मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आशाताई.. गेलात…! – भाग – १ ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

आशाताई.. गेलात…! – भाग – १ ☆ शीला पतकी 

शब्दावाचुनी संवादाची

 लाभे तुज स्वरभाषा 

सप्तसुरांची एक स्वामिनी 

नाम तिचे आशा…

अशी ही सुरांची स्वामिनी दोन महाराण्यातील महाराणी आशा भोसले काल आपल्याला सोडून गेली. 92 वर्षाच्या महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख एकेरी करताना प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आपलेपणाच दिसतो. देवाला जसे आपण अरे परमेश्वरा असे म्हणतो तत्वत त्या दोन भगिनींना.. लता आणि आशा अशा… याना एकेरी संबोधनच मिळाली आणि तीच जगातील सर्वात आपलेपणाची भावना आहे असे मला वाटते.

काल टीव्ही वरती एक वाजता अचानक पणे बातमी आली आशाबाई आपल्याला सोडून गेल्या दोन मिनिट धक्काच बसला विश्वास बसेना चार वर्षांपूर्वी एक स्वर हरपला आणि आज दुसरा..! खूप वाईट वाटलं पण शेवटी मन म्हणायला लागलं अरे जगणार किती वर्ष. समृद्ध आयुष्य जगलेल्या जीवाने लोळत घोळत जाणे बरोबर नाही. आशाबाई अशाच उठून निघून गेल्या एका समृद्ध, संघर्षमय, बंडखोर, मिश्किल युगाचा अंत झाला. मंगेशकरांच्या पाच भावंडामधली ही सगळ्यात चुलबुली मुलगी.. एकदा एका मुलाखतीत ऐकले होते.. आशा घरात कुठे सापडली नाहीतर लहानपणी घरातली सारी या मुलीला हुडकायचे तेव्हा त्यांच्या मातोश्री बरोबर सांगायच्या अगं पलीकडच्या गल्लीत बाया शेवाया घालताहेत तिथे गेले असेल शेवया धरायला…! अशा बाईनी लहानपणापासूनच अशा शेवया घाल कुरडया कर पापड्या घाल सांडगे तोडून दे… या सगळ्या गोष्टीत आनंद घेतला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल आणि केवळ तीन वर्षांनी मोठी असलेल्या आपल्या भगिनीलाच सर्वस्व मानून तिचे श्रद्धेने ऐकत त्या मोठ्या झाल्या. लताबाईंवर जबरदस्त विश्वास ती म्हणाली आई वडिलांच्या पायाचे पाणी तीर्थ असते ते प्याल्याने आपले जीवन सुखी होते आणि ते झोपले असताना त्यांच्या पायावरून पाणी घालून ते एका ताटलीत जमा करून तीर्थसारखे प्राशन करणाऱ्या बहिणी… आशा बाईनी हा किस्सा सांगताना सांगितला होता… कदाचित आई-वडिलांच्या पदस्पर्शाच्या त्या पाण्याने आमचे जीवन उजळून निघाले त्यांचा आशीर्वाद लाभला आणि आम्हाला मोठ होता आलं…

मोठं होण्यासारखं काय होतं जवळ? वय अत्यंत लहान पाच भावंड एकट्या आईने काय करावं पैशाची विलक्षण नड दीनानाथ मंगेशकर गेल्यानंतर त्यांना घरी आणावं की नाही का तसेच स्मशानभूमीत न्यावे? हा प्रश्न त्या घराला पडला होता कारण दोनदा टॅक्सी करणे एवढे भाड्याचे पैसे नव्हते तरीही माईनी घरी नेण्याचा निर्णय घेतला ह्या सगळ्या घटनांचा परिणाम लताबाईंवर झाला होता कारण त्या थोड्याशा कळत्या होत्या. बाकी सगळे भावंडे लहानच होती ना मग सगळी श्रद्धा आपल्या मोठ्या बहिणीवर…! सुरांची जादू सगळ्यांजवळच होती लताबाई आपण मेहनत करत आणि इतराना करायला लावत. यौवनात पदार्पण केल्यानंतर आशाबाई थोड्या बंडखोर निघाल्या मनस्वी होत्याच त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतला. गणपतराव भोसले यांच्याशी लहान वयात लग्न केलं ते घरी कोणालाही पसंत नव्हतं तरीही त्यांनी आपला संसार नेटका करायचा प्रयत्न केला खूप गरिबी बघितली. गणपतराव भोसले विलक्षण हिंसक खूप त्रास दिला पण आपण केल आहे आपण निभावायच आहे हा आशाबाईंचा विश्वास ठाम होता, आणि त्यांनी ते केले. ही आशा भोसले यानी सांगितलेला एका मुलाखतीला किस्सा आहे… की मी कोणत्याही साडीवर पांढरा ब्लाउज घालून जात असे कारण माझ्याकडे तो एकच चांगला ब्लाऊज होता जुना ब्लाउज रात्री घालायचा आणि हा धुवून ठेवायचा सकाळी तो ब्लाउज साडीवर घालून रेकॉर्डिंग ला जायचं त्यामुळे दोन्ही खांद्यावर पदर घट्ट लपेटून म्हणलेली त्याची गाणी आपल्याला चित्रीकरणात दिसतात हे सार त्यानी मागे टाकले आणि मेहनतीच्या जोरावर त्या पुढे गेल्या त्यांना कामे मिळताना लताबाईंचाच तर मोठा अडसर होता लताबाईंच्या आवाजाची जादू लोकांवर साम्राज्य करीत होते पण हळूहळू त्यानी आपल्या आवाजाची जादू दाखवायला सुरुवात केली. आपल्या आवाजाचे वेगळेपण दाखवायला सुरुवात केले लताबाईंशी स्पर्धा नाही त्या नेहमी म्हणत लता शेवटी लता आहे..! एका मुलाखतीत तिने सांगितले होते दीदी कडून दाद मिळवणं खूप कठीण… एका गाण्यांमध्ये दोघी एकत्र गात होत्या गाणं होतं… मन क्यू बहका रे बहका आधी रात को… त्यावर अशा बाईंची दुसरे ओळ आहे बेला मेहका रे मेहका आधी रात को… आधी रात हा शब्द त्यांनी इतका सुंदर म्हणलाय लताबाईंनी चष्मा खाली घेतला आणि तिला हसून दाद दिली की अरे वा काय सुंदर हमसे भी आगे हो.. आशाबाईनी सांगितलं असे क्षण खूप कमी पण ते मी जपून ठेवले आहेत.

 लताबाईंपेक्षा वेगळ्या धाटणीची असंख्य गाणी गाऊन सुद्धा म्हणजे कव्वाली भावगीत शास्त्रीय संगीत गायले गझल गायल्यात पाश्चिमात्य घाटाची गाणी गायली. कॅब्रे सॉंग गायलं… इतके वैविध्य आशाबाई देऊ शकल्या तरीही त्या म्हणतात लता ही लताच आहे तो हिमालय आहे हे असं म्हणायला खूप मोठे पण लागत. आपल्या मोठ्या बहिणीबद्दल आदर प्रेम हे सगळं सगळं ओसंडून वाहत होतं लताबाई एखादी गोष्ट नाही म्हणाल्या की आशांनी पुढे जाऊन ते कधीच केलं नाही कारण त्यांना कळून चुकलं होतं कि ती जे सांगते त्यात खूप जास्त तथ्य असते. अनेक डॉलरची बिदागी देऊन आपल्या मुलाच्या लग्नात लता आणि अशांनी गावे अशी इच्छा एका माणसाने व्यक्त केली होती लता दीदीनी त्याला साफ नकार दिला. आशाबाई येतील अशी आशा त्याला वाटत होती लताबाईंनी फक्त एकच वाक्य उच्चारलं… ” लता तू लग्नात जाणार आहेस का गायला? ” ह्या एका वाक्यात सगळं काही भरून होतं आणि आशाबाईने तात्काळ नकार दिला.

आशाबाई बंडखोर होत्या कारण त्या लहान बहीण होत्या हट्ट करणे बंडखोरी करणं हा त्यांचा हक्कच होता पण लताबाई ना ते करून जमणार नव्हतं कारण त्यांच्यावर त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती आपल्या वडिलांचं नाव मोठं करायचं होतं आणि हे करत असताना आपल्या भावंडांनी कुठेही चुकू नये चुकीचा निर्णय घेऊन ये चुकीच्या ठिकाणी गाऊ नये हाच लताबाईंचा उद्देश होता आणि हा त्यांचा हेतू ती सर्व भावंड जाणून होती त्यामुळे लता बाई त्यांच्यासाठी बहीणच नव्हे तर आई बाप सर्वस्व होत्या खूप मुली आपल्या कुटुंबासाठी राबतात पण त्यांची भावंड कदर करतीलच असं नाही लताबाईंच भाग्य मोठं ही सगळ्या भावंडांनी त्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. आशाबाईंच्या प्रत्येक मुलाखतीत लतादीदींबद्दल विलक्षण आदर प्रेम आणि कृतज्ञता दिसून येते.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रिचार्जिन्ग.. मनाचे…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “रिचार्जिन्ग.. मनाचे…” ☆ श्री मंगेश मधुकर

काही गोष्टी ‘मन’ रिचार्ज करतात.

झालं असं की…

ऑफिसच्या कामानिमित्त खूप वर्षांनी बालपण जिथं गेलं त्या भागात जाण्याचा योग आला. दहावीत असताना घर बदललं त्यानंतर इच्छा असूनही तिथं जाता आलं नाही आणि ऑफिसमुळे अनपेक्षित संधी मिळाली.

काम संपेपर्यंत संध्याकाळ झाली. ताबडतोब शाळेजवळ गेलो. खूप वर्षांनंतर ‘शाळा’ पाहताना आठवणींची एकेक फोल्डर उघडली. ‘मन’ पुन्हा शालेय दिवसात रमलं. मोबाइलच्या आवाजानं वास्तवात आलो. भुकेची जाणीव झाल्यावर तिथल्या प्रसिद्ध भेळेची आठवण झाली. ते दुकान अजूनही चालू असेल की नाही असा विचार डोक्यात आला. ‘जाऊन बघू’ म्हणत निघालो. बालपणी पायी तुडवलेल्या गल्ली, बोळातून जाताना भन्नाट फिलिंग होतं. दहा मिनिटांत पोचलो. चक्क दुकान चालू होतं. आजूबाजूला आकर्षक बोर्ड, लखलखाट असलेल्या दुकानांच्या रंगबिरंगी गर्दीत साधा बोर्ड असलेलं भेळेचे दुकान लक्ष वेधून घेत होतं. गाडी पार्क करून दुकानात गेलो आणि आश्चर्याचा धक्का बसला. जवळपास वीसेक वर्षांनी आलेलो तरीही सगळं जसच्या तसं, पंधराजण बसतील एवढीच जागा, पन्नास वर्षाच्या वाटचालीविषयीची कात्रणं भिंतीवर लावलेली. सोबतच गिऱ्हाईकांनी काय करावे आणि काय करू नये याविषयी आदेशवजा विनम्र सूचनांचा बोर्ड, तिथंच तीन प्रकारच्या भेळीचं मेनूकार्ड, लाकडी बाक, जुन्या धाटणीचं टेबल, त्यावर चिंचेच्या पाण्याचा स्टीलचा तांब्या आणि शेजारी हिरव्या चटणीचं भांडं, समोरच भेळ करण्याच्या तयारीत मश्गुल मालक, गंमत वाटली लहान असताना यायचो तेव्हाही दुकानात कामगार नव्हते आताही नाही. सगळी कामं मालक आणि कुटुंबीयच करत होते. आवडीच्या भेळेची ऑर्डर दिली. पहिला घास खाल्ल्यावर ‘वाह!! ’ आपसूक तोंडातून निघाले. अजूनही ‘चव’ तशीच. यत्किंचितही बदल नाही. चिंचेचं पाणी, चटणी घेतली आणि उदरभरणात गुंग झालो. मन तृप्त झालं. तीन भेळ पार्सल घेतल्या. बिल देण्यासाठी काउंटरवर गेलो तेव्हा तिशीतले मालक आपल्या मुलाला ‘भेळ’ बनवायला शिकवत होते.

“वा, भेळ वारसा पुढच्या पिढीकडे.. ”मी बोलल्यावर मालक फक्त हसले.

“खूप वर्षापूर्वी तुमच्या वडीलांना असंच शिकवताना पाहिलं होतं. ”तिथल्या फोटोकडे बोट दाखवत म्हणालो.

“म्हणजे तुम्ही!! ”

“इथली भेळ एक रुपयाला मिळायची तेव्हापासून खातोय. नऊवारीतल्या आजी काउंटर सांभाळायच्या आणि पांढरा पायजमा, हाफ शर्टातले वडील सगळी कामं करायचे. आता तुम्ही आणि नंतर हा छोटा.. पिढी बदलली पण चव नाही. वा!! तात्पुरतेपणाला महत्व असलेल्या काळात वारसा जपला जातोय हे महत्वाचं. छान वाटलं. खूप शुभेच्छा!! ”खुष झालेल्या मालकांनी हातात श्रीखंडाची वडी ठेवली. त्यांच्यासोबत छानपैकी सेल्फी घेऊन निघालो. जुनं जाऊन नवीन येणं हे निसर्गाचं चक्र. आयुष्यही तसंच चालू असतं पण काही परंपरा, वास्तु, ठिकाणं हे पुन्हा जुन्या काळात घेऊन जातात. भेळीच्या निमित्तानं अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या. मस्त वाटलं. घरी पोचलो तरी मन आठवणीतच रेंगाळलेलं.

वास्तव विसरायला लावणारी अशी ठिकाणं असतात. जिथं पद, प्रतिष्ठा, अहं काही आडवं येत नाही. अशा ठिकाणी वेळ काढून भेट द्या. भारी वाटेल.

“दिल ढूंढता हैं, फिर वही फुरसत के रात दिन…

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशीही असते चॅरिटी.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ अशीही असते चॅरिटी.. – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

अशीही असते चॅरिटी‘!!!’

*”माझ्या गरिबीला कंटाळून तू मला सोडलं होतंस ना? बघ आज मी या जिल्ह्याचा कलेक्टर आहे! ” साहेबांनी भर शाळेत घटस्फोटित बायकोचा अपमान केला… पण जेव्हा मुख्याध्यापकांनी सत्य सांगितलं, तेव्हा साहेबांचा श्वासच कोंडला! *

*वाशिम जिल्ह्यातील ‘शिरपूर’ गावची ती एक जुनी जिल्हा परिषद (ZP) शाळा. सकाळची वेळ होती. अचानक शाळेच्या गेटवर पोलिसांच्या गाड्या आणि लाल दिव्याची गाडी येऊन थांबली. वाशिम जिल्ह्याचे नवे आणि अत्यंत कडक शिस्तीचे ‘जिल्हाधिकारी’ (Collector) अविनाश पाटील साहेब शाळेच्या अचानक तपासणीसाठी (Surprise Visit) आले होते. *

अविनाश साहेब रुबाबात गाडीतून उतरले. मुख्याध्यापक आणि शिक्षक घाबरून स्वागताला धावले. साहेब एक-एक वर्ग तपासत पुढे जात होते. सातवीच्या वर्गात साहेब शिरले आणि फळ्यावर गणितं शिकवणाऱ्या शिक्षिकेने मागे वळून पाहिलं. साहेबांची पावलं तिथेच थबकली! त्यांचा श्वास एका सेकंदासाठी रोखला गेला.

ती शिक्षिका दुसरी कुणी नसून अविनाशची घटस्फोटित बायको, ‘पल्लवी’ होती! अंगावर एक अत्यंत साधी, विटलेली सुती साडी, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर एक अजीब शांतता. पाच वर्षांनंतर ते दोघे असे समोरासमोर आले होते. पल्लवीच्या हातातला खडू खाली पडला, पण तिने स्वतःला सावरले आणि ती गप्प उभी राहिली.

तो ५ वर्षांपूर्वीचा कटू भूतकाळ:

पाच वर्षांपूर्वी अविनाश पुण्यात यूपीएससी (UPSC) ची तयारी करत होता आणि पल्लवी एका खाजगी शाळेत ५-७ हजारांवर शिक्षिका होती. अविनाशचे सलग ३ प्रयत्न अपयशी ठरले होते. घरात भयंकर गरिबी होती. नातेवाईक त्याला ‘निकम्मा’ आणि ‘बायकोच्या पैशांवर जगणारा’ म्हणून हिणवायचे.

एके दिवशी पल्लवीने अचानक अविनाशसोबत भयंकर भांडण काढलं. ती जोरात ओरडली होती, “मला तुझ्या या फालतू संघर्षाला कंटाळा आलाय! तू आयुष्यात कधीच एक रुपया कमवू शकणार नाहीस. मी माझा जन्म तुझ्यासोबत गरिबीत सडवू शकत नाही! ” त्या एका अपमानाने अविनाशचा पुरुषी अहंकार दुखावला गेला. रागाच्या भरात दोघांचा घटस्फोट झाला. अविनाश दिल्लीला गेला आणि पल्लवीने वाशिमसारख्या एका मागास गावात बदली मागून घेतली.

तो अपमानाचा प्रसंग आणि साहेबांचा अहंकार:

आज तोच ‘निकम्मा’ नवरा या जिल्ह्याचा राजा (कलेक्टर) बनून तिच्यासमोर उभा होता. अविनाशने शाळेची तपासणी संपवली आणि पल्लवीला मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलावले.

केबिनमध्ये फक्त मुख्याध्यापक, अविनाश आणि पल्लवी होते. अविनाशने अत्यंत तुसडेपणाने आणि गर्वात पल्लवीकडे बघून म्हटलं,

“काय मॅडम? पाच वर्षांपूर्वी माझ्या गरिबीला आणि बेरोजगारीला कंटाळून तुम्ही मला सोडून गेला होतात ना? तुम्हाला वाटलं होतं मी रस्त्यावर येईन. पण आज डोळे उघडून बघा… तोच ‘निकम्मा’ नवरा आज या पूर्ण जिल्ह्याचा ‘कलेक्टर’ बनून तुमच्यासमोर बसलाय! आणि तुम्ही? तुम्ही आजही या खेड्यातल्या फाटक्या शाळेत ५० पोरांना शिकवत खितपत पडला आहात. आज तुम्हाला तुमच्या निर्णयाचा नक्कीच पश्चात्ताप होत असेल! ”

पल्लवी काहीच बोलली नाही. तिने फक्त डोळे खाली वळवले आणि तिच्या गालावरून एक अश्रू खाली ओघळला. ती केबिनच्या बाहेर जायला वळली.

तो सत्याचा स्फोट आणि पायाखालची जमीन सरकवणारा प्रसंग:

तेवढ्यात वयस्कर मुख्याध्यापक (शिंदे सर) पुढे आले आणि त्यांनी पल्लवीला थांबवले.

“पल्लवी मॅडम, आज साहेबांना सत्य सांगाच… नाहीतर हे आयुष्यभर तुम्हाला स्वार्थी समजतील! ”

अविनाशने रागाने विचारले, “कोणतं सत्य शिंदे सर? हिने स्वतःच्या स्वार्थासाठी मला सोडलं होतं, हेच सत्य आहे. ”

शिंदे सरांचे डोळे पाणावले होते. ते साहेबांच्या टेबलाजवळ आले आणि म्हणाले,

*”साहेब, तुम्ही पुस्तके वाचून कलेक्टर झालात, पण माणसं वाचायला पार विसरलात! पाच वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही पुण्यातून दिल्लीला गेलात, तेव्हा दिल्लीच्या ‘संकल्प आयएएस (IAS) अकॅडमीची’ दीड लाखांची फी आणि तुमच्या दर महिन्याच्या मेसचे (जेवणाचे) ४ हजार रुपये कोण भरायचं… याची तुम्ही कधी चौकशी केली का? ”

अविनाश अवाक् झाला. “ते… ते तर मला एका ‘चॅरिटेबल ट्रस्ट’ कडून स्कॉलरशिप मिळत होती. ”

शिंदे सर अत्यंत जड आवाजात म्हणाले,

*”साहेब… ती कोणतीच स्कॉलरशिप नव्हती! या पल्लवी मॅडमने बँकेतून ५ लाखांचं पर्सनल लोन काढलं होतं आणि एका ओळखीच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या दर महिन्याला गुपचूप तुमच्या दिल्लीच्या क्लासची फी भरायच्या!

तुमच्या नातेवाईकांचे टोमणे आणि पैशांची तंगी तुमच्या ध्येयाच्या आड येत होती. तुमचा स्वाभिमान बायकोचे पैसे कधीच घेणार नाही, हे पल्लवी मॅडमला माहीत होतं. म्हणून त्यांनी स्वतःला ‘स्वार्थी’ आणि ‘वाईट बायको’ ठरवून तुमच्याशी भांडण केलं… जेणेकरून रागाच्या आणि सूडाच्या आगीत का होईना, पण तुम्ही दिल्लीला जाऊन कलेक्टर बनाल! साहेब… या माऊलीने स्वतःच्या अंगावर साधी नवी साडी घेतली नाही, एक वेळ उपाशी राहिली, पण या फाटक्या शाळेत राहून तिने तुमच्या यशाचा महाल उभा केलाय! “*

अहंकाराचा शेवट आणि पश्चात्तापाचे अश्रू:

हे शब्द ऐकताच कलेक्टर अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली! त्याचा श्वास अक्षरशः कोंडला गेला! ज्या खुर्चीवर बसून तो पल्लवीचा अपमान करत होता, ती खुर्ची तिच्याच रक्ता-घामातून बनली होती!

अविनाश वेड्यासारखा खुर्चीवरून उठला आणि त्याने कोणताच विचार न करता, त्या जिल्हा परिषदेच्या केबिनमध्ये थेट पल्लवीच्या पायांवर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार घातला!

तो लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला… “पल्लवी… मला माफ कर! मी नीच आहे. माझ्या यशाच्या अहंकाराने मला आंधळं केलं होतं. तू माझं घर नाही सोडलंस, तू स्वतःला जाळून माझ्या आयुष्यात प्रकाश आणलास! मला शिक्षेचा अधिकार दे, पण मला सोडून नको जाऊस… ”

पल्लवीने रडत त्याला उठवले. त्या दिवशी एका कलेक्टरचा सगळा रुबाब आणि माज एका साध्या झेडपी (ZP) शिक्षिकेच्या त्यागासमोर कायमचा मातीत मिसळला होता. सत्याचा आणि खऱ्या प्रेमाचा असा विजय झाला होता, ज्याने जिल्ह्याच्या राजालाही गुडघे टेकायला भाग पाडले!

आई-वडील आणि बायकोच्या पडद्यामागच्या त्यागाला विसरून, स्वतःच्या यशाचा माज असणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा*

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मोरारजी देसाई सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी अटलजींकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत अटलजींनी भारत -चीन आणि भारत – पाक संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. १९७९ मध्ये ते चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. अटलजींनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. विदेशमंत्री म्हणून १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदी भाषेबद्दल प्रेम असलेल्या अटलजींनी हिंदीतच भाषण करण्याचे ठरवले. राष्ट्रसंघात हिंदीला मान्यता नव्हती. त्यामुळे हिंदीत भाषण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले 

गूंजी  हिंदी विश्वमें 

स्वप्न हुआ साकार 

राष्ट्रसंघ के मंच से 

हिंदी की जयकार!

अटलजींनी आपल्या कार्यकाळात पुढील काही अत्यंत महत्वाची कामे केली. 11 आणि 13 मे 1998 ला पोखरण येथे पाच भुमिगत परमाणु परिक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले. ही सगळी प्रक्रिया अत्यंत गोपनीयरित्या पार पाडली गेली. या भारताने टाकलेल्या यशस्वी आणि धाडसी पावलांमुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना धक्का बसून त्यांनी अनेक अटी भारतावर लादल्या. पण वाजपेयी सरकारने या सर्व गोष्टींचा खंबीरपणे सामना केला.

19 फेब्रुवारी 1999 ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता पुढाकार घेत सदा. ए. सरहद नावाने दिल्ली ते लाहौर बस सेवा सुरू करण्यात येऊन स्वतः वाजपेयी पाकिस्तानला जाऊन आले. भारत पाक संबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. महत्वाची शहरे महामार्गांनी जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भुज परियोजना कार्यान्वित केली. 100 वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला कावेरी जलविवाद सोडविला.

देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला: कोकण रेल्वे व नव्या टेलीकाॅम नितीची सुरूवात करून पायाभूत विकास करण्याकरीता पाऊले उचलली. आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली त्यामुळे कामांचा वेग वाढला. याशिवाय लोकहिताच्या दृष्टीने अनेक महत्वाची कामे तडीस नेली.

अटलजी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी. संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक. काव्यशास्त्र विनोदात रमणारा एक जिंदादिल माणूस… राजकारणाच्या धामधुमीतही अटलजींची काव्य आणि लेखन प्रतिभा कार्यरत होती. मेरी संसदीय यात्रा, मेरी इक्यावन कविताये, संकल्प काल, शक्ती से शांती, फोर डीकेड्स इन पार्लमेंट, कैदी कविराज की कुंडलिया आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. जीवनाबद्दल एका कवितेत सुरेख भाष्य करतात 

 जन्म मरण का अविरत फेरा

जीवन बंजारो का डेरा

आज यहाँ कल कहाँ कूच  है

कौन जानता किधर सवेरा…

भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला आणि दिशाहीनांना नवी दिशा देत होती.

हम पडाव को समझे मंझिल

लक्ष्य हुआ आँखो से ओझल

वर्तमान के मोहजाल मे

आनेवाला कल न भुलाए

आओ फिर से दिया जलाएँ…

आपल्या वाणीनं सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे अटलजी तसे मितभाषी होते. त्यांना निसर्गात रमायला, निसर्गाची विविध रुपं बघायला आवडायची. ते संगीताचेत्यांचा छंद होता. गीत रामायण ऐकायला त्यांना अतिशय आवडायचं. त्यामुळे बाबुजींशी म्हणजेच सुधीर फडकेंशी त्यांची खास मैत्री होती. भीमसेन जोशींनाही ऐकायला ते अतिशय उत्सुक असत. भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असतानापुण्यात झाली होती. पण कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी कणखर भूमिका घेतली.

दांव पर सब कुछ लगा है

रुक नही सकते, टूट सकते

है मगर हम झुक नही सकते…

ते आपल्या कवितांबद्दल बोलताना म्हणतात 

’’माझ्या कविता म्हणजे युध्दाची घोषणा करण्यासारख्या आहेत ज्यात हारण्याची भिती नाही, माझ्या कवितांमधे सैनिकाला हरण्याची भिती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमधे भिती चा आवाज नव्हें तर जिंकण्याचा जयघोष असेल. ’’

अटलजींना आपल्या आयुष्यात अनेक मोठमोठे सन्मानाचे पुरस्कार लाभले. या विद्वान, कवी मनाच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याचा गौरव 25 डिसेंबर 2014 ला भारताचा सर्वोच्च पुरस्कार ’’भारतरत्न’’ देण्यासाठी देऊन करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः 27 मार्च 2015 ला अटलजींच्या घरी त्यांना हा पुरस्कार देण्याकरता गेले. अटलजींना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांनी भारतवासीयांच्या हृदयात कायमचे आदराचे स्थान मिळाले आहे. हीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे.

२५ डिसेंबर हा अटलजींचा जन्मदिवस “गुड गव्हर्नन्स डे” अर्थात “सुशासन दिन” म्हणून साजरा केला जातो. आजच्या काळात खरी गरज अटलजींसारख्या स्वच्छ, चारित्र्यवान, अभ्यासू आणि निष्कलंक नेत्यांची आहे. अटलजी आज जरी आपल्यात नसले तरी जीवन कसं जगावं याचा आदर्श त्यांनी आपल्या उदाहरणातून घालून दिला आहे. ज्यांना वाजपेयींना समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्या विविध विषयावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांचा जरूर अभ्यास करावा.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “साळिंदराचं कोडं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “साळिंदराचं कोडं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

साळिंदराचं कोडं (Porcupine Dilemma)

जवळ यायचं की लांब राहायचं? तुम्हाला वाटतं की प्रेमात किंवा मैत्रीत जितकं जास्त जवळ जाल, तितकं जास्त सुख मिळेल? तर मग तुम्ही स्वतःला एका मोठ्या संकटात ढकलत आहात.

खरं तर, माणसांच्या बाबतीत ‘अति जवळीक’ हेच दुःखाचं सर्वात मोठं कारण असतं. नात्यातलं अंतर कमी करणं म्हणजे आनंदाची खात्री नसून, तो दुखापतीला दिलेलं आमंत्रण असू शकतं.

१८५१ सालची गोष्ट आहे… आर्थर शोपेनहॉवर नावाच्या एका जर्मन तत्त्वज्ञानं जगाला एक अजब विचार दिला. याला ‘पोरक्युपाइन डिलेमा’ किंवा ‘साळिंदराचं कोडं’ म्हणतात.

आता तुम्ही म्हणाल, माणसाच्या आयुष्याचा आणि काट्यांनी भरलेल्या साळिंदराचा काय संबंध? ऐका तर, हा संबंध तुमच्या-आमच्या रोजच्या जगण्याशी आणि तुटणाऱ्या नात्यांशी जोडलेला आहे!

कल्पना करा, की कडाक्याची थंडी पडलीय. बर्फाचा थर साचलाय आणि अशा वातावरणात साळिंदरांचा एक कळप थंडीनं कुडकुडतोय. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना ऊब हवीय.

साहजिकच, उबेसाठी ते एकमेकांच्या जवळ येतात. पण जसे ते एकमेकांना चिकटून उभे राहतात, तसे त्यांच्या अंगावरचे तीक्ष्ण काटे एकमेकांना टोचू लागतात. वेदना असह्य झाली की ते लांब पळतात. लांब गेले की पुन्हा थंडी वाजू लागते. मग उबेसाठी पुन्हा जवळ येतात, आणि पुन्हा तेच काटे टोचतात.

हा खेळ असाच सुरू राहतो. जोपर्यंत त्यांना एक असं ‘योग्य अंतर’ सापडत नाही, जिथं त्यांना एकमेकांची ऊबही मिळेल आणि कोणाचे काटेही टोचणार नाहीत.

माणसाचंही अगदी असंच असतं… आपल्याला एकटं वाटतं, एकाकीपणाची भीती वाटते, म्हणून आपण नात्यांच्या शोधात असतो. कुणाच्या तरी जवळ जावंसं वाटतं, कुणाशी तरी मन मोकळं करावंसं वाटतं…

परंतु जसं आपण कुणाच्या तरी खूप जवळ जातो, तसे समोरच्याचे ‘काटे’ आपल्याला टोचू लागतात.

हे काटे म्हणजे काय? तर समोरच्याचे स्वभावदोष, त्यांच्या सवयी, त्यांचा अहंकार किंवा त्यांचे विचार. आपण जितके जवळ जातो, तितके त्यांचे हे दोष आपल्याला स्पष्ट दिसू लागतात आणि मग सुरू होतो संघर्षाचा प्रवास… आणि आपल्याला वाटतं की, यापेक्षा लांब राहिलेलं बरं होतं!

आज  २०२६ मध्ये, जेव्हा आपण डिजिटल जगात एकमेकांशी २४ तास जोडलेले आहोत, तेव्हा हा ‘साळिंदराचा पेच’ अधिकच गंभीर झालाय.

अलीकडच्या काही संशोधनांतून असं समोर आलंय की, सोशल मीडियामुळं आपण लोकांच्या व्हर्च्युअली इतके जवळ गेलो आहोत की, त्यांच्या खाजगी आयुष्यातले ‘काटे’ आपल्याला सतत टोचत राहतात. त्यामुळं आजकाल त्यामध्ये लवकर ‘बर्नआउट’ जाणवतोय.

शोपेनहॉवरनं यावर एक जालीम उपाय सांगितला होता… तो म्हणजे, ‘सन्मानजनक अंतर’ (Polite Distance).

नात्यात पूर्णपणे विरघळून जाणं किंवा पूर्णपणे लांब जाणं, या दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत. सुखी व्हायचं असेल तर दोन साळिंदरांसारखं असं अंतर राखायला हवं, जिथं प्रेमाची ऊबही टिकून राहील आणि स्वाभिमानाला धक्काही लागणार नाही.

अनेकदा आपण प्रेमाच्या नादात समोरच्याच्या वैयक्तिक अवकाशात (Personal Space) शिरतो, आणि मग तक्रार करतो की, नात्यात गुदमरल्यासारखं होतंय.

थांबा, अजून पुढं ऐका… ही समस्या फक्त जोडप्यांची नाहीये. आई-वडील आणि मुलं, जिवलग मित्र किंवा ऑफिसमधले सहकारी, या सगळ्यांना हे साळिंदराचं तत्त्व लागू पडतं.

याचा अर्थ असा नाही की जवळ जाऊच नका… याचा अर्थ असा आहे की, डोंगर चढताना त्याचे दगडधोंडे टोचणारच, हे स्वीकारून योग्य अंतर राखा. शिष्टाचार आणि मर्यादा या नात्यातल्या भिंती नसून, ती नात्याला वाचवणारी कुंपणं आहेत.

आजच्या या धावपळीच्या आणि ‘ओव्हर-शेअरिंग’च्या जगात तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांपासून किती अंतर राखून आहात? विचार करा, तुम्ही उबेसाठी जवळ जाताय की एकमेकांना टोचण्यासाठी?

शेवटी प्रश्न उरतोच… आपण उबेसाठी टोचून घ्यायला तयार आहोत की थंडीत कुडकुडत एकटं राहायला? की आपण ते सुवर्णमध्य गाठणारं ‘अंतर’ शोधण्यात यशस्वी झालो आहोत…?

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हौसेचं फसलेलं गणित… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हौसेचं फसलेलं गणित... ? श्री आशिष  बिवलकर ☆

लग्नात कपड्याच्या हौसेला,

पैशाचं मोल कधीच ते नसतं |

कोपलेल्या सूर्यनारायणापुढे,

मात्र हौसेचं गणित मात्र फसतं |

*

रेमंडचा थ्री पीस सूट शिवून,

लग्नात ऐटीत होता मिरवणार |

मुलीकडच्यांची पोशाखात,

नवरदेव म्हणाला जिरवणार |

*

इतकी वर्षे रखडलेला उपवर,

यंदा मात्र नशिबाने लग्न जुळलं |

समोरची पार्टी पैशाने मजबूत,

तिथंच गड्याचं नशीब फळलं |

*

बँडबाजा वरात सनई चौघडा,

हट्टाने मान्य करुन घेतलं मागून |

वैशाखातच चांगला मुहूर्त आहे,

थाटात लग्न बैठकीत गेला सांगून |

*

वैशाख वणव्यात थ्री पीस सोडा,

चड्डी बनियान घालून तो पाटावर |

पाहून लग्न सोहळा वऱ्हाड्यांनी,

यथेच्छ ताव तो मारला ताटावर |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रेमसखा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्रेमसखा! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

रंगारी साऱ्या दुनियेचा 

धरून बैसला कुंचला,

चितारी तन्मयतेने मग 

हृदयी वसल्या राधेला!

*
कर्णफुले कानी दोन 

प्रेम रंगात रंगवली,

नील कांती मुखावरची 

खुलवी ओठांची लाली!

*

मुग्ध भाषा दो नयनांची 

सौन्दर्य मुखाचे वाढवी,

बिंदीसवे कनक मुकुट 

केशसंभार तो खुलवी!

*

प्रेम नजरेने बघता तिला 

वाटे आत्ता जिवंत होईल,

दिसता प्रेमसखा सामोरी 

मिठीत त्याच्या विरघळेल!

मिठीत त्याच्या विरघळेल!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # २८२ – संकल्पित रहो…२ ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता – संकल्पित रहो…।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # २८२ – संकल्पित रहो – १ ✍

लूट, हत्या, बलात्कार

आज/समाज

बेशर्मी की चादर ओढ़कर सो गया है

इसीलिये भ्रष्टाचार/ राष्ट्रीय धर्म हो गया है।

ईमान को दकियानूसी

और अहिंसा को कहा जा रहा है

कायरता का पर्याय

हाय!

क्या हो गया है मुझे और मेरे देश को

कौन तोड़ेगा जड़ता के परिवेश को?

शायद

झंकृत हो रहे हैं कृष्ण चेतना के तार

खुल रहे हैं किरनों के द्वार

कोई कहता है

कैसे हुआ होगा/ सृष्टि का जन्म और विस्तार

और हर बार कैसे होता है संहार!

है

अन्तः करण होता है मुखर

निकलते हैं स्वर

जब सम्बन्धों की सुगंध चुक जाती है।

जीवन की प्रगति रुक जाती है

और आरंभ होता है/ महाप्रलय महाविनाश

काश ! हम सोचते

कि हम अमृतपुत्र हैं

हमारी जिन्दगी वरदान है बाजार नहीं

और हम

मनुष्य हैं चीज नहीं

मगर हमें इतना भी तमीज नहीं

हम भूलते हैं भ्रमते हैं

और बाट जोहते हैं।

किसी अवतार की

गौतम, महावीर शंकराचार्य

या गाँधी की

 

या किसी चमत्कारिक आँधी की ।

दोस्तो!

चमत्कार एक भ्रम है

अट्टू अथक श्रम ही

परिवर्तन का उद्गम है।

संकल्पित रहो

आतंक का अंगुलिमाल

शरण में आयेगा

मन की दृढ़ता से

पूरा पर्यावरण शुद्ध हो जायेगा।

क्रमशः…

स्व डॉ. राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # २८१ “माँ तो माँ है, नहीं…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत माँ तो माँ है, नहीं...”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # २८१ ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “माँ तो माँ है, नहीं...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी 

सिकुडी, सिमटी पडी हुई

खटिया पर बूढ़ी माँ ।

जैसे फँसी हुई लकड़ी

में कोई चूड़ी, माँ ॥

 

फिर भी दिया करे

आशीषें सभी सदस्यों को ।

हाथ जोड़ कर रचती है

करुणा के दृश्यों को ।

 

और निरंतर किडनी की

बीमारी के कारण –

सूज गई है देह, लगे

ज्यों फूली पूड़ी, माँ ॥

 

इतनी बीमारी फिर भी

कुछ करने की चाहत ।

उसकी आँखों में दिखती

न मिल पाती राहत –

 

लेटे-लेटे चिल्लाती –

लाओ मैं कर देती

नहीं हो चुकी हूँ अब

इतनी भी मैं बूढ़ी,माँ ।

 

माँ तो माँ है, नहीं

समझते हैं तीनों बेटे ।

लगी हुई माँ किस

उधेड़ बुन में लेटे – लेटे

 

बहुओं को यों तो वह

चौकीदार सरीखी है ।

लेकिन काम बताये तो

लगती है जूड़ी*  माँ ॥

जूड़ी = बुखार का एक प्रकार

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

06-04-2026

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – दशरथ मांझी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – दशरथ मांझी ? ?

वे खड़े करते रहे,

मेरे इर्द-गिर्द

समस्याओं के पहाड़,

धीरे-धीरे….,

मेरे भीतर

पनपता रहा

एक ‘दशरथ मांझी,

धीरे-धीरे…!

(*दशरथ मांझी- 25 फुट ऊँचे पहाड़ को 22 वर्ष अकेले दम काटकर 360 फुट लम्बी सड़क बनाने वाले पर्वत-पुरुष।)

?

© संजय भारद्वाज  

रात्रि 8:17, 7.4. 23

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ हनुमान साधना संपन्न हुई. अगली साधना की जानकारी आपको शीघ्र दी जावेगी। 🕉️💥 

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares