हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शशि साहित्य # २१ – कविता – मेरा रचयिता… ☆ श्रीमती शशि सराफ ☆

श्रीमती शशि सराफ

(श्रीमती शशिसुरेश सराफ जी सागर विश्वविद्यालय से हिंदी एवं दर्शन शास्त्र से स्नातक हैं. आपने लायंस क्लब और स्वर्णकार समाज की अध्यक्षा पद का भी निर्वहन किया. आपका “लेबल शशि” नाम से बुटीक है और कई फैशन शोज में पुरस्कार प्राप्त किये हैं. आपका साहित्य और दर्शन से अत्यधिक लगाव है. आप प्रत्येक शुक्रवार श्रीमती शशि सराफ जी की रचनाएँ आत्मसात कर सेंगे. आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता ‘मेरा रचयिता।)

☆ शशि साहित्य # २१ ☆

? कविता – मेरा रचयिता…  ☆ श्रीमती शशि सुरेश सराफ  ? ?

🫟🫟🫟🫟🫟

बड़े मनोयोग से सुना रहे थे हम ,दास्तां अपनी,

चीत्कार सुन हड़बड़ा कर होश जो आया.

यह अजनबी मंजर नया नया सा था,

यह कुछ और नहीं!!!

अपने उन्ही शब्दों को,

लहुलुहान हो, चोट खाकर लौटते देखा..

 

ना टटोल मेरे मन को,

कि दोबारा सुनाऊं हाल,

अब तो खुद से भी कुछ कहने का अब मन नहीं..

 

शिकवा तो अब किसी से, कैसा भी नहीं.

हजारों साल से खड़े पत्थरों में,

धड़कनें सुनने की झूठी ख्वाहिश…

यह खता मेरी है, किसी और की तो नहीं..

 

मेरा सारा मनुहार, यूं व्यर्थ हो गया,

सींच कर खुद को,मेरे आंसुओं से,

वह और भी मजबूत हो गया.

अब मैं हूं और सिर्फ मेरा रचयिता,

वह अच्छा-अच्छा लिख रहा..

और मैं खुश होकर पढ़ रही.

© श्रीमती शशि सराफ

जबलपुर, मध्यप्रदेश 

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # ९८१ ⇒ संपादक मेहरबान ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “संपादक मेहरबान।)

?अभी अभी # ९८१ ⇒ आलेख – संपादक मेहरबान ? श्री प्रदीप शर्मा  ?

जो लिखता है, वह लेखक नहीं कहलाता, जो छपता है, वही लेखक कहलाता है। अगर संपादक मेहरबान तो लेखक पहलवान। आप कहीं भी छपें, अखबार में अथवा किसी पत्रिका में, या फिर आपकी कोई किताब प्रकाशित हो, तब ही तो आप लेखक कहलाएंगे।

गए वे दिन, जब लेखक वही कहलाता था, जिसकी

कोई किताब प्रकाशित होती थी। तब स्थिति यह थी, प्रकाशक मेहरबान, तो लेखक पहलवान। लेकिन आज समय ने लेखक को इतना आर्थिक और बौद्धिक रूप से संपन्न कर दिया है कि उसे किसी प्रकाशक की मिन्नत ही नहीं करनी पड़ती। किताब लिख, अमेजान पर डाल।।

कलयुग में जो छप जाए, वही साहित्य कहलाता है। अखबारों के संपादक लेखक के लिए भगवान होते हैं। अखबार का क्या है, वह तो विज्ञापन से ही चल जाएगा, लेकिन लेखक की कोई रचना, तब ही रचना कहलाएगी, जब वह कहीं छप जाएगी।

किसी अखबार के संपादक को पत्रकार कहा जाता है, साहित्यकार नहीं। होगा सबका मालिक एक, लेकिन संपादक का असली मालिक तो अखबार का मालिक ही होता है। मालिक खुश, तो संपादक खुश।।

कभी लेखन भी एक विधा थी, लोग लिख लिखकर ही लेखक बना करते थे। अगर प्यार किया, तो कविता लिखी, दिल टूटा तो ग़ज़ल लिखी। संपादक के नाम पत्र लिखे, जब छपने लगे, तो कॉन्फिडेंस बढ़ा। अखबारों और संपादकों से भी पहचान बढ़ी। प्रतिभा कुछ सीढ़ी और चढ़ी और उनकी भी अखबार में रचना छपी।

उधर अखबारों और पत्रिकाओं का भी अपना एक स्तर होता था। जो स्थापित मंजे हुए लेखक होते थे, उनसे तो रचना के लिए आग्रह किया जाता था, लेकिन किसी नए लेखक को कई पापड़ बेलने होते थे। रचना अस्वीकृत होना आम बात थी। जो नर निराश नहीं होते थे, उनकी किस्मत का ताला आखिर खुल ही जाता था।।

शुरू शुरू में एक लेखक के लिए हर संपादक भगवान होता है। अगर संपादक मेहरबान तो लेखक पहलवान, लेकिन अगर एक बार ऊंट पहाड़ के नीचे आ गया, तो फिर लेखक भी संपादकी पर उतर आता है। याद कीजिए दिनमान के रघुवीर सहाय को, धर्मयुग के धर्मयुग भारती और साप्ताहिक हिंदुस्तान के मनोहर श्याम जोशी को।

जब लेखक ही संपादक हो, तो चर्चित लेखकों की तो पौ बारह।

साहित्यिक पत्रिकाओं की बात अलग है। ज्ञानोदय, सारिका, नई कहानियां, हंस और कथादेश तो लेखकों की अपनी ही जमीन रही है।।

इंदौर में एक अखबार ऐसा भी था, जो पत्रकारों और नवोदित लेखकों के लिए गुरुकुल और सांदीपनि आश्रम से कम नहीं था।

जहां राहुल बारपुते जैसे विद्वान और राजेंद्र माथुर जैसे जुझारू संपादक मौजूद हों, वह किसी नालंदा और तक्षशिला से कम नहीं।।

केवल एक पारखी को ही हीरे की पहचान होती है।

हर चमकती चीज सोना नहीं होती। एक कुशल संपादक ही किसी रचना की गुणवत्ता को परख सकता है। फिर भी कहीं कहीं ऊंची दुकान और फीके पकवान परोसे जा रहे हैं, और लोग चाव से खा भी रहे हैं। बस संपादक मेहरबान तो।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना 📖 ☆ सम्पादक मंडल ई-अभिव्यक्ति ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना !! 📖

कुछ अपरिहार्य कारणों से शनिवार दि. २५/४/२६ से गुरुवार दि. ३०/४/२६ तक ६ दिनों के लिए ई-अभिव्यक्ति का प्रकाशन बंद रहेगा। 

इसके अलावा, हर महीने के पाक्षिक अवकाश 28 तारीख को ई-अभिव्यक्ति का प्रकाशन नियमित रूप से होगा। 

आप सभी का इसी प्रकार स्नेह, प्रतिसाद और सहयोग अपेक्षित है।

 

– संपादक मंडल 

ई-अभिव्यक्ति 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २९१ – गुरू माऊली…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९१ – विजय साहित्य ?

☆ गुरू माऊली …!

=१= 

 पुस्तक माझी गुरू माऊली

ज्ञान शलाका,देई साऊली.

मुळाक्षरांनी, भरली पाटी

शब्द शारदा, प्रसाद वाटी.

 

=२=

गुरु माऊली, ग्रंथ कोंदणी

ज्ञान संपदा, शब्द गोंदणी.

भावमनीचे, आहे स्पंदन

मनामनांचे, दैवी मंथन.

=३=

ग्रंथगुरू हेहोय सारथी ,

घडवी ज्ञानी, नवीन पिढी

पुस्तक पेढी, उंची ठरवी

ध्येय पथाची, सुखद शिडी.

 =४=

ज्ञानलालसा, नि ज्ञानार्जन

अक्षरधन हे, मनी जपू

पुस्तक पेढी, सगुण शारदा,

तिन्ही त्रिकाळी तिजसी नमू

 =५=

अक्षरलेणी, अक्षरगाथा,

सरस्वतीच्या, चरणी माथा

पुस्तक पेढी, हवी संग्रही

ज्ञानदायीनी, अक्षर गाथा…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ कोठे शोधू… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

 

? कवितेच्या उत्सव ?

कोठे शोधू… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

(वृत्त – पतितपावन 8-8-8-2)

 

रमून गेले कशी सहज मी नवीन संसारी

जशी विरघळे साखर दुधात तशी पडल्यावरी

 *

वाटे ना मज परके कोणी मला ना सासरी

जुळली नाती अशी जशी की जन्मजन्मांतरी

 *

दीर सासरे नणंद सासू गोकुळ भरलेले

येती जाती सगे सोयरे अंगण फुललेले

 *

शेतीवाडी जमीन जुमला अमाप दुध दुभते

माणुसकीच्या आपुलकीच्या शब्दांना भरते

 *

अडी नडीला येती सारे समजून आपुले

गावाकऱ्यांचे भांडण तंटे इथे किती सुटले

 *

आता कोठे शोधू वाडा ती गाय वासरे

काळ बदलला गाव हरवला उडाली पाखरे

  

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सत्संग-सज्जन प्रशंसा

परमेश्वर प्राप्तीसाठी नामस्मरण, भक्ती, सेवाभाव याबरोबरच सत्संग या गोष्टीला तितकेच महत्त्व दिल्याचे आपल्याला गाथेतील  अभंगांतून दिसून येते. उच्च समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण वर्गातील काही  मंडळींकडून तुकाराम महाराजांना अतिशय त्रास दिला जात होता. आम्ही वेद पंडित, शास्त्राचा अभ्यास केलेले, म्हणून आम्हीच अध्यात्माचे जाणकार असे समजून जे समाजातील खालच्या वर्गाचे समजणाऱ्या लोकांना फार पीडा देत असत अशा पाखंडी वर्गावर तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून चांगलेच ताशेरे मारले आहेत.

ब्राह्मण असो की वैश्य असो अथवा शूद्र, संत सज्जन कोणाला म्हणावे हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

हिरा ठेविता ऐरणी/ वाचे मारिता जो घणी /

 तोची मोल यावे खरा/ करणीचा होय चुरा//

 मोहरा तोची अंगे/ सूत न जळे ज्याचे संगे/

 तुका म्हणे तोचि संत/ सोसो जगाचे आघात//

संत कसे असतात तर, जो हिरा ऐरणीवर ठेवून मोठ्या हातोड्याने त्याच्यावर घाव घातला तरी फुटत नाही. तोच हिरा

मौल्यवान आहे दुसरे इतर बनावट काचेचे तुकडे असतात कारण ते घाव घालताच त्यांचा चुरा होतो. ज्याला सूत गुंडाळून अग्नीत टाकले असता सूत जळत नाही तोच खरा मोहरा होय. त्याचप्रमाणे जो जगाने दिलेले सर्व प्रकारचे उपद्रव शांतपणे सहन करतो त्याला संत म्हणावे.

ते संतांचा महिमा वर्णन करतात.

 सकळ चिंतामणी शरीर/ जरी जाय अहंकार समूळ आशा/

 निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी/ निर्मळ स्फटिक जसा.//

 मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी/ येती तया पासी अवघे जन//

 तीर्थासी तीर्थ झाला तोची एक/ मोक्ष तेणे दर्शने//

 मन शुद्ध तया काय करीसी माळा/

 मंडित सकळा भूषणासी//

 हरीच्या गुणे गर्जताती सदा/

 आनंद तया मानसी//

 तन मन धन दिले पुरुषोत्तम/ आशा नाही कवणाची//

 तुका म्हणे तो परीसाहुनी आगळा/

 काय महिमा वर्णू त्याचा//

या अभंगात तुकारामांनी संतांची लक्षणे सांगितली आहेत. चित्त शुद्ध असलेल्या संतांबद्दल तुकाराम महाराज गौरवाने बोलत आहेत की ज्याचा अहंकार गेला  आहे, निंदा, हिंसा, कपट, देह बुद्धी याचा वास त्यांच्यात नाही तोच स्फटिकासारखा निर्मळ आहे, त्याचे सर्व शरीर चिंतामणीच आहे. मोक्ष देणारे तीर्थ काशी, तिची त्याला जरुरी नाही. कारण सर्व तीर्थांना पावन करणारा संत हाच तीर्थस्थान झालेला आहे. सर्व जग अशा पुरुषापाशीच येते. याच्या दर्शनानेच मोक्षाचा लाभ होतो. ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला जपमाळेसारख्या बाह्य चिन्हांची काहीही जरुरी राहिलेली नाही. मन शुद्ध असल्यानेच तो सर्व भूषणांनी मंडित झालेला आहे. जे हरीचे गुणगान करत असतात ते निरंतर आनंदातच असतात.त्यांनी स्वतःला पुरुषोत्तमाच्या ठायी अर्पण केले आहे आणि जो कोणावरही आशा ठेवत नाही तो परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही. संतांच्या दर्शनाने तापत्रयांचा नाश होऊन विश्रांती मिळते.

 

 शुद्ध बीजापोटी/ फळे रसाळ गोमटी/

 मुखी अमृताची वाणी/ देह देवाचे करणी//

 सर्वांग निर्मळ/ चित्त जैसे गंगाजळ/

 तुका म्हणे जाती/ ताप दर्शनी विश्रांती

 

बीज शुद्ध असले की त्यातून उगवणारी फळे रसाळ आणि गोडच असतात, असं सांगून संत तुकाराम पुढे म्हणतात की ज्याच्या मुखात अमृततुल्य गोड शब्द आहेत आणि ज्याचा देह देवकार्यासाठी वापरला जात आहे, ज्याचे चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे त्याच्या दर्शनाने त्रिविध ताप हरण होऊन चित्ताला विश्रांती मिळते.

 सोनियाचे ताट क्षीरीने भरिले/

 भक्षावया दिले श्वानालागी//

 मुक्ताफळ हार खराशी घातला/

 कस्तुरी सुकराला चोजविली//*

 वेद पारायण बधिरा सांगे ज्ञान/

 तयाची ते खूण काय जाणे//

 तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे/

 भक्तीचे महिमान साधू जाणे//

एक संत साधूच असा आहे की जो भक्तीचा महिमा जाणतो. सामान्यांना हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज या अभंगात रोजच्या जीवनातील काही उदाहरणे देतात.

सोन्याच्या पात्रात खीर भरून ती कुत्र्याला दिली तर त्याचा काय उपयोग? त्याचप्रमाणे गाढवाच्या गळ्यात मोत्याचा हार घातला किंवा डुकराच्या नाकाला कस्तुरी लावली

तर त्याचा महिमा त्यांना कळणार आहे का? एखाद्या बहिर्‍याला(अज्ञानी) माणसाला वेदाचे ज्ञान कितीही देण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच्या बुद्धीला समजणार आहे का? जे खरे वर्म आहे ते ज्याचा तोच जाणू शकतो. याच कारणास्तव संतांची संगती धरावी असे तुकाराम महाराजांचे सांगणे आहे.

तुकाराम महाराजांना वैष्णवांचे दास होण्याची तळमळ लागली आहे. कारण ते म्हणतात.

 ते माझे सोयरे सज्जन सांगाती/

 पाय आठवीती विठोबाचे//

 येरा मानविधी पाळणा पुरते/

 देवाची ती भुते म्हणोनिया//

 सर्व भावे जालो वैष्णवांचा दास/

 करीन त्यांची आस उच्छिष्ठाची//

 तुका म्हणे जैसे आवडती हरिदास/

 तैसी नाही आस आणिकांची//

तुकाराम महाराजांच्या मनात हरिदासांविषयी अत्यंत आदर आहे. जे पांडुरंगाच्या चरणांचे चिंतन करतात ते सज्जन माझे सोयरे आहेत असे ते म्हणतात.

बाकीच्यांना मी फक्त विधीपालनापुरते आदराने वागवतो कारण सर्व भूतमात्र देवाच्याच रूपाचे असतात. काया, वाचा, मनाने मात्र तुकाराम महाराज वैष्णवांचे दास आहेत. त्यांच्या उच्छिष्टाची महाराज आशा धरतात. त्यांना हरिदास जितके आवडतात तितके इतर कोणीही आवडत नाही. या अभंगात पर्यायाने सज्जनांची संगती चांगली हे सांगण्याचा महाराजांचा आटोकाट प्रयत्न आहे.

संतांची महती सांगणारा हा आणखी एक अभंग आपण पाहूया.

 काय वाणू आता न पुरे हे वाणी/

 मस्तक चरणी ठेवीतसे//

संत महात्म्य वर्णन करताना महाराजांची वाणी अपुरी पडते. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून ते म्हणतात,

 थोरीव सांडली आपुली परिसे/

 नेणे सिवो कैसे लोखंडासी//

 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती/

 देह कष्टविति पर उपकारे//

 भुतांची दया हे भांडवल संता/

 आपुली ममता नाही देही//

 तुका म्हणे सुख पराविया सुखे/

 अमृत हे मुखे स्त्रवतसे//

लोखंड अति हीन आहे, त्याला मी कसा स्पर्श करू? असे मनात न आणता परीस त्याचे सोने करतो, त्याचप्रमाणे संतांनी माझ्या सारख्या हीनाचा स्वीकार केला आहे. संतांचे अवतार जगाच्या कल्याणा करताच असतात, ते आपला देह परोपकार करण्यासाठी कष्टवितात. सर्वांवर दया करणे, हे संतांचे स्वाभाविक भांडवल आहे व त्यांना स्वतःच्या देहाची ममता नसते.

ते संत लोकांच्या सुखामुळेच सुखी होतात आणि त्यांचे बोलणे अमृता सारखे मधुर असते. हरीच्या नामामृताचा ओघच त्यांच्या वाणी वाटे वाहत असतो.

पुढील भागात सज्जन प्रशंसे विषयी आणखी काही अभंगांचा आपण विचार करू.

क्रमशः… १६ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # हमारा बजाज… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # हमारा बजाज… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आमच्या लहानपणी.. म्हणजे साठी च्या दशकात… चैत्र संपता संपता आणि वैशाखाची ओपनिंग सुरू झाली की फारतर जेष्ठ अर्धा अधिका पर्यंत… मराठी महिन्याच्यां गोंधळात न पडता सरळ इंग्रजी मंथचा विचार केला तर मार्च एंड पासून ते जून हाफ पर्यंत उन्हाळ्याचा सिझन सुरू असायचा… त्यावेळी सगळे ऋतू आपल्या वेळा काटेकोरपणाने पाळत असत… इतकचं काय माणसं, संस्था आस्थापना, शाळा, महाविद्यालये, रेल्वे, बस, विमानं इ इ. देखिल आपल्या वर्षभराच्या एकदा आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार चालत असतं… वार्षिक परिक्षेचे पीर एप्रिलच्या मध्याला एकदा पाण्यात पडले कि सगळी शाळकरी मुलांचा जथ्था आपापल्या पालकांसह उन्हाळी सुट्टीसाठी म्हणून गावाकडे जायचा… शहरातील उन्हाळ्यापेक्षा गावात सौम्य आणि अधिक गारवा तसेच आंबा, काजू, फणस, जांभूळ चा मनसोक्त पाहुणचाराचा आस्वाद आनंद लुटून झाला कि मृगाची पावसाची पहिली सर पडायचा अवकाश कि सगळे आपल्या शहरात परतायचे… तेव्हा त्या दोन तीन महिन्यात इकडे सिलिंग फॅन हुप्प होऊन बसायचा… ते ए. सी. , कुलर वगैरे श्रीमंती सिंम्बाल चे फॅड अद्याप मध्यमवर्गीय कुटुंबात अवतरलेले नव्हते… आणि सिलिंग फॅन मात्र शहरात घराघरातून वर्षभर तिन त्रिकाळ घुमत असायचा… पर्यावरणाचा समतोल साधला गेल्याने उन्हाळी तापमान देखील आपला ठरलेल्या पाऱ्यापेक्षा कधी जास्त होतच नसे… तर सांगत होतो कि तेव्हा सिलिंग फॅन हि एकमेव घरटी गरज होती आणि टेबल फॅन खिशात खुळखळणाऱ्या जास्तीच्या पैशाची चैन समजली जायची… जिथे हम दो और हमारे दो चा मामला तिथे सिलिंग वरचा एकुलता एक हाॅल मधला नि बेडरूम मधला हमारा बजाज आपलं गारेगार वारं फिरवायचा… पण जिथं टिचभर जागेत मणभर माणसं असायची तेव्हा हा चैन म्हणून नावं ठेवलेला टेबल फॅन उपयोगात आणला जायचा.. प्रत्येकाच्या सोयीनुसार कोपऱ्यात फिरता वा खडा ठेवून वारं फिरवायचा… स्पीड ची बटनं चार असली तरी वारं भन्नाट देत असे… पण या टेबल फॅन चा उपयोग मात्र त्या उन्हाळ्यापुरता मर्यादित असे… त्यानंतर तो अडगळीत फळीवर (लाॅफ्टवर) त्याला गवसणी घालून ठेवला जाई तो परत पुढच्या उन्हाळ्यातच खाली उतरे… असं दोन दशके पुढची गेली आणि पुढे पुढे सगळा माहोलच बदलत गेला… त्याला काय होतयं या विचाराने बुद्धीला मांद चढले आणि माणसांची विचाराची दिशा विकृत झाली… त्याचा विपरीत परिणाम निर्सगावर झाला आणि तो देखील माणसासारखाच रंग बदलू लागला.. त्याच्या दैनंदिन वेळापत्रकाचलाच त्याने न जुमानता आपल्या मनाला स्वैर स्वातंत्र्य दिले… सगळे ऋतूंची मनमौजी सुरू झाली… कुणीही उठावं कधीही यावं आपल्याला हवं तसं वागावं.. राहावं, ओरबाडावं, नासधूस करावं नाहीतर हुलकावणी देत राहून तोंडच दाखवायचं नाही… आणि माणसालाच वेठीला धरून त्यालाच जाब विचारायचा… सर्व काही तुझ्या ताब्यात आहे याचा फुकाचा गर्व आहे ना तुला मग दाखव कि वेळेवर हवा तेव्हढा पाऊस, थंडी आणि उन्हाळा आणून… आहे का तुझा निर्सगावर अंकुश तुझा… लावतोस का शिस्त मला… तुला काय वाटलं हमारा बजाज सारखा बटणाच्या कळीवर चालू बंद करून हुकमत आमच्या वर मिळवता येईल काय… अरे तुमचा तो हमारा बजाज देखील काहीवेळा चालता चालता बंद पडतो.. मान टाकतो आणि कशी तुमची ऐन गरजेच्या वेळी काशी करून जातो… तेव्हा तुमची कशी होते चिडचिड… अगदी त्याच तालावर माझ्या या बेताल वागण्यानं देखील तुमच्याच बेजबाबदार पणाने माझ्याशी वागणूकीचा परिणाम तुम्हाला भोगायला लावण्याची किंमत मोजून घेत असतो… तुम्ही काय रे हमारा बजाज म्हणून त्या टेबल फॅन चेच गोडवे गात बसता… नि आम्हाला विसरता… ये हमने आपको करारा जवाब दिया है… तो बाजारातून जेव्हा हमारा बजाज नवा कोरा घरी घेऊन येता तेव्हा त्याच्या नवलाई पुढे सगळे घरदारनं घेरुन बसते आणि तो एकशे ऐंशीच्या कोनात फिरणारा टेबल फॅन मात्र अरे मला जरा मोकळीक द्याल तर मी हवा पसरवेन… कुणी आगाऊ कारटं त्या पात्यावर पेन्सिल, कागद धरून आवाजाची गंमत लुटत असतं.. नि माझ्या गतीला अवरोध झाल्याने मग माझी मतीच खुंटते नि कुठेतरी खरखर करणारा कानाला सहन न होणारा आवाज माझ्याकडून निघाला कि… अरे याला वापरून दहा वर्षे झाली म्हणजे याची गॅरंटी संपली आता त्याला भंगारात मोडीत घालून दूसरा नवा आणायला हवा… असं म्हणून पुन्हा तुम्ही नवा हमारा बजाजच आणता… आमच्या सारखे कैक बाजारात आले आणि गेले पण आमच्या सारखे आम्हीच कायम टिकून राहिलोय… हे तुमचं नि हमारा बजाज चं जन्मोजन्मीचं नातं असं अबाधित राहिले आहे.. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी… ठंडा ठंडा कुल कुल..

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित कथा – (१) मुलाचं प्रेम  / (२) माकडाचं स्पष्टीकरण – हिन्दी कथाकार : सुश्री मीरा जैन (३) सन्माननीय वेडा – हिन्दी कथाकार : संतोष सुपेकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित कथा – (१) मुलाचं प्रेम  / (२) माकडाचं स्पष्टीकरण – हिन्दी कथाकार : सुश्री मीरा जैन (३) सन्माननीय वेडा – हिन्दी कथाकार : संतोष सुपेकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(१)  मुलाचं प्रेम 

आज हॉस्पिटलमध्ये दाखल केलेली एक आई बहुतेक शेवटचे श्वास मोजत होती. आईची ती तशी अवस्था पाहून तिच्या मुलाला – नवलला अतिशय वाईट वाटत होतं …. आणि हतबल झाल्यासारखंही. केविलवाणेपणाने तो त्याच्या व्हाट्सअप.. फेसबुकवर असणाऱ्या मित्रांना सारखा मेसेज पाठवत होता ….

“ मित्रांनो माझी आई खूप जास्त आजारी आहे. तिला लवकर बरं वाटावं म्हणून मला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची आणि प्रार्थनेची फार फार गरज आहे … “ 

बऱ्याच मित्रांनीही लगेचच आपलेपणाने शुभेच्छांचे मेसेजेस पाठवायला सुरुवात केली…. आणि नवल अशा प्रत्येक मेसेजबद्दल धन्यवाद देण्यात गर्क झाला. पण व्हाट्सअप वरच्या एका मित्राने मात्र तो मेसेज वाचल्यावाचल्या आपल्या भावना मेसेजमधूनच व्यक्त करून न थांबता, तडक हॉस्पिटल गाठलं. प्रत्यक्षच जाऊन भेटलं तर नवलला जरा दिलासा मिळेल आणि त्याच्या आईसाठी नक्कीच काहीतरी करता येईल या भावनेने…

तो गेला, नवलजवळ बसला… नवललाही बरं वाटलं… आणि मग त्या मित्राने आईची प्रकृती सुधारण्याचा एक अचूक आणि खात्रीशीर उपाय नवलच्या कानात सांगितला…. पण तो उपाय ऐकून नवलच्या चेहेऱ्यावर पसरलेली चिंता कमी होण्याऐवजी दुपटीने गडद झाली.

त्या मित्राने नवलच्या कानात फक्त एवढंच तर सांगितलं होतं की … “ नवल तू लगेच आत आईजवळ जा, आणि तिच्या कानात फक्त एवढंच सांग की … ‘ आई … तू लवकरात लवकर बरी हो ना … तुझ्यावाचून घर अगदी सुनं सुनं वाटतंय गं! ‘ “ ….

तो मित्र दुसरा तिसरा कोणी नव्हता …. तर वृद्धाश्रमाचा मॅनेजर होता…

मूळ हिंदी कथा : बेटेकी ममता  

लेखिका : सुश्री मीरा जैन, उज्जैन.

—– 

(२)  माकडाचं स्पष्टीकरण…

दिवसभर दाणा पाणी शोधत इकडे तिकडे वणवण करत ती चिमणी फिरत राहिली होती. सगळं लक्ष मात्र घरट्यातल्या पिल्लांकडे होतं. संध्याकाळ झाली तशी ती घरट्याकडे परत फिरली. पण आज येतांना तिला नक्कीच काहीतरी वेगळंच जाणवत होतं. गावातली सगळी कुत्री आणि इतर सगळे प्राणीही अतिशय दु:खी दिसत होते …

‘कुठलाच आवाज नाही …. उगीच ओरडणं नाही … भांडणं नाहीत. असं तर कधीच होत नाही … मग आज का असे गप्प झालेले दिसताहेत सगळे.. आणि खूप दु:खी असल्यासारखे? नेमकं काय झालं असेल … आणि तेही एकदम या सगळ्यांच्या बाबतीत? ‘ … आता तिलाच फार अस्वस्थ वाटायला लागलं होतं. घरट्याजवळ येऊन ती झाडावर जराशी विसावली, इतक्यात शेजारच्या फांदीवर तशाच चिंताग्रस्त चेहेऱ्याने बसलेलं चिंटू माकड तिला दिसलं. ती पटकन उडून त्याच्याजवळ जाऊन बसली आणि मनातला प्रश्न त्याला विचारला… 

त्यावर चिंटू म्हणाला.. “ काय सांगू चिऊताई तुला.. अगं आज या गावात कसलं तरी आन्दोलन चाललं होतं. त्यात सात लोकांचा मृत्यू झाला आहे. ” 

“अरे बाप रे.. फार वाईट झालं हे… पण त्यामुळे माणसं दु:खी दिसण्याऐवजी हे प्राणीच जास्त दु:खी झालेले दिसताहेत की. असं का?“

… चिमणीच्या या प्रश्नावर चिंटू माकडाने अगदी सविस्तर उत्तर दिलं…

“आता काय सांगू तुला? काय झालंय की त्या दंगलीत मेलेली माणसं वेगवेगळ्या जातींची आहेत.. एका जातीतली तीन माणसं दगावली आहेत, आणि इतर जातींची प्रत्येकी दोन माणसं दगावली आहेत… का ते माहिती नाही, पण प्रत्येक जातीतली माणसं फक्त आपापल्या जातीतल्या माणसांसाठी दु:खी झाली आहेत … शोक व्यक्त करताहेत. … पण ही सगळी कुत्री आणि इतर प्राणी आहेत ना.. त्यांना त्या सातही माणसांच्या मरणाचं मनापासून दु:ख होतंय… कारण काय माहितीये? .. कारण त्यांना त्या सातही जणांमध्ये ‘ फक्त मनुष्य ‘ दिसतो आहे ना … म्हणून ….

मूळ हिंदी कथा : बंदरका विश्लेषण 

कथालेखिका : सुश्री मीरा जैन, उज्जैन.

—– 

(३) सन्माननीय वेडा – – – 

‘‘काय हो काका… हल्ली सकाळीच असं बागेत आल्यावरच काय होतं तुम्हाला? इथे मॉर्निंग वॉक करत असलेल्या माणसांकडे असे रोजच त्यांचे फोन मागत असता.. ते का? तुमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने असं वागणं योग्य आहे असं वाटतं का तुम्हाला? ”… 

.. बागेत अशोकरावांबरोबर चालत असलेल्या अनिलने त्यांना विचारलं… ‘‘आणि मला तर हेच समजत

नाहीये की इथे येतांना तुम्ही स्वत:चा फोन का घेऊन येत नाही? दुसऱ्या कुणाकडे तरी त्याचा फोन

का मागायचा? तुमच्या अशा वागण्यामुळे लोक तुम्हाला वेडा म्हणायला लागलेत, माहितीये का तुम्हाला? ”

‘‘अरे बापरे… असं झालंय का? ” अशोकराव खदखदून हसले. ‘‘म्हणजे मी असं का करतो हे तुमच्याही लक्षात आलं नाहीये का? अहो इथे फिरायला आलेल्या सगळ्या लोकांकडे मी त्यांचा फोन मागतो…खरंय.. पण कशासाठी मागत असेन? मला एखादा फोन करायचा असतो म्हणून? इथे येतांना मी माझा फोन बरोबर आणत नसेन असं वाटतं का तुम्हाला? तर तसं नाहीये… माझा फोन नेहेमी माझ्याबरोबरच असतो. हा बघा.. पण मी असा विचित्र वागतो त्याचा परिणाम लक्षात आला नाही का तुमच्या? मला घाबरून म्हणा… किंवा माझ्यावर चिडून म्हणा… पण रोज सकाळी इथे फिरायला येणारे लोक हल्ली एकतर इथे त्यांचा फोन घेऊन येतच नाहीत, नाहीतर माझ्या भीतीने फिरतांना आपला फोन खिशातच ठेवायला लागले आहेत… आणि मला हेच तर हवं होतं! ”

‘‘पण असं का व्हायला हवंय् तुम्हाला? ”

‘‘ कारण ऐकायचे आहे? मग ऐका… त्याचं कारण इतकंच की सकाळी सकाळी इथे व्यायाम करायला, किंवा तब्बेत सुधारण्यासाठी म्हणून येणाऱ्या लोकांनी फक्त त्यांच्या आरोग्यावर, शरीर स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करावं… मोबाईलवर नाही असं मला वाटतं. मोबाईलसाठी तर उरलेला सगळा दिवस आणि पूर्ण रात्र असते ना त्यांच्यासाठी! अहो इथे आल्यावर मला नेहेमी असंच चित्र दिसायचं की लोक चालता चालताही त्या फोनलाच चिकटलेले असायचे… फोनवर सतत कुणाशी तरी बोलत असायचे… अगदी व्हिडिओ-कॉलही करत असायचे… आणि त्या नादात चालत असतांना चक्क पडायचेही कितीदा तरी… नाहीतर कुणाला तरी धडकायचे… पाय एकीकडे आणि नजर एकीकडे असंच असायचं ना! ..

… पण आता बघा… सगळे कसे शिस्तीत फक्त आपल्या चालण्याकडे.. पर्यायाने स्वतःच्या शरीरस्वास्थ्याकडे लक्ष देत असतात… आणि त्यांच्या स्वत:च्या नकळत या वेड्याचा हेतू पूर्ण करतात. ”… इतकं बोलून अशोकराव पुन्हा तसेच खदखदून हसले… 

… आणि अनिल विशेष आदराने त्यांच्याकडे पहात राहिला…

मूळ हिन्दी कथा: सम्माननीय पागल 

कथाकार : श्री. संतोष सुपेकर, उज्जैन 

मराठी अनुवाद : मंजुषा सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सोलापुरातील ‘आवाज की दुनिया’  ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ सोलापुरातील ‘आवाज की दुनिया’ ☆ शीला पतकी 

सोलापूरची खरी ओळख गिरणगाव म्हणून होती. आता एकही गिरणी शिल्लक नाही हा भाग वेगळा पण गावाची सुरुवातच मुळी गिरणीच्या वाजणाऱ्या भोंग्यान व्हायची. जुनी गिरणी, लक्ष्मी विष्णू, जाम मिल, फुटाणे गिरणी म्हणून पण एक होती. अशा गिरण्यांच्या भोंग्याच्या आवाजाने गावाला जाग येत असे. गिरणीत पाळी बदलली की भोंगा वाजायचा तोच अख्या गावाला घड्याळाच टाइमिंग दाखवायचा. पाचच्या भोंग्यावर पाणी यायचं माणसं उठायची… पाण्याचा आवाज… पाण्याच्या भांड्यांचा आवाज… मग कोणाची आदळ आपट… आणि सोलापुरातील खास विषय म्हणजे नळावरची भांडण…! सरकारी नळ असायचे. त्या नळावर अख्या गल्लीची गर्दी… वाड्यातनही अनेक बिर्हाडामध्ये एखादा नळ… तसं तर पाणी दोन वेळा यायचं… पण वाड्यात 100- 100 माणसं. वरच्या मजल्या वरील लोकांना जिन्यावरून पाण्याच्या घागरी नेऊन पाणी भरावे लागे मोटर वगैरे नव्हत्या.

लाईट जेमतेम संध्याकाळ झाल्यावर तेसुद्धा रात्री नऊ पर्यंत चालू असे. त्यानंतर सगळ्या वाड्याचा लाईट बंद.! अभ्यास करणारी पोरं मग कंदीलावर अभ्यास करत असत अरे आमका पोरगा कंदीलावर अभ्यास करून मोठा झाला… असं काही नाही सगळीच पोर कंदीलावर अभ्यास करत होती. मुन्सिपालटीच्या दिव्यावर म्हणावं तर त्याच्यात संध्याकाळी एक माणूस तेल घालून जायचा त्या तेलावर तो दिवा किती वेळ जळणार मग तेही दिवे मालवून जायचे. अशी ही दिव्याची दिव्य कथा! त्यामुळे सकाळी नळावर भांडण नाही झाल असा दिवस नव्हता अर्थात ती भांडण तात्कालीक असायची. त्याचवेळी संडासला रांगा लागलेल्या. तीन-चार बिराडात एक बाथरूम कॉमन… सगळ्यांची आंघोळीची घाई… भांड्याचा खणखणाट संपेपर्यंत… धुण्याचा धपधपात चालू व्हायचा…

त्यानंतर बटर विकणारी माणसं ओरडत यायची सकाळची ही चहा बटरची सोय झाली की मग एखादा उसsssळ असे ओरडत यायचा. आम्ही मुस्लिम गल्लीत राहत असल्यामुळे म्हणजे काळी मशीद भागात… सहा वाजताच गल्लीत असलेले थोबडे आणि अण्णाप्पा व्हट्टेते चे दुकान उघडून ती मंडळी तयार असायची. थोबड्यांचे दुकान आमच्या वाड्याच्या खालीच असल्यामुळे दुकानाचा एक दरवाजा वाड्याच्या बाहेर आणि दुसरा दरवाजा वाड्यात असा उघडत असे. त्याच्या शेजारीच त्यांच्या दोन खोल्या कधी कधी थोबडे मामाला मदत करायला आम्ही वाड्यातली पोरं जात असू कारण सकाळी गडबड असायची ना सकाळच गिऱ्हाईक आणि वस्तू ठरलेल्या… “मामा दोन बाई छाप दो(म्हणजे चहा पुड्या), एकाने की मसूर डाळ, एक आने का तेल, दो पैसे के फल्या म्हणजे भाजक्या शेंगा, दो पैसे की शक्कर, दो पैसे की मसाला पुडी और चार आणे का जवारी का पीठ”… सगळी यादी थोबडे मामांना तोंडपाठ असायची त्यांचे हात वेगाने काम करायचे मदतीला आम्ही असायचोच एवढ्या कमी पैशात त्या गरीब माणसाची सकाळ भागत होती… हे मला आता विचार करताना लक्षात येतं.!

ही लगबग संपेपर्यंत वाडा थोडा शांत झालेला असायचा एखाद्या घरचा सकाळी सहा वाजता बॅटरीवर लावलेला सकाळचा रेडिओ त्याच्यामुळे अख्ख्या वाड्याची सुरुवात बिस्मिल्ला खानच्या शहानाईने व्हायची… सुधा नरवणे बातम्या देत आहेत… या आवाजाने घरातल्या आया पोरा सोरांना उठायच्या, “उठा रे सुधाताई आल्या सात वाजले” अर्थात आळशी राहिलेल गदळ त्यावेळेला उठायच. चहाचे सुगंध आणि कपबशाच्या मधुर आवाजांचा किणकिणाटात उषःकाल संपलेला असायचा आणि घराघरातून स्टोव्हचे शेगड्यांचे आवाज यायचे. खमंग फोडण्याचे वास तुरीची डाळ आणि भात शिजल्याचा वेगळाच वास ती भाताची रटरट. तो फोडणीचा तडतडाट आणि खमंग वास… आसमंतात भरून राहायचा.. आणि गंध आणि नाद यांच्या आवाजाची जुगलबंदी कानाला सुख द्यायची. पाठोपाठ धपाधपा भाकरी बडवल्याचा आवाज..

कुठेतरी पोरांच पाठांतर. कविता वाचन कुठेतरी पूजेच्या घंटा.. कुठेतरी आरती.. आणि पोरग अभ्यास करीत नाही ऐकत नाही रट्टे खाऊन ओरडण्याचे व्रात्य पोरांचे आवाज. वाड्याच्या प्रत्येक घरात वेगवेगळे काम चालू असायचे. मग शाळेला जायची गडबड पोर सर्व जेवण करून शाळेला निघाली कि अकरा वाजता सुधा जोशी.. कामगार सभेच्या कार्यक्रमाला हजर..! पोरं शाळेला पळाली कि आया जरा मुक्तपणे… दत्त दिगंबर दैवत माझे किंवा असावे घर ते आपले छान किंवा कौसल्याचा राम बाई अशा माणिक बाईंच्या आवाजात गुंगून जायच्या. भाजी फारशी दारावर येत नसे कारण आमच्या गल्लीतच भाजीचे छोटे मार्केट होतं कधीतरी एखादा शेतकरी बैलगाडीवर मेथीच्या पेंड्या घेऊन येत असे आणि दहा नव्या पैशाला एक पेंडी याप्रमाणे तो मेथी विकून गाडी रिकामी करूनच जायचा. त्याचा आवाजाच भारी… “महागाईत सस्ताईची कमाल 10 पैसे 10 पैसे “असे मोठ्या आवाजात ओरडून तो भाजी विकायचा. मध्येच दहीवाला दहीsss म्हणून ओरडून जायचाआणि सकाळचे आवाज संपायचे.

पुरुष मंडळी गिरणीमध्ये.. पोरं शाळेत.. मग बायका मंडळींचच राज्य… त्या बिचाऱ्या सगळ आवरून विश्रांती घेत तोवर सकाळच्या शाळेत गेलेली पोरं परत यायची त्यांची उस्तवारी करायची… थोड्या आडव्या पडल्या की त्यांचं दुपारी निवडण टिपण सुरू कारण त्या काळातल येणार धान्य निवडलेलं नसायचं… तांदळात गारेचे खडे असायचे… ज्वारी गव्हात खडे असायचे… मोहरी तर विचारूच नका.! आता कसं सगळं स्वच्छ निवडलेले मिळते, अगदी रेडी टू कुक! तेव्हा फक्त घरातली बाई रेडी टू कुक असायची.

दुपारचे आवाज वेगळेच असायचे दुपारी बर्फ गोळा.. बुड्डी का बाल… काळी मैना… ए कुल्फी एक डहाळे किंवा काय घोंगडीला रेवड भरायची कायssss असे आवाज करीत तांबड पागोटे आणि खांद्यावर घोंगड आणि हातात लोकरीची टकळी फिरवत रेवड वाला यायचा यायचा(रेवड म्हणजे घोंगड्याच्या टोकाच्या बाजूला घातलेली वीण त्यामुळे त्याचं धागे सुटू नयेत)… त्याबरोबर बोहारणीचा एक आवाज असायचा “काय हाय का जुने कापडं… ” असा टिपेला गेलेला आवाज असायचा मग बाया बापड्यांची तिच्याभोवती गर्दी एक तास मनोरंजन…! जुन्या कपड्यावर केलेल्या खरेदीचा आनंद! त्याच वेळेला खाली.. दिल्ली का लाल किल्ला देखो… आग्रे का ताजमहाल देखो.. असे टाळाचा नाद करीत सिनेमा दाखवणारा माणूस यायचा त्याच्या त्या तिपाईवर एक यंत्र असायचं.. वरच्या बाजूला एक बाहुली… त्याने दोर्या आवळल्या कि ती बाहुली नाचायची समोरच्या डब्याचे झाकण काढून पोरं सिनेमा बघायची… सिनेमा कसला एका पैशात चार-पाच चित्र दाखवायचा मजा होती…

पण चार वाजता गिरणीचा भोंगा व्हायचा कामाला गेलेली माणसं परत येईतो गाव हळूहळू थकत गेलेल असायचं! घरोघरी कंदीलाच्या काचा पुसून संध्याकाळची तयारी व्हायची तुळशी वृंदावनाजवळ दिवे लावायचे. काही घरात आरती व्हायची… काही घरात शुभंकरोती.. वाड्यात खेळणाऱ्या पोरांचे आवाज हळूहळू बंद व्हायचे! रस्त्यावरती मंद प्रकाश… प्रकाशाचा झगमगाट नसल्यामुळे सारा दिवस मिटत आल्यासारखा भासायचा. तोच एका लाकडी ट्रेमध्ये आलेपाक च्या वड्या आणि ढणढण जळणारा दिवा घेऊन ए आले पाक वाला आलेपा ssssकअसे ओरडत एक आलेपाक वाला यायचा आणि हलकेच तो त्या धुरात नाहीसा व्हायचा. तो शेवटचा विक्रेता. बुधवार असेल तर वाड्यातल्या एकमेव कुठल्यातरी रेडिओवर बिनाका गीतमाला ऐकायला मात्र चढाओढ असायची. कुठलं गाणं कुठल्या पायदान वर यायचे याची चर्चा असायची त्या एकमेव घराला.. ” काकू रेडिओचा आवाज थोडा मोठा ठेवा ना “… अशी प्रेमळ सूचनाही केली जायची. साडेआठ वाजताच मशिदीतली अजान व्हायची मग नमाज… नऊ पर्यंत सगळे खाऊन पिऊन अंथरुणावर जायचे नऊच्या दरम्यान सगळे दिवे मालवले जायचे कुठेतरी एखाद्या घरात चिमणी किंवा कंदील लागलेला असायचा कुठल्यातरी घरातून लहान लेकराला झोपवण्यासाठीचा अंगाईचा आवाज, जवळच्या मठातून टाळाचे, भजनाचे, आवाज यायचे.! रस्त्यावरची रहदारी केव्हाच बंद झालेली असायची. रिक्षा गावात नव्हत्या एखाद दुसरी मोटार,… चार दोन टांगे त्यांच्या घोड्याचा टापाचा आवाज… सायकलच्या घंटेची टिंग टिंग… या पलीकडे रस्त्यावर आवाज नव्हते! मग सारा शहर शांत व्हायचं आणि आनंदाने निद्रा देवीच्या आधीन व्हायचे… रात्री क्वचित रस्त्यावर एखाद्या दारुड्याची वेडी वाकडी चाल आणि बरळणं ऐकू यायचं एखाद्या घरात नवरा बायकोला बदडून काढायचा आणि तीही त्याला ठोकायची कारण तो त्यानंतर दारू पिऊन आलेला असायचा एवढे गोड आवाज संपले की दिवस संपला…!

– – – आवाज की दुनिया पूर्णपणे निद्रिस्त व्हायची गिरणगावची सारी दारिद्र्य दुःख दैना त्या परमेश्वराला हात जोडून सांगितली की तो दिवस संपवून जाई आणि सार शहर उद्याच्या आशेच्या किरणाची… पक्षांच्या चिवचिवाटाचीआणि पुनः त्याच आवाजाची वाट पाहत शांत झोपी जायचं आणि मधेच कधीतरी एखाद्या कुत्र्याच केकाटणे चालू राहायचं… रात्रीच्या त्या निरव शांततेचा शेवट रात्री बारा वाजता गस्त घालायला येणाऱ्या रामोशाच्या आवाजाने व्हायचा. तो ओरडायचा जागते रहो ssssजागते रहो ssssआणि गंमत म्हणजे त्या वेळेला सार शहर निद्रा देवीच्या आधीन गेलेल असायचं…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”How are you??” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “How are you??” ☆ संध्या बेडेकर ☆

“How are you??“

किती साधा आणि अगदी सहज विचारला जाणारा प्रश्न?

  • कशा आहात?
  • काय म्हणताय?

 याच अर्थाचे अनेक प्रश्न.

कोणी ओळखीचे भेटल्यावर सहजच विचारल्या जाणारा पहिला प्रश्न. गप्पांच्या सुरवातीचा प्रश्न…

त्याला साजेशी उत्तर…

  • अगदी मस्त,
  • मजेत 
  • I am fine. ,
  • I am doing good,

अशी, generally उत्तर आपल्याला ऐकायला मिळतात. चेहर्यावर हलकेसे स्मित पण दिसते. तरच तर उत्तर आणि चेहर्यावरचे भाव मॅच होतील. नाही का?

काल माझ्या मैत्रीणीच्या आईला आजींना केअर सेंटर मध्ये भेटायला गेले.

Wheel chair वर बसवून एका नर्सने त्यांना लिफ्टमधून खाली हाॅलमध्ये आणले होते. समोर वाहता रस्ता आहे, त्यामुळे संध्याकाळचा वेळेस पेशंटस येथे आणतात. दिवसभर खोलीत गेल्यामुळे त्यांनाही बाहेर चांगले वाटते.

इतर पेशेंट्ना भेटायला येणार्यांशी पण गप्पा होतात.

तेथेच आमच्या सोसायटीच्या Mrs Sharma retired english प्रोफेसर येथे admit आहेत हे मला माहित होत. त्या समोरच दिसल्या. मी विचारल,…

How are you Mam?

Oh! I am fine, doing good, All the doctors and nurses are taking very good care of us. May be in a month or two, I will be kack to my home.

मी त्यांच्या साठी आणलेली फळ त्यांना दिली आणि तेथेच बेंचवर बसून आजीं बरोबर गप्पा मारत होते.

आजींना विचारल? कशा आहात?

आजी हळुच हसल्या. म्हणाल्या…

अग! बघ सध्या हे अस आहे. परावलंबी जीवन जगण चालू आहे. कोणीतरी बसवणार, उठवणार, घेऊन येणार, घेऊन जाणार.

अग! पण यालाही नशीब लागत बर. आता या परिस्थितीत दुसरा उपाय नव्हताच. घरी एकटी राहणे शक्य नव्हतेच. बर आता अनघाचा (मुलीचा) विचार करणे पण आवश्यक आहे. बरेच उपाय/ पर्याय विचार करून, आमलात आणून झाले. मला फक्त माझाच विचार करून चालणार नव्हत. सारासार विचार करून हे option मला पटल. अग! आता केंव्हा आणि कधी डोॅक्टर ची गरज पडेल सांगता येत नाही. पाय अधु झाल्यापासून मला मदतीची गरज लागतेच. आयुष्यात परिस्थितीप्रमाणे नेहमीच तडजोड करत आलोय. नाही का? ही पण अशीच एक तडजोड आहे बघ.

अनघा चा विचार करण ही गरजेचेच आहे तिच्या जीवाची घालमेल कळते मला.

तिची मुल आता 10, वी 12 ला आहेत. तिची नोकरी, घर, मुल सर्वच बघायच. मीच हा option google वर search केला. आणि मी येथे रहायला आले.

आजी म्हणाल्या…

चल मी तुला माझी खोली दाखवते.

खोलीत एक writing table, एक लहान music system, पेन स्टंड, एक फोन holder, room freshner, coloured pencils, drawing book for seniors, family photo, देवाचा फोटो, मैत्रीणींचा गृप फोटो होता. काही पुस्तक ठेवली होती.

म्हणाल्या…

हा बघ माझा संसार. हा IPAD मी नवीन घेतला. सध्या मी on line गीता शिकतेय.

Thank God! पायात शक्ति राहीली नाही, पण डोक मात्र जागेवर आहे.

मला खूप कौतुक वाटल आजींच.

अग! शेजारच्या खोलीत माझ्याच वयाच्या सुमनताई आहेत. झोपूनच असतात. मी मधून मधून त्यांच्याजवळ जाऊन बसते. भजन म्हणते, एखादी गोष्ट वाचून दाखवते. माझा पण वेळ चांगला जातो.

बरोबर आहे…

खुश रहने के तरीके सोचने पडते है। तकलीफे तो खुदही हमें ढूंढ लेती हैं।

 तितक्यात अनघा आलीच. आईला छान भेटली, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. जेवली का? झोप लागली का? थोडी विचारपूस झाली. दोन पुस्तक दिली.

अनघा मला म्हणाली झाल्या का गप्पा तुमच्या? अग! आईचे drawing book बघीतलेस का तू? अग! आमची आई म्हणजे चित्रकारच आहे बघ. काय सुंदर कलर्स भरले बघ.

क्षणभर आई मुलीच्या नात्याची अदलाबदल झाली की काय? असच वाटल मला. अनघाने आईच्या डोक्याला तेल लावल. माॅलीश केली. वेणी घातली. तिच्यासाठी आणलेल्या वस्तू जागेवर ठेवल्या. शेजारच्या सुमन काकूंना भेटून आली.

आजी म्हणाल्या,… अग! आता मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, तिथे लक्ष दे. मी ठीक आहे. आणि फोनवर बोलू की..

थोड्या वेळाने आम्ही दोघी घरी यायला निघालो.

खाली Mrs Sharma ची मुलगी मिनी भेटली. Mrs Sharma तिला म्हणत होत्या, मला घरी घेऊन चल. मला नाही रहायच इथे.

बर! ठीक आहे. डोॅक्टर ने परमिशन दिली की जाऊ आपण घरी. मिनी म्हणाली.

अक्षरशः Mrs Sharma रडतच होत्या.

आम्ही तीघी बरोबरच बाहेर पडलो.

मी मिनी, अनघाच्या चेहर्यावरचे भाव निरखत होते, त्यांच्या मनातील घालमेल समजायचा प्रयत्न करत होते. एक पाय इथे थांब म्हणत होता तर दुसरा पाय घरांकडे जाण्याची घाई करत होता. तिथे नवरा मुल वाट बघत होती.

Past, Present आणि Future चा ताळमेळ बसवायचा त्यांचा प्रयत्न म्हणजे तारेवरची कसरतच. दोघींच्या मनात वेगळच विचार असतील. नाही का?

मिनी म्हणाली…  It is very difficult rather not possible to take care of her at home. 

अनघा म्हणाली,…

Old age is difficult. It totally depends on how they react / respond to it. 

खरय…

It is not bad things happen to good people, I think bad things hapen to everyone, It is the way they respond to situation / problem, make them good people. 

आता घरी गेल्यावर दोघी दुसर बटन on करून दुसरी जबाबदारी पूर्ण करणार.

आज अनघा आणि मिनी आपापल्या आयांचे आणि मुलांचे पालक आहेत. दोन्ही जबाबदार्या जाणून आहेत. प्रत्त्येकाच्या प्रवासात मदत करतायेत.

राहून राहून दोन्हीं आजींची 

How are you?

विचारल्यावर त्यांची उत्तरे मला आठवत होती.

आपली माणस दिसली की आवाज, मनातले भाव, उत्तर सगळच बदलत.

शारिरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती / attitude महत्वाचा. येथे बाई- माणूस, शिकलेली – अशिक्षित याच काहीही देणघेण नसत.

हे प्रत्येकाची सहनशक्ती, समज, acceptance to reality यावर अवलंबून असत.

खरय…

The hardest walk in life is to walk alone. once you accept and understand the reality, it becomes easier. It makes you strong.  

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares