पैसे देऊन वस्तू व काही प्रमाणात सेवा विकत मिळण्याचं ठिकाण असंच बाजार या बद्दल सांगता येईल. पण तरीही वेगवेगळा अर्थ बाजार या शब्दात असतो. ज्या वस्तू पैसे देऊन उघडपणे मिळतात व जिथे व्यवहार सरळ, व सचोटिने होतात असे कितीतरी बाजार आहेत.
भाजी बाजार, सराफ बाजार, मासळी बाजार, धान्य बाजार, कापड बाजार, अजूनही काही प्रमाणात बर्याच ठिकाणी भरला जाणारा आठवडे बाजार असे नेहमीचे व सगळ्यांना माहित असणारे अनेेक बाजार आहेत. या बाजारात मिळणार्या वस्तूंचे भाव सगळ्यांसाठी, सगळ्यावेळी सारखेच असतात अस नाही.
पण शाळेत वर्गावर शिक्षक येण्याआधी आमचा वाढलेला गोंधळ, गोंगाट ऐकून शिक्षक आल्यावर म्हणायचे, काय बाजार भरवला आहे. याचा अर्थ बाजार म्हणजे गोंधळ, गोंगाट, आणि बेशिस्तपणा असाच असायचा.
गुरांचा बाजार पण असतो. नावावरुन या बाजाराच स्वरूप काय असेल ते लक्षात येतच. पण निवडणूक झाल्यानंतर मात्र काहीवेळा वारंवार घोडेबाजार हा शब्द वापरला जातो. तेव्हा मात्र शब्द जरी घोडेबाजार असा असला तरी तो वापरतांना त्यात घोड्याचा नाहीतर कोणाचा उल्लेख असतो हे सहज लक्षात येतं. पण तो शब्द उघडपणे वापरला जातो. आणि नकळत आपण प्राण्यांच्या रांगेत एका बुध्दीजीवी समजल्या जाणाऱ्या प्राण्याला बसवतो. एकिकडे बुध्दीमुळेच आपल्यात व प्राण्यात भेद आहेत हे सांगतो. आणि दुसरीकडे या घोडेबाजाराचा उल्लेख करत परत बुध्दीवरच शंका घेतो. एखाद्याला समजत नसेल तर त्याला गाढव म्हंणण समजून घेउ. पण…
या शिवाय ‘बाजार’ नावाचा एक चित्रपट पण काढला होता. यात काय दाखवलं होत ते सांगणार नाही, पण बाजार हा शब्द फक्त चांगल्या, किंवा फक्त वाईट गोष्टींसाठीच वापरला जातो अस नाही. तर त्यावेळी भावना कोणत्या असतात त्यावरून चांगल का वाईट हे ठरवाव लागतं. आता चोरबाजारही असतो. पण तिथे वस्तू विकत घेणारे चोरच असतात अस नाही. शेअर बाजार पण आहे. याबद्दल सांगायची गरज आहे असही नाही.
शारिरीक दुखणं, अपघात, डाॅक्टर, हाॅॅस्पिटल, ऑपरेशन या गोष्टींची देखील आता काहीप्रमाणात सवय झाली आहे. पण आता अशा ठिकाणी देखील पाॅलीसी आहे का? … अशी विचारणा पहिल्यांदा होतेच. हा विचारण्याचा हेतू वाईटच असतो अस नाही. पण काहिवेळा याचा अनुभव चांगला सुध्दा नसतो. अशा पाॅलीसी देणारे अनेक आहेत. पण यापैकी एकाचा पाॅलीसी बाजार असाच उल्लेख करतात. आणि मग खरच बाजार या शब्दाबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार मनात येतातच.
या सगळ्या बाजाराचा विचार मनात आला तो सध्या सुरु असलेली सिलेंडरच्या काळ्याबाजाराच्या चर्चेवरून. वरचे सगळे बाजार हे दिसतात, खूपदा त्यांची ठिकाणही ठरलेली असतात. पण काळाबाजार हा असा बाजार आहे जो असतो, भरतो पण दिसत नाही. किंवा दिसणार नाही याचीच दक्षता या बाजारात घेतली जाते. हा प्रत्येकवेळी एकाच गोष्टीचा, एकाच ठिकाणी, एकाच वेळी नसतो. परिस्थिती आणि काळ यानुसार याची सगळी गणितं बदलतात. स्वस्त दरात पुरवठा होणारं धान्य. खतं, ज्या गोष्टी अनधिकृतपणे विकल्या जातात अशा गोष्टी. अशा सगळ्या गोष्टींचा मग काळाबाजार भरतो.
या शिवाय सिनेसृष्टीला माया बाजार अस म्हणणारे आहेत. याची पण अनेक कारणं असतील. शिवाय भंगार बाजार, कोंबडी बाजार असेही बाजार असतात. पण सगळ्या बद्दल लिहिल तर शब्दांचा बाजार भरवला अस वाटेल.
बाजार या शब्दामुळे विचारांचा बाजार भरला होता. तो थोडा थोडा कमी करतोय, बाकी काही नाही.
☆ सूरज : एका सुरवंटाचा प्रवास ☆ श्री मकरंद पिंपुटकर☆
(Metamorphosis – a journey of a caterpillar …)
तुम्ही कधी सुरवंट पाहिला आहे का हो? दिसायला ओबडधोबड आणि काटेरी असतो तो. चुकून जरी हात लागला ना तर काटे चांगलेच टोचतात त्याचे. पण मग हा सुरवंट प्रवासाला निघतो, स्वतःला बदलण्यासाठी तो कोशात जातो आणि एक सुंदर फुलपाखरू होऊन बाहेर येतो.
बोर्डीतल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आमच्या मेहता कॉलेजमध्ये २००५ साली असेच एक सुरवंट आले होते – सूरज नावाचं. BSc बायोटेक्नॉलॉजीला प्रवेश घेतला होता त्याने. कदाचित ॲडमिशनच्या पहिल्या यादीत त्याचं नाव नव्हतेही. आला तेव्हाचा सूरज काही फारसा बोलका होता असं आठवत नाही. बहुधा सुरुवातीचे काही दिवस तो एकंदरीत कॉलेजच्या माहोलला ॲडजस्ट होत होता.
एकदा रुळल्यावर मात्र सूरज बोलू लागला आणि तो इतका की “बाबा रे शांत हो” असं वारंवार म्हणायची पाळी यायची.
मूर्तीमंत विद्रोही वृत्तीचा अति आदर्शवादी असा सूरज होता. कॉलेजची बायोटेकची तिसरीच बॅच होती. प्रयोगशाळेत काही उपकरणं नसली किंवा एखादा प्रयोग नीट झाला नाही किंवा काही गोष्टी शिकवायला आम्ही चालढकल केली की सूरजचा तीळपापड व्हायचा.
हेच का शिकवलं नाही, इतकंच का शिकवलं, अमूक रेफरन्स पुस्तकं का नाहीत अशी सरबत्ती व्हायची. आणि याच्यामुळे जास्तीचं शिकायला लागतं म्हणून वर्गमित्रही नाराजच असायचे त्याच्यावर.
दुसऱ्या तिसऱ्या वर्षी मात्र हा मुलगा बदलू लागला, बदलतच गेला. म्हणजे तो शांत झाला, टीका करण्याचा बंद झाला असे नाही पण आता सकारात्मक टीका आली, अडचण सांगून झाली की लगेचच ” आपण असं करून बघू या का ” असा solution देणारा प्रश्नही पाठोपाठ येऊ लागला.
” पहिल्या वर्षाच्या शेवटीशेवटी मी जाम वैतागलो होतो. ” सूरज सांगत होता. ” माझ्या भुणभुणीने शिक्षकांची मी डोकेदुखी होतो, व विद्यार्थ्यांच्यातही माझे कोणी मित्र नव्हते. मी खरंतर सेकंड ईअरला पालघर कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेलो होतो. पण तिथल्या मॅडमने मला मार्ग दाखवला. इकडे ॲडमिशन का घ्यायची आहे हे ऐकून घेतल्यावर त्या म्हणाल्या की खरा चॅलेंज तिथेच राहून शिक्षकांचे तुझ्याबद्दलचे मत बदलण्यात आहे, त्याच वर्गातल्या मुलांशी मैत्री करण्यात आहे. ” मग मी हे चॅलेंज म्हणून स्वीकारले, माझ्यात थोडासा बदल घडवला आणि फरक तुम्हाला दिसतोच आहे. “
खऱ्या अर्थाने सूरज खुलला तो डिपार्टमेंटला tissue culture च्या झालेल्या workshop च्या वेळी. २०-३० मुलांपैकी जेव्हा याच्या एकट्याच्याच explant ला कोंब आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. पण असे क्षण वगळता त्याचा रांगडेपणा अजूनही नको त्या वेळेला डोकं वर काढेल अशी सार्थ भीती आम्हाला सतत वाटत रहायची.
सोसायटीचे सेक्रेटरी एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या वकिल मॅडमना बोर्डीसारख्या ग्रामीण भागातील संस्थेचे कॉलेज दाखवायला घेऊन आले होते. आपली मुलं आळशी आहेत, ती विचार करत नाहीत, नुसती घोकंपट्टी करतात, application करीत नाहीत असा काहीसा टीकात्मक सूर त्यांनी लावला. मॅडमने critical thinking वर जोर देत न्यूटनचे उदाहरण दिले. त्याच्या डोक्यावर सफरचंद पडल्यावर त्याने critical thinking वापरले आणि इतिहास घडला.
सूरजने हे ऐकून हात वर केला आणि बायोटेकच्या सर्व प्राध्यापकांच्या पोटात एकसमयवच्छेदेकरून मोठ्ठा गोळा आला – हा बाबा आता काय तारे तोडणार?
” मॅडम, न्यूटन जर आमच्या पाड्यावर – वस्तीवर जन्मला असता आणि जर आमच्यासारखाच जर भुकेलेला असता आणि त्याच्या जर डोक्यात असे फळ पडले ना, तर तो ते खाली का पडले असा विचार करत बसला नसता. त्याने ते फळ आधी खाऊन टाकलं असतं. रिकाम्या पोटी critical thinking सुचत नाही, मॅडम. “
सूरज प्रकाशझोतात आला होता. त्याचा स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती व स्पष्टवक्तेपणा मॅडमना भावला. सोसायटीने दिलेला पुच्छगुच्छ त्यांनी सूरजला भेट केला.
सूरजबद्दल आणखी माहिती कळत गेली. त्याचे वडिल तलासरीजवळ सरकारी कर्मचारी होते. सूरजला शिष्यवृत्ती / फी माफीही मिळू शकणार होती, पण सूरजचा बायोटेकला प्रवेश घेण्याचा विचार त्याच्या वडिलांना लहान तोंडी मोठा घास वाटत होता. आपण एका छोट्या गावातून आलो आहोत, आपण अशी मोठी स्वप्नं पाहू नयेत. तू शेतकी कॉलेजला ॲडमिशन घे, तू म्हणशील तिथे मी सही करतो. पण हे असं निसर्गाच्या विरूध्द जाणाऱ्या बायोटेक फियोटेकला जाणार असशील तर मी काही सही करणार नाही. आपला मुलगा मोठा होतोय, त्याला दात आहेत पण त्याच्यासाठी आपल्याकडे चणे नाहीत याची त्यांना खंत होती.
बोर्डीला असताना ” आई, मी इतका शिकणार आहे की पुढे जाऊन शास्त्रज्ञ बनणार आहे. ” असं सूरजने आईला सांगितले आणि त्या माऊलीची झोप उडाली. असं प्रवाहाविरुद्ध वेगळं काही केलंस तर तुला पगार काय मिळणार आणि तुझं पोट तू कसं भरणार – तिला प्रश्न पडला.
सूरज जवळजवळ वर्षभर डहाणूला (बोर्डीपासून १५ किलोमीटरवर) आदिवासी हॉस्टेलला राहिला. फीचे पैसे उभे करायला तो चक्क एका बारमध्ये नोकरी करत होता. हे कळल्यावर त्याच्या एका प्राध्यापकांनी त्याला शिक्षण – फीसाठी पैसे दिले व अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले.
दुसऱ्या वर्षी तो रहायला बोर्डीला आला – त्याच्या दोन वर्गमित्रांबरोबर. गावातील मुलांना असलेल्या न्यूनगंडाने ते आपल्यातील गुणांना न्याय देऊ शकत नाहीत हा छाप त्याला पुसायचा होता. त्या मित्रांना चालताबोलता ज्ञानकोश सोबतीला मिळाला होता. याची फलश्रुती म्हणून हे दोघेही सोबती चांगल्या मार्कांनी पास झाले व मार्गी लागले.
सूरज BSc झाला. ६६% गुण मिळवून. पण त्यापेक्षा कौतुकाची गोष्ट म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत तो भारतात सहाव्वा आला होता. ही गोष्टही आम्हाला नंतर गंमतीशीर रीत्या कळली.
JNU entrance clear झाल्यावरही कुठे जायचं, कसं रहायचं, कसा निभाव लागणार त्याची खात्री वाटत नसल्याने सूरजने मुंबईच्या रूईया कॉलेजला analytical science ला MSc साठी form भरला होता. गोखले सोसायटीने थोडे फीचे पैसे उभे केले होते, थोडे डिपार्टमेंटने. आणि अशात रूईया च्या HOD चा मला फोन आला, ” मकरंद, तुझ्या सूरजचा ॲडमिशन फॉर्म मी फाडून टाकलाय. ” आम्ही सर्व सुन्न.
HOD धनश्री मॅडम सांगत होत्या. ” अरे, रूईयात JNU entrance ला पहिला आलेला मुलगा आहे ६१ rank चा आणि तो जगभर पेढे वाटत सुटलाय. तुझा मुलगा सहावा आलाय. भारतभरातील JNU च्या वीस केंद्रांपैकी कुठल्याही कॉलेजला आमच्यापेक्षा जास्त चांगलं infrastructure असेल, शेवटी centrally funded institutes आहेत बाबा त्या. मी सूरजला माझ्याकडे ॲडमिशन घेऊ देणार नाही”
सूरज शिष्यवृत्ती मिळवून गोवा विद्यापीठात गेला. MSc झाल्यावर पठ्ठ्याने PhD करण्यासाठी दोन दोन शिष्यवृत्ती मिळवल्या. आता मात्र वडिलांचा राग विरोध मावळला आणि सूरज दिल्ली स्थित प्रतिष्ठित अशा NII National Institute of Immunology त मायकेल जॅक्सनला झालेल्या vitiligo या कोडाच्या उपायावर PhD करू लागला. आज डॉक्टर सूरज युरोपमध्ये पोस्ट डॉक्टोरल फेलो आहेत.
अजूनही त्याची बोर्डीशी, आमच्यासारख्या जुन्या खोडांशी जोडलेली नाळ कायम आहे.
आतल्या धगधगत्या आगीला त्याने ज्ञान संपादनाकडे वळवलं. नुसती वैगुण्यं काढण्यापेक्षा तो उत्तरं शोधू लागला. सुदैवाने अजूनही तो तसाच आहे – रांगडा, unsophisticated, someone who calls a spade a spade. पण त्या सुरवंटाचं आता छान फुलपाखरू झालं आहे.
आणि या सुंदर प्रवासाचे आम्ही थोड्या कालावधीसाठी का होईना सोबती आणि साक्षीदार होतो याचा आम्हाला असीम आनंद आहे.
बऱ्याच दिवसात एका मित्राशी फोनवर बोलणं झालं नव्हतं म्हणून विचार केला आज वेळ आहे तर फोन करावा. पलीकडे रिंग वाजली आणि लेडीज आवाज आला –
हॅलो कोण बोलतायं आपण
मी : नमस्कार, मी करंदीकर बोलतोय. शर्माजी कुठे बाहेर गेलेत का.
तिकडून : नाही, ते घरीच आहेत पण सध्या ते फेसबुकवर आहेत.
मी : म्हणजे! मग फोन तुम्ही कसा काय घेतला
तिकडून : रोज सकाळचा नाश्ता झाला की ते दोन तास फेसबुकवर असतात. आणि त्यावेळेत कोणाचाही फोन घ्यायचा नाही म्हणून कॉल फॉरवर्डिंग करता माझा नंबर दिलेला असतो. म्हणून फोन माझ्या फोनवर येतो.
तिकडून : ते फेसबुक वरून उठले, की तुमचा फोन येऊन गेल्याचे त्यांना सांगते.
मी ठिक आहे म्हटले, बाय-बाय केले आणि फोन बंद झाला.
आणखीन एका मित्राला फोन लावला आणि तो पण फेसबुक वरच होता.
विचार केला, एका मैत्रीणीला फोन लावावा, ती नक्कीच फेसबुक वर नसणार.
फोन लावला आणि तिकडून पुरुषी आवाज आला..
तिकडून : हॅलो कोण बोलताय आपण?
मी : नमस्कार, मी करंदीकर बोलतोय. छाया मॅडम आहेत का?
तिकडून : आहेत, पण आता त्या फेसबूक वर आहेत. अजून दोन एक तास तरी त्या फेसबुक वरून बाहेर येणार नाहीत. हा त्यांचा रोजचा शेड्यूल असतो. बाहेर आल्या की त्यांना तुमचा फोन आल्याचे सांगतो.
मी थोडे बोललो आणि धन्यवाद म्हणून फोन बंद केला.
विचार केला की आता अशा मित्राला फोन लावावा की जो स्वतः फेसबूक वर असला आणि कॉल फॉरवर्ड त्याच्या बायकोकडे गेला, तर त्याच्या बायकोशी पण बोलता येईल, कारण त्या पण चांगल्या ओळखीच्या आहेत.
मी फोन लावला रिंग वाजली आणि तिकडून एकदम तरुण माणसाचा आवाज आला –
हॅलो कोण बोलताय आपण?
मी : मी करंदीकर बोलतोय, सुरेश जी आहेत का.
तिकडून : आहेत पण आता ते फेसबुक वर आहेत
आणि या वेळेत ते कोणाचाही कॉल घेत नाहीत.
मी : त्यांच्या मिसेस ना फोन देता येईल का?
तिकडून : सॉरी सर, त्या म्हणजे आई पण आता फेसबुक वर आहे. ती पण यावेळी कोणाचे फोन घेत नाही. मी सुरेशजींचा मुलगा बोलतोय.
माझं वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे मी घरीच आहे. दोघांनी त्यांचे फोन कॉल फॉरवर्ड वर माझा नंबर दिला आहे.
मी : दोघंही दोन तीन तास फेसबुकवर म्हणजे सकाळच्या वेळी घरात कामाचा खोळंबा होत असेल
तिकडून : नाही नाही, सगळ्या कामांना मावशी आहेत. आणि ते दोघं फेसबुक वर असले, की घरात तेवढीच शांती असते. माझी बायको पण रिलॅक्स असते.
मी दोघांनाही तुमचा फोन आल्याचे सांगतो.
मी मुलाशी त्याच्या ऑफिस बद्दल / कामाबद्दल थोडी चौकशी केली, ‘हॅव अ नाईस डे’ असे म्हणून फोन बंद केला.
— — विचार केला, अरे सगळे फेसबुक वर आहेत आणि आपण फेसबुकच्या बाहेर आहोत हे काही बरोबर नाही.
मी लगेच माझ्या मोबाईलवर कॉल फॉरवर्ड करता बायकोचा नंबर टाकला आणि फेसबूकमय झालो.
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५७ आणि ५८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ५७ – –
जगीं होइजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥
अर्थ :भक्ताने सतत रामनाम घेऊन या जगात धन्य व्हावे. नुसते नामस्मरण करण्यापेक्षा क्रिया म्हणजे कृतीने, भक्तीने सातत्याने उपासना करावी. मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका न येऊ देता, उदासीनपणे (म्हणजे आजूबाजूच्या घटनांचा मनावर परिणाम न होऊ देता) मोकळ्या मनाने रामनामाची उपासना करावी आणि या जगात भक्त म्हणून धन्य व्हावे.
विवेचन : या आधीच्या दहा श्लोकांमध्ये समर्थांनी आदर्श भक्त कसा असावा, त्याची लक्षणे सांगितली आणि त्यावरून साधकांना देखील आपण कसे असावे याचा बोध होतो. पण त्या मार्गाने जायचे कसे किंवा त्यासाठी काय करायचे याचा उपाय ते या श्लोकात आपल्याला सांगत आहेत.
आधीचे श्लोक वाचून जर आपल्याला समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सर्वोत्तम भक्त व्हावेसे वाटले तर समर्थांचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. परंतु असे भक्त होण्यासाठी संस्कारांची आणि प्रयत्नांची गरज असते. लहानपणापासूनच संस्काराचे महत्त्व असते. ओल्या मातीला आकार देणे सोपे असते. म्हणून मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे आणि प्रत्यक्ष आपल्या वागणुकीतून त्यांच्यासमोर चांगल्या वागण्याचा आदर्श ठेवणे या गोष्टी संस्कारात येतात.
त्याचप्रमाणे समर्थांनी सांगितलेला भक्त होण्यासाठी देखील संस्काराची मनाला गरज असते. आपले मन सतत विषयाकडे ओढ घेत असते. त्यामुळे मनाला जाणीवपूर्वक भगवंताचे स्मरण, त्याची उपासना करण्याची सवय लावून घ्यावी लागते. हे एक प्रकारचे संस्कारच असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात सामान्य माणसाला देवात सुद्धा विषय दिसतात. परंतु संतांना विषयात सुद्धा देव दिसतो.
संतांजवळ प्रत्येक गोष्टीत देव पाहण्याची जी दृष्टी असते, ती विकसित व्हावी लागते आणि ती संस्कारानेच विकसित होते. म्हणून नामस्मरण, त्यासोबतच कृती आणि उपासना यांच्या माध्यमातून परमेश्वराचे ध्यान करावे. भोवतालच्या परिस्थितीमुळे मनात नाना प्रकारचे विकल्प किंवा शंका येतात. खरा भक्त अशा कोणत्याच गोष्टीकडे लक्ष न देता मनापासून भगवंताची उपासना करतो. म्हणूनच त्याच्यावर उपासनेत मोकळेपणा असतो.
भक्ताने उदासीन असावे असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदासीन हा शब्द इंद्रियांच्या बाबतीत वापरला गेला आहे. म्हणजे आपले मन जे सतत विषयांकडे ओढ घेते ती आवरणे, आणि विषयांच्या बाबतीत विरक्त राहणे म्हणजेच उदासीन राहणे होय. थोडक्यात म्हणजे विषयांच्या बाबतीत आपली वृत्ती उदासीन असली पाहिजे. भोवतालच्या परिस्थितीबद्दल नाही. आपण प्रापंचिक माणसे आहोत म्हणून आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना मग त्या अनुकूल किंवा प्रतिकूल असो, त्या संबंधात आपल्याला त्यांची योग्य ती दखल घेऊन वागावे लागेल. आपले जे कर्तव्य आहे त्याबाबत सजग राहावे लागेल. म्हणजेच त्या बाबतीतली उदासीनता कामाची नाही. आपल्याला प्रपंचात राहून परमार्थ साधायचा आहे. तेव्हा जी उदासीनता आहे ती विकारांबद्दल असावी. अशा प्रकारची सवय एकदा आपल्या मनाला लागली की मग भगवंताची मोकळेपणाने आपण उपासना करू शकू.
आपल्यासारख्या सामान्य माणूस अनेक गोष्टींना आणि विषयांना मनाने बांधला गेलेला असतो आपण जोपर्यंत ही बंधने तोडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भगवंताचे होऊ शकत नाही किंवा त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. मनाने प्रपंचाचा संग टाकावा आणि भगवंताचा संग जोडावा. मग खरोखरच भगवंताचे धन्य भक्त होण्यासाठी आपण पात्र होऊ.
स्वसंवाद ::
१) माझी उपासना “नित्यनेमाने” होते का? मी सुखात किंवा दुःखात असताना सुद्धा?
२) “सामान्य माणसाला देवात विषय दिसतो” माझ्या उपासनेत माझे खरोखर देवाकडे लक्ष असते का की मनात इतर विचारच जास्त असतात?
३) विकारांबद्दल उदासीन आणि कर्तव्याबद्दल सजग या दोन्ही गोष्टींचा समतोल माझ्या जीवनात आहे का?
– – – –
श्लोक क्र. ५८ – – –
नको वासना वीषई वृत्तिरुपें।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें |
सदा राम निष्काम चिंतीत जावा।
मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥
अर्थ :हे मना, भौतिक विषयांमध्ये वृत्तीरूपाने वासनांमध्ये अडकू नकोस. पूर्व पापांमुळेच आपले मन विषय वासनांमध्ये अडकते. म्हणून भगवंताचे नेहमी निष्काम भावाने चिंतन कर आणि मनामध्ये कल्पनेचा लवलेशही ठेवू नकोस.
(पदार्थी- दृश्य/बाह्य विषयांमध्ये, निष्काम- कोणतीही इच्छा न ठेवता, कल्पना-सुखाच्या गोष्टींचे मनोरे रचणे, लेश- मागमूस)
विवेचन :५७ ते ६० या श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला विषयवासनेचा त्याग करण्याबद्दल सांगत आहेत. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो हे आपण मागील श्लोकांमध्ये पाहिले आहे. या श्लोकात म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की विषयांमध्ये वृत्ती रूपाने आपली वासना अडकता कामा नये. या दृश्य किंवा भौतिक जगात आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो, त्यामध्ये आपले मन अडकते. ही सवय पूर्वपापामुळे लागते असे समर्थ सांगतात. हे पूर्वपाप म्हणजे पूर्व संचित संस्कार असे म्हणता येईल. हे संस्कार किंवा वृत्ती केवळ एका जन्माची नसून अनेक जन्मांची असते. त्यातूनच असे वागण्याची बुद्धी होते. यावर उपाय म्हणून निष्कामपणे रामाचे चिंतन करावे आणि विषयवासनांची कल्पना देखील मनामध्ये अजिबात उरू देता कामा नये.
वस् धातूपासून वासना हा शब्द आला आहे. वस् म्हणजे राहणे किंवा स्थिर होणे. आपले मन सतत इंद्रियांमध्ये म्हणजेच विषयांमध्ये राहते आणि सवयीने ते तेथेच स्थिर होते. म्हणून त्याला आपण वासना असे नाव देतो. स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध यांच्या सहाय्याने इंद्रियां मार्फत आपण विषय सेवन करीत असतो. थोडक्यात वासना म्हणजे हवेपण! आपल्याला जोपर्यंत हे हवे, ते हवे असे वाटत असते तोपर्यंत आपली चित्त त्या त्या विषयांमध्ये गुंतलेले असते.
वृत्ती, कामना आणि वासना असा प्रवास आपण बाह्य जगतातील वस्तूंसाठी करीत असतो. आपले मन अतिशय चंचल आहे. या मनावर वारंवार वेगवेगळ्या विषयांचे तरंग उठतात. असे अनेक तरंग जेव्हा तयार होतात, तेव्हा त्यातून त्या विषयाबद्दलची कामना म्हणजेच इच्छा निर्माण होते. ही कामना जेव्हा तीव्र होते तेव्हा तिचे रूपांतर वासनेमध्ये होते. हा वृत्ती, कामना आणि वासनेपर्यंतचा प्रवास माणसाला त्यातून बाहेर पडू देत नाही आणि शेवटी अध:पतनाकडे घेऊन जातो.
माणूस एकदा वासनेच्या अधीन झाला की त्याला दुसरे काही सुचत नाही. तो त्या सवयीचा गुलाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टीचे समर्थन करू लागतो. धूम्रपान किंवा मद्यपान करणारे त्या गोष्टींचे समर्थन करीत असतात असे आपण अनेकदा पाहतो. म्हणजे त्यांना त्यात आपण काही वावगे करीत आहोत असे वाटतच नाही. राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकात सुधाकर दारूच्या सवयीचा गुलाम होतो आणि त्यात त्याला काही वाटेनासे होते. परंतु नंतर ही दारू त्याच्या संसाराची धूळधाण करते. प्रख्यात गायक दीनानाथ मंगेशकर यांना देखील मदिरेचे व्यसन लागले होते आणि अति व्यसनामुळे त्यांचे अकाली निधन झाले. मुले लहान असताना संसार उघड्यावर टाकून निघून जावे लागले.
माणूस वृद्ध झाला, इंद्रिये थकली तरी देखील माणूस त्यातून बाहेर पडत नाही. शेवटपर्यंत विषय वासना त्याला त्रास देतच असतात. एखादी गोष्ट प्रत्यक्षात मिळाली नाही की मग तो कल्पनेच्या राज्यात रमतो, कल्पनेचे मनोरथ करू लागतो. आजच्या काळात तर टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्या आभासी गोष्टी कल्पनेच्या राज्यात माणसाला गुंतवून ठेवतात.
मग या सर्व गोष्टीतून सुटका करून घेण्याचा काही उपाय आहे का? निश्चितच आहे! समर्थ म्हणतात, “आपण निष्कामपणे रामाची चिंतन करावे, त्याचे ध्यान, मनन, चिंतन, पूजा करावी. हे सर्व संस्कार आहेत. त्यातून हळूहळू वाईट विषयांची कामना कमी होत जाते, मनामध्ये सद्वासना निर्माण होतात आणि शेवटी निर्वासना अवस्था निर्माण होऊन साधक मोक्षापर्यंत पोहोचतो. असा त्याचा प्रवास वाईटाकडून चांगल्याकडे होऊ शकतो.
पण इथे समर्थ आपल्याला निष्काम भक्ती करायला सांगतात हे लक्षात घ्यायला हवे. आपण सामान्य माणसे परमेश्वराची भक्ती देखील काहीतरी हेतू किंवा इच्छा मनात धरून करीत असतो. त्यामुळे आपली वासना शेवटपर्यंत सुटत नाही. हे ईश्वरा, मला अन्य काही नको. फक्त तू हवा आहेस अशा प्रकारची आर्तता जेव्हा भक्तीत येईल, तेव्हा आपली वाटचाल मोक्षमार्गाकडे व्हायला सुरुवात होईल.
या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा अरे अरे ज्ञाना झालासी पावन हा अभंग आठवतो. त्यात ते म्हणतात,
जेव्हा साधकाची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होऊ लागते, तेव्हा त्याच्या वृत्तीची निवृत्ती होऊ लागते. ती देखील कशी? तर आपणा सकट म्हणजे त्याचा मी पणा, अहंकार सगळे काही नष्ट होते आणि संपूर्ण वैकुंठच त्याला विष्णूरूप दिसू लागते. कामना, वासना सर्वच गोष्टी नाहीशा होतात. कल्पनेचा लवलेश देखील राहत नाही आणि मग आपोआपच जन्ममृत्यूच्या चक्रातून देखील त्याची सुटका होते.
स्वसंवाद ::
१) माझ्या मनात वारंवार येणाऱ्या कोणत्या इच्छा हळूहळू वासनांमध्ये रूपांतरित होत आहेत?
२) “मला हे हवेच आहे” असे वाटते तेव्हा मी त्यामागचा विचार करतो का?
३) मी एखादी गोष्ट मिळाली नाही तर अस्वस्थ होतो का, की शांत राहू शकतो?
४) माझ्या आयुष्यात कल्पनाविलास (दिवास्वप्ने / आभासी जग) किती प्रमाणात आहे?
५) मी दररोज किमान काही वेळ निष्काम भावाने नामस्मरण किंवा चिंतन करतो का?
☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १०. – पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई ☆ प्रा.भारती जोगी ☆
पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई
“मी सगुणाबाई! नाही ना ओळख लागंत? नाव ही नाही आठवंत ना? बरोबरंच आहे ना… इतिहासाच्या कुठल्या पानात गडप झाले, जमा झाले, हरवले कुणास ठाऊक!
आता मीच देते ओळख करून…
मी… सगुणाबाई! थोरल्या बाजीरावांची धाकटी सून… जनार्दन रावांची पत्नी. सुंदर, गोरीपान आणि विशेष म्हणजे… शिकलेली!
सातारच्या भिडे सावकारांची मी कन्या, वयाच्या ५व्या वर्षी १० वर्षाच्या जनार्दन रावांची पत्नी बनून पेशव्यांच्या घरात आले. आणि जाणवले की बाई गं, मला तर इथे अनेक एकाहून एक अशा मातब्बर सासू आणि जावांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचयं!
गंमत वाटली ना, अस्तिवाचं टिकवणं तेव्हाही होतं… हे वाचून! पण खरंयं ते!
पण हाय रे दैवा! अस्तित्व टिकवून ठेवीन म्हणंत असतांनाच… अचानक कर्नाटक च्या मोहिमे वरून परततांना जनार्दन रावांना टायफॉइड झाला, आणि मी १०व्या वर्षीच विधवा झाले हो! *बालविधवा* हा शिक्का कपाळावर, आणि लाल आळवण अंगावर! सौभाग्य म्हणजे काय? हे देखील कळले नव्हते, आणि बालविधवा म्हणजे काय? हे तरी कुठे माहिती होतं??
तुम्हाला सांगते… सासर-माहेर दोन्हींची श्रीमंती… पण… सौभाग्याची श्रीमंती हिरावून नेली ना नियतीने! नव-याचा केवळ १४ व्या वर्षी मृत्यू… त्यामुळे एकही पराक्रम नावावर नाही… त्यामुळे मी अभिमानाने मिरवावं असं कुठलंही पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता ही नाही. जगायला कुठलं कारण ही नाही. मग काय… मरेपर्यंत जगावं लागणार, म्हणून मग विरक्ती ची वाट धरली, बालवयातच! हो! कारण… बालविधवा म्हणजे… *समिधा*!! मूक, मौन, शांत जळंत राहणा-या! त्यांत कुठला आलायं ना ओलावा?
पण एक आधार मिळाला, वेळ घालवायला… *ग्रंथवाचन*! वेगवेगळ्या ठिकाणाहून ग्रंथ मागविले,
दुर्मिळ ग्रंथ संग्रह केला. भरपूर वाचन केले. पोथी-पुराणे ही वाचली. तीर्थक्षेत्री च्या तीर्थ यात्रा ही केल्या.
तुम्हाला एक गंमत सांगते… इतिहासाने माझी नोंद नाही घेतली, पण माझ्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाची मात्र नोंद आहे… कदाचित… अ क्षर असा अ क्षय साठा… म्हणून तरला की काय??
असंच वैराग्य युक्त, वैराण आयुष्य आणि वय सरंत होतं… वर्षा-वर्षानी पुढं-पुढं!! कुटुंबातील अनेक मृत्यू या डोळ्यांनी बघितले, पचवले… मायाळू सासू काशीबाई, पित्यासमान नानासाहेब, भावासमान सदाशिव राव, नारायण राव… एक ना अनेक!
पण तुम्हाला सांगते… माधवराव आणि रमाबाईंचं आकस्मिक जाणं… नाही पेलवलं गेलं हो! हा चटका नाही साहता आला. मग खूपच एकटेपण आलं… प्रकृती बिघडली… खालावतच गेली… आणि साता-याजवळ वडूज गावी, वाड्यात… कायमची विसावले मी!
आणि… आणि… पेशवाईतील…
*पहिली बालविधवा*… इतिहास जमा झाली… एक समिधा निमाली!!
सकाळच्या गडबडीत नेमकी ट्रॉली बाहेर ओढताना अडकली… धड ना आत, धड ना बाहेर… वैतागच… नेमके चहा साखरेचे डबे आत अडकले…! आतल्याआत चडफड नुसती… आता सुतार बोलवावा लागणार… एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार… नाहीतर बजेट वाढवून या कशा मोडीत काढायला झाल्यात, याची गाथा वाचणार. आजकाल मॉड्यूलर किचन कसं जोरात चाललंय… माझी इकडे कामं आणि तिकडं कामं. सगळं क्षणात मनात आणि डोळ्यांसमोरुन तरळूनच गेलं.
जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कड्कट् आवाज काढलाच तिने. लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई.. कडेच्या पट्टीवर… सरकेल… तात्पुरते तरी निभावेल…! चांगली आयडिया… मी पट्कन तेलाचं बोट फिरवलं… दोन मिनिटांनी ट्रॉली मऊसरपणे आतबाहेर डोकावली… कसलं भारी काम झालं एकदम! मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद देत म्हणलं, “बरं झालं बाई, वेळेत आलीस… नाहीतर… चहा पावडर विकत आणावी लागली असती. “ती हसली…
“वंगण लागतंय ताई, थेंबभरच पुरतं, पण लागतं कधीमधी आणि वेळेवर! ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा क्षणात! “
खरंच, वंगण लागतं…!
फक्त मशीन, वस्तूंनाच नाही तर माणसालाही, अगदी त्याच्या देहाइतकंच मनालाही, अगदी नात्यांनाही वंगण अवश्यक आहे.
चार चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचार वाचनाचं, सूरमैफिलींचं, श्रद्धा भक्तीचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कलाकल्पनेचं. जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येऊन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पूर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं.
लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची. प्यायचं म्हणजे प्यायचं… कितीही आदळापट केली तरी ती तिचा हेका सोडायची नाही. पोट आतड्याचं ते वंगणच आहे… महिना- दोन महिन्याने एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं… आणि तुम्ही मग आबरचबर हादडायला मोकळे… कानात तेल, नाकात दोन थेंब तूप, डोक्यावर बुदलीभर कोमट तेल… शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्षे आमच्या पिढीने खरं तर अनुभवला. रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यायची… शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं.
खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रूपात आपली सोबत करत राहतं… आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं, कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला आहे.
जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपण- गंज मिटवणं आणि पूर्वस्थितीत आणून सोडणं.. हा (स्व)भावच आहे वंगणाचा!
क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळूवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याशी शांतपणे बोलणं… हे ही नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचे वंगणच आहे.
वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं… जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपण उरेल… आणि कोरडेपण क्षणात भस्मसात होऊन जातं! त्यामुळे जगण्यात येणारे हर एक प्रकारचे वंगण जपणे, प्रसंगी ते वापरणे फार आवश्यक आहे. निर्जीव मशीन सामुग्रीला जिथं त्याचं महत्त्व समजतं, तिथं तुमच्या आमच्यासारख्या जिवांनी ते जाणलंच पाहिजे.. त्याचं जतन केलंच पाहिजे… तर जगणं लयीत.. सुसह्य… होत राहील!
* * * *
लेखिका : विदुला जोगळेकर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
लोकव्रत प्रकाशन, पुणे यांनी मुगल-ए- आजम हे डॉक्टर मीना श्रीवास्तव यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे .आपण बरेचदा बघतो की एखाद्या कथेवर, नाटकावर, कादंबरीवर आधारित चित्रपट बनतो.पण इथे उलटे झालेले आहे की, एका चित्रपटांवर पुस्तक निघालेले आहे. चित्रपटाचे लेखिकेने अत्यंत चोखंदळ रसिका प्रमाणे परीक्षण केलेले आहे . यात नुसतं चित्रपट परीक्षण नाही तर ते कलाकारांनी सादर केलेल्या कलेचे परीक्षण तसेच या चित्रपटाचे परीक्षण करताना त्या योगाने आलेले चांगल्या चित्रपटाचे ही संदर्भ त्या देतात. त्यामुळे तसं पाहिलं तर चित्रपट रसिकांसाठी हे पुस्तक म्हणजे खजिना आहे.
डॉ. मीना श्रीवास्तव
तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार, कोल्हापूर हा पुरस्कार या पुस्तकांसाठी मीनाताईंना मिळालेला आहे, ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.
डॉक्टर मीना श्रीवास्तव यांचे हे पहिले मराठी पुस्तक आहे, त्यांनी स्वतः लिहिले असे. तसे पाहिले तर त्यांनी’ महर्षी वाल्मिकी’ तसेच ‘रामायण ‘या दोन विश्वास देशपांडे लिखित मराठी पुस्तकांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद केलेले आहे. हे वाचताना त्यांचे इंग्रजी आणि हिंदी भाषेवरचे प्रभुत्व तर वाखाणण्याजोगंआहेच. परंतु या पुस्तकातून त्यांची सुंदर मराठी ही दिसून येते. ही मराठी लिहीत असताना त्यांनी त्या चित्रपटाच्या अनुषंगाने येणारे हिंदी, उर्दू आणि फारसी भाषेतील शब्दांचा सढळ हाताने वापर केला आहे. कारण की ‘मुगल- ए- आझम हा चित्रपट मुगल दरबारातील राजपुत्र सलिम आणि नर्तिका अनारकली यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे .त्यामुळे त्या लिखाणांमध्ये बरेच उर्दू शब्द येतात आणि ते त्या ठिकाणी चपखल बसतात. कुठेही ते वाचताना रसभंग होत नाही .या उलट त्यांनी व्यक्त केलेल्या भावना किंवा विचार त्या शब्दांनी अजून ठळकपणे मांडल्या जातात. याची कथाही त्या सुरसपणे मांडतात.
हे पुस्तक वाचत असताना त्यांना चित्रपट दिग्दर्शक आसिफ याविषयी असलेला आदर तसेच मधुबाला विषयी असलेले जिव्हाळा आणि प्रेम व्यक्त होते .या पुस्तकातील त्यांचे एक वाक्य कायम लक्षात राहण्यासारखे आहे. कारण की ‘मधुबाला सौंदर्याची पुतळी म्हणून सगळेजण मानतात परंतु तिच्या सौंदर्या बरोबरच तिचा सशक्त आणि समृद्ध करणारा अभिनय आहे’ हे पण लेखिकेनेचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मधुबालानं बरेचदा आजारी असतांना ऑक्सिजन सिलेंडर लावून चित्रपटात काम केलं, यावरून त्या चित्रपटाविषयी एकंदरच कामाविषयी तिचे असलेले समर्पण दिसून येतं. त्यामुळे हा चित्रपट असो आणि या चित्रपटाचे संपूर्ण पडद्यावरचे आणि पडद्यामागच्या टीमची मेहनत, त्यांनी केलेले परिश्रम म्हणजे हे पुस्तक.
दिग्दर्शक आसिफ याच्या कार्याला ,मेहनतीला, दिग्दर्शनाला,गुणग्राहकतेला तसेच चांगुलपणाचा ध्यास, जे जे करेल ते ते चांगलंच करणार या, उत्तमोतमाचा ध्यास घेणा-या त्याच्या वृत्तीला सलाम !संवाद लेखन असो, गायिका असो दिग्दर्शन असो ,फोटोग्राफी असो या सर्व बाबतीत उत्तमतेचा त्याने ध्यास घेतला होता आणि त्या संदर्भातली सगळे किस्से लेखिकेने खूप छानपणे उलगडून दाखवलेले आहे. खरोखरचे युद्ध वाटावे म्हणून सैनिकांची तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही के कृष्ण मेंनन यांच्या परवानगीने घेतलेली मदत, हा प्रकार ही काहीतरी वेगळाच आहे. तसेच ‘प्यार किया तो डरना क्या!’ च्या वेळेचा सेट चित्रपट संपल्यानंतर गुरुदत्तने तो सेट भाड्याने घेतला आणि असाही त्याचा उपयोग केला .दोन वर्ष त्या शिशमहलच्या सेटचं प्रदर्शन चालत राहिलं. तब्बल ७७ आठवडे तो चित्रपट मराठा रंगमंदिर, मुंबई मध्ये चालला .त्या काळात सर्वात जास्त कमाई केलेला तो चित्रपट होता .हा चित्रपट जसां आसिफचं वर्षानुवर्ष उराशी बाळगलेले स्वप्न होते. तसेच हा चित्रपट हे लेखिकेच्या भावाविश्वाचे स्वप्न होते आणि या चित्रपटाविषयी त्याचं दिग्दर्शन, कला, गाणी, गायक, प्रत्येक अंगाविषयी, त्या चित्रपटाविषयी वृत्तपत्रात, मासिकात आलेल्या वृत्तांताविषयी लेखिकेने भरभरून लिहिलेले आहे. आणि आसिफने जसा हा चित्रपट सुंदरपणे मांडला तसंच सुंदरपणे लेखिकेने या चित्रपटाचे समीक्षणही केलेले आहे, सर्व अंगाने `!
अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. एकूणच मुगल -ए-आजम व त्या संदर्भातील गोष्टींचा लेखिकेने असा उलगडा केलेला आहे की जवळपास ५० वर्षाचा भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास डोळ्यासमोर येतो. अक्षय लेखन, चांगली गाणी, चांगले चित्रपट, चांगले दिग्दर्शक, चांगले कलाकार यांचा संदर्भही आपल्याला मिळतो. चित्रपटातील जागा, चित्रपटाची नजाकत काय आहे? त्याची सौंदर्यस्थळे कशी ओळखावीत, यांची समज हे पुस्तक देतं.त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला एक रसिक, चित्रपट समीक्षक बनवू शकते. लेखिकेच्या या रसिक वृत्तीला सलाम.
परिचय : मोहिनी हेडावू
सहाय्यक राज्यकर आयुक्त, राज्य वस्तू व सेवा कार्यालय, नागपूर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी के चुनिन्दा साहित्य को हम अपने प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करते रहते हैं। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं।)
(ई-अभिव्यक्ति में “दस्तावेज़” श्रृंखला के माध्यम से अमूल्य और ऐतिहासिक तथ्यों को सहेजने का प्रयास है। दस्तावेज़ में ऐसे ऐतिहासिक दस्तावेजों को स्थान देने में आप सभी का सहयोग अपेक्षित है। इस शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है मारिशस से आदरणीय श्री रामदेव धुरंधर जी द्वारा उनके ८० वें जन्मदिवस के अगले दिन अपने प्रिय मित्रो और सहृदय पाठकों को धन्यवाद ज्ञापन स्वरुप सन्देश और हमारे लिए भविष्य का एक ऐतिहासिक दस्तावेज़ “कृतज्ञता ज्ञापन तथा मेरी अपनी कुछ बातें“। उनके जन्मदिवस के अवसर पर )
यह विशेष प्रसन्नता का विषय है कि इस शुभ अवसर पर सर्व भाषा ट्रस्ट की ओर से उनकी बहुमूल्य साहित्य-साधना को समेटती ‘रामदेव धुरंधर रचनावली’ (12 खंडों में) पाठकों के लिए उपलब्ध कराई जा रही है। हमें विश्वास है कि यह रचनावली हिंदी साहित्य-जगत के लिए एक महत्त्वपूर्ण धरोहर सिद्ध होगी। इसका संपादन डॉ दीपक पाण्डेय एवं डॉ नूतन पाण्डेय जी ने किया है।
ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से मॉरिशस के लोकप्रिय एवं वरिष्ठ साहित्यकार आदरणीय रामदेव धुरंधर जी को उनके 80वें जन्मदिन पर हार्दिक शुभकामनाएँ एवं अभिनंदन 💐🙏
☆ दस्तावेज़ # ३१ – मारिशस से ~ कृतज्ञता ज्ञापन तथा मेरी अपनी कुछ बातें☆ श्री रामदेव धुरंधर ☆
मेरी जन्म तिथि 11 जून 2026 के अवसर पर बहुत से मित्रों ने मेरे प्रति मंगलकामना के शब्द प्रेषित किये हैं। मैंने हर नाम को ध्यान से पढ़ने के साथ संलग्न शब्दों को भी पढ़ा और आत्मसात तो निश्चित ही किया। मेरे हिन्दी लेखन के प्रति मित्रों का यह आत्मीय अवदान है। आज यह आलेख लिखते वक्त मुझे थोड़ा विस्मय हो रहा है मैंने कल अस्सी पार कर दी। मैं अब बार — बार लिखता हूँ मेरे लिए यह उम्र बहुत है। यह अनुभव करने से ही मैं ऐसा लिखता हूँ।
फेसबुक ने एक सुविधा की नींव स्थापित कर दी है और मैं भारतेतर हिन्दी लेखक इससे कुछ — कुछ लाभ अर्जित कर लेता हूँ। अन्यथा पहले तो मैं पत्रों से काम लेता था। पत्र के आने — जाने में तो महीने लग जाते थे। पर आज समय परिवर्तित हुआ है। इन दिनों मैं फेसबुक में नित्य एक रचना डाल देता हूँ और उसकी लिखित प्रतिक्रिया मुझे प्राप्त हो जाती है। हाथ से लिखे जाने और पांडुलिपि डाक से भेजने के दिनों भी मैंने बहुत ही लिखा। पर इधर के दिनों में एक तो लेखन में रफ्तार आई और फेसबुक के आधार पर हजारों मित्रों से तारतम्य बनाने का संयोग हाथ लगा है। मैं मानता हूँ इस सुविधा ने मुझे लेखन में कुछ कदम आगे तो बढ़ाया ही है। तमाम — तमाम लेखक हैं जिनकी ओर मैंने हाथ बढ़ाया और उन्होंने स्वीकृति की मुहर से मेरे जेहन में अपने लिए स्थान बना लिया। उन्होंने भी अपनी ओर से मित्रता की पहल की।
मैं धर्मयुग और सारिका के जमाने से लिखा करता था बल्कि हिन्दी जगत में स्थापित होने के लिए यही मेरा आधार हुआ। मैं सरकारी स्कूल में हिन्दी का अध्यापक था। [1970 – 1976 ] मेरी पहली नियुक्ति रोमन कैथोलिक एडड् स्कूल में हुई थी। वहाँ मुझे हिन्दी का उद्धाटन करना था। रोमन कैथोलिक एडड् स्कूल होने से वहाँ अंग्रेजी फ्रेंच के अध्यापक सब के सब क्रिश्चियन थे। मैं अपने को बहुत अजनबी अनुभव करता था, बल्कि वे स्वयं मुझे अजनबी के कगार पर खड़ा देखना पसंद करते थे। यह लगभग क्रिओल इलाका था। भारतीय खून के बहुत से लोग स्वयं आ कर कह जाते थे उनके बच्चे हिन्दी पढ़ना पसंद नहीं करते। यह सुनने पर स्कूल के क्रिश्चियन टीचरों के बीच तो नाच का समा बंध जाता था। आज मॉरिशस के हिन्दी अध्यापक पता नहीं मेरी इन बातों को किस अर्थ में लें। तब के जिन हिन्दी अध्यापकों से आज मुलाकात हो जाती है हम वे अतीती बातें कर लेते हैं। हमारे साथ निश्चित ही यह बात साकार है हमने अपना जंगल काट कर स्वयं अपनी पगडंडी बनायी है।
अपने हिन्दी लेखन को भी मैं इसी वाक्य से जोड़ता हूँ। जंगल हो और मुझे धुन चढ़ गई हो मैं अपनी पगडंडी का निर्माण तो कर ही लूँ।
एक स्कूल से दूसरे स्कूल के लिए मेरा तबादला होता रहता और अवकाश वाली साठ की उम्र मेरे शरीर में दस्तक देने आ जाती। इस वक्त मैं अपनी जीवनी तो न लिख रहा हूँ, लेकिन जरूर अपने जीवन में हिन्दी का अनंत अनुराग समाहित होने की एक तस्वीर की रचना कर रहा हूँ। मैंने जिस स्कूल की पूर्व पँक्तियों में चर्चा की उन्हीं दिनों मुझे नागपुर में [ 1975 ] आयोजित विश्व हिन्दी सम्मेलन में भाग लेने का अवसर मिल गया था। इसका श्रेय मेरे कहानी लेखन को जाता। मैं धर्मयुग और सारिका के माध्यम से कुछ प्रसिद्धि हासिल कर चुका था। उन दिनों तो फोन तक का खास बोलबाला नहीं था। शिक्षा मंत्रालय से अधिकारी यह सूचना मुझे देने मोटर में स्कूल आए थे। उन्हें स्कूल की बही में लिखना था मुझे कितने दिनों की छुट्टी चाहिए। स्कूल की हेड क्रिश्चियन महिला होने से उसने तो इस तरह से जताया था भारत तो उसके लिए एक अपरिचित देश है। उन्हीं दिनों एक क्रिश्चियन महिला टीचर ऑस्ट्रेलिया जा रही थी। उसका पति ऑस्ट्रेलिया में रहता था। उस स्कूल से विदेश जाने वाला तो मैं उस महिला के समकक्ष था, लेकिन स्कूल में मात्र उसके नाम पर पार्टी रखी गई थी। मैंने महिला हेड टीचर को बाध्य किया था भारत से जोड़ कर मेरा नाम लिया जाए।
भारत से लौटने पर मेरे जीवन में ऐसा वक्त आया मेरे लिए फिर से मंत्रालय की ओर से अधिकारी मोटर में स्कूल आए और मुझे ऑफिस में बुला कर सूचित किया गया महात्मा गांधी संस्थान के लिए मेरा तबादला हो रहा है। मैं मंत्री खेर जगतसिंह का तब भी आभारी था और आज भी उनका कर्ज अपने सिर पर मानता हूँ। वे भी नागपुर विश्व हिन्दी सम्मेलन में गए थे। अभिमन्यु अनत तो निश्चित ही वहाँ थे। खेर जगतसिंह ने वहाँ अनत की अद्भुत चर्चा सुनने पर वहीं घोषित कर दिया था महात्मा गांधी संस्थान में वे हिन्दी की गरिमा के लिए अपनी सेवा प्रदान करने जाएँ। अनत प्राइमेरी सरकारी स्कूल में हिन्दी टीचर थे। उनका तबादला क्रीड़ा मंत्रालय के हिन्दी नाट्य विभाग में हो गया था। खेर जगतसिंह का नाम मैं इस वक्त भारतीय भावना के एक महान शख्स के रूप में ले रहा हूँ। उन दिनों वे योजना मंत्री थे। उन्हीं की योजना के तहत महात्मा गांधी संस्थान का निर्माण हुआ था। संस्थान का उद्घाटन भारत की प्रधान मंत्री श्रीमती इंदिरा गांधी के कर कमलों से हुआ था।
मैं जिस चुनाव इलाके से था खेर जगतसिंह यहीं निर्वाचित हुए थे। मैंने पहले भी लिखा इस वक्त दोहरा रहा हूँ नागपुर में हमारी आपसी पहचान हुई थी। उन्होंने वहाँ मेरा नाम सुना और अनत की तरह मेरा भी इस रूप में एक भविष्य निर्धारित कर दिया महात्मा गांधी संस्थान में हिन्दी के लिए कुछ विशेष रचनात्मक सेवा प्रदान करूँ। अनत वहाँ ‘वसंत’ पत्रिका शुरु कर चुके थे। हमारे प्यारे कवि पूजानन्द नेमा उनके साथ कार्यरत थे। मैं वहाँ जुड़ा तो बच्चों की एक पत्रिका की योजना बनी। हम नाम सोच रहे थे। नाम न मिलने से तो हमने हिडिंबा तक उच्चार दिया था। मेरे मुँह से निकला था रिमझिम। यही नाम मान्य हो गया। अभिमन्यु अनत ने संपादकीय में लिखा था रिमझिम नाम रामदेव धुरंधर की ओर से पारित हुआ है। यह अनत की उदारता थी।
मेरी बात इस तरह से है महात्मा गांधी संस्थान में जाने के बाद मेरे लिए वह मेरा एक नया हिन्दी जगत हुआ। कमलेश्वर, धर्मवीर भारती, राजेन्द्र यादव, मनोहर श्याम जाशी, नामवरसिंह, गंगाप्रसाद विमल, चित्रा मुद्गल, उनके पति अवध नारायण, डा. विनय तथा और भी अनेक लेखकों को हमने हिन्दी लेखन कार्यशाला संचालित करने के लिए बुलाया। सचमुच यहाँ लेखक तैयार होते थे। इन भारतीय हिन्दी मनीषियों ने यहाँ के लोगों की जुबानी इनकी कहानी कविता सुनी। इन्होंने सराहा भी और निर्देश भी दिया लेखन को कैसा होना चाहिए। यह मैं सन् 2000 से पहले की बात कर रहा हूँ। उन दिनों के हम सभी तो अवकाश ग्रही हो गए। मुझे पता नहीं इधर के दिनों में महात्मा गांधी संस्थान की ओर से उस तरह की कार्यशाला संचालित करने के लिए भारतीय विद्वानों को बुलाया गया हो।
स्वनामधन्य धर्मवीर भारती के सौजन्य से मैं भारत में कहानीकार के रूप में जाना गया। इसी के समानांतर मेरी निजी बात इस तरह से है मैंने महात्मा गांधी संस्थान में तीस साल तक नौकरी निभाने की प्रक्रिया में वहीं लेखन के कुछ गहरे मर्म का संयोग हासिल किया। अनत और नेमा हम तीनों साहित्य की बात तो करते रहते थे।
महात्मा गांधी संस्थान में हिन्दी की बहुतायत पुस्तकें थीं। इस संस्थान ने मुझे पुस्तकों के रेले – मेले में एक मेक कर दिया और मैं था कि जहाँ तक हो सका खूब पुस्तकें पढ़ना शुरु कर दिया। माटी मटाल, ययाति, मैला आंचल, परती परिकथा, ओशो की तमाम पुस्तकें, प्रेमचंद का साहित्यिक खजाना, मोहन राकेश के नाटक, अज्ञेय, निराला, बाणभट्ट की आत्मकथा, शरतचंद के हिन्दी रूपांतरण उपन्यास तथा मेरे मन के लायक और भी तमाम तमाम कृतियाँ मुझे नसीब होती गईं। मैं पुस्तकों से माला माल जैसी स्थिति में पढ़ने के साथ लेखन का रहस्य सीखने का मानो अपना मंत्र साधता रहा।
इस संदर्भ को मैं फेसबुक आगे भी जारी रखूँगा।
अभी के लिए यह बात कर लूँ बहुत से मित्रों ने मेरे जन्म दिन के अवसर पर लिखा, लेकिन मैं एक — एक को उत्तर कर पाना असंभव सा पा रहा हूँ। अतः बिना शाब्दिक वापसी के वह मेरे पास ही रह जाए। आप लोगों के लिए बस धन्यवाद ही।
कल ऐसा भी हुआ था मित्र राजेश सिंह ने मेरा जन्म दिन मनाने के लिए एक खास व्यवस्था की थी। बहुत से लोग जुड़े थे। राजेश ने मुझे बताया लोगों ने मुझ पर आधारित रचना का पाठ किया। राजेश ने कुछ मिनट के लिए मोबाईल से मुझे कार्यक्रम से जोड़ दिया था। आभार राजेश जी।
कल 11 जून को सर्वभाषा प्रकाशन के श्री केशव मोहन पाण्डेय जी ने ‘रामदेव धुरंधर रचनावली’ के कवर पेज से हिन्दी जगत को अवगत करवा दिया। उन्होंने बहुत सुन्दर बनाया है। मेरे अस्सीवें जन्म दिन के अवसर पर प्रकाशक की ओर से यह अनमोल उपहार रहा। स्वाभाविक है लेखक के साथ प्रकाशन की उसकी अपनी तृषा जुड़ी होती है। लेखक के नाते मैं भी तो इस धारा का एक बेबाक तैराक हुआ करता हूँ।
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
☆ लघुकथा – “राजनीति के कान”☆ श्री कमलेश भारतीय ☆
– मंत्री जी, बड़ा कहर ढाया है ,,,आपने।
– किस मामले में भाई?
– अपने इलाके के एक मास्टर की ट्रांस्फर करके।
– अरे , वह मास्टर? वह तो विरोधी पार्टी के लिए भागदौड़,,,
– क्या कहते हैं हुजूर?
– उस पर यही इल्जाम है।
– ज़रा चल कर कार तक पहुंचने का कष्ट करेंगे?
– क्यों?
– अपनी आंखों से उस मास्टर को देख लीजिए। जो चल कर आप तक तो पहुंच नहीं पाया। बदकिस्मती से उसकी दोनों टांगें बेकार हैं। और भागदौड़ करना उसके बस की बात कहां? जो अपने लिए भागदौड़ नहीं कर सकता, वह किसी के विरोध में क्या भागदौड़ करेगा?
– अच्छा भाई। तुम तो जानते हो कि राजनीति के कान बहुत कच्चे होते हैं और आंखें तो होती ही नहीं। खैर। आपने कहा है तो मैं इस गलती को दुरुस्त करवा दूंगा।
खिसियाए हुए मंत्री जी ने कहा जरूर लेकिन आंखों में कहीं पछतावा नहीं था।