हिन्दी साहित्य – कविता ☆ नवरात्रि विशेष☆ देवी गीत – महिमा मां बड़ी तुम्हारी है …….. ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

( आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित नवरात्रि पर्व पर विशेष  देवी गीत महिमा मां बड़ी तुम्हारी है……..। ) 

☆ नवरात्रि विशेष  ☆ देवी गीत – महिमा मां बड़ी तुम्हारी है …….. ☆

नवरात्रि पर्व में पूजा की महिमा मां बड़ी तुम्हारी है

हर गाँव शह , घर घर जन जन में पूजा की तैयारी है

 

सबके मन भाव सुमन विकसे, मौसम उमंग से पुलकित है

हर मंदिर मढ़िया देवालय में, भीड़ भक्त की भारी है

 

सात्विक मन की पूजा सबकी होती अक्सर है फलदायी

संसार तुम्हारी करुणा का, मां युग युग से आभारी है

 

श्रद्धा के सुमन भरा करते, जीवन में  मधुर सुगंध सदा

आशीष चाहता इससे मां, तेरा हर चरण पुजारी है

 

अनुराग और विश्वास जिन्हें है अडिग तुम्हारे चरणों में

उन पर करुणा की वर्षा करने की माता अब बारी है

 

कई रूपों, नामों धामों में, है व्याप्त तुम्हारी चेतनता

अति भव्य शक्ति, गुण की, महिमा तव जग में हे माँ न्यारी है

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए १ ,विद्युत मण्डल कालोनी , रामपुर , जबलपुर

vivek1959@yahoo.co.in

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – ६ ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

तांबडी जोगेश्वरी या पुण्याच्या ग्रामदेवतेचे मंदिर स्थापनेपासून व त्यानंतरचे पेशवेकालीन वर्णन आजच्या चारोळ्यांमध्ये गुंफलं आहे.

रुणुझुणुत्या पाखरा

या चालीवर म्हणून पहाव्यात खूप छान वाटतात.

– साधक उर्मिला इंगळे

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -६ ?

!!श्रीराम समर्थ!!

 

जोगेश्वरी तांबडी ती

ग्रामदेवता पुण्याची

ग्राम संरक्षक देवी

वर्षे तीनशें पूर्वीची !!

 

आहे उल्लेख पुराणीं

नाम तिचे योगेश्वरी

रुप प्राकृत तियेचे

शोभे नाम जोगेश्वरी !!

 

वध ताम्रासुराचा तो

पराक्रम करणारी

चतुर्भुजा स्वयंभू ती

नवसाला पावणारी !!

 

हाती डमरु त्रिशूळ

पानपात्र नि मुंडके

ताम्रासुरास वधून

रुप आगळे झळके !!

 

मूर्ती रहस्य आख्यान

जीव शिव एकरुप

पुण्यामध्ये स्थिरावले

जोगेश्वरी निजरुप !!

 

दिले खाजगीवाल्यांनी

बांधुनिया देवालय

जिवाजीने दिली जागा

उभे राहिले आलंय !!

 

झाले प्रसिद्ध मंदिर

येता पेशवे पुण्याला

भट श्रीवर्धनकर

आले पुण्य उदयाला !!

 

होते दुर्मिळ दर्शन

दूर होती योगेश्वरी

पुण्यामध्ये विसावली

जगन्माता जोगेश्वरी !!

 

लग्न मुंजीच्या अक्षता

येती वाजत गाजत

जोगेश्वरी आशीर्वाद

करी लक्षुमी स्वागत !!

 

रमा सगुणा पार्वती

पेशव्यांचा राणीवसा

राधा आनंदी जानकी

जोगेश्वरी वाणवसा !!

 

दिली अक्षत देवीस

लग्न द्विबाजीरावांचे

अमृत नी विनायक

व्रतबंध पेशव्यांचे !!

 

माधवराव पेशवे ते

जातायेता मोहीमेस

जोगेश्वरी देवालयी

येत होते दर्शनास !!

 

जोगेश्वरी पालखीत

सणावारी मिरविते

पेठेपेठेतुनी माता

मुख दर्शन दाविते !!

 

नवरात्री जोगेश्वरी

जाई तुळजापुरास

पेशव्यांचा लवाजमा

भवानीच्या दर्शनास !!

क्रमश:. ….

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घालमेल ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ कवितेचा उत्सव ☆ घालमेल ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

करोनाचा विळखा

घट्ट होत चाललाय

माणूस परिस्थितीचा

गुलाम होऊ घातलाय

 

करोनाने माणसाला

अगदी पेचात टाकलंय

जणू आभाळाने क्षितिजाला

घेरून टाकलय

 

शाश्वत असा सूर्य

उद्या क्षितिजावर उगवेल

पण आशेचा किरण कोणता

हे माणसाला कसे उमगेल?

 

दुसऱ्याच्या दुःखाने

खरंच काळजात चर्र होते

पण इतके वरवरचे की

लगेचच विसरते

 

आपण आपले बरे

दुसरे गेले उडत

बेदरकार विचारांची

मन का ठेवते पत?

 

परदुःख शीतल

परिणीती झाली आज

लाज वाटली स्वतःची

मन झाले नाराज

 

बातमी एखादी जीवघेणी

काळीज पार वितळवते

वयच होते कारणीभूत

म्हणून मृत्यूला स्वीकारते

 

भडका आगीचा उठत नाही

घरात जोवर ठिणगी पडत नाही

आज सुपात तर उद्या जात्यात

याची जाणीव कशी होत नाही?

 

पोट भरून ढेकर दिलेले

पैशाचा ऊहापोह करतात

गरीब बिचारे मृत्यूला

गृहीत धरून चालतात

 

गरीब-श्रीमंत लहान-थोर

भेदभाव न करोनाच्या ठाई

जो तो आपल्या प्राक्तनाच्या

वेटोळ्यामध्ये अडकला जाई

 

माणसाला माणसापासून

दूर लोटलंस देवा

मनात असून देखील

घडत नाही की रे सेवा!

 

तेहतीस कोटी देवांना

आर्जव आहे दीनवाणी

नात्यांची पकड सैल नका करू

हीच तुम्हा चरणी विनवणी

 

नको विवंचना नको भ्रांत

चुकले माकले कर माफ

लेकराला घे पदरात

अन् कर मन साफ

 

दुःख झाले अतोनात

मन झाले जड

तुझ्याशिवाय कुणाला सांगू

अन् विषयाला लावू कड?

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

jvilasjoshi@yahoo.co.in

9822553857

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे अंबे ! जगदंबे ! ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ हे अंबे ! जगदंबे ! ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

 

 

हे अंबे!जगदंबे!धाव घेई झडकरी

षड्रिपुचे महिष तूच, टाक गे विदारुनी

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर दाटले

छेद पटल दूर सार, रिपु भारी पातले

विश्वजननी आस तुझी, दाटली उरातुनी

अधीर मना धीर द, धाव पंचतत्वातुनी

तेज तूच, तूच आप, तूच वायु, तू धरा

व्यापिलेस व्योम सर्व, मम मनाच्या प्रांगणी

मी कन्या तव माते, अज्ञ आहे जाणुनी

तव क्रुपे बरसु दे, काव्यगंगा रोमातुनी

शक्तिदात्री, स्फूर्तीदात्री, करवीर निवासिनी

छत्र तुझे मज लाभो, प्रार्थिते मनोमनी.

 

 © सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – कृतघ्न वाघ ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – कृतघ्न वाघ ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ३. कृतघ्न वाघ

एका अरण्यात एक वाघ रहात होता. अरण्यातील प्राण्यांना मारून तो आपली उपजीविका करीत असे. एकदा त्याने रानातील रेड्याला मारून त्याचे भक्षण केले. तेव्हा रेड्याचे एक हाड वाघाच्या दातात अडकले व चिकटून बसले. त्याने ते काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण व्यर्थ! ते हाड काही केल्या निघेना. दातातून पू व रक्त वाहू लागले. तो वेदनेने तळमळू लागला.शेवटी तो वाघ झाडाच्या बुंध्यापाशी जबडा पसरून बसला. हे हाड कसे निघेल? मी जिवंत राहीन की नाही? काय करावे? या विचारांनी वाघ चिंताग्रस्त झाला.

अचानक त्याचे लक्ष झाडावर बसलेल्या कावळ्याकडे गेले. अंधःकारात जणू दीपदर्शनच!  त्याने कावळ्याला आपली व्यथा कथन केली. पुढे तो कावळ्याला म्हणाला, “जर तू माझ्या मुखातून हाड काढून मला जीवदान दिलेस, तर मी तुला दररोज मी शिकार केलेल्या प्राण्याचे मांस तुझ्या अपेक्षेप्रमाणे देईन. माझ्यावर एवढे उपकार कर.” वाघाने वारंवार प्रार्थना केल्याने व त्या पशुश्रेष्ठाचे दुःख पाहून कावळ्याला दया आली. वाघाच्या मुखात प्रवेश करून त्याने ते हाड काढले, व वाघाला वेदनामुक्त केले.

नंतर वचन दिल्याप्रमाणे, ”आता तू मला मांस दे” अशी कावळ्याने वाघाला विनंती केली. तेव्हा, “माझ्या मुखात प्रवेश करून तू मला त्रास दिलास, त्यामुळे मी असंतुष्ट आहे. तू वर माझ्याकडे मांस मागतोस? तू क्षणभरही इथे थांबू नकोस. दूर जा!” असे वाघाने कावळ्याला सुनावले.

तात्पर्य – संकटकाळात ज्याने मदत केली आहे अशा व्यक्तीचे लोकांना सुखकारक काळात विस्मरण होते.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

कथासरिता उपक्रम साहित्य कट्टा,संयोजन- डॉ. नयना कासखेडीकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चाहूल ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ चाहूल ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

पंचमहाभूतांनी भरलेल्या या निसर्गाचे काहीच सांगता येत नाही! पृथ्वी,आप, तेज,वायू, आकाश सारी तुझीच रूपे! कोणी त्याला निसर्ग म्हणोत तर कोणी परमेश्वर !पण या मानवप्राण्यासाठी  हे सारे महत्त्वाचे! त्यांचे अस्तित्व  रोजच्या जीवन व्यवहारात आपल्या लक्षातच येत नाही. आणि मग कधी एकदम वादळे येतात, आकाश कोसळते , सूर्याचा प्रकोप होतो तर कधी ही जमीन हादरते!असं झालं की आपल्याला निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते आणि सत्य दिसायला लागते!

निसर्गाचा अभ्यास म्हणून हवामान खात्याची यंत्रणा निर्माण झाली. आता ती बरीच शास्त्रशुद्ध झाली आहे. काही वर्षापूर्वी हवामान खात्याचा अंदाज ही विनोद करण्याची गोष्ट वाटे. ‘हवामान खात्याने अंदाज दिला आहे ना पाऊस पडेल म्हणून,मग हमखास येणार नाही’ अशा प्रतिक्रिया नोंदवल्या जात पण आता मात्र हे शास्त्र खूपच प्रगत झालंय.त्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा धुमाकूळ राहणारच आणि त्यासाठी जमेल तेवढी काळजी घेत आपण राहायचे!

वादळाचे भोवरे समुद्रात अखंड फिरत असतात, त्यांना आपण आवर घालू शकत नाही हे खरे! कधी कधी आपली नजर चुकून मुंबईला न जाता वारे कोकणाकडे वळतात किंवा आपल्या प्रभावाने एखादी किनारपट्टी नाश करतात .

एकमेकांवर अवलंबून असणारी ही पंचमहाभूते आर्यांच्या काळात देव म्हणून मानली गेली. निसर्ग पूजा महत्त्वाची  होती. निसर्गात असणाऱ्या प्रत्येक बदलाचा विचार करून माणसाने त्याचे महत्त्व मानले असेल!

यंदाचे २०२०  हे वर्ष काळाच्या कसोटीवर संकटाचे वर्ष म्हणून आले आहे. करोना महामारी च्या छायेत सारे जग सापडले आहे. पुन्हा एकदा निसर्ग आणि मानव या लढाईत आपले अस्तित्व टिकवायचे आहे. काही वर्षापूर्वी नाॅस्टरडॅम नावाच्या एका शास्त्रज्ञाने असे भाकीत केले होते की पृथ्वीवरील या जीवसृष्टीचे अस्तित्व २०२५ मध्ये संपेल!

तरी यापूर्वी 2005 मध्ये मुंबई बुडणार असेही भाकीत होते. तेव्हा मुंबई खरंच जलमय झाली. अगदी संपली नाही तरी मुंबईला निसर्गाचा खूप मोठा धक्का सहन करावा लागला.एका अरिष्टाची

चाहूल तेव्हापासून चालू झाली असेच वाटते. 2005 मध्ये पाण्याचा प्रवेश सांगली ,कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्राच्या शहरांमधून सुरू झाला. दरवर्षी खूप पाऊस आणि भरलेल्या धरणातून होणारा विसर्ग यामुळे या भागाला सतत पुराचा धोका निर्माण झाला. गेल्यावर्षी महाराष्ट्र ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपात नद्यांचे पाणी वाढले आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीची रेकॉर्डस् मोडली गेली.

शेतीची, वित्ताची हानी तर झालीच पण मनुष्य आणि जनावरे यांची ही हानी झाली.

यंदा जुलै,  ऑगस्ट मध्ये वादळाचा तडाखा श्रीवर्धन, अलिबाग या भागाला अधिक बसला आणि नारळी पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या .त्याच दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. सुदैवाने मृत्यू संख्या त्यामानाने कमी होती.

गेले दोन दिवस सतत कोसळणारा पाऊस पुन्हा एकदा वाईटाची चाहूल देत आहे. आधीच कोरोनाने ग्रासलेल्या लोकांना वादळाचा क्षोभ सहन करावा लागत आहे. नकळत माणसाला आपण निसर्गासमोर किती लहान आहोत हे जाणवते आहे !

आज दोन दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतली असे दिसते. नवरात्रीची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली असं समजायला हरकत नाही.  देवीच्या कृपेने यापुढे सर्व चांगले होईल अशी आशा वाटते आणि

चांगल्या दिवसाची चाहूल आजच्या घटस्थापनेपासून लागलेली आहे असे मनाला वाटते ! ?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झेप ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

☆ मनमंजुषेतून ☆ झेप ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

ऑस्ट्रेलियातील एका grandpa ची गोष्ट आहे. हे आजोबा रोज पहाटे समुद्र किनारी फिरायला जात. जाताना हातात एक टोपली असायची. किनाऱ्यावर हे काहीतरी वेचायचे आणि पुन्हा समुद्रात नेऊन टाकायचे. अनेक दिवस हे त्यांचे काम पाहून जेनीने त्यांना विचारले “Grandpa, हे काय करता?” आजोबा हसले आणि म्हणाले “बेटा, मी किनाऱ्यावर आलेले स्टारफिश गोळा करतो आणि पुन्हा त्यांना प्रवाहात सोडतो,  अगं भरतीच्या लाटांबरोबर ते बाहेर तर फेकले जातात पण त्यांची चाल मंद असल्याने बिचारे पुन्हा समुद्रात पोहोचू शकत नाहीत. अश्याना मी पुन्हा प्रवाहात मिसळण्याची संधी देतो.” ही गोष्ट वाचल्यावर वाटले आपल्याही समाजात असे अनेक आजोबा, आजी  समाजातील मुलामुलींना पुन्हा समाजाच्या प्रवाहात सोडण्यास मदत करतात. त्यापैकीच ही एक देवी, ” मालती ताई निमोणकर”

नाव जरा अपरिचित  वाटले ना?  गुजरवाडीत एका उंच ठिकाणी एका आश्रमात राहायच्या. एकदा चैत्रात आम्हा मैत्रिणींना  बोलावून हळदी कुंकू केले होते. गुजरवाडीतील पण बायका आल्या होत्या. भजनाचा कार्यक्रम केला होता. त्याच ह्या आजी. नागपूर जवळील मध्यप्रदेशातील एका छोट्याश्या गावात राहत होत्या. घरी अत्यंत कडक अश्या चालीरिती. पण सासू सासरे सुधारलेले होते. मॅट्रिक झालेल्या आजीने त्या काळी लग्न झाल्यावर BA केले. घरी खूप राबता होता. अश्या वातावरणात वाढलेल्या मालती ताई वरून पाहता खूप सुखी होत्या. दोन उच्चविद्याविभुषित मुली, उच्चविद्याविभुषित मुलगा,  सून,  सधन पती,  काय नव्हते?  परंतु मनातून मात्र  त्या समाधानी नव्हत्या.

सर्व जवाबदार्यांतून मुक्त झाल्यावर, लग्नाला ४० वर्षे झाल्यावर त्यांनी घरात एक निर्णय सांगितला. मी हे घर सोडून समाज कार्यासाठी बाहेर पडत आहे. थोडे समाजाचे देणे फेडून पहाते. घरातल्यांनी समजावले,  थोडे दटावले पण, म्हणाले, एकदा बाहेर पडलीस तर ह्या गृहस्थाश्रमात पुन्हा येणे नाही.. पण आजी ठाम राहिल्या आणि त्यांच्याच मुशीत घडलेल्या त्यांच्या लेकीने त्यांना पाठिंबा दिला.  एके दिवशी ह्या ध्येयाने पछाडून त्या आनंदवनात दाखल झाल्या. साधारण ५९-६० वर्षे वय. पहा, आपल्या घरातली वाटी, भांडी जरी हरवली तरी आपण कासावीस होतो. आजींनी क्षणात आपला भरलेला संसार सोडला. आनंदवनात बाबा व साधना ताईंनी त्यांना आपल्या बराकी जवळच खोली दिली. साधना ताईंचे आणि त्यांचे फार जुळले होते. पण अत्यंत कोमल हृदयाच्या मालतीताई कुष्ठरोग्यांची पीडा पाहून खिन्न होत. माणसाला पुस्तकाप्रमाणे वाचू शकणाऱ्या बाबांच्या डोळ्यांनी हे वाचले आणि त्यांनी डॉ. हर्डीकर आणि डॉ. शरयू घोले ह्यांच्या बरोबर काम करण्यास सुचविले. आणि त्या तेथून पुण्यात दाखल झाल्या.

पुण्यात ओंकार ट्रस्ट व डॉ. हर्डीकर ह्या संयुक्त कामात त्या दाखल झाल्या.  गुजरवाडीत डॉ. शरयू घोले ह्यांच्या संस्कार वर्गाची धूरा त्या सांभाळू लागल्या. मुले आणि आजी खूपच रमून जात. आणि इथेच पुढे एक निवासी आश्रम सुरु झाला. ‘अनाथ आश्रम’ हा शब्द जरी उच्चारला तरी आजींना आणि त्यांच्या सहकारी  मानसी ताई ह्यांना राग येत असे. “अगं, आम्ही नाही का त्यांचे पालक?  सनाथच आहेत ही मुले. “शुभम,  मयूर अशी ५ व ३ वर्षाची मुले दाखल झाली आणि आजींचे विश्वाचं बदलले. आजींचे व शरयू ताईंचे कार्य वाढू लागले. हळू हळू मुलांची संख्या वाढली. तिथेच त्यांची शाळा सुरु झाली. आजी मुलांची खूप काळजी घेत. हे चालू असतानाच आजी वाडीतील स्रीयांना एकत्र करून त्यांच्या अडी-अडचणी सोडवू लागल्या. अनेकांना त्यांचे निवास स्थान हे माहेरंच होते. मी पण त्याचा खूपदा अनुभव घेतला आहे. आजींच्या आश्रमात खूप प्रसन्न वातावरण होते. मुले तर आजींच्या भोवती सतत लुडबुडत असायची. मुलांसाठी आजींचा शब्द म्हणजे ‘वेद वाक्य’ होते. एक राम नावाचा छोटा तर म्हणायचा “मी मोठा होणार, खूप शिकणार आणि आजीला सोन्याची पैठणी आणणार.”

एक प्रसंग आठवतो! काही मुले अवती भोवती च्या परिसरात गवत काढायला गेली. रविवार होता, १-२ वाजे पर्यंत काम करून ती जेवायला आली. माझा ३ ला गणिताचा तास होता. मीही पोहोचले. तर काय! आजी सर्वांच्या हाताला तेल लावत होत्या. मी विचारले “काय झाले?” “अगं, गवत काढताना हाताला चरे पडलेत ना म्हणून मी तेल लावत आहे.” असे होते ते आजी-नातवांचे नाते. माझ्या तर डोळ्यात पाणीच आले. अनेक वर्ष ही माउली तिथे काम करत होती पण त्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या दोन्ही लेकीने त्यांना नंतर घरी परत आणले. आज त्या ८५ वर्षाच्या आहेत आणि आपल्या लेकीकडे अमेरिकेत ध्यान साधना करत वानप्रस्थाश्रमात मग्न आहेत!

चला येणार का अमेरिकेत ह्या देवीचे दर्शन घ्यायला?

© सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

medhasahasrabuddhe@gmail.com

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “निसर्ग माझा, मी निसर्गाचा” – प्रा. विजय जंगम ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ निसर्ग माझा, मी निसर्गाचा  – प्रा. विजय जंगम ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पुस्तकाचे नाव: निसर्ग माझा, मी निसर्गाचा

लेखक: प्रा. विजय जंगम

प्रकाशक: अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर.

किंमत: रू.260/.

प्रा. विजय जंगम लिखित ‘निसर्ग माझा,मी निसर्गाचा हे अलिकडेच प्रकाशित झालेले पुस्तक नुकतेच वाचनात आले.सारे काही निसर्गाविषयीच असेल असे गृहीत धरून पुस्तक वाचायला सुरुवात केली.काही पाने वाचून झाली आणि असे वाटू लागले की आपण वर्गात बसलो आहोत आणि आपले सर आपल्याला एक एक विषय व्यवस्थित समजावून सांगत आहेत.पुस्तकाच्या नावात जरी निसर्ग हा शब्द असला तरी या पुस्तकाचा विषय फक्त निसर्गापुरता मर्यादीत नाही.कारण अमर्याद निसर्गाचा विचारही संकुचितपणे करता येणार नाही.त्यामुळे निसर्ग आणि मानव यांचा विचार करताना लेखकाला अध्यात्म,विज्ञान आणि तत्त्वज्ञान या शास्त्रांचाही विचार करावा लागला आहे.प्रथमदर्शनी अवघड वाटणारे हे विषय लेखकात लपलेल्या शिक्षकाने अतिशय सोपे करून सांगितले आहेत.

पुस्तकाची विभागणी छोट्या छोट्या बत्तीस प्रकरणांमध्ये केलेली असल्यामुळे एक एक मुद्दा समजून घेणे सोपे झाले आहे.सृष्टीची निर्मिती कशी झाली,त्यामागचा  वैज्ञानिक सिद्धांत काय आहे हे सुरूवातीला स्पष्ट करत एकेका प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.विश्वनिर्मिती मागील अध्यात्मिक दृष्टीकोन विषद करतानाच विश्वाची निर्मिती होण्याआधी काय होते याचाही शोध ते घेतात. पंचमहाभूते, सप्तसिंधू , ब्रह्मांड,जन्म मरणाचा फेरा, ब्रह्म, मूळमाया असे अनेक शब्द आपल्या कानावर पडत असतात. त्या सर्वांचे साध्या,सोप्या भाषेतील स्पष्टीकरण आपल्याला येथे वाचायला मिळते. पंचमहाभूतांची निर्मिती, त्यांचा मानवी  शरीराशी असणारा संबंध, मानवाची गर्भावस्था, त्याची ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, अंतरेंद्रिये, मन आणि चित्त यातील फरक, पंचप्राण अशा अनेक विषयांवर सहजपणे भाष्य केले आहे.याशिवाय मानवाचा अहंकार,प्राकृतिक गुण,त्रिगुणी मनुष्यप्राणी, त्याचे सात्विक गुण, दुःख, सुख आणि आनंद यातील फरक यासारख्या अनेक विषयांसंबंधी असणार्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. अंतिम आणि अटळ असा मृत्यू, मृत्यूचे प्रकार याविषयी लिहीताना चिरंजीवित्व ही एक कल्पना आहे असे ते म्हणतात.

माणूस आणि निसर्ग यांच्यातील दुरावत चाललेल्या नात्यासंबंधी चिंता व्यक्त करून निसर्गाच्या पुनर्जन्माचीच आवश्यकता असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

श्री श्रीकांत वडियार यांनी चित्रित केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे. निसर्गाचे मानवाशी असलेले अतूट नाते, पुढील पिढ्यांसाठीही त्याची असलेली आवश्यकता आणि निखळ नैसर्गिक आनंदाचे दर्शन घडवणारे हे मुखपृष्ठ योग्य रंगसंगती मुळे आकर्षक ठरले आहे.

पुस्तकात अनेक ठिकाणी येणारी संतवचने, संदर्भ, गीता,दासबोध, चाणक्य नीती,अशा ग्रंथातील दाखले हे लेखकाच्या वाचनसमृद्धीचे द्योतक आहेत.अनेक ठिकाणी त्यांच्या लेखणीतून उतरलेली वाक्ये ही सुवचनाप्रमाणे वाटतात.उदाहरण म्हणून, ‘उपाशीपण हे नेहमी भरकटलेलं असतं’, आनंद हा कधीच परावलंबी नसतो’, ‘माणसाला अंतर्मुख व्हायला दुःख ही एक संधी असते’, ‘वेदनाच खरं बोलते’ अशा काही वाक्यांचा उल्लेख करता येईल.

मला तर वाटते की निसर्गाच्या माध्यमातून अध्यात्माच्या दारापर्यंत नेऊन पोचवणारा विज्ञाननिष्ठित भक्तीमार्ग या पुस्तकाने दाखवून दिला आहे.

 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

अध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता ☆ पद्यानुवाद – अष्टदशोऽध्याय: अध्याय (24) ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

अध्याय 18  

(सन्यास   योग)

(कर्मों के होने में सांख्यसिद्धांत का कथन)

(तीनों गुणों के अनुसार ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धि, धृति और सुख के पृथक-पृथक भेद)

यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्‍कारेण वा पुनः।

क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्‌॥

जो फल इच्छा सहित हो, कर्म अहं-सायास

उसको कहते राजस, भले हो बिना प्रयास।।24।।

भावार्थ :  परन्तु जो कर्म बहुत परिश्रम से युक्त होता है तथा भोगों को चाहने वाले पुरुष द्वारा या अहंकारयुक्त पुरुष द्वारा किया जाता है, वह कर्म राजस कहा गया है॥24॥

But that action which is done by one longing for the fulfilment of desires or gain, with egoism or with much effort-that is declared to be Rajasic.

 

 

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८

vivek1959@yahoo.co.in मो ७०००३७५७९८

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ आलू कैसे छीलें? ☆ श्री रमेश सैनी

श्री रमेश सैनी

( आज प्रस्तुत है सुप्रसिद्ध लेखक/व्यंग्यकार श्री रमेश सैनी जी की  मानवीय संबंधों  और मशीनों पर निर्भर होती आने वाली पीढ़ी पर आधारित एक विचारणीय कहानी   – “आलू कैसे छीलें?”।  कृपया  रचना में निहित मानवीय दृष्टिकोण को आत्मसात करें )

☆ आलू कैसे छीलें? ☆

लॉक डाउन में समय काटने के लिए किचन में पुरुषों में आमद रफ़त बढ़ गई है. स्वादिष्ट खाना बनाने के नुस्खे आजमा रहे हैं. उनकी देखा देखी बच्चे भी माँओं  के काम में अड़ंगा डाल रहे हैं. अभी कल परसों की बात होगी.मेरा पौत्र आयुष अपनी माँ के पास किचन में खड़ा होकर सवाल पर सवाल पूछे जा रहा था. सामने उबले आलू रखे थे. आलुओं को देख वह बोला-“मम्मी पोटाटो का क्या बनेगा?

–आलू बण्डे. माँ ने कहा

— तो बनाओ! कैसे बनते हैं

–आलू को छीलना पड़ेगा.

–मैं छील दूं?

–ये बहुत गरम हैं. आपसे नहीं बनेंगे. जल जाओगे.

आयुष नहीं माना. तब आयुष ने आलुओं को उठाया. वे बहुत गर्म थे.वह सी सी करने लगा. फिर दौड़ा दौड़ा अपने कमरे में गया, और स्मार्ट डिजीटल डिवाइस अलेक्सा ले आया. उसको आन किया और पूछा .

–आंटी!गरम आलू कैसे छीलते हैं?

—“आलू कच्चे हैं या पके”? फोन से आवाज आयी.

— मम्मी!आंटी पूछ रही हैं, आलू कच्चे हैं या पके?

—“पके”- मम्मी ने बताया

–आंटी पके! -बच्चे ने माँ की बात दुहरा दी

—“छोटे हैं या बड़े?”- फिर आवाज आई.

—मम्मी! छोटे हैं या बड़े ?

—मँझले!- माँ ने कहा.

—आँटी! मँझले.

—“तय करके बताओ! कैसे हैं ?.”

—मम्मी !आँटी पूछ रहीं हैं कि कैसे हैं?

मम्मी ने भुनभुनाकर कहा, कह दे-“छोटे हैं, पर छोटे से थोड़े बड़े हैं.”

—-आँटी! मम्मी कह रही हैं -” छोटे से थोड़े बड़े.”

—-ठीक है,अभी आलू ठण्डे हैं या बहुत गरम?

—“-बहुत गरम.” बच्चे ने तुरंत जबाब दिया.

—-आलू को हाथ से मत उठाना. हर गरम चीज को उठाने से हाथ जल जाते हैं. आवाज ने आगाह किया.

—-जलने से क्या होता हैआंटी.? बच्चे ने सवाल किया.

—-जलने से फफोले पड़ जाते हैं.. फिर उसका इलाज लम्बे समय तक चलता है.

—- मासूम बच्चे ने पूछा, “आंटी! पड़ोस वाली सौम्या दीदी कह रही थी उनका दिल जल रहा है पर कहीं पर फफोले नहीं दिख रहे हैं. दिल कहाँ पर होता है ?

—-अभी तुम दिल के चक्कर में मत पड़ो. अपने टास्क पर ध्यान दो. बस तुम्हें गरम आलू छीलना है.

— ठीक है आंटी! मुझे भी दिल से क्या लेना है. जो दिखता नहीं. तो बताओ आलू कैसे छीलें?

—अच्छा बताओ, किचन में छोटी, बड़ी चिमटी,फोर्क हैं?

—मम्मी! चिमटी या फोर्क है? बच्चे ने माँ की ओर देखते हुए कहा.

—रैक में रखे हैं. मम्मी ने सामने की ओर इशारा किया.

— आयुष रैक से फोर्क ले आया. बोला, ‘बताओ.आंटी, अब क्या करना है?’

—पहले बाउल में रखे आलुओं में से एक में फोर्क को घुसाकर उठाओ.

—आंटी! घुसाया पर वह टूटकर टुकड़े टुकड़े हो गया.

—दूसरे आलू में घुसाओ.

—पल भर के बाद बच्चे ने बताया,’आंटी वह भी टुकड़े टुकड़े हो गया.

—‘एक बार और कोशिश करो’ आवाज आई.

—आंटी! फोर्क घुसाने से आलू टूट रहे हैं.

— चिंता मत करो.

–आंटी!अब मैं क्या करुं? मैं आलू छीलना चाहता हूँ.

—मुझे विश्वास है तुम आलू छील लोगे.

— मम्मी हैं?

—हाँ! पर वह फोन पर बात कर रही हैं.

—और पापा ?

—वे भी मोबाइल पर चैट कर रहे हैं.आंटी, मैं परेशान हो गया. मुझे आलू छीलना है. यह मेरा आज का टास्क है.

—धैर्य रखो! तुमनें धैर्य नहीं रखा, इसलिए आलू टुकड़े हो गए.

—आंटी! धैर्य किसे कहते हैं?

— धैर्य मीन्स पेशेन्स.

—ओह! समझ गया.

—अच्छा! अपनी दादी को बुलाओ.

—दादी मीन्स.

— ग्रैंड  मॉम .

—ओह! आंटी, पर ग्रैंड मॉम हमारे साथ नहीं रहती हैं. वे अलग अकेली रहती हैं.

— ‘अच्छा ! अब समझ गई. तभी आलू छीलने वाली मुसीबत साल्व नहीं हो रही है.’ फिर आवाज आईं.

—हाँ! प्लीज़ जल्दी से साल्यूशन बताइए.

—‘अच्छा ऐसा करो. तुम पापा से कहो. वे ग्रैंड मॉम को घर ले आएं.’आवाज ने सुझाया

—-आंटी! ग्रेंड माम को पता है. कि गरम आलू कैसे छीलते हैं?

—हाँ ! उन्हें ठण्डे, गरम, छोटे, बड़े आलू छीलने का अनुभव है. उनके पास आपके सभी प्रॉब्लम  का सोल्युशन है.

—‘थैंक यू,वेरी मच आंटी.’

आयुष चिल्लाते चिल्लाते पापा के पास गया – पापा ! आज हम ग्रैंड मॉम घर लाएंगे.

—क्यों? पापा ने पूछा.

—-बच्चे ने बताया,’अलेक्सा आंटी कह रही हैं कि – ग्रैंड मॉम के पास हर प्रोब्लेम्स का सोल्युशन है. आप लोगों के पास समय नहीं है कि मुझे बताएं कि आलू कैसे छीलें, कौन सा काम कैसे करें?

 

© श्री रमेश सैनी 

जबलपुर , मध्य प्रदेश 

मोबा. 8319856044  9825866402

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares