मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृतार्थ संध्या… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ कृतार्थ संध्या… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

बुडताना सूर्य कोणी

फुलवात लावली होती.

 

व्याकूळ काळजात जशी ही

सांज तेवली होती.

 

क्षितिजावर रक्तिमेच्या

काजळरेख उमटली होती.

 

परतल्या गायींच्या कंठी

घंटीच निनादत होती.

 

उडवीत धूळ थोडी

सांज डोहात उतरली होती.

 

कवितेतील हरवली अक्षरे

कावरीबावरी झाली होती.

 

गहिवरल्या प्रार्थनीय समयी

मीही पापणी मिटली होती.

 

आणिक एक संध्या ह्रदयी

कृतार्थ झाली होती.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संवादाचा अभाव” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “संवादाचा अभाव☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय समाजात आजही अनेक कुटुंबांमध्ये विवाहाचा अंतिम निर्णय पालकच घेतात. मुलगा किंवा मुलगी यांची संमती विचारली जाते; पण अनेकदा ती केवळ औपचारिकता ठरते. स्पष्ट नकार देण्याचे स्वातंत्र्य अनेक तरुण-तरुणींना प्रत्यक्षात मिळत नाही. आई-वडिलांचा शब्द अंतिम, घराण्याची प्रतिष्ठा, समाज काय म्हणेल? किंवा इतके चांगले स्थळ शोधून आणले आहे, अशा दबावांमुळे अनेक तरुण-तरुणी स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय स्वीकारतात. अशा वातावरणात मुक्त संवादाची जागा भीती, मौन आणि कधीकधी तर क्रूर कृत्य करण्यास भाग पाडतात. परिणाम सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरीशी संगनमत करून थंड डोक्याने केतन अगरवालचा लोहगडच्या दरीत ढकलून केलेला खून.

मुलांना स्वतःच्या भावना, मत किंवा नकार मोकळेपणाने व्यक्त करता येत नसतील, तर समस्या अधिक गुंतागुंतीची बनते. दडपलेला विरोध, मानसिक ताण, असहाय्यता किंवा संताप कधी कधी चुकीच्या आणि विनाशकारी मार्गाने बाहेर पडू शकतो. अर्थात, कोणत्याही गुन्ह्याचे समर्थन यामुळे होत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या कृतीसाठी कायदेशीरदृष्ट्या जबाबदार असते. परंतु समाजशास्त्राचा उद्देश केवळ दोषी शोधणे नसून अशा घटना घडण्यामागील सामाजिक परिस्थिती समजून घेणे हा असतो.

पालकांनी मुलांच्या आयुष्याबाबत निर्णय घेताना त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. विवाह हा दोन कुटुंबांचा नव्हे, तर दोन व्यक्तींचा दीर्घकालीन सहजीवनाचा निर्णय असतो. त्यामुळे त्यामध्ये स्पष्ट, निर्भय आणि प्रामाणिक संवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. मुलाने किंवा मुलीने नाही म्हटले, तर त्या नकाराचा आदर करण्याची मानसिक तयारी पालकांमध्ये असली पाहिजे. नकार म्हणजे अवज्ञा नव्हे; तो व्यक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे अशा घटना समाजासाठी इशारा असतात. त्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की, विवाहसंस्थेत संवादाला किती महत्त्व दिले जाते, मुलांच्या इच्छेला किती स्थान दिले जाते आणि कुटुंबातील निर्णयप्रक्रिया किती लोकशाहीवादी आहे. संवाद, परस्पर सन्मान आणि स्वायत्तता यांचा अभाव असेल, तर त्याची किंमत कधी कधी संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागू शकते.

घटना घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच संवादाने प्रश्न सोडवला तर नंतर डोक्याला हात लावून बसायची पाळी येणार नाही, हे आपली कुटुंबव्यवस्था केव्हा समजून घेईल?

© श्री जगदीश काबरे

(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail.com मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परतफेड ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ परतफेड… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

शाळा सुटल्यावर घरी यायचे म्हणजे सर्वात जवळचा रस्ता मारुतीच्या देवळाजवळचा होता. पण अलीकडे त्या रस्त्याने यायचे म्हणजे घरी परतत असल्याचा मोकळा आनंद महेशला कधी वाटला नाही. कारण, घरी जाऊन दप्तर टाकताच त्याला बाटली घेऊन पुन्हा दवाखान्याकडे जावे लागे.

घरी तो चहा घेत असतानाच आई बाटली घेऊन उभी असे. मग मीठ-मिरची लावलेले पोहे एका कागदात ठेवून ती ते त्याच्या खिशात ठेवून सांगे, “आता लौकर पळ, नाही तर डॉक्टर जातील. ” दवाखान्यात डॉक्टर सहा वाजेपर्यंत असत. तेवढ्या वेळात गेले नाही तर मग दूर बाजारातल्या दवाखान्यात जावे लागे.

मग रस्त्यातच पोह्यांचा एकेक घास खात जायला बरे असे. पण कट्ट्यावर बसून खाण्यासारखी त्यात गंमत नव्हती, आणि शाळा सुटल्यावर अजूनही गरम असलेल्या कट्ट्याच्या फरशीवर बसायला तर त्याला एकदाही मिळाले नव्हते.

महेश देवळापाशी आला. त्या ठिकाणी सूमंत पाठकचे किराणा मालाचे दुकान होते. महेश जवळ आल्यावर सुमंत पाठकने त्याला हाक मारली, व म्हटले “अरे शिंच्या, काय सामान घेऊन जाताना धाड होत नाही. पैसे कोण? तुझा बाप देणार आहे की काय ?”

महेश एकदम शरमला. तो खालच्या मानेने म्हणाला, “बाबा तर आजारी आहेत. आईला विचारुन सांगतो. “

पाठक खाली उतरून आला. त्याने जाड मिशा ठेवल्या होत्या, आणि तो फार दारू पितो अन गांजा ओढतो हे सगळ्यांना माहीत तर होतेच. पण त्याची बायकोच सगळ्यांना तसे सांगत असे. तो म्हणाला, “काय खेळ चालवलात की काय ? उद्यापर्यंत नऊ रुपये घेऊन ये, नाही तर पुन्हा या रस्त्याने आलास तर पाय मोडून देईन. “

पाठकने नंतर हात उगारला व महेशच्या सणसणीत थोबाडीत दिली. त्याच्या हातातील दप्तर खाली पडले, व त्याचा गाल पेटल्याप्रमाणे जळू लागला. त्याने दप्तर कसेबसे उचलले व ओल्या डोळ्यांनी तो घरी आला.

आई त्याची वाट बघत होती. पण आता तिच्या हातात बाटली नव्हती. त्याचा चेहरा पाहून तिने विचारले, “काय झालं… ? सगळं सांग मला. “

महेशने सगळे सांगितल्यावर ती क्षणभर बसली. मग तिने चहा व पोहे त्याच्यापुढे ठेवले व म्हटले, “आज दवाखाना नको. मघाशीच डॉक्टर आले होते. उद्या औषध बदलून देतो म्हणाले. मी जरा जाऊन येते, तोपर्यंत तू पोहे खात कट्ट्यावर बस. ” ती कपाटाकडे गेली व एक-दोन डबे उघडून तिने पाहिले. एका डब्यातून तिने काही तरी मुठीत घेतले व बाहेर जाताना ती म्हणाली, “मी येथेच गाडगीळां कडे जाऊन येते. “

महेशने समोरच्या चहा-पोह्यांकडे पाहिले. किती तरी दिवसांनी त्याला कट्यावर बसून पोहे खायची संधी मिळाली होती. पण त्याची भूकच मेली होती आणि त्याला चेंगरुन गेल्यासारखे वाटत होते. तो तसाच येऊन बाहेर बसला.

गाडगीळांचे घर समोरच होते. घराला मोठी माडी होती. तेथल्या सोप्यावर मोठमोठे आरसे होते आणि तेथल्या खुर्च्यांना फुलाफुलांच्या मऊ गाद्या होत्या.

थोड्या वेळाने आई परत आली. चहा-पोहे तसेच पाहून तिने महेशकडे पाहिले. पण ती काही बोलली नाही. तिने बशी कपावर टाकली आणि बाबा झोपले होते त्या खोलीकडे पाहत म्हटले, “अहो, मी दहा मिनिटांत परत येते मारुतीला जाऊन”. तिने बाहेरच्या दाराला नुकतीच कडी लावली व महेशला म्हटले, “चल माझ्याबरोबर. ” 

महेशने तिच्या पायांकडे पाहत म्हटले, “तुझी जोडवी राहिलीच की गंऽऽ… ” जोडवी घातल्याखेरीज आई कधी बाहेर जात नसे आणि तिच्याबरोबर जाताना तिच्या जोडव्यांचा रस्त्यावर होणारा आवाज त्याला फार आवडे.

मग आईने पुन्हा कडी काढली, देवाच्या कोनाड्यांतील जोडवी गोळा करून पायांच्या बोटात अडकवली व त्याला बाजूला घेऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, “हं… आता चल. “

आई पाठकाच्या दुकानात आली. पाठक रस्त्यावर खाली वाकून साबणाची पेटी उघडत होता. आई दुकानाच्या फळीवर जाऊन उभी राहताच त्याने पेटी उघडण्याचे काम थांबवले व तो उभा राहिला. आई फळीवर उभी होती, तरी पाठक तिच्या एवढा उंच दिसत होता.

“पाठक ऽऽ… तुमचे किती पैसे द्यायचे आहेत ?” तिने शांतपणे विचारले. “पैसे द्यायला आणखी एक महिना तरी लागेल, असं मी गेल्या शनिवारीच सांगितलं होतं ना ? त्याला तुम्ही बरं म्हणाला होता ना ?”

“म्हणालो म्हणून काय झालं… ? मऊ लागलं म्हणून काय कोपरानं खणायचं काय… ?”

पाठक छद्मीपणे म्हणाला,

“तुमची बाकी नऊ रुपये आहे ?” आईने नोटा काढल्या व एकेक पुन्हा मोजून त्या पाठकला दिल्या. त्याने त्या हातात घेतल्या व गुर्मीने म्हटले, “बाकी चुकती झाली. आता यापुढं उधार मिळणार नाही. ” 

“सगळी बाकी अद्याप चुकती झाली नाही” आई म्हणाली. तिने झटकन हात वर केला व फाडकन सूमंत पाठकाच्या मुस्काटात दिली. काडऽऽक्कन आवाज आला.

पाठक खुळ्यासारखा पाहतच राहिला. रस्त्यावर दोन बायका शाल पांघरून मारूतीला चालल्या होत्या, त्या तेथेच थबकल्या. एक माणूस सायकली वरून उतरून पाहू लागला. दुकानातील गिऱ्हाईके तर एकदम गप्पच झाली, आणि साखरेचा पुडा बांधत असलेला सखाराम तो तसाच हातात धरून वेंधळ्यासारखा पाहत उगाच दोरा फिरवू लागला.

“अरे हरामखोरा, तू एक चपराक याला दिली होतीस ना, ती देखील फेडायचीच होती. आता सगळी बाकी चुकती झाली. ” आई कडाडली, “आणखी एक लक्षात ठेव. पुन्हा जर मूलाच्या अंगाला हात लावशील तर मारुतीच्या चौकात तुझं मढं पाडीन आडवं मूर्दाडा… लग्नाआधीपासूनच मी ब्लॅकबेल्ट चँम्पियन होते लक्षात ठेव. माझा एक तडाखा म्हणजे तू मेला समज. “

आई तितक्याच शांतपणे फळी वरून खाली उतरली व महेशच्या खांद्यावर हात ठेवून त्याला ढकलत चालू लागली. “आता घरी जाऊन चहा तापवून देते. मग कट्ट्यावर बसून पोहे खा. “

महेश त्या विचाराने फार सुखावला व झपझप चालू लागला. शेजारी चालत असलेल्या जोडव्यांच्या चटचट आवाजाची त्याला विशेषच ऐट वाटली…

**

लेखक : अज्ञात.

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाऊस आला गं… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ पाऊस आला गं ☆ संगीता कुलकर्णी ☆

पावसाळा म्हटलं की मला प्रथम आठवतो तो मन धुंद करणारा मृद्गंगंध… ! पहिल्या पावसाची गोष्टच काही वेगळी… ! त्याचे आणि माझे नाते खरंतर जिव्हाळ्याचे.. पाऊस आला की मी खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलू लागते त्याचा थंडगार वारा मनाला सुखावून जातो आणि शब्द उसळ्या मारू लागतात… शब्दांना पूर घेऊन एक वेडा पाऊस आला… !

 आला आला

 पाऊस आला

 मला भिजवून ओलेचिंब करुन गेला

पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसू लागल्या की येणार्‍या मृगाची चाहूल लागते.

सर्वच या सृजन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात.. पहिल्या पावसाची आतुरता या सृष्टीतल्या प्रत्येक न् प्रत्येकाला ही असतेच ना.. !

पहिल्या पावसाच्या वेळी जेव्हा आकाश भरून येते तेव्हा सृष्टीची किमया डोळे उघडे ठेवून बघत रहावी अशीच…

 पावसाची सर

 कोसळत होती 

 भिजताना सृष्टी

 उमलत होती

चिंब भिजलेल्या सृष्टीचा किमया मी मनात रेखाटत होते.. निळेभोर दिसणारे आभाळ एकदम काळेसावळे होते… ढगांची गर्दी… ढगांचा एकमेकांवर आदळणारा आवाज..

तो आवाज ऐकला की टाळ मृदुंगाशी स्पर्धा करतो की काय असा भास मला होतो.. चिंब भिजलेल्या सृष्टीचा अप्रतिम सुंदर 

देखावा मनात रेखाटत मी पावसाकडे बघत होते… सृष्टीतील त्या चैतन्याचा तो सोहळा डोळ्यात भरून घ्यावा आणि कानात साठवून ठेवावा एवढा नादमय… पाऊस म्हणजे अख्या सृष्टीला वेड लावणारा अद‍्भूत सोहळा… ! 

 आसुसलेली धरणी 

 मिलनासाठी

 दोन हातांचे पंख

 पसरून उभी

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबाने धरणीला स्पर्श होताच पावसाचे ते अगणित थेंब मातीत जेव्हा मिसळतात तेव्हा माती गर्भवती राहून तिच्या कुशीतून बीजाला कोंब फुटतो. तुकारामांच्या भैरवीतली “तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी” हा संदर्भ मातीला या काळात तंतोतंत लागू पडतो.

मातीचा तो धुंद वास…त्याने सुखावत होती.

हसताना मृद्गंगंध पसरवीत होती..

बहरत होती… लाजत होती आणि लाजून चिंब चिंब होत होती.

तो मृद्गंगंध श्वासात किती आणि कसा भरून घ्यावा… !

हा पाऊस आसमंतात एक नवं चैतन्य फुलवतो, सर्वांची तहान भागवितो, मातीत थेंब पडल्यावर पसरणारा तो मृदगंध अगदी उरात साठवावासा वाटतो..

वातावरणात विलक्षण गारवा येतो.

मृगाच्या पावसाचे आणि सृजनाचे एक विलक्षण असे नाते आहे. वळवाचा पाऊस आणि मृगाच्या पावसात तसा जमीन आसमानाचा फरक … वळवाचा पाऊस एकदा लागून गेला की तो नुकसानच करून जातो पण मृगाचा पाऊस तो आला की सगळ्यांना सुखावून जातो… सृष्टीतील सर्वांना तो वेड लावतो. पहिला पाऊस नवीन चैतन्य घेऊन येतो. मनाला जगायला नवीन उभारी देतो.

आयुष्यातले छोटे छोटे आनंदाचे जगण्याचे क्षण पहिला पाऊस मिळवून देतो.

माझ्यासाठी प्रत्येक नव्या क्षणी येणारा पाऊस हा पहिलाच असतो कारण मला तो दरवेळी एक नवी कविता देऊन जातो. मला त्या पावसात गुंतून राहणं आवडत.. जमतं… तो स्वत:हून मला भावना देतो… मला आशय पुरवतो. पाऊस सोबत केवळ गार हवा किंवा चिंब सरीच घेऊन येतो असं काहीच नाही तर पाऊस त्याही पलीकडे जाऊन प्रीत, विरह, आनंद यांसारख्या बऱ्याच भावना सोबत घेऊन येतो… पहिल्या पावसात त्याने मला भिजत असलेली पाहून जो मनमुराद आनंद लुटला त्या क्षणाची तुलना किंचीतच दुसऱ्या क्षणाशी होईल… मला बेधुंद जगताना पाहून त्यालाही पावसात भिजायची इच्छा झाली होती… पहिल्या पावसाचे ते थेंब अलगद ओठांनी चुंबूनी घ्यावेसे वाटतात…

पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे फरक फक्त इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी कायम मनाला… ! या हृदयाचे त्या हृदयी अशी अवस्था… छळणारा, जाळणारा तरीही हवाहवासा वाटणारा पाऊस…!

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”द्वंद्व मनातले..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “द्वंद्व मनातले.. ☆ संध्या बेडेकर ☆

हो की नाही ?? बरोबर की चूक ??

योग्य वर्तन की अयोग्य वर्तन ?? खूपदा हे द्वंद्व आपली परीक्षा घेत असत.

आज सकाळी आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी म्हणाल्या.

काकू माझ्या जावेची आई वारली हो.

मी म्हटलं,

अरे !! हो का ? मग तुम्ही गेल्या नाही. का बरं ? 

 मला या लोकांचं खूप कौतुक वाटतं 

ही मंडळी नातीगोती आपल्या पेक्षा जास्त छान सांभाळतात.

माहेरी सासरी कोणताही कार्यक्रम असो, या बस चां प्रवास करून तेथे नक्की जाणार. आज पाऊस आहे, ऊन आहे असे प्रश्न यांना पडत नाहीत बहुतेक.

बरं ! असंही नाही की त्या दिवशी त्या कामाला येणार नाही. पायी चालत येणे, काम करणे, पुन्हा घरी पायी जाऊन, बसने दोन तासांचा प्रवास करून, तेथून पुन्हा पायी चालत कधी कधी तर भर चिखलात चालून त्या तेथे पोहचतात.

कौतुक आहे. नाही का ?? 

आपल्या सारखं (म्हणजे मी माझ्या बद्दल बोलतेय) नाही की आपल्या सोयीनुसार आपण जातो किंवा फोन करून आपलं कर्तव्य पार पाडतो.

असं म्हणतात,

एकवेळ सुखात सहभागी झालं नाही तरी चालेल, पण दुःखात माणसाने जरूर जावे, आधार द्यावा.

मावशी म्हणाल्या,

काकू ! जायला तर हवं होत हो, पण मी नाही गेले. त्या पूढे म्हणाल्या,

काल पूर्ण दिवस याच विचारात गेला. एक मन म्हणतं होत जायला पाहिजे, तर दुसरं मन जून्या घटनेची सारखी आठवण करून देत होतं.

 काकू!! दोन वर्षांपूर्वी माझे आई वडील दोघेही गेले, पण या माझ्या जावेने एकदाही विचारलं नाही. साधी चौकशी ही केली नाही. आता आमची लोक पण फोन वगैरे करतातच की. पण एक फोन सुद्धा केला नाही हो.

न येण्याचे खोटे कारणही सांगितले नाही.

फक्त पाऊस पडला की भात लावायला ये असा फोन न चूकता करतात.

 काकू! श्रीमंतीचा भारी माज आहे तिला. हेच जर एखाद्या श्रीमंत घरात घडलं असतं, तर लगेच धावत गेले असते.

बरं! हे असं वागणं काही पहिल्यांदाचच आहे, असं नाही.

मी बरोबर नक्कीच वागले नाही, पण त्यांना त्यांच्या वागण्याची जाणीव केंव्हा होईल ? 

 काल मी देवाची माफी सुद्धा मागितली.

म्हंटल,

देवा !! आजचे दोन नंबर कापून घे बाबा. पण यावेळी मी असंच वागणार. या दोन नंबरची भरपाई मी कधी तरी करेन.

 गरीबांच्या घरचे मरण म्हणजे मरण नाही का ? काहीच संवेदनशील घटना नाही का ?? 

प्रत्येक वेळेस यांची श्रीमंती महत्वाची, कौतुकाची का ?? 

खरं तर त्यांच्या आईचा काहीच दोष नाही हो यात, पण मी गेले नाही.

माझ्या लक्षात आलं,

हा श्रीमंतीचा रोग समाजातील प्रत्येक पातळीवर आहे.

या रोगाने पछाडलेल्या लोकांची जमात सर्व ठिकाणी आढळते.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक बरेच असतात.

तसं मला मावशीचे म्हणणे पटले. अगदी सहज सुलभ प्रत्येकाच्या मनात येणारे हे विचार आहेत.

असे प्रसंग आपल्याला दुविधेत टाकतात. आपली चूक कळत असते, पण झालेला अपमानही लक्षात असतोच ना.

योग्य वर्तन विरुद्ध (×) अयोग्य वर्तन या मध्ये खडाजंगी युद्ध चालू असत.

 आपलेच प्रश्न ? त्यावर आपणच दिलेली उत्तरे, नंतर उत्तरांचे विश्लेषण. यांचे जणू पारायण सुरु असते. एका विचारांवर थांबल्या नंतर पुन्हा थोड्या वेळाने तीच सायकल सुरू होते.

हो. की. नाही ???

 यापैकी एकावर येऊन गाडी काही लवकर थांबत नाही. असं किती तरी वेळ / कधी कधी तर बरेच दिवस हा खेळ मनात चालू असतो. यावेळी अनेक वाचलेले सुविचार ही आठवतात.

 कोणी कसं वागावं ? हे आपल्या हातात नाही. पण आपण नेहमी व्यवस्थित वागावं ना.

असं वागल्याने खरंतर ते स्वतःचाच अपमान करतात. आपला कुठे झाला ?

 असे एक ना अनेक विचार मध्ये मध्ये लुडबुड करतात. आपला निर्णय बदलण्याचा प्रयत्न करतात 

पण का ? का म्हणून नेहमी ऐकायचं ? सहन करायचं ? त्यांचे ऐकत राहिले तर समोरच्या ची हिम्मत वाढते. आपण काहीही करू शकतो, कसेही वागू शकतो, असा त्यांचा समज कधीतरी दूर केलाच पाहिजे.

They should not take us for granted.

बरं एवढं करून श्रीमंत म्हणजे असे काही गडगंज वगैरे नाही. आणि असले तरी त्यांच्या दाराशी आम्ही उभे आहोत का ?? 

मोठी कार, डोळ्यांवर मोठा गॉगल्स, हातात मोठा मोबाईल, मग तो आय फोन असेल तर अजून स्मार्ट, अजून श्रीमंत समजून वागणारे लोक आजूबाजूला बरेच दिसतात.

दोन चार वाक्य इंग्रजीचे बोलता आले तर श्रीमंतीत अजून दोन डिग्री ची वाढ.

 हीच श्रीमंती, हाच स्मार्टनेस बस. बाकी कांक्रीट असं काही दिसत नाही त्यांच्यात.

खरं तर 

Making other people feel small, doesn’t make you big.

अशा लोकांशी वागायची आपली एक पॉलिसी आपल्यालाच तयार करायची असते.

 माझं माझं मी ठरवलंय. अगदी पहिल्या च अनुभवावरून नाही, पण जर असं वागणं नेहमीचच झालं तर, मग मात्र काही तरी ठरवावच लागत. त्यावेळी 

I follow the Principle.

Forget the past but Remember the lesson.

Moral in my life is very simple.

You treat me good, I will definitely treat you better.

कधी कधी आपल्याला आपल्याच वागण्याचे कारण लक्षात येत. की 

We have reduced communication to the people we love, not because we hate them but because they make us feel like, we are nothing to them.

चांगले संबंध नक्कीच असावेत, पण ती काय एकाच पार्टीची जबाबदारी असते का ??

I follow these principles in my life.

मावशीचे बोलणे ऐकून, मी आपल्याच विचारात दंग होते.

मावशींच्या बोलण्याने पुन्हा भानावर आले.

त्या विचारत होत्या,

काकू !! मी बरोबर बोलतेय का ? माझ वागणं एकदम चूकच आहे का ? 

आता काय उत्तर द्यावं ?? कळेना मला.

मी म्हटलं,

“कुसुम ताई कोणावर एवढं नाराज होऊ नका. ” त्याच महत्व आपल्या आयुष्यात कमी करा. पण या अशा प्रसंगी जाऊन या.

तुम्हालाच बरं वाटेल.

नाहीतर तुमच मन तुम्हाला खात राहील.

 शैवटी मला माझंच कौतुक वाटलं. समाधान मिळाल.

चांगले बरोबर विचारांनी चूक अयोग्य वर्तनावर मात केली.

म्हणतात ना,

Be a good person but do not waste time to prove it.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७१ आणि ७२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७१ आणि ७२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७१ – – 

जयाचेनि नामें महादोष जाती।

जयाचेनि नामें गती पाविजेती।

जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७१।।

अर्थ :  भगवंताच्या नामस्मरणाने मोठमोठी पापे नाहीशी होतात. साधकाला उत्तम अवस्था प्राप्त होते. पुण्याचा संचय होत जातो. असे सर्व काही ज्यामुळे प्राप्त होते त्या भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन पहाटेच्या वेळी करावे.

(महादोष – मोठमोठी पापे/पातके/दोष, गती – अवस्था/मुक्ती/मोक्ष)

विवेचन : भगवंताच्या नामाचा महिमा अपार आहे. सतत नामस्मरण केल्याने महादोष म्हणजे महापापे नाहीशी होतात. भगवंतांचे नाम आपले अंतःकरण शुद्ध करते. वाईट गोष्टी, पापकर्म करण्याची इच्छाच होत नाही. चोरी करणे, खोटे बोलणे, व्यभिचार करणे, हत्या करणे, अपेयपान (दारू)करणे या सारख्या गोष्टी या महापाप मानल्या जातात. परंतु सतत भगवंताचे नाम घेत राहिल्याने या गोष्टी करण्याची इच्छाच नाहीशी होते. व्यक्ती सदाचारी बनते. वाल्या कोळ्याचे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. वाटमारी करणे, हत्या करणे यासारखी महापापे त्याच्या हातून घडली होती. परंतु महर्षी नारद आणि ऋषींच्या उपदेशामुळे त्याच्यात अंतर्बाह्य बदल झाला. आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन त्याने रामनामाचा आश्रय घेतला. रामनामाची जादू एवढी मोठी आहे की वाल्या कोळ्याचे रूपांतर महर्षी वाल्मिकीत झाले. रामायणासारखा अद्वितीय ग्रंथ लिहून ते जगासाठी वंदनीय ठरले.

रामनामामुळे गती म्हणजे उत्तम अवस्था प्राप्त होते. अंतकाळी भगवंताचे नाम मुखात येणे यासारखे भाग्य नाही. ‘ अंते मती सा गती: ‘ असे म्हटले जाते ते यामुळेच. शेवटचा दिस गोड व्हावा असे तुकाराम महाराज म्हणतात याचा अर्थ हाच आहे. पण आयुष्याच्या अखेरच्या क्षणी माणसाच्या मुखात अचानक रामनाम येत नाही. त्यासाठी सतत मनाने भगवंताचे नामस्मरण करण्याची सवय असावी लागते. ही सवय असेल तरच अंतकाळी भगवंत आठवतो.

समर्थ तिसऱ्या ओळीत म्हणतात की नामाच्या योगाने पुण्यठेवा घडतो म्हणजे वाढतो. बँकेतील आपल्या खात्यात आपण बचत म्हणून थोडे थोडे पैसे टाकत राहतो. यात सातत्य असले तर ही पुंजी वाढत जाते. मुद्दलावरही व्याजही लागू होते. रामनाम ही तर अत्यंत मौल्यवान ठेव ! थोडीथोडी जमा करत गेलो की पुण्यसंचय वाढत जातो. संत मीराबाई म्हणतात, ” पायो जी मैने रामरतन धन पायो… ” हे असं अमोलिक धन आहे की ” खर्च न खुटे, चोर न लुटे. ” इतर धन खर्चल्याने संपतं. पण याची महती काही वेगळीच. हे तर दिवसेंदिवस वाढतच जातं. विशेष म्हणजे हे धन असं आहे की याला चोरही लुटू शकत नाही. सातत्याने रामनाम घेणाऱ्याचा पुण्यसंचय वाढतच राहतो.

नामस्मरणाने वासनांचा क्षय होतो. म्हणजे भगवंत प्राप्तीखेरीज इतर वासना हळूहळू नष्ट व्हायला लागतात. शेवटी केवळ भगवंत प्राप्तीची इच्छा उरते. आपल्या पुण्यसंचयानुसार ती या जन्मी किंवा पुढील जन्मी भगवंत नक्की पूर्ण करतो. तेव्हा हे मना, प्रभात समयी श्रीरामाच्या रूपगुणांचे चिंतन कर. दिवसभरही त्याचे नित्य स्मरण ठेव. हे नाम तुला मोक्षाकडे घेऊन जाईल.

स्वसंवाद ::

१. मी रोज माझ्या बँक खात्यातील शिल्लक (Balance) तपासतो, पण माझ्या खात्यात ‘पुण्यठेवा’ किंवा रामनामाची पुंजी किती जमा होत आहे, याचा हिशेब ठेवतो का ?

२. “शेवटचा दिस गोड व्हावा” असे मला वाटते, तर मग शेवटच्या क्षणी ते नाम सहज मुखात यावे म्हणून मी आजपासूनच अंतःकरणाला तशी सवय लावत आहे का?

३. माझ्या हातून कळत-नकळत होणारे छोटे-मोठे दोष किंवा वाईट विचार दूर व्हावेत म्हणून मी नामस्मरणाचा आधार घेतो का?

४. मीराबाईंनी म्हटल्याप्रमाणे, मला हे ‘अमोलिक धन’ मिळवण्याची खरी आस लागली आहे का की अजूनही चोरांनी लुटल्या जाणाऱ्या नश्वर धनामागेच धावत आहे ?

==========

श्लोक क्र. ७२ – – 

न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही।

मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही।

महा घोर संसार शत्रू जिणावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७२।।

अर्थ : रामनाम घेण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागत नाहीत. मुखाने रामनाम घेताना काही कष्ट पडत नाहीत. या रामनामाच्या साहाय्याने अत्यंत कठीण अशा संसाररूपी शत्रूवर मात करता येते. त्यासाठी प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे.

(न वेचे – खर्च करावे लागत नाहीत, ग्रंथीचे – पदरचे, अर्थ – पैसा, घोर – कठीण, जिणावा – जिंकावा)

विवेचन :  माणसाची देहबुद्धी फार प्रबळ असते. देहासाठी आणि देहाच्या सुखासाठी जे जे लागेल, ते मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस असतो. सगळी ऐहिक सुखे उपभोगण्यासाठी पैशाची मोठी गरज असते. त्यामुळे माणूस पैशाला फार जपतो. प्रसंगी देहापेक्षाही पैशाला महत्व देणारी माणसे व्यवहारात पाहायला मिळतात. आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करून ती पैसा मिळवण्याच्या मागे लागलेली असते. सामान्य माणूस स्वतःच्या मौजमजेसाठी हवे तेवढे पैसे खर्च करायला तयार असतो पण दानधर्माची वेळ आली की हात आखडता घेतो. सर्वसामान्य माणसांची ही मानसिकता समर्थ उत्तम प्रकारे जाणून आहेत. म्हणून रामनाम घेण्याबद्दल ते सांगतात की यासाठी पदरचा एक पैसाही खर्च करावा लागत नाही. वरील ओळीचा अर्थ आणखी एका प्रकारे घेता येईल. ते म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी वेगवेगळे ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करतो. आपली पारमार्थिक बैठक तयार होण्यासाठी आवश्यक त्या ग्रंथांचे वाचन अवश्य करावे. पण तेवढे झाल्यानंतर अधिक ग्रंथ वाचण्यात वेळ न घालवता नामस्मरण करावे. नामस्मरणासाठी ग्रंथ वाचनाची आवश्यकता नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, “वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा… “नुसते पुस्तकी ज्ञान किंवा शब्दपांडित्य महत्त्वाचे नसून, भगवंताच्या नामाची अनुभूती घेणे आणि अंतःकरणात भक्ती बाळगणे हेच वेदांचे खरे सार आहे हेच तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगायचे आहे.

दुसरी गोष्ट अशी की हे रामनाम मुखाने घेण्यास कोणतेही कष्ट पडत नाही. इतर तपसाधनेत तरी देहाला कष्ट पडतात. त्याचप्रमाणे तीर्थयात्रा वगैरे करायची म्हटले तरी देहाला कष्ट घ्यावेच लागतात. पदरचा पैसा खर्च करावा लागतो. पण रामनाम घेण्यासाठी यातील काहीही करावे लागत नाही. फक्त आपली इच्छा मात्र हवी. त्यासाठी स्वतंत्र वेळ देण्याची आवश्यकता नाही. सर्व संतांनी आपापली कामे करताना मुखाने हरिनामाचा जप सुरु ठेवला होता. आपणही आपली नित्यकर्मे करताना वाचेने किंवा मनाने भगवंताचे नाम घेऊ शकतो.

आपण सामान्य माणसे ! संसारात अडकलेलो असतो. बांधले गेलेलो असतो. पण हे बंधन दिसत नाही आणि कळतही नाही. आपले आयुष्य शेवटपर्यंत संसारासाठी धावाधाव करण्यातच जाते. शेवटी एक वेळ अशी येते की आपण हे सगळे कोणासाठी आणि कशासाठी केले असे वाटून पश्चाताप होतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. संसार म्हणजे विवाहित माणसाचा पती, पत्नी, मुले, नातेवाईक असा साधारण अर्थ आपण घेतो. पण जो माणूस जन्माला आला तो या संसारात अडकला. मग तो विवाहित असो वा अविवाहित. एका संसार या शब्दाचा व्यापक अर्थ हे जग असाही आहे. जीवनाबद्दल एका हिंदी गीतात फार सुंदर ओळी आहेत. ‘ संसार हैं एक नदिया, दु:ख सुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं… ‘अशा या संसाररूपी नदीतून तरून जायचं असेल तर रामनामाशिवाय तरणोपाय नाही.

संसार गोड वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो पण तो आपला मोठाच शत्रू आहे हे लक्षात येत नाही. ते लक्षात येते तेव्हा आयुष्याची किंमत आपण मोजलेली असते. एखाद्या गोष्टीचे माणसाला जेव्हा व्यसन लागते, तेव्हा ती गोष्ट त्याला अती प्रिय होते. मग ती वाईट आहे हे कळले तरी ती त्याला सोडवत नाही. तंबाखू, दारू इ. चे व्यसन लागलेल्यांची अशीच अवस्था होते.

समर्थ श्रीरामस्तुती करताना म्हणतात, ” संसारसंगे बहू शीणलों मी, कृपा करी रे रघुराज स्वामी. ” संसार हा आपला महाशत्रू आहे हे लक्षात घेऊन वागणाऱ्याला संसार बाधत नाही. तो संसारात असतो पण साक्षीभावाने प्रपंचाकडे पाहतो. हे सगळे प्रारब्धाचे खेळ आहेत हे तो जाणून असतो. सर्वसामान्यांना तो संसारात रमलेला दिसेलही पण त्याचे चित्त भगवंताकडे असते. आपण बसने किंवा रेल्वेने प्रवास करीत असतो. काहीवेळा सोबत असलेल्या सहप्रवाशांशी आपल्या छान गप्पा होतात. पण आपले स्टेशन आले की आपल्याला उतरावे लागणार हे आपण जाणून असतो. त्यामुळे त्या सहप्रवाशाना सोडून जाताना विशेष दुःख होत नाही. असेच आपण संसारातही असावे. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त असणाऱ्या कमलदलांप्रमाणे ! हे सगळे सांगणे सोपे पण आचरणे कठीण आहे. पण रामनाम घ्यायला तर सुरुवात करू या. तेव्हा हे मना, अधिक वेळ दवडू नकोस. प्रभात समयापासून भगवंताचे चिंतन कर असेच समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगू इच्छितात.

स्वसंवाद :: 

१. ज्या ऐहिक सुखांसाठी आणि पैशासाठी मी रात्रं-दिवस देह झिजवतो, ते सुख मला कधी चिरंतन शांतता देऊ शकेल का?

२. नामस्मरणासाठी पैशांचा खर्च नाही आणि देहाला कष्टही नाहीत, तरीही मी ते टाळण्यासाठी वेळेचे किंवा थकव्याचे निमित्त शोधतो का?

३. संसारातील नाती आणि कर्तव्यांमध्ये मी इतका गुरफटलो आहे का, की मला या सगळ्याकडे ‘साक्षीभावाने’ किंवा अलिप्तपणे पाहता येत नाहीये?

४. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे, मी संसारात राहूनही माझे चित्त भगवंतचरणी ठेवण्याचा प्रयत्न करतो का?

– क्रमशः श्लोक ७१ आणि ७२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आराम करा ?.. नाही.. नको.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ आराम करा ?.. नाही.. नको.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

 – – – एका जेरियाट्रिशियन (वृद्धावस्था तज्ज्ञ) यांच्या मनातून उमटलेले शब्द

वृद्धापकाळात एखादी व्यक्ती दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहिली आणि तिची मुले फक्त “आराम करा… घाई करू नका… ” एवढेच म्हणत राहिली, तर अनेकदा तिथूनच सर्वात धोकादायक परिस्थितीची सुरुवात होते.

– – – “वृद्ध व्यक्तीसाठी अंथरुणावर पडणे सोपे असते; पण पुन्हा उठणे अत्यंत कठीण असते. अनेक वेळा आजार माणसाला मारत नाही, तर अंथरुण मारते. “

मी डॉ. सॉंग युआनमिंग, वय ५४ वर्षे.

… गेली २७ वर्षे एका नामांकित रुग्णालयाच्या जेरियाट्रिक्स (वृद्धावस्था चिकित्सा) विभागात कार्यरत आहे.

या काळात १६, ००० हून अधिक रुग्णांवर उपचार केले आणि २, ४०० पेक्षा अधिक गंभीर स्थितीची प्रमाणपत्रे लिहिली.

आज मी वैद्यकीय परिभाषा वापरणार नाही. मी फक्त माझ्या डोळ्यांसमोर घडलेल्या तीन सत्य घटना सांगणार आहे.

… या तिन्ही कथा प्रत्येकाच्या आई-वडिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

पहिली घटना (२०१९ – शरद ऋतू)

रुग्ण: ८१ वर्षीय निवृत्त शिक्षक श्री. सन

त्यांच्या मांडीच्या हाडाला (Femoral Neck) फ्रॅक्चर झाले होते.

शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितले,

“वॉकरच्या साहाय्याने चालण्याचा प्रयत्न सुरू करा. “

मात्र मुलगा म्हणाला,

“बाबा इतके वयस्कर आहेत… पुन्हा पडले तर? त्यांना आराम करू द्या. “

गेल्या २७ वर्षांत मी “आराम करा” हे शब्द किमान ५०० वेळा ऐकले आहेत.

आणि प्रत्येक वेळी माझ्या अंगावर काटा आला.

कारण ८० वर्षांवरील व्यक्तीसाठी हे तीन शब्द अनेकदा मृत्यूकडे नेणारे ठरतात.

श्री. सन यांनी मुलाचे ऐकले.

ते अंथरुणावरच राहिले.

– ७ वा दिवस – खोकला सुरू झाला.

– १२ वा दिवस – ३८. ७° ताप; CT मध्ये फुफ्फुसांचा Hypostatic Pneumonia आढळला.

– १८ वा दिवस – ICU मध्ये दाखल.

– २३ वा दिवस – निधन.

… त्यांचा मृत्यू फ्रॅक्चरमुळे झाला नाही.

शस्त्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळेही झाला नाही.

तर दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहिल्यामुळे झालेल्या न्यूमोनियामुळे झाला.

हाड बरे झाले… पण फुफ्फुसे अंथरुणामुळे निकामी झाली.

दुसरी घटना (जानेवारी २०२१)

रुग्ण: ७८ वर्षीय पक्षाघात (स्ट्रोक) झालेला रुग्ण – श्री. ली

दहा दिवसांनी त्यांची प्रकृती स्थिर झाली.

मी त्यांच्या मुलीला सांगितले,

“आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुनर्वसन (Rehabilitation). “

– दिवसातून किमान दोनदा बसवा.

– प्रत्येक वेळी ३० मिनिटे.

– शक्य असल्यास उभे करा.

– थोडे चालवा.

मुलगी अतिशय सेवाभावी होती.

२४ तास काळजी घेण्यासाठी केअरटेकर ठेवला.

जेवण, औषधे, अंघोळ, डायपर… सर्व काही व्यवस्थित.

पण एक गोष्ट झाली नाही… त्यांना हलवलेच गेले नाही.

तिला भीती वाटत होती—

दुखेल… थकतील… पडतील…

जेव्हा केअरटेकर त्यांना बसवण्याचा प्रयत्न करायचा, ती म्हणायची—

“जबरदस्ती करू नका… आराम करू द्या. “

तीन महिन्यांनंतर… त्यांचा दुसराही पाय निकामी झाला.

हा दुसरा स्ट्रोक नव्हता.

तर Muscle Atrophy (स्नायूंचे झपाट्याने क्षीण होणे) होते.

दीर्घकाळ अंथरुणावर राहिल्यास—

– दर आठवड्याला १. ५ ते ३% स्नायू नष्ट होतात.

– तीन महिन्यांत जवळपास ४०% स्नायू कमी होतात.

परिणाम—

अर्धांगवायू → पूर्ण अर्धांगवायू

“अजून उभे राहू शकतात”

“आता कधीच उभे राहू शकणार नाहीत. “

ते आणखी १४ महिने जगले.

– – या काळात त्यांना तीन बेडसोर झाले.

सर्वात मोठी जखम इतकी खोल होती की हाड दिसत होते.

ड्रेसिंग करताना ते टॉवेल घट्ट पकडून वेदना सहन करायचे…

डोळ्यांतून अश्रू वाहायचे.

प्रत्येक वेळी मुलगी रडत म्हणायची—

“बाबा… आराम करा… “

हेच शब्द… सर्वात मृदू… पण सर्वात क्रूर ठरले.

तिसरी घटना (२०२३)

रुग्ण: ८३ वर्षीय श्री. झाओ

Hip Replacement शस्त्रक्रिया झाली होती.

त्यांचा मुलगा अभियंता होता.

दुसऱ्या दिवशी तो वही घेऊन माझ्याकडे आला.

“डॉक्टर, कृपया सात दिवसांचा पुनर्वसन कार्यक्रम लिहून द्या. “

मी योजना तयार केली—

– दिवस १ – घोट्याचे व्यायाम (प्रत्येक तासाला २० वेळा)

– दिवस २ – पाय उचलणे (१० × ४)

– दिवस ३ – वॉकरच्या सहाय्याने २ मिनिटे उभे राहणे

– दिवस ५ – १० पावले चालणे (४ वेळा)

– दिवस ७ – ८ मीटर चालणे

त्यांना वेदना झाल्या का?

हो.

तिसऱ्या दिवशी उभे राहताना त्यांच्या कपाळावर घाम होता…

ओठ पांढरे पडले होते.

मुलाने मात्र असे म्हटले नाही—

“आराम करा. “

त्याने फक्त एवढेच म्हटले—

“बाबा… फक्त ३० सेकंद उभे रहा… मी टाइमर लावला आहे. “

फक्त ३० सेकंद…

त्यांनी दात ओठ खात ते पूर्ण केले.

आणि तेच ३० सेकंद त्यांच्या आयुष्यातील सर्वात प्रभावी औषध ठरले.

१४ व्या दिवशी…

ते स्वतःच्या पायांनी चालत वॉर्डच्या बाहेर आले.

हळूहळू… पण स्वतःच्या पायांवर.

त्या वर्षीच्या १८४ रुग्णांमध्ये त्यांची पुनर्प्राप्ती (Recovery) सर्वोत्कृष्ट होती.

२७ वर्षांच्या अनुभवातून शिकलेले ५ धडे

१. दोन आठवड्यांपेक्षा जास्त अंथरुणावर राहणे म्हणजे स्नायूंचा झपाट्याने ऱ्हास.

अंथरुण म्हणजे विश्रांती नव्हे…

तो विनाशाची सुरुवात असू शकतो.

२. पहिले ७२ तास हे सुवर्णक्षण (Golden Period) असतात.

याच काळात हालचाल सुरू झाली की नाही, यावर पुढील आयुष्य ठरते.

३. सर्वात धोकादायक तीन गोष्टी

– न्यूमोनिया

– रक्ताच्या गाठी (Blood Clots)

– बेडसोर

.. या अनेकदा मूळ आजारापेक्षाही अधिक जीवघेण्या ठरतात.

४. चुकीचा सेवाभाव

रुग्णाचे प्रत्येक काम आपणच करणे…

त्यांना अधिक अपंग बनवू शकते.

५. खरी सेवा म्हणजे…

त्यांना पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करणे.

कधी कधी त्यासाठी थोडे कठोर व्हावे लागले तरी.

शेवटचा संदेश

मला विचारले गेले—

“तुम्हाला सर्वात जास्त कशाची भीती वाटते?”

मी उत्तर दिले—

“मला गंभीर आजाराची भीती वाटत नाही. “

“मला भीती वाटते जेव्हा कोणी म्हणते— ‘आराम करा. ‘”

कारण त्या क्षणी…

प्रयत्न करण्याची इच्छा संपलेली असते.

मी माझ्या कुटुंबालाही सांगितले आहे—

“जर मी कधी अंथरुणाला खिळलो… तर मला कधीही ‘आराम करा’ असे म्हणू नका. “

“मला उठवा… चालवा… टाइमर लावा… आणि सांगा—

‘बाबा… फक्त अजून ३० सेकंद!'”

आपल्या सर्वांसाठी

देव करो, आपल्या आई-वडिलांवर अशी वेळ कधीच येऊ नये.

परंतु जर आलीच—

✖️ “आराम करा” असे म्हणू नका.

✔️”मी तुम्हाला उभे राहायला मदत करतो. ” असे म्हणा.

कदाचित ते ३० सेकंद…

त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतील.

कारण…

स्वतःच्या पायांनी चालत शौचालयापर्यंत जाणे—

ही वृद्धापकाळातील सर्वात मौल्यवान स्वातंत्र्याची भावना आहे.

ते जपा… आजपासूनच.

टीप: प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते. शस्त्रक्रिया, स्ट्रोक किंवा गंभीर आजारानंतर हालचाल सुरू करण्याचा निर्णय नेहमी उपचार करणाऱ्या डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा. 

***

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जगणं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆

सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ जगणं– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित ☆

 येईल साठी, येईल सत्तरी

 करायची नाही कुणीच चिंता,

 प्रत्येक दिवस मजेत जगायचा

 वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता.

*

 वय झालं म्हातारपण आलं,

 उगाच कोकलत बसायचं नाही.

 विनाकारण बाम लावून,

 चादरीत तोंड खुपसायचं नाही.

*

 तुम्हीच सांगा छंद जोपासायला,

 वयाचा संबंध असतो का ?

 रिकामटेकडं घरात बसून

 माणूस आनंदी दिसतो का ?

*

 पोटा-पाण्यासाठी पोरं-सुना

 घर सोडून जाणारच,

 प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये

 असे रितेपण येणारच.

*

 करमत नाही करमत नाही

 सारखे-सारखे म्हणायचे नाही,

 आवडत्या कामात दिवस घालवायचा

 उगाचच कुढत बसायचं नाही.

*

 घरातल्या घरात वा बागेत

 हिंडाय-फिरायला जायचं,

 वय जरी वाढलं असलं तरी

 मनपसंत गाणं मनमोकळं गायचं.

*

 गुडघे गेले, कंबर गेली

 नेहमी नेहमी कण्हायचं नाही,

 आता आपलं काय राहिलं?

 हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही.

*

 पिढी दर पिढी चालीरीतीत

 थोडे फार बदल होणारच,

 पोरं-पोरी त्यांच्या संसारात

 कळत नकळत गुंतणारच.

*

 तू-तू, मै-मै, जास्त अपेक्षा

 कुणाकडूनही करायची नाही,

 मस्तपैकी जगायचं सोडून

 रोज थोडं थोडं मरायचं नाही.

*

 स्वत:च स्वत:ला समजवायचं असतं

 पुढे पुढे चालत राहायचं असतं,

 वास्तू ‘तथास्तु’ म्हणत असते

 हे उमजून निरामय जगायचं असतं.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: सुचिता पंडित

 ≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “नॉट विदाऊट माय डॉटर” – इंग्रजी लेखिका : बेट्टी मेहमुदी – मराठी अनुवाद : लीना सोहोनी ☆ परिचय – अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “नॉट विदाऊट माय डॉटर” – इंग्रजी लेखिका : बेट्टी मेहमुदी – मराठी अनुवाद : लीना सोहोनी ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆ 

पुस्तक : नॉट विदाऊट माय डॉटर

मूळ लेखिका… बेट्टी मेहमुदी

अनुवाद.. लीना सोहोनी..

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 

काही पुस्तकं इतकं वेड लावतात की ती कितीही वेळा वाचली तरी समाधान च होत नाही.. ती पुन्हा पुन्हा वाचावीत असच वाटतं राहतं.. त्यातलच एक पुस्तक म्हणजे नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक… मूळ अमेरिकन लेखिका बेट्टी मेहमुदी ह्यांनी लिहलेले आणि लीना सोहनी ह्यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक म्हणजे संकट काय असतात आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी किती पराकोटीची जिद्द असावी लागते याचं उत्तम उदाहरण आहे.. इच्छा असेल तर मार्ग नक्की मिळतो ह्या वाक्याची प्रचिती जागोजागी ह्या पुस्तकात येते… एक पुरोगामी विचारांची आधुनिक अमेरिकन स्त्री आणि तिने तिच्या चार वर्षाच्या मुलीसाठी केलेला संघर्ष ह्याची ही कहाणी… अमेरिकेत नोकरी निमित्त आलेला एक इराणी माणूस “मूडी” आणि एका सुशिक्षित घटोस्फोटित दोन मुलांची आई असणाऱ्या अमेरिकन महिलेची “बेट्टी” ची संघर्षमय प्रेम कहाणी म्हणजे हे पुस्तक..

अमेरिकेसारख्या आधुनिक जगात वावरणारा एक इराणी माणूस मूडी.. पेशाने डॉक्टर असणारा बेट्टी ला भेटतो.. तो तिचा डॉक्टर म्हणून.. पुढे भेटीगाठी वाढतात.. गोष्टी वेल्हाळ स्वभावामुळे मूडी लवकरच बेट्टी ला ही आवडू लागतो.. बेट्टी च्या दोन्ही मुलांना ही हा नवीन बाबा आवडू लागतो… कालांतराने बेट्टी आणि मूडी लग्न करतात.. चौघांचा सुखाचा संसार सुरू होतो.. बेट्टी स्वतःच्या नोकरी मध्ये उच्च पदावर पोहचते.. मूडी ही आपल्या क्षेत्रात नाव कमवत असतो.. पार्टी, पिकनिक, सगळं अगदी छान सुरळीत सुरू असत..

… अशीच काही वर्ष जातात आणि माहतोब चा जन्म होतो.. सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची माहतोब सगळ्या घरात आनंद घेऊन येते.. वरून दिसायला तर आनंदी कुटुंब असत.. पण.. मूडी चा भाचा इराण वरून येतो आणि ह्या कुटुंबाला नजर लागते.. हळूहळू मूडी मधला कट्टर इराणी बेट्टी ला दिसू लागतो.. छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांना खटकू लागतात.. मूडी चा भाचा आणि तो फारसी भाषेत तासनतास गप्पा मारत असतात..

आणि एक दिवस मूडी जाहीर करतो की आपण इराण ला जाऊन माझ्या कुटुंबीयांना भेटून येऊ.. ते वाट बघतायत.. भावनिक होऊन तो बेट्टी ला समजावतो तरीही बेट्टी च्या मनात पाल चुकचुकत असतेच.. पण त्याचा प्रेमापोटी 15 दिवस त्याच्या सोबत जाण्यास ती तयार होते…

….. इथे कथानक एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचत.. बेट्टी, माहतोब आणि मूडी इराणला जायला निघतात.. तिथल्या परंपरे प्रमाणे बेट्टी ने पूर्ण कपडे घालावेत अस फर्मान निघत पण ते ही ती करते.. चादोर (एक इराणी पेहराव) जो की जाड्या भरड्या कपड्यांचा अगदीच विटकरी रंगांचा असतो.. एक केस ही दिसू नये असा पोषाख.. त्या ड्रेस मध्ये बेट्टी ची होणारी घालमेल.. त्या चार वर्षाच्या माहतोब साठी ही हाच नियम.. ती ही एक स्त्रीच ना म्हणून.. इथून सुरू होते एका कट्टर इराणी मुस्लिम छळवादी, स्त्रियांना गुलाम समजणाऱ्या एका नवऱ्याच्या सो कॉल्ड पुरुषी मनोवृत्तीची कहाणी…

इराण ची त्या काळातील ती परिस्थिती.. ते गलिच्छ राहणीमान.. वर्षानुवर्षांपासून अंघोळ न करता राहणाऱ्या स्त्रिया.. अंघोळी मुळे आजार होतात हा समज बाळगणाऱ्या स्त्रिया.. टॉयलेट ची ही सोय नसलेली घर.. अन्नाच्या नावाखाली वाट्टेल ते खाणारी कुटुंब.. स्वागताच्या विचित्र विचित्र पद्धती.. आणि हे सगळं जेंव्हा बेट्टी सारखी अमेरिकेतून आलेली स्त्री पाहते तेंव्हा पुढच्या दिव्याची कल्पना येते आणि ती शहारून जाते.. चार वर्षाची माहतोब केविलवाणी होऊन जाते… आपल्या समोर काय वाढून ठेवलंय ह्याची दोघी माय लेकीना कल्पना येते.. लवकरच मूडी आपले रंग दाखवायला सुरुवात करतो आणि एक दिवस अमेरिकेत कधीही न परतण्याचा विचार जाहीर करून टाकतो.. पायाखालची जमीन सरकते म्हणजे काय ते बेट्टी ला कळून चुकत… तो पर्यंत दोघींचे ही पासपोर्ट मूडी ने ताब्यात घेतलेले असतात… अमेरिके विषयी चा प्रचंड द्वेष, राग.. त्यात बेट्टी अमेरिकन म्हणून तिला घरच्या स्त्रियांकडून मिळणारी वागणूक हे सगळं सहन करण्यासाठी एक परमेश्वर च आपली मदत करू शकतो ह्याची जाणीव माय लेकिना होते आणि सुरू होतो एक जीवघेणा अनुभव.. बेट्टी ला तिच्या घरच्याशी फोनवर ही बोललं दिलं जात नाही.. तिचे परतीचे सगळे दोर कापले जातात.. अशा परिस्थितीत ही ती आपण आपल्या मुलीसह ह्या कैदेतून सुटायच हा निश्चय करते.. त्यासाठी केलेले तिचे प्रयत्न तिची जिद्द.. चिकाटी म्हणजे हे पुस्तकं… नवऱ्याची क्रूर मारहाण… मुलीवरचा राग.. प्रचंड मानसिक दडपण.. माहातोब आणि बेट्टी चा विरह… हे सगळं वाचताना रडू नाही आलं तरच नवल… त्या नंतर आहे ही परिस्तिथी स्वीकारली आहे हे मूडी ला दाखवण्यासाठी केलेली धडपड, आणि एका बाजूला सुटकेसाठी चे प्रयत्न ह्याची उत्कंठा वर्धक कहाणी म्हणजे हे पुस्तक.. आपल्या मुलीसाठी तिच्या भवितव्यासाठी.. केलेल्या एका आईच्या संघर्षाची ही कथा… आणि जवळजवळ दिड ते दोन वर्ष ह्या यातनादायी, स्त्रियांना कसपटा समान समजणाऱ्या, अगणित बंधनं असणाऱ्या समाजामध्ये काढणे म्हणजे नरकयातनाच.. तरी ही इच्छा तिथे मार्ग हे आपल्या वडिलांचं वाक्य आठवून आठवून जगणाऱ्या एका जिद्दी आईची ही कहाणी… तिची सुटका ती कशी करून घेते, आपल्या मुलीसोबत मायदेशी जाऊ शकते की नाही हे सगळं एकदा तरी वाचलच पाहिजे…

हे पुस्तक मी आज पर्यंत चार पाच वेळा तरी वाचलं असेन पण प्रत्येक वेळी बेट्टी वेगळीच वाटते.. नवीन काहीतरी वाचतो आहोत असा फिल येतो.. आणि आपल्या समोर असणाऱ्या अडचणी, संकट किती क्षुल्लक आहेत हे कळून चुकत.. आणि जगण्याची एक नवी प्रेरणा मिळते.. जेव्हा जेंव्हा अडचणीत आहोत आणि आता काय करू अस वाटतं तेंव्हा मी बेट्टी चा संघर्ष वाचते आणि मग कळत अरे आपल्याकडे तर खूप काही आहे.. स्वातंत्र्य, उत्तम कुटुंब, आपले विचार मांडण्याची संधी आणि मुख्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती.. तिचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे हे मानणारा समाज.. हे इतकं असूनही जेंव्हा आपण कुरकुर करतो तेंव्हा हे पुस्तक एकदा वाचलं की खाडकन डोळे उघडतात..

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #३२९ ☆ ज़रूरतें व ख्वाहिशें… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख ज़रूरतें व ख्वाहिशें। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

(डॉ मुक्ता जी द्वारा रचित एक भजन – ये दुनिया है दो दिनों का मेला/ स्वर- रुखसार, सौजन्य – तरूनम चैनल)

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # ३२९ ☆

☆ ज़रूरतें व ख्वाहिशें… ☆ डॉ. मुक्ता ☆

‘ज़रूरत के मुताबिक ज़िंदगी जीओ; ख्वाहिशों के मुताबिक नहीं, क्योंकि ज़रूरतें तो फ़कीरों की भी पूरी हो जाती हैं, मगर ख्वाहिशें बादशाहों की भी अधूरी रह जाती हैं।’ इच्छाएं सुरसा के मुख की भांति बढ़ती चली जाती हैं, जिनका अंत संभव नहीं होता। उनका आकाश बहुत विस्तृत है, अनंत है, असीम है और एक इच्छा के पश्चात् दूसरी इच्छा तुरंत जन्म ले लेती है, परंतु इन पर अंकुश लगाने में ही मानव का हित है। ख्वाहिशें एक ओर तो जीने का मक़सद हैं, कर्मशीलता का संदेश देती हैं, जिनके आधार पर हम निरंतर बढ़ते रहते हैं और हमारे अंतर्मन में कुछ करने का जुनून बना रहता है। दूसरी ओर संतोष व ठहराव हमारी ज़िंदगी में पूर्ण विराम लगा देता है और जीवन में करने को कुछ विशेष नहीं रह जाता।

ख्वाहिशें हमें प्रेरित करती हैं; एक गाइड की भांति दिशा निर्देश देती हैं, जिनका अनुसरण करते हुए हम उस मुक़ाम को प्राप्त कर लेते हैं, जो हमने निर्धारित किया है। इनके अभाव में ज़िंदगी थम जाती है। इंसान की मौलिक आवश्यकताएं रोटी, कपड़ा और मकान हैं। जहाँ तक ज़रूरतों का संबंध है, वे आसानी से पूरी हो जाती हैं। मानव शरीर पंच-तत्वों से निर्मित है और अंत में उन में ही समा जाता है। वैसे भी यह सब हमें प्रचुर मात्रा में प्रकृति प्रदत्त है, परंतु मानव की लालसा ने इन्हें सुलभ-प्राप्य नहीं रहने दिया। जल तो पहले से ही बंद बोतलों में बिकने लगा है। अब तो वायु भी सिलेंडरों में बिकने लगी है।

कोरोना काल में हम वायु की महत्ता जान चुके हैं। लाखों रुपए में एक सिलेंडर भी उपलब्ध नहीं था। उस स्थिति में हमें आभास होता है कि हम कितनी वायु प्रतिदिन ग्रहण करते हैं और कार्बन डाइऑक्साइड छोड़कर पर्यावरण को प्रदूषित करते हैं। परंतु प्रभुकृपा से वायु हमें मुफ्त में मिलती है, परंतु प्रदूषण के कारण आजकल इसका अभाव होने लगा है। प्रदूषण के लिए दोषी हम स्वयं हैं। जंगलों को काटकर कंक्रीट के घर बनाना, कारखानों की प्रदूषित वायु व जल हमारी श्वास-क्रिया को प्रदूषित करते हैं। गंदा जल नदियों के जल को प्रदूषित कर रहा है, जिसके कारण हमें शुद्ध जल की प्राप्ति नहीं हो पाती।

सो! ज़रूरतें तो फ़कीरों की भी पूरी हो जाती है, परंतु ख़्वाहिशें राजाओं की भी पूरी नहीं हो पाती, जिसका उदाहरण हिटलर है। उसने सारी सृष्टि पर आधिपत्य प्राप्त करना चाहा, परंतु जीवन की अंतिम वेला में उसे ज्ञात हुआ कि अंतकाल में इस जहान से व्यक्ति खाली हाथ जाता है। इसलिए आजीवन राज्य विस्तार के निमित्त आक्रमणकारी नीति को अपनाना ग़लत है, निष्प्रयोजन है। सम्राट अशोक इसके जीवित प्रमाण हैं। उसने सम्राट के रूप में सारी दुनिया पर शासन कायम करना चाहा और निरंतर युद्ध करता रहा। अंत में उसे ज्ञात हुआ कि यह जीवन का मक़सद अर्थात् प्रयोजन नहीं है। सो! उसने  सब कुछ छोड़कर बौद्ध धर्म को अपना लिया।

‘यह किराये का मकान है/ कौन कब तक ठहर पाएगा/ खाली हाथ तू आया है बंदे/ खाली हाथ तू जाएगा।’ यहाँ हर इंसान मुसाफ़िर है। वह खाली हाथ आता है और खाली हाथ चला जाता है। इसलिए संचय की प्रवृत्ति क्यों? ‘यह दुनिया है दो दिन का मेला/ हर शख़्स यहाँ है अकेला/ तन्हाई संग जीना सीख ले/ तू दिव्य खुशी पा जाएगा।’ स्वरचित गीतों की पंक्तियाँ इन भावों को पल्लवित करती हैं कि वैसे तो यह जन्म से पूर्व निश्चित हो जाता है कि वह कितनी साँसें लेगा? इसलिए मानव को अभिमान नहीं करना चाहिए तथा सृष्टि के कण-कण में परमात्मा की सत्ता अनुभव करनी चाहिए, जो उसे प्रभु सिमरन की ओर प्रवृत्त करती है।

सो! मानव को स्वयं को इच्छाओं का गुलाम नहीं बनाना चाहिए। यह बलवती इच्छाएं मानव को ग़लत कार्य करने को विवश करती हैं। उस स्थिति में वह उचित-अनुचित के भेद को नहीं स्वीकारता और नरक में गिरता चला जाता है। अंतत: वह चौरासी के चक्कर से आजीवन मुक्त नहीं हो पाता। इससे मुक्ति पाने का सर्वोत्तम उपाय है प्रभु सिमरन। जो व्यक्ति शरणागत हो जाता है, वह निर्भय होकर जीता है आगत- अनागत से बेखबर…उसे भविष्य की चिंता नहीं होती। जो गुज़र गया है, वह उसका स्मरण नहीं करता, बल्कि वह वर्तमान में जीता है और प्रभु का नाम स्मरण करता है और गीता का संदेश ‘जो हुआ, अच्छा हुआ/ जो होगा, अच्छा ही होगा ‘ वह इसे जीने का मूलमंत्र स्वीकारता है। प्रभु अपने भक्तों की कदम-कदम पर सहायता करता है।

अक्सर ज़्यादा पाने की चाहत में हमारे पास जितना उपलब्ध है, उसका आनंद लेना भूल जाते हैं। इसलिए संतोष को सर्वश्रेष्ठ धन स्वीकारा गया है। इसलिए कहा जाता है कि ‘श्रेय मिले ना मिले, अपना श्रेष्ठ देना बंद ना करें। आशा चाहे कितनी कम हो, निराशा से बेहतर होती है।’ इसलिए दूसरों से उम्मीद ना रखें और सत्कर्म करते रहें, क्योंकि यह ज़िंदगी की सबसे बड़ी भूल व ग़लती है, जो हमें पथ-विचलित करती है। इंसान का मन भी एक अथाह समुद्र है। किसी को क्या मालूम कि कितनी भावनाएं, संवेदनाएं, सुख-दु:ख, हादसे, स्मृतियाँ आदि उसमें समाई हैं। इसलिए वह मुखौटा धारण किए रखता है और दूसरों पर सत्य उजागर नहीं होने देता। परंतु इंसान कितना भी अमीर क्यों ना बन जाए, तकलीफ़ बेच नहीं सकता और सुक़ून खरीद नहीं सकता। वह नियति के हाथों का खिलौना है; विवश है, क्योंकि वह अपने निर्णय नहीं ले सकता।

‘जो तकलीफ़ तुम ख़ुद बर्दाश्त नहीं कर सकते, वो किसी दूसरे को भी मत दो।’ महात्मा बुद्ध का यह कथन अत्यंत कारग़र है। इसलिए वे दूसरों के साथ ऐसा व्यवहार न करने का संदेश देते हैं, जिसकी अपेक्षा आप दूसरों से नहीं करते हैं। संसार में जो भी आप किसी को देते हैं, वह लौट कर आपके पास आता है। इसलिए दूसरों की ज़रूरतों की पूर्ति का माध्यम बनिए ताकि आपकी ख़्वाहिशें पूरी हो सकें। इसके साथ ही अपनी इच्छाओं आकाँक्षाओं, तमन्नाओं व लालसाओं पर अंकुश लगाइए, यही जीवन जीने की कला है।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares