मराठी साहित्य – विविधा ☆ मनकवडा राम… आत्माराम… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ मनकवडा राम… आत्माराम… ☆ अपर्णा परांजपे

ब्रह्म वाक्य आहे हे असं जर मी म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही याची खात्री आहे!

मुळात हे आत्मचिंतन असल्याने स्व वर केंद्रित आहे. बुद्धी ही दोन प्रकारची आहे.

१ देहबुद्धी (अज्ञान, मर्यादित बुद्धी)

२: आत्मबुध्दी (ज्ञान, अंतिम सत्य)

मग पहिला स्व जाणणारी बुध्दी समजून उमजून बदलवून दुसऱ्या स्व मध्ये प्रतिष्ठित करणे सोपं कसं असेल? म्हणून सगळा गोंधळ, अस्वस्थता, अस्पष्टता असते हे खरे, हे “जीवाचे” लक्षण आहे. पण

जीव जीवच राहून सुखी झाला असता तर सगळे प्रश्न मिटले असते. मर्यादित रुप हे अमर्याद स्वरूपाचा अंश असल्याने त्याची तळमळ शांत होत नाही व खरे समाधान मिळत नाही, जोपर्यंत तो स्वतः अमर्याद होत नाही. हाच अमर्याद स्व म्हणजे दुसरा स्व!

दुसरा स्व ही आपणच आहोत फक्त पहिला स्व ओळखून नव्या स्व ची ओळख धारण करणे ही ” घटना घडणे” म्हणजे खरा चमत्कार आहे.

देह रूपाने जन्म मिळाला हाही चमत्कारच आहे पण तो दृश्य आहे. या देहाचा आधार, चैतन्य म्हणजे आत्मा त्या आत्म्याचे स्वरूप परमात्म्याचा अंश आहे, हे जाणवणे म्हणजे “जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा” या महावाक्याचा स्वानंद अनुभवणे आहे! म्हणून हा खरा “दैवी चमत्कार” आहे!

मर्यादित रुपात स्वतः प्रतिष्ठित झालेला आत्माराम ओळखण्यासाठी त्याचीच माया अडथळा करते, परीक्षा घेते, जे आवश्यक आहे सगळे मनाचे खेळ उघड करते व मनाला स्व कडे वळवते. जीवनानुभव घेत घेत, सत्संग, सत्संगती, सद्ग्रंथ सापडणे ही सद्गुरू कृपा आहे. मार्गदर्शन मिळाल्याशिवाय मार्ग कळणार कसा?

 वेगवेगळ्या पध्दतीने दुसऱ्या स्व ची ओळख व्हावी असा प्रयत्न स्वतः सद्गूरु करतात हीच त्यांची कृपा आहे. आत्मनिष्ठ सद्गूरु च आत्म्याची ओळख करून देतात. मग मर्यादित स्व अमर्याद स्व मध्ये परिवर्तित होतो. महादेव हे देवांचे देव आहेत. त्याच्या मुखातून आलेली कथा पार्वती मातेसोबत शुकाने श्रवण केली व अमरत्व प्राप्त झाले. अश्या गोष्टी जीवनाचा आधार ठरतात.

रामाशिवाय शिव नाहीत

शिवाशिवाय राम नाहीत…

भगवान शंकरांचे जीवन बघितले तर..

भगवान शंकरांना ‘देवाधिदेव’ महादेव म्हटले जाते. महादेवांचे एक रूप तांडव करणाऱ्या ‘नटराजा’चे आहे, तर दुसरे रूप एका महान ‘महायोगी’चे आहे. ही दोन्ही रूपे रहस्यांनी भरलेली आहेत. शिवशंभूंना ‘भोलेनाथ’ असेही म्हणतात. जिथे एकाच व्यक्तिमत्त्वात इतके विविध पैलू आहेत, तिथून आपण आपल्या जीवनासाठी प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो.

वाईटाचा नाश करणे

ब्रह्मा हे उत्पत्तीसाठी आणि विष्णू हे सृष्टीच्या रचनेसाठी ओळखले जातात, तर शिव हे विनाशासाठी ओळखले जातात. शिवाचे हे रूप कदाचित भीतीदायक वाटू शकते, परंतु प्रगतीसाठी एखाद्या वाईट गोष्टीचा किंवा अनिष्ट प्रथांचा नाश होणे अत्यंत आवश्यक असते. शिव याच परिवर्तनासाठी ओळखले जातात.

शांत राहून स्वतःवर नियंत्रण मिळवणे

शिवापेक्षा मोठा कोणीही योगी झालेला नाही. एखाद्या परिस्थितीत स्वतःला गुंतवून न घेता, अलिप्त राहून त्या परिस्थितीवर पकड ठेवणे सोपे नसते. महादेव एकदा ध्यानाला बसले की संपूर्ण जग इकडे-तिकडे झाले तरी त्यांचे ध्यान कोणीही भंग करू शकत नाही. शिवाचे हे एकाग्र रूप आपल्याला जीवनातील गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यास शिकवते.

नकारात्मक गोष्टींना सकारात्मकतेने स्वीकारणे

समुद्रमंथनातून जेव्हा विष बाहेर आले, तेव्हा ते पिण्याची कोणाचीही तयारी नव्हती. अशा वेळी महादेवांनी स्वतः ते विष (हलाहल) प्राशन केले आणि त्यांना ‘नीलकंठ’ हे नाव मिळाले. या घटनेतून हा मोठा धडा मिळतो की, आपणही जीवनातील नकारात्मक गोष्टी पचवून घ्याव्यात, पण त्याचा परिणाम ना स्वतःवर होऊ द्यावा, ना इतरांवर.

जोडीदाराबद्दल आदर

हिंदू मान्यतेनुसार महादेव हे एक आदर्श जोडीदार मानले जातात. जर पार्वतीने त्यांना प्राप्त करण्यासाठी वर्षानुवर्षे तपश्चर्या केली, तर शिवानेही त्यांना आपली ‘अर्धांगिनी’ बनवून पूर्ण सन्मान दिला. म्हणूनच ३३ कोटी देवांमध्ये केवळ शिवांनाच ‘अर्धनारीश्वर’ म्हटले जाते.

सदैव समान भाव ठेवणे

शिवाचे संपूर्ण रूप पाहिले तर असा संदेश मिळतो की, ज्या गोष्टी आपण साध्या डोळ्यांनी पाहणेही टाळतो, त्या त्यांनी सहज स्वीकारल्या आहेत. म्हणूनच त्यांच्या लग्नाला भूतांची टोळी आली होती आणि अंगाला राख लावलेल्या भोळ्यानाथांच्या गळ्यात साप लटकलेला असतो. वाईट कशातच नसते, फक्त एकदा तुम्हाला ते स्वीकारता आले पाहिजे.

 तिसरा डोळा उघडणे

शिवांना ‘त्र्यंबक’ म्हटले जाते कारण त्यांना तिसरा डोळा आहे. तिसरा डोळा म्हणजे बोध किंवा अनुभूतीचा एक वेगळा आयाम (Dimension) खुला होणे. दोन डोळे फक्त भौतिक जग पाहू शकतात, पण तिसरा डोळा अंतर्मनात पाहतो. या ज्ञानामुळे तुम्ही जीवनाकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकता. त्यामुळे कोणत्याही ठरवलेल्या वाटेवर चालण्यापूर्वी स्वतः विचार करा आणि गोष्टी समजून घ्या.  

स्वतःचा मार्ग स्वतः निवडणे

शिवांची जीवनशैली असो वा त्यांचे कोणतेही अवतार, ते प्रत्येक रूपात पूर्णपणे वेगळे आहेत. मग ते तांडव करणारे नटराज असोत, विष प्राशन करणारे नीलकंठ असोत, अर्धनारीश्वर असोत किंवा लवकर प्रसन्न होणारे भोलेनाथ असोत. ते प्रत्येक रूपात जीवनाला एक योग्य दिशा दाखवतात.  

आपली ग्रंथसंपदा अथांग आहे! त्यातील एखादा कण जरी वेचता आला व त्याची प्रचिती घेण्यासाठी बुद्धी चा निश्चय झाला व तसे आचरण करता आले तर आणि तरच मानवी जीवनाचे कल्याण आहे म्हणून च चिंतन केले

मनकवडा राम… आत्माराम त्याचच खरा आधार व साक्षीदार ही तोच!

जे घडतंय व घडेल ते त्याच्या कृपेने घडणार तर मायिक शब्दांना काय स्थान?

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

कृतज्ञ मी कृतार्थ मी 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रायव्हसी – –  लेखक : श्री कैलास मोरे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

☆ प्रायव्हसी – –  लेखक : श्री कैलास मोरे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

आमच्या समोरच्या एका आलिशान फ्लॅटमध्ये मीनाक्षी काकू राहायला आल्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत खूप स्वप्नं होती. मुलगा ‘अमित’ आणि सून ‘सोनल’ दोघेही आयटी क्षेत्रातील मोठे अधिकारी. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. सोनल कौतुकाने त्यांना मॉलमध्ये फिरायला न्यायची, नवीन साड्या घ्यायची. पण जसजसा काळ लोटला, तसतसं ‘शहरी वास्तव’ समोर येऊ लागलं.

एके दिवशी दुपारी मीनाक्षी काकूंनी सोनलच्या बेडरूमचा दरवाजा उघडला—फक्त विचारण्यासाठी की संध्याकाळी काय बनवू? सोनल लॅपटॉपवर मीटिंगमध्ये होती. तिने रागाने काकूंकडे पाहिलं आणि मीटिंग संपल्यावर म्हणाली,

“आई, प्लीज… तुम्ही दरवाजा नॉक केल्याशिवाय आत नका येत जाऊ. ही माझी प्रायव्हसी आहे. कामात व्यत्यय येतो. “

मीनाक्षी काकूंना ते ‘नॉक करणं’ पचनी पडलं नाही. त्यांना वाटलं, पोटच्या लेकाच्या खोलीत जायला आता परवान्याची गरज लागणार? तिथूनच नात्यात एक अदृश्य भिंत उभी राहिली.

दिवसेंदिवस सोनल आणि अमित आपल्या कॉर्पोरेट आयुष्यात इतके गुंतले की मीनाक्षी काकू त्या घरात फक्त ‘मुलाला सांभाळणाऱ्या’ आणि ‘स्वयंपाक करणाऱ्या’ व्यक्ती उरल्या. संवादाची जागा मोबाईलच्या मेसेजेसनी घेतली.

एके रात्री घराच्या बाल्कनीत मीनाक्षी काकू एकट्याच बसल्या होत्या. सोनल बाहेर आली, पण तीही फोनवर बोलत होती. मीनाक्षी काकू म्हणाल्या,

“सोनू, आज तुझ्या आवडीची पुरणपोळी केलीये गं, ये लवकर जेवायला. ” सोनलने चिडून उत्तर दिलं,

“आई, मी डाएटवर आहे आणि मला खूप कॉल्स आहेत. तुम्ही जेवून घ्या, माझं मला कळतं. “

त्या रात्री जेवणाचं ताट समोर असूनही मीनाक्षी काकूंच्या घशाखाली घास उतरला नाही. ज्या मुलाला आणि सुनेला त्यांनी आपलं जग मानलं, त्यांच्याच जगात आज त्यांना स्थान उरलं नव्हतं.

काही दिवसांनी मीनाक्षी काकूंनी निर्णय घेतला की त्या गावी परत जाणार. अमितने विचारलं,

“का आई? इथे काय कमी आहे? एसी आहे, गाडी आहे, सगळं सुख आहे. “

तेव्हा मीनाक्षी काकूंच्या डोळ्यांतून पाणी आलं. त्या शांतपणे म्हणाल्या,

“बाळा, या घराच्या भिंती चकचकीत आहेत, पण त्या बोलत नाहीत. इथे एसीची थंडी आहे, पण मायेची ऊब नाही. सोनलला तिची ‘स्पेस’ हवीय आणि मला माझं ‘अंगण’. काळ बदलला म्हणून माणसांनी एकमेकांकडे पाहायची दृष्टी इतकी बदलावी, की रक्ताचं नात्याचं ही ओझं वाटावं? “

सोनल दारात उभी राहून हे सगळं ऐकत होती. तिला तिची चूक उमजली होती, पण तोपर्यंत मीनाक्षी काकूंनी आपली बॅग भरली होती. काळ बदलला होता आणि त्या काळाच्या ओघात एक सुंदर नातं ‘प्रायव्हसी’ आणि ‘व्यस्तते’च्या नावाखाली कायमचं दुभंगलं होतं.

मीनाक्षी काकूंची बॅग भरलेली होती. कपाट अर्धवट उघडं, आतल्या साड्यांच्या घड्या जणू काही त्यांनाच थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या. सोनल दाराशी उभी होती—पहिल्यांदाच तिच्या हातातला फोन शांत होता आणि मनातला आवाज मोठा.

त्या रात्री घरात कोणीच जेवलं नाही. अमित ऑफिसच्या मेल्सकडे पाहत बसला होता, पण अक्षरं धूसर दिसत होती. आईच्या डोळ्यांतलं पाणी त्याला सतत आठवत होतं.

“एसीची थंडी आहे, पण मायेची ऊब नाही…” हे वाक्य त्याच्या कानात घुमत राहिलं.

पहाटेच्या सुमारास सोनल हळूच मीनाक्षी काकूंच्या खोलीत आली. काकू जाग्याच होत्या. त्यांच्या हातात जुन्या फोटोचा अल्बम होता—अमितच्या लहानपणीच्या आठवणी, शाळेचा पहिला दिवस, वाढदिवस, त्याच्या बाबांच्या छायाचित्रासमोरचा दिवा…

सोनल शांतपणे त्यांच्या पायाशी बसली.

“आई… माफ करा मला. ” तिचा आवाज थरथरत होता. “मी माझा ‘स्पेस’ मागत होते, पण तुम्हाला मनातून दूर करत होते हे मला कळलंच नाही. मी करिअर, डेडलाईन्स, प्रायव्हसी यांच्यात इतकी गुंतले की… तुमच्या मनातलं ऐकलंच नाही. “

मीनाक्षी काकूंनी काही क्षण तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता—फक्त खोल दुखावलेपण होतं.

“सोनू, मला तुमच्या आयुष्यात अडथळा व्हायचं नव्हतं गं. फक्त एवढंच वाटायचं की, या मोठ्या घरात कुणीतरी मला दोन मिनिटं बसून विचारावं—‘आई, कशी आहेस? ’”

तेवढ्यात अमितही आत आला. त्याच्या डोळ्यांत अपराधाची जाणीव स्पष्ट होती.

“आई, चूक माझी आहे. मीच दोघींमध्ये दुवा व्हायला हवा होता. ऑफिसच्या नावाखाली मी जबाबदारी टाळली. तु कधी काही मागितलंच नाही… म्हणून आम्ही देणंही विसरलो. “

क्षणभर खोलीत शांतता पसरली. बाहेरून पहाटेचा हलका उजेड आत शिरत होता—जणू काही नव्या सुरुवातीची चाहूल देत.

सोनल उठली, बॅग उघडली आणि कपडे परत कपाटात ठेवू लागली.

“आई, तुम्ही कुठेही जाणार नाही. पण एक वचन द्या—तुम्हाला जे खटकतं ते मला थेट सांगा. आम्हीही शिकलो पाहिजे. या घरात तुमचा ही हक्क असू दे… पण मनावर ओझं नको. “

मीनाक्षी काकूंच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं.

“ठीक आहे. मी दरवाजा नॉक करीन… पण तुम्हीही कधीमधी माझ्या अंगणात या. माझ्या गोष्टी ऐका. “

त्या दिवशी संध्याकाळी वेगळंच चित्र होतं. तिघंही एकत्र बसून जेवत होते. सोनलने स्वतःहून पुरणपोळीचा छोटासा तुकडा घेतला.

“आई डाएट उद्यापासून, ” ती हसत म्हणाली.

अमितने आईचा हात हातात घेतला.

“आई, घर मोठं आहे म्हणून माणसं दूर असायला नकोत. आपण नियम बनवू—रोज किमान एकत्र चहा. फोन बाजूला ठेवून. “

बाल्कनीत पुन्हा तेच तिघं उभे होते. पण आज वातावरण वेगळं होतं. एसीची थंडी होतीच, पण त्यात मायेची ऊब मिसळली होती.

कधी कधी नातं दुभंगत नाही—आपणच त्याकडे पाहणारा आरसा धुळीने झाकतो. ती धूळ साफ करायला थोडं धैर्य, थोडी कबुली आणि थोडं प्रेम पुरेसं असतं.

त्या घरात आता ‘प्रायव्हसी’ होती, पण त्याहून मोठं ‘आपलेपण’ होतं.

आणि दुभंगलेला आरसा… पुन्हा एकदा अखंड झाला होता.

त्या दिवसानंतर घरातले नियम बदलले होते—रोजचा एकत्र चहा, आठवड्यातून एकदा बाहेर फेरफटका, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनातलं न भिता बोलायचं. काही दिवस सगळं खरंच सुरळीत चाललं.

पण आयुष्य नेहमीच सरळ रेषेत चालत नाही.

एक दुपार अचानक मीनाक्षी काकूंना चक्कर आली.

स्वयंपाकघरातल्या उकळत्या आमटीचा वास सर्वत्र पसरलेला होता, गॅस चालूच होता आणि त्या खाली बसल्या होत्या. सोनलने धावत जाऊन त्यांना सावरलं. अमितला फोन केला. दोघांनी मिळून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, “वय झालंय… शरीर थकायला लागतं. काळजी घ्या. त्यांना ताण नको. ”

त्या रात्री हॉस्पिटलच्या पांढऱ्या भिंतींमध्ये बसून सोनल पहिल्यांदाच स्वतःला पूर्णपणे असहाय्य समजत होती. लॅपटॉप नव्हता, मीटिंग नव्हती, डेडलाईन नव्हती—फक्त आईच्या श्वासांचा मंद आवाज होता.

तिने हळूच काकूंचा हात हातात घेतला. तो हात उबदार होता, पण थरथरत होता.

“आई… तुम्हाला बरं व्हायलाच पाहिजे. अजून मला तुमच्याकडून पुरणपोळी शिकायची आहे. अजून तुमच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. ”

मीनाक्षी काकूंनी डोळे उघडले. ओठांवर हलकीशी रेष उमटली.

“सोनू… मी आहे गं इथेच. पण एक सांगू? त्या दिवशी मी जायला निघाले होते ना… तेव्हा मनात खूप भीती होती. वाटलं, माझं लेकरू माझ्याशिवाय जगायला शिकलंय. मी उगाचच ओझं झालेय. ”

अमित बाजूलाच उभा होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

“आई, आम्ही मोठे झालो म्हणून तुझी गरज कमी झाली असं नाही. उलट… आम्हाला समजायला वेळ लागला. ”

काही दिवसांनी काकू घरी परतल्या. पण त्या पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. शरीर कमकुवत झालं होतं. आता स्वयंपाक सोनल करत होती. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी ती काकूंच्या खोलीत डोकवायची, त्यांच्या केसांवरून हात फिरवायची. अमित रोज त्यांच्या शेजारी बसून जुने फोटो पाहायचा.

एक संध्याकाळी बाल्कनीत तिघं बसले होते. आकाशात सूर्य मावळत होता. मीनाक्षी काकूंनी शांतपणे म्हटलं,

“माझं अंगण आता इथेच आहे. गावी परत जायची गरज नाही.

कारण अंगण मातीचं नसतं रे… माणसांचं असतं. ”

सोनलने त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं.

“आई, तुम्ही आम्हाला उशिरा का होईना, पण शिकवलंत—घर फक्त चार भिंतींचं नसतं. ते स्पर्शाचं, वेळेचं आणि शब्दांचं असतं. ”

काही महिन्यांनी, एक पहाट मात्र वेगळीच उजाडली. मीनाक्षी काकू शांत झोपेतच निघून गेल्या. चेहऱ्यावर समाधान होतं—जणू काही अपूर्ण राहिलेलं काहीच नव्हतं.

घर पुन्हा एकदा शांत झालं. पण यावेळी ती शांतता रिकामी नव्हती—ती आठवणींनी भरलेली होती.

स्वयंपाकघरात सोनल पुरणपोळी करत उभी होती. डोळ्यांत पाणी होतं, पण ओठांवर हलकंसं हसूही होतं. अमितने मागून येऊन तिला मिठी मारली.

“आई असती तर म्हणाली असती—‘गोड जरा कमी पडलंय. ’”

दोघंही हसले… आणि रडलेही.

बाल्कनीत उभं राहून अमित म्हणाला,

“एसीची थंडी आहे… पण आता मायेची ऊब नाही. कारण आईने ती आपल्या सोबत घेऊन गेली. ”

कधी कधी नातं तुटत नाही—ते वेळेआधी समजून घेतलं नाही तर हातातून निसटतं.

पण जेव्हा समज येते, तेव्हा जरी माणूस सोबत नसला… तरी त्याचं प्रेम आयुष्यभर साथ देत राहतं.

त्या घरात आता एक फोटो होता—हसऱ्या मीनाक्षी काकूंचा.

आणि त्या फोटोसमोर रोज दिवा लावला जायचा… फक्त प्रकाशासाठी नाही, तर त्या मायेच्या ऊबेसाठी, जी शेवटी घराला खरं घर बनवून गेली.

 

लेखक : श्री कैलास मोरे

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आज महिना अखेर…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आज महिनाअखेर …” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

31 March  “Today is account closing day.” 

… पण आमच्यासारख्या सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठांसाठी प्रत्येक महिन्याचाच शेवटचा दिवस खास असतो. त्या दिवशी पेंशन बॅंकेत जमा होते ना. म्हणून. महत्वाचा, आनंदाचा, आधार देणारा दिवस.

… आयुष्यभर इमानदारीने काम केल्यानंतर सरकारने दिलेली पोचपावती म्हणजे पेन्शन.

महिन्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी पहाटे पहाटे मोबाइल वर *टिंग* * असा आवाज ऐकला, म्हणजे ती पेन्शन बॅंकेत जमा झाल्याची सूचना असते. एरवी या *टिंग* चां त्रास होतो. हा आवाज अजिबात आवडत नाही. पहाटे पहाटे तर अजिबातच नाही. पण या दिवशी हा आवाज कानाला खूप गोड वाटतो. हा आवाज ऐकायला मन आतुर असत. जीव भांड्यात पडतो.

नेहमीचेच ठरलेले माझे डायलॉग स्वतः बरोबरच सूरू होतात.

बरंय बाई!! दर महिन्यात न चुकता ही पेन्शन येते. किती का असेना, पण आपल्या हक्काचे पैसे मिळतात. किती आधार आहे या पैशांचा.

देवा!! धन्यवाद बाबा तुला. एवढी एक चांगली सोय केली आहेस आमची. मानाने जगता येत. आता आम्ही रिटायर्ड झालेलो असलो, तरी पैसा लागतोच ना. नाही तर अजून किती दिवस नोकरी केली असती??

We are retired from Work असलो तरी, Not retired from Fun.

मार्च महिना तसा मोठाच, लांबलचक. संपता संपत नाही. असं मनाशीच मी म्हंटल. खरं तर आता रिटायर्ड होऊन दहा वर्षे झाली. आता महिना काय आणि वर्ष काय?? सुरू झाले काय आणि संपले काय?? रोजच्या जीवनात काही विशेष बदल होत नाही. तसं बघितलं तर विशेष काही घडलेलही नसत.  

उद्या नवीन महिना सुरू होणार म्हणजे सर्वांना  घरी येणाऱ्या मावशींना पैसे द्यायचे आहेत. बाकी बिल भरायची आहेत. आता सर्व कामे ‘ on line ‘ होतात, म्हणून दहा मिनिटात सर्वांना पैसे देणे होऊन जाते. उरलेले पैसे आपल्यासाठी पुरेसे असतात. ते पैसे बघता मी सहज म्हणते,

” बहुत पैसे हैं, अपने पास । “

आता काही अगदी पुर्वी सारख राहील नाही. मुलं घरात असताना, त्यांच्या शिक्षणाच्या वेळी, किराण्याची मोठ्ठी यादी तयार होत असे. नोकरी सांभाळून सर्व करताना घरात सर्व सामान व्यवस्थित असलं, तर रोजची कामे सहज सुरळीत होतील, या विचाराने जास्त सामान आणून ठेवणे. हा उद्देश असायचा.

आता घरी दोघेच असल्याने काही सामान नसले तरी चालते. घाई तर अजिबात नसते. बाहेर जाऊ तेंव्हा आणू, तेही लक्षात राहिलं तर.

तेंव्हा आम्हाला असा किती पगार मिळायचा?? त्यात घर खर्च, मुलांची शिक्षण, घराचे हप्ते, सणवार, औषध पाणी यानंतर असे किती पैसे वाचायचे??

बरं!! आता प्रत्येकाचे आयुष्य ‘life span’ ही वाढले आहे. मग पैसा पण जास्त लागणार ना. जमलेला पैसा किती दिवस पुरतो.??

तरी बरं आमच्या सारखे मध्यम वर्गीय लोक मनाने काटकसरीच असतात.

निवृत्ती नंतरच्या काळ ज्येष्ठांसाठी थोडा नाजूकच असतो. पैसा जवळ असला तर स्वतः वर विश्वास राहतो. आधीच मनाने नाजूक अवस्थेतून जात असताना जर त्यांच्या वाट्याला घरच्याच लोकांकडून दुर्लक्ष झाले, तर ही भावना खूप मानसिक त्रास देणारी आहे.

म्हणून ही पेन्शन, हा शेवटचा दिवस महत्वाचा.

आज ३१ मार्च, आज पहाटे *टिंग* काही वाजले नाही. क्षणभर जीव घाबरला. मनात आलं अरे!! काही नवीन सरकारी नियम बदलले तर नाही.??

लगेच लक्षात आलं,

 अरे!!! आज 31 St March

“Today is account closing day.” 

उद्या किंवा परवा पहाटे टिंग नक्की वाजणार.

आज मोबाईल ने मात्र छान टोमणा मारला.

कमाल का ताना दिया मोबाईल ने

हमेशा मेरे *टिंग* को कर्कश कहने वाले,

आज बड़े बेताब हो रहे हो उसी *टिंग* को सुनने के लिए।

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हडळ…!!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हडळ…!!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(बुडख्याकडचा (देठाकडचा) भाग हातानंच पिळून तटदिशी तोडला आणि अख्खी मेथीची गड्डी तिनं अक्षरशः हातानं कुस्करुन कढईत टाकली. ना निवडणं, ना साफ करणं, ना देठ काढणं…! )

इथून पुढे – – 

मेथी गरम तेलात पडली, अगोदरच खमंग तळला गेलेला तांबूस लसूण जणू मेथीची वाट बघत होता. मेथीची आणि त्याची कढईत भेट झाल्यावर ‘छिस्स’ असा आवाज आला. हा आवाज मी अजून विसरलो नाही. विसरूच शकत नाही.

यानंतर तिने पुन्हा उलथन घेतलं, त्याच पदराला पुसलं. भाजी हलवली आणि त्यावर मीठ टाकलं. कढईतूनच चिमटीत धरून तिनं ही भाजी माझ्या हिरव्यागार भाकरीवर टाकली. मी तिच्याकडे नुसता पहात होतो.

माझ्या गालावरून खरबरीत हात फिरवत म्हणाली, ‘खा ल्येकरा खा. सकाळधरनं उपासी हायस बाबा… ‘

… यानंतर मी त्या गरमगरम भाजी भाकरीवर तुटून पडलो. मला आठवतं, मी त्यावेळी दोन भाकरी आणि सगळी भाजी फस्त केली होती. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ याची प्रथमच जाणीव झाली. पोट तुडूंब भरलं होतं, मनही!

मी सहज पाहिलं. काठवठीत तिच्यापुरत्या असणाऱ्या पिठाच्या सर्व भाकऱ्या मी खाल्ल्या होत्या. फडक्याखाली आता भाजी शिल्लक नव्हती, डब्यात अजून पीठ शिल्लक असेल की नाही ते मला माहीत नव्हतं. मला माझीच लाज वाटायला लागली.

… गंमत अशी की पोट भरल्यावरच लाजेची जाणीव होते, उपाशीपोटी नाही.

चुलीजवळ बसून मला घाम आता होता. मी तिच्याजवळ जात म्हणालो, ‘मावशी, आता तू काय खाशील? ‘

… आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिला मावशी म्हटलं असावं. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागलं. गरागरा फिरणारे डोळे कुठेच ठरत नव्हते, हुंदका येत होता. त्यालाही ती दाबत होती. तिने ओठ मुडपले होते. त्यातूनही एक दात डोकावत होताच. मला जवळ घेत पुन्हा त्याच पदरानं माझ्या कपाळावरचा तिनं घाम पुसला. या पदरातून मला वास आला, शेणानं सारवलेल्या जमिनीचा, उखळात चेचलेल्या लसणाचा, डोक्याला लावलेल्या तेलाचा, माझ्याच घाबरट घामाचा आणि तिच्यातल्या पान्हा फुटलेल्या आईचा!

या पदरानं मी सुगंधी झालो. आता मला तिची भीती वाटत नव्हती.

जगात आपलं म्हणून कुणीही नसलेली एक समाजात टाकलेली बाई तिच्याही नकळत आई होऊन गेली.

पदरालाही किती पदर असतात ना? वरवर फाटका दिसणारा पदर किती मजबूत असू शकतो?

… प्रत्येक आई-मुलाचं नातं, पदरापासून सुरु होतं… पदराशी संपतं..! या दोन पदरांतला काळ म्हणजे आयुष्य!

आयुष्यात मला अशी बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी पुन्हा कुठंही मिळाली नाही.

इंटरनॅशनल कंपनीत काम करताना अनेकानेक फाईव्ह स्टार हॉटेलात राहिलो. जेवलो. मेनूकार्डवर व्हेजच्या रकान्यात शोधून शोधून मी मलई मेथी, बादशाही मेथी, लबाबदार मेथी, शाही मेथी, कोफ्ता, कश्मिरी मेथी रोल यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असतील. छे!

स्टारवाल्या हॉटेलात फक्त स्टारच असतात, पण मायेचा चंद्र नसतो.. चांदणं नसतं. दुधाचेही गुणधर्म वाढवायला कोजागिरीचा शीतल चंद्रच लागतो. चकाचाँद करणारे भगभगीत दिवे इथे काय कामाचे? कोणत्याही पदार्थाला कसलीच चव नसतेच मुळी!

चव उत्पन्न होते ती करणाऱ्याच्या मनातून… करणाऱ्याचा भाव शुद्ध असला की कोणतीही अशुद्धी त्या पदार्थाता दुषित करत नाही. संपूर्ण स्वच्छता पाळून शिव्या देत केलेलं पंचपक्वान्नंही बाधतंच, पण कसलीही स्वच्छता न पाळता मनाच्या गाभाऱ्यातनं जेव्हा माया, तेल आणि मिठात सोडली जाते तेव्हा मेथीची ती भाजीही अमृत होऊन जाते.

लोक याच मायाळू मावशीला हडळ म्हणायचे, का तर तिचा चेहरा भेसूर होता.

आपण चेहरा आणि कपड्यांवरून माणसाबाबत आडाखे तयार करतो. बऱ्याच वेळा ते चुकतात. चेहऱ्यावर रंग लावून कलाकार मंडळी नाटक करतात.

– – पण कोणताही रंग न लावता ‘नाटकं’ करतात काही मंडळी, त्यांना काय म्हणावं?

– – एखाद्याचं कौतुक करायला पटकन शब्द सापडत नाहीत, भांडताना मात्र झटपट त्यांना ते आठवतात. याला काय म्हणायचं?

– – ज्यांना आपण आयुष्यभर ‘चुकीची माणसं’ समजत असतो, तेच आपल्याला कधीतरी ‘बरोबर अर्थ’ समजावून सांगतात. मग ते चुकीचे कसे काय?

– – दुसऱ्याच्या चुका या चुका, पण आपल्या चुका म्हणजे ‘अनुभव’ असं कौतुकान सांगणाऱ्यांना काय म्हणावं?

– – – असे दुटप्पीपणानं वागणारे लोकच मग एखाद्या व्यक्तीवर ‘हडळ’ म्हणून शिक्का मारतात. एखाद्याला बहिष्कृत करतात.

या मावशीला मी गावाकडे गेल्यावर अधूनमधून भेटायचो. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असताना एकदा भेटायला गेलो होतो.

वय झालं होतं. खंगून खाटेवर पडली होती. आताशा तिला दिसत पण नव्हतं. वयानुरूप चेहरा आणखी भेसूर झाला होता… जवळ कुणी जायचंच नाही.

– – मी भेटायला गेलो. स्मरणशक्ती ढासळलेली.

तिनं ओळखलं नाही. काही आठवणी करून दिल्या. मेथीच्या भाजीची आठवण सांगितली. मान वळवुन पुन्हा एकदा ती तशीच हसली, जशी मेथीची भाजी खायला घालताना हसली होती पूर्वी… गूढ.. गालातल्या गालात!

‘काय आणून देऊ म्हातारे तुला? ‘ मी हातात हात घेऊन प्रेमानं विचारलं. ठिगळ लावलेल्या अंगावर चुकून पडलंय असं वाटायला लावणाऱ्या लुगड्याकडे तिनं क्षीणपणानं बोट दाखवलं.

‘लुगडं? ‘ मी बरोबर ओळखलं.

मी झट्दिशी उठलो. घरी जाऊन माझ्या आजीची दोन-चार लुगडी घेऊन येण्यासाठी..

तिने हातानंच खूण करत कुठे चाललास असं विचारलं. मी ही खुणेनंच सागितलं, ‘लुगडं घेऊन येतो…! ‘

तिनं मला परत खुणेनच जवळ बोतावलं. मी खाली वाकलो. ती. कानाजवळ येऊन एकेक शब्द तोडत बोलली, ‘जुनं तुज्या आजीचं लुगडं मला नगो, नव्वंकोरं आन तुज्या पैशाचं.. घडी मीच मोडनार… मरनाऱ्या मान्साला जुनं दिऊ न्हाई काई… माज्या पोरानं मला नवं लुगडं आनलं, ह्येजातच माझा आनंद… ‘ हे बोलून ती पुन्हा गूढ हसली.

– – तिचं बोलणं ऐकून मी शहारलो. स्वतःच्या मरणाविषयी इतकी अतिप्तता..!

बरं तिनं कसं ओळखलं ती मरणार आहे ते…?

मी विद्यार्थीदशेत… नवं लुगडं आणायला माझ्याकडे कुठले पैसे त्यावेळी? पण पुढच्यावेळी आलो की घेऊन येईन असे सांगून मी उठलो होतो.

पुढे काही वर्षांनी डॉक्टर झाल्यावर पुन्हा गावी गेलो. गाव चांगलंच सुधारलं होतं.

म्हातारीचं घर मात्र पडून गेलं होतं. पत्रे गंजले होते, ज्या खाटेवर ती झोपायची ती खाट तुटून पडली होती, एका कोपऱ्यात लोळागोळा होऊन… गाव खरंच सुधारलं होतं.

– – शेजारी उभ्या असणाऱ्या एकाला खुणेनं विचारलं, ‘म्हातारी कुठंय? ‘ तंबाखूची पिंक टाकत तो म्हणाला होता, ‘कोन? ती हाडळ व्हय? आरं ती मेली की कवाच… कोन नव्हतं तिला… ‘

पुढचं मला ऐकूच आलं नाही.

कोण नव्हतं तिला? कसं सांगू…?

ती मेली नाही… माझ्या मनात ती कायम जिवंत आहे…!

कोण कसं नव्हतं? मी होतो की तीचा, मनातून तिनं मुलगा मानलं होत मला?

… आई होऊन ती गेली. मलाच मुलगा होता आलं नाही..!!!

प्रत्येकवेळी आपलं मुल भेटत होतं, म्हणून ती तशी गूढ हसली असेल का?

यानंतरही मी अनेकवेळा गावाला गेलो. पण गल्लीत फिरताना हे पडकं घर मी टाळतो.

मला भीती वाटते आणि लाजही!

… पटकन् समोर येऊन ती दे माजं नवकोरं लुगडं अशी पटकन पुढ्यात येऊन मागेल ही भीती… आणि मी तिला ते कधी देऊ शकलो नाही याची लाज.

डॉक्टर झाल्यानंतर पैसे होते रग्गड माझ्याकडे. पण एक लुगडं घेण्याइतकाही मी श्रीमंत नव्हतो, त्या अर्थानं मी ही गरीबच की!

माणसाकडं पैसा असला की तो श्रीमंत होतो असं नाही…! या पैशानं जेव्हा कुणाचा दाह कमी होतो, वेदना कमी होतात, तेव्हा त्या पैशाची ‘लक्ष्मी’ होते. नाहीतर नुसतेच तो कागद किंवा वाजणारी नाणी. खिशात लक्ष्मी असेल तो खरा श्रीमंत.. बाकीचे नुसतेच धनिक!

नोटा आणि नाण्यांचे धनी!!

तिच्या पडक्या घराला तोक *हाडळीचं घर* म्हणतात, मी त्याला आईचं स्मारक समजतो.

– – ती गेली. माझ्या डोक्यावर एका न पेलणाऱ्या लुगड्याचं ओझं ठेवून गेली.

– – तिच्या घराजवळनं जाताना मी नजर चोरतो, एखादा देणेकरी असल्यासारखा…

पण का कोण जाणे…? त्या पडलेल्या घराकडं तरीही पाय वळतातच… आणि उगीचच भास होतो. तुटलेली ती जीर्ण खाट… माझ्याकडे बघत मंद मंद हसते आहे. गालातल्या गालात.. तसंच गूढ..!!!

… आणि मी पाय ओढत एकटाच मी तिथून चालायला लागतो, कुढत… आई नसलेल्या एखाद्या बेवारशासारखा…!!!

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १. ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १. ☆ प्रा.भारती जोगी ☆

सगुणाबाई जनार्दनराव पेशवे 

समिधाच सख्या या!! …

” मी सगुणाबाई! नाही ना ओळख लागत? नावही नाही आठवंत ना? बरोबरंच आहे ना… इतिहासाच्या कुठल्या पानात गडप झाले, जमा झाले, हरवले कुणास ठाऊक!

 आता मीच देते ओळख करून…

मी… *सगुणाबाई*! थोरल्या बाजीरावांची धाकटी सून… जनार्दन रावांची पत्नी. सुंदर, गोरीपान आणि विशेष म्हणजे… शिकलेली!

सातारच्या भिडे सावकारांची मी कन्या, वयाच्या ५व्या वर्षी १० वर्षाच्या जनार्दन रावांची पत्नी बनून पेशव्यांच्या घरात आले. आणि जाणवले की बाई गं, मला तर इथे अनेक एकाहून एक अशा मातब्बर सासू आणि जावांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचयं!

गंमत वाटली ना, अस्तिवाचं टिकवणं तेव्हाही होतं… हे वाचून! पण खरंयं ते!

पण हाय रे दैवा! अस्तित्व टिकवून ठेवीन म्हणंत असतांनाच… अचानक कर्नाटक च्या मोहिमे वरून परततांना जनार्दन रावांना टायफॉइड झाला, आणि मी १०व्या वर्षीच विधवा झाले हो! *बालविधवा* हा शिक्का कपाळावर, आणि लाल आळवण अंगावर! सौभाग्य म्हणजे काय? हे देखील कळले नव्हते, आणि बालविधवा म्हणजे काय? हे तरी कुठे माहिती होतं??

तुम्हाला सांगते… सासर-माहेर दोन्हींची श्रीमंती… पण… सौभाग्याची श्रीमंती हिरावून नेली ना नियतीने! नव-याचा केवळ १४ व्या वर्षी मृत्यू… त्यामुळे एकही पराक्रम नावावर नाही… त्यामुळे मी अभिमानाने मिरवावं असं कुठलंही पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता ही नाही. जगायला कुठलं कारण ही नाही. मग काय… मरेपर्यंत जगावं लागणार, म्हणून मग विरक्ती ची वाट धरली, बालवयातच! हो! कारण… बालविधवा म्हणजे… *समिधा*!! मूक, मौन, शांत जळंत राहणा-या! त्यांत कुठला आलायं ना ओलावा?

पण एक आधार मिळाला, वेळ घालवायला… *ग्रंथवाचन*! वेगवेगळ्या ठिकाणाहून ग्रंथ मागविले,

दुर्मिळ ग्रंथ संग्रह केला. भरपूर वाचन केले. पोथी-पुराणे ही वाचली. तीर्थक्षेत्री च्या तीर्थ यात्रा ही केल्या.

तुम्हाला एक गंमत सांगते… इतिहासाने माझी नोंद नाही घेतली, पण माझ्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाची मात्र नोंद आहे… कदाचित… अ क्षर असा अ क्षय साठा… म्हणून तरला की काय??

असंच वैराग्य युक्त, वैराण आयुष्य आणि वय सरंत होतं… वर्षा-वर्षानी पुढं-पुढं!! कुटुंबातील अनेक मृत्यू या डोळ्यांनी बघितले, पचवले… मायाळू सासू काशीबाई, पित्यासमान नानासाहेब, भावासमान सदाशिव राव, नारायण राव… एक ना अनेक!

पण तुम्हाला सांगते… माधवराव आणि रमाबाईंचं आकस्मिक जाणं… नाही पेलवलं गेलं हो! हा चटका नाही साहता आला. मग खूपच एकटेपण आलं… प्रकृती बिघडली… खालावतच गेली… आणि साता-याजवळ वडूज गावी, वाड्यात… कायमची विसावले मी!

आणि… आणि… पेशवाईतील…

 *पहिली बालविधवा*… इतिहास जमा झाली… एक समिधा निमाली.!

– लेख क्र. १.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाळणा हलणार की नाही? ☆ अर्चना मुळे ☆

अर्चना मुळे

 ? इंद्रधनुष्य  ?

☆ पाळणा हलणार की नाही? ☆ अर्चना मुळे☆

 – एक सामाजिक प्रश्न

एक काळ असा होता की, आई होताना सामाजिक, कौटुंबिक सक्ती असायची. ‘मुलगाच हवा’ हा हट्ट अनेक तरूणीना जाळणारा, विहिरीत ढकलणारा, माहेरी परत पाठवणारा, निराशा, औदासिन्य, ताणतणाव देणारा होता. मूल हवंच आणि मुलगाच हवा यामधल्या ‘च’ ने त्या काळातील मूल न होणार्‍या किंवा मुलगा न होणार्‍या तरूणींचा प्रचंड मानसिक छळ केला. त्या काळातील ‘मूल हवंच’ या विचारामागे शेतात आणि घरात राबण्यासाठी हात हवे असणे. वृद्धापकाळासाठीचा आधार तयार करणे. मृत्यूनंतर मुलाकडून अग्नी मिळाला तरच मोक्षप्राप्ती होते या कल्पनेनुसार सद्गती मिळवणे. अशी काही कारणं होती. मुलांचा सांभाळ हा सहज व्हायचा. तेव्हा एकल पालकत्व, द्विपालकत्व असा काही प्रकार नव्हता. एकत्र कुटुंबपद्धतीत मुलं हसत खेळत मोठी व्हायची. सामाजिक पालकत्व असायचं. मुलांचा खर्च एकत्रितपणे केला जायचा. त्यामुळे पालकत्व निभावताना तणाव नसायचा. मुलांची संख्या कितीही वाढली तरी फारशी अडचण नसायची. ‘ज्याने दिली चोच तो भरेल पोट’ असंही म्हटलं जायचं. मूल नसणं म्हणजे पाप होतं. शाप होता. त्यापेक्षा मुलांना जन्म देऊन सन्मानपूर्वक जगणं किंवा स्वत:ची सामाजिक प्रतिष्ठा टिकवणं यालाच महत्त्व दिलं जायचं.

काळ बदलला. मानवी संस्कृती – मानवी मूल्ये बदलली. जगण्याची व्याख्या बदलली. सावित्रीच्या लेकी शिकू लागल्या. कर्तृत्वाने मोठ्या होऊ लागल्या. ‘मुलगी झाली तर चालेल’ हा विचार समाजात रुजायला लागला. पूर्वीचा ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव! ‘ हा आशीर्वाद मागे पडायला लागला. आताच्या जोडप्यांच्या कुटुंबाच्या उंबरठ्यावर ‘मूल नकोच’ हा शांतपणे, जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय स्तब्ध उभा आहे.

काही वर्षापूर्वी ‘मूल का नाही’ हा प्रश्न विचारला जायचा. आता ‘कशासाठी मूल हवंय’ असा प्रश्न विचारला जातो. मूल नको हा काही नगण्य लोकांचा विचार नाही. तो सामाजिक कल बनला आहे. या विचाराकडे गांभीर्याने बघणं अपेक्षित आहे.

विवाहानंतर दीप आणि निला दोघं पुण्यात स्थायिक झाले. दोघंही आय टी कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी त्यानी अजून मुलाचा विचार केलेला नाही. ते म्हणतात, “शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडणं, स्वत:चं छोटंसं घर घेणं यात १०-१२ वर्षे निघून गेली. आता बाळाचा विचार केला तर नैसर्गिकपणे गर्भधारणेत अडचणी आहेत. डाॅक्टरनी सुचवलेले इतर पर्याय शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रासदायक आहेत. त्यातूनही बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतलाच तर आम्ही बाळाला वेळ देऊ शकणार नाही. त्याला पाळणाघरात ठेवणं आम्हाला पटत नाही. नातेवाईकानी आम्हाला स्वार्थी म्हटलं. जबाबदार्‍या नको आहेत असंही म्हटलं. पण आम्ही ठरवलं. लोक म्हणतात म्हणून आम्ही बाळाला जन्म देणार नाही. त्याला उत्तम असं आयुष्य आम्ही देऊ शकत नाही. तर जन्माला घालून त्याच्यावर अन्याय करण्याचा आम्हाला अधिकार नाही. म्हणून आम्ही बाळाला जन्म न देण्याचा निर्णय जबाबदारीने, दोघांच्या विचाराने जाणीवपूर्वक घेतला आहे. “

– – अशी ही पिढी.. या विषयावर जेन झी मोकळेपणाने बोलतात. त्यानी आणखी काही कारणं सांगितली.

नोकरी व्यवसायात खंड पडण्याची भीती – आर्थिक स्वावलंबनाच्या हेतूनेच प्रचंड मेहनतीने शिक्षण पूर्ण केलेलं असतं. नोकरी मिळालेली असते. त्यानंतर थोडं स्थिरस्थावर होतं न होतं तो लगेच बाळाचा विचार करू शकत नाही. नोकरीमुळे बाळाची जबाबदारी नीट पार पाडू शकत नाही. नोकरी तर सोडूच शकत नाही. कारण एकदा खंड पडला तर प्रगती खुंटेल. आणि पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करावी लागेल. अशी भीती या पिढीला वाटते.

आर्थिक ओझं – एक चांगला पालक होऊ शकतील की नाही याची भीती असते. उत्तम शिक्षण, उत्तम भौतिक सुखं देण्यात ते कमी पडतील असं त्याना सतत वाटत असतं. मुलांचं संगोपन हे आर्थिक ओझं वाटतं. चोवीस तास पालकत्वाची जबाबदारी पेलणं खूप कठीण आहे. या चिंतानीच पालक न होण्याचा निर्णय घेतला जातो.

दूषित पर्यावरण – स्वच्छ हवा, पाणी, अन्न मिळणं अशक्य आहे. आपण मुलाना कोणत्या प्रदूषित वातावरणात ढकलत आहोत याची जाणीव तरूणाना आहे. आम्हालाच जे मिळत नाही, ते आम्ही मुलाना कुठून देणार असाही विचार ही जोडपी करताना दिसतात.

शारीरिक – मानसिक आरोग्य – आजूबाजूचं वातावरण, शैक्षणिक ताण, मित्रांचा दबाव या सगळ्यात मुलं कितपत आरोग्यपूर्ण जगतील ही शंका येते. मुलांना निरोगी आयुष्य देणं ही जबाबदारी पालकांची असते.

उशिरा होणारी लग्नं – आजकाल लग्नाचं सर्वसाधारण वय तीस वर्षे झालं आहे. त्यानंतर गर्भधारणा किंवा प्रसूती यामधली गुंतागुंत वाढू शकते. धोका पत्करायला नको म्हणूनही अपत्यहीन राहण्याचा निर्णय घेतला जातो.

‘मुलगाच हवा’ पासून ‘मूलच नको’ हा प्रवास म्हणजे आधुनिक दर्जेदार जीवनशैली, बदलत जाणारी कौटुंबिक, सामाजिक मूल्ये आणि आर्थिक स्थैर्य याचा प्रभाव असं म्हणावं लागेल. सामाजिक नियमांची चौकट कधीच ओलांडली गेली. आता ‘पाळणा हलणं’ हा वैयक्तिक निर्णय झाला आहे. आधी आपण तर नीट जगू, मग नव्या जीवाला या जगात आणायचं की नाही ते ठरवू असं म्हणणारी ही पिढी आहे.

अपत्यप्राप्तीचा बदलता दृष्टिकोन-

पूर्वीचा काळ – या काळात अपत्य प्राप्तीचा मुख्य उद्देश वंश वाढवणे.. हे कौटुंबिक, सामाजिक कर्तव्य आहे असं मानलं जायचं. मुलांना भविष्यातील आर्थिक आधार समजलं जायचं. तेव्हा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकत्र कुटुंबात विभागली जायची. मातृत्व हेच स्री जीवनाचं सार्थक मानलं जायचं. अपत्यप्राप्ती न होणं हा सामाजिक अपमान होता. लग्नानंतर मूल होणं नैसर्गिक पण अनिवार्य होतं. अपत्याकडे म्हातारपणाची काठी म्हणजेच आधार म्हणून बघितलं जायचं.

आधुनिक काळ – या काळात अपत्य प्राप्तीचा उद्देश हा वैयक्तिक आनंद मानला जातो. मूल होऊ देण्याचा निर्णय हा स्वेच्छेने घेतलेला असतो. जबाबदारीची जाणीव असते. मुलांच्या संगोपनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. संगोपनाचा खर्च मोठा असतो. विभक्त कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाचा ताण पालकांवर असतो. पालक स्वत:चं करिअर, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वत:ची ओळख निर्माण करण्याला महत्त्व देतात. स्वेच्छेने मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतात. स्वत:च्या म्हातारपणाची काठी स्वत:च होतात. त्यासाठी आर्थिक तरतूद करूनच निर्णय घेतात.

पूर्वी नशीबाने, देवकृपेने मुलं व्हायची. आज निश्चयाने मुलं होतात. आधुनिक जोडपी सर्व आव्हानांचा विचार करतात. मानसिक तयारी करतात. मूल होणं ही आजच्या जोडप्यांची गरज नाही. मूल होऊ देण्यात कोणतीही जबरदस्ती ते ओढवून घेतच नाहीत. नवीन जोडप्याना बाळ न होण्यात अपूर्णत्व वाटत नाही. बाळाला जन्म देण्याचा निर्णय म्हणजे जाणीवपूर्वक स्वीकारलेलं पूर्णत्व असं त्यांना वाटतं. जबाबदार्‍या नको आहेत. स्वातंत्र्य हवंय असं काही नाही. न जन्मलेल्या बाळाचा ते प्रामाणिकपणे विचार करतात. त्यांच्या घरातला पाळणा रिकामा राहिला तरी त्यांचं जग अनेक सुखानी भरलेलं असतं. हेच आधुनिक सामाजिक सत्य आहे. जबाबदारीच्या जाणीवेतून स्वेच्छेने पालकत्व स्वीकारणे ही सजगतेची नांदी आहे. पण मूल होऊच न देणार्‍यांची संख्या वाढते आहे. म्हणूनच ‘पाळणा हलणार की नाही? ‘ हा सामाजिक उंबरठ्यावरचा प्रश्न झाला आहे.

© अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर” – लेखक : श्री विनय मधुकर जोशी ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर” – लेखक : श्री विनय मधुकर जोशी ☆ शोभा जोशी ☆

चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया. या तारखेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो. देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो. अनेक शुभ चिन्हांची रांगोळी ‘चैत्रांगण’ काढली जाते.

गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते. गौरी ही भौतिक समृद्धीची देवता. अन्नधान्य, वात्सल्य, धन संपत्ती, सौंदर्य, मांगल्य, कौटुंबिक सौख्य ही सारी काही तिचीच कृपा. आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान! . योग, वैराग्य, ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान.

शिव-पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते. बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले, “ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट. “

 

पार्वती म्हणाली, “अहो हे सुंदर विश्व? “

शिव म्हणाले, “साफ खोटं, आभासी आहे हे. “

“विश्वातील सौंदर्य, मांगल्य, नातीगोती?

तेही असत्य?

बरं. मग आपण खातो ते अन्न तरी? “

“तेही खोटं, असत्य, आभासीच, फक्त ब्रह्मतत्त्व सत्य! “

 

झालं …. गौरीला आला थोडा राग. ती म्हणाली, “बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खरं. बाकी सगळं आभासी ना? या क्षणी मी अंतर्धान होते. “

गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले, नात्यांचा गोडवा उडाला, घराचे घरपण हरपले, सात्त्विक सौंदर्य विरले, आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्यसुद्धा अकस्मात संपले.

 

शिवांना वाटले, हरकत नाही. या वाचून जगाचे काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्ख्या जगातले देव, मानव, ऋषी, पशुपक्षी, सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले.

महादेव म्हणाले, “थांबा. तुम्हाला जरा ज्ञान देतो. ” पण भुकेल्या पोटी कसलं ब्रह्म? कसलं ज्ञान?

“आधी अन्न द्या. मग पुढचं बोला. “

पण अन्न आणायचे कुठून. कोणीतरी सांगितलं, ” संपूर्ण विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे. तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले.

“ओम भवति भिक्षां देही|”

आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला, ” महादेवा, भिक्षेत काय देऊ? ज्ञान की वैराग्य?

महादेवांनी पाहिलं, आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे, मांगल्य लेवून, पावित्र्य पांघरून, समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र, वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जिवाला अन्न देऊन तृप्त करते आहे.

प्रपंचाशिवाय परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती, शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला. शिव म्हणाले, “ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी. त्यासाठी सकस अन्न हवे. अन्न हे पूर्णब्रह्म. त्याचीच भिक्षा दे!

ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।”

पार्वती हसली. तिने आनंदाने शिवांना भोजन दिले. शिव तृप्त होताच जगातले सगळे जीवदेखील तृप्त झाले.

त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले, ” तू सदाशिवालासुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस. जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस. “साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.

ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवरदेखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायकोसुद्धा मिळेल ते रांधून घराला जेवू घालत होती. परिस्थितीचा फरक असेल, पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे. कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात. तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं, नाती जपावीत, घराला घरपण द्यावं. हे सगळं करत असताना “गृहिणी कुठे काय करते? ” असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.

या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर. रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते. किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात. त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वगैरे. गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.

स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।

दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥

पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.

शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे ।

ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।

लेखक: श्री विनय मधुकर जोशी

प्रस्तुती : शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “माणिक मोती” — लेखिका : शोभा बेंद्रे ☆ परिचय – उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “माणिक मोती” — लेखिका : शोभा बेंद्रे ☆ परिचय – उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

पुस्तक : माणिक मोती – – माणिक वर्मा आणि परिवार..

लेखिका – शोभा बोंद्रे 

राजहंस प्रकाशन 

आवृत्ती पहिली, 12 मे 2025..

अलौकिक कलाकार आणि अलौकिक व्यक्तिमत्व— माणिक वर्मा (दादरकर) आणि अमर वर्मा — 

शोभा बोंद्रे यांनी माणिक ताईंच्या संपूर्ण परिवाराकडून त्यांच्याबद्दलची दिलेली माहिती तसेच माणिक ताईंचे बालपण, त्यांची शैला दातार यांनी घेतलेली मुलाखत या सर्व गोष्टींचा या पुस्तकात समावेश केला आहे. तसेच विशेष म्हणजे पु. ल. देशपांडे यांनीही माणिकताईं विषयी लिहिलेले या पुस्तकात समाविष्ट आहे.

माणिक ताईंच्या आईने त्यांनी संगीत शिकावे म्हणून खूप परिश्रम घेतले. त्यांनी स्वतः जातीने त्यांच्या गायन, शिक्षणात लक्ष घातले. त्यांची गाण्याची पहिली रेकॉर्ड वयाच्या बाराव्या वर्षीच निघाली. गाण्याबरोबरच शाळेचा अभ्यास, परीक्षा, गाण्याची तालीम हे सर्व त्या वयाच्या तेराव्या वर्षीच करत होत्या. माणिकताई दिसायला सुंदर आणि त्यांचे व्यक्तिमत्व सोज्वळ असे होते. त्यांचे गाजलेले पहिले गाणे ‘सावळाच रंग तुझा… ‘त्यानंतर त्यांनी गायलेले ‘हसले मनी चांदणे’ हे गाणेही प्रसिद्ध झाले. माणिकताईंची शेकडो गाणी सुपरहिट झाली!

चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत अमर वर्मांना माणिक भेटली आणि पहिल्याच भेटीत ती त्यांना आवडली. आयुष्याचा जोडीदार म्हणून दोघांनीही एकमेकाची निवड केली आणि 21 मे 1948 ला त्यांचे लग्न झाले. प्रथम पुण्याला संसार थाटला. राहायची सोय झाली. माणिक ताईंचे गाणेही बहराला आले. त्याचबरोबर माणिक ताईनी आपले बी. ए. चे शिक्षण ही पूर्ण केले.

‘अमृताहुनी गोड.. ‘हे गाणे त्यांनी बालगंधर्वांना म्हणून दाखवले, तसेच बालगंधर्वांची नाट्यगीते ही माणिकताईंनी गायली.

माणिक ताईंना चार मुली… भारती, अरुणा, वंदना आणि राणी..

या चारही मुलींनी त्यांचे आयुष्य भरभराटीला आणले होते. त्या चौघीही वेगवेगळ्या कलेच्या प्रांतात सुप्रसिद्ध झाल्या. माणिक ताईनी मुलींना उत्तम वळण लावले. आपल्या गाण्याच्या दौऱ्यांमुळे मुलींकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मुलींना मामा-मामींच्या सहवासात पुणे येथे ठेवले होते. या सर्वांनी एकमेकांना साथ दिली. या पुस्तकात प्रत्येकाने आपल्या आईबद्दलच्या आठवणी सुंदर शब्दात सांगितल्या आहेत.

या पुस्तकात लिखाणाची अशी विविधता असल्याने पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही आणि कादंबरी प्रमाणे सलगच वाचले पाहिजे असे होत नाही. कुठूनही सुरुवात केली तरी वाचनाचा आनंद घेता येतो!

माणिकताईंचा भरभराटीचा काळ चालू असतानाच त्यांना अचानक मोठा आजार झाला. त्यांची मेमरी गेली. गाणेच काय तर त्यांना बोलता ही येईना. मुंबईच्या मकरंद सोसायटीतील खूप आठवणी या पुस्तकात वाचायला मिळतात.

हैदराबाद इस्टेट मधील घरात राहत असतानाच माणिक ताईंना मॅनेंजायटीस झाला आणि त्या कोमात गेल्या. त्यावेळी अमर वर्मा नी सर्व कुटुंबाला आधार दिला. माणिक ताईंची काळजी घेतली. तीन महिने कोमात असलेल्या माणिक ताईंनी एक दिवस डोळे उघडले आणि त्या हळूहळू शुद्धीवर आल्या.

शुद्धीवर आल्यावर काही दिवस त्या विस्मरणातच होत्या, पण हळूहळू सुधारणा होऊन पुन्हा त्यांचे गाणे सुरू झाले. या काळात त्यांना कुटुंबाची मोलाची साथ मिळाली.

भारतीताईंना गाण्याची आवड नव्हती, तर वंदनाताईंच्या लेखनातूनच त्यांचा खोडकर स्वभावही दिसून येतो. अरुणाला वेगळ्या क्षेत्राची आवड होती तर राणीला लहान मुलींची गाणी गायला मिळाली होती! राणी वर्मा ची बालगीते अजूनही प्रसिद्ध आहेत. चौघीनींही आपापल्या क्षेत्रात चांगले नाव मिळवले.

चौघीही मुलींना चांगले वळण माणिक ताईंनी लावले होते. माणिकताईंचे व्यक्तिमत्व अतिशय सोज्वळ होते. तसेच स्वभाव मृदू होता.

या पुस्तकात पु ल देशपांडे, शिष्या शैला दातार, आशा खाडीलकर, किशोरी आमोणकर, विकास कशाळकर, डॉक्टर केशव चैतन्य कुंटे, सुहास व्यास यांचेही लेख आहेत.

यांच्या लेखातून माणिक वर्मा यांच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला प्रकाश टाकला आहे, तसेच त्यातून माणिक ताईंचे सुसंस्कृत, गुणी व्यक्तिमत्व समोर येते. माणिक वर्मांची अनेक गाणी खूप गाजली आहेत, आवडली आहेत त्यामुळे अर्थातच माणिक ताईंच्या आयुष्यातील घटना संबंधी वाचायला चांगले वाटले! तसेच एका सुप्रसिद्ध गायिकेची कारकीर्द कळली. माणिक वर्मांची गाणी अजूनही आपल्याला ऐकायला खूप आवडतात.

 रामनवमीच्या निमित्ताने ‘विजय पताका श्रीरामाची, झळकते अंबरी… ‘ हे गाणे नुकतेच ऐकायला मिळाले 

आणि माणिक ताईंचे पुस्तक वाचायला मिळाले याचा आनंद झाला..

©  उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # ३३० ☆ कथा कहानी – सूखी पत्ती ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम विचारणीय कथा – ‘सूखी पत्ती‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # ३३० ☆

☆ कथा-कहानी ☆ सूखी पत्ती

दफ्तर की इमारत वैसी ही है जैसी सरकारी इमारतें अमूमन होती हैं— बदरंग और बेरौनक। कई सालों से उसमें रंगाई-पुताई नहीं हुई। भीतर दीवारों पर बरसाती पानी के बड़े-बड़े धब्बे बारह महीने उपस्थित रहते हैं। बाहर की दीवारें काली हो रही हैं। टॉयलेट में थोड़ी देर खड़े रहने पर छत से पानी की बूँद चाँद पर टपककर मन को पवित्र कर देती है।
गेट और दफ्तर की इमारत के बीच जो खाली ज़मीन है उसमें कई तरह के पौधे बेतरतीब उग आये हैं। उनकी कटाई-छँटाई का कोई इन्तज़ाम नहीं है। इन्हीं के बीच से दफ्तर तक का घुमावदार रास्ता गुज़रता है।

इसी दफ्तर में पाँच छः बाबू बैठते हैं। बगल में छोटा सा कमरा बड़े बाबू का है, और उसके पार साहब का कमरा। साहब के आने-जाने का कोई निश्चित वक्त नहीं है। इससे बाबुओं को कोई दिक्कत भी नहीं होती। साहब के न रहने पर आज़ादी और मौज का वातावरण रहता है। बड़े बाबू को पटा कर कोई सुविधा ली जा सकती है।

दफ्तर में बैठने वाले बाबुओं में निरंजन बाबू, बेनी बाबू, गोस्वामी बाबू और सिंह बाबू हैं। इनके अलावा एक रजक बाबू भी हैं। रजक बाबू सीधे-सादे आदमी हैं। कोई उनका मज़ाक उड़ाये  तो बुरा नहीं मानते। हल्के से हँसकर उसे झेल लेते हैं। प्रतिवाद नहीं करते। रजक बाबू का रहन-सहन बहुत सादा है, जैसा साधारण परिवारों का होता है। अपने इन्हीं गुणों के कारण वे अक्सर अपने सहकर्मियों के निशाने पर रहते हैं। उनकी सिधाई और कपड़ों-लत्तों को लेकर मज़ाक चलता रहता है, लेकिन उन्हें कोई फर्क नहीं पड़ता।

बड़े बाबू बड़े नफासत-पसन्द व्यक्ति हैं। अच्छे सिले, साफ-सुथरे कपड़े पहनते हैं और माथे पर लाल तिलक लगाते हैं। पान की डिबिया हमेशा बगल में रखते हैं और एक पान मुख में। दफ्तर पहुँचते हैं तो चपरासी पूरनलाल दौड़कर उनका स्कूटर थाम कर पार्किंग के लिए ले जाता है।

रजक बाबू अब भी दीक्षितपुरा के अपने पैतृक घर में रहते हैं। घर काफी पुराना है और मुहल्ला भी पुराना, टेढ़ी-मेढ़ी गलियों वाला है। दिन में कई बार ट्रैफिक-जाम होता रहता है, लेकिन रजक बाबू का मन वहीं रमता है। मित्र और सहकर्मी उन्हें कई बार बिन-माँगी नसीहत दे चुके हैं कि अब वे एक इज़्ज़तदार नौकरी में आ गये हैं, अब उन्हें अपना बसेरा किसी ऊँची कॉलोनी में बना लेना चाहिए। लेकिन रजक जी ‘मेरो मन अनत कहाँ सुख पावे’ वाले हैं। वह घर और वह मुहल्ला छोड़ने की बात उनके गले उतरती नहीं।

रजक बाबू के परिवार में पीढ़ियों से कपड़े धोने और प्रेस करने का काम होता रहा है। माता-पिता ने इसी काम से कमाई की और बच्चों को पढ़ाया-लिखाया। मुहल्ले में उन्हें सब जानते हैं। रजक बाबू भी खाली समय में पिता-माता का हाथ बँटाते रहे। अब दफ्तर में नियुक्त होने पर भी उन्हें अपने घर के धंधे में कोई खोट नज़र नहीं आता।

पिता ज़िन्दगी भर खड़े-खड़े प्रेस करते रहे, इसलिए अब साठ पैंसठ की उम्र में उनकी टाँगें जवाब देने लगी हैं। माँ स्थूल हो गयी हैं, उनसे ज़्यादा काम नहीं होता, इसलिए रजक बाबू सुबह- शाम उनकी मदद करते रहते हैं। माँ कपड़ों की गठरी लेकर मुहल्ले में प्रेस के कपड़े दे आती है। मुहल्ले के बाहर के भी कुछ ग्राहक हैं, उनके कपड़े पहुँचाने के लिए साइकिल पर गठरी रखकर खुद रजक बाबू निकल जाते हैं क्योंकि पिता को अब साइकिल चलाने में घुटनों में तकलीफ होती है। रजक बाबू का छोटा भाई भी है, लेकिन वह कॉलेज में पढ़ता है और उसे कपड़े लेकर लोगों के घर जाने में अपनी बेइज़्ज़ती लगती है। साथ पढ़ने वाले लड़कों-लड़कियों से टकरा जाने का भय भी होता है।

दफ्तर में रजक बाबू के इस काम को लेकर तानाकशी और फिकरेबाज़ी होती रहती है। उनके सहकर्मियों का खयाल है कि रजक बाबू के कपड़ों की गठरी लेकर घूमने से दफ्तर की इज़्ज़त गिरती है। उनके खयाल से यह काम ‘बिलो स्टैंडर्ड’ है। जिस दिन कोई सहकर्मी उन्हें गठरी के साथ देख लेता है उस दिन आक्षेप तेज़ हो जाते हैं— ‘दे आये कपड़े?’  ‘ग्राहक खुश हैं? कोई नाराज तो नहीं हुआ?’ ‘बैठने के लिए कुर्सी मिली या पूरे टाइम खड़े ही रहे?’ ‘बड़े आज्ञाकारी हो भैया।’ ‘ऊँचा पद पाने से कुछ नहीं होता, उसे मेंटेन भी करना पड़ता है।’ बेनी बाबू इस फिकरेबाज़ी में शामिल नहीं होते क्योंकि हर महीने बीस तारीख के बाद उनकी तनख्वाह चुक जाती है और ऐसे में उन्हें रजक बाबू से हजार पाँच सौ की मदद मिल जाती है। अन्य सहकर्मी इस मामले में ज़्यादा उदार नहीं हैं।

रजक बाबू कई बार अपने साथियों को बता चुके हैं कि वे यह यह काम सिर्फ अपने माँ-बाप की मदद के लिए करते हैं, कमाई के लिए नहीं। उन्हें इस काम में कुछ गलत या कोई बेइज़्ज़ती की बात नज़र नहीं आती। उनके हिसाब से कोई काम बड़ा या छोटा नहीं होता। किसी काम से आदमी की इज़्ज़त नहीं घटती। वे महात्मा गाँधी का उदाहरण देते हैं जो अपने सारे काम खुद ही करते थे।

यह सुगबुगाहट बड़े बाबू के कानों तक भी पहुँच चुकी है और वे एक दिन रजक बाबू को बुलाकर उन्हें लेक्चर भी पिला चुके हैं। आवाज़ में मिश्री घोल कर उन्होंने रजत बाबू को समझाया था, ‘देखो भैया, हमें तो बहुत अच्छा लगता है कि आप अपनी इज्जत की कीमत पर अपने माँ-बाप की सेवा करते हो, लेकिन कुछ बातें हैं जो आप को समझना चाहिए। मेहनत मजदूरी के काम करने वालों को हम ‘ब्लू कॉलर वर्कर’ कहते हैं और दफ्तर का बाबू ‘व्हाइट कॉलर वर्कर’ होता है। ‘ब्लू कॉलर वर्कर’ की कैटेगरी से उठकर ‘व्हाइट कॉलर’ की कैटेगरी में आना बड़े भाग्य की बात है। आप इस मामले में भाग्यशाली हैं। तो आपको लौटकर ‘ब्लू कॉलर वर्कर’ नहीं बनना चाहिए। इससे हमारे एस्टेब्लिशमेंट की प्रतिष्ठा घटती है।’

थोड़ा रुक कर वे बोले, ‘आप समझिए कि हमारे समाज में मेहनत-मजदूरी करने वाले की इज्जत नहीं है। किसी मजदूर को किसी घर में कुर्सी पर बैठे देखा है क्या? उसे बैठने के लिए जमीन ही मिलती है। आप आज इस लायक हो गये कि समाज में इज्जत पा सकें, इसलिए आपको निचली कैटेगरी के काम से बचना चाहिए, वर्ना बड़ी मुश्किल से कमायी इज्जत कभी भी हाथ से खिसक सकती है। मैं आपको वह काम करने से मना नहीं कर रहा हूँ, लेकिन आपको खुद इस मामले में सोच समझ कर काम करना चाहिए। आप खुद सोचिए कि जो लोग आपसे दफ्तर में मिलते हैं वे आपको बाहर कपड़ों की गठरी लेकर घूमते देखकर क्या सोचते होंगे? अपनी इज्जत का खयाल हम खुद नहीं रखेंगे जो दूसरे क्यों रखेंगे?’

लेकिन इस प्रबोधन के कुछ दिन बाद मामला फिर गर्मा गया। मामला तब उठा जब रजक बाबू ने निरंजन बाबू को अपने बच्चों के लिए दफ्तर की स्टेशनरी देने से मना कर दिया। रजक बाबू दफ्तर की स्टेशनरी के इंचार्ज हैं। निरंजन बाबू तब से बिफरे हैं और उन्होंने बड़े बाबू से कह दिया है कि रजक बाबू जो कपड़े पहुँचाने का काम करते हैं उससे पूरे दफ्तर की नाक कटती है और उस पर तुरन्त कार्यवाही होनी चाहिए, अन्यथा उन्हें अपनी बात साहब तक पहुँचानी पड़ेगी।

बड़े बाबू ने रजक बाबू को तलब किया। मुलायमियत से बोले, ‘आपके अपने घर का काम करने की शिकायत बार-बार आती है। इस समस्या पर मैं सोचता रहा हूँ। मेरी समझ में आपकी समस्या की सारी जड़ यह है कि आप उस पुराने मुहल्ले में फँसे हुए हैं। वहाँ तंग गलियों में रहने से आदमी की सोच भी वैसी ही हो जाती है। मेरी मानिए तो लोन लेकर एक दो बेडरूम वाला फ्लैट ले लीजिए। अभी सब तरफ अपार्टमेंट बन रहे हैं, आसानी से मिल जाएगा। कम आउट ऑफ दैट मुहल्ला। दूसरी जगह दूसरी तरह के लोगों के साथ रहेंगे तो आपकी सोच भी बदलेगी। थिंक ओवर इट।’

रजक बाबू सहमति में सिर हिलाते हैं, फिर अपनी सीट पर बैठकर सोचते हैं। लोन लेकर फ्लैट खरीदने का मतलब है अपना चैन हराम करना। ऊपरी मंज़िल पर बिना लिफ्ट का फ्लैट मिला तो माँ-बाप से अलग होना होगा। बुढ़ापे में उनकी देखभाल और मदद कैसे होगी? उन्हें भाई के भरोसे नहीं छोड़ा जा सकता। नयी जगह में पुराने मुहल्ले जैसा सुकून, इत्मीनान और अपनापन मिलेगा?

बड़े बाबू की नसीहत याद करके रजक बाबू के मुख पर व्यंग्यपूर्ण मुस्कान आ जाती है। देखते हैं कि एक सूखी पत्ती उड़कर उनके कंधे से चिपक गयी है। उसे तर्जनी और अँगूठे से झाड़ कर वे सामने रखी फाइल में व्यस्त हो जाते हैं।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ गद्य क्षणिका# १०१ – धरती एक ही… – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे।

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय गद्य क्षणिका “– धरती एक ही…” ।

~ मॉरिशस से ~

☆ कथा कहानी  ☆ गद्य क्षणिका # १०१ — धरती एक ही — ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

अकूत धनवान सोचता था एक दिन इतना कुछ छोड़ कर जाना है। इस सोच से उसे रोना आ जाता था। इसी तरह की सोच एक फटेहाल आदमी के जेहन में कौंधती थी। कितने कष्ट से अपनी छोटी सी झोंपड़ी बनायी थी। एक दिन छोड़ कर जाना है। इस सोच से उसे भी रोना आ जाता था। शायद दुनिया के लिए यह नई बात न हो गरीब अपने जन्म की धरती के सीने पर लिखता हो मूल्यवान तो मैं भी होता हूँ।

 © श्री रामदेव धुरंधर
02 – 04 — 2026

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : rdhoorundhur@gmail.com

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares