मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #234 ☆ घातकी श्वास… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 234 ?

घातकी श्वास ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

येवढा विश्वास त्यावर, देह झाला दास होता

थांबलेला ऐन वेळी, घातकी तर श्वास होता

*

कोडमारा होत होता, मोडता चौकट न आली

उंबरा शालीनतेचा, माझिया दारास होता

*

पान मेंदीचे मनाला, भावले होतेच हिरवट

लाल केले हात त्याने, खेळला मधुमास होता

*

कंगव्याची पाच बोटे, मोगऱ्याने धुंद झाली

म्हणुन गजरा माळण्याचा, ध्यास ह्या केसास होता

*

चावुनी केला विड्याचा, तू जरी चोथा तरीही

रंगण्याचा छंद येथे, केवढा कातास होता

*

अन्नपूर्णा या घराची, रांधणारी वाढणारी

वैभवाचा वारसाही, आमच्या वंशास होता

*

चूल होती जाळ होता, होम होता पेटलेला

धूर राखेशी घरोबा, वाढलेला खास होता

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ २२ एप्रिल – वसुंधरा दिनानिमित्त – “वसुंधरा दिन…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ २२ एप्रिल – वसुंधरा दिनानिमित्त – “वसुंधरा दिन…” ☆ सौ राधिका भांडारकर 

वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन मंडेला यांनी मांडली. त्यांनी पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा ऱ्हास या मुद्द्यांवर तेथील सर्व थरातील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी वने, आणि वन्यजीव निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे राजकीय दबाव निर्माण झाला. आणि १९७० सालापासून अर्थ डे म्हणजेच वसुंधरा दिन २२ एप्रिल रोजी जगभर साजरा केला जातो.

वाढते प्रदूषण, विकासाच्या अवास्तव कल्पना, अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्यस्थिती मागील मुख्य कारण आहे. अवकाळी पाऊस, वाढते तापमान अकल्पित नैसर्गिक वादळे, भूकंप जंगलातले वणवे,भूजल पातळी खालावणे,  या सगळ्यांचं मूळ कारण म्हणजे पर्यावरणाचा न साधलेला समतोल.

माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू शकते पण लोभ नसावा अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. विकासाच्या भ्रामक कल्पनांपायी पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचारी वापर केल्याने वाढत्या प्रदूषणाचे परिणाम दिसत आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवी जीवनाचे भविष्य अंधकारमय आहे हे निश्चित. याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.

पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे याचे स्मरण करून देणे हे या वसुंधरा दिना मागचे उद्दिष्ट आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्वात मोठी भूमिका आहे ती जंगलची. मधल्या काही वर्षांमध्ये वाढती लोकसंख्या, वाढत्या गरजा, रस्ते, दळणवळण यानिमित्ताने प्रचंड वृक्षतोड झाली.  रानेच्या राने उद्ध्वस्त झाली. वन्य जीवांच्या वसाहती असुरक्षित झाल्या, पर्जन्यमान विस्कटले आणि सारा नैसर्गिक तोलच ढासळला. आता गरज आहे ती याविषयी अत्यंत सावध राहण्याची. पर्यावरण जागृती हा पृथ्वीवरच्या प्रत्येकाचा महामंत्र बनला पाहिजे.

 भरपूर झाडे लावा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गाने जंगलतोड वाचवा, पर्वत नद्या यांचा पर्यावरणातला सहभाग लक्षात घ्या, आणि त्यानुसार योग्य जीवनशैली राखून सर्वांगीण जागृती व प्रसार करणे ही या वसुंधरा दिन साजरा करण्यामागची खरी संकल्पना आहे.

प्लास्टिक आणि ई कचरा या सध्याच्या जागतिक समस्या आहेत. ज्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढत आहे. माऊस, कीबोर्ड, मोबाईलचे खराब झालेले स्पेअर पार्ट्स, किंवा सध्याच्या स्थितीत न चालणारी उपकरणे ही या ई कचरा प्रकारात येतात. जुन्या डिझाईनचे कम्प्युटर, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल आणि अन्य उपकरणे हा सुद्धा ई-कचराच आहे. हा कचरा जाळल्यास यातून निघणाऱ्या घातक वायूमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो.  शिवाय मानवी आरोग्यासाठीही हे धोकादायक आहे.

प्लास्टिक हे सर्वात घातक असे प्रदूषक आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस माऊंट एव्हरेस्ट पासून समुद्राच्या तळापर्यंत अनेक पर्यावरणीय कोनाड्यांचे प्लास्टिकने प्रदूषण केले आहे. प्राण्यांच्या अन्नामधून त्यांच्या पोटात प्लास्टिक जाणे अथवा ड्रेनेज सिस्टीम मध्ये अडकून सखलभागात पूर येणे, जागोजाग साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे परिसरातील सौंदर्य नष्ट होणे वगैरे अशा कितीतरी बाबींचा जाणीवपूर्वक आणि पर्यावरण पूरक अभ्यास हा झालाच पाहिजे आणि त्यावर उपाय यंत्रणा उभारली पाहिजे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने या महत्त्वाच्या समस्येवर प्रकाश टाकला जावा ही अपेक्षा.

हरितगृह वायू म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साईड, ओझोन व पाण्याची वाफ.  मात्र यांचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. यांचे वातावरणातले वाढते प्रमाण ही सध्याची ज्वलंत समस्या आहे. औद्योगिक क्रांती झाली, मात्र या हरितवायूंचा समतोल ढासळून पृथ्वीचे पर्यावरण धोक्यात आले आहे. जीवाश्म इंधन, (पेट्रोल डिझेल वगैरे) कोळसा, तेल, जंगलतोड, जमीन वापरातील बदल, मातीची धूप, शेती, पशुधन, घनकचरा, सांडपाणी या द्वारे मानववंशिक वायूंचे उत्सर्जन होते. पृथ्वीच्या वातावरणात होणारा बदल आणि उपरोक्त घटक यांचा समन्वय योग्य रीतीने साधला गेला पाहिजे.नुकतीच दुबईत झालेली ढगफुटी आणि प्रचंड पाऊस हा याचाच परिणाम असू शकतो. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या आणि पर्यायाने निसर्गनियमाच्या विरोधात केलेल्या खटाटोपाचाही हा परिणाम असू शकतो.

साऱ्या जगाचे डोळे आता उघडले आहेत. अनेक जागतिक परिषदा घडत असतात, उपाययोजनांचे आराखडे आखले जातात पण सारे फक्त कागदावर राहते. वसुंधरा दिनानिमित्त यावर प्रत्यक्ष ठोसपणे पाऊले उचलणे जरुरीचे आहे.

त्यासाठी आपण बरेच काही करू शकतो सर्व प्रसार माध्यमातून समाज जागृती करणे, पर्यावरण मित्र  गट बनवून प्रदर्शने, स्पर्धा, चित्रपटांच्या माध्यमातून प्रबोधन करणे, शक्यतो नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करणे, पर्यावरण संरक्षण संबंधित अभ्यासक्रम बनवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवणे वेळ पडल्यास सक्ती करणे.. अशा अनेक माध्यमातून प्रयत्न व्हायला हवेत.वसुंधरा दिनाच्या निमित्ताने निसर्ग संवर्धन व्हावे हीच अपेक्षा आणि एक महत्त्वाचं.. हे चरितचर्वण फक्त एका दिवसापुरताच मर्यादित नसावं तर ती मानवाची आचार संहिता ठरावी हा दुर्दम्य आशावाद बाळगूया.

वसुंधरा दिनाच्या पृथ्वीवासीयांना लाख लाख शुभेच्छा!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पायगुण – भाग- 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ पायगुण – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(तो भेटल्याशिवाय कोणताही उलगडा होणार नाही. मी योगेश भेटला की लगेच तुम्हाला सांगेन काय झालं ते! उगीच नको रडत बसू आई.”) – इथून पुढे 

अजिता हॉस्पिटलमध्ये गेली पण तिलाही चैन पडेना.हे काय झालं आणि यातून आता पुढे काय होणार याची तिलाही काळजी वाटायला लागली.लग्न ठरवून सहा महिने झाले,आपण दोघे सर्वस्वीअनुरूप आहोत, आपले स्वभाव जुळतातआवडीनिवडीसारख्याआहेत.आता हे काय  विघ्न मधेच?अजिताने दुपारी योगेशला फोन करायचे ठरवले.  शांतपणे ती आपल्या कामात गुंतून गेली.दुपारी योगेशचा तिला  फोनआला.  तिला म्हणाला, जरा बाहेर जाऊया जेवायला !अजिताला तो कारने न्यायला आला.हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन झाल्यावर म्हणाला,’अजिता!माझी आई तुमच्या घरी आली होती आणि काय काय बोलली ते तिनंच सांगितलं मला.

मला तर हे अनपेक्षितच आहे सगळं! माझ्या असं कधी मनात तरी येईल का?मला तू खूप आवडतेस आणि मी  मला भाग्यवान समजतो की अशी हुशार गुणी मुलगी मला मिळतेय.आईचं सोड तू!मी कधीही हे होऊ देणारनाही.आपलं लग्न होणार म्हणजे होणार.तुझ्यासारखी मुलगी टाकून दुसरी बघत बसायला मी मूर्ख नाही.तू क्षमा कर मला.तुम्हाला सगळ्याना खूप त्रास झाला असेल ना?माफ कर अजू मला!

योगेशच्या डोळ्यात पाणी आलं. शरमेने त्याचा चेहरा लाल झाला.

अजिता शांतपणे म्हणाली, “ थँक्स योगेश. आपण या सहा महिन्यात एकमेकांत खूप गुंतलो आहोत.हो ना?तू जर साथ देणारअसलास तर आपलं लग्न कसं मोडेल?शांत राहूया आपण.मला खूप धीर आला रे तुला भेटून.किती शहाणा आहेस तू. थँक्स योगेश.पण एक सांग, तुझ्या आईचा तू एकुलता एक मुलगा आहेस.त्यांच्या मनाविरुद्ध मी तुमच्या घरात आले तर माझं स्वागत कसं होणार? मला सतत जाणवत रहाणार की मी यांना नको असतानाही इथे आलेय!अजिता रडायला लागली.’मला काही सुचत नाही योगेश .मला तुला तुझ्या आईपासून तोडायचं नाहीये आणि तुला गमवायचंही नाहीये.” 

योगेश विचारात पडला. ‘ अजिता,आपण जरा वाट बघूया. आपली साथ घट्ट असणार हे कायम लक्षात ठेव. मीआणि तू कधीही वेगळे होणार नाही’. योगेश अजिताला  हॉस्पिटलला सोडून घरी गेला. अजिताने हे आईबाबांना सांगितलं. त्यांनाही आता हायसं वाटलं.

पण तरीही मनात धाकधूक होतीच की हे जे सुषमा बाई बोलल्या ते ठीक नाही झालं.

असा किंतु मनातअसताना आपल्या मुलीला तिथे सुख लाभेल का?काय कमी आहे अजितामधे?आता होईल ते बघत बसण्याशिवाय त्यांच्याही हातात काही नव्हते. अनपेक्षितपणे संध्याकाळी योगेशचे आजीआजोबा आणि बाबा अजिताच्या घरी आले.तिचे आईबाबा गडबडूनच गेले यांना असं अचानक बघून!या ना,म्हणत त्यांचे स्वागत केले दोघांनी. आजी म्हणाल्या’,मी पहिल्यांदा बोलते हं.हे बघा कुंटे, काल सुषमा तुमच्या घरी आली आणि जे बोलली ते आम्हाला अजिबात माहीत नव्हतं. आम्हाला तिचे विचार मान्य नाहीत.अहो, कसला पायगुण आणि कसले शुभ अशुभ हो? याच मुलीनं योगेशचे बाबा हॉस्पिटल मध्ये असताना रात्रंदिवस कष्ट घेऊन त्यांची सेवा केलेली आम्ही बघितली नाही का?उलट कौतुकच वाटले तिचे आम्हाला.ती या हॉस्पिटलमध्ये आहे म्हणूनच सगळ्या गोष्टी किती सुलभ झाल्या आम्हाला. ही अशी गुणी मुलगी आम्ही नाकारणे म्हणजे दारी आलेली लक्ष्मी नाकारण्यासारखे होईल.

“ कुंटे,तुम्ही आता हे लग्न लवकरात लवकर करून टाका.कशाला उगीच लांबवायचं ?योगेश आणि अजिता एकमेकांना अनुरूप  अनुगुणीही आहेत आणि त्यांचं प्रेमही जडलंय एकमेकांवर.तर लवकरचा मुहूर्त बघून आपण हे लग्न पार  पाडूया.अगदी हौसेने !”  अजिताच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला हे ऐकून.पण मग जरा  संकोचून बाबांनी विचारलं,पण सुषमाबाईना काय वाटेल?’

“ त्यांचं काय? ते  योगेश बघून घेईल.’आजोबा म्हणाले, लग्नानंतर योगेश आणि अजिता इथे आमच्याजवळ बंगल्यात रहाणार नाहीत. आमचा दुसरा मोठा फ्लॅट आहे,तिकडे ते राहिलेले उत्तम! म्हणजे कोणालाच कानकोंडे होणार नाही. नवीन लग्न होऊन येणाऱ्या अजिताला कोणाच्या मनाविरुद्ध आपण घरात आलोय, असं वाटता कामा नये. आणि हीही सूचना योगेशची आहे. हुशार आहे हो आमचा नातू.”  

आता योगेशचे बाबा म्हणाले, ‘ सुषमा जरा मागासलेल्या विचारांची आहे . आमचे आईबाबाच किती पुढारलेल्या विचारांचे आहेत तिच्यापुढे तुम्ही बघता आहातच. खरं सांगायचं तर तिला एवढी शिकलेली डॉक्टर सून नकोच होती. तिच्या मैत्रिणीची मुलगी फार मनात होती तिच्या सून म्हणून .पण योगेशने ठाम नकार दिला.मी माझ्याच व्यवसायातली मुलगीच माझी बायको म्हणून पसंत करणार हे त्याचे निश्चित होते.आम्हालाही ते मान्यच होते.पण घटना अशा घडल्या की बिचारी अजिता घरात येऊ घातली आणि दुर्दैवाने हे दोन अपघात म्हणा, प्रसंग घडले. मग तर सीमा आणि सुषमा हे लग्न नकोच व्हायला या निर्णयावर आल्या. त्या मायलेकी स्वभावाने अगदी सारख्या आहेत. पण माझा योगेश फार  गुणी आणि  मॅच्युअर्ड आहे .सुषमा तुमच्या घरी येईल आणि हे असं सगळं बोलेल हे आम्हाला कोणालाच माहीत नव्हते. तुम्ही प्लीज हे मनावर घेऊ नका.आम्हाला अजिता अतिशय आवडली आहे. मुख्य म्हणजे योगेश तिच्यावर मनापासून प्रेम करतो.  आपण मुलांची मनं नको का जाणून घ्यायला?काय कमी आहेतुमच्या अजितामध्ये?आम्ही तिलाआदराने  आणि प्रेमाने आमच्या घरी सन्मानाने आणणार सून म्हणून ! ‘ योगेशचे वडील  म्हणाले. अजिता आणि तिच्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी आले.आईबाबांची खात्रीच पटली,आपली अजिता योगेशच्या घरी सुखी होईलच.या मंडळींचं मनापासून कौतुक वाटलं  अजिताच्या आईबाबांना. अजिता तर थक्क झाली आजी आजोबांचे आधुनिक विचार बघून.  इतक्यात योगेशही आला अजिताच्या घरी.  झाली का मीटिंग आणि चाय पे चर्चा?आमच्या माँ साहेब नाही का आल्या?’ 

‘नाही बाबा ! त्यांना न सांगताच ही सभा भरलीय. काय करणार बाबा?आम्हाला तुमचं लग्न लावून द्यायचंय. त्यात बाधा नाही आणायचीय.’ 

योगेश म्हणाला, ‘आजी होईल ग सगळं  नीट. अजिता घेईल सगळं  सांभाळून.इतके पेशंट लीलया जिंकून घेणाऱ्या अजिताला आपल्या आईला आपलंसं करायला नक्की जमेल.थोडा वेळ देऊ या आपण सगळ्यांना. मला खात्री आहे,अजिता लाडकी सून होईल आपल्या आईची !’ कौतुकाने अजिताकडे बघत योगेश म्हणाला.  सगळी मंडळी गेल्यावर आईबाबांनी कौतुकच केले आपटे लोकांचे.आपली मुलगी चांगल्या कुटुंबात आणि मुख्य म्हणजे  अतिशय चांगल्या मुलाच्या हातात पडलीय  याची खात्री  पटली सगळ्यांना.आणि खूप  उत्साहाने अजिताचे आईवडील लाडक्या लेकीच्या लग्नाच्या तयारीला लागले.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– साधुसंत येती घरा… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – साधुसंत येती घरा… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त अनेकोत्तम शुभेच्छा 

(आदरणीय सुमित्राताई माझ्या शिवाजी पार्कच्या घरी प्रथम आल्यावेळी, आनंदाचं शिंपण करून गेल्या, त्यावेळची माझी भावना…)

पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांचा वारसा चालवणारी, त्यांची परंपरा जागवणारी आणि स्वतःही ती जगणारी; माझ्या नि अनेकींच्या आयुष्यातली – स्वाभिमानाने, व्रतस्थपणे कसं जगावं हे शिकवणारी, एक आदर्श, सोज्वळ, तेजस्वी, कर्तृत्ववान स्त्री….. ज्यांचं भाषण म्हणजे सदैव रंगलेली मैफल ! भारतातील राजकारणाचा, झाशीच्या राणीसारखा कणखर, करारी तरीही मृदु मुलायम आवाज….. लोकसभेच्या ‘स्पीकर’….  म्हणजेच ज्या आवाजाने भल्याभल्यांना “कृपया शांति रखिए…” असं म्हणत गप्प केलंय ! आणि जो हळवा, कोमल, आर्जवी आवाज, ज्यांच्यावर भारतरत्न आदरणीय अटलजींनी, मुलीप्रमाणे प्रेमाचा वर्षाव केला, ज्यांचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो, अशा सर्वांच्याच ताई….. आज माझ्या घरी येऊन आनंदाचं शिंपण करून गेल्या… ज्यांच्या जिव्हेवर सरस्वती वसली आहे, त्याचं प्रतिरूप म्हणजेच सुमित्राताई! यामुळेच मी ताईंना सुप्रसिध्द शिल्पकार आनंद देवधरांकडे घडलेली सरस्वतीची प्रसन्न आणि सुंदर मूर्ती भेट दिली! 

“ताई, तुम्ही माझ्या घरी स्मिताकाकूबरोबर प्रेमाने आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि प्रत्येक गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेतलात, याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय, जो शब्दांत वर्णन करणं शक्यच नाही. म्हणून म्हणावसं वाटतं, 

“साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा!”

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सद् रक्षणाय खलनिग्रहणाय ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ☆ श्री प्रसाद जोग

अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे — बलिदान दिवस १९ एप्रिल,१९१०

हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे,कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे या तिघांनी मिळून नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध दिनांक २१ डिसेंबर,१९०९ रोजी केला.

वध आणि खून दोन्हीचा शेवट मृत्यू असला तरी “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” म्हणून जी हत्या केली जाते तिला वध असे म्हटले जाते आणि वाईट प्रवृत्ती जेंव्हा हत्या करतात तेंव्हा खून केला असे म्हटले जाते.

तिघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक होते . १८९९ साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत ‘ या क्रांतिकारक संघटनेचे ते सदस्य होते . नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरूण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. फाशी दिली त्या वेळी त्यांचे वय अवघे १८ वर्षे होते.

गोल्फच्या बॉल ला हात लावला म्हणून जॅक्सनने नेटिव्ह माणसाला बेदम मारले त्या मध्ये त्यात त्याचा मृत्यू झाला,दुसऱ्या एका घटनेमध्ये वंदेमातरम म्हणणाऱ्या लोकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली पकडले होते,त्यांची वकिली करण्यासाठी बाबासाहेब खरे यांनी वकीलपत्र घेतले ,तर त्यांची सनदच रद्द केली आणि त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांना कैदेत टाकले.

बाबाराव सावरकर सातत्याने इंग्रज सरकारच्या विरोधात लिखाण प्रसिद्ध करत होते कवी गोविंद यांच्या रचना असलेले पुस्तक बाबाराव सावरकरांनी छापले, जॅक्सनने त्यांना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला,आणि त्यांनासुद्धा कैदेत टाकून त्यांची अंदमानात रवानगी केली.या सर्व घटनांची चीड येऊन या तिघांनी जॅक्सनला संपवायचे नक्की केले.

सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याना कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अश्या समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये ‘शारदा’ या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभा राहिले , त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च, १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल, १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.

“१९०९” या नावाने त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवला होता, तो २०१३ साली प्रदर्शित झाला. त्याचा टिझर मला यु ट्युब वर मिळाला, त्याची लिंक देत आहे

ठाण्याच्या तुरुंगात त्यांचे स्मारक केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील धगधगलेल्या यज्ञकुंडात तिघांची आहुती पडली आणि स्वातंत्र्य क्रांती पुढे वाट चालू लागली.

या तिन्ही थोर क्रांतिकारकांच्या स्मृतीला सादर प्रणाम … 

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मंदिर स्थळांचे रहस्य — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मंदिर स्थळांचे रहस्य — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

तुम्ही अंदाज लावू शकता का की या प्रमुख मंदिरांमध्ये काय सामान्य आहे:

  1. केदारनाथ,
  2. कलहष्टी,
  3. एकंबरनाथ- कांची,
  4. तिरुवनमलाई,
  5. तिरुवनाइकावल,
  6. चिदंबरम नटराज,
  7. रामेश्वरम,
  8. कलेश्वरम.

 ” सर्व शिवमंदिरे आहेत ” असे तुमचे उत्तर असेल, तर तुम्ही अंशतः बरोबर आहात.  प्रत्यक्षात ही मंदिरे ज्या रेखांशात आहेत.

 ” ते सर्व 79 ° रेखांशांमध्ये स्थित आहेत.”

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिरांच्या अनेक शेकडो किलोमीटरच्या वास्तुविशारदांनी जीपीएस शिवाय ही अचूक स्थाने कशी तयार केली.

  1. केदारनाथ 79.0669°
  2. कलहष्टी ७९.७०३७°
  3. एकंबरनाथ- कांची 79.7036°
  4.  ४. तिरुवनमलाई ७९.०७४७°
  5. तिरुवनैकवल 78.7108°
  6.  ६. चिदंबरम नटराज ७९.६९५४°
  7.  ७. रामेश्वरम ७९.३१२९°
  8. कलेश्वरम 79.9067°

नकाशा पहा. सर्व सरळ रेषेत आहेत.  

“केदारनाथ ते रामेश्वरम पर्यंत” सरळ रेषेत बांधलेली शिव मंदिरे भारतात आहेत.

ही मंदिरे 4000 वर्षांपूर्वी बांधली गेली होती.  मग, पाच मंदिरे इतक्या अचूकपणे कशी स्थापन झाली?    फक्त देवच जाणे.

केदारनाथ आणि रामेश्वरममध्ये 2383 किमी अंतर आहे.

ही सर्व मंदिरे 5 तत्वांची अभिव्यक्ती दर्शवतात, पंच तत्व (पांच तत्व), म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आणि अवकाश.

श्री कलाहस्ती मधील चमकणारा दिवा हा आकाशवाणी घटकाचे प्रतिनिधित्व करतो थिरुवनिक्काच्या आतील पठारातील वॉटर स्प्रिंग हे पाण्याच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते.

अन्नामलाई टेकडीवरील मोठा दिवा अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करतो.

कांचीपुरम येथील सँड्सचे स्वयंभू लिंग पृथ्वीचे घटक दाखवते.

चिदंबरम यांचे निराकार (निराकार) राज्य हे देवाच्या स्वर्ग (आकाश) घटकाचे प्रतिनिधित्व करत आहे.

आपल्या प्राचीन ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा आपल्याला अभिमान असायला हवा.  असे मानले जाते की ही केवळ 5 मंदिरे नाहीत तर “शिव-शक्ती अक्ष रेखा” या ओळीत अनेक आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महाकालचे देशभरातील सर्व ज्योतिर्लिंगांशी नाते आहे.

ज्योतिर्लिंगाचे अंतर आहे:

* उज्जैन ते सोमनाथ- 777 किमी

* उज्जैन ते ओंकारेश्वर – 111 किमी

* उज्जैन ते भीमाशंकर- 666 किमी

* उज्जैन ते काशी विश्वनाथ- 888 किमी

* उज्जैन ते मल्लिकार्जुन – 888 किमी

* उज्जैन ते केदारनाथ- 1111 किमी

* उज्जैन ते त्र्यंबकेश्वर – 555 किमी

*उज्जैन ते बैद्यनाथ- 1399 किमी

* उज्जैन ते रामेश्वरम- 1999 किमी

“उज्जैन हे पृथ्वीचे केंद्र मानले जाते.”  हिंदू धर्मामध्ये विनाकारण काहीही नव्हते.

सनातन धर्माचे 1000 वर्षांचे केंद्र म्हणून, उज्जैनमध्ये सूर्य आणि ज्योतिषाची गणना करण्यासाठी मानवनिर्मित साधन सुमारे 2050 वर्षांपूर्वी बांधले गेले होते

आणि, जेव्हा पृथ्वीवरील काल्पनिक रेषा सुमारे 100 वर्षांपूर्वी ब्रिटीश शास्त्रज्ञाने तयार केली, तेव्हा तिचा मध्य भाग उज्जैन होता. आजही उज्जैनमध्ये सूर्य आणि अवकाशाची माहिती घेण्यासाठी वैज्ञानिक येतात.

आपल्या शिव मंदिराविषयी ही खूप छान शास्त्रीय माहिती आहे. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘इमोशनल इंडिपेंडन्स…’ – लेखिका :श्रीमती मृदुल मृदू ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘इमोशनल इंडिपेंडन्स…’ – लेखिका :श्रीमती मृदुल मृदू ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

वयाच्या पंचेचाळीशीनंतर एक स्किल प्रत्येकाने आत्मसात करायला शिकलं पाहिजे ते म्हणजे…. emotional independance… म्हणजेच भावनिक दृष्ट्या समोरच्यावर अवलंबून राहणं हळूहळू सोडलं पाहिजे…

प्रेम द्यावं, care घ्यावी… पण मला कुणी प्रेम द्या, तर मी खूश, मला कुणी काही बोलाल तर मी रडणार, मला कुणी अपमानास्पद बोलाल तर मी ताबा सोडून रागात बोलणार, मला कुणी टाळलं की मी एकटं feel करणार, कुणी नीट बोललं नाही, की माझं मन वरखाली होणार आणि मी विचार करत बसणार की काय झालं असेल?… हे सगळं म्हणजे भावनिक दृष्ट्या आपण इतरांच्या प्रतिक्रियेवर आपलं मन अवलंबून ठेवणं आहे…हे थांबवायला हवं…

आपल्या खूश राहण्याचा आणि इतरांनी काही वागण्याचा अर्थाअर्थी संबंध नसतो … तो आपण लावतो.. बेसिकली, जग इकडचं तिकडे होवो, मी मेंटली स्टेबल राहणार, आनंदी राहणार, स्वतःला manange करत राहणार… हा एक निश्चय असतो, तो करायला शिकलं पाहिजे….

याने काय होईल?

1)लोकांमध्ये लक्ष लावून बसणं कमी होतं.

2) गॉसिप पासून आपण लांब राहतो.

3) आपल्याला खूश करण्यासाठी wrong कंपनी निवडण्यापासून आपण वाचतो.

4) कुणी कसंही वागलं तरी आपली मानसिक स्थिती ठीक राहते.

5) मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्येत पण ठीक राहते.

6) आपण स्वच्छ चष्म्याने सगळ्यांकडे पाहू शकतो कारण मला कुणाकडून काही नकोय, हे आपण मनातून ठरवतो.

7) यामुळे लबाड नाती आपोआप दूर राहतात, स्वार्थ नसताना जुळलेली नातीच खरी टिकतात.

8) कुणी कसही वागो, ती जबाबदारी त्यांची असते. त्यापायी आपण स्वतःला त्रास करून घेणं थांबवतो.

9)मनाची स्थिरता वाढल्याने आपण जास्त active आणि creative होतो, आनंदी राहून काम करतो.

10)एकटे आलो, एकटेच जाणार आहोत, या अंतिम सत्याला आपलंसं करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जातो…        

कुठेतरी आपण आणि दुसरे यात जी सीमा असते ती जाणून घ्यावीच लागते, या वयात ही detachment  जमू शकते कारण संसार निम्मा झालेला असतो(mostly).मुलं मोठी असतात, त्यांना आपापलं एक आयुष्य असतं. त्या पण दृष्टीने आपण त्यांच्यात ढवळाढवळ कमी करावी….

सगळ्यात महत्त्वाचं या वयाला आपली सेकंड इनिंग समजून काही चांगलं करण्यात मन रमवावं.

यासाठी emotionally independent असणं हे फायद्याचं ठरतं…. देवाघरी जाण्याआधी मन साफ करत जावं. ती process या वयात सुरू करावी… आपण स्वतःला माफ करावं, इतरांना माफ करावं आणि स्वतःला उत्तम कामामध्ये गुंतवून घ्यावं…. मदतीला तयार राहावं मात्र आपल्याला शक्यतो मदत घ्यायची नाही असं समजून स्वतःला सदृढ बनवावं मन आणि शरीराने…

याचा फायदा हा की चाळीशीपर्यंत भावनांमुळे आपल्याकडून झालेल्या चुका… किमान त्या नंतर आपण करणार नाही आणि एक stable शांत आणि समाधानी life जगण्यात एक पाऊल पुढे जाईल.

लेखिका :श्रीमती मृदुल मृदू

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ शब्द… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– शब्द – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

हरवलेल्या शब्दांनो,

या तुम्ही परत या |

रहाटगाड्यापासून मज,

काही क्षण दूर न्या |

*

शब्दांनो फुलागत सुंदर तुम्ही,

तुमचीच गुंफायचो माळ |

एक एक शब्द हसत यायचा,

जणू तुमच्याशी जोडली नाळ |

*

कामाचा उरक संपवता संपवता,

काही दिवस दूर तुम्हाला सारले |

दुरावा का असा आपल्यात यावा ,

कळेना माझेच मला ना स्मरले |

*

रोजच्या धकाधकीच्या गर्दीत,

तुमच्यामुळेच मिळतो एकांत |

छान गुफावून तुम्हाला एकत्र,

तेव्हाच माझा जीव होतो शांत |

*

काही कठोर, काही मृदू,

काही भावनिक घालतात साद |

काही उन्हात, काही पावसात,

लावून जातात मनासी नाद |

*

शब्द शब्द आणि शब्दच,

शब्दाविना प्रतिभेचे अधुरे प्रारब्ध  |

दूर जातात नकळत ते ,

संवादही तेव्हा होऊन जातो स्तब्ध |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 186 – शब्द दीप… ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण कविता – शब्द दीप।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 186 – शब्द दीप… ✍

मुट्ठियों से फिसली रेत की तरह

 फिसल गई एक सदी,

 बह रही है

एहसास की नदी ,

और मैं

नदी को भेंट कर रहा हूँ

अपने शब्द दीप

, मेरे शब्द दीप

लहरों की नाव पर

जाना उसे तट तक

जो मेरे लिए अगम्य  है ,

शायद वहां

उदासी का अंधेरा हो

और सन्नाटा

प्रतीक्षा बुन रहा हो।

ओ मेरे शब्द,

 तुम मोर पंख की तरह

 हौले से बुहारना,

अधरो का आंगन

अँजुरी में सहज लेना नयन जल

यहाँ खिल उठेगा

मेरे मन का शतदल कमल

© डॉ राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 187 – “बहुत गहरे तैरते…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत  “बहुत गहरे तैरते...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 187 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “बहुत गहरे तैरते...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

कैसे क्या खुद से

यहाँ ऊबे पिता जी ।

सुबह से अखवार

में डूबे पिताजी ॥

 *

बहुत गहरे तैरते

तल्लीन दिखते ।

साथ में अखवार

पर कुछ रहे लिखते ।

 *

जिन्दगी के अनुभवों

के संकलन ।

फलसफे संभाव्य –

मंसूबे पिताजी ॥

 *

थे बड़ी बर्दाश्त की

क्षमता निरंतर ।

दृढ़ सदा होती रही

जो आभ्यंतर ।

 *

यों सदा साहस व

मर्यादा समेटे,

भय रहित संकोच

के सूबे पिताजी ।

 *

वे रहे संघर्ष के

पर्याय शायद ।

रहे लड़ते दिलाने

को न्याय शायद ।

 *

वे नये सन्दर्भ में

पुरुषार्थ थे ।

नाम से थे निरंजन

दूबे पिताजी ।

©  श्री राघवेन्द्र तिवारी

22-03-2024

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print