मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धाडस – – भाग – १ ☆ श्री विश्वास दाते ☆

श्री विश्वास दाते

🌸 जीवनरंग 🌸

☆ धाडस – – भाग – १ ☆ श्री विश्वास दाते ☆

शुक्रवारी संध्याकाळची साडेसातची वेळ असावी. सगळे सहकारी केव्हाच घरी गेले होते. मी मात्र ऑफिस मधेच बसून होतो. बाहेर आमचा शिपाई मनोहर मी निघण्याची वाट पहात होता. संध्याकाळ जास्तच काळोखी वाटत होती. ऑफिसमधील एसी जराही जाणवत नव्हता. पुढे काय होणार ह्या विचारांचे मोहळ माझ्या मनात उठले होते. छाती भरून आल्याने श्वास जड झाला होता. मी गळ्याभोवती असलेली टायची गाठ सैल केली पण जराही आराम वाटला नाही. एका मोठ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक संकटाच्या कड्यावर मी उभा होतो.

एका मोठ्या कंपनीच्या मार्केटिंग विभागाचा मी प्रमुख होतो आणि कित्येक मॅनेजर्सची टीम माझ्याबरोबर काम करत होती. ह्या असिस्टन्ट [कनिष्ठ] मॅनेजर्सच्या बरोबर मदतीसाठी अनेक तरूण शिकाऊ मॅनेजर्स पण होते.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी अंजली ह्या कंपनीत शिकाऊ मॅनेजर म्हणून लागली. ती स्वभावाने आक्रमक आणि महत्वाकांक्षी तर होतीच, आणि एका उत्तम संस्थेतून MBA पण झालेली होती. तसेच ती मनमोकळी आणि वागायला मोकळीढाकळी होती. तिच्या ह्या स्वभावामुळे आणि तसेच तिच्यामधील काम तडीस लावण्याच्या क्षमतेमुळे आणि बऱ्यापैकी असलेल्या नैसर्गिक तरुण सौंदर्यामुळे, सुरुवाती पासूनच नकळत माझे लक्ष तिने आकर्षून घेतले होते.

काही काळानंतर तर अधूनमधून, तिच्या थेट अधिकार्‍याला बाजूला ठेवून, मी तिच्याशी थेट संपर्क कधी करू लागलो हे माझे मलाच कळले नाही. आपण काहीतरी चुकीचे करत आहोत ही भावना माझ्या प्रशिक्षित मनाला कुरतडू लागली होती. असे असूनही स्वत:च्या तारुण्याच्या प्रभावाखाली माझ्याकडून तिला पाठवलेल्या कौतुकाच्या चिठ्ठ्या हळूहळू जरा जवळि‍केच्या होत गेल्या होत्या.

माझ्या मनावर अविचाराने केंव्हा कब्जा केला हे माझे मलाच समजले नाही. एका संध्याकाळी मी जरा धाडस करून अंजलीला विचारले, “आज जरा निवांतपणे बाहेर जेवायला जायचे का? ”

जरा लाडिक आढेवेढे घेऊन अंजली म्हणाली, “सर, तुमची एवढी इच्छा आहे तर जाऊया. पण फार उशीर करायला नको हं. ”

माझ्या मनाला झालेल्या गुदगुल्या मलाच ठाऊक. आणि मग, काम संपल्यावर एकत्र बाहेर जेवण घेणेही खूप वेळा होऊ लागले. मधून मधून पुसटसा स्पर्श करणे सुरू झाले व बाहेर गेल्यावर माझी प्रगती हातात हात घेण्यापर्यंत कधी झाली हे मलाच समजले नाही. फारसा विरोध न करता, अंजली पण लटका राग दाखवत असे. काही दिवसांनी, अंजली जरी ऑफिसमध्ये मला ‘सर’ असे संबोधित असे, तरी बाहेर भेटल्यावर सुरुवातीला ‘रवी सर’ आणि नंतर फक्त ‘रवी’ असे संबोधू लागली होती. तरुण अंजलीकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे माझ्या मध्यमवयीन मनातला पुरुष कुठे तरी आतल्या आत सुखावत होता.

माझ्याकडून मिळणाऱ्या ह्या अनुकूल वागणुकीमुळे, अंजलीने त्याचा फायदा घेऊन दुसर्‍याने केलेल्या कामाचे क्रेडिट घेणे आणि स्वत:च्या चुका सहकाऱ्यांवर ढकलणे सुरू केले. माझ्याकडूनही संशयाचा फायदा नेहमीच अंजलीला दिला जात होता. कधी काळी तिच्या चुकांवर मी थोडा रागावलो तरी तो वरवरचा राग आहे हे समजण्या इतकी अंजली नक्कीच चाणाक्ष होती.

कंपनीमध्ये हळूहळू अफवांचे पीक सुरू झाले. मांजरीला डोळे मिटून दूध पितांना कोणी बघत नाही असे जरी वाटत असते तरी खरे नसते. माझ्या आणि अंजलीच्या समोर खुलेपणाने जरी कोणी बोलत नसले तरी दबकून चर्चा आणि अर्थपूर्ण कटाक्ष टाकले जाऊ लागले. माझ्या डोक्यात शिरलेल्या अनामिक भूतामुळे मी आणि चाणाक्ष अंजली दोघेही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिलो.

लवकरच कंपनीमध्ये, एका राजीनाम्यामुळे एक ब्रँड मॅनेजरची जागा रिकामी झाली. माझ्या मनात सुयश देशमुख या एका अतिशय कर्तुत्ववान कनिष्ठ मॅनेजरला त्या जागेवर नेमायचे होते कारण त्याला त्या कामाचा थोडा अनुभव होता तसेच त्याला खरोखरच बढती मिळणे आवश्यक होते. परंतु अतिमहत्वाकांक्षी अंजलीने त्या जागेवर तिला बढती मिळावी असा हट्ट माझ्याकडे सुरू केला.

लाडीकपणे अंजली, “रवी सर, मला वाटते की या ब्रँड मॅनेजरच्या जॉबसाठी मी अगदी योग्य आहे. तुम्ही माझी या जॉबसाठी निवड कराल अशी मला खात्री वाटते. कराल ना प्लीज. ”

“अंजली, या जॉबसाठी खूप जास्त अनुभव लागतो. तू आत्ताच तर आपल्या कंपनीत काम सुरू केले आहेस. अजून अनुभव गोळा कर. तू हुशार आहेस. कर्तुत्ववान आहेस. योग्य वेळी तुलाही बढतीची संधी मिळेल. सब्रका फल मीठा होता है. ”

अंजलीची मागणी लाडीक हावभावात चालूच राहीली. सुरुवातीला मी हा विषय टाळायचा प्रयत्न केला, कारण संपूर्ण विभागातील लोकांचे लक्ष माझ्या निर्णयाकडे लागले होते.

“सर, मी किती दिवस वाट पहायची? ही बढती मलाच द्या. ”

“अग वेडे, तुझा अनुभव अजून कमी आहे. शिवाय सुजय देशमुख खूप जास्त अनुभवी आहे आणि ह्या मोकळ्या झालेल्या जागेवरील लागणार्‍या कामाचा पण जाणकार आहे. मला वाटते की तू थोडा धीर धरून चांगले काम करत रहावे. तुला पण योग्य वेळी बढती मिळेल. तुलाही माहित असेल की ‘योग्य कामासाठी योग्य माणसाची निवड करणे’ ही माझी जबाबदारी आहे. ” 

आज तर फारच शर्थ झाली. अत्यंत खुनशी चेहेऱ्याने अंजलीने तिचे खायचे दात दाखवत, तिची मागणी पुनः लावून धरली.

“ सर, आता फार झाले. मी तुम्हाला स्पष्ट सांगते की बढती मला दिली नाही तर मी तुमच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करायला पुढे मागे पाहणार नाही. तुम्हाला सांगून ठेवते की तुम्ही मला पाठवलेल्या चिठ्ठ्या आणि इमेल्स माझ्याकडे मी जपून ठेवली आहेत. नाइलाजाने मला ही माहिती तुमच्या बायकोकडे पाठवावी लागेल. आता तुम्हीच काय ते ठरवा. ” 

माझ्या उत्तराची वाट न बघता, माझ्याकडे तुच्छ नजरेने बघत अंजली माझ्या केबिनमधून ताडताड बाहेर पडली. अंजलीचे हे रूप मला पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित होते. तिच्या धमकीचा पुनः विचार केल्यावर मला तर आभाळ कोसळल्या सारखेच झाले. एका बाजूला कंपनी मधील चौकशी आणि त्यातून होणार्‍या बदनामीची भीती आणि दुसर्‍या बाजूला सुखाने चाललेले वैवाहिक जीवन संपूर्ण उध्वस्त होण्याची शक्यता.

विचार करून करून मन उद्विग्न झाले आणि डोके भणभणू लागले. मात्र मी जेवढा जास्त विचार करत गेलो तेवढे माझ्या लक्षात आले की जर मूल्यांशी तडजोड करून ह्या दडपणाला बळी पडलो तर यापुढे सहकाऱ्यांच्या डोळ्याला डोळा देऊन पाहू शकणार नाही आणि मनाची टोच मला जन्म भर खात राहील. शांत चित्ताने झोपूही शकणार नाही.

मला ह्याची पण पूर्ण कल्पना होती की एकदा चटक लागली की ब्लॅकमेल करणारी व्यक्ती कधीही थांबत नाही, त्या व्यक्तीच्या मागण्या वाढतच जातात. आपणच केलेल्या घोडचुकीवर नुसता पश्चात्ताप करून काही उपयोग होणार नव्हता.

कंपनीकडून दयेची अपेक्षा करणे चूक ठरले असते कारण कुठल्याही कंपनीमध्ये मत्सरी व्यक्ती असतातच. लैंगिक अत्याचार सिद्ध झाला तर त्याबाबतची कंपनीची धोरणे अगदी स्पष्ट होती. नोकरी संपल्यावर मिळणारे कुठलेही फायदे न मिळता नोकरीतून बडतर्फ व्हावे लागले असते. याशिवाय सामाजिक नाचक्की झाली असती ते वेगळीच.

ह्याशिवाय माझे वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखाचे होते. माझी पत्नी सुलेखावर माझे नितांत प्रेम होते आणि विश्वास पण होता. अखेरीस एक ठाम निर्णय घेऊन मी घरी जायला निघालो. स्वत:ची मन:शांति ढळू नये म्हणून, मी सर्व धैर्य एकवटून झालेल्या घटना, कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सुलेखाला सांगायचे ठरविले. विचारांचे मोहोळ चालू असताना गाडी चालवत घरी कसा पोहोचलो ते सांगणे अवघड आहे.

– क्रमशः भाग पहिला 

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हतबल… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

हतबल… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

चपला काढून जवळजवळ पळतच रेखा स्वयंपाकघरात आली. ‘‘काकू – काकू ऐका ना ’’… मी वळून पाहिलं आणि पहातच राहिले. नवी कोरी झुळझुळीत साडी नेसलेली, व्यवस्थित वेणी घातलेली आणि गोड हसत उभी असलेली रेखा आज खूप आनंदात दिसत होती.

‘‘कशी आहे माझी साडी? ’’…

‘‘मस्तच. अगदी खुलते आहे तुझ्यावर’’… मी मनापासून म्हणाले.

– पण तिच्यापेक्षा तिच्या चेहेऱ्यावरचा आनंदच जास्त सुंदर वाटत होता मला…

‘‘मिश्टरांनी आणलीये माझ्यासाठी. आणि ना आणून रात्री गुपचूप कपाटात ठेवली होती’’….

तिला इतकी खुशीत असलेली मी आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती. मी पूजेसाठी ठेवलेला गजरा नकळत तिला दिला. घाईघाईने तो केसात माळून, आरशासमोर उभी राहून, ती वेगवेगळ्या कोनातून स्वतःकडे हसत पहात होती. नंतर काम करतानाही गुणगुणत होती, स्वतःशीच हसत होती.

रेखा… जेमतेम २०-२१ वर्षांची असेल. सुंदर नसली तरी नीटस होती. स्वच्छ आणि नीटनेटकी राहायची. चेहरा शांत. पण डोळे मात्र बोलके होते. दोन वर्षांपूर्वी पासून आमच्याकडे घरकामाला येते आहे. सुरुवातीला सतत बावरलेली, घाबरलेली वाटायची, हळूहळू रुळली. नवरा वयाने बराच मोठा असावा. आईच्या हट्टामुळे हिच्याशी नाईलाजाने लग्न केल्याचं सारखं तिला ऐकवायचा म्हणे. पण हिच्या बोलण्यात कधीच कुठली तक्रार जाणवायची नाही. फारसं न बोलता, शांतपणे काम करायची. हळूहळू मला ती आवडायला लागली होती. पण ही आजची रेखा, याआधी मला कधीच दिसली नव्हती. आज तिच्या अंगोपांगी फुललेला तो निर्मळ आनंद पहाताना मलाच खूप छान वाटत होतं… आज नेहमीपेक्षा पटापट काम संपवून ती निघूनही गेली…

— — आणि आज आता मी सकाळपासूनच तिची वाट पहात होते. दोनच माणसांच्या आमच्या घरात, तिच्यामुळे काल दिवसभर एक वेगळाच आनंद दरवळला होता… नकळत आज मी पुन्हा त्याच आनंदाची वाट पहात होते… ‘अजून का नाही आली ही? ’…. मी अस्वस्थ व्हायला लागले होते….

इतक्यात बेल वाजली. मी घाईघाईने दार उघडलं… माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. रेखाच आली होती… पण ही अशी? … लालबुंद डोळे…विस्कटलेला, सुजलेला चेहरा… अंगावर ठळक दिसणाऱ्या मारल्याच्या खुणा… खूप खूप केविलवाणी दिसत होती. आत आली, आणि ‘आई’… म्हणत एकदम गळ्यात पडून रडायलाच लागली. ‘आई’? … माझ्या मनात प्रचंड कालवाकालव होत होती. त्या क्षणी तिला आईच्या मायेची किती तीव्र गरज होती हे मला जाणवत होतं. मी कसंतरी तिला खुर्चीत बसवलं. पाणी दिलं. आणि नुसतीच तिच्या डोक्यावर, पाठीवर मायेने हात फिरवत राहिले.

जरा वेळाने तिचं रडणं थांबलं, आणि तिने आदल्या रात्री घडलेला सगळा प्रकार मला सांगितला… काल तिने कौतुकाने, हौसेने दिवसभर मिरवलेली ती साडी नवऱ्याने तिच्यासाठी आणलेलीच नव्हती, तर त्याच्या ‘मानलेल्या’ बायकोसाठी आणली होती म्हणे. अशा बाईला ‘मानलेली बायको‘ नाही, तर ‘ठेवलेली बाई‘ म्हणतात हेही त्या बिचारीला माहिती नव्हते.. तर त्याचा अर्थ कुठला माहिती असणार?

… आणि ती साडी हिने नेसलेली पहाताच नवरा प्रचंड भडकला होता. कसलाही विचार न करता त्याने तिला गुरासारखे मारले होते. शिव्यांचा भडीमार करत तुडवले होते. आणि तिच्या अंगावरची साडी फराफरा ओढून, फाडून टाकून घरातून निघून गेला होता. ही पार कोलमडून गेली होती. उपाशीपोटी रात्रभर रडत बसली होती. सकाळी नाईलाजाने उठून लटपटतच घरातली कामं तर उरकली होती. पण तिला घरात थांबावं असं वाटत नव्हतं.

… नवऱ्याची खूप भीती वाटत होती. त्याला आवरू शकेल आणि हिला सावरू शकेल असं हिच्या आयुष्यात कुणीच नव्हतं… म्हणून मग कामाला आली होती… माझ्यात तिच्या आईला शोधत होती…

जन्म देऊन तिची जन्मदात्री आई लगेचच देवाघरी गेली होती. आणि बापाने लगेचच दुसरं लग्न केलं होतं.. मनात हिच्याबद्दल प्रेम- जिव्हाळा फुलण्याआधीच. तेव्हापासून त्या सावत्र आईचा जाच आणि दुस्वास सहन करतच मोठी झालेली ती… तिची ब्याद टाळण्यासाठी त्या बाईने १५-१६ व्या वर्षीच तिशीतल्या एका बिजवराशी हिचं लग्न लावून टाकलं होतं – – तो माणूस ‘हुंडा’ नको म्हणाला एवढ्याच एका कारणाने.. इतर कुठलीच चौकशी न करता… हिच्या पसंती-नापसंतीचा कणभरही विचार न करता. आणि आता इतर कुठलाच आधार नसलेली ती.. त्याला सोडून जावं असं कितीही तीव्रपणे वाटलं तरी कुठे जाणार होती?? लग्न झाल्यापासून तिच्या वडलांनी तर तिच्याशी जणू संबंधच तोडून टाकले होते.. फार फार हतबल होऊन गेली होती ती…

… आणि मी? … मला तिच्यापेक्षा जास्त हतबल झाल्यासारखं वाटत होतं… मला खूप खूप मनापासून वाटत होतं की तिला म्हणावं – “ बाई या असल्या नवऱ्याला दे सोडून आणि आमच्याकडेच रहा कायमची “ म्हणून – – 

— पण त्या “ कायम “ शब्दाला आता काही अर्थ तरी उरला होता का? .. सहस्त्रचंद्र बघूनही २ वर्षं उलटून गेलेले माझे मिस्टर.. आणि त्यांच्या मागोमाग त्याच वाटेने चाललेली मी.. आम्ही किती दिवस पुरणार होतो तिला… तिचे ‘आई-बाप’ म्हणून? म्हणजे थोडे दिवस ‘आगीतून फुफाट्यात’ एवढाच काय तो फरक पडला असता.. आणि आमच्यानंतर पुनः तिची तीच फरपट.. हेच चित्र स्पष्ट दिसत होतं मला..

जनरीतीनुसार आज ना उद्या ती नाईलाजाने वास्तव स्वीकारेलही. पण मी? मला तिच्याबद्दल अगदी अंतःकरणापासून कितीही कणव.. कितीही काळजी वाटत असली तरी मी प्रत्यक्षात किती दिवस आणि काय करू शकणार होते तिच्यासाठी? शहाजोगपणाने मला ‘आई’ म्हणण्याची परवानगी तेवढी देणार होते का? … प्रत्यक्षात जन्मदात्या आईसारखी मनापासून तिची आई होणं जमणार तरी होतं का मला – झेपणार होतं का मला खरंच?

… आता मलाच खूप अगतिक झाल्यासारखं वाटतं होतं… कदाचित रेखापेक्षाही जास्तच.. फार फार हतबल झाल्यासारखं वाटतं होतं मला… खऱ्या अर्थाने पूर्णपणे हतबल होते मी – – –

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “परी…” –  भाग – २ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “परी…” –  भाग – २ ☆ श्री मंगेश मधुकर

(खूप दिवसांनी मायेचा निखळ स्पर्श अनुभवल्यावर भावुक झालेल्या परीनं आलेला हुंदका कसाबसा आवरला. पैसा, प्रतिष्ठा असूनही नियती रूसलेली म्हणूनच वाट्याला आनंदापेक्षा दु:खच जास्त. सगळं काही असूनही रिकामाचं. त्यात नलूबरोबर फुलणारं नातं ही अचानक तुटलं.)

इथून पुढे – – 

परी आणि नलूची पहिली भेट डोळ्यासमोर आली. चाळीतल्या गॅलरीतून गप्पा मारत जाताना परीचा पाय चुकून दारातल्या रांगोळीवर पडला.

“ए, डोळे फुटले का? जरा बघ की.. ”किंचाळत उभी राहिलेली नलू देखण्या परीकडं एकटक पाहतच राहिली.

“आय एम सो सॉरी!! सॉरी”परी.

“नले, जरा दमानं, मुद्दाम केलं नाही. रांगोळीच आहे ना परत काढ. ”मी नलूवर डाफरलो पण फटकळ नलूकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. ती अजूनही भान हरपून परीकडचं पाहत होती. लव्ह ऍट फस्ट साईट.

‘आय एम रियली सॉरी! ”परीचा माफीनामा सुरूच.

“नऱ्या, हे चिकणं चॉकलेट कोण रे!! ”नलूनं विचारलं.

“मित्रयं!! नीट बोल. ”माझ्याकडं पाहत नलूनं नाक मुरडलं आणि परीकडं पाहत लाजली तेव्हा परी हसला. नलूचं लाजणं अन परीचं हसणं हे फार दुर्मिळ अन धक्कादायक होतं. परी मुद्दाम मुलींपासून लांब रहायचा आणि नलू म्हणजे आमच्या चाळीची हिरोईन. दिसायला अतिशय देखणी, रूपवान वगैरे अजिबात नव्हती पण नजरेत भरण्यासाखी होती. गोरी. सुडौल बांधा, बोलके डोळे, सतत चालणारा तोंडाचा पट्टा, वेणीला डाव्या खांद्यांवरून पुढे घेत बोलणाऱ्या नलूनं अनेकांना घायाळ केलेलं पण लगट करायची कोणाची हिम्मत झाली नाही कारण तिचा भांडखोर, आक्रमक स्वभाव, आरडाओरडा, अंगावर धावून जाणं, शिव्या हे रोजचं. याच स्वभावामुळं तिच्याविषयी बऱ्या-वाईट बातम्या पसरलेल्या. एकदोघांबरोबर नावही जोडलं गेलेलं. एकूणच नलू म्हणजे गॉन केस. असं आख्ख्या चाळीचं मत. आमच्याच मजल्यावर दोन घरं सोडून रहायची पण एकदाही धड बोललो नव्हतो. माझं तिच्याशी एक मिनिट पटायचं नाही. (संडे डिश™©)

— 

हळूहळू परीचं आमच्या घरी येणं सवयीचं झालं. सगळी चाळ त्याला ओळखायला लागली. मी घरी नसताना सुद्धा तो येऊ लागला. नेमकं त्याच वेळी नलू आमच्या घरात थांबायला लागली. गप्पांसोबत नजरेचे खेळ सुरू झाले. त्यांच्यातलं विशेष नातं आईच्या लक्षात आलं. तिनं लगेचच मला सांगितलं. काळजीपोटी नलूविषयी सावध केलं परंतु वेगळ्याच विश्वात रमलेल्या परीनं दुर्लक्ष केलं. त्याला नलू मनापासून आवडलेली. पुन्हा परीला समजावयाचा प्रयत्न केला. नलूलासुद्धा परीचा नाद सोडण्याविषयी सांगितलं अन अपेक्षेप्रमाणे अपमान करून घेतला. सगळ्या चाळीला परीविषयी सहानुभूती आणि नलूविषयी तिरस्कार वाटत होता. नलू-परीची जोडी 100% विजोड आहे. स्वभाव विरुद्ध टोकाचे आहेत. आकर्षणाचा भर ओसरल्यावर नातं टिकणार नाही हे स्पष्ट होतं. त्याचा जास्त त्रास परीलाच होणार होता. म्हणूनच ठरवून मी नलूच्या घरच्यांना परीविषयी चुकीची माहिती दिली. त्याच्या बेफाम वागण्याच्या, व्यसनाच्या खोट्या गोष्टी सांगितल्या. परिणाम नलूची रवानगी गावाला मामाकडे झाली आणि काही दिवसातच लग्नही ठरलं. घरच्या दबावापुढे नलूनं माघार घेतली. परीला जबरदस्त धक्का बसला. प्रयत्न करूनही नलूची भेट झाली नाही. पार उद्ध्वस्त झाला. हताश, निराश परी एकदम नाहीसा झाला. काही दिवसांनी कायमस्वरूपी परदेशी गेल्याच समजल्यावर शोध थांबवला आणि घरातून पळून जाऊन नलूनं ठरलेलं लग्न मोडलं. त्यानंतर काही दिवसांनी भेटलेली नलू एकदम निराळी होती. निस्तेज, कोरा चेहरा, अबोल. तिनं मला जाब विचारला आणि माझी बाजू ऐकल्यावर छद्मीपणे हसली “नऱ्या, माठ आहेस. मित्राचं मन ओळखू शकला नाहीस. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. लग्न करणार होतॊ. तुझी समज कमी पडली. नको ते उद्योग करण्यापूर्वी एकदा बोलायला हवं होतं. असो.. जे झालं ते बदलू शकत नाही. फार मोठी चूक केलीस. तुझ्या कृपेनं मिळालेली शिक्षा आयुष्यभर भोगणार. आता परत कधीच भेटू नकोस. ”नलू निघून गेली. परीसाठी जे केलं ते चूक की बरोबर हे आजतागायत कळलेलं नाही परंतु मी दोघांना गमावलं. खूप अपराधी वाटतंय. (संडे डिश™©) 

— 

“परी, आता इथेच रहा. हॉटेलमध्ये नको” मी 

“नॉट पॉसिबल, परवा परत चाललोय. तुम्हांला भेटून छान वाटलं”परी.

“दोन दिवस थांब.. प्लीज”

“नको. आता इथं माझं काही नाही”आग्रह करून मी परीला हॉटेलवर सोडायला गेलो. जाताना जुना विषय काढला पण परी काहीच बोलला नाही.

“परी, सॉरी यार!! फार मोठी चूक केली जमलं तर माफ कर. माझ्यामुळे… ”मी हात जोडले. परी कसंनुसं हसला. त्या हसण्यात वेदना होती. हॉटेलमध्ये पोचल्यावर परी म्हणाला “फेरगेट इट, लाईफनं चान्स दिला तर परत भेटू नाहीतर.. ओके बाय”

“परी, लास्ट टाइम माझ्यासोबत कॉफी” मी विचारल्यावर परी हसला. कॉफीची ऑर्डर दिली आणि मोबाइल वाजला.

“डायरेक्ट आत ये. उजव्या बाजूचे तिसरे टेबल”

“कोण? ”परीनं विचारलं 

“परी, मीट माय सिस्टर.. ”परीनं मान उंचावून वर पाहिलं. सुन्न झाला. समोर नलूला पाहून परीचा पुतळा झाला. दोघांचे डोळे भरले. मी हलकेच तिथून सटकलो. पुन्हा कबाब में हड्डी व्हायचं नव्हतं. आई, मी आणि बायकोनी मिळून दोघांच्या भेटीसाठी प्लान केलेला. माझा फोन घेणार नाही म्हणून बायकोनं नलूला कॉल केला आणि आईला बोलायला लावलं. आईनं नलूला समजावलं. परीविषयी समजल्यावर नलू स्वतःला रोखू शकली नाही.

— 

खूप वर्षानी भेटलेले दोघं हेलावून गेले. खूप बोलायचं होतं, सांगायचं होतं परंतु भावनांना शब्द सापडत नव्हते. डोळे मात्र घळाघळा वाहत होते. काहीक्षण असेच गेले.

“आता पार म्हातारी दिसतेस”

“तू मात्र अजूनही चिकणा चॉकलेट”नलूच्या बोलण्यावर परी खळखळून हसला.

“हो. तुला शेवटचं भेटलो तिथंच माझं वय थांबलयं. ”

“अजूनही प्रेम करतोस”

“पूर्वीइतकंच आणि आयुष्यभर करेन. म्हणून तर एकटा राहिलो. तुझं काय? ”

“सेम टू सेम. तुझ्याशिवाय इतर कोणाचा विचारच नाही. लग्नाआधी घरातून पळाले तेव्हापासून पळतेच आहे. ”

“नलू…. आता कुठंही जाऊ नकोस. ”

“आता तुला सोडत नाही. अगदी तू म्हटलास तरी…. आपण लग्न करू. ”

“ताबडतोब.. ”परीनं मला फोन केला. “बोल मित्रा”

“आम्हांला लग्न करायचंयं तेव्हा तयारीला लागा. ”मी हॉटेलमध्ये गेलो तेव्हा दोघं शेजारी बसलेले आणि चेहऱ्यावर 70mm स्माईल होतं.

“नऱ्या, बिघडवलं तूच आणि पुन्हा जुळवलं सुद्धा तूच. आता आमचं लग्न लावून जबाबदारीतून मुक्त हो. ”हसत हसत नलू म्हणाली तेव्हा माझा बांध फुटला. पुन्हा दोघांची माफी मागितली तेव्हा खांद्यावर थोपटत परी म्हणाला “यू आर ट्रू फ्रेंड, ऑलवेज केअर फॉर मी. थॅंकयू मि. नरेश” 

समाप्त  

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “परी…” –  भाग – १☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “परी…” –  भाग – १ ☆ श्री मंगेश मधुकर

सुट्टीचा दिवस आणि काहीही पर्याय नसल्यानं सौंसोबत खरेदीसाठी मॉलमध्ये यावं लागलं. विंडो शॉपिंग सुरु असताना प्रत्येक वस्तू सौ हातात घेऊन पाहत होती आणि त्यातही वैताग म्हणजे हे कसंय, ते कसंय असं विचारत होती. दीड तास फिरत होतॊ तरी तिचा उत्साह कमी झाला नव्हता. मला मात्र प्रचंड कंटाळा आलेला, फिरून फिरून पाय दुखायला लागले तिला सांगून एका ठिकाणी थांबलो. मोबाइल पाहत असताना पाठीमागून आवाज आला. “हॅलो मि. नरेश” मान फिरवून पाहिलं तर पन्नाशीचा उंचापुरा, सडपातळ, गोरगोमटा, मोठाले घारे डोळे, धारदार नाक, काडीचा चश्मा, निळी जीन्स आणि पांढरा टी शर्ट घातलेला प्रसन्न चेहऱ्याचा एकजण हसत समोर उभा.

“येस. ”मी विचारलं खरं पण मनातल्या मनात ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते. (संडे डिश)

“हॅलो, मि नरेश. ओळखलं का? ”त्यानं पुन्हा विचारलं.

“सॉरी!! लक्षात येत नाहीये पण चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय”

“पंचवीस वर्षांनी हा चेहरा पाहताय. इतक्या काळात सगळं काही बदलतं. यू आर ऑल्सो चेंज्ड अ लॉट. ” 

“हे मात्र खरंय”डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्यावर तो मनापासून हसला.

“मि. नरेश, तुम्हांला मघाशीच पाहिलं आणि खात्री झाल्यावर भेटायला आलो. ”सारखं सारखं मि. नरेश ऐकून एकदम डोक्यात ट्यूब पेटली.

“आयला, तू परी, सॉरी म्हणजे तुम्ही….. ”माझ्या ओरडण्यानं मॉलमधल्या काही नजरा आमच्या दिशेनं वळल्या.

“येस, फायनली ओळखलं” अत्यानंदानं कडकडून मिठी मारल्यावर परी अवघडला. त्याच्यासाठी हे अनपेक्षित होतं.

“परी…. आय मीन परिमल, ग्रेट सरप्राइज”

“ कॉल मी परी.. पूर्वीसारखं. फिल गुड् टु हियर.. ”मोहक हसत परीमल म्हणाला. कमालीचा देखणा असलेल्या परीला वाढलेलं वय देखील शोभत होतं. अगदी सिनेमातला हीरोच. त्याच्याशेजारी मी म्हणजे हापूस आंब्यासोबत सुरण. कँटिनमध्ये झालेली आमची पहिली भेट आठवली. (संडे डिश) 

“हॅलो सर, मी परिमल. फस्ट इयरला आहे. एक मदत पाहिजे होती. ”

“बोला” मी 

“आता माझा चहा नाश्ता झाला. “

“मग मी काय करू”

“माझं पाकीट हरवलंय किवा कदाचित घरीच राहीलंय. बिल देण्यासाठी पैसे नाहीत. आय नीड हेल्प.. प्लीज.. उद्या तुमचे पैसे परत करीन. हा माझा पत्ता. ”

“ओके डोन्ट वरी.. मी बिल देतो. ”किमान दहा वेळा परिमल ‘थॅंकयू’ म्हणाला. त्यादिवसानंतर आमची मैत्री झाली. तसं पहायला गेलं तर सगळ्याच बाबतीत. आमच्यात खूप फरक होता. तो श्रीमंत, मी मध्यमवर्गीय. कारमधून कॉलेजला यायचा तर मी बसनं. दिसायला अतिशय देखणा जणूकाही राजपुत्रच. कॉलेजमध्ये मुलींच्या दिलाची धडकन तर मुलं खार खाऊन आणि गंमत म्हणजे यासगळ्यापासून परी मात्र एकदम अलिप्त. फारसं कोणाशीच बोलायचा नाही. अगदीच कोणी बोलायला गेलं तर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा. इतकं असूनही माझ्याशी बोलायचा. आमची घट्ट मैत्री झाली. घरी येणं जाणं सुरू झालं म्हणजे बऱ्याचदा तो माझ्या घरी यायचा. आईशी गप्पा मारायचा. तिच्या हातचं त्याला खूप खूप आवडायचं. मनसोक्त जेवायचा. कुठंतरी तो आपल्या आईला शोधत होता कारण एकुलता एक असूनही सगळं बालपण हॉस्टेलला गेलं. त्यात आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यावर तर परी जास्तच एकटा पडला. पैसा कितीही असला तरी एक सेकंदाचा मायेचा स्पर्श देऊ शकत नाही. हे परखड सत्य परीला फार लवकर समजलं होत. त्याच्या भल्यामोठ्या घरापेक्षा आमच्या चाळीतल्या दोन रूममध्ये जास्त रमायचा. तिथंच त्याला नलू भेटली आणि……

जुन्या आठवणीत हरवून मी परिमलकडे भान हरपून एकटक पाहत होतो. (संडे डिश) 

“व्हॉट हँपन, असं का पाहताय”परीच्या आवाजानं भानावर आलो. एक सांगायचं म्हणजे परी नेहमीच मला ‘मि. नरेश’ अशी हाक मारतो अन आदरयुक्त बोलतो कारण माहिती नाही पण त्यानं एकदाही एकेरी हाक मारली नाही.

“मित्रा, खूप वर्षांनी भेटलास फार भारी वाटतंय. ”

“सेम हीयर”पूर्वीसारखच त्रोटक बोलायची परीची सवय अजूनही तशीच होती.

“कसे आहात. ”परीनं विचारलं.

“संसार, नोकरी आणि जबाबदाऱ्या. रुटीन लाईफ.. तुझं काय? ” 

“जर्मनीला असतो. बिझनेस”

“बायको-मुलं”

“एकटा जीव सदाशिव…. ”

बोलताना परी भकास हसला.

“का रे”

“यू नो एव्हरीथिंग. जी आवडली ती नशिबात नव्हती आणि नंतर कोणी आवडली नाही. म्हणून मग एकटेपणालाच लाईफ पार्टनर केलं. नाहीतरी लहानपणापासून तोच सोबत होता. ”आपली वेदना परीनं सहजपणे व्यक्त केली पण माझ्या अंगावर शहारा आला. त्याचं पहिलं आणि एकमेव प्रेम अयशस्वी होण्यात माझाही सहभाग होताच. पूर्वीच्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या. कसतरीच वाटलं मी त्याच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही. दोघंही एकदम गप्प झालो काहीक्षण विलक्षण अवघडल्यासारखे गेले. तितक्यात सौ आल्या. परिमलला बघून तिला प्रचंड आश्चर्य वाटलं.

“परी, माय लाईफ पार्टनर”मी ओळख करून दिली तेव्हा सौ प्रचंड कौतुकानं परिकडे पाहत होत्या. कोणालाही सहज भुरळ पाडेल असंच त्याचं व्यक्तीमत्व होतं. (संडे डिश)

“वहिनी, नमस्कार, मी.. ”

“परिमल भाऊजी.. ह्यांनी तुमच्याविषयी सांगितलं होतं”

“आय होप, चांगलंच बोलले असतील” तिघंही मोठ्यानं हसलो.

“परी, घरी चल. ”

“आज नको. नंतर येतो. ”

“भाऊजी चला ना. आईंना खूप आनंद होईल. ”आईचा उल्लेख झाल्यावर परी भावूक झाला.

“आता आम्ही नवीन घरात राहतो. चाळीतलं घर केव्हाच सोडलं. ”मी 

“पण तिथली माणसं आणि आठवणी सोबत असतीलच ना त्या कधीच साथ सोडणार नाहीत. ”परी कोणाविषयी बोलतोय हे लक्षात आलं. इतक्या वर्षांनंतर सुद्धा तो नलूला विसरला नव्हता.

आयुष्यात कितीही पैसे कमावले तरी पहिली कमाई कधीच विसरली जात नाही. पहिल्या प्रेमाचं सुद्धा असंच काहीसं असतं.

परी नलूला अजिबात विसरला नव्हता हे लक्षात आलं. थेट विचारलं नसलं तरी तिच्याविषयी जाणून घ्यायची तीव्र ईच्छा त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती.

“थॅंकयू मि. नरेश”

आईला भेटण्याची अतीव इच्छा आणि माझ्या बायकोचा अतिआग्रह यामुळे परी घरी आला. घरात पाऊल टाकण्यापूर्वी शूज काढले. चाळीतली सवय. सगळ्यात आधी आईला भेटला. ध्यानीमनी नसताना परीची भेट झाल्यामुळे आईला प्रचंड आनंद झाला. खूप दिवसांनी मायेचा निखळ स्पर्श अनुभवल्यावर भावुक झालेल्या परीनं आलेला हुंदका कसाबसा आवरला. पैसा, प्रतिष्ठा असूनही नियती रूसलेली म्हणूनच वाट्याला आनंदापेक्षा दु:खच जास्त. सगळं काही असूनही रिकामाचं. त्यात नलूबरोबर फुलणारं नातं ही अचानक तुटलं.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बदल – – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ बदल – – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर बसून डॉक्टर प्रभाकर हलकासा झोका काढत होते. झोक्याबरोबर झोपाळ्याच्या कड्यांमधले चकचकीत राघू मैना मोर झुलत होते. त्यांच्या हातातलं वर्तमानपत्र उघडं असलं तरी नजर समोर लागली होती. मनात विचार झोका घेत होते. पूर्वी या झोपाळ्यावर बसलं की चौपाटीपर्यंतचा रस्ता दिसत असे. आता या सगळ्या उंच आणि वेड्यावाकड्या उगवलेल्या इमारतींनी पश्चिमेचा वारा आणि संध्याकाळचा आकाशातला नजारा सारंच गिळून टाकलं आहे. बऱ्याच वेळा पूर्वेकडचे सूर्यकिरण या उंच इमारतींच्या काचांवरून परावर्तित होतात आणि इथे व्हरांड्यात डोळे दिपवणारा प्रकाश पडतो. ऑपेरा हाऊसचा हा आपला भाड्याचा ब्लॉक जुना असला तरी भक्कम आहे. इथेही टॉवर करण्याच्या गोष्टी कानावर येत आहेत. किती भराभर बदलत चाललंय सारं!

तेवढ्यात नाश्ता, कॉफीचे मग आणि दोघांची रोजची औषधं घेऊन धनश्री आली आणि डॉक्टरांचे विचार थांबले. मोतिया रंगाची, जरीच्या जांभळ्या काठांची साडी, मोत्याचे मोजके दागिने आणि मोगऱ्याचा गजरा माळलेली धनश्री पासष्टी उलटून गेली तरी अगदी प्रसन्न टवटवीत दिसत होती.

“अरे वा! छान दिसताय अगदी! आज काय बुवा सगळं माहेर भेटणार तुम्हाला. मजा आहे. ” खुशीत आले की डॉक्टर धनश्रीला- पत्नीला- कौतुकानं ‘अहो-जाहो’ म्हणत. छान हसून प्रतिसाद देत धनश्री म्हणाली “बरं, बरं! आटपा आता लवकर. ”

“आवरतो तर! उगाच माझ्यामुळे माहेरच्या गोतावळ्यात जायला उशीर नको. ”

आज 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन एकत्र आलं होतं. रमाच्या म्हणजे धनश्रीच्या मोठ्या भावाच्या नातीच्या साखरपुड्याला जायचं होतं. त्यांची बेंगळुरूला राहणारी मुलगी केतकी आणि दिल्लीला असलेला मुलगा सुरेंद्र या समारंभाला येऊ शकणार नव्हते.

कॅबमध्ये बसता बसता डॉक्टरांच्या मनात आलं, ‘ठाण्याला जायचं म्हणजे लांब वाटतं आताशा. या कॅबसेवेमुळे बरीच सोय झालीये आपल्यासारख्यांची. ’

गाडीतल्या गार हवेने थोड्याच वेळात डॉक्टरांना डुलकी आली. बाहेरचा रंगीबेरंगी, उत्साहाने नटलेला सणाचा माहोल बघताना धनश्रीला वाटलं, ‘दरवेळी इथून जाताना बघावं तर नव्या इमारती, मॉल्स उभे राहिलेले दिसतात. मेट्रोचं बांधकामही जोरात सुरू आहे. त्यातच अरुंद रस्त्यांवरून, गर्दीतून मार्ग काढत दोन चाकी गाड्यांवरची अख्खी कुटुंबं नटून- सजून पळत आहेत. धन्य आहेत हे मुंबईकर!

पावसाळ्यामुळे पलीकडच्या निळसर डोंगररांगांवरची झाडं आणि रस्ते स्वच्छ दिसत होते. डोंगराला वळसा घालून जाणाऱ्या खाडीचं पाणी चकाकत होतं हिरवं आणि प्रसन्न वातावरण होतं.

हॉलमध्ये नवरा- नवरी, फोटोग्राफर आणि गुरुजी यांचंच स्टेजवर राज्य होतं. बाकी सारे सेल्फी आणि ग्रुप फोटो काढण्यात रमले होते.. लहान मुलांनी स्टेजपासून सगळा हॉल खेळण्यासाठी काबीज केला होता. सगळ्या भाच्या आणि भाचेसुना उगाचच लगबग करत मिरवत होत्या. कुणीतरी नाश्तापाण्याची चौकशी करून गेलं. दोघी- तिघी भाच्या आवडत्या धनश्रीआत्याला कौतुकानं सांगायला आल्या, “आत्या, आम्ही सगळ्या सासूगर्ल्सनी रमाच्या लग्नासाठी पटोला घ्यायचं ठरवलंय”.

लगेच दुसरी म्हणाली, “पण लग्नानंतर जेवायच्या वेळी मात्र सगळ्याजणी गाऊन्स घालणार आहोत बरं का. ”

अरे वा सासूगर्ल्स! आत्तासुद्धा छान दिसताय सगळ्याजणी. ”

चाळीशी होऊन गेलेल्या या भाच्या आणि सुना आता सासू होणार होत्या. थोडा चिवचिवाट करून त्या चिमण्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. शेजारी बसलेली ताई लगेच धनश्रीला म्हणाली, “त्या गाऊन्स घालायचं म्हणताहेत आणि तू त्यांचं कौतुक कसलं करतेस?”

“ अंगभर कपडे घालणार आहेत ना, ठीक आहे. गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स आणि टी-शर्ट घालणार असं म्हणाल्या असत्या, तर काय करणार होतो आपण? आणि अगं आजकाल फॅशन आहे जमिनीवर लोळणारे गाऊन्स घालायची. फक्त त्यांच्या ब्लाऊजची मागची छोटी पट्टी बघून डोळे मात्र मोठे नाही करायचे! आत्ता येताना बाहेर पाहत होते तर रस्त्यावर चालणाऱ्या, टू व्हीलरवरच्या, बसमधल्या लहान- मोठ्या नव्वद टक्के बायकांचे ब्लाऊज म्हणजे, ‘

कुणीही पाव मीटरपेक्षा जास्त कापड ब्लाऊजसाठी वापरू नये’ अशी कुणाची तरी सक्त ऑर्डर असल्यासारखं वाटावं असे होते. त्यापेक्षा आपल्या चिमण्यांच्या पाठीवर बरीच पिसं आहेत. ”

धनश्रीचा बोलणं ऐकणाऱ्या आजूबाजूच्या सगळ्याजणी हास्यरंगात बुडून गेल्या. “आपण फार कशाचा बाऊ करायचा नाही. ” धनश्रीनं तिचं म्हणणं पूर्ण केलं.

“खरं आहे ग बाई तुझं! छान जमवून घेतेस सगळ्यांबरोबर. म्हणून तर आवडती आहेस सगळ्यांची. ” ताई कौतुकानं धनश्रीला म्हणाली.

समारंभानंतर निघताना धनश्रीनं पुढच्या महिन्यात ठरवलेल्या डॉक्टरांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या समारंभाची सर्वांना आठवण करून दिली आणि येण्याचा आग्रह केला. परतताना गाडीमध्ये धनश्रीचे डोळे मिटत होते आणि ट्रॅफिक वाढल्यामुळे वारंवार थांबणाऱ्या गाडीत बसून डॉक्टर कंटाळले होते. मुंबईच्या गर्दीत दररोज मोठी भर पडत होती. डोंगरांवरसुद्धा वस्त्या झाल्यामुळे रस्त्याकडेला पावसाळ्यात वाहणाऱ्या झऱ्यांचे नाले झाले होते. कचऱ्याचे ढीग डोंगरांशी स्पर्धा करत होते. असाहाय्यपणे बाहेरचा बदल बघताना, डॉक्टरांच्या अधूनमधून मिटणाऱ्या डोळ्यांपुढे भूतकाळ तरळू लागला.

‘बारावीनंतर मेडिसिनला जाणार नाही’ असं अगदी ठामपणे सुरेंद्रनं सांगितलं होतं, तेव्हा त्याला समजावताना आपण म्हटलं, ‘अरे, बापूंनी किती कष्टाने…. ’

‘बाबा प्लीज, बापू आजोबा कोकणातून आले अर्धपोटी राहून, खूप अभ्यास करून यशस्वी डॉक्टर झाले, तुम्हीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकलंत, हे सर्व मला माहितीये. तुम्हा दोघांबद्दल, मेडिसिन प्रोफेशनबद्दल मला आदर आहे पण मला मेडिसिनला जायचं नाहीये. केतकीनं तिच्या ऑफिसमधल्या इंजिनीयर रामनाथनची जोडीदार म्हणून निवड केली, ती आपण सर्वांनी स्वीकारली. मलाही माझ्या आवडीच्या कम्प्युटर क्षेत्रात जायचय. तेव्हा प्लीज यावरून परत चर्चा नको. ’ अगदी शांत स्वरात सुरेंद्रने विषय संपवला होता.

घरातला डॉक्टरकीचा वारसा पुढे चालवला जाणार नाही, हे सत्य पचवायला आपल्याला खूप कठीण गेलं. पण झाली त्याची सवय हळूहळू. आता केतकी बेंगळुरूला नवऱ्याच्या इंजिनिअरिंग फॉर्ममध्ये साथ देते आहे आणि सुरेंद्र दिल्लीला यशस्वी उद्योजक आहे. परंपरेला बाजूला सारून मुलांनी त्यांच्या आवडीप्रमाणे आयुष्याचा मार्ग बदलला म्हणून काऽऽही बिघडलं नाही. या हल्लीच्या पिढीच्या सुस्पष्ट विचारतला मोकळेपणा कौतुक करण्यासारखा आणि थोडासा हेवा वाटण्यासारखासुद्धा आहे. स्पष्टपणे कबूल करायचं तर आता आपल्या प्रोफेशनमध्ये सुद्धा खूप बदल झाला आहे. सेवाव्रताचा बिझनेस झाला आहे. शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा ओतल्यानंतर….. आणि अलीकडे पेशंटची वृत्तीसुद्धा बदलली आहे. त्यांना उठसूट महागडे स्पेशालिस्ट लागतात. ’

धनश्रीला सगळ्या गोष्टींमध्ये सुवर्णमध्य साधायची बॅलन्सिग ट्रीक छान जमली आहे. मुलांनी वेगळ्या वाटा निवडल्या. व्यवसायानिमित्त ती दूर राहतात, ही बदलत्या काळाची गरज समजून सगळं समंजसपणे तिनं जमवून घेतलंय. मुलं आता आपल्याला प्रॅक्टिस बंद करण्याचा आग्रह करतात. धनश्रीनही तसं दोन- चारदा सुचवलं, पण आग्रह धरला नाही. तिचं भागवत मंडळ, हास्य क्लब, मैत्रिणी, टीव्ही सगळ्यात तिनं स्वतःला छान गुंतवून घेतलं आहे.

मुलांनी ठरवलेल्या डॉक्टरांच्या पंचाहत्तरीच्या समारंभाला अजून दोन दिवस होते. पण धनश्रीची मागच्या आठवड्यापासून गडबड सुरू होती. मुलं, नातवंडं येणार म्हणून तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ तयार केले जात होते. शिवाय आज संध्याकाळी तीनं तिच्या गुरुजींच्या प्रवचनाचा कार्यक्रम घरी करायचं ठरवलं होतं.

नमस्कार करते काका ॑. मधुरा म्हणजे केतकीच्या मैत्रिणीनं वाकून नमस्कार केला, तेव्हा विचारांच्या तंद्रीतून डॉक्टर बाहेर आले. बऱ्याच दिवसांनी भेटणाऱ्या मैत्रिणींच्या मनसोक्त गप्पा व्हाव्यात म्हणून धनश्रीनं मधुराला दोन दिवस राहायला बोलावलं होतं. मधुराचा योगविद्येचा विशेष अभ्यास होता. कितीतरी वर्ष ती योगविद्येचे विनामूल्य वर्ग घेतेय.

ये बैस इथे तुझ्या आवडत्या झोपाळ्यावर ॔॑. डॉक्टरांनी सरकून मधुराला झोपाळ्यावर जागा करून दिली. मधुरा आणि केतकी लहानपणापासूनच्या मैत्रिणी. त्यांचा खेळ, अभ्यास, गाणी, गोष्टी सारं या झोपाळ्यावर बसूनच चालत असे. मधुराला बघून धनश्री चहा- फराळाचं घेऊन आली. मधुरानं धनश्रीला आधी गळामिठी घालून मग वाकून नमस्कार केला आणि उत्साहाने सांगू लागली,

काका- काकू मी पुढच्या महिन्यात हेलसिंकीला म्हणजे फिनलँडला जातेय दोन महिन्यांसाठी. मागच्या वर्षी मी पुण्यातल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये योगाभ्यासाचा स्पेशल कोर्स केला होता. आता त्या इन्स्टिट्यूटतर्फे मला हेलसिंकीला पाठवत आहेत. मुलंही आता मोठी झाली आहेत. एक नवा अनुभव घ्यायला घरातल्या सगळ्यांनीच प्रोत्साहन दिलं मला. माझी असाइनमेंट संपली, की मनोहर मुलांना घेऊन तिकडे येणार आहे. मग आम्ही आठ-दहा दिवस नॉर्वे, स्वीडनला फिरून यायचं ठरवलं आहे.॔

छान! जाऊन या सगळे. इतकी वर्षं तू योगाभ्यासाचे विनामूल्य वर्ग घेते आहेस, त्याचं हे बक्षीस आहे बरं का! धनश्री कौतुकानं म्हणाली.

काकू, पूर्वी मी गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे योगवर्गात शिकविण्याचे पैसे घेत नसे, पण अलीकडे मी फी घेते बरं का. तरुण पिढीला योगशास्त्र शिकण्यात इंटरेस्ट आहे, पण त्यांना योगवर्गाची जागा चांगली पॉश लागते. अशा जागेचं भाडंही बरंच असतं. शिवाय अनुभवानं माझ्या लक्षात आलंय, की अलीकडच्या काळात आपण फुकट कुणाला काही दिलं, की त्याचं महत्त्व, खरी किंमत कुणाला कळत नाही. उलट जास्त फी घेऊन एसी आणि आधुनिक सोयी देणाऱ्यांकडे जास्त गर्दी होते. या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर आपल्यालाही बदलणं भागच आहे.

अगदी खरं आहे तुझं. काळाचा महिमा! दुसरं काय .॔

 मधुराचा नाश्ता झाला की दोघेही हॉलमध्ये या बरं का गुरुजी येतीलच इतक्यात.॔डॉक्टर आणि मधुरा हॉलमध्ये येऊन बसले तेव्हा प्रवचनाला सुरुवात झाली होती. प्रवचनकार एका कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर होते. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक होता. ते सांगत होते,

विज्ञान क्रांतीमुळे जग फार झपाट्यानं बदलतंय. कपडे, , राहणीमान, विचार, नाती सगळं मागच्या दशकात बदलत गेलं. या नव्या जगाशी जुळवून घेतलं तरच आपला निभाव लागेल. काळाप्रमाणे आपण बदललो नाही, तर इतरांना आपलीच अडगळ वाटायला लागेल. त्यापेक्षा नव्याचं स्वागत करणं केव्हाही श्रेयस्कर. बदल हा फक्त चांगला किंवा फक्त वाईट नसतो. मुख्य म्हणजे बदल अपरिहार्य असतो. बदल नको असं म्हणायची मुभा नियतीनं आपल्याला ठेवली नाहीये. म्हणून तर आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी साठीनंतर वानप्रस्थाश्रमाचा मार्ग सांगितला. हल्लीच्या काळात निदान मनानं तरी आपण या साऱ्या व्यापातून निवृत्त व्हायला हवं.

डॉक्टरांनी नकळत धनश्रीकडे पाहिलं, तर धनश्रीही अर्थपूर्ण नजरेनं त्यांच्याकडेच बघत होती. डॉक्टरांनी हसून संमतीदर्शक मान डोलावली.

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जो दुसऱ्यावरी विसंबला… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ जो दुसऱ्यावरी विसंबला…  ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

“दिलीप, त्या तुझ्या परवाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाची तयारी कुठपर्यंत आली आहे? ” रवीकाका आपल्या मुलाला विचारत होते.

आता इथे आधी हे सांगायला पाहिजे की स्वतः रवीकाका गेली अनेक वर्षं इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात होते, गेले वर्षभर त्यांचा मुलगा दिलीपसुद्धा या क्षेत्रात जम बसवू इच्छित होता आणि आज काका ज्या साखरपुड्याची चौकशी करत होते, ती दिलीपने घेतलेल्या एका कार्यक्रमाची होती, स्वतः दिलीपच्या साखरपुड्याची नव्हती.

“हां, बाबा, मी ते फ्लॉवर डेकोरेशनचं चंदूला सांगितलं आहे, रिया केटरर्स बघती आहे, रमेश खुर्च्या सोफे आणणार आहे, आणि… ” दिलीप सांगू लागला. त्याला मधेच थांबवत काका म्हणाले, “अरे, पण तू काय करणार आहेस? “

“हे काय, मी फोन करून फॉलोअप घेतोय ना, ” दिलीप.

“इकडे ये बेटा, दोन मिनिटं बस माझ्या शेजारी, ” काका त्याला म्हणाले, “मी तुला एक गोष्ट सांगतो. “

थोड्याशा नाखुशीनेच दिलीप काकांजवळ बसला.

“वीस पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बोईसर MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन)- उद्योगनगरीमध्ये एक छोटा लेबर कॉन्ट्रॅक्टर राहत होता.

वेगाने वाढणाऱ्या या कारखान्यांना खात्रीशीर कामगारांची गरज असायची. कुशल कामगारांना चांगल्या पगारावर कायम स्वरुपी नोकऱ्या मिळायच्या. अडचण आणि चणचण असायची ती अकुशल कामगारांची.

झाडू मारणे, कच्चा माल अथवा तयार प्रॉडक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवणे, ट्रक रिकामा करणे अथवा भरणे – त्या दिवशी, त्या कारखान्यात जे काम सांगितले जाईल ते काम करायला लागणारा कामगारवर्ग – यांना कायमस्वरूपी कामावर घेतलं, तर उगाच भारंभार पगार द्यावा लागायचा, आणि हवे तेव्हा हे कामगार मिळाले नाहीत, तर कामाचा खोळंबा व्हायचा, कंपनीचं नुकसान व्हायचं.

मग मालकांना यावर पर्याय मिळाला तो लेबर कॉन्ट्रॅक्टरचा. येत्या आठवड्यात आपल्या कारखान्यात किती टेम्पररी कामगार हवे आहेत हे त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं जायचं, त्या कामगारांना – जसं ठरलं असेल तसं दर पंधरा दिवसांनी वा दर महिन्याला – वेतन दिलं जायचं, प्रत्येक मजूरामागे कॉन्ट्रॅक्टरला त्याचं कमिशन दिलं जायचं.

माणसांना रोजगार मिळायचा, कंपनीला खात्रीशीर माणसं मिळायची आणि कॉन्ट्रॅक्टरला कमिशन. सगळे खुश!

यात अट एकच असायची, की काय वाट्टेल ते झालं, तरी ठरलेल्या संख्येइतके मजूर कॉन्ट्रॅक्टरने पुरवणं बंधनकारक असायचं. जर तो तितके मजूर पुरवू शकला नाही, तर त्याला दंड व्हायचा किंवा midc मध्ये नाव बदनाम व्हायचं आणि मग त्याला कॉन्ट्रॅक्टस मिळणं कमी होत जायचं.

तर या कॉन्ट्रॅक्टरला एका कंपनीत सहा मजूर देण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, स्थानिक सहा माणसं घेऊन त्याचं कामही छान चाललं होतं.

आता हा कॉन्ट्रॅक्टर आपलं कार्यक्षेत्र विस्तारायच्या विचारात होता, आणि त्याच्या सुदैवाने तशी संधी चालूनही आली. त्याच कंपनीला expansion करायचं होतं, त्यांना पंधरा दिवसांनी पुढच्या वर्षभरासाठी आणखी तीस अकुशल कामगार लागणार होते.

कंपनीने याला विचारलं. हा कॉन्ट्रॅक्टर हरखला, वाढणाऱ्या कमिशनचे आकडे त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागले, त्याने तत्क्षणीच होकार देऊन टाकला.

होकार दिला तर खरा, पण आजूबाजूला चौकशी केल्यावर कंपनी देत असलेल्या पगारात इतके मजूर काही मिळेनात. दोन दिवस गेले तरी काही सोय होईना.

हा कॉन्ट्रॅक्टर हवालदिल झाला. इतक्यात त्याची भेट “साहू”शी झाली. साहू दोन चार वर्षांपूर्वी ओरिसा राज्यातून बोईसरला आला होता आणि आता इकडचाच झाला होता. त्याला पहिली नोकरी याच कॉन्ट्रॅक्टरने लावून दिली होती.

“काय जाला, शाब? ” ओरिया मिश्रित मराठीत साहू विचारता झाला. याने त्याचा प्रॉब्लेम सांगितला.

“अरे, बस! इतनीसी बात है, शाब? फिर ये साहू किस दिन काम आयेगा? आपने मुझे पहिला जॉब दिया था. आपका एहसान है मेरेपे. ” तो म्हणाला की त्याच्या ओरिसात पुष्कळ ओळखी आहेत आणि जायचा यायचा खर्च दिला आणि वर थोडे पैसे दिले, तर आठ – दहा दिवसांत तो तीस माणसं सहज आणू शकेल.

कॉन्ट्रॅक्टरचं टेन्शन कमी झालं. असंही त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता आणि साहूला तो गेली काही वर्षं ओळखत होता. त्याने साहूला पैसे दिले आणि दहा दिवसांत – म्हटल्याप्रमाणे, साहू तीस माणसं घेऊन आला.

कॉन्ट्रॅक्टरने दोन खोल्या भाड्याने घेतल्या, त्यात ही सगळी माणसं राहू लागली.

कंपनीत ही नवी माणसे कामाला लागली, त्यांचे पगार, कॉन्ट्रॅक्टरचे कमिशन सगळं छान सुरू झालं. नंतर नंतर या कॉन्ट्रॅक्टरचा साहूवरचा विश्वास वाढत गेला. कोणत्याही नव्या कंपनीत माणसं लागली की तो साहूला फोन लावायचा, साहू ओरिसाहून माणसं आणायचा, कमिशनचा आकडा वाढत जायचा.

आता साहूने नोकरी करणं सोडून दिलं होतं, तो या कॉन्ट्रॅक्टरचा उजवा हात म्हणून काम करत होता. आणि हा कॉन्ट्रॅक्टर साहूच्या जीवावर निर्धास्त होता.

एके दिवशी ज्या कंपनीने अगदी सुरुवातीला तीस नवीन कामगार मागवले होते, त्याच्या मॅनेजरचा या कॉन्ट्रॅक्टरला फोन आला. कंपनीची मॅनेजमेंट बदलली जात होती, एक परदेशी कंपनी या कंपनीला विकत घेत होती त्यामुळे पंधरा दिवस पगार मिळायला उशीर होणार होता. हे कानावर घालण्यासाठी मॅनेजरने फोन केला होता.

कॉन्ट्रॅक्टरने लगेच साहूला फोन केला. तो म्हणाला की कामगारांना त्यांच्या रोजच्या शिध्यासाठी, वरखर्चासाठी काही पैशांची सोय करणे गरजेचं होतं. आणखीनही एक दोन कंपन्यांतील कामगारांसाठी अशी तात्पुरती सोय करायला लागणार होती.

पगार झाला, की कामगारांकडून हे पैसे वळते करून घेता येणार होते.

त्याने एका खाजगी सावकाराचा नंबर कॉन्ट्रॅक्टरला दिला. कॉन्ट्रॅक्टरने लगेच त्या नंबरवर फोन करून पैशांची मागणी केली, महिन्याभरात व्याजासकट पैसे परत करण्याचा वायदा केला. व्याजाची रक्कम पठाणी होती, पण बँकांकडून कर्ज मिळवण्यात वेळ जाणार होता, आयकराची आणि कायदेशीर बाबींची झंझट लागली असती त्यापेक्षा हे सोपे होते.

कॉन्ट्रॅक्टरने पैसे घेऊन साहूला दिले आणि सगळं काही आलबेल झाल्याबद्दल निःश्वास सोडला.

दोन आठवड्यांनंतर मॅनेजरचा कॉन्ट्रॅक्टरला फोन आला, आदल्या दिवशी कामगारांचा पगार झाला होता, पण आज त्यांच्यापैकी कोणीच कामाला आलेले नव्हते. मॅनेजरचा हा फोन चालू असताना दोन तीन इतर फोन येत असल्याचं कॉन्ट्रॅक्टरला लक्षात आलं.

“मी बघतो काय झालंय ते, ” असं म्हणत यानं फोन ठेवला, पाहिलं तर तीन वेगवेगळ्या कंपन्यांतून फोन आलेले. तीनही ठिकाणी फोन करून विचारलं, तर तिथंही कामगार कामावर आले नव्हते.

कॉन्ट्रॅक्टरला दरदरून घाम फुटला. त्याला काहीच सुधरेना. काय झालंय? काय होतंय? काहीच समजेना.

दोन मिनिटांनी भानावर आल्यावर त्याने पहिले छूट साहूला फोन लावला. त्याला ठाऊक असेल, तो काहीतरी मार्ग काढेल – याला आशा होती, याला खात्री होती… पण, पण साहूचा फोन स्विच ऑफ होता.

हा कावराबावरा झाला, भानावर आला, मोटरसायकलला लाथ घातली अन् त्या कामगारांच्या खोलीकडे सुटला. बघतो, तर खोल्या रिकाम्या, सामान नाही, माणसं नाहीत. साहूने नंतर आणलेल्या माणसांच्या खोल्यांवर तो गेला – तिथंही तीच परिस्थिती.

आजूबाजूला चौकशी केली, साहू सगळ्या माणसांना घेऊन गावाला पसार झाला असं कळलं.

हा कपाळाला हात लावून बसला. दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून घेणेकऱ्यांनी तगादा लावायला सुरुवात केली. साहूने अनेक कारखान्यातील कामगारांसाठी या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने पैसे उचलले होते, त्याच्या नावाने मोठ्ठे कर्ज करून ठेवलं होतं आणि आता ते पैसे घेऊन त्यानं पोबारा केला होता.

याची दुनिया उलथीपालथी झाली. पठाणांचा ससेमिरा पाठी लागला. त्यांची देणी देता देता त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या तोंडाला फेस आला. घरातले दागदागिने आणि अगदी मोटारसायकलही विकली आणि सावकारांच्या हातापाया पडून त्याने आपली सुटका करून घेतली.”

गोष्ट सांगताना रवीकाका थांबले. आणि दिलीपच्या खांद्यावर हात ठेऊन सांगू लागले, “त्या साहूवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेऊन आपला घात करून घेणारा तो कॉन्ट्रॅक्टर मी होतो. तेव्हा मी बचावलो, पण तुझे आजोबा खूप घाबरले, त्यांना माझी काळजी वाटू लागली. त्यांनी मला बोईसरहून निघून दुसरीकडे जायला सांगितलं, मी या शहरात आलो, कामं करता करता इव्हेंट मॅनेजमेंटच्या दुनियेत पाय रोवले.

कामांची वाटणी करायची, इतरांकडून कामं करवून घ्यायची हे योग्य आहे. पण आळशी व्हायचं नाही, आंधळा विश्वास ठेवायचा नाही.

साहूच्या ओंजळीने पाणी पिताना मी गाफील राहिलो. माझी तीच चूक तू करू नकोस. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला, हे तुला सांगण्यासाठी हा सगळा उद्योग, ” रवीकाका हसत हसत म्हणाले आणि आपली चूक उमगून, ती सुधारण्यासाठी दिलीपही कामाला लागला.

 श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक नंबर शिवणार” – भाग – २ – लेखक : श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

☆ “एक नंबर शिवणार” – भाग – २ – लेखक : श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर

(एक नंबर शिवणार हे सांगायला, आणि आपला फोन नंबर एका कागदावर लिहून द्यायला तो विसरला नाही. पण दुर्दैवाने राजारामने लिहून दिलेला त्याचा नंबर माझ्याकडून हरवला. त्यामुळे नंतर त्याच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही. बाबासाहेबांकडून त्याचा नंबर घेईन म्हटलं, पण तेही राहूनच गेलं.) इथून पुढे – – 

ह्या घटनेनंतर साधारण नऊ दहा वर्षांनी एकदा दुपारी ठाण्याला मी एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तिथून जेवून परत घरी येताना, हॉल स्टेशनजवळ होता, म्हणून जेवण जिरवायला चालत स्टेशनकडे निघालो. नेमकं त्याचवेळी माझ्या बुटाच्या सोलने मला दगा दिला. बुटाला सोडून सोल लोंबकळू लागला.

मात्र माझ्या नशिबाने तिथून पन्नास फुटावरच मला एक चांभराचं दुकान दिसलं. कसातरी खुरडत मी त्या दुकानापर्यंत पोचलो. तिथला चांभार खालमानेने काहीतरी शिवत होता. मी त्याच्या पुढ्यात माझा सोल सुटलेला बुट टाकला.

“सोल सुटलाय का, आत्ता शिवतो बघा. ” तो म्हणाला.

“दादा, जरा चांगला शिवा हं. मला लांब जायचंय. ” मी म्हणालो.

“साहेब, अगदी एक नंबर शिवणार बघा. काळजीच नको. ” त्याच्या तोंडचे हे शब्द ऐकून मी चमकलो. हा राजाराम तर नव्हे?

“राजाराम? ” मी सरळ हाकच मारली.

हाकेसरशी त्याने वर बघितलं. तो राजारामच होता. माझ्याकडे त्याने दोन मिनिटं बघितलं आणि म्हणाला, “साहेब, तुम्ही ते अंधेरीचे इतिहास संशोधनवाले ना? ” 

मी हो म्हणालो. पठ्ठ्याच्या लक्षात होतं तर. मला बरं वाटलं.

एकमेकांना ओळखल्यावर साहजिकच आम्ही गप्पा मारु लागलो. बोलता बोलता तो म्हणाला, आता मी कामासाठी पूर्वीसारखा फिरत नाही. हे खोपटं भाड्याने घेतलय. रोज इथे मी आणि मुलगा येतो, आणि काम करतो. माझ्या फिरण्यामुळे आणि चोख कामामुळे बरेचजण मला ओळखतात. ते फाटकी पुस्तकं, वह्या वगैरे इथे घेऊन येतात. माझा मुलगा ते शिवतो आणि मी चपला, बुट वगैरे शिवतो.

मुलगा? मी चमकलो. माझ्या आठवणीप्रमाणे राजारामला मूलबाळ नव्हतं, मग हा मुलगा कुठून आला? माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न ओळखून राजारामच पुढे म्हणाला,

“साहेब, माझा सख्खा मुलगा नाही. त्याचं काय झालं, सात आठ वर्षांपूर्वी एक दिवशी मी ठाण्याला स्टेशनवर उतरलो, तेव्हा पुलाखाली मला एक लहान पांगळा मुलगा दिसला. कुठल्या तरी भिकाऱ्याचा असावा. चेहऱ्यावरून उपाशी दिसत होता. मला त्याची दया आली म्हणून मी एक बिस्कीटचा पुडा घेऊन त्याला द्यायला गेलो, तेव्हा तो गुंगीत आहे असं लक्षात आलं. मी त्याच्या अंगाला हात लावून बघितलं, तर अंग चांगलंच गरम लागलं. सणकून ताप भरला होता. मग मी तसाच त्याला उचलला आणि स्टेशनजवळच्या एका ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासून त्याला औषध दिलं. तोपर्यंत हे सगळं ठीक होतं. त्यानंतर आता ह्या मुलाचं काय करायचं हा विचार माझ्या मनात आला. पण मी धाडस करुन आणि काय होईल ते बघू असं ठरवून त्याला थेट माझ्या घरीच घेऊन गेलो. बायकोने आणि आईने त्या मुलाला बघून बरेच प्रश्न विचारले. मी त्यांना काय घडलं ते सविस्तर सांगितलं. आधी त्यांनी दुसऱ्याच्या अनोळखी मुलाला घरात घ्यायला काचकूच केलं. पण नंतर त्याची अवस्था बघून त्या तयार झाल्या. थोड्या दिवसांनी औषधांनी आणि चांगल्या खाण्यापिण्याने तो मुलगा बरा झाला. म्हणून मी त्याला, परत होता तिथे सोडून येतो म्हणालो, पण तोपर्यंत त्या दोघींना त्याचा लळा लागला. त्यांनी नेऊ दिलं नाही. तसंही आम्हाला मूलबाळ नव्हतं आणि इतक्या दिवसात त्याची चौकशी करायला कुणीही आलं नव्हतं. हा अपंग मुलगा कुणाला तरी जड झाला असेल, म्हणून दिला असेल सोडून. दुसरं काय? राहू दे राहील तितके दिवस. माझ्या आईने त्याचं नाव किसन ठेवलं. आधी आम्हाला तो नुसता पांगळाच वाटला, पण नंतर त्याची जीभही जड आहे हे लक्षात आलं. तो तोतरा बोलतो. पण ह्या दोन गोष्टी सोडल्या तर अगदी हुशार आहे. घरी मी पुस्तकं शिवायचं काम करायचो तेव्हा माझ्या बाजूला बसून माझं काम तो लक्षपूर्वक बघायचा. तीन चार वर्षातच त्याने माझं काम आत्मसात केलं. आता तो लिहा वाचायला पण शिकतोय.

साहेब, आमचं हातावर पोट आहे. त्याला घरी ठेवला तर माझ्या बायकोला किंवा आईला त्याच्यासाठी घरी थांबायला लागतं, त्यांचा कामावर खाडा होतो. त्यात त्याच्या तोतरेपणामुळे आजूबाजूची मुलं त्याला चिडवून बेजार करतात, म्हणून मी त्याला पाठूंगळीला मारुन रोज इथे माझ्या मदतीला घेऊन येतो. ” एका दमात राजारामने सगळं कथन केलं.

“अरे पण आहे कुठे तो, मला तर दिसत नाही. ” सगळं ऐकून आणि आश्चर्यचकित होऊन मी म्हणालो.

“या, दाखवतो, ” असं म्हणून राजाराम मला त्याच्या दुकानाच्या मागच्या बाजूला घेऊन गेला.

तिथे कंपाऊंडची भिंत आणि राजारामचं दुकान याच्या मधल्या, प्लॅस्टिकचं छप्पर असलेल्या छोट्याश्या जागेत एक पांगळा मुलगा अगदी तन्मयतेने एक जुनं पुस्तक शिवत बसला होता. राजारामने उजेडासाठी तिथे एका बल्बची सोय केली होती. त्या मुलाच्या आजबाजूला काही फाटकी आणि काही शिवलेली वह्या, पुस्तकं होती. कामातली त्याची सफाई अगदी राजारामसारखीच वाटत होती. राजारामने त्याची आणि माझी ओळख करुन दिली. माझ्याकडे बघून त्याने हात जोडले व तो छान हसला. मला राजारामचं आणि त्या मुलाचं खूप कौतुक वाटलं. त्याचबरोबर मला त्या मुलाची दयाही आली, म्हणून मी राजारामला विचारले,

“राजाराम, तू ह्याला मागे का बसवतोस? पुढे तुझ्या बाजूला बसव. तिथे उजेड चांगला आहे आणि जागाही मोठी आहे. ” 

“साहेब, आधी त्याला मी पुढेच बसवायचो. पण नंतर लक्षात आलं, की लोकं एकाच ठिकाणी चपला आणि पुस्तकं शिवायला द्यायला बिचकतात. त्यातूनही काहींनी काम दिलं तर ते पैसे किसनच्या कामाकडे न बघता त्याच्या पांगळेपणाकडे बघून द्यायचे. ते मला आवडत नव्हतं. म्हणून मग मी त्याला मागे बसवायला लागलो. त्या अरुंद जागेची त्याला आता सवय झालीय. आता तो कुणाला दिसत नाही. त्यामुळे सगळेच प्रश्न सुटले. साहेब, तो त्याच्या पांगळ्या पायांवर कधीच उभा नाही राहिला तरी चालेल. पण आपल्या हिमतीवर उभा राहीला पाहिजे. कुणाच्या दयेवर नको. ” राजारामने स्पष्टीकरण दिलं.

राजारामच्या ह्या विचारांनी मी थक्क झालो. अश्या विचारांची माणसं आजच्या जगात खरंच दुर्मिळ आहेत.

राजारामचं आणि किसनचं पुन्हा एकदा कौतुक करुन, त्यांचा निरोप घेऊन मी निघणार, इतक्यात राजाराम म्हणाला,

“साहेब आणखी एक सांगू? आजवर आम्ही तिघांनी चपला, वह्या, पुस्तकं, गोधड्या, पिशव्या ह्या निर्जीव वस्तू खूप शिवल्या, त्यावर आमचं पोट भरलं. पण आता आम्ही ह्या पांगळ्या मुलाचं फाटलेलं आयुष्य शिवणार. आणि अगदी एक नंबर शिवणार बघा. हे देवाने दिलेलं काम आहे, ते करायलाच पाहिजे. “

राजारामचं ते वाक्य माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं, आणि माझ्या मनातली त्याची प्रतिमा शतपटीने उंचावली.

समाप्त

लेखक : श्री राजेंद्र परांजपे

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक नंबर शिवणार” – भाग – १ – लेखक : श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

☆ “एक नंबर शिवणार” – भाग – १ – लेखक : श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर

रविवारची सकाळ. आम्ही सगळे झोपेत होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. आधी मी दुर्लक्ष केलं. वाटलं भास असेल. पण दोन मिनिटांनी पुन्हा वाजली. तिसऱ्या वेळेस जेव्हा वाजली तेव्हा नाईलाजाने उठावं लागलं. उठून घड्याळात बघितलं तर जेमतेम साडेसात वाजत होते. म्हणजे रविवारच्या मानाने पहाटच म्हणायची.

मी आळस देतदेतच दार उघडलं. दारात साधारण चाळीस एक वर्षांचा एक काळासावळा माणूस उभा होता. अंगात पांढरा लेंगा झब्बा, आणि डोक्यावर मळकी गांधीटोपी. दाढीचे खुंट वाढलेले. त्याच्या हातात एक कापडी पिशवीपण होती. मी त्याला ओळखलं नाही.

माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तोच म्हणाला, “साहेब, नमस्कार. मी राजाराम. ” 

“सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. ” मी म्हणालो.

“अहो कसं ओळखणार? आपण पहिल्यांदाच भेटतो आहोत. मला बाबासाहेब देशमुखांनी तुमचा पत्ता दिला आणि भेटायला सांगितलं. ” त्याने स्पष्टीकरण दिलं.

बाबासाहेब देशमुख म्हणजे प्रसिद्ध इतिहास संशोधक. माझे चांगले आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचे मित्र. त्यांनी पाठवलंय म्हणजे हा माणूस नक्कीच कामाचा असणार. हे लक्षात आल्यावर, मी राजारामला म्हणालो,

“या ना, आत या. बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. “

“साहेब, तुम्ही मला अहो जाहो नका करु. नुसतं राजाराम म्हणा. मी लहान माणूस आहे. ” राजाराम म्हणाला.

“बरं, बस राजाराम. मी आलोच” असं म्हणून मी आत जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आलो, आणि काय काम आहे ते विचारलं.

“साहेब, मी जुनी फाटकी पुस्तकं शिवतो. देशमुखसाहेब म्हणाले की तुम्हीपण त्यांच्यासारखेच इतिहास संशोधक आहात. त्यामुळे तुमच्याकडेपण शिवण्यासारखी अशी दुर्मिळ आणि फाटकी पुस्तकं असतील तर ती द्या. एक नंबर शिवतो बघा मी ती. अगदी नव्यासारखी करुन देतो. ” राजारामने त्याच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं.

त्याचं म्हणणं खरं होतं, मीदेखील गेली तीसेक वर्ष इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे, कुठून कुठून जुनी आणि दुर्मिळ पुस्तकं, ग्रंथ, बखरी आणि इतर बरेच ऐतिहासिक दस्तावेज जमा केले होते. त्यातल्या काहींची अवस्था खूप नाजूक होती. ती व्यवस्थित शिवणं गरजेचं होतं. नाहीतर त्यातली पानं सुटून गहाळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे मी अशाच एखाद्या माणसाच्या शोधत होतो. बरं झालं बाबासाहेबांनी त्याला धाडला ते.

“आहेत अशी पुस्तकं वगैरे. अरे पण ती बेडरुममधे कपाटात आहेत. बेडरूम मध्ये माझी बायको आणि मुलगा झोपले आहेत. कपाटातून पुस्तकं बाहेर काढताना कदाचित त्यांची झोपमोड होईल. तू असं कर, तू दुपारनंतर ये. तोपर्यंत मी ती काढून ठेवतो. ” मी म्हणालो.

“दुपारनंतर? ” तो चाचरत पुढे म्हणाला, “साहेब, मी अंबरनाथला राहतो. आता घरी जाऊन परत यायचं म्हणजे खूप उशीर होईल. त्यापेक्षा मी तुमच्या बिल्डिंगच्या खालीच थांबतो, आणि तासाभराने वर येतो. चालेल?

अंबरनाथला राहतो? अरे बापरे! तिथून निघून हा माणूस रविवारी इतक्या लवकर अंधेरीला माझ्या घरी पोहोचला? पहिल्यांदाच आल्यामुळे माझं घर शोधण्यातदेखील त्याचा थोडा वेळ गेला असेलच. कमाल आहे या माणसाची. म्हणजे घरुन निघाला तरी किती वाजता असेल हा? मनातल्या मनात विचार करुन मी त्याला म्हणालो, “बरं, चालेल. मी लवकरात लवकर पुस्तकं बाहेर आणतो. पण तू घरुन काही खाऊन निघालास का? “

“हो साहेब” तो म्हणाला खरा, पण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की तो खोटं बोलतोय. घरुन निघताना किंवा वाटेत त्याने काहीच खाल्लेलं नसावं. मी खणातून माझं पाकीट काढलं, आणि त्यातली शंभरची नोट काढून त्याच्या पुढ्यात धरुन म्हटलं “हे घे आणि कोपऱ्यावर जाऊन आधी चहा, नाश्ता करुन ये. ” 

राजारामने थोडे आढेवेढे घेतले, पण मी ती नोट त्याच्या खिशातच कोंबल्यावर त्याचा नाईलाज झाला. तो नाश्ता करायला गेला.

तो चहा, नाश्ता करुन येईपर्यंत, मी पुस्तकं काढून ठेवली होती.

ही पुस्तकं शिवायचं काम तो कुठे बसून करणार, असा माझ्या मनात प्रश्न आला. पण जणू काही तो वाचून, राजारामच म्हणाला, “साहेब, तुम्ही तुमची गॅरेजमधली गाडी थोडावेळ बाहेर लावलीत तर मी तिथे बसून काम करतो. चालेल का? “

राजाराम हुशारीने आधीच सगळा विचार करुन आला होता तर. मला त्याचं कौतुक वाटलं.

आणि त्याचा प्रस्तावही चांगला होता. मग आम्ही दोघांनी मिळून पुस्तकं आणि एक मोठी चटई खाली नेली. मी माझी गाडी बाहेर लावली, आणि गॅरेजची जागा त्याला मोकळी करुन दिली. त्याने ताबडतोब चटई अंथरुन त्याच्या जवळच्या पिशवीतून दाभण, दोरा, गोंद, चिकटपट्टी वगैरे सामान काढलं आणि तो कामाला लागला.

“एक नंबर शिवणार बघा साहेब. काही काळजीच नको तुम्हाला आता या पुस्तकांची. या तुम्ही तुमचं आवरुन. ” तो म्हणाला.

वॉचमनला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून मी घरी गेलो आणि आंघोळ, चहा नाश्ता करुन पुन्हा तासा दीडतासाने खाली गेलो. तोपर्यंत त्याने अर्धअधिक काम संपवलं होतं. कामातली त्याची सफाई बघून मी खुश झालो. त्याच्याशी गप्पा मारता मारता मला समजलं की त्याच्या घरी त्याची बायको आणि आई आहे. त्या दोघी लोकांकडे धुणी, भांडी करतात आणि फावल्या वेळेत गोधड्या, पिशव्या वगैरे शिवण्याचंही काम करतात. आणि हा चपलांपासून पुस्तकांपर्यंत सगळं शिवतो. तसे खाऊन पिऊन सुखी होते तिघे, पण त्याच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली तरी अजून पाळणा हलला नव्हता. हा सल त्याच्या मनात होता, तो त्याने दोन तीन वेळा बोलूनही दाखवला. असतं एकेकाचं नशीब.

आणखी तासाभरात त्याचं काम संपलं. आम्ही पुस्तकं घेऊन वर घरी आलो. अगदी मला हवं होतं तसं काम केलं होतं त्याने. त्याला काही खायला देऊन, मी पैसे विचारले. माझ्या अंदाजापेक्षा त्याने कमीच सांगितले. मी ते दिले. त्याबरोबर त्याने त्यातले शंभर रुपये मला परत दिले. “साहेब, हे सकाळी तुम्ही मला नाश्त्यासाठी दिले होते. ” तो म्हणाला.

मी अवाक् झालो. आजच्या लबाडीच्या जगात इतका प्रामाणिकपणा? नाहीतर लोक ठरलेले पैसे दिल्यावरसुद्धा वर लोचटपणे आणखी बक्षिसी मागतात. मी राहू दे म्हटलं. पण त्याने ऐकलं नाही. ती नोट त्याने टेबलावर ठेवली आणि नमस्कार करुन तो निघून गेला. जाण्याआधी, परत काही काम असेल तर सांगा साहेब, एक नंबर शिवणार हे सांगायला, आणि आपला फोन नंबर एका कागदावर लिहून द्यायला तो विसरला नाही. पण दुर्दैवाने राजारामने लिहून दिलेला त्याचा नंबर माझ्याकडून हरवला. त्यामुळे नंतर त्याच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही. बाबासाहेबांकडून त्याचा नंबर घेईन म्हंटलं, पण तेही राहूनच गेलं.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री राजेंद्र परांजपे

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाचशे पावलं… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? जीवनरंग ?

☆ पाचशे पावलं… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

अपूर्वा रोजच्याप्रमाणे बागेत गेली. आज बागेत बरीच गर्दी दिसत होती. वाॅकिंग ट्रॅक वरून चालत असताना एका बाजूला सूर्य कलताना दिसत होता. डोक्यावरून एक दोन पक्ष्यांच्या माळा पण उडत गेल्या होत्या. आज घरातले आवरून बाहेर पडेपर्यंत तिला रोजच्यापेक्षा जरा उशीरच झाला होता, अंगवळणी पडलेल्या सवयीनुसार तिचे मन बाहेर फिरण्यास उत्सुक होते. आज रोजच्यापेक्षा कमी फिरावे असा विचार करून तिने हातातल्या घड्याळात बघितले. हातावरचे घड्याळ सात वाजून दहा मिनिटांची वेळ दाखवित होते. घरी परत जाताना तिला थोडी फळ व भाज्या खरेदी करायच्या होत्या. तिने अजून एक फेरी मारु असा विचार केला. बागेतल्या त्या शेडखालच्या बाकांवर अजून पेठे काका, शिरसाट काका, वगळ काका व हल्ली हल्ली त्यांना जाॅइन झालेले कुळकर्णी काका मोठमोठ्याने हसत बोलताना तिने पाहीले, हल्ली शिरसाट काका फार दिवसांनी बागेत आल्याचे तिच्या लक्षात आले. तस पाहता ते बागेच्या गेटच्या बाहेर पडल्यावर समोरच्याच टाँवरमध्ये राहत होते. नवीनच झालेला टाँवर तीस मजली होता. त्यांना भेटून ” कुठे होतात बरेच दिवस आला नाहीत तुम्ही? ” असे विचारावे का हा विचार अपूर्वाच्या मनात आला. अपूर्वा बरेच वर्ष त्या बागेत येत होती. वेळ मिळेल तसा ती कमी जास्त वेळ बागेत चालायला यायची. त्यामुळे तिची या सर्वांशी चांगलीच ओळख होती. बरेच वेळा त्यांच्याशी बोलून ती आणखीन घट्ट झाली होती.

बागेतून बाहेर पडण्याच्या विचाराने गेटजवळ गेलेली अपूर्वा परत मागे फिरली. जाऊ दे. होऊ दे पाच मिनिटे उशिर. पण बोलूया सर्वांशी तिथे जाऊन. असा विचार करून ती सर्व बसले होते त्या बाकांजवळ आली. तेव्हा तिने पाहिले की ते सर्वजण पण उठून एकमेकांचा निरोप घेत होते. वगळ काका शिरसाट काकांना म्हणाले, ” अरे शिर्‍या, येत जा दोस्ता. एवढ्या जवळ तर राहतोस. मित्रांना भेटायला येत जा जरा सवड काढून. ” वगळ काका आणि शिरसाट काका लहानपणापासूनचे मित्र होते. दोघांच्या वयात फार अंतर नव्हते. पेठे आणि कुळकर्णी हे मात्र त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते. तेवढ्यात पेठे काका बोलले “अहो शिरसाट येत जा अधूनमधून. तुम्हाला भेटून बर वाटत.” अपूर्वा दुरूनच हे संभाषण ऐकत होती. त्यांच्या त्या मैत्रीच्या चौकोनात शिरसाट काका वयाने इतर तिघांपेक्षा मोठे होते. शांत, गंभीर, मितभाषी होते. तरीपण सगळ्यांशी त्यांचे छान जमत असे. शांत राहून, कमी बोलूनसुदधा ते इतरांशी मिळून मिसळून राहत असत. बाहेर फिरताना त्यांची एक जीवाभावाची मैत्रीण त्यांच्या सोबतीला सतत राहत असे. ती म्हणजे त्यांंना सतत आधार देणारी त्यांची काठी. शांत, विचारी असे व्यक्तिमत्व लाभलेले ते मित्रांच्या चाललेल्या चेष्टा मस्करीत सक्रियपणे भाग घेत नसत. हलकेच हसून, शांत राहून एखाद वाक्य बोलून जात. फिरायला जाण्याच्या उद्देश्याने बाकी तिघांच्या राहणीमानात बदल घडला होता. कोणी टी शर्ट पँट घालत असे, तर कोणी टी शर्ट आणि ट्रॅक पँट घालून येई. तर कधी हाफ पँट व टी शर्टपण घालत असे. पण शिरसाट काका मात्र आपण त्यांना बघतोय तेव्हापासून झब्बा व लेंगा या वेशातच दिसत आले आहेत हे मात्र खरे. अपूर्वाने विचार केला. अपूर्वाला ते त्यांच्यात वेगळे जाणवायचे.

कुळकर्णी बोलल्यावर शिरसाट काका शांतपणे म्हणाले, ” अहो कुळकर्णी यावेसे फार वाटते हो. तुम्हाला तिघांना भेटायची फार इच्छा असते पण हल्ली प्रकृतीच्या कुरबुरी चालू असतात त्याच्यामुळे इच्छा असूनही शरीर साथ देत नाही. मग घरी बसण भाग होत. मग बसतो सोडवित पेपरमधील शब्दकोडी व आवड म्हणून लिहीतो १/२ पानं तेवढाच आपला विरंगुळा. कधी कधी शरीराने हो म्हटले तर बाल्कनीत उभा राहून दुरूनच तुम्हाला पाहतो. तेवढच आपल समाधान. ” आणि ते हसले.

अपूर्वाला दोन तीन वर्षांअगोदरचे ते आठवले काठीविना चालणारे. पण नंतर वयापरत्वे काठी त्यांच्याजवळ येऊन त्यांना साथ देऊ लागली होती. असे जरी असले तरी पूर्वी इतकेच शांत कुठेही त्रागा नाही की लाभलेल्या परिस्थितीसाठी कुरबूर नाही. आलेल्या परिस्थितीशी मिळतेजुळतेपणा अंगिकारुन पुढे जाणारे ते खरच किती वेगळे होते. ऐकू न येणे ह्या त्यांच्या समस्येलापण त्यांनी समस्या न ठेवता एक रोजच्या जीवनातील गोष्ट म्हणून स्विकारली होती. अपूर्वाने विचार केला, ” खरच कशी वेगवेगळ्या स्वभावाची माणस भेटत असतात. “

अपूर्वा पटकन पुढे होऊन शिरसाट काकांना म्हणाली, ” कसे आहात काका? तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. ” त्यावर ते पण बोलले, ” बरा आहे मी. तू कशी आहेस? आता पाय थकले आहेत. पूर्वीसारखे साथ देत नाहीत. म्हणून हल्ली बाहेर पडणे कमी झाले आहे. तू रोज येतेस ना? ” अपूर्वा बोलली. ” हो काका. मी सहसा चुकवत नाही. फिरल्यावर बर वाटत. मनाला आनंद मिळतो. ” अपूर्वाने त्यांना म्हटले, ” काका, तुम्ही मग टेरेसवर तरी जाता का फिरायला मोकळ्या हवेत? ” ” नाही ग. एवढा अट्टाहास करायचे दिवस आता राहीले नाहीत. खर सांगू तुला माझी रोजची गरजेची कामं करण्यापुरत जरी मी चालू शकलो तरी खूप झाले. अजून किती अपेक्षा बाळगायच्या आता पायांकडून? माझ्या त्या नित्याच्या कामांसाठी मला वाटते पाचशे पावले चालता आली तरी त्या परमेश्वराचा मी आभारी राहीन. ” आणि ते काठीच्या आधाराने पुढे चालू लागले. पाचशे पावल खरच किती माफक अपेक्षा आहे नाही ह्यांची? अपूर्वाने विचार केला असच जर का प्रत्येक वृदध व्यक्ती विचार करेल तर जीवनातली वाट्याला येणारी संध्याकाळ किती आनंदी होईल.”

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

मुम्बई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दयाळूपणाचा महिमा – (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

दयाळूपणाचा महिमा – (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

माझे नाव वेरोनिका आहे. मी ८० वर्षांची आहे. मी ब्राइटनमधील एका हार्डवेअर दुकानाच्या वरच्या एका छोट्या अपार्टमेंटमध्ये एकटी राहते. माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, पेन्शन, थोडी बचत यावर माझे घर चालते.. बाल्कनीतील माझ्या बागेत, पुदिना, थायम आणि एक हट्टी टोमॅटोचे रोप आहे.

दर शुक्रवारी, मी नेहमीच्याच सुपरमार्केटमध्ये जाते. त्याच वेळी आणि त्याच गाडीत. मी चहा ची पावडर, ब्रेड, सूप चे कॅन आणि नेहमीच… नेहमीच मोठ्ठ चॉकलेट खरेदी करते. हीच माझ्यासाठी मेजवानी असते.

एका पावसाळी दुपारी, मी एका तरुणीच्या मागे रांगेत होते. तिच्यासोबत दोन लहान मुले होती. एक हळू हळू रडत होतं. दुसऱ्याच्या हातात खेळण्यातला एक कापडी ससा होता ज्याला एक डोळा नव्हता.

तिने दूध, अंडी, तांदूळ, गोठवलेले वाटाणे, डायपर हे सगळं सरकत्या बेल्टवर ठेवले. तिचे हात थरथरत होते. जेव्हा कॅशियर ने ३८. ७६ डाॅलर बिल झाल्याचे सांगितले ते ऐकून ती एकदम स्तब्ध झाली. तीने रोखपाल (कॅशीयर) ला क्रेडिट किर्ड दिले. ते नाकारले गेले. तीने दूसरे कार्ड दिले. ते ही नाकारले गेले.

ती तरुणी रोखपाल (कॅशीयर) जवळ काहीतरी कुजबुजली “मी यातून दूध आणि पाव (ब्रेड) वगळू शकते का?” तीचा आवाज तुटक येत होता.

तेव्हाच मी काहीही विचार न करता माझं कार्ड रोखपाल (कॅशीयर) ला देत त्या तरुणीला त्या सर्व वस्तू माझ्या खात्यातून देण्यास सांगितले. त्या तरुणीने डोळे विस्फारून मागे वळून बघितले व म्हणाली “नाही, मी हे नाही स्विकारू शकत. “

“तू हे घेऊ शकतेस” मी म्हणाले ” कधी ना कधी आपणास सर्वांना मदतीची गरज पडतेच. ” तीने धन्यवाद करण्याआधीच मी स्मितहास्य केले व माझी छोटीशी पिशवी बॅग घेऊन तेथून निघून आले. मी हे काही तीचं धन्यवाद ऐकण्यासाठी केलं नव्हतं.

मला माझं तरुणपण आठवलं. तुटलेली. घाबरलेली. नवरा गेल्यानंतर माझ्या मुलाला मी कसंतरी वाढवत होते. एकदा मी अशीच रांगेत उभी होते… आणि मला कोणीही मदत केली नव्हती. म्हणून मी तीचं बील दिलं आणि घरी निघून गेले.

पण मला पुढचं काही माहीत नव्हतं.

ती तरुणी, तीचे नाव लैला होते, तीने त्या रात्री सार्वजनिक फेसबुक वर या मदतीविषयी लिहिले. “आज एका अनोळखी व्यक्तीने माझ्या किराणा सामानाचे पैसे दिले. पांढरे केस आणि दयाळू नजर असलेली एक वयस्कर महिला. तिने मला व्याख्यान दिले नाही. काहीही मागितले नाही. फक्त पैसे दिले. आणि निघून गेली. मी गाडीत बसून रडले. माझ्या मुलांनी त्या रात्री तिच्यामुळे जेवण केले. जर तुम्ही तिला ओळखत असाल तर तिला सांगा… या कृतीसाठी फक्त धन्यवाद पुरेसे नाही. “

कोणीतरी टिप्पणी केली, “थांबा – तिने पिवळा रेनकोट घातला होता का?” 

आणखी एकाने लिहिले “ती थॉम्पसनच्या हार्डवेअरच्या वर राहते, बरोबर? मी तिला दररोज सकाळी झाडांना पाणी देताना पाहतो. “

तासाभरातच लोकं माझ्या दारासमोर दिसू लागले. ते काही वार्ताहर नव्हते की त्यांचेकडे कॅमेरे ही नव्हते. ते माझे शेजारी होते. ते माझ्यासाठी फुलं, घरी बनवलेल्या जॅम ची बाटली, हाताने विनलेले मफलर वगैरे घेऊन आले होते.

एका किशोरवयीन मुलाने एक चिठ्ठी लिहिली, “तू तिच्यासाठी पैसे दिले. मी ही यापुढे पैसे देत जाईन, मी आता युवा केंद्रात मुलांना मोफत शिकवत आहे. “

मग पत्रे यायला लागली.

एका परिचारिका (नर्स) ने लिहिले “काल रात्री एका रुग्णाला सांत्वन देण्यासाठी मी उशिरापर्यंत दवाखान्यात थांबले, कारण तुम्ही मला दयाळूपणा फार महत्त्वाचा आहे याची आठवण करून दिली.”

व्यसनातून नुकताच सावरणारा एक माणूस लिहितो “मला सापडलेले पाकीट मी मालकाला जसेच्या तसे परत केले. मला तुम्ही केलेल्या उदारतेची आठवण आली होती. “

आणि लैला? ती गेल्या आठवड्यात मला भेटायला आली होती. तिच्या मुलांनाही सोबत घेऊन आली होती. आम्ही माझ्या बाल्कनीत बसलो. चहा घेतला. त्या लहान मुलाने मला त्याचा खेळण्यातला कापडी ससा, ज्याला एक डोळा नव्हता तो दिला. “त्याला तू फार आवडतेस, ” ती म्हणाली.

मी अजूनही दर शुक्रवारी त्या नेहमीच्या सुपरमार्केटमध्ये जाते.

आता, काही वेळा, कुणीतरी मी घेतलेल्या चाॅकलेट बार चे पैसे रोखपाल (कॅशीयर) ला देतो. आणि मी त्यांना ते देऊ देते. कारण दयाळूपणाची भावना संपायला नको. ती भावना फक्त वाट पाहत असते…. कोणीतरी धाडसी व्यक्तीची जो ते सुरू करेल.

आणि जर तुम्ही विचार करत असाल तर, कुणाच्या मनात आशा जागवण्यासाठी तुमच्याकडे पैसेच असले पाहिजेत असं नाही गरज नाही. तुम्ही फक्त एखाद्या गरजू ला जावून भेटण्याची आवश्यकता आहे. त्यांना खरोखर भेटा, आणि शब्दांशिवाय म्हणा, “मी या सर्व परिस्थितीमधून गेलो आहे. आणि आता मी तुमच्यासोबत आहे. “

जग असंच चांगलं होत जाईल, सुधारत जाईल, मोठमोठी भाषणं, आश्वासनं किंवा मथळ्यांमधून (हेडलाईन्स) नाही, तर शांत क्षणांमध्ये, सामान्य लोकांसमवेत. जो एकमेकांची काळजी घेण्याची निवड करतो.

मूळ इंग्रजी कथालेखक – अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

नाशिक, मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares