(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “रिश्ता और संपर्क…“।)
अभी अभी # १०७० ⇒ आलेख – रिश्ता और संपर्क श्री प्रदीप शर्मा
°Relation & contact°
रिश्ता केवल खून का ही नहीं होता। हम यहां इंसानियत के रिश्ते की बात भी नहीं कर रहे। बिना जान पहचान के कोई रिश्ता नहीं पनपता। मेल जोल और मेल मिलाप किसी भी रिश्ते की बुनियाद है। रिश्ते हवा में नहीं बनाए जाते। वर वधू की तलाश में अखबारों में मेट्रिमोनियल और क्लासीफाइड विज्ञापन तो दिए जा सकते हैं, लेकिन बात तो पत्र व्यवहार और मिलने जुलने के बाद ही आगे बढ़ती है।
पहले चिट्ठी पत्री उन जान पहचान के लोगों में होती थी, जिनके बीच में किसी कारण भौगोलिक दूरियां होती थी। अनजान लोगों से कौन पत्र व्यवहार करता था। जब किसी अजनबी से पहली बार मुलाकात होती थी, तो सबसे पहले परिचय प्राप्त किया जाता था। आपका शुभ नाम ? अच्छा, आप हमारे पड़ोसी हैं। पहले परिचय, पश्चात् मेलजोल।।
जैसे जैसे इंसान के बीच भौगोलिक दूरियां बढ़ने लगी, संचार के साधन भी विकसित होते चले गए, जिन परिचित चेहरों की जानकारी डायरी में नोट की जाती थी, उनको मोबाइल में स्थान मिलने लगा और बाद में संचार क्रांति के बाद तो सारा संपर्क ही फोन के माध्यम से होने लगा। जहां डायरी में जान पहचान के २५-५० नाम होते थे, वहां फोन के कॉन्टैक्ट की संख्या सैकड़ा पर कर हजार की संख्या में पहुंचने लगी। आज अगर आपके व्हाट्सएप, फेसबुक और ट्विटर के संपर्क जोड़ लिए जाएं, तो आप ही दांतों तले उंगली दबाने लगें।
क्या आज सोशल मीडिया पर हमारे जितने कॉन्टैक्ट हैं, उतने हमारे रिश्ते हैं ?आप नहीं समझते, आपका जवाब होगा। कब किससे क्या काम पड़ जाए आज के इस मशीनी युग में। वह जमाना गया जब बात बात पर साइकिल उठाकर बाजार जाना पड़ता था। आज फोन से कितनी सुविधा है, आप नहीं जानते। धीरे धीरे सभी काम ऑनलाइन होने लग गए हैं। अमेजिंग अमेजान है न।
न जान न पहचान, फिर भी अलादीन के चिराग की तरह मुंहमांगी चीज हाजिर और वह भी 24×7।।
क्या हमारे रिश्ते यंत्रवत और आभासी नहीं होते जा रहे। अपने काम से काम, और दूर की राम राम ! यह कैसी विडंबना है, जितनी जनसंख्या बढ़ती जा रही है, उतनी ही इंसान की आपस में दूरियां बढ़ती जा रही हैं। जो रिश्ते कभी जीवंत थे, वे आजकल औपचारिक होते जा रहे हैं। आज हर बच्चे के हाथ में मोबाइल है और उसके मोबाइल में मोबाइल गेम्स हैं। बस यही उसकी दुनिया है। समझ में नहीं आता, मोबाइल ने हमें जोड़ा है, या हम सिर्फ मोबाइल से ही जुड़े हैं।
कभी ये आंसू मेरे दिल की जुबान होते थे, आजकल फेसबुक ही मेरी जुबान है।
फेसबुक पर बैठकर मोबाइल के बारे में ऐसी बातें करना बिल्कुल ऐसा ही है, जैसे पानी में रहने वाली कोई मछली किसी को पानी से दूर रहने की हिदायत दे। मोबाइल की उपयोगिता हमने कोविड काल में देख ली। जब पूरे संसार हमारे लिए अछूता था, तब एक यह मोबाइल ही तो था, जिसने न सिर्फ गले से लगाया था, हर पल, हर क्षण हमारी मदद की थी। हमारे अकेलेपन का यह सहारा भी बना और एक उपयोगी संगी साथी भी। थैंक्स टू डिजिटल इंडिया।।
आप मानें या ना मानें, आज यह फोन हमारे शरीर का ही हिस्सा हो गया है। अब हमें शरीर के साथ इसकी भी देखभाल करनी है। जिस तरह अच्छे स्वास्थ्य के लिए हमें कई सावधानियां रखनी पड़ती हैं, फेसबुक और सोशल मीडिया की बुराइयों के प्रति हमें जागरूक, सावधान, और सतर्क रहना है। अगर आपने और विशेषकर आज की पीढ़ी ने मात्र इसे मनोरंजन का साधन समझ लिया तो मान लीजिए, आपने अपने लिए और युवा पीढ़ी के लिए नर्क का द्वार खोल लिया है।
पोर्न साइट्स और वैसी ही फिल्में आजकल आपके एंड्राइड फोन का हिस्सा हो गई हैं। बच्चों के वीडियो गेम्स दुस्साहसी ही नहीं, खतरनाक भी हैं। कई लोग तो महज सेल्फी के चक्कर में अपनी जान गंवा चुके हैं। अगर कोई बिल्डर अथवा प्रॉपर्टी ब्रोकर है तो उसका फोन टू व्हीलर हो अथवा फोर व्हीलर, कभी बंद नहीं हो सकता। जब कि ड्राइविंग के साथ मोबाइल का उपयोग अपराध ही नहीं, खतरनाक भी है।।
हम तो रसोई में चाकू का इस्तेमाल भी सावधानी से करते हैं, फिर मोबाइल के साथ लापरवाही क्यूं ? क्या हमारा सामाजिक जीवन मोबाइल द्वारा छीना नहीं जा रहा है। पहले रिश्तों में दरार आई और अब मोबाइल की बारी आई।
कितना अच्छा हो, जिस तरह कभी कभी जबान को लगाम देना सुखद लगता है, दोस्तों के बीच, परिवार के सदस्यों के बीच और इष्ट मित्रों के बीच, इस मोबाइल का मुंह भी बंद कर दिया जाए, ताकि हमारे रिश्ते जीवंत हों, खुली सांस ले सकें। फेसबुक पर स्वस्थ संवाद हो। साहित्य और अध्यात्म की चर्चा हो। आपसी समझ हो। रिश्तों की अहमियत हो, स्वार्थ और खुदगर्जी की नहीं। चाकू से सब्जी ही काटें, अपना हाथ नहीं।
खयाल रहे, बंदर के हाथ में कभी तलवार नहीं दी जाती।।
(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी की अब तक लगभग तेरह दर्जन से अधिक मौलिक पुस्तकें ( बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य ) तथा लगभग चार दर्जन साझा – संग्रह प्रकाशित तथा कई पुस्तकें प्रकाशनाधीन।लगभग चार दर्जन साझा – संग्रह प्रकाशित तथा कई पुस्तकें प्रकाशनाधीन। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत। भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मान, बाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्य कर्मचारी संस्थान के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंत, उत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित बारह दर्जन से अधिक राजकीय प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत।
☆ महावस्त्राचे पदर – भाग ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
‘मामा’ (माहेरचा समृद्ध दुवा)
‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’, आजीच्या ‘संस्कारांची शिदोरी’ आणि आजोबांचे ‘सुरकुत्यांमधील शहाणपण’ अनुभवले. या महावस्त्रात एक अत्यंत हसरा, मनमोकळा आणि प्रेमाचा सुंदर रंग भरणारा पुढचा महत्त्वाचा पदर म्हणजेच ‘मामा’! या पदराची झळाळी अत्यंत विलक्षण आणि नजरेत भरणारी असते; कारण हा नात्यांमधील अतिशय महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा आणि विलोभनीय असा पदर आहे.
‘झुक झुक झुक अगीनगाडी… मामाच्या गावाला जाऊया’ हे गाणं ज्याला माहिती नाही, असा मराठी माणूस विरळाच! मामाबद्दलचे प्रेम आणि आदर आपण अगदी लहानपणापासूनच शिकतो. आकाशात दिसणारा चंद्र बाळाला दाखवताना आई त्याला प्रेमाने ‘चांदोमामा’ म्हणते. तो भलेही आपल्यापासून लाखो मैल दूर असतो, पण त्याच्याशी आपण लहानपणी नकळत कितीतरी गुजगोष्टी करतो! चंद्राची ती शीतल सावली आपण प्रत्यक्ष मामाच्या प्रेमात अनुभवतो. लहान मुलांच्या गोष्टींतही अनेक प्राणी ‘मामा’ बनून बोलू लागतात; तर खेळांमध्ये ‘माझ्या मामाचं पत्र आलं, ते मला सापडलं’ अशी सुंदर गाणी असायची. आजच्या काळात पत्रलेखनच बंद झाल्यामुळे आपण अशा अनेक चांगल्या गोष्टींना मुकलो आहोत.
‘मामा’ हा शब्द उच्चारताच कोणाच्याही चेहऱ्यावर एक निखळ हास्य आणि आपुलकी उमटल्याशिवाय राहत नाही. आपण कधी विचार केला आहे का, ‘मा-मा’ या शब्दात दोन वेळा ‘मा’ शब्द का येतो? पहिला ‘मा’ म्हणजे आईची अथांग ‘माया’ आणि दुसरा ‘मा’ म्हणजे आईचे ‘माहेर’! या दोन ‘मा’ अक्षरांच्या सुरेख मिलनातून साकार झालेला शब्द म्हणजेच मामा! संस्कृतमध्ये ‘मम’ म्हणजे ‘माझे’. जो पूर्णपणे आपला असतो, जिथे कोणत्याही मुखवट्याची किंवा संकोचाची गरज नसते, तो ‘मामा’! आईच्या माहेरची समृद्ध आठवण आणि भाच्यांच्या विश्वातला हक्काचा सखा म्हणजेच मामा असतो.
मला तीन मामा होते. तिघांचीही आर्थिक परिस्थिती तशी अगदी बेताचीच होती, पण त्यांच्याजवळील प्रेमाचा आणि संस्कारांचा झरा मात्र अक्षय—म्हणजेच कधीही न आटणारा होता! लहानपणी ‘मामा घरी येणार आहेत’ एवढं जरी ऐकलं, तरी मला जो आनंद व्हायचा, तो अक्षरशः अवर्णनीय असायचा. सुट्ट्यांमध्ये मामाकडे जायला मिळणे हा मोठा उत्सव असायचा. तिथे मामा आणि मामी माझे खूप लाड करायचे, मला आवडणारे खाद्यपदार्थ हटकून बनवले जायचे. याच मामांनी मला प्रेमासोबतच संस्कारांची खरी शिदोरी दिली. माझे धाकटे मामा तर माझे मामा कमी आणि मित्रच जास्त होते! त्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने शेअर करायचो; तेही मला योग्य-अयोग्य काय, हे नेहमी समजावून सांगायचे.
त्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती अगदी नाजूक असताना सुद्धा मामांनी माझ्या आईला तिच्या प्रत्येक अडचणीत वेळोवेळी खूप मदत केली. तिचे आई-वडील तर ती लहान असतानाच वारले होते; त्यामुळे मामाच तिचे आई-वडील झाले. त्यांनीच तिला सांभाळले, शिकवले आणि योग्य वेळी लग्न करून दिले.
आई आणि मामा यांच्यातील अतूट व जिव्हाळ्याच्या बंधनाचा एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग मला आजही आठवतो. एकदा आई खूप आजारी होती, त्यावेळी मी लहान होतो. मामा शहरात राहत असल्याने आईला त्यांच्याकडेच ठेवावे लागले. नंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिचे एक मोठे ऑपरेशन झाले. त्या दरम्यान तिला प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि तातडीने रक्ताची गरज निर्माण झाली होती. अशा वेळी माझे मामा तिथे देवासारखे धावून आले. त्यांनी स्वतःचे रक्त देऊन माझ्या आईचे प्राण वाचवले! अशा कधीही न विसरता येणाऱ्या मामांच्या अनेक आठवणी माझ्या आठवणींच्या कप्प्यात जपलेल्या आहेत.
लहानपणीच्या आठवणींचा पट उलगडला, की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि ‘मामाचं गाव’ हे समीकरण सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं. ‘मामाच्या गावाला जाऊया, तिथे जाऊन मजा करूया’ ही बालगीतातली ओळ प्रत्येक लहान मुलाच्या आवडीची असते. मामाचं घर म्हणजे मुलांसाठी कडक शिस्तीतून मिळालेली एक हक्काची ‘मुक्त शाळा’! जिथे आई-बाबांचा ओरडा नसतो, अभ्यासाची कटकट नसते; असतो तो फक्त आणि फक्त भाचेमंडळांचे लाड पुरवणारा मामा! आई जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी नकार देते, तेव्हा भाचेमंडळी आपला हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी ज्याच्याकडे विश्वासाने धाव घेतात, तो मामाच असतो. भाच्यांच्या आनंदासाठी स्वतः लहान मूल होणारा, सुट्ट्यांमध्ये त्यांना फिरायला नेणारा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारा मामा प्रत्येक मुलाच्या बालपणाला आनंदाचे इंद्रधनुषी रंग देऊन जातो.
मामाच्या या अथांग मायेचा आणि बालपणीच्या आनंदाचा विचार करताना एका अत्यंत महत्त्वाच्या नात्याचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्णच होऊ शकत नाही—ते नातं म्हणजे ‘मामी’! मामा जे लाड करतो, बहिणीला धीर देतो किंवा भाच्यांच्या पाठीवर हात ठेवतो; या सगळ्यामागे ‘मामीची साथ आणि तिचे औदार्य’ खूप मोठे असते. मामी जर संकुचित वृत्तीची असेल, तर मामाचं घर भाच्यांसाठी कधीच उघडं राहू शकत नाही.
मामी ही केवळ मामाची पत्नी नसते, तर नावातच दडल्याप्रमाणे ती भाच्यांसाठी ‘मा-मी’ म्हणजे आईसारखीच दुसरी माउली असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळी भाचेमंडळी घरी आल्यावर, अजिबात कपाळावर आठी न आणता, हसतमुखाने त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणारी, त्यांचे कौतुक करणारी मामी खऱ्या अर्थाने त्या घराचे घरपण जपते. प्रसंगी ती स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष करून भाच्यांचे लाड पुरवते! नणंदेच्या संसारातील दुःखात तिला आपल्या सख्या बहिणीसारखा मायेचा आडोसा देणारी मामीच असते. म्हणूनच, मामाच्या माहेरचा हा ‘सुगंध’ टिकवून ठेवण्यात मामीचे योगदान अनन्यसाधारण आणि वंदनीय आहे!
मामा या नात्याचे रूप केवळ लाड पुरवण्यापुरते मर्यादित नाही; तर कठीण प्रसंगात तो कुटुंबाचा भक्कम कणा बनतो. दुर्दैवाने ऐनवेळी कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणजे मुलांचे वडील वारल्यानंतर, विस्कळीत झालेल्या कुटुंबाला आणि दुःखात बुडालेल्या आईला खऱ्या अर्थाने सावरणारा तिचा भाऊ म्हणजेच मुलांचा मामाच असतो. अशा वेळी मामीसुद्धा आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्या भाच्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे सामावून घेते.
याचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक उदाहरण म्हणजे भारताचे महान सुपुत्र, पहिले थोर इंजिनियर भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या! सर विश्वेश्वरय्या लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. अशा अत्यंत बिकट आणि कठीण प्रसंगात त्यांच्या आईला आणि बाल-विश्वेश्वरय्यांच्या शिक्षणाला त्यांच्या मामाने विश्वासाचा आणि भक्कम आधार दिला. मामाने लावलेल्या या विश्वासाच्या रोपट्यातूनच पुढे देशाचा एक महान शिल्पकार घडला!
मामा-मामी आणि भाच्यांचे हे प्रेम केवळ भावनांपुरते मर्यादित न राहता व्यवहारातही अगदी मूर्त स्वरूपात दिसते. आपल्याकडे अनेक हॉटेल्स, दुकाने किंवा व्यवसायांची नावे ‘मामा-भाचे’ अशी असलेली आपण आवर्जून पाहतो. ही केवळ व्यावसायिक नावे नसतात, तर एकमेकांवरील अथांग विश्वास, साथ आणि प्रेमाचे ते जिवंत प्रतीक असतात.
आपल्या संस्कृतीच्या इतिहासात पौराणिक कथांमध्ये या नात्याच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही छटा दिसतात. एका बाजूला स्वतःच्याच बहिणीच्या अपत्यांची निर्दयपणे हत्या करणारा आणि श्रीकृष्णाला मारण्यासाठी कपट-कारस्थाने रचणारा दुष्ट कंस मामा, तसेच भाच्यांना कपटाने युद्धाच्या गर्तेत लोटणारा कारस्थानी शकुनी मामा यांसारख्या कुप्रसिद्ध प्रवृत्ती होत्या; तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णाचे अर्जुनाच्या आणि पांडवांच्या पाठीशी असलेले खंबीर मार्गदर्शकाचे नातं होते. कृष्णाने भाच्यांवर म्हणजे अभिमन्यूवर केलेले प्रेम आणि दाखवलेला धर्ममार्ग आजही नात्यांचा आदर्श मानला जातो.
मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते, तेव्हा तिच्या माहेरची खरी ताकद आणि आधार तिचा भाऊ आणि वहिनी असतात. बहिणीच्या सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा, तिच्या मुलांच्या लग्नसमारंभात किंवा शुभकार्यात ‘माहेरचा मान’ म्हणून आस्थेने पुढाकार घेणारा मामा कुटुंबातील नात्यांची वीण अधिक घट्ट करत असतो.
कधी कधी आपले काम साधून घेण्यासाठी लोक एखाद्याला ‘मामा’ म्हणतात, त्यावरूनच बहुधा ‘कामापुरता मामा’ ही म्हण आली असावी. पण खरा मामा हा कामापुरता कधीच नसतो! तो कायमच आपल्या नात्याचं भान आणि जबाबदारी सांभाळत असतो. बहिणीकडे सगळ्या कार्यक्रमात तो हक्काने राबत असतो—अगदी पु. ल. देशपांडे यांच्या कथेतील ‘नारायण’सारखा! त्याच्या उपस्थितीशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा यांनी अंतरपाट धरल्याशिवाय तर आपल्याकडे लग्नच लागत नाही! तो एक प्रकारे मामाने भाच्याला आणि भाचीला दिलेला प्रेमळ आशीर्वादच असतो. भाच्यांच्या लग्नात मंडपात ‘मामाचा मान’ आणि त्यांनी दिलेली भेट ही केवळ वस्तू नसते, तर त्यात आपल्या बहिणीच्या संसाराबद्दलची अखंड कृतज्ञता साठलेली असते. बऱ्याच समाजात अजूनही मामाची मुलगी करण्याची प्रथा आहे. जेव्हा मामांची मुलगी लग्न होऊन आत्याकडे सून म्हणून येते तेव्हा त्या निमित्ताने दुसरी पिढी पुन्हा जोडली जाते. नात्यांचा गोफ आणखी घट्ट होतो.
आजच्या आधुनिक आणि गतिमान युगात, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जाण्याचे प्रमाण थोडे कमी झाले असले, तरी ‘मामा-मामी’ या नात्यातील ओलावा आणि आपुलकी आजही तशीच टिकून आहे.
आजच्या बदलत्या काळातही भाच्यांशी मित्रासारखे नाते जपणारा, त्यांच्या करिअरच्या आणि आयुष्याच्या टप्प्यावर पाठीवर विश्वासाचा हात ठेवणारा मामा आणि मायेची सावली देणारी मामी आजही तितकेच हवाहवासे वाटतात. नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा मामा-मामीचा पदर माहेरच्या मायेचा समृद्ध सुगंध घेऊन येतो. हा पदर जेवढा प्रेमाने आणि आदराने जपला जाईल, तेवढं आपलं कुटुंब आणि आपले आयुष्य अधिक आनंदी व सुकर होईल!
(प्यायला बसले की पाचपाच हजाराची दारु ते पिऊन जातात असं शेठजींच्या कानावर आलं होतं. आणि आता एका चांगल्या कामासाठी दोन हजार द्यायला खळखळ करत होते) इथून पुढे – –
” मी पवार साहेबांशी सहमत आहे ” पारेख उठून म्हणाले ” गरीबांना अशा गोष्टींची सवय लावायचीच कशाला? अशाने ते शेफारतात. एकदा सेलेब्रेट केल्यावर पुढच्या वर्षीही त्याची तीच अपेक्षा राहिल”
” तसं काही होणार नाही पारेख साहेब. पुढच्या वर्षी तो मोठा होईल त्याला आपोआपच जाणीव होईल ” शेठजी ठामपणे म्हणाले
” मला वाटतं आपण करावा वाढदिवस” वानखेडे उठून म्हणाले ” आपण सगळेच सधन आहोत. काय हरकत आहे दोनदोन हजार द्यायला. अहो तेवढ्या रकमेचं तर आपण जेवणच करणार आहोत. शेठजी बरोबर म्हणताहेत “
आता चर्चा रंगू लागली. प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात बोलणारे तावातावाने आपली बाजू मांडू लागले. आपल्या प्रस्तावाला थोडाही विरोध होणार नाही अशी अपेक्षा घेऊन आलेले लोढाशेठ समोरचे वादविवाद पाहून क्षुब्ध झाले. माणूस इतका स्वार्थी कसा होऊ शकतो याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं.
” शेठजी मी निघू का? मला शाॅपिंगला जायला उशीर होतोय ” गव्हाणेबाई अस्वस्थ होऊन म्हणाल्या तसे अध्यक्ष पाटील उठले
” दोन मिनिट थांबा गव्हाणे मॅडम. एकमत न झाल्यामुळे आपण मतदान घेऊ. दिनूचा वाढदिवस साजरा करावा असं किती जणांचं मत आहे त्यांनी हात वर करावा”
समोरच्या बारा जणातून फक्त कुलकर्णी, वानखेडे, चव्हाण, गव्हाणेबाई यांनी हात वर केले. पवार, महाजन, जोशी, पारेख, लोखंडे, सुलक्षणेबाई यांनी हात वर केला नाही. फक्त चार हात वर आलेले पाहून लोढाशेठ चिंतातूर झाले
“चार जण. अध्यक्ष आणि मी आमचं मत धरुन सहा जण होताहेत. म्हणजे सहा विरुद्ध सहा असा बिकट मामला झालाय”
” आता यावर उपाय काय? “सुलक्षणे बाईंनी विचारलं
” सोपं आहे. आज जे आले नाहीत त्यांना मी मेसेज पाठवून निर्णय विचारतो. जर नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त झाली तर मी स्वतः सगळा खर्च करुन त्या मुलाचा वाढदिवस करेन “शेठजी थोडेसे चिडूनच दृढनिश्चयाने म्हणाले तसे पवार उठून म्हणाले
“जर तुम्हांला वाढदिवस करायचाच होता तर आम्हांला बोलावलं कशासाठी? फालतू आमचा वेळ घालवला”आणि ते उठून बाहेर चालायला लागणार तेवढ्यात शेठजी म्हणाले
“एक मिनिट. माझी सर्वांना विनंती आहे की निर्णय काहिही होवो, या विषयाचा उल्लेख दिनू किंवा एकनाथजवळ करु नका. आपल्याला त्या कुटुंबाला सरप्राईज द्यायचंय “
“ठिक आहे “सर्व म्हणाले आणि पवारांच्या मागे सर्वजण निघून गेले.
“बघा मी तुम्हांला म्हंटलं नव्हतं की सगळे नमुने आहेत. पैसे देणार नाहीत. ठिक आहे. मेसेज पाठवून बघा सगळ्यांचा काय निर्णय होतो ते आणि मला कळवा”पाटीलसाहेब उद्वेगाने म्हणाले.
शेठजींना काय बोलावं ते कळेना. त्यांनी फक्त मान डोलावली.
घरी येऊन हा विषय त्यांनी बायकोला सांगितला. बायको रागाने मारवाडी भाषेत म्हणाली
“तुम्हांलाही नको त्या उचापत्या सुचतात. खरंच काय गरज आहे त्या पोराचा वाढदिवस करायची. असा कोणता तो मंत्रीसंत्री लागून गेलाय? मान्य आहे तो मेहनती आहे, प्रामाणिक आहे, विशेष म्हणजे तो कुणाच्याही मदतीला धावून जातो पण या लोकांना असं डोक्यावर चढवायचं नसतं हे माझ्यापेक्षाही तुम्हाला चांगलं समजतं कारण एवढं मोठं सुपरशाॅप तुम्ही चालवता ते उगाच नाही. आणि तुम्हांला एवढं त्याच्याबद्दल वाटतंच आहे तर त्याला घरी बोलवा. एखादा ड्रेस आणि मिठाईचा बाॅक्स त्याच्या हातात द्या बस झालं. पुर्ण सोसायटीच्या लोकांना बोलावून आपल्या सनीसारखा वाढदिवस साजरा करायची काहीच गरज नाही. दुसरं तुम्ही प्रत्येकाकडून दोन हजार घ्यायचं म्हणताय. अहो गणेशोत्सवासाठी आणि नवरात्राच्यावेळी वर्गणीचे साधे पाचशे रुपये द्यायलासुध्दा हे लोक त्रास देतात ते तुम्हांला काय दोन हजार काढून देणारेत? “
“वर्गणीची गोष्ट वेगळी आहे. तिथे भावना नसतात. पण इथे हा मुलगा सगळ्या कुटुंबांशी जोडला गेलाय. तू म्हणते तसा त्याचा वाढदिवस तर आपण कधीही करु शकतो. पण त्या पोराने जे स्वप्न बघितलंय ते पुर्ण करावं असं मला मनापासून वाटतंय”
“तुम्ही पण ना!एकदा काही ठरवलं की त्याच्यावरच अडून बसता”असं म्हणत ती तणतणत किचनमध्ये निघून गेली.
दुसऱ्या दिवशी शेठजींनी बाकीच्या छत्तीस परीवारांना मेसेज पाठवला. दिनूचा वाढदिवस साजरा करण्यामागची आपली भुमिका सविस्तर मांडून प्रस्तावाच्या बाजूने मत द्यायचं आवाहन केलं. तीनचार दिवस तर कुणाचीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर लोकांनी “कशासाठी हा उपद्व्याप करताय? , अशा अनिष्ट प्रथा पाडू नका, इतका खर्च का येतोय त्याचा हिशोब द्या, दोन हजार फार होतात, शंभरदोनशेत जे करायचं ते करा” अशा संतापजनक प्रतिक्रिया नोंदवल्या. प्रस्तावाच्या बाजूने फक्त आठ तर विरोधात सोळा मतं पडली. बाकीच्या बारा जणांनी सर्वसहमतीने जे ठरेल त्याला आम्ही राजी आहोत असं तटस्थ मत नोंदवलं. या तटस्थ लोकांचा शेठजींना भयंकर राग आला. हे तटस्थ लोकच चांगल्या कृत्यांच्या बाजूला उभं न रहाता वाईट कृत्यांना एक प्रकारे समर्थनच देतात हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी परत एकदा या लोकांना मेसेज पाठवून “फक्त हो किंवा नाही एवढंच कळवावे “अशी विनंती केली. पण तिचा काही उपयोग झाला नाही. अशा लोकांना कुणाच्याच नजरेत वाईट व्हायचं नसतं किंवा उघडपणे कोणतीही भुमिका घ्यायचं धैर्य त्यांच्यात नसतं. शेवटी सात दिवस वाट बघून शेठजींनी मतांची गणना केली. चौदा विरुद्ध चोविस मतांनी ते हरले होते. त्यांना खुप वाईट वाटलं. दिनू फुकट सर्वांची कामं करत होता त्याची लोकांनी शुन्य किंमत केली होती. याच कामाकरीता जर नोकर ठेवला असता तर महिन्याला तीनचार हजार त्याने सहज घेतले असते आणि या लोकांनी न कुरकुरता ते दिले असते. एकदम त्यांच्या डोक्यात सणक आली आणि त्यांना वाटलं, जावं आणि दिनूला सांगावं की “तुझ्या उपकाराची या लोकांना जाण नाही. यापुढे कुणाचंही काम करणं बंद कर”. पण त्यांनी मन आवरलं. शेवटी ते सोसायटीचे सेक्रेटरी आणि प्रतिष्ठित व्यापारी होते. त्यांना असं करणं शोभणारं नव्हतं.
दोनतीन दिवसांनी अध्यक्ष पाटिलसाहेबांचा फोन आला
“मग ठरलं का दिनूचा वाढदिवस साजरा करायचं? “
त्यांना काय उत्तर द्यावं ते शेठजींना कळेना. शेवटी त्यांनी खरं सांगायचं ठरवलं
” प्रस्तावाच्या बाजूने फक्त चौदा मतं पडली साहेब. त्यामुळे वाढदिवस कॅन्सल करावा लागणार”
पाटिलसाहेब जोरजोरात हसले
“मी म्हंटलं होतं ना तुम्हांला आपल्या सोसायटीत एकूण एक नमूने आहेत म्हणून. तुम्ही त्यादिवशी म्हंटला होतात की कुणी नाही केला तरी मी करणारच, मग कॅन्सल का करताय? जे तयार आहेत त्यांच्याकडून पैसे घ्या, उरलेले तुम्ही टाका आणि करुन टाका वाढदिवस”
“तसं करता येईल पण ते योग्य दिसणार नाही. ठिक आहे बघतो मी काय करायचं ते ” असं म्हणून त्यांनी पाटिलसाहेब काही म्हणायच्या आत फोन कट केला.
एकेक दिवस निघायला लागला तशी शेठजींच्या मनाची घालमेल वाढली. “कुणी नाही दिले पैसे तर मी माझ्या पैशाने वाढदिवस करीन”असे ते जोशात म्हणून तर गेले होते पण आता त्यांना तेवढे पैसे खर्च करणं जीवावर येत होतं. चौदा जणांनी पैसे दिले तरी उरलेले सत्तर बहात्तर हजार पदरचे
खर्च करायला त्यांच्या मनाची तयारी होत नव्हती. काय दुर्बुद्धी सुचली आणि आपण ते बोलून चुकलो याचा त्यांना आता पश्चात्ताप होऊ लागला.
एक दिवस एक गडबड झाली. संध्याकाळच्या वेळेस जोशींचा मुलगा आपली महागडी बाईक सोसायटीच्या बाहेर लावून घरात गेला. पाचच मिनिटात परत येऊन त्याला बाहेर जायचं होतं. दुर्दैवाने तो गाडीची चावी गाडीलाच विसरुन गेला. घरात गेल्याबरोबर त्याच्या मैत्रीणीचा फोन आला. तिच्याशी गप्पा मारतामारता आपण गाडी बाहेरच लावलीये हे तो विसरला. त्याच सुमारास एक बाईक चोर तिथं आला. बाईकला लागलेली चावी पाहून त्याला आनंदाचं भरतंच आलं. सिक्युरिटीच्या केबिनमध्ये तेव्हा राम नावाच्या सिक्युरिटी गार्डसोबत दिनूही बसला होता. त्याने बाईक स्टार्ट झाल्याचा आवाज ऐकला आणि तो ताठ झाला. जोशींच्या मुलाला त्याने मगाशीच वर जातांना पाहिलं होतं. एका सेकंदात तो गेटच्या बाहेर आला. बाईकवर दुसरा माणूस पाहून सगळा मामला त्याच्या लक्षात येऊन तो त्या बाईकस्वारावर जोरात ओरडला. बाईकचोराने बाईक वळवून मेन रोड वर जशी घातली दिनू जीवाच्या आकांताने त्याच्या मागे पळाला. बाईक आपल्या हातात लागणार नाही हे पाहून त्याने एक झेप घेऊन तीची मागची बाजू पकडली आणि तिला तो खेचू लागला. बाईकचोराने बाईकचा वेग वाढवला. दिनूने ते पाहून पायात घातलेल्या चपला रोडवर ताकदीने दाबून धरल्या. बाईकचा स्पीड कमी झाला पण दिनू आता फरपटत पुढे जाऊ लागला. सुदैवानं समोरुन येणाऱ्या दोन बाईकस्वारांचं लक्ष या प्रकाराकडे गेलं. त्यांना यात काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं. एकाने आपली बाईक सरळ बाईकचोराच्या समोर उभी केली. दुसऱ्याने चपळाईने खाली उतरुन बाईकचोराच्या बाईकची चावीच हस्तगत केली.
” हा चोर आहे. गाडी चोरुन घेऊन चाललाय “दिनू ओरडला तसा एका बाईकस्वाराने बाईकचोराच्या मुस्काटात दोन थपडा मारल्या. आता बरेच लोक जमा झाले. सिक्युरिटी गार्डही धावत आला. कुणीतरी पोलिसांना फोन लावला. बाईकचोराला लोकांनी पकडून ठेवलं.
“कुणाची गाडी आहे रे ही? “सिक्युरिटी गार्ड रामने दिनूला विचारलं
“त्या जोशीसाहेबांची आहे”दिनू म्हणाला. तेवढ्यात जोशींचा मुलगा धावत आला. बाईक पाहून त्याला हायसं वाटलं.
घरी जाऊन जोशींच्या मुलाने झालेला सगळा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला.
“बाबा त्या दिनूची कमाल म्हंटली पाहिजे. त्याची चप्पल तुटली, पॅंट फाटली तरी त्याने गाडी सोडली नाही. बाबा दिनूला काहितरी बक्षीस दिलंच पाहिजे”
“पाचशे रुपये देऊन टाक”
“बाबा आपली दिड लाखाची गाडी त्याने चोरी जाण्यापासून वाचवली आणि फक्त पाचशे रुपये द्यायचे? “
“अरे गाडी नेली असती तरी आपण चोवीस तासात
शोधून आणली असती. पोलीस खात्यात आपल्या ओळखीच आहेत तशा ” जोशी अभिमानाने म्हणाले
“हो. ते ठिक आहे पण पोलिसांनाही तुम्हांला एकदिड हजार बक्षीस म्हणून द्यावेच लागले असते ना? “
पोरगा ऐकत नाही हे पाहून जोशींचं डोकं तापलं
“हे बघ चूक तुझी आहे. तुला गाडीची चावी काढता येत नव्हती? आता मला उगीच मनस्ताप देऊ नकोस नाहीतर तुझी गाडीच मी विकून टाकेन ” बापाने दम भरल्यावर पोरगा चुप बसला पण कुठेतरी त्याच्या मनाला ते पटलं नव्हतं.
दोनतीन दिवसांनी अजुन एक घटना सोसायटीत घडली. सुलक्षणेबाईंची गांवातच रहाणारी मुलगी माहेरी आईवडिलांना भेटायला आली होती. संध्याकाळी ती आपल्या घरी निघून गेली. रात्री दहा वाजता तिचा सुलक्षणे बाईंना फोन आला.
“आई एक गडबड झालीये. माझं एक कानातलं सापडतच नाहीये. मी तुझ्याकडे आले तेव्हा दोन्ही कानात होते. आता मात्र डाव्या कानातच आहे” ती रडकुंडीला येऊन बोलत होती
☆ तुम्ही स्वतःचे कौतुक करता का?– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆
या धावपळीच्या जगात आपण इतरांच्या यशाचे कौतुक करायला कधीच विसरत नाही. मित्राने पदोन्नती मिळवली की आपण टाळ्या वाजवतो, कुणी छान जेवण बनवले की आपण त्याची स्तुती करतो. पण, कधी आपण आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यांत बघून “शाब्बास! ” म्हटलं आहे का?
… स्वतःचे कौतुक करणे म्हणजे स्वतःला जगापेक्षा श्रेष्ठ समजणे नव्हे, तर स्वतःमधील चांगल्या गुणांची प्रांजळ कबुली देणे होय.
… आपण दिवसभरात कितीतरी लहान-मोठ्या लढाया लढतो. कधी मनातील नैराश्यावर मात करतो, तर कधी थकलेले असतानाही कुटुंबासाठी हसून काम करतो. या प्रत्येक छोट्या विजयासाठी आपण कौतुकास पात्र आहोत.
… आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की;”स्वतःची स्तुती स्वतः करू नये. “
.. पण विचार करा, जर आपणच स्वतःच्या कष्टाची किंमत जाणली नाही, तर जग तरी ती का जाणेल? स्वतःचे कौतुक केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा आपण स्वतःला सांगतो की;”मी आजचा कठीण प्रसंग धैर्याने हाताळला, “तेव्हा आपल्या मनाला एक वेगळीच उभारी मिळते.
… आज तुम्ही एखादे काम वेळेत पूर्ण केले? स्वतःची पाठ थोपटा.
.. आपण माणूस आहोत, चुका होणारच पण, त्या चुकांमधून शिकून पुढे जाण्याच्या वृत्तीचे कौतुक करा.
.. दिवसातून एकदा आरशात पाहून स्वतःला एक छान स्मितहास्य द्या. म्हणा की;”तू जसा आहेस, तसा उत्तम आहेस. “
… स्वतःचे कौतुक करणे ही एक मानसिक गुंतवणूक आहे. यामुळे आपण केवळ आनंदीच राहत नाही, तर इतरांनाही सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो.
.. लक्षात ठेवा, या जगाच्या रंगमंचावर तुमची भूमिका तुमच्याइतकी उत्तम दुसरं कोणीच साकारू शकत नाही.
.. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि हक्काने स्वतःचे कौतुक करा! कारण….
.. कारण तुम्ही ‘खास ‘आहात.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित
सांगली – ४१६ ४१६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सोलापूर शहर हे 60 /65 वर्षांपूर्वी गिरणीवर चालणारे गाव होतं. गिरणगाव या नावानेच ते ओळखलं जायचं. सरकारी कार्यालयातील कर्मचारी म्हणजे सरकारी नोकर, एसटीतील कर्मचारी, रेल्वेतील कर्मचारी आणि उरलेली तमाम जनता जुनी गिरणी नरसिंग गिरजी, लक्ष्मी विष्णू मिल जाम मिल आणि फुटाणे गिरणी नावाची गिरणी होती. मला त्याबद्दल फारशी माहिती नाहीये पण तिचं नाव मी ऐकले आहे..
हे संपूर्ण शहर आर्थिक व्यवस्थापनासाठी गिरण्यांवर अवलंबून होते. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार एक तारखेला, एसटी वाल्यांचा पगार सात तारखेला, आणि सर्व गिरण्यांचे पगार मात्र दहा तारखेला होत. त्यामुळे दहा तारखेला सोलापुरात दिवाळी..!
75 टक्के गाव हे गिरणीवर अवलंबून… वडिल कुठे काम करतात विचारलं तर वर्गातील किमान 30 पोरं तरी सांगायची गिरणीमध्ये काम करतात. गिरणीचा पगार हा दहा तारखेला होत असे त्यामुळे दहा तारीख ही सर्व कामगार वर्गाच्या आयुष्यामध्ये दिवाळीची तारीख असायची… म्हणजे किशोर कुमारच गाणं आहे की खुश है जमाना आज पहिली तारीख है तस आज दस तारीख है.. अशी परिस्थिती होती.
दहा तारखेला सकाळपासूनच घरामध्ये आज वडिलांचा पगार होणार म्हणून मुल आनंदी, नवऱ्याचा पगार होणार म्हणून बायको आनंदी, लेकराचा पगार होणार म्हणून आई बाप आनंदी! त्यादिवशी सगळे गाव आनंदाच्या आगमनाच्या लगबगीत असायचं कारण शेवटचे चार-पाच दिवस हे उसनवारीत गेलेले असायचे. त्यामुळे दहा तारखेचा उत्साह वेगळा असायचा. तो केवळ घरातच नाही तर गावातही वेगळा असायचा. गिरणीत जाणारा प्रत्येक माणूस येताना खिशात पगार घेऊन येत असे त्यामुळे जाताना त्याचे चेहरे आशावादी आणि येताना प्रफुल्लीतच…. असं शहराचं वातावरण…!
अगदि हे तसंच असायचं गिरणीच्या रस्त्यावर…. संध्याकाळी दुतर्फा मिठाईच्या गाड्या लागलेल्या या गाड्यावर रंगीबेरंगी दाणे असलेले बुंदीचे लाडू.. शेवेने भरलेली गच्च ताट… तिच्यातही बारीक शेव जाडी शेव गोडी शेव असे प्रकार…. चिवड्याची टोपली… जिलबीची केशरी परात…. त्या सगळ्यांना रंगीबेरंगी कागद..! गाडीवाल्याच्या गाडीत वजन मापाचा काटा… वर्तमानपत्राची रद्दी आणि सुताचा गुंडा इतकं सामान…! प्रकाशाची फारशी व्यवस्था नसलेल हे गाव त्या दिवशी या गाड्यांवरती पेट्रो मॅक्स म्हणजे बत्त्या किंवा टेंभे यानी झगमगून जायचे. बाजूला असणाऱ्या फाटकावर, मरीआई चौकात, भैया चौकात भरपूर भाज्या घेऊन बसलेले भाजीवाले अस एक फार उत्साही दृश्य असायच. त्याचबरोबर बाहेर उभी असणारी काही दांडगट माणसंही असायची… ते असायचे रोहिले पठाण…. हे या गरीब कामगारांना व्याजाने कर्ज द्यायचे…. कामगाराकडे महिन्याचा पगार जेमतेम कुटुंब भागवणे एवढा असायचा. जुजबी आजारासाठी गिरणी दवाखाने मोफत होते पण मोठ्या आजारावर बाहेरचा औषध उपचार करावा लागायचा त्याला पैसा खर्च व्हायचा असे विमे वगैरे त्या काळात नव्हते. त्यासाठी, पोरबळांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा प्रपंचाला कमी पडतं म्हणून ्या बिचार्या गरीब कामगारांना कर्ज काढावच लागायचं… या कर्जाला व्याज असायचा आणि त्या व्याज वसुलीसाठी ही पठाण मंडळी दहा तारखेला गिरणीच्या दारात उभे….! प्रत्येक गिरणीच्या दाराशी असे पठण दिसायचे त्याची नजर चुकवून जाणं केवळ अशक्य..! तिथेच त्या पगारातले व्याजापुरते रक्कम काढून द्यावी लागायची आणि मग उरलेला पगार तो कामगार घरी घेऊन यायचा….!तरीही येताना आपल्या लेकरा बाळांसाठी लाडू चिवडा ते वर्तमानपत्राच्या दोऱ्याने बांधलेल्या पुडयात आनंदाने घेऊन यायचा.
लेकर बाळ दारामध्ये बापाची वाट बघत बसलेली असायची. तिथेच जुन्या गिरणीच्या चाळी नरसिंग गिरजि चाळी आहेत. भैय्या चौकात हीआहेत सगळी गिरणीच्या आसपास राहणारी मंडळी. प्रत्येक घरातलं पोर बापाला लांबून येताना पाहून आनंदित व्हायचं बापाच्या हातातली पिशवी घेण्यासाठी ते आनंदाने धावायचे जगातली सगळी सुख देणारा बाप त्यांना त्या दिवशी खूप मोठा वाटायचा…. कारण त्याच्या हातात जिलबी शेव चिवडा लाडू ही स्वप्नवत वाटणारी खाद्य श्रीमंती असायची…! आज या पदार्थाकडे डुंकुनी न पाहणारी पिढी पाहिली की आमचे दिवस आम्हाला आठवतात. जिलब्यांच्या वेटोळ्या प्रमाणे गोल गोल फिरणार आमचा आयुष्य तिथेच रिंगणात राहणार होतं. बुंदीच्या लाडवातला एकही बुंदीचा कण सांडणार नाही अशी दक्षता घेऊन आणि ते खाद्यपदार्थावर कागदाच्या तुकड्यावर संपवत असू.
प्रत्येक घरातला बाप आणलेला पगार खिशातून काढून म्हाताऱ्या आईच्या हातात ठेवत असे. देवाजवळ दिवा लावून ती सुद्धा पांडुरंगा समोर तो पगार ठेवून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असे आणि मग तो पैसा घर खर्चाला वापरला जायचा. त्या तोकड्या पैशात ते घर समाधानांन भरून जायचं कारण… घरात विठ्ठल रुक्माई सारखे आईबाप आणि श्रीकृष्ण पेंद्या यांच्यासारखाच गोकुळ असायचं. घरात आजीच्या भोवती गोळा झालेली मुलं बापान आणलेला खाऊ आजीने वाटून दिला की आनंदाने खाऊन पसार व्हायची. फार पैसा नसला तरी समाधान होतं आणि त्या समाधानाच सुखही ही मोठं होतं.
त्यादिवशी चाळीतल्या भजनाला मोठी रंगत यायची किती थोड्या पैशात किती समाधानी होती माणसं..! आमच्या घरी त्या दिवशी बेकरीतला मोठा ब्रेड यायचा तो दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बरोबर खायला मिळायचा त्यामुळे रात्री ब्रेड खाण्याचे स्वप्न उराशी घेऊन आम्ही झोपायचं.. इतकं साधं जीवन होतं पगाराच्या दुसऱ्या दिवशी गिरणीच्या बाजूचे चौक फुललेले असायचे. भैया चौकात कॅन्टीनस सगळी भरलेली असत भजी आणि चहा यांच्यावर ताव मारत… विविध पक्ष संघटना तिथे चर्चा करायच्या.. कामगारांच्या हक्काच्या… त्यांना काय काय मिळालं पाहिजे याच्या. कामगार पुढारी तिथे असायचे ते आपल्या मागण्यांसाठी काही कार्यक्रम आखायचे… आंदोलन व्हायची चळवळी व्हायच्या… चहा पिणारे चहाचे हॉटेलात…. दारू पिणारे दारूच्या गुत्त्यात जायचे पण… दारूबंदीच कार्य प्रभावी असल्यामुळेदारू झोकून माणसअशी राजरोस रस्त्यावरून फिरत नव्हती किंवा त्याला आळा तरी होता. दुकानातून औषधाची बाटली विकत आणावी इतकी सहजासाची दारू उपलब्ध नव्हती आणि दारू प्यायला जाणारा माणसाला समाजात फारसा मान नसायचा त्यामुळे ते सगळं चोरून व्हायचं. एकत्र कुटुंब असल्यामुळे आई बापाचा धाक असायचा. मोठा भाऊ बापाच्या जागी त्यामुळे एक चांगली भीती असायची. गिरणीतली तरुण पोर सहजासहजी चुकीच्या मार्गाला जात नव्हती खरं तर ही गिरणीत काम करणारी मंडळी शेजारच्या खेड्यातन आलेली एक भाऊ थोडी शेती करतोय दुसरा नोकरी करायला आला त्यांन आणखीन आपल्या धाकट्या भावाला बोलवून घेतलं अशी त्यांची कुटुंब शहरात वाढलेली. गिरणीच्या मालकाने त्यांच्यासाठी चाळी बांधून दिलेल्या त्यामुळे जुनी गिरणीच्या चाळी, नरसिंग गिरजीच्या चाळी अशा चाळीने त्यांच्या घराच्या राहण्याचे प्रश्न सोडवूनच टाकले होते पाणी दोन्ही वेळा यायचं कारण गिरण्या तीन पाळ्यात चालायच्या त्यामुळे पाण्याच व्यवस्थापनही त्यांच्या वेळेनुसार असायचे गिरणीच्या भोंग्यानी शहर जागे होत असल्यामुळे शहराला उद्योगाचे वळण होते.
कामगारांच्या विकासासाठी सरकारने स्थापलेली कामगार कल्याण केंद्र असायची ते अशाच गिरण्यांच्या आसपास किंवा कामगारांच्या वसाहतीत होती. ती केंद्र तरुण मुलातून खेळाडू तयार करायचे गिरणीतल्या तरुण मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वर्तमानपत्र आणि उत्तम पुस्तक ठेवायचे म्हणजे त्यांचे ग्रंथालय होते खेळाचे सामने भरवायचे… नाटकाच्या स्पर्धा व्हायच्या…! दुपारच्या वेळेला हेच केंद्र महिलांसाठी उघडे असायचे. तिथे शिवण वर्ग, विविध कलाकुसर शिकवणारे शिक्षक येऊन शिकवायचे, महिलांच्या विविध विषयावर वेगवेगळ्या व्याख्यातांना बोलवून व्याख्यानं व्हायची, त्यामध्ये मुलाचे संगोपन कसे करावे… गरोदर स्त्रीने कोणती काळजी घ्यावी… यासारख्या असंख्य विषयावर मार्गदर्शन होत असे… शिवण्याच्या मशीन असायच्या त्यामुळे बायका कपडे शिवून घेऊन जायच्या… मुलींची त्यांची नाटकं व्हायची छोट्या मुलांना सिनेमे दाखवले जायचे… सिनेमा म्हणजे ते माहितीपट असायचे.. पण केंद्रात सिनेमा आहे म्हटलं की सगळी पोरं धूम केंद्रात पळायची. केंद्र चालवणारी मंडळी खूप छान होती तळमळीने काम करणारे होती. ह्या कामगार कल्याण केंद्रा संदर्भात एक स्वतंत्र विषय करून लिहीन तेव्हा अशी कामगार कल्याण केंद्र ह्या गिरणीतल्या कामगारांच्या कलागुणांना वर्धिष्णू करीत मनोरंजन करीत आणि संस्कारही करीत होते… त्यावेळी कामगारात गुंड होते गटबाजी करणारे होते पक्ष वाले होते त्यांच्या त्यांच्यात इंटक वगैरे अशी काही संघटनांची आम्ही नाव ऐकत असू व्यंकप्पा मडूर हे चळवळीतलं नाव अशी बरीच नाव त्यावेळेला कानावर येत होती त्यांचे मोर्चे असायचे आंदोलन असायची पण गिरणी पेटवली… गिरणी जाळली… गिरणीत दगडफेक झाली… असे मात्र होत नव्हते. कारण काम करायच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा होती हे हिंसक प्रकार आंदोलनात नव्हते… काय ते रस्त्यावर थोडे व्हायचे… अर्थात हे शहर धाडसी मर्दांच होतं आहे. प्राणाची पर्वा न करता लढणारी माणसं या शहराने दिली. खून व्हायचे मारामाऱ्या व्हायच्या तशी थोडी सोलापूरची दहशत होती लोकांना, अगदी इंग्रजांना सुद्धा…! आम्हाला असं सांगायचे की इंग्रज, वर्तमानपत्रात सोलापूर हे नाव वाचले तर त्यांच्या हातातलं वर्तमानपत्र कापायचं इतकी दहशत नावात होती. इंग्रजांच्या नकाशात लाल रंगाने स्पॉट केलेल आपलं गाव होतं पहिला हुतात्मा या देशाला सोलापूर ने दिलाय तो शंकर शिवदारे… त्यांच्या आत्मसमर्पणाने स्वातंत्र्य चळवळीला ही उधाण आले होते.. अशा झोकून देऊन काम करणाऱ्या कामगारांचे जगत असलेले गाव…. सगळ्या गिरण्या राजकीय निष्क्रियतेमुळे कटकारस्थानामुळे हळूहळू बंद पडल्या.
तीन मोठ्या गिरण्यांची मिळून झालेली एक सोलापूर स्पिनिंग अँड विविंग मिल म्हणजे जुनी गिरणी पहिल्यांदा बंद पडली ती अनेक वेळा बंद पडत होती पण 64 स*** पूर्ण बंद झाली खूप आंदोलन झाली चळवळी झाल्या माणसं 50 दिवस उपोषणाला बसली लोक भाबडे आणि गरीब होते आणि नेते लबाड होते आपलीच गिरणी बंद पाडून स्वस्तात विकत घेणारे मुरारका यांना मदत करून आपलं उखळ पांढरं करून घेणारे नेतेही होते. बघता बघता एक एक गिरणी बंद पडत गेली सोलापूर बेकारीच्या खाईत गेलं… मधले अनेक वर्ष सोलापूरचा विकास थंड झाला… त्याला कारण उद्योग नाही!आजही फरशा उद्योगाची निर्मिती नाहीच आहे…
असो एकेकाळी चारच्या भोंग्याला उठणारे गाव निवांत म्हणून ओळखलं जाऊ लागलं याचं वाईट वाटतं डोळ्यात फक्त समाधानी होण्याचं स्वप्न घेऊन झोपणारा सोलापूरकर गिरणी बंद पडल्यानंतर ना सुखी झाला ना समाधानी राहिला. मधल्या एका पिढीच्या अफाट संघर्षानंतर गिरणगाव ही ओळख संपत आली तिथे काम करणारे आणि गिरणीवर अवलंबून असलेली गिरणीच्या पगारावर मोठी झालेली आणि गिरण्या बंद झाल्यानंतर होरपळून निघालेली तीआमची पिढी आता संपत आली. आता सोलापूर नवनविन उद्योगाने पुन्हा भरारी घेत आहे. चांगले नेते मिळाले तर कदाचित सोलापूरला हे पुनर्वैभव प्राप्त होईल. दुर्दैव हे आहे की आम्हाला मतदानापुरतं वापरलं जातं असो तो आजचा विषय नाही. आता सोलापुरात पगार एक तारखेला होतात विविध चांगल्या वाईट उद्योगातून सोलापूरकर मुलांच्या खिशात पैसे खुळखुळत आहेत तरुणांनी आपापले छोटे छोटे उद्योग शोधले आहेत माणसं पोट भरत आहेत काहीनी पुणे मुंबई जवळ केली तरीही सोलापूरची लोकसंख्या वाढली दोन तीन लाख वस्तीचं गाव बारा लाख वस्तीत रूपांतरित झाले. खूप चांगले बदल झालेत पण दहा तारखेची ती मजा ते पेट्रोल मॅक्स च्या गाडीतले हिरवे पिवळे कागद गुंडाळलेले लाडू जिलबी शेव चिवडा त्याच्या त्या गाड्या… भरगच्च भरलेली भजनी मंडळी हे सारं सार आजही डोळ्यासमोर येतं आणि दर दहा तारखेला वर्तमानपत्राच्या पुड्यात खाऊ बांधून आनंदाने आपल्या लेकरांसाठी हातात घेऊन येणारा बाप डोळ्यासमोर दिसतो… फार छान होते दिवस… सुखाचे नसतील पण समाधान मात्र होते कॅलेंडर वरची दहा तारीख पाहताना आजही गाणं तोंडावर येतं…
☆ “ग्रंथालयाचे मनोगत” – लेख क्र. १७ ☆ प्रा.भारती जोगी ☆
” मुसळधार पाऊस बघतीयेस ना खिडकीतून… मग असाच साहित्य-संस्कृतीचा ही अखंड पाऊस आहे. आत.. प्रवेश करून पहा की जरा!
हात लांबव, काढ त्या कपाटातील पुस्तकं, झटक त्यांची धूळ, फिरव त्यावर पारखी नजर, आणि मग…
पहा त्या सगळ्यांची आठवण येते का?
पैस, शेला, मृद्गंध, विशाखा,
व. पु, पुल अन् अत्रे,
आंबेडकरांचे ‘राजगृह‘, अन् सावरकरांच्या कविता!
दुर्बोध ग्रेस, अन् सुबोध बहिणाबाई
. .. शांताबाईंच्या शब्द खुणा अन् महानोरांची हिरवी बोली.
प्राचीन ग्रंथांचा सांस्कृतिक ठेवा, धार्मिक, सामाजिक, पौराणिक वारसा…
हे सगळं आणि अशी कितीतरी अफाट, अमाप, अगणित मेळविलेली अक्षरे डोळ्यांनी प्यायलीस ना आजवर… पोहोचवलीस, उतरवलीस ना थेट हृदयांतरी!….
मग… आता…
माझ्या जिरत्या पानांशी तुझी कां न उरली मैत्री?
कां दिवसेंदिवस आम्ही ओस पडत चाललो आहोत. बंद पडायच्या वाटेवर आहोत? अगं, काय सांगू…
“ग्रंथालयातील पुस्तकांचा श्वास रोज येतो कंठी
वाचकहो, तुमच्या साठी, वाचकहो तुमच्या साठी!
मान्य आहे गं मला, आज काळ बदलला. डिजिटल युग आलं. E Book चा जमाना आला. ग्रंथालयातील पुस्तके भ्रमण ध्वनीत एका टचवर मागे पुढे होऊ लागली. किंडल मध्ये नव्या रूपात, नव्या परिवेषात उभी राहिली. पण तुम्ही लोक एक महत्वाची गोष्ट विसरता की, आज माहितीचा प्रचंड स्फोट झालेल्या या युगात… मीच… म्हणजे ग्रंथालयच सत्य आणि असत्य यामधील फरक ओळखून योग्य माहिती मिळविण्याचे योग्य आणि विश्वसनीय साधन आहे. ग्रंथालय हे फक्त पुस्तक घर नसून ते एक संस्कार केंद्र आहे. विचारांची देवाणघेवाण, चिंतन, मनन, सर्जनशीलतेला चालना देणारे आलय आहे.
पुस्तके ही ज्ञानाचा अथांग सागर आहे आणि ग्रंथालय हे त्यांचे बंदर आहे.
हे विसरू नकोस ना!
माझ्या पुस्तकांनी काळानुरूप झालेला बदल ही स्विकारलायं ना… मग तुम्ही ही एक लक्षात घेतले पाहिजे की…
ग्रंथालयांच्या मदतीने, पुस्तकांच्या सहवासात, शांत, स्थिर वातावरणात मानसिक समाधान मिळवत… तुम्ही ग्रंथालय- पुस्तके-वाचक… हे अ-क्षर नाते जपा. कारण Byte मधले शून्य ही तेच, अन् एकेरीचे आखर ही तेच!
म्हणून ग्रंथालये ही वाचनालये कशी बनतील आणि ‘e’ च्या नव्या वेषात ही आपली भेट ग्रेट कशी होईल हा प्रयत्न करू यात! चल बराच वेळ झाला, येतीयेस ना माझ्या पाठोपाठ, पुस्तकांच्या दुनियेत!
आ चल, के तुझे मैं लेके चलूं, एक ऐसे गगन के तले, जहां गम भी ना हो, आंसूं भी ना हो, बस् प्यार और सच्चा ज्ञान ही पले!!! .
☆ हेही एक सर्वोच्च शिखरच – –– लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆
नदाव बन येहूदा
आजच व्हॉटसअप वरती एक पोस्ट वाचनात आली. इस्राएलचा चोवीस वर्षीय युवा गिर्यारोहक नदाव बन येहूदा ह्याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट अर्थात सागरमाथा सर करायला फक्त तीनशे मीटर बाकी राहीले असताना देखील शिखर सर करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि तरीही आज जगात ही बातमी वाचलेल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय तो बनून राहिला असेल हे नि:संशय.
कारण नदावने दुसऱ्या एका गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक विक्रम, कीर्ती, उपलब्धि ह्या गोष्टीना दुय्यम स्थान देत मूल्य आणि मूल्य संस्कार ह्याना श्रेष्ठ मानत “योग्य” गोष्ट केली.
त्याच्याच शब्दात सांगायचे तर “एव्हरेस्ट वरील माझ्या चढाई च्या मार्गात मला दोन मृतदेह दिसले की जे गिर्यारोहक नुकतेच मृत झाले असावेत. मी ज्या दोराच्या आधाराने चढत होतो त्यालाच ते लटकलेले होते. अंगातील त्राण संपल्यामुळे आहे तिथेच स्वतःला anchor करून ते तिथे थांबले आणि कदाचित कोमात जाऊन मृत झाले. त्यांना पार करून सर्व पुढे जात होते. आणि नंतर मला तो दिसला – तुर्कस्तानचा आयदिन इरमाक. आम्ही खाली कॅम्प मध्ये भेटलो होतो आणि आता तो हेल्मेट नाही, ऑक्सिजन मास्क नाही, ग्लोव्हज नाहीत अशा परिस्थितीत शेवट होण्याची वाट पहात होता. इतर काही गिर्यारोहक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. मात्र मी दुर्लक्ष करू शकलो नाही, आणि मी वैयक्तिक विक्रम आणि दुसऱ्या एका मनुष्याचे प्राण ह्यात दुसऱ्या गोष्टीची निवड केली. “
नदावने हा निर्णय घेतला खरा; पण तो अमलात आणणे हे तितकेच कठीण काम होते. बेशुद्ध पडलेल्या आयदिन ला उचलून खाली आणणे कर्मकठीण होते कारण त्याचे आणि स्वत:चे दोघांचे ओझे सांभाळत उतरायचे होते. आयदिन बेशुद्ध असल्यामुळे जास्त भारी वजनाचा भासत होता. अधून मधून त्याला शुद्ध यायची पण त्यात तो वेदना असह्य होऊन ओरडायचा. अशा परिस्थितीत खाली येताना नदाव चा स्वतः चा ऑक्सिजन मास्क फाटला. ग्लोव्हज काढावे लागले. त्यामुळे त्याला स्वतः ला बोटाना हिमदंश झाला. वाटेत त्याला अजून एक मलेशियन गिर्यारोहक भेटला की जो सुद्धा मरण्याच्या मार्गावर होता. वर जाणाऱ्या काही climbers कडून नदाव ने त्या दोन अत्यवस्थ climbers साठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवली आणि नऊ तासांच्या भगीरथ यत्नानंतर त्या दोघांना घेऊन कॅम्प पर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडू येथे नेऊन इस्पितळात दाखल केले आणि उपचार सुरू झाले. दोन जीव वाचवण्यात नदाव यशस्वी झाला.
जीवनात काही असे परीक्षेचे क्षण येतात जिथे तुम्ही कशा प्रकारचे मनुष्य आहात, तुमची मूल्य व्यवस्था कशी आहे आणि त्या मूल्यांसाठी तुम्ही किती मोठा त्याग करू शकता वा किंमत देऊ शकता हे स्वतः शीच नक्की करावं लागतं. अशा परीक्षेच्या क्षणी नदाव ने, एव्हरेस्ट सर करणारा सर्वात कमी वयाचा इस्रायली गिर्यारोहक ह्या सन्मान व कीर्तीचा त्याग करत मानवतेच्या सर्वोच्च मूल्याला प्राथमिकता दिली आणि जगासाठी एक धडा दिला. गिर्यारोहणाच्या धाडसी खेळातील अत्युच्च मूल्य ओळखून त्याप्रमाणे वागत एक अनोखे धैर्य दाखवले.
एकीकडे मानसन्मान, वैयक्तिक महत्वाकांक्षेची पूर्तता, सर्वोच्च शिखर सर करण्याची वैयक्तिक स्वप्नपूर्ती हे सारे आणि दुसरीकडे दुसऱ्या मनुष्याचा जीव वाचवण्याचा अशक्यप्राय प्रयत्न ज्यात वरील मानसन्मान, कीर्ती, स्वप्नपूर्ती, महत्त्वाकांक्षा पूर्ती ह्या गोष्टींच्या त्यागावरोबरच एक अजून भयंकर शक्यता होती आणि ती म्हणजे स्वतः चा जीव गमावण्याची. पण नदाव नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या अती कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि with flying colors he passed.
आज भले नदावला सागरमाथा सर करता आला असेल. भविष्यात तो हे लक्ष्य गाठेल किंवा नाही गाठू शकणार. मात्र तो कायम स्वतः ला ताठ मानेने आरशात बघू शकेल, त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना डोळ्याला डोळा भिडवून भेटू शकेल आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे जे अलौकिक समाधान आहे ते कायम त्याच्या उराशी असेल.
आज सागरमाथा सर न करता सुद्धा, नदाव बन येहुदा सर्व जगातील लोकांच्या मनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला असेल ह्यात शंका नाही.
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, सुब्रोतो नावाचा, वीस वर्षाचा एक मुलगा होता, जो कलकत्त्यातील एका कॉलनीमध्ये राहात होता.
त्याचे वडील एक भट्टी चालवत असत, जिथे ते दूध तापवून त्यापासून खवा बनवण्याचे काम करत असत.
सुब्रोतो खरं तर एक चांगला मुलगा होता, परंतु त्याला अनावश्यक खर्च करण्याची एक वाईट सवय होती. तो नेहमीच वडिलांकडे पैसे मागत असे आणि ते खाण्यापिण्यामध्ये आणि सिनेमा बघण्यामध्ये खर्च करत असे.
एके दिवशी वडिलांनी सुब्रोतोला बोलावले आणि म्हणाले, “”हे बघ बाळा, आता तू मोठा झाला आहेस, त्यामुळे तुला आपल्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत. हे रोज उठून, तू माझ्याकडे पैसे मागतोस आणि ते इकडे तिकडे उडवतोस, ही चांगली गोष्ट नाही.”
“काय बाबा! कुठे मी तुमच्याकडे हजारों रुपये मागितले आहेत?फक्त काही रुपयांसाठी तुम्ही मला एवढे लेक्चर देत आहात? एवढेसे रुपये, तर मी कधी पण तुम्हाला परत करू शकतो.” सुब्रोतो जरा वैतागून म्हणणला.
सुब्रोतोचे बोलणे ऐकून वडील विचलित झाले, परंतु त्यांना कळून चुकले की, धाकदपटशाहीने ही गोष्ट त्याला समजणार नाही. म्हणून ते म्हणाले, “”ही तर खूप चांगली गोष्ट आहे… असे कर की, तू मला जास्त नाही, फक्त एक रुपया रोज आणून देत जा.”
सुब्रोतो हसला आणि जणू काही मी जिंकलो, या आविर्भावात तो तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुब्रोतो जेव्हा वडिलांकडे आला, तेव्हा त्याला बघताच वडील म्हणाले, “बाळा, आण माझा एक रुपया.”
त्यांचे बोलणे ऐकून सुब्रोतो जरा घाबरला, आणि लगेच आपल्या आजीकडून एक रुपया घेऊन आला.
“घ्या बाबा, मी घेऊन आलो तुमचा एक रुपया,” असे म्हणून त्याने ते नाणे वडिलांच्या हातात दिले.
वडिलांनी ते नाणे घेतले आणि भट्टीमध्ये फेकून दिले.
“हे काय, तुम्ही असे का केले?”” सुब्रोतोने वैतागून विचारले.
वडील म्हणाले, “तुला काय करायचे आहे? तुला फक्त एक रुपया देण्याशी मतलब असला पाहिजे. मग मी त्याचे काहीही करू शकतो.”
सुब्रोतोने पण जास्त वाद घातला नाही आणि तो तिथून गुपचूप निघून गेला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा वडिलांनी त्याच्याकडे एक रुपया मागितला, तेव्हा त्याने आपल्या आईकडून एक रुपया घेऊन त्यांना दिला… बरेच दिवसांपर्यंत हाच क्रम चालू राहिला. तो रोज कुणा मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून एक रुपया घेई, आणि वडिलांना देई आणि वडील ते नाणे भट्टीमध्ये फेकून देत.
नंतर एक दिवस असा आला की, ज्यावेळी प्रत्येक जणांनी त्याला पैसे देण्यासाठी नकार दिला. सुब्रोतोला काळजी वाटली, की आता तो वडिलांना एक रुपया कुठून आणून देणार.
संध्याकाळ होत आली होती, त्याला काही समजत नव्हते की आता काय करावे! एक रुपया, न देण्याची नामुष्की त्याला सहन होणारी नव्हती. त्यावेळीच त्याला रस्त्यावर एक वयस्कर मजूर दिसला, जो एका प्रवाशाला सायकल-रिक्षात बसवून घेऊन जात होता.
“ऐका दादा, काही वेळासाठी तुम्ही मला ही रिक्षा ओढू द्याल का? त्याच्या बदल्यात मी तुमच्याकडून फक्त एक रुपया घेईन,”सुब्रोतो रिक्षावाल्याला म्हणाला.
रिक्षावाला खूप थकून गेला होता, त्यामुळे तो लगेच तयार झाला.
सुब्रोतो रिक्षा ओढू लागला.हे काम त्याला वाटत होते, त्यापेक्षा खूप कठीण होते… थोडे अंतर ओढल्यानंतरच त्याच्या हाताला घट्टे पडले, आणि पाय पण दुखू लागले! कसेतरी त्याने आपले काम पूर्ण केले आणि त्याच्या मोबदल्यात जीवनात पहिल्यांदाच स्वतःहून एक रुपया कमविला.
आज मोठ्या गर्वाने तो वडिलांकडे गेला आणि त्यांच्या हातावर एक रुपया ठेवला. रोजच्याप्रमाणे वडिलांनी रुपया घेऊन तो भट्टीत फेकण्यासाठी हात उचलला.
“थांबा बाबा!”सुब्रोतो वडिलांचा हात धरत म्हणाला, “तुम्ही हा फेकू शकत नाही! ही माझ्या मेहनतीची कमाई आहे.”” आणि सुब्रोतोने त्यांना घडलेली पूर्ण गोष्ट सांगितली.
वडील पुढे झाले आणि आपल्या मुलाला त्यांनी घट्ट आलिंगन दिले.
“बघ बेटा! इतके दिवस मी नाणी आगीत फेकत होतो, परंतु एकदाही तू मला थांबवले नाहीस. परंतु, आज जेव्हा तू स्वतःच्या मेहनतीची कमाई आगीमध्ये पडताना बघितलीस,तर एकदम ओरडलास. अशा प्रकारे, जेव्हा तू माझ्या मेहनतीची कमाई नको त्या गोष्टींमध्ये उडवतोस, त्यावेळेस मला पण तेवढेच दुःख होते. मी पण उदास होतो… म्हणूनच पैशाची किंमत समजून घे.जरी ते तुझे असू देत किंवा दुसऱ्या कोणाचे, कधीही अनाठायी खर्च करून, त्यांना नष्ट करू नकोस!”
सुब्रोतोला वडिलांनी सांगितलेली गोष्ट समजली. त्याने लगेच वडिलांना वाकून नमस्कार केला आणि आपल्या चुकीच्या व्यवहाराबद्दल क्षमा मागितली. आज त्याला एका रुपयाची किंमत समजली होती आणि त्याने मनातल्या मनात संकल्प केला की, आता तो कधीही पैशाचा अपव्यय करणार नाही.
मित्रांनो, हे तर आपल्याला कळले एका रुपयाचे महत्त्व, परंतु प्रत्येक क्षणी आपल्याला जे निसर्गाकडून फुकटात मिळत आहे, ज्याशिवाय आपण एक क्षणसुध्दा जिवंत राहू शकत नाही, तर आपण त्याची किंमत कधी चुकवू शकू का?
जर नाही, तर हे जीवन देणाऱ्याच्या प्रति, आपण प्रत्येक क्षणी कृतज्ञ होऊ शकतो का!
आपण आपल्याला मिळालेल्या संसाधनांचा उपयोग कसा करतो, ते आपलं चारित्र्य दर्शवत असते. आपली ही संसाधने आपलं अंतर्गत व्यक्तिमत्व आहे, जसे मन, बुद्धी, अहंकार… नंतर मग वेळ आणि बाहेरील संसाधने जसे संपत्ती, शक्ती इत्यादी. आपण त्यांचा उपयोग खऱ्या उद्देशासाठी सर्वोत्कृष्ट रीतीने केला पाहिजे.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : शामला पालेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈