मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया सुखविती हृदया… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ संध्याछाया सुखविती हृदया… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

मिलिटरीमध्ये निर्णयात्मक, कडक शिस्तीच्या आणि नियम बद्ध वातावरणात वाढलेल्या कर्नल साहेबांचा खाक्या काही और होता. भल्या पहाटे निसर्गरम्य वातावरणात वावरायला त्यांना खूप आवडायचं. चिमणपाखरांची भाषा त्यांना अवगत असल्यामुळे त्या दोस्तांशी दोस्ती करून बागेतून गोल फेरफटका मारून ते आपल्या पेन्शनर मित्रांकडे वळायचे.

आज पंधरा दिवस झाले तरी वासुनानांचा पत्ता नव्हता. हॊ त्याला कारणही तसंच होतं आयुष्याच्या संध्याकाळी पुढे जाण्यात त्यांच्या बायकोने, 1ला नंबर पटकावला होता.

ती मला सोडून माझ्या आधी देवाकडे का गेली? ह्या प्रश्नांच्या भोवऱ्यातून वासुनाना अजूनही बाहेर पडले नव्हते.

अखेर ह्या मित्र मंडळींनी त्यांना बागेत आणलंचं. त्यांना बोलतं करण्यासाठी मित्रांची धडपड चालूच होती.

पण ‘आता मी काय करू? कसा जगू? वेळ, दिवस कसा घालवू? ह्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता येईना. सगळेच गप्प होते. सगळ्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं इतकं की कट्ट्यावर बसलेल्या मंडळींच्या तोंडून नेहमी एकच वाक्य बाहेर पडायचं.

“हम पंछी एक डालके” 

आणि बरं का! ह्या सगळ्यांचे पुढारी होते कर्नल साहेब. खूप विचार करून त्यांना एक आयडिया सुचली. उत्स्फूर्तपणे ते म्हणाले, “मंडळी मला एक विचार सुचलाय. आपण आता रिकामं बसून नाही चालायचं. रिकाम्या डोक्यात शिरू पाहणाऱ्या सैतानाची कत्तल करायची. एकदम गोळी मारायची त्याला” 

गोंधळलेल्या नागुअप्पांनी त्यांचा धबधबा आंवरत विचारलंन्, “अरे बा, कर्नलया तुझी मिल्ट्री भाषा सोड. आणि सरळ भाषेत बोल ना जरा! आपण नक्की काय करायचं ते तरी सांग. कुठून तरी वासुनाना निराशेतून बाहेर आलेचं पाहयजेतं”

“सांगतो,! सगळ सांगतो! नागूआप्पा तुमच्यापासून सुरुवात करूया. नागोजीराव अहो काय बॉडी आहे तुमची 85 पार केलीतं पण अजूनही 75 चेच वाटताय तुम्हीं. आहात कुठे! कर्नल साहेबांची गाडी रुळावर येतच नव्हती.

“अरे करण्या! तुझी गाडी रुळावरून घसरतीय लेका, मी काय विचारतोय आणि तू कां मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतोयस?

आता मात्र सगळेच’एक डालकेपंछी’ओरडले”कर्नल साहेब मुद्द्यावर या, आणि सांगा तुमची भन्नाट आयडिया” 

कर्नल, भरदार मिशीतून मिस्कील हंसतं बोलते झाले, “आठवून बघा लहानपणीआपल्या शाळेत पी. टी. चा स्पेशल एक तास राखून ठेवलेला असायचा.

हॊ असायचा, पण मग त्याचं काय इथं? आपण काय आता त्या पी. टी. ला जाऊन वेळ घालवू शकतो का?

 “अहो मुद्याचं बोला हॊ कर्नल साहेब “उतावळे साठीचे संभाजीराव आता मात्र कावले होते. त्यांच्या गरम होत चाललेल्या डोक्यावर हात ठेवून साहेब म्हणाले, धीर धर! यार असा तापू नकोसआपल्या डोक्यात सैतान नकोय आणि संतापही नकोय. तुमच्या अधीर मनाला अधिक न ताणता माझ्या भेजातल्या आयडिया सांगतो,

 असं बघा नागप्पा ती समोर बालमंडळी बसली आहेतं ना, मोबाईल मध्ये डोकं खूपसून, त्यांना आपण मैदानात मोकळ्या हवेत, कोवळ्या उन्हात आणायचं आणि व्यायामात गुंतवायचं. एका जागी बसलेल्या ह्या गुळाच्या ढेपा हलल्याच पाहिजेत. बागेच्या गोल रिंगणात त्यांना पळवायचं. ” 

अरे पण महाभागा ती पोरं तयार होतील कां?

 कां नाही? त्यांचे बापही तयार होतील. पिझ्झापास्ता खाऊन ढेकर देणाऱ्यांना रींगणात पळवलेलं त्यांच्या आईबापांनाही नक्की आवडेल.

“अगदी बरोब्बर! मुलांना शिस्त लावणे त्यांना नाही जमलं, पण ते आपण जमवलं, आणि मी म्हणतो परस्पर पावणे बारा वाजले तर आईबाप कशाला विरोध करतील? उलट त्यांच्या ते पथ्यावरच पडेल. आपणचं सुरुवात करूया”

” बेस्ट आयडिया” आप्पा उत्साहाने उभे राहयले.

मिशीतल्या मिशीत हंसणाऱ्या कर्नल साहेबांच्या मनात आलं, होईल -होईल, दोस्तांना गुंतवण्याचा आपला प्रयोग नक्कीच यशस्वी होईल. त्यांच्याअंगात चैतन्याचं वारं सळसळायला लागलं.

आणि मग कर्नल पुढे सरसावून म्हणाले, “म्हणजे आयडिया नंबर एक पटलीय ना तुम्हाला? कापऱ्या हातांच्या टाळ्या खणखणीत वाजल्या आणि बेंबीच्या देठापासून, शाळकरी मुलांसारखा कोरस भरगच्च होकार दणदणला.

कोपऱ्यातून विशूभाऊंचा आवाज आला, “अरे त्या बालचमुंबरोबर आपणही कवायत करू या की! त्यांना लगोरी, विटी दांडू काकडी कोशिंबीर इत्यादी खेळ शिकवूया. पोरं दमली कंटाळली तर मामाच पत्र हरवलं, बटाटा शर्यत इत्यादी गंमतीशीर खेळात त्यांना आपण गुंगवूया. हे जुने मजेचे खेळ खेळताना बागेतल्या कुंदकळ्यांबरोबर या बाळ गोपाळांच्या हास्यकळ्याही उमलतील. “कोपऱ्यातल्या त्या आवाजाला टाळ्यांनी दणकून दाद दिली. आणि पेन्शनरांच्या घोळक्यातून दिलखुलास खोडकर हंसू बाहेर पडलं. कर्नलचा खणखणीत आवाज दणाणला, “सुनो यार! आता आयडिया नं. 2 ते आपलं, वर्तुळातलं, समोरचं फिरत मोफत वृत्तपत्र वाचनालय आहे ना! तिकडे आपल्याला आता वळायचय” 

“त्यात काय! रोजच आपण जातो की तिथे. ती तर आपली फेवरेट जागा आहे. जगातल्या उलाढाली, राजकीय गोष्टी, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान याची बँक लुटायला. गप्पांचा फड संपल्यावर या आवडत्या अड्ड्याकडे आपण हमखास रोजच वळतोच की, कोवळ्या उन्हाची शाल पांघरून पेपर वाचायला का मज्जा येते राव!

त्या सुखकल्पनेतून मित्राला बाहेर काढत कर्नल म्हणाले, “सदुभाऊ पण या अड्डयावर आता आपण ह्या बाळगोपाळांना पण घेऊन जायचंय. “

काय सांगताय! पण येतील का ती पोर आपल्या म्हाताऱ्यांच्या बरोबर?

अहो येतील की, आपण त्यांचे प्रेमळ आजोबा होऊन त्यांची मोबाईल मधली मान वर्तमानपत्रात अडकवायची. असं बघा, अण्णांना वयामुळे दिसत नाही. ही छोटी मंडळी पेपर वाचून दाखवतील त्यांना.

मुलांना पण त्यामुळे स्पष्ट उच्चाराची, मराठी वाचायची, सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल”.

रघुदादांनी अण्णांच्या पाठीवर थाप मारली. “अण्णा लेका दुहेरी फायदा होईल तुझा. त्या मुलांचा आणि त्यांच्या बापांचा पण फायदा होईल. ” 

“तो कसा काय?

असं बघ मोबाईलचं भूत मानगुटीवर बसल्यामुळे पोरांचं डोकं आणि डोळेही बिघडलेत. तासंतास स्क्रीन समोर बसल्याने पाठदुखी, मान दुखी, चिडचिडेपणाआणखी काही विकारांनी आकार घेतलाय.

 त्यांच्या विकासाचा कणाच मोडलाय रे!

त्यांना दुजोरा देत जोशीभाऊ म्हणाले, “वर्तमानपत्रात राजकारण, खेळ, अर्थशास्त्र एकाच ठिकाणी मिळेल त्यामुळे मेंदूला चालना मिळून मेमरी वाढते. शब्दसंग्रह वाढून ज्ञानात भर पडते. नियमित वाचनाची सवय लागून रिकामं मन सैतानाचं घर न बनता बुद्धीचा आगर होतं. ” 

इतका वेळ पेपर वाचणारे गजाभाऊ ओरडले “अरे ही बघा आजकी ताजी खबर, उत्तर प्रदेश सरकारने शाळांमधून हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्याचा आणि प्रार्थनेच्या आधी दहा मिनिटे वृत्तपत्र वाचनाचा निर्णय घेतलाय. आणि जगभरातून ह्या निर्णयाचंशाळांतून स्वागतच झालय”

हे ऐकल्यावर कर्नल साहेबांनी आनंदाने आरोळीच ठोकली. “अरे मग आपणही हा निर्णय मान्य करून मराठी पेपर वाचन सुरू करूया. मुलांच्या जिभेला मातृभाषेचं वळण लाऊ. इंग्लिश मीडियम मुळे मराठी इंग्रजीची त्यांच्या बोलण्यात येणारी खिचडी तरी वाचेल. कर्नल साहेब बाकी तुमच्या पोतडीतल्या आयडिया भन्नाटचं असतात. उशीर कशाला! उद्याचाच मुहूर्त धरू.

बागेतल्या मारुती पुढे शकुनाचा नारळ फोडून, खोबऱ्याचा प्रसाद वाटून, कार्यक्रमाचा श्री गणेशा आत्ताच करूया.

कर्नल साहेबांनी पिल्लू सोडलं “मंडळी आता गुढीपाडवा जवळचं आलाय सगळ्या भाभीजींना माझा निरोप सांगा भरपूर मसाले भात करून आणायचा. कडुलिंबाच्या चटणीचा उतारा हवाच श्रीखंडपुरीची ऑर्डर देऊया. आणि साजरं करूया वनभोजन. उंच उंच गुडी बागेतच उभी करूया. मदतीला चिल्लीपिल्ली वानर सेना आपल्या हाताशी असेलच. अशाप्रकारे चैतन्य बागेत चैतन्य उसळलं. सगळ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि होकार भरला 

 मंडळी काय सांगू तुम्हाला! तेव्हांपासून दरवर्षी ह्या चैतन्य उद्यानात गुढीपाडवा साजरा केला जातो बागेत उंच उंच गुढी उभारली जाते. माळापताकांनी बाग सजवली जाते. हौशी पुरुष मंडळी सनई सुरू करतात आणि मग काय! त्या चैतन्य बागेत वनभोजन साजरं होतं. नववर्षाची अशी ही उत्साही आनंदी सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरू झाली.

अशा प्रकारे कर्नल साहेबांचा उपक्रम पार पाडतांना सगळेच आनंदात असतात.

बायकोच्या वियोगाचं काही काळ का होईना वासुनाना दुःख विसरलेत. कारण बागेत रोज पेपरवाचन, कवायत पकडापकडी, पळणे, p. T. चा तास साजरा होतो. बाल मंडळींबरोबर हे ज्येष्ठही आता चिरतरुण झालेत. दुःख आणि दुखणं गोंजारायला त्यांना आता वेळच नाहीय्ये बरं का!

आणि हॊ ह्याचं सगळं श्रेय नक्कीच कर्नलसाहेबांनाच आहे. तर धन्यवाद कर्नल साहेब. मित्र-मैत्रिणींनो तुम्हांलाही गुढी पाडव्याच्या आत्तापासूनच शुभेच्छा.

धन्यवाद 

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सृजनाचे क्षण… भाग – २ ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ सृजनाचे क्षण… भाग – २ ☆ उज्ज्वला केळकर

आता ‘पांघरूण’कथेविषयी. याच क्रेशमधला एक मुलगा. त्याचं नाव मी ठेवलं ‘सर्जा’. सर्जाचं घर, मी, तळा-गाळातलं कुठलंही प्रतीनिधिक घर असेल, तसं रंगवलं. त्याची आई विड्या वळून संसार चालवणारी. म्हातारी, दमेकरी सासू, दोन भावंड, दिवसभर उनाडणारी, बाप रिक्षा चालवायचा पण सगळा पैसा बाई-बाटलीत उडवायचा. मनात येईल, तेव्हा बायकोच्या तोंडावर काही नोटा फेकायचा. तेवढंच त्याचं आपल्या संसाराबाबतचं कर्तव्य. ‘साल्या, भडव्या, रांडलेका’शिवाय बोलणं नाही. आईदेखील सदा करवादलेली.

आज क्रेशमध्ये चादरींचं वाटप होतं. त्यासाठी सगळ्या आयांना बोलावलं होतं. मी कथेत चादरींची केली ब्लॅंकेटस्. नाना रंगांची आकर्षक ब्लॅंकेटस्. आपल्याला कोणत्या रंगाचं ब्लॅंकेट मिळेल? तो विचार करायचा. त्याला लाल ब्लॅंकेट मिळालं होतं. त्याचा जर्मनीतला भाऊ डेव्हीड सारखंच. सर्जा अतिशय उत्तेजित झाला होता. त्याला आज जेवण-खाण काही सुचत नव्हतं. त्याने घरी आल्या आल्या आपल्या भावंडांना बोलावलं आणि सगळे ते ऊबदार ब्लॅंकेट पांघरून झोपून गेले.

सर्जाचा बाप दारू पिऊन घरी येतो. आज त्याच्या खिशात दमड्या नसल्यामुळे त्याला बाईकडे जाता आलेलं नाहीये. तो अस्वस्थ आहे. घरी येताच त्याचा पाय त्या नव्या ब्लॅंकेटमध्ये अडकतो. तो खाली पडतो. उठता उठता त्याचे लक्ष एकदम त्या आकर्षक ब्लॅंकेटकडे जाते. त्याच्या डोक्यात वीज चमकते. हे ब्लॅंकेटच आज तिला द्यावं. ती एकदम खूश होऊन जाईल. अशी चिकटेल, लई मजा येईल. तो सर्जाच्या अंगावरचे ब्लॅंकेट ओढू लागतो. ‘ब्लॅंकेट दे’ म्हणतो. सर्जा म्हणतो, ‘माझ्या जर्मनीतल्या बापाने माझ्यासाठी पाठवले आहे. मी देणार नाही. ’

‘तुझ्या जर्मनीतल्या बापाकडेच निघून जा, ‘ असं म्हणत सर्जाचा बाप ते ब्लॅंकेट हिसकावून निघून जातो. पाठीमागच्या सीटवर ब्लॅंकेट ठेवून तो रिक्षा सुरू करतो.

सर्जा रडत राहतो. त्याच्या अश्रूभरल्या डोळ्यासमोर येतं, ते फोटोतल्या ज्यो बाबांचे उबदार घर. त्याला अधीकच उघड्यावर पडल्यासारखं वाटतं. रडत रडत तो आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. आई आपल्या फाटक्या धडुत्याचा पदर त्याच्या अंगावर सरकवते…इथे कथा संपते.

तर अशा अनेक कथांमागच्या कथा सांगता येतील. अनेकदा प्रत्यक्ष अनुभव न घेता मानसिक अनुभवावरही मी कथा लिहिल्या आहेत. जे सुचलं, ते एकदा कागदावर उतरलं, की तृप्तता येते. समाधान वाटतं. आनंद होतो. तरीही मी, काही जण म्हणतात, त्याप्रमाणे असं म्हणणार नाही, की मी ‘स्वान्त सुखाय’ लिहिते. ‘स्वान्त सुखाय’च जर लिहायचं असेल, तर छापायला पाठवायचा खटाटोप कशाला करायचा? मला जे वाटतं, भावतं, ते तसं इतरांनाही भावतं, आवडतं का? हे मला समजून घ्यावसं वाटतं, त्यांच्या प्रतिक्रिया समजून घ्याव्यात, त्यातून काही नवीन शिकायला मिळेल का, हेही बघावं, असं वाटतं म्हणून मी लिहिते आणि छापायलाही देते.

अनेक जण अर्थप्राप्तीसाठी लिहितात. नावलौकिक मिळावा म्हणूनही लिहितात. मागणी तसा पुरवठा करणारीही काही लेखक मंडळी आहेत. संपादक, प्रकाशक, प्रायोजक यांनी सांगितलं, म्हणून लिहिणारीही काही लेखक मंडळी आहेत. इतरांचं कशाला? मी माझंच एक उदाहरण सांगते. सांगली आकाशवाणीच्या नाट्यविभागाने एकदा मला सांगितलं, जागतिक आरोग्यादिनाच्या निमित्ताने ‘फास्ट फूड’ या विषयावर तुम्ही नभोनाट्य लिहा. ठाशीव, साचेबंद विचार – फास्ट फूडचे फायदे-तोटे इ. बद्दल मला लिहावेसे वाटत नव्हते. या शब्दाभोवती विचार करता करता ‘फास्ट फूड’ संकल्पनेच्या नाना परी मला सुचल्या. बाजारात मिळणारं नेहमीचं फास्ट फूड, दहा दिवसात दहावी विज्ञान, भूगोल, इ. ‘इंटलेक्चुअल फास्ट फूड, ’ ‘कल्चरल फास्ट फूड’, ‘जेनेटिक फास्ट फूड’ (९ महिन्यांऐवजी ९ आठवड्यात बाई बाळंतीण व्हावी, म्हणून संशोधन) वगैरे… फॅँटसीच्या अंगाने मी हे नभोनाट्य लिहिले. ते अनेकांना आवडलेही. माझ्याकडे वरील विषयाची मागणी झाली नसती, तर मी हे नभोनाट्य वा नंतर याचीच केलेली कथा मुळीच लिहिली नसती. म्हणजे हा विषय मला सुचलाच नसता. माझी एकूण ५ नभोनाटये, व १००च्या वर ‘प्रतिबिंब’ शीर्षकाखालील कौटुंबिक श्रुतिका प्रसारित झाल्या आहेत.

सांगली आकाशवाणीच्या नाट्यविभागाने माझ्याकडून ‘एड्स्’ या विषयावरही सांगून नभोनाट्य लिहून घेतले. त्या विषयावरही मागणी नसती, तर मी नाटक, कथा लिहिली नसती.

एकदा एका मुलाखतीत कुणी तरी मला माझ्या लेखन प्रवासाविषयी विचारले. मग मीही त्याचा मागोवा घेऊ लागले. मला आठवतं, मी आठवीत असताना पहिली कविता लिहिली. त्यावेळी गोवा मुक्तिसंग्राम अगदी शिखरावर होता. रोज नव्या बातम्या. त्यावर चर्चा वगैरे… एक दिवस बातमी आली, या संग्रामातले शिलेदार हेमंत सोमण रस्त्यातून तिरंगा घेऊन चालत असताना पोर्तुगीज सैनिकाने त्यांना गोळी घातली. ते शहीद झाले. सर्वांना वाईट वाटलं. त्या दिवशी कशी कोण जाणे, मला कविता सुचली,

‘ हेमंत सोमणांनी गोव्यात झेंडा रोविला.

तडतडा तडकले पोर्तुगीज झेंडा त्यांनी पाहिला ‘ यानंतर ओळींवर ओळी… ते हुतात्मा झाले इथपर्यंतच्या. सगळ्यांनी कवितेचे कौतुक केले. पण दुसर्‍या दिवशी बातमी आली, त्यांना गोळी मारली नाही. त्यांना तुरुंगात टाकले. बातमी चांगलीच होती. आम्ही आनंदोत्सव साजरा केला. झाले ते चांगलेच झाले, पण माझी बिच्चारी कविता मात्र शहीद झाली. त्यानंतर शाळेत फारशी काही कवितेच्या वाटेला गेले नाही. नाही म्हणायला ११वीच्या निरोप समारंभाच्या वेळी एक कविता करून म्हंटलेली आठवते.

कॉलेजमध्ये असताना मला कवितेत रस असणार्‍या, कविता करणार्‍या मैत्रिणी मिळाल्या. आणि मीही उत्साहाने कविता करू लागले. हळू हळू वैचारिक, ललित लेखनही सुरू झालं. अभ्यासाचा सराव म्हणून असेल, मी कविता, कथा, पुस्तके यांची समीक्षाही करू लागले.

माझं लग्न झालं आणि मी सांगलीजवळील माधवनगरसारख्या खेड्यात एकत्र कुटुंबात राहू लागले. पुढे दोन-तीन वर्षे घरात काम काम आणि कामच. काही नवीन सुचायला आणि विचार करायला वाव आणि वेळच नव्हता. माझे लेखन थांबलेच जसे. नाही म्हणायला किरकोळ कविता अधून –मधून लिहिल्या जात. त्या जाणणार्‍या आणि कविता लिहिणार्‍याही काही जेष्ठ कवयित्री तिथे मला मिळाल्या. महिला मंडळाच्या ‘वंदना’ या हस्तलिखित वार्षीकाच्या संपादनाचेही काम तिथे मी केले.

पुढे १९७० साली मला सांगलीच्या डी. एड. कॉलेजमध्ये अध्यापनाची नोकरी लागली. तिथे अनेक विद्यार्थिंनींशी संबंध आला. त्यांच्या नाना कथा आणि व्यथा मला कळल्या, पण तरीही मी कथेच्या वाटेकडे वळले नव्हते. बाकीचे लेखन मात्र पूर्ववत चालू होते. या काळात माझे अनुभवविश्वही विस्तारले. मला लेखनाला नवनवे विषय सुचले. तरीही या काळात माझे प्रामुख्याने लेखन हे कॉलेजचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी झालं.

माझं कथालेखन त्या मानाने उशिरा सुरू झालं. त्याला कारणही तसंच घडलं. मला लग्नानंतर दहा वर्षाने मुलगा झाला. तोपर्यंत मुलाची (मुलगा किंवा मुलगी) वाट पाहून आम्ही अनाथाश्रमातून मूल दत्तक घ्यायचे ठरवले होते. त्यासाठी फॉर्म भरणे वगैरे चालू केले होते आणि अचानक मला दिवस गेल्याचे लक्षात आले. नंतर माझ्या मनात आलं, जर मी आधी मूल दत्तक घेतलं असतं आणि नंतर मला स्वत:चं मूल झालं असतं, तर घरातली, नात्यातली, शेजारची त्याच्याशी कशी वागली असती? यातून मला ‘परक्याचं पोर’ हे कथा सुचली. बाळंतीण असतानाच मी ती लिहिली. ही माझी पहिली वाहिली कथा. ती खूप गाजली. मला अनेक खुषीपत्रे आली. त्यानंतर मी बर्‍याच कथा लिहिल्या. त्याही गाजल्या. माझे ५ कथासंग्रह प्रकाशित आहेत. १. कृष्णस्पर्श २. धुक्यातील वाट ३. झाले मोकळे आकाश ४. फास्ट फूड ५. पाचा उत्तरी सफल संपूर्ण. माझे २ कविता संग्रह आहेत. १. चंद्रपालखीची वाट २. मृगजळाकाठी. एक भौगोलिक पुस्तक आहे. ‘भारतीय नद्यांची ओळख. ’ यात भारतातील मुख्य नद्या व त्यांना मिळणार्‍या ३-४ महत्वाच्या उपनद्या यांची भौगोलिक व सांस्कृतिक महिती दिली आहे.

याशिवाय माझी बालवाङ्मयाची ३०-३२ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यात कथा, कविता, नाटिका, चरित्र इ. प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. माझ्या काही कथांचा हिंदीत, तर तुरळकपणे उडिया, तेलुगु, कन्नडमध्ये अनुवाद झाले आहेत. मला माझ्या एकंदर लेखनासाठी, बालवाङ्मयाच्या ३ पुस्तकांसाठी, २ अनुवादीत पुस्तकांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. तसेच मला जालंदर येथे पंजाब कला साहित्य अ‍ॅकॅडमीचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे मला कोटा येथे ‘शब्दसरोज सन्मान’, व जबलपूर येथे ‘डॉ. श्रीराम दादा ठाकूर संस्कारधानी सन्मान’ मिळाला आहे. पण महाराष्ट्राबाहेरचे हे पुरस्कार सन्मान मला माझ्या अनुवादित साहित्यासाठी मिळाले आहेत.

अनुवादीत साहित्य हा माझ्या लेखनाचा आणखी एक टप्पा. मला अनुवादित साहित्य वाचायला आवडतं आणि अनुवाद करायलाही आवडतो. अनुवाद म्हणजे केवळ एका भाषेतील शब्दाला, दुसर्‍या भाषेतील प्रतिशब्द देणे नव्हे. ते झाले भाषांतर. अनुवाद हीदेखील पुनर्निर्मिती असते. अनुसृजन असंही काही लोक त्याला म्हणतात. तो शब्द मला फार आवडतो. तर मी अनुवाद करते म्हणजे पुनर्निर्मिती किंवा अनुसृजन करते.

मी फक्त हिन्दी भाषेतील साहित्याचा अनुवाद करते. अनुवादामुळे, वेगवेगळे प्रदेश, तिथला परिसर, वातावरण, लोकजीवन, लोकसंस्कृती, त्यांचे रीतिरिवाज, त्यांची जीवनदृष्टी कळून येते. नवीन ज्ञान होतं. त्याचबरोबर हेही कळतं, की जीवनपद्धती वेगवेगळी असली, तरी संस्कृतीचा अंत:स्त्रोत एकच आहे. मी आत्तापर्यंत, मोहनलाल गुप्ता, प्रतिमा वर्मा, सूर्यबाला, मधु कांकरीया, भगवान वैद्य ‘प्रखर’, सुशांत सुप्रिय, गिरिमा घारेखान, हंसा दीप, इ. लेखकांच्या कथांचा अनुवाद केला आहे. रेत में खोयी नदी, संघर्ष, गोरा, गोदान इ. कादंबर्‍यांचा अनुवाद केला आहे. माझे ७ अनुवादित लघुकथा संग्रह प्रकाशित आहेत. हरीशंकर परसाई, घनश्याम अग्रवाल यांच्या व्यंग्य लेखनाचाही मी अनुवाद केला आहे. सरश्री तेजपारखी, स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानात्मक पुस्तकांचाही मी अनुवाद केला आहे. माझ्या अनुवादीत पुस्तकांची संख्या ३५ च्या वर आहे. काही पुस्तके छापली जाण्याची वाट बघत प्रकाशकांच्या रांगेत उभी आहेत.

अभिमन्यू जसा चक्रव्यूहात शिरला आणि आत आतच जात राहिला, तसेच माझे अनुवादाच्या बाबतीत झाले आहे. मी एकदा अनुवादात घुसले, ती त्यातच गुरफटत गेले. माझे स्वत:चे लेखन बाजूलाच पडले. पण मला यातही आनंद मिळाला. अगदी नवनिर्मिती केल्याचा आनंद. तर असे हे माझे काही सृजनाचे क्षण, जे मला आनंद, समाधान, तृप्ती देऊन गेले. आपल्या सगळ्यांना ते सांगावेसे वाटले, म्हणून हा लेखन प्रपंच.

— समाप्त —

©  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तेथे काळजीचे काय काम!! ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ तेथे काळजीचे काय काम!! ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

*अनेक वर्षांपूर्वीची कथा. एका जनपदाचा (त्यावेळी राज्यांना जनपद म्हटले जायचे…) राजपुत्र आपल्या असामान्य कर्तृत्वाने राजाधिराज झाला…! *

नव्हे…!!

*विश्वविख्यात झाला..!!! “*

नव्हे…!

*युगयुगांवर त्याने आपले नाव कोरले…!! “*

… *लौकिक अर्थाने त्याने आई वडिलांची आज्ञा पाळली. आपल्या गुरूंची आज्ञा पाळली. त्यांच्या प्राणप्रिय पत्नीला जेव्हा राक्षसाने फसवून पळवून नेले, तेव्हा त्याने उपलब्ध मनुष्यबळ, साधनसामग्रीच्या आधारे राक्षसाचा वध केला…! दुसऱ्याच्या राज्याचा मोह न करता, त्याच्या भावाला राज्याभिषेक करून हा स्वर्गाहून प्रिय असणाऱ्या आपल्या मातृभूमीत परत आला…!! *

– – *यात त्याने कायम “प्रतिसाद” देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. * 

आपल्या मनात जे आहे तेच मी इथे लिहिले आहे…

*प्रत्येकाला “नर ते नारायण” अर्थात “राम ते प्रभू श्रीराम” असा प्रवास करण्याचा मूलभूत अधिकार भारतीय संस्कृती आपल्याला देत आली आहे…! “*

रामचरित्र जितके गाऊ तितके कमीच आहे…!

आज सर्वसामान्य माणसं एक तक्रार करीत असतात की कशातच राम राहिलेला नाही, त्यावेळी रामाची कथा प्रकर्षांने आठवते आणि ती कथा आपल्याला सांगते की जोपर्यंत रामकथा या भूमीवर जोपर्यंत ऐकली जाते, गायली जाते, सांगितली जाते, तोपर्यंत इथल्या कणकणात राम आहे…! आपण त्याचे स्मरण करून आपले विहित कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या सोबत असेल…

कारण…

कर्तव्य म्हणजे राम

बांधिलकी म्हणजे राम

समर्पण म्हणजे राम

निराश होण्याचे, तक्रार करण्याचे काहीच कारण नाही…

श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात त्याप्रमाणे आजपासून आपण *”मुखी नाम | हाती प्रपंचाचे काम ||”* हे सूत्र अंगीकारण्याचा प्रयत्न करू.

– – *”जेथे आहे रामनाम |*

 *तेथे काळजीचे काय काम ||”*

श्रीराम जयराम जयजयराम

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समईच्या शुभ्र कळ्या…  – लेखक : पं. हृदयनाथ मंगेशकर  ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ समईच्या शुभ्र कळ्या…  – लेखक : पं. हृदयनाथ मंगेशकर  ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

(भाऊ-बहीण यांचं नातं मायेच्या ओलाव्याचं, नितळ आणि प्रेमानं ओथंबलेलं. थोरली बहीण आशा भोसले यांच्याविषयी लिहिताना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रतिभा विलक्षण उंची गाठते. पंडित हृदयनाथ यांचा हा विशेष लेख) 

‘संध्येची वेळ, पत्थरानी चढणित घर राहिले रे दूर…’ कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेसारखी स्थिती…दहा वर्षांची आशाताई मला कडेवर घेऊन धुळीनं, म्हणजे फुपाट्यानं, भरलेल्या रस्त्यानं चालत होती. दुपारच्या उन्हानं तापलेला रस्ता अजूनही आपले उष्ण श्वास सोडत होता.

कडेवर पाच वर्षांचा भाऊ आणि एका हातात नदीवर धुतलेल्या कपड्यांचे पिळे घेऊन ही फक्त दहा वर्षांची आशाताई…उपाशीपोटी, अजाण आशाताई त्या खडकाळ तापलेल्या रस्त्यानं आनंदात चालत होती.

आलेल्या परिस्थितीला हसत तोंड देणं हा दैवी गुण तिला लहानपणापासूनच मिळाला होता. एका बाजूला एक पडका किल्ला, एका बाजूला तापी नदीचा भीतिदायक खोल डोह आणि पुरात नदीनं कापलेले बिहड आणि फुफाट्याचा एकाकी रस्ता…ही निर्भय पोरगी अगदी आरामात चाललेली होती. नेटका सुंदर चेहरा, सरळ नाक,

जाड; पण सुबक ओठ, अगदी निष्पाप डोळे, भोळा भाव असलेले; पण मोठे, गालाला गोड खळ्या, सावळा रंग, अतिशय प्रमाणबद्ध दणकट शरीर, बाबांचं (मा. दीनानाथ) सारं सौंदर्य, स्वभाव आणि मुख्यतः गाणं घेऊन आशाताई जन्माला आली होती. बाबा गायला बसायचे. समोर दीदी (लता मंगेशकर), तिच्या बाजूला मीनाताई आणि बाबांचे निवडक शिष्य रियाज करायचे आणि आशाताई? ती एकतर खेळत असायची किंवा आईला मदत करत असायची.

एकदा आईनं चिंतेनं विचारलं : ‘‘मालक, ही आशा नुसती खेळत असते. ही केव्हा गाणार?’’

बाबा शांतपणे म्हणाले : ‘‘काळजी करू नकोस. ती खेळता खेळता गाणं शिकत असते आणि गाणं शिकवून येतच नाही; त्याला दैवी देणगी असावीच लागते. हिला ती दैवी देणगी आहे आणि स्वभावानं ती ‘हब’ आहे. (‘हब’ म्हणजे म्हैस).

ती प्रेमळ आहे, भोळी आहे; पण कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेण्याची शक्ती तिच्यात आहे. वेळ आली की धडक देऊन ती अचानक गायला सुरुवात करेल आणि ‘मी मी’ म्हणणारे तिच्यापुढं लोटांगण घालतील असं ती गाईल; पण श्रीमती, हिचा भोळा स्वभाव? मला चिंता वाटते. बघू पुढं काय होते ते.’’

माझं आणि धुतलेल्या कपड्यांचं ओझं घेऊन आशाताई घरी पोहोचली. मला ओट्यावर बसवून ती कपडे वाळत घालू लागली… .. 

‘‘ए आजी, भूक लागली आहे. काही खायला आहे?’’

म्हातारी आजी ताईबाई म्हणाली : ‘‘आशा, जेवून गेली होतीस ना? मग या वेळी तुला भूक का लागली?’’

‘‘ताई, सारे कपडे धुतले…वाळत घातले…सारी भांडी धुतली…सारं घर सारवलं…बाळला कडेवर घेऊन आताच तापीवरून आले आणि मग भूक नाही का लागणार?’’

‘‘बरं, मीच चुकले. आत भाकरी आणि तिखट-तेल आहे, लोणचंही आहे. खाऊन घे…पण आशा, लवकर जेवून घे. आज जडीबाई (शेजारीण) येणार आहे. थोडं गाऊ या.’’

मग जडीबाई आणि गावातल्या बायका यायच्या. संध्याकाळचं गार वारं सुखावू लागायचं. पाखरं घरी जाण्याच्या तयारीत किलबिल करायची. मग ताईबाई, आशाताई, उषाताई गायला सुरुवात करायच्या.

‘यशोदे घराकडे चाल .. मला जेवू घाल

आई दही वाढ दही .. वर कांद्याची कोशिंबिरी

पाई पडलिया फुटा .. झिजली नखं

मला जेवू घाल.’

त्या अत्यंत मागासलेल्या खेड्यातल्या त्या जीर्ण घरात हे सगळं अतिकरुण वाटायचं. आशाताईच्या गळ्यातला हा करुण रस या खेड्यातल्या उपासमारीच्या आणि कामाच्या ताणामुळं समृद्ध झाला. त्यात युद्धाच्या काळात आलेलं दारिद्र्य सारं गाव भोगत होतं. त्यात खरूज या आजाराची साथ. खरजेनं आशाताईचं सारं अंग भरलेलं. माझंही. नुसत्या वेदना. या वेदनेनं शरीर नाही; पण भावजीवन समृद्ध झालं. पुढील संगीताच्या वाटचालीत या भोगलेल्या यातनांचा फार उपयोग झाला.

‘‘आशा, ते छल्ल्याचं गाणं गा. जडी, ही कशी ठसक्यात गाते, ते ऐक.’’

.. .. मग आशाताई गायला सुरुवात करायची… .. 

‘मेरा छल्ला जो गम गया

ढूँढो जमादार

नको, नको जमादार

मेरे छल्ले के खातीर

मै तो तोडे बनाऊँगा

नको नको जमादार

मेरी छल्ला जो गम गया

ढूँढो जमादार.’

मग अशी अनेक लोकगीतं आशाताईला त्या थाळनेर गावी पाठ झाली.

‘‘आशाताई, तुझ्यासाठी एक खास गाणं तयार केलं आहे. अर्थात्, ‘एचएमव्ही’साठी. पैसे मिळणार नाहीत; पण रॉयल्टी मात्र मिळेल.’’

‘‘बाळ, मी फार कामात आहे. पैशाचा प्रश्नच नाही; पण मला वेळच नाही.’’

‘‘ठीक आहे, गाणं ऐकून घे. आवडलं तर वेळ मिळाल्यानंतर गा.’’

‘‘बरं गा, मी ऐकते.’’

मी गायला सुरुवात केली…

‘‘जिवलगा ऽऽऽ राहिले रे दूर घर माझे

पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे

जिवलगाऽऽऽ’’

‘‘बस्स कर, थांब! थाळनेरमधले सारे भोग या गाण्यात उतरले आहेत. तुला कडेवर घेऊन उपाशीपोटी मी अशीच चालायची! बाळ, मी फिल्मची दोन गाणी रोज गाते आणि गातच राहणार; पण माझ्या जीवनाचं दर्शन घडवणारं हे गाणं मी इतर गाणी सोडून गाणारच. चल! आपण रिहर्सल करू या.’’

‘‘पण आशाताई, या गाण्यामध्ये अंतऱ्यासाठी संगीताचे तुकडे नाहीत. हे अनुभवनिष्ठ, दृष्टान्त देणारं गाणं आहे. गायिका फक्त आपल्या ‘जिवलगा’साठी गात आहे. गायिका, जिवलग, निसर्ग आणि जीवघेणी संध्याकाळ…या गाण्यात कुणालाही प्रवेश नाही.

“ ‘‘जिवलगाऽऽऽ’ म्हणजे प्रियकर असं मुळीच नाही. जिवलगा ही एक आर्त हाक आहे, एक जीवघेणी पुकार आहे. ही आर्त हाक कुणासाठी आहे हे ज्यानं त्यानं आपल्या जीवनानुभूतीनं ठरवावं. संगीतकार, कवी, गायिका हे या जिवलगाच्या आर्त हाकेचे केवळ माध्यम आहेत.’’

एक दिवस आशाताईचा आईला फोन आला : ‘‘माई, मी फार त्रासात आहे. तू लवकर मला इथून बाहेर काढ.’’

माई घाबरली. म्हणाली : ‘‘चल बाळ, आशाला घरी आणू या. ती फार त्रासात आहे.’’

मग मी, आई, अर्जुन (माझा खास मित्र) असे तिघं आशाताईच्या घरी पोहोचलो. आशाताई आणि भोसले भांडत होते. आई त्यांना समजावत होती; पण कुणीच ऐकत नव्हतं. अचानक आशाताई घर सोडून निघून गेली. आठ महिन्यांची गरोदर बाई घर सोडून निघून गेली. मी बंगल्याखाली मोटारीत बसलो होतो.

माझ्यासमोरच आशाताई टॅक्सीत बसून निघून गेली. आई भोसलेंना समजावत बसली. तेवढ्यात मला आशाताईची मुलगी वर्षा दिसली. आशाताईचीच कॉपी…तसंच नाक, तोच रंग, त्याच खळ्या, तेच निष्पाप भोळे डोळे.

.. .. लहान आशाताई माझ्याकडं पाहत होती! मी काहीही विचार न करता गच्चीवर गेलो. वर्षाला उचललं आणि मोटारीत घालून वाळकेश्वर इथं घरी आलो. वर्षा इतकी लहान होती की ती मला आपला बापच समजली. लग्नाआधीच मी तीन वर्षांच्या मुलीचा बाप झालो.

थोड्या वेळानं आशाताई घरी आली. दोघी बहिणी खूप रडल्या.

‘‘आशा, आता तू इथंच माझ्या खोलीत राहा. बघू, तुझ्या केसाला कोण धक्का लावतंय.’’

‘‘पण दीदी, माझा हेमंत, वर्षा हे सारे इथंच राहतील?’’

‘‘अगं, हे तुझं घर आहे, जिथं आम्ही तिथं तू, जिथं तू तिथं तुझी मुलं. मी लता मंगेशकर, तू आशा भोसले…काय कमी आहे आपल्याला?’’ दीदी आशाताईला मिठीत घेत म्हणाली.

मग आशाताई निश्चिंतपणे ‘वाळकेश्वर हाऊस’ इथं आमच्याबरोबर राहू लागली. वर्षा मला सोडून राहायचीच नाही. मी तिचे सारे लाड पुरवत होतो. एक दिवस आई, दीदी, उषाताई कोल्हापूरला गेल्या. गरोदर आशाताईची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.

मी थोडा अस्वस्थ झालो. कारण, आशाताई गरोदर होती आणि माझी अनामिक भीती खरी झाली. आशाताईला टायफॉईड झाला. डॉक्टरांनी सांगितलं : ‘चौदा दिवस बेडरेस्ट. पलंगावरून हलायचं नाही. कारण, पोटात गर्भ आहे.’ मी डॉक्टर कपूर यांना म्हणालो : ‘‘डॉक्टर, मी कसं सांभाळणार आशाताईला? ती गरोदर आहे आणि तिला विषमज्वर झाला आहे. तिची औषधं, पथ्यपाणी वगैरे मी कसं सांभाळणार?’’

डॉक्टर म्हणाले : ‘‘काळजी करू नका. आशाताई दणकट आहे. ती या आजारातून सहज बाहेर येईल. मी एक नर्स पाठवून देतो. ती सर्व औषधपाणी सांभाळेल.’’

मी सुटकेचा निःश्वास सोडला. मग नर्स आली. तिनं सारी जबाबदारी घेतली; पण संध्याकाळी, रात्री द्यायच्या औषधांची यादी आणि वेळा सांगून गेली. मीही फार विचार न करता तिला ‘हो’ म्हणालो. वेळेप्रमाणे औषध देऊ लागलो. शेवटचं औषध पहाटे पाचला होते. मी सूर्यवंशी… पहाटे कसा उठणार? मी जागतच बसलो.

असे चार दिवस गेले. आशाताई बरी होत होती; पण मी मात्र किंचित वेड्यासारखं बोलत होतो. माझा मित्र अर्जुन यानं मला सांगितलं, ‘तू असंबद्ध बोलत आहेस…’ मग माझ्या लक्षात आलं की, मी रोज रात्री जागरण करतोय, दिवसाही झोपत नाही…मग मी आशाताईला म्हणालो : ‘‘आज सकाळची औषधाची गोळी तू घे. आज मी जरा झोपतो.’’

आशाताई म्हणाली : ‘‘मी तुला सांगत होतेच की, इतका जागू नकोस; पण तू ऐकतोस कुठं? जा, झोप जा. मी वेळेवर औषध घेईन.’’

मग मी झोपायला गेलो; पण झोप येईच ना. बऱ्याच वेळानंतर डोळ्यांवर झापड येऊ लागली आणि माझा गतकाळात प्रवेश झाला :

ते पुणं…ते घर…ती रेवडीकरांची गल्ली… तो राजा गडी…

‘‘आशा, बाळला घे…मघापासून रडतोय बघ! काही तरी खेळव त्याला.’’ आईचा हळवा आवाज आला.

‘‘बघते आई, तू काळजी करू नकोस,’’ आशाताई मला कडेवर घेत म्हणाली. बाबांचा मृत्यू होऊन एक महिना झाला असावा. दीदी कामाला लागली होती. मीनाताई पोटाच्या विकारानं त्रस्त होती. उषाताई लहान. मग मला कडेवर कोण घेणार? आशाताई. कारण, शरीरानं ती दणकट होती; पण मला कडेवर का घ्यावं लागायचं?

कारण, मला चालता, अगदी रांगताही, येत नव्हतं. बोन टीबी म्हणजे हाडेव्रण झाला होता. पायात दूषित रक्त भरलं गेलं होतं. दिवस-रात्र फक्त वेदना आणि आक्रोश. आशाताईला हे कळत होतं. म्हणून ही माझी दुसरी आई मला सतत कडेवर घेऊन काम करायची.

खरंही वाटणार नाही; पण आशाताई मला कडेवर घेऊन झाडून घेणं, भांडी घासणं, कपडे धुणं ही सारी कामं करायची. पुढं मी सिंदबादची गोष्ट वाचली. तो म्हातारा, सिंदबादच्या खांद्यावरून उतरतच नाही. त्या म्हाताऱ्यासारखा मी आशाताईच्या कडेवरून उतरतच नसे. किती सेवा केली तिनं माझी! कसं उतरणार हे ऋण?

एखाद्या माणसाच्या नशिबात नियती असं गमतीदार; पण करुण भविष्य लिहून जाते की आश्चर्यच वाटतं. आशाताईचं प्रारब्ध असं काही विचित्र आहे…दणकट शरीर मिळालं; पण लहानपणापासून शारीरिक कष्ट सतत भोगावे लागले. गुणी मुलगी आणि प्रतिभावान मुलगा देवानं तिच्या ओटीत टाकला.

ती दोन्ही मुलं अल्पायुषी ठरली…आशाताईनं प्रेमविवाह केला. तो प्रियकर विक्षिप्त निघाला. लाथा, शिव्या, मार खातही अमर गाणी तिनं गायिली. अलीकडं मी टीव्ही पाहतो. तेव्हा, भारत सरकार ‘भारतरत्न’ ही पदवी खिरापतीसारखी वाटते आहे, हे मला काही दिवसांपूर्वी बातम्यांमधून कळलं…पण जगताला ७० वर्षं संगीतकलेचा प्रत्यय देणाऱ्या, नव्वदी उलटलेल्या एकमेव आशा भोसले यांना सरकार का विसरतं? नियती! आणि, दुसरं काय?

बाबा गेल्यानंतर आम्ही कोल्हापूरला गेलो. नुसते हाल. चुरमुऱ्यात पाणी घातलं की आमचं जेवण झालं. नुसतं दैन्य, वेदना, अवहेलना. बाबांचं श्राद्ध आलं की, बाबांचं एक चांदीचं ताट आई विकायची. ते ताट आणि मी कडेवर…अशा थाटात एप्रिल महिन्याच्या उन्हात आशाताई गुजरी गल्लीत जायची.

ते ताट विकून जे पैसे यायचे त्यांतून श्राद्ध करण्यास लागणारं सारं सामान घेऊन ती घरी यायची. मग आई, मीनाताई, आशाताई स्वयंपाकाला बसायच्या. गावातली एक समजूत की, श्राद्ध या कर्माला २१ भाज्या लागतात. मग या बायका २१ भाज्या करण्याचा खटाटोप करायच्या. मग दुसऱ्या दिवशी भटजींना दक्षिणा देऊन आम्ही पाची भावंडं गच्चीच्या तापलेल्या पत्र्यावर उभे राहून उपाशीपोटी, कावळा घासाला केव्हा शिवतो, याची वाट बघत राहायचो.

का कुणास ठाऊक, मी या कर्मकांडाच्या विरुद्ध झालो. थोडीफार आशाताईही या कर्मकांडाच्या विरुद्ध आहे. या कोल्हापुरात प्लेगची साथ आली आणि आम्ही थाळनेरला गेलो. ही खानदेशची राजधानी…पण नगण्य खेडं.

तिथं आशाताईच्या आणि माझ्या अंगावर खरूज या आजारानं हल्ला केला. सर्व अंग रक्ताळायचं. त्या वेदनामय आजारात आशाताई दीड-दोन मैल (किलोमीटरची भाषा त्या वेळी नव्हती) चालत तापी नदीवर आंघोळ करून, सगळ्यांचे कपडे धुऊन घरी यायची. मला सदैव कडेवर घेऊन.

मग आम्ही मुंबईला आलो. आता थोडे बरे दिवस आले होते. मी चालूही लागलो होतो. एक दिवस उग्र मुद्रेनं आशाताई भिंतीला टेकून उभी होती. आई तिच्यावर ओरडत होती. आशाताई निगरगट्टपणे उभी होती.

मग कळलं की, आशाताई घर सोडून गेली प्रियकराबरोबर. सगळ्यात जास्त धक्का मला बसला. आता आशाताई कधीही दिसणार नाही…मी उन्हात दुपारी रस्त्यावर उभा राहायचो आणि प्रत्येक मोटारीत बघायचो. कारण, माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की, आशा या रस्त्यानं जाते. बरेच दिवस मी उन्हात उभा राहिलो; पण आशाताई दिसली नाही.

‘तुझ्याच साठी कितीदा… ऊन्ह सोशिले माथी रे, तुझ्याच साठी रे…’

कविवर्य ना. घ. देशपांडे यांची ही कविता मला वाचवेना. आताही मला झोप येईना. कारण, हा सारा भूतकाळ माझी झोप घेऊन गेला होता.

आशाताई बरी झाली आणि मुलाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात गेली. दोन दिवसांनी तिनं एका सुंदर मुलाला जन्म दिला. सगळे आनंदानं वेडे झाले; पण आशाताईच्या नवऱ्यानं रुग्णालयाला धमकी दिली. बायकांचं रुग्णालय ते.

साऱ्या बायका घाबरल्या. आशाताई एक दिवसाची बाळंतीण; पण तिनं धैर्यानं त्या रुग्णालयाच्या संचालिकेला सांगितलं की, ‘तुम्ही काळजी करू नका. मी आत्ता घरी जाते.’ आणि, एका दिवसाच्या मुलाला घेऊन आशाताई घरी आली; पण जिना कसा चढणार?

मग मी, अर्जुन, हिरालाल यांनी आशाताईला खुर्चीवर बसवलं आणि आम्ही तिघांनी आशाताईला तिसऱ्या मजल्यावर नेलं. मी आशाताईला गमतीनं म्हटलं : ‘‘आशाताई, इतके दिवस तू मला खांद्यावर मिरवलंस…आज मी तुला खुर्चीवर बसवून मिरवलं.’’

दीदीनं मुलाचं नाव ठेवलं : ‘आनंद.’

‘‘आशाताई, आपला प्रयोग असलेलं ‘जिवलगा…’ हे गाणं मैफलीत शास्त्रीय संगीतकारही गायला लागलेत…मोठे समीक्षकही ‘जिवलगा’वर समीक्षा लिहीत आहेत. सर्वसाधारण श्रोत्यांना हे गाणं फार आवडलं आहे. आता एक नवा प्रयोग करतोय, गूढकाव्य स्वरबद्ध करतोय. तूच या गाण्याला न्याय देऊ शकशील याची मला खात्री आहे. गाणार का?’’

आशाताई हसली. म्हणाली : ‘‘प्रयोग असला की तुला माझी आठवण येते, नाही?’’

मी पहिल्यांदाच गंभीरपणे म्हणालो : ‘‘आशाताई, तुझी यासाठी आठवण येते; कारण, नियती आपल्या सहनशीलतेवर एक प्रयोगच करत होती. त्या प्रयोगाचे फक्त दोन साक्षीदार आहेत…तू आणि मी.’’

‘‘बरं, गाणं ऐकव,’’ आशाताई गहिवरून म्हणाली.

मी गाणं ऐकवलं.

‘‘फार छान चाल आहे. गाणाऱ्याला एक आव्हान आहे या चालीत; पण बाळ, काव्य ओ की ठो कळलं नाही आणि कळणारही नाही; पण मी हे गाणं गाणार.’’

‘‘नाही आशाताई, अंधारात बाण मारू नकोस. मी उद्या कवी आरती प्रभूंकडून याचा अर्थ नीट समजावून घेतो आणि तुला लिहून देतो. त्या अर्थामध्ये एकाकार होऊन मगच हे गाणं गा.’’

दुसऱ्या दिवशी मी तो कागद आशाताईला दिला. आशाताई ते गाणं गायिली.

नव्वद वर्षांची आशाताई नुकतीच मला भेटली. जुन्या आठवणी निघाल्या. एकदम हरवून म्हणाली : ‘‘बाळ, तुझी इतकी गाणी मी गायिले…अवघड, अनवट अशी गाणी. ‘जिवलगा…’, ‘केव्हातरी पहाटे…’, ‘तरुण आहे रात्र अजुनी…’, ‘मी मज हरपुन बसले गं…’, ‘मागे उभा मंगेश’, ‘जांभुळपिकल्या झाडाखाली…’, ‘नभ उतरू आलं…’ ही सगळी गाणी फार लोकप्रिय झाली; पण तुझं ते गाणं – जे कुणालाच पसंत नव्हतं ते गाणं – मी तुझ्या सर्व गाण्यांत उत्कृष्ट नव्हे, उत्कट गायिले, असं मला ठामपणे वाटतं.’’

ते गाणं अर्थासहित :

समईच्या शुभ्र कळ्या उमलवुन लवते

केसातच फुललेली जाई पायाशी पडते

भिवयांच्या फडफडी दिठीच्याही मागे पुढे

मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे

साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची

आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची

थोडी फुले माळू नये डोळा पाणी लावू नये

पदराच्या किनारीला शिवू शिवू उन गं ये

हासशिल हास मला मला हासूही सोसेना

अश्रू झाला आहे खोल चंद्र होणार का दुणा…

रामप्रहर होतो, कळ्यांना बहर येतो. त्या कळ्यांचा आकार कसा असतो? झाडाच्या डहाळीवर झोके घेत असलेली कळ्यांची लडी… समईच्या कोन्यावर झुलत असलेली शलाका…अनेक रंगांच्या जटा धारण केलेली धवलशुभ्र ज्योत ही समईवर उगवलेली मोगऱ्याच्या एक कळी भासते…

समईच्या वाती प्रज्वलित केल्या, त्या वेळी त्या नव्हाळीनं उभ्या होत्या; पण आता फार वेळ गेल्यामुळं त्या कोमेजल्या आहेत. त्या वाती मान लववून आहेत. रात्री केसात माळलेल्या कळ्या, उमलून केसातच फुलून आता कोमेजून पायाशी पडल्या आहेत. म्हणजे, रामप्रहर झाला आहे…दिठी म्हणजे दृष्टी.

विश्वाचं दर्शन घडवणारा तेजोपट…तेज म्हणजे प्रकाश…माझी अस्वस्थता माझ्या भिवयांच्या फडफडीतून व्यक्त होत आहे. त्या फडफडीचा वेग इतका विलक्षण आहे की, त्या वेगानं माझ्या दिठीच्या वेगाला अडथळा येतोय.

म्हणजे, माझ्या भिवयांची तडफड प्रकाशाच्या वेगालाही मागं टाकतेय आणि हा सारा जीवघेणा खेळ, माझं मागं मागं राहिलेलं माहेर बापुडपणे बघत आहे. मी सासुरवाशीण आहे म्हणून हे निमूटपणे भोगत आहे. काय भोग आहेत हे की जे अव्यक्त असावेत? इतकी रात्र झाली आहे. चांदणं चहूकडं पसरलं आहे. कालही झोप लागली नाही. आजही तीच अवस्था.

‘दिन तैशी रजनी झाली गे माये’

झोप नाही; पण पेंग येते…पण डोळ्यांत अश्रू साचल्यानं डोळे अर्धवट उघडे राहतात. त्या अश्रूंत चांदण्यांचं प्रतिबिंब पडतं…डोळ्यांना चांदणीची पेंग? नुसते डोळे मिटले की त्यांत अवकाश सामावलं हेही साधं उमजत नाही. डोळे बंद करण्याचं स्मरणच होत नाही. मुलखाची विसराळू झालेय, झालं!

माळायची आहेत तर थोडी फुलं माळू नयेत. साऱ्या रात्रभर पुरतील इतकी फुलं घ्यावीत. अहो! रात्र सरली पाहिजे ना…

झोप येते म्हणून डोळां पाणी लावू नये. झोप न येऊ देण्याचं काम अश्रू करताहेत ना!

रात्री फुलं माळायचं काम उजाडल्यावर संपलं. पदराच्या किनारीला सकाळचं ऊन्ह शिवायला लागलं. माझी ही दयनीय अवस्था पाहून तुला हसू येतंय ना? खरंय…तुला हसू येणारच. तुझं अस्तित्व मी उदरात जोपासते आहे ना! पण खरं सांगू?…मला तुझं हसू सोसत नाही. तुझ्या-माझ्यासारखा एका जिवाला मी जन्म देणार आहे.

मी बाळाला अंगावर पाजणार…एक शरीर माझ्या शरीरात जगतंय…मी जन्मदात्री माता, आई होणार…ही जाणीव इतकी विलक्षण आहे की, मी हादरून गेले आहे. माझी अवस्था तुम्हा पुरुषांना कळणारच नाही. अरे, माझा अश्रू खोल झाला आहे. त्याला करुणेचे, दुःखाचे, मायेचे कंगोरे आहेत. ‘जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है?’ आता मी रूपांतरित होणार आहे आणि चंद्रही दोन होणार आहेत.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : पं. हृदयनाथ मंगेशकर 

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २. ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २. ☆ प्रा.भारती जोगी ☆

दुर्गाबाई दामोदर चाफेकर 

२२ जून… हा दिवस म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील धगधगते पान! त्या पानावरील होमकुंड म्हणजे आपल्या सशस्त्र क्रांतीने पेटविणा-या चाफेकर बंधूंच्या अभिमानास्पद योगदानाचं तेजाळलेलं दर्शन!!

१८९७ मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये तपासणीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्लेग कमिशनर कॅप्टन रॅंड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट यांच्यावर गोळ्या झाडून केलेला वध! ही घटना इतिहासातील पानावर कोरली गेली. नंतर १८ एप्रिल १८९८ रोजी मोठे बंधू दामोदर चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली. स्वातंत्र्य यज्ञात बलिदान दिलेला हा हुतात्मा!!

पण… त्याच होमकुंडात, समिधा म्हणून सतत स्वतः ला समर्पित करत राहिलेल्या… पण साधा नामोल्लेख च काय पण… साधं नाव देखील माहीत नसलेल्या अशा… उपेक्षित आणि अलक्षित स्त्रियांपैकी एक… स्वातंत्र्यवीराची पत्नी… दामोदर चाफेकरांची अर्धांगिनी *दुर्गाबाई*!!

दुर्गाबाई पिंपरी जवळील *मेंढ-याचे तळे* येथील होळकर घराण्यातील! एक हसरी, मिश्किल स्वभावाची मुलगी! गाणेही उत्तम गात असे. सणासमारंभात जमलेल्या नातेवाईकांना एकत्र करून नाच-गाणी करत असे. थोडक्यात काय तर एक हसता-खळाळता, उत्फुल्ल, निर्मळ निर्झर! अतिशय नाजूक अशी बाला! गंमत म्हणजे तिला शीळ देखील वाजवता येत असे.

ही अशी भरभरून जगणारी दुर्गा, १७ व्या वर्षी दामोदर चाफेकर यांच्याशी विवाह संपन्न होऊन चाफेकरांच्या घरात मोठी सून बनून प्रवेशली आणि दुर्गा… दुर्गा *बाई* बनली… आणि बघता-बघता तिच्यातली अल्लड, खेळकर, खुशमिजाज दुर्गा तिच्या बाईपणाच्या कोशात गुरफटून जणू अस्तित्व हीन झाली. दामोदर रावांच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या प्रवाहाविरुद्ध न वाहता, त्याच प्रवाहात स्वतः ला पूर्णपणे सामावून घेत, जीवन प्रवाह वाहता ठेवला तिनं!

दामोदर चाफेकरांना फाशी झाली. दुर्गाबाई आणि धोंडीराम नामे त्यांचा पुत्र मागे राहिले. दामोदर चाफेकरांचे, चाफेकर बंधूंचे नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अमर झाले. पण इतिहासात अशा प्राणांची आहुती देऊन अमर झालेल्यांच्या कुटुंबियांचे… पत्नी, मुलांचे काय झाले असेल, हा विचार ही आम्हां आयते स्वातंत्र्य उपभोगणा-यांच्या मनात ही येत नाही, ही खरी शोकांतिका आहे.

रॅंड आणि आयर्स्ट चा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत… दोघांच्याही श्रीमतींना आणि मुलांना स्पेशल, वार्षिक पेन्शन सुरू झाले. ऑन ड्युटी मारले गेले म्हणून खास वाढीव दराने पेन्शन सुरू झाले. पण…

दामोदर चाफेकर… जे… खरं म्हणजे देशासाठी ड्युटी करून फासावर चढले, त्यांच्या पाठीशी घरी राहून ऑन ड्युटी राहूनही, दुर्गाबाई आणि त्यांच्या मुलाला कोणतेही पेन्शन मिळाले नाही. १८९७ मध्ये त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्या १९५६ पर्यंत… म्हणजे ६० वर्षे जगल्या. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही त्या ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले, ना, पती स्वातंत्र्य सैनिक असल्याचे ताम्रपट मिळाले!

हीच ती खरी खंत! विचार करावा अशी बाब!! शेवटी होमकुंडात किती आणि कोणत्या समिधा जळल्या… कुणी पाहिल्या ना????

*ज्या प्रबला निज भाव बलाने*

*करिती सदने हरिहर भुवने*

*देव -पतिना वाहिनी सुमने*

*पाजुनी केशव वाढविती*

*परी जयांच्या दहनभूमीवर,

नाही चिरा नाही पणती…

* तेथे कर माझे जुळती!!

– लेख क्र. २.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “महान राजा…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “महान राजा…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

व्हियेतनाम या लहानग्या देशानं

अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला

नमवलं होतं.

जवळपास वीस वर्षे चाललेल्या या युद्धात अमेरिका पराजित झाली होती.

 

विजयानंतर व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्षांना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला.

साहजिकच तो यु्द्ध कसे जिंकलात हाच असणार! किंवा

अमेरिकेला कसं नमवलं हाच असणार!

 

त्यावर दिलेलं हे उत्तर वाचा…

“मुळात अमेरिका बलाढ्य देश. मात्र त्याच बलाढ्य देशाला नमवण्यासाठी

मी एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं. त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी युद्धनीतीचा वापर केला आणि सहज विजय संपादन केला…

पुढे पत्रकारानं विचारलं की, कोण होता तो महान राजा?

 

मित्रांनो, जेव्हा मी हे वाचलं तेव्हा माझीही छाती चांगलीच फुगली, जशी आता तुमची फुगेल..

 

तर या प्रश्नावर व्हियेतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर उभे राहिले

आणि

छत्रपती शिवाजी महाराज” असं नाव घेतलं.

नाव घेत असताना त्यांच्या डोळ्यांत एक वेगळेच तेज दिसत होतं!

 

पुढे ते म्हणाले की, असा राजा जर आमच्या देशात जन्माला आला असता,

तर आज आम्ही जगावर राज्य केलं असतं.

 

काही वर्षांनंतर या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर ‘शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधिस्थ झाला’

असं लिहून ठेवलंय…

 

कालांतराने व्हियेतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचा दौरा केला. ठरलेल्या राजकीय

कार्यक्रमानुसार त्यांना लाल किल्ला आणि गांधीजींची समाधी दाखवण्यात आली.

 

मात्र हे दाखवत असताना त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे हे विचारलं.

तेव्हा…

तेव्हा भारतीय सरकार थबकलं आणि रायगड असा उल्लेख केला…

 

परराष्ट्र मंत्री रायगडावर आल्या आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

 

समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी रायगडावरची माती उचलली आणि आपल्या बॅगमध्ये भरली.

यावर पत्रकारांनी या मातीमागचं कारण विचारलं. त्यावर मंत्री महोदय म्हणाल्या की,

“ही माती शूरांची आहे.

या मातीत महान राजा जन्माला आला. हीच माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार आहे.

जेणेकरून आमच्या देशामध्ये असे शूर वीर पुरुष जन्माला येवोत… “

 

माझा राजा हा फक्त महाराष्ट्राला हेवा वाटावा असा नसून

संपूर्ण जगाला हेवा वाटावा असाच आहे!

 

छत्रपती शिवाजी महाराज की जय!  

अपेक्षा व्यक्त करतो की, आपण ही आलेख मोठ्या अभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करावी..!

 ज्यांचं टीचभर आहे ते हात भर सांगतात आणि माझ्या राजाच आभाळभर आहे तरी ते सांगायला आपण कमी पडतो.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “विचारचक्रांचा योग्य उपयोग” – लेखक : अब्राहम थॉमस – अनुवाद : स्नेहा केणी☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “विचारचक्रांचा योग्य उपयोग” – लेखक : अब्राहम थॉमस – अनुवाद : स्नेहा केणी☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : विचारचक्रांचा योग्य उपयोग 

 – – – मनावर प्रभावीपणे ताबा मिळवा

लेखक : अब्राहम थॉमस

अनुवाद : स्नेहा केणी

मूल्य: ३३०₹ 

रोजच्या धकाधकीच्या जीवनाने भांबावून न गेलेली व्यक्ती सापडणे जणू अशक्यच आहे. मनात सतत गोंधळ सुरू असतो… त्यामुळे आपण नेहमी दुख, राग आणि वैतागाच्या दुष्टचक्रात अडकलेलो असतो… मग अशा परिस्थितीत मदतीसाठी पाहावे तरी कोणाकडे? याचं उत्तर आपल्यातच दडले आहे. हे पुस्तक प्रभावी मन नियंत्रणाद्वारे पुढे जाण्याचे व्यवहार्य आणि शाश्वत मार्ग सुचवते.

– – रागावर नियंत्रण कसे ठेवावे. संयम कसा वाढवावा. दुःखाला कसे सामोरे जावे. अपराधीपणाचा सामना कसा करावा. अचानक आलेल्या निराशेच्या खोल गर्तेतून कसे बाहेर पडावे. समाधानी आयुष्य कसे जगावे. जीवन अर्थशून्य भासत असल्यास, या निराशापूर्ण भावनेला कसे टाळावे. हे पुस्तक ‘इफेक्टिव माईंड कंट्रोल’ या संकेतस्थळावरील मनासंबंधीच्या ए. आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रबंधातील वर्तनात्मक पैलूंचा संक्षिप्त आढावा घेते. ईएमसी या संकेतस्थळाला जगभरातून भरघोस प्रतिसाद लाभला. १५० देशांतील सुमारे पाच लाखांहून अधिक लोकांनी या वेबसाईटला भेट दिली. इएमसी असे गृहीत धरते की आय. ए. (अंतर्ज्ञानाची नियतरीती) मुळे मनाला विगमक तर्क वापरून वृत्ती आणि वर्तन नियंत्रित करता येते.

– – हे पुस्तक शतकानुशतके ज्ञानी व्यक्तींनी आचरणात आणलेल्या साध्या सोप्या मानसिक व शारीरिक सरावांची शिफारस करते. यामुळे आपला दृष्टिकोन व कृती बदलण्यास मदत होते आणि आपण आयुष्याचे सकारात्मक अनुभव घ्यायला शिकतो.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # ३३१ ☆ व्यंग्य – कलियुग के त्रिदेव ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है समसामयिक विषय पर आपका एक अप्रतिम विचारणीय व्यंग्य – ‘कलियुग के त्रिदेव’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # ३३१ ☆

☆ व्यंग्य ☆ कलियुग के त्रिदेव

‘दैनिक खबरची’ का पत्रकार खोजीलाल बहुत परेशान है। रूस-यूक्रेन युद्ध ख़त्म हुआ नहीं और अमेरिका-इज़रायल-ईरान युद्ध के पटाखे फूटने लगे। गज़ा पर इज़रायली आक्रमण से 70000 से ज्यादा बेकसूर मरे। खाने की लाइन में लगे बच्चों पर गोलियां चलीं। अमेरिका की ईरान पर बमबारी से 160 मासूम स्कूली छात्राएं असमय काल-कवलित हुईं। श्रीलंका के पास ईरानी युद्धपोत डुबाने से 80 से ज्यादा ईरानी सैनिक मरे। इस पर प्रेसिडेंट ट्रंप की टिप्पणी थी कि उनके सैनिकों को जहाज़ पर क़ब्ज़ा करने के बजाय उसे  डुबाने में ज़्यादा मज़ा आता है। इन लड़ाइयों में हज़ारों इमारतें ज़मींदोज हुईं, हजारों परिवार बेघर और बर्बाद हुए। लेकिन इस बर्बादी के लिए ज़िम्मेदार राष्ट्राध्यक्षों के माथे पर शिकन नहीं पड़ी। वे हंसते, मज़ाक करते, नृत्य की मुद्राएं बनाते रहे, ‘शत्रु’ की बर्बादी पर बगलें बजाते रहे।

खोजीलाल धार्मिक आदमी है। उसने पढ़ा है कि सृष्टि के सृजन, पालन और विनाश की ज़िम्मेदारी ब्रह्मा, विष्णु और शिव यानी त्रिदेव के हाथों में है। इसीलिए जब वह ज़्यादा विचलित होता है तो आकाश की तरह मुंह उठाकर कहने लगता है— ‘यह क्या हो रहा है प्रभु? आदमी आदमी की जान का दुश्मन बना हुआ है। छोटे-छोटे बच्चे कीड़े मकोड़ों की तरह मर रहे हैं। फिर उन्हें जन्म देने की क्या ज़रूरत थी? क्या यह सब आपकी सहमति से हो रहा है? पाप और अन्याय करने वालों को आप रोकते क्यों नहीं?’

खोजीलाल को युद्ध में कूदने वाले देशों का यह तर्क परेशान करता है कि  वे अपनी सुरक्षा के लिए आक्रमण कर रहे हैं। उसे लगता है कि यदि यह तर्क मान लिया  जाए तो हर देश को अपनी सुरक्षा के लिए दूसरों पर आक्रमण करने का लाइसेंस मिल जाएगा। फिर कानून-कायदे किस लिए हैं?

इन्हीं तर्कों-वितर्कों में उलझा खोजीलाल एक दिन घर आकर सो गया। थोड़ी देर में देखा सामने साक्षात शिवजी खड़े हैं। वही बाघंबर, त्रिशूल, शरीर पर भस्म और कंठ में नाग। लेकिन चेहरे पर बड़ी गंभीरता। खोजीलाल दर्शन करके भावविभोर हुआ, हाथ जोड़कर बोला, ‘दर्शन पाकर कृतार्थ हुआ प्रभु, लेकिन संसार में यह क्या हो रहा है? सृष्टि के विनाशक तो आप हैं लेकिन आदमी आदमी के प्राण लेने पर क्यों तुला है? क्या यह सब आपकी मर्जी से हो रहा है?’

शिवजी कुछ और गंभीर हो गये, बोले, ‘भक्त, तुम्हारा दुख और तुम्हारी चिन्ता सही है, लेकिन जो हो रहा है उसके लिए हम जिम्मेदार नहीं हैं। इसके लिए आदमी ही जिम्मेदार है। ब्रह्मा जी आदमी की रचना ऐसी करते हैं कि मैन्यूफैक्चरिंग डिफेक्ट न हो तो उसका शरीर आराम से सत्तर अस्सी साल तक चलेगा। तुम लोग जो कृत्रिम अंग बनाते हो वे दस पंद्रह साल भी नहीं चलते। तुमने नाना प्रकार के वाहन सड़कों और आकाश में चला कर आदमी की उम्र को अनिश्चित और छोटा किया है। भ्रष्टाचारी लोग भवनों और पुलों में मिलावट करके दूसरों के प्राण लेते रहते हैं। तानाशाह हजारों वर्षों से अपने शक्ति प्रदर्शन के लिए युद्ध का खेल खेलते रहे हैं क्योंकि उसमें जान  सैनिकों और नागरिकों की जाती है। वे खुद सुरक्षित रहते हैं।

‘दूसरे, आदमी ने अपनी तरक्की दिखाने के चक्कर में युद्ध को ज्यादा नुकसानदेह बना दिया है। पहले युद्ध मैदान में सवेरे शुरू होते थे और शाम को बंद हो जाते थे। सैनिकों के घर और परिवार तक तब के अस्त्रों की पहुंच नहीं हो पाती थी। अब शत्रु के नगरों, इमारतों और परिवारों पर हमला होता है जिसमें हजारों निर्दोष मारे जाते हैं। बड़े पैमाने पर बर्बादी होती है, लेकिन इसी को तुम लोग तरक्की बताकर फूले फिरते हो। तुम्हारी करतूतों के लिए हम कहां दोषी हैं? दरअसल अब आदमी ही सृष्टि का पालक और विनाशक बना बैठा है। हमें अप्रासंगिक, आउटडेटेड बताया जाता है।’

सुनकर खोजीलाल हाथ जोड़कर बोला, ‘आप ठीक कहते हैं प्रभु, लेकिन अब इस संसार का क्या होगा?’

शिवजी ने जवाब दिया, ‘मैंने विष्णु जी से बात की है। उन्होंने कभी भस्मासुर का अंत किया था। वे ही कलियुग के भस्मासुरों से निपटने का उपाय बताएंगे।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ लघु कथा # १०२ – राज — तंत्र… – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे।

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय गद्य क्षणिका “– राज — तंत्र …” ।

~ मॉरिशस से ~

☆ कथा कहानी  ☆ लघु कथा # १०२ राज — तंत्र  ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

क्रांति — दूत के अपाहिज होने पर राज द्रोह के उसके खाते बंद कर दिये गए। इसके पीछे जानी बूझी सोच यह थी जो अपाहिज हो गया उससे अब आतंकित होने का काई कारण शेष रहा नहीं। पर इस कोण से सतर्कता की एक दृष्टि तो रखी ही जाती थी जो निढाल हो गया कहीं वह फिर से सक्रिय न हो जाए। कुछ दिनों बाद क्रांति — दूत की दयनीय मृत्यु होने पर वे खाते जला दिये गए। इसके पीछे एक बहुत बड़ा कारण था। इन लोगों के दुर्योग से अगले चुनाव में इनकी हार हो जाती और नई सरकार क्रांति — दूत के उन बंद खातों को खुलवाती तो शर्म के मारे इन्हें नर्क में भी मुँह छिपाना भारी पड़ता। वास्तव में क्रांति — दूत के राज द्रोह थे कहाँ। उसकी तो समर्पित राज भक्ति थी।

 © श्री रामदेव धुरंधर

10 — 04 — 2026

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : rdhoorundhur@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # ३३१ – आदिम से आदिम तक ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है। साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # ३३१ आदिम से आदिम तक… ?

मनुष्य जंगल में रहता था। शिकार के लिए संघर्ष होता था। स्वाभाविक है कि शस्त्र के रूप में पत्थर और लकड़ी का प्रयोग होता होगा।  मनुष्य ने विकास की राह पर कदम बढ़ाए। आदिम से आधुनिक होने की सतत यात्रा की।

इस यात्रा में मनुष्य ने बस्तियाँ बसाई। बस्तियों से गाँव, गाँव से नगर बने। नागरी सभ्यता का उदय हुआ। अकेला-दुकेला रहने वाला मनुष्य समूह में बसने लगा, समाज बना। तथापि संसाधनों के केंद्रीकरण के चलते संग्रह की वृत्ति जन्मी, लालच पनपा। इसने न केवल संघर्ष को बढ़ाया, अपितु द्वंद्व के नए आयाम भी खोले। मनुष्यजीवन के केंद्र में पैसा आता गया। धन संपदा, संसाधनों पर अधिकार जमाए रखने की वृत्ति बढ़ती गई, समर तीव्र होता गया।

संघर्ष की परिधि बढ़ी तो पत्थर, डंडे से आगे बढ़कर मनुष्य ने तलवारें विकसित की। फिर तो एक दूसरे को मारने- काटने के लिए विनाश का खून मुँह लग गया। गोली-गोले ढाले जाने लगे, मनुष्य द्वारा मनुष्य पर दागे जाने लगे। दो लोगों की सिर फुटव्वल में एक की अधिक हानि होती थी, अब हानि सामूहिक होने लगी। शत्रु का संहार, भीषण  नरसंहार में बदलने लगा।

विज्ञान का विकास और विस्तार हुआ। आदमी का आदिम और निखरा। अब ‘मास डिस्ट्रक्शन’ या बड़ी संख्या में मनुष्य को एक साथ मौत के घाट उतार देने के साधन तैयार हुए।

मनुष्य- मनुष्य में होने वाला संघर्ष, दो समूहों में होने वाले युद्ध से होते हुए विभिन्न राष्ट्रों के आपसी  संग्राम तक आ पहुँचा।

फिर उन्नीसवीं सदी आई । बड़ी संख्या में विश्व के राष्ट्र एक दूसरे से उलझे। यह प्रथम विश्वयुद्ध था। इस विश्वयुद्ध ने डेढ़ करोड़ से अधिक लोगों की बलि ली।

दो दशक बीतते-बीतते, विनाश के अजगर ने फिर अपना मुँह खोला। द्वितीय विश्वयुद्ध आरंभ हुआ। येन केन प्रकारेण विजय प्राप्त करना ही इसका अंतिम ध्येय था। इस बार मनुष्य पर परमाणु बम का परीक्षण किया गया। इस विनाश के साक्ष्य के रूप में पूरे शहर में जलकर खाक हुए और कुछ अधजले पेड़ बचे रहे, बाकी पूरा शहर मर गया।

आदमी के भीतर का आदमी मरता रहा, आज भी मर रहा है। कहा गया कि तीसरा विश्वयुद्ध पानी के लिए लड़ा जाएगा। संसार की महाशक्तियों को लगा कि पहले तेल पर तो आधिपत्य जमा लें, फिर पानी पर सोचा जाएगा।

अस्त्र-शस्त्र अब इतने संहारक हो चले कि एक रात में एक पूरी सभ्यता को नष्ट करने की चेतावनी दी जाने लगी। आदमी के विकराल आदिम को देखते हुए इस चेतावनी के सच सिद्ध होने की आशंका सदा बनी रहती है। आदमी की विडंबना और विसंगति देखिए कि किसी की आशंका, किसी के लिए संभावना भी होती है।

आदमी ने अपनी सूझबूझ से जंगल से महानगर तक यात्रा की। ज़मीन को अपने कब्जे में लिया, अंतरिक्ष को घातक हथियारों से पाट दिया समुद्र के गर्भ में विनाश बो दिया। बाहर से आधुनिक होने की यात्रा में भीतर का आदिम निखरता रहा।

अल्बर्ट आइंस्टीन ने कहा था कि चौथा विश्वयुद्ध पत्थरों और लकड़ियों से लड़ा जाएगा। सभ्यता नष्ट करने का आसुरी उन्माद यह स्थिति ला भी सकता है कि हमारी कथित सभ्य प्रजाति ही नष्ट हो जाए।  जब हथियारों के उपयोग से प्रजाति नष्ट हो जाएगी तो नये हथियार ढालने वाले भी नष्ट हो जाएँगे। साधनहीन बचे- खुचे लोग जंगलों में रहने लगेंगे। इसके बाद आगे जब कभी संघर्ष होगा तो फिर वही पत्थर, वही लकड़ियाँ साधन बनेंगे।

आदिम से आदिम की इस यात्रा के असंख्य आयाम हैं। इन आयामों पर हर विचारवान को अपने-अपने ढंग से चिंतन करना चाहिए। इस चिंतन से कोई समाधान निकल कर आ सके तो मनुष्य जाति पर बड़ा उपकार होगा।

© संजय भारद्वाज 

प्रातः 7:31 बजे, 11 अप्रैल 2026

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 2 अप्रैल से  एक माह की हनुमान साधना वैशाख पूर्णिमा तदनुसार 1 मई 2026 को संपन्न होगी। 🕉️

💥 इसमें हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमानाष्टक के पाठ किए जाएँगे। हनुमान चालीसा के 21 या अधिक पाठ करने वाले विशेष साधक तथा 51 या अधिक पाठ करने वाले महा साधक कहलाएँगे। 101 या अधिक पाठ करने वाले परम साधक कहलाएँगे। आत्म परिष्कार और मौन साधना साथ चलेंगे।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares