हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य #118 – लघुकथा – “सेवा” ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य”  के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं।  आज प्रस्तुत है एक ज्ञानवर्धक एवं विचारणीय लघुकथा – “सेवा।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 118 ☆

☆ लघुकथा – सेवा ☆ 

दो घंटे आराम करने के बाद डॉक्टर साहिबा को याद आया, ” चलो ! उस प्रसूता को देख लेते हैं जिसे आपरेशन द्वारा बच्चा पैदा होगा, हमने उसे कहा था,” कहते हुए नर्स के साथ प्रसव वार्ड की ओर चल दी. वहां जा कर देखा तो प्रसू​ता के पास में बच्चा किलकारी मार कर रो रहा था तथा दुखी परिवार हर्ष से उल्लासित दिखाई दे रहा था.

” अरे ! यह क्या हुआ ? इस का बच्चा तो पेट में उलझा हुआ था ?”

इस पर प्रसूता की सास ने हाथ जोड़ कर कहा, ” भला हो उस मैडमजी का जो दर्द से तड़फती बहु से बोली— यदि तू हिम्मत कर के मेरा साथ दे तो मैं यह प्रसव करा सकती हूँ.”

”फिर ?”

”मेरी बहु बहुत हिम्मत वाली थी. इस ने हामी भर दी. और घंटे भर की मेहनत के बाद में ​प्रसव हो गया. भगवान ! उस का भला करें.”

” क्या ?” डॉक्टर साहिबा का यकीन नहीं हुआ, ” उस ने इतनी उलझी हुई प्रसव करा दी. मगर, वह नर्स कौन थी ?”

सास को उस का नाम पता मालुम नहीं था. बहु से पूछा,” बहुरिया ! वह कौन थी ? जिसे तू 1000 रूपए दे रही थी. मगर, उस ने लेने से इनकार कर दिया था.”

” हां मांजी ! कह रही थी सरकार तनख्वाह देती है इस सरला को मुफ्त का पैसा नहीं चाहिए.”

यह सुनते ही डॉक्टर साहिबा का दिमाग चकरा गया था. सरला की ड्यूटी दो घंटे पहले ही समाप्त हो गई थी. फिर वह यहाँ मुफ्त में यह प्रसव करने के लिए अतिरिक्त दो घंटे रुकी थी. 

”इस की समाज सेवा ने मेरी रात की डयूटी का मजा ही किरकिरा कर दिया. बेवकूफ कहीं की,” धीरे से साथ आई नर्स को कहते हुए डॉक्टर साहिबा झुंझलाते हुए अगले वार्ड में चल दी.

© ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

07/03/2018

पोस्ट ऑफिस के पास, रतनगढ़-४५८२२६ (नीमच) म प्र

ईमेल  – [email protected]

मोबाइल – 9424079675

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात — किंवा — त्या तरुतळी विसरले गीत — तसेच —

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे — किंवा — आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको —

– अशी एकाहून एक सुंदर, तरल भावगीते, आणि हळुवार भावनांनी बहरलेली प्रेमगीते लिहिणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि गीतकार श्री. वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचा आज स्मृतिदिन.  (ऑक्टोबर ६, १९१३ – सप्टेंबर ८, १९९१) 

श्री. कांत यांचा जन्म नांदेड येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथे झाले. पण त्यानंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अर्थात त्यांच्या काव्यप्रतिभेमध्ये त्यामुळे काहीच फरक पडला नाही आणि उणीव तर अजिबातच राहिली नाही असे आवर्जून सांगायला हवे.  

साधारण १९६० आणि ७० च्या दशकात मराठीमध्ये “ भावगीत “ हा भावप्रधान काव्यरचनेचा प्रकार– जो खरंतर खूप पूर्वीपासूनच ‘ भावगीत ‘ हे नामानिधान न लावता लिहिला जात होता – तो रसिकांपर्यंत विशेषत्वाने पोहोचला, रुळला, लोकप्रिय झाला, आणि रसिकांच्या मनात घट्ट रुजलाही. श्री. वा.रा.कांत हे त्यावेळच्या अग्रगण्य भावगीतकारांपैकी एक अग्रणी. अतिशय आशयगर्भ आणि हळुवार शब्दरचना असणाऱ्या काव्यरचना करणारे अलौकिक प्रतिभावंत, आणि लोकप्रिय कवी आणि गीतकार ही त्यांची अगदी ठळक ओळख सुरुवातीपासूनच निर्माण झाली,आणि आता रसिकांच्या मनात ती कायमची ठसली गेली आहे.   

‘विहंगमाला’ या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काही काळ काम केले होते.  त्यानंतर निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी केली होती. (१९३३-१९४५). नंतर त्यांनी निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून जवळपास पंधरा वर्षे कार्यभार सांभाळला. (१९४५- १९६०). त्यानंतर १९६०-१९७० अशी दहा वर्षे भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. शेवटी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रातून ते सेवानिवृत्त झाले.  

श्री. कांत यांचे प्रकाशित साहित्य —-

काव्यसंग्रह 

दोनुली, पहाटतारा, बगळ्यांची माळ, मरणगंध (नाट्यकाव्य), मावळते शब्द, रुद्रवीणा, वाजली विजेची टाळी, वेलांटी, शततारका, सहज लिहिता लिहिता, फटत्कार, मावळते शब्द 

कविता, भावगीते याबरोबरच त्यांनी नाटयलेखन, अनुवाद, समीक्षा , अशाप्रकारचे गद्य लेखनही केले होते. 

‘अभिजात‘, आणि ‘रसाळ वामन‘ अशा टोपण नावांनीही त्यांनी काही लिखाण केलेले होते. 

श्री. कांत यांना पुढील पुरस्कार प्राप्त झाले होते —–

१९६२-६३ ‘वेलांटी ‘ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

१९७७-७८ ‘मरणगंध ‘ या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

१९७९-८० ‘ दोनुली’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसुत ‘ पुरस्कार

१९८९-९० ‘मावळते शब्द’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसुत’ पुरस्कार 

तसेच त्यांना पुढील सन्मान देऊन गौरविण्यात आले होते —-

१९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान

१९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान

१९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान

वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र -” कविवर्य वा.रा.कांत “ – या नावाने कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे आणि कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.

माझी उन्हे मावळली आहेत …. माझी फुले कोमेजली आहेत 

कालचा प्रकाश, कालचा सुवास…. मात्रा वेलांटीत शोधत आहे 

शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे ? …… 

— अशा भावना जरी त्यांनी स्वतः त्यांच्या अखेरच्या दिवसात व्यक्त केल्या असल्या, तरी खरा मराठी रसिक मात्र तो स्वतः हयात असेपर्यंत श्री. कांत यांची मनाला थेट भिडणारी भावकाव्ये विसरणे अशक्य आहे यात शंका नाही. 

श्री वा. रा. कांत यांना आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी अतिशय भावपूर्ण आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || वंदन गणेशा || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ || वंदन गणेशा || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

   वंदन गणेशा| पाठीशी सर्वेशा|

   सदैव विघ्नेशा| सकलांचा|| धृ ||

 

   तू विश्वचक्षूंनी| कली निर्दालूनी|

   आनंदी करूनी| चराचर|| ०१ ||

 

   शोभे एकदंत| असे भाग्यवंत|

   होई कृपावंत| प्रार्थनेने|| ०२ ||

 

   नमो लंबोदर| असत्या प्रहार|

   सत्याचा विचार| सांगतसे|| ०३ ||

 

   हे वक्रतुंडाय| पापांसी क्षेमाय|

   भक्त रक्षणाय| धावून ये|| ०४ ||

 

   चौसष्ठ कलांचा| आहे अधिष्ठाता|

   सृष्टीचा निर्माता| गजानन|| ०५ ||

 

   तव चतुर्भुजे| शस्त्र शास्त्र साजे|

   तिन्ही लोक पूजे| मयुरेशा|| ०६ ||

 

कवी : म. ना. दे.

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चांदणे हे डहुळेल… ☆ – वा.रा.कांत ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ चांदणे हे डहुळेल… ☆ – वा.रा.कांत ☆

ऊन रेशमी पडता

डोळे फुलांचे दिपले

बिंब दवाच्या दर्पणी 

सात जन्मांचे पाहिले

 

सात जन्मांचे संचित

तुझ्या हास्यात माळले

जपतात दुःखे पोटी

काळी डोळ्यांची वर्तुळे

 

साहिल्यास सा-या व्यथा

ज्योतीपरी तू कापत

तेवलीस रात्रभर

माझ्या मातीच्या घरात

 

झोप आता बोलू नको

फुलमिटू झाले डोळे

अर्थ जागविता ओठी

शब्द माझे पेंगुळले

 

आता बोलू नको काही

निळाई ती  गढूळेल

नि:श्वासही नको खिन्न

चांदणे हे डहुळेल.

  – वा.रा.कांत

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #125 – पान…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

इस संवेदनशील मराठी कविता का हिन्दी भावानुवाद “एक पत्ता” आप आज के अंक में पढ़ सकते हैं । 

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 125 – पान…! 🍃 

मी अंगणातल्या झाडाचं

एक पान…

वहीत जपून ठेवलंय

भविष्यात लेकरांन  

झाड़ म्हणजे काय…

विचारलं

तर निदान

झाडाचं पान तरी

दाखवता येईल…!

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ थोडं मनातलं… उमलत्या वेळा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ थोडं मनातलं… उमलत्या वेळा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

सकाळी उठून बाहेर आलो आणि बागेत एक फेरफटका मारला. सूर्याची सोनेरी कोवळी किरणं सगळ्या सृष्टीला न्हाऊ घालत होती. झाडं, पानं, फुलं जणू चातक होऊन त्या सूर्यप्रकाशाचं रसपान करीत होती. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. रात्री मिटलेली कमळाची कळी आपले डोळे अर्धवट उघडून साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेत होती. हळूहळू तिला उमलून यायचंच होतं. गुलाबाच्या कळ्यांनाही आता जाग आली होती. जाई, जुई तर सूर्यदेवांचं स्वागत करण्यासाठी कधीच्या तयार होत्या. झेंडूची फुलं उमलली होती. सोनेरी, पिवळसर झेंडूच्या फुलांवर सोनेरी सूर्यकिरणे पडल्यामुळे त्यांचं सौंदर्य काही आगळंच  भासत होतं. मोगरा, जाई, जुई आपल्या अत्तराच्या कुपीतून सुगंधी शिडकावा करून वातावरण सुगंधित करीत होते. वाऱ्याच्या शीतल लहरी  हा सुगंध अलगद वाहून नेत होत्या. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांवर अलगद नर्तन करून आपला आनंद व्यक्त करीत होती.

सृष्टीच्या अंगणात हा प्रभातोस्तव रंगला होता. विविधरंगी पानं, फुलं, पक्षी यांनी हा रंगसोहळा साकार केला होता. सृष्टीमध्ये अव्यक्त असलेल्या निर्गुण निराकाराची पूजा निसर्गानं आपल्या परीनं मोठी सुरेख मांडली होती. या पूजेसाठी फुलं आपल्या पूर्ण शक्तीनिशी पूर्णपणे उमलून आली होती. त्यांच्या अंतरंगातून सुगंधाच्या भक्तीलहरी बाहेर पडत होत्या. पक्षी आपल्या सुरात त्याची आरती गात होते. सूर्यदेवांच्या सोनेरी प्रकाशात सृष्टीचा गाभारा उजळून निघाला होता. कुठूनतरी भूपाळीचे सूर अलगद कानी आले.

मलयगिरीचा चंदनगंधीत धूप तुला दाविला

स्वीकारा ही पूजा आता उठी उठी गोपाळा

माझ्या तोंडून आपोआप उद्गार बाहेर पडले. ‘ वा, किती सुंदर ! ‘ मनात एक प्रश्न आला. हे सगळं कशासाठी ? काही विशेष कारण आहे का ? इतका सुंदर असलेला हा सोहळा, हा उत्सव रोज कशासाठी ?

माझ्या मनातल्या प्रश्नाला सगळ्यांनी आपापल्या परीनं उत्तर दिलं. सूर्यकिरणं म्हणाली, ‘ कालची रात्र अंधारात गेली ना ! तुला उद्याची चिंता होती. मावळलेल्या दिवसाबरोबर तुझ्या कोमेजलेल्या आशा अपेक्षांना पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आम्ही आलो आहोत. या प्रकाशाप्रमाणेच तुझा आजचा दिवसही प्रकाशमान होवो. ‘

फुलं म्हणाली, ‘ अरे रोजचा दिवस नवा. रोज आपल्या आयुष्याच्या पुस्तकाचे एक नवीन पान आपण उघडतो. मग तो रोजचा दिवस हा आपल्या जीवनातील एक सोहळाच नाही का ? म्हणून त्याची सुरुवात आम्ही पूर्णपणे फुलून करतो. उमलता उमलता सौंदर्याची बरसातही करतो. आम्ही कसे टवटवीत असतो ! तसंच प्रसन्न, टवटवीत तुम्हीही राहावं  असं आम्हाला वाटतं. तुम्हीही आपला दिवस आपले निहित कार्य, चांगली कामं करण्यात घालवावा. तोही आम्हाच्यासारखा प्रसन्न, हसतमुख आणि टवटवीतपणे. आणि जमलं तर सुगंधाची उधळण करावी. तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध परिसरात दरवाळावा असं आम्हाला वाटतं. ‘

मी म्हटलं, ‘ अहो, थांबा थांबा. जीवनाचं सारं तत्वज्ञानच तुम्ही उलगडून सांगितलंत. तुमचे हे शब्द मला माझ्या अंतरंगात साठवू द्या. ‘ खरंच रोजची पहाट म्हणजे आमच्यासाठी त्या विधात्यानं दिलेलं अमूल्य वरदान आहे. प्रत्येक दिवस आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहे. कधी ऊन, वारा, पाऊस असेल. वादळे झेलावी लागतील. थंडीचा कडाका असेल. फुलं उमलण्याची थोडीच थांबली आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या या छोट्याशा आयुष्यात संकटे, सुखदुःख येणारच ! त्यासाठी उमलण कशाला सोडायचं ? कोमेजायचं कशाला ? दुर्मुखलेलं का राहायचं ? जमेल तसं फुलून यायचं. आपल्या सुगंधाची बरसात करायची.

फुलांचं मनोगत समजून घेता घेता शीतल सुगंधी वायू लहरी कानाशी येऊन गुणगुणू लागल्या. ‘ अरे, रोजचा दिवस म्हणजे सगळ्या गेलेल्या इतर दिवसांसारखाच एक असतो का ? कदाचित तुला तसं वाटेल. पण आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आगळावेगळा असतो. जे काल होतं ते आज नाही. आणि जे आज आहे ते उद्या असणार नाही. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव असतो. म्हणूनच या बदलाला रोज नव्या उत्साहानं, उमेदीनं सामोरं जायचं असतं. तुला माहिती असेलच की आम्ही सदा सर्वकाळ वाहत असतो. कधीही थांबत नाही. आम्ही थांबलो तर ही सृष्टी थांबेल. तुझ्या श्वासात आणि रोमारोमात आम्ही असतोच. तेव्हा मित्रा, या सकाळच्या प्रसन्न वेळी मोकळा प्रसन्न श्वास घे. आपल्या तनामनात नवीन ऊर्जा भरून घे आणि आजच्या दिवसाला सामोरा जा. ‘

मी वाऱ्याच्या लहरींना म्हटलं, ‘ अगदी खरं आहे तुमचं. तुम्ही आमचा प्राण आहात. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सोबत असते तुमची. तुमचा संदेश मी लक्षात ठेवीन. नवीन ऊर्जेनं भारून माझ्या कामाला सुरुवात करीन.

तेवढ्यात फुलाफुलांवर नाचणाऱ्या, बागडणाऱ्या फुलपाखरांकडे माझं लक्ष गेलं. त्यांचे विविध रंग मनाला प्रसन्न करीत होते. त्यातलं एक डोळे मिचकावीत म्हणालं, ‘ आमचंही थोडं ऐकशील का रे ? ‘ मी म्हटलं, ‘ जरूर. आज तुम्ही सगळेच मला अतिशय सुंदर संदेश देत आहात. तुमचं मला ऐकायचंच आहे. ‘

फुलपाखरू म्हणालं, ‘ आमच्या पंखांवरचे रंग तुला आवडतात ना ? पण नुसतं त्यावर जाऊ नकोस. तुला कदाचित माहिती नसेल आम्हा सुरवंटाचं फुलपाखरू होताना आम्हाला किती दिव्यातून जावं लागतं ! पण आम्ही त्याचा विचार करत बसत नाही. आम्हाला जमतील तसे निसर्गाचे रंग आमच्या अंगावर माखून घेतो. तसं आमचं आयुष्य अल्पजीवी असतं. पण आम्ही ते जगतो मात्र आनंदानं. दुसऱ्यालाही आनंद देतो. किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं आहे, नाही का ? ‘ असं म्हणून आपल्या पंखांची सुंदर उघडझाप करीत ते दुसऱ्या फुलावर जाऊन बसलं.

सूर्यदेवांची किरणं आता थोडी अधिक प्रखर होऊ लागली होती. निसर्गातले सगळेच घटक आपापल्या कामाला लागले होते. सगळी फुलं पूर्णपणे उमलली होती. दिवस उमलला होता. उमलत्या वेळा मला प्रसन्न करून गेल्या. माझं मनही उमललं होतं. रोमारोमात नवचैतन्याचा संचार झाला होता. उमलत्या वेळी होणारा सृष्टीचा सोहळा मी अनुभवला होता. तोच सोहळा माझ्याही जीवनात प्रतिबिंबित व्हावा म्हणून त्या निर्गुण निराकाराला मी हात जोडले.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ झाडाची व्यथा… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ झाडाची व्यथा… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन

आपल्या वृक्षमित्राला उदास बसलेलं पाहून चिमणी चिवचिवू लागली, `काय झालं दोस्ता? तू इतका उदास का?

झाडानं व्यथित स्वरात उत्तर दिलं, `चिमणुताई मला या ठिकाणी खूप असहज आणि असहाय्य असल्यासारखं वाटतं.’ चिमणी हसत हसत पुन्हा चिवचिवली. `काय चेष्टा करतोयस दादा! तू तर किती नशीबवान आहेस. तुझ्या आस-पास रोज सफाई केली जाते. खत-पाणी सगळं कसं नियमितपणे आणि वेळेवर मिळतं. एकदम हिरवागार आणि स्वस्थ दिसतोस तू. तुझं एक पान तरी तोडायची कुणाची हिम्मत आहे का? चोवीस तास या बागेचा पहारेकरी लक्ष ठेवून असतो. मग तुला दु:ख कुठल्या गोष्टीचं? ‘

वृक्षाच्या डोळ्यातून अश्रू टपकले. भरल्या डोळ्याने तो म्हणाला, `पण माझे बहुतेक सगळे नातेवाईक या बागेच्या बाहेर राहतात ना? इथे मी एकटा…’

मूळ हिन्दी कथा – पेड़ की व्यथा – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हीच खरी महालक्ष्मी… लेखक – अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ हीच खरी महालक्ष्मी… लेखक – अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

पण काहीही  म्हणा —

 ज्या ज्या घरात सगळ्या सुना , मुलं , जावा , नातवंडं एकत्र येतात, सर्वजण मिळून कामं करतात,

तिथं खरंच प्रसन्न वाटतं, करमतं ! दोन तीन दिवस अगदी मजेत जातात !

 

मित्र हो ,

हे करमणं , मजा वाटणं , प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते !

 

ती येते , रहाते ,जेवते आणि जातांना म्हणते–

‘खुशाल रहा– असंच मिळून मिसळून रहात जा ! ‘ 

 

कुणी आणि का लावलं असेल आपल्यामागे हे सगळं ?

शास्त्रीयदृष्ट्या असेल का काही अर्थ या सणसमारंभांना ?

थोडा विचार केला , चिंतन केलं तर आपल्याला कळेल……….

 

या सणाच्या निमित्ताने आपलं घर भरून जातं–आपुलकीला उधाण येतं–माणसं एकत्र येतात ,भेटतात , बोलतात

आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात ……! 

बैठकीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची , पावलांची दाटी हीच खरी लक्ष्मी …….!

 

चार दिवस सर्व कुटुंबाचं एका छताखाली येणं – गुण्यागोविंदाने रहाणं – आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं …… हीच खरी लक्ष्मी !

 

पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक– दिरानी वहिनींकडे हक्काने मागितलेला कपभर चहा –’ तुम्ही राहू द्या, मी करते ‘ असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट …… हीच खरी लक्ष्मी ….!

 

मित्रहो त्यामुळे पूर्वजांना नाव ठेऊ नका. ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते– पण मनाने श्रीमंत होते. 

सुशिक्षित नसतीलही– पण नम्र होते. 

एखाद्या वेळेस रागवत असतील– पण डुख धरत नव्हते. 

ते फॉरेन रिटर्न नव्हते– परंतू एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे त्यांना चांगलं कळत होतं. 

योग्य वेळी योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं …… हीच खरी लक्ष्मी !

 

मला मला करण्यापेक्षा,  तू घे , तू घे चा आग्रह करणे—

आधी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा —अशी  ज्येष्ठांनी केलेली मायेची सूचना —

घर, कुटुंब आणि नातं टिकण्यासाठी प्रत्येक सदस्याने केलेला त्याग —

…हीच खरी महालक्ष्मी ….!

 

लेखक : अनामिक

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मंत्र पुष्पांजली — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

अल्प परिचय

वैद्यकी व्यवसाय, पुणे.

कथा, कादंबरी, एकांकिका, काव्य,अशा सर्वप्रकारच्या साहित्य प्रकारातील व वैद्यकीय लेखन. सुमारे पन्नास पुस्तके प्रकाशित. शिवाय ध्वनिफिती /सी.डीं। चे ही प्रकाशन झाले आहे.

आकाशवाणी व दूरदर्शनचे मान्ताप्राप्त भावगीतकार व अभिनेता.

? इंद्रधनुष्य ?

☆ मंत्र पुष्पांजली — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

— संस्कृत श्लोक

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॥

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय।
महाराजाय नम: ॥

ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।
पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति ॥

ॐ तदप्येषः श्लोकोभिगीतो।
मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥

॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥

— मराठी भावानुवाद —

यूट्यूब लिंक >> मंत्रपुष्पांजली मराठी / Mantrapushpanjali Marathi – YouTube

ॐ यज्ञासहित करुन आद्य विधी उपासनेचे

पूजन केले देवे यागरूपी त्या प्रजापतीचे

यज्ञाचरणे देवताधामा केले त्यांनी प्राप्त

याची कर्मे महानता झाली त्यांना अर्जित

 

अनुकूल सकला असे तुझे कर्म

मनीच्या कामनांची पूर्ती तुझा धर्म

अमुच्या इच्छा समस्त पूर्ण करा

नमन राजाधिराजा वैश्रवणा कुबेरा

 

कल्याणकारक असावे राज्य

भोग्य परिपूर्ण असे साम्राज्य

लोभमोहविरहित लोकराज्य

अधिपत्य अमुचे असो महाराज्य

 

क्षितीजसीमेपर्यंत अमुचे राज्य सुखरूप असो

सागरमर्यादेचे अमुचे राज्य दीर्घ आयुचे असो

राज्य आमुचे सृष्टी आहे तोवर संरक्षित असो

आयु या राज्याची परार्ध वर्षे सुरक्षित असो

 

असे राज्य कीर्तीमानसे व्हावे

म्हणोनी या  श्लोकास आम्ही गावे

अविक्षीत पुत्रांनी मरुद्गणांनी

परिवेष्टिले राज्य आम्हासि लाभो—-

भावानुवादकर्ता— ©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – अजुनी रूसुन आहे – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – अजुनी रूसुन आहे   ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

😊

अजुनी रूसुन आहे

खुलता कळी खुलेना

विनवून  पाहीले मी

इकडे मानही वळेना

😊

चुकले कशात  माझे

हे काही  आकळेनी

😊

किती किडे,अळ्या मी

हुडकून  आणल्या हो

त्यातील चव कुणाची

प्रियेस का रूचेना

😊

रानावनात फिरलो

गवतातूनी हुडकलो

पण वेगळ्या चवीची

हिस भूल का पडेना!

😊

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print