मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दुभंग… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ दुभंग ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

  सगुणाचा साकाराचा भक्त दिंडीत नाचतो

 निर्गुणाच्या वारूळात मौन निराकार होतो

कधी औदार्याचा राणा कधी कार्पण्याचा स्वामी

भोगी कधी ऐहिकाचा कधी स्मशानाचा जोगी

 *

हाच विदेही अनंत देहाचाही हाच बंदी

 तोडी वज्राच्या शृंखला कुसुमांचा हाच कैदी

 *

 पोथ्यापुराणात शोधी यक्षप्रश्नांचे  उत्तर

आरशात एक कोडे  करी यास निरुत्तर

 *

 याचे उत्थान असीम याचे पतनही धन्य

मायामोही गुंतलेली  मोक्ष भक्तीही अनन्य

 *

पंचप्राणा भिडे याच्या   दूर  हाक श्रेयसाची 

बेडी  तूटता  तुटेना पायातल्या प्रेयसाची

 *

द्वैत  अद्वैताचे द्वंद्व  काही केल्याही सरेना 

 दोन्ही घरात क्षुधार्त दोन्ही लोकीचा पाहुणा

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हा वाकांबी मनभावन… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हा वाकांबी मनभावन… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(उद्धव वृत्त)

(मात्रा : 2+8+2+2=14)

फुललेल्या कारंजाची 

ही सुमने सुंदर सजली

अन् गंध गोड देताना 

मम् मनात सारी रुजली

*

हा वाकांबी मनभावन

मोहिनी घालतो कणकण

हे वैशाखाचे वैभव 

की रिमझिमणारा श्रावण

*

बहु रूप गुणाच्या खाणी

या कुंभी अंगी लपल्या

मी शब्दांना गोंजारत

त्या काव्यामध्ये टिपल्या 

*

श्वेतांगी तुषार त्यातच 

रक्तांगी मोहर फुलतो

हा कुंबी रंगीत शेला

पांघरताना मग खुलतो

*

हा वाक नामे आला

अन् जंगली पेरु झाला

शिरपेचावर वृक्षाच्या

जरतारी किरिटच ल्याला

*

हा वैद्यराज गुणकारी

लोभसवाणा मजमोही

मी कविता त्यावर करता 

मग सुखावला ना तो ही

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गणित… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गणित… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

मुखी न येवो अवाक्षर

सद्गुरू आई खेरीज,

होईल पापांची नक्कीच वजाबाकी,

अन् पुण्याची बेरीज…

 

या जीवनाच्या गणितात

उरेल नक्कीच शून्य,

असता हृदयी तूझीच भक्ती,

मज नकोच काही अन्य..

 

सार्थ जीवन 

कृतार्थ हा जन्म

न देणे न मागणे

सुटले गणित मम…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१० ☆ आशा भोसले… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१० ?

☆ आशा भोसले… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आशा भोसले आहेत आजही–

गाण्याच्या लकेरी देताहेत साक्षी !

 

जन्मताच ऐकली कितीतरी गाणी,

नाचरे मोरा आंब्याच्या वनात…

ते..चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी!

    आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,

खूप जवळचे वाटले आशाचे गाणे

..

एका तळ्यात होती..

मी मज हरपून बसले गं..

केव्हा तरी पहाटे…

उषःकाल होता होता..

परवशता पाश ज्यांच्या….

युवती मना….

आशा भोसले नित्य नवी !!

 

आयुष्यातल्या सर्व भावना

त्या स्वरातून व्यक्त झाल्यात!

मग बुगडी माझी सांडली चा

ठसका असो की,

ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर चा भक्तिभाव!

ही वाट दूर जाते….चा आशावाद  ,

आणि

जीवलगा राहिले रे दूर घर माझे…..चे आर्त स्वर!

आशा काळजात रुतून बसलेली !

आशा इथेच आहे….

वो हसीन दर्द दे दो जिसे मैं

गले लगे लगा लूं….म्हणणारी !

एक आर्त विराणी–

काळाच्या पडद्याआड..

तरीही…

चिरंजीवी..चिरंतन!!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवीची कविता… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ कवीची कविता... ☆ श्रीशैल चौगुले ☆

जाता-जाता सहज लिहीता

शब्दासंगे होईल कविता

निळे आभाळ, हिरवी धरा

मनातली सरिता-सविता.

सहा ऋतूतले रत् भोळे

शब्द माझे मोहिती कोकिळे

रान पिकातून फुलपाखरे

भृंगर गुंजन काव्यांचे चाळे.

 *

प्रहर-प्रभाती भुपाळी सुचे

सोनेरी शब्दांचे ते भाव रचे

चिव-चिव पाखरेही अंगणी

चिंतन चटकन शब्द वेचे.

 *

अक्षर पिसारे फुलते स्पंदनी

हृदय सुखावे ओहोळ प्रवाही

अलगद उन्हात झुले सावली

वैशाखातही काव्य मोद ग्वाही.

 *

पाऊस हलका शब्दात खेळे

श्रावण येता कवितांचे मेळे

चंद्रात चांदणे शरद गाणे

हेमंती मग छंदातच लोळे.

 *

आता सांजवेळी उगी नजर

आठवणीसंगे शब्दा पाझर

सरते असेच कवितेचे वय

वड-पिंपळ काव्याला गोजिर.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

मागील भागात आपण मधुरा भक्ती विषयी थोडी माहिती घेतली. या भागात भक्तीच्या याच प्रकाराविषयी आणखी काही माहिती घेऊ.

स. रा. गाडगीळ यांच्या मते मानसशास्त्रीय पध्दतीने मधुरा भक्तीचा उलगडा करणे हे चुकीचे आहे. त्यांच्या मते तो पंथ जेथे उदयाला आला, तेथील विशिष्ट परिस्थितीत अगर परंपरेत त्याची मुळे पाहणे आवश्यक आहे. चैतन्यांनंतर बंगालमध्ये विकसित झालेला वैष्णव धर्म आणि वज्रयान बौध्द पंथातून विकसित झालेला सहजिया पंथ यांनी मधुरा भक्तीचा संप्रदाय विकसित केला, असे ते मानतात. स्त्री बनल्याशिवाय खरे प्रेमरहस्य आस्वादिता येणार नाही, अशी सहजिया पंथाची धारणा होती.

पुरूषभक्ताने स्त्रीवेष धारण करण्याच्या कृतीचे स्पष्टीकरण धर्मशास्त्राच्या इतिहासात शोधण्याचे प्रयत्‍नही झाले आहेत. प्रारंभी मातृप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियाच देवतांच्या पुजाऱ्याचे काम करीत असत. पुढे पुरूष पुजारी बनले परंतु पुजाऱ्याने स्त्री असले पाहिजे, या विचाराचा पगडा समाजमनावर असल्यामुळे पुरूष-पुजारी स्त्रीवेषातच वावरू लागले असावेत. आपल्याकडचे पोतराज वगैरे स्त्रीवेष धारण करतातच. अशा रीतीने पुरूषाने स्त्री बनण्याची कल्पना मातृप्रधान संस्कृतीमधून मधुरा भक्तीच्या संप्रदायात आली असावी, असे एक मत आहे.

जे. जी. फ्रेझर यांनी केलेल्या नोंदीनुसार पिलू बेटांमध्ये देवी आपला पुजारी म्हणून स्त्रीची निवड करण्याऐवजी पुरूषाची निवड करते. त्या पुजाऱ्याच्या अंगात येते आणि तो पुरूष मग स्त्रीसारखा वागू लागतो अशी समजूत आहे. अमेरिकेतील अनेक आदिम जमातींमध्ये असे पुजारी आढळतात. दृष्ट लागू नये म्हणून स्त्रीवेष धारण करण्याची पध्दतही काही ठिकाणी आढळते. याच हेतूने विवाहात वधूवरांनी एकमेकांचा वेष घालण्याची प्रथाही काही समाजांत आढळते.

चैतन्य महाप्रभू हे मधुरा भक्तीचे प्रमुख प्रवर्तक होते. त्यांच्यामुळेच बंगालमध्ये हा संप्रदाय रूढ झाला. आयुष्याच्या अखेरची अनेक वर्षे ते राधारूपातच वावरत होते.

रामकृष्ण परमहंसही काही काळ स्त्रीवेषात वावरले होते. वल्लभाचार्यांच्या पुष्टिमार्गानेही मधुरा भक्तीचा जोरदार पुरस्कार केला होता.

मधुरा भक्तीचा स्वीकार करणाऱ्या विविध भक्तांनी व सांप्रदायिकांनी ललित व ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली. चैतन्य प्रभूंच्या रूपगोस्वामी, जीवगोस्वामी, सनातनगोस्वामी वगैरे शिष्यांनी मधुरा भक्तीचे एक तत्त्वज्ञान निर्माण केले. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य या भक्तीच्या पाच प्रकारांपैकी माधुर्यभक्ती सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी मानले. त्यांनी मधुर रसाचे एक साहित्यशास्त्रही मांडले. मधुररस हा तत्त्वत: भक्तीच्या स्वरूपाचा असला, तरी त्याच्यामधील प्रिया-प्रियकर नात्यामुळे त्याची वर्णने मात्र शृंगाररसा सारखी करण्यात आली आहेत.

गुलाबराव महाराजांचा (इ स १८८१-१९१५) अपवाद वगळता, मराठी भक्तीसंप्रदायात मधुरा भक्तीला फारसे स्थान मिळालेले नाही. गुलाबराव महाराज स्वत:ला ज्ञानेश्वरांची कन्या व कृष्णाची पत्‍नी मानत. तसेच स्त्रीवेष व मंगळसूत्रादि सौभाग्यचिन्हेही धारण करीत असत. अमरावती येथे त्यांच्या संप्रदायाचे ‘श्रीज्ञानेश्वर मधुरा द्वैत सांप्रदायिक मंडळ’ आहे.

भारतातील अन्य प्रांतांतूनही मधुरा भक्तीचा स्वीकार करणारे संत होऊन गेले आहेत. तमिळनाडूमधील नम्माळवार (६ वे शतक) हे त्यांपैकी एक होत. विदर्भातील देवनाथ हे कवी स्वत:ला प्रियकर व परमेश्वराला प्रेयसी मानत असत. भारतातील मूसाशाही सुहाग (१५ वे शतक) हे सूफी साधू परमेश्वराला पती मानत व स्वत: स्त्रीवेष धारण करीत असत. युरोपमधील ख्रिस्ती संतांनी परमेश्वराच्या मधुरा भक्तीचा अनुभव घेतल्याची वर्णने ही आढळतात. मुस्लिम स्त्री संत रबिया (इ स ७१७-८०१) ही परमेश्वराला पती मानून त्याची भक्ती करीत असे.

जन्मत: स्त्री असलेल्या भक्तांनी मधुरा भक्तीचा स्वीकार केल्याची उदाहरणेही आहेत. संत मीराबाई या त्यापैकी प्रमुख होत. त्या स्वत:ला ललिता नावाच्या गोपीचा अवतार आणि कृष्णाला आपला पती मानत असत. आळवार संतांपैकी आंडाळ ही रंगनाथाला म्हणजेच कृष्णाला आपला पती मानत असे. तिने रंगनाथाच्या मूर्तीचे दर्शन घेताच ती रंगनाथाशी एकरूप झाली, असे म्हणतात. दक्षिणेत अजूनही दरवर्षी तिचा व रंगनाथाचा विवाहदिन साजरा केला जातो.

याच प्रकारच्या भक्तिरसाचा अविष्कार आपल्याला ‘गीतांजली’ तील गीत क्र ५२, ५३, ५४, ५६, ५७, ५९, ७२, ७३, ७४, ८९, ९१, ९४, ९९, १०१, १०२ मध्ये कमी अधिक प्रमाणात पहायला मिळतो.

—–

☆ गीत : ५५ ☆

LANGUOR is upon your heart and the slumber is still on your eyes.

Has not the word come to you that the flower is reigning in splendour among thorns? Wake, oh awaken! Let not the time pass in vain!

At the end of the stony path, in the country of virgin solitude my friend is sitting all alone. Deceive him not. Wake, oh awaken!

What if the sky pants and trembles with the heat of the midday sun ⎯ what if the burning 

sand spreads its mantle of thirst ⎯

Is there no joy in the deep of your heart? At every footfall of yours, will not the harp of 

the road break out in sweet music of pain?

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत:५५ ☆

जागा असशी परी ये भानावर

दूर जायचे तुज असे खरोखर

डोळ्यात झोप, मनात मरगळ

झटकून दे, व्यर्थ जातोय काळ॥ 

*
काट्यांसंगे गुलाब बहरतसे

वैभवात अन् राज्य करितसे

संकटे झेलण्या तुझेच रे बळ

ध्यानी धरी, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

थांबू नको वाट बिकट जराशी

सखा एकटा त्या निर्जन प्रदेशी

वाट पाहे, करी प्रवास सुफळ

भेट न चुको, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

झेलुनि रवितापा नभ उरी कंपते

तप्त वाळु भिउनि जळात भिजते

तसा सोसुनि भवताप सकळ

मार्ग आक्रमी, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

हर्ष अंतरीचा तुज जाणवेल

चाहूल हरीची जेंव्हा कळेल

सुसह्य होईल वेदनेची कळ

ऊठ ऊठ, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

टाक पाऊले त्या वाटेवरती

पदरवातुनि तारा झंकारती

मुक्त हो, त्यागुनि देहाची खोळ

त्वरा करी, व्यर्थ जातोय काळ॥

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆ गीत : ५६ ☆

THUS it is that thy joy in me is so full. Thus it is that thou hast come down to me. O thou lord of all heavens, where would be thy love if I were not?

Thou hast taken me as thy partner of all this wealth. In my heart is the endless play of 

thy delight. In my life thy will is ever taking shape.

And for this, thou who art the King of kings hast decked thyself in beauty to captivate my heart. And for this thy love loses itself in the love of thy lover, and there art thou seen in 

the perfect union of two.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५६ ☆

मला पाहता, तुझ्या अंतरी, प्रीत जागते

उतरलास पायरी, ठाऊक तरी तुला सांगते

*
मी नसते तर सांग कुणावर होशी आरक्त

तुला मिळविण्यासाठी मी ही झाले विरक्त

*
जे जे मजला आनंद देई, ते ते निर्मित जाशी

कान्हा, जिंकाया मन माझे रूपे अनेक घेशी

*

सर्वस्व अर्पुनि मजला, आलास हृदयी रिक्त

आनंद मनी दाटला, काय सांगू त्या नसे अंत

*

कळले नाही, तू माझ्यात मी तुझ्यात विरले

दोन मने जुळता, जीव शिव ना अलग उरले

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : ५७ ☆

LIGHT, my light, the world-filling light, the eye-kissing light, heart-sweetening light!

Ah, the light dances, my darling, at the centre of my life; the light strikes, my darling, the chords of my love; the sky opens, the wind runs wild, laughter passes over the earth.

The butterflies spread their sails on the sea of light. Lilies and jasmines surge up on the crest of the waves of light.

The light is shattered into gold on every cloud, my darling, and it scatters gems in 

profusion.

Mirth spreads from leaf to leaf, my darling, and gladness without measure. The heaven’s river has drowned its banks and the flood of joy is abroad.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत:५७ ☆

कसे सांगू माझे प्रकाशाशी नाते

तो माझा, फक्त माझाच वाटते

*
डोळ्यांना चुंबतो, हृदयी माधुर्य भरतो

अंतरी नाचतो, हृदयाची तार छेडतो

*

प्रिये, बघ आकाश त्याने उघडले

हास्य किरण धरणीवर उधळले

*

प्रकाश सागरात फुलपाखरांच्या बोटी

तर लाटेवर स्वार पुष्पगंधाची लोटी

*

प्रिये, बघ सोनेरी शिंपल्यात मेघ

भरून, भारून टाकला विश्व परीघ

*

मुक्त हस्ते करतो, रत्नांची उधळण

पानापानांतून आनंदाची पखरण

*

बांध तोडले गंगेने, भरून आला ऊर

अथांग पसरेल आता आनंदाचा पूर

– क्रमशः भाग १९..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझे वाचन” – लेखिका: शेफाली वैद्य  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “माझे वाचन” – लेखिका: शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

माझे वाचन खूप वेगवेगळ्या विषयांवर, पण फार विस्कळीत असते. माझ्या बेडसाईड टेबलवर एकाच वेळी चार ते पाच तरी वेगवगळ्या विषयांवरची आणि वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तके असतात, आणि थोडे हे पुस्तक, थोडे ते पुस्तक असे चाखत माखत वाचन सुरु असते. फक्त मंदिर स्थापत्य, भारतीय वस्त्रकला आणि एकूणच कला हे तीन आवडीचे आणि अभ्यासाचे विषय सोडले तर माझे वाचन बरेचशे बेशिस्त, अघळपघळ आणि विस्कळीत आहे, बट समहाऊ, इट वर्क्स फॉर मी!

आता हेच बघा ना, शंकर रामाणींची कोकणी कविता मला थेट माझ्या बालपणीच्या गोव्यात घेऊन जाते. त्यांच्या प्रत्येक शब्दाला गोव्याच्या खाऱ्या वाऱ्याचा गंध आहे, तिथल्या तांबड्या मातीचा रंग आहे, तिथल्या जाई-सुरंगीचा परमळ आहे आणि तिथल्या आठवणींची आंबटगोड अमूरपिकी चव आहे. आता हीच, छोटीशीच कविता पहा ना,

खंयचो हो गांव?

पांचवेंचार सेम

अपरूपाचे ब्रह्म

चंवरता.

 

पालवली वात ;

फांतोडेची भूल

उजवाडाचो धुल्ल

म्हज्या दारां.

पहिल्या वाचनात ही कविता अगदीच साधी वाटते; पण थोडं थांबून विचार केला तर कळतं की रामाणी कुठली अध्यात्मिक जाणीव कवितेत जिवंत करू पाहतात.

‘खंयचो हो गांव? ’ हा प्रश्न साधा नाही, आपण कोण? कुठले? कुठे उभे आहोत? हे विचारणारा हा साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. आयुष्याच्या ज्या वळणावर कवी उभा आहे, तिथे तो स्वतःलाच हा प्रश्न विचारतोय. पांचवेंचार सैम/अप्रूपाचे ब्रह्म ह्या ओळीत कवी आधीच्या प्रश्नाचे उत्तर देतो. सैम म्हणजे निसर्ग, जो स्वतःच जणू अप्रुपाचं ब्रह्म आहे. सगळं निसर्गचक्र एकमेकांत गुंफलेलं आहे. माती, पाणी, उजेड, वारा, आणि मानवी जीवन सारं एकाच धाग्यात ओवलेलं. समुद्राच्या पाण्यात अदृश्य रूपात मीठ असावं तसं हे ब्रह्मरूप आहे. म्हटलं तर हा साक्षात्कार सोपा आहे, पण जीवन इतकं सोपं, सरळ नसतं.

‘फांतोडेची भूल’ हा किती अचूक शब्द वापरलाय रामाणींनी. आयुष्यात किती तरी वेळा आपल्याला चकवा लागतो, पहाटेच्या धुक्यात पुढ्यात पुढ्यात रस्ता असूनही आपण कधी कधी चुकीच्या वाटा धरतो. ‘उजवाडाचो धुल्ल म्हज्या दारां’, म्हणजे प्रकाश आहे, पण तो स्वच्छ नाही. प्रकाशाचा धुरळा आहे. सत्य आपल्या पुढे आहे, पण ते स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी नजर आधी स्वच्छ करावी लागते. मला रामाणींची कविता भाषेचं साधं सौंदर्य आणि तरीही त्या कवितेला व्यापून उरलेली एक प्रकारची अध्यात्मिक गूढता ह्यासाठी आवडते.

‘देखणा देहान्त जो’ हे वनिता पटवर्धन ह्यांचे पुस्तक सर्वांगाने मृत्यूविषयी भाष्य करते. जरा वेगळा विषय आहे, पण अध्यात्मिक, साहित्यिक, तात्त्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेतलेला मृत्यूचा धांडोळा वाचनीय आहे. तसेही कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला मृत्यू ह्या संकल्पनेबद्दल एक सुप्त आकर्षण असतेच.

नितीन वैद्य Neeteen Vaidya हे फेसबुकवरचे माझे एक आवडते लेखक. ते मुखत्वे पुस्तकांविषयी लिहितात. त्यांच्या वाचनात कमालीचे सातत्य आणि शिस्त आहे, जी बघूनच माझी छाती दडपून जाते. इतक्या शिस्तीने मी काहीच करू शकत नाही, पण ‘वाचून उरणारी पुस्तके’ हे त्यांचे त्यांच्या वाचनप्रवासाबद्दलचे पुस्तक खरोखरी छान आहे. ते म्हणतात तसे ‘पुस्तके तुम्हाला वेगवेगळ्या शक्यतांच्या तिठ्यावर आणून सोडतात’.

भैरप्पांचे सार्थ हे माझ्या अतीव आवडीचे पुस्तक. आठव्या शतकातल्या भारताचा प्रचंड भौगोलिक आणि सांस्कृतिक पट वाचकांपुढे उलगडणारे हे पुस्तक मी कितीही वेळा वाचू शकते. आता एक दीर्घ लेख लिहिण्याच्या निमित्ताने कितव्यांदा तरी परत वाचून काढले. भैरप्पांच्याच जास्त लोकप्रिय असलेल्या आवरणचं प्रिक्वेल म्हणून प्रत्येकाने सार्थ वाचावं असं मला वाटतं. भारताच्या ऱ्हासकाळाची सुरवात सार्थ मध्ये नोंदली गेली आहे तर मध्य आवरण मध्ये.

ह्यातलं ‘आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी’ हे पुस्तक इतर पुस्तकांहून वेगळं आहे. बचत, गुंतवणूक आणि खर्च ह्या तिन्ही संकल्पनांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारं हे पुस्तक पैश्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देतं. जवळचा पैसा खर्च करणं म्हणजे फक्त नोटा मोजून एखादी वस्तू विकत घेणे नव्हे, तर आपण पैसे केव्हा, कसा आणि कशावर खर्च करतो ह्यातून आपलं व्यक्तिमत्व आणि आपल्या प्राथमिकता परिभाषित होतात हेच हे पुस्तक विविध उदाहरणे देऊन सांगतं. पैशाला नाकारायचं नाही, तुच्छ लेखायचं नाही पण त्याला आपल्या आयुष्याचा राजाही बनवायचं नाही हेच हे पुस्तक सांगतं. अनुभवांवर, शिक्षणावर, आरोग्यावर, नात्यांवर केलेला खर्च ही उधळपट्टी नसते, ती आपल्या आयुष्यात केलेली गुंतवणूक असते हा महत्त्वाचा धडा हे पुस्तक देतं.

ही सगळी पुस्तकं एकाच वेळी वाचताना मला असं जाणवत होतं ही पुस्तकं वेगवेगळी असली, तीन वेगवेगळ्या भाषांमधली असली तरी कुठेतरी ह्या सगळ्या पुस्तकांना जोडणारा एक अदृश्य धागा आहे, तो म्हणजे वाचक म्हणून माझा दृष्टिकोन. रामाणींच्या कवितेतला “खंयचो हो गांव? ” हा प्रश्न, भैरप्पांच्या लेखनातून उमटणारी इतिहासाची जाणीव, वनिता पटवर्धनांची मृत्यूकडे पाहण्याची शांत, थेट नजर, नितीन वैद्यांचे ठासून सांगणे की पुस्तके मित्र असतात, जगण्याला आधार देतात पण जगावं मात्र आपल्यालाच लागतं आणि मॉर्गन हौसेलची पैशाकडे बघण्याची प्रगल्भ समज हे सगळंच शेवटी वाचक म्हणून आपल्यालाच आपली ओळख नव्याने करून देतं.

वाचन शिस्तीत करता आलं तर आनंदच आहे, पण तसं ते नसलं तरी जिवंत असावं लागतं. थोडं असं, थोडं तसं, कधी विस्कळीत, कधी नेमकं, पण सतत आपल्याला घडवत राहणारं. जसं समुद्राच्या वाऱ्यात मीठ असतं, तसं या सगळ्या वाचनात वाचक म्हणून आपल्या अनुभवांचं, आठवणींचं आणि जाणिवांचं एक सूक्ष्म पण कायम राहणारं अस्तित्व असतं. आणि मग लक्षात येतं, शंकर रामाणी शोधत असलेलं ‘गांव’ हे बाहेर नसून, या सगळ्या शब्दांमध्ये, त्यातून मिळणाऱ्या अनुभूतींमध्ये, स्वतःच्या आतच कुठेतरी शांतपणे वसलेलं आहे.

लेखिका:शेफाली वैद्य

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुंड… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ गुंड… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

 चांगले लोकही आंधळे जाहले

फालतू वागले कावळे जाहलें

संगती भोवल्या नासल्या भावना

भोग भोगायचे सोहळे जाहले

 *

गुंतले ते असे लाभल्या यातना

जाणते शाहणे वेंधळे जाहले

 *

सापळे मांडले कोंडली माणसे

भक्त सारे कसे बावळे जाहले

 *

धर्म आहे कुठे राहिला चांगला

कर्म आहे इथे पांगळे जाहले

 *

साधना संपली वासना जागली

पाप ही हासले सोवळे जाहले

 *

बंधने संपली कायदे मोडले

गुंड आता पुन्हा मोकळे जाहले

 *

रंगल्या बातम्या संपली तीवृता

ढोंग आता किती कोवळे जाहले

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २. ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २. ☆ प्रा.भारती जोगी ☆

दुर्गाबाई दामोदर चाफेकर 

२२ जून… हा दिवस म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील धगधगते पान! त्या पानावरील होमकुंड म्हणजे आपल्या सशस्त्र क्रांतीने पेटविणा-या चाफेकर बंधूंच्या अभिमानास्पद योगदानाचं तेजाळलेलं दर्शन!!

१८९७ मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये तपासणीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्लेग कमिशनर कॅप्टन रॅंड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट यांच्यावर गोळ्या झाडून केलेला वध! ही घटना इतिहासातील पानावर कोरली गेली. नंतर १८ एप्रिल १८९८ रोजी मोठे बंधू दामोदर चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली. स्वातंत्र्य यज्ञात बलिदान दिलेला हा हुतात्मा!!

पण… त्याच होमकुंडात, समिधा म्हणून सतत स्वतः ला समर्पित करत राहिलेल्या… पण साधा नामोल्लेख च काय पण… साधं नाव देखील माहीत नसलेल्या अशा… उपेक्षित आणि अलक्षित स्त्रियांपैकी एक… स्वातंत्र्यवीराची पत्नी… दामोदर चाफेकरांची अर्धांगिनी *दुर्गाबाई*!!

दुर्गाबाई पिंपरी जवळील *मेंढ-याचे तळे* येथील होळकर घराण्यातील! एक हसरी, मिश्किल स्वभावाची मुलगी! गाणेही उत्तम गात असे. सणासमारंभात जमलेल्या नातेवाईकांना एकत्र करून नाच-गाणी करत असे. थोडक्यात काय तर एक हसता-खळाळता, उत्फुल्ल, निर्मळ निर्झर! अतिशय नाजूक अशी बाला! गंमत म्हणजे तिला शीळ देखील वाजवता येत असे.

ही अशी भरभरून जगणारी दुर्गा, १७ व्या वर्षी दामोदर चाफेकर यांच्याशी विवाह संपन्न होऊन चाफेकरांच्या घरात मोठी सून बनून प्रवेशली आणि दुर्गा… दुर्गा *बाई* बनली… आणि बघता-बघता तिच्यातली अल्लड, खेळकर, खुशमिजाज दुर्गा तिच्या बाईपणाच्या कोशात गुरफटून जणू अस्तित्व हीन झाली. दामोदर रावांच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या प्रवाहाविरुद्ध न वाहता, त्याच प्रवाहात स्वतः ला पूर्णपणे सामावून घेत, जीवन प्रवाह वाहता ठेवला तिनं!

दामोदर चाफेकरांना फाशी झाली. दुर्गाबाई आणि धोंडीराम नामे त्यांचा पुत्र मागे राहिले. दामोदर चाफेकरांचे, चाफेकर बंधूंचे नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अमर झाले. पण इतिहासात अशा प्राणांची आहुती देऊन अमर झालेल्यांच्या कुटुंबियांचे… पत्नी, मुलांचे काय झाले असेल, हा विचार ही आम्हां आयते स्वातंत्र्य उपभोगणा-यांच्या मनात ही येत नाही, ही खरी शोकांतिका आहे.

रॅंड आणि आयर्स्ट चा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत… दोघांच्याही श्रीमतींना आणि मुलांना स्पेशल, वार्षिक पेन्शन सुरू झाले. ऑन ड्युटी मारले गेले म्हणून खास वाढीव दराने पेन्शन सुरू झाले. पण…

दामोदर चाफेकर… जे… खरं म्हणजे देशासाठी ड्युटी करून फासावर चढले, त्यांच्या पाठीशी घरी राहून ऑन ड्युटी राहूनही, दुर्गाबाई आणि त्यांच्या मुलाला कोणतेही पेन्शन मिळाले नाही. १८९७ मध्ये त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्या १९५६ पर्यंत… म्हणजे ६० वर्षे जगल्या. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही त्या ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले, ना, पती स्वातंत्र्य सैनिक असल्याचे ताम्रपट मिळाले!

हीच ती खरी खंत! विचार करावा अशी बाब!! शेवटी होमकुंडात किती आणि कोणत्या समिधा जळल्या… कुणी पाहिल्या ना????

*ज्या प्रबला निज भाव बलाने*

*करिती सदने हरिहर भुवने*

*देव -पतिना वाहिनी सुमने*

*पाजुनी केशव वाढविती*

*परी जयांच्या दहनभूमीवर,

नाही चिरा नाही पणती…

* तेथे कर माझे जुळती!!

– लेख क्र. २.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनातले आभाळ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

🙏 मनातले आभाळ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मनी दाटल्या आभाळाला

कधीतरी मोकळे करा,

डोह दुःखी आठवांचे

नित्य नेमाने रिते करा!

मनी दाटल्या आभाळाला

फिरू दे मुक्त आभाळी,

लादू नका तुमची घुसमट

तुम्ही त्याच्या कपाळी!

 *

मनी दाटल्या आभाळाला

नका घालू तुम्ही वेसण,

करून त्या मोकळे ढाकळे

करा साजरा रोज सण!

 *

मनी दाटल्या आभाळाला

भरू दे स्वतः आपले रंग,

कुवत त्याची जोखा तुम्ही

ते समर्थ रचण्या अभंग!

ते समर्थ रचण्या अभंग!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares