मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. इरावती कर्वे – लेखक – बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ डॉ. इरावती कर्वे – लेखक – बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर

“ए दिनू मी जाते” अशी नवऱ्याला शंभर वर्षापूर्वी हाक मारणारी, थोर समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, चिकित्सक संशोधक, लेखिका, डा.इरावतीबाई कर्वे यांचा ११ ऑगस्ट हा स्मृतीदिन.

महाराष्ट्राला ज्यांचा विसर पडला आहे अशा अनेक विद्वान व्यक्तीपैकी डा.इरावतीबाई कर्वे याही एक आहेत.पुण्याच्या फर्ग्युसन कालेजचे प्राचार्य डा.दिनकर धोंडो कर्वे यांच्या त्या पत्नी व महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्नूषा आहेत.बाईंचा जन्म म्यानमार येथे १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला.वडीलांचे नाव गणेश हरी करमरकर व आईचे नाव भागीरथीबाई होते.वडिल म्यानमरधील एका कंपनीत नोकरी करीत होते.मूळचे हे कुटुंब कोकणातले आहे.त्यांना पाच भाऊ होते.म्यानरमधील इरावती नदीवरुन त्यांचे नाव “इरावती” असे ठेवले.कुटुंबात त्यांना माई म्हणत.विद्यार्थी व मित्रपरिवारात त्यांना आदराने “बाई” असे म्हटले जायचे.

लालसर गोरापान रंग, उंच, धिप्पाड देहयष्टी, रसरसशीत कांती.ठसठशीत कुंकु.घट्ट बुचडा, नऊवारी साडी, निळ्या, निळ्या डोळ्यात चमकणारे प्रचंड बुध्दीचे तेज असे त्यांचे सुंदर व अत्यंत विलोभनीय व्यक्तीमत्व होते.पुण्यातील रस्त्यावरुन १९५२च्या सुमारास भरधाव वेगाने स्कूटर चालवीत डेक्कन कालेजकडे जाणाऱ्या या महान विदूषीकडे अवघे पुणेकर कूतूहलाने व आदराने पाहत असत.

वयाच्या सातव्या वर्षी हुजूरपागा शाळेत त्यांना दाखल केले.आणि मग त्या कायमच्या पुणेकर झाल्या.१९२२ साली त्या मट्रिक झाल्या.१९२६ साली फर्ग्युसन कालेजमधून त्या तत्वज्ञान विषय घेऊन बी.ए.झाल्या.आणि त्याचवर्षी त्यांचा फर्युसन कालजचे प्राध्यापक दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी प्रेमविवाह झाला.१९२८ साली त्या एम.ए.झाल्या.त्याचवर्षी महर्षि कर्व्यांचा विरोध असताना त्या अट्टाहासाने पी.एचडी करण्यासाठी जर्मनीला गेल्या.१९३० साली “मानवी कवटीची अरुप प्रमाणता”(A semetry of human skull) या विषयात त्यांना पी.एचडी मिळाली.तत्कालीन काळात स्त्रिया पदवीधर होणे हेच अवघड होते.बाई तर परदेशात जाऊन पी.एचडी.होऊन आल्या होत्या.पुण्यात त्यावेळी ही अपुर्वाईच होती.काही काळ त्यांनी एसएनडीटी विद्यापीठात कुलसचिव पदावर काम केले.व नंतर त्यांनी डेक्कन कालेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली.संशोधन हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते.त्यामध्ये त्या रमून गेल्या.महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना फर्ग्युसन कालेजचे प्राचार्य रँग्लर र.पु.परांजपे यांचा सहवास लाभला होता.त्यांच्या घरीच त्या राहत होत्या.या विद्वान, ऋषितुल्य गुरुंचे संस्कार बाईंच्या व्यक्तीमत्वात गडदपणे ऊमटले.

संशोधन, चिकित्सा, साहित्य, काव्य यांची अभिरुची त्यांच्या संस्कारात निर्माण झाल्या.संशोधक हा त्यांचा मूळ पिंडच होता.संशोधन करण्यासाठी सारा भारतभर त्या फिरल्या.जगभर प्रवास केला.मानववंशशास्त्र व समाजशास्त्र यामध्ये त्यांनी आयुष्यभर संशोधन केले.अखंड वाचन केले.शंभरहून अधिक संशोधनपर लेख लिहिले.जगभर व्याख्याने दिली.त्यांचे सारे लेखन चिंतनगर्भ आहे.चिकित्सा करतानाही अत्यंत सहृदयपणे विवेचन त्यांनी केले आहे.हिंदू समाजरचना, हिंदू समाज एक अन्वयार्थ, महाराष्ट्र अँड इटस् पीपल, किनशीप आरगनायझेशान इन इंडिया(नातेदारी संबध)असे पुष्कळ वैचारिक व संशोधनात्मक त्यांनी लेखन केले आहे. Kiniship organization in India या ग्रंथाने त्यांना जगप्रसिध्द किर्ती मिळवून दिली.नात्यासंबधी शब्द, त्यांचा अभ्यास व स्त्रियांच्या प्रश्नासंबधी त्यांचे लेखन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.रुढअर्थाने त्या स्त्रिवादी नाहीत.परंतु त्यांच्या वैचारिक चिंतनातून आपसूकच स्त्रिवादी विचार प्रसवले आहेत.हे त्यांचे हवे तर द्रष्टेपण म्हणता येईल.स्रिया पुरुषाबरोबर समानतेचे हक्क मागतात.इरावतीबाईंनी स्त्रीयांना समानतेचे हक्क काय मागता तर समानतेपेक्षा जास्तच मागा असे सांगितले.त्यांचे सासरे महर्षि कर्वे यांनी स्रियांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढले.परंतु इरावतीबाईंनी महिलासाठी वेगळ्या विद्यापीठाची गरजच नाही असे म्हटले.त्यांना पुरुषांच्याबरोबरीने शिकू द्या असे सांगितले.

इरावतीबाईनी मानवंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्म, संस्कृती याविषयी वैचारिक आणि संशोधनात्मक लेखन केलेच शिवाय त्यांनी जे ललित लेखन केले आहे ते फारच ऊच्च दर्जाचे केले आहे.महाराष्ट्र संस्कृती त्यांच्या लेखनात ऊमटली आहे.त्यांच्या वैचारिक लेखनामुळे त्यांचे ललित लेखनही विलक्षण टापटिपीचे व हृदयगंम झाले आहे.”युगांत” मधील व्यक्तीरेखाने त्यांना मराठी साहित्यात अढळ स्थान प्राप्त करुन दिले आहे.महाभारतील गूढ व्यक्तीमत्वाचा शोध त्यांनी मानवंशशास्त्र व समाजशास्त्रीय अनुबंधाने घेतला आहे.हे पुस्तक वाचताना आपण देहभान विसरतो.भोवरा, युगान्त, परिपूर्ती असे पुष्कळसे ललित लेखन त्यांनी केले आहे.परिपूर्ती या पुस्तकात परिपूर्ती या शिर्षकाचा लघुकथेच्या अंगाने जाणारा त्यांचा आत्मलेख आहे.एका समारंभात बाईंची ओळख करुन देताना अमक्याची सून, अमक्याची मुलगी, अमक्याची पत्नी अशी करुन दिली.समारंभ संपला.बाई घरी चालल्या.परंतु त्यांचे मन विलक्षण अस्वस्थ होते, मन सैरभैर झाले होते.त्यांना कसले तरी अपुरेपण जाणवत होते.काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते.याच विचारात त्या घरी चालल्या होत्या.वाटेत मुलांचा खेळ चालला होता.बाईंना पाहताच एक मुलगा मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे! शूः शूः त्या बाई पाहिल्यास का? ती बाई जात आहेत ना? त्या आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का”.एवढ्या गलक्यातून ते वाक्य ऐकताच बाई चपापल्या.त्यांचे डोळे आनंदाने चमकू लागले.आता त्यांना काहीतरी हरवले होते ते गवसले होते.मनाची परिपूर्ती झाली होती.समारंभातील अपूरी ओळख आता पूर्ण झाली होती.” आधीच्या परिचयात प्रतिष्ठा होतीच.”कर्व्याची आई”या शब्दाने प्राणप्रतिष्ठा झाली.

खरेतर बाईनी ही गोष्ट उपहासाने लिहिली होती.स्त्री कितीही कर्तबगार झाली तरी ती कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाची पत्नी अशीच असते, तिला स्वतःची वेगळी ओळख नसते.हे त्यांना सांगायचे होते.परंतु कर्व्याची आई ही त्यांची ओळख त्यांना जीवनाची परिपूर्ती वाटून गेली.

त्यांचे सारे ललित साहित्य असेच अंतर्मुख करणारे आहे.मनाचा तळ ढवळून काढणारे आहे.वैचारिक घुसळण करणारे आहे.एवढ्या विद्वान बाई, इंग्लिश सहीत अनेक पाश्चात्य भाषा अस्खलित बोलणारी पंढरपूरची वारी करते याचे मराठी माणसाला केवढे अप्रुप वाटायचे.अगोदर ऊंच असलेल्या बाई आणखी ऊंच वाटू लागायच्या.प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून घेणारी ही बुध्दीप्रामाण्यवादी, प्रचंड विद्वान बाईं वारीत सामील व्हायच्या.भक्ती आणि ज्ञान याचा केवढा हा मनोज्ञ संगम! विद्वतेची, पांडित्याची भरजरी वस्त्रे बाजुला सारुन फाटक्या तुटक्या, दीन- बापुड्या गरीब वारकऱ्याबरोबर पांडुरंगाच्या ओढीने पंढरीला जाणारी ही पहिलीच भारतीय उच्चविद्याविभूषित विदूषी आहे.बाईंना फक्त ६५ वर्षाचे आयुष्य लाभले.११ आगष्ट १९७० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.परंतु एवढ्या आयुष्यात कोणी शंभर वर्षे जगून होणार नाही एवढे संशोधन व वैचारिक लेखन केले, खूप भ्रमंती केली.खूप व्याख्याने दिली.परदेशात लौकिक मिळविला.शंभर वर्षांपूर्वी स्त्री असल्याचा कोणताही अडसर न मानता विद्वत्तेच्या उंच शिखरावर विराजमान झाल्या.सनातनी पुण्यातल्या भररस्त्यावर भरधाव वेगाने स्कूटर चालवणारी, फर्ग्यूसन कालेजच्या प्राचार्य असलेल्या आपल्या नवऱ्याला “ए दिनू मी जाते रे” अशी एकेरी बोलणारी या महाराष्ट्राच्या विद्वान सुपूत्रीला साष्टांग दंडवत.

लेखक – बी. एस. जाधव 

प्रस्तुती – उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कटू वास्तव – – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

श्री अमोल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कटू वास्तव– – –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं. 

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या.आपण टपरीवर चहा घेऊ.” 

ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा.”

आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉल मध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला. 

तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरिया मध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या. 

५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो. 

 बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते. 

“पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय? ” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्स मध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं. 

पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही. 

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही..! बिल भरून माणसं निघूनही गेली. 

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात..! पराक्रम दाखवण्याच्या नादात एकस्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया..! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात..! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल..

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय?

आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही. 

महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का?

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत.

बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील?

कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही. 

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाइक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे..! रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात?

सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? 

जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही. 

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावायलाच हवा.

*राष्ट्रहित सर्वोपरी* 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ग्रुपमध्ये काय काय साध्य होते…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “ग्रुपमध्ये काय काय साध्य होते…?…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

ग्रूपमध्ये आनंद असतो.

ग्रुपमध्ये उत्साह असतो.

ग्रुपमध्ये प्रोत्साहन मिळतं.

ग्रुपमध्ये जिव्हाळा असतो.

ग्रुपमध्ये एकमेकांची काळजी असते.

ग्रुपमध्ये सुसंवाद साधता येतो.

ग्रुपमध्ये सहकार्य मिळतं.

ग्रुपमध्ये शक्ती मिळते.

ग्रुपमध्ये दिलासा मिळतो.

ग्रुपमध्ये प्रबोधन होतं.

ग्रुपमध्ये आदर मिळतो.

ग्रुपमध्ये प्रेम मिळतं.

ग्रुपमध्ये आपुलकी असते.

ग्रुपमध्ये समन्वय असतो.

ग्रुपमध्ये सामंजस्य असते.

ग्रुपमध्ये मार्गदर्शन मिळतं.

ग्रुपमध्ये समुपदेशन होतं.

ग्रुपमध्ये सांत्वन केलं जातं.

ग्रुपमध्ये सामाजिकीकरण होतं.

ग्रुपमध्ये व्यक्तिमत्व विकास होतो.

ग्रुपमध्ये मनोबल वाढतं.

ग्रुपमध्ये वक्तृत्व विकसित होतं.

ग्रुपमध्ये आपलेपणाची भावना असते.

ग्रुपमध्ये बुद्धीची मशागत होते.

ग्रुपमध्ये अंतःकरण विशाल होतं.

ग्रुपमध्ये एकटेपणा दूर होतो.

ग्रुपमध्ये निराशा दूर होते.

ग्रुपमध्ये स्वयंविश्वास वाढतो.

ग्रुपमध्ये विचार प्रगल्भ होतात.

ग्रुपमध्ये भाषण व संभाषण सुधारते.

ग्रुपमध्ये मानसिक परिवर्तन घडून येतं.

ग्रुपमध्ये बौद्धिक विकास होतो.

ग्रुपमध्ये भावनिक विकास होतो.

ग्रुपमध्ये सकारात्मकता वाढते.

ग्रुपमध्ये संवेदनशीलता वाढते.

ग्रुपमध्ये कौशल्य विकसित होतं.

ग्रुपमध्ये संयम शिकता येतो.

ग्रुपमध्ये ज्ञानवृद्धी होते आणि प्रत्येकाच्या जीवनाला लयबद्धता येऊन शिस्त लागते.

ज्याला ग्रुपचे महत्त्व कळतं तो संघटित होऊन टिकून राहतो आणि कधीतरी व्यक्त होतोच..!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रिती आस ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रिती आस ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

काळे करुनी अंबर 

आस जिवा लावीशी 

तुज टोलवता समीराने 

तोंड तुझे काळे करशी

*

तळ गाठला धरणांनी 

भेगाळली सारी अवनी 

वाट पाहुनी कासकराच्या 

आले बघ नयनी पाणी 

*

आहे वाहन यंदा गर्दभ 

झाड दुगाण्या लवकर 

शांत करुनी धारित्रीला 

भरून काढ सारी कसर

*

नटव लवकर हिरवाईने 

उघड्या बोडक्या सृष्टीला

तृप्त होता सारे चराचर 

देईल आशीर्वाद तुजला

देईल आशीर्वाद तुजला

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ संध्यारंग… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

?संध्यारंग – ? ☆ श्री राहूल लाळे ☆

संध्याकाळच्या आभाळात

केशरी रंग भरला,

अन्

दिवसभराचा प्रवास संपवून

सूर्य क्षितिजाकडे वळला…

 

ढगांच्या कुशीत विसावताना

क्षणभर थांबला तो,

जणू निरोप देताना म्हणाला—

“उद्याही भेटेन पुन्हा! ”

 

रस्त्यावरची धावपळ सुरूच,

वाहनांची गर्दी तशीच,

पण त्या गोंगाटातही

निसर्गाची कमाल दिसली…

 

एक क्षण टिपला कॅमेऱ्याने,

एक क्षण मनात साठला,

मावळता सूर्य सांगून गेला—

“अंत नाही हा…हा तर नव्या पहाटेचा वायदा! ”

© श्री राहुल लाळे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # १५८ ☆ कितना शेष है चलना ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “कितना शेष है चलना” ।)

✍ जय प्रकाश के नवगीत # १५८ ☆

☆ कितना शेष है चलना ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

फिर समय ने हाँक दी

गाड़ी उमर की

और कितना शेष है चलना।

बोझ दिन का उठाए

हम रात भर जागे

स्वप्न आँखों में लिए

बुनते रहे धागे

भोर ने फिर खोल दी

खिड़की ख़बर की

साँझ तक बस स्वयं को छलना।

यादें सब ठहर गईं

आइनों के दर पर

प्रतिबिंबित होता है

चेहरों वाला घर

छतों के झरोखे से

झाँकते शहर की

खुली हुई हर किताब पढ़ना।

रोशनी के पृष्ठ पर

अंधकार व्याप्त

सुलगते हैं हाशिए

संभावना समाप्त

बाँच रही हैं रातें

इबारत सफर की

सूरज का भी तय है ढलना।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Articles ☆ 🌅 THE THREE GOLDEN HOURS ☆ Shri Jagat Singh Bisht ☆


Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

Authored six books on happiness: Cultivating Happiness, Nirvana – The Highest Happiness, Meditate Like the Buddha, Mission Happiness, A Flourishing Life, and The Little Book of HappinessHe served in a bank for thirty-five years and has been propagating happiness and well-being among people for the past twenty years. He is on a mission – Mission Happiness!

🌅 THE THREE GOLDEN HOURS 🌌

Begin your day with yourself, before the world begins to claim you.

There are three hours in the day that can quietly transform the remaining twenty-one.

They are the first three hours of the morning—those precious hours between waking up and getting fully caught up in the demands of the day.

Most of us give these hours away rather cheaply.

We wake up, reach for the mobile phone, check messages, scroll through news, respond to notifications—and before we have even met ourselves, we have entered everybody else’s world.

What if you did something different? 🌿

 What if, for just three hours, you chose to belong to yourself?

These are your Golden Hours. And how you spend them can influence not only your body and mind, but also the quality of the day that follows.

🌄 1. Rise before the world awakens

If possible, wake up early—preferably before sunrise.

There is something wonderfully intimate about being awake when most of the world is still asleep. The air feels fresher, the surroundings quieter, and the mind less crowded.

You don’t have to fight with the day.

You meet the day before it meets you.

Step outside. Go for a gentle walk or jog. Let your feet touch the earth. Allow your body to awaken naturally.

🚶‍♀️ Walk.

🏃‍♂️ Jog.

🌿 Breathe.

🌅 Watch the sunrise.

Don’t hurry. This is not a race.

 It is a rendezvous with life.

 🤸 2. Let your body move

Your body has remained relatively still through the night. Give it the joy of movement.

Stretch. Bend. Twist. Turn. Whirl. Jump.

Do some simple yoga, mobility exercises, Surya Namaskar or whatever form of movement suits your age and fitness.

The purpose is not to become an athlete.

The purpose is to remind every cell of your body: “We are alive!” ✨

Move gently, consciously and joyfully.

🌬️ 3. Breathe as though you have all the time in the world 

Now slow down.

Take a deep, comfortable breath in.

And breathe out slowly.

Again.

And again.

🌬️ Breathe in peace.

Breathe out tension.

Don’t merely breathe mechanically. Feel the breath entering your body. Feel it leaving.

For a few minutes, let your breathing become slow, deep and relaxed.

You may discover something beautiful:

When the breath becomes calm, the mind often begins to follow.

🌳 4. Look at nature. Really look.

How often do you actually look at the world around you?

Not through a camera.

Not through a mobile screen.

With your own eyes.

Look at the trees. 🌳

Listen to the birds. 🐦

Feel the morning breeze. 🍃

Watch the changing colours of the sky. 🌅

Notice the flowers, the clouds, the sunlight and the quiet movement of life.

 For a few moments, simply stand there.

 You may feel that the universe is not something distant and mysterious.

 It is right here—breathing, moving and unfolding around you.

 And when you become still enough to notice it, you may experience something that cannot easily be explained in words:

 bliss, gratitude and a quiet sense of Divine blessing. 🙏

 🧘 5. Sit in silence

After the body has moved and the breath has settled, sit quietly for a while.

Meditate.

You need not make meditation complicated.

Sit comfortably. Close your eyes. Watch your breath. Let thoughts come and go without chasing them.

And, as far as possible, maintain silence.

Silence is not emptiness.

It is space.

Space in which you can hear yourself.

Space in which the mind can settle.

Space in which something deeper within you can be felt.

🕊️ Meditation brings calm.

Silence brings grace.

You may not solve all your problems in meditation.

But you may discover that you don’t have to carry all of them into the morning.

😊 6. Let your first words be smiles

 If you meet people during your morning walk, don’t feel obliged to begin the day with conversation.

 A smile is enough.

 A gentle nod.

A wave of the hand.

A warm glance.

 😊 Sometimes a smile says more than a sentence.

 Protect the peacefulness of the morning.

 There will be plenty of time later for talking, debating, explaining and reacting.

 For now, simply be.

 💧 7. Give your body water

 After your walk and quiet time, drink water.

 A glass—or more according to your needs.

 💧 Let hydration be one of your morning rituals.

 There is no need to turn it into a complicated health prescription. Just make drinking adequate water a simple, conscious part of beginning your day.

 🍋 8. Nourish yourself gently

 If you enjoy it, have a warm cup of ginger, lemon and honey tea.

 🍋🫚🍯

 Sip it slowly.

 Don’t gulp it down while rushing through messages or news.

 Let even your morning drink become a small act of mindfulness.

 📵 9. And now comes the most important rule…

 NO GADGETS.

 Especially no mobile phone.

 📵 No WhatsApp.

📵 No social media.

📵 No breaking news.

📵 No emails.

📵 No endless scrolling.

 Your mind has just emerged from the quiet of sleep.

 Why should the first thing you feed it be somebody else’s opinions, anxieties, arguments, advertisements and notifications?

 Don’t allow the mobile phone to become the first voice you hear each morning.

 Let the first voice be your own.

 Or better still—

 let it be silence. 🕊️

 🍎 10. Have breakfast peacefully

 Finally, sit down for a healthy and balanced breakfast.

 🥣🍎🥛🌾

 Eat slowly.

 Eat mindfully.

 Taste your food.

 If possible, eat without a screen in front of you.

 Breakfast need not be elaborate. What matters is that it nourishes you and is eaten in a peaceful atmosphere.

 Don’t merely feed the body. Nourish the mind while you feed it.

 

 🌞 And then… enter the day

 By now, something subtle may have happened.

 You have moved your body.

You have breathed deeply.

You have witnessed nature.

You have meditated.

You have been silent.

You have smiled.

You have nourished yourself.

And, most importantly, you have not allowed the world to invade your mind at sunrise.

 You step into the rest of the day carrying something precious.

 🌿 The fragrance of the morning.

 It stays with you.

You feel more relaxed.

More peaceful.

More energetic.

More centred.

More positive.

The problems of the day may still be waiting.

The traffic will still be there.

The emails will still arrive.

People will still disagree with you.

Life will still have its surprises.

But you will meet them differently.

Because you have already met yourself.

✨ Your morning is not merely the beginning of your day.

It is the foundation upon which you build your day.

So, tomorrow morning, try something simple.

Wake up early.

 Before the world starts talking to you, listen to yourself.

Before you look at the screen, look at the sky.

Before you respond to messages, respond to your breath.

Before you rush into life, pause and experience life.

Give yourself these three golden hours.

🌅 Walk.

🤸 Move.

🌬️ Breathe.

🌳 Observe.

🧘 Meditate.

🕊️ Be silent.

😊 Smile.

💧 Hydrate.

🍋 Nourish.

📵 Disconnect from gadgets.

🙏 Connect with the Divine.

And then walk into the day—not as someone who is merely awake, but as someone who is alive, peaceful, grateful and fully present.

🌅 Give the first three hours to yourself—and you may find that the rest of the day begins to give something back to you.

 Your morning is a gift.

Don’t exchange it for a screen. 🙏✨

♥ ♥ ♥ ♥

© Jagat Singh Bisht 🪷

Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker

FounderLifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – सीमित ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – सीमित? ?

खुद को सीमित,

उनको विस्तृत करता रहा,

वे प्रहर बरतते,

मैं क्षण संचित करता रहा।

?

© संजय भारद्वाज   

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️  श्रावण साधना संपन्न हुई. अगली साधना की जानकारी आपको शीघ्र ही दी जावेगी। 🕉️ 💥 

आत्मपरिष्कार व ध्यानसाधना भी नियमित रूप से चलेंगे।

हमारा प्रयास है कि महत्वपूर्ण स्तोत्रों का अधिकाधिक प्रसार हो।

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ – मेघमल्हार धुन सावन की, जयजयकार शिव जी की! ☆ डॉ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

☆ आलेख ☆

☆ मेघमल्हार धुन सावन की, जयजयकार शिव जी की! ☆ डॉ. मीना श्रीवास्तव ☆

प्रिय पाठकगण,

सादर प्रणाम!

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ: प्रतिपत्यये ।

जगत: पितरौ वंदे पार्वतीपरमेश्वरौ ।। १ ।।

(भावार्थ – शब्द और अर्थ का सम्यक ज्ञान प्राप्त हो, इसलिए शब्द और अर्थ के समान ही (परस्पर से भिन्न हो कर भी) परस्पर में समाहित रहने वाले, जो अखिल जगत के जनक जननी हैं, ऐसे पार्वती तथा परमेश्वर {शिव} को मैं प्रणाम करता हूँ।)

महाकवि कालिदास के अमर काव्य ‘रघुवंशम् ‘ का प्रारम्भ शिव-पार्वती स्तुति के इसी श्लोक से होता है। जब मेघों से लरजती रिमझिम फुहार धरती पर बरसने को व्याकुल हो, जब इंद्रधनुषी किनारी से सजी, विविध कुसुमों की भीनी भीनी खुशबू में लिपटी बेलबूटी से सजे वस्त्र ओढ़ कर साँवरी सलोनी वसुंधरा आनन्द गीत गुनगुनाने लगे और जब परमेश्वर की असीम कृपा आप पर हर पल वृद्धिंगत होने को तैयार हो तो, समझ लीजिये कि सावन का महीना आपके द्वार पर दस्तक दे रहा है।

अब कृष्णमेघ नई उमंग के साथ आसमान में छा जाते हैं। जरा सी बारिश हुई नहीं कि मेघों से लुका छुपी खेलती सुनहरी धूप की किरणें झांकती हैं । फिर प्रकृति का एक अनुपम दृश्य, इंद्रधनुष आसमान में तन जाता है। उसके सप्त रंग सुहानी आभा बिखेरते हैं समस्त वातावरण में! जब इंद्रधनुष कहे कि मेरी इस सुंदरता का कोई सानी नहीं, तब कोई है जो कारे कारे बदरा को देख अपने पंखों को फैलाकर अपनी नृत्यकला से समस्त प्रकृति को भावविभोर करे एवं कहे, है कोई मेरा सानी रंगों में और नृत्य में? मित्रों, हमें तो मयूर का नृत्य उतना ही लुभाता है, जितने मोरपखा के रंग। ‘छायावाद’ के शीर्ष लेखक सुमित्रानंदन पंत ने उनकी ‘बरसते बादल’ नामक कविता में सावन के शस्य श्यामल रूप का मनमोहक वर्णन किया है, जो कर्णमधुर भी है।

“झम झम झम झम मेघ बरसते हैं सावन के,

छम छम छम गिरतीं बूँदें तरुओं से छन के।

चम चम बिजली चमक रही रे उर में घन के,

थम थम दिन के तम में सपने जगते मन के।”

वर्षा की फेनिल धाराओं को देख कवि का मन ऐसा डोलने लगता है कि, वह बारम्बार सावन के आने की प्रतीक्षा करने लगता है। 

“पकड़ वारि की धार झूलता है मेरा मन,

आओ रे सब मुझे घेर कर गाओ सावन!

इन्द्रधनुष के झूले में झूलें मिल सब जन,

फिर फिर आए जीवन में सावन मन भावन!”

*

उज्जयिन्यां महाकालं ओम्कारम् अमलेश्वरम्॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्।

सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे।

हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥

मित्रों, बारह  ज्योतिर्लिंगों में ही नहीं, बल्कि हर शिवभक्त के प्राणों में बसे देवों के देव महादेव की आराधना करने के लिए सर्वोत्तम ऐसा सावन का महीना भगवान शिव को समर्पित है। जिस मनोरम प्रकृति के हर रूप में ईश्वर का निवास है, वहीं प्रकृति अपने सबसे सुन्दर रूप का शृंगार कर भोलेनाथ की पूजा में तल्लीन हो जाती है। इस माह में चंद्रमा श्रवण नक्षत्र में होते हैं, इसलिए इस महीने को श्रावण या सावन कहा जाने लगा। शास्त्र कहते हैं कि सावन के महीने से भगवन विष्णु चौमासे के लिए योगनिद्रा में चले जाते हैं। इसलिए महादेव सृष्टि का संचालन करने लगते हैं और इस महीने में भूलोक पर आते हैं।

भगवान शिव को सोमनाथ अर्थात सोम (चंद्र के स्वामी) और जलदेव (वर्षा के स्वामी) भी कहा जाता है। जलाभिषेक से सम्बंधित एक प्रचलित पौराणिक कथा के अनुसार, सावन के महीने में समुद्र मंथन के दौरान “हलाहल” नामक विष निकला था। समस्त सृष्टि की रक्षा करने के लिए भगवान शिव ने विष ग्रहण कर लिया था, जिसके कारण उनका गला नीला पड़ गया। तब से वे “नीलकंठ” कहलाए। उस समय उनके गले पर विष का प्रभाव कम करने के लिए देवताओं ने उन्हें जल अर्पित किया था। मुझे तो यहीं प्रतीत होता है कि शिव ऐसे इकलौते अल्पसंतोषी भगवान हैं जो श्रद्धापूर्वक अर्पण किये हुए जल तत्व को ग्रहण कर प्रसन्न होते हैं। भगवान शिव की पूजा-अर्चना करने के लिए सावन के सोमवार को उपवास, उपासना और जलाभिषेक महत्वपूर्ण माने जाते हैं। मान्यता है कि इन दिनों में शिवजी को जलाभिषेक करने से सर्वोत्तम फलप्राप्ति होती है और भक्तों की मनोकामनाएं अवश्य पूरी होती हैं। बेल की पत्तियां और धतूरा भी भोलेनाथ को अतिप्रिय हैं। इस माह के प्रारम्भ से कांवड यात्रा भी प्रारम्भ होती हैं।

श्रावण माह का महत्व इस महीने में आने वाले पूजा अर्चना और त्योहारों के कारण और भी वृद्धिंगत हो जाता है। हर मंगलवार को मंगला गौरी व्रत और श्रावण शुक्ल तृतीया को हरियाली तीज के दिनों में शिव-गौरी को पूजा जाता है। महादेव को प्रसन्न करते करते उनके गले में प्रेम से लिपटे उनके नीलकंठ की शोभा बढ़ाते हुए नागराज वासुकी को कैसे बिसरा दें? इन्होंने ही अमृतमंथन के लिए रस्सी का कार्य किया था। नाग पंचमी का त्यौहार हम इसी सावन में (श्रावण शुक्ल पंचमी) मनाते हैं। देखिये हमारी भारतीय संस्कृति इतनी महान है कि विष उगलने वाले सर्पों को भी हम देवता का दर्जा देकर पूजते हैं। श्रावण पूर्णिमा के दिन मछुआरे सागर को श्रीफल अर्पण कर यह प्रार्थना करते हैं कि वह शान्त रहे। इसी दिन भाई बहन के प्रेम का प्रतीक रक्षाबंधन मनाया जाता है। जन्माष्टमी (श्रावण वद्य अष्टमी) यह कृष्णजन्म का पावन दिवस कृष्णभक्तों के लिए तो आनंदोल्लास का पर्व होता है। हर श्रावण शुक्रवार को किया जाने वाला जरा जीवंतिका पूजन बालकों की मंगल कामना के लिए किया जाता है। इसके आलावा सावन महीने में कामिका एकादशी, सावन पुत्रदा एकादशी, हरियाली अमावस्या आदि व्रत रखे जाते हैं। इन दिनों में नववधुएं मायके में जाने को व्याकुल होती हैं, ऐसे में उन्हें सखियों के साथ बिताये पल याद आते हैं, खास कर ‘सावन के झूले’!

यह मौसम कृषकों को प्राणदान देता है एवं उनकी फसलों को नव-हरीतिमा प्रदान करता है।  

भक्ति और समृद्धि से समाहित यह खुशहाल समां सबको आनंदविभोर करता है। उसकी जलधाराओं के नृत्याविष्कार में ‘ॐ नमः शिवाय’ और नन्हे बालगोपाल की किलकारियां प्रतिध्वनित होती हैं। आइये इस हरित ऋतु का प्रेमोल्लास से स्वागत करें।

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साहित्यिक स्तम्भ ☆ ग़ज़ल # १६५ ☆ चल रही राह ऐसी कुछ दुनिया… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “चल रही राह ऐसी कुछ दुनिया“)

☆ साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # १६५ ☆

✍ चल रही राह ऐसी कुछ दुनिया… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

ख़त्म होगी मेरी सज़ा कब तक

ज़िंदगी की करूँ दुआ कब तक

 दर्दे-दिल दूर करने पी तो लूँ

रंग लाएगी ये दवा कब तक

 *

 हार मानी नहीं अभी मैंने

तू करेगा ग़ज़ल-सरा कब तक

 *

रह गुज़र ज़ीस्त की थका डाली

जिस्म अपना निचोड़ता कब तक

 *

मैं जलाता ही जा रहा दीपक

चल बुझाती है तू हवा कब तक

 *

चल रही राह ऐसी कुछ दुनिया

आख़िरश रुकना ज़लज़ला कब तक

 *

रंगे ज़िद्दत में जी रहा है तू

ज़ीस्त का समझे फ़लसफ़ा कब तक

 *

बेवफ़ाई के घन चलाते अरुण

प्यार का घर रहे टिका कब तक

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares