☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
परमेश्वराशी तादात्म्यता-१
मागील भागात स्वतः तुकाराम महाराज निःसंग होऊन लोकांनाही भवभया पासून मुक्त होण्यासाठी कसे सावध करीत होते हे आपण पाहिले. एकदा जीवनात निःसंगता आली की द्वैतभाव नष्ट होऊन परमेश्वराशी तादात्म्यता कशी येते याविषयी गाथेतील काही अभंग घेऊन आपण या भागात विवेचन करूया.
शरणागत भक्तांना तुकाराम महाराज काय सांगत आहेत?
ब्रह्मादीक जया लाभासी ठेंगणे/
बाळीये आम्ही भले शरणागत//१//
ते भक्तांविषयी आणि स्वतः विषयी बोलत आहेत. ब्रह्मादीकांना सुद्धा जो लाभ होऊ शकत नाही, ते त्यासाठी ठेंगणे, तोकडे पडतात तो लाभ देवाला शरण आलेल्या आम्हा भक्तांना अगदी सहज होतो. त्याचे कारण काय? तर
कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ/
झाला पद्मनाभ सेवाऋणी//२//
आम्ही कामना, वासनांचा त्याग केल्यामुळे आम्हाला भजनाचा लाभ झाला आहे आणि आमच्याकडून होणाऱ्या या सेवेसाठी प्रत्यक्ष विष्णू सुद्धा आमचा ऋणी झाला आहे.
परमेश्वराला प्रसन्न करण्याचे भजन हे फार प्रभावी साधन आहे.
कामधेनुच्या क्षीरा पार नाही/
इच्छितचिये वाही वरुसावे//३//
या ठिकाणी महाराजांनी कामधेनूचे रूपक वापरले आहे. कामधेनूचे दूध कधीही न आट णारे असते. या सर्व संत मंडळींची हरी म्हणजे कामधेनू आहे. जेवढ्या आमच्या हरिभक्तीचा जोर मोठा तेवढा या धेनूचा पान्हा सकस आणि सरस!
हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी/
नारायण अंगी विसावला//४//
आम्हाला बसल्या जागी परिपूर्णत्व आले आहे. आता आमच्या ठिकाणी ध्याता, ध्यान, आणि ध्येय असा भेद राहिला नाही. नारायण आमच्या अंगी विसावला आहे अर्थात आम्ही अद्वितीय ब्रह्मरूप झालो आहोत.
शेवटी याच अभंगात महाराज सांगतात,
तुका करी जागा/ नको वासपू वाउगा/
आहेस तू अंगा/ अंगी डोळे उघडी//५//
प्रत्यक्ष भगवंत हृदयात स्थिर झाल्यामुळे, नारायणमय झाल्यामुळे आम्ही भक्तजन अत्या- नंदाच्या भोजनाचा आस्वाद घेत आहोत. वासनाक्षयामुळे आम्हाला पुनर्जन्म नाही. नारायण स्वरूपाशी तादात्म्यभाव हे या अवस्थेचे रूप आहे.
निजरूप विसरून तुकाराम महाराज झोपी गेलेल्याला जागे करतात. त्याला सांगतात की तू भिऊ नकोस. अद्वैतरूपी हरी तुला सापडेल कारण तू स्वतःच अंगाने तो आहेस, परमात्मा रूप आहेस. जेव्हा तू तुझी आत्मिकदृष्टी उघडून पाहशील तेव्हा तुला त्याचे ज्ञान होईल.
एकात्मतेचे दुसरे उदाहरण या अभंगातून पहा.
माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया/
अंग आणि छाया जया परी//
आपले शरीर आणि सावली ही जशी वेगळी नसतात, त्याचप्रमाणे माया आणि ब्रह्म या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. जरी या दोन वेगळ्या गोष्टी भासल्या तरी तत्वतः त्या एकच आहेत. छाया कोणत्याही शस्त्राने तुटत नाही. हाताने तिला दूर सारता येत नाही. जमिनीवर लोटांगण घातले तरी ती वेगळी न होता आपल्या अंगाखाली दिसेनाशी होते. आपण उंच झालो तर ती उंच होते, वाकलो तर ती आपल्याबरोबर लवते.
*
आता केशी राजा हेची विनवणी/
मस्तक चरणी ठेवीतसे//१//
*
देह असो माझा भलतीये ठाई/
चित्त तुझ्या पायी असो द्यावे//२//
*
काळाचे खंडण घडावे चिंतन/
तन मन धन विन्मुखता//३//
*
कफ वात पित्त देह अवसाने
ठेवावी वारुनी दुहिते ही//४//
*
सावध तो माझी इंद्रिय सकळ/
दिली एक वेळ हाक आधी//५//
*
तुका म्हणे तू या सकळाचा जनिता/
येथे ऐक्यता सकळांसी//६//
*
इथे परमेश्वराला उद्देशून महाराज म्हणतात,
“हे केशवा, तुझ्या पायांवर मस्तक ठेवून मी तुला विनंती करतो की, माझा देह कुठेही असो, पण चित्त मात्र तुझ्या ठिकाणीच असावे. देह, मन, द्रव्य याचा मोह नष्ट होऊन अखंड तुझ्याच चिंतनात माझा सर्व वेळ खर्च व्हावा. कफ, वात, पित्त या त्रिदोषांचे माझ्या अंतकाळी निवारण व्हावे. जोपर्यंत माझी सर्व इंद्रिये सावध आहेत तोपर्यंत मी तुम्हाला साद घालून वर्तमान परिस्थिती निवेदन करीत आहे. “
सामान्य जन मूढ आहेत, त्यांना परब्रम्ह स्वरूपात द्वैतभावना नाही हेच मुळी समजत नाही. त्यांना तारण्यासाठी भक्तीचे महात्म्य पटवून देणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज त्यांच्या मनातील हे विचार खालील अभंगात सांगत आहेत.
याजसाठी भक्ती/ जशी रुढवावया ख्याती/
नाही तरी कोठे दुजे/ आहे बोलावया सहजे/
गौरवावयासाठी/ स्वामी सेवेची कसोटी/
तुका म्हणे अळंकारा/ देवभक्त लोकी खरा//
लोकांमध्ये भक्तीचा गौरव होण्यासाठी स्वामी, सेवक आणि सेवेची कसोटी या गोष्टी येतात. लोकांमध्ये देव आणि भक्त यांचे वरवरचे द्वैत हे भूषण आहे, अलंकाराप्रमाणे आहे. या सगूण भावातूनच हळुहळू जनसामान्यात एकरूपता येते.
ईश्वराशी महाराजांची संपूर्ण तादात्म्य पावलेली अवस्था या अभंगात ते वर्णितात.
काहीच मी नव्हे कोणीये गावीचा/
मी कोणीच नाही. मला ना नाव ना गाव. जागच्या जागी असणारे जे एकमेव ब्रह्म आहे तेच मी आहे.
*नाही जात कोठे येत फिरोनिया/ मी कोठे जात नाही की मी परत येत नाही.
नाही मज कोणी आपले दुसरे/
कोणाचा मी खरे काही नव्हे//
मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही, माझ्यात आप-परभाव नाही.
नाही आम्हा जावे मरावे लागतं/
अहो अखंडित जैसे तैसे//
आम्ही जगत नाही की मरत नाही, कायम जसेच्या तसे राहतो.
तुका म्हणे नामरूप नाही आम्हा/
वेगळा या कर्मा-अकर्मासी//
आम्हाला रूप नाही, नाव नाही, कर्म-अकर्म यापासून आम्ही वेगळे आहोत.
परमेश्वराशी एकरुपता म्हणजे काय हे आपल्याला तुकारामांच्या या अवस्थेतून स्पष्ट होते.
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६१, ६२, ६३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ति सूत्रे : ६१
लोकहानौ चिन्ता न कार्या निवेदितात्मलोकवेदत्वात् ||६१||
अर्थ : भक्ताने आपला स्व आणि लौकिक व वैदिक कर्मे भगवंताला अर्पण केलेली असतात. म्हणून लोक व्यवहारात हानी झाली तरी त्याने चिंता करू नये.
विवेचन : *श्वास घ्यायला शिकवावे लागतं नाही, तसे भक्ति करायला शिकवावे लागू नये…! (नारद मुनींची इतकी सूत्रे अभ्यासल्यावर तर अजिबातच नाही…)* तर मनुष्याला श्वास घ्यायला शिकवावे लागतं नाही…! भक्तिमार्गात जाणे किंवा भक्तीमार्ग लाभणे हे कदाचित दैवाधिन असू शकेल. मागे आपण एक विचार केला की अनुदिनी अनुतापें… अशी स्थिती आल्यावर जर मनुष्य भक्तिमार्गाकडे अग्रेसर झाला तर त्याने तो मार्ग स्वतःहून सोडू नये…
*भक्तीमार्ग अनुसरणे हा एक प्रवास आहे. प्रवासात स्थिर असलेली झाडं आपल्याला पळताना दिसतात… , अर्थात याचे बालपणी जितके नवल अथवा आकर्षण असते, तितके आकर्षण मोठेपणी राहता नाही, कारण आपले वाहन पुढे जात असते, याचे पूर्ण ज्ञान मनुष्याला झालेले असते… *
मनुष्याच्या आयुष्यात येणारी सुखदुःख ही त्या पळणाऱ्या झाडांप्रमाणे खोटी असतात, किंवा आपल्या मनाने तयार केलेली असतात, हे मान्य करण्याचे सामर्थ्य आपल्याला भक्तीच देत असते. परमेश्वर आपल्याला जीवनाचा सारथी आहे. तोच आपला जीवनरथ हाकत आहे आणि आपण त्याच्यावर भार टाकून निर्धास्त झाले पाहिजे ही जाणीव आता साधकाला होऊ लागते. मग तो अधिकाधिक निश्चिंत होऊ लागतो…
भक्तिमार्गात वाटचाल करताना साधक असो व सिद्ध असो सुखदुःख त्याच्या वाट्याला येतातच येतात. कारण त्यामागे त्याचे प्रारब्ध असते. त्याचे त्याला ते भोगून संपवावे लागते. इथे भक्त आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताची इच्छा आहे असे मानून त्यातून अलिप्त होत जातो आणि कर्मबंधांतून मुक्त होत जातो.
एका साधूकडे एक मनुष्य गेला. साधूला म्हणाला की माझ्यामागे भूत लागले आहे. ते मला सोडत नाही. साधूने आपल्या सामर्थ्याने भुताला बोलावले आणि त्याला सांगितले की या मनुष्याला सोडून दे. त्यावर ते भूत म्हणाले की मी आता सोडायला तयार आहे. पण हा मनुष्यच मला सोडत नाही…! सामान्य मनुष्य आपल्या मनाने अशी भीतीची अनेक भुते निर्माण करतो आणि स्वतःच त्यांना धरून ठेवतो, त्यांना चिकटून बसतो आणि आयुष्यभर दुःखी राहतो…
साधकाने कसे वागावे किंवा साधनेच्या विशिष्ठ टप्प्यावर साधकांची मनोवृती कशी असते किंवा असावी याचे वर्णन माउली पुढील ओवीत करतात…
करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥
(ज्ञानेश्वरी १२. ११८)
जय जय रघुवीर समर्थ
– – – –
नारद भक्ति सूत्रे ६२
न तदसिद्धौर लोकव्यवहारो हेयः किन्तु फलत्यागस्तत् साधनं च कार्यमेव ॥ ६२ ॥
अर्थ : जोपर्यंत चिंता न करणे साधले नाही तोपर्यंत साधकाने लौकिक कर्माचा त्याग करू नयेज त्यांना सोडू नये. कर्मफळाचा त्याग मात्र प्रयत्नपूर्वक निष्ठेने करीत रहावे.
विवेचन : काळाच्या पुढे धावती ती काळजी. मनुष्य सर्व काही सोडतो पण तो काळजी सोडत नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की मनुष्याने मनुष्याने नामस्मरणभक्तीच्या सहाय्यानं
काळाच्या छाताडावर नाचावे. पण प्रत्यक्षात मात्र याच्या उलट होताना दिसते…
संताच्या दारी जाऊन आले की मनुष्याला आपण चिंतामुक्त झाल्यासारखे वाटते. पण त्याची काळजी, चिंता घरी पोचण्याआधीच त्याच्या छाताडावर नाचू लागतात.
साधनेत प्रगती होऊ लागली की साधक खऱ्या निश्चिंत होऊ लागतो, पण ती स्थिती कायम राहते असे म्हणणे धाडसाचे ठरते. ज्याप्रमाणे सायकल चालवायला शिकणारा मुलगा सायकल शिकत असतो, तेव्हा तो थोडा थोडा तोल सांभाळू लागतो. त्याला वाटतं आपण सायकल पूर्णपणे चालवायला शिकलो. पण प्रत्यक्षात मात्र तसं होतंच असं नाही… , मनुष्य अनेक वेळा पडतो आणि सायकल चालवायला शिकतो… पण जोपर्यंत त्याच्यात निपुणता येत नाही, तोपर्यंत त्याचे सायकल चालवताना पडणे अगदीच स्वाभाविक असते आणि जोपर्यंत तो निपुण होत नाही, तोपर्यंत त्याने सायकल चालवण्याचा सराव करणे सोडून चालत नाही…
साधकाने असेच करावे असे नारद मुनी आपल्याला सांगत असावेत. साधनेचे विविध टप्पे असतात…! जोपर्यंत नदी सागराला जाऊन मिळत नाही, तोपर्यंत तिची कधी खळखळ, तर कधी शांत प्रवाह असे चालूच राहते. फक्त नदीने वाहणे थांबवून चालत नाही…!
साधकाचे असेच होते असे सर्व संत सांगतात. साधनेच्या काळात देखील थोडीफार भरती ओहोटी असतेच..! घालमेल चालू असतेच…! थोडक्यात साधकाने आपली विहित कर्मे टाकून चालत नाही. जोपर्यंत साधनेत पूर्णत्व येत नाही, तोपर्यंत त्याने आपली विहित कर्म टाकू नयेत. फक्त त्याचे फळ मात्र भगवंताला अर्पण करावे. संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग या सूत्रांचे विवेचन करणारा आहे असे म्हणता येईल.
“नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥२॥ नको गुंफो भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥३॥ तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥४॥”
(अभंग क्रमांक 870, सार्थ तुकाराम गाथा. धार्मिक प्रकाशन संस्था)
जय जय रघुवीर समर्थ
– – –
नारद भक्ति सूत्रे ६३
“स्त्रीधन नास्तिकवैरीचरित्रं न श्रवणीयम् ||६३||”
अर्थ : स्त्रिया, धन, संपत्ती, ऐश्वर्य, नास्तिक लोक आणि शत्रू यांचे वर्णन ऐकू नये.
विवेचन : आपल्याकडे सहा विकार प्रमुख सांगितले आहेत. आता विकारांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही…!
दूरदर्शन, दूरचित्रवाणी, चोवीस तास चालणाऱ्या बातम्या, सामाजिक माध्यमे, त्यात भर म्हणून झटपट पैसा देणार अनेक खेळ सध्या मोबाईल वर उपलब्ध आहेत, तसेच आधुनिक जीवनशैली मनुष्याला निसर्गापासून दूर नेत आहे आणि नवनवीन मानसिक, शारीरिक, भावनिक आजारांना आमंत्रण देत आहे. इतक्या व्यवधानातून लक्ष काढून ते *आत*मध्ये वळवणे किती अवघड…!
नारद मुनींच्या काळात फक्त सहा विकार होते. त्यात सुद्धा काम आणि क्रोध हे जास्त महत्वाचे आहेत. या सूत्राच्या सुरवातीला स्त्रीचा उल्लेख झाला आहे. जवळजवळ सर्व साहित्यात पुरुषांना स्त्रीपासून सावधान राहायला सांगितले आहे. थोडा सखोल विचार केला तर मनुष्य स्खलनशील प्राणी आहे. यात स्त्रीपुरूष असा विषय असण्याचे कारण नाही. पण सर्व संतांना हा विश्वास होता की स्त्रिया वाईट मार्गाला जाऊ शकणार नाहीत, पण पुरुषांबद्दल तितका विश्वास त्यांना वाटतं नसावा. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की आजपर्यंत धर्म टिकला तो स्त्रियांमुळेच..!
असो, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्रीच्या मोहात पडून अनेक लोक पथभ्रष्ट झाल्याचे आपल्याला आढळेल. गीतेत भगवंत म्हणतात,
“अधर्म माजतो तेंव्हा भ्रष्ट होती कुल-स्त्रिया|
स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण-संकर||”
(गीताई ०१. ४१)
इथे स्त्री वाईट नाहीच आहे, पण पुरुषांना परस्त्रीबद्दल आसक्ती वाटते ती वाईट आहे आणि यातून त्यांचे पतन होत जाते. आपल्याकडे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यात पहिला आहे धर्म. दुसरा आहे काम, तिसरा आहे अर्थ आणि चौथा आहे मोक्ष.
धर्मावर आधारित आचार, विचार आणि व्यवहार. धर्मावर आधारित काम इथे अपेक्षित आहे. धर्मावर आधारित आचरण, त्यावर आधारित काम आणि त्यावर आधारित अर्थाची प्राप्ती झाली तर मोक्ष नक्कीच दूर नाही.
संत तुकाराम महाराज आपल्या साधनेच्या प्रारंभिक टप्प्यात त्यांचे जे अनुभव आहेत ते अभगांच्या द्वारे लिहिले आहेत. ते म्हणतात,
स्त्रियांचा तो संग नको नारायणा ।
काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥
*
नाठवे हा देव न घडे भजन ।
लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु. ॥
*
दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें ।
लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥
*
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु ।
परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥
* (अभंग क्रमांक 239 सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)
साधकाच्या मनातून स्त्री आणि पुरुष हा भेद जाईपर्यंत काळजी घ्यावीच लागते. एकदा का साधक पक्का झाला की मग त्याच्यावर या कामक्रोधाचा प्रभाव पडत नाही. मला इथे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक घटना आठवते. परदेशात असताना त्यांना एक तरुणी भेटायला आली. तिने त्यांच्याकडे मागणी केली की मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे. सामान्य
साधक असता तर त्याने काय केले असते हे सांगणे अवघड आहे, पण स्वामी विवेकानंद तिला म्हणाले की माझ्या सारखा मुलगा कशाला हवा आहे, मातोश्री मलाच आपला मुलगा माना, मी आपल्याला माझी आई मानतो.
गीतेत भगवंत म्हणतात,
“काम क्रोध तसा लोभ आत्म-नाशास कारण|”
“तीन हीं नरक द्वारें टाळावीं चि म्हणूनियां||”
(गीताई १६. २१)
– – धन मिळवणे हा आपल्याकडं पुरुषार्थ मानला गेला गेला आहे. विहीत मार्गाने धन मिळवणे हा पुरुषार्थ आहे. चोरी करून धन मिळवणे यात कसला आलाय पुरुषार्थ?
संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात धनाबद्दल आपले मत सांगतात.
“जोडोनिया धन उत्तम वेव्हारे।
उदास विचारें वेंच करी।।”
(अभंग क्र. 2864, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
साधना करणे म्हणजे स्वतःला अधिकाधिक नव्हें, तर पूर्ण शुद्ध करणे. त्यासाठी निर्विकार होणे. विकार भगवंताने निर्माण केलें आहेत तर वाईट नसणारच, पण ज्याप्रमाणे औषधाची ठराविक मात्रा असते, तसे विकार त्या मात्रेत घेतले तर ते पूरक ठरू शकतात, अन्यथा विकारांची मालिका चक्रवाढ पद्धतीने वाढू शकते.
भक्तिमार्गात अग्रेसर होत असताना साधकाची दृष्टि आणि मनोवृत्ती अशी होते की त्याला सगळीकडे भगवतांचे अस्तित्व जाणवू लागते. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणायचे की मला प्रत्येक गोष्टीत राम दिसतो.
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
पद्मविभूषण श्री दत्तात्रेय उर्फ काकासाहेब कालेलकर यांनी कविवर्य ‘ऋग्वेदी’ यांच्या ‘अभंग गीतांजली’ (टागोर यांच्या ‘गीतांजली’चा मराठी भावानुवाद) साठी लिहिलेल्या प्रस्तावनेतील वेचक भाग आपल्या माहितीसाठी आज प्रस्तुत करीत आहे.
श्री काकासाहेब कालेलकर हे थोर स्वातंत्र्यसेनानी, म. गांधींचे अनुयायी व सहकारी, थोर समाजसेवक, मराठी, गुजराती, हिंदी व इंग्रजी भाषांतील साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, अनेकविद्यापीठांचे कुलगुरू असले तरी तेकविवर्य ‘ऋग्वेदी’ यांचे एके काळचे विद्यार्थी होते व रविंद्रनाथ टागोरांबरोबर शांतिनिकेतन मध्ये राहिले असल्यामुळे त्यांच्यामधील माणूस व कवी यांना जवळून ओळखणारे होते; याच कारणांमुळे त्यांनी ‘ऋग्वेदी’ यांच्या ‘अभंग गीतांजली’स प्रस्तावना लिहिण्याचे मान्य केले असावे.
कालेलकर लिहितात, “गीतांजली मध्ये टागोरांनी परमात्म्याला हृदयापासून साद घातली आहे. आपल्या हृदय सागरात भरती /ओहोटी, लहान मोठ्या लाटांचा महोत्सव अखंड चालूच असतो आणि जोपर्यंत असे आहे तोपर्यंत गीतांजली सारख्या हृदय काव्याची आवश्यकता मनुष्याला असणारच. गीतांजली वाचत असताना आपण काव्यसुख घेत आहोत असा अनुभव येत नाही तर हृदयाला दिव्य आहार मिळत आहे, पौष्टिक रसायन पोहोचत आहे, असे वाटते. म्हणूनच गीतांजली हा ग्रंथ जगाच्या धार्मिक साहित्यात कायमचे स्थान मिळवणार आहे याविषयी शंका नाही. ”
“रवींद्रनाथांनी मानसशास्त्र आणि समाज शास्त्र यामध्ये खूप खोल उतरून कवित्वाचा एक नवाच आणि कष्टसाध्य असा आदर्श आपल्यापुढे ठेवला आहे. या कवीने भारतीय संस्कृतीच्या अंगप्रत्यंगाचे आकलन केलेले असले पाहिजे. प्रेम भावना आणि धर्म भावना यांचे रहस्य त्याला अवगत असले पाहिजे. कोणत्याही कवी मध्ये अद्भुत वशीकरण विद्या असते. तो परिचित आणि अपरिचित सर्वच लोकांचे हृदय काबीज करतो. आणि जणू कांही त्याची ही मोहिनी विद्या पाहूनच सरस्वती देवी त्याला वाचाशक्तीचे वरदान देते. जो भाव व्यक्त करावयाचा असेल त्याला अनुरूप असे शब्द जणू कांही आपोआप न बोलावता येऊन उभे राहतात. एकही शब्द प्रयत्नपूर्वक आणून बसवला असेल अशी शंका देखील मनात येत नाही. तद्वतच या विभुतीने मनुष्य जीवनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच त्यांच्या वाणीमध्ये आत्मविश्वास, सामर्थ्य आणि व्यापकता आली आहे. टागोरांनी कवित्वाचा एक महान आदर्श जगापुढे मांडला आहे. “
“रवींद्रनाथांची प्रतिभा जितकी स्वतंत्र आहे तितकीच ती आर्य संस्कृतीचे परिपक्व फळ आहे. त्यांच्या लेखात, भाषणात, कवितेत आणि नाटकात हिंदुस्थानातील साहित्याच्या उत्तमांशाची छाप स्पष्ट दिसते. भास, कालिदास यांचा हा कवी वारस आहे, हे ओळखावयास फारसे परिश्रम पडत नाहीत. हिंदुस्थानच्या संत कवींच्या साहित्याचे त्यांनी आकंठ पान केले आहे; याची गीतांजलीतील कोणतेही पद्य साक्ष देऊ शकेल. उपनिषदे, बौद्ध वाङ्मय, वैष्णव संप्रदायाचे साधुसंत आणि महर्षी देवेंद्रनाथ अशा अनेक तत्वज्ञांची छाप रवींद्रनाथांच्या काव्यावर पडलेली दिसते. “
“गीतांजलीत सर्वत्र आर्य भावनाच दिसून येते. गीतांजली ही एक कवी वृत्ती नसून एक सबंध संस्कृतीच आहे. येथून तेथून सर्वत्र ईश्वरभक्ती, ईश्वरनिष्ठा आणि मांगल्याचीच उपासना या कवितांमधून दिसून येते. “
शांतिनिकेतन मध्ये असताना एके दिवशी काकासाहेब त्यांना म्हणाले, ” गुरुदेव, आपल्याकडून काही बोध ऐकावा अशी माझी इच्छा आहे. ” तेव्हा टागोर म्हणाले, “मी कवी आहे. कवीची वृत्ती हीच माझी साधना! मी कोणाचा गुरु होऊ शकत नाही. “
अशा यानिरभिमानी, निरलस, व निरुपाधिक महाकवीस सादर प्रणाम!
—–
☆ गीत : ४९ ☆
YOU came down from your throne and stood at my cottage door.
I was singing all alone in a corner, and the melody caught your ear. You came down
and stood at my cottage door.
Masters are many in your hall, and songs are sung there at all hours. But the simple carol of this novice struck at your love. One plaintive little strain mingled with the great music of the world, and with a flower for a prize you came down and stopped at my cottage door.
I HAD gone a-begging from door to door in the village path, when thy golden chariot
appeared in the distance like a gorgeous dream and I wondered who was this King of all kings!
My hopes rose high and me thought my evil days were at an end, and I stood waiting for
alms to be given unasked and for wealth scattered on all sides in the dust.
The chariot stopped where I stood. Thy glance fell on me and thou earnest down with a smile. I felt that the luck of my life had come at last. Then of a sudden thou didst hold out thy right hand and say “What hast thou to give to me?”
Ah, what a kingly jest was it to open thy palm to a beggar to beg! I was confused and
stood undecided, and then from my wallet I slowly took out the least little grain of corn and gave it to thee.
But how great my surprise when at the day’s end I emptied my bag on the floor to find a least little grain of gold among the poor heap. I bitterly wept and wished that I had had the heart to give thee my all.
THE night darkened. Our day’s works had been done. We thought that the last guest
had arrived for the night and the doors in the village were all shut. Only some said, The king was to come. We laughed and said “No, it cannot be!”
It seemed there were knocks at the door and we said it was nothing but the wind. We put out the lamps and lay down to sleep. Only some said, “It is the messenger!” We
laughed and said “No, it must be the wind!”
There came a sound in the dead of the night. We sleepily thought it was the distant
thunder. The earth shook, the walls rocked, and it troubled us in our sleep. Only some said, it was the sound of wheels. We said in a drowsy murmur, “No, it must be the rumbling of clouds!”
The night was still dark when the drum sounded. The voice came “Wake up! Delay not! “We pressed our hands on our hearts and shuddered with fear. Some said, “Lo, there is the king’s flag!” We stood up on our feet and cried “There is no time for delay!”
The king has come but where are lights, where are wreaths? Where is the throne to seat him? Oh, shame! Oh utter shame! Where is the hall, the decorations? Some one has said, “Vain is this cry! Greet him with empty hands, lead him into thy rooms all bare!”
Open the doors, let the conch-shells be sounded! In the depth of the night has come the king of our dark, dreary house. The thunder roars in the sky. The darkness shudders with lightning. Bring out thy tattered piece of mat and spread it in the courtyard. With the storm has come of a sudden our king of the fearful night.