मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘आत्या’ (माहेरच्या मायेचा एक हळवा कोपरा)

​नात्यांना काही नावे असतात आणि काही नात्यांना सुगंध असतो. नाव उच्चारलं की नातं समोर येतं; पण काही नाती आठवली की मनात एखादा गंध दरवळतो… जुन्या घराचा, अंगणातल्या तुळशीचा, उन्हाळ्याच्या सुट्टीचा, चुलीवरच्या स्वयंपाकाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायेचा!

​‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’, आजीची ‘संस्कारांची शिदोरी’, आजोबांचे ‘सुरकुत्यांमधील शहाणपण’, मामाचा ‘माहेरचा समृद्ध दुवा’ आणि मावशीची ‘आईची प्रतिछाया’ अनुभवली. या महावस्त्रात असाच एक अत्यंत हळवा, आपुलकीचा आणि माहेर-सासर या दोन घरांना जोडणारा रेशमी धागा म्हणजेच ‘आत्या’!

​तुम्ही म्हणाल, कशासाठी सांगत आहात ही नाती? तर नात्यांनीच कुटुंब आणि समाज जोडला जातो. आपलं जीवन समृद्ध होतं ते नात्यांमुळेच ना! आपल्याला एकट्याला काय महत्त्व आहे?

​जशी आईची बहीण म्हणजे मावशी, तशी वडिलांची बहीण म्हणजे आत्या. मावशी आणि आत्या… नावं वेगळी आहेत, नाती वेगळी आहेत; पण माया आणि प्रेम यात फरक नाही. कदाचित व्यक्तिपरत्वे थोडाफार फरक कोणाला जाणवू शकेल, पण त्याचा विचार इथे आपल्याला करायचा नाही.

​वडिलांच्या बहिणीला आपण ‘आत्या’ म्हणतो. नात्यांच्या व्याख्येत ही माहिती अगदी पुस्तकी आणि बरोबर आहे; पण भावनेच्या कोशात ‘आत्या’ या शब्दाचा अर्थ एवढाच नसतो. आत्या घरातील सगळ्या नात्यांना व्यापून उरते. आत्या म्हणजे बाबांच्या माहेरची जिवंत आठवण.

​‘बाबांचं माहेर?’ तुम्ही म्हणाल, “अहो, माहेर आईचं असतं, बहिणीचं असतं; बाबांचं कसं असेल?”

​पण मला वाटतं, बाबा लहान असताना ज्या गावी राहिले, ज्या घरात राहिले आणि आई-बाबा आदी ज्या व्यक्तींसोबत राहिले, ते ठिकाण म्हणजे त्यांचं माहेरच! एखाद्या स्त्रीला आपल्या माहेरची जेवढी ओढ असते, तेवढीच ओढ बाबांनाही त्यांनी बालपण जिथे घालवलं, ज्यांच्यासोबत घालवलं त्या नातेवाईकांची आणि मित्रांची असते. आणि आत्या म्हणजे बाबांच्या बालपणाची साक्षीदार! एकाच घरात वाढलेले, बरोबर जेवलेले, दंगामस्ती केलेले, छोट्या-मोठ्या कारणांवरून भांडलेले, रुसलेले आणि पुन्हा हसलेले. आपल्या बाबांना ‘अरे’ म्हणून हक्काने हाक मारणाऱ्या मोजक्या व्यक्तींमधली ती एक! आणि म्हणूनच कदाचित ‘आत्या’ या नात्यात आपल्या बाबांच्या बालपणाचा एक सुंदर तुकडा दडलेला असतो.

​आईच्या माहेरची माणसं आपल्याला ‘मामा’, ‘मावशी’, ‘आजोबा’, ‘आजी’ म्हणून लहानपणापासूनच जवळची वाटतात. पण बाबांच्या माहेरची माणसंही तितकीच आपली असतात, हे जाणवायला कधी कधी थोडा वेळ लागतो. कारण वडील स्वतःच्या भावना फारशा बोलून दाखवत नाहीत; त्यांच्या माहेरच्या आठवणींचा कप्पा ते सहज उघडत नाहीत. पण जेव्हा आत्या घरी येते, तेव्हा बाबांच्या चेहऱ्यावर अचानक एक वेगळंच निष्पाप बालपण उमलतं.

​”अरे, तू अजूनही तसाच आहेस!”

आत्याने बाबांना असं म्हटलं की आपण आश्चर्याने बाबांकडे पाहतो. कारण आपल्यासाठी ते शिस्तप्रिय बाबा असतात, पण आत्यासाठी तो अजूनही तिचा लहान भाऊ असतो! त्यांच्या बालपणीच्या खोड्या, भांडणं, रुसवे-फुगवे, शाळा, खेळ, आईचा धाक आणि वडिलांची शिस्त… सगळं काही तिच्या स्मरणात ताजंतवानं आणि जिवंत असतं. जसा अनेक वर्षांपूर्वीचा एखादा फोटोंचा अल्बम पाहताना आठवणी जाग्या होतात, तसाच बालपणीच्या आठवणींचा अल्बम आत्या आली की उघडला जातो. म्हणूनच आत्या म्हणजे केवळ एक नातं नाही; ती आपल्या वडिलांच्या हरवलेल्या बालपणाची खरीखुरी साक्षीदार असते.

​बालपणात आत्या म्हणजे एक वेगळीच लाडकी व्यक्ती असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावाला जाणं म्हणजे जणू एखादी आनंदी सहलच! तिच्या घरात गेल्यावर आईच्या घरापेक्षा थोडं अधिक स्वातंत्र्य मिळतं. खाण्यापिण्याच्या बाबतीतही तिचा हात थोडा सैलच असतो. “अरे, घे ना अजून एक!” आई समोर असताना ज्या गोष्टीसाठी दहा वेळा विचार करावा लागतो, ते आत्याकडे एकदाच मागितलं की मिळतं! आणि आईने जर आत्याकडे आपल्या मुलाच्या खोड्यांची तक्रार केली, तर आत्या बहुतेक वेळा मुलांचीच बाजू घेते.

​”असू दे गं… मुलंच आहेत. थोडं खेळणार, थोडा दंगा करणार!”

आत्याच्या या एका वाक्यात भाच्याला मिळालेला हक्काचा जामीन असतो! पण आत्या फक्त लाड करणारी नसते, वेळ आली तर ती प्रेमाने समजही देते. आई रागाने बोलते, बाबा शिस्तीने बोलतात आणि आत्या मायेने समजावते. तिच्या बोलण्यात अधिकार असतो, पण त्या अधिकाराला मायेची रेशमी किनार असते.

​माझ्या लहानपणाच्या अनेक आठवणी आत्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्या आठवणी लिहायच्या म्हटलं, तर आत्याच्या उल्लेखाशिवाय त्या पूर्ण होणारच नाहीत. तसं तर मला दीर्घकाळ आत्याची माया लाभली. मी लहान असताना, नोकरीला लागल्यानंतर तसेच पुढे लग्न झाल्यावरही तिने माझं भरभरून कौतुक केलं आहे. माझी आत्या कल्याणला राहायची. आत्या आणि तिचे यजमान यांनी माझ्या मनावर उत्तम संस्कारांचं शिंपण केलं, त्यातून मी खूप काही शिकलो.

​माझं लहानपण एका अगदी छोट्या खेड्यात गेलं. पण आत्या कल्याणला राहत असल्याने मी दर सुट्टीत तिच्याकडे जायचो. ग्रामीण भागात राहत असलेल्या माझ्यासारख्या अजाण मुलाला शहरी संस्कृतीचा स्पर्श आणि ओळख तिच्यामुळे झाली. आत्याच्या यजमानांनी स्वतः माझ्यासोबत फिरून त्यावेळची मुंबई मला दाखवली आणि अनेक गोष्टींची माहिती दिली. त्यांनीच मला तेव्हा ‘मनाचे श्लोक’ हे पुस्तक भेट दिलं होतं. ते मला म्हणाले होते, “विश्वास, हे श्लोक पाठ कर. ते पाठ झाले की मला सांग.” त्याप्रमाणे मी तेव्हा सगळे श्लोक पाठांतर केले होते. त्यांनी त्यावेळी मला एक वही आणि पेन बक्षीस म्हणून दिले होते.

​आज इतकी वर्षं उलटून गेली, तरी ती वही, ते पेन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते ‘मनाचे श्लोक’ अजूनही माझ्या हृदयात कोरलेले आहेत. पुढे याच ‘मनाचे श्लोकां’शी माझं नातं इतकं दृढ होईल आणि त्यावर माझ्याकडून एक विस्तृत लेखमाला लिहिली जाईल, याची त्या वेळी मला कल्पनाही नव्हती! माझे आतेभाऊही माझ्यापेक्षा मोठे होते, पण त्यांनीही मैत्रीच्या नात्याने माझ्याशी वागून मला खूप प्रेम दिलं आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्या.

​काही नाती केवळ भेटीगाठींनी टिकत नाहीत; ती आठवणींच्या मुळांनी टिकतात. काळ जसजसा पुढे जातो, आपण मोठे होतो आणि मग शिक्षण, नोकरी, संसार, मुलं… प्रत्येक जण आपापल्या जगात रमतो. आत्याच्या घरच्या फेऱ्या कमी होतात, फोनवरच्या गप्पा कमी होतात. ‘नंतर बोलू’ म्हणता म्हणता असे अनेक ‘नंतर’ निघून जातात; पण नात्यातील ‘अंतर’ कधीच वाढत नाही.

​आजच्या काळात कुटुंबाची व्याख्याही बदलली आहे. पूर्वी एकत्र कुटुंबात आत्याचं येणं-जाणं सहज असायचं. घर मोठं होतं, माणसं जास्त होती, अंगण मोठं होतं, माणसांची मनंही मोठी होती आणि वेळही भरपूर होता. पण आता काळानुसार सगळ्याच गोष्टींचा संकोच झाला आहे. माणसं जवळ असूनही वेळ दूर निघून गेला आहे. पूर्वी आत्या अचानक दारात उभी राहायची, “काय गं, आलीस?” असा प्रश्न विचारण्याआधीच घरात तिच्या स्वागताची तयारी व्हायची! आज कोणीच अचानक येत नाही. आधी फोन येतो—”वेळ आहे का? तुम्ही घरी आहात का?” सगळ्याच गोष्टी बदलल्या.

​आत्याच्या नात्यात आणखी एक सुंदर गोष्ट असते. ती आपल्या आईची नणंद असली, तरी अनेकदा आईची जिवाभावाची मैत्रीणही असते. दोघी एकत्र आल्या की जुन्या आठवणींची पेटी उघडते. बाबांच्या बालपणातील गमतीशीर किस्से बाहेर येतात आणि मग आपल्याला कळतं—आपले बाबा ज्या व्यक्तीला ‘माझी बहीण’ म्हणतात, तिच्यासाठी ते अजूनही ‘दादा’ किंवा ‘भाऊ’च आहेत. लग्नातील किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमांच्या आठवणी निघतात; घर काही क्षण का होईना, पुन्हा हसतं-खेळतं होतं.

​भावाबहिणीचं नातंही अतिशय विलक्षण असतं. लहानपणी एकमेकांशी क्षुल्लक गोष्टीवरून भांडणारे, मोठे झाल्यावर एकमेकांच्या संकटात धावून जाणारे! संसाराच्या वाटेवर दोघे वेगवेगळ्या घरात गेले, तरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात त्यांचं माहेरचं घर कायम राहतं; आणि त्या माहेरच्या घराची एक जिवंत खूण असते—‘आत्या’.

​म्हणूनच, दुर्दैवाने जेव्हा वडील जग सोडून जातात, तेव्हा आत्याला होणारं दुःख फक्त भावाच्या जाण्याचं नसतं; तिच्या आयुष्यातील एक संपूर्ण मोठा अध्याय बंद झाल्याचं असतं. ‘माझा भाऊ’ म्हणत ज्याच्याशी ती आयुष्यभर बोलली, भांडली, हसली, रुसली… त्याचा आवाज अचानक कायमचा शांत झालेला असतो. त्या वेळी आत्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहताना आपणही अंतर्मुख होतो. तेव्हा जाणवतं की नाती केवळ रक्तावर आधारित नसतात, आठवणींची मुळे त्याहून खूप खोल गेलेली असतात!

​आत्या आणि भाचा-भाची यांचं नातंही तितकंच सुंदर. आई-वडिलांच्या शिस्तीच्या चौकटीबाहेर मायेची एक मोकळी खिडकी उघडी ठेवणारी व्यक्ती म्हणजे आत्या! भाच्यांच्या यशात मनापासून आनंद मानणारी आणि त्यांच्या अपयशातही त्यांना प्रेमाने धीर देणारी. आज भाचा मोठा झाला, त्याला स्वतःची मुलं झाली, तो स्वतः बाबा झाला; तरी आत्याच्या नजरेत तो अजूनही तोच छोटासा मुलगा असतो. “किती मोठा झालास रे!” हे वाक्य आत्या जितक्या वेळा म्हणते, तितक्या वेळा आपल्याला जाणवतं की तिच्या मनात आपण कधीच मोठे झालेले नसतो. आणि आजच्या कृत्रिम जगात ही गोष्ट किती दिलासा देणारी असते!

​आत्याला हिंदीत ‘बुआ’ म्हणतात. अनेक हिंदी चित्रपटांतून, मालिकांतून आणि कथांमधून हे नातं आपल्याला डोकावताना दिसतं. पण भाषा बदलली की नातं बदलत नाही. ‘आत्या’ म्हटलं की जशी आपल्या मनात मायेची एक ओळखीची प्रतिमा उभी राहते, तशीच ‘बुआ’ म्हटलं की हिंदी भाषिकांच्या मनातही! शब्द वेगळे, उच्चार वेगळे; पण नात्याची ऊब मात्र तीच! ‘बुआ’ या शब्दातही एक वेगळीच गोडी आहे. हिंदी घरात कदाचित “बुआ के घर चलो!” असं म्हटलं की बालपणाला आनंदाची चाहूल लागते, आणि मराठी घरात “आत्याकडे चल!” म्हटलं की बालपणाला पंख फुटतात! पण दोन्हीकडे स्वागत करणारा मायेचा हात मात्र अगदी सारखाच असतो. कारण नाती भाषेच्या सीमा मानत नाहीत—‘आत्या’ असो की ‘बुआ’!

​आजच्या डिजिटल युगात नाती एका क्लिकवर जोडली जातात आणि एका क्लिकवर दूरही जातात. व्हिडिओ कॉलवर चेहरे दिसतात, संदेशांमध्ये शुभेच्छा येतात. पण आत्याने हातावर ठेवलेला उबदार हात, डोक्यावरून फिरवलेली मायेची थाप आणि “काळजी घे रे!” म्हणताना तिच्या आवाजात उतरलेली खरीखुरी काळजी… याला जगात कोणत्याही डिजिटल तंत्रज्ञानाचा पर्याय नाही.

​वय वाढतं तसं माणसाला महागड्या भेटवस्तूंपेक्षा माणसं अधिक हवीहवीशी वाटतात—विशेषतः आपल्या माहेरच्या आठवणींशी जोडलेली माणसं. कारण ज्या घरातून ती कधीतरी सासरी गेली, त्या घरातील माणसं, आवाज, हसणं-रडणं, रुसवे-फुगवे, सण-उत्सवांची लगबग… सगळं तिच्या मनात कुठतरी जिवंत असतं. तिच्या माहेरच्या आठवणींचा शेवटचा धागा कधी कधी तिच्या भावाच्या मुलांशी जोडलेला असतो.

​म्हणूनच आत्याला भेटणं म्हणजे केवळ एका नातेवाईकाला भेटणं नव्हे! ते आपल्या वडिलांच्या बालपणाला भेटणं असतं. आपल्या कुटुंबाच्या जिवंत इतिहासाला भेटणं असतं. आणि आपल्या स्वतःच्या बालपणातील एका सुंदर पानाला पुन्हा अलगद स्पर्श करणं असतं.

​‘आत्या’ हे नातं माहेरच्या अंगणातल्या त्या जुन्या, समृद्ध झाडासारखं असतं… ज्याच्या सावलीत आपण कधीतरी खेळलो होतो, ज्याच्या फांद्यांवर कधी झोका घेतला होता; आणि आयुष्याच्या उन्हात खूप पुढे आलो, तरी ज्याची शीतल सावली मनातून कधीच जात नाही… आत्या म्हणजे त्या सावलीचं मायेचं नाव!

 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्राजक्त सडा… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

डॉ. नेहा भटकर

? मनमंजुषेतून ?

☆ प्राजक्त सडा… ☆ डॉ. नेहा भटकर

परवा पहाटे अंगणातील पारिजातकाच्या हसऱ्या नाजूक फुलांचा सडा अंगणभर पसरलेला बघितला अन् पाय आपोआपच तिकडे वळले. मन उगाचचं या फुलांची नी आपली पहिली भेट नेमकी कधी झाली हे आठवायला लागलं तशी एक नवीनच गोष्ट ध्यानी आली. ती अशी की या फुलापानांच्या झाड झाडोऱ्याच्या रंगीबिरंगी दुनियेशी माझा परिचयच मुळी पारिजातामार्फत झाला. माझ्या आठवणीतील फुलांच्या परिचयाचा विचार करता, मला जितकं आठवतं, त्यानुसार अगदी पहिल्याप्रथम फुल म्हणून जे माझ्या समोर आलं ते पारिजातकाचचं फुल होतं. त्याआधी भलेही कितीतरी फुलं आणि झाडं बघितली असतीलही पण जाणिवेच्या स्तरावर झालेली प्रथम अनुभूती ही प्राजक्ताचीच. सरकारी नोकरीमध्ये असलेल्या माझ्या वडिलांच्या क्वार्टरच्या भल्यामोठ्या आवारवजा अंगणात अगदी दारासमोरची भली थोरली दोन पारिजाताची झाडं, श्रावण भाद्रपदात बहरली की प्रत्येक पहाट दूर दूर पर्यंत सुगंधी सुबक गर्द केशरी दांड्यांच्या चांदणंफुलांची उधळण करायची. त्या बालवयात कधी भिजलेली तर कधी कोरडी प्राजक्त फुलं एक एक करून अलगदपणे फ्रॉकच्या ओच्यामध्ये वेचता वेचता पहाट अपुरी पडे. अंमळ जराशाने जरी दिवस वर आला की त्या दिवसातली कोवळी सूर्यकिरणे सुद्धा प्राजक्त फुलांना सोसवेनात. या सगळ्या उद्योगात आवारातील अनेक जण असायचे. आमच्या चिमुकल्या हातातील सुवासिक हसऱ्या फुलांच्या ओंजळींच्या आठवणीने परवाची पहाट अधिकच प्रसन्न करून टाकली. तेव्हापासून मधली काही थोडी वर्षे शिक्षणानिमित्त घराबाहेर राहण्याचा काळ वगळता अगदी आजतागायत घराच्या अंगणात पारिजात माझ्या सोबतीला आहे. पारिजात आपल्या अंगणात नसला तरीही श्रावण भाद्रपदात दरवळणारा तो, कुण्या घराच्या आवाराच्या भिंतीवरून डोकावणाऱ्या डहाळीवरील शुभ्र नाजूक पाकळ्या आणि केशरी दांड्यांच्या मोहक इवल्या फुलांचा सडा रस्त्यावर जाता येता दिसला की क्षणभर तरी तिथे घुटमळायला लावणारा वा तिथून जाताना पावलांची गती तरी मंदावणारा, नकळत सुवासाच्या लालसेने एक दिर्घ श्वास घ्यायला लावणारा. असं हे त्याचं बहरणं, दरवळण आणि लागोलाग तो सुंदर सुवासिक फुलांचा खजिना सर्वत्र उधळूण, त्याच्या अस्तित्वाची नोंद घ्यायला भाग पाडणारं त्याचं वागणं.

हा जादुई पारिजात वृक्ष पूढे पुराणकथांमधून भेटला. समुद्रमंथनातून उपजलेला एक अलौकिक असा स्वर्गलोकीचा वृक्ष म्हणून त्याची ओळख. सत्यभामेच्या हट्टाखातर श्रीकृष्णाने मोठ्या पराक्रमाने इंद्राला पराजित करून भूलोकी आणलेला. या कथेचा संदर्भ घेऊन बालकवी त्यांच्या सुप्रसिद्ध ‘श्रावणमास’ कवितेत लिहितात ‘पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला’ आणि या कवितेच्या निमीत्त्याने पारिजात पुन्हा आम्हाला क्रमिक पुस्तकाच्या पानावर एका वेगळ्या छापील रूपात व गंधात भेटला. आमच्या इयत्ता चौथीच्या शाळकरी वयात मराठी बालभारतीमधील बालकवींचा हा बहरलेला पारिजात आणि हर्षोल्हासित भामा वाचून फार आनंद व्हायचा. पण पुढे असे कळले की कसलं काय, सत्यभामेचा रोष पुन्हा उफाळून आला. ‘पारिजात माझ्या दारी, फुले का पडती शेजारी’ हे ‘बहरला पारिजात’ या नाटकातील ग. दि माडगूळकर यांनी रचलेलं आणि माणिक वर्मा यांनी गायलेलं हे नाट्यपद जेव्हा ऐकलं, तेव्हा कुठे भामेच्या रोषाचा उलगडा झाला. त्यायोगे पुन्हा एक पारिजात, त्याची आणखी एक खासियत आणि त्यासंबंधीची एक वेगळी पुराणकथा कळली. पारिजात सत्यभामेच्या दारी पण फुलांचा सडा शेजारच्या अंगणात अर्थात रुक्मिणीच्या. त्यामुळे भामेने मनाचा त्रागा करून घेणे हे ओघाने आलेच.

पुराणकथा आणि कवितांमधून बाहेर पडलेला पारिजात महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पुन्हा एकदा त्याच्या शास्त्रीय आणि सौंदर्यपूर्ण तपशिलासह डोकावला. जागतिक स्तरावर विचार करता पारिजाताच घराणं हे मूळचं भारतीय उपखंड आणि दक्षिणपूर्व आशिया या भागातलं. भारतामध्ये तर हा सर्वदूर आढळणारा, अत्यंत देखणेपणाने फुलणारा, एकूणच शुभंकर म्हणून सर्वज्ञात. पारिजाताच शास्त्रीय नाव निक्टेन्थिस आर्बोर्ट्रिस्टिस’ (Nyctanthes arbor-tristis) म्हणजेच रात्री फुलणारा आणि पहाटेच्या अंधुक प्रकाशात सूर्योदयापूर्वीच फुलोराचं जमिनीवर शिंपण करणारा. जो रात्रीला असंख्य सुगंधी फुलांनी दरवळतो जणू काही आकाशातल्या शुभ्र चांदण्या आपल्या अंगाखांद्यावर केशरी कुपीतील सुगंधाचे लेणे लेवून मिरवतोय आणि उजाडायला लागलं की एक एक करून सगळी फुलं अलगदपणे जमिनीवर झरायला लागतात व संपूर्ण झाड पुन्हा पुढल्या रात्री फुलायला मोकळं. रात्रीला बहरणाऱ्या या झाडाला इंग्लिशमध्ये नाईट ब्लूमिंग जास्मिन (Night blooming Jasmine आणि उजाडायच्या आधीच फुलांच्या होणाऱ्या गळतीमुळे त्याला ट्री ऑफ सारो (Tree of sarrow), सागरी प्रवाळासारख्या केशरी मोहक दांडीमुळे त्याला कोरल जास्मिन (Coral Jasmine) असेही म्हणतात. इथे शास्त्रीय दृष्ट्या जस्मिन या शब्दाचा इतर अनेक जस्मिन कुळातील सुगंधी फुलझाडांचा दुरान्वयानेही संबंध नाही. विविध भारतीय भाषांमध्ये त्याची अनेक नावं आहेत जसे हिंदी व गुजराती मध्ये हरसिंगार, तमिळ मध्ये पवळा मल्लिगाई, मराठी मध्ये पारिजातक वा पारिजात, मल्याळममध्ये पारिजातकम, बंगाली व संस्कृतमध्ये शेफालीका वा शिऊली, प्राजक्त… वगैरे. पौराणिक कथांमध्ये स्वर्गलोकीचा वृक्ष म्हणून ओळखला जाणारा प्राजक्त, गंध आणि सौंदर्यामध्ये ज्याचं नाव अग्रक्रमाने घेतले जातं, औषधी शास्त्रातील त्याची महत्ता आणि उपयुक्तता सुद्धा जगनमान्य आहे. फुलांच्या गंध आणि रूप सौंदर्याशिवाय पारिजातक अनेक औषधी गुणधर्म देखील बाळगून आहे. आसाम आणि बंगालमध्ये पारिजात फुलांनी अनेक पाककृतींमध्येही प्रवेश केलायं आणि त्यांच्या खाद्य संस्कृतीचा भाग झालीत. फुलांच्या केशरी दांड्या बऱ्याचदा पदार्थाला रंग येण्यासाठी महागड्या केशरला पर्याय म्हणूनही वापरतात असेही ऐकिवात आहे. दांड्यांचा गर्द केशरी नैसर्गीक रंग हा तर आपल्या रेशमी कापड उद्योगात अगदी अग्रक्रमाने वापरला जातो. झाडावरून जमिनीवर पडलेलं फुल देवपूजेत नको हा संस्कार पण त्याला अपवाद आहे तो केवळ पारिजात फुलांचा, ती वेचायची त्यावर पाणी शिंपावे व खुशाल देवाला वाहायची.

आकोटजवळील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या धारगडच्या निसर्गरम्य परिसरातील भटकंतीत असाच एकदा ध्यानीमनी नसताना, अगदी धारगडच्या महादेवाच्या गुंफेच्या खडकाळ डोंगर माथ्यावर उभा असलेला पारिजात, श्रावणात महादेवाला फुलांचा अभिषेक करीत असताना दिसला आणि कोण आनंद झाला हे शब्दात सांगणं कठीणच. हा वन्य परिसरात भेटलेला पारिजात न विसरणाजोगाच.

आज घडीचा हा अंगणात फुललेला पारिजात, काहीवर्षांपूर्वी मी नोकरीनिमित्ताने राहत असलेल्या माझ्या आकोटच्या घरातील पारिजाताच्या तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी. त्याचं झालं असं की आकोट येथील पारिजाताखाली उगवलेलं इवल्यासं रोपटं, आमच्या मित्र परिवारातील अमरावती निवासी कुटुंबाला भेटीदाखल दिलं. त्यांच्या अमरावतीच्या घरी त्याचा छान बहारदार वृक्ष झाला. पूढे जेव्हा आम्ही आमचं बिऱ्हाड आकोटहून अमरावती मुक्कामी हलवलं, तेव्हा त्यांनी त्याचं मैत्रीच्या नात्याने त्यांच्याकडील पुढल्या पिढीचा नवजात पारिजात आमच्या अंगणी लावायला आता पंधरा वर्षांहून जास्त काळ लोटला. कुठलेही फुलण्याचे निश्चित वेळापत्रक नसलेली, वर्षभरात केव्हाही ढगाळ दमट वातावरण जमून आले की लगेच पानोपानी पिवळसर पांढऱ्या हलक्या पोपटी छटेच्या असंख्य घमघमत्या सुगंधीत फुलांनी फुलून येणारी, स्वतःला डेरेदार करण्याच्या नादात चहुकडे विस्तारणारी कुंती वा कामिनी एकीकडे तर आकाशाशी स्पर्धा करणारा शेवगा दुसरीकडे, या दोघांच्या मध्ये माझ्या अंगणातील सध्याचा पारिजात, जमेल तसा अगदी निमूटपणे स्थिरावलाय. त्याची मुळी कुणाशीही स्पर्धा नाही.

जवळपास वर्षभर टपोऱ्या फुलांनी फुलणाऱ्या कोपऱ्यातील ऐटबाज चाफ्यासारखा तो डौलदारही नाही की कोवळ्या वा कडक उन्हाच्या तिरीपाचे कलाबूत लिलया अंगावर खेळवित चमचमणाऱ्या रुपेरी पानांनी भरारलेल्या समोरच्या सळसळत्या पिंपळासारखा देखणाही नाही. पारिजातकाकडे एरवी कुणाच्या कौतूकभरल्या नजरा वळणे तसे कठीणच. तो आपला वर्षभर निव्वळ खरखरीत पाने ओबडधोबड सालीच्या मातकट खोडानिशी ऊभा. जेव्हा दरवर्षी नित्यनेमाने श्रावण भाद्रपदातील दरेक रात्री त्याची फांदीनफांदी अगणित वेधक केशरी दांड्यांच्या नाजूक सुगंधित शुभ्र फुलांनी, जणू आकाशातील तारकाच, लगडून जाते तेव्हा हे स्वर्गीय सौंदर्य बघून अवघा भवताल नक्कीच चकित आणि पुलकित होत असणार यात शंका नाही. त्याला मात्र त्याच्या या अप्रतिम सौंदर्याचे काहीही नाही. ते विलक्षण सुवासिक, नाजूक आणि तितकंच रेखीव पांढऱ्या केशरी रंगाचं वैभव तो अंगावर मिरवीतही बसत नाही. अगदी पहिलं सूर्यकिरण अंगावर पडायच्या आत तो आपलं एक एक विलोभनिय सुगंधित आभूषण धरणीला अर्पण करायला लागतो, एक प्रकारचं अर्घ्य दानचं जणू. त्यासाठी तो वाऱ्याच्या हलक्याशा झुळकेची देखील वाट बघत नाही. फांदीवरून एकेक फुल गळताना बघणे, केवळ स्वर्गीय आनंद, त्यासाठी आपली पहाट मात्र मोकळी असायला हवी. बहुगुणी पारिजाताचं श्रावण भाद्रपदातील दरवळलेल दर्शन खरोखरीच विलोभनीय तर आहेच आणि आपसुकच त्याला बघून मनात दातृत्व, मांगल्य, शुचिता अशा भावनांचा उन्मेष उमटल्यास नवल ते काय. पारिजाताला मात्र सुंदर सुगंधी फुलांच्या ओंजळींची मुक्त्तहस्ते उधळण करणे एवढंच ठाऊक.

 ┉❀꧁꧂❀┉

©  डॉ. नेहा विनोद भटकर

अमरावती

मो ९९७५०३०६२७ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक मस्त आगळावेगळा अनुभव ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ एक मस्त आगळावेगळा अनुभव ☆ श्री सुधीर करंदीकर

मी ड्रायव्हर सीटवर आणि शेजारी आरटीओ (पुण्याच्या रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसचे मुख्य) असा प्रवास — सातारा ते पुणे”

शीर्षक जरा विश्वास न बसण्यासारखं नक्कीच वाटलं असेल. पण हा माझा एक खरा अनुभव आहे. त्याचं झालं असं —

साधारण 1990 ची घटना असेल. मी टेल्को कंपनी मध्ये (म्हणजे सध्याची टाटा मोटर्स) चिंचवडला फाउंड्री या विभागात सर्विस ला होतो.

मशीन ची दुरुस्ती हा विभाग माझ्याकडे होता. ट्रक ला लागणाऱ्या सगळ्या कास्टिंगचा पुरवठा आमच्या फाउंड्री मधून होत असे.

निरनिराळ्या कास्टिंगचे साचे तयार करण्याकरता परदेशातून आणलेली खूप मोठी मोल्डिंग मशीन होती. त्याच मशीन मध्ये एक अजस्त्र पार्ट होता त्याचे नाव होते Anvil.

काही वर्षांच्या वापरानंतर हा भाग वियर आऊट होतो आहे हे लक्षात आले. म्हणून जर्मनीहून नवीन पार्ट मागवण्यात आला. नवीन पार्ट मशीन मध्ये बसवला आणि जुना पार्ट रिपेयर होणार नाही या कल्पनेने स्क्रॅप यार्ड मध्ये नेऊन ठेवण्यात आला. याचे वजन साधारण चार टन होते, उंची साधारण आठ फूट आणि डायमीटर साधारण तीन फूट होता. अशा अजस्त्रेमुळे कोणी स्क्रॅप नेणारे पण त्याला नेत नव्हते.

साहेबांच्या असे लक्षात आले की हा पार्ट रिपेअर करून घ्यायला काय हरकत आहे. कारण आता पुन्हा नवीन पार्ट मागवायचा झाला तर त्याची किंमत साधारण 16 लाख रुपये आहे. जुना पार्ट रिपेअर करता आला तर बराच खर्च वाचू शकेल. साहेबांनी हे काम माझ्यावर सोपवले.

रिपेअर चे काम कसे करता येईल याचा मी आराखडा तयार केला. हे काम कुठे करून घेता येईल याची चौकशी सुरू केली. साताऱ्याजवळ सातारा रोड येथे भारत फोर्ज यांचे मोठे वर्कशॉप आहे, तिथे हे काम होऊ शकणार होते. तिथला सेटअप बघणे, त्यांना कामाची कल्पना देणे याकरता तिथे जाणे आवश्यक होते. मिटिंग मध्ये साहेबांनी लगेच याला ओके दिले. बाहेर गावी जायचे म्हणजे कंपनी टॅक्सी ची व्यवस्था करत असे. मटेरियल्स डिपार्टमेंटचे प्रमुख श्री के एस राव म्हणाले टॅक्सी च्या ऐवजी आपल्या ऑफिसची TATA 206 गाडी न्यायला हरकत नाही. साहेबांनी ओके दिला.

टेल्को नी 206 ही नवी गाडी नुकतीच लॉन्च केली होती. आणि एक नवी कोरी गाडी आमच्या डिव्हिजन ला मिळाली होती.

संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मी गाडीची किल्ली ताब्यात घेतली. आणि गाडी घेऊन घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठला घरून सातारा रोड कडे निघालो. कारच्या मानाने या गाडीची लांबी रुंदी बरीच जास्त आहे. गाडीचं समोरचं बोनेट खूपच लांब आहे, आणि ड्रायव्हर सीटवरून बोनेट चा काहीच भाग दिसत नाही. त्यामुळे समोरचा बंपर पण दिसत नाही. त्यामुळे गर्दीच्या रस्त्यावर गाडी चालवताना जरा मुश्किल होत होती.

भारत फोर्ज कंपनीत पोहोचलो. तिथे श्रीयुत रेड्डी प्रमुख होते. त्यांना भेटून कामाची कल्पना दिली. त्यांनी रिपेअर करण्याची एक वेगळी कल्पना समोर मांडली. ती मला जास्त आवडली म्हणून मी लगेच त्यांना त्याचे कोटेशन तयार करायला सांगितले. तिथला सेटअप बघितला आणि काम व्यवस्थित होऊ शकेल याची खात्री पटली. साधारण दोन लाखाचे कोटेशन होते. दुपारी जेवायला सातारा येथे गेलो होतो.

दुपारी चार वाजता साहेबांना बाय करून पुण्याकडे निघालो. काम छान होऊ शकते म्हणून खुशीत होतो. थोडे पुढे गेलो आणि सातारा-पुणे रोडला लागलो. काही अंतरावर डावीकडे ट्रॅफिक पोलीस च्या दोन गाड्या उभ्या होत्या. एक ऑफिसर उभे होते आणि दोन ट्राफिक पोलीस गाडी थांबवा असा हाताने इशारा करत होते.

मनात विचार आला — की माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे पण बरोबर गाडी चे कुठलेही कागदपत्र नाहीत आणि माझे ऑफिसचे आय कार्ड पण नव्हते. मी मनातून देवाला नमस्कार केला आणि गाडी तिथे थांबवली. काच खाली केली आणि नमस्कार म्हणालो.

ट्रॅफिक पोलीस : साहेब गाडी कुठे चालली आहे

मी : पुण्याला

ट्रॅफिक पोलीस : आरटीओ साहेबांना बरोबर नेणार का. साहेबांची गाडी बंद पडली आहे.

मी : नक्कीच घेऊन जाईन.

लगेचच बाजुच्या दारातून साहेब आत आले. पोलिसांनी दार बंद केले आणि साहेबांना जोरदार सॅल्यूट ठोकला. आणि आमची गाडी पुण्याकडे निघाली. गाडीत साहेबांबरोबर छान गप्पा झाल्या. आपल्या गाडीत बाजूला खुद्द आरटीओ बसले आहेत आणि आपण गाडी चालवत आहोत याची मला मजा वाटत होती.

पुण्यात शिरल्यानंतर लागणाऱ्या चौकांमध्ये आमची गाडी बघून पोलीस सॅल्यूट करत होते. साहेब म्हणाले निलायम टॉकीज पाशी गाडी थांबवा तिथे मला नेण्याकरता गाडी आली आहे. मी गाडी साईडला उभी केली. तिथे पोलिस उभे होतेच. त्यांनी साहेबांना सॅल्यूट केला आणि दार उघडले. साहेबांनी उतरतांना मला थँक्स दिले आणि मी गाडी छान चालवतो याबद्दल कॉम्प्लिमेंटस् पण दिले.

मी गाडी सुरु केली आणि घराकडे निघालो.

माझे साताऱ्याचे कामं छान झाले होते, आणि ते काम व्यवस्थित पूर्ण होणार अशी खात्री पण मनात तयार झाली होती. आणि येताना आरटीओ बरोबर प्रवास करण्याची अशक्यप्राय म्हणा किंवा दुर्मिळ म्हणा, अशी संधी पण मिळाली होती. एकंदरीत मजा आली.

– – life is to enjoy.

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अग्नी किंवा तेज ऊर्जा ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ अग्नी किंवा तेज ऊर्जा ☆ विभावरी कुलकर्णी ☆

अग्नी किंवा तेज तत्त्व हे पंचमहाभूतांपैकी एक अत्यंत प्रभावशाली तत्त्व आहे. मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर त्याचे अनेक फायदे होतात.

शारीरिक फायदे

पचनशक्ती (जठराग्नी) आयुर्वेदानुसार शरीरातील अग्नी अन्नाचे पचन करतो. हा अग्नी संतुलित असल्यास पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

रोगप्रतिकारशक्ती सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून मिळणारे ‘तेज’ शरीरातील जंतूंचा नाश करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते.

चयापचय 

शरीरातील उष्णता रक्ताभिसरण सुरळीत ठेवते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राखते.

मानसिक आणि बौद्धिक फायदे

स्पष्टता आणि निर्णयक्षमता प्राप्त होते.

‘तेज’ म्हणजे प्रकाश. ज्याप्रमाणे अंधारात प्रकाश दिशा दाखवतो, त्याचप्रमाणे तेज तत्त्वाच्या प्रभावामुळे बुद्धी तल्लख होते आणि संभ्रम दूर होऊन विचारांमध्ये स्पष्टता येते.

आत्मविश्वास आणि उत्साह मिळतो

तेज ऊर्जेमुळे माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. नैराश्य किंवा आळस दूर करून कार्य करण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी ही ऊर्जा आवश्यक असते.

अध्यात्मिक फायदे

नकारात्मकतेचा नाश ज्याप्रमाणे अग्नी अशुद्ध गोष्टी जाळून शुद्ध करतो, त्याचप्रमाणे तेज ऊर्जा मनातील नकारात्मक विचार आणि विकार भस्म करण्यास मदत करते.

तेजस्वी व्यक्तिमत्व उपासनेतून किंवा ध्यानधारणेतून तेज तत्त्व आत्मसात केल्यास व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि स्वभावात एक प्रकारचे ‘ओज’ किंवा तेज जाणवते, ज्यामुळे समाजात त्याचा प्रभाव पडतो.

तेज ऊर्जा मिळवण्याचे काही मार्ग

१ सूर्योपासना: सकाळी लवकर कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे किंवा सूर्यनमस्कार घालणे.

२ दीप दर्शन: शुद्ध तुपाचा दिवा लावून त्याकडे त्राटक (एकाग्रतेने पाहणे) करणे. या मुळे एकाग्रता वाढते. मनातील नकारात्मकता भस्म होऊन मानसिक शक्ती मिळते.

३ सात्त्विक आहार: शरीरातील जठराग्नी प्रदीप्त ठेवणारा ताजा आणि संतुलित आहार योग्य वेळी घेतल्यास शरीरातील अग्नी, अन्नाचे रूपांतर ऊर्जेत करतो. जास्त मसालेदार व जास्त तिखट अन्न, जास्त उष्ण पदार्थ यामुळे पित्त वाढते. ते तेज किंवा अग्नीचे असंतुलित स्वरूप आहे. ते टाळण्यासाठी शीत व पाचक पदार्थांचा समावेश करावा.

जर हा अग्नी मंद झाला तर शरीरात आळस व रोग निर्माण होतात.

४ प्राणायाम व योग : भस्त्रिका व कपालभाती या सारख्या प्राणायामा मुळे शरीरातील उष्णता वाढते. व रक्ताभिसरण सुधारून मानसिक जडत्व दूर होते.

५ उष्ण पाण्याचे सेवन : कोमट पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आणि चयापचय क्रिया सुधारते.

थोडक्यात सांगायचे तर, अग्नी किंवा तेज ऊर्जा ही माणसाला केवळ जिवंत ठेवत नाही, तर त्याला प्रगतीसाठी आवश्यक असलेले चैतन्य आणि दीप्ती प्रदान करते.

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जडेल नाते प्रभुशी तयाचे… – लेखक : डॉ. सतीश पवार ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ जडेल नाते प्रभुशी तयाचे– लेखक : डॉ. सतीश पवार ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

डॉ. विवेक आणि डॉ. सीमा रेडकर 

आजोळ, दिलासा, विसावा…

डॉ विवेक व डॉ सीमा रेडकर या दाम्पत्यास आज लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा व त्यांच्या मोठ्या समाजकार्याचा छोटासा आढावा.

आज सानेगुरुजी असते तर त्यांनी लिहिले असते,

करी जतन जो वृद्धांचे

जडेल नाते प्रभुशी तयाचे.

कारण वृद्ध ही आज एक टाकाऊ चीझ झाली आहे. सिंधुदुर्गचे एक डॉक्टर दाम्पत्य आपला वेळ धन देऊन त्यांच्यासाठी सेवा उभ्या करतात हे समाजाला व डॉक्टर लोकांना दिशादर्शक आहे.

लहान मुलांना कोणीही उचलून घ्यायला तयार असतो. पण वृद्ध मात्र कोणाला नको असतात. सिंधुदुर्ग मधील वृद्ध लोकांची संख्या वाढते आहेत. काही जणांना मुले नाहीत तर ज्यांना मुले आहेत ती बाहेर आहेत. अशा वृद्धांची काळजी घ्यायचे मालवणच्या डॉ विवेक व डॉ सीमा रेडकर यांच्या मनात आले. वृद्धाश्रम नाही तर माणूस रिटायर झाल्यावर कसे जगावे अशी संस्था काढायचे त्यांनी ठरवले. ही संकल्पना कै दिलीप लाड यांची व आजोळ हे नाव ठेवले डॉ सीमा रेडकर यांनी.

आजोळ म्हणजे आजी आजोबांचे घर. या प्रकल्पात जे जे नेरुरकर व इतर लोकांचाही मोठा हातभार लागला.

आजोळ नेरूर, ता. कुडाळ इथे 25 मे 2011 ला चालू झाले आणि तेथील उत्तम काळजीमुळे वृद्धांचे आयुष्य वाढू लागले. आयुष्य वाढल्याने त्यांना वृद्धपणातील अनेक आजार होऊ लागले. मग या शारीरिक व मानसिक आजाराची काळजी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन या संकल्पनेचा जन्म झाला व रेडकर रिसर्च संस्थेने दिलासाची स्थापना रेडी इथे केली.

येथील काम पाहून आरवली येथील शेट्ये ट्रस्टने डोळ्यांच्या शस्त्रक्रिया कक्ष व कॉन्फरन्स हॉल दिला.

येथील वृद्धांची सेवा सुरेशजी झांट्ये व त्यांच्या ट्रस्टने पाहिली. अशा लोकांसाठी प्रशस्त व सर्व सोयीने युक्त हॉस्पिटल असावे ते त्यांचे मत होते. त्यांनी रमाबाई नारायण प्रभू झांट्ये ट्रस्ट मार्फत विसावा नावाची छान वस्तू रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरला चालवण्यासाठी सुपूर्द केली.

इथे तीन भाग आहेत. पहिला भाग अल्पकाळाने आजारी असणाऱ्या वृद्ध रुग्णांसाठी. इथे पेशन्ट 8 ते 10 दिवस ठेवून बरे करून घरी पाठवले जातात. मोतीबिंदू, संधिवात, ब्लड प्रेशर, हृदयविकार अशा आजारांची तपासणी होते. दारिद्र्य रेषेखालील लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होते. पर्यटनाचा आनंद लुटला लुटता ब्लडप्रेशर, हृदयविकार, मधुमेह या प्राणघातक आजारांचा चेकअप एकाच वेळी करता येतो, अशी अत्याधुनिक यंत्रणा रेडी या खेड्यात उपलब्ध आहे. त्याला होलटर मॉनिटरिंग, ambulatory ब्लडप्रेशर मॉनिटरिंग व continuous ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणतात.

इथे तुम्ही भेट दिल्यावर तुम्हाला दिसेल की विसावा व दिलासा या रेडकर हॉस्पिटल ट्रस्टच्या शाखा वार्धक्याने थकलेल्या वृद्धांची उत्तम काळजी घेत आहेत. त्यांच्या सेवेसाठी सक्षम स्टाफ आहे, उत्तम स्वच्छता आहे, मनोरंजन, योगसाधना यांची सोय आहे. शारीरिक परिस्थितीमुळे विकल झालेले वृद्ध खाटेवरून खाली पडू नयेत म्हणून लहान मुलांच्या पाळण्याला लावतो तशा पट्ट्या त्यांच्या खाटेला लावल्या आहेत, अशा अनेक बारीक बारीक गोष्टी तुम्हाला दिसतील.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व ना नफा ना तोटा तत्वावर चालू आहे. या ट्रस्टच्या संचालकांना कोणतेही मानधन याबाबत मिळत नाही.

ज्या मुलांना आपल्या आईवडिलांना सरकारी दवाखान्यात पाठवायचे नाही पण फाईव्ह स्टार वृद्धाश्रम हॉस्पिटलही परवडणारे नाही, अशा दारिद्रय रेषेजवळ घुटमळणाऱ्या खऱ्याखुऱ्या मध्यमवर्गीयांसाठी या विसावा व दिलासा यांची गरज आहे.

रेडकर ट्रस्ट तर्फे इथे सरकारमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स घेण्यात येतो. आतापर्यंत रेडी पंचक्रोशीतील 180 हुन अनेक मुली 10 वि, 12 वि होऊन नन्तर इथे सिस्टर झाल्या आहेत व त्यांना जॉब मिळाला आहे.

**

डॉ विवेक रेडकर हे सिंधुदुर्ग मधील पहिले MD मेडिसिन डॉक्टर. त्यांची जडणघडण सामाजिक बांधिलकी असणारे त्यांचे आईवडील यांच्यामुळे झाली. त्यांचे वडिल एकनाथ रेडकर यांनी मिठबाव डी एड कॉलेज, कसाल व वेतोरे हायस्कूल इथे झोकून देऊन योगदान दिले. आई सुशीला रेडकर हिंदी शिक्षिका कन्या शाळा मालवण येथे होत्या.

निवृत्ती नंतर दोघांनी रेडी इथे खाण मालकांविरोधात न्यायाचा लढाही दिला.

रेडकर हॉस्पिटल रिसर्च संस्था 14/12/2005 ला स्थापन झाली असून मालवण, रेडी व धारगळ गोवा इथे सेवा देत असून हल्लीच त्यांना अधिकृत वैद्यकीय संशोधन केंद्र म्हणून केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून असे ते कोकणातील एकमेव केंद्र आहे.

वैद्यकीय संशोधन हे डॉ विवेक रेडकर सरांची पॅशन असून त्यांनी 21 पेक्षा जास्त शोधनिबंध अमेरिका, युरोप अशा चौदा देशात सादर केले आहेत. हत्तीपाय या रोगावर त्यांनी मालवण शहरात राबवलेली मोहीम सर्वश्रुत आहे तसेच हल्लीच केलेले कोविड काळातील मिथिलीन ब्लुवरील संशोधन सुद्धा प्रसिध्द व सर्वमान्य झाले आहे.

हीच संशोधनाची आवड त्यांचा मुलगा डॉ सागर व सून डॉ सुप्रिया यांच्यात उतरली असून कोविडच्या covaxin या लसीवरील संशोधनासाठी देशातील फक्त दहा हॉस्पिटलची निवड केली होती त्यात एक होते धारगळ, गोवा येथील रेडकर हॉस्पिटल. ती अत्यंत अभिमानाची बाब आहे. या संशोधनात त्यांना दुसरा क्रमांक मिळाला त्यामुळेच त्यांना अधिकृत वैद्यकीय संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळायला सोपे झाले.

रेडकर रिसर्च सेंटर लहान मुलांचा मधुमेह तसेच लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया यावरही मोलाचे काम करत आहे. शाळेतील मुलांच्या आरोग्य तपासणीतुन त्यांनी 170 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया मुंबईतील डॉक्टर लोकांच्या सहकार्याने मोफत केल्या आहेत.

सरांच्या दोन्ही बहिणी अलका नारकर व संगीता तोरकर शिक्षिका म्हणून रिटायर होऊन आता सामाजीक कार्याला वाहून घेतले आहे व आपल्या बंधूंना मदत करत आहेत.

**

कुठे गाजावाजा प्रसिद्धी न करता सिंधुदुर्ग मधील एक डॉक्टर दाम्पत्य आयुष्याच्या संध्याकाळी थकलेल्या वृद्ध लोकांची सेवा करत आहे. बरेच जण आपल्या घरातील वृद्धांना धड बघत नाहीत, तर इथे दुसऱ्यांच्या घरातील वृद्धांची सेवा केली जात आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.

आम्ही सिंधुदुर्गचे डॉक्टर या सामाजिक भान बाळगणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला मानवंदना देतो. खूप शुभेच्छा.


लेखक : डॉ सतीश सदाशिव पवार,

कणकवली

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ “उचलला हारा..” – कवयित्री : बहिणाबाई चौधरी – रसग्रहण : अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ “उचलला हारा..” – कवयित्री : बहिणाबाई चौधरी – रसग्रहण : अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆


उचलला हारा… बहिणाबाईंची कविता

उचलला हारा, हारखलं मन भारी ।

निजला हार्‍यात, तान्हा माझा शिरीहारी ।।

डोईवर हारा, वाट मयाची धरली ।

भंवयाचा मया, आंब्याखाले उतरली ।।

 *

उतारला हारा, हालकलं माझं मन ।

निजला हार्‍यात, माझा तानका ‘सोपान’ ।।

 *

लागली कामाले, उसामधी धरे बारे ।

उसाच्या पानाचे, हातीपायी लागे चरे ।।

 *

ऐकूं ये आरायी, धांवा धांवा घात झाला ।

अरे, धांवा लव्हकरी, आंब्याखाले नाग आला ।।

 *

तठे धांवत धांवत, आली उभी धांववर ।

काय घडे आवगत, कायजांत चरचर ।।

 *

फना उभारत नाग, व्हता त्याच्यामधीं दंग ।

हारा उपडा पाडूनी, तान्हं खेये नागासंगं ।।

 *

हात जोडते नागोबा माझं वांचव रे तान्हं ।

अरे, नको देऊं डंख, तुले शंकराची आन ।।

 *

आतां वाजव वाजव, बालकिस्ना तुझा पोवा ।

सांग सांग नागोबाले, माझा आयकरे धांवा ।।

 *

तेवढ्यांत नाल्याकडे, ढोरक्याचा पोवा वाजे ।

त्याच्या सूराच्या रोखानं, नाग गेला वजेवजे ।।

 *

तव्हां आली आंब्याखाले, उचललं तानक्याले ।

फुकीसनी दोन्हीं कान, मुके कितीक घेतले ।।

 *

देव माझा रे नागोबा, नही तान्ह्याले चावला ।

सोता व्हयीसनी तान्हा, माझ्या तान्ह्याशीं खेयला ।।

 *

कधीं भेटशीन तव्हां, व्हतील रे भेटी गांठी ।

येत्या नागपंचमीले, आणीन दुधाची वाटी ।।

………

कवितेतल्या मोजक्या काही ओळीत किती सहजपणे एक थरारक प्रसंग उभा केला आहे बहिणाबाईंनी!

यातले काही शब्द भुरळ घालणारे आहेत.

प्रसंगाचे कथन असल्याने व कवितेत सांगायचा आहे म्हटल्यावर जिथून या प्रसंगास सुरवात झाली त्यानेच कवितेची देखील.

‘उचलला हारा’…

डोक्यावरच्या हाऱ्यात बाळ झोपलाय. म्हणून ‘शिरीहारी’. श्रीहरी नाही. किती गोड वाटते ते ऐकायला. अन कविता गातांना मिटर चुकला असते बहुतेक.

अन वाट मयाची धरल्ये. मयाची…म्हणजे मळ्याची.

आंब्याखाली हारा ठेवला. मनात कालवाकालव झाली. त्या बाळाला तसे तिथे एकट्याला सोडून उसाच्या फडात कामाला जातांना.

काम करतांना उसाची धारदार पाती हातापायास चरे पाडत होती.

आणि इतक्यात..

इतक्यात मोठ्या आवाजात ‘आरायी’ म्हणजे आरोळी ऐकू आली “धावा रे धावा! आंब्या खाली नाग निघालाय”

आंब्याखाली नागोबा?????

हे ऐकताच चर्र झाले. अरे देवा हे काय घडतंय. धावंतच पोहोचले आंब्याशी. पहाते तर काय? हारा पालथा पाडून बाळ व नागोबा दोघेही दंग आहेत खेळण्यात! तान्हं खेये नागासंग. अरे बापरे!

 

हात जोडले नागोबाला. शपथ घातली त्याला. तुला शंकराची शप्पथ आहे नागोबा. डंख नको मारू माझ्या सोपानाला.

आणि धावा केला त्या ‘बालकिसना’चा, बाळकृष्णाचा. अरे वाजव तुझा पावा, अन बोलाव त्या नागाला तुझ्याकडे. ऐक रे माझे, वाजव तुझा पावा.

आणि हे मी बोलत्ये तोच…

नाल्यापलिकडून ‘ढोरक्याचा’, म्हणजे गुराख्याच्या बासरीचे सुर ऐकू येवू लागले. आणि मग त्या सुरांच्या जादूने त्या रोखाने नाग निघून गेला.

 

तो निघून जाताच मी धावले आंब्याकडे. तान्ह्याला उचलून घेतले. कवटाळले. कानांत त्याच्या फुंकरले. आणि चटचट मुके घेतले त्याचे.

“नागोबा! मी आजूबाजूस नव्हते. तू त्याला डसला नाहीस. देवच रे बाबा तू. स्वतः तान्हा झालास व माझ्या या तान्ह्यास खेळवलेस.

नागोबा.  होत राहील आपली भेट. आणि हो, येणाऱ्या नागपंचमीला तुझ्याकरता दुधाची वाटी मी येईन घेऊन!”

 

रसास्वाद : अनंत गद्रे

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खिडकीतून दिसणारे पक्षीजग ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ खिडकीतून दिसणारे पक्षीजग ☆ शालिनी जोशी

आमच्या घराच्या शेजारच्या घरात आंबा आणि चिकू यांची मोठी झाडे आहेत. दोन्ही जवळ जवळ असल्याने एकमेकात मिसळून गेली आहेत. दोन्ही झाडे कायम हिरवीगार असतात. चिकू तर जास्तच, त्याची पानगळ कधी होते आणि नवीन पालवी कधी येते कळतच नाही. सहाजिकच असा वृक्षसंभार म्हणजे पक्षांचे आणि छोट्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे निवासस्थान. आमच्या घराची खिडकी समोरच येते. त्यामुळे त्यांचे निरीक्षण करणे हा माझा छंद.

बरेच पक्षी झाडांना भेट देतात. कधी भारद्वाज आपल्या भारदस्त आवाजात साद घालतो. मला तो शाल पांगरलेल्या प्रौढ राजासारखा वाटतो. त्याच्या पाठीचा मखमली तांबूस रंग त्याला शोभून दिसतो. पांढऱ्या ठिपक्यांची साडी नेसलेली कोकिळा. आपल्या कर्कश आवाजात काळ्याभोर रंगाच्या, लाल डोळ्यांच्या, मंजुळ आवाजाच्या कोकिळाला साथ घालत असते. छोट्या सनबर्डची पळापळ  अखंड सुरू असते. बारीकशी पिवळी चोच असणारी साळुंकी दबक्या पावलांनी वावरत असते. खारुताई खालीवर अखंड धावत असते. या झाडावरून त्या झाडावर उडी मारणे हा तिचा आवडता छंद. शेपटीच्या हलण्यावर आवाज करते, का आवाजाच्या तालावर शेपटी हरवते ते कळत नाही. मात्र दोन्ही क्रिया अखंड आणि एकदमच सुरू असतात, एवढे मात्र खरे. एक दोनदा दुर्मिळ शिक्रा व चष्मेवाला यांनीही दर्शन दिले. टिट, रॉबिन, पोपट, कावळा ही अधून मधून असतात. बुलबुलांचा बुलबुलाट अखंड सुरू असतो. तो विविध आवाजात ओरडतो. म्हणून मी त्याच्या ओरडण्याला बुलबुलाट म्हणते. एकदा आमच्या घराच्या खिडकीच्या ग्रीलवर त्याने घरटे केले. काड्या काड्याजमवून गोल वाटी तयार झाली. एक दिवस पाहिले तर जोडी ग्रील वर बसलेली. अंडी कधी घालतील याची आम्ही वाट पाहत होतो. पण कोणीच फिरकले नाही. घरटे खाली लोंबताना दिसले. बहुतेक महाराणींच्या पसंतीस महाल उतरला नाही. काय करणार. पण या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या डोक्यावर टोपी असते. तपकिरी काळ्या रंगाचा, पांढरे पोट, रुंद चोच असलेला हा पक्षी गालावर दोन बाजूला लाल भडक रंगाचे डाग मिळवतो. शेपटीखालीही तसाच मोठा लाल टिपका असतो. समोरून पाहिला तर काळ्या शेंडीचा पांढर्या दाढीचा साधूच तो वाटतो. सगळे पक्षी मिळून काही वेळेला इतका कलकलाट करतात की पक्षांची शाळा भरली असावी.

या सर्वांपेक्षा माझे लक्ष वेधले ते नाचण किंवा नाचरा यानी(fantail). चिमणी सारखा छोटासा पक्षी, दहा-बारा सेंटीमीटर लांब, छोटीशी चपटी चोच आणि मातकट रंग. रंगाचे कोणतेही सौंदर्य नाही. पण एका जागेवर थांबली की शेपटीचा पिसारा फुलवते, तो पाहत राहावा. या पक्षाला स्थिरता नाही. अखंड पिसारा फुलवीत नाचत असतो. त्यामुळे नाव नाचण. मोराचे नृत्य भारदस्त व सौंदर्यवती नर्तकीच्या  नृत्याची आठवण करून देते. तर नाचण तुरू तुरू चालणारी बारीक अशी छोटी बालिका. अखंड उत्साहाचा झराच. आता इथे दुसऱ्या क्षणी तेथे पसारा फुलवून तयार. या फुलवलेल्या पिसार्याची नागमोडी किनार त्याची शोभा वाढवते. मला उत्साह देणारी ही नाचण. अखंड घरात बसणारी मी. पण नाचण मला अखंड काहीतरी करायची उमेद देते. त्यामुळे मी काहीतरी लिहीत, वाचत राहते. म्हणूनच मला कार्य प्रवण करणाऱ्या या नाचणचे कौतुक.

 

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काल देव पुन्हा भेटला.. ” – लेखक : श्री सुबोध गाडगीळ ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “काल देव पुन्हा भेटला.. ” – लेखक : श्री सुबोध गाडगीळ  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मी म्हटलं, “हल्ली जरा जास्तच भेटतोयस. ”

“तुझं वय बघता networking वाढवून ठेवलेलं बरं, ” तो म्हणाला.

“काहीतरीच काय! ”

“मग तूच सांग. तुमच्याकडे पन्नाशीच्या पुढे डॉक्टर, CA आणि देव या तिघांशी संबंध चांगले ठेवायला सुरुवात होते की नाही? ”

मी हसलो.

देव आज चांगल्या mood मध्ये दिसत होता.

मी सहज विचारलं, “एक सांग. माझ्या आयुष्याचा हिशोब तुझ्याकडे असतो का? ”

“असतो. ”

“सगळा? ”

“सगळा. ”

“म्हणजे मी काय कमावलं, काय खर्च केलं, कुठे गेलो, काय केलं…? ”

“नाही रे. एवढा फालतू data ठेवायला माझ्याकडे server space नाही. ”

मी चमकलो.

“मग कसला हिशोब? ”

तो काही बोलला नाही.

मीच पुढे म्हणालो, “मला वाटलं असेल काहीतरी मोठं account. पुण्य किती, पाप किती… शेवटी net balance. ”

“तुम्ही माणसं ना, मला फार कमी लेखता. मला CA समजता की चित्रगुप्ताचा junior? ”

“मग काय नोंदवतोस? ”

“उदाहरण देतो. परवा तू एका माणसाला फोन केला होतास. ”

“कुठल्या? ”

“ज्याच्याकडून तुला काही काम नव्हतं. ”

मी आठवायचा प्रयत्न केला.

“अच्छा! सहज केला होता. ”

“माझ्याकडे तो सहज नव्हता. ”

“म्हणजे? ”

“त्याचा दिवस खराब गेला होता. तुझ्या दहा मिनिटांच्या फोनने जरा बरा झाला. ”

मी काही बोललो नाही.

“आणखी एक. काही दिवसांपूर्वी घरी सगळे बसले होते आणि तुम्ही कसल्यातरी फालतू विषयावर पोट धरून हसलात. ”

“त्याचीही entry? ”

“मोठी. ”

“आणि मी केलेली महत्त्वाची कामं? ”

“कुठली? ”

“इतकी वर्षं काम केलं, व्यवसाय उभा केला, पैसे कमावले, जबाबदाऱ्या पार पाडल्या… ”

देवाने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं.

“त्यासाठी तुला पैसे मिळाले ना? ”

“हो. ”

“मग त्याचं credit पुन्हा माझ्याकडे कशाला मागतोयस? ”

हा मुद्दा मला आवडला नाही.

“म्हणजे achievements ना काही किंमतच नाही? ”

“आहे ना. भरपूर आहे. पण गंमत अशी आहे की तुम्ही ज्या गोष्टींचा हिशोब आयुष्यभर ठेवता, त्यांचा मला फारसा ठेवावा लागत नाही. आणि ज्या गोष्टी तुम्ही कुठेच नोंदवत नाही, त्या मला जपून ठेवाव्या लागतात. ”

आता मी शांत झालो.

“उदाहरणार्थ? ”

“तुझ्यामुळे कोणाचा अपमान टळला. कोणाला गरज असताना तू थांबलास. कोणाचं पूर्ण ऐकून घेतलंस. स्वतः बरोबर असूनही एखादा वाद वाढवला नाहीस. कुणाच्या आनंदात मनापासून आनंदी झालास. एखाद्या माणसाला त्याच्या कठीण काळात ‘मी आहे’ एवढंच सांगितलंस. ”

मी म्हणालो, “पण यापैकी बरंचसं मला स्वतःलाही आठवत नसेल. ”

“म्हणून तर मी लिहून ठेवतो! ”

त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच खोडकर हसू आलं.

मला अचानक एक शंका आली.

“पण मग चुका? त्या पण लिहितोस? ”

“नक्की. ”

“किती आहेत? ”

“तुला उद्या काही काम नाही ना? ”

“एवढ्या? ”

“अरे, मी देव आहे. जादूगार नाही. ”

मी हसलो.

थोड्या वेळाने विचारलं,

“मग शेवटी माझ्या खात्यात काय उरेल? ”

तो म्हणाला,

“हीच तुमची अडचण आहे. प्रत्येक नातं, प्रत्येक काम, अगदी आयुष्यसुद्धा तुम्हाला शेवटी profit की loss एवढ्यात काढायचं असतं. ”

“मग हिशोब कशासाठी? ”

देव काही क्षण शांत राहिला.

“हिशोब तुला न्यायला नाही रे. तुला कधीतरी दाखवायला. ”

“काय? ”

“तू आयुष्यभर ज्या गोष्टींना मोठं समजत होतास, त्यातल्या बऱ्याच गोष्टी किती लहान होत्या आणि ज्या क्षणांना ‘यात काय विशेष? ’ म्हणून विसरून गेलास, तेच प्रत्यक्षात किती मोठे होते. ”

तो उठून निघाला. मी मागून विचारलं,

“मग आत्तापासून काय करू? ”

त्याने मागे न बघताच उत्तर दिलं,

…. “काही वेगळं करू नकोस. नाहीतर उद्यापासून प्रत्येकाला मदत करून मनात म्हणशील — ‘देवा, entry केलीस ना? ’”

मी जोरात हसलो.

तो थोडा पुढे गेला आणि थांबला.

“फक्त एक गोष्ट कर. ”

“काय? ”

“तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टींची पावती मिळत नाही, त्यांना कमी किंमत देऊ नकोस. ”

आणि तो निघून गेला.

आपल्याला पगाराची slip मिळते. Investment चं statement मिळतं. धावण्याला वेळ मिळतो. कामाला appraisal मिळतं. घराला market value मिळते. Social media वर likes मिळतात.

म्हणून त्या गोष्टी खऱ्या वाटतात.

पण आईबरोबर निवांत बसलेली दहा मिनिटं, जुन्या मित्राचा विनाकारण आलेला फोन, मुलांबरोबर झालेलं फालतू हसणं, कोणीतरी अडचणीत असताना आपण न बोलता त्याच्या बाजूला उभं राहणं, यापैकी कशाचीही receipt मिळत नाही.

त्यामुळे बहुधा आपण त्यांचा हिशोबच ठेवत नाही आणि कदाचित आयुष्याची सगळ्यात मोठी गंमत हीच आहे, ज्याचा आपण काटेकोर हिशोब ठेवतो, ते शेवटी इथेच राहून जातं.

आणि ज्याचा कधी हिशोबच ठेवला नाही, तेच बहुधा आपल्याबरोबर येतं.

लेखक : श्री सुबोध गाडगीळ

प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाळवंटातील हिरवळ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ वाळवंटातील हिरवळ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर स्वागत समारंभाचे आयोजन केले जाते. हल्ली त्यासाठी ‘ रिसेप्शन ‘हा इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. कधी कोणाचा गौरव सोहळा असतो तर कधी कोणाची एकसष्ठी किंवा एकाहत्तरी किंवा सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम अशा विविध कारणांनी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांना आपण हजेरी लावतो. कार्यक्रम पत्रिकेत उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले असते. हे स्नेहभोजन म्हणजे बऱ्याच वेळा बुफे असते.

‘ कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी ‘ असे आवाहन केलेले असल्यामुळे सर्वजण उत्तम प्रकारचा पोशाख घालून अंगावर सुगंधी द्रव्य फवारून अशा कार्यक्रमांना जाऊन खरोखरीच त्यांची शोभा वाढवत असतात. बऱ्याच वेळेला असे कार्यक्रम म्हणजे फॅशन शो सारखे वाटतात. या कार्यक्रमांमध्ये काही ओळखीची बरीच मंडळी भेटते. एखाद्या लांबट टेबलवर पांढरे स्वच्छ आच्छादन घालून निरनिराळे खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले असतात. बाजूलाच नव्या कोऱ्या डिश असतात. जणू काही त्या कार्यक्रमासाठी नवीनच आणलेल्या! प्रत्येक डिशवर पेपर नॅपकीन असतो. मंडळी रांगेत उभे राहून आपल्या हाताने आपल्याला हवे ते पदार्थ घेत असतात.

वधू-वरांना किंवा सत्कारमूर्तींना स्टेजवर जाऊन भेटवस्तू द्यायची, शुभेच्छा द्यायच्या आणि यजमानांचा निरोप घेऊन मार्गस्थ व्हायचे असा साधारण हा प्रकार असतो. यजमान बिचारे मनापासून अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यासाठी आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्च करत असतात. आपण कार्यक्रमासाठी यावे आणि शुभेच्छा किंवा शुभाशीर्वाद द्यावेत असा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. आणि तो मोठ्या प्रमाणावर साध्य होतानाही दिसतो. परंतु अलीकडे अशा कार्यक्रमांमध्ये त्यांची सहजता जाऊन आणि मूळ उद्देश बाजूला पडून औपचारिकता आलेली दिसते.

खरंतर असे कार्यक्रम म्हणजे सामाजिक जीवनातील एक सुंदर प्रसंग! यानिमित्ताने समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र येत असतात. प्रत्येक जण नेहमी आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे इच्छा असूनही मित्रांच्या, नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या भेटी होत नाहीत किंवा त्यांच्याकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला आपल्या ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडे जाण्यासाठी जो वेळ आपल्याला द्यावा लागला असता तो वेळ वाचतो आणि त्यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टी करण्याची संधी अनायासे उपलब्ध होते. परंतु किती जण या प्रसंगाचा असा लाभ घेतात?

अशा कार्यक्रमात आपल्या ओळखीची व्यक्ती दिसली की आपण आपला हात उंचावून त्यांना अभिवादन करतो किंवा हाय हॅलो म्हणतो. चेहऱ्यावर एखादी स्मितरेषा असते. फार तर ” काय? कसे आहात? खूप दिवसांनी भेटला ” या पलीकडे संभाषणाची गाडी पुढे जात नाही. असा औपचारिक संवाद होऊन जो तो आपापल्या उद्योगात (म्हणजे येथे जेवण्याच्या किंवा शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात) मग्न होऊन जातो.

अशा प्रसंगी समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र आलेले असतात. परंतु आपण सर्वांशी संवाद साधत नाही. आपल्या ओळखीचे, आपल्या बरोबरीचे, आपल्या सामाजिक स्तराला शोभतील अशा प्रकारच्या व्यक्तींशीच आपण फार तर थोडे हितगुज करतो. या कार्यक्रमात असेही काही लोक आलेले असतात की ज्यांचा सामाजिक स्तर किंवा प्रतिष्ठा आपल्यापेक्षा कमी असते. अशा लोकांना आपल्याशी बोलावेसे वाटते परंतु अशावेळी आपली प्रतिष्ठा किंवा अहंकार आडवा येतो आणि आपण त्यांच्याशी बोलणे टाळतो काही लोक तर अशाप्रसंगी ओळखही दाखवत नाहीत. आयोजकांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण खरोखरच कार्यक्रमाची फक्त शोभा वाढवण्यासाठी येतो आणि एखाद्या शोभेच्या वस्तूसारखेच येतो आणि जातो.

पण खरं तर असे कार्यक्रम म्हणजे लोकांशी संबंध दृढ करण्याची मोठी संधी असते असे मला वाटते. आजच्या काळात जसे आपण अनेक गोष्टींचे रिन्यूअल करतो तसेच संबंधांचे देखील रिन्यूअल करण्याची ही संधी असते. आपल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करावी, त्यांची सुखदुःखे जाणून घ्यावी यासाठी हे कार्यक्रम अनायासे संधी उपलब्ध करून देतात. पण औपचारिकता, कृत्रिमता, अभिमान, अहंकार, खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना यासारख्या गोष्टींमुळे आपण अशा प्रकारची चांगली संधी अशा कार्यक्रमांमधून दवडतो.

पण अशाही प्रसंगात प्रेमाने विचारपूस करणारे, आस्थेने चौकशी करणारे काही लोक भेटतात. असे लोक मला वाळवंटातील हिरवळीसारखे वाटतात. त्यांच्याजवळ कृत्रिमता नसते. अभिमान किंवा अहंकार नसतो किंवा खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनाही नसतात. अशी माणसे प्रेमाचे किंवा शीतलतेचे गुलाबपाणी प्रत्येकाच्या अंगावर शिंपत असतात. अशी माझ्या ओळखीची काही माणसे आहेत. ती भेटली म्हणजे जवळ येऊन आवर्जून बोलणारच! कधी कधी त्यांच्या पिशवीत गुलाबपुष्पे किंवा चाफ्याची फुले असतात. आपल्या ओळखीच्या व्यक्तींना ही फुले देऊन आपुलकीच्या सुगंधाची देवाण-घेवाण करतात. काहीजण जवळ येऊन अकृत्रिम हस्तांदोलन करतात किंवा गळाभेट घेतात. यातूनही संबंध दृढ होतात अशा व्यक्तींबद्दलची आपुलकी, प्रेम वाढीस लागते. अशी माणसे संकटप्रसंगी धावून येतात, मदतीला नेहमीच तयार असतात. अशी माणसे म्हणजे समाजरूपी उपवनात फुललेली सुंदर फुलेच! वाळवंटात सगळीकडे वाळूच वाळू पसरलेली असते आणि रखरखीत वातावरण असते. अशा वातावरणात कुठे अपवादाने हिरवळ दिसली की मन प्रसन्न होते. अशीच ही माणसे वाळवंटातील हिरवळ!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वायू ऊर्जा (Air Element Energy) ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ वायू ऊर्जा (Air Element Energy) ☆ विभावरी कुलकर्णी ☆

वायू तत्व (Air Element) हे पंचमहाभूतांपैकी (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) अत्यंत महत्त्वाचे आणि गतिमान तत्व आहे. आपल्या शरीरात आणि विश्वात हालचाल, प्राणशक्ती आणि संवाद साधण्याचे काम वायू तत्व करते.

या वायू तत्वाचे आपल्या जीवनातील उपयोग आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत.

१. वायू तत्वाचे शरीरातील आणि दैनंदिन जीवनातील उपयोग

प्राणवायूचा पुरवठा (Respiration): वायू तत्वाचा सर्वात मुख्य उपयोग म्हणजे श्वसन. शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकणे हे वायू तत्वामुळेच शक्य होते.

शारीरिक हालचाली शरीरातील रक्ताभिसरण अन्ननलिकांमधून अन्नाची हालचाल, हातापायांची हालचाल आणि मज्जासंस्थेद्वारे होणारे संदेशवहन हे सर्व वायू तत्वाच्या नियंत्रणाखाली असते.

उत्सर्जन क्रिया शरीरातील टाकाऊ पदार्थ (मल-मूत्र, घाम) बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत वायू तत्व (विशेषतः अपान वायू) महत्त्वाची भूमिका बजावते.

संवाद आणि आवाज आपण जे बोलतो, तो आवाज हवेच्या माध्यमाशिवाय दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे संवाद साधण्यासाठी वायू तत्व आवश्यक आहे.

२. वायू तत्वाचे आरोग्यदायी फायदे

जेव्हा शरीरात वायू तत्व संतुलित असते, तेव्हा त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतात:

मानसिक आणि बौद्धिक फायदे

विचारांची स्पष्टता आणि एकाग्रता – संतुलित वायू तत्व बुद्धीला तीक्ष्ण करते. यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता, कल्पकता (Creativity) आणि विचारांमध्ये स्पष्टता येते.

उत्साह आणि चैतन्य शरीरात वायूचा प्रवाह योग्य असेल तर आळस दूर होऊन दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते.

शारीरिक फायदे

उत्तम पचनक्रिया – आयुर्वेदामधील ‘समान वायू’ जठराग्नीला प्रदीप्त करतो, ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होते.

त्वचेचे आरोग्य:-

 वायू तत्व शरीरातील स्पर्शज्ञानाशी संबंधित आहे. वायू संतुलित असेल तर त्वचेवरील चमक कायम राहते आणि त्वचा निरोगी राहते.

लवचिकता:- स्नायू आणि सांध्यांमध्ये योग्य प्रमाणात वायू असल्यामुळे शरीरात लवचिकता (Flexibility) टिकून राहते.

वायू तत्व संतुलित करण्याचे उपाय

शरीरात वायू तत्व बिघडल्यास (उदा. वात दोष वाढल्यास) सांधेदुखी, गॅसेस, त्वचा कोरडी पडणे किंवा अस्वस्थता (Anxiety) यांसारखे त्रास होऊ शकतात. ते संतुलित ठेवण्यासाठी खालील उपाय फायदेशीर ठरतात:

प्राणायाम अनुलोम-विलोम, कपालभाती आणि भ्रामरी प्राणायामामुळे शरीरातील वायू तत्वाचे शुद्धीकरण आणि संतुलन होते.

वायू मुद्रा: अंगठ्याचे टोक तर्जनीच्या (पहिले बोट) मुळाशी लावून उर्वरित तीन बोटे सरळ ठेवल्यास ‘वायू मुद्रा’ बनते. ही मुद्रा रोज १५ ते २० मिनिटे केल्याने सांधेदुखी आणि पोटातील गॅस कमी होतो.

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे: पहाटेच्या शुद्ध हवेत फिरणे किंवा बागेत बसून दीर्घ श्वास घेतल्याने शरीराला शुद्ध वायू तत्वाचा लाभ होतो.

आहार: वात वाढवणारे पदार्थ (जसे की अतिशय कोरडे, शिळे किंवा थंड अन्न) टाळावेत. आहारात तूप, कोमट पाणी आणि ताज्या अन्नाचा समावेश करावा.

वायू तत्व हे आपल्या शरीरातील ‘प्राणशक्ती’ (Life Force) आहे. मनाची शांती, शरीराची गती आणि उत्तम आरोग्यासाठी वायू तत्वाचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे.

वायू तत्त्वाची (Air Element) ऊर्जा आपल्या शरीरात प्राणायाम, सजगता आणि ध्यानधारणा याद्वारे मिळवता येते. निसर्गात वायू हा गतिमानता, मोकळेपणा, विचार आणि संवादाचे प्रतीक आहे. शरीरात याचे स्थान प्रामुख्याने अनाहत चक्र (हृदय चक्र) आणि श्वसनसंस्थेशी जोडलेले असते.

वायू तत्त्वाची ऊर्जा सक्रिय करण्यासाठी आणि ती आत्मसात करण्यासाठी खालीलप्रमाणे ध्यान (Meditation) आणि काही पद्धतींचा अवलंब करता येईल.

१ स्पर्श अनुभवणे: तुमच्या त्वचेला स्पर्श करून जाणाऱ्या हवेच्या मंद लहरींचा (हळुवार वाऱ्याचा) जाणीवपूर्वक अनुभव घ्या.

२. प्राणायाम (श्वसनाचे नियंत्रण)

वायू तत्त्वाचा थेट संबंध आपल्या श्वासाशी आहे. त्यामुळे प्राणायामाद्वारे ही ऊर्जा सर्वात जलद मिळते:

३. ज्ञान मुद्रा (Gyan Mudra)

वायू तत्त्व संतुलित करण्यासाठी ‘ज्ञान मुद्रा’ किंवा ‘वायू मुद्रा’ अत्यंत प्रभावी आहे.

ध्यानाला बसताना अंगठ्याचे टोक आणि तर्जनीचे (पहिले बोट) टोक एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत हात गुडघ्यावर ठेवा.

यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि विचारांमधील अस्थिरता कमी होऊन वायू तत्त्वाची ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित होते.

४. अनाहत चक्रावर ध्यान (Heart Chakra)

वायू तत्त्वाचे मुख्य केंद्र हृदय मानले जाते.

ध्यानादरम्यान आपले संपूर्ण लक्ष छातीच्या मध्यभागावर (अनाहत चक्र) केंद्रित करा.

या चक्राचा रंग हिरवा आहे. तिथे हिरव्या रंगाच्या प्रकाशाची कल्पना केल्यास किंवा ‘यं’ (YAM) या बीजाक्षराचा मानसिक जप केल्यास वायू तत्त्वाची ऊर्जा जागृत होते.

५. निसर्गाशी जवळीक

प्रातःकालीन भ्रमण: पहाटेच्या वेळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत, बागेत किंवा टेकडीवर फिरायला जाणे.

विस्तीर्ण आकाशाकडे पाहणे: मोकळ्या आकाशाकडे काही वेळ शांतपणे पाहिल्याने मनातील संकुचितपणा दूर होतो आणि वायू तत्त्वासारखा मोकळेपणा अनुभवास येतो.

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares