☆ काय हवे? विद्वत्ता की चातुर्य? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
काय हवे:विद्वत्ता की चातुर्य?
*
माझे एक मित्र आहेत, नाव त्यांचे पंडित.
आणि या पंडित नावाच्या मित्राचा जेव्हा जेव्हा फोन येतो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात एक विचार येतो आणि लगेच कविवर्य मोरोपंतांच्या एका सुभाषितातल्या ओळींची आठवण होते:
”केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार।
शास्त्रग्रंथविलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार।।”
मी स्वतःशीच हसतो, कारण मोरोपंतांनी ‘पंडित मैत्री’तून मनुष्याला चातुर्य येतं असं सांगितलं आहे. गंमत थोडा वेळ बाजूला राहू देऊ पण माझ्या मनात एक प्रश्न नेहमी घोळत राहतो. तो हा की. मोरोपंत हे स्वतः इतके मोठे विद्वान असूनही त्यांनी या चार मार्गातून मिळणाऱ्या अंतिम फळाला ‘विद्वत्ता’ न म्हणता, ‘चातुर्य’ (Practical Wisdom) असे का म्हटले असेल बरं? त्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षाही काहीतरी अधिक महत्त्वाचे सांगायचे आहे, हे निश्चित!
येथेच विद्वत्ता आणि चातुर्य यातील सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक स्पष्ट होतो, जो जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. विद्वत्ता आणि व्यावहारिक चातुर्य यातील फरक स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट बऱ्याच वेळा सांगितली जाते. आपल्यापैकी बहुतेकांनी ती वाचलीही असेल. एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते. अनेक शास्त्र आणि ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता. एकदा ते नदी ओलांडण्यासाठी एका नावाड्याच्या बोटीत बसले.
नावेत बसल्यावर पंडितजींनी नावाड्याला विचारले, “अरे, तू कधी व्याकरण, तत्त्वज्ञान किंवा धर्मशास्त्र वाचले आहेस का? “
नावाड्याने नम्रपणे उत्तर दिले, “महाराज, मला हे काहीच माहीत नाही. “
पंडितजी उपहासाने म्हणाले, “तुझ्या आयुष्यातील पाव भाग तर व्यर्थ गेला! “
थोडे पुढे गेल्यावर नदीत अचानक वादळ आले आणि बोट डळमळू लागली.
घाबरलेल्या नावाड्याने पंडितजींना विचारले, “महाराज, तुम्हाला पोहता येते का? “
पंडितजी घाम पुसत म्हणाले, “मी फक्त शास्त्रे वाचली आहेत; मला पोहता येत नाही! “
यावर नावाड्याने शांतपणे उत्तर दिले, “महाराज, तुमचे तर पूर्ण आयुष्यच व्यर्थ गेले! कारण ही बोट बुडणार आहे. “
ही कथा आपल्याला सांगते की, केवळ ‘ज्ञान’ (विद्वत्ता) पुरेसे नसते, तर ते ज्ञान आणि त्यासोबत जगण्याचे ‘व्यवहारिक शहाणपण’ (चातुर्य) असणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्वान माणूस आपल्या विषयात पारंगत असतो, पण अनेकदा तो जगापासून, व्यवहारापासून आणि ‘लोकांच्या स्वभावा’पासून अनभिज्ञ असतो. तो आपल्या ग्रंथसिद्ध भूमिकेवर किंवा नियमांवर ठाम असतो. तो ‘जे योग्य आहे’ तेच करायचा हट्ट धरतो.
याउलट, चतुर माणूस लवचिक भूमिका घेतो. चतुर माणूस आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता परिस्थितीनुसार, वेळेनुसार आणि समोरच्या व्यक्तीनुसार आपली रणनीती बदलतो. ही लवचिकता म्हणजे नैतिकतेचा त्याग नव्हे, तर उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करण्याचे व्यावहारिक ज्ञान आहे. तो ‘काय करायचे आहे’ (Aim) यावर लक्ष केंद्रित करतो, तर विद्वान ‘कसे करायचे’ (Process/Rule) यावर ठाम राहतो. विद्वत्ता आपल्याला ज्ञान देते, पण चातुर्य आपल्याला ते ज्ञान वापरण्याची कला शिकवते.
मोरोपंत वरील श्लोकात चातुर्य मिळवण्यासाठी चार मार्ग सांगतात, आणि ते सर्व केवळ ग्रंथपठणाचे मार्ग नाहीत, तर प्रत्यक्ष जीवनातील अनुभवाचे मार्ग आहेत: देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार आणि शास्त्रग्रंथविलोकन. या चार क्रियांमध्ये मोरोपंत केवळ शास्त्रग्रंथ वाचून पांडित्य मिळवण्याऐवजी, देशाटन, मैत्री आणि सभेतला संचार यांसारख्या प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारी चातुर्य प्राप्त करण्यावर भर देतात.
चांगदेव महाराजांनी तब्बल १४०० वर्षे तपश्चर्या केली. त्यांची प्रचंड विद्वत्ता आणि कठोर साधना यामुळे लक्षात येते. मात्र, ज्ञानेश्वरांना पाठवलेल्या पत्रात मायना काय लिहावा हे एवढ्या मोठ्या विद्वान संताला कळू शकले नाही. जेव्हा ते संत ज्ञानेश्वरांना भेटायला वाघावर बसून आले, तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांना चक्क भिंत चालवून प्रती-उत्तर दिले. १४०० वर्षांच्या तपश्चर्येनंतरही त्यांना व्यावहारिक शहाणपण (चातुर्य) आले नव्हते, हे या प्रसंगातून स्पष्ट होते.
बिरबल हा अकबराच्या दरबारातील ‘विद्वान’ असण्यापेक्षा ‘चतुर’ (Wise) म्हणून अधिक प्रसिद्ध होता. त्याने दरबारातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी मानवी स्वभावाचे अचूक निरीक्षण केले आणि हजरजबाबीपणा वापरला. मानवी मनाचा त्याचा अभ्यास उत्तम होता. त्याचा वापर करण्यातून त्याचे चातुर्य दिसून येते.
श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे चातुर्याचा आदर्श नमुना आहे, कारण त्यांनी वेळप्रसंगी घेतलेली लवचिक भूमिका. जेव्हा त्यांना जाणवले की बलवान अशा जरासंधासमोर उघडपणे टिकाव लागणे शक्य नाही, तेव्हा त्यांनी आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी मथुरेहून द्वारकेला स्थलांतर केले. त्याचप्रमाणे, कालयवनापासून बचाव करण्यासाठी त्यांनी रणांगणातून पळ काढला आणि प्रसंगी ‘रणछोड’ हे नाव आनंदाने स्वीकारले. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने ‘युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म’ म्हणून लढून प्राण दिला असता; पण श्रीकृष्णाने तत्त्वांची तडजोड न करता धर्माचे रक्षण करण्यासाठी रणनीतीत लवचिकता आणली. अशा प्रकारची लवचिकता छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा अनेक प्रसंगात दाखवली. परंतु महाभारत युद्धात भीष्माचार्य, द्रोणाचार्य किंवा कृपाचार्य यांना ती दाखवता आली नाही. आपल्या तत्त्वांना किंवा प्रतिज्ञाला थोडी मुरड घालून त्यांनी अधर्माची बाजू सोडली असती तर त्यांच्यासारखे महान कोणी ठरले नसते. परंतु तसे न केल्यामुळे त्यांचा रणांगणामध्ये अंत झाला. अगदी रामायणातील हनुमान सुद्धा चातुर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ही सांगितलेली सगळी माणसे विद्वान, बुद्धिमान तर होतीच परंतु विद्वत्ता आणि चातुर्य त्यांच्या व्यक्तिमत्वात हातात हात घालून चालत होते. आणि नेमके हेच आपल्या शिक्षण पद्धतीने करणे अपेक्षित आहे.
आजच्या शिक्षण पद्धतीकडे पाहता अनेकदा असे जाणवते की, आजची शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना ज्ञान देते, पण त्यांच्यात व्यावहारिक शहाणपण निर्माण करण्यात कमी पडते. (Knowledge comes but wisdom lingers) अशी परिस्थिती निर्माण होत आहे. पुस्तकी ज्ञान (विद्वत्ता) मिळते, पदवी मिळते पण मिळालेले ज्ञान कसे वापरावे याचे व्यावहारिक शहाणपण (चातुर्य) येण्यास वेळ लागतो.
मोरोपंतांनी याच व्यावहारिक चातुर्यावर भर दिला. म्हणूनच, ते आपल्याला ‘विद्वान’ होण्यापेक्षा ‘चतुर’ (Wise) होण्याचा संदेश देतात. जीवनात पुढे जाण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, आणि आनंदी राहण्यासाठी ही व्यावहारिक बुद्धिमत्ता किंवा चातुर्यच खरे उपयुक्त ठरते.
आज आपल्या हातात माहितीचा अपार साठा आहे, ज्ञानाचे दरवाजे उघडे आहेत; पण जीवन जगताना, निर्णय घेताना, नाती सांभाळताना, आणि संकटांचा सामना करताना आपल्याला मदत करते ते चातुर्य, म्हणजेच व्यावहारिक शहाणपण. मोरोपंतांनी शतकांपूर्वी दिलेला संदेश आजही तितकाच लागू आहे — विद्वत्ता महत्त्वाची आहेच, पण चातुर्य त्याहूनही महत्त्वाचे!
म्हणूनच,
चला, फक्त जाणकार न बनता, जाणिवेने वागणारे बनूया!
फक्त माहिती गोळा न करता, त्या माहितीचे जीवनात रूपांतर करू या!
(गौरीला फार वाईट वाटायचं. या सुंदर मुलीच्या नशिबी हे सुख लिहायला देव कसा विसरला. का असा शाप या निष्पाप जिवाला? ” गौरीच्या जिवाला घोर लागायचा.)
इथून पुढे – –
आता प्रसन्न रिटायर झाला. आजपर्यंत त्या दोघांना कुठेही ट्रीपला, बाहेर जाता आलं नाही.
यावेळी मात्र गौरी म्हणाली, “ आपण जाऊया ना हो एकदा तरी परदेशी ट्रीपला. कधीही गेलो नाही आपण दोघेच असे. आपल्या सोसायटीतल्या बर्वे गोखले फॅमिली जात आहेत दोघे दोघे. जायचं का आपण? ”
प्रसन्न म्हणाला, ”अग पण मग विभाचं काय करायचं? का तिला घेऊन जायचं? ”
“नको नको. आपणच जाऊ की हो फक्त दोघे. फक्त एकच महिन्याचा प्रश्न आहे. येताना आपण माझ्या मावस बहिणीकडे पण लंडनला जाऊन येऊ. किती वर्षे ती तिकडे आहे आणि आपल्याला बोलावतेय की. असे फक्त महिनाभर जाऊन येऊया. मी शुभाला विचारू का? विभाला महिनाभर ठेवून घेतेस का तुझ्या घरी? ती नाही म्हणायची नाही असं वाटतंय. ”
प्रसन्न म्हणाला, “ बघ विचारून. पण जमणार नसेल तिला तर मग आपल्याला जाता येणार नाही गौरी.”
शुभाचा बंगला मोठा होता. मागे पुढे अंगण, छान बाग, मागे झोपाळा. नशीब काढलं होतं शुभानं. गौरीच्या मनात आलं.
गौरी शुभाच्या घरी गेली. शुभाला सुट्टीच होती त्या दिवशी. तिच्या सासूबाईंनी स्वागत केलं शुभाचं.
”या या गौरीताई. किती दिवसानी आलात. साहिल ची आठवण येते की नाही? बघा तरी किती गुंड झालाय हल्ली.” साहिलला झोपाळ्यावर घेऊन बसत त्या हसून म्हणाल्या.
गौरी हसत म्हणाली ”नाही कशी येत या गुंडूची आठवण.. पण शुभा आणते ना दर रविवारी त्याला. रमतो अगदी तो “
गौरी आत गेली. शुभाच्या बेडरूममध्ये दोघी बसल्या.
“काय ग आई? आज अचानकच? ”
“शुभा, तुला एक विचारायचं होतं. अग आपल्या सोसायटीतली जोडपी चालली आहेत युरोप ट्रिप ला. आम्हाला आग्रह करत आहेत या म्हणून. मग तसेच लंडनला तुझ्या शशीमावशीकडे जाऊन येऊ.
तर तो महिना विभा तुमच्याकडे राहू देत का? म्हणजे मला अजिबात तिची काळजी रहायची नाही. तिला एकटीला कशी सोडू आपल्या घरी मी? ” गौरीच्या डोळ्यात पाणी आलं.
शुभा तिच्याजवळ बसली. ”आई, जरूर जा तुम्ही. मी नक्की संभाळीन विभाला. त्यात काय एवढं ग? सासूबाई पण नाही म्हणणार नाहीत. एकच महिन्याचा तर आहे ना प्रश्न? जा तुम्ही. तसेही तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही ग विभामुळे. ओळखीचे लोक जात आहेत तर जरूर जा.”
निर्धास्त होऊन गौरी घरी आली.
संध्याकाळी शुभाने समीरला सांगितलं. ” आपल्याकडे विभाला महिनाभर येऊ दे ना? आईबाबांना बिचाऱ्यांना कधीच कुठं जाता येत नाही. मी हो म्हटलं म्हणून तू रागावला नाहीस ना समीर? ”
समीर म्हणाला, “फार गुणी आहेस तू शुभा. याच तुझ्या सरळ साधेपणावर मी भाळलो ना? अग येऊ दे तिला. मी कसा रागावेन तुझ्यावर?”
आणि मग गौरी प्रसन्न निर्धास्त मनाने, विभाला शुभाकडे पोचवून ट्रीपला गेले.
शुभाच्या सासूबाईंना विभा आलेली फारसं रुचलं नाही असं वाटलं शुभाला. एरवी त्यांचं आणि शुभाचं अतिशय पटायचं. होत्याच त्या हुशार आणि मनमिळाऊ. शुभा सारखी गोड मुलगी घरात आल्यावर त्यांना आनंदच झाला. समीर एकुलता एक असल्याने त्यांची मुलीची हौस राहिलीच होती. दोघी सासू सुना खूप मजा करत. खरेदी करायला बरोबर जात. हॉटेलात दोघीच जाऊन छान एन्जॉय करत. कदाचित आपण त्यांना न विचारताच विभाला इकडे आणलं म्हणून त्यांना राग आला असेल असं म्हणून शुभाने तो विषय कानामागे टाकला.
विभा पहिल्यांदा बुजली पण मग रुळली शुभाच्या घरात. छोटा साहिल तर सतत तिच्या बरोबर असायचा. त्याला घेऊन ती झोपाळ्यावर बसली की सासूबाई काहीतरी काम काढून तिच्याजवळ बसायच्या. न जाणो, चुकून तो हिच्या हातून पडला तर?
त्या दिवशी शुभाला ऑफिस चं काम होतं म्हणून ती ऑफिसला गेली आणि समीर घरीच होता. विभा एकटीच बागेत झोपाळ्यावर बसली होती. मोठे झोके घेत असताना तिची ओढणी वाऱ्यावर उडत होती. केस मोकळे सुटून झोक्याबरोबर पंख्यासारखे पसरत होते. तिचा चेहरा आनंदाने फुलून लालबुंद झाला होता नुसता. अनिमिष डोळ्यांनी समीर तिच्याकडे बघत उभा होता. काहीतरी कामासाठी सहज बागेत आलेल्या सासूबाईंनी समीरकडे बघितलं. विभाकडे बघत असलेली त्याची नजर त्यांना वेगळंच सांगून गेली. आपल्या आईची चाहूल लागताच, तिची नजर चुकवत समीर घरात निघून गेला. सासूबाईंच्या पोटात धस्स झालं पण तरीही असं नसेल म्हणून त्यांनी आपल्या मनाची समजूत घातली. विभाचं अप्रतिम लावण्य कोणालाही भुरळ घालेल असंच होतं.
त्या दिवशी ती बागेत झाडांना पाणी घालत होती. तिचा घरातलाच गाऊन भिजून गेला होता. वर खोचलेल्या गाऊन मधून तिचे गोरेपान नितळ गुडघे आणि पोटऱ्या दिसत होत्या. पुन्हा एकदा सासूबाईंना समीर तिच्याकडे भान हरपून बघताना सापडला. पुन्हा त्यांची नजरा नजर झाल्यावर समीर आत निघून गेला. आता मात्र सासूबाई बेचैन झाल्या. चाणाक्ष आणि अनेक पावसाळे बघितलेल्या त्या बाईना हे लक्षण ठीक दिसलं नाही.
त्यांना शुभाशी एकटीला बोलायची संधी मिळत नव्हती. अचानक, त्या दिवशी समीर घरी नव्हता पण शुभा घरात एकटी होती. , साहिलला घेऊन त्याला संभाळणारी मुलगी आणि विभा बागेत गेल्या होत्या. सासूबाईंनी शुभाला हॉल मध्ये बोलावलं.
“शुभा, जरा आपला चेहरा आरशात नीट बघितला आहेस का? किती ओढलेला चेहरा, हे कळकट गाऊन, कधी केस नीट शेप देऊन कापलेले नाहीत. बघते आहेस ना?”
हसून जवळ बसत शुभा म्हणाली, “ हे काय आज सासूबाई? मी नेहमीचीच तर आहे तुमची शुभा”
सासूबाई गंभीरपणे म्हणाल्या, ”हो. पण गोष्टी बदलण्याच्या आत डोळे उघडून बघ बायो. तू विभाला घरी आणलं आहेस ते चांगलंच केलंस. ती आणि तू जुळ्या बहिणी ना? तिचा चेहरा, कांती रूप बांधा कुठेही जराही धक्का लागलेला नाहीये. आणि तू? बघ निरखून स्वतःकडे शुभा. तिची थोरली बहीण दिसतेस तू हल्ली. ”.. त्यांनी काय झालं आणि स्वतः पाळत ठेवून बघितलेलं तिला सांगितलं.
“ शुभा, माझा मुलगा लाखात एक आहेच ग. पण शेवटी तो पुरुष आहे बाळा. त्या रूपाचा त्याला मोह पडणारच. ती आहेच तशी अप्सरा. हे बघ माझ्या सुने, काही विपरीत घडायच्या आत ही जोखीम तू आईबाबांकडे नेऊन पोचवावीस हे उत्तम. दोन दिवसात ते येत आहेत ना? आता हिला अजिबात जास्त ठेवून घेऊ नकोस. तिला बुद्धी कमी आहे, समज उणी आहे हे असलं तरी तारुण्य मुसमुसतं आहे नुसतं. पुरुषाला हेच फक्त हवं असतं मुली. फक्त सुंदर शरीर. तू वेळीच शहाणी हो. विपरीत घडूच देऊ नकोस. अग बाईसारखी बाई असून मला तिच्याकडे बघावंसं वाटतं, तर समीर तर पुरुष आहे बेटा.
हा जळता निखारा घरी आणून आपल्याच सुखी संसाराला आग नको लावू शुभा. पटतंय का? आणि आत्ताच नव्हे तर पुन्हा कधीच आणून विषाची परीक्षा बघू नकोस मुली. अडचण असली तर तू माहेरी रहायला जात जा पण ही जोखीम इथे आणू नकोस. ”
.. शुभा तिथून उठून गेली.
रात्री तिने निष्पापपणे झोपलेल्या आपल्या बहिणीकडे बघितलं. झोपेत तिचा गाऊन वर गेला होता आणि मांड्या उघड्या पडल्या होत्या. केस डोळ्यावर महिरप करत होते आणि निरागस विभा झोपेत हसत होती. शुभाने तिचा गाऊन खाली केला. हळुवारपणे तिला मायेने पांघरूण घातले. अत्यंत प्रेमाने तिचा पापा घेतला. सगळ्या जगाची माया तिच्या पोटात दाटून आली. या भाबड्या जिवासाठी तिचा जीव नुसता कासावीस झाला.
दुसऱ्याच दिवशी शुभाने विभाला मार्केटमध्ये नेले. ती अगदी हरखून गेली. तिला शुभाने कितीतरी छान ड्रेस गाऊन, कायकाय तरी घेऊन दिले. नव्या लेदरच्या बॅगमध्ये हे सगळं भरलं.
“सासूबाई, आज विभाला आईबाबांकडे पोचवून येते हं. ” भरल्या डोळ्यांनी शुभा म्हणाली.
तिने त्यांना मिठी मारली. “ थँक्स थँक्स सासूबाई. माझ्या हे कधीही लक्षात आलं नसतं हो. जग माझ्या सारखं सरळ साधं आहे असंच वाटतं हो मला. पण तुम्ही किती शहाण्या आहात. थँक्स. मला सावध केल्याबद्दल. आणि वेळीच माझा संसार वाचवल्या बद्दल पण. मी आता जरा स्वतःकडे पण लक्ष देईन “.
शुभाने आपली कार काढली आणि विभाला शेजारी बसवून म्हणाली,
“ चला! जायचं ना आपल्या आईबाबांकडे?”
– – आणि वळणं घेत शुभाची कार माहेरच्या रस्त्याला लागली.
गावाला प्रायमरी शाळेत असताना बुधवारची आम्ही वाट बघत असायचो, कारण ह्या दिवशी आठवडी बाजार असायचा. दर बुधवारी आमची सकाळची शाळा असायची. आणि ती सकाळी दहाला संपायची.. त्यामुळे बुधवार हा आमच्यासाठी भारी असायचा. आमचं गाव परिसरात मोठं असल्याने आजूबाजूच्या पंचवीस तीस खेड्यातून या ठिकाणी बाजारासाठी लोक यायचे. हा काळ साधारण ९० च्या दरम्यानचा आहे. तेव्हा बरेचसे लोक बैलगाडी.. रेंग्या.. दमणी.. सायकलने.. पैदल.. असे ह्या बाजारात दाखल व्हायचे.
बैलगाड्यांनी येणारा शेतकरी वर्ग गावाच्या बाहेर असलेल्या एका पटांगणामध्ये आपापल्या बैलगाड्या ‘पार्क’ करायचा. तिथे बैलांना चारापाणी घालून.. ते कासऱ्याच्या साह्याने चाकालाच बैलांना बांधून ठेवायचे. मग आपापल्या पिशव्या.. पोते.. विकायला आणलेलं जे काय सामान.. असेल ते घेवून ही मंडळी आठवडी बाजारात पोहोचायची.. काहीजण आपल्या सोबत तंबू किंवा राहूट्या आणायचे.. ऊन पावसापासून वाचण्यासाठी तसेच मालाचे रक्षण करण्यासाठी या तब्बूंचा.. राहूट्यांचा उपयोग व्हायचा.. काहीजण मात्र बाजाराच्या साथीमध्ये खाली पोतं टाकूनच आपलं दुकान थाटायचे!
इकडे बसस्टॉपवर मात्र खचाखच भरून आलेल्या गाड्या.. जिपा.. मेटॉडोर.. ट्रक आणि बसेस ह्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं असायचं. प्रत्येकाची सामान खाली उतरवण्याची घाई असायची.. ह्या दिवशी हमाल कमी पडायचे.. गावातील ठरलेले मुलं दोन-तीन चा ग्रुप करून भरपूर कमाई करायचे.. तालुक्याच्या ठिकाणाहून आलेले व्यापारी अशा मुलांना पकडून आपापला विक्रीचा माल ठरलेल्या बाजारओट्यापर्यंत पोहोचवून घ्यायचे.. त्यासाठी मुलं मागील तेवढी रक्कम व्यापारी देत असतं. विशेषता ‘झाडी’तून म्हणजे भिशी, चिमूर, नांद इथून येणारा तांदूळ हा मोठ्या प्रमाणात मेटॅाडोर मधून यायचा.. तो तंबूमध्ये थप्पी थप्पी ने लावण्यासाठी खूप दणकट असे हमाल लागायचे.. त्यासाठी ह्या मुलांना मोबदलाही भरपूर मिळायचा.
बाजाराची सुरुवातच मुख्यतः देशी दारूच्या दुकानापासून व्हायची.. त्यामुळे हौसे, नवसे, गवसे, आठवडी बाजारासाठी आणलेला पैसा बऱ्याचदा तिथेच खर्च करून दिवसभर बाजारात बोंबलत फिरायचे. काहीजण सट्टापट्टीच्या नादी लागून नंबरगेम मध्ये अडकायचे.. तर काही मित्रासोबत शेवचिवडा, आलूबोंडे, भजे खात हॉटेलिंग करायचे..
तिथून पुढे कपडे वाल्यांची रांग सुरू व्हायची.. त्या ठिकाणी गरीब, मजूर लोकं आपल्या मुलांसाठी आंगळ टोपडं खरेदी करायचे. सोबत आलेली पोरं आई-वडिलांकडे आईसप्रोटसाठी हट्ट धरायचे.. आंगळ टोपडं आणि सोबत आईसप्रोट मिळाल्यामुळे मुलांचा बाजार मस्त झालेला असायचा.. ते दिवसभर मग आईच्या मागे मागे बाजार भर फिरायचे. काही फुगेवाले, खेळणीवाले दुकानदार सायकलवर आपला व्यवसाय करायचे.. त्यांच्या सायकलला लावलेले भोपू वाजल्यावर मुलं फुगे किंवा खेळणीसाठी रडारड करायचे.
पुढे भुसार मालाची म्हणजे धान्य, डाळी, गहू, ज्वारी इत्यादींची ओळ होती.. त्या ठिकाणी शेतकरी बायका घमेल्यामध्ये किंवा एखादं दुसऱ्या पोत्यामध्ये आपल्या शेतात पिकलेलं वरील प्रकारचे कोणतेही धान्य घेऊन बसायच्या.. एक दोन तासात ते सर्व धान्य विकल्यावर मिळालेल्या पैशांमध्ये आपला आठवडी बाजार करायच्या!
अजून थोडं पुढे गेल्यावर मात्र ठोक व्यापारी व त्यांची दुकाने असायची.. त्यामध्ये तेलाचे व्यापारी, गुळाचे व्यापारी, चिकन सुपारी व्यापारी, सोन्या चांदीचे व्यापारी, आपापल्या दुकानात नोकर चाकरासह बसलेले असायचे.. ह्या ठिकाणचा मोठा व्यापार.. मोठी उलाढाल व त्यातील ग्राहक सुद्धा ठरलेले होते.. गरीब, मजूर ह्या मोठ्या दुकानांमध्ये जायची हिंमत करायचा नाही..
पुढे गेल्यावर बांबू पासून तयार केलेल्या टोपल्या.. तट्टे.. चटया.. ढोल्या.. इत्यादीसह त्या ठिकाणी लाकडाचे मोठमोठे फाटे.. वासे.. मयाली.. दरवाजे.. खिडक्या.. विकायला ठेवलेल्या असायच्या.. ज्याच्या कुणाच्या घराचे बांधकाम चालू आहे, असे लोक या ठिकाणी येऊन सौदेबाजी करून हा फौजफाटा घेऊन जायचे..
बाजारातला मुख्य रस्ता दुतर्फा हॉटेल.. पानठेले.. कृषी केंद्र. सायकल मार्ट.. किराणा.. कापडाचे मोठे व्यापारी. मिठाईची दुकाने.. फरसाण.. मुरमुरे फुटाणे.. गळ्यातलं नाकातलं विकणारे.. सलूनवाले.. प्रेसवाले.. टेलरिंग कामवाले.. मोटर रिवाइंडिंगवाले.. इलेक्ट्रिकल दुकान.. हार्डवेअर इत्यादींनी सजलेला होता. ही गावची आणि बाजारातली मुख्य लाईन होती. ह्याच ओळीमध्ये जर्मन पितळेची भांडे विकणारे व्यापारी तसेच शेवटी शेवटी कुंभाराची रांजण, गाडगे, मडके विकण्याची जागाही होती..
मासे, मटण, डुक्कर, भाजल्या मासळ्या, झिंगे, इत्यादी मांसाहारी पदार्थासाठी बाजारात एक कोपरा ठरवून दिला होता.. त्या ठिकाणी लाकडाच्या तीपाईवर लटकवलेल्या बोकडाची.. डुकराची.. उलटी टांगलेली शरीरे.. तसेच खाली घमेल्यामध्ये जमा केलेल्या रक्ताची.. शिवाय माशांची.. खेकड्यांची.. मिळून एक अजब प्रकारची दुर्गंधी वजा हवीहवीशी वाटणारी बाजाराची खास ओळखही होती.
तिथून पुढे लागूनच गरम मसाल्याची दुकाने यात मीरे, दालचिनी, लवंग, तिखट, मीठ, हळद, घरचे कुटलेले मसाले, अद्रक, लसूणासह अनेकानेक जिभेचे चोचले पुरवणाऱ्या वस्तू मिळायच्या.. त्याला लागूनच पुढे शाकाहारी म्हणजे शेतकऱ्यांचा भाजीपाला वांगे, टोमॅटो, कोबी, गवार, फुलकोबी, पालक, मेथी, इत्यादीसह कांदे, बटाटे विकणाऱ्यांची पालं किंवा तंबू होते. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या मोसमात या ठिकाणी दूरवरून येणारे सर्व प्रकारचे आंबे मिळायचे.. त्यानंतर उंदीर मारण्याचं औषध विकणारे.. जडीबुटीवाले.. तवा, कढई, तलवार, चाकू, पोळपाट, लाटणं, इत्यादी तयार करणारे शीख म्हणजे सरदार लोकांचे तंबू असायचे.
नदीच्या पलीकडे पारध्यांनी आणलेल्या लावा, तीतरं, कबूतरं, इतर पक्षी, हरीण, ससे, ईत्यादी ह्या बाजारात मिळायचे.
बाजारात फक्त उलाढाल.. व्यापार.. पैशाची देवाणघेवाण.. एवढेच होत नव्हते तर ह्या ठिकाणी वीस-पंचवीस गावातला संवाद.. भेटीगाठी.. नातेसंबंध.. सुखदुःखाच्या बाता.. निरोप.. विरह.. देवाणघेवाण.. इत्यादींचाही ऊहापोह व्हायचा.
सायंकाळच्या वेळी उरलीसुरली दारू पिऊन एखादं दुसरे भांडण.. किंवा मारामारी हा ठरलेला कार्यक्रम असायचा! सगळ्यांची घरी परतण्याची घाई असायची.. गावातलं कोणी मागे राहिला कां? ठरल्यानुसार सगळ्या वस्तू खरेदी केल्या कां? किती नफा किती तोटा झाला? इत्यादींच्या चर्चा.. गप्पा मारत दहा-बारा किलोमीटर वरून आलेली मंडळी भरभर पैदल.. बैलगाडीने.. नाही तर कुणी आणलेल्या वाहनाने.. आपापल्या गावी परतायची, ती आठवडाभरानंतर पुन्हा एकत्र येण्यासाठी..
आता आठवडी बाजाराची वाट पहावी लागत नाही.. सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे.. स्वीगी.. झोमॅटो.. ॲमेझॉन रिलायन्स बाजार.. आपल्या घराच्या आत घुसलेला आहे.. आठवडाभर थांबायला कुणाला फुरसत नाही वेळ नाही.. एकमेकांशी बोलायला तर मुळीच नाही.. गाडीघोडा सगळ्यांकडे उपलब्ध आहे.. त्यामुळे आठवडी बाजाराची वाट पाहायची गरज नाही.. त्यामुळे संवाद नाही.. भेटणं नाही.. विरह नाही.. सुख दुःख नाही.. कुणाचचं कुणाला घेणंदेणं नाही.. त्यामुळे केवळ दोन दशकात बदललेल्या आठवडी बाजाराच्या ह्या स्वरूपाचं आणि अशा कित्येक नामशेष होत चाललेल्या चांगल्या परंपरांचा -हास होताना बघून मन भरून येतं.. गदगदून जातं..
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ती सूत्र क्र. ३०.
स्वयंफलरूपतेति ब्रह्मकुमाराः ॥ ३० ॥
अर्थ: ब्रह्मदेवाचे पुत्र (सनकादिक तसेच नारद) भक्ती स्वयंफलरूप आहे असे म्हणतात.
विवेचन : भक्ती ही साधन मानली तर तिचे महत्त्व राहणार नाही. तसेच तिला ज्ञानादिकाचे साध्य मानले तरी पारतंत्र्य प्राप्त होते किंवा अन्योन्याश्रयत्व दोष प्राप्त होतो हे पूर्वीच्या सूत्रावरील विवरणात सांगितले आहे. ही दोन्ही मते नारदांना मान्य नसावीत म्हणून या सूत्रात नारद म्हणतात, ती स्वयंफलस्वरूप आहे.
भक्तीची स्वयंफलरूपता नारदांनी सूत्र सव्विसाव्यात ‘फलरूपत्वात्’ म्हणून सांगितलीच आहे. सनकादिक व नारद या उभय ब्रह्मकुमारांच्या मते भक्ती ही कोणाचे साध्य नाही व कोणाचे साधन नाही; ती स्वतःच फलस्वरूप आहे, तीच साध्य व तीच साधन आहे. ज्ञानाने भक्ती किंवा भक्तीने ज्ञान हे मत त्यांना मान्य नाही. ती स्वयंफलस्वरूपा कशी आहे याचे विस्तारपूर्वक विवरण, सव्विसाव्या सूत्रावर केले गेलेच आहे. कोणी म्हणेल की कोणते तरी साधन केल्याविना भक्ती तरी कशी प्राप्त होणार? कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्याबद्दल मत प्रगट करणे अन्यायकारक होऊ शकते. आपण नामस्मरण भक्तीचे उदाहरण पाहू. कोणतेही नाम घेताना, कोणालाही सुरुवातीला त्याचा कंटाळाच येतो, हा जवळजवळ सर्वांचा अनुभव असेल. पण श्रीयुत तुकाराम आंबिले यांना त्यांच्या गुरूंनी स्वप्नात नाम दिले. त्यांनी त्या नामाचा घोषा लावला….! न कंटाळता, न थकता, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करीत, अगदी भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन नाम घेतले…..! शेवटी एक वेळ अशी आली की श्री. तुकाराम आंबिले यांचे #”आकाशा एवढ्या तुक्यात”# रुपांतरण झाले….! हे सर्व परिवर्तन निव्वळ नामस्मरणाने झाले असे संत तुकाराम महाराज यांचे चरित्र वाचले की लक्षात येईल.
सामान्य मनुष्याच्या अंगी असलेल्या उपजत *गुणां*मुळे त्याच्यात भगवद्विमुखता, विषयवासना, अश्रद्धा हे असे अनेक रोग असतात, त्यामुळे त्याला भक्तीमार्ग गोड लागत नाही. पूजेत, भजनात, ध्यानात आनंद होत नाही; रुची निर्माण होत नाही. याचे औषधही हेच आहे की नामस्मरण सतत करीत राहणे. ते नाम ते सर्व विकार दूर करते, हृदयशुद्धी होते. मग संत तुकाराम महाराज म्हणतात,
नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृतचि स्रवे *होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥०१॥ मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥०२॥ जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें । अंगा येती उद्गार ॥०३॥ सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा तुका म्हणे ||०४||”
संदर्भ: अभंग क्रमांक ८८४, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)
तुकाराममहाराजांनी प्रथम आपल्या वाणीस नाम घेण्याची प्रेरणा दिली.
“घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ ||
डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ ||
तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ ||
मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ ||
तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा || ५ ||”
– – संत तुकाराम महाराज सतत नामाच्या मागे लागले, मनात असेल किंवा नसेल पण वाचेवर नाम वसोदे, असा नामजप, भजन चालू झाले. मग त्यांना पुढील प्रमाणे अनुभव आला…
☆ “नाझ -ए -हिंद! 🇮🇳 अभिमान आहे!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
नाझ-ए-हिंद! अभिमान आहे!
जगात आणि त्यातल्या त्यात भारतात सर्वाधिक धर्मनिरपेक्ष जर कुणी असेल तर ती भारतीय सेना. सेनेत जणू सबंध भारत नांदत असतो. एक सैनिक, एक सैन्याधिकारी त्याच्या कार्यकाळात भारताच्या जवळजवळ सर्वच राज्यांत, सीमांवर विविध राज्यांतून आलेल्या विविध अधिका-यांच्या नेतृत्वात सेवा बजावून निवृत्त होतो.
नेतृ या संस्कृत शब्दापासून तयार झालेल्या नेता या शब्दाचा एक अर्थ ‘धोका पत्करणारा’ असाही सांगितला जातो… अर्थात समूहाच्या अग्रभागी राहून, समुहावर येऊ घातलेले संकट जो प्रथम आपल्या शिरावर घेतो.. तो खरा नेता… नायक!
“शत्रूला माझ्या सैनिकांना इजा पोहोचवायचीच झाल्यास.. त्यांना प्रथम माझ्याशी दोन हात करावे लागतील… त्यात मी मरण पावलो तरच त्यांना माझ्या सैनिकांपर्यंत पोहोचता येईल! आणि मी माझ्या जवानांसाठी काहीही करू शकतो.. नव्हे करेन” असं छातीठोकपणे सांगणारा आणखी एक सेनानी भारतीय सेनेने अनुभवला… त्याची ही कथा! भारतीय सैन्याधिकारी त्यांच्या हाताखाली काम करणा-या जवानांना my boys म्हणतात… ते केवळ औपचारीकता म्हणून नव्हे… तर खरोखरीच संकटाच्या परिस्थितीत त्यांच्या मागे संरक्षक म्हणून उभे राहतात… हे सिद्ध करणारी!
बावीस ऑगस्ट, दोन हजार आठ… पहाटेचे साडेतीन वाजलेले आहेत… या दिवसाच्या सायंकाळी जम्मू-काश्मीरमध्ये तैनात ४५, राष्ट्रीय रायफल्सच्या अधिका-यांना एक पक्की खबर मिळाली आहे… पाकिस्तानी अतिरेक्यांचा एक मोठा गट सीमा ओलांडून भारतात प्रवेश करणार आहे! Insurgent म्हणजे प्रस्थापित सत्तेस धुडकावून त्या सत्तेविरुद्ध शस्त्र हाती घेतलेली व्यक्ती. या Insurgent विरुद्ध कारवाई करून त्याला नेस्तनाबूद करणे गरजेचे ठरते.. अन्यथा सत्ता धुळीस मिळायला वेळ लागत नाही. भारतात भारताची, भारतातल्या सर्वच्या सर्व भूभागावर एकछत्री सत्ता आहे.. आणि असेल. या सत्तेला कुणी आव्हान दिले तर ते आव्हान मोडून काढण्याच्या अखंडित मोहिमेला Counter-Insurgency अशी संज्ञा आहे.
अतिरेकी आपल्या सीमेच्या आत खोलवर येण्याआधीच त्यांना रस्त्यातच गाठायला त्यांना सामोरे जायचे आणि त्यांचा खात्मा करायचा… अशी सर्वसाधारण पद्धत असते. हे जणू एकप्रकारे मरणावर चालून जाण्यासारखेच. पण ही अशी चाल करून जाणेच भारतीय सैनिकांच्या अंगवळणी पडले आहे.
४५, राष्ट्रीय रायफल्सच्या अधिका-यांना या येऊ घातलेल्या अतिरेक्यांविरोधात मच्च्छल गावाजवळ, कुपवाडा सेक्टरमध्ये ‘नाव-नार’ नावाने एक मोहिम आखली. आपल्या कुटुंबियांसमवेत एक दीर्घ सुट्टी उपभोगून सैन्य तुकडीत नुकतेच परतलेले अनुभवी कमांडिंग ऑफिसर या मोहिमेत अग्रभागी राहून निघाले. साहेबांना प्रत्यक्ष सैनिकी कारवायांचा थोडाथोडका नव्हे तर तब्बल वीस वर्षांचा अनुभव होता. आपल्या नेतृत्वातील सैनिकांना स्वत:चे पुत्र मानणारे अधिकारी म्हणून या साहेबांची ख्याती होती. त्यांचे पिताजी सेनेत Honorary Captain होते. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकीत हे साहेब सेनेत अधिकारी म्हणून दाखल झाले होते… आणि त्यांच्या दोन भावांनी सुद्धा त्यांचाच कित्ता गिरवला होता… एकच कुटुंबातील चौघे पुरुष भारताच्या संरक्षण सेवेत होते!
त्या पहाटेचा अंधार अधिकच गडद होता. सावध पावले टाकीत आपली तुकडी पुढे पुढे सरकत राहिली… कर्नल साहेब त्यांच्यापुढे कुणालाही जाऊ देत नव्हते… इतक्यात समोरच्या झाडीत काही हालचाल दिसली… आणि एके-४७ मधून निघणा-या गोळ्यांचा चकचकाट त्या अंधाराला भेदून येऊ लागला… आपल्या सैनिकांनी प्रशिक्षणात शिकवल्यानुसार त्वरीत आपापल्या जागा घेतल्या… कर्नल साहेबांनी थेट पुढे घुसत त्यांची रायफल अचूक चालवली… दोन अतिरेकी त्यांच्या वर्षावात त्वरीत ठार झाले खरे… पण त्या अतिरेक्यांनी झाडलेल्या फैरीमध्ये (फैर=fire) साहेबांच्या शरीरात अनेक गोळ्या घुसल्या! साहेब जबर जखमी झाले… आणि कोसळले…. पण कोसळताना त्यांनी आणखी एक अतिरेकी पाहिला…. आधीच्या दोन अतिरेक्यांचे मुडदे पाहून त्या अतिरेक्याने डोंगर उतारावरील एका चिंचोळ्या जागेत आसरा घेतला आणि त्या सुरक्षित जागेवरून तो भारतीय सैनिकांवर जबरदस्त गोळीबार करु लागला! आपल्या सैनिकांना पुढे जाता येईना…. कर्नल साहेबांनी ही आणीबाणीची परिस्थिती जाणली…. प्रचंड जखमी अवस्थेत, एखादा जखमी वाघ चवताळून उठावा तसे साहेब उठले… तो अतिरेकी लपला होता त्या छोट्या डोंगराच्या दुस-याबाजूने वर चढले… आणि त्यांनी स्वत:ला त्या अतिरेक्याच्या दिशेने खाली लोटून दिले…. अगदी त्याच्या पुढ्यात जाऊन थांबले कर्नलसाहेब… त्या अतिरेक्याच्या समोर त्याचा मृत्यू साक्षात उभा होता….. कर्नल जोजन थॉमस साहेबांच्या रुपात! जोजन साहेब केरळमधील थिरुवला जिल्ह्यातील एका खेड्यात, कुट्टूर गावात २२ जुलै, १९६५ रोजी जन्मले होते. JOJAN हे JOHAN (जोहान) या शब्दाचे एक रूप आहे. जोहान चा अर्थ आहे देव दयाळू आहे! आणि Thomos हे प्रभू येशूच्या बारा शिष्यांपैकी एका शिष्याचे नाव होते. Jojan Thomos हे नाव धारण करणारा एक बहादूर सैनिक अधिकारी भारतीय सैन्याला लाभला, ही सुद्धा ईश्वरी कृपाच म्हणावी लागेल.
जोजन यांनी पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि चेन्नईच्या सैन्य अधिकारी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून ते रुजू झाले. आणि मार्च १९८६ मध्ये त्यांनी देशसेवेत प्रथम पग.. पहिले पाऊल ठेवले!
जोजन साहेबांना रेजिमेंट मिळाली ती ११, जाट रेजिमेंट. एक केरळी माणूस हरियाणवी सैनिकांच्या सोबत काम करू लागला… जगातल्या इतर कोणत्याही सैन्यात असे वैविध्य आढळत नाही सहसा. सेनेत जणू सारा भारत एकवटलेला असतो. एकेक पायरी पार करीत करीत जोजन साहेब आता कर्नल बनले होते… त्यांची कार्यशैली, उत्साह आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन वरिष्ठांनी त्यांना 45 राष्ट्रीय रायफल्समध्ये डेप्युटेशनवर पाठवलं…. राष्ट्रीय रायफल्समध्ये देशाच्या विविध भागातील उत्तमोत्तम सैनिक, अधिकारी हेरून त्यांना कर्तव्यावर विशेष कामगिरीसाठी बोलावून घेतले जाते… आणि यासाठी अनेक सैनिक, अधिकारी उत्सुक असतात… कारण राष्ट्रीय रायफल्स जम्मू-कश्मीरमध्ये तैनात असल्याने इथे नेहमी शौर्य गाजवण्याची संधी असतेच! जोजन साहेबांनी मोठ्या उत्साहाने काश्मिरात पदार्पण केले!
काश्मीर म्हणजे काही एखाद्या हाऊसिंग सोसायटी नव्हे… सिमेंटची संरक्षक भिंत असलेली. प्रवेशद्वारावर एखाद-दोन रखवालदार नेमले की झाले! प्रचंड लांबीची भारत-पाक सीमा… घनदाट जंगल… लहरी हवामान… पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षण दिले गेलेले, अत्याधुनिक शस्त्रसज्ज आणि भारतद्वेषाने पेटून उठलेले माथेफिरू अतिरेकी, त्यात काही स्थानिकांचा पाठिंबा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कायदे, संघटना, जनता यांच्यामुळे सैन्यबलाचा थेट वापर करण्यावर असलेल्या मर्यादा….. एक ना अनेक कारणे आहेत. इथे प्रत्येक फुटावर सैनिक उभे करणे अशक्य आहे… पण तरीही भारतीय सैनिक असेल त्या स्थितीत पाय रोवून उभे असतात… एखादा सैनिक धारातीर्थी पडला की दुस-याच क्षणी दुसरा सैनिक त्याची जागा घेत असतो…. माघार नाही घेत…. म्हणून कश्मीर आणि पर्यायाने भारत आपला आहे!
२२ ऑगस्ट, २००८ रोजी जोजन साहेबांचे वय होते ४३ वर्षे १ महिना. पोटी दोन मुले होती.. एक मुलगी मेघना आणि चिरंजीव फिलेमॉन. पत्नी गृहिणी बीना. बेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक मित्र जोडले आणि अनेक विषयांमध्ये कसब प्राप्त केले. एखाद्या वाघासारखी शरीरयष्टी लाभलेल्या जोजन साहेबांचे मन मात्र खूप हळवे होते. पत्नी आणि दोन मुले, आई, वडील यांच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. सैनिकी जीवनातील अनिश्चितता त्यांना ठाऊक असल्याने प्रत्येक क्षण पुरेपूर आनंदाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न असत. त्यांनी हेलिकॉप्टरचालक प्रशिक्षण घेतले आणि भारताच्या सीमांवर तैनात असलेल्या शीघ्र कृती दलाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून सहा वर्षे प्रभावी कामगिरी करून नाव कमावले… त्यांच्या गणवेशावर आर्मी एविएशन कोअरचे पंख सन्मानाने मिरवत राहिले.
कर्नल जोजन साहेब त्या अतिरेक्याच्या अगदी समोर उभे होते… इतक्या जवळून रायफल झाडता येत नाही… थेट भिडायला लागते… जोजन साहेबांनी त्या अतिरेक्यावर झडप घातली… त्याला जणू मरणमिठीच मारली…. जोरदार संघर्ष झाला…. आणि शेवटी वाघाने तो पिसाळलेला कुत्रा मारला! पण साहेब पुन्हा उठून उभे राहू शकले नाहीत. आपल्या इतर सैनिकांनी तोवर इतर तीन जनावरे यमसदनी धाडून दिली होती… एकूण सहा शिकारी झाल्या होत्या! अतिरेक्यांना टिपताना नाईक नीरज आणि शिपाई सुलतान सिंग हे दोघे जखमी होऊन हुतात्मा झाले होते! या दोघांना मरणोत्तर सेना मेडल जाहीर झाले.
प्रत्येक मोहिमेत वैद्यकीय साहाय्य दल सोबत घेऊन जाता येतेच असे नाही… डोंगर, रस्ते, अंधार, अंतर या अडचणी असतात… त्यातून जखमींना अतित्वरीत वैद्यकीय मदत देता येतेच असे होत नाही, गरज पडली आणि शक्य झाल्यास हेलीकॉप्टरमधून जखमींना लष्करी रुग्णालयात नेले जाते. पण त्यादिवशी एवढे सर्व करूनही जोजन साहेबांचे प्राण वाचू शकले नाहीत! पण त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले…. अतिरेक्यांना माझ्या सैनिकांपर्यंत पोहोचायचे झाल्यास… त्यांना माझ्या मृतदेहावरूनच पुढे जावे लागेल!
‘अशोक चक्र’ हा शांतता काळात सैनिकांना प्रदान केला जाणारा सर्वोच्च सैनिक सन्मान मानला जातो. त्याचे मानकरी ठरले कर्नल जोजन… मरणोत्तर अशोक चक्र विजेते! हुतात्मा कर्नल जोजन थॉमस यांच्या धीरोदात्त पत्नी बीना यांनी तत्कालीन महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये २००९ मधील प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार स्वीकारला! पती गमावल्यानंतर बीनाताई यांनी अगदी कमी कालावधीत स्वत:ला सावरले… कारण त्यांच्या पदरात दोन मुले होती… मुलगी मेघना आणि मुलगा फिलेमॉन. बीनाताई यांनी कर्नल जोजन साहेबांच्या स्मृति कायम राहाव्यात यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले. साहेबांची जीवनकहाणी सांगणारी चित्र-पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली. साहेबांचे स्मारक उभारले.
भारतास धुळीस मिळवण्याचे स्वप्न पाहणा-या शत्रूला प्रत्युत्तर म्हणून, जिथे कर्नल जोजन साहेब आणि अन्य सैनिकांनी देह ठेवले, त्या स्थळी भारतीय सेनेने नाझ-ए-हिंद अर्थात हिंदुस्थानाचा अभिमान नावाने एक मोठे स्मृतिस्थळ उभारले गेले आहे. इथे शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर तिरंगा डौलाने फडकत असतो. इथे कर्नल साहेबांची शौर्यगाथा प्रकाशित केलेली आहे. इथल्या द-या-खो-यात केरळमधून काश्मिरात आलेल्या आणि देशाचे शत्रू असलेल्या अतिरेक्यांची शिकार केलेल्या वाघाची डरकाळी कायम घुमत असते… या वाघाचे नाव जोजन! हम रहे या न रहे… यह देश रहना चाहिये…. यासाठी असे अनेक वाघ आपले प्राण देत असतात! देशाने त्यांच्या प्रती कृतज्ञ रहायला हवे…. त्यांच्या कथा पुढच्या पिढीला सांगत राहायला हव्यात…. कारण पुढच्या पिढ्यांना त्यांचा वारसा घ्यावा लागणार आहे! जयहिंद!
कर्नल जोजन साहेबांची कहाणी तुम्हाला इतरांना सांगावी वाटली तर जरूर सांगा. जिन्हे नाझ है हिंद पर वह कहां है? .. या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे!
(‘उरतृप्त’ उपनाम से व्यंग्य जगत में प्रसिद्ध डॉ. सुरेश कुमार मिश्रा अपनी भावनाओं और विचारों को अत्यंत ईमानदारी और गहराई से अभिव्यक्त करते हैं। उनकी बहुमुखी प्रतिभा का प्रमाण उनके लेखन के विभिन्न क्षेत्रों में उनके योगदान से मिलता है। वे न केवल एक प्रसिद्ध व्यंग्यकार हैं, बल्कि एक कवि और बाल साहित्य लेखक भी हैं। उनके व्यंग्य लेखन ने उन्हें एक विशेष पहचान दिलाई है। उनका व्यंग्य ‘शिक्षक की मौत’ साहित्य आजतक चैनल पर अत्यधिक वायरल हुआ, जिसे लगभग दस लाख से अधिक बार पढ़ा और देखा गया, जो हिंदी व्यंग्य के इतिहास में एक अभूतपूर्व कीर्तिमान है। उनका व्यंग्य-संग्रह ‘एक तिनका इक्यावन आँखें’ भी काफी प्रसिद्ध है, जिसमें उनकी कालजयी रचना ‘किताबों की अंतिम यात्रा’ शामिल है। इसके अतिरिक्त ‘म्यान एक, तलवार अनेक’, ‘गपोड़ी अड्डा’, ‘सब रंग में मेरे रंग’ भी उनके प्रसिद्ध व्यंग्य संग्रह हैं। ‘इधर-उधर के बीच में’ तीसरी दुनिया को लेकर लिखा गया अपनी तरह का पहला और अनोखा व्यंग्य उपन्यास है। साहित्य के क्षेत्र में उनके योगदान को तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के हाथों) से सम्मानित किया गया है। राजस्थान बाल साहित्य अकादमी के द्वारा उनकी बाल साहित्य पुस्तक ‘नन्हों का सृजन आसमान’ के लिए उन्हें सम्मानित किया गया है। इनके अलावा, उन्हें व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों साहित्य सृजन सम्मान भी प्राप्त हो चुका है। डॉ. उरतृप्त ने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने और समन्वय करने में भी महत्वपूर्ण भूमिका निभाई है। बिहार, छत्तीसगढ़, तेलंगाना की विश्वविद्यालयी पाठ्य पुस्तकों में उनके योगदान को रेखांकित किया गया है। कई पाठ्यक्रमों में उनकी व्यंग्य रचनाओं को स्थान दिया गया है। उनका यह सम्मान दर्शाता है कि युवा पाठक गुणवत्तापूर्ण और प्रभावी लेखन की पहचान कर सकते हैं।)
जीवन के कुछ अनमोल क्षण
तेलंगाना सरकार के पूर्व मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से ‘श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान’ से सम्मानित।
मुंबई में संपन्न साहित्य सुमन सम्मान के दौरान ऑस्कर, ग्रैमी, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, दादा साहब फाल्के, पद्म भूषण जैसे अनेकों सम्मानों से विभूषित, साहित्य और सिनेमा की दुनिया के प्रकाशस्तंभ, परम पूज्यनीय गुलज़ार साहब (संपूरण सिंह कालरा) के करकमलों से सम्मानित।
ज्ञानपीठ सम्मान से अलंकृत प्रसिद्ध साहित्यकार श्री विनोद कुमार शुक्ल जी से भेंट करते हुए।
बॉलीवुड के मिस्टर परफेक्शनिस्ट, अभिनेता आमिर खान से मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ।
विश्व कथा रंगमंच द्वारा सम्मानित होने के अवसर पर दमदार अभिनेता विक्की कौशल से भेंट करते हुए।
आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य – ईमानदारों का सम्मेलन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # ७४ – व्यंग्य – ईमानदारों का सम्मेलन ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’☆
(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)
पहली बार जिला मुख्यालय में “ईमानदारों का राष्ट्रीय सम्मेलन” आयोजित हुआ। स्वागत द्वार पर बड़े अक्षरों में लिखा था—“सच्चाई ही हमारी पहचान है।” नीचे छोटा अक्षर में लिखा था—“प्रायोजक: यूनिवर्सल कंस्ट्रक्शन कंपनी (जिस पर सीबीआई की जांच जारी है)।” मुख्य अतिथि, माननीय मंत्री जी, जिन्होंने हाल ही में अपनी तीसरी पत्नी के नाम पर पाँच एकड़ ज़मीन रजिस्टर कराई थी, मंच पर पहुँचे तो तालियाँ गूँज उठीं। भीड़ में से किसी ने कहा— “यही सच्चे ईमानदार हैं, सब कुछ खुलेआम करते हैं!” मंत्री जी मुस्कुराए। उन्होंने भाषण में कहा— “देश को अब ईमानदारी की कमी नहीं, बस पहचानने की ताकत चाहिए।” भाषण समाप्त होते ही मंच संचालक ने घोषणा की— “अब ईमानदारी सम्मान समारोह होगा।” पुरस्कार स्वरूप मंत्री जी ने हर प्रतिनिधि को घड़ी भेंट की, जिस पर उनका चुनाव चिन्ह खुदा था। पत्रकारों ने पूछा— “घड़ी असली है या नकली?” आयोजक बोला— “घड़ी असली है, बस समय नकली बताती है।”
दूसरा सत्र ‘नैतिकता के नए मानदंड’ पर था। एक वक्ता, सरकारी बाबू, बोले—“पहले रिश्वत को अपराध माना जाता था, अब यह सहयोग शुल्क कहलाने लगी है। समाज विकासशील है, शब्दावली भी होनी चाहिए।” दूसरे वक्ता, प्राइवेट स्कूल के संचालक, बोले—“हम बच्चों में नैतिकता लाने के लिए जीना कठिन बना देते हैं। फिर जब बच्चा नियम तोड़ने लगे, तो वही असली नागरिक कहलाता है।” सभागार तालियों से गूंज उठा। तभी मंच के पीछे से आवाज़ आई—“कृपया चोरी गई कुर्सियाँ वापस करें।” प्रतिनिधि मुस्कुराए—“ईमानदारी का सम्मेलन है, कुर्सियाँ कहाँ जाएँगी?” कुछ देर बाद पाया गया कि दर्जनभर कुर्सियाँ पार्किंग में बिक्रय हेतु रखी थीं। आयोजक ने घोषणा की— “यह व्यवस्था शुल्क है।” बाबू जी बोले— “वाह, देश आगे बढ़ रहा है!”
तीसरे सत्र में “डिजिटल ईमानदारी” पर चर्चा हुई। एक युवा अफ़सर ने कहा—“अब सब ऑनलाइन है। भ्रष्टाचार भी पारदर्शी हो गया है। ट्रांजैक्शन सीधे खाते में आती है, दलालों की ज़रूरत नहीं रही। यह डिजिटल इंडिया की सफलता है।” एक और विद्वान बोले—“ईमानदारी अब ऐप में मिलती है, वेरिफाई करके डाउनलोड करनी पड़ती है।” तभी मंच के सामने एक गरीब व्यक्ति अपनी फ़ाइल लेकर आया—“बाबू जी, दो महीने से आवेदन लंबित है।” बाबू ने मुस्कुरा कर कहा—“भाई, यह ईमानदारी का सम्मेलन है, सुविधा केंद्र नहीं। यहाँ सिर्फ भाषणों की अनुमति है, काम की नहीं।” वह आदमी चुप हो गया, लेकिन पौधे के पास खड़ा एक बच्चा बोला—“अगर यह ईमानदार हैं, तो हमारे गाँव में झूठे कौन रहते हैं?” सभा मौन हो गई। पंखे की आवाज़ में ईमानदारी की झिल्ली सी फड़फड़ाने लगी।
सम्मेलन के अंत में अध्यक्षीय वक्तव्य हुआ। अध्यक्ष महोदय बोले— “हम सब अपने-अपने क्षेत्र के ईमानदार लोग हैं। मैं डॉक्टर के नाम पर दवा बेचता हूँ, शिक्षक नकली प्रमाणपत्र देता है, अफ़सर काम न करके फ़ाइल दबाता है, नेता जनता को भरोसा देता है—और यही राष्ट्रीय एकता का आधार है।” सभागार ठहाकों से भर गया। उन्होंने कहा— “अगले वर्ष हम ‘सच्चाई दिवस’ मनाएँगे, बशर्ते प्रायोजक मिल जाए।” बाहर निकलते हुए किसी ने पूछा— “क्या सम्मेलन सफल रहा?” आयोजक हँसा— “पूरा बजट खर्च हो गया, अब तो ईमानदारी साबित है!” रात को शहर लौटने वाले प्रतिनिधियों की बसें चलीं। सड़क किनारे एक ठेला वाला बैठा था, धीरे से बुदबुदाया— “साहब लोग ईमानदार हैं, इसलिए गरीब अब भी ज़िंदा है।” सड़क की बत्तियाँ झिलमिलाईं—शायद वे भी इस नई ईमानदारी पर मुस्कुरा रही थीं।
☆ Minor Nuances but Major Impacts – By Captain Pravin Raghuvanshi, NM ☆
With immense joy and gratitude, I’m thrilled to share with the readers that my new book, “Minor Nuances but Major Impacts,” is now published!
It is a story-driven exploration of how small actions create transformational results in strategic leadership and management.
This book distills 45 years of my journey across the uniformed services, corporate world, and strategic management—captured through real experiences, insights, and learnings. Years of observation and reflection, now placed in your hands with lessons and takeaways.
Do read, reflect, and share your thoughts.
Captain Pravin Raghuvanshi, NM
(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.
About the book: Minor Nuances but Major Impacts
Great empires are not built overnight, nor do they crumble abruptly without reason. Hidden beneath the towering facades of thriving organisations lie the tiny, often invisible elements, those minor nuances that shape the trajectory of success or failure. These are not the headline-making disruptions or glamorous strategies found in case studies, but the everyday choices, overlooked behaviours, and unspoken cultural defaults that silently determine whether a company merely survives or genuinely thrives.
This book is a culmination of my 45 years of hands-on experience in the corporate world, stitched together over seventeen years of reflection, observation, and unwavering curiosity. Through countless boardrooms, shop floors, crisis meetings, and mentoring sessions, I came to recognise a painful pattern: while many small organisations dream of becoming giants, very few actually do. Not because they lack vision, product, or passion, but because they fail to notice the little things that matter.
Each chapter in this book delves into one such nuance. Some will feel familiar, others might be uncomfortable to confront. Yet, each carries within it the seeds of transformation, if only leaders and entrepreneurs are willing to pause, reflect, and act.
But this book is not just a commentary or a checklist. It is a mirror. And like all mirrors, it does not lie. It reveals truths that we sometimes wish to ignore but must confront if we seek growth that is not just quantitative, but also qualitative and sustainable.
The first part of this book builds a strong foundation of lessons and insights drawn from both triumphs and pitfalls. But theory, no matter how sound, is only half the journey. Part Two shifts gear. It steps into the world of a real-life entrepreneur Paresh Mittal whose journey you will walk, stumble, and rise with. It is here that the lessons truly come alive.
This is a book for those who believe that big things are hidden in small details. For those who are brave enough to admit that what’s holding them back might not be the market or the competition, but something much closer often within.
Welcome to a journey where small shifts lead to big outcomes.
I am pleased to present the Foreword written by Dr. Navin Singh.
Dr. Navin Singh
It is a privilege to present the foreword to Minor Nuances but Major Impacts, a distinguished contribution by Captain Pravin Raghuvanshi, NM-an individual whose multifaceted career embodies a rare confluence of strategic insight, professional rigour, and intellectual curiosity.
Over the course of my career in public service and policy, I have engaged with exceptional minds across diverse domains. Captain Raghuvanshi stands out among them not merely for the breadth of his accomplishments, but for the clarity and depth of his thought. A decorated officer of the Indian Navy, an experienced management advisor, a high-level contributor to national and international initiatives, and an acclaimed poet, his profile defies easy classification. This book reflects his uniquely interdisciplinary perspective and a lifetime of reflective practice.
In this work, Captain Raghuvanshi addresses a critical but frequently overlooked phenomenon in organisational dynamics the disproportionate impact of seemingly minor practices, decisions, and behavioural tendencies. Drawing on extensive experience in industrial relations, corporate strategy, Defence, and technological innovation, he presents a structured yet accessible framework for understanding how subtle misalignments can hinder institutional growth and conversely, how mindful refinements can catalyse transformation.
What makes this book particularly valuable is its pragmatic orientation. The author does not offer abstract prescriptions; instead, he grounds his observations in lived corporate realities and practical scenarios. His writing bridges the gap between theory and practice, between leadership intent and organisational outcome. The result is a narrative that is simultaneously reflective, actionable, and enduring in relevance.
The language employed is precise and elegant, marked by clarity of thought and literary finesse. Each chapter engages the reader intellectually while inviting – a rare feat in management literature. The work encourages readers to consider not just what organisations do, but how and why they do it questions central to sustainable excellence.
For leaders, managers, policymakers, and students of management alike, Minor Nuances but Major Impacts offers not only insights but also a mindset a way of perceiving the granular elements that determine institutional success. It challenges assumptions, sharpens strategic thinking, and fosters a more nuanced understanding of human and organisational behaviour.
I commend Captain Pravin Raghuvanshi for this valuable contribution. His work is timely, thought-provoking, and destined to find a meaningful place in boardrooms, classrooms, and among discerning professionals who recognise that in management, as in life, it is often the finer details that shape the grand outcomes.