☆ तुका म्हणे – मनोमय पूजा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
मनोमय पूजा/
हेच प्रिये केशिराजा //१//
*
घेतो कल्पनेचे भोग /
न मानतील बाह्यरंग // २//
*
अंतरीचे जाणे /
आदी वर्तमान खुणे//३//
*
तुका म्हणे कुडे /
कोठे सारे त्याच्यापुढे//४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
तुम्ही मनापासून केलेली परमेश्वराची पूजा परमेश्वर चरणीच अर्पण करा. कारण परमेश्वर बाह्यरंगाला भुलत नाही तर तो तुम्ही अंरात्म्यातूनकेलेले सोपस्कार जाणून घेतो. तुमच्या मनात आणि बाहेर जे काय आहे ते त्याला सर्वकाही माहिती असते. मग त्याच्या पुढे जाणे आपल्याला कधीतरी शक्य होईल का?
तुमच्याकडे डामडौल, आणि डोळेदिपवणारा बाह्य देखावा नसला तरी तुम्ही देवाची करूणा भाका. त्याची मनोभावे पूजा करा. तुमच्या मनात काय आहे तुम्हाला काय हवे आहे ते तो ओळखतो. तुम्हाला काय द्यायचे हे ही तोच ठरवतो. म्हणून तर त्याला सर्वेश्वर म्हणतात. त्याच्या पुढे जाणे आपल्याला कधीतरी शक्य असेल का?
दासू वैद्य हे विसाव्या शतकाच्या नवव्या दशकापासून लेखन करणारे आघाडीचे कवी, गीतकार, नाटककार. त्यांनी बाल व कुमार वाङ्मयात देखील मोलाची भर घातली आहे. त्यांच्या एकांकिका, नभोनाट्य, ललित लेख इत्यादी विपुल साहित्य असून ते टी व्ही, चित्रपट यासाठी गीतलेखन देखिल करतात. त्यांच्या बाल कवितांचं वाचन विजय तेंडुलकरांसारख्या चिकित्सक साहित्यिकाने केले आहे.
ते आपल्या आजूबाजूच्या जीवनात रमतात व त्या जीवनाशी निगडित विषयांवर साहित्य निर्मिती करतात. त्यांची कविता जगण्याचे वास्तव सांगते, स्वप्नरंजनात रमत नाही. ती तत्वज्ञान सांगत नाही तर बहुसंख्यांच्या जगण्याचं वास्तव सांगते. कवी म्हणून समकालाकडे बघण्याची त्यांची दृष्टी प्रस्तुत कवितेत स्पष्टपणे जाणवते. सद्यस्थितीचं सखोल आकलन व ते व्यक्त करून समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज ज्या साहित्यिकांना कळते तेच समाजाचं देणं फेडू शकतात. दासू वैद्य त्यातलेच एक व प्रस्तुत कविता अशातलीच एक.
सदर कवितेत कवी आपल्या दाराशी येऊन ठेपलेल्या भयावह भविष्याबाबत आपल्याला जागरूक करतात. ही कविता, हा विचार, समाजातल्या विशेष करून मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित, एक किंवा दोनच मुले असणारे, आपल्या मुलांचे सर्व लाड पुरवणारे, मुलांना सर्व अत्याधुनिक व महागडी खेळणी आणून देणारे पालक यांच्यापर्यंत पोहोचवण्याची निकड दासू सरांना जाणवते म्हणून ते अशा कविता लिहितात.
आपण वेळीच जागे झालो नाही तर पाश्चात्य देशातील शाळांत घडणाऱ्या दुर्दैवी घटना आपल्याकडेही लवकरच पहायला मिळतील. अल्पवयीन मुले गंमत म्हणून किंवा किरकोळ कारणावरून घरातल्या वडिलधाऱ्यांचे पिस्तुल वापरायला मागेपुढे बघणार नाहीत.
कवी म्हणतात पूर्वी जत्रा भरायच्या, तिथं मुलं आण्या, दोन आण्याला मिळणारी पुंग्यांसारखी खेळणी घ्यायची पण आता मुलांना धडाडणारी, खोट्या का असेनात पण सटासट गोळ्या झाडणारी मशीनगन आवडते, त्यांना युद्ध युद्ध खेळायला आवडतं. उशांचाअडसर बनवून, त्यामागून मुलाने जेव्हा वडिलांवर बंदूक रोखली तेव्हा त्याच्या डोळ्यातील हिंस्र भाव बघून कवीचे काळीज चरकलं व त्यातूनच जन्मली ही कविता.
पाश्चात्य देशांत अधुनमधून अल्पवयीन मुलांकडून अशी हिंसा घडत असते पण आपण त्यातून कांहीच बोध घेणार नाही का? खेळण्यांचे निर्माते पैसे कमवण्यासाठी कसलीही खेळणी बनवतील पण आपण कसलाही विचार न करता ती खेळणी मुलांना आणून देणार आहोत का? सिनेमातील हिंसा बघून बघून आपणही हिंसेला निर्ढावलो आहोत का? लहान मुलांच्या निष्पाप मनात आपणच हिंसेची बीजं तर रोवत नाही ना? या सर्व प्रश्नांची उत्तरे दासू सर या कविते द्वारे समाजाकडे मागत आहेत.