मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विमानतळ…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “विमानतळ…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमच्या राष्ट्र सेविका समितिच्या शाखेत खेळल्या जाणाऱ्या एका खेळाचे नाव आहे… ” विमानतळ” 

वेगळं वाटलं ना? सांगते कसा खेळला जातो ते..

सर्वांनी गोल करून उभ राहायचं. चारी कोपऱ्यात मातीतच गोल आखायचा. त्यांना चेन्नई, दिल्ली, मुंबई, कलकत्ता अशी नावं द्यायची. सर्वांनी घोषणा देत पळायचं.

“संघटन मे शक्ती है

शक्ती को बढाना है

हिंदुस्तान हमारा है “

जी खेळ घेणार असेल तिनी पाठ करून उभ रहायचं. काही वेळाने तिने शिट्टी वाजवली की ज्या विमान तळाजवळ तुम्ही उभ्या असाल… तिथे जाऊन उभ राहायचं. त्या उभ्या राहिल्या की नंतर खेळ घेणारीनी एका विमान तळाचं नाव घ्यायचं.

तिथे उभ्या असलेल्या सगळ्या जणी खेळातून बाद… कितीही नाही म्हटलं तरी पहिल्या फेरीत बाद झाल्यावर वाईट वाटतं..

परत दुसरा राउंड… सर्वजणी आऊट होईपर्यंत असा खेळ चालु ठेवायचा.

खेळाचे मर्म लक्षात आलं का?

– – सगळ्याजणी पळत होत्या. पण नेमकं ज्या विमानतळाचं नाव उच्चारलं त्या खेळातून बाद झाल्या.

आयुष्यात असंच अनपेक्षित पणे काहीही होऊ शकतं… त्याचा स्वीकार करायचा. सारखं गुडी गुडी, चांगलंच होईल का? तर नाही.. जगत असतानाही असे अचानक धक्के बसत असतात. त्यावेळी नाऊमेद व्हायचं नाही. असही घडतं.. ते पचवायची, त्याच्याशी सामना करायची… तुमची मानसिक तयारी असायला हवी..

हेच या खेळातून शिकवलं गेलं आहे. खेळातून बाद झालो हे सहजपणे घेत… बाहेर उभं राहून खेळणाऱ्यांना घोषणा देत प्रोत्साहन द्यायचे.

हा खेळ झाला की परत पुढचा खेळ खेळायला सुरुवात करायची…

दुसरा खेळ आहे अग्निकुंड..

यात गोल करून.. एकमेकींचे हात घट्ट धरून उभं राहायचं. मध्यभागी प्रतिकात्मक अग्निकुंड आहे. जोर लाऊन शेजारचीला त्यात ढकलायच. जिचा पाय उचलला जाईल.. जी गोलाच्या आत ढकलली जाईल.. ती या खेळातून बाहेर.. शेवटी दोघी राहिल्या की त्यांनी एकमेकींना ओढायचे… शेवटी त्यातली एक जण जिंकणार…

समोर संकट दिसतंय… कुणीतरी तुम्हाला त्यात ढकलतय.. त्या क्षणी तुम्ही सर्व शक्तीनिशी त्याला प्रतिकार करायचा. पाय घट्ट रोवून उभं राहायचं. अगदी ठामपणे…

एखादा मुद्दाम तुम्हाला त्रास देत असेल तर प्रतिकार हा केलाच पाहिजे.

अर्थात हे कोणीतरी शिकवलं तर हे जमेल. यष्टि प्रशिक्षणातून हेच तर समितित शिकवलं जातं. निरनिराळे व्यायाम प्रकार, खो खो, कबड्डी या सारखे खेळ घेतले जातात. शरीराला एक प्रकारची शिस्त लावली गेल्यामुळे शरीर कणखर बनते.

सध्या सोफ्यावर बसून मोबाईलवर तासन्तास खेळ खेळले जातात. त्यात जिंकलो, पॉईंट मिळाले तर ते कृत्रिम, आभासी असतात. प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग शून्य आहे.

शाखेत मैदानावरच्या मातीत खेळत असताना जोम, उत्साह, तरतरी, आत्मबल हे मिळत असते. त्यासाठीच तुम्ही राष्ट्र सेविका समितिच्या शाखेत या…

त्यासाठी कुठलीही फी नाही.. परीक्षा नाही.. इथे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम जागवले जाते.

नवीन ओळखी होतात. एकमेकांमध्ये आत्मीय भाव, स्नेह निर्माण होतो. इतर कुठेही शिकवले जात नाही… ते इथे शिकायला मिळते. देशभक्तीपर गीतं शिकवली जातात.

ती सर्वांबरोबर जोरकसपणे म्हणताना मनात उत्साह व चैतन्य येते.

” पुण्य भू: मातृभू हिंदू भूमी आपुली

स्वर्गतुल्य भासते आम्हास माय माऊली”

अशा आपल्या मायभूमीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी एक होऊया..

… आपण सध्याच्या जगात सजग.. सतर्क व्हायला हवे आहे.

… तर मग निश्चयाने उचला पाऊल…

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “‘बीज’ पेरून गेलेले तुकोबाराय!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “‘बीज’ पेरून गेलेले तुकोबाराय!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज

जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांनी या जगास ‘आमुचा राम राम घ्यावा’ म्हणत दिलेल्या निरोपाच्या दिवसाचे स्मरण म्हणजे ‘श्री तुकाराम महाराज बीज’! 

तुकोबारायांच्या संदर्भात ‘बीज’ म्हणजे द्वितीया तिथी. यावर्षी हा दिवस ५ मार्च, २०२६ आहे. महाराष्ट्र वाड्मय हे अभंग आहे. कारण ते केवळ शाब्दिक रचनेपुरते जुळवलेले शब्द नसून प्रत्यक्ष जीवनाच्या अनुभवातून उमटलेले उदगार आहेत. कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव श्री माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, जगदगुरू श्री संत तुकोबारायांचा गाथा, समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचा दासबोध, भक्त शिरोमणी श्री नामदेव रायांचा गाथा, किंवा संत श्री एकनाथ महाराजांचे भागवत… किंवा अगदी अलीकडचे श्री गजानन विजय यांसारखे ग्रंथ शोधू पाहता असे कळते की… प्रत्येक वाचनाच्या वेळी वाचकांस काही तरी नवीन गवसत जाते… म्हणूनच पारायणाचे महत्त्व आहे! वर्तमानपत्रासारखे एकदा वाचले आणि झाले असे नाही… हे तर आपले भविष्यपत्रच आहे. जीवनातील प्रत्येक क्षणासाठी या वाड्मयात काही न काही आहे… अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत! 

श्री तुकोबारायांनी रचलेल्या हजारो रचनांपैकी आता केवळ ४४०० उपलब्ध आहेत, असे दिसते. यातही काही क्षेपक (म्हणजे इतरांनी आपल्या रचना श्री तुकोबारायांच्या म्हणून प्रचारात आणलेल्या) आहेत, असे अभ्यासक सांगतात. जवळपास प्रत्येक अभंगात आपणांस एखादा तरी नवा शब्द, नवा विचार आढळून येईल! 

सहज गंमत म्हणून सांगतो, एका व्यक्तीला एका व्यक्तीने श्री ज्ञानेश्वरी वाचावयास दिली. ती व्यक्ती त्या दिवसाचे वाचन संपले की पुढील वेळेस कुठून सुरुवात करावी हे लक्षात येण्यासाठी ग्रंथात बुक मार्क (दोरा) ठेवत. परंतु त्यांचा नातू ते घरात नसताना तो बुक मार्क अनावधानाने आधीच्या पानांत ठेवी. हे गृहस्थ तिथून वाचनास सुरुवात करीत. असे सलग काही दिवस झाले! ते एकेदिवशी म्हणाले… ओव्या छान आहेत… पण ज्ञानेश्वर महाराजांनी तेच तेच पुन्हा पुन्हा लिहिले आहे! असो.

हे वाड्मय चिंतन करण्यासाठी असल्याने सतत नजरेखालून घालणे श्रेयस्कर असते. कुणी कितीही विद्वान असले तरी त्यांना वक्तृत्वात या संतांनी लिहून ठेवलेल्या ओव्यांचा, अभंगांचा, पदांचा, समासांचा संदर्भ, दाखला द्यावाच लागतो. ‘तुका म्हणे’ हे शब्द तर जणू एखाद्या विचाराला दिलेला भक्कम पुरावाच जणू. माउलींच्या ओव्या, समर्थांचे समास ज्याला अर्थासह तोंडपाठ असतील, त्याच्या मुखातून प्रत्यक्ष सरस्वतीच प्रवाहित होत राहते! महाराष्ट्रात होऊन गेलेले सर्व वक्ते याच अमोघ भांडवलाच्या आधारे श्रीमंत होऊ शकले. आचार्य प्र. के. अत्रे यांचा श्री तुकोबारायांच्या अभंगांचा गाढा व्यासंग होता. प्राचार्य राम शेवाळकर यांच्या वाणीत माऊली विराजमान असत. भारतरत्न लतादीदी, भारतरत्न भीमसेनजी जोशी, वाड्मय- ‘पुरुषोत्तम’ पु. ल. देशपांडे यांनी संतांचे शब्द मनापासून जनापर्यंत पोहोचवले… ते केवळ या शब्दांत सामर्थ्य होते म्हणूनच.

ज्ञानोबारायांनी आईसारखे कोमल शब्द लिहावेत आणि तुकोबारायांनी वरपांगी कडक बापासारखे शब्दांचे प्रहार करावेत… पण या मायबापांची माया एकाच जातीची! तुकोबाराय हाती वाग्बाण अर्थात शब्दांचे बाण घेऊनच फिरत तर कधी काठी पण ते केवळ ज्ञानदीप लावू जगी या विचाराने! स्वत: घेत असलेला आनंद इतरांनीही घ्यावा यासाठी तुकोबाराय… तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू… नका चरफडू घ्या रे तुम्ही! असे ज्यावेळी म्हणतात त्यावेळी हा आनंद इतरांनी घ्यावा असे त्यांना किती प्रकर्षाने वाटते, हे दिसून येते.

ज्ञानदेव पाया आणि तुकोबाराय कळस असं संत बहिणाबाईंनी प्रतिकात्मक म्हणून ठेवलेलं असलं तरी पाया दुय्यम आणि कळस सर्वोत्तम असा त्याचा अर्थ नाही. एखाद्या नदीचा उगम आणि तिचा प्रत्यक्ष विस्तार हे एकमेकांपासून वेगवेगळे करता येत नाहीत, किंवा त्यांची क्रमवारी लावता येत नाही.

श्रीमद भगवद्गीता नावाची सोन्याची जाडजूड वीट, तिच्यापासून घडवलेले देखणे अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी… गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी! तसं श्री संत तुकोबारायांचा गाथा म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि श्री ज्ञानेश्वरी यांतील अर्थांचा परिपाक. आणि तुकोबाराय याचे सारे श्रेय माऊलींना देतात! तुका म्हणे नेणो युक्तीचिया खोली… म्हणोनि ठेविली पायी डोई! तुकोबाराय स्वत:ला ‘पामर’ म्हणवून घेतात ते माऊलींच्या तुलनेमध्ये… इतरांच्या नव्हे. इतरांसाठी ते तुकोबाराय… तुकाराम महाराजच होते आणि आहेत. तुकोबा आणि भगवान विष्णू हे एकच आहेत, असे रामेश्वर भट यांनी म्हणले आहे… आणि हे रामेश्वर भटांसारख्या अधिकारी पुरुषाने म्हणले आहे, हे ध्यानात घेण्यासारखे आहे! 

इंद्रायणी देहूतून पुढे येते आणि माऊलींचे चरण स्पर्शून पुढे जाते. तुकोबाराय देहूतून पुढे वहात आले… ज्ञानोबारायांच्या चरणाशी नतमस्तक झाले आणि पुढे स्वत: प्रवाह बनून पुढे जात राहिले. जसं आपण पत्रावळीचा गठ्ठा उचलताना एक हात खालच्या पत्रावळीला आणि दुसरा हात वरच्या पत्रावळीला लावतो, तसंच ज्ञानेश्वरी आणि गाथा या अक्षर वाड्मयाबाबत म्हणता येईल. याचा अर्थ या गठ्ठ्यातील कोणतीही पत्रावळ दुय्यम आहे, असे मात्र अजिबात नाही. या गठ्ठ्यात असलेली प्रत्येक पत्रावळ ही ज्ञानाच्या, भक्तीच्या पदार्थांना योग्य ती जागा देत अभ्यासक, भाविकांस तृप्त करण्याचे सामर्थ्य अंगी बाळगते.

संत देहाने जगातून गेले आहेत… पण जाताना विचारांचा वारसा देऊन गेले आहेत! जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांना त्यांच्या ३७७व्या बीजोस्त्वानिमित्त वंदन. त्यांनी पेरलेल्या बीजातून भक्तीचा, सदसदविवेकबुद्धीचा मळा फुलला आहे… आणि हीच महाराष्ट्राची खरी दौलत आहे! राम कृष्ण हरी!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्त्री म्हणजे…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “स्त्री म्हणजे…” ☆ संध्या बेडेकर ☆

स्त्री म्हणजे शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचे Perfect combination आहे.

“26 th August” महिला समानता दिवस. ” अमेरिकेत ‘1893 ‘ साली सुरू झालेला हा दिवस तेथील महिलांना voting rights मिळावे, याकरिता सुरू झाला होता 1920 साली 26 th August. ला हा अधिकार त्यांना मिळाला. ••••

हा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे. या आधी स्त्री ला, पुरुषांच्या बरोबरीने समान आदर, हक्क मिळावे. ही स्त्रियांची मागणी होती. या विचाराला चालना मिळाली. जनजागृती ची सुरुवात झाली होती. कोणत्याही चळवळीची सुरुवात होणे, हा नेहमीच एक महत्वाचा Turning Point असतो. ••••

आजची स्त्री याच चळवळीचा परिणाम आहे. •••

महिला आणि पुरुषांची तुलना करणे ही गोष्ट मला खूप आवडतं नाही. पटतही नाही. सृष्टी ने स्त्री व पुरुष दोघांची शारिरीक व मानसिक रचना खूप विचारपूर्वक केली आहे. ते एकमेकांचे पूरक आहेत. ••• दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ••• दोघे एकमेकांचे आधार आहेत. •••दोघांचे जन्मजात गुण मिळुनच प्रकृतीची /सृष्टीची काळजी घेण्यात ते समर्थ आहेत. •• त्यांच्यात स्पर्धा नसावी. ती एक टीम आहे. अशा अर्थाने घ्यावे. ••••

स्त्री प्रकृतीची ची अलौकिक अदभुत सर्वोत्तम कलाकृती आहे. ती जगाची ओळख आहे. ती नसेल तर संपूर्ण जगात काळोख आहे. •••

स्त्री पुर्वीपासून अशीच आहे. आपण इतिहासातील तिच्या पराक्रमाच्या, सहनशीलतेच्या, त्यागाच्या, गाथा ऐकलेल्या आहेत. आज जेव्हा तिला अधिकार मिळाले. स्वतंत्रता मिळाली. तेव्हा सामान्य स्त्री सुध्दा चौखटीतुन बाहेर पडली. ती मोकळी झाली. व्यक्त होऊ लागली. काळा बरोबर धावणे तिला जमू लागले. तिची उपस्थिती समाजात जाणवू लागली. तिच्या गुणांचा प्रभाव समाजात दिसू लागला. व समाजात त्यामुळे झालेला बदलही दिसू लागला. •••

स्त्री म्हणजे ‘शस्त्र ‘आणि ‘शास्त्र ‘ दोन्ही च perfect combination आहे. शौर्य आणि संस्कृती जपणारी, दोन्हीत प्रविण. आपल्या परिवाराची काळजी घेणारी. जीव ओवाळून टाकणारी स्त्री. जेंव्हा प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, मग ती प्रतिष्ठा नवऱ्याची असो, नाही तर देशाची असो, ती आपले शौर्य दाखविण्यात मागे पूढे बघत नाही. •••

आजच्या स्त्रीने प्रगतीची तलवार कंबरेला खोचली आहे. आज ती गल्ली पासून दिल्ली पर्यंत पोहोचली आहे. एक पाउल घरात तर एक अंतराळात ठेवले आहे. •• ••••मंत्री बनून देश चालवते •••. टीचर बनून अंधार घालवते. •••आज ती पूढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सज्ज आहे. •••

** अनवाणी ते कॅटवॉक ** 

प्रत्येक क्षेत्रात तिने आपली योग्यता वेळोवेळी दाखवून, ती समानतेची अधिकारी आहे. हे सिद्ध केले आहे. आता समानतेचा प्रश्न उरतच नाही. •••

स्त्री व पुरुष जेव्हा एकमेकांना आधार देतात. एकमेकांबरोबर खंबीर पणे उभे राहतात, तेंव्हा दोघांची शक्ती द्विगुणित होते. ••••

– – ही आजच्या स्त्रीची एक सशक्त बाजू झाली. पण दुर्दैवाने तिची दुसरी बाजूही आहे. ती तेवढी सशक्त नाही खरं तर नाजूक च आहे. ••••

आजही आपण

“बेटी बचाव बेटी पढाव “.

“स्त्री भ्रूण हत्या ” “acid attack'” “बलात्कार ” सारख्या बातम्या वर्तमानपत्रात वाचतो. शंभर दीडशे वर्षांपूर्वी चालू झालेली चळवळ आज ही चालू ठेवायला हवी आहे. अजून ही उद्देश्य पूर्ण झालेला नाही. •••

आजही ‘स्त्री स्वतंत्रता ‘व ‘स्त्री सुरक्षा ‘ हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेतच. •••••

ही विकृती, असे मनोरुग्ण आजही स्त्रीचा आदर मान ठेवण्यात असमर्थ आहेत.

” महिला समानता ” आता ही चळवळ घरोघरी चालू ठेवायला हवी आहे. पण आजही मुलगा झाला तर कणभर का होईना, जास्त आनंद होतोच. ही विचारधारा बदलायला हवी. स्त्रियांच्या संबंधित नियम, कानून, शिक्षा जास्त कडक व्हायला हवी.. •••

प्रत्त्येक वर्षी या दिवसांचे celebration म्हणजे आजच्या परिस्थितीची चाचणी करणे व त्यात सुधारणा करणे होय. ••••

ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ••••

© संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नो कम्प्लेंट डे!…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “नो कम्प्लेंट डे! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

नो कम्प्लेंट डे!

‘जीवनात काहीही तक्रार नाही’ दिवस

हल्ली खूप सारे ‘डे’ साजरे करण्याची आपल्याला सवयच लागली आहे.

कधी मदर्स डे, कधी फादर्स डे, कधी टिचर्स डे, कधी चॉकलेट डे, कधी फ्रेन्डशिप डे तर कधी वुमन्स डे…

वर्षभरातील जवळपास प्रत्येक दिवस कुठल्यातरी ‘डे’साठी फिक्स केलेला आहे.

खरं तर आपल्याकडे म्हणजे भारतात अशा प्रकारचे ‘डे’ साजरे करण्याची आवश्यकताच नाही. कारण फक्त त्या ‘डे’च्या दिवशीच नाही, तर संपूर्ण वर्षभर आपण त्या सर्व लोकांचा सन्मान करायला पाहिजे, आदर करायला पाहिजे…

आपल्याकडे खरी गरज आहे ती स्ट्रेस फ्री डे, नो चिडचीड डे, अ‍ॅप्रीशिएशन डे आणि नो कम्प्लेंट डे सारखे ‘डे’ साजरे करण्याची…

आपण आयुष्य आनंदाने जगतच नाही. कायम कसली तरी कम्प्लेंट करीत असतो. आज काय चहात साखरच कमी होती, भाजीत मीठच जास्त होतं, गाडीत पेट्रोलच नव्हतं, तिथे पंखाच नव्हता, त्याने मला विचारलंच नाही, मला बसायला खुर्चीच नव्हती, त्याने मला निमंत्रणच दिलं नाही, प्यायला थंडगार पाणीच नाही, पायात घालायला चांगले पॉलीश केलेले शूज नाहीत, चांगले कपडेच नाहीत, माझ्याजवळ अ‍ॅपलचा मोबाईलच नाही आणि बरंच काही… नुसती कम्प्लेंट, कम्प्लेंट आणि कम्प्लेंट!

अरे आपण कधी खूश राहणार? जे आहे त्यात खूश राहता येऊ शकत नाही काय?

एखादे दिवशी चहात साखर कमी झाली, म्हणून एवढी चिडचिड करायची काही आवश्यकता नाही. झाली तर झाली कमी साखर, कुणी मुद्दामहून तर असं करीत नाही ना.

आपणच आपलं निरीक्षण करू या की, आपण किती गोष्टीवर उगीचच चिडचिड करतो. दिवसभरात किती कम्प्लेंटस करत राहतो आणि ठरवून टाकू की किमान एक दिवस तरी ‘नो कम्प्लेंट डे’ साजरा करु या.

खरं तर एरवी हे ‘डे’ वर्षातून एकदाच असतात. आपण मात्र नो कम्प्लेंट डे अगोदर महिन्यातून एकदा मग आठवड्यातून एकदा आणि सवय झाल्यावर मग रोजच्या रोज साजरा करू या. बघा मजा येईल.

पण

कृपया या मेसेज बद्दल कुणी कम्प्लेंट करू नये.

★★★

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ त्या पेल्याशीच जुळली भाग्यरेषा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? त्या पेल्याशीच जुळली भाग्यरेषा… ? श्री आशिष  बिवलकर ☆

दोन थेंबांस महाग झालो मी,

रिक्त पेल्यास चढे माझी नशा |

सहवास एकमेकांचा लाभला,

पहावेना एकमेकांची ही दशा |

*

जीव त्याच पेल्यावर मी लावला,

त्यात शोधत राहिलो दहा दिशा |

पाठ साऱ्या जगानेच दाखवली,

त्याने दाखवली जगायची आशा|

*

सारं काही माझ्या हातून निसटले,

जगाने केला जीवनाचा तमाशा |

तरी डगमगलो नाही प्रसंगांना,

त्याने शिकवली संघर्षाची भाषा |

*

दिवसभर राबराब राबलो असा,

सुखमय केली त्याने माझी निशा |

क्षीण तनामनाचा दूर केला त्याने,

त्याच्या शिवाय न उरली मनीषा |

*

भले जग कितीही म्हणू दे आता,

हातून केली यानेच याची दुर्दशा |

का करू तमा मी स्वार्थी जगाची,

त्या पेल्याशीच जुळली भाग्यरेषा |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # २७५ – सुमित्र के दोहे ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत है सुमित्र के दोहे।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # २७५ – सुमित्र के दोहे ✍

☆ 

रोई ब्रज की गोपिका, रो रहे नंदलाल।

 चुप्पी साधे राधिका, आंसू करे सवाल।

 *

आंसू का इतिहास है आशु का भूगोल ।

आंसू का विज्ञान अब, रहस्य रहा है खोल।।

 *

आंसू है संवेदना आंसू, मन की पीर।

यशोधरा का रूप है, जसोदा की जंजीर।।

 *

जनक दुलारी चल पड़ी, ओढ़ अश्रु का चीर ।

आंसू डूबी अयोध्या, राम मौन गंभीर ।।

 *

घनानंद का अश्रुधन, अर्पित कृष्ण सुजान।

उसी अश्रु की धार में, डूबे थे रसखान ।।

 *

आंसू डूबी सांस से, रचित ईश्वरी फाग।

रजउ ब्रह्म थी, जीव थी, ऐसा था अनुराग।।

© डॉ. राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # २७४ – “सपनों जैसा घर…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत सपनों जैसा घर...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # २७४ ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “सपनों जैसा घर...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी 

उसके आँचल के खूँटों में

जैसे बँधी व्यथा ।

माँचौके में लिखकर आयी

है प्राचीन कथा ॥

 

भूख, स्वाद, संतुष्टि, पुष्टि के

सारे पात्र जहाँ ।

मिलजुल कर के लिखें तृप्ति की

बारह खड़ी वहाँ ।

 

वहीं कहीं विश्वास, सेंक कर

रखती डिब्बे में –

उसका प्रेम पराँठों के संग

होता नहीं मृथा ॥

 

वह अदभुत करुणा की

अनुपम दाल पकाती है ।

जिसमें संध्या, चाँद कूदकर

बना चपाती है।

 

और इसी क्रम, चावल का

पकना, खुशबू देना –

बस आधारहीन असमंजस

जैसा जथा – तथा ॥

 

सपनों जैसा घर, घरके

सपने , सपने से हैं ।

यहाँ प्रश्न के उत्तर , सब

अपने अपने से हैं ।

 

सभी पाण्डवों का पालन

कुन्ती करती आयी –

जो थी कभी बोझ न,

सहने वाली विनत प्रथा ।

©  श्री राघवेन्द्र तिवारी

07-03-2026

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – सेलेक्टिव ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – सेलेक्टिव ? ?

अधिकांशत:

उनका लेखन

केंद्रित होता है

स्त्री देह पर,

मन,अंतर्द्वंद

भावना,वेदना

तो बहुत दूर

जाने क्या है

उन आँखों में

कि उभरता ही नहीं

प्रतिबिम्ब, स्त्री के

हाथ, पैर

कंधे, कान

घुटने, टखने

पेट, पीठ का,

वे आँखें देखती हैं

…देखती नहीं..,

वे आँखें घूरती हैं

प्राकृतिक लज्जा को ढके

कुछ ‘सेलेक्टिव’ हिस्सों को,

कोई बता रहा था

चर्चित होने के लिए

‘सेलेक्टिव’ होना

ज़रूरी होता है..,

पर मेरी बात

यहाँ समाप्त नहीं हुई है

सुनो प्रसिद्धि-पिपासुओ!

मैं कलम चलाते

रहना चाहता हूँ,

लिखते रहना चाहता हूँ,

लेखक बने रहना चाहता हूँ,

लेखन पर चर्चा चाहता हूँ

पर चर्चित होने के लिए

‘सेलेक्टिव’ लिखना नहीं चाहता!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आशुतोष साधना संपन्न हुई। अगली साधना की जानकारी शीघ्र ही दी जावेगी। 🕉️ 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Weekly Column ☆ Witful Warmth # 65 – Mechanical Motherhood… ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆

Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Dr. Suresh Kumar Mishra, known for his wit and wisdom, is a prolific writer, renowned satirist, children’s literature author, and poet. He has undertaken the monumental task of writing, editing, and coordinating a total of 55 books for the Telangana government at the primary school, college, and university levels. His editorial endeavors also include online editions of works by Acharya Ramchandra Shukla.

As a celebrated satirist, Dr. Suresh Kumar Mishra has carved a niche for himself, with over eight million viewers, readers, and listeners tuning in to his literary musings on the demise of a teacher on the Sahitya AajTak channel. His contributions have earned him prestigious accolades such as the Telangana Hindi Academy’s Shreshtha Navyuva Rachnakaar Samman in 2021, presented by the honorable Chief Minister of Telangana, Mr. Chandrashekhar Rao. He has also been honored with the Vyangya Yatra Ravindranath Tyagi Stairway Award and the Sahitya Srijan Samman, alongside recognition from Prime Minister Narendra Modi and various other esteemed institutions.

Dr. Suresh Kumar Mishra’s journey is not merely one of literary accomplishments but also a testament to his unwavering dedication, creativity, and profound impact on society. His story inspires us to strive for excellence, to use our talents for the betterment of others, and to leave an indelible mark on the world.

Some precious moments of life

  1. Honoured with ‘Shrestha Navayuvva Rachnakar Samman’ by former Chief Minister of Telangana Government, Shri K. Chandrasekhar Rao.
  2. Honoured with Oscar, Grammy, Jnanpith, Sahitya Akademi, Dadasaheb Phalke, Padma Bhushan and many other awards by the most revered Gulzar sahab (Sampurn Singh Kalra), the lighthouse of the world of literature and cinema, during the Sahitya Suman Samman held in Mumbai.
  3. Meeting the famous litterateur Shri Vinod Kumar Shukla Ji, honoured with Jnanpith Award.
  4. Got the privilege of meeting Mr. Perfectionist of Bollywood, actor Aamir Khan.
  5. Meeting the powerful actor Vicky Kaushal on the occasion of being honoured by Vishva Katha Rangmanch.

Today we present his SatireMechanical Motherhood 

☆ Witful Warmth# 65 ☆

☆ Satire ☆ Mechanical Motherhood… ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆ 

That afternoon in Ratlam wasn’t just weather; it was like a long, exhausted yawn of a burning government file. The sun was spitting fireballs across the sky, much like a brand-new officer slamming ‘Urgent’ stamps on dusty old folders. The dogs wandering near the municipal dustbins were under the huge delusion that they were first-class citizens of ‘Independent India.’ Poor fools! They didn’t know that to be a citizen in this republic, two legs aren’t enough. You need a ration card and the basic qualification of having taken at least one dip in the holy river of corruption. Being a dog is the greatest moral crime in this country because it follows that old-fashioned loyalty which our system has long ago declared ‘outdated’ and tossed into the trash.

On that same melting tar road, ‘Modernity’ zoomed past on a two-wheeler, moving with a speed as fast and hollow as election promises. Two ‘civilized’ women were riding the scooter—the kind who look like they memorized and then tore up all chapters of kindness and religion in childhood so that no ‘confusion’ remains. Tied to the back was a rope, and at the end of that rope was a puppy, who was under the impression that he was out for a ‘walk.’ The puppy hadn’t yet learned how to ‘bark’ properly, but he was being given international-level training in how to ‘drag.’ As the scooter speeded up, his tiny paws began to rub against the road, just like a widow’s pension application rubs against the stairs of a government office. The woman on the back seat would glance at him occasionally, like a pro tax officer checking an honest man’s pocket to see if any ‘balance’ was left.

In our great nation, ‘Motherhood’ has been advertised so much that it now exists only in commercials and political slogans. The motherhood sitting on that scooter had probably left its ‘duty’ behind at some traffic signal after bribing a cop. The puppy’s skin was peeling off, and the tar road was turning red with his blood, looking like a map of a ‘Smart City.’ People passed by as if a VIP convoy was moving, where bowing your head is the only guarantee of safety. In India, ‘Ignoring’ is a national art in which we are all born gold-medalists. If you can watch a life gasping on the road and not stop chewing your tobacco, believe me, you deserve to be declared the most ‘mature’ and ‘experienced’ citizen of this democracy. Sensitivity here is just a ‘device’ that is switched ‘on’ only while taking a selfie.

The puppy was finished, the scooter stopped, and the woman tossed him into the bushes exactly like a politician tosses his manifesto after winning an election—wipe the evidence and move on. The next day, the same woman was sitting in her air-conditioned room, getting teary-eyed watching ‘the horrors of war’ on TV. “Oh God! How cruel the world has become!” she sighed. Just then, her teacup slipped, and she screamed at her servant as if he wasn’t a human, but ‘sin’ itself in person. Outside the window, the bloodstain on the scooter tire was laughing out loud. That stain knew how thin this coat of civilization is, and that the pride of being ‘human’ is actually buried under that lifeless piece of meat which we crush every day under the wheels of ‘progress.’

****

© Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Contact : Mo. +91 73 8657 8657, Email : drskm786@gmail.com

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # ९३८ ⇒ पूत के पांव ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “पूत के पांव।)

?अभी अभी # ९३८ ⇒ आलेख – पूत के पांव  ? श्री प्रदीप शर्मा  ?

पूत, पुत्र को कहते हैं जो पंजाब में जाकर पुत्तर हो, जाता है। राज किसी का भी हो, अगर वह पूत राजस्थान के किसी रणबांकुरे के यहां पैदा हुआ है, तो राजपूत ही कहलाएगा। कल तक जो पूत सपूत तो क्यूं धन संचय, पूत कपूत तो क्यूं धन संचय, कहते नहीं थकते थे, वे ही आज बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ के मार्ग को प्रशस्त करते नज़र आ रहे हैं।

जरूर वे लोग भविष्य दृष्टा होंगे, जो पूत के पांव पालने में पहचान जाते होंगे। काहे का पंचांग और काहे का काल निर्णय। कौन अखबारों में आज जन्म लिए बालक का भविष्य पढ़े, बस पूत के पांव पालने में देखे, और जन्म कुंडली बना दी। कितने पप्पू और कितने चाय वाले होंगे हमारे देश में, काश किसी ने उनके पांव पालने में तब देख लिए होते तो आज देश और वंश दोनों धन्य हो जाते।।

पुत्र को तो हम पूत कह देते हैं, लेकिन पुत्री के लिए हमारा शब्दकोश खामोश है। बनारस में जिसे छोरा, छोरी कहते हैं, वही बंगाल में जाकर छोकरा, छोकरी हो जाता है। कहीं मद्रासी और बंगाली छोकरा छोकरी मिलकर फिल्मी गाने गाते हैं तो कहीं लड़के को पोट्टा और लड़की को पोट्टी कहकर बुलाया जाता है। बुजुर्ग लोग आज भी अपनी तीसरी पीढ़ी, अर्थात पोता और पोती को आशीर्वाद देते, देखे जा सकते हैं। पूतना कृष्ण लीला का एक महत्वपूर्ण चरित्र है, जिसका उद्धार नंद के बाल गोपाल ने किया था। वैसे भी पूतना जैसी संतान से तो नि:संतान रहना ही भला।

हमारी लोकोक्तियां, कहावतें और मुहावरे कभी कभी गागर में सागर का काम कर जाती हैं। इनमें कहीं वक्रोक्ति है तो कहीं व्यंग्य, कहीं कोई गंभीर संदेश है तो कहीं कोई छुपा हुआ राज। नन्हें मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, क्या पूत के पांव पालने में, का लेटेस्ट वर्शन नहीं लगता ?

बस आज की व्याख्या अगर सकारात्मक है तो कल की कहावत में एक नहीं, कई अर्थ निहित हैं।।

कौन अपनी औलाद को अच्छी तरह नहीं पालता !

जन्म और कर्म दोनों के अपने सिद्धांत हैं। भाग्य और पुरुषार्थ का जरूर पालने से भी कुछ संबंध रहा होगा। जब कोई नि:संतान दंपत्ति किसी मासूम बच्चे/बच्ची को गोद लेता है तो क्या देखकर लेता है, पांव या और कुछ ? अब उस बालक को जहां पलना है, वही उसका पालना हुआ।

क्या पालक का पूत के पालने अर्थात् पालन पोषण करने से भी कोई संबंध है। पूत के पांव कब तक पालने में रहेंगे, वह पालने से जमीन पर भी आयेगा, घुटनों घुटनों चलेगा, ठुमक चलत रामचंद्र की तरह अपने पांवों पर खड़ा भी होगा। अपने कुल का नाम रोशन करेगा। कहीं नंद यशोदा तो कहीं माता कौशल्या और महाराज दशरथ। पूत के पांव सिर्फ पालने में ही नहीं नजर नहीं आते, अच्छी तरह पालने पोसने और संस्कारों से भी नजर आ जाते हैं। पालने के साथ जरा पालक पर भी गौर किया जाए।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares