मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५ आणि ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५ आणि ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

– – – श्लोक ५

मना पापसंकल्प सोडून द्यावा

मना सत्यसंकल्प जीवी धरावा |

मना कल्पना ते नको विषयांची |

विकारी घडे हो जनी सर्व ची ची ||

अर्थ : समर्थ मनाला बजावत आहेत की हे मना तू पापसंकल्प (वाईट विचार)सोडून दे आणि त्या जागी सत्यसंकल्पांना (सद्विचार किंवा परमात्मास्वरूपाचे ज्ञान) स्थान दे. हे मना तू विषयांची कल्पना देखील करू नकोस कारण विषयातून नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. आणि मग तशा प्रकारची कृत्ये हातून घडतात. त्यामुळे लोकांमध्ये छी थू होते.

आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात, ” मना अंतरी सार विचार राहो ” मग मनामध्ये हे सार विचार म्हणजेच चांगले विचार कायमस्वरूपी राहावेत म्हणून काय करायला हवे ते समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात. त्यासाठी सुरुवातीला पापसंकल्प म्हणजे आपल्या मनातील वाईट विचारांचा त्याग करावा लागेल. प्रत्येकाच्या मनात चांगले वाईट असे विचार येतच असतात. त्यातही वाईट विचार लवकर येतात आणि ते नैसर्गिक असते. मग असे विचार घालवले तर त्या जागी दुसरे काहीतरी हवे कारण रिकामे मन हे सैतानाचे घर असते असे आपण म्हणतो. म्हणून समर्थ म्हणतात की पापसंकल्प म्हणजे वाईट विचारांचा त्याग केल्यानंतर मनामध्ये सत्यसंकल्पांना म्हणजे चांगल्या विचारांना स्थान द्यावे. आपले मन म्हणजे सुपीक जमीन अशी कल्पना केली तर त्यामध्ये जशा विचारांचे बीज आपण पेरू तसे ते उगवतील, अनेक पटींनी उगवतील. म्हणूनच त्यात सद्विचारांची पेरणी करावी आणि वाईट विचारांचे तण उपटून टाकावे.

पापसंकल्प आणि सत्यसंकल्प या दोन्ही शब्दात ‘ संकल्प ‘हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. संकल्प म्हणजे आपल्याला पुढे जे काही करायचे आहे त्याचा विचार आणि उच्चार मनाशी करणे होय. जेव्हा आपण एखादे धार्मिक कार्य करतो तेव्हा सुरुवातीला गुरुजी आपल्या हातून त्याचा संकल्प सोडतात. म्हणजेच ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे आणि त्याचे परिणामस्वरूप फळ आपल्याला मिळावे असा त्यामागील हेतू असतो. नवीन वर्षात किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी देखील आपण संकल्प करत असतो. विद्यार्थी अभ्यासाचा, उत्तम शरीर प्रकृती कमावण्याचा निश्चय करतात. हे संकल्प साधारणपणे चांगलेच असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला होता आणि मग तशी कृती त्यांच्या हातून घडली आणि त्यांच्या संकल्पास मूर्त रूप आले. आधी मनात विचार येतो, त्याप्रमाणे आपल्या जिभेवर ते शब्द येतात आणि नंतर त्याप्रमाणे कृती घडते. म्हणजे विचार, उच्चार आणि आचार ही संकल्पमागील त्रिसूत्री आहे असे म्हणता येईल. मग लौकिक व्यवहारात जर संकल्प एवढा आवश्यक आणि महत्वाचा असेल तर मग अध्यात्मात तर हवाच हवा.

पण असे संकल्प करण्यासाठी मनाचा निर्धार लागतो. त्यासाठी वाईट विचारांचा, कुबुद्धीचा त्याग करावा लागतो आणि त्या जागी सद्विचारांना जाणीवपूर्वक स्थान द्यावे लागते. हे करणे सोपे नाही. त्यासाठी  मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय लावावी लागते. माणसाचे मन हे नेहमी विषयांकडे ओढ घेते. मनाचे विषय, बुद्धीचे विषय आणि इंद्रियांचे विषय माणसाला आकर्षित करत असतात. इथे विषय या शब्दाचा अर्थ वासना (इच्छा)असा घेता येईल. निरनिराळ्या प्रकारच्या वासना आपल्याला आकर्षित करून त्यांच्याकडे ओढत असतात. आपण त्या वासनांना बळी पडतो. म्हणजे आधी विचार येतो, मग आपल्या मुखात तशा गोष्टी येतात आणि नंतर तशी कृती घडते. तसे होऊ नये म्हणून समर्थ आधीच बजावतात की विषयांची कल्पनाच करू नये. एकदा का विषयांची कल्पना म्हणजे त्या विषयांना मनामध्ये स्थान दिले तर त्यांना बळ मिळत जाते आणि मग माणसाची कृती त्याप्रमाणे होते. काम, क्रोध, लोभ, मोह इ. षडविकार आहेत. माणूस विषयाधीन झाला किंवा वासना आणि विकारांना बळी पडला तर समाजामध्ये त्याची छी थू होते, तो माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा राहत नाही.

श्रीरामांनी जीवनात संयमाला स्थान दिले आणि मर्यादांचे पालन केले म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. रावण विद्वान होता, शूर होता, ज्ञानी होता पण तो विकारांना बळी पडला आणि त्यामुळे त्याचे अध:पतन झाले. आपण संयमाची मूर्ती असलेल्या आणि मर्यादापुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांचे पूजन करतो, रावणाचे नाही. म्हणूनच विषयांची कल्पना देखील नको असे समर्थ म्हणतात.

आपल्यासारख्या सामान्य आणि संसारी माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न येईल की मग विषय भोगायचेच नाहीत का? जीवनाचा आनंद घ्यायचा नाही का? अशा प्रसंगी श्रीरामांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. श्रीरामांनी जीवनाचा आनंद घेतला परंतु त्यासाठी धर्माने जी मर्यादा आखून दिली आहे, तिचे त्यांनी पालन केले. म्हणून आपल्या धर्मात, संस्कृतीत जे मान्य असेल त्याचा संयमितपणे उपभोग आपण घेऊ शकतो. आणि ते करत असताना सत्यसंकल्पाकडे म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीकडे आपली वाटचाल करू शकतो. हल्ली जग जवळ आले आहे. द वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज असं आपण म्हणतो. पण प्रत्येक देशाच्या चालीरीती, संस्कृती निराळी असते. ते पाहिल्यानंतर आपल्याकडील नीतिमत्तेच्या कल्पना आपल्याला चुकीच्या वाटू शकतात. परंतु जिथे जसे वागणे योग्य असते तसेच वागायला हवे. इतर ठिकाणी अमुक अमुक गोष्ट मान्य आहे म्हणून आपण इकडेही तसं करायला काय हरकत आहे असा सोयीस्कर विचार आपल्या मनात येऊ शकतो. कारण मनाची धाव विषयांकडेच असते. पण ती गोष्ट आपल्या धर्मात, संस्कृतीत किंवा नीतिमत्तेच्या कल्पनेत बसते का याचा विचार करायला हवा. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय अशी आपली वाटचाल जीवनामध्ये असले पाहिजे. हेच या ठिकाणी समर्थांना सांगायचे आहे.

संकल्प जसा असेल, तसे जीवन घडते. म्हणून समर्थ प्रथम मनाला शुद्ध करण्याचा आग्रह धरतात. मन शुद्ध झाले की मार्ग आपोआप प्रकाशमान होतो; सत्यसंकल्पातूनच श्रेयसाचा प्रवास सुरू होतो.

स्वसंवाद..

  • माझ्या मनात वारंवार येणारे विचार कोणत्या प्रकारचे असतात?
  • मी जाणीवपूर्वक सत्यसंकल्प करून तो पाळण्याचा प्रयत्न करतो का?
  • माझे विचार, शब्द आणि कृती यांमध्ये सुसंगती आहे का?
  • विषयांच्या आकर्षणामुळे मी कधी माझ्या मूल्यांशी तडजोड करतो का?
  • माझ्या जीवनसंकल्पाची दिशा केवळ यशाकडे आहे की मानसिक आणि अध्यात्मिक उन्नतीकडेही?

– – – 

– – – श्लोक ६.

नको रे मना क्रोध हा खेदकारी |

नको रे मना काम नाना विकारी |

नको रे मदा सर्वदा अंगीकारू |

नको रे मना मत्सरू दंभ भारू ||||

अर्थ : हे मना, क्रोधाला स्थान देऊ नकोस; तो शेवटी खेद आणि दुःख देणाराच आहे. कामवासना नाना प्रकारचे विकार निर्माण करते. मद (अहंकार), मत्सर आणि दंभ (ढोंगीपणा) या विकारांपासून दूर राहा असा समर्थांचा स्पष्ट उपदेश आहे.

मागील श्लोकात समर्थांनी “पापसंकल्प” सोडण्याची सूचना केली. येथे ते त्या पापसंकल्पांचे मूळ असलेल्या विकारांकडे आपले लक्ष वेधतात. मनाच्या अध:पतनाला कारणीभूत ठरणारे हे विकार म्हणजेच षडरिपूंपैकी प्रमुख काम, क्रोध, मद, मत्सर आणि दंभ. त्याबद्दल समर्थ प्रामुख्याने या ठिकाणी सांगतात.

क्रोध हा खरोखरच खेदकारी आहे. रागाच्या भरात उच्चारलेले शब्द आणि केलेली कृती अनेकदा नंतर पश्चातापाला कारणीभूत ठरतात. हातातून सुटलेला बाण जसा परत येत नाही; तसेच रागाच्या भरात बोललेले शब्दही.

क्रोध हा क्षणिक असतो; पण त्याचे परिणाम मात्र दीर्घकाळ मनात जखम करतात. म्हणूनच मोठी माणसे आपल्याला सांगतात की राग आला की थोडा थांबा, एक ते दहा अंक मोजा, श्वास घ्या. कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. हा छोटासा विरामच अनेक अनर्थ टाळू शकतो.

कामभावना ही जीवनातील नैसर्गिक शक्ती आहे. ती नाकारण्याची गोष्ट नाही; पण तिचा अतिरेक विकारांना आमंत्रण देतो. काम म्हणजे केवळ लैंगिक वासना नव्हे; कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी हव्यास हा देखील ‘काम’च.

विवाहमंत्रातील “धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि” हे वचन याच संतुलनाची शिकवण देते. धर्माच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाचा स्वीकार ही आपली संस्कृती आहे. संयमित काम सृजनशील असतो तर त्याचा अतिरेक विनाशकारी ठरतो.

संत परंपरेत तीन ‘एषणा’ सांगितल्या आहेत. वित्तेषणा (संपत्तीची हाव), दारेषणा (सुंदर स्त्रीची अभिलाषा) आणि लोकेषणा (कीर्तीचा हव्यास). या तिन्ही एषणा किंवा वासना मनाला बाहेर खेचतात. अध्यात्माची वाट मात्र अंतर्मुख करते. म्हणूनच ती श्रेयस्कर!

यश, वैभव किंवा कीर्ती मिळाली की मनात ‘मीच केले’ हा अहंकार उद्भवतो. ‘ वऱ्हाड निघालं लंडनला ‘ या लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगात एक नणंदेचं पात्र आहे. काही चांगलं झालं की ते माझ्यामुळे झाला असं ती सारखं म्हणत असते. हा फुकाचा अहंकार. हा मद म्हणजेच अहंकार साधकाच्या प्रगतीत अडथळा ठरतो.

इतरांची प्रगतीने सज्जनांना आनंद होतो. पण ज्यांना ती पाहवत नाही त्यांना मत्सर निर्माण होतो आणि मत्सरातून द्वेष जन्म घेतो. आणि मग स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा दंभ सुरू होतो. हे असते आभासी मोठेपणाचे प्रदर्शन. जर मनापासून एखादी गोष्ट कोणी करत नसेल तर टिळे, टोपी, गंधमाळा, भगवे कपडे या सगळ्या गोष्टी म्हणजे सोंग आहेत. जो सगळ्या गोष्टी मनापासून करतो त्याला असे प्रदर्शन करण्याची गरज भासत नाही. पांढरे कपडे घालून समाजसेवेचा आव आणणे, वाङ्मयचौर्य करणे हा देखील असाच प्रकार म्हणता येईल.

‘जगाच्या पाठीवर ‘ या चित्रपटात ग दि माडगूळकर यांनी लिहिलेले एक सुंदर गाणे आहे ‘ थकले रे नंदलाला ‘ हे गीत आजच्या परिस्थितीचे अतिशय सुंदर वर्णन करते यातील प्रत्येक ओळ आजच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला लागू पडते. या गीतातील ‘ निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला… ‘ यासारखी ओळ असो किंवा ‘ विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला… ‘ यासारखी ओळ असो त्या आजच्या परिस्थितीचे हुबेहूब वर्णन करतात.

हे विकार सूक्ष्म असतात; पण आत्मविकासाच्या वाटेवर ते खोल दरी निर्माण करतात. राघवाच्या अनंत मार्गावर चालायचे असेल तर बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूंवर विजय मिळवावा लागतो. हा मार्ग दुसऱ्यांवर विजय मिळवण्याचा नाही; तर स्वतःवर विजय मिळवण्याचा आहे. साधकाला देहबुद्धी ओलांडून आत्मबुद्धीकडे वाटचाल करायची असते. या प्रवासात विकारांवर सतत लक्ष ठेवावे लागते. कारण ते हळूहळू, नकळत मनावर कब्जा करतात.

त्यासाठी मनावर एकदम नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न न करता सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करावी. मोठ्या प्रतिज्ञेपेक्षा छोट्या, सातत्यपूर्ण संयमाचे पाऊल अधिक प्रभावी असते.

स्वसंवाद..

  • रागाच्या क्षणी मी थांबतो का, की तत्काळ प्रतिक्रिया देतो?
  • माझ्या इच्छांमध्ये संयम आहे का, की अतिरेक?
  • इतरांच्या यशाने मला आनंद होतो की मत्सर?
  • माझ्या यशामागे ईश्वरकृपा आणि इतरांचा देखील वाटा आहे याचे भान मी ठेवतो का?
  • बाह्य जग जिंकण्यापेक्षा मी स्वतःवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो का?

– क्रमशः श्लोक ५ आणि ६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अर्थपूर्ण गिचमिड…” माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ सौ शोभा जोशी ☆

सौ शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “अर्थपूर्ण गिचमिड…” माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ सौ शोभा जोशी

पुण्याच्या प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज रोडवर (FC Road) संध्याकाळची वेळ होती. तरुण मुला-मुलींची गर्दी, कॅफेमधला गोंगाट आणि वाहनांचा आवाज.

तिथेच, एका कोपऱ्यात, जिथे महापालिकेची मोठी कचराकुंडी होती, तिथे एक ६५-७० वर्षांचा म्हातारा बसला होता.

त्याचा अवतार बघण्यासारखा नव्हता. अंगावर एकच फाटका शर्ट, वाढलेली दाढी, जटा झालेले केस आणि अंगाला दुर्गंधी येत होती. तो कचऱ्यातून काहीतरी शोधून खात होता.

येणारे-जाणारे लोक त्याला बघून नाक मुरडत होते. काही टवाळखोर पोरं त्याला दगड मारून पळून जात होती. “ए वेड्या! ए सायंटिस्ट! काय शोधतोय कचऱ्यात? “

तो म्हातारा कोणाकडेच बघत नव्हता.

त्याच्या हातात एक ‘विटकरीचा तुकडा’ (Red Brick Piece) होता.

तो त्या तुकड्याने फुटपाथवर आणि समोरच्या भिंतीवर काहीतरी ‘गिचमिड’ लिहित होता.

लोक हसून म्हणायचे, “बघा, वेडा काहीतरी नक्षी काढतोय. “

त्याच वेळी, तिथून ‘समीर’ एका लग्सरी कार मधून जात होता. समीर आता शहराचा ‘जिल्हाधिकारी’ (Collector) झाला होता. त्याला आज कॉलेजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं.

समीरची नजर त्या म्हाताऱ्यावर पडली.

गाडी सिग्नलला थांबली होती. समीरने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्या म्हाताऱ्याने भिंतीवर जे लिहिलं होतं, ते बघून समीरचे डोळे विस्फारले.

ते काही गिचमिड नव्हतं.

ती ‘कॅल्क्युलसची अवघड समीकरणं’ (Complex Calculus Integration Problems) होती.

आणि ती इतकी अचूक होती की, एखाद्या सामान्य प्रोफेसरलाही सोडवायला वेळ लागेल.

समीरने ड्रायव्हरला ओरडून सांगितलं, “गाडी थांबव! आताच्या आता! ” समीर गाडीतून उतरला. तो आपला सूट-बूट सावरत त्या कचराकुंडीजवळ गेला.

सुरक्षारक्षक आणि लोक बघत राहिले. “कलेक्टर साहेब या वेड्यापाशी का जात आहेत? “

समीर त्या म्हाताऱ्याच्या जवळ गेला. दुर्गंधी येत होती, पण समीरला त्याचं भान नव्हतं.

तो भिंतीवरची ती गणितं वाचत होता. आणि त्याला त्याच्या बालपणीची आठवण झाली.

त्याच्या शाळेत एक शिक्षक होते – ‘देशपांडे सर’. जे गणिताचे जादूगार होते. ते नेहमी म्हणायचे, “गणितात देव असतो रे! आणि हे जग एक समीकरण आहे. “

पण २० वर्षांपूर्वी, देशपांडे सरांच्या पत्नीचा आणि मुलाचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्या धक्क्याने सर वेडे झाले होते आणि ते कुठेतरी गायब झाले होते.

समीरने थरथरत्या हाताने त्या म्हाताऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला.

“सर? देशपांडे सर? “

त्या म्हाताऱ्याने मान वर केली. त्याचे डोळे रिकामे होते. त्यात कोणतीच ओळख नव्हती.

तो फक्त हसला आणि म्हणाला, “बाळा, हे गणित चुकलंय बघ. इथे ‘X’ नाही, ‘Y’ पाहिजे. हे जग चुकलंय… “

त्या एका वाक्याने समीरला खात्री पटली. हा आवाज तोच होता.

समीरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या.

ज्या शिक्षकाने त्याला घडवलं, ज्याच्यामुळे आज तो ‘कलेक्टर’ झाला होता, तो गुरु आज कचऱ्यात अन्न शोधत होता आणि लोक त्याला दगड मारत होते.

समीर तिथेच, त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गुडघ्यावर बसला.

त्याने त्या म्हाताऱ्याचे घाणेरडे, चिखलाने माखलेले पाय आपल्या हाताने धरले आणि त्यावर डोकं ठेवलं.

गर्दी जमली होती. लोक फोटो काढत होते.

समीर ओरडला, “ए फोटो काय काढताय? लाज वाटत नाही तुम्हाला?

ज्या माणसाला तुम्ही ‘वेडा’ समजून दगड मारलेत ना… ते तुमचे आणि माझे ‘बाप’ आहेत ज्ञानाने.

हे ‘प्राध्यापक विनायक देशपांडे’ आहेत. ज्यांनी हजारो इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स घडवलेत.

आज नियतीने त्यांची परीक्षा घेतली, आणि तुम्ही समाजाने त्यांना नापास केलं. “

समीरने स्वतःचा कोट काढला आणि सरांच्या अंगावर घातला. त्याने जवळच्या हॉटेलमधून पाणी आणलं आणि स्वतःच्या हाताने सरांचा चेहरा धुतला.

देशपांडे सर शांत होते. ते फक्त समीरकडे बघत होते. कदाचित त्यांच्या स्मृतीच्या पडद्यावर काहीतरी अस्पष्ट आठवत असावं.

समीरने त्यांना आपल्या सरकारी गाडीत बसवलं.

तो त्यांना आपल्या घरी घेऊन गेला.

त्यांना आंघोळ घातली, नवीन कपडे दिले आणि पोटभर जेवण दिलं.

जेवताना देशपांडे सर अचानक थांबले.

त्यांनी समीरकडे बघितलं आणि विचारलं, “बाळा… ते इंटीग्रेशनचं गणित सुटलं का रे तुझं? “

समीर रडत हसला. “नाही सर… तुम्ही शिकवाल तरच सुटेल. “

समीरने पुढचे ५ वर्षे देशपांडे सरांचा सांभाळ केला.

औषधोपचाराने त्यांची स्मृती पूर्ण परत आली नाही, पण त्यांना हे समजलं की आपण सुरक्षित आहोत.

समीर रोज संध्याकाळी ऑफिसवरून आला की पाटी-पेन्सिल घेऊन सरांच्या समोर बसत असे.

आणि देशपांडे सर, ज्यांना स्वतःचं नाव आठवत नसे, ते मात्र समीरला गणिताची अवघड समीकरणं अगदी सफाईदारपणे शिकवत असत.

ज्या दिवशी देशपांडे सर वारले, त्या दिवशी समीरने त्यांच्या अंत्यविधीसाठी एकही दिवस सुट्टी घेतली नाही.

तो म्हणाला, “सरांची शिकवण होती – कर्म करत राहा. मी रडणार नाही, कारण त्यांनी मला गणितातल्या शून्यातून विश्व निर्माण करायला शिकवलंय. “

रस्त्यावरचा प्रत्येक वेडा किंवा भिकारी हा जन्मताच तसा नसतो. कोणाचं नशीब कधी फिरेल सांगता येत नाही. ज्या हातांनी आज तुम्ही दगड मारताय, त्या हातांनी कधीतरी कोणाचं भविष्य घडवलं असेल. शिक्षकांचा आणि बुजुर्गांचा आदर करा, परिस्थिती कशीही असो. कारण ज्ञान कधीच म्हातारं होत नसतं आणि ते कधीच कचरा होत नसतं.

माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  सौ शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कुठे हरवली ती मैना खेर??” – लेखक : श्री बिपिन देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “कुठे हरवली ती मैना खेर??” – लेखक : श्री बिपिन देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आज एका रद्दीच्या दुकानावरून जाताना सहज एका गोष्टीवर नजर गेली. एक लक्झरी कार त्याच्या दारात थांबली होती. त्याने खटका दाबून डिकी (सॉरी.. त्याला आता ट्रंक म्हणायचं! ) उघडली आणि कारच्या डिकीतून अगदी किरकोळ रद्दी काढून ती दुकानदाराला देऊ केली.

माझ्या खट्याळ मनात उगीचच विचार आला की आज २८ तारीख, हा मनुष्य रद्दी विकायला आलाय म्हणजे याच्या घरी ‘ मैना खेर’ आली की काय?

मी मनाने एकदम ४०-५० वर्षे मागे गेलो. ‘मैना खेर…! ‘

बहुतेक पगारदार मध्यमवर्गीय घरांमध्ये प्रत्येक महिन्याची साधारण २०-२५ तारीख आली की ही ‘मैना खेर’ नावाची नावडती पाहुणी हटकून येत असे.

आज हा २८ तारखेला रद्दी विकणारा मनुष्य दिसल्यावर तिची आठवण झाली.

त्यावेळी मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात दर महिन्याच्या ४ आठवड्यांना नावही मोठी भन्नाट दिलेली असायची.

दर महिन्याला १ तारखेला पगार झाल्यावर येणारा पहिला आठवडा म्हणजे ‘ गोल्डन विक’!

महिन्याची वाणी, दूधवाला, पेपरवाला, मुलांच्या फिया (त्यावेळचं ‘फी’ चं मराठी अनेकवचन) वगैरे देऊन थोडी मध्यमवर्गीय मौजमजा करून झाल्यावर, दुसरा आठवडा यायचा तो म्हणजे  ‘सिल्व्हर विक’!

पैशाचं पाकिट बऱ्यापैकी हलकं व्हायला लागलेलं असताना महिन्याचा तिसरा आठवडा यायचा तो म्हणजे ‘ ब्रॉंझ विक’!

हा संपतोय नाही तर यायचा महिन्याचा ४था आठवडा. हा म्हणजे ‘ रद्दी विक’!

पगाराचं पाकिट रिकामं झालेलं असायचं. रोजच्या खर्चासाठी महिनाभर साठलेला रद्दीचा गठ्ठा नाडीनं बांधून सायकलीच्या कॅरियरला लावला जायचा. जे काही पैसे येतील, त्यातून बारीकसारीक खर्च भागवले जायचे. रद्दी विकून आलेल्या थोड्याफार पैशातून आठवडा ढकलला जायचा म्हणून याचं नाव ‘ रद्दी विक’ इतकंच! आधीच्या गोल्डन, सिल्व्हर वगैरे आठवड्यांचा गोल्ड, सिल्व्हरशी तसा काही संबंध नाही.

या आठवड्यात नवीन खरेदीवर बॅन आलेला असायचा.

नवीन काही आणायचं असेल तर “आत्ता हट्ट नको करूस, आत्ता ‘मैना खेर’ आहे ! बाबांचा पगार झाल्यावर घ्यायला सांगते हं मी त्यांना! “अशी आश्वासनं मुलांना दिली जायची.

तर अशी ही ‘ महिना अखेर’ यायची. तिचं लाडाचं नाव ‘ मैना खेर’!

शाळकरी मुलांना मात्र या महिना अखेरीत देखील एक आनंदाचा दिवस असायचा, तो म्हणजे, महिन्याचा शेवटचा दिवस!

त्या दिवशी शाळा ‘अर्धा दिवस’ असायची. वर्गशिक्षकांना महिन्याच्या ‘फी’चा हिशोब  करायला वेळ मिळावा म्हणून शाळा अर्धा दिवस असायची. तसं पाहिलं तर या अर्ध्या दिवसाच्या शाळेलाही काही अर्थ नसायचा म्हणा. वर्गशिक्षक त्या वेळातही काम करायचे.

कुणी फी भरलेली नसेल तर त्याला सूचना दिली जायची. प्रगती पुस्तकात महिन्यातल्या हजेरी-गैरहजेरीचा हिशोब मांडला जायचा.

त्या अर्ध्या दिवसातही सगळा गडबड गोंधळच चालायचा.

मला आजही एक गोष्ट खटकते ती म्हणजे वर्गशिक्षक मंडळी हिशोबात गोंधळ नको म्हणून ‘नादारीवाल्या’ मुलांना एका बाजूला वेगळे बसवत असत. तेव्हा ते ‘नादारी’ प्रकरण काय आहे ते समजायचं नाही. खरंतर ज्या मुलांना ‘नादारीवाले’ म्हणून अस्पृश्यासारखं वेगळं बसवलं जायचं, त्यांनादेखील खरंतर ते माहिती नसावं. कारण तेवढी समज कुणाला होती म्हणा?

हे आत्ता या ‘ मैना खेरच्या’  आठवणीत आठवलं खरं!

आता  या ‘मैना खेर’चं नाव कुठे ऐकायला मिळत नाही.

मोबाईल ॲप वरून सहज मिळणारी फसवी कर्जं, क्रेडिट कार्ड्स, चौका चौकात उघडलेली गोल्ड लोनची दुकानं आणि महत्त्वाचं म्हणजे ‘इएमआय’वर उपलब्ध असणाऱ्या जीवनासाठी आवश्यक आणि अनावश्यक गोष्टींमुळे,

“आत्ता नको ! बाबांचा पगार झाल्यावर पुढच्या महिन्यात ह्यांना आणायला सांगते हं! “असं म्हणणारी आई तरी कुठे राहिली आहे आता!

या सगळ्या ‘इझी क्रेडिट’, ‘इन्स्टा लोन’ च्या या आभासी सुबत्तेच्या आणि चंगळवादाच्या युगात, ती दुष्ट चेटकिणीसारखी वाटणारी  ‘मैना खेर’  कुठेतरी हरवली आहे, हे मात्र निश्चित!

लेखक: श्री. बिपिन देशमुख

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वात्सल्याचा गाव ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वात्सल्याचा गाव ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

(१)

घरी परतता संध्याकाळी

कोणी तरूणी लेकुरवाळी

मना पिलाची ओढ लागते

तटतटते अंगी काचोळी!!

*

पिलू भुकेले नजरेपुढती

पाय आपसूक वेगाने पडती

पिलू पाहता वक्षामधूनी

अमृत धारा बरसत जाती!!

*

  कवयित्री : नीलांबरी शिर्के

 

(२) 

गायीच्या न् आईच्या नेत्री

वात्सल्याचा वसतो गाव

बुडी मारूनी तिथे खोलवर

घ्यावा म्हणते त्याचा ठाव!!

*

नाक दाबुनी डोळे मिटले

आणि तळाशी गेले थेट

सदाचार अन संस्कृतीचे

ममताभरले काळीज बेट!!

*

त्या गावातुन फिरता जाणवे

निरामय विचारसहवास

पावन हळवी लहर भरवी

आपुलकीने विचार घास!!

*

तृप्तपणे माघारी फिरताना

मातृत्व वात्सल्य मिळे वसा

वसा घेऊन परतताना  

भरला जाई काळीज कसा!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ डॉ. सुमित्र विशेष – मेरी स्मृतियों में – मेरे पिता ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से  प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं डॉ  राजकुमार तिवारी ‘सुमित्र’ जी की दूसरी पुण्यतिथि पर संस्मरण – मेरी स्मृतियों में- मेरे पिता)

☆ संस्मरण – मेरी स्मृतियों में – मेरे पिता ☆ डॉ भावना शुक्ल ☆

द्वितीय पुण्यतिथि पर शत-शत नमन🙏🙏

पिता केवल एक संबंध नहीं होते, वे जीवन की वह दृढ़ पहचान होते हैं जिन पर व्यक्तित्व की पूरी इमारत खड़ी रहती है। मेरे पिता मेरी जान थे, मेरी पहचान थे और वो मेरे जीवन का अभिमान थे । उनका अस्तित्व मेरे लिए केवल भावनात्मक नहीं, बल्कि वैचारिक और सांस्कृतिक विरासत के रूप में भी सदा जीवित रहेगा।

 

उनका व्यक्तित्व अत्यंत प्रखर था-बिना शोर किए, बिना स्वयं को सामने रखे। वे उस वटवृक्ष की भाँति थे जिसकी जड़ें गहराई में छिपी रहती हैं, पर छाया सबको मिलती है। जीवन की आँधियाँ, तपन और बारिश वे स्वयं झेलते रहे, किंतु संतान को उसका आभास तक नहीं होने दिया। अंतर्मन  की पीड़ा, अनगिनत आहें और असह्य मौन—सब कुछ उन्होंने अपने भीतर समेट लिया। पिता का यही मौन उनका सबसे बड़ा त्याग था।

मेरे जीवन की शान, आत्मविश्वास और संस्कार पिता से ही बढ़े। वे हर समय तट पर खड़े उस प्रहरी की तरह थे, जो भले ही दिखाई न दे, पर उसकी उपस्थिति से ही यात्रा सुरक्षित हो जाती है। आज वे भौतिक रूप से पास नहीं हैं, किंतु उनकी स्मृति हर क्षण दिलासा देती है-

“बेटा, हम हमेशा तुम्हारे साथ हैं. हमने तुम्हारा हाथ पकड़ा है।”

मेरे पिता का साहित्य से गहरा नाता था। घर में साहित्यकारों का आना-जाना, विचारों की चर्चा, कविताओं में रस का बस जाना-यह सब मेरे संस्कार का हिस्सा बना। उन्होंने शब्दों के प्रति सम्मान सिखाया, विचारों को उड़ान दी और अभिव्यक्ति को पहचान। उनके सान्निध्य में कविता केवल रचना नहीं रही, वह जीवन का स्वभाव बन गई। जो पहचान मुझे साहित्य में मिली, वह माता- पिता के दिए संस्कारों की ही देन है।

पिता ने कभी उपदेश नहीं दिए, उन्होंने जीवन जिया-और वही जीवन मेरी सबसे बड़ी शिक्षा बना। उनका प्यार आशीर्वाद की तरह था, जो बिना कहे, बिना जताए हर क्षण साथ रहा। आज उनकी पुण्यतिथि पर मन पीड़ा से भरा है, पर साथ ही गर्व से भी-कि ऐसे पिता मिले, जो जीवन भर खजाने की तरह संजोए जाने योग्य रहा।

पिता नहीं हैं, पर उनका व्यक्तित्व, उनके संस्कार और उनकी स्मृतियाँ आलोक की तरह हमारे साथ सदा रहेगा  यह शाश्वत है –

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : bhavanasharma30@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #३११ ☆ अहंकार व संस्कार… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख अहंकार व संस्कार। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # ३११ ☆

☆ अहंकार व संस्कार… ☆

अहंकार दूसरों को झुका कर खुश होता है और संस्कार स्वयं झुक कर खुश होता है। वैसे यह दोनोंं विपरीत दिशाओं में चलने वाले हैं, विरोधाभासी हैं। प्रथम मानव को एकांगी व स्वार्थी बनाता है; मन में आत्मकेंद्रितता का भाव जाग्रत कर, अपने से अलग कुछ भी सोचने नहीं देता। उसकी दुनिया खुद से प्रारंभ होकर, खुद पर ही समाप्त हो जाती है। परंतु संस्कार सबको सुसंस्कृत करने में विश्वास रखता है और जितना अधिक उसका विस्तार होता है; उसकी प्रसन्नता का दायरा भी बढ़ता चला जाता है। संस्कार हमें पहचान प्रदान करते हैं; दूसरों से अलग करते हैं, परंतु अहंनिष्ठ प्राणी अपने दायरे में ही रहना पसंद करता है। वह दूसरों को हेय दृष्टि से देखता है और धीरे-धीरे वह भाव घृणा का रूप धारण कर लेता है। वह दूसरों को अपने सम्मुख झुकाने में विश्वास करता है, क्योंकि वह सब करने में उसे केवल सुक़ून ही प्राप्त नहीं होता; उसका दबदबा भी कायम होता है। दूसरी ओर संस्कार झुकने में विश्वास रखता है और विनम्रता उसका आभूषण होता है। इसलिए स्नेह, करुणा, सहानुभूति, सहनशीलता, त्याग व उसके अंतर्मन में निहित गुण…उसे दूसरों के निकट लाते है; सबका सहारा बनते हैं। वास्तव में संस्कार सबका साहचर्य पाकर फूला नहीं समाता। यह सत्य है कि संस्कार की आभा दूर तक फैली दिखाई पड़ती है और सुक़ून देती है। सो! संस्कार हृदय की वह प्रवृत्ति है; जो अपना परिचय स्वयं देती है, क्योंकि वह किसी परिचय की मोहताज नहीं होती।

भारतीय संस्कृति पूरे विश्व में सबसे महान् है; श्रद्धेय है, पूजनीय है, वंदनीय है और हमारी पहचान है। हम अपनी संस्कृति से जाने-पहचाने जाते हैं और सम्पूर्ण विश्व के लोग हमें श्रद्धा की दृष्टि से देखते हैं; हमारा गुणगान करते हैं। प्रेम, करुणा, त्याग व अहिंसा भारतीय संस्कृति का मूल हैं, जो समस्त मानव जाति के लोगों को एक-दूसरे के निकट लाते हैं। इसी का परिणाम हैं…हमारे होली व दीवाली जैसे पर्व व त्यौहार, जिन्हें हम मिल-जुल कर मनाते हैं और उस स्थिति में हमारे अंतर्मन की दुष्प्रवृत्तियों का शमन हो जाता है; शत्रुता का भाव तिरोहित व लुप्त-प्रायः हो जाता है। लोग इन्हें अपने मित्र व परिवारजनों के संग मना कर सुक़ून पाते हैं। धर्म, वेशभूषा, रीति-रिवाज़ आदि भारतीय संस्कृति के परिचायक हैं, परंतु इससे भी प्रधान है– जीवन के प्रति सकारात्मक सोच, आस्था,  आस्तिकता, जीओ और जीने का भाव…यदि हम दूसरों के सुख व खुशी के लिए निजी स्वार्थ को तिलांजलि दे देते हैं, तो उस स्थिति में हमारे अंतर्मन में परोपकार का भाव आमादा रहता है।

परंतु आधुनिक युग में पारस्परिक सौहार्द न रहने के कारण मानव आत्मकेंद्रित हो गया है। वह अपने व अपने परिवार के अतिरिक्त किसी अन्य के बारे में सोचता ही नहीं और प्रतिस्पर्द्धा के कारण कम से कम समय में अधिकाधिक धन-संपत्ति अर्जित करना चाहता है। इतना ही नहीं, वह अपनी राह में आने वाले हर व्यक्ति व बाधा को समूल नष्ट कर देता है; यहां तक कि वह अपने परिवारजनों की अस्मिता को भी दाँव पर लगा देता है और उनके हित के बारे में लेशमात्र भी सोचता नहीं। उसकी दृष्टि में संबंधों की अहमियत नहीं रहती और वह अपने परिवार की खुशियों को तिलांजलि देकर उनसे दूर… बहुत दूर चला जाता है। संबंध-सरोकारों से उसका नाता टूट जाता है, क्योंकि वह अपने अहं को सर्वोपरि स्वीकारता है। अहंनिष्ठता का यह भाव मानव को सबसे अलग-थलग कर देता है और वे सब नदी के द्वीप की भांति अपने-अपने दायरे में सिमट कर रह जाते हैं। पति-पत्नी में स्नेह-सौहार्द की कल्पना करना बेमानी हो जाता है और एक-दूसरे को नीचा दिखाना उनके जीवन का मूल लक्ष्य बन जाता है। मानव हर पल अपनी सर्वश्रेष्ठता सिद्ध करने में प्रयासरत रहता है। इन विषम परिस्थितियों में संयुक्त परिवार में सबके हितों को महत्व देना–उसे कपोल-कल्पना -सम भासता है, जिसका परिणाम एकल परिवार-व्यवस्था के रूप में परिलक्षित है। पहले एक कमाता था, दस खाते थे, परंतु आजकल सभी कमाते हैं; फिर भी वे अभाव-ग्रस्त रहते हैं और संतोष उनके जीवन से नदारद रहता है। वे एक-दूसरे को कोंचने, कचोटने व नीचा दिखाने में विश्वास रखते हैं। पति-पत्नी के मध्य बढ़ते अवसाद के परिणाम-स्वरूप तलाक़ की संख्या में निरंतर इज़ाफ़ा हो रहा है।

पाश्चात्य सभ्यता की क्षणवादी प्रवृत्ति ने ‘लिव- इन’ व ‘तू नहीं और सही’ के पनपने में अहम् भूमिका अदा की है…शेष रही-सही कसर ‘मी टू व विवाहेतर संबंधों’ की मान्यता ने पूरी कर दी है। मदिरापान, ड्रग्स व रेव पार्टियों के प्रचलन के कारण विवाह-संस्था पर प्रश्नचिन्ह लग गया है। परिवार टूट रहे हैं, जिसका सबसे अधिक ख़ामियाज़ा बच्चों को भुगतना पड़ रहा है। वे एकांत की त्रासदी झेलने को विवश हैं। ‘हेलो- हाय’ की संस्कृति ने उन्हें उस मुक़ाम पर लाकर खड़ा कर दिया है, जहां वे अपना खुद का जनाज़ा देख रहे हैं। बच्चों में बढ़ती अपराध- वृत्ति, यौन-संबंध, ड्रग्स व शराब का प्रचलन उन्हें उस दलदल में धकेल देता है; जहां से लौटना असंभव होता है। परिणामत: बड़े-बड़े परिवारों के बच्चों का चोरी-डकैती, लूटपाट, फ़िरौती, हत्या आदि में संलग्न होने के रूप में हमारे समक्ष है। वे समाज के लिए नासूर बन आजीवन सालते रहते हैं और उनके कारण परिवारजनों  को बहुत नीचा देखना पड़ता है

आइए! इस लाइलाज समस्या के समाधान पर दृष्टिपात करें। इसके कारणों से तो हम अवगत हो गए हैं कि हम बच्चों को सुसंस्कारित नहीं कर पा रहे, क्योंकि हम स्वयं अपनी संस्कृति से दूर होते जा रहे हैं। हम हैलो-हाय व जीन्स कल्चर की संस्कृति से प्रेम करते हैं और अपने बच्चों को कॉन्वेंट स्कूलों में शिक्षित करना चाहते हैं। जन्म से उन्हें नैनी व आया के संरक्षण में छोड़, अपने दायित्वों की इतिश्री कर लेते हैं और एक अंतराल के पश्चात् बच्चे माता-पिता से घृणा करने लग जाते हैं। रिश्तों की गरिमा को वे समझते ही नहीं, क्योंकि पति-पत्नी के अतिरिक्त घर में केवल कामवाली बाईयों का आना-जाना होता है। बच्चों का टी•वी• व मीडिया से जुड़ाव, ड्रग्स व मदिरा-सेवन, बात-बात पर खीझना, अपनी बात मनवाने के लिए गलत हथकंडों का प्रयोग करना… उनकी दिनचर्या व आदत में शुमार हो जाता है। माता-पिता उन्हें खिलौने व सुख-सुविधाएं प्रदान कर बहुत प्रसन्न व संतुष्ट रहते हैं। परंतु वे भूल जाते हैं कि बच्चों को प्यार-दुलार व उनके स्नेह-सान्निध्य की दरक़ार होती है; खिलौनों व सुख-सुविधाओं की नहीं।

सो! इन असामान्य परिस्थितियों में बच्चों में अहंनिष्ठता का भाव इस क़दर पल्लवित-पोषित हो जाता है कि वे बड़े होकर उनसे केवल प्रतिशोध लेने पर आमादा ही नहीं हो जाते, बल्कि वे माता-पिता व दादा-दादी आदि की हत्या तक करने में भी गुरेज़ नहीं करते। उस समय उनके माता-पिता के पास प्रायश्चित करने के अतिरिक्त अन्य विकल्प शेष नहीं रह जाता। वे सोचते हैं– काश! हमने अपने आत्मजों को सुसंस्कृत किया होता; जीवन-मूल्यों का महत्व समझाया होता; रिश्तों की गरिमा का पाठ पढ़ाया होता और संबंध-सरोकारों की महत्ता से अवगत कराया होता, तो उनके जीवन का यह हश्र न होता। वे सहज जीवन जीते, उनके हृदय में करुणा भाव व्याप्त होता तथा वे त्याग करने में प्रसन्नता व हर्षोल्लास का अनुभव करते; एक-दूसरे की अहमियत को स्वीकार विश्वास जताते; विनम्रता का भाव उनकी नस-नस में व्याप्त होता और सहयोग, सेवा, समर्पण उनके जीवन का मक़सद होता।

सो! यह हमारा दायित्व हो जाता है कि हम आगामी पीढ़ी को समता व समरसता का पाठ पढ़ाएं; संस्कृति का अर्थ समझाएं; स्नेह, सिमरन, त्याग का महत्व बताएं ताकि हमारा जीवन दूसरों के लिए अनुकरणीय बन सके। यही होगी हमारे जीवन की मुख्य उपादेयता… जिससे न केवल हम अपने परिवार में खुशियां लाने में समर्थ हो सकेंगे; देश व समाज को समृद्ध करने में भी भरपूर योगदान दे पाएंगे। परिणामत: स्वर्णिम युग का सूत्रपात अवश्य होगा और जीवन उत्सव बन जायेगा।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ डॉ. सुमित्र विशेष – पिता-असीम आकाश ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से  प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं डॉ  राजकुमार तिवारी ‘सुमित्र’ जी की दूसरी पुण्यतिथि पर एक कविता – पिता -असीम आकाश)

☆ कविता – पिता-असीम आकाश ☆ डॉ भावना शुक्ल ☆

देखते हैं स्वप्न

जीवन है असीम आकाश

जहां सपनों के पंख फैले हैं

गर्मी है जहां छाँव भी है

ठंड भी है और बारिश भी है

इसी रूप में हम देखते हैं

अपने पिता को

यही जीवन का आकाश

कभी धधकता सूरज बनता है

हमें तपाकर मजबूत करता है

कभी शीतल चांदनी का एहसास है

असीम आकाश में –

कोई नहीं होती सीमा

हर उड़ान संभव है

थामे रहो विश्वास के पंख

पिता जीवन का आकाश है

उनमें धैर्य है, दृढ़ता है,

विस्तार है और स्वतंत्रता है

यही प्यारा आकाश है

जिसकी छांव में मिलता है

हमें जीवन का अर्थ-

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : bhavanasharma30@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन-यात्रा ☆ डॉ. सुमित्र विशेष – मेरी स्मृतियों में – पुण्य स्मरण ☆ श्री प्रेम नारायण शुक्ला ☆

श्री प्रेम नारायण शुक्ला

☆ जीवन-यात्रा – डॉ. सुमित्र विशेष – पुण्य स्मरण ☆ श्री प्रेम नारायण शुक्ला

मेरे पितृतुल्य ससुर जी से मुझे अपार स्नेह और दुलार मिला। मेरे अपने पिता का अवसान बहुत जल्दी हो गया था, इसलिए उनका सान्निध्य अधिक समय तक नहीं मिल सका। ऐसे में जब जीवन ने मुझे पिता समान ससुर जी का साथ दिया, तो लगा जैसे ईश्वर ने उस रिक्तता को भर दिया हो। उन्हें पाकर मेरा जीवन सचमुच धन्य हो गया।

उनके पास बैठना, उनसे बातें करना, साहित्य के विषय में उन्हें सुनना मेरे लिए अत्यंत आनंददायक होता था। यद्यपि मुझमें साहित्यिक संस्कार नहीं हैं, फिर भी उनकी कविताएँ सुनना, उनके विचारों को जानना मन को समृद्ध कर देता था। जब भी जबलपुर जाना होता, ऐसा लगता मानो पिता का स्नेह फिर से प्राप्त हो रहा हो।

मम्मी के जाने के बाद पापा ने ही माँ और पिता-दोनों का दुलार दिया। जबलपुर के साहित्यिक आयोजनों में उनके साथ जाना, बड़े-बड़े साहित्यकारों से मिलना, उनके साथ कार्यक्रमों में उपस्थित होना-ये सभी अनुभव मेरे लिए गर्व और सौभाग्य के क्षण थे।

आज पापा नहीं हैं, तो ऐसा लगता है जैसे जीवन का एक बड़ा सहारा चला गया हो। उनकी कमी हर पल महसूस होती है। अब उनके स्मरण और उनकी यादों को सहेजकर रखना ही हमारे लिए आत्मिक श्रद्धांजलि है। 🙏

© श्री प्रेम नारायण शुक्ला 

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : bhavanasharma30@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ डॉ. सुमित्र विशेष – पिता का प्यार… ☆ डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’ ☆

डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’

 ☆ कविता ☆

☆ पिता का प्यार…☆ डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’ ☆ 

पिता का प्यार

सृष्टि का सबसे अनमोल उपहार

पिता के लिए क्या लिखूं

शब्द कम पड़ जाते हैं

केवल भाव ही समझ आते हैं

मेरे लिए मेरे पिता एक पूरी दुनिया है

हर समस्या के लिए जादू की पुड़िया हैं

जीवन के उलझते प्रश्नों का समाधान है

मेरी आन बान और मेरी शान है कामना की कामना है

ऐसे ही आपकी यादों में खो जाऊं 

और हर जन्म में आपकी ही बेटी कहलाऊं

 

© डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’

मो 9479774486

जबलपुर मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन-यात्रा ☆ डॉ. सुमित्र विशेष – मेरे पिता मेरा गौरव…☆ डॉ हर्ष कुमार तिवारी ☆

डॉ हर्ष तिवारी 

? जीवन-यात्रा ?

☆ मेरे पिता मेरा गौरव…☆ डॉ हर्ष कुमार तिवारी ☆ 

मेरे पिता मेरे लिए सम्मान और गौरव का स्रोत हैं। उनके व्यक्तित्व में साहित्य केवल रुचि नहीं, बल्कि जीवन का संस्कार था हां मैंने  जो सहज रूप से मुझ तक आया। शब्दों के प्रति आदर, विचारों की शुचिता और अभिव्यक्ति की मर्यादा मैंने पिता से ही पाई।

संस्कारधानी जबलपुर की साहित्यिक परंपरा में आज भी पिता का नाम आदर के साथ लिया जाता है। उनकी लेखनी, उनका वैचारिक अनुशासन और साहित्य के प्रति उनकी निष्ठा एक ऐसी धरोहर है, जिसे सहेजना मेरा दायित्व है।

मैं स्वयं को उनका पुत्र कहने में गौरव अनुभव करता हूँ। पिता ने जो साहित्यिक संस्कार और धरोहर दी, उसे आगे बढ़ाना ही मेरी साधना है और यही मेरी सच्ची श्रद्धांजलि। 

© डॉ. हर्ष कुमार तिवारी

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares