मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१२ ☆ मैत्र… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१२ ?

☆ मैत्र… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

हे तुझे दुटप्पी वागणे नव्हे बरे

सूज्ञ तू तुला समजावणे नव्हे बरे 

 *

बेगडी तुझे सारे विचार साजणी

नेहमीच संधी साधणे नव्हे बरे

 *

वागणे तुझे वा-यापरीच स्वैरसे

स्वार्थ सोहळे जोपासणे नव्हे बरे

 *

शब्द शस्त्र आहे लागता मनावरी

डंख नित्य सकळा मारणे नव्हे बरे

 *

जर नसे जिवाला शांतता “प्रभा” तिथे

मैत्र हे असे सांभाळणे नव्हे बरे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझा संसार… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ माझा संसार सुश्री नीलांबरी शिर्के 

माझा संसार संसार

तवा तापे गॅसवर

मसाला वाटताना

होई मिक्सरची घरघर!!

सखे माझ्या या संसारी

नाही म्हातारी कोतारी

वृद्धाश्रमी पाठवून

सुख शांती लाभे घरी!!

लॅडस्केप बोनसाय

सजवीले घरीदारी

जागा नाही खर्च केली

देवाच्या ग मी देव्हारी!!

माझ्या संसाराला ठेका

डिस्को पाॅप संगिताचा

मिळणार नाही तुला

शब्द येथे आरतीचा!!

सांभाळाया मुलांना ग

बाई खास आहे घरी

काय म्हणते संस्कार

आपोआप होतात ग

मोबाईल टि व्ही वरी!!

माझ्या कपाळीच कुंकू

नाही लालच रंगाच

त्याच कसब ग मोठ

ड्रेससंगे रंगायाच!!

सखे संसार संसार

नाही सुखा पारावार

रूढवादी संस्कारांना

जागा नाही टिचभर!!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

जवळजवळ १६५ वर्षांपूर्वी कोलकत्ता जवळच्या ‘जोरासांको’ येथील ठाकूर घराण्याच्या महाल सदृश घरात ७ मे १८४१ रोजी रविंद्रनाथांचा जन्म झाला. वडील महर्षी देवेंद्रनाथ व आई शारदा देवी यांचं ते चौदावं अपत्य होते. साहजिकच त्यांना आईचा सहवास फार वर्षे लाभला नाही. वडील पण सतत प्रवासांत असत. ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचे देवेंद्रनाथ वरचेवर हिमालयात भटकंती करत, तिथे जाऊन रहात, त्यामुळे त्यांचा सहवास देखील फारसा मिळायचा नाही. पण जेंव्हा रविंद्र उर्फ ‘रोबी’ ने शाळे विषयीच्या तक्रारी त्यांना सांगितल्या तेंव्हा त्यांना फार वाईट वाटले व त्यांनी रोबीला शाळेतून काढले ते कायमचेच.

घरीच वडील त्यांना शिकवू लागले. प्रवासात ते रोबीला आपल्या सोबत घेऊन जाऊ लागले. तिथे निसर्गाच्या सानिध्यात शाळेत न मिळणारं, पण बौद्धिक व भावनिक जग समृद्ध करणारे शिक्षण सहज बोलता बोलता रोबीला मिळू लागलं. वडिलांबरोबर केलेला प्रवास, हिमालयातील भटकंती, निसर्गाकडून व वडिलांकडून मिळालेलं ज्ञान हा रविन्द्रनाथ यांच्या जीवनातला सुवर्णकाळ होता. याच काळात या शाळा सोडून दिलेल्या तथाकथित अज्ञानी मुलाचं रूपांतर एका सुसंस्कृत मुलात झालं. (The ugly duckling was transformed into an admired swan) ही शिदोरी त्यांना नोबेल पुरस्कारा पर्यंत घेऊन गेली व शिक्षणपद्धतीचा कायापालट करणाऱ्या शिक्षणमहर्षी या पदवीपर्यंत घेऊन गेली. पूर्ण भारताने नाही तर जगाने त्यांना कलाक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, समाजसुधारणेचं क्षेत्र, तत्वज्ञानाचे क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांतील गुरुपद बहाल केलं व गुरुदेव या पदवीने सन्मानित केलं. कोणतेही समाजमान्य पारंपारिक शिक्षण न घेतलेला, कोणत्याही विद्यापीठाची कसलीही पदवी गाठीशी नसलेला हा माणूस शिक्षणक्षेत्रात ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रयोग यशस्वीपणे करून दाखवतो ही गोष्ट अचंबित करणारी आहे.

त्यांच्या मनात शाळेविषयी तिरस्कार निर्माण करणाऱ्या, त्या काळी सर्वसंमत असणाऱ्या, मुलांना शारीरिक क्लेश देणाऱ्या, अपमानास्पद शिक्षा करणाऱ्या पद्धतीचे जगाने खरंतर आभारच मानायला हवेत कारण त्यामुळेच रविंद्रनाथांनी शाळा सोडली. वडिलांकडून, निसर्गाकडून, पुस्तकां कडून ज्ञान मिळवून ते संवेदनशील विचारवंत, हरहुन्नरी कलाकार बनले.

रविंद्रनाथांनी लहानपणीच तीन तीन क्रांतीकारी चळवळी खूप जवळून पाहिल्या, अनुभवल्या. एक म्हणजे राजा राममोहन रॉय यांची धार्मिक पुनरुत्थानाची चळवळ, ज्यातून ब्राह्मो

समाजाची निर्मिती झाली. दुसरी म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी चालू केलेली साहित्यिक चळवळ, ज्यामुळे भारतीय, वाङ्मयीन विश्व खडबडून जागे झाले. आणि तिसरी राजकीय चळवळ ‘Indian National movement’, जी राजकीय व सांस्कृतिक दडपशाहीचा निषेध करत होती. या तीनही चळवळींत टागोर कुटुंबियांचा सक्रिय सहभाग होता व त्यामुळे बालपणी व तरुणपणी रविंद्रनाथांनी या सर्व हालचाली खूप जवळून पाहिल्या होत्या.

पौर्वात्य व पाश्चिमात्य दोन्ही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी एकत्र आणून संघर्षाशिवाय मानवजातीच्या कल्याणासाठी काम करावं अशी भावना कदाचित या तिन्ही चळवळींचा त्यांच्या कोवळ्या मनावर झालेल्या परिणामाचा परिपाक असावा.

वयात बरंच अंतर असूनही वडीलबंधू सत्येंद्रनाथांबरोबर रविंद्रनाथांचे वडिलांप्रमाणेच मित्रत्वाचे संबंध होते. आय ए एस असलेल्या सत्येंद्रनाथांच्या देशातील निरनिराळ्या शहरांत बदल्या व्हायच्या पण तिकडे जाऊन रोबी त्यांच्याबरोबर रहात, वेद, उपनिषदे, संत वाङ्मय यांचे वाचन करीत व त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्या ज्ञान कक्षा विस्तारित असत.

‘रोबी’ या आपल्या आत्मकथनपर पुस्तकात त्यांनी म्हटलय की, ” ज्या देवाचा व प्रेमाचा माझ्या सर्व साहित्यात संदर्भ आला आहे तो या जीवनाचा देव (God of life) आहे व ते प्रेम जीवनावरील प्रेम आहे. ” त्यांच्या शब्दांतून उमटणारे दैवी सूर, धर्म, भाषा, देश अशा सर्व सीमा लांघून सर्व विश्वात घुमले. आपल्या एका कवितेत ते स्वतःलाच सांगतात, “Move out of yourself, stand out in the open, you will hear the music of the universe in your heart. “

—–

☆ गीत : ६४ ☆

ON the slope of the desolate river among tall grasses I asked her, “Maiden, where do 

you go shading your lamp with your mantle? My house is all dark and lonesome ⎯ lend 

me your light! ” She raised her dark eyes for a moment and looked at my face through 

the dusk. “I have come to the river, ” she said, “to float my lamp on the stream when the 

daylight wanes in the west. ” I stood alone among tall grasses and watched the timid 

flame of her lamp uselessly drifting in the tide.

In the silence of gathering night I asked her, “Maiden, your lights are all lit ⎯ then where do you go with your lamp? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” 

She raised her dark eyes on my face and stood for a moment doubtful. “I have come, ” she said at last, “to dedicate my lamp to the sky. ” I stood and watched her light 

uselessly burning in the void.

In the moonless gloom of midnight I asked her, “Maiden, what is your quest holding the 

lamp near your heart? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” She 

stopped for a minute and thought and gazed at my face in the dark. “I have brought my light, ” she said, “to join the carnival of lamps. ” I stood and watched her little lamp uselessly lost among lights.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत :६४ ☆

नदीच्या उतरणीला उभा मी असताना,

मज दिसली ती, झाकुनि एक दीप नेताना

 

निघालीस कोठे हा दीप 

तुझा घेउनि?

देशील कां, घर माझे

आले अंधारुनि?

 

डोळे मोठ्ठे करूनि क्षण

मजकडे पाही

म्हणे मावळतीला सोडेन नदी प्रवाही

 

भित्री ज्योत थरथरुनि

वहातच गेली 

निशेच्या तमी पुन्हा दिवा घेउनि दिसली 

 

आता तरी देशील कां,

घर माझे उजळण्या?

म्हणे दिवा हा आणिला

नभासि अर्पिण्या

 

अवकाश पोकळीत दीप व्यर्थ तेवला

गडद रात्री, आली फिरुनि,

दीप छातीशी धरिला 

 

पुन्हा मी पुसले, टक लावुनि, पहात म्हणते

आनंदोत्सव असे दिव्यांचा, त्याचसाठी नेते

 

अनंत दिवे, ध्येय रहित, तेवती प्रकाशात

ती अन् तिचा दीप दोन्ही हरवले गर्दीत

 

भक्तीचा दीप न मिळे, असा आयता कोणास

ज्याचा त्याने तो ठेवावा चेतवुनि हृदयास

 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ६५ ☆

WHAT divine drink wouldst thou have, my God, from this overflowing cup of my life?

My poet, is it thy delight to see thy creation through my eyes and to stand at the portals 

of my ears silently to listen to thine own eternal harmony?

Thy world is weaving words in my mind and thy joy is adding music to them. Thou givest 

thyself to me in love and then feelest thine own entire sweetness in me.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६५ ☆

*

भरुनी वाहतो देवा

सुखी जीवनाचा ठेवा

*
तूच दिले मज हे जीवन

विविध रसांनी नटवून

*

कोणता रस तुजला

अर्पू मी न कळे मला

*

तूच निर्मिलेले जग 

मम नेत्री पाहशील का?

संगीत तूच निर्मिलेले

मम श्रोत्री ऐकशील का?

*

विश्व तुझेच मम हृदयी

गोफ विणे शब्दमयी

*

अलौकिक तव आलापी

सुखदायक हो भवतापी

*

बली सम तू दाता असशी

मम चेतसी तुलाच देशी

*

तव माधुरी मी हृदयी धरी

तव हृदयांगण जी तृप्त करी

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ६६ ☆

SHE who ever had remained in the depth of my being, in the twilight of gleams and of glimpses; she who never opened her veils in the morning light, will be my last gift to thee, my God, folded in my final song.

Words have wooed yet failed to win her; persuasion has stretched to her its eager arms in vain.

I have roamed from country to country keeping her in the core of my heart, and around her have risen and fallen the growth and decay of my life.

Over my thoughts and actions, my slumbers and dreams, she reigned yet dwelled alone and apart.

Many a man knocked at my door and asked for her and turned away in despair.

There was none in the world who ever saw her face to face, and she remained in her 

loneliness waiting for thy recognition.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६६ ☆

*

जी अंतरात माझ्या, ती संधीप्रकाश किरणात

कुणी न तिज पाहिले, दिवसाच्या प्रकाशात

*

प्रेमयाचना शब्दांची, फोल तिला जिंकण्यास 

प्रयत्न निष्फळ होत, तिचे मन वळविण्यास

*

देशोदेशी फिरलो, हृदयात तिज स्थापुनि

आयुष्याचे चढउतार, भोवती तिच्या गुंफुनि

*

अनन्य भक्ती तुजप्रती, हृदयी येई उमलुनि

मार्ग चाललो, जो दिला तिनेच मला दावुनि 

*

सत्ता तिचीच, मम स्वप्न, विचार वा कृती

निराश झाले, ज्यांना ती मागून हवी होती

*

वाट पाहते, तव मान्यतेची, एकटीच राहुनि

अर्पण करी, तिज देवा, अखेरच्या गीतातुनि

*

– क्रमशः भाग २२..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३२५ ☆ शेतकऱ्यांचे प्रश्न… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२५ ?

☆ शेतकऱ्यांचे प्रश्न… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वावरात या इतके कांदे पिकले होते

जागोजागी त्यांचे डोंगर रचले होते

*

उठाव नाही या कांद्याला काय करावे

कवडीच्या भावातच सारे विकले होते

*

भाग भांडवल सुद्धा वसूल झाले नाही

कास्तकार तर सारे येथे खचले होते

*

डोळ्यांचा हा पहा कालवा झाला त्याच्या

काळजात त्या सारे पाणी मुरले होते

*

अंधाराशी रोज लढाई करता करता

कोसळणारे तारे दिवसा दिसले होते

*

सटवाईने कायम केली त्याची थट्टा

त्याचमुळे का नशीब त्याचे रुसले होते

*

लग्न ठरेना म्हणून त्याने फास घेतला

शेतकऱ्यांचे प्रश्न कधी का सुटले होते

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मौनरंगी काव्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मौनरंगी काव्य... ☆ श्रीशैल चौगुले ☆

तुझ्या मौनरंगी गाली

कुसुमांक शब्दलाली

ओळखूनी मन आहे

वाहे कवणपखाली.

 *

चालता जीवनवाट

अनोळखी भेट झाली

वाटले लिहावे आता

स्मरणांची ओळ ओली.

 *

नजर चोरटी जाणे

हृदयातली रंगोली

प्रभात संध्या नित्यची

स्वप्न प्रतिभे हवाली.

 *

असे वेड तुझे कसे

लागले कवित झुली

शब्द झोके अक्षरांना

ज्ञानफुलांच्याच वेली.

ऋतू मात्र भारावून

रचित श्रावण डोली

शिशीर वसंत गाती

काव्यप्रेम स्पंद बोली.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ ‘देवा…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

? क्षण सृजनाचे ?

☆ ‘‘देवा…’ ☆  शांभवी मंगेश जोशी 

क्षण सृजनाचे:

दि. ३/४/२०२६ या ई-अभिव्यक्ती मध्ये खालील लेख आला आहे. तो वाचल्यानंतर मला माझी एक कविता येथे द्यावी असे वाटले. प्रथम तो लेख व नंतर माझी कविता आपल्यासाठी.

☆  निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

मंदिराच्या पायऱ्या चढताना हातातील फुलांच्या हारापेक्षाही मनातील मागण्यांचे ओझे जास्त जड असते..

प्रत्येक पाऊल एका अपेक्षेने पडत असते आणि प्रत्येक नमस्कारात काहीतरी पदरात पाडून घेण्याची धडपड असते..

आपण देवाकडे जातो ते बहुधा स्वतःला अपूर्ण समजूनच..

कुणाला धन हवे असते, कुणाला यश, तर कुणाला केवळ मनाची शांती..

पण या मागणारे आणि देणारे यांच्या गर्दीत एक निराळाच प्रवाह वाहत असतो.

तो म्हणजे त्या जिवांचा, ज्यांनी मागणे सोडून दिले आहे..

ज्यांच्या डोळ्यांत आता आसवांची जागा एका संथ शांततेने घेतली आहे..

माणूस जेव्हा स्वतःच्याच अंतर्मनाच्या गाभाऱ्यात डोकावतो, तेव्हा त्याला उमजते की खरी श्रीमंती बाहेरून काही मिळवण्यात नसून आत जे आहे त्यात तृप्त राहण्यात आहे.

हे जगणे सोपे नसते..

या तृप्तीला एक सूक्ष्म दुःखाची किनार असते. हे दुःख एखाद्या जुन्या जखमेसारखे नसते, तर ते एका अशा जाणीवेचे असते की आता आपल्याला जगाकडून काहीही नको आहे..

ज्याला काही नको असते, तोच खऱ्या अर्थाने ‘सुखी आत्मा’ असतो..

पण या वैराग्यात एक प्रकारची एकाकीपणाची सावली असते..

जग जेव्हा धावत असते, ओरडत असते, तेव्हा हा माणूस आपल्याच हृदयाच्या कोपऱ्यात शांत बसून स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतो..

ही तृप्ती आनंदापेक्षाही जास्त गंभीर आणि मौनापेक्षाही जास्त सखोल असते..

अशा वेळी बाहेरच्या मूर्तीसमोर हात जोडण्याचं भानही उरत नाही, कारण साऱ्या जगाला व्यापणारा तो विधाता स्वतःच्याच निवांत एकांतात सामावलेला असतो..

हे एक नितांत सुंदर सत्य आहे..

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

—– 

☆ कविता –  😀 देवा, 🙏🌹🙏 ☆

 आले कशी कळेना, दारी तुझ्या दर्शनास

 नसताच कारण आणि इच्छा जराही मनात😞

 तरीही आस उगा मनात, भेटशील इथे तू खचित!

 वाटले…! वाटले पाहू तरी, असतो कसा तो देव!

 भ्रमनिरास माझा देवा नक्कीच तू केला😢

 साधून ते तुजला, आनंद कुठला मिळाला?

 रांगेत मी भक्तांच्या, तू वेढ्यात सुरक्षारक्षकांच्या

 तिथेच भक्ती माझी टिचकली, जी बळेच होती मी जपलेली 🙃

 ढकलाढकली अन् धक्काबुक्की ती अशी

 आले क्षणभर तव सामोरी कशीबशी

 तशाच धक्क्याने नेले क्षणात दूरदूर

 तनाने तसे मनानेही खूप खूप दूर दूर 👎👎

 सांगते हात जोडुनि शपथ घेउनि तुझी, 🙏🙏

 हात जोडण्यासही जमलेच नाही, त्या एका क्षणात! 😢

 किंचितही वळून ना पाहिले पुन्हा

 परी

 सोडला श्वास सुटकेचा, संपला सोहळा दर्शनाचा

आली कीव तुझीच! वाटले, हवी तुलाच सुटका

 येथुनि

निघाले तडक जरी माघारी… तरी…

तरी पावलांमागोमाग हा कसला भास? 🤔🤔🤔

 

आलास की काय सोडुनि तू तुझ्या राउळास?

 

संशय खरा की खोटा, छळतो मनाला

परी त्या क्षणापासुनिवाटते निश्चिंत माझ्या मनाला👍🙏😀🙏

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, shambhavijoshi76@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क्षण झाला अमर… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ क्षण झाला अमर… ☆ अपर्णा परांजपे

सहज सुचलं म्हणून… ✍️क्षण झाला अमर

१: “भूत-भविष्य चिंतनात नाही तर वर्तमान कळतं…”

भूत म्हणजे स्मृतींची सावली.

भविष्य म्हणजे कल्पनांची छाया.

दोन्हींचा आधार मन आहे — आणि मनच काळ निर्माण करते.

पण वर्तमान?

तो ना स्मृती आहे, ना कल्पना. तो शुद्ध अनुभूती आहे.

 

उपनिषद म्हणतात —

“यत् साक्षादपरोक्षाद् ब्रह्म” —

जे प्रत्यक्ष आहे, तेच ब्रह्म आहे.

वर्तमान क्षण हाच साक्षात् ब्रह्मानुभवाचा दरवाजा आहे.

जो क्षण पूर्णतेने जगतो, तो काळाच्या पलीकडे जातो.

 

२: “दिवसांचे महत्त्व कमी झाले की ‘क्षणांचे’ मूल्य कळते…”

दिवस हे मोजमाप आहे.

क्षण हा अनुभूती आहे.

दिवस बाह्य घड्याळ सांगते. मात्र क्षण अंतःकरण उलगडते.

जेव्हा आपण दिवसांच्या धावपळीतून थांबतो, तेव्हा जाणवते —

जीवन दिवसांनी नव्हे, तर जागृत क्षणांनी घडते.

 

अद्वैत दृष्टीने —

प्रत्येक क्षणात पूर्णत्व आहे.

कारण क्षणातच चैतन्य प्रकट आहे.

 

३: “भगवंत हृदयस्थ आहे…”

भगवंत शोधायचा बाहेर का?

तो तर साक्षीभावात, शुद्ध जागरूकतेतच आहे.

ईशावास्यमिदं सर्वम्” —

सर्व काही त्याने व्यापले आहे;

मग हृदय त्याच्या बाहेर कसे असेल?

जेव्हा मन भूत-भविष्य सोडते,

तेव्हा हृदयात शांत, निर्विकल्प प्रकाश उगवतो.

तोच भगवंत.

🕉️ थोडक्यात

न भूतं न भविष्यं, केवलं वर्तमानम्।

न कालः तत्र भाति, केवलं चैतन्यम्।

यस्मिन् क्षणे विश्रान्तिः, स एव ब्रह्मक्षणः॥

(भूत नाही, भविष्य नाही — जे उरते ते वर्तमान चैतन्य; ज्या क्षणी विश्रांती मिळते, तोच ब्रह्मक्षण.)

 *

ध्यान म्हणजे अपूर्णतेच गोडी वाटणे, अनुभवणे

भूत-भविष्य निवळले की क्षण पवित्र होतो;

क्षण पवित्र झाला की हृदय मंदिर बनते. 🙏

*

 भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हौसेचं फसलेलं गणित… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हौसेचं फसलेलं गणित... ? श्री आशिष  बिवलकर ☆

लग्नात कपड्याच्या हौसेला,

पैशाचं मोल कधीच ते नसतं |

कोपलेल्या सूर्यनारायणापुढे,

मात्र हौसेचं गणित मात्र फसतं |

*

रेमंडचा थ्री पीस सूट शिवून,

लग्नात ऐटीत होता मिरवणार |

मुलीकडच्यांची पोशाखात,

नवरदेव म्हणाला जिरवणार |

*

इतकी वर्षे रखडलेला उपवर,

यंदा मात्र नशिबाने लग्न जुळलं |

समोरची पार्टी पैशाने मजबूत,

तिथंच गड्याचं नशीब फळलं |

*

बँडबाजा वरात सनई चौघडा,

हट्टाने मान्य करुन घेतलं मागून |

वैशाखातच चांगला मुहूर्त आहे,

थाटात लग्न बैठकीत गेला सांगून |

*

वैशाख वणव्यात थ्री पीस सोडा,

चड्डी बनियान घालून तो पाटावर |

पाहून लग्न सोहळा वऱ्हाड्यांनी,

यथेच्छ ताव तो मारला ताटावर |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रेमसखा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्रेमसखा! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

रंगारी साऱ्या दुनियेचा 

धरून बैसला कुंचला,

चितारी तन्मयतेने मग 

हृदयी वसल्या राधेला!

*
कर्णफुले कानी दोन 

प्रेम रंगात रंगवली,

नील कांती मुखावरची 

खुलवी ओठांची लाली!

*

मुग्ध भाषा दो नयनांची 

सौन्दर्य मुखाचे वाढवी,

बिंदीसवे कनक मुकुट 

केशसंभार तो खुलवी!

*

प्रेम नजरेने बघता तिला 

वाटे आत्ता जिवंत होईल,

दिसता प्रेमसखा सामोरी 

मिठीत त्याच्या विरघळेल!

मिठीत त्याच्या विरघळेल!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जगणे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ जगणे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

असले कसले छळते जगणे

फसवा फसवी करते जगणे

*

नखरे करते तितके चुकते

चुकल्या वरती रडते जगणे

*

करुया म्हणते समता ममता

करते समयी फसते जगणे

*

धमकी मिळता बनते हळवे

हरलो म्हणते पळते जगणे

*

ठरल्या वरती बनते पणती

दूस-या करता जळते जगणे

*

जगता जगता हसते म्हणते

सजण्या करता नसते जगणे

*

घटको घटकी झिजते विरते

दमते शिणते मरते जगणे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares