यत्रा नरो देवयन्तो युगानि वितन्वते प्रति भद्राय भद्रम् ।।५।।
☆
☆ सूर्य स्तोत्र ☆ भावानुवाद : डॉ. निशिकान्त श्रोत्री ☆
☆
प्रभाते स्मरितो श्रेष्ठ सविता रूप मी
ब्रह्माण्ड केंद्रवासी यज्ञकर्ता देहस्वामी ।
समप्रकाशी किरणे उत्पत्तीमूल अहंकार विना
ब्रह्मासमान पद्मशुद्ध सदैव चिंतनीय मना ॥१॥
*
सकलांचा तारणहार सुंदरदेही मनप्रसन्न
ब्रह्मेंद्रादी देवता अर्चिती त्या प्रभाते नमन
त्रिगुणीपूर्ण वर्षाकारक संरक्षक नियंत्रक
सकलांचा पालनकर्ता त्रैलोक्याचा पालक ॥२॥
*
प्रभाते भजितो सवितृदेव अनंत शक्तीचा
पापानाशक रोगहारक निवारक शत्रुभयाचा
मूर्तिमान कालस्वरूपी चक्षु समस्त लोकांचा
नमन आदिदेवासी हटवी पाश जसा गोकंठाचा ॥३॥
*
ॐ देवतांस्तव उधळित उदय प्रकाशाचा
मित्राचा नेत्र स्वामी वरुणाचा अग्नीचा
धारयितो पृथ्वी अंतरिक्ष तथा भास्कराला
आत्मा हा विश्वाचा श्रवण करितो विश्वाला ॥४॥
*
उषादेवी संगे प्रकाशमान सूर्य देदिप्यमान
अंत समयी नारीस देउन साथ करी रक्षण
प्रतिक्षा करिती जेथ मनुज पूजिती देवतांसी
शुभ कल्याण तेथ होई शुभ कल्याणासी ॥५॥
☆
॥ इति श्री महर्षि मयासूर रचित निशिकान्त भावानुवादित श्री सूर्यस्तोत्र संपूर्ण ॥
☆
जरी हे स्तोत्र सूर्य स्तोत्र म्हणून प्रसिद्ध असले तरी हे स्तवन सूर्यमालेतील सूर्याचे नसून ते विश्वकेंद्री सवितृ देवाचे म्हणजेच विश्वात्म्याचे आहे. विशेषतः हे पहिला व चौथ्या श्लोकांमधून स्पष्ट होते.
वरील कविता लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे, आपल्या सर्वांसाठीच असलेला बिकट करोना काळ मुख्यत्वे कारणीभूत आहे. त्या वेळी आलेला श्रावण महिना हा खूपच वेगळा, असुरक्षित आणि भीतीदायक होता.
लहानपणापासून जो आनंद श्रावण महिन्यात अनुभवला होता त्याची आठवण तेव्हा अगदी बेचैन करत होती. त्या बालपणीच्या आठवणींमुळेच ह्या कवितेचा जन्म झाला.
ही कविता लिहिणे म्हणजे थोडक्यात बालपणीच्या आठवणींना उजाळा देणे आणि प्रत्यक्ष नाही परंतु कवितेच्या माध्यमातून स्वतः आणि आप्तजनांना ह्या पवित्र महिन्याचा अनुभव घडवणे हाच एक उद्देश्य होता.
काही दिवसांपूर्वी मी माझी ” मल्हार महुडे ” ही कविता रसग्रहणासाठी आपल्याला पाठवली होती.
त्या कवितेतील पाऊस धिंगाणा घालत येणारा आषाढातला पाऊस होता. त्यातले मेघ ” झिंगल्यापरी डोंगर माथ्यावर धडका मारणारे, मत्त गजांसारिखे होते. ”
आताचा हा पाऊस रिमझिमणारा, हळवा आहे. त्याची संतत धार चालू आहे. अशा वेळी एखाद्या विरही नववधूच्या मनाची काय अवस्था असेल बरे!माझ्या या ” मेघ” कवितेतूनच समजून घ्या ना!
☆ काय फरक पडतो?? … मूळ हिन्दी कविता : हेमन्त बावनकर ☆ स्वैर अनुवाद – मंजुषा सुनीत मुळे ☆
अमेरिका – इस्राईल – इराण यांच्यामध्ये सुरु झालेल्या आणि जगभर खळबळ आणि अशांतता माजविणाऱ्या तीव्र संघर्षाचे खेदजनक आणि वेदनादायक पडसाद जगभर वेगवेगळ्या प्रकारे उमटले .. उमटत आहेत.. उमटत राहणार आहेत. या युद्धातला सर्वात जास्त उद्विग्न करणारा हाहा:कार म्हणजे दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नराधमांकडून केली गेलेली अत्यंत हीन कारवाई ….. दक्षिण इराणमधल्या ‘मिनाब’ मध्ये मुलींच्या प्राथमिक शाळेवर केला गेलेला मिसाईल हल्ला. या हल्ल्यात शंभराहूनही जास्त व्यक्ती मारल्या गेल्या …. ज्यात बहुतांश व्यक्ती म्हणजे या शाळेतल्या लहान लहान मुली होत्या .. ‘ व्यक्ती’ म्हणून अजून पुरेशा उमललेल्याही नाहीत अशा मुग्ध कळ्या ..
…. ज्यांची मने दगडाचीच आहेत त्या निर्घृणांना या घटनेमुळे दु:खच काय .. साधा खेदही वाटला नसेल. पण अतिशय संवेदनशील मन असणारे हिंदी कवी श्री. हेमंत बावनकर यांच्या मनात या प्रसंगामुळे माजलेली खळबळ आणि उद्विग्नता मात्र शब्दरूप घेऊन व्यक्त झाली आणि ‘क्या फर्क पड़ता है?’ या अगदी चपखल शीर्षकाची त्यांची मुक्तछंदातली कविता कागदावर उतरली. त्यांनी अनुभवलेला सृजनाचा हा अतिशय हळवा क्षण या कवितेतून थेट हृदयाला भिडला आणि या काव्याचा स्वैर अनुवाद केल्यावाचून रहावलेच नाही …..
☆ काय फरक पडतो ? ☆ स्वैर अनुवाद – मंजुषा सुनीत मुळे ☆
अजिबात आवाज नको हं ..
शांतता .. एकदम शांतता ..
इथे गाढ झोपल्यात लहान लहान मुली .. शंभराहून जास्त ..
हो खरंच .. शंभराहून जास्त
शिकायला चाललेल्या ..
चालल्या तर होत्या .. पण परत येऊ शकल्याच नाहीत ..
झोपवून टाकलं गेलं त्यांना .. त्या लहान लहान कबरींमध्ये ..
एका भयानक दफनभूमीमध्ये ..
– – पण .. पण यामुळे जगातल्या बाकीच्या तशाच लहान लहान मुलींना ..
त्यांच्या नातेवाईकांना .. आणि .. आणि ..
माणूस म्हणण्याच्या लायकीच्याच नसलेल्या माणसांना ..
काय फरक पडतो ???
..
त्या निष्पाप लहान मुलींना तर हेही माहिती नव्हतं की ..
देश म्हणजे नक्की काय असतं ?
देशाची सीमा काय असते ? ..
धर्म .. पंथ म्हणजे तरी काय ?
वंश म्हणजे नेमकं काय असतं ? .. यातलं काही काही माहिती नव्हतं ..
मित्र देश आणि शत्रू देश म्हणजे नेमके कोण ?
.. आणि ते कसं ठरवतात
.. हे कुठे ठाऊक होतं ?
.. .. त्यांना तर एवढंच समजत होतं की ..
सूर्य एकच असतो ..
चंद्रही एकच असतो ..
आणि ही जमीन सगळ्यांचीच असते.
त्यांचं सगळं विश्व घरापासून सुरू होतं आणि शाळेपर्यंत संपतं सुद्धा..
खायचं-प्यायचं, अभ्यास करायचा आणि आई-वडलांच्या कुशीत स्वतःला विसरून जायचं .. बस् .. ..
– – पण ज्याने कुणी त्यांच्या शाळेला लक्ष्य करून मिसाईल टाकलं ..
.. .. त्यांना या निरागस वास्तवामुळे काय फरक पडतो ???
आपल्याला तर आता सवयच झालीये ..
टि.व्ही. वर लढाया बघायची ..
व्हिडिओ गेम्स बघतो तितक्याच सहजपणे बघायची …
विनाशाच्या या खेळात आता आम्हाला दिसतच नाहीत ..
.. .. पार विध्वंस होत असलेल्या शाळा आणि रुग्णालयं ..
.. शहरं .. तिथल्या दिमाखदार इमारती ..
.. विध्वंस झालेल्या शहरांखाली दडलेली
.. गुदमरणारी शांत- स्वस्थ आयुष्यं …
.. उध्वस्त झालेल्या सुंदर बागा .. .. आता ..
.. आता लहान मुलं , स्त्री-पुरुष ,वृद्ध माणसं
.. सगळेच कसं का जगेनात नाहीतर मरेनात …
.. .. कुणाला काय फरक पडतो ???
शिकण्यासारखं तर खूप काही होतं आपल्याला …
पण काय शिकलो आपण …
– – शासक निरंकुश सत्ताधारी झाले त्यापासून ?
– – नागासाकीत अणुबॉम्बचा विस्फोट केला गेला त्यापासून ?
– – छळछावण्यांकडून ? गॅस चेम्बर्सकडून ? थेट मृत्यूच्या जबड्यात टाकणाऱ्या त्या विनाशक गॅसकडून ?
– – आतंकवादाच्या भयानक सावटाकडून ..
– – जहाल विषारी असणाऱ्या धर्मान्धतेकडून ..
– – सततची युद्ध आणि प्रचंड नरसंहाराकडून … ???
.. .. .. आणि आता हताश झालेल्या त्या शांती आणि सुरक्षिततेच्या भावनेचीच जरी हिंसा झाली
.. शान्तिदूत जन्माला येण्याची शक्यताच जरी मावळली .. तरी ..
दि. ३/४/२०२६ या ई-अभिव्यक्ती मध्ये खालील लेख आला आहे. तो वाचल्यानंतर मला माझी एक कविता येथे द्यावी असे वाटले. प्रथम तो लेख व नंतर माझी कविता आपल्यासाठी.
☆ निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆
मंदिराच्या पायऱ्या चढताना हातातील फुलांच्या हारापेक्षाही मनातील मागण्यांचे ओझे जास्त जड असते..
प्रत्येक पाऊल एका अपेक्षेने पडत असते आणि प्रत्येक नमस्कारात काहीतरी पदरात पाडून घेण्याची धडपड असते..
आपण देवाकडे जातो ते बहुधा स्वतःला अपूर्ण समजूनच..
कुणाला धन हवे असते, कुणाला यश, तर कुणाला केवळ मनाची शांती..
पण या मागणारे आणि देणारे यांच्या गर्दीत एक निराळाच प्रवाह वाहत असतो.
तो म्हणजे त्या जिवांचा, ज्यांनी मागणे सोडून दिले आहे..
ज्यांच्या डोळ्यांत आता आसवांची जागा एका संथ शांततेने घेतली आहे..
माणूस जेव्हा स्वतःच्याच अंतर्मनाच्या गाभाऱ्यात डोकावतो, तेव्हा त्याला उमजते की खरी श्रीमंती बाहेरून काही मिळवण्यात नसून आत जे आहे त्यात तृप्त राहण्यात आहे.
हे जगणे सोपे नसते..
या तृप्तीला एक सूक्ष्म दुःखाची किनार असते. हे दुःख एखाद्या जुन्या जखमेसारखे नसते, तर ते एका अशा जाणीवेचे असते की आता आपल्याला जगाकडून काहीही नको आहे..
ज्याला काही नको असते, तोच खऱ्या अर्थाने ‘सुखी आत्मा’ असतो..
पण या वैराग्यात एक प्रकारची एकाकीपणाची सावली असते..
जग जेव्हा धावत असते, ओरडत असते, तेव्हा हा माणूस आपल्याच हृदयाच्या कोपऱ्यात शांत बसून स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतो..
ही तृप्ती आनंदापेक्षाही जास्त गंभीर आणि मौनापेक्षाही जास्त सखोल असते..
अशा वेळी बाहेरच्या मूर्तीसमोर हात जोडण्याचं भानही उरत नाही, कारण साऱ्या जगाला व्यापणारा तो विधाता स्वतःच्याच निवांत एकांतात सामावलेला असतो..
हे एक नितांत सुंदर सत्य आहे..
*
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: स्वाती मंत्री
—–
☆ कविता – 😀 देवा, 🙏🌹🙏 ☆
☆
आले कशी कळेना, दारी तुझ्या दर्शनास
नसताच कारण आणि इच्छा जराही मनात😞
तरीही आस उगा मनात, भेटशील इथे तू खचित!
वाटले…! वाटले पाहू तरी, असतो कसा तो देव!
भ्रमनिरास माझा देवा नक्कीच तू केला😢
साधून ते तुजला, आनंद कुठला मिळाला?
रांगेत मी भक्तांच्या, तू वेढ्यात सुरक्षारक्षकांच्या
तिथेच भक्ती माझी टिचकली, जी बळेच होती मी जपलेली 🙃
ढकलाढकली अन् धक्काबुक्की ती अशी
आले क्षणभर तव सामोरी कशीबशी
तशाच धक्क्याने नेले क्षणात दूरदूर
तनाने तसे मनानेही खूप खूप दूर दूर 👎👎
सांगते हात जोडुनि शपथ घेउनि तुझी, 🙏🙏
हात जोडण्यासही जमलेच नाही, त्या एका क्षणात! 😢
किंचितही वळून ना पाहिले पुन्हा
परी
सोडला श्वास सुटकेचा, संपला सोहळा दर्शनाचा
आली कीव तुझीच! वाटले, हवी तुलाच सुटका
येथुनि
निघाले तडक जरी माघारी… तरी…
तरी पावलांमागोमाग हा कसला भास? 🤔🤔🤔
आलास की काय सोडुनि तू तुझ्या राउळास?
संशय खरा की खोटा, छळतो मनाला
परी त्या क्षणापासुनिवाटते निश्चिंत माझ्या मनाला👍🙏😀🙏
परवा आणि काल राज्यात अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस सुरू असल्याच्या बातम्या सतत ऐकू येत होत्या … अनेक ठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसाचे .. कुठे कुठे पडत असलेल्या गारांचे व्हिडीओज व्हाट्सअप वर आणि टी व्ही वरच्या बातम्यांमध्ये सतत बघायला मिळत होते. आमच्या गावातही दुपारभर स्वच्छ असलेलं आकाश दुपारनंतर झाकोळायला लागलं होतं… आणि ते सगळं वातावरण पाहून पावासाच्याही आधी मनात शब्दांची टपटप सुरू झाली … गारा वेचाव्यात तसे घाईघाईने ते शब्द वेचतांना अचानक कागदावर तशीच घाईघाईने उतरली एक कविता .. .. .. ..
माझ्या जवळचा मित्र आणि त्याची बायको हे भिन्न विचाराचे जोडपे आहे. बायको आस्तिक आहे तर मित्र नास्तिक. पण त्या दोघांमध्ये गेली तीस वर्षे कुठल्याही प्रकारचा विसंवाद झालेला नाही. कारण ते दोघेही आपापल्या विचारांचा एकमेकांवर दबाव टाकत नाहीत. त्यांच्यातील हा सुसंवाद मी नेहमीच बघत असतो आणि त्यातून मला त्यांच्याविषयी लिहावेसे वाटले, ते असे…
जगात तेहतीस कोटी देव आहे अस मानलं जात.. असतील ही कदाचित.. पण प्रत्येकाच्या मनात त्याच्या देवाची एक वेगळी प्रतिमा असते.. प्रत्येकाचं आराध्य वेगळं असत.. कोणी विष्णू भक्त असतो तर कोणी शिव भक्त.. कोणी देवी भक्त असतो तर कोणी गणेश भक्त..
किती किती रूपे तुझी..
कुठे कुठे शोधू तुला..
तुझे अनंत देव्हारे…
हे जरी खर असलं तरी प्रत्येकाची श्रद्धा त्याची भक्ती ही वेगळी असते.. कोणी देवावर फुलं वाहून आपली भक्ती जपत असत.. तर कोणी खडकाळ मातीवर अनंत फुलं फुलवून आपली भक्ती दाखवत असत आता इथे प्रत्येकाची श्रद्धा महत्वाची.. आणि जिथे श्रद्धा असते तिथे अंध श्रद्धेला अजिबात स्थान नसते हे महत्वाचे… जेंव्हा पासून देव ही संकल्पना कळायला लागलीय तेंव्हा पासून बाप्पाचे म्हणजे गणपती बाप्पाचे साजिरे रूप च माझ्या डोळ्यासमोर येतं.. आणि मग ह्या सगळ्या च्या ही पलीकडे मनात खोल वर घर करून आहे तो माझा सखा.. कृष्ण… सावळा कान्हा.. त्याचं आणि माझं नात एका गोड आठवणीने जोडलं गेलंय.. लहानपणी आजी आम्हा मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायची.. रामायण, महाभारत आणि किती काय काय गोष्टी ती सांगायची त्या सगळ्याच फार रंजक असायच्या पण कृष्णाची गोष्ट जास्त आवडीचे.. रामायणातील राम जेंव्हा सीता मातेला सोडून जायचा तेंव्हा वाईट वाटायचं.. त्या वेळी तर रामाचा राग ही यायचा पण कृष्णाच्या कुठल्याच गोष्टीचा कधी राग आला नाही.. त्याने राधेला किती ही वाट पाहायला लावली.. त्रास दिला तरी तो नटखट कान्हा अजूनच जवळचा वाटायचा.. अर्थात राम आणि कृष्ण हे कोणी वेगळे नाहीत हे कळायचं ते वय न्हवत.. पुढे दोघांच्या प्रेमाची तुलना करायला लागले तेंव्हा दोघं ही आपापल्या अवतारात किती महान होते ह्याची खात्री पटत गेली.. माझी आजी पण गोष्टी इतक्या रंगवून सांगायची ना की बास आत्ता चे हे मालिका वाले पण तिच्या पुढे पाणी कमच म्हणावे लागतील🤪 कृष्ण जन्म रंगवून सांगताना वसुदेवा ने टोपलीत लपेटून ठेवलेलं ते देखणं बाळ अगदी डोळ्यासमोर उभं राहायचं.. कारावासातून बाहेर निघताना झोपी गेलेले पहारेकरी, नदीला आलेला पूर, देवकीचा आक्रोश सगळं सगळं आपण जगतो आहोत असा भास व्हायचा.. तेंव्हा पासून हा बालगोपाल मनात घर करून बसला तो कायमचा.. नंद यशोदा घरी वाढताना त्याच्या लिला.. त्याच्या वर आक्रमण करणारे ते क्रूर राक्षस.. ती पुतना मावशी.. आपल्या वरच चाल करून येतायत की काय इतकं ते कृष्ममय जीवन मी जगते आहे असं वाटायचं.. पायाला मुसळ बांधून घर भर फिरणारा लड्डू गोपाळ तर जास्तच लाडका वाटतो.. नटखट कान्हाच्या खोड्या त्याच्या बाल लिला, त्याच लोण्यावर ताव मारणं.. लोण्यानी माखलेला तो निरागस चेहरा सगळच कस लोभसवाण वाटतं.. सवंगड्यांना सोबत घेऊन त्याने काढलेल्या खोड्या, गोवर्धन पर्वत उचलून गोकुळ वासियांना दिलेल मायेचं छत, इंद्राचा चुर केलेला अहंकार हे सगळच कौतुकास्पद वाटतं.. कृष्ण कधी देव आहे म्हणून त्याची भिती नाही वाटतं तो जवळचा मित्र बनून नेहमी जास्तच जवळचा वाटतो.. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो आपला सखा, सोबत, प्रेरणास्थान, आदर्श पुत्र, स्त्रियांचा कैवारी, दुष्टांचा वैरी आणि राधेचा प्रियकर.. ही त्याची सगळीच रूप आपण जगतो आहोत ह्याचा सतत भास होत राहतो ते आपण कृष्ण मय आहोत म्हणूनच.. कृष्ण फार आपला सामान्य माणसा सारखा अगदी आपला वाटतो.. जेवढा तो नंद यशोदेच्या लाडाकोडात वाढला तेवढाच तो संदीपणी च्या आश्रमात सुदामा सोबत सामान्य रोजची कर्तव्य करताना पण तेवढाच प्रभावी वाटतो.. वयाच्या प्रत्येक टप्प्यात कृष्णाने जगण्यासाठी उत्तमोत्तम उदाहरण घालून दिलेली आहेत.. कृष्णा वरचं प्रेम त्याची भक्ती जगण्याची एक वेगळीच प्रेरणा देऊन जाते.. त्याच्या त्यागातलं त्याच निस्सीम प्रेम त्यांचं समर्पण आजच्या पिढीने अनुकरण करण फार गरजेचं वाटतं.. आज जेंव्हा छोट्या छोट्या संकटाना घाबरून मुलं आत्महत्या करताना दिसतात तेंव्हा कृष्ण निती महत्वाची वाटते… कृष्णाची संकटावर मात करण्याची जिद्द जगण्याची नवी ऊर्जा देऊन जातात.. फक्त ती समजून घेण्याची गरज आहे.. आणि मैत्रिणींनो खर सांगू का आपण संकटात आहोत, आपल्यावर अत्याचार होतायत आपल्याला सोडवायला कृष्ण येईल ह्याची वाट बघण्यापेक्षा स्वतः कृष्ण बनून त्या संकटावर मात करणं म्हणजे कृष्ण भक्ती.. तो तर आहेच आपल्या मनात आपल्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या कृत्यात, आपल्या प्रेमात, आपल्या त्यागात त्याची साथ असतेच ती फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे इतकचं.. कधी हा कृष्ण आपला बाबा बनून येतो तर कधी हा मित्र, भाऊ, सखा तर कधी पतीच्या रुपात फक्त त्या कृष्णाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे.. म्हणूनच वाटतं कृष्ण येईल मदत करेल ह्याची वाट पाहत राहण्या पेक्षा आपल्या प्रयत्नांनी ते संकट दूर करण्याचे प्रयत्न करून स्वतः कृष्ण बनता आलं पाहिजे..
जगेन मी कृष्ण बनुनी
राधेचा सखा होऊन
गोपिकांचा बालगोपाल..
यशोधेचा नंदलाल..
होऊनी मित्र सुदाम्याचा..
आधार बनू आपल्या सख्याचा..
रुक्मिणी चा होऊनी नाथ..
सोबत करू देऊ निरंतर साथ..
बनुनी प्रद्युमनाचा पिता..
मार्ग दाखवू सर्वथा..
पांडवांचा होऊनी कैवारी..
दूर करू कौरवी दूर विचारी..
कुण्या द्रौपदीचा होऊनी सखा..
देऊ विश्वास रक्षणाचा..
अर्जुनाचा होऊनी सारथी..
घेऊनी सुदर्शन हाती..
आपणच होऊन आपले मुरारी
मारून टाकू सारे दूर विचारी…
होऊनी कृष्णमय..
मिरवू आनंद निरामय…
टीप – सोनी लीव्ह वरती लालो नावाचा सिनेमा पाहिला आणि कृष्णप्रेमाने मन भरून आल.. कृष्ण प्रेमीनी आवर्जून बघावा असा मूव्ही आहे नक्की बघा…)
कधी नव्हे तो निवांतपणा मिळाला होता. उकाडा फार जाणवायला लागला होता. बाल्कनीत जरा हवा येत असेल म्हणून तिथे खुर्ची टाकून बसले होते. मग नजर सहजच इकडेतिकडे भिरभिरायला लागली, आणि दररोजच समोर असणाऱ्या कित्येक गोष्टी नव्यानेच पहातेय असं वाटायला लागलं……
… त्यातलेच एक हे घरासमोरील मोठ्ठे पिंपळाचे झाड …’ आजूबाजूचं सगळंच इतकं बदललंय.. पण हे झाड मात्र गेली कित्येक वर्षं आहे तसंच आहे.. ते कसं काय ?‘…
… इतक्यात वाऱ्याची एक सुखद झुळूक आली.. अंग मोहरून उठलं.. समोरचं ते झाडही सळसळलं …. आणि.. आणि बघता बघता त्याची कितीतरी पानं अल्लाद झाडावरून खाली पडली.. मला कसंतरीच झालं.. एकदम जाणवलं की ही तर पानगळ सुरु झालीये.. म्हणजे आता शिशिर संपून वसंत ऋतू येणार तर … आणि मग त्या भिरभिरणाऱ्या पानांबरोबर मनही भिरभिरायला लागलं – – –
खरंच.. काय गंमत आहे ना.. कोणी न सांगताच या झाडांना कळतंय की वर्षभर ज्याची वाट पाहात होतो तो आपला प्रिय सखा वसंतराजा आता येणार म्हणून.. आणि झाडं आता त्याच्या स्वागताची जणू तयारी करताहेत.. मनात आलं.. ही झटकून टाकलेली पानं म्हणजे जणू इतके दिवस नावडत्या सोबत्याबरोबर राहावे लागल्याने मनाला आलेली मरगळच अशी क्षणार्धात झटकून टाकली असेल का ? पण मग ज्यांच्यामुळे झाडांना शोभा अशी ती पानं एकदम अशी निरुपयोगी समजून दूर फेकून देतांना काहीच दु:ख नसेल का झालं झाडाला ?……
…. असं नसेल पण.. इतकं कठोर नि कृतघ्न व्हायला झाडं म्हणजे माणसं थोडीच आहेत ? मग हे कदाचित फक्त स्थित्यंतर असेल …. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे.. किंवा झाडाचा पुनर्जन्म ??
आत्मा तोच आणि वरचा साज मात्र नवा.. कोवळ्या लुसलुशीत तजेलदार पानांचा !!.. असंच असावं….
.. म्हणूनच तर या खाली पडलेल्या पानांच्या चेहेऱ्यावर कुठे दु:ख दिसत नाहीये ! कशी आनंदाने भिरभिरताहेत ! त्यांची जागा घेऊन आता झाडावर अभिमानाने डोलणाऱ्या नव्या पानांकडेही किती कौतुकाने पहाताहेत ! केवढं मोठं मन हे.. आणि केवढा त्याग.. आपल्या जीवावर ज्याचा रुबाब, त्याला संजीवनी मिळावी म्हणून किती सहज स्वतःचाच त्याग करताहेत ही पानं ! ही पानगळ !…. का लोक खेदाने पहातात तिच्याकडे ? तिचा मोठेपणा का लक्षातच येत नाही कुणाच्या ?.. प्रत्येक गोष्टीत फक्त ‘उणं’ तेवढंच पाहणाऱ्या आम्हा माणसांना तिच्याकडून काहीच संदेश घ्यावासा वाटत नाही ते का ?….
…. निदान आयुष्याला मरगळ आणणाऱ्या नकारात्मक संवेदना झटकून टाकून सद्भावाची अन प्रेमाची नवी पालवी फुलवावी आणि भविष्य आनंददायी ‘वसंत’ व्हावं असा प्रयत्न करण्यासाठी या पिंपळवृक्षाप्रमाणे सज्ज व्हावं असं कधी वाटेल आम्हाला ?
नव्या रक्ताला.. नव्या विचारांना.. नव्या जाणिवांना संधी देण्यासाठी जुन्यांनी अट्टाहास सोडून समजूतदारपणा दाखवायलाच हवा हे या पानगळीकडून शिकेल का कधी आमचा समाज ? … या समाजवृक्षाला नवजीवन मिळावं म्हणून हातात हात घालून एकत्रपणे काही करू शकू का आम्ही.. या पानगळीसारखं ???
… सहजपणे ‘कचरा’ समजल्या जाणाऱ्या या दुर्लक्षित पानगळीतून कितीतरी शिकण्यासारखं आहे हाच एक विचार मग कितीतरी वेळ माझ्या मनात टपटपत राहिला … त्या पानगळीसारखाच … आणि नकळत तसेच भिरभिरत कागदावर शब्द उतरले…
☆ पानगळ… ☆
☆
दिवसामागून दिवस चालती.. ऋतूमागूनी ऋतू धावती
विसावा नसे मुळी कसा तो.. निसर्गचक्रा सततची गती – –
*
वसंत प्रिय तो येईल आता.. कल्पनेत या वृक्ष थरारे
स्वागतास अति आतुर झाला.. आनंदे अन मनही भरारे – –
*
येणार नक्की तो प्रियतम म्हणुनी.. सळसळ उठली पानोपानी
स्वतःस आता किती सजवावे.. रोमरोम हे जाई हरखुनि – –
*
मरगळ मनीची झटकत असता.. विखरून पाने किती ओघळली
सालभरी त्यांनीच सजवले.. जुनी जणू ती आता झाली – –
*
जुने जाऊ द्या मरणालागी.. म्हणतच येती नवी पाने ती
परी तयांना आज कळेना.. उद्याची त्यांची हीच स्थिती – –