श्री मिलिंद जांबोटकर
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ Life नावाच्या exam मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी! – लेखक : श्री विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆
मित्र हो, काळ बदलतो तसं प्रश्नांचं स्वरूप देखील बदलतं.
Solutions काढण्याच्या पद्धती सुद्धा बदलतात!
ज्या गोष्टी, जे प्रॉब्लेम्स आपण गृहीतच धरलेले नसतात, कधी कधी नेमके तेच आपल्या वाट्याला येतात!
अशा वेळेस अजिबात घाबरू नका, भिऊ नका. शांतपणे विचार करा आणि योग्य ते निर्णय घ्या!
जे नातेवाईक, जे मित्र आपल्याला आपले खरेखुरे हितचिंतक वाटतात, त्यांचे जरूर मार्गदर्शन घ्यावे
आपण कोणाचा तरी सल्ला घेतो, उपाय विचारतो, याचा अर्थ आपण कमी हुशार असतो असं नाही!
‘राजे’ लोक सुद्धा प्रधानाचा सल्ला घ्यायचे, राष्ट्र प्रमुखाला सुद्धा सल्लागार नेमावे लागतात!
एखाद्या प्रश्नावरती सर्व बाजूने विचार विनिमय होऊन उत्तम मार्ग निघावा, म्हणून सल्ला घ्यायचा असतो!
आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न येत असतात!
एका दुःखावर मार्ग सापडला की दुसरं दुःख लगेच तयार असतं, यालाच Life म्हणतात.आयुष्य असंच असतं. त्यामुळे अजिबात घाबरू नका!
आपण आपलं दुःख जर कोणालाच सांगितलं नाही तर दुःख वाढत असतं, डोकं सुन्न होत असतं!
एखाद्या समस्येवर जेव्हा आपल्याला काहीच उपाय सुचत नसतो, तेव्हा मित्राची मदत घ्यायची असते!
फक्त ज्याला आपण आपले दुःख सांगू तो पाठ वळताच टिंगलटवाळी करून हसणारा नसावा, एवढी काळजी जरूर घ्यावी!
हल्ली समजदार असे मित्र, विश्वास ठेवावा असे नातेवाईक मिळणं खरंच अवघड आहे, परंतु असे लोक शिल्लकच राहिले नाहीत, असे अजिबात नाही!
संख्या कमी आहे, हे मान्य. पण अशा प्रगल्भ विचारसरणीचे लोकच उरले नाहीत हे मात्र चूक आहे.फक्त तसे मित्र, तशी माणसं आपल्याला ओळखता आली पाहिजेत आणि त्यांना जपताही आलं पाहिजे!
नवऱ्याला बायकोचा मित्र होता आलं आणि बायकोला नवऱ्याची मैत्रीण होता आलं की प्रपंचातील अनेक प्रश्न सहज सुटतात, परंतु कधी कधी तेच एकमेकांसाठी प्रॉब्लेम क्रियेटर्स ठरतात!
नवरा बायकोच जर क्षुल्लक कारणावरून भांडत बसले, एकमेकांवर रागराग करून चिडचिड करू लागले, अबोला धरू लागले तर घरातील खरे प्रश्न कसे काय सुटतील?
आयुष्य नावाच्या परीक्षेमध्ये फक्त वर्षाच्या शेवटी किंवा सेमिस्टर पद्धतीने पेपर्स नसतात!
प्रपंचामध्ये रोज परीक्षेला बसायचं असतं!
परीक्षेचा वेळ, Syllabus, टाइम टेबल, प्रश्नांची काठिण्य पातळी काहीही ठरलेलं नसतं!
शांतता, संयम, सहनशीलता, या सद्गुणांशिवाय Life नावाच्या exam मध्ये उत्तीर्ण होताच येत नाही! म्हणून हे सर्व सद्गुण जाणीवपूर्वक आत्मसात करा!
त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा, All the best!
काssssही काळजी करू नका सगळं चांगलं होईल!
☆
लेखक: प्रा.विजय पोहनेरकर
प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






