मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. कांतिलाल टाटिया… – माहिती संग्राहक / लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

सौ. मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ डॉ. कांतिलाल टाटिया… – माहिती संग्राहक / लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

डॉ. कांतिलाल टाटिया 

डॉ. टाटिया शहाद्याचे. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील गरीब, वंचित आदिवासी बांधवांच्या सेवेत स्वत:ला पूर्ण वेळ झोवूâन दिले. जिल्ह्याच्या काना-कोपNयातील आदिवासीगावे, पाडे, अतिदुर्गम भागातील हान लहान वस्त्या इथे ते जायचे. रस्त्यांची, विहिरींची कामे, एकशिक्षकी का होईना शाळा, वनखाते, तलाठी, पोलीस या ठिकाणांची असंख्य कामे, पाण्याचे टँकर्स, आवश्यक असलेली बी-बियाणे, रोजगार, रुग्णांना, गर्भवतींना धुळ्यापर्यंत आणून उपचाराची व्यवस्था करणं अशा रचनात्मक कामांमध्ये ते बुडालेले असायचे.

जगापासून तुटलेल्या वनवासी जीवांना ते मनापासून आणि जमेल तेवढी मदत करत. आपल्या जुनाट मोटरसायकलवरून उन्हातान्हाची, पाऊसपाण्याची, थंडी-वाऱ्याची पर्वा न करता ते फिरत. घराघराशी संपर्क ठेवत. त्यांच्या लग्नकार्य, सणा-वारात, उत्सव-समारंभात सामील होत.

एकदा त्यांच्या वाहनाने दगा दिला. त्यांना गंभीर अपघात झालाा. पायाचे हाड मोडल्याने प्रदीर्घ काळ दवाखान्यात बेडवर पडून राहणे भाग पडले. ही बातमी खेडोपाडी पोचली आणि डॉ. टाटियांच्या समाचाराला येणाऱ्या वनवासी लोकांची रीघ लागली.

त्यात उघडेवाघडे पुरुष, ठिपक्या ठिपक्यांच्या तांबड्या फडक्या डोक्यावर घेतलेल्या डॉक्टरांच्या शेकडो लेकुरवाळ्या बहिणी होत्या. म्हातारे-म्हाताऱ्या, तरुण मुलं, मजूर, झाडून सगळे भेटायला येऊन जात होते. आठवड्याकाठी एखादी दहा रुपयाची एखादी नोट कशीबशी पाहायला मिळणारी, ३-४ रुपये रोजावर कंबरतोड मेहेनत करणारी ही शापित माणसं… भेटीनंतर त्या दवाखान्याच्या आवारातच ठिय्या मारून मिरच्या भााकरी बांधलेली कळकट फडकी सोडून पोटात भरत आणि डोळ्यातलं पाणी पुसत घरी जात. उसने-पासने घेतलेले पैसे बस भाड्यासााठी खर्च करून आणि तेही शक्य नसेल, तर मैलोनमैल रस्ता अनवाणी पायंनी तुडवत, रस्ता विचारत विचारत ही माणसे डॉक्टरांना बघायला रांगेने येत होती.

– – भेटणं कसं? एक एक जण घाबरत घाबरत बेडजवळ जाई. शिस्तीत आवाज न करता डॉ. टाटियांचा हात हातात घेई. आया-बाया त्यांची बला घेत. म्हातारी-कोतारी माणसं त्यांच्या डोक्यावरून, कपाळावरून, गालांवरून मायेने हात फिरवीत आणि गहिवरलेल्या अहिराणीत आशीर्वाद देत… पण हा व्हिजिटर एक गोष्ट न चुकता करीत होता. निरोपाचा रामराम झाला, की डॉक्टरांच्या उशीखाली त्यांचा हात जाऊन बाहेर येई. टाटिया कुटुंबातील कुणालाच कळेना, हे काय आहे? एकाला विचारल्यावर उत्तर मिळालं, `काही नाही भाऊ, आहेर करना पडस, आजारी मानुसले. ‘

– – हे ऐकताक्षणी डॉ. टाटियांनी चटकन उशी बाजूला करून पाहीलं आणि बघणारे सगळे थक्क झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं. काही क्षणातच त्या पाण्याचं अश्रूधारा आणि हुंदक्यात रुपांतर झालं.. उशीखाली एक रुपया, दोन रुपये, पाच रुपयांच्या बारीक घड्या घातलेल्या असंख्य मळक्या नोटा, चार आणे, आठ आणे, अगदी दहा-वीस पैशांचीसुद्धा काही नाणी होती.

– – आजारी माणसाला उपचारांचा न झेपणारा खर्च असतो आणि त्याचे मित्र, सगेसंबंधी, जातभाई, रक्ताची माणसे यांनी त्यात जमेल तेवढा खारीचा वाटा उचलणं, हे त्यातल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं, या धारणेतून निर्माण झालेली `आजारपणाच्या आहेरा’ची पिढ्यान पिढ्या सुरू असलेली परंपरा ही माणसं डॉ. टाटियांच्या बाबतीतही इमानाने पालत होती.

खरं तर हॉस्पिटलचं बील बरंच होणार होतं. आणि टाटिया परिवारही काही फार श्रीमंत नव्हता. ही `आहेराची’ सगळी रक्कम मोजली, तरीही दवाखान्याच्या एका दिवसाच्या खर्चाहून अधिक होणार नव्हती. पण एक रुपया, दोन रुपये यांची किंमत काय असते, हे धुळे जिल्ह्यातल्या त्या निष्कांचन, आदिवासी भागात गेल्याशिवाय कुणाला कळणार नाही.

हे आदिवासी जिथे या जगात आले, वाढले आणि जिथे त्यांचा जन्मभरचा रहिवास असणार होता, त्या जंगलातच उगवून वाढलेल्या झाडांइतकीच नैसर्गिक आणि तेवढीच उंची असलेली अशी ही `सहजीवनश्रद्धा’ आहे, नाही का?

अशी `मेडिकल इन्शुअरन्स स्कीम’ त्यांच्या अक्षरशत्रू पूर्वजांना शेकडो वर्षापूर्वी सुचली आणि तिचं एका गुप्त व अखंड चालणाऱ्या परंपरेत रुपांतर झालं असणार.

(धुळ्याचे कार्यकर्ते व मार्गदर्शक धरमचंद चोरडिया यांनी पक्षकार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलेला किस्सा)

माहिती संग्राहक / लेखक : श्री मिलिंद हिरे

प्रस्तुती: सौ. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पहारा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पहारा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

कोल्हापूर ते पणजी या मार्गावर आंबोली घाटातून जाणारी लाल रंगाची ‘एसटी बस’ सर्वांनाच परिचयाची होती. या बसचे जुने ड्रायव्हर होते, ‘माधवराव’. गेली तीस वर्षे त्यांनी हा अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा घाट निर्धोकपणे पार केला होता. माधवराव अतिशय शांत आणि मितभाषी होते.

पण माधवरावांची एक विचित्र सवय होती, जिचा प्रवाशांना भयंकर कंटाळा यायचा. घाटाच्या अगदी मध्यभागी ‘काळभैरव वळण’ नावाचे एक अत्यंत धोकादायक आणि अंधारे वळण होते. तिथे आजूबाजूला काहीही नव्हते, फक्त शेकडो फूट खोल दरी होती. माधवराव रोज न चुकता स्वतःची एसटी बस त्या वळणावर ‘दोन मिनिटांसाठी’ थांबवायचे. ते एसटीतून खाली उतरायचे, दरीच्या कठड्याजवळ जाऊन त्या खोल अंधाऱ्या दरीत काहीतरी निरखून पाहायचे, आणि मग परत येऊन गाडी सुरू करायचे.

एके दिवशी या बसमधून रोहन नावाचा एक तरुण प्रवास करत होता. रोहनला स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर ‘व्हायरल’ व्हिडिओ टाकण्याचे भयंकर व्यसन होते. त्याला पुण्यात एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचे होते आणि बस आधीच लेट होती.

जेव्हा माधवरावांनी नेहमीप्रमाणे त्या निर्जन दरीजवळ गाडी थांबवली आणि ते खाली उतरले, तेव्हा रोहनच्या रागाचा स्फोट झाला. त्याने स्वतःचा मोबाईल काढला आणि माधवरावांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली.

“बघा मित्रांनो, हा म्हातारा ड्रायव्हर रोज या निर्जन दरीजवळ गाडी थांबवून प्रवाशांचा वेळ वाया घालवतोय. नक्कीच हा इथे काहीतरी जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचे प्रकार करत असावा. अशा बेजबाबदार माणसांमुळेच एसटीचा बोजवारा उडालाय, ” असा स्वतःचा आवाज टाकून रोहनने तो व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करून टाकला.

व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. लोकांच्या संतापजनक कमेंट्स आल्या. एसटी महामंडळावर दबाव आला आणि अधिकाऱ्यांनी माधवरावांना बोलावून त्यांच्यावर ‘कामात हलगर्जीपणा’ केल्याचा ठपका ठेवून त्यांना नोकरीवरून निलंबित (Suspend) केले. त्यांचे पेन्शनही रोखण्यात आले. माधवरावांनी कुणाकडेही कोणतीही तक्रार केली नाही, ते फक्त मान खाली घालून एसटी स्टँडवरून कायमचे निघून गेले. रोहनला मात्र स्वतःच्या ‘व्हायरल’ ताकदीचा भयंकर अहंकार आला होता.

या घटनेला दोन महिने उलटले. मुसळधार पावसाळ्याचे दिवस होते. रोहन स्वतःच्या नवीन कारने रात्री दोन वाजता त्याच आंबोली घाटातून एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला होता.

पावसाचा जोर भयंकर होता आणि समोरचे काहीच दिसत नव्हते. त्याच ‘काळभैरव वळणावर’ रोहनच्या गाडीचा ब्रेक स्लिप झाला. गाडीने कठडा तोडला आणि ती कार सपकन त्या शेकडो फूट खोल, अंधाऱ्या दरीत कोसळली.

गाडी झाडांमध्ये अडकून उलटी पडली होती. रोहन रक्ताच्या थारोळ्यात अडकला होता. त्याच्या छातीत स्टिअरिंग घुसलं होतं. रात्रीचे अडीच वाजले होते, मुसळधार पाऊस सुरू होता आणि मुख्य रस्त्यावरून त्याची गाडी दरीत पडलेली कुणालाही दिसण्याची सुतराम शक्यता नव्हती. “आपण आता मरणार, आपल्याला कुणीच वाचवू शकत नाही, ” या भीतीने रोहनच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. त्याचा श्वास कोंडत होता.

तेवढ्यात… त्या घनदाट अंधारात आणि पावसात दरीच्या वरून एका बॅटरीचा (Torch) प्रकाश त्याच्या गाडीवर पडला. कुणीतरी भिजत, चिखलातून घसरत एका जाड दोरीच्या साहाय्याने खाली दरीत उतरत होते.

तो माणूस गाडीजवळ आला. त्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, रक्ताने माखलेल्या रोहनला गाडीतून अत्यंत कष्टाने बाहेर ओढले. त्या म्हाताऱ्याने रोहनला स्वतःच्या पाठीवर घेतले आणि चिखलातून, दगडांमधून रक्ताळलेल्या अवस्थेत त्याला खेचत वर रस्त्यावर आणले. रोहन बेशुद्ध पडला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये रोहनला शुद्ध आली. त्याच्या बेडशेजारी एक पोलीस इन्स्पेक्टर उभे होते.

“नशीबवान आहेस तू मित्रा. जर काल रात्री ‘माधवरावां’नी तुला दरीतून बाहेर काढलं नसतं, तर आज तुझा मृतदेहच सडला असता तिथे, ” इन्स्पेक्टर म्हणाले.

‘माधवराव? ‘ हे नाव ऐकताच रोहनच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने थरथरत्या आवाजात विचारले, “मा… माधवराव? ते एसटी ड्रायव्हर? पण ते रात्री अडीच वाजता त्या दरीजवळ काय करत होते? “

इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि जे सत्य सांगितले, ते ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच फाटली.

“तुला माहितीये, ते म्हातारे माधवराव रोज एसटी थांबवून त्या दरीत काय बघायचे? पंधरा वर्षांपूर्वी, माधवरावांची गरोदर मुलगी आणि जावई त्याच काळभैरव वळणावरून रात्री दरीत कोसळले होते. ते दोघेही सलग सहा तास त्या दरीत जिवंत होते, मदतीसाठी ओरडत होते… पण रस्त्यावरून जाणाऱ्या एकाही गाडीने खाली दरीत डोकावून पाहिलं नाही. ते तडफडून तिथेच मेले. त्या दिवसापासून माधवरावांनी एक शपथ घेतली होती… की त्यांची एसटी जेव्हाही त्या वळणावरून जाईल, तेव्हा ते दोन मिनिटे थांबून दरीत नक्की डोकावून पाहतील, जेणेकरून आणखी कुणाचं बाळ तिथे तडफडून मरु नये. ते प्रवाशांचा वेळ वाया घालवत नव्हते रोहन… ते त्या दरीचा पहारा देत होते! “

रोहनच्या डोक्याला भयंकर मुंग्या येऊ लागल्या. त्याला श्वास घेता येईना.

“तू व्हिडिओ व्हायरल करून त्यांची नोकरी खाल्लीस. त्यांची एसटीची ड्युटी गेली… पण त्या म्हाताऱ्याचा नियम मोडला नाही. नोकरी गेल्यापासून गेल्या दोन महिन्यांत ते म्हातारे रोज रात्री पावसात, स्वतःच्या गावातून पाच किलोमीटर अनवाणी चालत त्या दरीजवळ येतात आणि हातात बॅटरी घेऊन कुणी पडलंय का ते चेक करतात. काल रात्री ते तिथेच उभे होते, म्हणून तू वाचलास. तुला वाचवताना त्यांच्या डोक्याला मार लागलाय आणि ते बाहेरच्या वॉर्डमध्ये बेशुद्ध आहेत.”

रोहनच्या हातातील सलाईनची नळी निसटली. तो बेडवरून खाली फरशीवर गुडघ्यावर कोसळला.

ज्या म्हाताऱ्याला त्याने स्वतःच्या एका ‘व्हायरल’ व्हिडिओसाठी आणि अहंकारासाठी नोकरीवरून काढले होते, ज्याची त्याने संपूर्ण जगासमोर बदनामी केली होती… त्या देवासमान म्हाताऱ्याने स्वतःच्या मुलीचे दुःख विसरून, नोकरी गेल्यानंतरही भर पावसात दरीचा पहारा दिला होता, आणि त्याच म्हाताऱ्याने रोहनला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले होते! खोट्या प्रसिद्धीचा आणि सोशल मीडियाचा तो सगळा अहंकार आज त्या म्हाताऱ्याच्या रक्ताळलेल्या पायांसमोर कायमचा राख झाला होता. रोहन वेड्यासारखा दोन्ही हातांनी स्वतःचे तोंड दाबून ओक्साबोक्शी रडत होता. स्वतःच्याच नीचपणाची आणि माधवरावांच्या त्या हिमालयाएवढ्या निस्वार्थ त्यागाची जाणीव इतकी भयंकर होती की, तो तिथेच एका जिवंत प्रेतासारखा थिजून गेला.

आपल्याला जे सत्य ‘स्क्रीनवर’ दिसते, ते नेहमीच खरे नसते. एखाद्याच्या वागण्यामागची नेमकी वेदना समजून घेतल्याशिवाय त्याला जगासमोर गुन्हेगार ठरवू नका. खऱ्या आयुष्यात ‘व्हायरल’ होण्यापेक्षा ‘माणूस’ होणे जास्त गरजेचे असते, कारण जेव्हा सत्याची चपराक बसते, तेव्हा पश्चात्ताप करायला शब्दही अपुरे पडतात.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद” – लेखक : श्री श्रीकांत तलगेरी ☆ परिचय –  डॉ. प्रमोद वि. पाठक ☆

 डॉ. प्रमोद वि. पाठक

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद” – लेखक : श्री श्रीकांत तलगेरी ☆ परिचय –  डॉ. प्रमोद वि. पाठक ☆

पुस्तक : आर्य आक्रमण सिध्दांत आणि भारतीय राष्ट्रवाद

लेखक : श्रीकांत ग. तलगेरी

अनुवादक : प्रा. म. मो. पेंडसे.

प्रकाशक : साप्ताहिक विवेक,

पृष्ठे : ३७७,

मूल्य : रु. ५००/-

आर्यांनी भारतावर आक्रमण करून स्थानिक जनसमूहांवर विजय मिळवला, आपले वर्चस्व प्रस्थापित केले, इथे पूर्वीपासून वसती करून असलेल्या लोकांवर आपली संस्कृती लादली हे गृहितक इंग्रजी राज्यकर्त्यांनी लादलेल्या भारतातील इतिहास शिक्षणक्रमाचा अविभाज्य भाग म्हणून गेली दिडशे वर्षे शिकवले जात आहे. इ. स. १९२० नंतर मोहेंजोदारो आणि हरप्पा येथे झालेल्या उत्खननाने त्यावर जणू शिक्कामोर्तब झाले. उत्खनित झालेली सिंधू संस्कृतीची शहरे आर्यांनी नष्ट केली असे ठरविण्यात आले. ते गृहीत इथल्या आणि परदेशातील अभ्यासकांच्या मनात इतके घट्ट रुजले की त्याला आव्हान न देता येणाऱ्या सिध्दांताचे महत्त्व प्राप्त झाले. आज सर्वसाधारण सुशिक्षित भारतीय नागरिकाच्या मनावर हेच बिंबलेले आहे की आर्य हे पश्चिमेकडून आलेले आक्रमक होते. त्याला धरून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक लिखाण होत राहिले. त्यातून या देशातील विविध जनसमूहांमधे यशस्वी रित्या सामाजिक फूट पाडली गेल्याचे चित्र गेल्या शतकभरात दृढ झालेले आपण पाहतो. त्याचे पडसाद आजही आपल्याला तामिळनाडूच्या राजकारणात पहायला मिळतात. आजकाल हिन्दू-आर्यांना सनातन संस्कृतीशी जोडून त्यांच्या विरोधात प्रक्षोभ आणि संधर्ष उभा करण्याचे राजकारण तेथे चालते आहे.

सिध्दांताचा प्रतिवाद

आर्य आक्रमण सिध्दांत विशेष करून इंग्रजी राज्यकर्त्यांनी जगावर, त्यातल्या त्यात भारतीय आणि युरोपातील जनमानसावर यशस्वीपणे थोपवला. त्याला एक प्रकारे पुष्टी बोगाझकोई येथे हजारोंच्या संख्येने मिळालेल्या लिखित मातीच्या मुद्रांनी मिळाली. कारण त्या मुद्रांवरील मजकूरात वैदिक देवता, इतर संस्कृत नावे आणि संख्यांचा समावेश होता. काही मुद्रांवरील मजकूरानुसार त्यांचा काळ निश्चितपणे इ. स. पूर्व १३८०च्या दरम्यानचा होता हे ठरविता आले. त्याला धरून तो जनसमुदाय मजलदरमजल करत ईराणमार्गे इ. स. पूर्व १२००च्या दरम्यान भारतात पोहचला असा निष्कर्ष सहज काढता आला. मॅक्समुल्लरने अंदाजपंची ठरविलेल्या आर्य आक्रमणाच्या काळाशी तो जुळल्याने त्यावर मोहर लागली. त्याचा अमिट प्रभाव आतही अनेक बिनीच्या प्राच्यविद्या संशोधकांवर आहे. माझ्या मते ही संशोधक मंडळी बोगाझकोई मातीच्या मुद्रांच्या दलदलीत फसून बसली आहेत. आर्य आक्रमण प्रतिपादनाचा सविस्तर संशोधन करून प्रतिवाद करणारे पाच ग्रंथ नारायणराव भवानराव पावगी यांनी १८९०च्या दशकात प्रसिध्द केले होते. याच्याही पुढे जाऊन पश्चिमेतील अनेक प्राचीन साम्राज्ये भारतीयांनी प्रस्थापित केली होती असे त्यांनी नमूद होते.

आर्य आक्रमण सिध्दांताचा ठोसपणे पुरस्कार लो. टिळकांनी केला. त्याचा प्रतिवाद करणारे ग्रंथ नंतरच्या काळात अनेक संशोधकांनी लिहिले. जसे जसे नवे संशोधन होत गेले तसे तसे आर्य आक्रमण सिध्दांताच्या विरोधातील पुरावे पुढे येऊ लागले आहेत. त्याच विषयाला धरून श्रीकांत तलगेरींनी लिहिलेला THE ARYAN INVASION THEORY: A REPREAISAL हा ग्रंथ (पृष्ठे ३७३) १९९३ साली आदित्य प्रकाशन, नवी दिल्लीने प्रसिध्द केला होता. आता सुमारे ३२ वर्षांनंतर प्रा. म. मो. पेंडसे यांनी केलेला मराठी अनुवाद साप्ताहिक विवेकने प्रसिध्द केला आहे. तीन दशके जुनी असली तरी, एका बहुचर्चित विषयाची सटीक आणि दोन्ही विचारधारांची माहिती करून घेण्याची संधी या ग्रंथाव्दारे मराठी वाचकांना मिळेल.

प्रस्तुत ग्रंथात विशेष भर भाषाशास्त्रीय विश्लेषणावर आहे. संस्कृत, इराणी, ग्रीक आणि लॅटिन भाषांमधील शब्द साम्य लक्षात आल्यावर मूळ भाषा कोणती आणि तिचे मूळ ठिकाण कोणते असावे असा प्रश्न समोर येणे साहजिकच होते. त्याचे उत्तर शोधताना मात्र ब्रिटिश संशोधकांनी युरोपीय संस्कृती केन्द्रस्थानी ठेवून या दोन्ही प्रश्नांचे उत्तर, शोधले नाही तर तयार केले. ज्या ब्रिटिशांना १८व्या शतकात डॉ. सॅम्युअल जॉन्सनने इंग्रजी शब्दकोश तयार करेपर्यंत शब्दांचे स्पेलिंग एकसारखे असावे याची अक्कल नव्हती ते, ज्या भारतीयांनी हजारो वर्षांपूर्वी ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्ग इ. उच्चारांना धरून संस्कृत व्याकरणाची बांधणी केली, बिनीचे व्याकरणकार दिले त्यांना हे उपटसुंभ संस्कृत भाषा मूळ शिकवू लागले. त्याने सर्व घोटाळा केला. त्यांनी प्राथमिक Indo-European root language – भारोपिय मूळ असलेल्या भाषेची संकल्पना मांडली. ही भाषा युरोपच्या आसपासच्या प्रदेशात निर्माण झाली हेही ठोस पुरावे उपलब्ध नसताना ठरवले. त्यातून पुढे जाऊन आर्य स्थलांतर आणि आक्रमणाचे गृहितक मांडले गेले. खरेतर संस्कृत भाषा अति प्राचीन काळापासून ज्या प्रदेशात प्रचारात आणि वर्धिष्णू होती त्या प्रदेशात तिचे मूळ असणे अगदी स्वाभाविक होते. त्याच्या उलट असलेल्या दिशेकडून स्थलांतराचे इमले रचले गेले. त्यावर अमाप ग्रंथ रचना झाली. आता स्थिती अशी आहे की सत्य स्वीकारायचे तर आजवर उभारलेल्या आणि आता अवैध ठरू लागलेल्या तुलनात्मक भाषिक संशोधनाच्या महालांवर बुलडोझर चालवून ते जमिनदोस्त करावे लागतील.

अपभ्रंश की उद्भ्रंश

काही वर्षांपूर्वी माझी दोन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भाषाशास्त्रीं बरोबर भेट झाली. ते दोघेही अमेरिकेतील प्रख्यात विद्यापिठांत नावाजलेले प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यातील एक मराठी (माणूस) होते. मी त्यांना एकमेकांशी संबंधित असलेल्या शब्दांच्या तीन जोड्यांच्या भौगोलिक प्रवासा विषयी विचारले. ऋग्वेदात इंद्राने वध केलेल्या “वृत्र” या महाभयंकर भुजङ्गाचा वारंवार उल्लेख येतो. त्या भुजङ्गाचे पर्यायी नाव “अहि-दास” असेही आहे. त्याचा वध करणारा या अर्थी इंद्राला “वृत्रघ्न” असे नाव दिले गेले. या वृत्रघ्नाला पर्यायी म्हणता येईल असा शब्द पारशी लोकांचा धर्मग्रंथ अवेस्तात “वेरेत्रघ्न” असा आहे. त्याच्या उत्तरेला असलेल्या आर्मेनियात तो “वाहग्न” असा झाला आहे. त्याला समांतर असलेल्या भुजङ्ग दर्शक शब्दांची रूपे “अझी दाहक” आणि “अझो दाह” अशी आहेत. मी त्यांना विचारले होते की हा शाब्दिक अपभ्रंशाचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे की उलट्या दिशेने झाला असावा. त्या दोघांनीही या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले होते. साधारणपणे कठीण उच्चारी शब्दांचे अपभ्रंश सोप्या उच्चारात होतात. “क्षेत्र” चे शेत, (हिंदीत खेत) होते, शेतचे “क्षेत्र” असा “उद्भ्रंश” होत नाही. हे एक व्यवहारातील उदाहरण झाले. तसे वृत्रघ्नचे वेरेत्रग्न आणि वाहग्न असे अपभ्रंश होणे साहजिकच ठरते. पण बोगझकोई मुद्रांच्या दलदलीत फसलेल्या त्या दोघांनी पूर्वे कडून पश्चिमेकडे हा पर्याय स्वीकारला असता तर आजवर केलेल्या दशकांच्या संशोधनाचा डोलारा एका क्षणात जमिनदोस्त होईल, आर्य आक्रमण मोडीत निघेल ही भिती त्यांना होती. तेही माझ्यासारख्या नाव नसलेल्या (उपटसुंभा) कडून.

तसे पाहता भारोपीय भाषा मूळ युरोपात असणे हे थोतांड आहे. तलगेरींनी या थोतांडाचे अंतरंग उघडे पाडून त्यातील खाचाखोचा समोर आणल्या आहेत. त्यांनी अनेक प्रस्थापित आणि नावाजलेल्या भाषाशास्त्रज्ञांच्या संशोधनातील कच्चे दुवे स्पष्ट केले आहेत. विशेष करून मध्यपूर्वेतील आणि दक्षिण युरोपातील प्राचीन भाषांमधील प्रचलित शब्द आणि त्यांचे मूळ असू शकणारे संस्कृत अथवा संस्कृतोद्भव शब्द यांचे सविस्तर विवेचन केले आहे. त्यातून असे दिसते की भाषाशास्त्रीय विवेचनातून आर्यांचे स्थलांतर पूर्वेकडून पश्चिमेकडे झाले असण्याचीच शक्यता होती. त्याला आधुनिक पुरातत्त्वीय आणि जनुकीय विस्तारावरील संशोधनाचा ठोस आधार मिळतो आहे. यावर विषयाला धरून दै. मुंबई तरुण भारत (दि. ५ नोव्हे. २०२२) मधे माझा प्रसिध्द झालेला लेख, तसेच “पुरातत्त्वावर वेदमुद्रा” या माझ्या पुस्तकातील प्रकरण “आर्य आक्रमणाच्या थोतांडाला साम्यवादी मक्केतून सुरूंग” (नचिकेत प्रकाशन २०२३, पृ ९९-१०६) यात वाचकांना वाचता येईल.

पुराणांमधील वंशावळ्या

पाश्चात्य संशोधक आणि त्यांची री ओढणाऱ्या भारतीय संशोधकांनी पुराण ग्रंथांना विश्वासार्ह नाहीत असे ठरवून वैचारिक अडगळीत टाकले होते. त्या पुराणांची ऐतिहासिक उपयुक्तता दाखविण्याचे महत्त्वाचे काम तलगेरिंच्या पूर्वी ए. डी. पुसाळकर आणि पी. एल. भार्गव यांनी केले. पुराणांमधील वंशावळ्या व्यवस्थित लावून कालदृष्ट्या इतिहासाची बांधणी केली जाऊ शकते हे त्यांनी सिध्द केले. तलगेरी त्यांच्या दोन पाऊले पुढे गेले आहेत. त्यांनी वैदिक राजे आणि मध्यपूर्वेतील प्राचीन राजे आणि राजवंशांची योग्य सांगड घातली आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य मानता येईल. या विषयाला धरून विस्तृत चर्चा या ग्रंथात आहे. पुराणांमधील राजवंशावळ्या भाकडकथा म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत हे वास्तव या ग्रंथाने ठळकपणे पुढे आणले.

एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतो. जर सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती एकच होत्या तर हे स्थलांतर होण्याचे कारण काय होते? त्याचा उलगडा गेल्या दोन तीन दशकातील संशोधनाने अधिक स्पष्टपणे झाला आहे. इ. स. पूर्व २०००-१८०० दरम्यान सिंधू नदी खोऱ्यात अनेकदा मोठ्या प्रमाणावर भूपृष्ठीय (Tectonic) उत्पात झाले. त्याच्या परिणामी जवळपास सर्व मोठी शहरे आणि गावे सामूहिक स्थलांतर होऊन ओस पडली. सिंधू संस्कृतीचे लोक चार दिशांना स्थलांतरित झाले. त्यातील जे दोन जनसमूह वायव्येकडे आणि पश्चिमेकडे स्थलांतरित झाले त्यांचा मागोवा तुलनात्मक भाषाभ्यासातून (Comparative philology) घेतला गेला. त्याचा घटनांचा विस्तृत आढावा “पुरातत्त्वावर वेदमुद्रा” यात (पृ. ११-२३) घेतला आहे. य़ा स्थलांतरा मागची अभूतपूर्व पूरांची वस्तुस्थिती लक्षात घेतली की तलगेरींच्या आणि प्रख्यात पुरातत्त्वविद डॉ. बी. बी. लाल यांनी प्रतिपादन केलेल्या आर्यांच्या वायव्य आणि पश्चिमेकडील स्थलांतरांचा वस्तुनिष्ठ उलगडा होतो.

प्रा. म. मो. पेंडसे यांनी केलेले हे भाषांतर एकदम छान झाले आहे. सामान्य वाचकांना वाचताना मूळ ग्रंथ वाचल्याचे समाधान मिळेल, मात्र एक तांत्रिक तृटी अभ्यासकांना जाणवत राहील. जागोजागी संक्षिप्त रूपात दिलेल्या संदर्भ ग्रंथाची यादी त्यात देण्याचे राहून गेलेले दिसते. या ग्रंथाच्या पुढील आवृत्तीत संदर्भ यादी न चुकता समाविष्ट व्हावी.

परिचय : डॉ. प्रमोद वि. पाठक

नाशिक   भ्र. – ९९७५५५९१५५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #३१६ ☆ यह भी गुज़र जाएगा… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख यह भी गुज़र जाएगा। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # ३१६ ☆

☆ यह भी गुज़र जाएगा… ☆ डॉ. मुक्ता ☆

‘गुज़र जायेगा यह वक्त भी/ ज़रा सब्र तो रख/ जब खुशी ही नहीं ठहरी/ तो ग़म की औक़ात क्या?’ गुलज़ार की उक्त पंक्तियां समय की निरंतरता व प्रकृति की परिवर्तनशीलता पर प्रकाश डालती हैं। समय अबाध गति से निरंतर बहता रहता है; नदी की भांति प्रवाहमान् रहता है, जिसके माध्यम से मानव को हताश-निराश न होने का संदेश दिया गया है। सुख-दु:ख व खुशी-ग़म आते-जाते रहते हैं और यह सिलसिला अनवरत चलता रहता है। मुझे याद आ रही हैं स्वरचित पंक्तियां ‘दिन रात बदलते हैं/ हालात बदलते हैं/ मौसम के साथ-साथ/ फूल और पात बदलते हैं अर्थात् समयानुसार दिन-रात, हालात व मौसम के साथ फूल व पत्तियों का बदलना अवश्यंभावी है। प्रकृति के विभिन्न उपादान धरती, सूर्य, चंद्रमा, तारे आदि निरंतर परिक्रमा लगाते रहते हैं; गतिशील रहते हैं। सो! वे कभी भी विश्राम नहीं करते। मानव को नदी की प्रवाहमयता से निरंतर बहने व कर्म करने का संदेश ग्रहण करना चाहिए। परंतु यदि उसे यथासमय कर्म का फल नहीं मिलता, तो उसे निराश नहीं होना चाहिए;  सब्र रखना चाहिए। ‘श्रद्धा-सबूरी’ पर विश्वास रख कर निरंतर कर्मशील रहना चाहिए, क्योंकि जब खुशी ही नहीं ठहरी, तो ग़म वहां आशियां कैसे बना सकते हैं? उन्हें भी निश्चित समय पर लौटना होता है।

‘आप चाह कर भी अपने प्रति दूसरों की धारणा नहीं बदल सकते,’ यह कटु यथार्थ है। इसलिए ‘सुक़ून के साथ अपनी ज़िंदगी जीएं और खुश रहें’– यह जीवन के प्रति सकारात्मक सोच को प्रकट करता है। समय के साथ सत्य के उजागर होने पर लोगों के दृष्टिकोण में स्वत: परिवर्तन आ जाता है, क्योंकि सत्य सात परदों के पीछे छिपा होता है; इसलिए उसे प्रकाश में आने में समय लगता है। सो! सच्चे व्यक्ति को स्पष्टीकरण देने की कभी भी दरक़ार नहीं होती। यदि वह अपना पक्ष रखने में दलीलों का सहारा लेता है तथा अपनी स्थिति स्पष्ट करने में प्रयासरत रहता है, तो उस पर अंगुलियाँ उठनी स्वाभाविक हैं। यह सर्वथा सत्य है कि सत्य को हमेशा तीन चरणों से गुज़रना पड़ता है… ‘उपहास, विरोध व अंततः स्वीकृति।’ सत्य का कभी मज़ाक उड़ाया जाता है, तो कभी उसका विरोध होता है…परंतु अंतिम स्थिति है स्वीकृति, जिसके लिए आवश्यकता है– असामान्य परिस्थितियों, प्रतिपक्ष के आरोपों व व्यंग्य-बाणों को धैर्यपूर्वक सहन करने की क्षमता की। समय के साथ जब प्रकृति का क्रम बदलता है… दिन-रात, अमावस-पूनम व विभिन्न ऋतुएं, निश्चित समय पर दस्तक देती हैं, तो उनके अनुसार हमारी मन:स्थिति में परिवर्तन होना भी स्वाभाविक है। इसलिए हमें इस तथ्य में विश्वास रखना चाहिए कि यह परिस्थितियां व समय भी बदल जायेगा; सदा एक-सा रहने वाला नहीं। समय के साथ तो सल्तनतें भी बदल जाती हैं, इसलिए संसार में कुछ भी सदा रहने वाला नहीं। सो! जिसने संसार में जन्म लिया है, उसकी मृत्यु अवश्यंभावी है। इसके साथ-साथ आवश्यकता है मनन करने की… ‘ इंसान खाली हाथ आया है और उसे जाना भी खाली हाथ है, क्योंकि कफ़न में कभी जेब नहीं होती।’ इसी प्रकार गीता का भी यह सार्थक संदेश है कि मानव को किसी वस्तु के छिन जाने का ग़म नहीं करना चाहिए, क्योंकि उसने जो भी पाया व कमाया है, वह यहीं से लिया है। सो! वह उसकी मिल्कियत कैसे हो सकती है? फिर उसे छोड़ने का दु:ख कैसा? सो! हमें सुख-दु:ख से उबरना है, ऊपर उठना है। हर स्थिति में संभावना ही जीवन का लक्ष्य है।  इसलिए सुख में आप फूलें नहीं, अत्यधिक प्रसन्न न रहें और दु:ख में परेशान न हों…क्योंकि इनका चोली-दामन का साथ है। एक के जाने के पश्चात् ही दूसरे का पदार्पण होना स्वाभाविक है। इसमें एक अन्य भाव भी निहित है कि जो अपना है, वह हर हाल में मिल कर रहेगा और जो अपना नहीं है, लाख कोशिश करने पर भी मिलेगा नहीं। वैसे भी सब कुछ सदैव रहने वाला नहीं; न ही साथ जाने वाला है। सो! मन में यह धारणा बना लेनी आवश्यक है कि ‘समय से पूर्व व भाग्य से अधिक कुछ मिलने वाला नहीं।’ कबीरदास जी का यह दोहा ‘माली सींचै सौ घड़ा, ऋतु आय फल होइ’…. समय की महत्ता व प्रकृति की निरंतरता पर प्रकाश डालता है।

समय का पर्यायवाची आने वाला कल अथवा भविष्य ही नहीं, वर्तमान है। ‘काल करे सो आज कर. आज करे सो अब/ पल में प्रलय होयेगी, मूरख करेगा कब’ में भी यही भाव निर्दिष्ट है कि कल कभी आएगा नहीं। वर्तमान ही गुज़रे हुए कल अथवा अतीत में परिवर्तित हो जाता है। सो! आज अथवा वर्तमान ही सत्य है। इसलिए हमें अतीत के मोह को त्याग, वर्तमान की महत्ता को स्वीकार, आगामी कल को सुंदर, सार्थक व उपयोगी बनाना चाहिए। दूसरे शब्दों में ‘कल’ का अर्थ है– मशीन व शांति। आधुनिक युग में मानव मशीन बन कर रह गया है। सो! शांति उससे कोसों दूर हो गयी है। वैसे शांत मन में ही सृष्टि के विभिन्न रहस्य उजागर होते हैं, जिसके लिए मानव को ध्यान का आश्रय लेना पड़ता है।

ध्यान-समाधि की वह अवस्था है, जब हमारी चित्त-वृत्तियां एकाग्र होकर शांत हो जाती हैं। इस स्थिति में आत्मा-परमात्मा का तादात्म्य हो जाता है और उसका संबंध संसार व प्राणी-जगत् से कट जाता है; उसके हृदय में आलोक का झरना फूट निकलता है। इस मन:स्थिति में वह संबंध-सरोकारों से ऊपर उठ जाता है तथा वह शांतमना निर्लिप्त-निर्विकार भाव से सरोवर के शांत जल में अवगाहन करता हुआ अनहद-नाद में खो जाता है, जहां भाव-लहरियाँ हिलोरें नहीं लेतीं। सो! वह अलौकिक आनंद की स्थिति कहलाती है।

आइए! हम समय की सार्थकता पर विचार- विमर्श करें। वास्तव में हरि-कथा के अतिरिक्त, जो भी हम संवाद-वार्तालाप करते हैं; वह जग-व्यथा कहलाती है और निष्प्रयोजन होती है। सो! हमें अपना समय संसार की व्यर्थ की चर्चा में नष्ट नहीं करना चाहिए, क्योंकि गुज़रा हुआ समय कभी लौटकर नहीं आता। इसलिए हमें उसका शोक भी नहीं मनाना चाहिए। वैसे भी यह कहावत प्रसिद्ध है कि ‘नया नौ दिन, पुराना सौ दिन’ अर्थात् ‘ओल्ड इज़ गोल्ड’… पुरातन की महिमा सदैव रहती है। यदि सोने के असंख्य टुकड़े करके कीचड़ में फेंक दिये जाएं, तो भी उनकी चमक बरक़रार रहती है; कभी कम नहीं होती है और उनका मूल्य भी वही रहता है। सो! हम में समय की धारा की दिशा को परिवर्तित करने का साहस होना चाहिए, जो सबके साथ रहने से, मिलकर कार्य को अंजाम देने से आता है। संघर्ष जीवन है…वह हमें आपदाओं का सामना करने की प्रेरणा देता है; समाज को आईना दिखाता है और गलत-ठीक व उचित-अनुचित का भेद करना भी सिखाता है। इसलिए समय के साथ स्वयं को बदल लेना ही श्रेयस्कर है। जो लोग प्राचीन परंपराओं को त्याग, नवीन मान्यताओं को अपना कर जीवन-पथ पर अग्रसर नहीं होते; पीछे रह जाते हैं… ज़माने के साथ कदम से कदम मिलाकर नहीं चल सकते तथा उन्हें व उनके विचारों को मान्यता भी प्राप्त नहीं हो सकती। इसलिए संतोष रूपी रत्न को धारण कर, जीवन से नकारात्मकता को निकाल फेंके, क्योंकि संतोष रूपी धन आ जाने के पश्चात् सांसारिक धन-दौलत धूलि के समान निस्तेज, निष्फल व निष्प्रयोजन भासती है; शक्तिहीन व निरर्थक लगती है और उसकी जीवन में कोई अहमियत नहीं रहती। इसलिए हमें जीवन में किसी के आने  और भौतिक वस्तुओं व सुख-सुविधाओं के मिल जाने पर खुश नहीं होना चाहिए और उसके अभाव में दु:खी होना भी बुद्धिमत्ता नहीं है, क्योंकि सुख-दु:ख का एक स्थान पर रहना असंभव है, नामुमक़िन है… यही जीवन का सार है।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रचना संसार #८८ – गीत – ऋतुपति… ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ☆

सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(संस्कारधानी जबलपुर की सुप्रसिद्ध साहित्यकार सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ ‘जी सेवा निवृत्त जिला एवं सत्र न्यायाधीश, डिविजनल विजिलेंस कमेटी जबलपुर की पूर्व चेअर पर्सन हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में पंचतंत्र में नारी, पंख पसारे पंछी, निहिरा (गीत संग्रह) एहसास के मोती, ख़याल -ए-मीना (ग़ज़ल संग्रह), मीना के सवैया (सवैया संग्रह) नैनिका (कुण्डलिया संग्रह) हैं। आप कई साहित्यिक संस्थाओं द्वारा पुरस्कृत एवं सम्मानित हैं। आप प्रत्येक शुक्रवार सुश्री मीना भट्ट सिद्धार्थ जी की अप्रतिम रचनाओं को उनके साप्ताहिक स्तम्भ – रचना संसार के अंतर्गत आत्मसात कर सकेंगे। आज इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम गीत – ऋतुपति

? रचना संसार # ८८ – गीत – ऋतुपति…  ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ? ?

अनुरक्त हुए ऋतुपति को मैं,

पीने को हाला देती हूँ।

कंचनवर्णी इस यौवन को,

मधुरस का प्याला देती हूँ।।

**

मधुरिम अधरों पर रसासिक्त,

आँखें सुंदर भी  हैं नीली।

यौवन मद में मखमली बदन,

स्वर्णिम आभा नथ चमकीली,

प्रेयसी प्राणदा प्रियतम को,

प्यारी मधुशाला देती हूँ।

*

कंचनवर्णी इस यौवन को,

मधुरस का प्याला देती हूँ।।

**

नित मदिर -गीत गाता  यौवन,

बौराती पुलकित तरुणाई।

मैं बँधीं प्रीति की डोरी से,

हूँ बिना पिया के अकुलाई।।।

सिंदूरी माथे को खुश हो,

निज मन मतवाला देती हूँ।

*

कंचनवर्णी इस यौवन को,

मधुरस का प्याला देती हूँ।।

**

यौवन का झीना घूँघट पट,

रेशम की अँगिया शरमाती।

अभिसार वल्लरी नित पुष्पित,

है चन्द्र प्रभा सी  मुस्काती।।

प्रिय प्रांजल मूरत प्रांजल को

मैं प्रेमिल प्याला देती हूँ।

*

कंचनवर्णी इस यौवन को,

मधुरस का प्याला देती हूँ।।

© सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(सेवा निवृत्त जिला न्यायाधीश)

संपर्क –1308 कृष्णा हाइट्स, ग्वारीघाट रोड़, जबलपुर (म:प्र:) पिन – 482008 मो नं – 9424669722, वाट्सएप – 7974160268

ई मेल नं- meenabhatt18547@gmail.com, mbhatt.judge@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – समग्रता ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – समग्रता ? ?

उन आँखों में

बसी है स्त्री देह,

देह नहीं, सिर्फ

कुछ अंग विशेष,

अंग विशेष भी नहीं

केवल मादा चिरायंध,

सोचता हूँ काश

इन आँखों में कभी

बस सके स्त्री देह..,

केवल देह नहीं

स्त्रीत्व का सौरभ,

केवल सौरभ नहीं

अपितु स्त्रीत्व

अपनी समग्रता के साथ,

फिर सोचता हूँ

समग्रता बसाने के लिए

उन आँखों का व्यास भी तो

बड़ा होना चाहिए..!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 2 अप्रैल से  एक माह की हनुमान साधना वैशाख पूर्णिमा तदनुसार 1 मई 2026 को संपन्न होगी। 🕉️

💥 इसमें हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमानाष्टक के पाठ किए जाएँगे। हनुमान चालीसा के 21 या अधिक पाठ करने वाले विशेष साधक तथा 51 या अधिक पाठ करने वाले महा साधक कहलाएँगे। 101 या अधिक पाठ करने वाले परम साधक कहलाएँगे। आत्म परिष्कार और मौन साधना साथ चलेंगे।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – पुस्तक समीक्षा ☆ कोई नाम न दो…  –  संपादक- डाॅ शैलेश गुप्त वीर ☆ सुश्री इन्दिरा किसलय ☆

सुश्री इन्दिरा किसलय

☆ पुस्तक समीक्षा ☆

☆ कोई नाम न दो…  –  संपादक- डाॅ शैलेश गुप्त वीर ☆ सुश्री इन्दिरा किसलय ☆

कृति–कोई नाम न दो

संपादक- डाॅ शैलेश गुप्त वीर

समीक्षक- इन्दिरा किसलय

प्रकाशक- श्वेतवर्णा प्रकाशन नई दिल्ली

पृष्ठ-200

मूल्य-349/-

☆ प्रेम का मनोविज्ञान -बदलाव की बयार-“कोई नाम न दो” – सुश्री इन्दिरा किसलय

श्वेतवर्णा प्रकाशन नई दिल्ली से प्रकाशित इस कृति में 79  लघुकथाएँ संग्रहित हैं। सम्पादक हैं बहुभाषाविद् डॉ. शैलेश गुप्त वीर। यूँ भी प्रेम को कोई नाम कैसे दिया जा सकता है। वह तो गूंगे का गुड़ है। शब्दों का सहारा लेकर  अंश-अंश ही व्यक्त हो पाता है। प्रस्तुत संग्रह समकाल में प्रेम की विविध स्थितियों, धारणाओं, सामाजिक मान्यताओं और मनोवैज्ञानिक जटिलताओं का  सूक्ष्म रूपायन करता है।

पुराकाल में निसर्ग के सान्निध्य में परवान चढ़ने वाला लैला-मजनू वाला प्रेम अब इतिहास हो गया या कहें कि छुई मुई संवेदना ने जाग्रत चेतना का दामन थाम लिया है।

स्वतंत्रता, शिक्षा से उत्पन्न जागृति, आर्थिक आत्मनिर्भरता, कानून की स्त्री सापेक्ष स्थिति और टेक्नोलॉजी के बढ़ते चरण मनोभावों को विशाल स्तर पर प्रभावित कर रहे हैं। उपभोक्तावाद और सोच का खुला आकाश, स्त्री-पुरुष समान अधिकारों के तल पर सामाजिक संरचना को आंदोलित कर रहा है।

लघुकथाओं के लघुतम कलेवर में प्रेम के बहुआयामी पार्श्व उभरे हैं जो समाज वैज्ञानिकों के लिए चेतावनी भी है और गहन चिंतन का विषय भी। जिज्ञासा सिंह ने ड्रिंक के केवल एक सिप में वर्जनाओं को तोड़ने की झिझक और सामाजिक मान्यताओं के बदलते स्वरूप का दर्शन करवाया है। सारी कहानियाँ सम्प्रेषणीयता की दृष्टि से अनुपम हैं। कृति में कहीं प्लेटोनिक लव है, कहीं समझदार, कहीं दैहिक आकर्षण, कहीं व्यवहार और कहीं अस्तित्व के प्रति प्रचंड जागरूकता, ऐसे कितने ही रूप रिश्तों में बदलाव की सूचना दे रहे हैं। क्रांति अचानक आकार नहीं लेती शनैः शनैः असंतोष का बारूद इकट्ठा होता है। सामाजिक क्रांति में वर्षों से संचित ताप सतह पर नजर आता है। शुद्ध शब्दों में इन कथाओं को प्रेम का मनोविज्ञान समझाती, स्वप्निल अनुभूति का रूहानी विस्तार करती हुई कथाएँ कह सकते हैं।

मनोज कुमार झा ने “लिव-इन रिलेशनशिप “का एक अलग ही रूप सामने रखा है। रंजना जायसवाल ने विवाह की परंपरागत प्रथा को एक तीखे सवाल से शीशा दिखाया है—-” पिता कहते हैं अनजान व्यक्ति से बात नहीं करनी चाहिए पर शादी कर लेनी चाहिए —–?

राजेंद्र वर्मा की”” घर “”में भी प्रेम विवाह और तलाक को समान अधिकार की पृष्ठभूमि में उकेरा गया है। शिवानी की आईना भी क्रांतिकारी कथा है। अंजू खरबंदा की दृष्टि में” प्रेम पगे रिश्ते “जीवन के स्वीकार की दास्तां है। वार्धक्य को भी प्रेम और  सलीके से जिया जा सकता है। कमल कपूर की “बूढ़े प्रेमपाखी “कहानी यही कहती है। डॉ शैलेश गुप्त वीर की “सच्चा प्यार “प्रणयी जोड़ों के लिए नेत्रोन्मीलक है। डाॅ मिथिलेश दीक्षित की निर्णयकथा प्रभावित करती है। इन्दिरा किसलय कृत “चाहे जो हो ” कहानी एक नौकरीशुदा स्त्री का असफल जीवन और भटकाव की दास्तां कहती है।

कथितव्य है कि इस संग्रह में प्रख्यात लघुकथाकार –सुकेश साहनी, रामेश्वर काम्बोज हिमांशु, संतोष सुपेकर, अंजु दुआ जेमिनी, रघुविन्द्र यादव, विनोद सागर, उमेश महादोषी, योगराज प्रभाकर, सारिका भूषण आदि ने भी अपनी महनीय उपस्थिति दर्ज की है। शिल्प की दृष्टि से देखें तो कथाएं पर्याप्त न्याय कर रही हैं। कथ्य के वैशिष्ट्य के साथ संदर्भगत संवेदना, भाषा की स्पष्ट सामयिक अभिव्यक्ति पर जोर देने की बात संपादक” वीर जी “ने की है।

विगत दो दशक से लघुकथा ने पाठकों के हृदय में भरपूर स्थान पाया है। सुकेश साहनी की “फेस टाइम” ने एक ज्वलंत मुद्दे पर प्रकाश डाला है। सोशल मीडिया के रिश्तों पर पड़नेवाले प्रभाव को दर्शाया है।

नारी अस्मिता, तकनीकी विस्फोट, परंपरा और इक्कीसवीं सदी के बदलते परिदृश्य को चित्रांकित करती है हर लघुकथा। कथाओं की मारक क्षमता अद्वितीय है। कथा चयन हेतु संपादक वीर जी बधाई के पात्र हैं। निर्दोष मुद्रण, विषयानुरूप मुखपृष्ठ के साथ समस्त कथाएं लघुकथा के इतिहास में संपूर्ण अर्थवत्ता के साथ मौजूद हैं। ।

©  सुश्री इंदिरा किसलय 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #३१६ ☆ भावना के दोहे – मन मोहन  ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से  प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं – भावना के दोहे – मन मोहन )

☆ साप्ताहिक स्तम्भ  # ३१६ – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे – मन मोहन  ☆ डॉ भावना शुक्ल ☆

 

करते तेरी वंदना, हम तो आठों याम।

मन मोहन से पूछती, कब आओगे श्याम।।

 *

अंतस् की पीड़ा बढ़ी, कहाँ छुपी मुस्कान।

अभिनय तुम करना नहीं, उससे तुम अंजान।।

 *

मीत हमारी प्रीत का, तुझे नहीं है भान।

अब तो मुझको समझ लो, तुझमें बसती जान।।

 *

शर्त नहीं हमने रखी, प्रेम किया आगाध।

दोष नहीं तुमको दिया, बस मेरा अपराध।।

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : bhavanasharma30@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #२९८ ☆ कविता – यह कैसी तकरार लड़ाई… ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है समसामयिक विषय पर आपकी  एक कविता – यह कैसी तकरार लड़ाई आप  श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # २९८ ☆

कविता – यह कैसी तकरार लड़ाई☆ श्री संतोष नेमा ☆

यह कैसी तकरार लड़ाई

बात किसी को समझ न आई ।।

दादागीरी की ज़िद देखो ।

अमरीका ने आग लगाई ।।

यह कैसी तकरार लड़ाई ।

यह कैसा कानून कायदा ।

देखें अपना सिर्फ फायदा ।।

यूएन ओ धृतराष्ट्र बना है।

दिखे ना उसको कहीं आपदा ।।

आज समय लेता अंगड़ाई ।

यह कैसी तकरार लड़ाई ।

यूक्रेन को धमकाता रसिया ।

यूएसए की चालें घटिया ।।

रखते बड़ी नाक मतवाले ।

कातिल चाल चलें नटखटिया ।।

केवल अपनी दिखे भलाई ।

यह कैसी तकरार लड़ाई ।

पाक बड़ा नालायक लगता ।

जिसका खाता उसको ठगता ।।

हमला करता अफगानों पर ।

बारूदों से स्वयं सुलगता ।।

बढ़ा रहा आतंक कसाई ।

यह कैसी तकरार लड़ाई ।

किम जोंगुन की बात निराली ।

करे नित्य आघात मवाली ।।

सनक मिजाजी उसकी शातिर।

निंदनीय है न्याय प्रणाली ।।

मिसाइलें उसने चलवाई ।

यह कैसी तकरार लड़ाई ।

भले देश छोट इजरायल ।

है अमेरिका उसका कायल ।

कैसी जंग छिड़ी है भाई ।

कदम कदम मानवता घायल ।।

समझ गई दुनिया कुटिलाई ।

यह कैसी तकरार लड़ाई ।

खेल तेल का हर दिन चलता ।

मन में खोट इरादा पलता ।।

दबा रहे दीगर देशों को ।

यह संतोष खेल अब खलता ।।

जगजाहिर इनकी चतुराई ।

यह कैसी तकरार लड़ाई ।

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

वरिष्ठ लेखक एवं साहित्यकार

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 70003619839300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # ९६१ ⇒ हल्दी और मेंहदी ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “हल्दी और मेंहदी।)

?अभी अभी # ९६१ ⇒ आलेख – हल्दी और मेंहदी ? श्री प्रदीप शर्मा  ?

हल्दी और मेंहदी दो ऐसी दी हैं, जो अपने ही रंग में रंगी हुई हैं, और जिसके हाथ लग जाती हैं, उन्हें भी हाथों हाथ रंग जाती हैं।

जहां भी रस्म है, रिवाज है, उत्सव है, तीज त्योहार है, खुशी का मौका है, शादी ब्याह है, दोनों दीदियां सज धजकर तैयार हैं।

हल्दी अगर एक गांठ है तो मेंहदी एक हरा भरा कांटेदार पौधा। हल्दी इतनी हेल्दी है कि खाई भी जाती है और लगाई भी जाती है। जब कि मेंहदी सिर्फ लगाई जाती है। कुदरत ने इन दोनों को इतना तबीयत से रंगा है कि जो भी इन्हें पीसता है, अथवा घोलता है, खुद इनके रंग में सराबोर हो जाता है।।

मेंहदी लगी मेरे हाथ! सिर्फ हाथ ही क्यों ? सर से पांव तक आजकल मेंहदी का सम्राज्य फैला हुआ है। कहीं कहीं तो यह आलम है कि रविवार की छुट्टी का दिन मेंहदी दिवस ही बन जाता है। मेंहदी आजकल सिर्फ श्रृंगार नहीं, फटते पांवों के लिए राहत है, किसी के लिए शौक है तो किसी के लिए रोजगार। चारों ओर फल फूल रहा मेंहदी का कारोबार।

गोरे गोरे हाथों में मेंहदी लगा के

नैनों में कजरा डाल के।

चली दुल्हनिया पिया से मिलने

छोटा सा घूंघट निकाल के।।

एक नहीं ऐसे कई लोकगीत ढोलक की थाप पर महिलाओं द्वारा गाये जाते हैं जब मेंहदी और हल्दी की रस्म होती है।

मेंहदी तो खैर महिलाओं की जीवन संगिनी है लेकिन हल्दी रस्म बड़ी खास होती है। एंटी बैक्टिरियल और एंटीसेप्टिक गुण तो होते ही हैं हल्दी में, रंग में निखार तो आता ही है, एक तरह का उबटन ही तो है हल्दी। हल्दी लगाई नहीं जाती, लगवाई जाती है। दूल्हा हो अथवा दुल्हन, गालों पर कितनी उंगलियां हल्दी लगाती हैं, कोई हिसाब नहीं।।

मेंहदी जहां जहां भी रच जाती है, बस प्रेम और रंग बरसाती है। जब कि हल्दी दूध में भी घुल जाती है, हड्डियों को मजबूत ही नहीं करती, खून भी बढ़ाती है। हल्दी का नाम लेकर हल्दीराम भले ही मशहूर हो गया हो, हमारे घर में एक बार नमक नहीं हो, चलेगा, हल्दी नहीं हो, नहीं चलेगा। कच्ची हल्दी भी बड़ी गुणकारी होती है। इसका अचार भी बनता है और सब्जी भी।

कैसी कहावत है यह, हींग लगे ना फिटकरी….? जब कि ना हींग में कोई रंग है और ना ही फिटकरी में। माना कि हींग में ही हिना के समान ही खुशबू है और फिटकरी पानी साफ करती है लेकिन जब भी चोखे रंग की बात होगी, खुशबू और महक की रात होगी, वहां हल्दी और मेंहदी हमेशा साथ होंगी। देखिए मेंहदी का रंग ;

बन्नी के गोरे गोरे हाथ

मेंहदी लगाओ रे।

इस पे बन्ने का लिख दो

नाम ..!!!

और अब हल्दी का रंग ;

सोने के कटोरवा में पिसल

हरदी अम्मा लहे लहे

हरदी लगावे ;

चटकार अम्मा लहे लहे।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares