☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
रवींद्रनाथांचा जन्म उच्चवर्णीय, गर्भश्रीमंत, जमीनदार व उच्चशिक्षित घराण्यातला. त्यांच्या व्यापक विचारांना जाती धर्माची, वर्ण पंथांची, देश वा राज्याच्या सीमांची बंधनं मान्य नव्हती. ते अखिल मानव जातीच्या भल्याचा विचार करीत. कदाचित् त्यामुळेच समकालीन विचारवंतांच्या मनात त्याच्या विषयी नेहमीच संशयाचे धुके असत असे. परंतु त्यांचं आपल्या देशावर, या वसुंधरेवर निरतिशय प्रेम होतं. त्यांचे विचार प्रगल्भ होते. बुद्धिमत्ता अलौकिक होती. आरशासारखं स्वच्छ मन होतं.
त्यांच्या मते प्रत्येकाला शिक्षणातून स्वतःचा उत्कर्ष घडवण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार व समान संधी मिळायला हवी. त्यासाठी देश, प्रांत अशा सीमारेषा नसाव्यात. त्या काळातही ते जागतिकीकरणाचे ध्येय बाळगून होते.
गीतांजलीतील आपल्या ३५ व्या कवितेत त्यांनी अत्यंत सकारात्मक असे हे विचार मांडले आहेत. जेथे जात, पंथ, वर्ण, रूढी, भाषा अशा कोणत्याही भेदभावाच्या भिंती नाहीत, समानता आहे, परस्परांबद्दल आदर आहे, नैतिकता, विवेक, सत्यवचन यांचा अंगिकार करणारं मन आहे अशा विश्वाची, मानवजातीची आस त्यांनी इथे व्यक्त केली आहे.
समाजात भयमुक्त, संघर्ष मुक्त वातावरण असावे. दडपशाहीच्या निंदनीय वास्तवातून बाहेर पडले पाहिजे अन्यथा वाळवंटातील रेती मध्ये रुतल्याप्रमाणे बसावे लागेल. ते ओलांडून गेलो तरच प्रगतीशील भविष्याचा, राष्ट्रीय एकात्मतेचा स्वच्छ प्रवाह निर्माण होईल, जो कधीच थांबणार नाही. एकसंध, निष्पक्ष असा परिपूर्ण भारत, परिपूर्ण जग निर्माण केले पाहिजे.
ते ह्या काव्यातून प्रत्येक मानवासाठी नैतिक, बौद्धिक व आध्यात्मिक स्वातंत्र्याची मागणी करतात. तसेच वसाहतवादी मानसिकतेविरुद्ध भाष्य करतात. वैयक्तिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सर्व बंधनांना तोडून जे स्वातंत्र्य लाभेल ते स्वर्गासम असेल. त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझ्या देशाला जागे कर, अशी ते विधात्याकडे प्रार्थना करतात.
त्यांचे हे काव्य म्हणजे जणू सगळ्या मानवतेला आवाहन आहे. विचारही इतके दूरदर्शी, सार्वकालिक आणि व्यापक आहेत की आजही ते सर्वांना मार्गदर्शक ठरतील. या कवितेने स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळीच मिती प्राप्त करून दिली. स्वातंत्र्य म्हणजे फक्त सत्ता बदल नाही. तर भयमुक्त समाज निर्माण करणे जेथे परस्परांबद्दल आदरभाव असेल, समानता असेल.
हे काव्य संपूर्ण विश्वात गाजले कारण यातील विचार वैश्विक आहे. यात सामूहिक प्रबोधनाचे आवाहन आहे. न्याय्य, खुल्या भयमुक्त मानवी जगाच्या निर्मितीचं आवाहन आहे. ही कविता फक्त भारतातच नाही तर बांगलादेशातही पाठ्यपुस्तकातून शिकवली जाते.
सन १९१७ च्या कलकत्ता येथे झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात स्वतः रविंद्रनाथांनी ही कविता ‘इंडियन प्रेअर’ म्हणून प्रस्तुत केली होती. तिचं सिंहीली भाषेतही भाषांतर झालं आहे. सन १९१० च्या आधी त्यांनी ही कविता बंगाली भाषेत लिहिली होती. नंतर त्यांच्या ‘नैवेद्यम्’ या कवितासंग्रहातून ‘प्रार्थना’ या शीर्षकाखाली ती प्रसिद्ध झाली. ही मूळ कविता क्रांतिकारी वळणाची व अधिक आवेशपूर्ण होती. तिचे इंग्लिश मध्ये भाषांतर करताना टागोरांनी त्यात
काही बदल करून ती बरीच
सौम्य केली आहे.
—–
☆ गीत ३४ ☆
LET only that little be left of me whereby I may name thee my all.
Let only that little be left of my will whereby I may feel thee on every side, and come to
thee in everything and offer to thee my love every moment.
Let only that little be left of me whereby I may never hide thee.
Let only that little of my fetters be left whereby I am bound with thy will, and thy purpose
is carried out in my life ⎯ and that is the fetter of thy love.
WHERE the mind is without fear and the head is held high;
Where knowledge is free; Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls; Where words come out from the depth of truth; Where tireless striving stretches its arms towards perfection;
Where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit; Where the mind is led forward by thee into ever-widening thought and action ⎯
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.
☆ “परदेशी भक्तांचा कृष्ण consciousness!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
शामा आन बसो ब्रिंदावन में
मेरी उमर बीत गयी गोकुल में
मैं तो बन के दुल्हन आज सजी
बस तुमही हो मेरे तन मन में ।।
श्रीकृष्ण नावाचं एक गारूड गेली कित्येक युगे सहृदय मानवांच्या मनावर राज्य करीत आलेलं आहे. विविध रूपांत भगवान श्रीकृष्ण कोट्यवधी लोकांच्या हृदयात विराजमान आहेत. कृष्णलीला अगाध आणि अनंत आहेत.
मानवी देहात अवतरीत झालेला हा देव देहाच्या, वासनेच्या अंगभूत मर्यादा ओलांडून केंव्हाच पुढे, अगदी पुढे निघून आलेला दिसतो. माना मानव वा परमेश्वर… मी स्वामी पतितांचा म्हणत हा कर्माचा योगी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सबंध जगतातील अनेकांच्या मनात वसलेला दिसतो.
जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या ISKON अर्थात International Society for Krishna Consciousness या संस्थेने कृष्णाची आणि जगाची गाठ घालून दिली, असे म्हणता येईल. पाश्चात्य जगतातील विज्ञाननिष्ठ लोक मोठ्या संख्येने कृष्णनाम जपताना दिसतात, तेंव्हा ही जाणीव निश्चितच अगदी उच्च पातळीवरची असेल, यात शंका नाही!
हजारो परदेशी युवक-युवती भारतात कृष्णाच्या शोधात येताना दिसतात, भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानी, त्यांनी लीला केल्या त्या वृंदावनात रमताना दिसतात…. गाताना दिसतात. मोठ्या श्रद्धेने ही मंडळी श्रीकृष्ण भावानामृत ग्रहण करतात. यामागील कारणे काहीही असोत… त्यांना त्यांच्या जीवनाच्या उत्कर्षासाठी हा मार्ग योग्य वाटतो… हे महत्त्वाचे!
इंटरनेट वर सध्या एका रशियन युवतीने अत्यंत तल्लीन होऊन गायलेल्या एका हिंदी कृष्ण भजनाचा रील खूप मोठ्या संख्येने पाहिला जातो आहे. उच्चार, गायनाची धाटणी काहीशी वेगळी असली तरी ती ज्या भावनेने गाते आहे…. ते ऐकण्यासारखे आहे. विशेषत: तन मन में हा उच्चार तर केवळ अवीट गोडीचा.
मन:शांतीच्या शोधात असणा-यांना कृष्णभक्ती हा एक उत्कृष्ट मार्ग उपलब्ध आहे. किंबहुना अध्यात्माच्या जगतात कृष्ण नाम हा परवलीचा शब्द बनला आहे. राम कृष्ण नामे ही (ये) दोन्ही साजिरी… हृदयमंदिरी स्मरा का रे… आपली आपण करा सोडवण… संसार बंधन तोडा वेगी… असं माऊली म्हणतात. राम आणि कृष्ण अर्थात श्रीराम आणि श्रीकृष्ण ही दोन्ही नामे साजिरी, गोड आहेत….. या नामांच्या केवळ उच्चाराने संसार बंधनातून सुटका होऊ शकते, असा विश्वास श्री ज्ञानोबारायांनी दिला आहे. असो.
परदेशी लोकांनी आपला हा ठेवा आपलासा केला आहे… हेच खरे.