मराठी साहित्य – विविधा ☆ “युद्ध आणि भारत…” ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

☆ “युद्ध आणि भारत…” ☆ शीला पतकी 

युद्ध हा शब्द आपण रामायण महाभारत हे वाचताना ऐकला यावरचे सिनेमे त्याच्या सिरीयल पाहताना ते पाहायला खूप मजा येत होती. रावणाची 10 तोंड बाणाने कापली जात असताना लहानपणी छान वाटायचं… मग बिभीषण सांगायचा नेमका बाण कुठे मारायचा आहे… मग रावण मरायचा… रामाचा विजय… रावणाचा अंत्यविधी… त्याला रामाची उपस्थिती… आणि मग सितेला घेऊन रामाचे परतणे…!

तसंच महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर झालेले युद्ध. सख्खे आणि चुलत यांचं… श्रीकृष्णाने सांगितलेली गीता… कुरुक्षेत्रावरती असलेल्या व्यवस्था… म्हणजे उद्या सैन्याचा किती सैनिकांचा स्वयंपाक करायचा किती मेले आहेत… किती उरले आहेत… हे श्रीकृष्ण खात असलेल्या शेंगाच्या टरफलावरून ठरत असे… आणि तितक्या लोकांचा स्वयंपाक युद्धभूमीवर व्हायचा… ह्या सगळ्या रंजक कथा वाचून कमाल वाटायची.

मी सातवीत असताना हिंदी प्रवीण परीक्षेला बसले होते. खरं तर ती परीक्षा बीए समकक्ष होती आणि मी फक्त सातवीत. त्यात अभ्यासाला एक पुस्तक होतं ‘भारत दर्शन ‘आणि त्यात काही लेख होते त्यातला कुरुक्षेत्रावरचा एक शेवटचा लेख होता त्यामध्ये मरताना दुर्योधन युधिष्ठराला म्हणतो “युधिष्ठिर मै तो विरोंको साथ लेकर स्वर्ग जा रहा हूं तुम विधवाओंको लेकर राज करो”*हे वाक्य संदर्भा सहित स्पष्टीकरण.. चार मार्क इतकाच अभ्यास केला… पण त्या वाक्याचा खरा अर्थ मोठ झाल्यावर कळायला लागला… की अरे खरंच युद्धामध्ये सर्वात जास्त नुकसान कोणाच होत असेल तर ते स्त्रियांचं होतं. पुरुष सगळे सैनिक… ते युद्धभूमीवर मरतात तो मरणारा माणूस कोणाचातरी भाऊ असतो,  कुणाचा तरी मुलगा असतो,  कुणाचा तरी बाप असतो,  कुणाचा तरी नवरा असतो, आणि या सगळ्या बायकांची म्हणजे आई मुलगी बायको या सगळ्यांची यानंतर परवड होते म्हणजे सर्वात जास्त नुकसान स्त्रियांचं होतं… त्यांना वैधव्य घेऊन बिनआधाराचे जगावे लागते आणि ते खरोखर कठीण होते… आणि तो विजय पांडवांच्या हातात येताना सुद्धा त्याला कारुण्याची केवढी झालर होती हे आपल्या लक्षात येईल. पांडव कोणावर राज्य करणार होते? … पुरुष तर सगळे मेले होते ना युद्धात…! ही ही सगळी त्याकाळी होणारी जमिनीवरची युद्ध त्या युद्धाला नियम होते. सामान्य माणसाला त्याची झळ फक्त या पद्धतीने लागत होती मालमत्तेचं नुकसान नव्हतं आताची युद्धं वेगळी आहेत पण कारणं तीच आहेत.. सत्ता…! माझ्या हातात सत्ता असायला हवी. आपल्या भूभागापलीकडे जाऊन मला सत्ता हवी आहे. आणि तो भूभाग मला काबीज करायचा आहे. तेच कारण आहे… तेल साठ्यांचा भूभाग आपल्या ताब्यात कसा येईल यासाठी प्रयत्न…! यामध्ये भारत मात्र चतुर आहे. एकीकडे विरोधी पक्ष हाकाटी पिटत आहे की भारताने कोणाची तरी बाजू घ्यावी नरेंद्र मोदी सारखा हुशार पंतप्रधान त्यांनी कोणाची बाजू घेणे पसंत केले नाही पण आपणच युद्धात मध्यस्थी केली पाहिजे अशी परिस्थिती मात्र फार पूर्वीपासून त्यांनी तयार केली आहे चाबहार(चारबहार) बंदर

विकसित करून भारताने त्या ठिकाणी मोठे काम केले आहे त्यामुळे हा भौगोलिक प्रदेश तेल साठे उपलब्ध करून देण्याला अत्यंत उपयुक्त आहे तो विकसित करून देण्याची ताकद भारतीय इंजिनियर्स मध्ये आहे त्यामुळे इराणला आपल्या विरोधात जाऊन चालणार नाही तसेच ट्रम्प साहेबांना सुद्धा युद्धामध्ये तेल साठ्यावरती आक्रमण करायचे नाही. कारण ते संपले तर युद्धाचे कारण संपेल तेव्हा यातील काही बेटांवर येथे तेल साठे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत ती बेटे सुरक्षित आहेत.! … कालच बातमी आपण वाचली की रिलायन्स कंपनीने तेला साठ्याबद्दल मोठा सौदा केला आहे वगैरे वगैरे… हे काय आज ठरलेलं नसतं अनेक वर्षापासून याची योजना झालेली असते ते साठे आपल्या वर्चस्वाखाली कसे येतील याची तरतूद मोदी सरकारने आधीच करून ठेवली त्यामुळे आता मध्यस्थिला जर बोलावलं गेलं तर ते फक्त मोदींना बोलवलं जाईल आणि युद्ध थांबेल. युद्ध भौगोलिक कारणाने सुरू होते त्याने इतिहास घडतो,  बदलतो, सत्ता पालट होऊ शकतो, याचा नेमका फायदा कसा उठवायचा याचे ज्याला सूत्र कळाले तो त्या युद्धात न पडताही त्यावर वर्चस्व गाजवतो.

भारतासारख्या शांतता प्रिय राष्ट्राला युद्ध नकोच आहे.. कुणाचेच नकोय! कारण आम्ही बुद्धाला मानणारे लोक आहोत कोणत्याही देशातल्या शाळेतली मुलं एखाद्या बॉम्बने मृत्युमुखी पडणं या बातमीने आमच्या देशातला प्रत्येक नागरिक अस्वस्थ होतो. युद्धात अपरिमित हानी होते ती महिलांची आणि मुलांची परवा तर मी एक व्हिडिओ पाहिला आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बॉम्ब चे गोळे पडत होते. अंगाला तोंडाला काळ लागलेल आहे पडल्यामुळे काहीतरी थोड्याशा जखमा झाल्यात असा एक छोटा मुलगा जो पाठीमागे होत असलेल्या बॉम्ब च्या आवाजाने भयभीत झालेला आहे आणि तो हात हलवून सांगत होता” प्लीज स्टॉप इट प्लीज स्टॉप इट “… त्याच्या चेहऱ्यावरचे भय पाहून डोळे पाणावले. तसेचयुक्रेंनच्या युद्धाच्या वेळी सुद्धा तेथील मुलांना सुरक्षितपणे हलवत होते तेव्हा एक मुलगी अगदी पाच सहा वर्षाची बापाला सोडून जायला तयार नव्हती आणि ते दोघे इतके धाय मोकलून रडत होते. त्यांच ते दूर जाणं बघून पोटात अक्षरशा कालवत होत..! काय मिळवणार आहोत जमिनीच्या तुकड्यावर सत्ता साधून..? हे सत्तेची अभिलाषा असणाऱ्यांनाच ठाऊक पण दुनियेतल्या सगळ्या दुःखाची जाणीव झाल्यानंतर शांततेच्या शोधात फिरलेल्या बुद्धांनी जी शिकवण आम्हाला दिलेली आहे त्यामुळे आपण भारतीय लोक युद्धापेक्षा शांती पसंत करतात परवाच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही फक्त जो संदेश द्यायचा होता तो दिला वास्तविक पाहता पाकिस्तान बरोबर दोन हात करून त्याला नेस्तनाबूत करणे इतकी ताकद भारताकडे नक्कीच आहे पण आपल्याकडे एक मंत्र आहे फुत्कारो लेकिन काटो नही आम्हाला कोणालाही बेचिराख करायचे नाही त्या देशातल्या निरपराध सामान्य माणसाला काहीच करायचे नव्हते तुम्ही तुमच्या देशात सुखाने नांदा आम्ही आमच्या देशात पण… पण जर काही कराल तर मात्र सोडणार नाही हे नुसत्या फुत्कारण्यावरून आम्ही दाखवून देतो आमच्यासमोर उदाहरण असतं… सगळं जग जिंकल्यानंतरही मोकळ्या हाताने परत जाणाऱ्या नेपोलियनचे… आणि प्रेतांचे खच पाहून अस्वस्थ झालेल्या सम्राट अशोकाचे… म्हणून आम्हाला भारताला युद्ध नकोच आहे. आम्हाला फक्त बुद्ध हवा आहे! शांततेचा संदेश देणारा… स्थिर जीवनाची शाश्वती देणारा… निसर्गाला जपायला सांगणारा. आणि युद्धभूमी वरती ही गीता सांगणारा कृष्ण.. आम्ही आजही पसंत करतो आणि मला वाटते हेच आम्हा भारतीयांच्या संतोषकारक समाधानाच्या जीवनाचे रहस्य असावे…!

टीप :वरील लेख खूप अभ्यासाचा नाहीच आहे मला नेमकं काय वाटलं त्याचा आहे त्या दृष्टिकोनातून याचे मूल्यमापन करावे.

©  शीला पतकी

निवृत्त मुख्याध्यापिका सेवा सदन प्रशाला आणि संचालिका नापास शाळा सोलापूर

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संबंध… ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ ‘संबंध…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“Graceful,  durable old furniture आणि New fashionable furniture ची सांगड घालून घर सजवू या. ” 

काल छायाचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मला तिने विचारले,  “मागच्या वर्षी तुझ्या नेहाचे लग्न झाले ना. तुमच्या काय अपेक्षा होत्या ग?? नेहाच्या काय अटी होत्या?? “

मी म्हंटले,  “काय ग?? काय झाले आज?? अचानक हा प्रश्न कुठुन डोक्यात आला?? असं का विचारते आहेस?? “

छाया म्हणाली,  “अग!! यावर्षी अजयचे लग्न करायचा विचार आहे. एका विवाह संस्थेत‌ नाव नोंदवले होते. काही मुलींची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. मुलींकडच्यांचे फोन पण येत आहेतच. मला तर हे खूप कठीण काम वाटतंय ग. कसं करावं की मुलींची पण dignity राहिल,  व सर्व दृष्टीने समाधान होईल. खूप जास्त मोठ्या अपेक्षा नाहीत आमच्या,  आपल्या सारखीच असावी. एकदा वाटतं मुलीला आधी आम्ही बघून,  मग अजयने बघावी का? एकदा वाटतं,  आधी अजयनेच बघावी,  तिच्याशी बोलावे,  भेटावे व नंतर जर गोष्टी पूढे गेल्या तर मग पूढच्या गोष्टी कराव्यात. “

छाया पुढे म्हणाली,  “मला वाटलं तुझ्याशी थोडं बोलावं म्हणजे,  माझे‌ विचार थोडे स्पष्ट होतील. तुला मुलीच्या आईचा अनुभव आहे ना. तेंव्हा मुलीकडे कसा आणि काय विचार करतात हे कळेल. खूप अपेक्षा असतात का ग?? आजकाल म्हणे मुली आधी मुलाचे पॅकेज किती?? व प्रोपर्टी किती आहे?? हेच बघतात. खरं आहे का?? “

मी म्हंटले,  “खरं सांगू का?? अग! प्रत्त्येक घर वेगळं असतं. अग! आपली मुलगी आनंदी रहावी यापेक्षा दुसरे काय हवं असतं ग?? आम्ही नेहाला पहिल्या पासून हेच सांगत आलो,  की लग्न झाल्यावर दोनाचे चार हात होतात. तेंव्हा दोघे मिळून खूप कमवू शकता. मुलगा चांगला पाहिजे व घरचे अन्य सदस्य पण महत्वाचे असतातच. पैशापेक्षा माणसं महत्वाची.

मला अस वाटते,  आधी तुम्हीच बघा. घरदार बघून बरंच लक्षात येतं. चौकशी करा. एखादी चांगली फॅमिली,  म्हणजे तुमचे,  त्यांचे विचार जुळत असतील तर,  दोन्ही कडील पूर्ण फॅमिलीने दोन तिनदा भेटण्यास काही हरकत नाही. गप्पांमध्ये बरेच कळते. तुमचे विचार,  अपेक्षा,  परिस्थिती,  त्यांच्या घरचे सणवार लक्षात येतात.

आजकाल मुली शिकलेल्या असतात,  त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारणे बरोबर वाटत नाही. तेंव्हा अशा भेटीत सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. बोलताना त्यांचा विचारांचा कल कळतो. व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन कळतो. चांगले होमवर्क करून जा,  म्हणजे बोलण्यात कोणते विषय काढायचे??? याची तयारी होईल.

सध्याची‌ परिस्थीती म्हणजे,  समाजात सध्या चालू असलेली प्रथा बदलायला हवी आहे. मुलींचे विचारही सध्या वेगळ्या दिशेने जात आहेत. घरातील माणसांपेक्षा घरातील वस्तूं जास्त महत्त्वाच्या वाटतायेत.

आजकाल मुलांचे आई-वडीलही आधीच माघार घेतात. आधीच ठरवून मोकळे होतात. आधीच असे दाखवतात की लग्न झाल्यावर वेगळे राहणेच बरं राहील. व त्याअर्थाचे वक्तव्य देतात. तयारी करतात. हा शेवटचा option असावा. “

“मुलाला मुलगी पसंत पडली की,  तिने अजयला नीट साथ द्यावी. बस,  एवढीच अपेक्षा आहे आमची. बाकी आमची काही अपेक्षा नाही. आमचा भार आमच्या मुलावर नाही. ते वेगळे राहिले तरी चालेल,  वगैरे वगैरे बोलून मोकळे होतात. आधी पासून असे सिग्नल आपल्या बोलण्यातून द्यायची काय गरज?? त्यापेक्षा आम्हाला सून मुलीच्या रुपात हवी आहे,  घराला सांभाळणारी,  आमच्यात मिळुन मिसळून राहणारी. तिच्या नोकरी करण्याला आमचे बंधन नसेल. दोघांना दोन्ही घरचा आधार असणारच आहे. दोन्ही घरी अडीअडचणी ला ही मुलं असतीलच.

लग्न म्हणजे दोन्ही घरचा नेहमीचा संबंध असायला हवा. दोन्ही घरच्या सुख दुःखात एकमेकांची साथ हवी.

अहो! एकाच घरच्या दोन भावांची घरे वेगळी असतात. कारण दोन्ही घरच्या बायका वेगवेगळ्या घरातुन येतात ना म्हणून. आपल्या बाबतीत तर आपण अगदी दोन वेगळ्या फॅमिलीज आहोत. तेंव्हा फरक असणारच आहे. तुमच्या आणि आमच्या काही चांगल्या पद्धती मिळुन‌ नवीन काही चांगल्या पध्दती दोन्ही घरात सुरू होतील. नक्कीच चांगले होईल. आणि घाई कशाचीच नाही. adjust व्हायला थोडा वेळ लागेल एवढंच. ‘ अशा अर्थाचे बोलणे जास्त चांगले व‌ positive वातावरण निर्माण करेल.

मुलगा लग्न झाल्यावर आपला रहात नाही असा विचारच करायचा नाही. मी छायाला म्हंटलं,  “तू आपल्या सूनेबद्दल जे चित्र मनात रेखाटलं आहे ते तसंच व्हायला तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. हे बघ आरामदायी म्हातारपण हवे असेल तर एकत्र राहणं तुमच्या करिता चांगलेच आहे व नोकरी करणाऱ्या सूनेकरिता पण ते सोईस्करच असणार आहे. दोन पीढी एकत्र रहायचे म्हणजे सोपं गणित नाही. तडजोड करावीच लागणार आहे. कारण जनरेशन गॅप एवढा मोठा आहे की सर्वांचे सर्वांना सर्व पटेल हे शक्यच नाही.

अग! पस्तीस वर्षे झाली आम्हा दोघांना बरोबर राहून. तरी प्रत्त्येक गोष्टी वर एकमत असतंच असं नाही. पण आपल्या माणसांसाठी तडजोड केली तर काय हरकत आहे?? नोकरी करणारी सून पाहिजे तर तडजोड जास्तच करावी लागेल. स्पष्ट व गोड बोलून सर्व सहज शक्य होऊ शकतं. मनातल्या मनात धूसफूस,  भुणभुण करणे,  बाहेरच्या लोकांना घरातील गोष्टी सांगण्यापेक्षा घरातील लोकांशी स्पष्ट बोलून मार्ग काढणे जास्त चांगले नाही का?? त्यामुळे कान भरणे हा प्रकार होणारच नाही.

सून म्हणजे,  तुझ्या एवढाच तिचा पण मान‌ या घरात असायला हवा आहे. ती तुमची पुढची पिढी आहे. तुझ्या लाडक्याची अर्धांगिनी आहे. मुलगा तेवढा माझा,  मग सून‌ तुझी नाही का?? हा दूजाभाव नको.

अजयला नुसता खोकला झाला तरी तू काळजी करते,  तेवढेच प्रेम आपल्या सूनेवरही करायचे. आपण आपल्या कडून पूढाकार घ्यायचा. सूनेला आपलं मानणे व ते आपल्या कृतीतून दाखविणे ही या नात्याची सर्वात महत्त्वाची व आवश्यक पहिली पायरी आहे.

माझी आजी म्हणायची,  मुलगा तर माझा आहेच. सूनेला आपलसं करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करते. तिच्या घरच्यांचा मान ठेवते. शेतावरून आंबे आले,  धान्य आले की आधी त्यातले थोडे तरी मी सूनेच्या माहेरी नक्की पाठवते. सूनेचा वाढदिवस मी आठवणीने साजरा करते. हे असे प्रसंग नातं घट्ट करतात.

माझा मुलगा आता फक्त माझा नाही त्याच्यावर माझ्या इतकाच हक्क असणारी त्यांची बायको ही आहे,  हे सत्य पचले पाहिजे. आता सूनेचे माहेर ही माझ्या मुलाची extended फॅमिली असणार आहे. हे ही सत्य पचले पाहिजे.

मन मोठ्ठं व मोकळं ठेवावे लागेल. लहान सहान गोष्टींवर दुर्लक्ष करणे,  प्रतिक्रिया न देणे,  body language वर लक्ष देणे हे प्रयत्नपुर्वक शिकावे लागेल.

सूनेच्या नावाने बोंब मारणे,  सर्वात सोप्पे काम आहे. पण त्यात आपण आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडण्यात कमी पडलो‌ का?? हाही अर्थ निघतोच. तेंव्हा home work खूप करायचे आहे.

Ego, पैसा, practical approach, प्रतिष्ठा, formal relations, चढाओढ, शोबाजी, property, माणसांपेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा, ही समज या सध्याच्या परिस्थितीत हावी आहे. या पेक्षा प्रेम,  संबंध,  आत्मियता,  एकमेकांची काळजी,  आधार,  समाधान या जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत हे पुन्हा एकदा समाजात युवा मंडळीला समजावयाची गरज आहे. सुरवात करायला हवी आहे. वेळ लागेल,  उशिरा का होईना पण परीणाम नक्की दिसतील.

पैसा व माणसं हे दोन्ही आयुष्यात महत्वाचे व आवश्यक आहेत पण त्याचा बॅलन्स सांभाळता आला पाहिजे.

कुठे थांबायचे??? हे प्रत्येकाला प्रत्त्येक क्षेत्रात नेहमी समजलंच पाहिजे. मग ते प्रकृतीवर अतिक्रमण असो किंवा पैशामागे धावणे असो. जूनी पीढी असो नाही तर नवीन पिढी असो.

आपली पीढी म्हणजे नवीन व‌ जून्या पद्धती रितीरिवाज,  संस्कार यांना जोडणारा ब्रिज आहे व त्यामधून मार्ग काढायला आपण शिकलो आहोत. अनेक challenges बघीतले आहेत,  झेलले आहेत,  व यशस्वीपणे पार केले आहेत. आता हे challenge ही सफलतेने पार पाडू या. नवीन वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलायचा प्रयत्न करू या. विचारांचे नातं इतकं घट्ट करूया की मतभेद पण हसत हसत स्विकारायला शिकूया. Graceful, durable old furniture व New fashionable furniture ची सांगड घालून पुन्हा एकदा घर सजवू या.

सामान्य जीवन जगणे हे खरंतर प्रत्येकाकरिता व त्याच्या कुटुंबीयांकरिता असामान्य व आनंददायी गोष्ट असते.

सुनेला पारखायचा नाही, समजायचा प्रयत्न करावा. म्हणतात ना, ‘रिश्ते बरकरार रखने के लिए एकही शर्त है, किसी की कमियां नहीं, अच्छाइयां देखें। ईश्वर तो सिर्फ मिलाने का काम करता हैं। संबंधों में नजदीकियां और दूरियां बढ़ाने का काम तो इन्सानही करता हैं।’

 

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“अहो ऐकलंत का जरा! “

“अगं लग्न झाल्यापासून तुझ्या शिवाय कुठल्या बाईच ऐकलंय का मी? “

“आता मला कसं कळणार,  ऑफिसमध्ये कोणा कोणाचं ऐकता ते? “

“बरं,  बरं,  कळतात हो मला टोमणे! ते जाऊ दे,  सकाळी सकाळी मला सणा सुदिला वाद नकोय! बोल काय म्हणत होतीस तू? “

“अहो आपण किनई या पाडव्याला स्वर्गात जाऊ या! “

“काय s s s s? “

“अहो केवढ्या मोठ्याने ओरडताय? शेजारी पाजारी बघायला येतील,  काय झालं म्हणून! “

“अगं मग तू बोललीसच तशी! दसऱ्याला जसं सीमोल्लंघन करतात तसं पाडव्याला काय स्वर्गारोहण करतात की काय? “

“अहो नीट ऐकून तर घ्याल किनई,  का लगेच सुतांवरून स्वर्ग गाठाल? “

“अगं मी कुठे स्वर्ग गाठायला चाललोय? तूच म्हणालीस नां,  की आपण या पाडव्याला स्वर्गात जाऊ या म्हणून? “

“अहो हा स्वर्ग म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची शो रूम! “

“अगं मग असं सविस्तर सांग नां,  मला कसं माहित असणार तुझ्या डोक्यात कुठला स्वर्ग आहे ते? पण तिथून तुला काय घ्यायच आहे ते नाही बोललीस. “

“अहो आता मला प्रत्येक पाडव्याला नवीन साडी वगैरे नकोय. अजून पाच सहा कोऱ्या साडया तशाच पडल्येत! “

“पण त्या साडया काय तुला ‘इधर का माल उधर! ‘ करण्यात कधीतरी कामाला येतीलच नां? “

“म्हणजे? “

“अगं म्हणजे एखादी मिळालेली साडी आवडली नाही,  तर तोंड दाबून बुक्क्याचा मार खाल्ल्यागत तुम्ही बायका ती ठेवून घेताच की नाही? “

“मग तोंडावर कसं बरं सांगणार आवडली नाही म्हणून? ते बरं दिसत का? “

“हो ना,  मग तीच साडी कधी ना कधी तरी दुसऱ्या बाईला देता नां,  त्यालाच मी ‘इधर का माल… ‘

“कळलं,  कळलं! आम्हां बायकांचं ते ट्रेड सिक्रेट आहे! “

“यात कसलं आलंय सिक्रेट,  ओपन सिक्रेट म्हणं हवं तर! बरं ते जाऊ दे,  तुला त्या स्वर्गाच्या शो रूममधे कशाला जायचय ते नाही कळलं. “

“मला ‘ठुशी’ घ्यायची आहे! सासूबाईंनी त्यांची खरी ‘ठुशी’ मोठ्या जाऊबाईंना दिली,  तेंव्हा पासून माझ्या डोक्यात निदान एक ग्रॅमची ‘ठुशी’ घ्यायच फारच मनांत आहे. “

“अगं पण तुला आईनं,  वहिनीला दिलेल्या ठुशीच्या बदल्यात तिचा ‘घपला हार’ दिला ना,  मग? “

“अहो त्याला ‘घपला हार’ नाही ‘चपला हार’ म्हणतात! “

“तेच ते,  अगं पण मी काय म्हणतो आपण तुला एक ग्रॅमची खोटी खोटी ‘ठुशी’ कशाला घ्यायची? आपण त्यापेक्षा वा. ह. पे. कडून किंवा पु. ना. गा. कडून खरी सोन्याची ‘ठुशी’ घेऊ या की? “

“नको गं बाई,  हल्ली खरे दागिने घालायची सोय कुठे राहील्ये? सगळ्या बायकांचे सगळे खरे दागिने लॉकरची शोभा वाढवताहेत झालं. “

“मग माझ्या डोक्यात एक नाही दोन वस्तू आहेत,  ज्या नुकत्याच बाजारात नव्याने आल्येत. त्या नवीन आणि इनोव्हेटिव्ह असल्यामुळे खूप म्हणजे खूपच महाग आहेत,  त्या घेऊ या का? “

“अगं बाई,  त्या आणि कुठल्या? “

“प्रेशर कुकर आणि… “

“काय s s s? “

“अगं किती जोरात ओरडलीस? शेजारी पाजारी बघायला येतील ना? “

“अहो तुम्ही बोललातच तसं! प्रेशर कुकर काय बाजारात नवीन आलेली वस्तू आहे? गेली कित्येक वर्ष मी वेग वेगळे कुकर वापरत्ये. “

“अगं खरंच सांगतो,  हा प्रेशर कुकर बोलणारा आहे,  जो नुकताच नवीन आलाय बाजारात! “

“काय सांगताय काय? “

“अगं खरं तेच सांगतोय,  या कुकर मधे ना शिट्याच होत नाहीत! “

“मग कळणार कसं कुकर झाला आहे का नाही ते? “

“अगं जरा नीट ऐक. मी तुला म्हटलं ना,  की हा बोलणारा कुकर आहे म्हणून,  मग त्याच्यात शिट्या कशा होतील? तुला किती शिट्या हव्येत त्यावर तो सेट करायचा आणि गॅस चालू करायचा! “

“बरं,  मग? “

“मग त्यातून थोडया थोडया वेळाने one,  two,  three असे आवाज येतील,  त्यावरून तुला कळेल की कुकरच्या किती शिट्या झाल्येत त्या. “

“अस्स होय! मग बरंच आहे,  सिरीयल बघायच्या नादात मला मेलीला कळतच नाही किती शिट्या झाल्येत त्या! चालेल मला,  आपण तो बोलणारा कुकर घेऊयाच. ते ठुशी बिशीच जाऊ दे,  पुन्हा कधी तरी बघू! “

“Ok,  मग उद्याच जाऊन बोलणारा कुकर घेऊन येवू,  काय? “

“हो चालेल,  पण तुम्ही दुसरी वस्तू पण म्हणाला होतात,  ती कुठली? “

“आहे,  म्हणजे तुझ्या लक्षात आहे मी दोन वस्तू म्हटल्याचे. “

“म्हणजे काय? आम्हां बायकांची मेमरी तशी पुरुषांपेक्षा बरी असते असं म्हणतात! “

“असं कोण म्हणत? “

“आम्ही बायकाच! “

“अगदी बरोबर,  पण ती फक्त तुम्हाला हव्या असलेल्या खरेदीच्या बाबतीतच बरं का! बाकी सगळा उजेडच म्हणायचा. “

“कळलं,  कळलं! मला पण तुम्ही म्हणालात तसा सणा सुदीला वाद नकोय,  ती दुसरी वस्तू काय आहे ना,  ती बोला चटचट,  मला अजून बरीच कामं पडल्येत! “

“अगं त्या दुसऱ्या नवीन वस्तूच तू नांव ऐकलंस ना,  तर नाचायलाच लागशील बघ! “

“नाच करायचा कां आनंदाने गायचं ते नंतर बघू,  पटकन त्याच नांव… “

“रिमोट कंट्रोलची गॅस शेगडी! “

“का s s य? “

“अगं आपल्या टीव्हीला कसा रिमोट कंट्रोल असतो ना,  तसाच या गॅसच्या शेगडीला पण असतो. बसल्या जागेवरून तू गॅस चालू किंवा बंद करू शकतेस. बोल कशा काय आहेत या दोन नवीन वस्तू! “

“झ ss का ss स ss! आता सिरीयल सोडून मधेच उठायला नको गॅस बंद करायला! “

एवढं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी… खरी सोन्याची ठुशी परवडली असती,  पण या दोन नवीन,  त्याहून महागडया वस्तू घ्यायचे कबूल करून,  स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून नाही ना घेतला,  या विचारात पाडव्याला आडवा पडलो!

 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ औदुंबर आणि अश्वत्थ… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

✦ औदुंबर आणि अश्वत्थ… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

बालकवींचा औंदुंबर जसा सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे तसा गोविंदाग्रजांचा (राम गणेश गडकरी) *पिंपळ* (अश्वत्थ) परिचित आहे.

पुण्यातील कसबा पेठेतील ‘याज्ञवल्क्य आश्रमा’समोर हा पुराण अश्वत्थ होता. भोवती जडावलेला पार होता. त्यासमोर गडकरी मास्तर रहायचे. त्यांच्या घराच्या खिडकीतून तो पिंपळ दिसायचा.

त्याची सर्व रुपं मास्तरांनी डोळे भरून पाहिली असतील. त्याच्या पर्णांच्या प्रत्येक सळसळीचा अर्थ मास्तरांसारख्या कविह्रदयाच्या प्रतिभावान सारस्वताला कळला असेल. म्हणूनच त्यांना *पिंपळपान* ही सर्वपरिचित हळुवार कविता स्फुरली!

या पिंपळाच्या पारावर हुंदडण्यात माझी बालपणीची अनेक वर्षे गेली. समोरचे ‘येथे राम गणेश गडकरी रहात होते’ अशी पाटी असलेले घर जाता – येता दिसायचे.

कसबा सोडून आता चाळीस वर्षे लोटली आहेत. सगळा भूगोल बदललाय तिथला. दोन महिन्यापूर्वी कसब्यात जाण्याचा प्रसंग आला.

मुलीला बरोबर घेतलं. म्हटलं “चल,  आज तुला एक तीर्थक्षेत्र दाखवणार आहे”.

आवर्जून याज्ञवल्क्य आश्रमात गेलो होतो. तो पिंपळ आणि त्या भोवतीचा पार अजून तसाच असल्याचे दिसले. पिंपळाच्या काही शाखा ढाळल्या होत्या पण बाकी सगळं तसंच होतं.

पारावर विसावलो आणि सवयीप्रमाणे ‘मराठी भाषेच्या शेक्सपियर’च्या घराकडे दृष्टी गेली. आणि हे काय,  ते निळ्या रंगाचं लाकडी घर अदृष्य झालेलं! त्याजागी एक शिमिटाची अधुनिक वास्तू उभी राहिलेली दिसली.

मन हळवं झालं. हळहळलो ते पाहून. विषण्णपणे पारावर बसून राहिलो काही काळ. मी मुलीला मास्तरांचं घर अभिमानानं दाखवणार होतो. डोळ्याच्या कडा पाणावल्या किंचित. बाजूला बसलेल्या मुलीने विचारले,  “काय झालं? ” डोळ्यात काही गेलं का? गाँगल तरी घालायचा. किती प्रदूषण आहे गावात. “

मी तिला काय दाखवणार आता? माझं ‘ते तीर्थक्षेत्र’ उध्वस्त झालं होतं. भविष्यात त्याचा जीर्णोद्धारही होणार नव्हता कधीच!

पुण्यातली अशी अनेक तीर्थक्षेत्रं नगरविस्तारीकरणात काळाच्या उदरात गडप झाली आहेत आणि पुढेही होणार आहेत.

कालच वार्ता वाचली की आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तव्य असलेले सदाशिव पेठेतील खजिना विहिरीजवळील नृसिंह मंदीर रस्ता रुंदिकरणात पाडले जाणार आहे म्हणे.

कालाय तस्मै नमः! 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ईश्वरार्पणम्… लेखक: डॉ. सरवनन – माहिती संकलक : मधुकर बोरीकर ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ईश्वरार्पणम्… लेखक: डॉ. सरवनन – माहिती संकलक : मधुकर बोरीकर ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

विज्ञानाच्या पलीकडे जे काही आहे,  ते सर्व म्हणजेच परमेश्वर आहे,  हे सिद्ध करणारी ही कहाणी आहे. आपण कर्ता असलो तरी करविता केवळ ‘तो’च असतो हे दाखवून देणारा हा लेख आहे.

जीवनाचा खरा अर्थ आणि त्यापलीकडचे सत्य म्हणजे ‘देव’च आहे.

मी MRI स्कॅनकडे पाहिलं आणि अंगावर काटा आला. तो हॉस्पिटलच्या एअर कंडिशनरमुळे नव्हता,  तर समोर दिसणाऱ्या दाहक सत्यामुळे होता. तो साक्षात मृत्यूचा आदेशच होता — काळ्या-पांढऱ्या अक्षरांत छापलेला.

*या हॉस्पिटलमध्ये मला एक दंतकथा म्हणतात. *

मी डॉ. सरवनन — व्हॅस्क्युलर सर्जरीचा निवृत्त प्रमुख.

चाळीस वर्षं मी मानवी शरीराच्या आत काम केलं आहे. चेन्नईच्या रस्त्यांपेक्षा मला माणसांच्या रक्तवाहिन्यांचा नकाशा अधिक चांगला माहीत आहे. धडधडणारी हृदयं मी हातात धरली आहेत,  छतावर रक्त उडवणाऱ्या नसा मी शांत केल्या आहेत. पण त्या स्कॅनकडे पाहताना,  इतक्या दशकांनंतर पहिल्यांदाच,  मला स्वतःला मी सर्जन आहे असं वाटलं नाही. मला स्वतःचीच फसवणूक झाल्यासारखं वाटलं.

रुग्णाचं नाव गौरी होतं.

वय अवघं सव्वीस. एकटी आई. दोन शिफ्ट्समध्ये एका छोट्या उपहारगृहात काम करून घर चालवणारी. कॉफी ओतताना ती अचानक कोसळली. तिच्या हृदयामधील अ‍ॅन्युरिझम (रक्तवाहिनी ज्या ठिकाणी कमजोर होते,  त्या ठिकाणी नसतील रक्तदाबामुळे येणारा फुगीर भाग. रक्तदाब अधिक वाढला तर ही नस फुटू शकते आणि असीमित रक्तस्त्राव होऊ लागतो.) फक्त मोठा नव्हता — तो राक्षसी होता. हृदयाच्या अतिशय नाजूक भागाभोवती तो अजगरासारखा विळखा घालून बसला होता.

*“हे ऑपरेशन शक्य नाही,  वरदन, ” विभागप्रमुखांनी मान हलवत सांगितलं. *

*“आत गेलात,  तर टेबलवरच ती मुलगी रक्तस्राव होऊन मरेल. हात लावला नाहीत,  तरी ४८ तासांत नस फुटेल. दोन्ही मार्गांनी मृत्यूच. ”*

*वैद्यकीय व्यवस्थेत आम्हाला जोखमी तोलून पहायला शिकवलं जातं. कायदेशीर जबाबदाऱ्या,  यशाची टक्केवारी — सगळं. *

*तर्क सांगत होता,  ” वहात लावू नकोस. निसर्गावर सोड. मागे फिर. “*

*पण मग मी गौरीच्या डोळ्यांत पाहिलं आणि वेटींग रूम मध्ये बसलेली तिची चार वर्षांची चिमुकली मुलगी दिसली. वहीत चित्रं काढत तिथे बसली होती. तिने फाटके बूट घातले होते. * 

*गौरी गेली,  तर ती मुलगी एकटी पडणार होती. बाहेरच्या जगात तिचे आईविना किती हाल होतील या विचारानेच तिच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने माझे मन भरून गेले होते. मी प्रशासनाला ऑपरेशन थिएटर ठरवायला सांगितलं. *

*मी केस घेणार असल्याचं जाहीर केलं. ते मला वेड्यात काढत होते. कदाचित मी होतोही. *

*ऑपरेशनच्या आदल्या रात्री,  मी माझ्या अंधारलेल्या ऑफिसमध्ये बसलो होतो. बाहेर शहर झगमगत होतं — आत टांगणीला लागलेल्या एका जीवाबद्दल पूर्णपणे उदासीन असलेलं. *

*मी घाबरलो होतो. दगडासारखे स्थिर असणारे माझे हात थरथरत होते. स्कॅन पुन्हा पुन्हा पाहिला. *

*कुठलाच मार्ग नव्हता. कुठलीच आशा नव्हती. हे आत्मघातकी मिशन होतं. *

*मी विज्ञानावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. *

*स्कॅलपेल,  टाके,  रक्तदाब — ह्यांवर. * 

*पण माझ्या टेबलावर,  वैद्यकीय जर्नल्सच्या ढिगाऱ्यामागे,  एक लहानसं,  प्लास्टिक लॅमिनेट केलेलं वैद्येश्वराचं चित्र आहे. माझ्या आजीनं मेडिकल कॉलेज सुरू करताना दिलं होतं. *

ती म्हणाली होती —

*“औषध शरीरावर उपचार करतं,  पण माणसाला देव बरा करतो. ”*

मी ते चित्र हातात घेतलं.

कोणतीही औपचारिक प्रार्थना केली नाही.

फक्त गौरीची फाईल हातावर ठेवली,  देवाच्या प्रतिमेकडे पाहिलं आणि अंधारात हळूच बोललो —

*“हे प्रभो…, या वेळेला माझे हात अपुरे पडतायत. *

*मी इथे फक्त एक मेकॅनिक आहे. *

*उद्या सकाळी तुम्हालाच ऑपरेशनसाठी यावं लागेल. *

*मी हात देतो…, *

*पण बुद्धी तुम्ही द्या. *

*आज सर्जन तुम्हीच आहात. ”*

*दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटर मध्ये गोठवून टाकणारं थंड वातावरण होतं. तणावानं भरलेलं. नर्सेस शांत होत्या. भूलतज्ज्ञ तर,  माझ्याकडे पाहायलाच तयार नव्हते. *

सगळ्यांना माहित होतं — *”आपण एका अटळ सत्याकडे चाललो आहोत. तिचा मृत्यू अटळ होता. “*

ऑपरेशन सुरू झालं.

*स्कॅनपेक्षाही परिस्थिती वाईट होती. रक्तवाहिनी कागदासारखी पातळ,  आणि जणू संतापून धडधडत होती. एक चुकीचा श्वास,  एक सूक्ष्म कंप — आणि सगळं संपणार होतं. *

*मी मायक्रो-कात्री उचलली. *

*तो क्षण होता. Widowmaker क्षण. * (widowmaker artery= left anterior descending artery हृदयाच्या बहुतांश भागाला शुद्ध रक्त पुरवणारी,  एक अत्यंत महत्वाची रक्तवाहिनी)

*या क्षणाच्या अलीकडे होतं जीवन आणि पलीकडे उभा होता केवळ मृत्यू! *

*आणि ते घडलं. * 

*खोलीत पूर्ण शांतता पसरली. फक्त शांतता नाही,  — पोकळी. *

*मॉनिटर्सचे आवाज दूर कुठेतरी विरून गेले. *

*माझ्या खांद्यांवरून एक विलक्षण उब पसरली,  हातांमधून बोटांपर्यंत वाहत गेली. तो अ‍ॅड्रेनालिन नव्हता. *

*ही होती… शांतता. *

*गंभीर,  भारलेली शांतता. *

*माझे हात वेगाने हलू लागले. स्पष्टच सांगतो —*

*”मी ते हलवत नव्हतो,  मी ते हलताना पाहत होतो. *

*मी यापूर्वी कधीच न शिकलेली कौशल्ये वापरत होतो. सत्तर वर्षांच्या माणसाला अशक्य असलेली गती आणि अचूकता माझ्या बोटांत कुठूनतरी आली होती. मेंदूच्या देठाजवळ,  मिलिमीटर अंतरावर,  क्षणाचाही संकोच न करता काम चालू होतं. दिसतही नसणाऱ्या ठिकाणी मी नेमक्या क्लिप्स लावत होतो — कुठलीतरी दैवी जाणीव मला मार्ग दाखवत होती. *

*“BP स्थिर आहे…”* *भूलतज्ज्ञ आश्चर्याने कुजबुजला. *

मी उत्तर देऊ शकलो नाही.

*मी एका तंद्रीत होतो. *

*”माझ्या मागे कुणीतरी उभं आहे,  माझ्या कोपरांना दिशा देत आहे,  मनगट स्थिर करत आहे”* — *अशी तीव्र जाणीव होती. *

*क्षणभर वाटलं,  खरंच दुसराच कोणी डॉक्टर टेबलजवळ उभा आहे. *

पंचेचाळीस मिनिटांनी मी शेवटचं उपकरण ट्रेमध्ये ठेवलं.

*“अ‍ॅन्युरिझम संपलं आहे,  नसेवर आलेलं फुगीरपणा गेला आहे. ”* मी म्हणालो.

*“आता बंद करा. ”*

*थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला. नर्सेस रडत होत्या. *

*रेसिडेंट्स मॉनिटर्सकडे अविश्वासाने पाहत होते. *

*एक थेंबही रक्त गेलं नव्हतं. *

*ते अशक्य होतं — पण परिपूर्ण होतं. *

मी गाऊन काढून हात धुण्याच्या ठिकाणी गेलो.

आरशात पाहिलं.

*अशा ऑपरेशननंतर मी नेहमी थकलेला,  घामाघूम,  पाठ दुखत असणारा असतो. *

*आज मला यापैकी काहीही जाणवत नव्हतं. मी शांत होतो. अजिबात थकलो नव्हतो. *

 *मी माझ्या सुरकुतलेल्या,  वृद्ध हातांकडे पाहिलं. * 

*आज त्यांनी एका आईला वाचवलं होतं. एका छोट्या मुलीला अनाथ होण्यापासून वाचवलं होतं. *

*पण सत्य फक्त मला माहीत होतं. *

मी ऑफिसमध्ये परत गेलो,  वैद्येश्वराचं ते छोटंसं चित्र उचललं आणि खिशात ठेवलं.

*एका आठवड्यानंतर मी डिस्चार्जच्या कागदावर सही केली. *

गौरी तिच्या मुलीचा हात धरून बाहेर पडली. डोळ्यांत अश्रू,  *”मला हिरो… किंवा देव “* म्हणत होती.

मी हसलो आणि मान हलवली.

*“मी एकट्याने नाही केलं, ”* मी म्हणालो.

*तिला वाटलं,  मी टीमबद्दल बोलतोय. *

*पण त्या दिवशी मुख्य सर्जन कोण होता,  हे मला माहीत होतं. *

*विज्ञान ‘कसं’ हे सांगू शकतं. रक्तप्रवाह,  नसांचं जाळं,  सगळं सगळं. *

*पण ‘का’ — हे कधीच सांगू शकत नाही. *

*अशक्याच्या समोर उभा असलेला माणूस अचानक मार्ग कसा शोधतो,  हे विज्ञान समजावू शकत नाही. *

*कधी कधी स्वीकारावं लागतं,  की,  आपण फक्त एक साधन आहोत. *

आणि त्या मंगळवारी,  ऑपरेशन थिएटर क्रमांक ४ मध्ये, *खरा वैद्य — परमवैद्य — स्वतः हजर होता. *

*कधीही आशा सोडू नका. *

*स्कॅन काळा असला तरी,  जग संपलं असं म्हणत असलं,  तरीही! *

*चमत्कार नेहमी वीज-गडगडाटासह येत नाहीत. कधी कधी ते फक्त स्थिर हातांमध्ये…, आणि शांत प्रार्थनेत येतात. *

जय वैद्येश्वर.

सर्व कृतींच्या पाठीमागील शक्ती दाखवणारी अतिशय सुंदर कथा..

 

मूळ इंग्रजी लेखक : डॉ. सरवनन

संकलक : मधुकर बोरीकर 

प्रस्तुती : स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सापाच्या विषावरील उतारा!” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सापाच्या विषावरील उतारा!” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री सुनील देशपांडे ☆

वायन्स बायोटेक प्रा. लि. द्वारे हैदराबादमध्ये भारतातील अँटी स्नेक बाईट इंजेक्शन तयार केले जाते!!

त्याबद्दल आपण जाणून घेऊ.

या कंपनीचा एक मोठा घोड्यांचा तबेला आणि प्रजनन केंद्र आहे,  उत्तम गुणवत्ता नियंत्रण आणि पर्यायाने गुणवत्ता हमी आहे.

नाग सापाच्या विषारी दंशाने हत्तीलाही मारले जाऊ शकते,  पण एक प्राणी त्यापासून बचावतो: घोडा!

कोणत्याही विषारी सांपाने दंश केला तरी घोडा त्यातून मरत नाही. दंश केल्यानंतर,  घोडा सुमारे तीन दिवस हलका असला तरी,  तो पूर्णपणे ठीक होतो,  जसे काहीच झाले नाही.

हे निसर्गातील एक अविश्वसनीय आश्चर्य आहे.

आणि या प्राण्यातच मानवासाठी जीवन वाचवण्याचे एक रहस्य आहे – अँटी-वेनोम व्हॅक्सीन.

पण हे अँटी-वेनोम व्हॅक्सीन कसे बनवले जाते?

प्रथम,  सांपांचे विष गोळा केले जाते.

मग,  घोड्यास थोड्या प्रमाणात विष टोचले जाते.

घोड्याची प्रतिकारशक्ती प्रतिसाद देते आणि विष निष्प्रभ करण्यासाठी प्रतिद्रव्य तयार करते.

2-3 दिवसांनंतर,  ही प्रतिद्रव्ये घोड्याच्या रक्तात असतात.

मग घोड्याचे रक्त घेतले जाते आणि लाल रक्तपेशी काढून टाकल्या जातात.

प्लाझ्मा (पांढरा भाग) अँटी-वेनोम तयार करण्यासाठी प्रक्रिया केला जातो.

हे अँटी-वेनोम नंतर सांपाने दंश केलेल्या मानवांमध्ये इंजेक्ट केले जाते,  त्यांचे जीवन वाचवण्यासाठी.

केवळ भारतात,  शेकडो घोड्यांची देखभाल करून हे जीवन वाचवणारे सीरम तयार करण्यासाठी अनेक अँटी-वेनोम उत्पादन सुविधा आहेत.

या सौम्य प्राण्यामुळे,  आम्ही पृथ्वीवरील काही घातक विषांपासून संरक्षित आहोत.

घोड्यांशिवाय,  सांपाच्या दंशामुळे अनेकांना जीवन गमवावे लागेल.

हे निसर्गाच्या रहस्य,  दया आणि अंगभूत योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

निसर्गाचा प्रत्येक घटक हे अशा आश्चर्यजनक कृपेचे प्रतिबिंब आहे.

— 

(एका इंग्लिश पोस्टवरून अनुवादित) 

इंग्लिश लेखक : अज्ञात 

मराठी अनुवाद : श्री सुनील देशपांडे 

मो  ९६५७७०९६४०

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सन्मान निधी…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सन्मान निधी…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

“आई,  तूपण ना! काय हे? बाबांच्या फक्त १२,००० रुपयांच्या पेन्शनसाठी इतकी धावपळ कशाला? आपण आपल्या एका कर्मचाऱ्याला यापेक्षा जास्त पगार देतो…! “

मोहित चिडून आईला म्हणाला.

 केवळ लाईफ सर्टिफिकेट देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लांब रांगेत उभं राहण्यापेक्षा घरी जाऊ या,  असा तो आग्रह करू लागला.

 मोहितचं म्हणणं काही अंशी खरंच होतं.

त्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय होता. वर्षभरात लाखो रुपये पगार-भत्त्यांत जात होते.

मग फक्त १२,००० रुपयांसाठी इतका वेळ का घालवायचा?

 

मोहितचे वडील एकनाथराव गेल्या महिन्यात अल्पशा आजाराने वारले होते. ते सरकारी शाळेत शिक्षक होते आणि १२ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांना पेन्शन मिळत होती. त्यांच्या निधनानंतर शासनाच्या नियमानुसार अर्धी पेन्शन त्यांच्या पत्नी सरला यांना मिळणार होती. त्यासाठीच आज त्या बँकेत लाईफ सर्टिफिकेटची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या.

 

महिनाभरापूर्वी एके दिवशी मोहितचा मुलगा कुशाग्रचा आठवा वाढदिवस होता. त्याने आजीकडे सायकलची मागणी केली होती.

 

सरलाताईंच्या खात्यात फारसे पैसे उरले नव्हते. म्हणून त्यांनी मोहितकडे १०,००० रुपये मागितले. मोहित ऑफिसला निघायच्या तयारीत होता. थोडं आश्चर्याने पाहून त्याने पत्नी श्रेयाला आईला पैसे द्यायला सांगितले. श्रेया पैसे देताना हलकंसं पुटपूटली,

“आजकाल खूप मंदी आहे बरं का! जरा सांभाळून खर्च करा. ”

 

संध्याकाळी सरलाताईंनी त्या पैशांतून कुशाग्रसाठी सायकल घेतली आणि घरात पुन्हा हशा-आनंद पसरला.

 

पण पुढच्या आठवड्यात मोहितची मोठी बहीण माहेरी आली.

 

नवरा जिवंत असताना सरलाताईंना कधीच पैशांसाठी कुणाकडे पाहावं लागत नव्हतं. ते स्वतःच पेन्शनमधून त्यांना थोडेफार पैसे देत असत.

आता मात्र मुलीच्या निरोपासाठीही त्यांना सुनबाईकडे हात पसरावा लागणार होता.

श्रेयाचे तेच शब्द त्यांच्या मनात घुमत होते,

“ मंदी आहे… जपून खर्च करा! ”

 

मन खट्टू करून त्या मुलीला रिकाम्या हाताने निरोप देऊ लागल्या,  तेवढ्यात श्रेया स्वतः पुढे आली आणि २००० रुपये त्यांच्या हातात ठेवत म्हणाली,

“ मुलीला रिकाम्या हाताने कसं पाठवणार? ”

पण त्या शब्दांत आपलेपणा कमी आणि टोमणा जास्त होता हे सरलाताईंना जाणवलं.

 

सरलाताईंच्या आयुष्यात पैशांची खरी कमतरता नव्हती. औषधं,  रिचार्ज,  छोट्या गरजा—मोहित लगेच पैसे देत असे.

पण मंदिरात दान करायचं असो,  सणासुदीला नोकरांना काही द्यायचं असो,  नातेवाईकांना भेट द्यायची असो,  प्रत्येक वेळी मागणं त्यांच्या स्वाभिमानाला टोचत होतं.

 

अलीकडे त्यांची बहीण आली होती. तिची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तिला मदतीची अपेक्षा होती. पण सरलाताई स्वतःच पैशासाठी सुनेकडे पाहताना दिसल्यावर तिने काहीच मागितलंच नाही.

 

आणि मग एक दिवस मोबाईलवर मेसेज आला — State Bank of India कडून.

 

सहा महिन्यांची पेन्शन — ७२,००० रुपये — त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा संदेश होता. सरलाताई जवळच्या ATM मधून १०,००० रुपये काढून घरी येत होत्या. त्यांच्या चालण्यातला आत्मविश्वास,  चेहऱ्यावरचे तेज सांगत होतं — पेन्शनला “सन्मान निधी” का म्हणतात ते.

 

कोट्यवधींच्या संपत्तीपेक्षा त्यांच्या पतींच्या त्या १२,००० रुपयांच्या पेन्शनमध्ये त्यांना अधिक वजन,  अधिक आधार आणि सर्वात महत्त्वाचं — स्वाभिमान जाणवत होता.

 

आई-वडिलांचं आयुष्य आपल्या आरामासाठी झिजलेलं असतं. आणि आपण मात्र त्यांच्या गरजांकडे ‘रक्कम’ म्हणून पाहतो.

 

गोष्ट पैशांची नाही,  स्वाभिमानाची आहे.

सन्मानाची आहे, भावनांची आहे.

 

पेन्शन म्हणजे फक्त पैसे नसून ती ‘सन्मानाची सही’ आहे.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “गाथा कोकणच्या सागरदुर्गांची” – लेखक : प्रा. प्र. के. घाणेकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गाथा कोकणच्या सागरदुर्गांची” – लेखक : प्रा. प्र. के. घाणेकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : गाथा कोकणच्या सागरदुर्गांची

लेखक: प्रा. प्र. के. घाणेकर 

पृष्ठे: ३८१

मूल्य: ६००₹ 

कोकणचा भूभाग प्राचीन काळापासून अत्यंत महत्वाचा राहिला आहे. दमण-डहाणूपासून ते गोवा-कारवारपर्यंत हा भूभाग निखळ मराठी भाषिक आहे. कित्येक शतकांपूर्वीपासून या प्रदेशातील बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्वाची भूमिका बजावीत आहेत. इथल्या खाड्या एकेकाळी खूप आतवर जहाजांच्या वावरास उपयुक्त ठरल्या होत्या. पण या सगळ्या घडामोडींसाठी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका इथल्या सागरदुर्गांनी बजावलेली दिसते.

कुलाबा,  खांदेरी,  पद्मदुर्ग,  जंजिरा,  सुवर्णदुर्ग,  सिंधुदुर्ग,  अंजदीव हे सागरबेटांवरील जलदुर्ग किंवा पाणकोट जसे कोकणात आढळतात,  तसेच आफ्रिकन सिद्दींनी उभारलेले उंदेरी (जयदुर्ग) आणि जंजिरा (जझीरे मेहरूब) किंवा उत्तर फिरंगाणातील केळवे-माहीमचे किल्ले,  तसेच दक्षिणेस गोव्यातील आग्वाद,  गास्परदियश,  रेईसमागोस,  खोलगड उर्फ काब-द-राम असे अनेक किल्ले पोर्तुगीजांनी बांधून घेतले. त्यातही रेवदंडा आणि वसई यांची दुर्गबांधणी खूप वेगळ्या त-हेची आहे.

हे पुस्तक लिहिताना लेखकाने खालील अपेक्षा व्यक्त केली आहे… 

कोकणचे किल्ले पाहावयाचे ते ह्यासाठी. आपण का? कसं? कोणासाठी अन् कशासाठी जगायचं? ह्याचा अर्थ या जलदुर्गांच्या सहवासात कळतो. जळणारं मन,  उघडे डोळे अन् चालणारे पाय असतील तर हे सारं नीट कळतं आणि मग अशा जागी गेलं की,  आपले आपण हरवून जातो. सागराची गाज आपल्याला शिवरायांच्या कल्पनेतील झेप अन् मनसुब्यातील फेक सांगू लागते. इथल्या दुर्गाची ढासळणारी तटबंदी शिवस्पर्शाची कहाणी सांगू लागते. तसं झालं की,  अशा किल्ल्यांवर कधीमधी दिसणाऱ्या पुंड तरुणांच्या शहरी टोळक्यांची नाच-गाणी,  हावभाव यांची कीव येते. “देवा,  त्यांना क्षमा कर… ” असं वाक्य आपल्याही तोंडी येतं.

हे किल्ले पाहताना आपला गौरवशाली इतिहास आपल्याला स्मरणार नसेल,  तर हे किल्ले पाहायला जायचंच कशाला? तिथं गेल्याचा ‘पराक्रम’ अजरामर करण्यासाठी खडू,  कोळसा,  विटकर,  चुना आणि तैलरंग अशा गोष्टींचा उपयोग करून घाणेरड्या अक्षरात आपली नावं कोरून ठेवण्याचा उपक्रम करताना आपल्याला स्मरलं पाहिजे की,  आपल्या पूर्वजांनी घाम गाळून अन् रक्त सांडून हे दुर्ग उभारले अन् प्राणपणाने जपले,  पण त्यांपैकी एकानंही आपलं नाव नाही कुठे कोरून ठेवलं. इथं आल्यावर इथल्या वास्तू,  इथली प्रेक्षणीय ठिकाणं,  पूजनीय स्थानं,  इथली माणसं या सर्वांची जाण आपण राखली पाहिजे. ते आपलं कर्तव्यच आहे. कारण या देशाचा हा वैभवशाली इतिहास आपला आहे.

या किल्ल्यांवर लोकांनी यावं,  डोळे भरून ही दुर्गरत्नं पाहावीत. शिवरायांनी ही दुर्गपुष्पे समृद्ध रत्नाकराच्या अन् तात सह्याद्रीच्या माथी वाहून केलेली शौर्यपूजा पाहावी,  असं मला प्रामाणिकपणे वाटतं. इये मुलखी हिंडणाऱ्यांचे चार गट प्रामुख्याने मला आढळतात. शिवरायांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत श्रद्धेने या गडकोट,  किल्ले अन् दुर्गावर मनापासून प्रेम करणारे,  हा झाला पहिला वर्ग. पाठपिशवी लटकावून ट्रेकिंग -रॉकक्लाइंबिंग करणारे अन् हिमालयात जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सह्याद्रीत हिंडणारे,  हा दुसरा वर्ग. ह्या भागातील पशू -पक्षी -वनस्पती,  भूरचना अशा निसर्गविशेषांचा अभ्यास करण्यासाठी हिंडणाऱ्यांचा तिसरा गट,  केवळ गंमत म्हणून केव्हातरी-कसंतरी-कारणपरत्वे बाहेर पडणाऱ्यांचा चौथा गट. पण हे किल्ले डोळसपणे पाहावेत,  त्यांचं महत्त्व जाणून घ्यावं,  तेथे घडलेला इतिहास समजून घ्यावा; तेथील निसर्गविशेषही परिचयाचा असावा,  असं सर्वसमावेशक असणं,  मला अपेक्षित आहे. पैकी गिर्यारोहण प्रेमींचा कोणत्याही किल्ल्यावर नव्या सुखसोयी,  रस्ते,  विजेचे दिवे,  राहण्याजेवणाची सोय करण्यास सामान्यतः विरोध असतो. या ठिकाणांची दुर्गमता,  निर्मनुष्यपणा,  अडचणी तशाच राहाव्यात असा यांचा आग्रह असतो. पण आश्चर्य असं की, सर्व सुविधा तिथे उपलब्ध झाल्या,  तर त्यांचा लाभही ही मंडळी घेतातच.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ५-१५ किल्ल्यांवर लोकांनी जावं,  तिथला इतिहास स्मरावा; वृद्ध, लहान मुलं,  माता, भगिनी, आजारी, अपंग अशा सर्वांना तिथं जाणं सुकर असावं,  त्यांना तिथं व्यवस्थित राहता यावं,  असं मला नेहमी वाटतं. कारण इथे आपला इतिहास घडला आहे. अवघड वाटा,  दुष्कर मार्ग,  मानवी संपर्कापासून दूर जावं असं ज्या ट्रेकर्सना वाटतं,  त्यांना हिंडायला या दुर्गांच्या देशात अनेक ठिकाणं आहेत. मात्र या साऱ्या सोयींच्या पाठोपाठ येऊ शकणारा बकालपणा टाळणं हे फक्त तिथे जाणाऱ्या आपल्या सर्वांच्याच हाती आहे. तेवढं सांभाळलं जावं असं आवर्जून वाटतं.

– – – 

अशा ७८ किल्ल्यांची नकाशांसह माहिती प्रसिद्ध दुर्गअभ्यासक व लेखक प्रा. प्र. के. घाणेकर सरांनी या पुस्तकात दिली आहे. ती सर्वांनाच निश्चितपणे उपयुक्त ठरेल.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # ३२८ ☆ व्यंग्य – मंत्री जी का हाज़मा ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम व्यंग्य  – ‘मंत्री जी का हाज़मा‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # ३२८ ☆

☆ व्यंग्य ☆ मंत्री जी का हाज़मा ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

मंत्री जी लाव-लश्कर के साथ डॉक्टर के दवाखाने पहुंचे। लश्कर को बाहर छोड़कर मंत्री जी डॉक्टर के चेंबर में दाखिल हुए। डॉक्टर ने आने का कारण पूछा तो मंत्री जी ने बताया— ‘पेट में बहुत तकलीफ रहती है। कुछ भी पचता नहीं। कभी उल्टी होती है तो कभी डायरिया। बेचैनी बहुत रहती है। अचानक ही घबराहट होने लगती है। हलक सूखता रहता है।’

डॉक्टर ने पूछा, ‘खाना क्या खाते हैं? कुछ बदपरहेज़ी होती होगी।’

मंत्री जी ने जवाब दिया, ‘बहुत सादा खाना खाता हूं। कोई बदपरहेज़ी नहीं होती।’

डॉक्टर साहब चक्कर में पड़े, बोले, ‘पूरी जांच करनी पड़ेगी।’

मंत्री जी कुछ संकोच में बोले, ‘वैसे आप अपने तक ही रखें तो बताना चाहता हूं कि मेरी तकलीफ तभी बढ़ती है जब लोग पैसा वैसा दे जाते हैं। लोग ब्रीफकेस लेकर आते हैं और छोड़ कर चले जाते हैं। मना करता हूं तो कहते हैं रख लीजिए, नहीं तो हमारा दिल टूट जाएगा। तभी हमें घबराहट होती है और उल्टी डायरिया का सिलसिला शुरू हो जाता है। रात को नींद भी नहीं आती।’

डॉक्टर साहब हंस कर बोले, ‘समझ गया। आपकी दूसरी वाली यानी माल हज़म करने वाली पाचन-शक्ति कमज़ोर है। आपके पिताजी क्या करते थे?’ 

मंत्री जी ने जवाब दिया, ‘स्कूल मास्टर थे।’

डॉक्टर साहब फिर हंसे, बोले, ‘यही रोग की जड़ है। आपके खानदान में माल पचाने की परंपरा नहीं रही। इसीलिए आपको दिक्कत हो रही है।’

फिर कुछ सोच कर बोले, ‘इस मर्ज़ का इलाज आपको डॉक्टर के पास नहीं मिलेगा। आप किसी अनुभवी, तपे हुए राजनीतिज्ञ के पास जाइए। उन्हीं के पास माल पचाने का नुस्खा मिलेगा।’

मंत्री जी डॉक्टर साहब को धन्यवाद देकर रुख़सत हो गये। एक माह बाद डॉक्टर साहब के पास उनका फोन आया, बोले, ‘धन्यवाद, डॉक्टर साहब। आपने सही रास्ता दिखाया। मुझे एक सीनियर राजनीतिज्ञ से पाचन-शक्ति बढ़ाने का मशवरा मिल गया है। अब पेट की गड़बड़, घबराहट वगैरह  कुछ नहीं होती। आपको बहुत धन्यवाद।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन यात्रा ☆ “शहीद भगत सिंह की कुछ बातें” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ जीवन यात्रा – “शहीद भगत सिंह की कुछ बातें” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

किसी मित्र ने एक काम मेरे जिम्मे लगाया कि शहीद भगत सिंह की जीवनी लिख कर  दूं । बड़ी कोशिश रही कि जल्द से जल्द दे सकूं पर इधर उधर के कामों के बावजूद शहीद भगत सिंह के प्रति मेरी श्रद्धा और उनके पैतृक गांव खटकड़ कलां में बिताये ग्यारह वर्ष मुझे इसकी गंभीरता के बारे में लगातार सचेत करते रहे । बहुत सी कहानियां हैं उनके बारे में । किस्से ऊपर किस्से हैं । इन किस्सों से ही भगत सिंह शहीद ए आज़म हैं ।

मेरी सोच है या मानना है कि शायद शुद्ध जीवनी लिखना कोई मकसद पूरा न कर पाये । यह विचार भी मन में उथल पुथल मचाता रहा लगातार । न जाने कितने लोगों ने कितनी बार शहीद भगत सिंह की जीवनी लिखी होगी और सबने पढ़ी भी होगी ।  मैं नया क्या दे पाऊंगा ? यह एक चुनौती रही ।

सबसे पहले जन्म की बात आती है जीवनी में । क्यों लिखता हूं मैं कि शहीद भगत सिंह का पैतृक गांव है खटकड़ कलां , सीधी सी बात कि यह उनका जन्मस्थान नहीं है । जन्म हुआ उस क्षेत्र में जो आज पाकिस्तान का हिस्सा है जिसमें 27 सितम्बर, 1907 में जन्म हुआ । और यह बात भी परिवारजनों से मालूम हुई कि वे कभी अपने जीवन में खटकड़ कलां आए ही नहीं । फिर इस गांव की इतनी मान्यता क्यों ? क्योंकि स्वतंत्र भारत में भगत सिंह , राजगुरु और सुखदेव को श्रद्धा अर्पित करने के  दो ही केद्र हैं -खटकड़ कलां और हुसैनीवाला । इनके पैतृक गांव में इनका घर और कृषि भूमि थी । इनके घर को परिवारजन राष्ट्र को अर्पित कर चुके हैं और गांव में मुख्य सड़क पर ही एक स्मारक बनाया गया है । बहुत बड़ी प्रतिमा भी स्मारक के सामने है । पहले हैट वाली प्रतिमा थी , बाद में पगड़ी वाली प्रतिमा लगाई गयी ।  इसलिए इस गांव का विशेष महत्त्व है । हुसैनीवाला वह जगह है जहां इनके पार्थिव शवों को लाहौर जेल से रात के समय लोगों के रोष को देखते हुए चोरी चुपके लाया गया फांसी के बाद और मिट्टी का तेल छिड़क आग लगा दी जैसे कोई अनजान लोग हों -भगत सिंह, राजगुरु और सुखदेव । दूसरे दिन भगत सिंह की माता विद्यावती अपनी बेटी अमर कौर के साथ रोती हुई पहुंची और उस दिन के द ट्रिब्यून अखबार के पन्नों में राख समेट कर वे ले आई तीनों की जो आज भी शहीद स्मारक में ज्यों की त्यों रखी है । यही नहीं स्मारक भगत सिंह जो डायरी लिखते थे और कलम दवात भी रखी हैं।  मानो अभी कहीं से भगत सिंह आयेंगे और अपनी ज़िंदगी की कहानी फिर से और वहीं से लिखनी शुरू कर देंगे , जहां वे छोड़ कर गये थे । इनकी सबसे बड़ी बात कि इन्होंने अपने से पहले शहीद हुए सभी शहीदों की वो गलतियां डायरी में लिखीं जिनके चलते वे पकड़े गये थे । जाहिर है कि वे इतने चौकन्ने थे कि उन गलतियों को दोहराना नहीं चाहते थे ।  वैसे यह कितनी बड़ी सीख है हमारे लिए कि हम भी अपनी ज़िंदगी में बार बार वही गलतियां न दोहरायें ।

अब बात आती है कि आखिर कैसे और क्यों भगत सिंह क्रांतिकारी बने या क्रांति के पथ पर चले ? शहीद भगत सिंह के चाचा अजीत सिंह ने किसान आंदोलन पगड़ी संभाल ओए जट्टा में बढ़ चढ़ कर हिस्सा लिया जिसके चलते उन पर अंग्रेज सरकार की टेढ़ी नज़र थी । उन्हें जेल में ठूंसा गया दबाने के लिए । इनके पिता किशन सिंह भी जेल मे थे । जब इनका जन्म हुआ तब पिता और चाचा जेल से छूटे तो दादी ने इन्हें भागां वाला कहा यानी बहुत किस्मत वाला बच्चा । जिसके आने से ही पिता और चाचा जेल से बाहर आ गये । इस तरह इसी भागां वाले बच्चे का नाम आगे चल कर भगत सिंह हुआ ।

फिर इनके बचपन का यह किस्सा भी बहुत मशहूर है कि पिता किशन सिंह खेत में हल चलाते हुए बिजाई कर रहे थे और पीछे पीछे चल रहे थे भगत सिंह । उन्होंने अपने पिता से पूछा कि बीज डालने से क्या होगा ?

-फसल।  यानी ज्यादा दाने ।

-फिर तो यहां बंदूकें बीज देते हैं जिससे ज्यादा बंदूकें हो जायें और हम अंग्रेजों को भगा सकें ।

यह सोच कैसे बनी और क्यों बनी ? इसके पीछे बाल मनोविज्ञान है ।

इनके चाचा अजीत सिंह ज्यादा समय जेल में रहते और चाची हरनाम कौर रोती बिसूरती रहती या उदास रहतीं । बालमन पर इसका असर पड़ा और चाची से गले लग कर वादा करता रहा कि एक दिन इन अंग्रेजों को सबक जरूर सिखाऊंगा । इनके चाचा अजीत सिंह उस दिन डल्हौजी में थे जब हमारा देश स्वतंत्र हुआ और उसी दिन वहीं उनका खुशी में हृदय रोग से निधन हो गया । डल्हौजी में उनका स्मारक भी बनाया गया है जिसे देखने का सौभाग्य वहां जाने पर मिला था ।

परिवार आर्य समाजी था और इनके दादा अर्जुन सिंह भी पत्र तक हिंदी में लिखते थे जो अनेक पुस्तकों में संकलित हैं । भगत सिंह के परिवार के बच्चों के यज्ञोपवीत भी हुए । इस तरह पहले से ही यह परिवार नयी रोशनी और नये विचारों से जीने में विश्वास करता था जिसका असर भगत सिंह पर भी पड़ना स्वाभाविक था और ऐसा ही हुआ भी ।

इस तरह क्रांति के विचार बालमन में ही आने लगे । फिर जब जलियांवाला कांड हुआ तो दूसरे दिन बालक भगत अपनी बहन बीबी अमरकौर को बता कर अकेले रेलगाड़ी में बैठकर  अमृतसर निकल गया और शाम को वापस आया तो वहां की मिट्टी लेकर और फिर वह विचार प्रभावी हुआ कि इन अंग्रेजों को यहां से भगाना है । उस समय भगत सिंह मात्र तेरह साल के थे । बीबी अमर कौर उनकी सबसे अच्छी दोस्त जैसी थी । वह मिट्टी एक मर्तबान में रख कर अपनी मेज पर सजा ली ताकि रोज़ याद करें इस कांड को । इस तरह कड़ी से कड़ी जुड़ती चली गयीं । भगत सिंह करतार सिंह सराभा को अपना गुरु मानते थे और उनकी फोटो हर समय जेब मे रखते थे । उन्हें ये पंक्तियां बहुत पसंद थीं

हम भी आराम उठा सकते थे घर पर रह कर

हमको भी मां बाप ने पाला था दुख सह सह कर ,,,

दूसरी पंक्तियां जो भगत सिंह को प्रिय थीं और गुनगुनाया करते थे :

सेवा देश दी करनी जिंदड़िये बड़ी औखी

गल्लां करनियां ढेर सुखलियां ने

जिहना देश सेवा विच पैर पाया

उहनां लख मुसीबतां झल्लियां ने,,, स्कूल की पढ़ाई के बाद जिस काॅलेज में दाखिला लिया वह था नेशनल काॅलेज , लाहौर जहां देशभक्ति घुट्टी में पिलाई जा रही थी । यह काॅलेज क्रांतिकारी विचारकों ने ही खोला था जिनमें संभवतः लाला लाजपतराय भी एक थे । उस घुट्टी ने बहुत जल्द असर किया । वैसे भगत सिंह थियेटर में भी दिलचस्पी रखते थे और लेखन में भी । इसी काॅलेज में वे अन्य क्रांतिकारियों के सम्पर्क में आए और जब लाला लाजपतराय को साइमन कमीशन के विरोध करने व  प्रदर्शन के दौरान लाठीचार्ज में बुरी तरह घायल किया गया तब ये युवा पूरे रोष में आ गये । स्मरण रहे इन जख्मों को पंजाब केसरी लाला लाजपत राय सह नहीं पाये और वे इस दुनिया से विदा हो गये । लाला लाजपतराय की ऐसी अनहोनी और क्रूर मौत का बदला लेने की इन युवाओं ने ठानी । सांडर्स पर गोलियां बरसा कर जब भगत सिंह लाहौर से निकले तो थियेटर का अनुभव बड़ा काम आया और वे दुर्गा भाभी के साथ हैट लगाकर साहब जैसे लुक में बच निकले । दुर्गा भाभी की गोद में उनका छोटा सा बच्चा भी था । इस तरह किसी को कोई शक न हुआ। भगत सिंह का यही हैट वाला फोटो सबसे ज्यादा प्रकाशित होता है ।

इसके बाद यह भी चर्चा है कि घरवालों ने इनकी शादी करने की सोची ताकि आम राय की तरह शायद गृहस्थी इन्हें सीधे या आम ज़िंदगी के रास्ते पर ला सके लेकिन ये ऐसी भनक लगते ही भाग निकले । क्या यह कथा सच है ? ऐसा सवाल मैंने आपकी माता विद्यावती से पूछा था तब उन्होंने बताया थे कि सिर्फ बात चली थी । कोई सगाई या कुड़माई नहीं हुई न कोई रस्म क्योंकि जैसे ही भगत सिंह को भनक लगी उसने भाग जाना ही उचित समझा ।  तो  क्या फ़िल्मों में जो गीत आते हैं वे झूठे हैं ?

जैसे : हाय रे जोगी हम तो लुट गये तेरे प्यार में ,,,इस पर माता ने कहा कि फिल्म चलाने के लिए कुछ भी बना लेते हैं । वैसे सारी फिल्मों में से मनोज कुमार वाली फिल्म ही सही थी और मनोज कुमार मेरे से आशीर्वाद लेने भी आया था ।

खैर भगत सिंह घर से भाग निकले और कानपुर जाकर गणेश शंकर विद्यार्थी के पास बलवंत नाम से पत्रकार बन गये । उस समय पर इनका लिखा लेख -होली के दिन रक्त के छींटे बहुचर्चित है । और भी लेख लिखे । मै हमेशा कहता हूं कि यदि भगत सिंह देश पर क़ुर्बान न होते तो वे एक बड़े लेखक या पत्रकार होते । इतनी तेज़ कलम थी इनकी ।

इसके बाद इनका नाम आया बम कांड में । क्यों चुना गया भगत सिंह को इसके लिए ? क्योंकि ये बहुत अच्छे वक्ता थे और इसीलिए योजना बनाई गयी कि बम फेंककर भागना नहीं बल्कि गिरफ्तारी देनी है । भगत सिंह ने अदालत में लगातार जो विचार रखे वे अनेक पुस्तकों में सहेजे गये है और यह भी स्पष्ट किया कि हम चाहते तो भाग सकते थे लेकिन हम तो अंग्रेजी सरकार को जगाने आये थे । दूसरे यह गोली या बम से परिवर्तन नहीं आता लेकिन बहरी सरकार को जगाने के लिए इसे उपयोग किया गया ।  इस तरह यह सिद्ध करने की कोशिश की गयी कि हम आतंकवादी नहीं बल्कि क्रांतिकारी हैं । भगत सिंह की एक पुस्तिका है-मैं नास्तिक क्यों हूं ? यह खूब खूब बिकती है और पढ़ी जाती है । भगत सिंह हरफनमौला और खुशमिजाज युवक थे । इनके साथी राजगुरु और सुखदेव भी फांसी के हुक्म से जरा विचलित नहीं हुए और किसी प्रलोभन में नहीं आए । अनेक प्रलोभन दिए गये । आखिरी दिन तक प्रलोभन दिये जाते रहे लेकिन भारत माता के ये सपूत अपनी राह से बिल्कुल भी पीछे न हटे । डटे रहे ।

भगत सिंह पुस्तकें पढ़ने के बहुत शौकीन थे और अंत तक जेल में अपने वकील या मिलने आने वालों से पुस्तकें मंगवाते रहे । आखिर जब फांसी लगने का समय आया तब भी लेनिन की जीवनी पढ़ रहे थे और जब बुलावा आया कि चलो । तब बोले कि ठहरो, अभी एक क्रांतिकारी दूसरे क्रांतिकारी से मिल रहा है । अपने छोटे भाई कुलतार को भी एक खत में लिखा था कि पढ़ो , पढ़ो, पढ़ो क्योकि विचारों की सान इसी से तेज़ होती है ।

बहुत छोटी उम्र मे  23 मार्च, 1931 में फांसी का फंदा हंसते हंसते चूम लिया । क्या उम्र होती है मात्र तेईस साल के आसपास । वे दिन जवानी की मदहोशी के दिन होते हैं लेकिन भगत सिंह को जवानी चढ़ी तो चढ़ी आज़ादी पाने की ।

फिर भी रहेंगी कहानियां ,,

तुम न रहोगे , हम न रहेंगे

फिर भी रहेंगी कहानियां,,

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares