्हा सूर्य उत्तर देतो…
आम्हासही या शायराची
कीव येऊ लागते,
याच्या म्हणे प्रणयास
रात्र यावी लागते.
प्रेम हे काय दिवस ठरवून
व्यक्त करायची चीज आहे ?
आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात.
प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची परिणती आहे.
गदिमा म्हणून गेलेयत…
‘प्रथम तुज पाहता, जीव वेडावला…’
यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे सरळ-सरळ न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की
‘जिथे सागरा धरणी मिळते
तेथे तुझी मी वाट पहाते’
मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत.
ही कोंडी शेवटी तो फोडतो,
(सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.)
‘लाजून हांसणे अन् हांसून ते पहाणे,
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे’
भेट झाल्यावर मात्र हृदयात
एक अनाहूत हुरहुर सुरू होते.
मग परत गदिमा मदतीला येतात,
‘हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता’
तोही आपल्या विश्वात नसतोच.
‘होशवालों को खबर
बेखुदी क्या चीज है,
इश्क किजे, फिर समझिये,
बंदगी क्या चीज है’
प्रेमात ती ठार वेडी झालीय,
म्हणतेय काय….
‘मी मनांत हसता प्रीत हसे,
हे गुपीत कुणाला सांगू कसे ?’
त्याचे बहाणे ती सुद्धा ओळखून आहे.
तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू ) आहेत,
ती म्हणते,
‘नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,
परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी’
ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे
नाहीत. मग तीच म्हणते,
‘ये मुलाकात इक बहाना है,
प्यार का सिलसिला पुराना है’
शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर
‘घडी घडी मेरा दिल धडके,
हाय धडके, क्यू धडके’
ह्याची खात्री पटलीय पण
खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय.
‘कहना है, कहना है,
आज तुमसे ये पहली बार,
तुम ही तो लायी हो,
जीवन में मेरे
प्यार, प्यार, प्यार..’
ती त्याच्या हरकतीने मोहरून गेलीय.
तृप्त झालीय.
‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,
शब्दरूप आले, मुक्या भावनांना’
आणि मग झाडांची पाने हलतांत. तो खूष.
‘जेव्हां तिची नी माझी, चोरून भेट झाली,
झाली फुले कळ्यांची,
झाडे भरांत आली’
आणि तिनं चक्क होय म्हटलं.
हा गडाबडा लोळायचा बाकी.
‘तुम क्या जानो, मुहब्बत क्या है..:
‘कोकिळ कुहूकुहू बोले,
तू माझा तुझी मी झाले.’
दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते:
‘तुज्ये पायान् रूपता काटां,
माज्ये काळजान् लागतां घांव’
आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं.
दो लब्जों की है बस ये कहानी या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही.
‘आज तू डोळ्यांत माझ्या,
मिसळूनी डोळे पहा,
तू असा जवळी रहा,
तू अशी जवळी रहा..’
प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणा-या या कविता ज्या साहित्यात आहेत त्या मराठी भाषेला व्हॅलेन्टाईन डेच्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?
भारतीय संस्कृती आणि माय मराठी प्रेमी… नक्कीच सहमत असतील.
लेखक:अज्ञात
प्रस्तुती:सौ.राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈