वरील कविता लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे, आपल्या सर्वांसाठीच असलेला बिकट करोना काळ मुख्यत्वे कारणीभूत आहे. त्या वेळी आलेला श्रावण महिना हा खूपच वेगळा, असुरक्षित आणि भीतीदायक होता.
लहानपणापासून जो आनंद श्रावण महिन्यात अनुभवला होता त्याची आठवण तेव्हा अगदी बेचैन करत होती. त्या बालपणीच्या आठवणींमुळेच ह्या कवितेचा जन्म झाला.
ही कविता लिहिणे म्हणजे थोडक्यात बालपणीच्या आठवणींना उजाळा देणे आणि प्रत्यक्ष नाही परंतु कवितेच्या माध्यमातून स्वतः आणि आप्तजनांना ह्या पवित्र महिन्याचा अनुभव घडवणे हाच एक उद्देश्य होता.
☆ “अहिंसक आंदोलनाचे आणि सशस्त्र क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यातील मोल…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
“दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल” हे गीत काव्यात्मक आणि राजकीय प्रतीक म्हणून महत्त्वाचे आहेच; मात्र त्यालाच फक्त स्वातंत्र्याचा इतिहास मानणे चुकीचे ठरेल. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलनांनी ब्रिटिश सत्तेला व्यापक आव्हान दिले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लाखो सामान्य लोकांनी तुरुंगवास, लाठीमार, आर्थिक नुकसान आणि सामाजिक दडपशाही सहन केली. हे आंदोलन केवळ चरखा फिरवण्याचे आंदोलन नव्हते. मिठाचा सत्याग्रह, परदेशी मालावर बहिष्कार, कर न भरणे, संप, निदर्शने आणि ब्रिटिश प्रशासनाशी असहकार या सर्वांचा त्यात समावेश होता. त्यामुळे गांधीवादी संघर्षाचे प्रतीक म्हणून चरख्याचा उल्लेख करणे आणि संपूर्ण स्वातंत्र्यलढा चरख्यापुरता मर्यादित करणे यात मोठा फरक आहे हे आपल्यासारख्या सुज्ञ माणसांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्याच वेळी, क्रांतिकारकांचे योगदान महात्मा गांधींनीही कधीच नाकारले नव्हते, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. सशस्त्र क्रांतिवीरांचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. त्याचप्रमाणे आझाद हिंद सेनेचे प्रयत्न, १९४६ मधील रॉयल इंडियन नेव्ही उठाव आणि जालियनवाला बाग हत्याकांडानंतर निर्माण झालेला संताप यांनाही इतिहासाच्या व्यापक चौकटीत स्थान द्यावे लागते.
पण येथे एक महत्त्वाची राजकीय घडामोड लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून ब्रिटिशांना क्रांतिकारकांच्या सशस्त्र संघर्षामुळेच भारत सोडावा लागला, असे म्हणणे अतिसुलभीकरण करणे होय. क्रांतिकारकांनी ब्रिटिश साम्राज्याला नैतिक, राजकीय आणि सुरक्षाविषयक आव्हान दिले, हे तर खरेच. त्यांच्या बलिदानाने तरुणांमध्ये राष्ट्रवादाची प्रेरणा निर्माण केली, हेही खरे. परंतु त्याच काळात दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनची आर्थिक व सामरिक परिस्थिती, भारतीय राजकीय जनमत, काँग्रेसचे व्यापक आंदोलन, मुस्लिम लीगचे राजकारण, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया आणि ब्रिटिश साम्राज्याच्या बदललेल्या जागतिक परिस्थिती या सर्व घटकांचा विचार करावा लागतो. याहून महत्त्वाचे म्हणजे, रक्तरंजित इतिहास आणि अहिंसक इतिहास ही परस्परविरोधी विभागणीच चुकीची आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा रक्तरंजितही होता आणि मोठ्या प्रमाणावर अहिंसकही होता. चौरी चौरा, जालियनवाला बाग, क्रांतिकारकांच्या फाशी, पोलिसांचा गोळीबार, तुरुंगातील अत्याचार आणि विविध उठाव हा त्याचा एक भाग आहे; तर सत्याग्रह, असहकार, बहिष्कार, उपोषणे, मोर्चे, जनआंदोलने आणि लाखो लोकांचा अहिंसक सहभाग हा दुसरा भाग आहे. एवंच एका प्रवाहाचे अस्तित्व मान्य करण्यासाठी दुसऱ्याला पुसून टाकण्याची गरज नाही. अन्यथा सेक्युलर विचारसरणी आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यात फरक तो काय राहील?
म्हणूनच चरखा फिरवून स्वातंत्र्य मिळाले नाही, हे वाक्य अर्धसत्य आहे. कारण चरखा ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करणारे शस्त्र नव्हता; तर तो आर्थिक स्वावलंबन, स्वदेशी आणि जनसहभागाचे प्रतीक होता. त्याचप्रमाणे भगतसिंगांची पिस्तूल किंवा आझाद हिंद सेनेची शस्त्रेही एकट्याने ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करू शकली नाहीत. स्वातंत्र्य मिळवून देणारी शक्ती म्हणजे अनेक दशकांच्या विविध प्रकारच्या प्रतिकाराचा एकत्रित ऐतिहासिक परिणाम होता. म्हणून ध्वजारोहणाच्या वेळी एखादे गांधीवादी गीत वाजवले म्हणजे क्रांतिकारकांचा अपमान होतो, असे सरळ समीकरण मांडणे हे आपल्या देशभक्तीच्या विचाराला संकुचित करते. त्याऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, सावरकर, टिळक, आझाद हिंद सेनेचे सैनिक, नौदल उठावातील सहभागी आणि असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक, या सर्वांच्या योगदानाची वस्तुनिष्ठ जाणीव ठेवणे अधिक योग्य ठरेल.
खरा इतिहास कोणत्याही एका महापुरुषाच्या किंवा एका विचारधारेच्या मालकीचा नसतो. भारताचे स्वातंत्र्य हे एका व्यक्तीचे कर्तृत्व नव्हते आणि एका विचार पद्धतीचेही फलित नव्हते; ते विविध विचारांचे, विविध संघर्षपद्धतींचे आणि असंख्य ज्ञात-अज्ञात भारतीयांच्या त्यागाचे संचित होते. म्हणून फक्त अहिंसेमुळे स्वातंत्र्य मिळाले, हे जसे अर्धसत्य आहे, तसेच फक्त सशस्त्र क्रांतीमुळे स्वातंत्र्य मिळाले, हेही अर्धसत्यच आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासाला खरा न्याय द्यायचा असेल तर चरख्याबरोबर क्रांतिकारकांचे रक्त, सत्याग्रहाबरोबर तुरुंगवास, जनआंदोलनांबरोबर सशस्त्र उठाव आणि राजकीय वाटाघाटींबरोबर साम्राज्याच्या अंतर्गत झालेला दबाव, या सर्व घटनांना योग्य ऐतिहासिक संदर्भात पहावे लागेल. असे केले तरच एकांगी विचार न करता स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमगेल आणि समजेल.
☆ स्वातंत्र्यदिन, सर्व्हर आणि नेटवर्क…☆ डॉ मकरंद पिंपुटकर☆
चिंचवडमध्ये राहणारा अमोल वयाच्या तिसाव्या वर्षीच संसाराच्या सुखदुःखाचे मोठे अनुभव घेत होता.
… सुख म्हणजे सुट्टीचा दिवस, क्रिकेट आणि मिसळ.
… दुःख म्हणजे सोमवार, ऑफिस आणि बायकोने सांगितलेला “थोडासा” व्यायाम.
दोन वर्षांपूर्वीच नेहा आणि अमोलचं लग्न झालं होतं. लग्न चांगलंच मानवलं होतं त्याला. नेहा जरी त्याला लाडात “ढोलू” म्हणत असली, तरी अमोलच्या मते ती अतिशयोक्ती होती. परिस्थिती त्याच्या पूर्णपणे आटोक्यात होती, तो फक्त “खाते पिते घर का” होता इतकंच.
असं त्यानं म्हटलं, की शर्टाची पोटावरची बटणं किती वेळा तुटली याचा पाढा नेहा त्याला वाचून दाखवायची.
पण त्याला अमोलचा नाईलाज होता. “खाणं” या विषयावर त्याचं मनापासून प्रेम होतं, कदाचित क्रिकेटपेक्षाही जास्तच.
व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करण्याच्या तर तो सर्वस्वी विरोधात होता. जिमची फी आपणच भरायची, आणि तिथं जाऊन, मेहनत करून, घामही आपणच गाळायचा हे त्याच्या तत्वातच बसत नव्हतं. उलट त्याच्या मते तर व्यायाम केल्याने माणूस दमतो आणि त्यामुळे त्याला जास्त भूक लागते. “मग फायदा काय? ” तो नेहमी विचारायचा.
त्याची पत्नी नेहा याच्या अगदी उलट होती.
सकाळी पाच वाजता उठणे, धावणे, योगा, सायकलिंग, ट्रेकिंग, प्रोटीन शेक—तिच्या आयुष्यात ‘बसून राहणे’, ‘लोळत पडणे‘ ही संकल्पनाच नव्हती.
अमोललाही तिने केलेल्या पौष्टिक खाद्यकृती खायला आवडायच्या, पण तो ठरलेल्या मापापेक्षा दुप्पट खायचा आणि सगळंच मुसळ केरात जायचं.
असो. आज १५ ऑगस्ट होता, शनिवार, स्वातंत्र्यदिन, सुट्टी.
सकाळपासून भुरभुर पाऊस रिमझिमत होता, हवेत छान गारवा होता.
पण नेहा पहाटेच उठली होती. “अमोल, उठ! सहा वाजले. ”
चादरीखालून आवाज आला. “हं…”
“सहा वाजले, अमोल, उठ. अजून किती झोपणार? ”
“आज सुट्टी आहे ना? ”
“हो. म्हणूनच तर तिकोना किल्ल्यावर ट्रेकिंगला जायचं आहे! ”
अमोलने डोळे उघडले. “ट्रेकिंग? “
“हो. ट्रेक! किती दिवसांपासून सांगतेय. ”
किलकिल्या डोळ्यांनी अमोलने खिडकीतून बाहेर पाहिले.
पाऊस.
गार हवा.
ढग.
… आणि त्याच्या डोक्यात दुसरेच दृश्य होते.
सोफा.
टीव्ही.
क्रिकेट.
आणि कदाचित…
मिसळ.
आजपासून भारत–श्रीलंका कसोटी क्रिकेट सामना सुरू होणार होता. तिकडे बांगला देशाची क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाचा बॅण्ड वाजवत होती.
… इतका भरगच्च कार्यक्रम असताना, शरीराला कष्ट घेऊन ट्रेकिंगला जायचं? नुसत्या विचारानंच अमोलला दम लागला.
पण नेहा अजूनही खमकेपणाने समोर उभी होती. “काय विचार करतोयस? ”
“काही नाही. ”
“मग तयार हो. ”
अमोलने एक दीर्घ श्वास घेतला.
सरळ सांगितलं असतं—“मला ट्रेकला यायचं नाही. ” तर त्याचे परिणाम त्याला चांगले माहिती होते.
.. आरोग्य, वजन, स्टॅमिना, वय, भविष्यातील जीवनशैली आणि “तू स्वतःची काळजी घेत नाहीस” या विषयांवर किमान दीड तासाचं व्याख्यान होणार होतं, – रिकाम्या पोटी त्याला हे सगळं ऐकून घ्यायला लागलं असतं, आणि नंतर मान खाली घालून ट्रेकला जावंच लागलं असतं.
म्हणून अमोलने दुसरा मार्ग निवडला.
“नेहा…”
“काय?”
“मी आलो असतो ग, मला खरंच खूप आवडलं असतं. पण आज ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग लावली आहे. ”
नेहा थांबली.
“आज?”
“हो. ”
“१५ ऑगस्टला?”
“हो. ”
“कशाची?”
अमोलने चेहऱ्यावर शक्य तितका गंभीर भाव आणला.
.. “नेटवर्क प्रॉब्लेम आहे. क्लायंटचा सर्व्हर काल रात्री क्रॅश झाला. काल रात्री उशीरा मेसेज आला आहे. मॅनेजमेंटने सगळ्यांनाच बोलावलंय. रिकव्हरी प्लॅन आजच तयार करायचा आहे. ”
नेहा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली.
गंभीर चेहरा ठेवून त्याने आणखी एक वाक्य जोडले— “क्लायंटची समस्या सुट्टी बघून येत नाही. ” हे वाक्य कुठेतरी ऐकलेलं होतं. पण त्या क्षणी ते त्याला फार कॉर्पोरेट वाटलं.
नेहाने दीर्घ श्वास घेतला. “ठीक आहे. मग मी जाते माझ्या मित्रमैत्रिणींसोबत. ”“हो. तुम्ही जा. ट्रेक एन्जॉय करा. “ नेहा निघून गेली आणि अमोलने आपला झोपेचा कोटा पूर्ण करून घेतला. आंघोळपांघोळ आटोपली आणि तडक रवीच्या घरी डेरेदाखल झाला.
रवीने दार उघडलं.
“काय रे?”
अमोल आत शिरत म्हणाला, “आज देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. ”
“म्हणजे? ”
“आणि आपण स्वतःला घरच्या बंधनातून मुक्त करणार आहोत. ”
रवी अमोलचाच मित्र, त्याला लगेच अर्थ समजला.
“नेहाला काय सांगितलं आहेस? ”
“ऑफिस. ”
“कशासाठी? ”
“अर्जंट मीटिंग. नेटवर्क नाहीये, सर्व्हर बिघडला आहे. ”
“साल्या, पकडला जाशील. ” रवीचे अनुभवाचे बोल.
“ते राहू दे रे. काहीतरी खायला दे, अशक्तपणा आला आहे. “
रवीच्या सोसायटीत झेंडावंदनानंतर घरोघरी समोसे पाठवले होते, त्यांच्यावर ताव मारणं झालं, तोपर्यंत रवीने फोनाफोनी करून अतुल आणि आशुतोष या त्यांच्या शाळासोबत्यांना “स्वातंत्र्यदिनाची” कल्पना दिली.
रवी – अमोल गॅलरीत चहाचा आस्वाद घेत मित्रांची वाट पाहत होते, तोवर प्रशांत स्वीटसमधून खादाडीची सामुग्री घेऊन अतुल आणि आशुतोष आलेच.
टीव्हीवर आलटून पालटून ऑस्ट्रेलिया – बांगला देश आणि भारत–श्रीलंका सामने सुरू होते. तिकडे बांगला देशचे गोलंदाज ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा फडशा पाडत होते, इकडे हे चौघं कांदा भजी, खमण आणि कचोऱ्यांचा.
खाण्याच्या डिशेस समोर… चहा बाजूला… क्रिकेट टीव्हीवर.
त्या क्षणी अमोलला जाणवलं—
… स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं हेच असावं.
अचानक टीव्हीवर सामना थांबला. इकडे ऑस्ट्रेलिया सामन्याचा दिवस संपला म्हणून, आणि तिकडे श्रीलंकेत पाऊस पडू लागला म्हणून.
अमोल म्हणाला, “मॅच का थांबली? माहिती आहे का? आपण नेवाळे मिसळला जाईपर्यंत काही मिस व्हायला नको म्हणून. ”
अमोलच्या हातातला मोबाइल थांबला. “स्वाती? ती तर ट्रेकला येणार होती ना, तुझ्याबरोबर. ”“हो. पण तिच्याकडे अचानक पाहुणे येणार होते, म्हणून कॅन्सल झालं तिचं. तिने विचारलं—अमोल का आला नाही ट्रेकला म्हणून. ”
अमोलच्या घशात काहीतरी अडकलं. “तिला कसं कळल मी ट्रेकला नाही ते? ”
“अमोल, ती रवीच्याच सोसायटीत राहते. आजची तुम्हा मित्रांची रवीच्या घरची पार्टी आणि नेवाळे दौरा हे सगळंच तिनं पाहिलं आणि मला सांगितलं आहे. ”
घरात शांतता.
अमोलने हळू आवाजात विचारलं,
“तिनं तुला सगळं सांगितलं? “
नेहा शांतपणे म्हणाली, “अमोल, मला एकच सांग. ”
“हं…”
“तुला ट्रेकला यायचं नव्हतं, एवढंच ना? ”
“हो. ”
“मग सरळ सांगितलं असतंस. ”
अमोलने हळू आवाजात उत्तर दिलं, “माझं काही न ऐकता, ट्रेक माझ्या आरोग्यासाठी चांगला आहे म्हणत तू मला खेचत घेऊन गेली असतीस. ”
“हो. ”
“म्हणून मी…”
“खोटं बोललास. ”
“हो. ”
नेहा हसू लागली. “ठीक आहे. ”
अमोलला आशा वाटली. “म्हणजे? ”
“म्हणजे काही नाही, उद्या सकाळी सहा वाजता आपण दोघं तिकोना किल्ल्यावर जाणार. ”
अमोलचा चेहरा उतरला.
“अगं, पण तू आजच जाऊन आली आहेस ना! ”
“हो. ”
“मग पुन्हा कशाला? ”
“ट्रेक तुझ्या आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून. ”
.. अमोल गप्प.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता नेहा ट्रेकिंगच्या शूजमध्ये तयार उभी होती.
अमोल तिच्या मागे उभा होता.
चेहऱ्यावर झोप… डोळ्यांत दुःख… आणि हातात पाण्याची बाटली.
नेहा म्हणाली, “चल. ”
अमोलने एकदा आकाशाकडे पाहिले. मग म्हणाला, “नेहा… ”
“काय? “
“तिकोना गडावर मिसळ मिळते का? ”
नेहाने मागे वळून पाहिलं. “नाही. आणि तरीही आपण ट्रेकला जाणार आहोत. ”
आणि अमोलला तेव्हा एक अंतिम सत्य समजलं—
क्रिकेटमध्ये Rain Delay असतो, ऑफिसमध्ये Emergency Meeting असते, पण बायकोच्या हातात पुरावा आला की कुठलाही Delay काम करत नाही.
आणि त्याहून महत्त्वाचं—
… बायकोला फसवणं कठीण आहेच; पण तिच्या मैत्रिणींच्या नेटवर्कला फसवणं अशक्य आहे.
‘सफर’ हा हिंदीतला बर का, नाहीतर इंग्रजी शब्द म्हंटल तर अर्थाचा अनर्थ होईल. ! हा सफर म्हणजे प्रवास! यात्रा. !
आता सफर म्हंटल की” हम सफर” हा आलाच.. तो चांगलाच मिळेल तर नशिब.. स्वर्ग दोन बोटे उरले.. वगैरे.. नाहीतर अनुभव.. बाबा आमटे म्हणतातच. ‘An experience is cruel teacher.. it punishes first. teaches later..
आता हम सफर.. हा एक भाग.. दुसरा भाग म्हणजे कशाने प्रवास करणार हा?
‘केल्याने तीर्थाटन! ‘असे म्हंटल आहेच.. कोणताही मोठा पुरुष घेतला तर ते देशभरातून प्रवास करतातच.. अर्थात पायीच. मग ते शंकराचार्य.. जे केरळ मध्ये जन्मले.. अणि श्रीनगर ला पायी गेले.. अणि तपश्चर्या केली.. अणि ह्या प्रवासात भारताचा अभ्यास केला..
गांधीजी, ह्यानी मीठाचा सत्याग्रह पद यात्रेने सुरू केला. विनोबा भावे.. ह्यानी पदयात्रेने भूदान चळवळ सुरू केली..
तर असे हे प्रवास.. !
हा पर्यटन म्हणून आजकाल करतातच.. फक्त साधने बदलली. ‘सजन रे झूट मत बोलो ‘ची बैलगाडी असो वा ‘मांग के साथ तुम्हारा.. ‘ वाली घोडा गाडी.. प्रवास हा आलाच.. साधने तर महत्वाची आहे.. !
कार मध्ये देवानंद ‘चुडी नही मेरा दिल है.. ‘! म्हणतो तर ट्रेन मध्ये ‘ उपरवाला जानकर भी अंजान है’ म्हणून श्लेष साधतो!.. अणि प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.. !!
तिकडे शर्मिला टागोर जितेन्द्रला.. ट्रक मध्ये ‘हम सफर मेरे हम सफर ‘ म्हणते..
तर जीनत अणि राजेश खन्ना ‘हम दोनो दो प्रेमी’ म्हणत जीवन प्रवासाचा आनंद घेतात..
कारण त्यांना ‘हम सफर ‘ मिळाला आहे फक्त प्रवासच बाकी आहे. !
प्रवासात शॉकच absorber म्हणून भक्कम साथ आहे. !!
ट्रेन, बस ह्याने प्रवास केल्यावर करीना अणि शहीद ह्याना रस्ते आवडून गेले.. अणि ते म्हणतात ‘ मंजिल से रास्ते अच्छे लगने लगे. !
“The last ride together” ही जॉन डन ची कविता खूप गाजली की त्या नंतर जिने हा लग्नाचा प्रस्ताव झिडकारल, त्या गाजलेल्या कवयित्रीने त्याला प्रपोज केले.. and they lived happily ever.. असे झाले.. ! ह्यात कवि म्हणतो.. की. ‘त्याचा सोबत प्रेयसीने घोड्यावर बसावे अणि सोबत त्याने फेरफटका मारावा.. ‘
अणि ती तयार होते. त्या छोट्याश्या प्रवासाचे वर्णन त्याने त्यात केले आहे.. exctasy.. सर्वोच्च आनंद.. देणारा हा प्रवास होता!!
खरा प्रवास हाच आहे की मंजिल दूर आहे.. अणि हम सफर चा हाथ हातात आहे.. शेवटी जन्मापासून मरेपर्यंत हा प्रवास करायचाच आहे.. त्यामुळे destinstion ला पोहोचण्याची घाई नाही करायची बर का… तर प्रवास हाच अनुभव घ्यावा, , उपभोगायचा, साजरा करायचा.. इतक की मंजिल विसरून जाऊ.. ह्यात तद्रूप होऊन जायचे अणि केशवसुतांनी म्हणाल्याप्रमाणे झपूर्झा अवस्थेला पोहोचू शकतो.. !
The road less travelled.. ह्या कवितेत tennyson म्हणतो त्याप्रमाणे धोपटमार्ग.. सोडले की प्रवासात गम्मत येते… अणि काही चांगल करण्याची धमक!!
तर तुमचा प्रवास ठरवा.. साथी निवडा. अणि निघा.. the whole world is with you!!
आम्ही छान मराठीत गप्पा मारत चाललो होतो. निनादने याआधी एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक केला होता. त्यामुळे त्यालाही हा रस्ता माहितीचा होता. आम्ही गप्पा मारत चालत असतानाच पुढे उजव्या बाजूला एक भारतीय ट्रेकर हळूहळू चालताना दिसला. साधारण पंचावन्न वयाचा, काहीसा स्थूल, पाठीवर छोटी सॅक, कमरेला एक पाऊच, बरोबर एक पोर्टर. त्याच्या खांद्यावर स्वतःच्या बॅगेसहित या माणसाची मोठी डफलबॅग. तो त्या माणसाच्याच चालीने हळू हळू चालत होता.
आमच्या मराठीतील चाललेल्या गप्पा ऐकून तो माणूस थोडा थबकला आणि वळून म्हणाला.
“ पुण्याचे का? ”
मी म्हणालो “नाही”.
मी ठाण्याचा आणि हा निनाद नाशिकचा.
महाराष्ट्रीयन आहोत. हे ऐकून त्याला खूप आनंद झाला.
बाहेरच्या कोणत्याही अनोख्या देशात किंवा अनोळखी ठिकाणी मराठी बोलणारा ट्रॅकर असला की तो पुण्याचाच असतो असा समज बऱ्यापैकी आहे. आणि तो काही अंशी खराही आहे.
“मी पण महाराष्ट्रीयन… इंदोरला असतो. “
मी म्हटलं “अरे वा”… एवरेस्ट बेस कॅम्प का?
“नाही” मी “थ्री पासचा” ट्रेक करायला चाललोय. “
त्याचे एकंदर वय आणि त्याचं शरीराचं आकारमान पाहून मला त्याचं कौतुक वाटलं. त्याच्या एकूण शरीरयष्टीकडे पाहून मला वाटत होतं की, याला हे जमेल की नाही. पण त्याचा आत्मविश्वास दांडगा होता. फक्त एक पोर्टर गाईड घेऊन तो सोलो “थ्री पास” करायला निघाला होता.
“थ्री पास” हा ट्रेक एव्हरेस्ट बेस कॅम्प पेक्षाही अवघड आहे. मला अजूनही शंका होती.
मी तरीही त्याचं कौतुक केलं.
“अरे वा तुम्ही या वयात पण “थ्री पास” करत आहात आणि तेही सोलो.. ?
नाही म्हटलं तरी हा वीस-बावीस दिवसाचा ट्रेक होता.
“25 दिवस लागले तरीही चालेल. मी हा ट्रेक पूर्ण करण्याच्या उद्देशानेच पूर्ण महिन्याची सुट्टी घेऊन आलोय. ”
मला त्याचं अजून कौतुक वाटलं. मी त्याचं नाव विचारलं.
“मी पिंगळे”
मी थोडं थांबून विचारलं
“तुम्ही काय करता”
“मी आयआयटीमध्ये प्रोफेसर आहे इंदोरला” आणि माझे आयआयटीचे क्लासेस पण आहेत. और मेरा लडका इंजिनियर है. बेंगलोरमे सर्व्हिस करता है.. ”
अर्ध मराठी आणि हिंदी बोलण्यावरून तो पक्का इंदोरचा महाराष्ट्रीयन वाटतं होता.
चालत असताना त्याला बोलायला जड जात होतं. थोडी धाप ही लागत होती. त्या अरुंद वाटेवरून खेचर आणि इतर पोर्टर, गिर्यारोहक ये जा करीत होते..
मी आणि निनादने त्यांना थोडं बाजूला थांबवलं. आता माझी उत्सुकता वाढत होती.
निनाद बाजूला शांतपणे उभा राहून आमच्यातील संवाद लक्षपूर्वक ऐकत होता.
आता एका जागी थांबल्यामुळं त्याला बोलायलाही सोपं वाटू लागलं. एकीकडे त्याच्याबद्दल कौतुक पण वाटत होतं आणि काळजीही वाटत होती.
शेवटी मी विचारलंच…
“एवढा अवघड ट्रेक का निवडला. त्याऐवजी नुसता EBC करायचा ”
त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला..
“ EBC तो सब करते है. मुझे कुछ चॅलेंजिंग करना था.. ”
और इसके साथमे मेरा EBC भी हो जायेगा..
परत तो एक क्षण थांबला आणि म्हणाला.
“ये मेरा बकेट लीस्टका ट्रेक था. ”
मी म्हटलं “अरे व्वा.. येतो बहोत अच्छा है. दुनियाके हर ट्रेकरके बकेट लिस्टमे ये EBC ट्रेक होताही है. ”
एक दीर्घ उसासा घेऊन लगेच म्हणाला…
“वो क्या है, मेरी वाईफ को कॅन्सर है. सेकंड स्टेज…”
मी एकदम स्तब्ध झालो. माझ्या मनात प्रश्न पडला. यांची पत्नी कॅन्सरने आजारी असूनही हा गृहस्थ एव्हढा अवघड ट्रेक का करतोय.. ?
माझ्या तोंडून निघालं. “ओह.. सॉरी…”
“कोई बात नही. मेरे वाईफ के लियेही मैं ये ट्रेक कर रहा हूँ…”
उसनेही मुझे जबरदस्ती ये ट्रेक पर भेजा. बोली तुम्हारा बकेट लीस्टका ट्रेक है, सपना है… वो पुरा करके आओ. तुम वापीस आने तक मुझे कुछ नही होगा”
धन्य आहे त्या महिलेची. एव्हढा जीवघेणा आजार असूनही नवऱ्याच्या स्वप्नाची काळजी ती करतेय. एव्हढ बळ येतं कुठून…? मी मनातच विचार करीत होतो.
आजूबाजूनी येणारे जाणारे ट्रेकर्स आम्हाला पाहून शुभेच्छा देत होते. आम्हीही ट्रेक पूर्ण करून येणाऱ्यांचे अभिनंदन करीत होतो. ट्रेक रूटवर असा संवाद नेहमीच एकमेकांना बळ देत असतो. थकून येणाऱ्यांना परत उभारी मिळत जाते.
आम्हालाही आता उशीर होत होता. जमेल तर जास्त अंतर आज कापायचं होतं. निनादची पण चुळबुळ चालू होती. आम्ही परत गप्पा मारत हळू हळू चालायला सुरवात केली. त्याने पण आमच्या बरोबर चालायला सुरुवात केली.
त्याला खूप बोलायचं होतं. चालतंच त्याने बोलायला सुरुवात केली…
“मेरी पत्नीको मेरा ट्रेकिंगका पॅशन मालूम है. कुछदिन पहले उन्होने मेरे हातमे एक बुक थमाई… बोली पढो इसे.. मैने दो बार पढी है. “और उनकी डॉक्युमेण्ट्रीभी देखी है …”
माझं कुतूहल हळूहळू वाढतंच होतं. मी माझी चाल हळू केली. त्याच्या बरोबरीने चालू लागलो.
“मैने वो बुक दो दो बार पढी… और डॉक्युमेंटरीभी चार चार बार देखी. और उससे प्रेरणा लेके मैं ट्रेक पे चला हूँ. ”
माझ्या बरोबरचा निनादने शेवटी त्याला विचारलं.
“कोनसा बुक है वो…”
“वो कोई महाराष्ट्रके मुंबईसे कुलकर्णी करके है ”
मी न राहवून म्हटलं “कहीं शरद कुलकर्णी तो नही.. ”
तो लगेच उत्तरला “हाँ वही… जिनकी पत्नीका देहांत एवरेस्टपर हुआ था. ”
मी आणि निनाद दोघेही स्तब्ध झालो.
पिंगळे पुढे बोलतच होता..
“मैं ये ट्रेक पुरा करुंगा और मेरे वाईफ को समर्पित करुंगा…
उसे बहुत ख़ुशी होगी. ”
आम्ही दोघंही चालता चालता थांबलो.
पिंगळेही थांबले. त्यांचा पोर्टरही पुढे जाऊन आमची वाट पहात थांबला.
निनादला आता राहवलं नाही.
तो हातातला ट्रेकिंग पोल माझ्या दिशेने करीत पिंगळेना म्हणाला.
“तुम्हाला माहीत आहेत का हे कोण आहेत. ? ”
माझ्याकडे शोधक नजरेने न्याहाळत पिंगळे उत्तरले.
“ नाही…याद नही येत. पण कोठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ”
“ हे शरद कुलकर्णी आहेत ”
आश्चर्याने माझ्याकडे पहात पिंगळे उदगारले.
“ये शरद कुलकर्णी”.. ??
अंजली मॅडमके पती.. ??
जिन्होने वो बुक लिखा है वो.. ?
शेवटी माझ्याच्याने राहवले नाही. त्यांच्याकडे वळत मी सांगितलं.
“हो, मीच तो शरद कुलकर्णी. ”
पिंगळेचा विश्वास बसत नव्हता. परत परत ते विचारत होते. “वो आपही है…? “
… बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो माझ्या पायावर पडायच्या आत मी त्याला सावरले आणि माझ्या गळ्याशी धरले. सारखे त्याच्या तोंडातून तेच शब्द बाहेर पडत होते.
“यहाँ आनेसे पहले.. मैने मॅडमकी फिल्म… चार- चार बार देखी…बार – बार बुक पढी. और निकल पढा.. ”
मैं बहुत भाग्यशाली हूँ…आज मेरी लिये बहुत बढा दिन है.. जिससे प्रेरणा लेके चला हूँ, वह खुद मेरे सामने यहाँ खडा है.. वह भी परदेशमे… मैं मेरे पत्नी को लेके आपसे मिलने जरूर आऊंगा…”
… त्याला झालेल्या अत्यानंदामुळे त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.
मी त्यांना म्हटलं “अहो तुमच्यासारखे लोक एका चांगल्या उद्देशाने, अशा बिकट परिस्थितीत, तेही या उतार वयात ट्रेक करीत आहात. हे आमच्यासाठीपण खूप प्रेरणादायी आहे. ”
मी त्याला आपल्या बाहुपशात घेऊन थोडं शांत केलं. त्यांना पुढील ट्रेक साठी काही उपयुक्त सूचना दिल्या. शुभेच्छा दिल्या. आणि दोघां उभयंतांना मुंबई भेटीचं आमंत्रण दिलं. आणि पुढील मुक्कामासाठी निघालो.
वाटेतील रोडोडेंड्रॉन गुलाबी फुले आता आणखीन गडद दिसू लागली. त्याचा हलकासा दरवळणारा सुगंध हळुवारपणे मन प्रफुल्लित करित होता. माझं मलाच छान वाटू लागलं.
… तसा मी काही मुळात लेखक नाही. पण आज पहिल्यांदाच माझ्या हातून एक चांगलं पुस्तक लिहून झाल्याचं समाधान वाटलं… अतिशय आनंदायी आणि आत्मसमाधान देणारा अनुभव होता तो…
खरं तर हे पुस्तक लिहायचा मी खूप कंटाळा केला होता.
… पण आता वाटतंय या पुस्तकाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काही लोकांच्या जीवनात खरीच प्रेरणा मिळतेय… आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी आता घेतोय.
☆
लेखक : शरद कुलकर्णी
प्रस्तुती : रेखा जांबवडेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ही फक्त हकीकत नसून वास्तव.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
ही फक्त हकीकत नसून वास्तव – –
अतिशय गंभीरपणे प्रत्येकाने वाचावे, विचार करावा ही हकिकत नसून वास्तव आहे
एक प्रश्नही निर्माण होतो : जर आयुष्याच्या शेवटी सोबत करायला कोणी नसेल, तर प्रगती, पद आणि पैशाचा काय उपयोग???
येणारा काळ हा अविवाहितां,चा काळ असेल…
एका नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, पुढील सहा वर्षांत जगातील सुमारे ४५% महिला अविवाहित राहतील.
हा अहवाल १ मे २०२६ रोजी ‘लोकमत’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता.
हा ‘मॉर्गन स्टॅनली’ने (Morgan Stanley) केलेल्या एका विस्तृत अभ्यासावर आधारित आहे.
अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष :
१. आजच्या महिला उच्चशिक्षित आहेत आणि आपल्या करिअरला प्राधान्य देतात.
२. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत आणि कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाहीत.
३. त्यांना स्वातंत्र्य आवडते आणि त्या आपल्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेऊ इच्छितात.
४. त्यांनी लग्न, मातृत्व आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे आपल्या प्रगतीतील अडथळे म्हणून पाहायला सुरुवात केली आहे.
५. हा कल असाच सुरू राहिला, तर पारंपारिक कौटुंबिक रचना आणि सामाजिक चौकट कोलमडून पडू शकते.
६. लोकसंख्या घटणे, अविवाहित पुरुषांच्या संख्येत वाढ होणे आणि वृद्धत्वातील एकाकीपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
७. इथे एक प्रश्नही निर्माण होतो : जर आयुष्याच्या शेवटी सोबत करायला कोणी नसेल, तर प्रगती, पद आणि पैशाचा काय उपयोग?
अनेक आई-वडील आपल्या मुलींसाठी स्थळे शोधत आहेत, पण मुलींना स्वतःलाच लग्नात रस नाही.
परिणामी, आलेले प्रत्येक स्थळ नाकारले जाते.
समाजातील एका मोठ्या वर्गाला अजूनही या बदलाचे गांभीर्य समजलेले नाही, त्यामुळे आपण योग्य वेळी जागे होणे आवश्यक आहे.
मुलीच्या लग्नाचे योग्य वय २३ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे किंवा शक्य असल्यास त्याहूनही आधी असावे. यासाठी सामूहिक पातळीवर जनजागृती आणि प्रयत्नांची गरज आहे.
हा मुद्दा कोणाच्या विरोधात उपस्थित केलेला नाही, तर भविष्यातील स्थिरता आणि संतुलनाच्या चिंतेतून मांडला आहे.
समाज, कुटुंब, कुटूंब व्यवस्था आणि वैयक्तिक जीवन यात संतुलन राखणे हीच खरी प्रगती आहे.
आपण सर्वांनी यावर नक्कीच विचार केला पाहिजे.
भविष्यातील एक ज्वलंत समस्या
जेव्हा मुलांची लग्ने २० व्या वर्षी होत होती, तेव्हा एका शतकात ५ पिढ्या होत होत्या.
जेव्हा मुलांची लग्ने २५ व्या वर्षी झाली, तेव्हा एका शतकात ४ पिढ्या झाल्या.
आता, जेव्हा मुलांची लग्ने ३० व्या वर्षी होत आहेत, तेव्हा एका शतकात केवळ ३ पिढ्या होत आहेत.
विचार करण्यासारखी गोष्ट : आपला समाज पुढच्या शतकापर्यंत टिकेल का?
रस्ते आणि गल्ल्या ओस पडल्या आहेत, आसपासची घरे रिकामी आहेत.
आज घरांमध्ये मुलांचा आवाज कमी आणि पती-पत्नीचे आवाज जास्त ऐकू येतात.
महिला वयाच्या ३०-३५ वर्षांपर्यंत अविवाहित राहतात.
पुरुष वयाच्या ३५ वर्षानंतरही अविवाहित राहतात.
उशिरा लग्ने – आणि मग विभक्त होणे (घटस्फोट).
तुटलेली कुटुंबे,
दुःखी आई-वडील,
एकटे पडलेले आई-वडील…
संपूर्ण पिढी एक रिकामेपण (पोकळी) अनुभवत आहे.
आपण याला “शिक्षित समाज” म्हणू शकतो की “आत्मघातकी समाज”?
ही लोकसंख्या कमी करण्याची एक छुपी कटकारस्थाने वाटते.
जर ५० जोडप्यांपैकी प्रत्येकाला एकच मूल असेल, तर पुढच्या पिढीतील मुलांची संख्या नाममात्र असेल.
हे असेच सुरू राहिल्यास तिसरी पिढी तर जवळपास नाहीशी होईल.
पाडे आणि गल्ल्या ओस पडल्या आहेत आणि प्रत्येकजण रस्त्यावर आहे.
अर्धे आयुष्य रस्त्यावरच जाते.
संपूर्ण गावेच्या गावे नाहीशी होत आहेत.
शहरांमध्ये उत्तुंग इमारती आहेत, पण संयुक्त कुटुंब पद्धती संपुष्टात आली आहे.
नवीन सुना म्हणतात की त्यांना “फक्त एकच मूल” हवे आहे.
हा समाज आहे का?
सत्य हे आहे की :
मुले आता प्रेमाचे प्रतीक राहिलेली नाहीत, उलट, मूल होणे ही एक सक्ती वाटू लागली आहे.
यात सर्वात मोठा दोषी मुलीचा बाप आहे; तोच बाप ज्याने स्वतः २०-२२ व्या वर्षी लग्न करून संसार थाटला, तोच आता वयाच्या ३० वर्षांपर्यंत मुलीचे लग्न न करून हिरोगिरी दाखवतो.
परिणाम…?
स्त्री-पुरुष मानसिक तणावाखाली जातात.
आज मुलांना ना वेळेवर नोकऱ्या मिळत आहेत, ना त्यांची लग्ने वेळेवर होत आहेत.
समाज हळूहळू कोलमडत चालला आहे.
म्हणूनच मुले समाजासोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतात.
म्हणजेच, विभक्त कुटुंबे.
ते अगदी असेही म्हणतात की त्यांना मुले नको आहेत.
लग्नाला उशीर करणे / मूल होण्यास उशीर करणे, आणि नंतर एका मुलानंतर वैद्यकीय आणि संगोपनाच्या समस्यांची कारणे देणे… हे आता सामान्य झाले आहे.
वयामुळे हजारो तरुण-तरुणी अविवाहित फिरत आहेत आणि समाजातील ज्येष्ठ मंडळी गप्प आहेत.
लग्न, कुटुंब, मुले,
सर्व काही एक ओझे मानले जात आहे.
लग्न हे केवळ सांसारिक बंधन नाही, तर ते घर, कुटुंब आणि समाजाचा मुख्य आधारस्तंभ आहे.
हा वंश, सभ्यता आणि संस्कृती पुढे नेण्याचा मार्ग आहे.
आता आपल्या सर्वांना समजून घेण्याची वेळ आली आहे.
मुलांना “अति” स्वातंत्र्य देऊन आपण त्यांची समज काढून घेतली आहे.
लग्ने पुढे ढकलली जात राहिली आणि जेव्हा ती होतात, तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
पुन्हा तोच एकाकीपणा.
लग्नाचे योग्य वय :
पुरुषांसाठी : वयाच्या ३० वर्षांपूर्वी
महिलांसाठी : वयाच्या २५ वर्षांपूर्वी
अन्यथा इतिहास लिहील, “त्या समाजाने स्वतःला शांतपणे नष्ट केले.” विचार करा आणि समजूतदारपणे वागा.
आपल्या मुलांची लग्ने योग्य वेळी करा.
कारण, जर कुटुंबाचे रक्षण झाले नाही, तर समाज कोसळायलाही वेळ लागणार नाही.
म्हणूनच डेव्हिड सेल्बॉर्न आणि बिल वॉर्नर सारख्या लेखकांना असे म्हणणे भाग पडले आहे की, मजबूत कौटुंबिक रचनेच्या अभावामुळे जगातील बहुतांश देशांमध्ये आणि अगदी भारतातही कौटुंबिक परंपरेचा ऱ्हास सुरू झाला आहे.
पाच रक्ताची नाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत :
मोठे काका (वडिलांचे मोठे भाऊ),
लहान काका / चुलते (वडिलांचे लहान भाऊ),
आत्या (वडिलांची बहीण),
मामा (आईचे भाऊ),
मावशी (आईची बहीण).
भविष्यात अशी नाती कदाचित पाहायला किंवा ऐकायलाही मिळणार नाहीत.
हे आपण असे समजून घेऊ शकतो :
मुलगा मुलगी
२ १ (मावशी नाही)
१ २ (मोठे काका, लहान काका नाहीत)
१ १ (मोठे काका, लहान काका, मावशी नाही)
१ ० X
० १ X
परिणाम
० ०
एका अपत्याच्या (single-child) कुटुंबांमुळे तिसऱ्या पिढीवर गंभीर परिणाम होईल, ती पिढी जिथे तुम्ही आजी-आजोबा असाल.
ज्या आजोबांना मुदलापेक्षा व्याजाची (नातवंडांची) जास्त ओढ असते, ते मुद्दलही गमावून बसतील. त्याला ते स्वतःच जबाबदार असतील.
त्यामुळे, जोडप्यांनी एकाच अपत्याच्या निर्णयावर गांभीर्याने विचार केला पाहिजे.
लोकसंख्येची ही घटती आकडेवारी बरेच काही सांगून जाते.
तुमचा नातू किंवा पणतू या जगात अगदी एकटा पडेल.
जर त्याला रक्ताच्या नात्यांची गरज भासली, तर या संपूर्ण विश्वात त्याचे म्हणायला कोणीही नसेल.
ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
हे केवळ आपल्या मुलांना एकाकी जीवन जगण्यास भाग पाडत नाही, तर आपली संस्कृती देखील नष्ट करेल.
आपण एकतेच्या गोष्टी करतो, पण संस्कृतीच नष्ट होईल.
या सर्व गोष्टीला सध्याची पिढी जबाबदार आहे.
जर तुम्हाला हा विषय गंभीर वाटत असेल, तर यावर घरी, पती-पत्नीमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये आणि विविध सभा-बैठकांमध्ये चर्चा करा.
आपली संस्कृती, मूल्ये आणि येणाऱ्या पिढ्यांना वाचवा.
हा लेख खरचं आजच्या दुष्टीने प्रेरणादायी आहे – – यातुन तरी वधु वर पालकांनी सर्तक राहा.
आपल्या पाल्यांसाठी नक्कीच विचार करावा ही खरंच विनंती आहे
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ शिवतत्त्व आणि कॉस्मिक विज्ञान ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
(एक तुलनात्मक शोधनिबंध)
टीपः
या निबंधात भारतीय शैवदर्शनातील शिवतत्त्व आणि आधुनिक कॉस्मोलॉजीतील विश्वसंकल्पना यांची तुलनात्मक चिकित्सा केली आहे.
कॉस्मिक विज्ञान_ (Cosmic Science) म्हणजे विश्वाची (Cosmos) उत्पत्ती, रचना, उत्क्रांती आणि अंतिम नियती यांचा अभ्यास करणारे विज्ञान. हे प्रामुख्याने कॉस्मोलॉजी (Cosmology) आणि खगोलभौतिकी (Astrophysics) या शाखांमध्ये विकसित झाले आहे.
शिवतत्त्वातील_ “स्पंद”, “उत्पत्ती–स्थिती– लय” आणि “अद्वैत” या संकल्पनांचा आधुनिक भौतिकशास्त्रातील “बिग बँग” सिद्धांत, “क्वांटम क्षेत्र सिद्धांत” आणि “कॉस्मिक उत्क्रांती”शी संवाद साधून अभ्यास केला आहे.
प्रस्तुत अभ्यासाचा उद्देश वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानात्मक भाषांचा गोंधळ न करता प्रतीकात्मक व संकल्पनात्मक साम्यांचे विश्लेषण करणे हा आहे.
१. प्रस्तावना
मानवी ज्ञानपरंपरेत विश्वविषयक चिंतन दोन प्रमुख मार्गांनी विकसित झाले आहे—
(१) प्रायोगिक, गणिताधारित विज्ञान
(२) अनुभूतीप्रधान अध्यात्मिक तत्त्वज्ञान
भारतीय शैवपरंपरेतील शिव ही संकल्पना विश्वाच्या मूलतत्त्वाचे प्रतीक आहे, तर आधुनिक विज्ञानात विश्वाचे वर्णन निरीक्षणीय पुराव्यांवर आधारित आहे. या दोन ज्ञानप्रणालींचा तुलनात्मक अभ्यास “विज्ञान विरुद्ध अध्यात्म” असा संघर्ष न मानता “संवाद” म्हणून करणे हा या प्रबंधाचा उद्देश आहे.
२. साहित्यसमीक्षा
२. १ उपनिषद व अद्वैत दृष्टी
छांदोग्य उपनिषदात “सर्वं खल्विदं ब्रह्म” ही संकल्पना संपूर्ण विश्व एकाच अद्वैत तत्त्वाचे रूप असल्याचे सांगते. ही अद्वैत संकल्पना अस्तित्वाच्या एकात्मतेचा आधार देते.
२. २ काश्मीर शैवदर्शन आणि स्पंद सिद्धांत
‘वसुगुप्त’ यांनी प्रतिपादित केलेले ‘शिवसूत्र’ आणि पुढील ‘स्पंदकारिका’ ग्रंथांमध्ये विश्वाचे मूळ स्वरूप “स्पंद” — सूक्ष्म कंप — असे मांडले आहे.
स्पंद म्हणजे चेतनेची गतिशील अवस्था.
२. ३ आधुनिक भौतिकीतील समांतरता
‘फ्रिटजॉफ काप्रा’ यांनी ‘दि ताओ ऑफ फिजिक्स’ (१९७५) मध्ये पूर्वीय अध्यात्म आणि क्वांटम भौतिकीतील साम्यांचे विवेचन केले आहे. त्यांच्या मते उप-अणु कणांची गतिशीलता ही “कॉस्मिक डान्स” सारखी आहे.
३. आधुनिक कॉस्मोलॉजी : वैज्ञानिक आधार
३. १ विश्वाचा विस्तार
एडविन हबल (१९२९) यांनी आकाशगंगांच्या रेडशिफ्ट निरीक्षणांवरून विश्व विस्तारत असल्याचे दाखवले.
यावरून बिग बँग सिद्धांत दृढ झाला.
३. २ ऊर्जा–पदार्थ समत्व
अलबर्ट आईन्स्टाईन (१९०५) यांच्या विशेष सापेक्षतावादानुसार E = mc² हे समीकरण ऊर्जा आणि पदार्थ एकाच वास्तविकतेच्या दोन अवस्था असल्याचे दाखवते.
३. ३ क्वांटम क्षेत्र सिद्धांत
क्वांटम क्षेत्र सिद्धांतानुसार मूलभूत कण हे स्वतंत्र घटक नसून क्षेत्रातील स्पंदने आहेत.
ही कल्पना “स्थैर्य” हे भासमान असून “गतिशीलता” हेच मूलभूत स्वरूप असल्याचे सुचवते.
३. ४ कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी
१९६५ मध्ये ‘ अर्नो पेन्झिआस’ आणि ‘ रॉबर्ट विल्सन’ यांनी कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंडचा शोध लावला, जो बिग बँग सिद्धांताचा प्रायोगिक पुरावा मानला जातो.
४. तुलनात्मक विश्लेषण
विश्लेषण पुढील क्रमाने खालील तालिकेत सांगितले आहे.
ही तुलना प्रत्यक्ष वैज्ञानिक समानता दर्शवत नाही, तर संकल्पनात्मक साम्य दाखवते. शैवदर्शन हे अनुभूतीप्रधान आहे; आधुनिक विज्ञान हे गणितीय आणि प्रायोगिक आहे.
५. तत्त्वज्ञानात्मक चर्चा
शैवदर्शनात विश्व हे चेतनेचे प्रकटन आहे.
विज्ञानात विश्व हे ऊर्जा-क्षेत्रांचे परस्परसंवाद आहे.
दोन्ही दृष्टींमध्ये “अस्तित्वाचे मूलभूत एकत्व” हा समान धागा आढळतो.
तथापि, विज्ञान चेतनेला अद्याप भौतिक प्रक्रियांच्या संदर्भात स्पष्ट करते; अध्यात्म चेतनेला मूलतत्त्व मानते.
६. काव्यमय निष्कर्ष
जेव्हा हबल अवकाश दुर्बीण दूरस्थ आकाशगंगांचे प्रकाशचित्र टिपते,
तेव्हा ती अब्जावधी वर्षांचा इतिहास उलगडते.
जेव्हा ध्यानात अंतर्मन शांत होते,
तेव्हा ते वर्तमानातील सूक्ष्म स्पंद ऐकते.
विश्व हा एक नाद आहे—
डमरूचा, प्रकाशाचा, गुरुत्वाचा.
ताऱ्यांचा जन्म आणि लय,
कणांचे प्रकट आणि विलय,
हे सर्व एका अखंड लयीचे प्रतिबिंब आहेत.
समारोप
या संशोधनात्मक अभ्यासातून असे दिसते की:
शैवदर्शन आणि आधुनिक कॉस्मोलॉजी या स्वतंत्र ज्ञानप्रणाली आहेत.
दोन्हींत गतिशील, स्पंदनशील विश्वाची कल्पना आढळते.
साम्ये प्रतीकात्मक व तत्त्वज्ञानात्मक पातळीवर आहेत; वैज्ञानिक प्रमाण म्हणून नव्हेत.
विज्ञान विश्वाचे मोजमाप करते;
अध्यात्म त्याचा अनुभव घेते.
या दोन्हींच्या संवादातून विश्वाचे अधिक समग्र आकलन संभवते.
☆ “सध्याची बटाट्याची चाळ…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆
☆
बटाट्याची चाळ आता जमीनदोस्त झाली आहे.
त्रिलोकेकर, सोमण, गुप्तेच्या पुढच्या पिढ्या आता स्वतःच्या गाड्यांनी फिरू लागल्या आहेत.
असा मी असा मीमधले गिरगांवातले रस्ते आता भलतेच रुंदावले आहेत. हातात जीपीएस फोन आणि गुगल मॅप्स आल्यामुळे बेंबट्या आता भर उन्हातान्हात पत्ता शोधत फिरत बसत नाही, मॅप लावून झटदिशी डेस्टिनेशन गाठतो.
लग्नातल्या जेवणावळी श्लोक आहेर कधीच इतिहासजमा झाले आहेत. नाव घेणं मात्र नाममात्र उरलं आहे.
कोकणातल्या अंतू बर्वासुद्धा तब्येतीन् चांगलाच सुधारला आहे आणि विचारांनीही.
मुलाच्या घरची सगळी अपसव्यं त्याला आता मान्य झाली आहेत.ना जातीची, ना पातीची सून त्याची चांगली काळजी घेते आहे.
नामू परटान् आता लौंड्री घातली आहे, आता तो स्वतःचे कपडे वापरतो आणि दुसरी कसली भट्टी पण लावत नाही.
नारायणाने पण आता नसते उद्योग करायचे सोडून आपल्या कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.त्याचा मुलगा आता लग्नात फुल चड्डी आणि टाय घालून बुफे घेत असतो आणि नारायणदेखील त्याला एटिकेट्स शिकवित असतो.
हरितात्यांनी आता इतिहासातल्या गोष्टींचं पुस्तक लिहिलं आहे, त्यांना आता आजोबांनी पुरवलेल्या भांडवलावर बुडित धंदे करायची आवश्यकता राहिली नाही.
लखू रिसबुड आता चांगलाच सुधारला आहे, त्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यात सोन्याची जाड साखळी आली आहे. कुणाच्या बातम्या देऊन फायदा होईल हे त्याला चांगलेच उमगले आहे.
आता लखू शब्दकोडी लिहित नाही, मोठं मोठ्या नेत्यांना आपल्या लेखांतून कोडी घालतो आणि ती कोडी सोडविण्याची बक्षिसं देखील पटकावतो.
सखाराम गटणे आता कॉम्प्युटरच्या भाषा शिकतो, त्याला सुवाच्य हस्ताक्षराची आणि नीतिमत्तेची आवश्यकता उरली नाही. कॉम्प्युटरच्या अनेक भाषांत पारंगत झाल्यामुळे त्याची साहित्याची आवड पार मागे पडली.
नंदा प्रधान पहिल्यापासून जरा फॉरवर्डच होता.तोही तीन ब्रेकअप्स नंतर आता लॉंगटर्म रिलेशनशिप करण्यात सक्सेसफुल झाला आहे.
नाथा कामत मात्र आहे तसाच राहिला आहे, त्याचा बुजरेपणा कधी जाईल देव जाणे.
बबडू आता राजकारणात शिरला आहे, तो कुठलातरी महापौर वगैरे झाला होता, पहिल्यापासूनच लटपट्या होता तो, कुठल्या युनिव्हर्सिटीचा चॅन्सेलरसुद्धा झाला तर मला नवल वाटणार नाही.
पेस्तनकाका आणि काकी मात्र हल्ली दिसत नाहीत आणि कधी दिसलेच तर ते १००% वाटत नाहीत.
नाही म्हणायला चितळे मास्तर हरवल्याची खंत मात्र हृदयात बोचते.
ऑनलाईन टीचिंग, टेस्ट सिरीज, प्रोफेशनल टीचिंगच्या या जमान्यात संस्कार पेरणारे मास्तर मात्र हरवलेले आहेत.
भगवद्गीता पाठ न करता त्यातले तत्त्व जगणारे काकाजी आता सापडेनासे झाले आहेत, पण आचार्यांचा वेष चढवून गीता मुखोद्गत करून नाही ते धंदे करणारे बोगस आचार्य फोफावले आहेत.
दोन तत्त्वांचा वाद त्यांच्यातल्या प्रामाणिकपणाबरोबरच मिटलाय आणि फक्त ऐहिक सुखांचा पाठलाग सुरू राहिला आहे.
पुलंनी लिहिलेल्या एक एक व्यक्तिरेखा हा बदलणाऱ्या संस्कृतीचा प्रवास सांगणाऱ्या होत्या.
त्यांनी लिहिलेली बटाट्याची चाळ आणि असा मी असा मी हे बदलत्या सामाजिक जीवनाचे प्रवासवर्णनच होते.
त्या संस्कृतीमध्ये एकेकाळी पुरता मिसळून गेलेल्या मला, आज मागे वळून बघताना ती संस्कृती अनोळखी वाटू लागली आहे आणि माझ्या मुलांकडे बघितल्यावर असे जाणवू लागते की आज मी स्वीकारलेली ही आधुनिक संस्कृतीसुद्धा फार वेगाने कालबाह्य होत चालली आहे.
पुलंनी हा बदल त्यांच्या लिखाणातून नेमकेपणाने दाखवला.
बदलत्या काळाची पावले कशी ओळखायची आणि त्या नव्या काळाचं हसतमुखाने स्वागत कसं करायचं हे पुलंनी आम्हाला शिकवलं.
काळ बदलला, संस्कृती बदलली, वेषभूषा बदलली, आर्थिक स्थिती बदलली तरी माणूस तोच आहे.
त्या बदललेल्या वेष्टणातला माणूस वाचायला पुलंनी आम्हाला शिकवलं.
भले त्यांच्या व्यक्तिरेखा जुन्या झालेल्या असोत किंवा त्यांची विचारसरणी आज पूर्णपणे बदललेली असो, पुलंनी टिपलेली त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अमर आहे.
नितळ मनानं केलेलं ते समाजाचं निरीक्षण आहे.
पुलं आज असते तर शंभरीत पदार्पण करते झाले असते, आणि आज बदललेल्या सुशिक्षित आणि श्रीमंत समाजाचीही त्यांनी तितक्याच कुशलतेने दाढी केली असती.
पुलंनी आम्हाला जगण्याची दृष्टी दिली, संगीताचा कान दिला, राजकारण्यांच्या भाषणातला आणि कृतीतला फरकही दाखवून दिला.
आणीबाणीत वागण्यातला निर्भयपणा आणि सच्चेपणा दाखवून दिला.
खऱ्या अर्थाने आयुष्य बुद्धिनिष्ठ विचारांनी आणि प्रामाणिकपणे जगलेला मराठी साहित्यिक असे मी त्यांना म्हणेन.
त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणाचा संपूर्ण वेध घेणे हे माझ्या बुद्धीच्या पलीकडले असले तरी माझ्या क्षीण बुद्धीला त्या ज्ञान समुद्रातल्या खजिन्याचे जेवढे दर्शन घडले त्यातील थोडेफार मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
याव्यतिरिक्त त्यांची प्रवास वर्णनं ,नाटकं, पुरचुंडी सारखे लेख, गोळाबेरीज हसवणूक सारखी पुस्तकं, भाषांतरं, चित्रपट पटकथा लेखन, दिग्दर्शन, एकपात्री प्रयोग, कथाकथन, मराठी साहित्याचा गाळीव इतिहास यासारखी विनोदी शैलीत लिहिलेली विद्वत्ता पूर्ण पुस्तकं, इत्यादी साहित्याचा आणि अंगभूत कलेचा वेध घेण्यासाठी एखाद्यास त्यांच्या साहित्यात डॉक्टरेट केले तरी आयुष्य कमीच पडेल यात काहीच शंका नाही.
या आमच्या आयडॉलला लक्ष लक्ष प्रणाम।
कवी : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “राम रामेति रामेति..” – लेखक : डॉ. राहुल देशपांडे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : राम रामेति रामेति
लेखक: डॉ. राहुल देशपांडे
पृष्ठ: १६८
मूल्य: ३००₹
हे पुस्तक कोणासाठी?
… जीवन जगत असताना आपल्या ठरविलेल्या ध्येयाकडे जायचा प्रवास सहज करायचा असेल त्यांच्यासाठी…
… रोजच्या प्रवासात अडथळे येऊन योग्य मार्ग सापडत नसेल आणि अति विचारांनी जे स्वतःचेच नुकसान करून घेत असतील त्यांच्यासाठी…
… जगणे अवघडच असते आणि मीच केवळ वेदना भोगत आहे असे समजून ईश्वराला दोषी ठरविणाऱ्या माझ्या अनेक मित्रांसाठी…
… आत्ता जरी मार्ग खडतर असला तरी जगणे खूप सोपे आणि सुंदर आहे यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी…
… ज्यांनी रामायण वाचले त्यांच्यासाठी, ज्यांनी वाचले नाही, त्यांच्यासाठीही. श्रीराम आणि सीतामाई यांना मानतात त्यांच्यासाठी आणि मानत नाहीत त्यांच्यासाठीही…
… प्रभू राम आणि सीता माई यांना आजच्या जीवनशैलीत नव्याने समजून घ्यायचे असेल त्यांच्यासाठी…
… मला सगळा रस्ता माहिती आहे असे प्रवास सुरू करताना शंभर वेळा सांगतात आणि नंतर हळूच गुगल मॅप लावतात त्यांच्यासाठी… एकूणच सुखी व्हायचे आहे अशा सर्वांसाठी…
‘मी यशस्वी आहे का? ’ हा प्रश्न कधीही स्वतःला विचारू नये. कारण त्याचे उत्तर कठीण आहे. तेही खूप सापेक्ष आहे.
मात्र, ‘मी सुखी आहे का? ’ हा प्रश्न नक्की विचारावा आणि याचे उत्तर जर ‘हो’ आले तर तुम्ही नक्की यशस्वी आहात, यावर विश्वास ठेवा.
‘मात्र सुखी राहायचे कसे? ’ हा प्रश्न आजच्या ताणतणावाच्या, धावपळीच्या जगण्यात पडतो. ते पण साहजिक आहे.
गदिमा-बाबूजींच्या गीतरामायणाचा आधार घेत रामकथेतील विविध पात्रांच्या मदतीने मला सुखी जगण्याचा कानमंत्र मिळाला. तो या पुस्तकरूपाने तुमच्यासमोर ठेवत आहे. इथे तुम्ही राम मानता का नाही मानत, हा प्रश्न नाही. कारण इथे राम केवळ देव नाही, तर resilience, emotional intelligence आणि ethical leadership यांचा भारतीय रूप उलगडणारा दिशादर्शक आहे.
हे केवळ पुस्तक नाही.
क्रॅश कोर्स आहे – सुखी जगण्याचा.
आपल्या सुखी जगण्याच्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे…
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम एवं विचारणीय व्यंग्य – ‘पेपर लीकेज का जिन्न‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # ३४५ ☆
☆ व्यंग्य ☆ पेपर लीकेज का जिन्न ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆
पेपर लीकेज के मसले ने सरकारों की नींद आराम कर दी है। पूरे देश में हंगामा बरपा है। सरकारों को लगता है ये आंदोलनकारी जेन-ज़ी नहीं, बोतल से निकले जिन्न जी हैं। अभी तक ये कहां छिपे बैठे थे? समझ में नहीं आता कि इन्हें वापस बोतल में कैसे बन्द किया जाए। ये चुपचाप पुलिस की लाठियां खाकर भागने वाले, किताबों में डूबे रहने वाले संस्कारी छात्र अचानक जिम्मेदार लोगों से आंख में आंख डालकर सवाल कैसे करने लगे? घोर कलियुग! उस पर तुर्रा यह कि इनके साथ जेन-अल्फ़ा भी कुसंस्कार सीख रहा है, यानी बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुबहान अल्लाह।
देश के बहुत से सयाने लोग लड़कों के नारों और उनके द्वारा प्रदर्शित प्लेकार्डों से दुखी हैं। ‘हाय,हाय, ये नेताओं के लिए कितनी गन्दी भाषा लिख और बोल रहे हैं। इनके संस्कार कहां गये?क्या इनके मां-बाप ने इन्हें यही सिखाया था? न किसी की शर्म, न लिहाज। राम, राम।’
कुछ दूसरे सयाने जवाब देते हैं— ‘हमारी पीढ़ी ने नयी पीढ़ी को कौन से संस्कार सिखाये हैं? संसद में सांसद दूसरे दलों के सांसदों के लिए कैसी भाषा का उपयोग करते हैं? सभी बड़े मंदिरों में रोज़ चोरी की खबरें आती हैं, परीक्षाओं के पेपर लीकेज से छात्रों का भविष्य चौपट हो रहा है, पार्टियों को खुले आम तोड़कर सरकारें बनायी जाती हैं, बड़े-बड़े सन्त जेल की हवा खा रहे हैं, सिद्ध भ्रष्ट बड़ी कुर्सियों पर बैठे हैं, चतुर लोग बैंकों का हज़ारों करोड़ हज़म करके विदेश में मौज कर रहे हैं, हजारों करोड़ से बने पुल उद्घाटन से पहले गिर रहे हैं, नयी बनी एक्सप्रेस-वे चटक रही हैं, नये बने एयरपोर्ट पहली बरसात में चौधार आंसू टपका रहे हैं, महापुरुषों और ऋषि-मुनियों की नयी बनी मूर्तियां हवा के झोंके से गिर रही हैं। यह सब नयी पीढ़ी देख रही है और समझ रही है, इसलिए उस पर हमारे नैतिकता के भाषणों से कोई असर नहीं होने वाला। ये कोई दूध-पीते बच्चे नहीं हैं। इस पीढ़ी के पास हमसे ज़्यादा समझ है। वह हमारी पीढ़ी के पाखंड को खूब समझ रही है।’
सुन कर संस्कारों की दुहाई देने वाले सयाने मौन साध लेते हैं।
सरकारों में भगदड़ मची है। इस लीकेज को कैसे बन्द किया जाए। कमेटियां बन रही हैं। कुछ पकड़-धकड़ भी हुई है। कमेटियों से सुझाव आता है कि लीकेज के दोषियों के लिए सख़्त सज़ा का प्रावधान हो। दस साल की सज़ा और दस करोड़ जुर्माने पर सहमति बनती है।
एक मसखरा सवाल करता है, ‘अपराधी के पास दस करोड़ की संपत्ति नहीं हुई तो वसूली कैसे होगी?’
छात्र इन सुझावों पर आपत्ति करते हैं, कहते हैं, ‘ये सब लीकेज के बाद के उपाय हैं। इनसे छात्रों का नुकसान कैसे पूरा होगा? अंग्रेज़ी की कहावत के अनुसार घोड़े के भाग जाने के बाद अस्तबल का दरवाज़ा बन्द किया जाएगा। सरकार यह बताये कि लीकेज रोकने के लिए क्या किया गया है।’
सरकारें फिर परेशान हैं। फिर कमेटियां बैठती हैं। फिर मगजमारी होती है। लीकेज रोकने के सुझाव मांगे जाते हैं। छात्रों की तरफ से सुझाव आता है कि परीक्षाओं का पूरा काम सौ प्रतिशत ईमानदार और कठोर निर्णय लेने वाले अधिकारियों को सौंपा जाए। अब सौ प्रतिशत ईमानदार अधिकारियों की खोज में दौड़भाग शुरू होती है। तुरन्त ‘ऑनेस्टी टेस्टिंग मीटर’ तैयार करवाए जाते हैं और सौ से ज़्यादा अधिकारी इन मीटरों से लैस होकर देश के कोने-कोने में निकल पड़ते हैं। उच्च अधिकारी सारे वक्त उनसे रिपोर्ट लेते हैं।
ज़्यादातर मामलों मैं रिपोर्ट मिलती है कि ईमानदार तो बहुत मिल रहे हैं लेकिन अब तक सौ प्रतिशत वाला बन्दा नहीं मिला है। उच्च अधिकारी माथे का पसीना पोंछते हैं, कहते हैं, ‘कोई बात नहीं। लगे रहो। कामयाबी ज़रूर मिलेगी।’
तो भाइयो, सौ प्रतिशत ईमानदार खोजने की कोशिश अभी ज़ारी है। हम भी दुआ करते हैं कि अधिकारियों को इस काम में जल्दी सफलता मिले। वैसे यह गांधी और बुद्ध का देश है। यहां सौ प्रतिशत ईमानदार आदमी नहीं मिला तो बड़ी नककटई हो जाएगी।