मराठी साहित्य – विविधा ☆ “स्मरण—सूर.. शब्दांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्मरण—सूर.. शब्दांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

“जन पळ भर म्हणतील हाय हाय” ह्या ओळी जरी सरसकट ख-या असल्या तरी काही व्यक्तींच्या बाबतीत ह्या लागू होत नाही हेच खरे. सहा  फेब्रुवारी! मागील वर्षी ह्याच तारखेला आपल्यातून लता मंगेशकर गेल्या.अर्थातच आपल्यासाठी त्या इतकी मोठी गाण्यांची ईस्टेट ठेऊन गेल्यात की रोज अजूनही त्यांची गाणी ऐकल्याशिवाय दिवस जात नाही आपला. त्यांना वर्षश्राद्धदिनी विनम्र अभिवादन.

ही  तारीख अजून एका जादुई शब्दांची किमयागाराची आठवण करुन देणारी तारीख. आज कवी प्रदीप ह्यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन.

लता म्हणजे एक अद्भुत आश्चर्य, लता म्हणजे साक्षात सरस्वती, लता म्हणजे एक जादू. आणि कवी प्रदीप हे सुप्रसिद्ध गीतकार. 

कवी प्रदीप ह्यांच मूळ नावं रामचंद्र नारायण द्विवेदी. कवी प्रदीप ह्यांच नाव घेतल्याबरोबर “ए मेरे वतन के लोगो” हे अजरामर गीत कानात गुंजायला लागतं. ह्या गाण्याला अतीशय सुंदर शब्दांत निर्मिलयं कवी प्रदीप ह्यांनी तर गोड गळ्याने  भावपूर्ण सुस्वर गाऊन सजवलयं लता मंगेशकर ह्यांनी. हे देशभक्तीपर गीत ऐकून आजही नशा चढते देशप्रेमाची,आठवतं शहीदांचे बलिदान. 1962 मध्ये झालेल्या चीन भारताच्या युद्धात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.काही प्रदेश आणि त्याहूनही अनमोल असलेल्या सैनिकांचे प्राण गमवावे लागले.ह्मा गीताचे थेट प्रक्षेपण लता मंगेशकर ह्यांनी 27जून 1963 रोजी रामलीला मैदानावर केले. तेव्हा पंडीत नेहरुंच्या डोळ्यात शहीदांचे बलिदान आठवून अश्रु दाटले.ह्या गीताची रक्कम कवी प्रदीप ह्यांनी “युद्ध विधवा सहायता निधी” मध्ये वळती करायला लावली. कवी प्रदीप ह्मांनी तब्बल 1700 गीतं लिहीलीतं

त्यामध्ये “जय संतोषी माँ,चल चल रे नौजवाँ., आओ बच्चो तुम्हे सिखाए” ही गीतं खूप प्रसिद्धीस पावली.

लता मंगेशकर ह्यांच्या गाण्यांविषयी माहिती लिहायला गेलं तर पुस्तकही लहानच पडेल. लता मंगेशकर ह्या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना गौरविल्या जातं. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा  आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.

लता मंगेशकर ह्यांना दिदी म्हणूनही संबोधल्या जातं.लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. आजच्या पोस्ट मध्ये त्यांना मिळालेल्या पुरस्कारांविषयी बघू.

त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्स चा  सर्वोच्च नागरी पुरस्कार, “द लीजन ऑफ ऑनर”ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर  सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन  फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.पुरस्काराचे वयाच्या ६१ व्या वर्षी सर्वात वयस्कर विजेत्या होण्याचा विक्रम मंगेशकर यांच्या नावावर आहे. त्यांना या श्रेणीतील अलीकडचा पुरस्कार लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी मिळाला आहे. ज्युरींनी त्यांना  हा पुरस्कार “दुर्मिळ आणि शुद्ध शैलींसह उत्कृष्ट अभिव्यक्तीसह गाण्यासाठी” प्रदान केला आहे.

त्यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी गायलीत.तरी त्यातून काही गाण्यांना पुरस्कार मिळालेत ते खालीलप्रमाणे.

“परिचय “चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

“कोरा कागज “चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,”लेकीन” चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, “चोरी चोरी” चित्रपटातील ‘रसिक बलमा’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.”मधुमती”मधील “आजा रे परदेसी”,”बीस साल बाद”मधील “कही दीप जले कही दिल”,”जीने की राह” मधील “आप मुझे अच्छे लगने लगे” हम आपके है कौन मधील “दीदी तेरा देवर दिवाना” साठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार..!

खरंच लता मंगेशकर ह्या भारताची “शान” होत्या आणि कायम राहतील. दिदींच्या पुण्यतिथीनिमित्त आणि कवी प्रदीप ह्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुनश्च एकदा अभिवादन.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मरणा अगोदर जगून घ्या…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

? विविधा ?

☆ “मरणा अगोदर जगून घ्या…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

जीवन फार धावपळीचे झाले आहे. शिक्षण महाग झाले आहे.बाजारातील सर्वच आवश्यक असणा-या गोष्टी महाग झाल्या आहेत.मध्यमवर्गीय कुटुंब चालवणे खूपच कसरतीचे झाले आहे.आपण आपल्या जबाबदा-या पार पाडत असतोच, पण हे करत असताना समाधान मिळते का याकडे कुणाचे लक्ष आहे का?

तर मी म्हणतो,आपण कसे समाधानी राहू यावर लक्ष केंद्रित करा खूप दुर्घटना माणसांच्या आयुष्यात घडत असतात आणि आपल्याला या घटना पचवायची ताकद ईश्वर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने देत असतो.ती संधी वेळीच स्वीकारा सत्य जे समोर येतं त्याकडे पाठ फिरवू नका. मग  ते सत्य आनंद देईल किंवा दु:ख देईल.

मेहनत सर्वजण करतात.रतन टाटा असे म्हणतात आपण कोण आहे या पेक्षा आपण कसे आहोत हे महत्वाचे आहे.स्वभाव जुळत नाहीत.जबरदस्तीने काही कामे करावी लागतात. पण काही वेळा इलाज नसतो.पण लादलेली कामे कर्तव्य म्हणून केली तर त्रास होणार नाही.सर्वच गोष्टी माणसाच्या मनासारख्या होत नाहीत हे मान्य करून घ्यायला शिकलंच पाहिजे.

मी आपल्याशी बोलता बोलता कुठला विषय कुठे घेवून जात आहे हे माझ्याच लक्षात आले नाही. आजचाच एक प्रसंग, एक माणूस गाडीवरून जात असताना छान गाणं गुणगुणत होता. म्हणजे मला ऐकू आलं इतका त्याचा आवाज होता. साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा तो तरूण असावा.सांगण्याचा हेतू दिवसभर काम करून थकून घरी जात असताना तो इतका खूष असेल तर तो किती समाधानी आहे हे त्याच्या गाणे गुणगुनणण्यावरून लक्षात आले. पैसा खूप जवळ असला म्हणजे आपण खूप समाधानी आहोत आणि राहू ,हा मनाचा गोड गैरसमज  आहे.

लोक आपण न केलेल्या गोष्टीकडे फोकस करत बसतात. एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केले ते ही कोणत्या परिस्थितीमध्ये हे लक्षात घेत नाहीत.उलट त्यांनी काय केलं नाही यावर बोलत राहून मिळालेला आनंद त्यांना उपभोगता येत नाही. तर न केलेल्या गोष्टी उगाळत बसल्यामुळे येणा-या आनंदावर पाणी फिरून जात असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कुणामुळे कुठलेच कोणाचे काम थांबत नाही हे तर मान्य आहे.आपण एखादे काम केले नाही म्हणून ते काम काही काळ थांबेल पण कायमस्वरूपी ते काम थांबत नाही. कुणीच ते काम करणार नाही असं होत नाही…ते काम कोणाकडून तरी होणार हे नक्की!

सांगण्याचा उद्देश असा की जीवन जगत असताना समाधानी राहायला शिकलं पाहिजे.स्वप्नं बघताना जी स्वप्ने पूरी करता येतील अशीच स्वप्ने पहावी.आणि ती स्वप्ने पूरी करून त्याचा आनंद घ्यावा.रोजची धावपळ करत असताना आपल्यासाठी काही वेळ घालवावा मग त्यामध्ये आपला छंद जो आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे.मग तो छंद लिखाणाचा असेल, वाचनाचा असेल ,मुव्ही पाहण्याचा असेल, निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा असेल, मित्राशी गप्पी मारण्याचा असेल आपल्याला ज्यात मन रमेल तो छंद आपण मनापासून जोपासावा आणि का जोपासू नये?

गेलेली वेळ परत येत नाही वय वाढत जाते,अनुभव येत राहतात मागे वळून पाहिले तर आपण घेतलेले निर्णय चुकीचे वाटू लागतात.पण असे न होता एखादा निर्णय आयुष्य बदलून जातो.असं काहीसं घडत असतं!

समोरच्या माणसाने काय करावे, कसे वागावे, हे आपण नाही ठरवू शकत पण आपण मात्र योग्य दिशेने योग्य विचाराने वागण्यास काय हरकत आहे…

समोरचा माणूस चुकीचं वागत असेल तर आपला नाईलाज असतो आणि त्याच्या बदलण्याने त्रास होत असेल तर तो त्रास आपण का करून घ्यावा.जर त्याला तो त्रास होत नाही तर आपणतरी तो त्रास का करून घ्यायचा. काही वेळा समोरचा कसा वागतो त्याच्याशी तसेच वागावे लागते.

आपल्यातल्या मीपणालाही केव्हातरी संधी द्यावीच लागते. समोरचा माणूस मनासारखा वागत नाही म्हणून दु:खाला कवटाळून का बसावे.भांडण एकाशी त्याचा परिणाम आपण इतर गोष्टींवर करत असतो, हे का कळत नाही ? आपलं एकाशी भांडण होतं. पण इतर नात्यातून जो आनंद  मिळणार असतो तो का आपण घेत नाही. जीवन आपल्याला पुन्हा मिळणार आहे का हो, नाही ना ? आणि वय उलटी गिनती करणार आहे का नाही ना? लहानपण, तरूणपण व म्हातारपण चुकलं आहे का, नाही ना?

जगात एकच गोष्ट अटळ आहे

मरण….येणारच फक्त कधी येईल आणि कोणत्या रूपाने येईल माहीत नसतं, फक्त त्याला कारण हवे असते…म्हणून मरणा अगोदर जगून घ्या…जगून घ्या……….

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अर्थसंकल्पाच्या निमित्ताने” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “अर्थसंकल्पाच्या निमित्ताने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नुकताच अर्थसंकल्प जाहीर झाला. सगळ्या देशाचं म्हणजेच अर्थतज्ञ मंडळींच ,व्यापा-यांच तसेच आर्थिक बाबीशी निगडित असलेल्या प्रत्येकाचं लक्ष ह्याकडे होतचं. प्रत्येक अर्थसंकल्प हा थोडी खुशी थोडा गम स्टाईलच असतो. ह्यामुळे ह्यात कोणाला जरा दिलासा मिळतो तर कुणाला पुढील सगळ्या गोष्टींची तरतूद करून ठेवावी लागते.

लहानपणापासून प्रश्न पडायचा हे अर्थशास्त्र, अंदाजपत्रक म्हणजेच बजेट आणि अर्थसंकल्प ही काय गोष्ट आहे? तेव्हा ह्या बाबींशी फारसा संबंध न आल्याने ह्याचे चटकन आकलन व्हायचे नाही..

मग थोडसं ह्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं अर्थसंकल्पामध्ये आयव्ययाचे म्हणजेच जमाखर्चाचे अंदाजपत्रक करआकारणी, वस्तुंच्या किमती ह्या सगळ्याची सविस्तर मांडणी म्हणजेच एक प्रकारचं गणित असतं.थोडक्यात अर्थसंकल्पाची व्याख्या म्हणजे विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची ताळमेळ बसवतं तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला अर्थसंकल्प ,बजेट ह्या गोष्टी आखाव्याच  लागतात. त्यानुसार आपले खर्चाचे आणि उत्पादनाचे कार्यक्रम योजावे लागतात.

लहानपणी आईबाबांची,वडीलधाऱ्या मंडळींची बजेट,बचत,तरतूद ह्या बाबींना व्यवस्थित महत्त्व देणं बघतं आलेय.आणि आज जरा युवावर्गाचे आजचा दिवस मस्त जगून घ्यावा, उपभोगून घ्यावा हा फंडा पण बघतेयं. ह्या दोन्ही बाबी अगदी तशा विरोधी त्यामुळे कायम मनात द्वंद्व  उभं राहायचं नक्की कोणाचं बरोबर आधीच्या पिढीचं की नंतरच्या पिढीचं.

पण दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या आकस्मित संकटाने ह्या प्रश्नाचं उत्तरं जवळपास शोधून दिलं.तसं तर कोणतीच टोकाची भुमिका ही बरोबर नसते पण योग्य म्हणून निवडायची झाली तर मला जास्त मागील पिढीची

भूमिका म्हणजेच भूक नसली तरी शिदोरी ही हवीच ही जास्त पटली. लहानपणी आईबाबांची बजेट,नियोजन, पुढील तरतूद ह्या गोष्टी म्हणजे कंजुषपणा वाटायचा. पण आता वाढत्या प्रचंड महागाईने,आर्थिक डोलारा डळमळीत झाल्याने,रोजगार मिळण्याच्या भ्रांत पडण्याच्या परिस्थिती ने परत एकदा आईबाबाचं बरोबर हे मी मनोमन कबूल केलयं.

पुढे बँकींग सेक्टर मध्ये काम करतांना “अंथरुण पाहून पाय पसरावे”, ह्या म्हणीचा प्रत्यय बघण्याचा योग खूपदा आला.बरेच जण आर्थिक नियोजन नीट न करता वारेमाप कर्जामुळे मानसिकरित्या कोलमडलेले पण बघण्यात आले.त्यामुळे मला मुळात आधीच भविष्याचे नीट नियोजन, आखीवरेखीव संकल्पना, आपलं बजेट हे आधीचं आखून कच्चा आराखडा तरी तयार असणं हे आवडायचं पण ह्या बँकींग सेक्टर मध्ये आल्याने त्याची आवश्यकता ही नक्कीच लक्षात आली.व्यापक दृष्टिकोनातून खूप काही शिकायला मिळालं,अनुभव गाठीशी बांधता आले.त्यामुळे दरवर्षी बजेट आखतांना हे मनाशी मी आधीच ठरवायचे आरोग्य,शिक्षण आणि घरचे ताजे सात्विक खाणे ह्यात अजिबात नो काटकसर परंतू चैनीच्या गोष्टी, ज्याचा कधीच अंत नसतो अशा रोज बाजारात नित्यनवीन येणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टी कमीपैशात वा स्वस्तात मिळाल्यातरी स्टेटस च्या नावाखाली डोलारा आखणं ह्याला अजिबात मनातच थारा द्यायचाच नाही.

खरचं प्रत्यक्ष संसारातील, घराचं बजेट तयार करतांना यजमान वा गृहीणीची तारांबळ उडते तर प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या देशाचं आर्थिक नियोजन ही काही साधीसोप्पी गोष्ट नव्हे.तरी दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्र्यांना ही कसरत करावीच लागते आणि सामान्य जनता त्यातील लाभ हानी जाणून घ्यायला उत्सुक असते.असा हा पैशांचा खेळ व्यवस्थित मेळ घालून खेळावाच लागतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५५ – मार्था ब्राऊन फिंके ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५५ – मार्था ब्राऊन फिंके ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

शिकागो मध्ये मत्सराग्नि भडकलेला होता. मिशनरी तर विरोधात गेले होतेच पण बोस्टनला जेंव्हा स्वामीजी महाविद्यालयात व्याख्यान द्यायला गेले होते त्यावेळी च्या व्याख्यानाने विद्यार्थी भारावून गेले होते. इतके की,त्या दोन दिवसांच्या भेटीमुळे म्हणा किंवा स्वामींच्या दर्शनाने वा ऐकलेल्या विचाराने म्हणा, भविष्यात काहींचे जीवनच प्रभावित झाले होते. त्यातालीच एक विद्यार्थिनी होती, मार्था ब्राऊन फिंके. त्या दोन दिवसांच्या आठवणीवर मार्था तिचे आयुष्य बदलवू शकली.

मार्था ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती ते स्मिथ कॉलेज म्हणून ओळखलं जात होतं.स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी १८७५ मध्ये सोफाया स्मिथ यांनी हे महाविद्यालय स्थापन केले होते. हे कॉलेज एक वैचारिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. न्यू यॉर्क आणि बॉस्टन च्या बरोबर मध्यावर नॉर्थअॅम्प्टन हे मॅसॅच्युसेटस राज्यातले टुमदार गाव होतं. त्या गावात हे कॉलेज होतं. मार्थाचं घर थोडं जुन्या वळणाचं होतं. जुन्या संस्काराच होतं. प्रोटेस्टंट ख्रिश्चन होते ते. त्यामुळे कॉलेजला बाहेर पाठवताना तिच्या आईवडिलांना तिची काळजी वाटत होती.बाहेर पडलेल्या मुली मुक्त विचारांच्या होतात असा सर्वांचा समज होता. कॉलेजला गेलेल्या मुली धर्म वगैरे मानत नाहीत असा अनुभव काहींचा होता.तिथे वसतिगृहात मुली राहत असत. वसतिगृहात जागा शिल्लक नसल्याने मार्था कॉलेज परिसरातच भाड्याने राहत होती.

ज्यांच्या घरात राहत होती ती घरमालकिण स्वभावाने कडक होती. पण चांगली होती. त्या कॉलेजमध्ये अधून मधून विचारवंत भेटी देत असत. असेच एकदा स्वामी विवेकानंद यांची नोहेंबर मध्ये दोन व्याख्याने असल्याचे तिथल्या सूचना फलकावर लिहिले होते. ते एक हिंदू साधू आहेत एव्हढेच त्यांच्या बद्दल आम्हाला माहिती होते असे मार्थाने तिच्या आठवणीत म्हटले आहे.ते एव्हढे मोठे आहेत हे माहिती नव्हते. त्यांची सर्व धर्म परिषदेतील किर्ति यांच्या पर्यन्त पोहोचलेलीही नव्हती.पण कुठून तरी कानावर आल की हे हिंदू साधू, मार्था राहत असलेल्या घरमालकिणी कडेच उतरणार आहेत आणि त्यांच्या बरोबर या मुलींचे जेवण पण असणार आहे. त्यांच्या बरोबर आम्ही मुली चर्चा पण करू शकणार होतो याचे तिला फार अप्रूप वाटले होते.त्यामुळे सर्वजनि घरमालकिणीवर जाम खुश होत्या. त्यांनी आपल्या या मालकिणीला उदार मतवादी म्हटले आहे कारण आपल्याकडे एका काळ्या माणसाची राहण्याची सोय करायची म्हणजे त्याला काळी हिम्मतच असावी लागते असे त्यांना वाटत होते.बहुतेक गावातील हॉटेलांनी त्यांना प्रवेश नाकारला असेल असेही त्यांना वाटलं.

मार्था म्हणते, आम्ही लहानपणापासूनच भारताचे नाव ऐकतं होतो कारण माझी आईसुद्धा हिंदुस्थानात जाणार्‍या मिशनर्‍याशी लग्न करणार होती.आमच्या चर्चमधून दरवर्षी भारतीय स्त्रियांसाठी मदतीची एक भली मोठी पेटी पाठवली जात असे. शिवाय त्यान काळात भारतबद्दल इतर माहिती अशी होती की, भारत हा एक उष्ण देश आहे. तिथे सगळीकडे साप फिरत असतात. तिथले लोक इतके अडाणी आहेत की, दगडा समोर किंवा लाकडासमोर डोके टेकवतात.बापरे . मारथाचे वचन चांगले होते तरी सुद्धा तिला भरता बद्दल फारशी माहिती नव्हती. ख्रिश्चन धर्मियांच्या दृष्टीकोणातून लिहिलेली भारताची माहिती फक्त तिला माहिती होती. एखादा भारतीय भेटून त्याच्याशी बोलायला कधी संधी नव्हती मिळाली.

त्यामुळे मार्था च्या घरमालकिण बाईंकडे विवेकानंद हे हिंदू साधू उतरणार तो दिवस आला. त्या दिवशी पाहिलेले स्वामी विवेकानंद कसे होते याचं तिने वर्णन केलय की, ‘ते उतरणार ती खोली तयार करण्यात आली. भारदस्त व्यक्तिमत्व,एक कला प्रिन्स अल्बर्ट कोट,काली पॅंट ,डोक्यावर डौलदार फेटा घातलेला अलौकिक चेहर्‍याचा, डोळ्यात विलक्षण चमक असलेला,असा हिंदू साधू ! घरी आल्यावर सर्व जानी भारावून गेल्या. मार्था म्हणते, मला तर तोंडून काही शब्दच फुटत नव्हते.इतकी भक्तिभावाने ती हे व्यक्तिमत्व बघत होती. संध्याकाळी व्याख्यान झाले त्यानंतर प्रश्नोत्तरे.

घरी त्यांना भेटायाला तत्वज्ञानाची  प्राध्यापक मंडळी, चर्चचे धर्माधिकारी, प्रसिद्ध लेखक, आले होते. चर्चा सुरू होती. सर्व मुली एका कोपर्‍यात बसून ऐकत होत्या. विषय होता, ख्रिश्चन धर्म – खरा धर्म. हा विषय स्वामीजींनी नव्हता निवडला, आलेल्या विचारवंत मंडळींनी निवडला होता. ते सर्व स्वामीजींना आव्हान देत होते. त्यांच्या त्यांच्या धर्माची माहिती असलेले मर्मज्ञ विषय मांडित. मार्थाला वाटले होते की स्वामीजी तर हिंदू त्यांना काय इकडचे कळणार व त्यावर कसे तोंड देणार? पण उलटेच झाले होते. स्वामी विवेकानंद आपली बाजू मांडताना, प्रती उत्तर देताना बायबल, इंग्रजी तत्वज्ञान, धर्मज्ञान, वर्डस्वर्थ, व थॉमस ग्रे यांचे  काव्य संदर्भ देऊन बोलत होते. ठामपणे बोलत होते. स्वामीजींनी त्यांच्या बोलण्यातून धर्माच्या कक्षा अशा रुंद केल्या की त्यात सर्व मानवजात सामील झाली आणि वातावरण बदलून गेले. मुक्त विचारांनी  दिवाणखान्यातील वातावरण भारावून गेले.या हिंदू साधुनेच बाजी मारली. त्यामुळे मी पण उल्हसित झाले असे मार्था ने लिहून ठेवले आहे. मार्था म्हणते आमच्या कॉलेज मधली मंडळी धर्माच्या बाबतीत फार संकुचित विचारांची होती. स्वतालाच ती शहाणी समजत. या बौद्धिक पातळीवरील चर्चेत स्वामीजींचा झालेला विजय मार्था च्या कायम लक्षात राहिला होता.

मार्थाने आणखी एक विशेष आठवण सांगितली आहे. तिथल्या वास्तव्यात दुसर्‍या दिवशी सकाळी, बाथरूममधून पाण्याचा आवाज व त्याबरोबर अनोळखी भाषेतले स्तोत्रपठण ऐकू येत होते. ते ऐकण्यासाठी सर्व मुली घोळक्याने दाराबाहेर उभ्या राहिल्या. एकत्र ब्रेकफास्ट च्या वेळी मुलींनी या स्तोत्राचा अर्थ स्वामीजींना विचारला.त्यांनी उत्तर दिलं, “प्रथम मी डोक्यावर पाणी ओततो . नंतर अंगाखांद्यावर. प्रत्येक वेळी सर्व प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे म्हणून मी ते स्तोत्र म्हणतो”. हे ऐकून मार्था आणि मुली भारावून गेल्या. मार्था म्हणते, “मीही प्रार्थना करत असे पण ती स्वतसाठी आणि नंतर कुटुंबासाठी. समस्त मानवजातीसाठी व प्राणिमात्रासाठी आपलेच कुटुंब आहे असे समजून प्रार्थना करावी असे कधीच मनात आले नव्हते आमच्या”. 

ब्रेक फास्ट नंतर स्वामीजी म्हणाले चला बाहेर फिरून येऊन थोडं, म्हणून आम्ही चार मुली त्यांच्या बरोबर गेलो . गप्पा मारत चाललो होतो, माला एव्हढेच आठवते की, ख्रिस्ताचे रक्त हा शब्दप्रयोग वारंवार केला जातो. हे शब्द मला कसेचेच वाटतात असे ते म्हणाले होते.यावर मीही विचार करू लागले. मलाही हे उल्लेख आवडत नव्हते. पण चर्चच्या तत्वांच्या विरुद्ध उघडपणे बोलायचे धैर्य हवे. पण इथेच माझ्यातील स्वच्छंद आत्म्याने मुक्त चिंतांनाचा स्त्रोत त्या क्षणी खुला केला आणि मी कायमची मुक्तचिंतक झाले. विषय बदलून मी त्यांना वेदांबद्दल विचारले कारण त्यांनी आपल्या भाषणात वेदांचा उल्लेख केला होता. मी वेद मुळातून वाचावेत असे त्यांनी माला सांगितले. मी त्याच क्षणी संस्कृत शिकण्याचे ठरविले . पण ते शक्य झाले नाही पुढे.

यावरून एक गोष्ट गमतीची आठवली. उन्हाळ्यात आमच्याकडे नवीन गुर्नसी पारडू पाळीव प्राण्यांमध्ये समाविष्ट झाले. माझ्या वडिलांनी तो माझ्याकडे सोपविला. त्याचे नाव मी वेद ठेवले. दुर्दैवाने ते वासरू लवकरच मेले. माझे वडील गमतीने म्हणाले की तू त्याचे नाव वेद ठेवले म्हणूनच ते गेले.

नंतर स्वामीजी परत एकदा अमेरिकेत येऊन गेले, ते कळले नाही. मग काहीच संबंध नाही आला. पण त्या दोन दिवसात स्वामीजींच्या विचाराने मार्था चे जीवनच उजळून गेले असे ती म्हणते. तिने वडिलांना पत्र लिहून हा वृत्तान्त कळवला तर ते घाबरून गेले. आपल्या घराण्याचा धर्म सोडून ही स्वामीजींबरोबर त्यांची शिष्या होऊन निघून जाते की काय अशी त्यांना भीती वाटली.

मार्था ने तिचे हे स्वतंत्र विचार तिच्यापुरतेच मर्यादित ठेवले. तिच्या मते मी लगेच हे अमलात आणले असते तर, जीवनात मला लगेच त्याचा उपयोग झाला असता. खूप वेळ वाया गेला. पण ती निराश नाही झाली. आतापर्यंत जरी चाचपडली असली तरी विचार पेरले गेले आहेत ते उगवणारच असा तिला विश्वास होता.  स्वामीजींनी सांगितलेला वैश्विक धर्म तिच्या अंतकरणात जाऊन बसला होता. ती १९३५ मध्ये जवळ जवळ ४२ वर्षानी, भारतात पहिल्यांदा कलकत्त्यात आली तेंव्हा, प्रथम ती एक प्रवासी म्हणून तिचा प्रवास सुरू झाला तर भारतात पोहोचल्यावर गंगेच्या काठावरील बेलुर मठात स्वामी विवेकानंदांच्या पवित्र स्मृतीचे, समाधीचे दर्शन घेतल्यावर आपण एक विश्वधर्माचे यात्रेकरू आहोत याची मनोमन खात्री झाली. तिथेच आत्मिक आणि मानसिक उन्नतीची ओढ असणार्‍या मार्था ने या आठवणी सगळ्यांच्या आग्रहाखातर सांगितल्या आहेत. मार्था जर दोन दिवसांच्या विचाराने एव्हढी प्रभावित झाली असेल तर आपल्याकडे हे तत्वज्ञान बारा महीने चोवीस तास उपलब्ध आहे विचार करण्याची गोष्ट आहे .

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संत निवृत्तीनाथ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “संत  निवृत्तीनाथ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एखादी व्यक्ती घडते तेव्हा ती घडतांना अनेक नानाविध गोष्टींचा, व्यक्तीमत्वांचा तिच्यावर कळत नकळत प्रभाव पडतो आणि मग तिच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण होते. ह्यालाच आपण संस्कार असही म्हणतो. ह्यामधूनच त्या व्यक्तीचे कर्तृत्व बहरते,तिचा विकास होतो आणि काही वेळा तिच्याकडून अतुलनीय कामगिरी घडून एक अद्भुत, अद्वितीय व्यक्तिमत्त्व आकारास येतं आणि पुढे वर्षानुवर्षे आपण कित्येक पिढ्यानपिढ्या त्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो.

ह्याचप्रकारे आपल्यासगळ्यांच्या माऊली म्हणवल्या गेलेल्या अद्वितीय अविष्कार म्हणून घडलेल्या ज्ञानेश्वर माऊलींना घडविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या निवृत्तीनाथांची आज प्रकर्षाने आठवण होते. संपूर्ण वारकरी मंडळींची साक्षात माऊली असलेल्या ज्ञानोबांना घडविण्याची किमया वा ताकद ही निवृत्तीनाथां कडे होती. माणसाच्या जडणघडणीत अनेक गोष्टींचा सहभाग असतो.त्यात जर ती व्यक्ती आपल्या सगळ्यांसाठी आदर्श व्यक्ती असेल तर आपण नकळत तीला घडविणा-या गोष्टींचा अभ्यास करतो.त्या गोष्टी लक्षात आल्यावर आपापल्या परीने त्याचे अनुकरण करायचा प्रयत्न करतो. अशा अनेक श्रध्दास्थानी आदरणीय व्यक्तींपैकी प्रामुख्याने निवृत्तीनाथांचे नाव अ्ग्रक्रमी राहील. नुकतीच  निवृत्तीनाथांची जयंती झाली.त्यांना कोटी कोटी प्रणाम.

भारतभूमी ही अनेक संताच्या सहवासाने पावन झाल्यामुळे खूप पवित्र, वैविध्यपूर्ण आणि संस्कृती ने परिपूर्ण झालेली आहे.अनेक संत,महात्मे येथे जन्मले आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना घडविले सुद्धा.त्यांच्या शिकवणी पैकी काही अंश जरी आपल्या कडून आचरणात आणल्या गेले तर जीवन धन्य होईल.

निवृत्तीनाथांचं अवघं 23 वर्षांचं आयुर्मान. पण ह्या अवघ्या 23 वर्षात अख्ख ब्रम्हांडाचं ज्ञान त्यांनी जगाला दिलं. त्यांची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी आपल्या ज्ञानोबारायांना घडविलं,वाढविलं. ज्ञानेश्वर माऊलींचे पालक,थोरले बंधू,गुरू, मार्गदर्शक, असं सर्व काही म्हणजे निवृत्तीनाथ जणू.त्यांनी आपलं मोठेपणं,वडीलपणं ह्या लहान भावंडांना आदर्श घडवून सार्थक केलं.

निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताई ह्या भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे सगळ्यात थोरले.जणू ह्या कुटूंबाचे पालकच.आईवडीलां- च्या पश्चात पालकांच्या जबाबदारीची भुमिका  निवृत्तीनाथांच्या वाट्याला आली.

भागवत संप्रदायाचे आद्यपीठ ज्ञानेश्वर माऊलींचे सकलतीर्थ,विश्वकल्याणासाठी पसायदानातील श्री विश्वेश्वरावो,आद्यगुरू, आदिनाथ ह्या उपाध्या लागलेल्या निवृत्तीनाथां च्या शिकवणींची आज परत ह्या निमीत्ताने मनोमन उजळणी होते.आईवडीलांबरोबर निवृत्तीनाथ एका जंगलात गेले होते.तेव्हा एका वाघाने त्यांना उचलून एका गुहेत नेले.त्या गुहेत त्यांना एका तेजःपुंज साधूने बहुमोल ज्ञान दिले. हेच ते त्यांचे गुरू, नाथपंथातील गहिनीनाथ होत अशी आख्यायिका आहे.

निवृत्तीनाथांनी एक हरीपाठ व तिनचारशे अभंग रचले आहेत.त्यांनी ज्ञानेश्वरांना सामान्य लोकांना समजेल, उमजेल अशा भाषेत गीता लिहावयास सांगितली, तीच ही भावार्थ दिपीका ज्ञानेश्वरी होय.

ज्ञानेश्वर, सोपानदेव ह्यांनी समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाईंनी अन्नपाणी त्यागून देह ठेवला.त्यानंतरच निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. खरचं ज्ञानेश्वर माऊलींसारख्या व्यक्ती घडविणारे निवृत्तीनाथ अलौकिक शक्ती चे प्रतीक. त्यांना परत एकदा कोटीकोटी प्रणाम

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सुखाची किल्ली…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “सुखाची किल्ली…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

बरेचदा मनात विचार येतो, माणसाला नेमकं काय हवं असतं ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला जाणं म्हणजे ते समुद्रातील पाणबुडे वा गोताखोर लोकं समुद्राचा तळ ढुंढाळायचा प्रयत्न करतात, तसं काहीसं वाटलं. सुख, आनंद ह्या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलत जातात. तरीही ढोबळमानाने सुखी होण्यासाठी काही बेसिक गोष्टींना अग्रक्रमाने स्थान मिळतं.

ह्या बेसिक गोष्टींपैकी पहिलं स्थान आपलं आणि कुटूंबियांच आरोग्य.”सर सलामत तो पगडी पचास” ह्या म्हणीनुसार आपलं निरामय आरोग्य आपल्याला खूपसारं मनस्वास्थ्य देतं. आपल्या वा आजुबाजुच्या अनुभवाने आपल्या लक्षात येतं आपला प्रत्येक अवयव हा तितकाच महत्त्वाचा असतो. आपल्याला जेव्हा एखाद्या अवयवाला ईजा होते तेव्हा नेमकं आपल्या मनात हटकून येतं,दुसरा कुठलाही अवयव एकवेळ परवडला पण ह्या अवयवाचं दुखणं नको रे बाबा.

दुसरं स्थान आपलं मानसिक आरोग्याचं. काही कारणाने आपली मनस्थिती जर ताळ्यावर नसेल तर त्याक्षणी प्रकर्षाने जाणवतं. एकवेळ शारिरीक आजारपण असलं तर दिसतं तरी पण काळजी,विवंचना ह्याने हरवलेलं मनस्वास्थ्य मात्र दाखवताही येत नाही अन लपवताही येत नाही.

तिसरी अवघडलेली अवस्था म्हणजे आर्थिक विवंचना. ह्या स्थितीतील व्यक्तींना वाटतं आरोग्यावर पैशाने इलाज तरी करता येतो. फक्त पैसा,सुबत्ता हवी मग काळजी आसपास ही फिरकतही नाही.

वस्तुस्थिती अशी असते की आपल्याला ह्या कुठल्याही प्रकारची चिंता नसली वा व्यक्ती जवळ जबरीची सहनशीलता असली तरी हा भवसागर तारुन जायला मदतच होते.

म्हणूनच संतांनी म्हंटलच आहे “सदा सर्व सुखी असा कोण आहे ?” . त्यामुळे सुखी होण्याची किल्ली ही आपलीच आपल्याजवळ असते हे खरं

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुटुंब, सेवा आणि  नोकरी, वगैरे… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

?  विविधा ?

☆ कुटुंब, सेवा आणि  नोकरी, वगैरे… ☆ श्री राहूल लाळे ☆

नववर्ष आलं आणि मागच्या वर्षाचा आढावा घेऊन पुढच्या वर्षात काय करायचं याचं प्लॅनिंग सुरू झालं. वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात वडील आजारी पडले. तसं मागचं वर्ष संपतानाच थोड्या तक्रारी चालू होत्याच, पण आता तीव्रता वाढली होती. अचानक ऑफिसमध्ये फोन आला की चक्कर येऊन पडले आणि लगेच निघालो. रस्त्यातूनच अँब्युलन्स घरी बोलवली आणि वडिलांना घेऊन दीनानाथ हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीत आणलं . परिस्थिती अवघड आहे आणि क्रिटिकल आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आणि आयसीयूमध्ये ऍडमिट केलं.

कोणतंही आजारपण, हे ते भोगणाऱ्याला जाणवतं आणि जवळच्या नातेवाईकांना, त्यांच्याशी संबंधितांना, हॉस्पिटलमध्ये काम करत असणारे डॉक्टर्स, नर्सेस, तिथले मामा-मामी आणि इतर सर्व सपोर्ट स्टाफना ही त्याची जाणीव होते…पण प्रत्येकाची त्याकडे पहायची दृष्टी वेगळी. डॉक्टर्स-नर्सेस-मदतीचा स्टाफ यांच्यासाठी जरी रुग्णांची सेवा करणं ही ड्युटी -कामाचा भाग असला तरी ती मनापासूनच करायला लागते – रुग्णाचा आजार त्याचं निदान करून दूर करायचा असला तरी भावनिक गुंतवणूक  न करता हे करणं महा कौशल्याचं काम. व्यक्ती तशा प्रकृती तसंच जेवढे रुग्ण तेवढे वेगवेगळे आजार व त्यांचे स्वरूप. यावर इलाज करताना अनेक नाजूक – अवघड आणि अनेकदा कसोटीचे प्रसंग येतात- त्यातून यशस्वी होऊन बाहेर पडणं सोपं काम नाही ! गेले काही आठवडे हॉस्पिटलमध्ये राहून अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. सुरवातीला वडलांना  इमर्जन्सीत आणल्यावर तिथल्या स्टाफने केलेली धावपळ – नंतर रात्रभर ICU मध्ये तिथे चाललेली लगबग – सकाळी बाबांना शुद्ध आल्यावर त्या अर्धवट  स्थितीत त्यांच्या  ” माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही” अशा काही तक्रारीही स्मितमुद्रा  धारण करून  डॉक्टर व इतर स्टाफचं त्यांचं काम करत राहणं म्हणजे त्यांना अशा किरकिऱ्या तर कधी अनेक सोशिक रुग्णांना एकाच वेळी अटेंड करणं यासाठी वैद्यकीय ज्ञान आणि प्रॅक्टिस याबरोबरच किती कौशल्याचं आणि धीराचं काम आहे हे नंतरही दोन-तीन आठवडे  जवळून पाहायला मिळालं.

जीवनदानाचं आणि रुग्णसेवेचं काम करणाऱ्या या सर्वांना अनेकदा दुवा मिळतात पण  काही विपरित प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याच्या प्रोफेशनल हॅझार्डना समोर जायला लागतं.  हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सेस , मामा-मामी आणि सिक्युरिटी  स्टाफ यांची  ( यात अनेक स्त्रियाच ) परिस्थिती काही वेगळी नाही – कधी रेग्युलर शिफ्ट म्हणून तर कधी ओव्हरटाईम म्हणून बारा बारा तास वेगवेगळ्या वेळेची ड्युटी करणं – अनेक रुग्ण – त्यांना भेटायला येणारे नातेवाईक- मित्रपरिवार यांना सांभाळून घेत सतत बारा महिने चोवीस तास हॉस्पिटलमध्ये  रुग्ण – त्यांच्या आणि नातेवाईकांच्या तक्रारी आणि दडपणग्रस्त  मनस्थितीत राहणं सोपं नाहीच.

सलग तीन आठवड्यांहून अधिक काळ लहानपणानंतर  वडिलांना आधी कधी  दिला होता  हे आठवायलाच लागेल. सुरुवातीचा पूर्ण  आठवडाभर पूर्ण वेळ  हॉस्पिलमध्येच होतो – ऑफिसला जाऊ शकलो नाही . नंतर इथं अनेक दिवस जाणार आहे हे कळाल्यावर आई – बायको – बहीण यांनी दिवसाचा वेळ वाटून घेतला आणि ऑफिसला जाणं  सुरु केलं.  संध्याकाळी ऑफिसमधून परस्पर हॉस्पिटलमध्ये जायचं आवरून  वडलांना जेवण भरवायचं – थोडावेळ बोलायचं – अनेक तक्रारी ऐकायच्या – समजावणूक काढायची सकाळचा चहा नाश्ता त्यांचा आणि माझा करून घरी जाऊन आवरून ऑफिसला जायचं असं टाईट शेड्युल सुरु झालं. ऑफिसला जायला थोडा उशीर होतोय पण सहकारी सांभाळून घेतायत. गेले तीन चार आठवडे हॉस्पिटलमध्ये अनेक चांगले वाईट अनुभव आले – चांगले प्रसंग डॉक्टर- हॉस्पिटल स्टाफ व इतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून तर वाईट म्हणजे  एवढ्या कालावधीत ओळखीचे झालेले काही रुग्ण डोळ्यासमोर  दगावताना  पाहणं आणि उगाचंच मनात गिल्टी कॉन्शस व्हायला होणं (ऍक्च्युअली त्यांचे नातेवाईक जास्त ओळखीचे झालेले – एकमेकांची दुःखं  शेअर करून ती हलकी होतात – ते अनुभवलं -). या ४ आठवड्यात काही समदुःखी मित्रमंडळी  भेटली, जी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या उपचारासाठी आली होती. त्यातली काही नेहमी भेटणारी तर काही अगदी वीस पंचवीस वर्षांनी भेटली. वडिलांवर उपचार करणारी डॉक्टर तर लहानपणीची मैत्रीण.. उपचाराबरोबरच तिचे आधाराचे बोल होतेच.. इतरही डॉक्टर मित्र मंडळी भेटली.

आणखी एक  गोष्ट म्हणजे कुटुंब एकत्र आलं – नातेवाईक -मित्रमंडळींचे  फोन किंवा येऊन भेटणं झालं.

 – हे भेटणं- बोलणं एरवीही  वेळोवेळी व्हायला हवं असं वाटू लागलं आणि भेटायला येणारे  किंवा आधाराचे शब्द देणारे आपले कोण आणि फक्त  आपले म्हणणारे कोण हेही स्पष्ट झालं. असो प्रत्येकाला आपापले व्याप असतात. बापूंशी (वडील) बरंच   जवळचं  बोलणं – त्यांचं ऐकून घेणं अनेक दिवसांनी झालं – बाहेरचे सगळे कार्यक्रम – काही लग्नं – बाहेरगावच्या व्हिझिट्स – रोटरीचे कार्यक्रम सगळं बंद – मात्र वाचन – मोबाईलवर काही क्लिप्स बघणं – थोडंफार लिहिणं चालू ठेवलं.

हे आजारपण, दुखणं-खुपणं आपल्या प्लॅनिंगमध्ये कधीच नसतं , नाही का?  आजारी माणूस वृध्द असेल तर तो आजारी पडू शकतो याची मनाची तयारी असते, तरुण किंवा कोणत्याही वयातला धडधाकट माणूस आजारी पडला तर  मात्र ते काळजीचं  कारण होऊन बसतं. आजार, आजारपण आणि त्याबरोबरच येणारे वैद्यकीय उपचार व खर्च याचं आपण कसं नियोजन करतो याचा खरोखरंच विचार करायला हवा, हे अनेकदा आपल्याला किंवा जवळच्या व्यक्तीच्या आजारपणात आपल्याला जाणवतं. तब्बेतीची आणि जीवाची काळजी असली तरी सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर एकवेळ निभावून येता येतं हे आता अनुभवायला मिळालं.

पण ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी काय करायचं ? तेही विदारक दृश्य सामोरं यायचं –  ती पाहतानाच दवाखान्यातच  एक पुस्तक वाचताना  ” लता भगवान करे ” या सत्य घटनेवर आधारित सिनेमाबद्दल वाचलं –  लता करे या पासष्टीच्या महिला आणि त्यांचे पती बुलढाण्याचे रहिवासी –  जमीनदाराच्या शेतात काम राबून आयुष्य काढलेले – आयुष्यभराची कमाई तीन मुलींच्या लग्नात खर्च होऊनही एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास सांभाळून सुखानं  जगणारं  जोडपं. सुख  हे बाह्य संपन्नतेवर अवलंबून नसून मनीच्या समाधानावर आहे हे दाखवणारं जोडपं. अचानक बाईंच्या पतीला गंभीर आजार होतो व तपासण्या करायला शहरात मोठ्या दवाखान्यात जायचा प्रसंग ओढवतो. आसपासच्या लोकांकडून पैसे गोळा करून लताबाई नवऱ्याला घेऊन शहरात मोठ्या दवाखान्यात जातात पण तिथल्या तपासण्या, डॉक्टरांच्या फिया , राहण्या खाण्याचा खर्च कळल्यावर त्या हबकून जातात. हॉटेल मध्ये खायला पैसे नाहीत म्हणल्यावर बाहेर दोन सामोसे घेऊन खाताना सामोसाच्या  पुडक्यावर बाई ” बारामती मॅरेथॉन मध्ये बक्षिसाची भव्य रक्कम” ही जाहिरात पाहतात आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला जाऊन संयोजकांच्या हातापाया पडून   नववारी साडीत – अनवाणी पायानी शर्यतीत सामील होतात – आणि आश्चर्य म्हणजे फक्त नवऱ्याचे प्राण वाचवायचे या एकमेव उद्देशाने – जिवाच्या आकांताने पळून  महागाचे शूज घातलेल्या स्पर्धकांना हरवून मॅरेथॉन जिंकतात व पायांना झालेल्या जखमा विसरून बक्षिसाच्या पैशाने नवऱ्यावरचे उपचार चालू करतात. प्रेम सर्वात श्रेष्ठ हे प्रूव्ह करून दाखवणं यापेक्षा वेगळं काय असतं ? – ही स्पर्धा लताबाईंनी पुढची दोन वर्षही जिंकली एवढं मात्र कळलं की हा नि:स्वार्थीपणा आपल्या माणसाच्या – कुटुंबाच्या प्रेमातून येतो – आपल्या माणसासाठी छोटा मोठा त्याग करायची भावना याच प्रेमातून -निस्वार्थीपणातून निर्माण होते – नाते संबंध पुन्हा जुळण्यासाठी ते पक्के होण्यासाठीही याचा हातभार लागतो – लताबाईंसारखं मॅरेथॉन पळणं सर्वांना शक्य नाही – त्याची गरजही नाही – पण भौतिक सुखाच्या सर्व गोष्टी जवळ असताना – त्या सर्व गोष्टीतून – रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून आपल्या माणसासाठी फक्त आजारपणातच नाही इतरवेळी ही भावना का जोपासू नये ? आणि या पलीकडे जाऊन आपलं क्षितिज थोडंसं  वाढवून – प्रेम- आत्मीयता- ममत्व बाळगून कुटुंबाबाहेरही इतरांना जेवढी जमेल तेवढी मदत करायला काय हरकत आहे ?   त्यात किती सुख समाधान मिळेल याची कल्पना ही गोष्ट वाचून आणि ४ आठवडे दवाखान्यात राहून मिळाली – योगायोगानं हेच ” जीवन समजून घेताना ” या गौर गोपाल दास यांच्या पुस्तकात या दिवसांत वाचायला मिळालं . आपलं कुटुंब आपण निवडू शकत नसतो पण आपल्या रूपातून आपल्या कुटुंबाला आणि कुटुंबही आपल्याला मिळालेली एक सुंदर भेटच नसते का ?

गेले तीन चार आठवडे असे गेले तरी या सक्तीच्या पण आता काहीश्या भावून गेलेल्या सेवेमुळे एक आंतरिक समाधान मिळाले हे नक्की पाहूया – आमच्या सर्वांच्या प्रयत्नांनी – डॉक्टर व नर्सेसच्या उपचारांनी – बापूंना  लवकर बरं वाटू दे – आणि आमचं सहजीवन असंच आंतरिक बहरू दे –  आणि इतर सर्व रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाइकांसाठीही  हीच भावना व्यक्त करण्यापलीकडे माझ्या हातात आज काय आहे ?

© श्री राहुल लाळे

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “व्यक्तिमत्व – चवदार,ठसकेदार…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

अल्प परिचय 

पती – कर्नल. डॉ.प्रकाश बेडेकर.

शिक्षण – बी. एस सी, एम.एड

सम्प्रति –  

  • २० वर्षे अध्यापनात कार्यरत
  • १० वर्षे दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेत सिनिअर समुपदेशक म्हणून काम केले
  • ललित लेखन करते.

दोन पुस्तके – १. सहजच – मनातलं शब्दात २. मला काही बोलायचय – ही प्रकाशित झालेली आहेत.

? विविधा ?

☆ “व्यक्तिमत्व – चवदार,ठसकेदार…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

आज दादा वहिनीला श्री.श्रीधर    कुलकर्णी यांचेकडे लग्नाचे  आमंत्रण आहे. कुलकर्णी काका  म्हणजे   आमचे चुलत घराणे.  खूप श्रीमंत.पैशाचा धबधबा पडतो की काय त्यांच्या घरी  ?? असं वाटतं.त्यातच  मुलांचीही बिझनेस मधे  मदत झाली.••• म्हणतात ना,•••• “पैसा पैशाला ओढतो.”••••

ते  काकांकडे बघून पटत. ••••

म्हंटल तर मुलं खूप शिकलेली नाही.पण पिढी  दर पिढी चालत आलेला बिझनेस मात्र उत्तम सांभाळतात. सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन  जन्माला आलेली ही मुलं, आपल्या बिझनेस मधे चोख आहेत.सरस्वती खूप प्रसन्न नसली तरी लक्ष्मीने मात्र आपला वरदहस्त  त्यांच्यावर छान  ठेवलेला आहे.•••••

श्रीमंतीची सर्व लक्षणे दिसतात. मोठा बंगला, दारासमोर चार गाड्या,घरात नोकर माणसे,म्हणजे घरच्या बायकांना  साधारण बायकांसारखे काम करायची गरज पडत नाही. उठणे बसणे पण अशाच लोकांबरोबर. ••••••

पैशाचा माज  चढला आहे, असं म्हणता येणार नाही. कदाचित ते सहज बोलत असावेत, वागत असावेत. पण ते  आपल्या सारख्या सामान्य  माणसांना कुठे तरी खटकत.,मनाला  लागत. असे  आमच्या दादाचे  नेहमी म्हणणे असते. वहिनीला काही ते पटत नाही व आवडत तर त्याहुनही नाही.  ••••

मागे  दादाच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला दादा वहिनी त्यांच्या घरी गेले असताना, त्यांना मिळालेली वागणूक वहिनी  अजूनही  विसरलेली नाही. प्रत्त्येक भेटीची   वहीनीची काही तरी खास आठवण आहेच.  नातं असलं तरी सांपत्तिक परिस्थिती मधे तफावत आहे.   तरीही काही महत्वाच्या  कार्यक्रमात दादा वहिनी जातातच.आपलं नातं टिकवण्यासाठी, कसलाही विचार न करता हजेरी  लावतात.•••••

तेंव्हा अनघा लहान होती,ती पण आई बाबांबरोबर जायची. काही प्रसंग तिच्या बालमनावर चांगले कोरले गेले होते. घरी अलमारी भरून क्रोकरी असताना,आम्हा तिघांना वेगवेगळ्या आकाराच्या स्टील प्लेट, वाटी मधे  चिवडा दिल्याचा प्रसंग तिला आठवतो. दुर्लक्ष केलेले ही आठवते. त्यानंतरची आईची कुरकुर,वाईट वाटणे,कधी कधी  आईचे रडणे,तिच्या चांगले लक्षात होते. एकदा पूजेला गेले असताना, पूजेचे महत्व कमी व श्रीमंत लोकांचा कौतुक समारंभच  जास्त वाटत होता.वहीनी खूप खुशीने तेथे कधीच गेली नाही. ••• 

दादा ची परिस्थिती सामान्य होती. येथे लक्ष्मी नाही,पण  सरस्वती मात्र खूप प्रसन्न होती.दादाची  मुल शिक्षणात हुशार होती,म्हणून त्यांच्या शिक्षणाकरिता दादा वहिनीने  कधी काही कमी पडू दिले नाही.•••

अनघा ने ग्रॅज्युएशन नंतर  स्टेट लेवल, नॅशनल लेवल च्या परीक्षा दिल्या.’ UPSC ‘ पास केली.आज ती पोलीस खात्यात उच्च अधिकारी आहे.••••

आज कुलकर्णी काकांकडे लग्नाला जायचे आहे.अनघा म्हणाली मी पण येईन. ती अशा एका दिवसाची वाट बघतच होती.••••

अचानक तिच्या समोर फ्लॅश बॅक सुरू झाला. आईच्या डोळ्यातील अश्रु आठवले.

 “आपण नेहमी चांगले वागायचे”. असा  बाबांचा  नियम आहे. त्यामुळे नाइलाजाने आई,बाबांबरोबर जात असे.•••

अनघा रंगाने सावळी व जेमतेम उंची, म्हणून तिच्या वर तेथे  कटाक्ष व्हायचे.कसं होईल हिचे ???  ही काळजी  तिच्या आई बाबांपेक्षा त्यांनाच  जास्त होती. त्यांच्या घरी  आई बाबांकडे दुर्लक्ष करतात. ही गोष्ट तिच्या मनात घर करून बसली होती. काही दुःख सारख आपलं डोकं वर काढतात.व तुम्हाला त्याची सतत आठवण करून देत राहतात. व प्रत्त्येक आठवणीबरोबर ती सल वाढतच जाते.••••

आई बाबा  लग्नाला जायला निघाले.अनघा आॅफिस मधून  सरळ हॉलवर येणार होती.•••

तसं  अनघाला सहज सुट्टी घेता आली असती, व छान तयार होऊन लग्नाला जाता आले असते. पण  तिला काळया सावळ्या अनघाचा  ‘रूबाब ‘ दाखवायचा होता. खरं तर हे असे  वागणे तिच्या स्वभावात बसत नव्हते. पण जुन्या प्रसंगाची आठवण व आई बाबांना मिळालेली वागणूकही  ती विसरली नव्हती. आज  आई बाबांना खासकरून आईला तिची  प्रतिष्ठा मिळवून द्यायची   होती. त्यांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. ••••

पोलिस अधिकारी च्या युनिफॉर्म मधे अनघा हॉलवर पोचली. मस्त कडक युनिफॉर्म  त्यावर   ACP rank चे लागलेले  स्टार्स, डोक्यावर लावलेली cap,हातात स्टीक, चकचकीत बूट,  कमरेवर बेल्ट.डोळयांवर काळा चष्मा. तिला आॅफिसकडून मिळालेल्या  गाडीतून अनघा आली.लगेच ड्रायव्हर ने  कारचा दरवाजा   उघडला. अदबीने बाजूला उभे राहून, एक कडक सॅलूट मारला.•••

”  व्वा !!!काय शान होती अनघाची.”

तेथील सर्व लोक बघतच राहिले. लहान मुले तर जवळ येऊन बघू लागली.अनघाचा मोबाईल कारमधेच राहिला होता, तेंव्हा ड्रायव्हर ने तो तिला आणून दिला व पुन्हा एकदा  तसाच कडक सॅलूट मारला.•••

हाॅलमधील सुंदर महागड्या पैठणी निसून, दागिन्यांनी लदलेल्या, ब्युटी पार्लर मधून सरळ हॉलवर आलेल्या so called smart, श्रीमंत बायका बघतच राहिल्या. आता आकर्षणाचा केंद्रबिंदू  पोलिस अधिकारी ‘अनघा ‘ होती.••••

श्रीधर काकां काकू,व त्यांच्या घरचे इतरही  सर्व, अनघाच्या स्वागतासाठी लगेच आले. ••••

अनघाने वेळ कमी असल्यामुळे मी सरळ आॅफिसमधूनच आले व लगेच मला जावे लागेल.  असे सांगितले.••••आज सर्वांशी भेट  होईल,  म्हणून मी आले.••••पुर्वी लहान असताना मी आई बाबांबरोबर येत असे. •••पण  या मधल्या काळात मला येणे जमलेच नाही.•••तिने सर्वांची विचारपूस केली.••• सर्वांना आनंदाने भेटली. वर वधू ला भेटली. फोटोग्राफर ने तिचे आवर्जून बरेच फोटो काढले. आपल्यामुळे वर वधू कडे दुर्लक्ष व्हायला नको, म्हणून तिने लगेच निघायचे  ठरविले •••••

लगेच अनघाच्या जेवणाची सोय झाली. तिच्या ड्रायव्हरला ही  आदराने जेवण दिल्या गेले..आई बाबा हे सर्व डोळे भरून बघत होते.आजही आईच्या डोळ्यात अश्रू आलेच. पण ते  मुलीचे कौतुक बघून, तिचा होणारा मानसन्मान बघून.••••

अनघाच्या  आई-बाबांना लग्न घरात सर्वांसमोर मान मिळाला. आईच्या मनातील सल दूर झाली होती.अनघाचा उद्देश्य पूर्ण झाला  होता,तो ही बाबांचा नियम सांभाळून,”आपण नेहमी चांगले वागावे”.  ••••

निघताना   अनघा आई बाबांना म्हणाली,••••आई-बाबा जास्त उशीर करू नका. अंधाराच्या आत घरी पोहचा. ••••

श्रीधर काकांची पंधरा वर्षांची नात ‘ राधा’ अनघा जवळ येऊन म्हणाली,ताई मला पण तुझ्या सारखे पोलिस अधिकारी बनायचे आहे. बाबा,माझा ताई बरोबर फोटो काढा ना.तो मी माझ्या स्टडी टेबल वर ठेवेन.••••

अनघा म्हणाली,••• हो का  ??

मग छान अभ्यास कर.मी तुला वेळोवेळी guidance देईन. ••••

एकंदरीत अनघाचा प्रभाव जबरदस्त होता.•••

“वक्त वक्त की बात हैं।

 वो भी एक  वक्त था ।

आज भी एक वक्त हैं।”••••

आज कुलकर्णी काकांच्या ड्रायव्हर ने आई-बाबांना घरी पोहचविले.••••

म्हणतात ना,•••

“Your greatest test is how you handle people who have mishandled you.” ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चप्पल…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “चप्पल…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नवीन घरं लावतांना अनेक जुन्या गोष्टी बाद करुन त्याची जागा नवीन वस्तू घेतात. काही वेळी खरोखरच जुन्या वस्तू ह्या बाद झाल्याच्या सिमारेषेवरच असतात फक्त आपल्या भावना त्यात अडकल्याने त्या अजून हद्दपार झालेल्या नसतात.

परंतु आपल्या वस्तुंबाबत त्याच भावना नेक्स्ट जनरेशन वा दुसऱ्या व्यक्तीच्या नसल्याने त्या वस्तू बदलायला आपण सोडून बाकी सगळे जणू सरसावून तयारच असतात.

ह्या सगळ्या गोष्टींमध्ये “शू रँक” बदलायची ठरली. आजकाल संपूर्णपणे झाकल्या जातील अशा ” शू रँक ” आँनलाईन पण भरपूर मिळतात. पूर्वी अगदी छोटासा चप्पलस्टँड सहज पुरून जायचा. कारण सहसा घरी जितकी मंडळी तितके चपलांचे जोड असं साधं सोप्प समीकरण होतं.

आता मात्र सगऴ गणित, समीकरण जणू पालटूनच गेलयं.  एकाच व्यक्तीचे किमान चार पाच जोडं हे पादत्राणांचे असतातच असतात. अर्थातच हे सरासरी गणित हं. बाहेर घालायच्या चप्पल,वाँकसाठी सँडल्स वा शूज, घरात घालायच्या स्लीपर्स, आणि एखादा नवाकोरा एक्स्ट्रा जोड.असो. काळ खूप बदललायं हे खरं. आपल्या दोन पिढ्या आधी सरसकट सर्वांना कायम चप्पल मिळायच्याच असं नाही. बराच काळ ते अनवाणी काढायचे.आता अनवाणी हा शब्द कुणाच्याही डिक्शनरीतच नाही. आपल्या आधीच्या पिढीला एक जोड मिळायचा तो वर्षभर म्हणा वा अगदी झिजून झिजून तुटेपर्यंत वापरावा लागायचा.आपल्या पिढीला एक नेहमीचा आणि एक एक्स्ट्रा जोड मिळायचा शिवाय हरवल्या तर मार न बसता नुसती शाब्दिक बोलणी खावी लागायची. आताच्या पिढीला तर काही बोलूच नये.त्यांच्या पादत्राणांचा स्टाँक बघितला तर आपले फक्त डोळे विस्फारल्या जातात, शब्द मात्र फुटत नाही. असो.

ह्या चप्पल वरुन आठवलं, “चप्पल”नावाची  एक मस्त मराठी शाँर्टफिल्म मी नुकतीच बघितली. फिल्म बघतांना आपोआपच डोळे पाणवतात हेच त्या फिल्मचे यश. सोबत लिंक देतेयं.वेळ मिळाल्यास बघून घ्या. ह्या फिल्ममध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. शेवटी माणसं,नाती हीच आपली खरी इस्टेट. त्यांना जपलं,त्यांच मनं ओळखलं, त्यांच्यासाठी जे काही आपण करु त्याच्या दुप्पट कधी ना कधी आपल्याकडे रिबाँड येईलच.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प, भाग –५४ – उत्तरार्ध – मत्सराचा अग्नी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

विचार–पुष्प, भाग –५४ – उत्तरार्ध – मत्सराचा अग्नी डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प’.

हुश्श! स्वामी विवेकानंद यांना स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरो शी केलेला व्याख्यानांचा करार आता संपला होता. तरीही त्यांची व्याख्याने सतत होत होती आणि अनेकजण त्यांच्या विचारांकडे आकृष्ट होत होते. ही संख्या वाढतच होती. त्यामुळे यातून आपले खरे अंतरंगशिष्य त्यांना शोधायचे होते. तिथल्या सामाजिक कामाची पाहणी केल्यावर त्यांना आपल्या कामासाठी संघटना किंवा संस्था उभी करावी हे मनोमन पटले होतेच. असे त्यांनी एकदा मिसेस लायन यांना बोलून दाखवले होते. म्हणजेच त्यांच्या मनात अशी संघटना कोणाची करायची? त्याचे उद्दिष्ट्य काय असेल? कार्यपद्धती कशी असेल याचे विचारमंथन सुरू होते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, शब्दात आणि मनात देशभक्तीच होती.त्यांचे ध्येय फार मोठे होते. त्यांना भारताचे पुनरुत्थान घडवायचे होते. हे घडवून आणण्यासाठी आत्म्याला जाग आणणे महत्वाचे होते,ती जाग आणण्यासाठी चे अध्यात्म ज्ञान आवश्यक आणि त्यांच्या दृष्टीने हे अध्यात्म ज्ञान फक्त भारतच सार्‍या जगाला देऊ शकत होता.म्हणून ही जाग सर्वांमध्ये निर्माण करणे हेच स्वामीजींचे ध्येय होते.

तिथे अमेरिकेत त्यांच्या व्याख्यानांशिवाय असे काही प्रसंगही घडत होते घटना घडत होत्या.

एकदा घडलेली घटना आहे. अमेरिकेत श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्या तुलनेत स्वामीजी कृष्णवर्णीय वाटत असत. एका गावात ते स्थानकावर उतरले आणि त्यावेळी काही समिति सदस्य त्यांना घ्यायला आले होते. हे तिथल्या एका निग्रोने पाहिले. त्याच्या दृष्टीने हा माणूस आपल्यापैकी एक कृष्णवर्णीयच होता.मग आपल्या पैकी एका बांधवाचा गौरवर्णीय लोक एव्हढा आदर करताहेत हे पाहून तो मोहरून गेला. तो खर तर एक हमाल होता. तो स्वामीजींजवळ येऊन म्हणाला, “मला तुमच्याशी हस्तांदोलन करण्याची ईच्छा आहे. मी भारतीय आहे असे काहीही न सांगता स्वामीजींनी त्याचा हात प्रेमभराने हातात घेतला आणि त्याला म्हणाले, “ धन्यवाद माझे बंधो, धन्यवाद! तो निग्रो खूप भारावून गेला होता.  स्वत:चे देशबांधव प्रेम आणि अखिल मानवजातीचे वाटणारे प्रेम एकाच ठिकाणी ? तर या उलट काही ठिकाणी स्वामीजींना निग्रो समजून केशकर्तनालयात बाहेर काढून अपमान केल्याचाही प्रसंग घडला.

अमेरिकेत आता स्वामीजींना न्यूयॉर्क मध्ये जाण्याचे आमंत्रण मिळाले होते. तत्वज्ञानाच्या अभ्यासात गोडी असणार्‍या काही जणांचा हा गट होता, त्यांनी बोलवले होते.त्यात डॉ.एगबर्ट ग्युएर्न्सि,मिसेस स्मिथ,मिस हेलन गौल्ड हे लोक  होते, ग्युएर्न्सि यांच्या कडे स्वामीजी राहायला होते. हेल आणि बॅगले यांच्या प्रमाणेच ग्युएर्न्सि पतिपत्नी यांचे स्वामीजींशी घरगुती संबंध तयार झाले.ग्युएर्न्सि व्यवसायाने डॉक्टर होते. लेखक, नियतकालिकाचे संपादक होते. ब्रुकलीन डेली टाईम्स आणि न्यू यॉर्क मेडिकल न्यूज टाईम्स याचे संस्थापक पण होते. वय एक्काहत्तर ,विवेकानंदां च्याच वयाचा त्यांचा तरुण मुलगा नुकताच स्वर्गवासी झालेला. त्या धक्क्यातून ते अद्याप सावरले नव्हतेच,मिस गौल्ड सुद्धा अफाट श्रीमंत होत्या त्यांच्याकडेही स्वामीजी राहण्यास गेले. अशा या न्यूयॉर्कच्या मुक्कामात त्यांचा अनेक मोठमोठ्या लोकांशी सबंध येत होता. बोलवले की जात व्याख्याने देत, भेटत, चर्चा करत. शिवाय तिथल्या महत्वाच्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. सहा-सात दिवस भुररर्कन  निघून गेले, आता ते बोस्टनला आले होते. तिथे अठवडाभरात महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समोर विचार व्यक्त केले, त्यावेळी मार्था ब्राऊन फिंके महाविद्यालयात शिकत होती. तिथे पहिल्यांदा विवेकानंद यांना तिने पहिले. विचार समजण्याचे वय नव्हते पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव आपल्यावर पडला असे तिने आठवणीत लिहून ठेवले आहे. एव्हढे श्रेष्ठ असूनही ते आम्हा विद्यार्थ्यात मिळून मिसळून वागले हे तिला विशेष वाटले होते. पुन्हा न्यूयॉर्क, परत बोस्टन व जवळपास फिरणे चालू होते.

प्रा राइट यांच्या निमंत्रणावरून स्वामीजी बोस्टनला पुन्हा आले होते. हार्वर्ड आणि बोस्टन इथे त्यांची व्याख्याने झाली होती. इथे बोस्टनला मिसेस ओली बुल यांची पहिली भेट झाली होती. ज्या पुढील कार्यात सहभागी झाल्या आहेत.तसेच इथे त्यांना कर्नल थॉमस वेंटवर्थ हिगिनसन्स जे सर्वधर्म परिषदेत पण भेटले होते ते भेटले. विमेन्स क्लब मध्ये मिसेस ज्युलिया वॉर्ड होवे यांनी स्वामीजींचे व्याख्यान ठेवले होते. त्याही भेटल्या. असे दौरे चालू होते स्वामीजी फार थकून गेले. नंतर हेल यांच्या कडे ते विश्रांतीसाठी थांबले.

इझाबेला मॅककिंडले हिने स्वामीजींना भारतातून आलेला सर्व पत्रव्यवहार पाठवला. यात होती भारतात झालेली वृत्तपत्रीय प्रसिद्धीची कात्रणे .काहींमध्ये अमेरिकेतला गौरव होता. ते ठीक होते , पण भारतात आपल्याबद्दल जो विरोधी प्रचार चालला होता त्याचीही कात्रणे त्यात होती.ती वाचून स्वामी विवेकानंद यांना फार फार वाईट वाटले. त्यांनी इझाबेलाला कळवले की, “माझ्याविषयी माझ्याच देशातील लोक काय म्हणतील याची मी फार फिकीर करीत नाही. पण एक गोष्ट मात्र आहे की, माझी आई वृद्ध आहे, सार्‍या आयुष्यभर तिने कष्ट उपसले आहेत.असे सारे असूनही जिच्या सार्‍या अशा ज्याच्यावर केन्द्रित झाल्या होत्या असा आपला मुलगा ईश्वराच्या आणि मानवाच्या सेवेसाठी देऊन टाकण्याचा भार तिने सहन केला. पण मजूमदार कलकत्त्यात सर्वत्र सांगत आहेत, त्याप्रमाणे दूर परदेशात कोठेतरी गेलेला हा आपला मुलगा तेथे पशुसारखे जीवन घालवत आहे ,अनीतिमान झाला आहे, हे जर का तिच्या कानावर गेलं,तर त्या धक्क्याने ती प्राण सोडेल, पण परमेश्वर दयाघन आहे. त्याच्या मुलांना कोणीही अपाय करू शकत नाही”. हे प्रतापचंद्र मजूमदार यांचे कलकत्त्यातले प्रताप वाचून स्वामीजी, आईच्या आठवणीने बेचैन झाले. खरे तर ते स्वत:  शांतपणे या सर्वांना अजूनही तोंड देत होते.

प्रतापचंद्र मजुमदार कलकत्त्यात आपल्याबद्दल एव्हढे भयानक सांगत आहेत . या वृत्तपत्राचे संपादक मजुमदारांचा चुलत भाऊ आहे.ज्याने याआधी आपले एव्हढे कौतुक केले ते आता?

याचा पहिला धक्का स्वामीजींना परिषदेच्या वेळी बसला होताच . ज्या प्रतापचंद्र मजुमदारांनी ब्राहमो समाजात उपासना संगीत गाणारा नरेंद्र पाहिला होता ,एव्हढ्या लांबच्या देशात त्यांना नरेंद्र पुन्हा भेटल्यानंतर आपल्याला जणू घरातले वडीलधारी भेटल्याचा आनंद नरेंदला झाला होता पण घडलं होतं उलटच . पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते नरेंद्रशी अगत्याने बोलले होते.पण जेंव्हा सर्व माणसे प्रचंड संख्येने नरेंद्र भोवती गोळा होऊ लागली तसतसे मजुमदार यांना मत्सर वाटू लागला ,परिषदेतल्या मिशनर्‍यांजवळ त्यांनी स्वामीजींची निंदा करणं सुरू केलं. नरेंद्र हा तसा कोणीच नाही तो एक लुच्चा आणि ठक आहे येथे येऊन संन्यासी असल्याचे ढोंग करीत आहे. असे सांगून त्यांची माने कलुषित केली.त्यात ते यशस्वी झाले. या सगळ्यावर मात करून स्वामीजी पुढे निघून गेले होते.

विवेकानंद यांचे विचार, त्यांचे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व यामुळे तिथले सगळेजण भारले गेले होते तसे , मत्सराची दुसरी वाईट बाजुही त्याला होती. विरुद्ध प्रचार. आता मात्र विवेकानंद यांनी या वृत्तपत्रांकडे लक्षच द्यायचे नाही असे ठरवले होते.काहीही छापून आल तर ते मनावर घेत नसत. त्यातून आता भारतात सुद्धा हा अपप्रचार चालू आहे आणि हे सर्व प्रतापचंद्र करीत आहेत हे कळल्यापासून तर त्यांना खरे विश्वासच बसत नव्हता. प्रतापचंद्र या पातळीला जातील हे स्वप्नातही वाटले नाही. खेटरीचे राजेसाहेब आपल्या पाठीशी उभे आहेत म्हणून आपण निश्चिंत पाने इथे आलो. पण आता? आपण दूर्वर्तनी आहोत शिलभ्रष्ट आहोत असे प्रतापचंद्र सर्वत्र सांगत आहेत. हे ऐकून आपल्या आईला काय वाटेल? ही वेदना त्यांना सतावत होती.

मत्सर भावनेतून चक्क चारित्र्य हनन सुरू होते. सुरूवातीला फक्त विरोध मग विरोधाचे तीव्र स्वरूप, मग प्रचार आणि किर्ति जशीजशी वाढली तशी विरोधासाठी पद्धतशीर मोहिमच सुरू झाली होती.मग सुरू झाला छुपा खोटा प्रचार. विवेकानंद यांचे चारित्र्य शुद्ध नाही. ते तरुण सुंदर मुलींना फूस लावून आपल्या जाळ्यात ओढतात वगैरे सांगू लागले. यात मिशनरी, ब्राह्मसमाजी आणि थिओसोफिस्ट आघाडीवर होते. हे अमेरिकेत सुरू होते पण प्रतापचंद्र भारतात काही दिवसांनी परत आल्यावर भारतात सुद्धा ही मोहीम त्यांनी सुरू ठेवली होती. ब्राह्म समजाच्या मुखपत्रात विवेकानंद यांच्या विरोधात लेख येत असत. इतर नियतकालिकात सुद्धा असे लेख येत होते आणि हे सर्व लेख अमेरिकेत पाठवले जात, तिथेही ते प्रसिद्ध करत.अशा प्रकारे मत्सराचा अग्नि पेटला होता. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print