मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सिनेमा, क्रिकेट, राजकारण… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

सिनेमा, क्रिकेट, राजकारण… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

एक गोष्ट मला कधीच समजली नाही की…

चित्रपटांतील अभिनेते किंवा अभिनेत्री असे नेमके काय काम करतात की त्यांना एका चित्रपटासाठी ५० किंवा १०० कोटी रुपये मिळतात…?

काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्याच्या मृत्यूनंतर अशी चर्चा खूप झाली होती की अभियांत्रिकीतील टॉपर मुले-मुली पुढे शिक्षण घेण्याऐवजी चित्रपटसृष्टीची निवड का करतात?

ज्या देशात सर्वोच्च शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते इत्यादी लोक वर्षाला १० ते २० लाख रुपये कमावतात, ज्या देशाचा राष्ट्रपती वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा कमी कमावतो, त्या देशातील चित्रपट कलाकार वर्षाला १० ते १०० कोटी रुपये कमावतात..!

कमावोत; पण ते असे काय काम करतात? हा प्रश्न तर उपस्थित होणारच ना…?

आणि देशाच्या विकासात त्यांचे योगदान काय आहे?

मोठमोठ्या शास्त्रज्ञांना १०० कोटी रुपये कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागते आणि हे लोक एका वर्षात इतके पैसे कमावतात..!

प्रश्न तर उपस्थित होणारच…

आज ज्या तीन क्षेत्रांनी देशातील नव्या पिढीला मोहित केले आहे ती म्हणजे

सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण

या तीन क्षेत्रांशी संबंधित लोकांची कमाई आणि प्रतिष्ठा दोन्हीही मर्यादेपलीकडे गेली आहे. हेच आजच्या आधुनिक तरुणांचे आदर्श बनले आहेत. प्रत्यक्षात आज त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जेव्हा एखादी गोष्ट महागडी असते, अविश्वसनीय असते, अप्रासंगिक असते, तेव्हा ती देश आणि समाजासाठी हानिकारक किंवा आत्मघातकी ठरते.

आज कोणताही सुशिक्षित युवक किंवा युवती या क्षेत्रांकडे आकर्षित झाला नाही तरच ते अस्वाभाविक वाटेल..!

बॉलिवूडमध्ये ड्रग्स आणि वेश्याव्यवसाय, क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग आणि ऑनलाइन जुगार, राजकारणात गुंडगिरी आणि भ्रष्टाचार.

या सगळ्यांच्या मागे मुख्य कारण पैसा हेच आहे..

आणि हा पैसा त्यांच्यापर्यंत आपणच पोहोचवतो, हीसुद्धा मोठी मूर्खता आहे..!

७०-८० वर्षांपूर्वीपर्यंत प्रसिद्ध कलाकारांना सामान्य वेतन मिळत असे. ३०-४० वर्षांपूर्वी क्रिकेटपटूंची कमाईही विशेष नव्हती. ३०-४० वर्षांपूर्वी राजकारणही इतके धनसंपन्न नव्हते.

हळूहळू आपण लुटले जात राहिलो आणि ते आनंदाने आपल्याला लुटत राहिले..!

आपण या माफियांच्या जाळ्यात इतके अडकलो आहोत की येणाऱ्या पिढीचे आणि देशाच्या भविष्याचे नुकसान करत आहोत..!

५० वर्षांपूर्वीपर्यंत चित्रपट इतके अश्लील किंवा फुहड नव्हते. क्रिकेटपटू आणि नेते इतके अहंकारी नव्हते. आज तर हे लोक देव बनून बसले आहेत..!

आता गरज आहे की यांना डोक्यावरून खाली उतरवून जमिनीवर आणावे, जेणेकरून त्यांना स्वतःची मर्यादा कळेल..!

एकदा व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो-ची-मिन्ह भारतात आले होते.

त्यांची भेट भारतातील मंत्र्यांशी झाली. बैठकीत त्यांनी मंत्र्यांना विचारले, “तुम्ही सर्व काय करता? ” आपले मंत्री म्हणाले, “आम्ही सर्व राजकारण करतो. “

त्यांना हे उत्तर समजले नाही म्हणून त्यांनी पुन्हा विचारले, “माझा अर्थ असा की तुमचा व्यवसाय काय आहे? ” मंत्री म्हणाले, “राजकारण हाच आमचा व्यवसाय आहे. “

हो-ची-मिन्ह थोडे आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, “कदाचित तुम्हाला माझा प्रश्न समजला नाही. राजकारण तर मीही करतो, पण माझा व्यवसाय शेती आहे. मी शेतकरी आहे. माझा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. सकाळ-संध्याकाळ मी शेती करतो आणि दिवसा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करतो. ” हे ऐकून भारतीय प्रतिनिधीमंडळातील लोक निरुत्तर झाले..!

नंतरच्या एका सर्वेक्षणात समजले की भारतात ६ लाखांहून अधिक लोकांचा उदरनिर्वाह राजकारणावर चालतो; आज ती संख्या कोट्यवधींमध्ये पोहोचली आहे..!

जेव्हा कोरोनाने संपूर्ण युरोपला विळखा घातला होता, तेव्हा डॉक्टरांना अनेक महिने सलग सुट्टी मिळाली नव्हती आणि संपूर्ण युरोप संकटात सापडला होता. तेव्हा पोर्तुगालमधील एका डॉक्टरने संतापून म्हटले होते, “तुम्ही सर्व फुटबॉलपटू रोनाल्डोकडे जा. तुम्ही त्याला कोट्यवधी डॉलर्स देता, मग तोच तुम्हाला वाचवेल. आम्हाला सामान्य फी देऊन इतक्या मोठ्या अपेक्षा का ठेवता? “

माझे स्पष्ट मत आहे की ज्या देशातील तरुणांचे आदर्श शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ इत्यादी नसून, राजकारणी, क्रिकेटपटू आणि अभिनेते असतात; त्या देशाची वैयक्तिक प्रगती कदाचित होऊ शकते, पण देशाची सर्वांगीण प्रगती अशक्य आहे.

सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक, धोरणात्मक दृष्टिकोनातून तो देश कायम मागे राहील.

अशा देशाची एकता आणि अखंडता नेहमीच धोक्यात राहील.

ज्या देशात अनावश्यक आणि अप्रासंगिक क्षेत्रांचे वर्चस्व वाढत राहील, तो देश दिवसेंदिवस कमकुवत होत जाईल.

देशात भ्रष्टाचारी आणि देशद्रोही लोकांची संख्या वाढत जाईल.

प्रामाणिक लोक मात्र उपेक्षित राहतील. राष्ट्रवादी लोकांना जगणे कठीण होईल.

तथापि, सर्व क्षेत्रांमध्ये काही चांगले लोकही असतात आणि ते माझ्या दृष्टीने आदरास पात्र आहेत.

गरज आहे की आपण प्रतिभावान, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, समाजसेवी, देशासाठी काहीही करण्याची भावना असलेले, जिद्दी देशभक्त, राष्ट्रनिष्ठ वीर लोकांना आदर्श मानले पाहिजे…,

नाचणारे-गाणारे भांड, ड्रग्ज घेणारे, चारित्र्यहीन, गुंड, मवाली, जातीयवादी आणि दुष्ट देशद्रोही लोकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या बहिष्कृत करण्याची प्रवृत्ती आपण विकसित केली पाहिजे.

आपण असे केले तर ठीक, अन्यथा देशाची अधोगती निश्चित आहे.

तुम्ही स्वतः ठरवा,

सलमान, अमिर, शाहरुख, ह्रितिक, करिश्मा, करिना, आलिया किंवा सचिन, विराट यांचे देशाच्या सामाजिक मूल्यवर्धन आणि विकासात काय योगदान आणि सहकार्य आहे? (Value addition) 

आपली मुले अशा लोकांना आदर्श मानतात जे स्वतः फक्त आत्मकेंद्रित आहेत, असे या लेखाचे मत आहे..!

भविष्यात माझ्या भारत देशाला अशा स्वयंमशगुल तारकांची फार गरज नाही.

डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि संशोधकांची गरज भासणार आहे.

म्हणून भारताचे भविष्य डोळे उघडून जागे होवो अशी आशा.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : रेखा जांबवडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ भेट… कवी : मा. दीपक पटेकर. (दीपी) ☆ रसग्रहण – राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ भेट… कवी : मा. दीपक पटेकर. (दीपी) ☆ रसग्रहण – राधिका भांडारकर ☆

एखादं नातं विरून जातं पण त्या नात्यातले अनुभवलेले काही हळुवार कोमल प्रीतीचे क्षण मात्र नकळत सोबत राहतात. प्रेमाची परिणीती जरी निर्णायक झाली नसली तरी भावनांचा अविष्कार पुसत नाही. रोजच्या जीवनचक्रात हे सारं गरगरत असतंच पण अचानक असं काहीतरी घडतं की काळ, परिस्थिती, मागे घडलेलं सारं काही विसरून जायला होतं आणि मन पुन्हा त्या मधुर क्षणांच्या आठवणीत रमतं. हरवलेलं गवसू लागतं.

“बकुळीची फुले” या कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या काव्यसंग्रहातील भेट ही कविता वाचल्यानंतर मनात हेच विचार झळकून गेले. अतिशय भावूक आणि हळुवार कविता! ती वाचली आणि तिचा रसास्वाद घ्यावासा वाटला. प्रथम कविता वाचूया.

 भेट ☆

 भेट अचानक होते तेव्हा

 जुन्या आठवा डोळे भरती

 वरवर शांती परि अंतरी

 विचारचक्रे गरगर फिरती …

भेट अचानक होते तेव्हा

 मुके शब्द अन् नयन बोलती

 नसे वाच्यता फक्त शांतता

 नयनामध्ये तिज साठवती..

 *

 भेट अचानक होते तेव्हा

 थरथर थरथर अधर कांपती

श्वासामध्ये वाढुनि अंतर

 हृदयामधले ठोके चुकती..

 *

भेट अचानक होते तेव्हा

 जुने वाद अन भांडण स्मरती

 रुसवे फुगवे हास्यात विरुनि

 हातामध्ये हातच धरती …

 *

भेट अचानक होते तेव्हा

स्पर्शामधुनी ओढ जाणती

 मनपटलावर होउनि हलचल

येते लाली गालांवरती..

 *

 भेट अचानक होते तेव्हा

 नयन इशारे नयना कळती

 अधरांशी अधरांनी बोलुनी

 मिटून डोळे मिठास घेती..

 – दीपक पटेकर

 या कवितेत एका ब्रेकअपची कहाणी आहे.

 भेट अचानक होते तेव्हा

 जुन्या आठवा डोळे भरती

बरोबर शांती परि अंतरी

 विचारचक्रे गरगर फिरती… 

सगळं काही संपलेलं असताना, ध्यानीमनी नसताना अचानक ती भेटते आणि जुन्या मधुर आठवणी जाग्या होतात. डोळे पाणावतात. काळाने सगळं बदललेलं असतं. दोघांचीही जीवने आता वेगवेगळ्या दिशेला पांगलेली असतात. त्यामुळे असे एकाएकी पुन्हा भेटल्यानंतर त्याच्याकडून कुठलीही उत्तेजित प्रतिक्रिया जरी परिस्थितीचे भान ठेवून झाली नसली तरी अंतरात मात्र असंख्य विचारचक्रे फिरू लागतात. ती कशी असेल या क्षणी?

तिच्या मनात नक्की कोणते भाव असतील?

माझ्या मनातल्या भावांशी त्यांचे साम्य असेल का? वगैरे शंका त्याच्या मनात स्वाभाविकपणे डोकावतात.

भेट अचानक होते तेव्हा

मुके शब्द अन् नयन बोलती

नसे वाच्यता फक्त शांतता

नयनामध्ये तिज साठवती..

या अनपेक्षित भेटीत शब्द, वाचा मूक झाली असली तरी नजरेच्या भाषेतून अर्थ झिरपत आहेत. तो फक्त त्या क्षणी तिचे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवत आहे.

भेट अचानक होते

थरथर थरथर अधर कांपती

श्वासामध्ये वाढुनि अंतर

 हृदयामधले ठोके चुकती..

शृंगार, प्रीतभावना, प्रणयातुरता या अशा काही हळुवार कोमल भावना आहेत की त्या जेव्हा अंत:प्रवाहात जाणवतात तेव्हा त्याची स्पंदनं देहावर उमटतात. त्याचं कवीने नेमकं वर्णन या कडव्यात केलेलं आहे. तिला पाहिलं आणि नकळत ओष्ठद्वयांचं कंपन जाणवलं. श्वास जणू काही थांबला आणि हृदयातले ठोके वाजू लागले. धडधड जाणवू लागली. हरवलेल्या प्रेमाच्या आशावादामुळे होणारी देह स्थिती आणि त्याचा अनुभव असा निराळाच असावा, हे कवीने अत्यंत समर्थ शब्दात वेचले आहे.

 भेट अचानक होते तेव्हा

 जुने वाद अन भांडण स्मरती

 रुसवे फुगवे हास्यात विरूनी

हातामध्ये हातच धरती…

कसं असतं ना? प्रेमामध्ये वाद असतात भांडण असतात, रुसवे फुगवे सारं काही असतं. नात्यात अंतर पडतं, दरी निर्माण होते. पण ते तेवढ्यापुरतंच असतं. रागाच्या भरात तुटफुट झालेली असते पण पुन्हा अचानक भेट घडल्यानंतर मात्र “कसं चुकलं आपलं! ” हे जाणवून हास्य फुलतं आणि एकमेकांचं नातं किती घट्ट आहे याची साक्ष हातात हात धरल्यावर मिळते.

 भेट अचानक होते तेव्हा

 स्पर्शामधुनी ओढ जाणती

मनपटलावर होउनि हलचल

 येते लाली गालावरती…

काळाबरोबर जे विसरलं गेलं असं वाटत असतानाच दोघांची अचानक भेट होते आणि जाणवतं आपल्यात अजून सारे काही तसेच आहे. स्पर्शातली ओढ आजही कायम आहे आणि मनावर लहरलेल्या या तरंगांनी पुन्हा शरीरात एक लाट उसळते. जे आतापर्यंत दडपलं होतं ते जागू लागतं आणि त्या भावनेने दोघेही तितकेच हरखून जातात. क्षणात जे त्याला वाटत होतं ते तिलाही वाटतंय याची साक्ष तिच्या गालावर चढलेली लाली देते.

 भेट अचानक होते तेव्हा

नयन इशारे नयना कळती

 अधरांशी अधरांनी बोलुनि

 मिटून डोळे मिठास घेती..

कवितेतलं हे शेवटचं कडवं म्हणजे भावनांनी गाठलेला शिखरबिंदू आहे. याप्रसंगात शब्दांचं काही कामच उरत नाही. प्रीतीची भाषा ही केवळ नयनांतून व्यक्त होते. इथे शब्द बोलत नाहीत नजरा बोलतात. नजरेचे इशारेच पुरे असतात मग सारे बंध सुटतात, नियम अटी नाहीशा होतात. या क्षणी खरं फक्त एकच असतं ते म्हणजे प्रीतीची ओढ, स्पर्शाची आतुरता, पुन्हा एकदा एकमेकांनी दिलेली देहाची हाक आणि अर्थात मग बेभानपणे ओठावर ओठ टेकतात आणि डोळ्यांची पाखरं अलगद मिटतात. त्यानंतरचा अनामिक आनंद आणि गोडवा मिटलेल्या देहात उसळतो.

तुटलेलं एक नातं पुन्हा जुळतं.

दीपक पटेकरांची ही कविता वाचल्यानंतर फक्त दोनच शब्द ओठावर येतात, ”निव्वळ अप्रतिम!”

ही संपूर्ण कविता पादाकुलक वृत्तात रचलेली आहे. अतिशय सहज- सुलभ, लयबद्ध शब्दरचना. संपूर्ण काव्यभाव वाचकाच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी रसमय शब्दशैली. चोवीस ओळींच्या या कवितेत ओळींपलिकडचे कित्येक न लिहिलेले भावशब्दही वाचक वाचतो आणि एका वेगळ्याच भावविश्वात रमून जातो.

या कवितेचं वैशिष्ट्य असं की “भेट अचानक होते तेव्हा” ही या काव्याची मध्यवर्ती टॅगलाईन आहे आणि प्रत्येक कडव्यात या भेटीमुळे निर्माण झालेला अलवार भावरंग टिपण्यात कवीची संवेदनशीलता आणि शब्दसामर्थ्य जाणवते. दोन प्रेमिकांची ही भेट जशीच्या तशी त्याच गोडव्याने आणि भावनाविष्काराने डोळ्यासमोर उभी राहते. हा स्वभावोक्ती अलंकार कवीने फार सुंदर साधला आहे.

शृंगार रसात, प्रेमभावात भिजलेले हे काव्य वाचताना कुठेही अश्लीलता जाणवत नाही.

झाडावर फुल उमलावं आणि भ्रमराने पाकळ्यांवर हळूच उतरावे इतका अलगद शृंगार या काव्यात आहे. विरहानंतरच्या या शृंगारात पुनर्मिलनाची उत्कटता आहे. “कामोत्तेजिता” ही नैसर्गिक भावना आहे आणि त्याचं वर्णन जर संयतपणे केलं तर ते विकृत न वाटता सौंदर्यशाली वाटतं आणि शृंगारिक काव्य वाचताना हा अनुभव येणं हे शब्दांचे सामर्थ्य आणि कवितेचे यश अधोरेखित करतं.

दीपीजी, आपलं मनापासून अभिनंदन आणि आपला हा काव्यप्रवास सातत्याने होत राहो हीच शुभेच्छा!

© राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मी ‘मोल’करीण” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

“मी ‘मोल’करीण ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मी ‘मोल’ करीन!

कोणत्या कामाचं किती मोल करावं हे परिस्थिती ठरवते. मूल्य या संस्कृतातील शब्दाचं आजचं रूप म्हणजे मोल! यातून अमोल, अमूल्य, अनमोल, मौल्यवान इत्यादी शब्द आले असावेत.

आधुनिक जीवनपद्धतीत, विशेषत: नोकरी करणा-या महिलांना घरकामात मदत ही अपरिहार्यच ठरली आहे. आहे रे (haves) गटातील माणसांना यामुळेच नाही रे (have nots) गटातील माणसांना जवळ करावे लागते. आणि या दोन्ही गटांतील लोकांचे एकमेकांचे सहसंबंध कालपरत्वे बदलत जाताना दिसतात.

मोलकरीण हा शब्द आता मागे पडला असून कामवाली बाई आणि हल्ली नुसतंच बाई असं म्हटलं जातं. इंग्रजी माध्यमात शिकणारी तथाकथित उच्च मध्यमवर्गातील मुलं मराठी शाळेतली मुलं त्यांच्या शिक्षकांना बाई म्हणत असली की त्यांची टिंगल करतात! बाई हा अत्यंत सन्मानदर्शक शब्द असा भलत्याच अर्थाने रूढ होऊ पाहतो आहे. काही ठिकाणी ताई, मावशी हे शब्द वापरले जातात. पण मावशी हा शब्द आता रूग्णालयामध्ये सेवा करणा-या महिलांना आणि मामा हा शब्द तेथे काम करणा-या पुरूषांना चिकटवला गेला आहे!

अगदी फार पूर्वी केवळ अतिश्रीमंत कुटुंबांनाच घरकामासाठी माणसं नोकरीत ठेवणं परवडत असे. ती गरजही होती आणि प्रतिष्ठीतपणाचं एक लक्षणसुद्धा. राजेराजवाडे त्यांच्या मुलींना लग्नात भेट म्हणून काही दासीही तिच्यासोबत धाडून देत.

अर्थात अपवादात्मक परिस्थितीमध्येच, पण घरकामासाठी जाणा-या महिलांना संबंधित घरातील ज्येष्ठ महिला आणि काहीवेळा पुरुषांच्या विचित्र वागण्यास तोंड द्यावे लागते… असे ऐकले आहे.

संबंधित महिला काम करीत असताना तिच्या मागे कमरेवर हात ठेवून तिच्यावर पर्यवेक्षण करणे, अति सूचना करणे म्हणजे बारीक लक्ष ठेवणे हा एक प्रकार असतो. यामुळे काही घरांत कामवाल्या टिकत नाहीत, असा अनुभव आहे.

प्रत्येक घरातील स्वयंपाकाची पद्धत, भाषा निराळी असते. त्यामुळे दुस-या महिलेच्या हाताच्या पोळ्या, भाजी, घासलेली भांडी, धुतलेले कपडे, केलेली स्वच्छता आणि भाषा, लहेजा निश्चितपणे निराळा असणारच… पण यावर काही मालकिणी किंवा त्यांच्या घरातल्या ज्येष्ठ महिला कटाक्ष ठेवून असतात.

एक आजीबाई तर बाई भांडी घासून गेल्या की, ती भांडी पुन्हा एकदा विसळून घेत. सुनेने कामवाल्या ताईस अर्धा कप चहा दिला तर चहाचे महिन्याभराचे किती पैसे होतील? असा सवाल सासू विचारू शकते.

आपल्या घरात अन्न शिजवणा-या व्यक्तीची त्या अन्नावर वासना जाणे काही अगदीच अशक्य नाही. त्यामुळे त्यांना त्याचा एखादा भाग खायला देणे हे काही फार चुकीचे ठरत नाही.

या व्यवसायात असलेल्या महिलांची कर्मकहाणी अत्यंत वेगळीही असू शकते. दारुडा नवरा आणि मोलकरीण हे समीकरण तसे बरेच रूढ होते. आता अगदीच तसे नसले तरी संसाराला हातभार लागावा म्हणून चार घरची कामे करणा-या अत्यंत व्यावसायिक महिलाही आढळून येतात… आणि यात काहीही गैर नाही.

अन्नाची, पैशांची, दागिन्यांची, वस्तूंची चोरी करणे, सतत रजा घेणे, चहाड्या करणे, घरातील चर्चेत आपली मते मांडणे, पगार वाढवला जावा म्हणून अनेक खटपटी करणे, उसने पैसे घेणे, न सांगता काम सोडून निघून जाणे, एखाद्या महिलेला एखाद्या घरात काम धरू नको म्हणून धमकावणे इत्यादी अनेक तक्रारीही या महिलांच्याबाबतीत असतात, आणि त्यात तथ्ये आहेत. पूर्वीच्या काळी अत्यंत प्रामाणिक म्हणून ख्याती असलेल्या समाजघटकातील लोकही आता जबरी चोरी, खून करताना आढळत आहेत. पण बदलत्या सामाजिक, नैतिक परिस्थितीचा हा परिणाम आहे. पण म्हणून सर्वच महिलांवर असा शिक्का मारणे योग्य नाही. आपल्या घरात कामासाठी नेमल्या जाणा-या व्यक्तींची खातरजमा करून घेणे, ही आपलीच जबाबदारी ठरते.

प्राप्त परिस्थितीला सामोरे जात अनेक महिलांना हा व्यवसाय पत्करावा लागतो. यांपैकी अनेक महिलांनी जिद्दीने त्यांच्या मुलांना शिकवून मोठे केल्याचीही उदाहरणे भरपूर दिसतील. यासाठी मालकांचे सहकार्य मात्र लागतेच. आणि हे ओळखून मदत करणारी माणसं खरंच मोठ्या मनाची असतात. घरातील महिलांचे आणि घरकामासाठी येणा-या महिलांचे जीवाभावाचे नाते निर्माण झाल्याचेही दिसून येते. मोलकरणीच्या मुलींनी शिकावे यासाठी आग्रह धरणारी कुटुंबेही आहेतच, हे समाजाचे सुदैवच आहे! याच बरोबर मोलकरणीच्या लहान मुलींनी सुद्धा आपल्याकडेच मोलकरीण म्हणून कामाला यावे, असे वाटणारी माणसेही कमी नाहीत.

मोलकरीण मुलीच्या लग्नात कन्यादान करणारे सुशील लोकही असतात. वधू-वर सूचक मंडळ चालवणा-या एका व्यक्तीने त्यांच्या घरी घरकाम करणा-या एका परित्यक्त मुलीचे लग्न जुळवून दिल्याचेही समजले.

पण काही महिलांना अत्यंत दुर्दैवाने एखाद्या कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सदस्याकडून काही उपद्रव होण्याची शक्यता असते. काही महिला केवळ पोटासाठी हे प्रकार सहनही करतात. मोलकरीण आणि त्या घरातील पुरुष यांच्यातील विशिष्ट संबंध यांबाबत चित्रपटांतून विचित्र चित्रणही पहायला मिळते, पण हे ठीक नाही.

काही कुटुंबांत कित्येक वर्षांपासून सातत्याने सेवा करणा-या महिला आढळतात. त्यांच्या समोरच त्या घरांतील मुळे लहानाची मोठी झालेली असल्याने या महिलांचा या मुलांवर जीव असणे, त्यांनी त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून दटावणे असेही प्रकार आढळतात. एखाद्या कुटुंबात जर सुनेचा/सासूचा छळ होत असेल तर त्या घरातील पुरुषांना चार शब्द सुनावण्याचाही अधिकारी काही जुन्या मोलकरीण महिलांना असल्याचे पाहिले गेले आहे.

कोरोना काळात काही महिला मदतनीसांनी एकाकी वृद्ध दांपत्यांची जीवाचा धोका पत्करून सेवा केल्याचीही उदाहरणे आहेत.

काही वेळा तर जिथे काम करतात त्या कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा उत्तम आर्थिक परिस्थिती असलेल्या मोलकरणीही असतात… परिस्थिती सुधारली तरी काम करण्याची सवय असल्याने ब-याच महिला काम करीत राहतात… आणि ते पैसे मुलांच्या संसाराला लावत असतात.

‘विनापाश महिला’ हवी आहे अशी कधी कधी वर्तमानपत्रात जाहिरात बघायला मिळते. अशा महिला असू शकतात. काही कुटुंबे अशा महिलांना घरी ठेवून घेतात आणि त्यात त्यांनाही कुटुंबाचे प्रेम, आधार मिळू शकतो. मराठीत ‘मोलकरीण’ नावाचा चित्रपट खूप गाजला. अर्थात प्रत्यक्ष आयुष्यात असं झालेलं असण्याची शक्यता खूप कमी आहे. पण या चित्रपटात आईने मुलासाठी केलेला त्याग, त्या चित्रपटातील देव जरी मज कधी भेटला सारखी गाणी, सुलोचना यांचा अभिनय रसिकांच्या कायम लक्षात राहील, असा आहे.

आपण आपल्या आयुष्यात येणा-या, मग त्या मोलकरणी का असेनात भावनिक नाते जोडले पाहिजे, त्यामुळे आयुष्य सुकर होते, असे दीपा लागू एकदा एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या… आणि हे सांगताना त्या भावनावशही झाल्या होत्या. त्यावेळी उपस्थितांना तो विचार फारसा पटलेला दिसला नाही. परंतू मग त्यांनी अशी काही उदाहरणे सांगितली. मुले परदेशी असणारे आजारी लोक, घरात कुणाला असाध्य विकार असणारी कुटुंबे यांना कामवाल्या मावशींचा, आज्जींचा मोठा आधार मिळाल्याचेही दिसून येते.

मराठी दूरचित्रवाहिनीवरील एका विनोदप्रधान कार्यक्रमात एक अविवाहित पुरुष आणि त्याच्या घरात मोलकरीण म्हणून काम करणा-या महिलेचे भावबंध अत्यंत वेगळ्या पातळीवरचे दाखवण्यात येतात! तो संघर्षरत, मध्यमवयीन कलाकार माणूस आहे. ती गरजू, अल्पशिक्षित महिला आहे. ती त्याच्या घरात ते घर जणू तिच्याच मालकीचे आहे, अशा आविर्भावात वावरते. प्रसंगी मालकाला खडसावते, त्याची टिंगल करते. अर्थात विनोदी कार्यक्रम असल्याने लेखकास हे स्वातंत्र्य घेता आलेले आहे, हेही खरेच.
दूरचित्रवाणी वाहिनीवर नुकत्याच प्रसारित झालेल्या या कार्यक्रमातील एका skit मध्ये मालक आणि मोलकरीण यांच्यातील अत्यंत तरल अशा नात्याचे सादरीकरण पहायला मिळाले. कसलेले अभिनेते समीर चौगुले आणि नम्रता संभेराव यांनी या नात्यातील काही पैलू अत्यंत भावनिक प्रसंगांतून उलगडून दाखवताना कमाल केली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांत हसता हसता आसवेही तरळून गेली. शेवटी माणूसच माणसाला जीव लावू शकतो. ही मोलकरीण मालकाचे लग्न जुळावे म्हणून हक्काने प्रयत्न करते, मालक वेळेवर जेवावेत म्हणून त्यांना रागे भरते, त्याला राखीही बांधते आणि भाऊबीजेची हक्काची ओवाळणीही वसूल करते. त्याची आणि तिची भाषा निराळी आहे… पण मानवी नात्यातील मृदपणा सारखाच आहे! शेवटी आपण कुणाकडे कोणत्या नजरेने पाहतो, यालाही महत्त्व आहेच की!

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच… आपल्या अनुभवाला आलेली बाजू कायमची तशीच असेल असं गृहीत धरून चालणे ठीक नाही. गरज सर्वांनाच पडू शकते!
आपल्याला आपल्या सभोवताली असलेल्या लोकांचे मोल मात्र करता आले पाहिजे… मी (योग्य ते) मोल करीन… असं प्रत्येकाने ठरवले की माणसांचे मूल्य वाढू लागेल, असं निश्चित वाटतं!

संसाराचा गाडा ओढण्यासाठी कष्ट करीत असणा-या तमाम प्रामाणिक, सालस बाई, ताई, मावशी, आज्जी यांना नमस्कार. त्यांच्या परिस्थितीमध्ये लवकरच सुधारणा होवो, आणि त्यांना ही कामे करावी लागू नयेत, अशी शुभेच्छा!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पान खाये सैया हमारो…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पान खाये सैया हमारो…” ☆ श्री सुधीर करंदीकर

विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर पान खाल्ल्याने तोंडाची चव वाढते. पान खाल्ल्याने तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. तसेच दात पोकळी, दात किडणे यांचा त्रास कमी होतो. जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात. आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते.

देशातच काय तर आता विदेशात देखील विड्याचे पान मोठ्या आवडीने खाल्ले जाते. प्राचीन काळापासून भारतात जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आहे. मात्र, पान खाणं ही सवय चांगली नाही, यामुळे दात खराब होतात, असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.

मुळात विड्याचे पान खाणे ही चुकीची सवय नसून पान खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपली सुटका होते. यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, फुफ्फुसांशी संबधी आजार दूर होतात आणि अनेक लाभ मिळतात.

विड्याच्या पानांची चव ही तिखट स्वरूपाची असते. परंतु यामध्ये कॅल्शियम (Calcium), प्रोटीन (protein), खनिज (Minerals), कार्बोहायड्रेट (carbohydrate), फायबर (Fiber), व्हिटॅमिन सी (vitamin C) भरपूर प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

(conditions apply – पानामधे तंबाखू, गुटखा असे प्रकार टाकू नयेत)

पान खाण्याचे फायदे व त्यापासून मिळणारी पोषक तत्वे या विषयावर जो रिसर्च झालेला आहे तो असे दाखवतो की विड्याचे पान जर बायकोने तयार केले असेल तरच त्याच्यातली सर्व पोषक तत्वे जागृत होतात आणि त्याचा फायदा खाणाऱ्याला पूर्णपणे मिळतो.

इतर कोणी पान तयार केले असेल तर फक्त दिखाऊ फायदा होतो, म्हणजे ओठांना आणि जिभेला लाली येते एवढाच पान खाण्याचा फायदा त्यांना होतो.

म्हणून शक्यतोवर बायकोने केलेले पान खाण्यावरच भर असू द्यावा हेच रिसर्च सांगते.

एखादा महिना वर सांगितल्याप्रमाणे पान खाऊन बघा आणि अनुभव कळवा.

भाग २ —

बऱ्याच जणांचे मला यावर मेसेज आले /फोन आले, की आम्हाला हे फायदे नक्कीच मिळवायचे आहेत, पण बायकोने तयार केलेले पान रोज कसे मिळवावे, हा मोठा प्रश्न आहे, काय करता येईल?

उत्तर खूप सोपे आहे – बायकोला कायम खुश ठेवा.

बायकोला कायम खुश कसे ठेवावे याकरता – मला आनंदी राहायचे आहे, काय करू? , हा माझा लेख जरूर वाचा.

काही लेडीज नी असा प्रश्न विचारला, की विड्याच्या पानाचे फायदे मिळवण्याकरता पुरुषांनी बायकोने केलेले पान खावे असे तुम्ही लिहिले आहे. पण मग विड्याच्या पानाचे फायदे मिळवण्याकरता आम्ही बायकांनी कुणी केलेले पान खावे!

यावर उत्तर असे आहे, की कुणीही तयार केलेले पान स्त्रियांनी खाल्ले तरी त्यांना त्याचे सगळे फायदे मिळतातच. कारण पानामध्ये असलेली सर्व पोषक तत्वे जागृत करण्याची किमया देवाने जशी बायकोच्या हातात दिलेली आहे, तशीच किमया सर्व स्त्रियांच्या तोंडात पण दिलेली आहेत. बघा ना, स्त्रियांच्या आवाजात कायम गोडी असते आणि बोलण्यात कायम प्रेम असतं.

त्यामुळे स्त्रियांकरता पान कुणी केले आहे हे महत्त्वाचे नसून, त्यांनी रोज पान खाणे हेच महत्त्वाचे आहे.

टीप : आमच्या बागेत विड्याच्या पानांचा वेल आहे. त्यामुळे मी रोज बायकोनी तयार केलेले पान खातो. आणि बायको पण स्वतः केलेले पान खाते)

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वयाचा धाक आणि आदर… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ वयाचा धाक आणि आदर☆ शीला पतकी 

आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषता महाराष्ट्रात वय वाढलेल्या व्यक्तींबद्दल प्रथमपासूनच आदर दाखवला जातो वयाने वाढलेल्या माणसांचा आपण मानसन्मान ठेवतो घरात सुद्धा पूर्वी मोठ्या माणसांसमोर बसून कोणी बोलत नव्हते. मोठी माणसे घरात आली की लहान मुलं सुद्धा पटकन उठून उभे रहात. मोठ्या माणसासमोर लोळत पडणे.. अशा गोष्टी होत नव्हत्या! बोलताना एक आदर होता मोठ्या भाऊ बहिणीला मान होता आणि त्यांच्या वयाचाही आपण आदर करत होतो. यामागे घरात असणारे छान संस्कार होते!

घरातच नव्हे तर आपण ज्या ठिकाणी नोकरी करायचो ते कार्यालय, शाळा, कचेऱ्या, व्यवसाय या ठिकाणी सुद्धा आपल्यापेक्षा वरिष्ठांना मान देण्याची पद्धत होती आणि आजही आहे. सिनिऑरिटी हा सन्मानाचा मुद्दा मानला जातो. आजही आम्ही शाळेत गेलो होतो तर सर्व ज्युनिअर शिक्षक वाकून नमस्कार करतात. शिक्षकी पेशामध्ये तर विद्यार्थी अगदी रस्त्यात भेटला आणि तो त्याच्या क्षेत्रात कितीही मोठा असला तरी तो पटकन वाकून नमस्कार करतो हा अनुभव आहे. या कृतीमध्ये नमस्कार करणाऱ्यांचा मोठेपणा दिसतो. त्यांच्यामध्येआपल्या प्रति आदर भाव आहे हे लक्षात येतं. पण काही वेळा ज्यांना आपण आदर देतो, मान ठेवतो ती माणसे आपल्या वयाचा धाक दाखवायला लागतात. आमच्या पुढे येणाऱे आमचे विद्यार्थी आमच्यापेक्षा प्रचंड हुशार असतात. त्यांनी निवडलेली क्षेत्र त्या ठिकाणी ते करीत असलेले काम हे स्पृहणीय असते. त्या मानाने आमचे शिक्षण तोकडे असते. पण त्यांच्याजवळ त्यांच्या पदाचा हुशारीचा शिक्षणाचा किंचितही गर्व नसतो. आणि नमस्कार करून घेणार माणूस उगाचच त्याला काहीतरी दोन गोष्टी कधी कधी ऐकतो सुद्धा.

अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या मुलांना, आपल्या धाकट्या भावंडाना आपल्या वयाचा धाक घालतो. माझे एक ओळखीतले गृहस्थ आहेत वयाने मोठे आहेत. लोकात सन्माननीय. त्यांना अनेक ठिकाणी बोलवतात पण दरवेळी त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात. लोकांनी त्यांना येऊन घेऊन जावं आणून पोहोचवावं. त्यांची दखल घ्यावी. हे काही कारणाने काही वेळेला होत नाही मग ते घरी बोलावून कान उघडणी करतात.

सासवा सूनामध्ये नेमकं हेच घडतं सासूचा सदैव धाक आणि सातत्याने “आम्ही नाही असं केलं, आम्ही नाही तसं केलं. “… बदलत्या परिस्थितीच भान ठेवायला पाहिजे असं मला वाटते बरेच जण इतरांना टॉर्चर करत असतात आणि या धाकामुळे संबंध बिघडतात.

एका घरातला किस्सा आहे. मोठा भाऊ फारसा काही शिकलेला नाही कदाचित त्याच्यावरती जबाबदार्या असतील. धाकटी भावंडं हुशार निघाली त्यांना समाजात मान मिळाला, प्रतिष्ठा मिळाली, पैसा मिळाला, पण हा माणूस जिथे तिथे त्यांना ऐकवायचा ” गप्प काही सांगू नकोस तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी “किंवा “उगीच नाही आमचे केस पांढरे झाले शिकला म्हणजे मोठा झालास का “.. असे सदैव ऐकवत असे भावंडे बिचारी मोठा भाऊ आहे त्याचा मान ठेवण्यासाठी त्याच्या धाकात होती पण हे अनेक वेळा घडल्यावर वयाने लहान असलेला पण कर्तुत्वान असलेला धाकटा भाऊ म्हणाला, “दादा तू पावसाळे खूप पाहिले पण ते सगळे दुष्काळी होते रे त्या दुष्काळी पावसाळ्यात पाऊस पडला नाही त्यामुळे तुझ्या डोक्यात काही उगवलं नाही कुठल्या गोष्टीची पेरणी झाली नाही नव्याने काही घडलच नाही नव्या विचारांचे कुठले अंकुर फुटले नाहीत अशा नुसत्या दुष्काळी पावसाळ्याचा उपयोग काय? आणि केस पांढरे म्हणशील तर आता ते तरुण मुलांचे सुद्धा होत आहेत त्याचा वयाचा आणि अनुभवाचा संबंधच राहिला नाही”… त्यांच्यातले नातेसंबंध दुरावले गेले. कारण धाकामुळे मान देत असलेली भावंड स्वतःच्या किरकिरी मुळे एक दिवस बोलून बसली आणि मग ते टोचले मला वाटतं वयस्कर माणसाकडून ही होणारी मोठी चूक आहे.

केवळ वय वाढलं, आपले अनुभव काही वेगळे आहेत म्हणून दरवेळी आपण आदरणीय ठरतो असं असण्याचा काहीच कारण नाही. जग इतक्या झपाटाने बदलतय पिढीची भाषा बदलतीये, कौशल्य बदलताय, शिक्षण पद्धती बदलतीये,… अफाट हुशार मुलं आहेत. त्यांचे अनुभवही सुंदर आहेत ते खर तर आपण समजून घ्यायला पाहिजेत आणि दोन पिढीतील ही समज वाढली तर नातेसंबंध हे उत्तम होतील आणि मग उगाचच वयाचा आणि अनुभवाचा धाक कोणाला घालवा लागणार नाही.

काल सहज फोनवर बोलताना माझ्या मैत्रिणीने सांगितलेल्या अनुभवावर मी विचार केला आणि पटलं, *पावसाळ्यावर काही अवलंबून नसतं ते दुष्काळी असता कामा नयेत त्या अनुभवात आपल्याला काही रुजवता आलं पाहिजे काही उगवता आलं पाहिजे तर आपल आयुष्य समृद्ध आणि हिरवं होऊन जातं आणि दुसऱ्याच्या आयुष्यात आपण हिरवळ आणू शकतो* काल मला जगण्याचा छान मंत्र मिळाला. वाचा पटलं तर घ्या नाहीतर धाक दाखवा.

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १२ – यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १२ – यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर. ☆ प्रा.भारती जोगी ☆

यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर 

तीस वर्षांचा नवरा तुरुंगाच्या पलीकडे आत उभा… जो कदाचित आता पुढच्या जन्मीच भेटणार. आणि अलीकडे उभी आहे सव्वीस वर्षांची त्याची पत्नी, जिने नुकताच पुत्र वियोग साहिला आहे.

निरोप देण्यातल्या आणि घेण्यातली ताकद बघा… नवरा सांगतोयं, ” माई, स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायचा असेल तर आपल्या घराचा धूर नको कां करायला? पुन्हा या जन्मी शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप! “

… हे शब्द कानी पडताच त्या पत्नीनं पटकन जाळीतून हात आत घालून त्याच्या पायाला हात लावला, ती धूळ आपल्या मस्तकी लावली आणि म्हणाली, ” हे पाय बघून ठेवते पुढच्या जन्मी चुकायला नकोत म्हणून! “

निरोप घेणा-या या होत्या यमुनाबाई उर्फ माई सावरकर!

आणि निरोप देणारे होते विनायक सावरकर उर्फ तात्यासाहेब!

यमुनाबाई जव्हार संस्थानचे तत्कालीन दिवाण भाऊसाहेब चिपळूणकर यांच्या ज्येष्ठ कन्या. देशसेवेचे व्रत घेतलेल्या, धाडसी, कणखर आणि परिश्रमी!

सावरकर आणि चिपळूणकर घराण्यांत आधीपासूनच घरोबा होता. त्यामुळे यमुनाबाईंना सावरकरांच्या कुटुंबातील देशभक्ती विषयी, त्यांच्या क्रांतिकारक विचारांविषयी पूर्वकल्पना होतीच. विनायकांशी विवाहबद्ध होतांनाच यमुनाबाईंनी देशसेवेचे व्रत अगदी ” की घेतले न व्रत हे आम्हीं अंधतेने”… अशाच बाण्याने अंगिकारले. त्या सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबाशी अगदी एकरूप झाल्या.

पती बॅरिस्टर होण्याचं स्वप्न बघणा-या यमुनाबाईंना जेव्हा त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाल्याचे कळले तेव्हापासूनच यमुनाबाईंनी आपल्या पतीच्या समाजसुधारणेच्या कार्यात लक्ष घालायला सुरुवात केली. कारण सावरकरांच्या अर्धांगिनीला हे चांगलेच ठाऊक होते की, स्वातंत्र्याचा लढा हे त्यांचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळेच पतीला खंबीर साथ देत राहिल्या.

तात्यासाहेबांनी रचलेले पोवाडे, देशभक्ती ची पदे, रचलेल्या आर्या… हे सगळं काव्य यमुनाबाई आपल्या मोठ्या जाऊबाईंबरोबर त्यांनी स्थापन केलेल्या *आत्मनिष्ठ युवती समाज* या संस्थेच्या बैठकीत करत.

स्त्रियांसाठी सहभोजन, हळदीकुंकू समारंभ घडवून आणत. मुलांची मुंज, लग्न ही लावून देत. स्त्रियांना धीट होण्याचा उपदेश करत.

भगूर येथील पैतृक वाड्यावर जप्ती आली, घरातील स्त्रिया रस्त्यावर आल्या, हालाखीची परिस्थिती… पण तरीही ही यमुना वहायची थांबली नाही. न डगमगता आल्या संकटाला हिंमतीने तोंड देत राहिली. स्वाभिमानी यमुनाबाईंनी माहेरचा ही आधार घेतला नाही. कारण त्यांनी लग्न लागल्या क्षणापासूनच जणू निश्चयच केला होता…

घातले गळा मी मंगळसूत्र पवित्र

तेव्हाच गुंफिले त्यागाचे ही सूत्र

पदरात दडविल्या अपमानाच्या ज्वाळा

स्वातंत्र्यवीराचे कुंकू लावूनी भाळा

– – अशी ही स्वातंत्र्य लढ्यातील एक अदृश्य नायिका… जिच्या जीवनाची सुरुवातच पतीपासून वेगळं होण्याने झाली… शेकडो मैलांवर, समुद्रापलीकडे अंधा-या कोठडीत पती, पत्नी प्रकाशमय खोलीत पण अंधारलेल्या आयुष्यात एकटी! सगळं आयुष्य वेदना, संघर्ष, सामाजिक बहिष्कार… यांनी व्यापलेलं… पण ही समिधा स्वातंत्र्य होम कुंडात समर्पित होतच राहिली,

आदरणीय श्री. बाजपेयीजीं नी सावरकरांबद्दल काढलेले गौरवोद्गार… यमुनाबाईंनाही लागू व्हावेत असंच त्यांचं कर्तृत्व! त्यासुद्धा होत्या…

तेज, तप, तितीक्षा!!

… सावरकरांची सावली बनल्या, आपल्या जाऊबाईंची ही सावली बनल्या. निर्माल्य बनून समर्पित झाल्या.

… म्हणूनच म्हंटलयं… *दिव्यत्वाच्या स्पर्शानं उजळून निघालेला तेजस्वितेचा अंश म्हणजे माई! त्यागाचा अबोल आदर्श म्हणजे माई! *

– लेख क्र. १२ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ६५ आणि ६६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६५ आणि ६६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ६५ – – 

नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे ।

अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ।

धरी रे मना आदरे प्रीती रामी । 

नको वासना हेमधामी विरामी ।६५।

अर्थ :: भक्तीविना जीवन म्हणजे दीनवाणे जगणे. ज्या मुर्खांना हे कळत नाही, त्यांचे दुःख वाढतच जाते. म्हणून हे मना, आदरपूर्वक रामावर प्रेम करायला शीक. सोन्याचे घर जरी असले पण त्यात रामाचा निवास नसला तर त्याची कामना काही उपयोगाची नाही.

(भक्तिऊणे – भक्तीशिवाय, जिणे – जगणे, दूणे – दुप्पट, हेमधामी – सोन्याचे घर, विरामी – ज्यात राम नाही असे)

विवेचन :: आधीच्या श्लोकात समर्थांनी अति काम किंवा अति लोभामुळे काय होते ते सांगितले. या श्लोकामध्ये ते आपल्याला भक्ती विना जीवन म्हणजे काय हे सांगत आहेत. ज्याप्रमाणे अति काम आणि क्रोध यांच्यामुळे व्यक्तीचे जगणे लाचारीचे होते, त्याप्रमाणेच भक्तीशिवाय जीवन म्हणजे दैन्यवाणे जगणे. भक्ती म्हणजे शक्ती! ती दिसत नाही पण जो ती मनापासून करतो, त्याला ती जाणवते. सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र जरी असला तरी प्रामुख्याने तो त्याचा भक्त होता. जवळ पैसा, वैभव नव्हते पण भक्तीचे तेज होते, शक्ती होती. अनेक संतांना विपरीत परिस्थितीत दिवस कंठावे लागले. त्यांच्याजवळ सत्ता, संपत्ती, वैभव यांचा अभाव होता. पण भक्तीची दौलत अपार होती. या भक्तीचे तेज त्यांच्या मुखावर विलसत होते. कोणत्याही परिस्थितीत आनंदी आणि समाधानी राहण्याची त्यांची वृत्ती होती.

पण ज्यांची भगवंतावर श्रद्धा नाही, असे लोक भक्तीविना जगतात. अशा लोकांचा कोणीही सहज बुद्धिभेद करू शकतो. देव कुठे आहे? उगाचच त्यावर श्रद्धा ठेवून कशाला जगायचे? जीवन आहे तोपर्यंत मौजमजा करून घ्या. असे सांगणारे लोक भेटतात. आपल्याला अशा गोष्टी लवकर पटतात. त्यामुळे भगवंतावरील श्रद्धा विसर्जित करून आपण ऐहिक जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. पण ऐहिक जीवनात जेव्हा पदोपदी अपयशाचे, अपमानाचे प्रसंग येतात, संकटे येतात तेव्हा माणूस खचतो. कारण कुठेही श्रद्धा नसते. कुठलाही आधार नसतो. ‘ Faith can move mountains ‘ अशी एक इंग्रजी म्हण आहे. श्रद्धेचे सामर्थ्य अपार असते. श्रद्धा तारक आहे. प्रल्हादाची भगवंतावर श्रद्धा होती. या श्रद्धेनेच त्याला सर्व प्रसंगातून तारून नेले. परंतु श्रद्धाहीन माणसाच्या जीवनात दुःखाचा गुणाकार होतो. म्हणूनच समर्थ तळमळीने आपल्याला आदरपूर्वक रामावर श्रद्धा ठेवायला, प्रेम करायला सांगतात.

हेमधामी आणि विरामी ही दोन विशेषणे समर्थांनी फार सुंदर योजली आहेत. हेमधामी म्हणजे सोन्याचं घर, राजवाडा. विरामी म्हणजे रामाशिवाय. हल्ली काही घरांमध्ये ‘ हे घर श्री महाराजांचे आहे ‘ अशी पाटी लावलेली आढळते. म्हणजे राहणाऱ्यांची अशी श्रद्धा असते की या घरात महाराज किंवा भगवंत राहतो. हे त्याच्याच मालकीचे आहे. म्हणजे भगवंताच्या छत्रछायेत आपण राहत असतो. आणि इथे भगवंत आहे ही भावनाच किती सुंदर! असे घर म्हणजे मंदिरच! हीच कल्पना थोडी आणखी विस्तारली तर आपला देह म्हणजे सुद्धा भगवंताचे निवासस्थान असेही आपल्याला म्हणता येते. त्याच्या श्रद्धेविना असलेला देह म्हणजे फक्त हाडामांसाचे शरीर!

घर सोन्याचे असले तरी घरात राहणाऱ्यांची जर भगवंतावर श्रद्धा नसेल, तर असे घर म्हणजे चार भिंतींचा एक तुरुंग! सोन्याचे घर म्हणजे राजवाडा, वैभव! पण जिथे राम नाही त्या घराची किंमत शून्य. ज्या दगडांवर रामनाम लिहिले जाते, ते दगड सुद्धा तरतात. रामावर म्हणजे भगवंतावर श्रद्धा नसलेली व्यक्ती म्हणजे मूढ पाषाणच! या संसार सागरात ती बुडणारच हे ठरलेले आहे! महाभारत युद्धाच्या प्रसंगी अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी जातात. भगवंत म्हणतात, ” एका बाजूला निःशस्त्र असलेला मी आहे आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना. त्यातून ज्याला जे हवे ते त्याने मागून घ्यावे. ” या प्रसंगी दुर्योधन नारायणी सेना मागून घेतो आणि अर्जुन भगवंताला. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अर्जुनाची भगवंतावर दृढ श्रद्धा होती. म्हणून मला भगवंतच हवा असे त्याला ज्या तीव्रतेने वाटले तसे दुर्योधनास वाटणे शक्यच नव्हते. नारायणाशिवाय नारायणी सेना काय कामाची? म्हणून अर्जुनाला जसे तीव्रतेने वाटले की मला भगवंतच हवा तसे आपल्यालाही वाटले पाहिजे. तेव्हा हे मना, आदरपूर्वक रामरायावर प्रेम करायला शीक हेच समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद :: 

१) माझ्या जीवनात श्रद्धेचा आधार किती आहे? संकटाच्या वेळी मी खचतो की स्थिर राहतो?

२) मी ‘नारायणी सेना’ (संपत्ती, साधने) निवडतो की ‘नारायणाची ‘ निवड करतो?

३) माझे घर ‘हेमधामी’ आहे की ‘रामधामी’?

४) माझ्या आनंदाचा स्रोत बाह्य गोष्टींमध्ये आहे की अंतर्मनातील भक्तीत?

– – – – 

श्लोक क्र. ६६ – – 

नव्हे सार संसार हा घोर आहे ।

मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ।

जनीं वीष खाता पुढे सूख कैचें?

करी रे मना ध्यान या राघवाचे ।६६।

अर्थ :: हे मना, हा संसार अनित्य आणि असार आहे. घोर म्हणजे भयंकर आहे. तूच याचा जरा विचार करून सत्य शोधून काढ. एखाद्याने विष भक्षण केले तर ते वाईट परिणाम केल्यावाचून कसे राहील? तेव्हा तू भगवंताची भक्ती कर.

विवेचन :: 

या श्लोकामध्ये संसाराचा फोलपणा समर्थ आपल्याला पटवून देत आहेत. हा संसार असार आहे. विनाशी आहे. संसारात सुखी झाला आणि सुखदुःखे भोगावी लागली नाही असा मनुष्य आढळणे कठीण! त्यातून संसार घोर म्हणजे भयंकर आहे. संत या सगळ्यातून गेले आहेत. संत तुकारामांना भयंकर असा दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यात मुलेबाळे, पत्नी यांची आहुती गेली. पण संसाराचा फोलपणा त्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळेच त्यातून बाहेर काढणारी एकच गोष्ट त्यांना माहित होती. ती सारभूत गोष्ट म्हणजे विठ्ठल. त्याचाच ध्यास त्यांनी घेतला होता. सर्वच संतांनी संसाराचा हा फोलपणा लक्षात घेऊन जनसामान्यांना ईश्वरभक्तीचा उपदेश केला. आम्हाला संतांचे सांगणे समजत नाही असे नाही. पण त्यातील फोलपणा ध्यानी घेऊनही आम्ही या विषाचा अनुभव घ्यायला तयारच असतो. विष खाल्ले की ते त्याचे परिणाम दाखवणारच! विष खाल्ले आणि चांगला अनुभव आला असे कधी होऊच शकत नाही. ते त्याचा प्रभाव दाखवणारच. इथे विष म्हणजे विषयासक्ती असाही अर्थ घेता येईल.

म्हणून समर्थ या श्लोकात म्हणतात, ” हे मना, दुसऱ्यांचे सांगणे तुला पटत नसेल तर तू स्वतः अनुभव घेऊन बघ. तू स्वतः त्यातील सत्य शोधून काढ. कधी कधी माणसे दुसऱ्याच्या अनुभवाने शहाणे होत नाहीत. म्हणून स्वतःला जो अनुभव येतो, त्यावर सारासार विचार करून त्यातून तरी योग्य निष्कर्ष आपल्याला काढता आला पाहिजे. समर्थ आपल्याला संसाराचा त्याग करा असं सांगत नाहीत तर त्यातील फोलपणा ध्यानी घेऊन त्यातील आसक्ती कमी करा असेच त्यांचे सांगणे आहे. संसाराकडे साक्षीभावाने आपल्याला पाहता आले पाहिजे. पाण्यात आणि चिखलात राहूनही जसे कमळ त्यापासून अलिप्त असते तसेच आसक्तिरहित आपल्याला संसारात राहता आले पाहिजे.

एकदा सत्य लक्षात आल्यानंतर मग त्यातून बाहेर पडण्याचा उपाय करता येतो. संसार करताना आपल्या लक्षात येतं की आपल्याला समजायला लागल्यापासून आपण या प्रपंचात किती गुंतत चाललो आहोत. सगळ्यांची मने सांभाळताना आपली किती ओढाताण होते आहे! किती दिवस ही लटकी नाती जपायची? कोणाकोणाचा अहंकार जपायचा? पैसा कमवायचा तरी किती? किती पैसा मिळवला म्हणजे तो पुरे झाला असे होते? ही संपत्ती, हे घरदार मी कोणासाठी कमावतो आहे? हे सगळे तर इथेच ठेऊन जावे लागणार आहे. आपल्यापुढे दोनच पर्याय असतात. एकतर ठेऊन जा, नाहीतर देऊन जा. बरोबर घेऊन जाण्याचा पर्याय आपल्याला परमेश्वराने दिलेला नाही. बरं, ज्यांच्यासाठी हे सर्व करावं, ती पोरंबाळं तरी नंतर आपल्याला विचारतील याची काय खात्री आहे? गेल्यानंतर काही दिवस आपली तसबीर भिंतीवर लागेल. तिची पूजा होईल. काही दिवसांनी तीही निघून जाईल. हे जगच अनित्य आणि मर्त्य आहे. आधीच्या श्लोकांत समर्थांनी सांगितल्यानुसार ‘ मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. ‘ अशी परिस्थिती असते. तरी आपल्याला केवढा गर्व असतो, आपल्या पैशाचा, रूपाचा, सत्तेचा!

हा सगळा विचार कदाचित कोणाला निराशावादी वाटण्याची शक्यता आहे. पण वस्तुस्थितीकडे डोळेझाक केली तरी वस्तुस्थिती थोडीच बदलते! उलट वस्तुस्थिती समजली तर त्यातून बाहेर पडण्याचा उपाय करता येतो. यावर एकच उपाय आहे. असार संसाराला बाजूला सारून जे सार म्हणजे रामनाम आहे, तेच जीवी धरावे. धान्य पाखडण्याचे सूप आपल्याला माहिती असेल. धान्य पाखडताना ते त्यातील असार म्हणजे खडे, केरकचरा आदी बाहेर टाकून देते. आणि सार म्हणजे जे धान्य आहे ते धरून ठेवते. आपणही सुपाची भूमिका करावी. असार सर्व सोडून द्यावे आणि सार म्हणजे भगवंत त्यालाच घट्ट धरून ठेवावे. रामरायाचे ध्यान सर्व सुख देणारे आहे. ते ‘ मंगल दर्शन पूर्णविराम ‘ असे आहे. ” म्हणून हे मना, या राघवाचे ध्यान कर “असे समर्थ तळमळीने आपल्याला सांगत आहेत.

स्वसंवाद :: 

१) मी संसार करताना त्यात अडकतो आहे का, की त्याकडे साक्षीभावाने पाहतो आहे?

२) “विष” म्हणून सांगितलेली विषयासक्ती माझ्या जीवनात कोणत्या रूपात आहे?

३) मी इतरांच्या अनुभवातून शिकतो का, की स्वतः धडपडूनच शिकतो?

४) माझ्या आयुष्यात “सार” आणि “असार” यातील फरक मला स्पष्टपणे कळतो का?

५) मी रोजच्या जीवनात भगवंताच्या स्मरणासाठी वेळ काढतो का, की तो पुढे ढकलतो?

– क्रमशः श्लोक श्लोक ६५ आणि ६६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चाटण संस्कृती…” – लेखिका : योगिनी श्रीनिवास पाळंदे ☆ प्रस्तुती – शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “चाटण संस्कृती…” – लेखिका : योगिनी श्रीनिवास पाळंदे ☆ प्रस्तुती – शोभा जोशी

आमच्या घरी जेवणं झाली की त्यांनतर आमचे वडील ताट “चेक” करायचे… पान स्वच्छ लागायचं.

खाताना स्वच्छ निपटून आणि चाटून पुसून खाणे हे खाद्यसंस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून घट्ट रुजले आहेत.

माझ्या आयुष्यातला चाटण संस्कृतीतला जॉय, माझ्या लहानपणी, जॉय नामक वर्षाकाठी एकदाच मिळणाऱ्या आईसक्रीमपाशी सुरू झाला होता! त्या कपाच्या पातळ कव्हरापासून चाटणप्रवास सुरू झाला.

या प्रवासातला प्रामाणिक साथीदार म्हणजे दुधाचं पातेलं. ते घासायला टाकण्यापूर्वी अंगठ्याने त्याला खरवडून घेऊन चाटतानाचा तो समाधीक्षण अवर्णनीय असतो. दुधाच्या पातेल्याच्या इतकंच आमटीचं पातेलं चाटणं म्हणजे “सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयौ. ” दूध आणि आमटी याला समान न्याय देण्याइतकं गीतातत्त्व अंगात मुरणं ही या चाटणसंस्कृतीची देन आहे.

रात्रीचं जेवण झालेलं असतं, शेवग्याच्या शेंगांची ओलंखोबरं आणि चिंचगुळ घालून केलेली अमृततुल्य आमटी संपलेली असते पण त्या रिकाम्या पातेल्याच्या आतल्या भिंतींना जे अमृतकण चिकटलेले असतात, ते बोटाने निपटून चाटून साफ करताना जो काही निर्मळ आनंद मिळतो, तो ते पातेलं चाटणाऱ्यानेच अनुभवावा.

तुम्ही काजू शेंगदाणे घालून मस्त आटवलेली अळूची भाजी (पुण्यात फदफदं म्हणतात) खाल्लेली असेल पण पंगतीच्या शेवटी उरलेली भाजी, वाटीत ट्रान्सफर केल्यानंतर पातेल्याच्या आत चिकटलेली अळूची-साय कधी खाल्ली आहे? बेफाट लागते!

माझी नणंद गव्हल्याच्या खिरीचं पातेलं, खीर संपल्यानंतर मागून घेते आणि रिकाम्या पातेल्याला स्वच्छ करते.

सासूबाई तर गोडाचा शिरा संपल्यानंतर गार झालेली कढई घेऊन त्यात इवलं दूध टाकून ठेवायच्या आणि पातेले निपटून घ्यायच्या.

पिठल्याच्या कढईच्या तळाशी जमलेली खमंग खरवड बेसुमार चविष्ट लागते. आणि, ती मन लावून खरवडणारं ध्यान, किती सुंदर दिसतं ते साक्षात तुकोबाच सांगू शकतील.

या चाटण संस्कृतीला समजूतदारपणाचे आणि सिव्हिक सेन्सचे अनेक पदर आहेत.

ताट अथवा पातेलं इतकं स्वच्छ निपटावं की त्यातले अन्नकण पूर्णत्वाने संपावे, ते घासणाऱ्या बाईला त्याची घाण वाटू नये आणि बरबटलेलं ताट घासताना व्यय होणाऱ्या पाण्याचीही केवढीतरी बचत व्हावी.

आमचा हा चाटून पुसून खाण्याचा अलिखित नियम हा फक्त पातेलं आणि कढईपुरता मर्यादित नव्हता तर तो आंब्याच्या फोडी आणि कोयी खातानाही लागू व्हायचा.

खाऊन माजावं, टाकून माजू नये, भूखी तो सुखी अशा अनेक म्हणी आणि वाक्प्रचारामध्ये लहानपण घालवलेल्या आम्हा सर्वांनाच, अन्न टाकण्याचा मोठाच तिटकारा. एकतर आम्ही जास्त अन्न शिजवत नाही आणि समजा जास्त शिजून उराउरी झालीच तर ती टाकून कधीच देत नाही.

आमटीची थालिपीठं, फोडणीचा भात, किंवा फोडणीची पोळी असेल किंवा, कोबीच्या उरलेल्या भाजीचे पराठे किंवा कोथिंबीर माठ पालक यांच्या कोवळ्या देठाचं बनवलेलं सुप असेल.

तुपाच्या बेरीमध्ये कणिक भिजवण्यापासून ते त्याचा गूळ घालून केलेल्या वड्यापर्यंतचा कायापालट असेल. अशी टाकाऊतून टिकाऊची संस्कृती किंवा कचऱ्यातून पुनर्निर्माणाची कला जोपासणाऱ्या मला, या दिवाळीत मोठाच धक्का बसला.

घरी केलेला ताजा चिवडा आणि बेसन लाडू एका ओळखीच्या बाईने लेकाला खायला दिले, त्यानेही “ममी यम्मी”करत खाल्ले. (मम्मी आणि यम्मी हे शब्द ऐकल्यावर का कुणास ठाऊक एक कानफटात मारावीशी वाटते…)

असो!

खरा कानफटात मारायचा प्रसंग तेव्हा उद्भवला जेव्हा मी त्याची ताटली घासायला टाकली. मी पाहाते तो त्यात चिवड्यातून वेचलेले दाणे आणि लाडवातून उपटलेले बेदाणे त्याने चक्क टाकून दिलेले होते. त्याला विचारल्यावर ”हल्ली मला नाही आवडत तो कचरा“ इतकं सरळ सोपं उत्तर आलं.

बारकाईने पाहिल्यावर अशा टाकणं-न खाताना, गूळ पसरलेला भाग सोडून उरलेल्या निर्गुळपोळीच्या चंद्रकोरी टाकणाऱ्यांचीही एक जमात असते.

पावाच्या कडा टाकून मधला मऊभाग खाणारे महाभागही असतातच की.

मसालादूध म्हणजे माझा जीव की प्राण!!

पण त्यात जीव ओतून घातलेलं केशर आणि सुकामेव्याचं वैभव, तळाशी जाऊन बसतं ही एक समस्याच आहे. आणि हल्लीच्या पिढीच्या माजखोर पाईकांना ते चाटायला आवडत नाही आणि टाकण्यात काही गैरही वाटत नाही.

मी मसाला दुधाच्या ग्लासच्या तळाशी चिकटलेली सुकामेवापूड बोटाने चाटून न खाणाऱ्याला कधीच क्षमा करू शकत नाही.

माझ्या एका मैत्रिणीकडे भरली वांगी प्रचंड आवडतात. ती करतेच अप्रतिम. पण तिची मुलं वांग्याला चिकटलेला मसाला खाऊन वांगी चक्क टाकून देतात. मी तिला सुचवणार आहे की एक दिवस मसाल्याचा गोळाच दे डब्यात भाजी म्हणून. कशाला ती वांगी फुकट घालवायची!

अशा टाकणं-संस्कृती पाईकांना शनिवारवाड्यावर जाहीर फटके अशा शिक्षा ठोठावल्या पाहिजेत.

बरं ही टाकणं- मंडळी स्वतः चाटून पुसून घेत नाहीतच पण इतरांनी कुणी चाटायला घेतलं की त्यांना एम्बॅरॅसिंग वाटतं (टाकताना बरं नाही वाटत एम्बॅरॅसिंग).

खूप जणांना सवय असते, ते पूर्ण चहा पीत नाहीत, तळाशी उरवतात… म्हणजे आम्ही वेडेखुळे म्हणून गाळून देतो की काय याना चहा!

काहींना चहावर जमलेली साय त्याच कपाच्या कडांवर फाशी दिल्यासारखी टांगून ठेवण्याची सवय असते. जी बघताना घाण वाटते.

पुन्हा तो कप साफ करणाऱ्याचा विचार केला आहे का कधी?

ह्या मुलांनी खाल्लेल्या हापूसच्या फोडी बघितल्या आहेत? विलक्षण वेदनादायी आहे त्या खाल्लेल्या फोडी टाकणं! शरीराचा नक्की कुठला अवयव वापरतात फोडी खाताना देवच जाणे. दात नामक अवयव तोंडात असताना, आंब्याच्या फोडीला इतका गर शिल्लक राहूच कसा शकतो? आमच्यावेळी आम्ही आंब्याच्या कापट्या खाताना, जबड्यातला सर्वात तीक्ष्ण दात वापरून त्याचं अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक करायचो, आणि त्यानंतर बाठ कुणी चाखायची यावरून युद्धं व्हायची ती वेगळीच.

हल्लीच्या फूड फूड वगैरे चॅनेलवर येणारे समस्त कपूर-खन्ना लोकं, पदार्थ करुन झाल्यावर ज्या बेपर्वाईने ती पातेली आणि कढया सिंकमध्ये टाकतात, ते पाहून अंगावर काटा येतो.

खरवडून घेणे, निपटून घेणे, चाटून घेणे, पुसून घेणे, विसळून घेणे या स्वैपाकघरातल्या पाच क्रियापदांची ओळख हल्लीच्या पिढीला करून द्यावी वाटते.

आतेसासूबाईंकडे एकदा गेले होते. त्या गुळाच्या पोळ्यांसाठी गूळ किसत होत्या. किसण्याचे काम झाल्यावर त्यांनी किसणीखाली स्टीलचे ताट ठेवून त्या किसणीवर पाणी ओतले आणि म्हणाल्या दुपारपर्यंत हा किसणीला चिकटलेला गूळ विरघळून त्याचं पाणी होईल, मग मी ते आमटीसाठी वापरीन.

मला त्यांच्या काटकसरीपणाचं आणि कल्पकतेचंही कौतुक वाटलं. आता काही लोकांना या कृतीला “किती तो कर्मदरिद्रीपणा” असं म्हणावंसं वाटेलही पण उलटपक्षी मीच असं म्हणणाऱ्यांना विचारदरिद्री म्हणेन.

बटाटेवडे अथवा भजी करून झाल्यावर परातीला चिकटलेला पिठाचा, ओवा-मीठ- तिखट – कोथिंबीर-कांदा युक्त चविष्ट ऐवज, सिंकस्वाहा करण्याऐवजी, विसळून आमटीत ढकलावा, त्या आमटीची चव अप्रतिम लागते.

आणि ती आमटी यदाकदाचित उरलीच तर दुसऱ्यादिवशी थालीपीठार्पण करावी. काय जबरदस्त होतं त्या थालीपीठाचं. मुळात भाजणीचं थालीपीठ चविष्टच असतं पण उरलेल्या आमटीला पोटात आश्रय दिल्यावर थालीपीठ जणू कातच टाकतं.

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्मच्याही पलीकडे नेणारी एक ऋणजाण भावना आहे

ती, गुडघा गुडघा चिखलात भात लावणी करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल असेल. उन्हातान्हात राबणाऱ्या मजुरांविषयी असेल.

पेरणी, लावणी, छाटणी, कापणी करणाऱ्या घट्टे पडलेल्या हातांबद्दल असेल, त्याहीपुढे, रात्रीबेरात्री वाहने चालवून शेतातील धान्य आपल्यापर्यंत वाहून आणणाऱ्या वाहन चालकांबद्दल असेल, ज्या रस्त्यांवरून ती वाहने धावतात तो तयार करणाऱ्या मजूरांबद्दल असेल.

शेतातून सुरू होणारी ही ऋण-जाण-साखळी, वाटेतल्या अनेक कष्टकऱ्यांपासून ती अगदी पोळ्यावाल्या काकूंपर्यंत नव्हे त्याहीपुढे भांडी घासणाऱ्या सखूपर्यंत येते. मला टाकलेल्या अन्नात हे सगळे चेहेरे दिसतात.

काही वर्षांपूर्वी ज्ञान प्रबोधिनी संस्थेत एका शिबिरात सहभागी झाले होते. त्यांच्या कॅन्टीनमध्ये गेले असता, तिथे मनाला भिडणारा एक श्लोक-संदेश भिंतीवर लावला होता…

वदनी कवळ घेता, नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते, आपुल्या बांधवांचे

कृषिवल कृषी करुनि, अन्न ते निर्मितात

कृषिवल कृषी कर्मी, राबती दिन – रात

स्मरण करून त्यांचे, अन्न सेवा खुशाल

उदर भरण आहे, चित्त होण्या विशाल.

जुनं-नवं, आमची पिढी-तुमची पिढी, यापलीकडे जाऊन, विविध मतभेद टाळून, निदान अन्न-ऋण-स्मरण या विषयावर एकमत व्हायलाच हवे, नाही का?

 

लेखिका : योगिनी श्रीनिवास पाळंदे

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “समाजातील डावे–उजवे*” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “समाजातील डावे–उजवे☆ श्री जगदीश काबरे ☆

“पुरोगामी = डावी विचारसरणी” आणि “प्रतिगामी = उजवी विचारसरणी” अशी मांडणी ऐतिहासिक प्रक्रियेतून तयार झालेली आहे. याचा उगम समजून घेतला तर हा प्रश्न अधिक स्पष्ट होईल. या संज्ञांचा उगम १७८९ मध्ये फ्रेंच क्रांतीनंतर जेव्हा नवीन संसद बसली, तेव्हा राजसत्ता आणि परंपरागत विशेषाधिकार (जमीनदार, धर्मगुरू) टिकवण्याच्या बाजूचे सदस्य अध्यक्षांच्या उजव्या बाजूला बसत असत, तर बदल, समता आणि लोकशाही यांचा आग्रह धरणारे सदस्य डाव्या बाजूला बसत असत. इथून ‘डावे’ आणि ‘उजवे’ ही राजकीय बिरूदे जन्मास आली. म्हणजेच ही विभागणी कोणी एका व्यक्तीने ठरवली नाही, तर ती प्रत्यक्ष राजकीय परिस्थितीतून नैसर्गिकरीत्या विकसित झाली. यानंतर या शब्दांना विचारसरणीचा अर्थ मिळत गेला. १९व्या आणि २०व्या शतकात समाजवाद, साम्यवाद, सेक्युलरिझम यांसारख्या विचारसरणी डाव्या बाजूशी जोडल्या गेल्या, कारण त्या समानता, कामगार हक्क, संपत्तीचे पुनर्वाटप यांचा आग्रह धरणाऱ्या आहेत. दुसरीकडे सनातनीवृत्ती, कर्मकांड, धार्मिक स्थितीशीलता आणि भांडवलशाही यांसारख्या संकल्पना उजव्या बाजूशी जोडल्या गेल्या, कारण त्या परंपरा, खाजगी मालकी आणि बाजारव्यवस्थेला महत्त्व देणाऱ्या आहेत.

डाव्या विचारसरणीचा गाभा समाजातील असमानता कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. या विचारानुसार, समाजातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विषमता ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे आणि ती सुधारता येते. त्यामुळे समाजवाद आणि साम्यवाद यांसारख्या विचारसरणी डाव्या गटात मोडतात. याउलट उजवी विचारसरणी काही प्रमाणात असमानता ही नैसर्गिक किंवा अपरिहार्य असल्याचे मानते आणि समाजात स्थैर्य राखण्यासाठी परंपरा, सांस्कृतिक मूल्ये आणि संस्थांचे महत्त्व अधोरेखित करते. त्यामुळे धार्मिक स्थितीशीलता आणि भांडवलशाही या विचारसरणी उजव्या गटाशी जोडल्या गेल्या. राज्याची भूमिका हा डावे-उजवे यांच्यातील आणखी एक महत्त्वाचा फरक आहे. डाव्या विचारसरणीनुसार राज्याने सक्रिय हस्तक्षेप करून सामाजिक न्याय साध्य करावा, कल्याणकारी योजना राबवाव्यात आणि दुर्बल घटकांचे संरक्षण करावे, असे मानले जाते. याउलट उजव्या विचारसरणीत राज्याची भूमिका मर्यादित असावी, बाजारव्यवस्था आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांना प्राधान्य द्यावे, असे मानले जाते. मात्र प्रत्यक्षात बहुतांश देशांमध्ये या दोन्ही टोकांच्या मधला मार्ग स्वीकारला जातो, जिथे काही क्षेत्रांत राज्य हस्तक्षेप करते आणि काही क्षेत्रांत बाजाराला स्वातंत्र्य दिले जाते.

आधुनिक काळात डावे-उजवे ही विभागणी अधिक गुंतागुंतीची झाली आहे, कारण ती फक्त आर्थिक प्रश्नांपुरती मर्यादित राहिलेली नाही. सांस्कृतिक आणि सामाजिक मुद्द्यांवरही ही विभागणी दिसते. डावी विचारसरणी सामान्यतः वैयक्तिक स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, लैंगिक समानता आणि विविधतेचा स्वीकार यावर भर देते, तर उजवी विचारसरणी राष्ट्रवाद, पारंपरिक मूल्ये आणि सांस्कृतिक सातत्य यावर भर देते. त्यामुळे एखादा पक्ष आर्थिकदृष्ट्या उजवा असला तरी सामाजिकदृष्ट्या काही प्रमाणात डावा असू शकतो, किंवा उलटही होऊ शकते. यामुळेच “डावे-उजवे” ही विभागणी एकाच सरळ रेषेत असत नाही, तर ती अनेक स्तरांवर समजून घ्यावी लागते.

इथे पुरोगामी आणि प्रतिगामी या शब्दांचा अर्थही लक्षात घ्यायला हवा. पुरोगामी म्हणजे समाजात बदल घडवून आणणारे, समानता वाढवणारे, अन्यायकारक रचना मोडून काढणारे विचार. प्रतिगामी म्हणजे विद्यमान व्यवस्था टिकवण्याचा किंवा पूर्वीच्या स्थितीकडे परत जाण्याचा आग्रह धरणारे विचार. ऐतिहासिकदृष्ट्या, अनेक वेळा डाव्या विचारसरणीने सामाजिक सुधारणा (उदा. कामगार कायदे, स्त्री-अधिकार, जातीय समानता) पुढे नेल्या, त्यामुळे डावे = पुरोगामी अशी प्रतिमा तयार झाली. त्याचप्रमाणे, उजव्या विचारसरणीने अनेकदा परंपरा जपण्यावर भर दिला, त्यामुळे उजवे = प्रतिगामी अशी प्रतिमा निर्माण झाली. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायला हवा की, एखाद्या काळात जे विचार पुरोगामी होते ते पुढच्या काळात सामान्य होतात आणि मग त्याच गोष्टी टिकवण्याची भूमिका उजवी ठरू शकते. तसेच, काही वेळा उजव्या विचारसरणीतही प्रगतीशील बदल दिसू शकतात (उदा. आर्थिक सुधारणा), आणि काही वेळा डाव्या विचारसरणीतही कट्टरता किंवा बदलांना विरोध दिसू शकतो.

भारतीय संस्कृतीत डावा हात = अशुद्ध ही संकल्पना रूढ आहे. पारंपरिक हिंदू सामाजिक आचारांमध्ये, विशेषतः चातुर्वर्ण्य/जातिव्यवस्थेत, उजव्या हाताला शुद्ध आणि डाव्या हाताला अशुद्ध मानण्याची सवय होती आणि आहेही. उदा. जेवताना उजवा हात वापरणे, शुचिर्भूत होण्याच्या कामांसाठी डावा हात वापरणे. ही विभागणी शारीरिक स्वच्छतेच्या व्यवहारातून आली आणि नंतर तिला धार्मिक-सांस्कृतिक वैधता मिळाली. जेवणाच्या ताटात सुद्धा पदार्थ वाढताना डावे-उजवे केले जाते; जसे की डाव्या बाजूला तोंडी लावण्यासाठी कमी खाल्ले जाणारे पदार्थ (चटणी, लोणचे, मीठ, पापड, इत्यादी) तर उजव्या बाजूला शरीराला जास्त पोषक असलेले खाल्ले जाणारे पदार्थ ( भात, भाजी, डाळ, आमटी, चपाती, भाकारी इत्यादी) वाढले जातात.  यामुळे उजवा = चांगला/पवित्र आणि डावा = कमी/अशुद्ध असा सांस्कृतिक अर्थ तयार झाला.

भारतीय संदर्भात ही विभागणी आणखी गुंतागुंतीची बनते, कारण येथे डावे-उजवे हे फक्त आर्थिक धोरणांवर आधारित नसून जातिव्यवस्था, धर्म, राष्ट्रवाद आणि सामाजिक न्याय यांसारख्या घटकांशीही जोडलेले आहेत. त्यामुळे डावे आणि उजवे यांची व्याख्या व्यक्तीनुसार आणि राजकीय दृष्टिकोनानुसार बदलू शकते. काहींसाठी सामाजिक समता आणि धर्मनिरपेक्षता हे पुरोगामीपणाचे मापदंड असतात, तर काहींसाठी सांस्कृतिक ओळख आणि परंपरेचे संरक्षण हे प्रतिगामी मापदंड महत्त्वाचे असतात. म्हणून येथे पुरोगामी हा शब्द अनेकदा सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्याशी जोडला जातो, तर प्रतिगामी हा शब्द जातिव्यवस्था, धार्मिक कट्टरता, किंवा असमानता टिकवण्याशी जोडला जातो. पण भारतात डावे-उजवे हे फक्त आर्थिक किंवा राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक, धार्मिक आणि जातीय संदर्भांनुसारही ठरतात. त्यामुळे इथेही डावे = पुरोगामी, उजवे = प्रतिगामी ही रेषा नेहमीच स्पष्ट असतेच असे नाही. पण इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा लागतो. उजवा–डावा सांस्कृतिक अर्थाचा आणि आधुनिक राजकीय उजवा–डावा या संकल्पनांचा उगम वेगवेगळा आहे. युरोपमध्ये फ्रेंच राज्यक्रांतीनंतर तयार झालेली राजकीय संज्ञा आणि भारतातील धार्मिक-सामाजिक प्रतीकं वापरून तयार झालेली संज्ञा या स्वतंत्र परंपरा आहेत. नंतरच्या काळात, जेव्हा डावी विचारसरणी (उदा. समाजवाद आणि साम्यवाद ) भारतात आली, तेव्हा काही लोकांनी डावा या शब्दाला आधीपासून असलेल्या सांस्कृतिक नकारात्मक अर्थाशी जोडून त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच, ब्राह्मणांनी किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्थेने पुरोगामी विचारांना कमी लेखण्यासाठी ‘डावी विचारसरणी’ हा तुच्छता दर्शक शब्द वापरायला सुरुवात केला. भारतीय समाजात आधीपासून असलेल्या डावा = अशुद्ध/कमी या सांस्कृतिक प्रतिमेचा उपयोग आजचे हिंदुत्ववादी राजकीय टीकेसाठी सध्या पुरोगाम्यांना तुच्छ लेखण्यासाठी वापरतात.

खरे पाहता, कोणतीही विचारसरणी—डावी किंवा उजवी—लोकशाहीसाठी तेव्हाच धोकादायक ठरते जेव्हा ती सत्तेवर आल्यावर संस्थात्मक आणि व्यवस्थात्मक संतुलन कमकुवत करत विरोधी मतांना दडपते. म्हणून डावे आणि उजवे या संज्ञा ऐतिहासिक घडामोडी, राजकीय संघर्ष आणि सामाजिक बदल यांच्या प्रक्रियेतून तयार झाल्या आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मात्र आजच्या काळात या शब्दांचा वापर अनेकदा भावनिक किंवा राजकीय आरोप-प्रत्यारोपासाठी केला जातो. यामुळे त्यांचा मूळ अर्थ धूसर होतो. म्हणूनच, कोणतीही विचारसरणी डावी म्हणजे पुरोगामी आहे की उजवी म्हणजे प्रतिगामी आहे, हे ठरवताना त्या विशिष्ट काळाचा, समाजाचा आणि त्या विचारांच्या परिणामांचा विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरते. थोडक्यात, डावी आणि उजवी विचारसरणी या दोन परस्परविरोधी छावण्या नसून त्या समाजातील वेगवेगळ्या मूल्यप्रणालींचे प्रतिनिधित्व करतात. एकीकडे समानता आणि बदल यांचा आग्रह असतो, तर दुसरीकडे स्थैर्य आणि परंपरा यांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. प्रत्यक्षात कोणताही समाज या दोन्ही प्रवाहांच्या संतुलनातूनच पुढे जातो, आणि त्यामुळे या संज्ञांकडे एकाच वेळी ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय संदर्भात पाहणे अधिक आवश्यक ठरते.

© श्री जगदीश काबरे

(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail.com मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”शब्दांचे तापमान…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “शब्दांचे तापमान… ☆ संध्या बेडेकर ☆

“शब्दांचेही तापमान असते. शब्द मनाला स्पर्श करतात. ”

काल मी व‌ माझी मैत्रीण छाया खूप दिवसांनी भेटलो. छान गप्पा रंगल्या होत्या आमच्या. जवळ जवळ सर्व विषय झाले होते. अगदी देशातील राजकारणा पासून ते घराच्या राजकारणापर्यंत. मनसोक्त गप्पा व त्याच बरोबर दोन दा चहा, कांदा भजी, पावसाळी हवा, मज्जा आली. एकुण आम्ही दोघी ‘recharge ‘ झालो. व आता मला माझे घर व‌ घरातली काम दिसत होती.

मी निघणारच तेवढ्यात बेल वाजली. छाया ने दरवाजा उघडला. एक स्मार्ट दिसणारी छान, ऊंच स्त्री कोणाचा तरी पत्ता विचारत होती.

ती म्हणाली,  इथे मेधा कुलकर्णी कुठे राहतात तुम्हाला माहिती आहे का??

कोण मेधा कुलकर्णी??? मला नाही माहित. असं छाया ने उत्तर दिले.

तेव्हा तिने मेधा चे वर्णन केले म्हणाली,

अहो, ती अशी काळी, लठ्ठ चष्मा लावते. बुटकी आहे‌. बघा. असं तिने मेधा चे वर्णन केले व हावभाव पण तसेच केले.

मला थोड खटकलच. थोडा रागही आला.

आम्हाला मेधा कोण??? माहिती नाही. तिच्या शी कधी आमचा सम्बन्ध येईल की नाही हे ही माहित नाही. मेधा कोणाची मुलगी,? कोणाची बायको? काहीच माहीत नाही. पण तिचे असे वर्णन ऐकून, मनात मेधा ची एक इमेज मात्र नक्की तयार झाली. उद्या काही कारणाने जर हिचे नाव पुन्हा कोणी घेतले तर माझ्या समोर तिचे हेच चित्र उभे राहणार.

कदाचित मेधा असेलही तशीच पण तिची अजून दुसरी ओळख नसेलच का?????

तीचा ‘flat no??? वगैरे. किंवा हेच वर्णन दुसऱ्या शब्दांत ही होऊ शकलं असतं ना Medium height, सावळीशी, चष्मा लावते. (सावळेपणाची डिग्री कमी जास्त होऊ शकते.) असे मेधा चे वर्णन ऐकले असते, तर मनात एक वेगळीच इमेज तयार झाली असती.

ही स्त्री मला आधुनिक वाटली. ‘ well dressed ‘ तर होतीच पण सुसंस्कृत होती का????

त्या स्त्री च्या अशा बोलण्याचे खूप अर्थ निघतात. तिच्याच व्यक्तिमत्त्वाची पुसटशी कल्पनाही येते. स्वतः सुंदर असल्याचा अहंकार? अभिमान? की दुसऱ्या ला कमी लेखणे. उगीच दुसऱ्या ची इमेज खराब करणे. अपमान करणे. की काही ही विचार न करता बोलणे, जे मनात येईल ते.

जर तुम्ही सुंदर अहात तर ती देवाची तुमच्या वर थोडी extra कृपाच म्हणायची. त्यात तुमचे असे विशेष कर्तुत्व काय????

काही लोकांना दुसर्याना कमी पाहण्यात, त्यांच्या चूका काढण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. समाधान मिळते. त्यांचे नेहमी अर्ध्या रिकाम्या ग्लास कडेच लक्ष जाते. तुम्ही दिसायला छान सुंदर उंच म्हणजे सर्वगुणसंपन्न नाही. व व दुसर्याच्या रंग रूपावर बोलण्याचे सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलेलेही नाही.

किंवा असेही असू शकते, की कधी तरी मेधा ने या बाईचा अपमान केला असावा व हे त्याचे प्रत्युत्तर असेल. पण ते तिसऱ्या व्यक्ती समोर कशाला?????

पण काही ही कारण असू दे, हे असे बोलणे चूकच आहे. शब्दांचे पण तापमान असते. शब्द मनाला स्पर्श करतात. तुम्ही दुसऱ्या चा अपमान केला, तर त्यांचा अपमान होतो की नाही माहीत नाही. पण तुम्ही तुमचा मान मात्र नक्की कमी करता.

खूप लोकांची सवय असते ते चार चोघात मुद्दाम असे विषय काढतात व एखाद्याला टार्गेट करतात. त्याच्या उपस्थितीत किंवा कधी त्याच्या अनुपस्थितीत.

अपमान कधी कोणी विसरत नाही. जेव्हा मौका मिळतो. तेव्हा तो व्याजासकट परत करतात. हे नक्की, आता अशी देवमाणसे दिसत नाही, जे एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करतील. उलट चार मारतील.

आपण स्वतः ला सुशिक्षित, आधुनिक समजतो मग व्यवस्थित बोलणे हे त्यात येत नाही का? आपल्याला शब्दांची मांडणी बरोबर करणे जमत नाही का? बोलताना विचार करत नाही का? समोरचा उत्तर देत नाही. म्हणजे त्याला बोलता येत नाही. असे नाही. तो सभ्य आहे हे कारण आहे त्याचे

समाजात मिळुन मिसळून राहण्यासाठी या बेसिक गोष्टी आहेत. याकरिता उच्च शिक्षण, आधुनिक राहणी, हे नसले तरी चालेल. थोडे ‘common sense ‘हवे बस, पण अडचण येथेच आहे ना ‘common sense is most uncommon ‘.

तुमची भाषा अशुध्द असू शकते. उच्चार चूक असू शकतात. आवाज खूप मधुर नाही, हे पण मान्य आहे. पण भाषेतला भाव छान ठेवणे, हे तर आपल्याच हातात असते ना.

चार पुस्तके कमी वाचली तरी चालेल. पण कोणाच्या कमी वर वार करणे चूकच आहे.  खरं तर, लक्षात ठेवाव

शब्दांचा तोल सावरला की बोलांना आपोआप मोल येत.

माणसाला मोजायचा मापदंड, त्याची ओळख, म्हणजे फक्त त्याचे रुप रंग हेच आहे का? कर्तुत्व, स्वभाव इतर गुणही महत्वाचे असतातच.

प्रथम दर्शनी तुमचे‌ रंग रूपच जरी दिसत असले, तरी पाठोपाठच तुमचे बोलणे पण असतेच ना.

‘Be positive ‘ आपण म्हणतो. मी किती ‘Positive ‘ आहे? अस स्वतः चे गुणगान करणारे तर खूप भेटतात. रोज सकाळी what’s app वर येणारे सुविचार ही खूप वाचतो. अशा मेसेजेस ना like करतो thumb’s up पण करतो..

म्हणतात ना

 सिर्फ़ सुविचारों को पढ़कर कोई परिवर्तन नहींआता,

 विचारों पर चलकर ही परिवर्तन आता है ।

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares