मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

जवळजवळ १६५ वर्षांपूर्वी कोलकत्ता जवळच्या ‘जोरासांको’ येथील ठाकूर घराण्याच्या महाल सदृश घरात ७ मे १८४१ रोजी रविंद्रनाथांचा जन्म झाला. वडील महर्षी देवेंद्रनाथ व आई शारदा देवी यांचं ते चौदावं अपत्य होते. साहजिकच त्यांना आईचा सहवास फार वर्षे लाभला नाही. वडील पण सतत प्रवासांत असत. ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचे देवेंद्रनाथ वरचेवर हिमालयात भटकंती करत, तिथे जाऊन रहात, त्यामुळे त्यांचा सहवास देखील फारसा मिळायचा नाही. पण जेंव्हा रविंद्र उर्फ ‘रोबी’ ने शाळे विषयीच्या तक्रारी त्यांना सांगितल्या तेंव्हा त्यांना फार वाईट वाटले व त्यांनी रोबीला शाळेतून काढले ते कायमचेच.

घरीच वडील त्यांना शिकवू लागले. प्रवासात ते रोबीला आपल्या सोबत घेऊन जाऊ लागले. तिथे निसर्गाच्या सानिध्यात शाळेत न मिळणारं, पण बौद्धिक व भावनिक जग समृद्ध करणारे शिक्षण सहज बोलता बोलता रोबीला मिळू लागलं. वडिलांबरोबर केलेला प्रवास, हिमालयातील भटकंती, निसर्गाकडून व वडिलांकडून मिळालेलं ज्ञान हा रविन्द्रनाथ यांच्या जीवनातला सुवर्णकाळ होता. याच काळात या शाळा सोडून दिलेल्या तथाकथित अज्ञानी मुलाचं रूपांतर एका सुसंस्कृत मुलात झालं. (The ugly duckling was transformed into an admired swan) ही शिदोरी त्यांना नोबेल पुरस्कारा पर्यंत घेऊन गेली व शिक्षणपद्धतीचा कायापालट करणाऱ्या शिक्षणमहर्षी या पदवीपर्यंत घेऊन गेली. पूर्ण भारताने नाही तर जगाने त्यांना कलाक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, समाजसुधारणेचं क्षेत्र, तत्वज्ञानाचे क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांतील गुरुपद बहाल केलं व गुरुदेव या पदवीने सन्मानित केलं. कोणतेही समाजमान्य पारंपारिक शिक्षण न घेतलेला, कोणत्याही विद्यापीठाची कसलीही पदवी गाठीशी नसलेला हा माणूस शिक्षणक्षेत्रात ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रयोग यशस्वीपणे करून दाखवतो ही गोष्ट अचंबित करणारी आहे.

त्यांच्या मनात शाळेविषयी तिरस्कार निर्माण करणाऱ्या, त्या काळी सर्वसंमत असणाऱ्या, मुलांना शारीरिक क्लेश देणाऱ्या, अपमानास्पद शिक्षा करणाऱ्या पद्धतीचे जगाने खरंतर आभारच मानायला हवेत कारण त्यामुळेच रविंद्रनाथांनी शाळा सोडली. वडिलांकडून, निसर्गाकडून, पुस्तकां कडून ज्ञान मिळवून ते संवेदनशील विचारवंत, हरहुन्नरी कलाकार बनले.

रविंद्रनाथांनी लहानपणीच तीन तीन क्रांतीकारी चळवळी खूप जवळून पाहिल्या, अनुभवल्या. एक म्हणजे राजा राममोहन रॉय यांची धार्मिक पुनरुत्थानाची चळवळ, ज्यातून ब्राह्मो

समाजाची निर्मिती झाली. दुसरी म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी चालू केलेली साहित्यिक चळवळ, ज्यामुळे भारतीय, वाङ्मयीन विश्व खडबडून जागे झाले. आणि तिसरी राजकीय चळवळ ‘Indian National movement’, जी राजकीय व सांस्कृतिक दडपशाहीचा निषेध करत होती. या तीनही चळवळींत टागोर कुटुंबियांचा सक्रिय सहभाग होता व त्यामुळे बालपणी व तरुणपणी रविंद्रनाथांनी या सर्व हालचाली खूप जवळून पाहिल्या होत्या.

पौर्वात्य व पाश्चिमात्य दोन्ही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी एकत्र आणून संघर्षाशिवाय मानवजातीच्या कल्याणासाठी काम करावं अशी भावना कदाचित या तिन्ही चळवळींचा त्यांच्या कोवळ्या मनावर झालेल्या परिणामाचा परिपाक असावा.

वयात बरंच अंतर असूनही वडीलबंधू सत्येंद्रनाथांबरोबर रविंद्रनाथांचे वडिलांप्रमाणेच मित्रत्वाचे संबंध होते. आय ए एस असलेल्या सत्येंद्रनाथांच्या देशातील निरनिराळ्या शहरांत बदल्या व्हायच्या पण तिकडे जाऊन रोबी त्यांच्याबरोबर रहात, वेद, उपनिषदे, संत वाङ्मय यांचे वाचन करीत व त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्या ज्ञान कक्षा विस्तारित असत.

‘रोबी’ या आपल्या आत्मकथनपर पुस्तकात त्यांनी म्हटलय की, ” ज्या देवाचा व प्रेमाचा माझ्या सर्व साहित्यात संदर्भ आला आहे तो या जीवनाचा देव (God of life) आहे व ते प्रेम जीवनावरील प्रेम आहे. ” त्यांच्या शब्दांतून उमटणारे दैवी सूर, धर्म, भाषा, देश अशा सर्व सीमा लांघून सर्व विश्वात घुमले. आपल्या एका कवितेत ते स्वतःलाच सांगतात, “Move out of yourself, stand out in the open, you will hear the music of the universe in your heart. “

—–

☆ गीत : ६४ ☆

ON the slope of the desolate river among tall grasses I asked her, “Maiden, where do 

you go shading your lamp with your mantle? My house is all dark and lonesome ⎯ lend 

me your light! ” She raised her dark eyes for a moment and looked at my face through 

the dusk. “I have come to the river, ” she said, “to float my lamp on the stream when the 

daylight wanes in the west. ” I stood alone among tall grasses and watched the timid 

flame of her lamp uselessly drifting in the tide.

In the silence of gathering night I asked her, “Maiden, your lights are all lit ⎯ then where do you go with your lamp? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” 

She raised her dark eyes on my face and stood for a moment doubtful. “I have come, ” she said at last, “to dedicate my lamp to the sky. ” I stood and watched her light 

uselessly burning in the void.

In the moonless gloom of midnight I asked her, “Maiden, what is your quest holding the 

lamp near your heart? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” She 

stopped for a minute and thought and gazed at my face in the dark. “I have brought my light, ” she said, “to join the carnival of lamps. ” I stood and watched her little lamp uselessly lost among lights.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत :६४ ☆

नदीच्या उतरणीला उभा मी असताना,

मज दिसली ती, झाकुनि एक दीप नेताना

 

निघालीस कोठे हा दीप 

तुझा घेउनि?

देशील कां, घर माझे

आले अंधारुनि?

 

डोळे मोठ्ठे करूनि क्षण

मजकडे पाही

म्हणे मावळतीला सोडेन नदी प्रवाही

 

भित्री ज्योत थरथरुनि

वहातच गेली 

निशेच्या तमी पुन्हा दिवा घेउनि दिसली 

 

आता तरी देशील कां,

घर माझे उजळण्या?

म्हणे दिवा हा आणिला

नभासि अर्पिण्या

 

अवकाश पोकळीत दीप व्यर्थ तेवला

गडद रात्री, आली फिरुनि,

दीप छातीशी धरिला 

 

पुन्हा मी पुसले, टक लावुनि, पहात म्हणते

आनंदोत्सव असे दिव्यांचा, त्याचसाठी नेते

 

अनंत दिवे, ध्येय रहित, तेवती प्रकाशात

ती अन् तिचा दीप दोन्ही हरवले गर्दीत

 

भक्तीचा दीप न मिळे, असा आयता कोणास

ज्याचा त्याने तो ठेवावा चेतवुनि हृदयास

 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ६५ ☆

WHAT divine drink wouldst thou have, my God, from this overflowing cup of my life?

My poet, is it thy delight to see thy creation through my eyes and to stand at the portals 

of my ears silently to listen to thine own eternal harmony?

Thy world is weaving words in my mind and thy joy is adding music to them. Thou givest 

thyself to me in love and then feelest thine own entire sweetness in me.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६५ ☆

*

भरुनी वाहतो देवा

सुखी जीवनाचा ठेवा

*
तूच दिले मज हे जीवन

विविध रसांनी नटवून

*

कोणता रस तुजला

अर्पू मी न कळे मला

*

तूच निर्मिलेले जग 

मम नेत्री पाहशील का?

संगीत तूच निर्मिलेले

मम श्रोत्री ऐकशील का?

*

विश्व तुझेच मम हृदयी

गोफ विणे शब्दमयी

*

अलौकिक तव आलापी

सुखदायक हो भवतापी

*

बली सम तू दाता असशी

मम चेतसी तुलाच देशी

*

तव माधुरी मी हृदयी धरी

तव हृदयांगण जी तृप्त करी

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ६६ ☆

SHE who ever had remained in the depth of my being, in the twilight of gleams and of glimpses; she who never opened her veils in the morning light, will be my last gift to thee, my God, folded in my final song.

Words have wooed yet failed to win her; persuasion has stretched to her its eager arms in vain.

I have roamed from country to country keeping her in the core of my heart, and around her have risen and fallen the growth and decay of my life.

Over my thoughts and actions, my slumbers and dreams, she reigned yet dwelled alone and apart.

Many a man knocked at my door and asked for her and turned away in despair.

There was none in the world who ever saw her face to face, and she remained in her 

loneliness waiting for thy recognition.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६६ ☆

*

जी अंतरात माझ्या, ती संधीप्रकाश किरणात

कुणी न तिज पाहिले, दिवसाच्या प्रकाशात

*

प्रेमयाचना शब्दांची, फोल तिला जिंकण्यास 

प्रयत्न निष्फळ होत, तिचे मन वळविण्यास

*

देशोदेशी फिरलो, हृदयात तिज स्थापुनि

आयुष्याचे चढउतार, भोवती तिच्या गुंफुनि

*

अनन्य भक्ती तुजप्रती, हृदयी येई उमलुनि

मार्ग चाललो, जो दिला तिनेच मला दावुनि 

*

सत्ता तिचीच, मम स्वप्न, विचार वा कृती

निराश झाले, ज्यांना ती मागून हवी होती

*

वाट पाहते, तव मान्यतेची, एकटीच राहुनि

अर्पण करी, तिज देवा, अखेरच्या गीतातुनि

*

– क्रमशः भाग २२..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुरांचा वसंत हरपला… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ सुरांचा वसंत हरपला… ☆ राधिका भांडारकर

आशाताईंच्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने कवीवर्य सुरेश भटांनी त्यांच्यासाठी एक कविता पाठवली होती. शब्द असे होते…

आता न तुझे कुठल्याही जखमांशी देणे घेणे 

पाऊस तुझ्यावर साऱ्या सौख्याचा बरसत राहो

हा कंठ तुझा अलबेला हा रंग तुझा मतवाला

तलवार तुझ्या गाण्याची बिजलीसम चमकत राहो

तू सरगम सुखदुःखाचा जपलास कसा उमजेना 

हा कैफ तुझा माझ्या धमन्यातून उसळत राहो 

… खरं आहे. आज देहाने त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सुरात तो सळसळता कैफ मात्र चिरंतन, अविनाशी राहणार.

काल त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मन प्रचंड सैरभैर झालं. मनात आलं, लता आणि आशा नाहीत अशा जगात आता आपल्याला जगण्याची सवय करावी लागणार. चार वर्षांपूर्वी लतादीदींचे निधन झाले आणि त्याच वाटेने आता आशाताई रसिकांच्या मनावर एक पोरकेपणाची भावना ठेवून निघून गेल्या.

भारतीय सुगम संगीत क्षेत्रातल्या एका सुस्वर युगाचा अंत झाला. लता म्हणजे भगवंताची बासरी तर अशा म्हणजे राधेच्या मनातल्या कृष्णाचा सूर होता.

चाळिशीच्या दशकात चित्रपट बोलू लागला आणि गाऊही लागला. त्याच सुमारास लता आणि आशा नावाची संगीताच्या नभांगणात नक्षत्रे उगवली. दत्ता डावजेकरांचे संगीत असलेले ‘माझा बाळ’ या चित्रपटात,

चला चला नव बाळा हे गीत आशाताईंनी गायले आणि इथून पुढे सुरांच्या दुनियेत जे घडले तो चमत्कारच म्हणावा लागेल. नंतरच्या पिढ्यांसाठी संगीतातले महत्त्वाचे ब्रँड त्यांनी अधोरेखित केले. आजही संगीताच्या रिअॅलिटी शोमध्ये प्रामुख्याने आशा, लता, रफी, मुकेश, किशोर कुमार यांचीच गाणी नव्या पिढ्यांकडून गायली जातात. कित्येक गायक झालेत, होतीलही पण या सुरांचं अलौकिकत्व, तो करिष्मा केवळ अजोड आहे.

आशाताईंच्या गाण्याचे वैशिष्ट्य हे की त्यांच्या गळ्याला पेलवत नाही किंवा बसत नाही अशी कुठलीच स्वररचना नाही. त्यांचा कंठ खऱ्या अर्थाने अष्टपैलू. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे पल्लेदार सूरही सहजपणे त्यांच्या गळ्यातून उतरले. “शूरा मी वंदिले. ” किंवा मर्मबंधातली ठेव ही” सारखी नाट्यगीते म्हणजेच एक वस्तुपाठ आहे. हिंदुस्थानी गायकीचे थाट, रंग त्यातून उलगडले. त्याच गळ्यातून अवखळ, उडती, मदमस्त शृंगारिक गाण्यांची बरसात झाली. अनवट गझला त्यांनी गायल्या. त्यांच्या गळ्यात फक्त सात स्वरच नव्हते तर सात ऋतूंचाच मुक्काम होता जणू काही. असा प्रवाही गळा म्हणजे केवळ भगवंतांचेच देणे म्हणावे लागेल.

मोठ्या झाडाखाली छोटे झाड वाढत नाही असे म्हणतात पण लतादीदीच्या वटवृक्षासमान सावलीत आशाताईंच्या स्वरवेलींचा मांडवही जोमाने बहरत गेला आणि सर्व प्रकारच्या मानमरातबाने आणि किताबाने त्यांची जोडी भरून गेली. स्वरसम्राज्ञी आशा भोसले अशी स्वतंत्र ओळख त्यांनी मिळवली. गाणे कुठलेही असो,

“ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख”

किंवा

“छोड दो आँचल चल जमाना क्या कहेगा”

किंवा अगदी अलीकडचं,

“ सपने मे मिलता है मुंडा मेरा सपने में मिलता है “

… शब्द, भाव आणि अभिनयाने भरलेलं त्यांचं गाणं ऐकणाऱ्याच्या काळजात रुतून बसतं.

वयाच्या नव्वदीत सुद्धा त्या भरजरी साडी आणि चमचमता रत्नहार परिधान करून मंचावर येऊन “ओ मेरे सोना रे सोना रे” गायला लागल्या की श्रोतृवर्ग अक्षरशः पागल होऊन जायचा.

रसिकांना त्यांनी फक्त गाणं दिले नाही तर या जन्मावर शतदा प्रेम करायलाही शिकवलं. त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या मोडक्या संसाराची लाज टाकून चित्रपट गीत क्षेत्रात एक जबरदस्त ठसा उमटवला.

त्यांच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष होता. टक्केटोणपे, मानापान त्यांनी सहन केले. जीवन म्हणजे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं पण त्याला त्यांनी त्यांच्या कंठात असलेल्या दैवी सुराने आणि आत्मविश्वासाने सडेतोड उत्तर दिले.

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, “स्वतः भोगलेल्या वेदनेतूनच खरा कलाकार जन्म घेतो”

त्यांच्या असामान्यत्वातही त्यांनी एक सामान्यपण जपलं होतं. त्या एकदा म्हणाल्या होत्या,

“आज मी तुमच्यासमोर गायिका म्हणून उभी असले तरी मी एक गृहिणी आहे, माझं मन स्वयंपाक घरात रमतं. मला माझ्या मुलांना, इतरांना! सर्वांनाच स्वादिष्ट खाद्यपदार्थ स्वतः बनवून खाऊ घालण्यात फार आनंद वाटतो, अगदी माझ्या गाण्याइतकाच. ”

त्यांचा व्यासपीठावरचा गप्पिष्ट, मोकळा, मी तुमच्यातलीच असा जाणवून देणारा वावर हेच सांगायचा की, वय हा एक निव्वळ आकडा आहे, त्यांनी १२००० च्या वर गाणी गायली असतील पण त्यांना मात्र त्याचे मुळीच कौतुक नव्हते. अजूनही हजारो गाणी गाण्याचा उत्साह त्यांच्यात टिकून होता हे विशेष. त्यांचा सूर म्हणजे मूर्तिमंत चैतन्य. उत्साह म्हणजे एखादा अवखळ धबधबाच. जीवनावरचे प्रेम त्यांच्या गायकीतून जाणवायचं. व्यक्त व्हायचं.

“भोगले जे दुःख ज्याला सुख म्हणावे लागले” ही आशाताईंनी गायलेली गझल खोल पाण्याच्या तळाशी नेते.

“जिवलगा राहिले हे दूर घर माझे

पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे.. ”

ही विराणी गावी तर ती फक्त आशाताईंनीच.

त्यांची किती गाणी आठवावीत? किती सूर साठवून ठेवावेत हृदयाच्या कप्प्यात?

आशाताईंच्या निधनाचे वृत्त ऐकताच मनात याच ओळी घुमल्या.

“ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे

” जणू काही अशाताईंच्या जाण्याचा संपूर्ण भावार्थ याच ओळीत साठलेला आहे.

शब्दसुरांना मरण नसते. सूरात्मा अमर असतो. पिढ्यानुपिढ्या ही संगीत सरिता अशीच झुळझुळ वाहत राहणार आणि या सूरगंगेच्या किनारी उभं राहून सारं चराचर त्यांना आदरांजली वाहत राहणार.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वेडेपणा आणि मूर्खपणा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वेडेपणा आणि मूर्खपणा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

  

मूर्खपणा आणि वेडेपणा (Madness and Stupidity)!

एका माणसाच्या गाडीचे टायर बरोबर एका मानसिक रुग्णालयासमोर (Mental Hospital) पंक्चर झाले. रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करताना त्याला मोठी कसरत करावी लागली.

त्याने गाडीचा बोनेट उघडला, जॅक काढला, जादा चाक (spare wheel) आणि व्हील स्पॅनर बाहेर काढले. पंक्चर झालेले चाक काढण्यासाठी त्याने चारही नट (nuts) उघडले. पण दुर्दैवाने, ते चारही नट गडगडत गेले आणि थेट गटारात पडले. गटाराचे झाकण उघडता येण्यासारखे नव्हते; नट पाण्यात गायब झाले होते.

तो माणूस हताश होऊन इकडे-तिकडे पाहू लागला आणि शेवटी निराश होऊन पदपथावर बसला.

रुग्णालयाचा एक रुग्ण कुंपणातून हे सर्व सुरुवातीपासून पाहत होता. तो ओरडला:

“ए मूर्खा! काय करतोयस तिथे? “

माणसाने उत्तर दिले:

“मित्रा, विचारू नकोस रे. टायर पंक्चर झाला आणि चाक बदलताना चारही नट गटारात पडले. “

तो रुग्ण लगेच म्हणाला: “अरे, तू उगीच गोष्टी अवघड करतोयस! साधी गोष्ट आहे, बाकीच्या तिन्ही चाकांमधून एक-एक नट काढ, म्हणजे तुझ्याकडे प्रत्येक चाकाला तीन नट होतील. पुढच्या पेट्रोल पंपापर्यंत किंवा टायर रिपेअरिंगच्या दुकानापर्यंत जाण्यासाठी तेवढे पुरेसे आहेत! “

त्या माणसाने रुग्णाने सांगितल्याप्रमाणे केले आणि आनंदाने त्याला विचारले: “अरे वा! मग तू या मानसिक रुग्णालयात काय करतोयस? “

त्या रुग्णाने दिलेले उत्तर खरंच ‘लेजेंडरी’ होते…

“मित्रा, आम्ही इथे ‘वेडेपणा’मुळे आहोत, ‘मूर्खपणा’मुळे नाही! “

‘वेडेपणा’ ही एक वेगळी गोष्ट आहे.

आणि ‘मूर्खपणा’ पूर्णपणे वेगळी.

वेडेपणावर उपचार होऊ शकतात, पण मूर्खपणावर नाही!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : दीप्ती गौतम

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ क्लेशवृक्षाच्या छायेत” (कविता-संग्रह) – कवी : राजकुमार कवठेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “ क्लेशवृक्षाच्या छायेत” (कविता-संग्रह) – कवी : राजकुमार कवठेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : क्लेश वृक्षाच्या छायेत 

… बहरलेल्या काव्याचा मोहोर

कवी : राजकुमार कवठेकर 

 ९४२११०५८१३

प्रकाशक : अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर 

 ९३०९१३८४४३

पृष्ठे : १२०

मूल्य : रु. २००/-

आयुष्याचे वस्त्र हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले असले तरी सुखापेक्षा दु:खाचे धागेच जास्त दाट आहेत कि काय असे वाटावे असे सर्वसामान्य माणसाचे जगणे असते. थोडेसे सुखही लाभले नाही अशा दु:खितांची संख्याही काही कमी नाही. किंबहुना दु:ख हेच जीवनातील अंतीम सत्य आहे असे म्हटले तर चूक ठरु नये. कारण ते प्रत्येक व्यक्तीने अनुभवलेले असते. ते दु:ख स्वत: भोगणे, दु:खाची जाणीव असणे,

दुस-याच्या दु:खाने व्यथीत होणे आणि त्याच दु:खाचा शोध घेत घेत याच जन्मात त्याची पाळेमुळे छाटून टाकण्याचा प्रयत्न करताना या सर्व वेदना आपल्या शब्दातून व्यक्त करणे ज्याला जमते तोच क्लेश वृक्षाच्या छायेलाही आपलेसे करू शकतो. असा कवी मग कुठलीही खंत न बाळगता आपल्या सोसण्याच्या तपामुळे क्लेशवृक्षालाही आनंदाचे फळ येईल असे आत्मविश्वासपूर्वक म्हणू शकतो. क्लेशवृक्षाच्या छायेत बसुनही

” होईल कधितरी स्वप्न हासरे खांद्यावर चे मूलऽऽ

क्लेशतरुवर फुलेल जे फुल पडेल त्याची भूल ऽऽ “

असे म्हणणारे मिरजेचे कवी, प्रसिद्ध गझलकार श्री. राजकुमार कवठेकर यांच्या ‘क्लेशवृक्षाच्या ‘

प्रत्येक पानापानातून याची खात्री पटते.

दु:खाची महिरप असणा-या या कविता संग्रहात डोकावून पाहिले तर, काहीशा आत्ममग्न असणा-या या कविने निसर्ग भावभावनांच्या विविधांगी रचना समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे आयुष्यातील चढ उतारामुळे जगणे जसे जगावेसे वाटते तितक्याच उत्सुकतेने आपण हा संग्रह शेवटपर्यंत वाचत जातो. बोलक्या मुखपृष्ठातून व्यक्त होणारा क्लेशवृक्ष आणि त्याची छाया ओलांडून पुढे जाताना, कविच्या मनाची स्पंदने शब्दाशब्दातून ऐकू येतील अशा भावकविता वाचताना एकामागून एक कविता वाचण्याची ओढ लागून रहाते.

स्मरणांचा जाच चुकत नाही. दु:खाचा पहारा उठत नाही. अशा अवस्थेत जगण्याचा हा अवजड मेणा कुठवर वाहुन न्यायचा असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. वास्तवाच्या वणव्यात मन होरपळत असताना आणि या छळवादी आयुष्याला सामोरे जात असताना दमछाक तर होतेच आहे. पण एवढे सहन केल्यावर तरी आशेची रम्य पहाट दाखवणारे एखादे वळण या वाटेवर येणार आहे का? वारंवार अश्रूच वाट्याला यावेत असा वेदनेचा शाप आयुष्याला लागला आहे. सुखांना मोकळेपणाने नांदताच येत नाही. सांत्वनाच्या आहेरांनी मनावरच्या जखमा भरून येत नाहीत. स्वप्नांचा पाठलाग चालुच आहे. या भ्रमंतीत स्वत:ला हरवून बसावे, स्वतःचा शोध स्वतःला लागूनच नये अशी अवस्था झाली आहे. हाताच्या मुठी वळल्या तरी ठोस पाऊल उचलावे एवढे बळ आणायचे कुठून? जगण्यातली अगतिकता पराकोटीला गेली आहे. सगळं समजत असून सुद्धा आंतरिक समुद्राच्या लाटा आतल्या आतच हेलकावे घेत असतात. रोज उगवणारा दिवस ही इतरांसाठी सकाळ असली तरी आपल्यासाठी मात्र ती आणखीन एका वजावटीच्या दिवसाची सुरुवात असते हे कठोर सत्य नाकारता येत नाही. दु:खाच्या सागरात हेलकावे खाणारे हे जगणे, पराभवाने ग्रासले असले तरी यशाचे गीत म्हणणे, कविने सोडून दिलेले नाही. मनातील दुर्दम्य इच्छाशक्तीने दु:खावर मात केली आहे आणि काटेरी प्रारब्धाला आशेचे जरतारी वस्त्र नेसवण्याचे धैर्य कविला मिळाले आहे. फुटक्या आरशात स्वत:चीच शेकडो प्रतिबिंबे दिसावीत तसा मी स्वत:ला पाहताना दिसतो आणि समजतच नाही मी नेमका खरा कोणता? मग लक्षात येतं, आपण तर शब्दांच्या राईत मग्न असतो. ठरलेली वाट नसतेच आपली. आपला आपल्याला तरी भरवसा आहे का? ज्यांच्यात असतो त्यांचेही आपण नसतो. कदाचित हे वेगळेपण हीच आपली खरी ओळख असेल. कविच्या आत्ममग्नतेतून आत्मशोधाचा हा प्रवास आपल्यालाही अंतर्मुख करतो.

शेवटी जगणं म्हणजे तरी काय असतं? कवीच्याच शब्दात सांगायचं तर :

जगणं असते एक कविता, कळली तर पटकन कळणारी… नाही तर आमरण छळणारी…

आपल्या आत्ममग्नतेमुळे आयुष्यातील महत्त्वाचे कितीतरी क्षण निसटुन गेले आहेत. आयुष्य हेळसांडून गेले आहे. त्यामुळे असाही प्रश्न पडतो की

‘ कुठवर जगण्याचा जाच हा सांग सोसू

 कुठवर हसण्याचे रेशमी वस्त्र नेसू?

 बहरत असताना झाड निष्पर्ण झाले

 फिरुन फिरुन पक्षी कालचे दूर गेले “

जागतिकीकरण आणि शहरीकरणाचे चटके कवीला ही जाणवत आहेत. सुखाच्या चेह-याचे पोर्ट्रेट आयुष्यभर अंगावर मिरविले तरी भंगत जाणारे नातेसंबंध कितीही जोडायचा प्रयत्न केला तरी पूर्ण एकजीव होत नाहीत हेच खरे. मग त्या पोर्ट्रेटच्या सौंदर्याकडे लक्ष न जाता केलेली डागडुजी मात्र ठळकपणे डोळ्यात भरुन राहते आणि मन ठसठसत राहते. बाल्कनीतली बाग, कॉलबेलच्या चिमणीचा चिवचिवाट, पोर्ट्रेट मधला समुद्र, अशा कृत्रिम जीवंतपणाच्या खुणा कवितेतून स्पष्टपणे दाखवल्या आहेत. दुसरीकडे ‘ दोघांचेच विश्व ‘ असले तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चक्राकार गतीने व्यापलेल्या या जगण्यात परस्परांची भेटच होत नाही, मग संवाद तर दूरच. मोग-याचा गजरा मात्र या सर्व धावपळीत मूकपणे दरवळत राहतो. समोर आलेल्या सुखाला नाकारायच तर नाहीच. पण या सुखाच्या चाहुलीने हुरळून न जाता भोगलेले दु:ख अजूनही मनात खोलवर सलत असतं. त्यामुळे सुखाच्या श्रावणातही दु:खाचा वैशाख वणवा विझलेला नसतोच.

 ” या जगण्याचे हे असेच

 उमलत्या वेळीच ग्रासले कातरवेळीचे भय…

 कठोर निर्णयाच्या वेळीच नेमकी

 दाटून येते जुनी सय… “

तरीही

 ” तरिही जगणे… तरिही जगणे

 जरी न काही मनाप्रमाणे 

 रोज मनाने मनात कुढणे

 ठेऊन ओठांवरती गाणे “

या खंबीर मनाने प्रवास अव्याहतपणे चालुच असतो. ओळखीची खूण सापडत नाही. स्वप्नातला गाव दिसत नाही. या एकाकी प्रवासामुळे मन कधीतरी खिन्न

होणारच. मग वाटतं,

 ” पालटावा हा ऋतू माझी शमावी वेदना

 श्रावणाचा मेघ दाटो चिंब होऊ दे मना 

 सावलीचा दो घडीचा लाभु दे रे गारवा 

 या तमी एकांत रानी रे दिसावा काजवा “

नियतीच्या फे-यामध्ये सुखाची सावली येईल तेव्हा येवो. पण मनाची वेदना शमविण्यासाठी निसर्गाशिवाय दुसरा मित्र कोण असणार? या संग्रहात समाविष्ट असलेल्या निसर्ग कविता म्हणजे कविने हातात कुंचला न घेता त्याच्या मनाच्या कॅनव्हासवर शब्दांचे फटकारे मारुन चित्रित केलेली देखणी निसर्ग चित्रेच आहेत. म्हणून तर

 ” ढगांनी जसे ग्रासिले सुर्यबिंबा

 क्षणार्धात सर्वत्र सांजावले

 चकाकून जाती विजांच्या शलाका

 थवे पाखरांचे घरी पातले “.

किंवा सरी बरसू लागल्यावर

 “. लडीवाळ बाळापरी पावसाच्या

 नभाच्या कुशीतून आल्या सरी

 झळांचा बने थंडसा मंद वारा

 घुमे रानझाडीतुनी बासरी “.

यासारखे टपोरे शब्द कविच्या मानसमेघातून बरसु लागतात.

 ‘ काजळसे जमले मेघ, विजेची रेघ

 कुठे चमचमते

 ही हवा गार बोचरी, उठे शिरशिरी 

 कापरे भरते ‘ ‌

असो किंवा

 ‘ वा-याला कसले पिसे कसा घुमतसे

 नाचवी राने…

 पाण्यास मिळाले सूर खूर चौखूर

 उधळी हर्षाने… ‘.

सारख्या लयबद्ध निसर्ग कविता वाचताना मन नकळतपणे डोलू लागते. याठिकाणी सूर, खूर, चौखूर

या शब्दांतून साधलेला अनुप्रासात्मक नाद लक्ष वेधून घेणारा आहे. पावसाच्या आगमनात लग्न सोहळ्याचे मांगल्य पाहणा-या या कविला म्हणून तर पूर्ण खात्री आहे की काही काळासाठी आभाळ रुसल तरी

 “. रुसण्यातुनही हसेल माया

 काठिण्याला फोडित पाझर

 सळसळणारे वैभव लेईल 

 उद्या ; आजचे श्रांत कलेवर “

अशा निसर्गात रममाण होतानाच कविच्या हाती एक पत्र येते… तिचे ते पत्रही पाऊसरुपीच असते. भरुन आलेलं

आभाळ आणि भरुन आलेलं मन, एकीकडे घनांची तर दुसरीकडे शब्दांची होणारी दाटी, अशा मनातून कोसळणा-या पावसात चिंब भिजणारं हे पत्र आपल्यालाही कधी भिजवून टाकतं समजतही नाही.

पण हा निसर्ग असा सर्वांगानं तसाच असला तरी

‘. पाखरं ‘ मात्र पहिल्यासारखी राहिली नाहीत असे कविला वाटते. ती धिटावत चालली आहेत. घाबरणं नाही. थवेही नाहीत. चिवचिविट तर कधीच बंद झालेला.

‘ पाखरं ‘ ही रुपकात्मक कविता नव्या पिढीच्या जीवनपद्धतीचे दर्शन घडवते.

या काव्यसंग्रहात काही कविता ‘ त्याच्या ‘ आहेत, काही ‘तिच्या ‘ आहेत तर काही दोघांच्याही आहेत.

प्रेम म्हटलं की माया, हुरहूर, रुसवा, विरह, समज, गैरसमज हे सगळं आलंच. वाढत्या वयाबरोबर येणारा समंजसपणा प्रेमाकडे पाहण्याची दृष्टीही बदलून टाकतो. अपेक्षाही बदललेल्या असतात. हे सर्व भाव व्यक्त करणा-या श्री. कवठेकर यांच्या कविता वाचताना त्यांच्या मनातील कोमल भावभावना अनुभवायला मिळतात.

एका कवितेत ते म्हणतात, तिला भेटायला निघण्यापूर्वीच ते तिच्यापाशी जाऊन पोहोचलेले असतात. त्याच कवितेच्या शेवटी ते म्हणतात मी परतूनही नसतो परतलेला. तिला भेटण्याचा आवेग आणि तिचा निरोप घेतला तरी तिथेच गुंतून राहात मनाचे घुटमळणे कविने नेमक्या शब्दात मांडले आहे. तिच्या असणं म्हणजे ‘ सर्वव्यापी निरभ्र चांदणगर्भ आकाश ‘असतं.

तिच्यामुळेच तर त्याच्या आयुष्यातील अज्ञातवास संपून नवं पर्व सूरु होत असतं. या सुखाच्या चांदण्यामुळेच की काय, तिचा विरह झाला तरी तिच्या आठवणीने, तिच्या नुसत्या स्मरणानेही विरहाच्या दु:खाची बेडी तुटते. तिकडे तिची काय अवस्था असते? ती म्हणते

 “तुझा भास होई तुझी हाक येई 

 नको वाटते ही सुखाची घडी

 तुझ्या वाचुनी रे सुन्या मैफिली या

 ऋतू… आसवे… हासणे… बेगडी.

साहजिकच अशा या सखीच्या बाबतीत मग कविला वाटते,

 ” तुला वादळांचे नको हेलकावे 

 तुझे शीड डौलात जावो पुढे

 कधी भेटता तू कुठे ; ओळखीने

 पहावे… हसावे… पुरे एवढे… “

त्याला तिच्या फक्त प्रेमाचीच जाणीव आहे असे नाही तर तिच्या कर्तृत्वाचीही जाण आहे. म्हणूनच एकीकडे घर संसार आणि दुसरीकडे स्विकारलेली व्यावसायिक जबाबदारी समर्थपणे पेलताना तिची होणारी दमछाक आणि दिसणारी कर्तव्य तत्परता कविच्या नजरेतून सुटलेली नाही. कार्यमग्न असणारी तिची बोटं आणि वेळेला कवेत घेण्यासाठी तिच्या पावलांची चाललेली लगबग यांचा मेळ घालता घालता तिला दावं सोडून पळता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग कवी लिहून जातो,

 ” सखी कळते मलाही, काय दुखते सलते

 संस्कारांच्या उंब-यांशी, कसे पाऊल अडते “

अशी सखी लाभली हे आपले भाग्यच आहे. कवी म्हणतो

” जन्म अपुराच माझा तुझे फिटावया ऋण

जन्म पुन्हा पुन्हा लाभो तुझ्या इतका सुजाण “

हे भाव जसे नेमक्या शब्दात व्यक्त झाले आहेत, अगदी त्याचं नेमकेपणाने कविने आईच्या जाण्यानंतर भाव व्यक्त केले आहेत. आई गेल्यानंतर

” घर माझ्यासम आईला तेव्हाच पोरके झाले

कुठल्याच सुखाचा धागा फाटल्या मनास बसेना “

आणखी वेगळ्या शब्दांची आवश्यकता आहे का?

क्लेशवृक्षाच्या छायेत बसून भवताल न्याहाळत असताना कविनं जे अनुभवलं, जी स्वप्नं पाहिली ती आपल्या समर्थ लेखणीतून उतरवत असताना

शब्दसंपदा, उपमा, कविकल्पना अगदी सहजपणे कवितेत गुंफल्या आहेत. अलंकारिक शब्दांचे अप्रस्तुत प्रदर्शन टाळून मनाला मोकळे करणारे शब्द त्यामुळेच वाचकाला आपल्या जवळचे वाटतात.

स्मरणांचा जाच,, दु:खाचा पहारा, वास्तवाचा वणवा, स्वप्नांचे वेफर्स, बेदरकारपणाची झुलपे, भयपटासारखे सरकणारे आयुष्य, निनादत येणा-या वेदना, धीराचा कलंडणारा माठ, श्वासांचे शीड, व्याकूळपणे तिष्ठणारी माया, जडत्वापोटी येणारे तान्हुले हासरे, ही त्यांची काही उदाहरणे. किंवा

” नको म्हणूस ‘ जुनेरं ‘ जरी वस्त्र धसावले

 काल फाटक्या दिवसांना ऋतू यांनीच दाविले “

या दोन पंक्तींतून कविने गृहिणीला ज्या शब्दात आश्वस्त केले आहे ते शब्द कुणाचाही ‘ फाटका ‘ संसार झाकून घ्यायला पुरेसे आहेत.

कविच्याच शब्दात सांगायचं तर

” आणि यांच्याही पल्याड, खूप काही उरणारे

 खोल खोल काळजाशी, फुलणारे… सलणारे… “

असे आहे ज्याच्यावर लिहायला हवं असं वाटत.

पण

” कळते सारे : हवे उठाया

 बाकी रस्ता अजुन खूपसा

हवा आवरायास पसारा,

 हवी धराया पुन्हा उभारी “

हे कविचे सांगणे लक्षात घेऊ आणि

“आता मज नाही, कुठलीच खंत

 मन हे दिगंत… होऊ पाहे

अशा सात्विक समाधानाने हा काव्य शोधप्रवास थांबवतो.

 

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ दि. दि. ७/५/२६ ते दि. १०/५/२६ प्रकाशन बंद – सूचना 📖 ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 संपादकीय निवेदन 💐

📖  दि. ७/५/२६ ते दि. १०/५/२६ प्रकाशन बंद – सूचना 📖

कृपया सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी – – – 

काही तांत्रिक कारणामुळे शनिवार दि. ७/५/२६ ते दि. १०/५/२६.. असे ४ दिवस ई-अभिव्यक्ति दैनिकाचे लिंक स्वरूपातले प्रकाशन बंद राहील. पण त्या त्या दिवसाचे साहित्य ग्रुपवर थेट प्रकाशित केले जाईल.

सोंमवार दि. ११/५/२६ पासून लिंक स्वरूपात पुन्हा नियमित प्रकाशन केले जाईल.

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना 📖 ☆ सम्पादक मंडल ई-अभिव्यक्ति ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना !! 📖

कुछ तकनीकी कारणों से बुधवार दि. ६/५/२६ से रविवार दि. १०/५/२६ तक ५ दिनों के लिए ई-अभिव्यक्ति का प्रकाशन बंद रहेगा। 

आप सभी का इसी प्रकार स्नेह, प्रतिसाद और सहयोग अपेक्षित है।

 

– संपादक मंडल 

ई-अभिव्यक्ति 

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # १४६ – बुन्देली कविता – ”सज्जन, गुनी, रहीस लगत है” ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

आज प्रस्तुत हैं बुन्देली कविता – सज्जन, गुनी, रहीस लगत है।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # १४६ ☆

☆  बुन्देली कविता – सज्जन, गुनी, रहीस लगत है ☆ आचार्य भगवत दुबे ✍

सज्जन, गुनी, रहीस लगत है

कड़ बच्चों की फीस भरत है

कोट कचहरी के बाहर बो

अजी लिखत, नबीस लगत है

 *

दोनऊँ पहलमान एकई से

कौनउ नई ऊरीस लगत है

 *

बो काये गुमसुम बैठो है

चुभ रउ कौनउ टीस लगत है

 *

अंड-गंड बातों में नइयाँ

सदा निपोत खबीस लगत है

 *

बार और नाखून बड़े हैं

भिनकत रति खबीस लगत है

 *

भगवत’ सबहें देखन भर के

इन सब में बो बीस लगत है

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ गाल बजाने से…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी ☆

डॉ. रामेश्वरम तिवारी

संक्षिप्त परिचय

  • हिंदी-प्राध्यापक(सेवानिवृत्त) महारानी लक्ष्मीबाई शासकीय कन्या स्नातकोत्तर महाविद्यालय, भोपाल  (म.प्र).
  • नई दुनिया, दैनिक भास्कर, वीणा, हंस, धर्मयुग, कादम्बिनी आदि पत्र-पत्रिकाओं में कविता और लघुकथाएँ प्रकाशित। पुस्तकः कविता के ज़रिए,  मध्य प्रदेश साहित्य अकादमी के सौजन्य से प्रकाशित।

आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण कविता – गाल बजाने से…!

☆ ॥ कविता॥ गाल बजाने से…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी

 

गाल  बजाने  से  हाल  नहीं  बदलते हैं,

खोटे सिक्के ज्यादा दिन नहीं चलते हैं।

*

कोई  कितना भी होशियार, सयाना हो,

समय  आने  पर  ही  सितारे बदलते हैं।

*

रोज-रोज बार-बार द्वारे दस्तक देने पर,

एक दिन ह्रदय के बंद कपाट खुलते हैं।

*

जवान  बेटों  की आवारगी को देखकर,

प्राणों  से  प्यारे लाड़ले अपने खलते हैं।

*

अपनों  को  आगे  बढ़ता  हुआ देखकर,

ख़ैर, गैर तो गैर अपने जन भी जलते हैं।

© डॉ. रामेश्वरम तिवारी

सम्पर्क – सागर रॉयल होम्स, होशंगाबाद रोड, भोपाल-462026

मोबाईल – 8085014478

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पुजारी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – पुजारी ? ?

मैं और वह,

दोनों काग़ज़ के पुजारी,

मैं फटे-पुराने,

मैले-कुचैले,

जैसे भी मिलते,

काग़ज बीनता, संवारता,

क़रीने से रखता,

वह इंद्रधनुषों के पीछे भागता,

रंग-बिरंगे काग़ज़ों के ढेर सजाता,

दोनों ने अपनी-अपनी थाती

विधाता के आगे धर दी,

विधाता ने

उसके माथे पर

अतृप्त अमीरी

और मेरे भाल पर

समृद्ध संतुष्टि लिख दी..!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ हनुमान साधना संपन्न हुई. अगली साधना की जानकारी आपको शीघ्र दी जावेगी। 🕉️💥 

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ अनन्त की गोद में: देवभूमि की एक यात्रा ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

श्री जगत सिंह बिष्ट

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

🌿 यात्रा संस्मरण –  अनन्त की गोद में: देवभूमि की एक यात्रा 🌿

कुछ यात्राएँ हमें स्थानों तक ले जाती हैं… और कुछ ऐसी होती हैं जो हमें भीतर की ओर ले चलती हैं। उत्तराखण्ड की पावन धरती—देवभूमि—की मेरी यह यात्रा निस्सन्देह मुझे अध्यात्म की गहराई में लेकर गई।

लगभग डेढ़ महीने तक, जीवन ने पहाड़ों, हिमनदों और नदियों की लय पकड़ ली। घुमावदार पहाड़ी रास्ते कभी-कभी धैर्य की परीक्षा लेते, पर हर मोड़ पर प्रकृति अपना नया रूप दिखाती—बर्फ से ढकी चोटियाँ मौन वैभव में खड़ी, और साथ बहती पवित्र नदी जैसे सदा साथ निभाने वाली सहचरी।

मन बार-बार पूछता रहा—इस भूमि में इतने मंदिर, कथाएँ और आस्थाएँ कैसे समायी हैं? शायद इसका उत्तर ग्रन्थों में नहीं, इस भूमि की हवा में है—जहाँ हर श्वास स्वयं एक प्रार्थना बन जाती है।

🌊 ऋषिकेश: जहाँ मौन बोलता है

हिमालय की तराई में बसा ऋषिकेश, पावन गंगा के तट पर, हमें अपने शांत आलिंगन में ले लेता है।

मेरी पत्नी राधिका, परमार्थ निकेतन आश्रम में, एक गहन योग-प्रशिक्षण में प्रतिभागी थीं—उनका दिन भोर से आरम्भ होकर देर रात्रि में समाप्त होता। और मुझे मिला एक दुर्लभ वरदान—कुछ न करने का मधुर सुख।

सुबह मैं गंगा के किनारे बैठता, जल की लहरों को प्रथम किरणों में झिलमिलाते देखता। वहाँ, उस निःशब्दता में, विचार धीरे-धीरे शांत हो जाते और समय जैसे थम सा जाता। ध्यान स्वयं ही घटित होने लगा।

रविवार की एक सहज पदयात्रा हमें भूतनाथ मंदिर तक ले गई, जहाँ से गंगा और ऋषिकेश का दृश्य किसी स्वप्न सा प्रतीत हुआ—मानो नदी धरती और आकाश को एक सूत्र में पिरो रही हो।

🕉️ हिमालय का आह्वान

योग-प्रशिक्षण पूर्ण होते ही, मन हमें और भीतर—हिमालय की गोद में बसे उन पवित्र स्थलों की ओर खींच ले गया, जिन्हें देखने की चाह वर्षों से थी। पंच प्रयाग, जहाँ नदियाँ मिलकर एक हो जाती हैं, हमें बुला रहे थे।

🔱 गुप्तकाशी और उखीमठ: प्रार्थनाएँ सबके लिए

गुप्तकाशी में प्राचीन विश्वनाथ मंदिर, काशी की स्मृति जगाता है, और अर्धनारीश्वर मंदिर शिव और शक्ति के दिव्य संतुलन का प्रतीक है।

यहाँ हमने प्रार्थनाएँ कीं—अपने लिए, अपने परिवार और मित्रों के लिए, और उन पूर्वजों के लिए जो अब हमारे बीच नहीं हैं। ऐसा लगा मानो समय की सीमाएँ मिट गई हों और अतीत व वर्तमान एक ही क्षण में समा गए हों।

उखीमठ में ओंकारेश्वर मंदिर की संध्या आरती अत्यन्त भावपूर्ण थी। दीपों की ज्योति जब संध्या आकाश से मिलती, तो ऐसा लगता मानो दिव्यता साक्षात् उपस्थित हो।

💍 त्रियुगीनारायण: जहाँ प्रेम शाश्वत हुआ

त्रियुगीनारायण, वह पावन स्थल जहाँ मान्यता है कि भगवान शिव और माता पार्वती का विवाह हुआ था।

वहाँ आज भी होते विवाहों को देखना अद्भुत था—मानो समय ठहर गया हो और हर युगल उस दिव्य मिलन का आशीर्वाद पा रहा हो।

🏔️ चोपता से जोशीमठ: शिखरों और सरलता के बीच

आगे बढ़ते हुए चोपता के हरे-भरे मैदान, दूर चमकते हिमनदों के साथ, किसी स्वप्न से कम नहीं लगे।

जोशीमठ में नृसिंह मंदिर का वातावरण अत्यन्त शांत था। परन्तु सबसे मनमोहक दृश्य था—मंदिर प्रांगण में छोटे बच्चों का उत्साहपूर्वक क्रिकेट खेलना। कोई रोकटोक नहीं। बच्चों को निर्भीक होकर खेलने का अवसर मिलना ही चाहिए।

उस क्षण, पवित्रता और सहजता का सुंदर संगम देखने को मिला।

🌳 ज्योतिर्मठ: समय से संवाद

आदि शंकराचार्य द्वारा स्थापित ज्योतिर्मठ, मानो समय की सीमाओं से परे है।

वहाँ स्थित प्राचीन कल्पवृक्ष के नीचे बैठकर ध्यान करना एक अद्भुत अनुभव था। समीप की गुफा ने हमें भीतर की यात्रा पर आमंत्रित किया।

कुछ स्थान ऐसे होते हैं जहाँ मौन रिक्त नहीं होता—वह पूर्ण होता है। यह उन्हीं में से एक था।

🌊 पवित्र संगम: जहाँ नदियाँ एक हो जाती हैं

हर प्रयाग एक पावन कथा सा प्रतीत हुआ—

विष्णुप्रयाग में धौली गंगा और अलकनंदा का आलिंगन,

नन्दप्रयाग में नन्द बाबा और कृष्ण की स्मृतियाँ,

कर्णप्रयाग में महाभारत के कर्ण की तपस्या की छाया,

रुद्रप्रयाग में जल को स्पर्श कर आरती करने का अप्रत्याशित सौभाग्य।

हमारे कक्ष से नीचे दिखता संगम, एक जीवंत चित्र सा प्रतीत होता था।

धारी देवी मंदिर में भोर का पहला दर्शन और आरती—अत्यन्त दिव्य और आत्मीय अनुभव।

🌺 देवप्रयाग: अलकनंदा और भागीरथी का संगम

देवप्रयाग में, जहाँ भागीरथी और अलकनंदा मिलकर गंगा का स्वरूप लेती हैं—वहाँ पहुँचकर मन स्वतः ही मौन हो गया।

दो नदियों का यह मिलन, जीवन का एक गहरा रूपक प्रतीत हुआ—दो यात्राएँ, जो मिलकर एक ऐसी धारा बनती हैं जो असंख्य जीवनों का आधार बनती है।

नेत्र अनायास ही नम हो उठे—यह भाव केवल अनुभव किया जा सकता है।

🌺 सुरकण्डा देवी और लाखामण्डल: आस्था की अनुगूँज

सुरकण्डा देवी मंदिर की चढ़ाई और मार्ग में दिखते हिमालय के दृश्य मन को मंत्रमुग्ध कर देते हैं। राधिका की यह वर्षों पुरानी इच्छा थी, और वहाँ पहुँचकर जो दिव्य अनुभूति हुई, वह शब्दों से परे है।

लाखामण्डल मंदिर में संध्या आरती के समय गाँव के बच्चों की उल्लासपूर्ण सहभागिता ने मन मोह लिया। पास ही बहती यमुना के किनारे उनका क्रीड़ांगन और खेल के प्रति जोश, एक सजीव उत्सव सा प्रतीत हुआ।

🌄 यात्रा जो अभी शेष है

लौटते समय हमारे पास कोई भौतिक स्मृति नहीं थी—केवल एक गहन तृप्ति थी। यह अनुभव कि जीवन स्वयं एक तीर्थयात्रा है।

अब भी एक पुकार शेष है—भागीरथी के साथ चलने की, पंच केदार और पंच बद्री की यात्रा करने की।

ईश्वर हमें सामर्थ्य दे कि हम इन आकांक्षाओं को पूर्ण कर सकें।

तब तक, हिमालय हमारे भीतर ही बसा रहेगा।✨

#देवभूमि #उत्तराखण्ड #आध्यात्मिकयात्रा #हिमालय #गंगा #प्रकृतिप्रेम #आत्मअनुभूति #योगऔरध्यान #भारत_की_आत्मा

© श्री जगत सिंह बिष्ट

साधक

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’≈

Please share your Post !

Shares