मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ताकदीने जगलेला विचार, प्रेमाने घडवलेले कार्यकर्ते – भाग १ – लेखक : प्रसाद चिक्षे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ ताकदीने जगलेला विचार, प्रेमाने घडवलेले कार्यकर्ते – भाग १ – लेखक : प्रसाद चिक्षे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले

विवेकानंद केंद्र -एकनाथजी रानडे -ए. बालकृष्णन

 – मा. श्री. ए. बालकृष्णन… विवेकानंद विचार आणि पूर्वांचलाशी आयुष्यभर नातं जोडणाऱ्या एका विलक्षण कर्मयोग्याला श्रद्धांजली… मृत्यू दि. २७/८/२६.

१९६२च्या चीन युद्धानंतर भारतीय मानस पूर्णपणे खचून गेलेलं होतं. त्या युद्धानंतर ईशान्य भारतातून अनेक सैनिक परत येऊ लागले. त्यांनी सांगितलेल्या कहाण्या ऐकून अंगावर काटा यायचा. आजही यूट्यूबवरील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या चिनी आक्रमणाची दाहकता लक्षात येते.

एकीकडे चीनचं आक्रमण आणि दुसरीकडे देशाच्या मनात निर्माण झालेली निराशा—या परिस्थितीत देशाला अधिक सामर्थ्यवान, अधिक आत्मविश्वासपूर्ण बनवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार सुरू झाला. याच काळात भारतभर स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी वर्ष मोठ्या प्रमाणावर साजरं करण्याची तयारी सुरू झाली.

१९६३ हे स्वामी विवेकानंदांचं जन्मशताब्दी वर्ष.

स्वामीजींना त्यांच्या आयुष्याचं ध्येय ज्या कन्याकुमारीच्या शिलेवर सापडलं, त्याच शिलेवर त्यांचं भव्य स्मारक उभं करावं, असा संकल्प करण्यात आला. पण हे काम काही केल्या पुढे सरकत नव्हतं. त्या स्मारकाला दक्षिण भारतातील काही ख्रिश्चन मिशनऱ्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा प्रचंड विरोध होता. त्या शिलेबद्दल वेगवेगळे दावे करण्यात येत होते.

आणि अशा वेळी एका जबरदस्त व्यक्तिमत्त्वाची एंट्री झाली—एकनाथजी रानडे.

एकनाथजींच्या अथक प्रयत्नांनी आणि सर्व भारतीयांच्या सहकार्याने अखेर कन्याकुमारीचं भव्य विवेकानंद शिलास्मारक उभं राहिलं. ’

पण एकनाथजींना केवळ दगडाचं स्मारक उभं करायचं नव्हतं.

त्यांना विवेकानंदांचं जिवंत स्मारक उभं करायचं होतं.

विवेकानंदांचं जिवंत स्मारक म्हणजे त्यांच्या विचारांनी भारावून जाऊन आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित करणारी माणसं—महिला, पुरुष, युवक, युवती. One Life, One Mission या भावनेने जगणारे कार्यकर्ते.

– – यातूनच विवेकानंद केंद्राची निर्मिती झाली. विवेकानंद केंद्राचा कणा असणारा कार्यकर्त्यांचा वर्ग म्हणजे जीवनव्रती. जीवनव्रती प्रशिक्षणात एकनाथजींनी तरुणांना आवाहन केलं—

या राष्ट्रकार्यासाठी तुम्ही सहभागी व्हा.

– – या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या तरुणांमध्ये एअरफोर्समधला एक तडफदार, विलक्षण ऊर्जावान युवक होता—ए. बालकृष्णन.

अफाट ताकद. मनात काहीतरी करून दाखवण्याची प्रचंड इच्छा. मनाची विलक्षण शुद्धता. तीव्र इच्छाशक्ती. कोणत्याही परिस्थितीचं तुफान विश्लेषण करून निर्णय घेण्याची क्षमता. आणि त्याला जोडलेली अफाट पॅशन.

… हा तरुण विवेकानंद केंद्राचा जीवनव्रती कार्यकर्ता झाला. एकनाथजींच्या सहवासात त्याच्या या अफाट ऊर्जेला दिशा मिळाली.

त्या काळात पूर्वांचल—ईशान्य भारत—हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता. चीनपासून असलेला धोका तर होताच; पण त्याचबरोबर तिथल्या सांस्कृतिक वैविध्यालाही मोठं आव्हान होतं.

निसर्गाने निर्माण केलेली सृष्टी, मानवी जीवन आणि समाजव्यवस्था इतकी वैविध्यपूर्ण आणि सुंदर आहे की तिची विविधता टिकवणं, त्या विविधतेतलं सौंदर्य टिकवणं आणि त्या विविधतेच्या मुळाशी असलेली अंतर्निहित एकात्मता टिकवणं ही काळाची गरज होती.

याच पूर्वांचलाच्या कामाची जबाबदारी घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पुढे अग्रस्थानी आले—बालकृष्णनजी.

विवेकानंद केंद्राच्या पूर्वांचलातील कामाचे ते प्रमुख संघटक झाले.

पहिली भेट

बालकृष्णनजींना मी पहिल्यांदा कन्याकुमारीमध्ये पाहिलं.

सकाळची वेळ होती. आम्ही काही जीवनव्रती कार्यकर्ते भोजनगृहातून ‘नचिकेता’कडे जात होतो. आपल्याच मस्तीत होतो. एकमेकांची हसी-मजाक सुरू होती.

अचानक समोरून एक व्यक्ती आली… आकाशी निळ्या रंगाचा शर्ट, पांढरी धोती, पांढरीशुभ्र आणि भरीव दाढी, पांढरेशुभ्र केस आणि डोळ्यांवर चष्मा. एका हाताने धोतीचा पदर सावरत ते आमच्याकडे चालत आले.

अचानक एक भारदस्त आवाज कानावर पडला—

“ए, कम हिअर!  व्हॉट्स युवर नेम? ”

विवेकानंद केंद्रात ‘तुझं नाव काय? ’, ‘कुठून आलास? ’ असे प्रश्न सहज विचारले जातात, याचा मला अनुभव होता. मी लगेच उत्तर दिलं—

“आय अॅम प्रसाद. ”

पण पुढचा क्षण वेगळाच होता.

त्या व्यक्तीने थेट माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं—

“कसा आहेस?  ठीक आहेस ना?  बरं वाटतंय का इथे?  काही त्रास तर नाही? ”

मी अचंबित झालो.

पाठीवर थाप देत त्यांनी आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.

आवाजात जरब. व्यक्तिमत्त्वात भारदस्तपणा. पण बोलण्यात प्रचंड प्रेम.

हे काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन होतं.

आम्ही नंतर शांतपणे ‘नचिकेता’कडे परत आलो. मी रमणमूर्तीजींना विचारलं—

“हे कोण? ”

उत्तर मिळालं—

“बालकृष्णनजी! ”

बालकृष्णनजींबद्दल मी आधी खूप काही ऐकलं होतं. त्यामुळे माझ्या मनात त्यांचं एक वेगळंच चित्र तयार झालं होतं—अतिशय ताकदीचा माणूस, एअरफोर्समधला माणूस, नॉर्थ-ईस्टच्या कुठल्याही अवघड परिस्थितीत फिरणारा माणूस, कोणतंही आव्हान स्वीकारून ते पूर्ण करणारा माणूस.

अखंड पूर्वांचलाचा चप्पा-चप्पा माहीत असलेला माणूस.

प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव माहीत असलेला आणि त्यांच्याशी थेट संपर्क ठेवणारा माणूस.

प्रचंड इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशा असलेला माणूस.

पण हा एवढा जबरदस्त माणूस आपल्याशी इतक्या प्रेमाने बोलू शकतो, ही अनुभूतीच विलक्षण होती.

“Purity is important…”

पुढे सलग पंधरा दिवस बालकृष्णनजींचा सहवास मिळाला.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हाला विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती प्रशिक्षणाची दीक्षा देण्यात आली. आमचं प्रशिक्षण आणि काम सुरू झालं.

त्या वेळी बालकृष्णनजींनी केलेलं भाषण आजही माझ्या कानात घुमतं—

“Purity is important.

Dedication is important.

Character is important.

Willpower is important.

Learning is important. ”

– – एकामागून एक ते वाक्य फेकत होते, जणू काही बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात!

पण त्या प्रत्येक वाक्यामागे त्यांचा स्वतःचा अनुभव होता.

ते आम्हाला केवळ विचार सांगत नव्हते… ते स्वतः जगलेला विचार आमच्यासमोर ठेवत होते.

कन्याकुमारीमध्ये त्यांच्यासोबत अनेक क्षण घालवता आले. प्रशिक्षणात त्यांनी आम्हाला केंद्र प्रार्थना समजून सांगितली. केंद्र प्रार्थनेचा एक वेगळाच आयाम त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला.

यानंतर ते पूर्वांचलाच्या दौऱ्यावर निघून गेले.

… पूर्वांचल म्हणजे त्यांचा जीव की प्राण!  आणि तिथले कार्यकर्ते म्हणजे त्यांच्यासाठी लाखमोलाची ठेव.

अरुणाचलमध्ये खरा सहवास

माझी पोस्टिंग अरुणाचल प्रदेशमध्ये ‘अरुण ज्योती’च्या कामासाठी झाली. त्यानंतर बालकृष्णनजी अरुणाचलमध्ये आले आणि त्यांच्याबरोबरचा माझा खरा सहवास सुरू झाला.

बालकृष्णनजींची झोपण्याची व्यवस्था जिथे केली होती, त्याच्या बाजूलाच मी झोपायचो. कॉटवर बालकृष्णनजी आणि खाली बाजूला मी… आमच्या खूप साऱ्या गप्पा व्हायच्या.

आमच्या दोघांच्या वयामध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. पण एवढा मोठा माणूस आपल्याशी अगदी लहान भाऊ किंवा मुलगा असल्यासारखा प्रेमाने वागतो, ही अनुभूतीच दिव्य होती.

त्यांची पॅशन जबरदस्त होती. बोलण्यात नेमकेपणा होता. पण त्याचबरोबर ते प्रचंड विनोदीही होते.

एकदा सकाळी उठल्यानंतर काही वेळाने मी उठलो. बालकृष्णनजी माझ्याकडे पाहून हसायला लागले.

म्हणाले—

“अरे प्रसाद, तू तो नींद में बहुत बात करता है!  मुझसे बात कर रहा था—‘मुझे घर जाना है, घर जाना है. ’ सही में घर जाना है क्या? ”

मी चकित झालो.

माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी मला सांगत होतं की मी झोपेत बोलतो!

नंतर मी त्यांना विचारलं—

“मी खरंच झोपेत बोलतो का? ”

तेव्हा ते म्हणाले—

“नाही, तू बोलत नाहीस. मी तुझी मजा करत होतो. ”

इतके अफाट विनोद मी बालकृष्णनजींबरोबर अनुभवले आहेत.

– क्रमशः भाग पहिला

लेखक : प्रसाद चिक्षे

ज्ञान प्रबोधिनी

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अगदी तुमच्या माझ्या घरातील वास्तव… – लेखक : एक अज्ञात ☆ रमा मोडक ☆

रमा मोडक

? इंद्रधनुष्य ?

☆ अगदी तुमच्या माझ्या घरातील वास्तव… – लेखक : एक अज्ञात ☆ रमा मोडक ☆

 – – – खरंच सांगतो मन अस्वस्थ झाले…

“प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म किती वाजता झाला? ” 

“श्रीकृष्णाचा जन्म किती वाजता झाला? “

“नृसिंह जन्म कुठल्या वेळी झाला? “

“हनुमंतांचा जन्म कुठल्या वेळी झाला? ” 

अशा प्रकारचे काही प्रश्न मी डिसेंबर महिन्यातल्या एका सेशनमध्ये मुलामुलींना विचारले होते. समोर बसलेली सगळी मुलंमुली १३ ते २५ वयोगटातली, उच्चशिक्षित कुटुंबातली, आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेली, नामांकित खाजगी शाळांमध्ये जाणारी होती. पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत. मी त्यांना वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं यांची नावं सांगून त्यांच्या सेवनातून आपल्याला कुठले घटक मिळतात, असं विचारलं. त्याचीही उत्तरं मिळाली नाहीत.

“घरात तुम्ही एकटेच आहात आणि भूक लागली तर तुम्ही काय करुन खाल? “असं विचारल्यावर जवळपास सगळ्यांनी मॅगी नूडल्स, पास्ता, जॅम टोस्ट अशी नावं सांगितली.

“श्रावण महिन्यात आपल्या घरी कोणकोणते कार्यक्रम असतात? “

“गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती घरातून बाहेर पडताना आपण उंबऱ्यापाशी काय म्हणतो?” 

“गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी पाडव्यादिवशी आपण सरस्वती पूजन किंवा पाटीपूजन करतो का? “

“पाटीवरची सरस्वती काढता येते का? “

“पंचामृत कसं करतात? “

“नैवेद्याचं पान कसं वाढतात? “

“चैत्रांगण कसं काढतात? ” 

“चैत्रगौर म्हणजे काय? “

“खंडेनवमीच्या दिवशी काय करतात? “

“आषाढी एकादशीचं महत्त्व काय? “

यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर एकालाही देता आलं नाही. मग मात्र मला जरा अस्वस्थता आली.

एका जुडीमध्ये किती दुर्वा असतात? , माळावस्त्र कसं करतात?, औक्षण कसं करतात – तेलाच्या दिव्यानं की तुपाच्या दिव्यानं? , पुरणाची आरती माहिती आहे का? , धोतर कसं नेसतात?  तुमचं कुलदैवत आणि कुलदेवता माहिती आहे का? … हे प्रश्न विचारले तेव्हाही हाच अनुभव आला. अनेकांनी तर “आमच्या घरी असे काही सणवार आम्ही करतच नाही. सगळे सण मोठ्या घरी असतात किंवा गावी असतात” अशी उत्तरं दिली. मुंज झालेल्यांना बहुतेक सगळ्यांना मुंज का करतात?  हेही ठाऊक नव्हतं.

मुलांना श्लोक, वेचे येत नाहीत. संतांचे अभंग येत नाहीत, एक तेवढी गणपतीची सोडली तर बाकी आरत्या येत नाहीत. उत्तमोत्तम कवींच्या कविता येत नाहीत. त्यांनी प्रवासवर्णनं वाचलेली नाहीत. वाचनालयात जाण्याची सवय नाही. एखादं चार ओळींचं पत्र लिहिता येत नाही. पाकिटावर पत्ता कुठल्या क्रमानं लिहितात, ते माहिती नाही. फार तर गणपती स्तोत्र, रामरक्षा, मारुती स्तोत्र येतं. पण, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, पांडुरंगाष्टक, भगवद्गीतेचे अध्याय, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, आदित्यहृदय स्तोत्र येत नाही. मनाचे श्लोक येत नाहीत, करुणाष्टके ठाऊक नाहीत. संपूर्ण वन्दे मातरम् सुद्धा ठाऊक नाही.

आपत्कालीन परिस्थितीत काय कराल?  असं विचारलं, तर तेही सांगता येईना. ॲम्ब्युलन्स कशी बोलवाल?  गॅस सिलेंडर लिकेज असेल तर काय कराल?  कुणी लिफ्ट मध्ये अडकलं तर काय कराल?  सीसीटीव्ही फुटेज पाहता येतं का?  ऑफलाईन रेल्वे रिझर्व्हेशन करता येतं का?  बँकेत चेक भरता येतो का?  वीजबिल वाचता येतं का?  पुण्यात बस ने फिरता येईल का?  धान्य निवडता येतं का?  हॉट प्रेस ऑईल आणि कोल्ड प्रेस ऑईल यात फरक काय असतो?  पाम ऑईल म्हणजे नेमकं काय?  वनस्पती तूप म्हणजे काय?  कोलेस्टेरॉल म्हणजे काय?  हेही कुणाला सांगता येईना…!

घरातल्या सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करता येते का?  उभी इस्त्री आणि आडवी इस्त्री म्हणजे काय?  वॉशिंग मशीन न वापरता कपडे धुता येतात का?  शाळेतला डबा स्वतःचा स्वतःला घासून ठेवता येतो का?  शर्टाचं बटण तुटलं तर लावता येतं का किंवा उसवला तर टाके घालता येतात का?  गिफ्ट पॅक करता येतं का?  कोऱ्या कागदांची वही शिवता येते का?  भाज्या निवडता, चिरता येतात का?  कंपोस्ट खत करता येतं का?  फोडणी करता येते का?  दह्याचं विरजण लावता येतं का?  ताक करता येतं का?  लोणी कढवता येतं का?  मुगाची खिचडी करता येते का?  असं विचारलं तर तेही येत नव्हतं.

हे सगळं इतक्या स्पष्ट समोर आलं आणि त्याचीच अस्वस्थता मनातून जाता जाईना. मुलांच्या जडण-घडणीला जो सांस्कृतिक आधार असायला हवा, तो तयारच झाला नसल्याचं लक्षात आलं. वय वर्षे पंधरा-सोळा ते वय वर्षे बावीस-तेवीस या वयोगटात यातलं काहीही येत नसेल तर मामला गंभीर आहे, हे पालकांना जाणवून देणं गरजेचं वाटलं.

फक्त भरभक्कम गुणांच्या मार्कलिस्ट मिळवल्या आणि भरपूर पॅकेज मिळवलं म्हणजे आपलं आयुष्य परिपूर्ण झालं, असं होऊ शकत नाही, हे मुलं आणि पालक या दोघांनाही लक्षात यायला हवं. बरं, शालेय अभ्यासात तरी उत्कृष्ट गुणवत्ता आहे का?  तर पुष्कळदा तसंही नसतं. वर्षानुवर्षं मराठी ऐकून, वाचून, बोलून सुद्धा “भेटलं, मिळालं, सापडलं” यातला फरक कळत नाही. “जर आणि अगर” यातला फरक कळत नाही. मराठी बोलताना हिंदी इंग्रजी शब्द बेसुमार घुसवलेले असतात. देवनागरी लिखाणाबद्दल तर विचारायलाच नको. विज्ञानात पुस्तकी सर्किट डायग्राम येते, पण प्रत्यक्षात सर्किट तयार करता येत नाही. साधा सिलिंग मधला एलईडी बल्ब पण बदलता येत नाही.

रात्री झोपण्यापूर्वी गॅस सिलेंडरचा नॉब बंद करता येत नाही. आखूड आणि तंग कपड्यांपेक्षा अंगभर शुद्ध सुती कपडे वापरण्याचं महत्त्व समजत नाही. जंक फूड मधला धोका लक्षात येत नाही. रोजच्या आयुष्यात प्लॅस्टिकचा वापर कसा टाळावा, हे कळत नाही. सिग्नलला थांबल्यावर दुचाकी बंद करावी, यातलं पर्यावरण महत्व कळत नाही. कापडी पिशवीचा वापर का वाढवायला हवा, हे समजत नाही. बाहेरून अन्न पार्सल आणायला जाताना सोबत स्टीलचा डबा घेऊन जावा, गरम पदार्थ प्लॅस्टिक कंटेनर किंवा फॉइल मधून पार्सल आणू नये, हे विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कळू नये?  कृत्रिम शीतपेये कशी हानिकारक आहेत, हे कळत नाही. मग विज्ञानाचा नेमका अभ्यास ही मुलंमुली करतात तरी कशी?  

मग आयुष्य उत्तम जगण्यासाठीची सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, भावनिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक, वैज्ञानिक, आर्थिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विषयक जीवनदृष्टी आहे का?  ते सर्वांगीण जीवनपोषण आपल्या मुलामुलींना कसं मिळणार, कुठून मिळणार, कोण देणार ह्याचा विचार आपण केला आहे का?  

हे प्रश्न इतके लख्ख समोर दिसल्यावर दोन महिन्यांपूर्वी आम्ही पालकांसाठी एक सत्र आयोजित केलं होतं. त्यामध्ये “आपल्या मुलांनी कोणत्या गोष्टी शिकाव्यात, असं तुम्हाला वाटतं? ” असा प्रश्न मी उपस्थित पालकांना विचारला. बहुतेक सगळ्या पालकांची गाडी ‘शाळेच्या परीक्षेत भरपूर मार्क’ याच गोष्टीपाशी अडली होती. नॅशनल एन्ट्रन्सेस मध्ये स्कोअर झाला की बस्स.. डोक्यात एवढा एकच विचार.. आपल्या जगण्याची गुणवत्ता फक्त पैसा कशी ठरवणार?  

आपल्या मुलामुलींचा सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक बुद्धिभेद का होतो आहे?  “मी, माझं, मला, फक्त माझ्यापुरतं” हा फॉर्म्युला आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं कितपत उपयोगी पडणार आहे?  “आयुष्यात पैसा हेच एकमेव सत्य आहे” ही धारणा आपल्या मुलांना सुरक्षित आणि स्वस्थ जगवेल का?  असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत, ह्याचं मला फार आश्चर्य वाटलं आणि तेवढंच वाईटही वाटलं. आपल्या मुलामुलींना चांगले मित्र मैत्रिणी नाहीत, चांगलं वाचनीय साहित्य त्यांना ठाऊक नाही, विद्वानांचा सहवास नाही, आपल्याला मिळालेल्या चांगल्या आयुष्याविषयी कृतज्ञता नाही. निदान आपल्या चांगल्या आरोग्याविषयी तरी दैनंदिन जीवनात बदल घडवायला हवा, तर तेही नाही.

जर असं असेल तर हा केवळ शिक्षणव्यवस्थेचा दोष नाही. नव्या पिढीला घडवण्याचं धोरण समाजानंच ठरवण्याची गरज आहे. कारण, कुठलाच पुस्तकी अभ्यासक्रम आणि मार्कलिस्ट आपल्या मुलांच्या सुदृढ, समंजस आणि शहाण्या जगण्याचा पाया घालण्यासाठी पुरा पडणार नाही. शाळा, कुटुंब आणि समाज या तिघांनीही एकत्र येऊन काही नीति ठरवली तर हे चित्र बदलता येईल. समाजातल्या प्रत्येकानं ‘ही माझी जबाबदारी आहे’ असं मान्य करुन सक्रिय सहभाग घेतला नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांची आयुष्याची वस्त्रं अशी फाटत राहतील, ज्यांना लावायला ठिगळं अपुरी पडतील.

पुस्तकी अभ्यास, विद्याभ्यास आणि कौशल्याभ्यास या तीनही वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या आयुष्यात या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे मान्यच आहे. पण शाळेची सुट्टी ही पुस्तकी अभ्यासाची सुट्टी आहे, असं लक्षात घेऊन जीवनविद्या आणि कौशल्य विकास या दोन्हीं विकासांवर भर द्यायला हवा. जाणिवेच्या समृद्धीपासून ते प्रत्यक्ष कृतिशीलतेपर्यंतचा प्रवास व्हायला हवा. आपल्या संस्कृतीमधलं विज्ञान मुलांना समजायला हवं आणि विज्ञानातली नैतिक संस्कृती सुद्धा उमगायला हवी. खिशाला पटणं आणि मनाला पटणं यातला फरक नव्या पिढीला शिकवायला हवा.

पर्यावरणाच्या स्वास्थ्याला आणि राष्ट्रीय हिताला ज्या गोष्टी हिताच्या नाहीत, त्या कितीही आर्थिक मोबदला देणाऱ्या असल्या तरीही त्या नाकारण्याचं धैर्य मुलांमध्ये यायला हवं. महिन्याभराचा अनलिमिटेड डेटा पॅक मारुन घरात निवांत बसून सोशल मीडियावर वाट्टेल तसं व्यक्त होण्यात काहीही कर्तृत्व नाही, उलट ते लाज आणणारं लक्षण आहे, हेही घडवणं आता संस्कारांचा भाग झालंय. महापुरुषांचे विचार कृतीमध्ये आणण्यासाठी आणि अनुकरण करण्यासाठी असतात. डॉल्बी सिस्टिमपुढं नाचण्यानं ते विचार आपल्या व्यक्तिमत्वात येत नाहीत, हाही संस्कार आता नितांत गरजेचा झाला आहे. तरच ‘आयुष्य म्हणजे इव्हेंट नसतो’ हे पुढच्या पिढ्यांमध्ये रुजायला मदत होईल.

म्हणूनच म्हणतो पालकमित्रांनो, उन्हाळी सुट्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला. मूल घडवण्याचा खरा अभ्यासक्रम फार व्हास्ट आहे आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला स्वतःलाच पाण्यात उतरावं लागेल. मुलांच्या पाठीशी नाही तर त्यांच्या सोबत राहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्याला मानेवरचं जोखड न समजता स्वतः डेव्हलपमेंटल मेंटॉर होण्यातला आनंदसुद्धा मनसोक्त लुटला पाहिजे.

लक्षात घ्या, आपल्या मुलांना आपल्याच सक्रियतेची सगळ्यात जास्त गरज आहे. ती जबाबदारी आऊटसोर्स करता येणार नाही. केवळ जन्म दिल्यानं पालक होता येत नाही आणि शाळा, कोर्सेस, ग्राउंड, शिबिरं यांच्या फिया भरल्यानं संगोपन केलं असं म्हणता येत नाही. आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचं शिल्प अधिक देखणं घडवायचं असेल तर, शिक्षकांसोबत आपणही ती शिल्पकला शिकून घेणं गरजेचं आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय मुलांना उत्तमपण येणार नाही अन् ते घाव आपणच घातल्याशिवाय आपलं पालकत्व सुफळ संपूर्ण होणार नाही. तेव्हां, पालकत्वाचं व्रत स्वतःच केलं तरच त्याचा लाभ आपल्या पदरी पडेल, अन्यथा…!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : रमा मोडक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सात वार…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सात वार…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

 आठवड्यातील सात वारांची निर्मिती कशी झाली व का? वाराची देवता कोणती..

आपण युगानुयुगे वर्षानुवर्षे

रवि, सोम, मंगळ अशा सात

वारांशिवाय कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत नाही. यांच्याशिवाय कसलाही व्यवहार होणे अशक्य आहे.

राजा परिक्षिताला शाप मिळाला की या सात दिवसात एक दिवस तुझा मृत्यु निश्चित आहे. आणि प्रत्येक मनुष्याचा देखील जन्म व मृत्यूचा एक वार निश्चित आहे. एकंदरीत काय तर संपूर्ण विश्वच या सात वारांवरअवलंबून आहे. असे असताना आपण कधी असा विचार केला का?  तो म्हणजे या सात वारांची निर्मिती झाली कशी?  व ती कोणी केली?

ज्याच्याशिवाय आपले व्यवहार चालूच शकत नाहीत, त्याची दखल घेणे आपले आद्य कर्तव्य आहे. ज्ञानरूपीप्रकाशाशिवायअज्ञानरूपी अंधार नाहीसा होत नाही म्हणून हा लेखप्रपंच.

आज बहुतांशी समाज आपल्या वेद, शास्त्र, पुराणांना थोतांड समजणारा आहे. शिवाय देव व धर्माला न मानणारा आहे. पण आपल्याला ठाऊक आहे का या सात वारांचा निर्माता कोण आहे ते?

सृष्टीचा आरंभ होत असताना भगवान शंकरानी समस्त लोककल्याणासाठी या

वारांची कल्पना केली. थोडक्यात सांगायचे झाले तर भगवान शंकर संसाररूपी रोगाचा नाश करणारे वैद्य आहेत. तसेच औषधांचेही औषध आहेत.

भगवान शंकरांनी सात देवतांच्या नावांनी वारांची कल्पना केली व त्या प्रत्येक वाराचा स्वामी म्हणून ग्रहांची योजना केली. ते पुढीलप्रमाणे..

शिवपुराणानुसार…

 

देवता शंकर — स्वामी सूर्य

वार : रविवार

आरोग्य प्राप्ती

 

देवता मायाशक्ति – स्वामी चन्द्रमा

वार : सोमवार

सम्पत्तिप्राप्ति

 

देवता कुमार कार्तिकेय

स्वामी — मंगळ वार मंगळवार

व्याधिनिवारण

 

देवता भगवान विष्णु

स्वामी बुध वार बुधवार

पुष्टिवर्धक

 

देवता ब्रह्मदेव

स्वामी बृहस्पति

वार गुरुवार

आयुष्यवृद्धी

 

देवता इन्द्रस्वामी शुक्र

वार शुक्रवार

भोगदायक

 देवता यम

 

स्वामी शनैश्चर

वार शनिवार

मृत्युचे निवारण

 

अशाप्रकारे शिवपुराणानुसार सात वारांची सृष्टीच्या हितासाठी भगवान शंकरांनी निर्मिती केली. म्हणून आपल्या धर्मात देवता व ग्रहांना विशेष स्थान आहे.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ सूर्य स्तोत्र ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ सूर्य स्तोत्र ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रावण महिन्याचे महत्व लक्षात घेऊन, आज रविवार असल्यामुळे हे सूर्य स्तोत्र सादर करण्यात येत आहे. मूळ संस्कृत व त्याचा भावानुवाद.

☆  सूर्य स्तोत्र – महर्षि मयासूर ☆

प्रात: स्मरामि खलु तत्सवितुर्वरेण्यंरूपं हि मण्डलमृचोऽथ तनुर्यजूंषी।

सामानि यस्य किरणा: प्रभवादिहेतुं ब्रह्माहरात्मकमलक्ष्यचिन्त्यरूपम् ।।१।।

*

प्रातर्नमामि तरणिं तनुवाऽमनोभि ब्रह्मेन्द्रपूर्वकसुरैनतमर्चितं च।

वृष्टि प्रमोचन विनिग्रह हेतुभूतं त्रैलोक्य पालनपरंत्रिगुणात्मकं च।।२।।

*

प्रातर्भजामि सवितारमनन्तशक्तिं पापौघशत्रुभयरोगहरं परं चं।

तं सर्वलोककनाकात्मककालमूर्ति गोकण्ठबंधन विमोचनमादिदेवम् ।।३।।

*

ॐ चित्रं देवानामुदगादनीकं चक्षुर्मित्रस्य वरुणस्याग्ने:।

आप्रा धावाप्रथिवी अन्तरिक्षं सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्र्व ।।४।।

*

सूर्यो देवीमुषसं रोचमानां मत्योन योषामभ्येति पश्र्वात्।

यत्रा नरो देवयन्तो युगानि वितन्वते प्रति भद्राय भद्रम् ।।५।।

☆  सूर्य स्तोत्र ☆ भावानुवाद : डॉ. निशिकान्त श्रोत्री ☆

प्रभाते स्मरितो श्रेष्ठ सविता रूप मी

ब्रह्माण्ड केंद्रवासी यज्ञकर्ता देहस्वामी ।

समप्रकाशी किरणे उत्पत्तीमूल अहंकार विना

ब्रह्मासमान पद्मशुद्ध सदैव चिंतनीय मना ॥१॥

*

सकलांचा तारणहार सुंदरदेही मनप्रसन्न

ब्रह्मेंद्रादी देवता अर्चिती त्या प्रभाते नमन

त्रिगुणीपूर्ण वर्षाकारक संरक्षक नियंत्रक

सकलांचा पालनकर्ता त्रैलोक्याचा पालक ॥२॥

*

प्रभाते भजितो सवितृदेव अनंत शक्तीचा

पापानाशक रोगहारक निवारक शत्रुभयाचा

मूर्तिमान कालस्वरूपी चक्षु समस्त लोकांचा

नमन आदिदेवासी हटवी पाश जसा गोकंठाचा ॥३॥

*

ॐ देवतांस्तव उधळित उदय प्रकाशाचा

मित्राचा नेत्र स्वामी वरुणाचा अग्नीचा

धारयितो पृथ्वी अंतरिक्ष तथा भास्कराला

आत्मा हा विश्वाचा श्रवण करितो विश्वाला ॥४॥

*

उषादेवी संगे प्रकाशमान सूर्य देदिप्यमान

अंत समयी नारीस देउन साथ करी रक्षण

प्रतिक्षा करिती जेथ मनुज पूजिती देवतांसी

शुभ कल्याण तेथ होई शुभ कल्याणासी ॥५॥

॥ इति श्री महर्षि मयासूर रचित निशिकान्त भावानुवादित श्री सूर्यस्तोत्र संपूर्ण ॥

जरी हे स्तोत्र सूर्य स्तोत्र म्हणून प्रसिद्ध असले तरी हे स्तवन सूर्यमालेतील सूर्याचे नसून ते विश्वकेंद्री सवितृ देवाचे म्हणजेच विश्वात्म्याचे आहे. विशेषतः हे पहिला व चौथ्या श्लोकांमधून स्पष्ट होते.

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जाणीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जाणीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

विनायक घरी आला तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. माधवी त्याची वाटच बघत होती.

“आज बराच उशीर केलात यायला “

माधवीनं विचारलं

“हो. सध्या मंथ एंड आहे ना! त्यामुळे मिटिंगवर मिटिंग

सुरु आहेत “

“बरं तुम्ही फ्रेश व्हा. तोपर्यंत मी जेवायला वाढते “

तो फ्रेश होऊन येईपर्यंत माधवीनं टेबलवर जेवणाची तयारी घेतली. विनायक खुर्चीवर येऊन बसला. समोर दोनच ताटं पाहून त्यानं आश्चर्याने विचारलं

“दोनच ताटं?  नयना जेवणार नाहीये का? ” 

“अहो ती बाहेर गेलीये. तिची ती साक्षी नावाची मैत्रीण बंगलोरहून आलीये आज. तिला भेटायला गेलीये. दोघी बाहेरच पावभाजी वगैरे खाऊन येणार आहेत “

” साक्षी बंगलोरला असते? जाॅब लागलाय की लग्न झाल्यामुळे? “

“नाही. लग्न नाही झालं तिचं. मागच्या दिड वर्षापासून ती जाॅबला तिथंच आहे “

” किती पॅकेज आहे? “

” सध्या सहा लाखाचं आहे‌. पुढच्या वर्षीपासून नऊ लाख होणार आहे म्हणे “

विनायकनं एक सुस्कारा सोडला

” एकेक करुन नयनाच्या सगळ्या मैत्रीणी जाॅबला लागल्या म्हणायच्या तर? “

माधवीनं मान डोलावली

“आणि आपली बया बसलीये पाच वर्षांपासून घरी. किती अपेक्षा होत्या मला तिच्याकडून. कंप्युटर इंजीनियर झाल्याझाल्या तिला चांगल्या कंपनीत नोकरी लागेल, चांगला पगार मिळेल, चारचौघात अभिमानाने सांगता येईल की माझी मुलगी या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करतेय. तिला एवढं पॅकेज आहे. पण नाही, एकही अपेक्षा पोरीनं पुर्ण केली नाही ” विनायक उद्विग्न होऊन म्हणाला

” जाऊ द्या. अशीही आपल्याला काही तिच्या पैशांची गरज नाहीये “

” पैशाचा इश्यूच नाहीये माधवी. इतकं चांगलं शिक्षण घेऊनही तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग करत नाहीये तर त्या शिक्षणाचा फायदाच काय? मग साधं बीए, बीकॉम केलं असतं तरी चाललं असतं. कशाला तिच्या शिक्षणासाठी आपण इतका पैसा खर्च केला असता?  ” विनायक चिडून म्हणाला

” जाऊ द्या तुम्ही चिडू नका. शांततेने जेवून घ्या. आणि तिलाही काही बोलू नका. उगीच तुमचा बीपी वाढून जाईल “

” वाईट वाटतं गं! लोक विचारतात तेव्हा सांगायलाही लाज वाटते की माझी मुलगी घरीच बसलीये. कसलाच जाॅब करत नाहीये “

” मी परवाच तिला नोकरीबद्दल बोलले तर ती माझ्यावरच खवळली. ‘ तुम्हांला मी जड झाले असेन तर करुन टाका माझं लग्न ‘असं म्हणायला लागली “

” दुसरा पर्यायच काय ठेवलाय तिनं आपल्यासमोर? खरंच यावर्षी करुनच टाकतो तिचं लग्न ” विनायक उद्वेगाने म्हणाला

” नाहीतर काय! घरात बसूनही काय करते ती? सांगितल्याशिवाय कोणतंही काम करत नाही. सदोदित तो मोबाईल घेऊन बसलेली असते. काय करते कुणास ठाऊक! आपण काही बोललो तर रुसून बसते. चारचार दिवस बोलत नाही “

“उद्यापासूनच तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करुया. आताच ती सव्वीस वर्षाची आहे. जास्त उशीर केला तर नंतर लग्न जमणंही कठीण होऊन बसेल. खरंतर आपण अगोदरच तिचं लग्न उरकून टाकायला हवं होतं. उगीच तिला नोकरी लागण्याची

वाट बघत बसलो “

” तिच तर म्हणत होती की ‘नोकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणून ‘आजकालची मुलं म्हणे नोकरी करणारी मुलगीच पसंत करतात’असं तिचंच म्हणणं होतं “

“आता तिचं काहिही ऐकायचं नाही. चांगलं स्थळ आलं की उरकून टाकायचं ” विनायक ठामपणे म्हणाला

दुसऱ्या दिवसापासून खरोखरच त्यानं वेगवेगळ्या शहरातल्या विवाह संस्था, मंडळात नयनाचं नाव नोंदवायला सुरुवात केली. आपल्या नातेवाईक, मित्रांना फोन केले. ‘मुलीचं यंदा कर्तव्य आहे तेव्हा तुमच्या माहितीतलं चांगलं स्थळ सुचवा “अशी त्यांना विनंती केली.

काही दिवसांनी एक चांगलं स्थळ चालून आलं. मुलगा हैदराबादला एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. नऊ

लाखाचं पॅकेज होतं. फोटोवरुन तरी चांगला दिसत होता. विनायकनं त्याची माहिती आणि फोटो नयना आणि माधवीच्या मोबाईलवर पाठवले. पण दोघींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दोन दिवसांनी त्यानंच माधवीला विचारलं.

“मी ते स्थळ पाठवलं होतं ते तुम्ही दोघींनी बघितलं नाही का? “

” बघितलं. नयना नाही म्हणतेय “

” का? सगळं तर चांगलं आहे “

” तिचं नेहमीचंच कारण. नोकरी लागल्याशिवाय लग्न करायचं नाही म्हणे “

” बोलव तिला ” विनायक संतापून म्हणाला

माधवीनं नयनाला तीनचार हाका मारल्या पण तिनं प्रतिसाद दिला नाही. शेवटी माधवी उठून तिच्या खोलीकडे गेली आणि तिला घेऊन आली.

“काय बाबा? “

“काय करत होतीस? तुझ्या आईनं इतक्या हाका मारल्या. ऐकू नाही आल्या? “विनायकनं रागाने विचारलं

“काही नाही. गाणी ऐकत होते. कानात ईअर फोन होते म्हणून ऐकू आलं नाही “

” बरं. मी ते स्थळ पाठवलं होतं, त्याला तू नाही म्हणतेय म्हणे “

” हो. मी मागेही तुम्हांला सांगितलं होतं की मला नोकरी लागल्याशिवाय लग्नच करायचं नाही म्हणून “

“मला एक सांग. तू इथे नोकरी करुन काय उपयोग? मुलगा जर दुसऱ्या शहरात असेल तर तुला इथली नोकरी सोडावीच लागणार ना? “

” हो बरोबर. पण आजकालच्या मुलांनाच नोकरी करणारी मुलगी हवी असते. नोकरी करणाऱ्या मुली स्मार्ट, हुशार आणि जगासोबत चालणाऱ्या असतात असं त्यांना वाटतं. अशा मुलींना जास्त पॅकेजेसची मुलं मिळतात “

” पण या मुलाची तर मुलगी नोकरी करणारीच हवी अशी काही अट नाहिये “

” हो. पण मग त्याला पॅकेजही तर कमीच आहे “

“नऊ लाखाचं पॅकेज कमी आहे? “विनायकनं आश्चर्याने विचारलं “तुला माहित नसेल बेटा की मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा मला फक्त तेराशे रुपये पगार होता. हातात फक्त नऊशे-साडेनऊशे रुपये पडायचे. आमचं लग्न झालं तेव्हाही मला फक्त साडेतीन हजार पगार होता. तुझी आई श्रीमंत घरातली होती तरीसुद्धा तिच्या वडिलांनी फक्त माझी सरकारी नोकरी आणि आमचं घराणं पाहून आमचं लग्न लावून दिलं. आणि नंतरही आम्हांला कधी पैशांची चणचण भासली नाही. आज तीस वर्षाच्या नोकरीनंतरही माझं पॅकेज सोळाच लाख आहे. त्यामानाने या मुलाचं पॅकेज सुरुवातीलाच एकदम छान आहे. आणि ते पुढेही वाढू शकतं “

” तुमचा काळ वेगळा होता बाबा. आता महिन्याला एक लाखही पुरत नाहीत “

” तुम्ही स्वतःवर कंट्रोल नाही ठेवला तर महिन्याला पाच लाखही पुरणार नाहीत. व्यवस्थित मॅनेज केलं तर तीसचाळीस हजारातही महिना आरामात पार पडतो. तुझ्या दिलीपकाकाचंच उदाहरण घे. फक्त चाळीस हजारात व्यवस्थित घर चाललंय. मुलं महागड्या काॅलेजमध्ये शिकताहेत. खाऊनपिऊन सुखी आहेत. कधी पैसा पुरत नसल्याची तक्रार नसते. बरं जाऊ दे तुला जर नोकरीच करायची होती तर तू आतापर्यत काय केलंस? पाच वर्षं झालीत तुला इंजीनियर होऊन. तुझ्या सगळ्या मैत्रिणी नोकरीला लागल्यात म्हणे. मग तुलाच का नोकरी लागत नाहिये? “

नयनाचा चेहरा पडला. हळू आवाजात ती म्हणाली

” करतेय मी प्रयत्न पण कुठे जागाच निघत नाहीये त. आणि बाबा मी दोनदा केलीये नोकरी. अगदीच काही घरात बसून नव्हते. “

“बरोबर. पण ती किती महिने केलीस? त्या सुप्रीम इंडस्ट्रीज मध्ये तीन महिने आणि सायबर सोल्यूशन्समध्ये दोन महिने. खरं ना? “

” मग काय करणार? तिथं एक तर पगार कमी आणि हॅरॅसमेंटच इतकी होती की एकेक दिवस काढणं मला मुश्कील झालं होतं “

” बेटा नोकरी म्हंटलं की तिथं थोडीफार हॅरॅसमेंट असणारच. माझंच बघ. सरकारी नोकरी असूनही माझी ऑफिसमधून यायची वेळ नक्की नसते. बारा बारा तेरातेरा तास ड्युटी होऊन जाते. कधीकधी रविवारी, सुटीच्या दिवशीही ऑफिसला जावं लागतं. सततच्या मिटिंग्स्, काॅन्फरन्सने जीव वैतागून जातो. वरुन सिनीयर्सच्या शिव्या खाव्या लागतात त्या वेगळ्या च. सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात असंच असतं कारण सगळ्यांवरच प्रेशर असतं. मलाही बऱ्याच वेळा वाटतं की सोडून द्यावी नोकरी. मस्त आराम करावा पण मी तसं करु शकत नाही ” विनायक तिला समजावत म्हणाला

” तुमची गोष्ट वेगळी आहे बाबा. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. तुम्हांला नोकरी सोडून कसं चालेल? आणि माझं चालू आहे नोकरी बघणं. नोकरी लागली की बघा मला मोठमोठ्या पॅकेजेसच्या मुलांची स्थळ चालून येतील “

” फक्त पॅकेजच महत्वाचं असतं का बेटा? मुलाचं घराणं, त्यातली माणसं, मुलावरचे संस्कार हे तुला महत्वाचे वाटत नाही का? आणि फार श्रीमंत घर कधीच नको. तिथे बऱ्याचदा बायकांना बरोबरीने वागवलं जात नाही. त्यांच्या मताला किंमत दिली जात नाही “

” असेलही तसं. पण आजकालच्या मुलींना हँडसम आणि श्रीमंत मुलगाच नवरा म्हणून हवा असतो “

” चुकीचं आहे ते. बरं जाऊ दे. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहिये. महिनाभर आम्ही थांबतो. तोपर्यंत तुझ्या नोकरीचं जमलं तर ठिक नाहीतर चांगलं स्थळ आलं तर तुला लग्न करावंच लागेल “

” बाबा एका महिन्यात मला कशी नोकरी लागेल? एक वर्ष तरी थांबा “नयना काकुळतीने म्हणाली

” नाही. तुझ्या नोकरीची वाट बघताबघता पाच वर्षं निघून गेली आहेत. जास्त उशीर केला तर तू थोराड दिसायला लागशील. आणि मग थोराड दिसणाऱ्या मुलाशीच तुला लग्न करावं लागेल “

” मला कुणी समजूनच घेत नाही ” नयना संतापून रडायला लागली “ती आई तशीच आणि तुम्हीही तसेच

. सारखे मागे लागतात. मनासारखं काही करुच देत नाहीत “

रागारागाने ती उठली आणि तिच्या रुमकडे निघून गेली

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9209763049

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जबाबदार कोण?  पालक की मुले?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “जबाबदार कोण?  पालक की मुले?☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय समाजात विवाह ही केवळ दोन व्यक्तींची वैयक्तिक निवड नसून ती कुटुंब, परंपरा, प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यतेशी घट्ट जोडलेली संस्था आहे. म्हणूनच “मला लग्न करायचं आहे की नाही, कधी करायचं आहे, कुणाशी करायचं आहे” हे प्रश्न वैयक्तिक असले तरी त्यांची उत्तरं अनेकदा व्यक्तीपेक्षा कुटुंब आणि समाज ठरवतात. ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली आहे की अत्यंत उच्चशिक्षित, परदेशात काम करणारे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुणसुद्धा विवाहासारख्या निर्णयात पूर्ण स्वायत्तता घेत नाहीत. यामागे केवळ परंपरेचा दबाव नाही, तर भावनिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचे घटकही गुंतलेले आहेत. भारतीय कुटुंबव्यवस्थेची रचना ही सामूहिक आहे. म्हणजेच व्यक्तीपेक्षा कुटुंबाचे हित, सन्मान आणि एकात्मता यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी लग्नाचा निर्णय घेताना “माझं आयुष्य” यापेक्षा “आपल्या घरचं काय? ” हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. लग्न म्हणजे दोन कुटुंबांची सांगड अशी धारणा असल्याने, निर्णय प्रक्रियेत पालकांचा हस्तक्षेप ‘हक्काचा’ मानला जातो. अशा वातावरणात स्वतंत्र निर्णय घेणे बंडखोरी वाटू शकते. परिणामी, मुलं स्वतःहून लग्न ठरवण्याऐवजी कुटुंबाच्या मान्यतेची वाट पाहतात किंवा त्यांच्यावरच जबाबदारी सोपवतात.

यात आर्थिक मानसशास्त्राचाही मोठा वाटा आहे. लग्न हा भारतीय संदर्भात केवळ सोहळा नसून तो एक मोठा आर्थिक प्रकल्प असतो. हॉल, जेवण, कपडे, दागिने, पाहुणचार, या सर्वांचा खर्च प्रचंड असतो. परंपरेने हा खर्च पालकांनी उचलायचा असतो, आणि अनेक वेळा तो “प्रतिष्ठेचा प्रश्न” बनतो. त्यामुळे मुलगा-मुलगी आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी “हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे” ही धारणा त्यांच्या मनात कायम राहते. स्वतःच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलणे म्हणजे केवळ पैसे देणे नाही, तर त्या खर्चामागील सामाजिक अपेक्षा, नातेवाईकांचे समाधान, प्रतिष्ठेचे गणित यांची जबाबदारी घेणे होय; आणि ही जबाबदारी घेण्यास अनेक जण मानसिकदृष्ट्या तयार नसतात. याशिवाय भावनिक अवलंबित्व हा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय समाजात मुलांना लहानपणापासूनच “तुमच्यासाठी आम्ही आहोत” अशी शिकवण दिली जाते. त्यामुळे निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवण्यापेक्षा पालकांच्या अनुभवावर अवलंबून राहण्याची सवय लागते. लग्नासारख्या मोठ्या निर्णयात चूक झाली तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील, ही भीतीही असते. म्हणूनच “आई-वडिलांनी ठरवलेलं सुरक्षित” अशी मानसिकता तयार होते. हा केवळ भीतीचे परिणाम नसून, ती एक प्रकारची सामाजिक कंडिशनिंग आहे.

सामाजिक दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठेचे राजकारणही या प्रश्नाच्या मागे दडलेले आहे. “लोक काय म्हणतील? ” हा भारतीय मानसिकतेचा केंद्रबिंदू आहे. मुलगा किंवा मुलगी स्वतः लग्न ठरवतात, विशेषतः आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय, तर कुटुंबावर टीका होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अनेक वेळा पालक स्वतः पुढाकार घेतात आणि मुलांनाही तसेच करण्यास भाग पाडतात. परिणामी, व्यक्तीची स्वायत्तता दुय्यम ठरते आणि सामाजिक मान्यता प्राथमिक ठरते. मुलं स्वतःहून लग्न का ठरवत नाहीत याचे आणखी एक कारण म्हणजे निर्णयक्षमता विकसित न होणे. आपल्या शिक्षणपद्धतीत करिअर, स्पर्धा, नोकरी यावर भर दिला जातो; पण जीवननिर्णय, नातेसंबंध, भावनिक परिपक्वता याबाबत मार्गदर्शन कमी असते. त्यामुळे एखादी व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असली तरी वैयक्तिक आयुष्याचे निर्णय घेण्यात ती गोंधळलेली असू शकते. यामुळे “कुटुंब ठरवेल” हा सोपा मार्ग निवडला जातो.

ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ आर्थिक स्वावलंबन पुरेसे नाही, तर मानसिक स्वातंत्र्य आणि जबाबदारीची जाणीव आवश्यक असते. जेव्हा व्यक्ती “माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेईन आणि त्याचे परिणामही मी स्वीकारेन” अशी भूमिका घेते, तेव्हा खऱ्या अर्थाने बदल सुरू होतो. काही शहरी भागात, विशेषतः नव्या पिढीत, हा बदल दिसू लागला आहे. लव्ह मॅरेज, साधे विवाह, कोर्ट मॅरेज, स्वतः खर्च उचलणे यासारख्या प्रवृत्ती वाढत आहेत. पण हा बदल अजूनही मर्यादित आहे, कारण परंपरा आणि सामाजिक अपेक्षा अजूनही मजबूत आहेत. शेवटी, हा प्रश्न मुलं जबाबदारी का घेत नाहीत, इतकाच नाही तर समाज त्यांना तसे करू देतो का, हाही आहे.

अन्यायाची होण्याची जाणीव असताना व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील निर्णायक टप्प्यांवर, विशेषतः विवाहासारख्या निर्णयात, स्वतःची जबाबदारी का घेत नाही?  हा प्रश्न केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मानसिक रचनेवर प्रकाश टाकणारा आहे. कारण येथे “जबाबदारी घेतली नाही” हा निष्कर्ष जितका महत्त्वाचा आहे, तितकाच “घेऊ दिली गेली का? ” हाही प्रश्नही महत्त्वाचा आहे. या दोन स्तरांमधील ताण समजून घेतल्याशिवाय संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांची सामाजिक घडण अशी झाली आहे की, आज्ञाधारकता, कुटुंबनिष्ठा आणि समायोजन हाच त्यांच्या चांगुलपणाचा निकष ठरवले गेला. त्यामुळे विवाहाच्या बाबतीत स्वतःची निवड मांडणे हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, कुटुंबाच्या अपेक्षांना आव्हान देणारे पाऊल ठरते. अशा वेळी “आई-वडिलांसमोर काही चाललं नाही” ही फक्त सबब नसून, ती एक सामाजिक वास्तवाची अभिव्यक्ती आहे. निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यासाठी लागणारा आत्मविश्वास ही गोष्ट केवळ वैयक्तिक इच्छेवर अवलंबून नसते; ती दीर्घकाळाच्या संस्कारातून, संधींमधून आणि सामाजिक पाठबळातून विकसित होते. म्हणूनच अनेक स्त्रिया उच्चशिक्षित असूनही, निर्णायक क्षणी स्वतःची भूमिका ठामपणे मांडू शकत नाहीत.

सामाजिक बंधनांमध्ये अडकलेली व्यक्ती अनेकदा त्या बंधनांना स्वीकारून बसते आणि आपल्यावर अन्याय सहन करत असते. यालाच मानसशास्त्रात संस्कारातील गुलामी मान्य करणे म्हणतात. म्हणजेच बाह्य दडपण हळूहळू व्यक्तीच्या आतल्या विश्वासाचा भाग बनते. परिणामी, ती स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका घेते, स्वतःच्या निवडीवर विश्वास ठेवत नाही आणि सुरक्षिततेच्या नावाखाली पारंपरिक मार्ग स्वीकारते. येथे अन्याय केवळ बाहेरून होत नाही, तर तो आपल्या अंतर्गतही होत राहतो. तथापि, सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे यांसारख्या समाजसुधारकांनी स्त्रीला स्वओळख, शिक्षण आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देण्याचा जो प्रयत्न केला, तो पूर्णपणे समाजात झिरपला नाही, हेही वास्तव आहे. यामागे केवळ स्त्रियांची उदासीनता कारणीभूत नाही, तर त्या विचारांना प्रतिकार करणारी सामाजिक रचना अजूनही टिकून आहे. शिक्षण मिळालं तरी निर्णयस्वातंत्र्य मिळेलच असं नाही, कारण घरातील सत्तासंबंध, आर्थिक अवलंबित्व, आणि कुटुंब तुटेल या भीतीमुळे अनेक स्त्रिया तडजोडीचा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे स्वातंत्र्याची जाणीव आणि स्वातंत्र्याची अंमलबजावणी यामध्ये मोठी दरी निर्माण होते.

आजची पिढी अशा लग्नाला “डिसफंक्शनल मॅरेज” म्हणून ओळखू लागलेली आहे, ही एक सकारात्मक बाब आहे. कारण आधी जे ‘नॉर्मल’ मानलं जात होतं ते भावनिक तुटलेपण, संवादाचा अभाव, केवळ सामाजिक बंधन म्हणून टिकवलेलं नातं आता प्रश्नांकित होत आहे. त्यामुळेच अनेक तरुण-तरुणी विवाहाबद्दल अधिक सजग झाले आहेत आणि “आपण हा अन्याय स्वतःवर होऊ देणार नाही” अशी भूमिका घेऊ लागले आहेत. या बदलामुळेच घटस्फोटांचे प्रमाण वाढताना दिसते. पण वाढते घटस्फोट हा कुटुंब संस्थेच्या अपयशाचा निर्देशक आहे की असमानतेला नकार देण्याचा प्रयत्न आहे, याचा विचार व्हायला हवा. त्यामुळे फक्त आजच्या पिढीला दोष देणं सोपं असलं तरी ते अपुरं आहे. कारण जेव्हा पिढ्यानुपिढ्या असमानतेवर आधारलेली विवाहसंस्था उभी केली जाते, तेव्हा तिच्या परिणामांना सामोरं जाताना संघर्ष अपरिहार्य असतो. आजचे तरुण-तरुणी समतेची अपेक्षा करतात, भावनिक सुसंवाद शोधतात आणि स्वतःची ओळख जपण्याचा प्रयत्न करतात. जर ही अपेक्षा पूर्ण होत नसेल, तर ते नातं तोडण्याचा निर्णय घेतात. हा केवळ ‘अधीरपणा’ नाही, तर ते मूल्यांमध्ये झालेल्या बदलाचे लक्षण आहे.

मग विवाहसंस्थेचा सुकाणू पारंपरिक असमानतेकडून समतेच्या आणि मानवतेच्या मूल्यांकडे वळवायचा का?  याचे उत्तर समाजाच्या सामूहिक इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. जर पालक अजूनही मुलांच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचा आग्रह धरत राहिले, तर नवीन पिढीशी संघर्ष वाढणारच. उलट, जर त्यांनी मुलांना निर्णयक्षम बनवले, त्यांच्या निवडीचा आदर केला, आणि समतेच्या मूल्यांना पाठिंबा दिला, तर विवाहसंस्था अधिक सुदृढ आणि अर्थपूर्ण होऊ शकते. म्हणून प्रश्न दोषारोपाचा नसून जबाबदारीच्या पुनर्वाटपाचा आहे. स्त्रिया, पुरुष, पालक आणि समाज, सर्वांनी मिळून विवाहाच्या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. समता, स्वातंत्र्य आणि परस्पर सन्मान या मूल्यांवर आधारित नातेसंबंध निर्माण झाले, तरच विवाहसंस्था टिकाऊ आणि समाधानकारक ठरेल. अन्यथा, असमानतेवर उभी असलेली कोणतीही रचना कितीही परंपरेच्या आधारावर टिकवण्याचा प्रयत्न केला, तरी ती आतून पोखरलेलीच राहील. जोपर्यंत कुटुंब आणि समाज व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवत नाहीत, तोपर्यंत मुलं पूर्ण स्वायत्ततेने लग्न ठरवतील आणि पार पाडतील अशी अपेक्षा वास्तववादी ठरणार नाही. ज्या प्रमाणात व्यक्ती स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारेल आणि कुटुंब त्या स्वातंत्र्याला मान्यता देईल, त्या प्रमाणात भारतीय विवाहसंस्थेची मानसिकता बदलत जाईल, हेच खरे नाही का?

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०१ आणि १०२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०१ आणि १०२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 श्लोक क्र. १०१ – – 

जया नावडे नाम त्या येम जाची ।

विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ।

म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे ।

मुखे बोलता दोष जाती स्वभावे ।।१०१।।

अर्थ : ज्या व्यक्तीला भगवंताचे नाम आवडत नाही अशा व्यक्तीला यम त्रास देतो. नामाबद्दल शंका आणि नाना प्रकारचे तर्क कुतर्क ज्याच्या मनात येतात अशा व्यक्तीला तिरस्करणीय नरक प्राप्त होतो. म्हणूनच अत्यंत आदराने भगवंताचे नाम घ्यावे. जो भगवंताचे नाम घेतो त्याच्या स्वभावातील दोष हळूहळू नाहीसे होऊ लागतात.

(येम – यमदूत, जाची – त्रास देतात, विकल्प – शंका/संशय, तर्क – नानाविध कल्पना, स्वभावे – सहजच/नैसर्गिकरित्या)

विवेचन – एखादी गोष्ट कर असे वारंवार सांगूनही जर कोणी ऐकत नसेल, तर त्या व्यक्तीला तसे न करण्याचे काय परिणाम होतील असे आपण समजावून सांगतो. विशेषतः लहान मुलांना एखाद्या गोष्टीतले धोके आपण समजावून सांगतो आणि मग तरी त्यांनी ती करावी अशी अपेक्षा करतो. तसेच समर्थ इथे आपल्याला नामस्मरणाचे महत्व समजावून सांगताना करत आहेत. वारंवार सांगूनही आपण जर नामस्मरण केले नाही तर अंतकाळी आपल्याला यम त्रास देतील, आपल्या मनात नामाबद्दल नको त्या कल्पना आणून जर आपण नाम घेतले नाही, तर लोकांमध्ये आपली छी थू होऊन आपल्या वाट्याला नरक ठरलेलाच आहे. म्हणूनच अत्यंत आदराने भगवंताचे नाम घ्यावे.

आपल्या धर्मशास्त्रात मृत्यूनंतरच्या जीवनासाठी स्वर्ग आणि नरक अशा कल्पना आहेत. पुण्यवान माणसाला स्वर्गप्राप्ती होते आणि पापी मनुष्य नरकात जातो अशी साधारण त्यातील कल्पना आहे. ज्याने पाप केले असेल, भगवंताचे नाम घेतले नसेल अशा व्यक्तीला यमदूत त्रास देतात. नाम न घेणाऱ्याला अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते असे समर्थ सांगतात. समर्थांच्या काळात अशा कल्पनांवर लोकांचा जास्त विश्वास होता म्हणून समर्थांनी त्या प्रकारे समजावून सांगितले आहे. आज आपण ज्या काळात जगतो आहोत, त्या काळातील लोक स्वर्ग, नरक, यम इ. कल्पनांवर विश्वास ठेवणारे नाहीत. म्हणूनच या गोष्टींचा अर्थ आपण वेगळ्या प्रकाराने घ्यायला हवा.

आज जरी बरेचसे लोक स्वर्ग, नरक, यम इ. गोष्टींवर विश्वास ठेवत नसले तरी बरेचसे लोक हे मानतात की आपल्या बऱ्यावाईट वागण्याची फळं आपल्याला या ठिकाणीच भोगावी लागतात. सर्व संतांनी एकमुखाने भगवंताच्या नामाचा महिमा सांगितला आहे. संतांचे वागणे आणि बोलणे यात एकवाक्यता असते. ते जे बोलतात, त्यामागे स्वानुभवाचे सामर्थ्य असते. गोंदवलेकर महाराज आपल्याला जेव्हा रामनाम घ्यायला सांगतात, तेव्हा त्या नामाची महती त्यांनी स्वतः अनुभवलेली असते. ‘ आधी केले मग सांगितले ‘ असा हा रोकडा व्यवहार असतो. म्हणून निदान संतांच्या सांगण्यावर तरी आपण विश्वास ठेवून नाम घ्यायला हवे.

नाम घेण्याची ही सवय जर लावून घेतली नाही तर अंतकाळी देखील सवयीनुसार नाम न येता दुसऱ्याच गोष्टीत जीव अडकेल. प्राण जाताना त्यामुळे जीवाला वेदना होतील. ऐहिक गोष्टीतच जीव अडकेल. पुन्हा मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकू. हाच यमदूतांनी दिलेला त्रास आहे असे आपण मानायला हरकत नाही. संतांनी एवढया कळकळीने सांगूनही जर नामाबद्दल विश्वास नसेल आणि त्याच्या खरेपणाबद्दल भलतेच विचार मनात येत असतील, तर मन नामाकडे वळणारच नाही. अशा वेळी माणूस मग दुसऱ्या आकर्षणात अडकतो. कसले नाम, कसला स्वर्ग आणि नरक?  मरणानंतर जे काही होईल ते कोणी पाहिले आहे?  तेव्हा मौजमजा करून या जीवनाचा उपभोग घेऊ असा विचार करून माणूस नको त्या गोष्टीत अडकतो. नको त्या गोष्टी करण्यात वाहवत जातो. मग समाजात अशा व्यक्तीची छी थू होते. त्याची प्रतिष्ठा राहत नाही. लोकांच्या दृष्टीने अशी व्यक्ती तिरस्करणीय बनते. असे जगणे म्हणजे एक प्रकारचा नरकच आहे.

तेव्हा मनात कोणतीही शंका न ठेवता भगवंताचे नाम घ्यावे. अति आदराने ते नाम घेत जावे. भगवंताच्या नामाचे सामर्थ्य असे आहे की जो कोणी ते नाम घेईल त्याचे दोष हळूहळू कमी होत जातात. जे गुण भगवंताला प्रिय आहेत, असे गुण व्यक्तीच्या स्वभावात वास करतात. त्याच्या हातून अनुचित गोष्टी घडत नाहीत. व्यक्ती अंतिमतः सुखी आणि समाधानी असते.

स्वसंवाद 

१. मरणानंतरच्या नरकाची भीती बाळगण्यापेक्षा, मी आजच्या माझ्या चुकीच्या प्रवृत्तींमुळे माझे चालू आयुष्यच ‘नरकप्राय’ करून घेत नाहीये ना?  

२. संतांनी स्वानुभवातून सांगितलेल्या नामस्मरणाच्या ‘रोकड्या व्यवहारावर’ विश्वास ठेवण्याऐवजी, माझे मन अजूनही ‘तर्क-कुतर्कात’ आणि संशयात वेळ वाया घालवत आहे का?  

३. “अंतकाळी सवयीनुसार नाम मुखात यावे” यासाठी मी माझ्या दैनंदिन जीवनात आजपासूनच नामस्मरणाची सवय लावून घेण्यास किती प्राधान्य देतो?  

४. नाम घेतल्याने जर स्वभावातील दोष ‘स्वभावे’ (सहजच) गळून पडणार असतील, तर मी माझ्या अहंकाराचा आणि रागाचा त्याग करून नामस्मरणाचा आश्रय का घेत नाही?  

=====

श्लोक क्र. १०२ – – 

अती लीनता सर्वभावे स्वभावे ।

जना सज्जनालागी संतोषवावे ।

देहे कारणी सर्व लावीत जावे ।

सगूणी अति आदरेंसी भजावे ।।१०२।।

अर्थ : आपल्यामध्ये स्वभावतःच अतिशय नम्रता असावी. अशा सहज नम्रतेने सत्पुरुषांना आनंद द्यावा. आपला देह सर्व चांगल्या कामांसाठी झिजवावा. अतिशय आदरपूर्वक सगुण भक्ती करावी.

(लीनता – नम्रता, सर्वभावे – अगदी मनापासून, कारणी – चांगल्या गोष्टींसाठी)

विवेचन – भक्ताच्या अंगी कोणते गुण असावेत ते या श्लोकात समर्थ आपल्याला सांगत आहेत. भगवंताचा भक्त लीन म्हणजे नम्र असतो. अध्यात्मात लीनता हा अतिशय मोठा गुण मानला गेला आहे. ज्या व्यक्तिजवळ लीनता नसेल, त्याच्या ठायी अहंकार निर्माण होतो. हे मी केले, ते माझ्यामुळे झाले अशा प्रकारचा अहंकार निर्माण होतो. साधकासाठी अहंकार हा प्रगतीतील मोठा अडथळा आहे. त्यामुळे आपल्या स्वभावात नम्रता असणे आवश्यक आहे. ती सुद्धा मनापासून असावी. आतून उमलून आलेली असावी. एखाद्या हसतमुख व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणारे हास्य आतून उमलून आलेले असते. हास्याचा कृत्रिम मुखवटा त्याला धारण करावा लागत नाही. तशीच नम्रता देखील आतून यावी. ती स्वभावाचाच एक भाग असावी असे समर्थांना सांगायचे आहे. हल्ली कार्पोरेट जगतात आपले काम साधून घेण्यासाठी लोक कृत्रिम नम्रतेचा आश्रय घेतात. निवडणुका जवळ आल्या म्हणजे मते मागण्यासाठी नेते मंडळी अति नम्र होतात. पण ही खरी नम्रता नसून तो काही काळापुरता धारण केलेला एक मुखवटा असतो.

अहंकारी व्यक्ती कोणालाच आवडत नाहीत. नम्रतेने वागणाऱ्या व्यक्ती समोरच्याचे मन सहज जिंकून घेतात. फळांनी लगडलेले झाड वाकलेले असते. ज्याला साधक व्हायचे त्याने तर नम्र असलेच पाहिजे. आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचे श्रेय भगवंताला किंवा गुरूंना दिले पाहिजे. दोष असतील तर ते आपले अशी भावना हवी. कर्तेपण भगवंताकडे देतो तो खरा साधक. अशा प्रकारची नम्रता किंवा लीनता अंगी बाणली की सत्पुरुषांना संतोष होतो. गर्विष्ठ किंवा अहंकारी व्यक्ती त्यांना आवडत नाही. ज्ञानेश्वरांसारख्या महान संतांनी आपल्या हातून जे काही कार्य घडले त्याचे श्रेय आपल्या गुरूंना दिले आहे.

आपला हा नरदेह सर्व चांगल्या कारणांसाठी झिजला पाहिजे. केवळ देहाचे भरणपोषण केले तर आपल्यात आणि पशूत फरक काय?  समाजात अनेक चांगली कार्ये होत असतात. अशा कामांना पैशाने नाही तरी शरीराच्या माध्यमातून श्रम करून हातभार लावला पाहिजे. शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरात, गोंदवल्याला गोंदवलेकर महाराजांच्या मठात अनेक भक्त स्वेच्छेने सेवा देत असतात. अशी उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. यातून भगवंताची सेवा तर घडतेच पण देह भगवंताच्या कारणाने झिजतो. माणसाला जो देहाभिमान असतो, तो नष्ट व्हायला मदत होते. देहबुद्धी कमी होत जाते.

सर्व संतांनी सगुण भक्ती केली आहे. परमेश्वराच्या सेवेत आपला देह झिजवला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी पांडुरंगाची सगुण भक्ती केली. रामकृष्ण परमहंस कालीमातेची सेवा करीत. मीराबाईंनी श्रीकृष्णाची भक्ती केली. परमार्थात प्रगती करायची असेल तर सगुणाकडूनच निर्गुणाकडे जावे लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात ‘ सगुणी अति आदरेसी भजावे ‘ सगुणात प्रेम निर्माण झाले नाही तर ते निर्गुणात कसे येणार?

स्वसंवाद 

१. माझ्या रोजच्या वागण्या-बोलण्यात असणारी नम्रता ही केवळ माझे ‘काम साधून घेण्यासाठी’ घातलेला मुखवटा आहे, की ती माझ्या अंतःकरणातून आलेली खरी ‘लीनता’ आहे?  

२. ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे, माझ्या आयुष्यातील यशाचे श्रेय मी देवाच्या आणि गुरूंच्या चरणी अर्पण करतो, की ‘मी केले’ या अहंकाराचा फुगा फुगवत बसतो?  

३. भगवंताने दिलेला हा सुंदर नरदेह मी केवळ स्वतःच्या उपभोगासाठी आणि देहभरणासाठी वापरतो आहे, की कधी सामाजिक व सत्कार्यात ‘श्रमदान’ करून तो कारणी लावतो?  

४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, मी माझ्या आराध्य दैवताची भक्ती केवळ ‘वरवरची’ करतो, की मनात अथांग आदर आणि प्रेम बाळगून सगुण स्वरूपात त्या परमेश्वराला शोधतो?  

– क्रमशः श्लोक १०१ आणि १०२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकाच स्त्रीच्या प्रेमात… सात वेळा… – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – मराठी अनुवादक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ एकाच स्त्रीच्या प्रेमात… सात वेळा… – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – मराठी अनुवादक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

एका १८ वर्षांच्या नातवाने आपल्या ८० वर्षांच्या आजोबांना विचारले:

“आजोबा… तुम्ही ६० वर्षे एकाच स्त्रीच्या प्रेमात कसे राहू शकलात? “

“परस्परांना समजून घेणे गरजेचे असते… “

“मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे… “

“तडजोड आणि जुळवून घेणे आवश्यक असते… “

नातवाला अशा उत्तरांची अपेक्षा होती.

पण आजोबा हसले, क्षणभर आजीकडे पाहिले आणि म्हणाले:

मी ६० वर्षे एकाच स्त्रीच्या प्रेमात होतो, असे तुला कोणी सांगितले? “

नातवाला आश्चर्य वाटले.

आजोबा पुढे म्हणाले…

“वयाच्या २० व्या वर्षी, मी तिच्या सौंदर्याच्या आणि तिच्या उत्साही स्वभावाच्या प्रेमात पडलो.

ते माझे पहिले प्रेमहोते.

वयाच्या ३० व्या वर्षी, ती आई झाली. रात्री जागून आपल्या बाळाला हळुवारपणे झोपवणाऱ्या त्या स्त्रीच्या मी प्रेमात पडलो.

ते माझे दुसरे प्रेमहोते.

वयाच्या ४० व्या वर्षी, मी त्या धाडसी स्त्रीच्या प्रेमात पडलो जिने चेहऱ्यावर हास्य ठेवून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलली.

ते माझे तिसरे प्रेमहोते.

वयाच्या ५० व्या वर्षी, मी त्या स्त्रीच्या प्रेमात पडलो जिने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःची स्वप्ने आणि इच्छांचा त्याग केला.

ते माझे चौथे प्रेमहोते.

वयाच्या ६० व्या वर्षी, तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, पण मी त्या सोबतीण स्त्रीच्या प्रेमात पडलो जी केवळ एका नजरेने माझ्या चिंता समजू शकत होती.

ते माझे पाचवे प्रेमहोते.

वयाच्या ७० व्या वर्षी, मी त्या स्त्रीच्या प्रेमात पडलो जी मला दररोज विचारायची:

‘तुम्ही तुमचे औषध घेतले का? ‘

तिची ती काळजी माझ्या मनाला भिडली.

ते माझे सहावे प्रेमहोते.

आणि आता, वयाच्या ८० व्या वर्षी, मी त्या स्त्रीच्या प्रेमात आहे जी माझ्या शेजारी हळू चालते, मला आपल्या जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा सांगते आणि माझ्यासोबत हसते.

ते माझे सातवे प्रेमआहे. “

नातू गप्प राहिला.

आजोबा हसले आणि शेवटी म्हणाले:

लग्न म्हणजे केवळ आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत राहणे नव्हे”…

तर, आयुष्य बदलत असताना त्याच व्यक्तीच्या वेगवेगळ्या रूपांच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडायला शिकणे, म्हणजे लग्न होय. “

सौंदर्य बदलते.

वय बदलते.

शरीर बदलते.

परिस्थिती बदलते.

पण या सर्व बदलांमधूनही, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे पाहून असे म्हणू शकत असाल की…

तूच ती व्यक्ती आहेस जिच्यावर मी प्रेम करतो/करते. “

तर हेच दीर्घ आणि आनंदी वैवाहिक जीवनाचे खरे गुपित आहे.

कारण…

प्रेम म्हणजे केवळ एकदाच प्रेमात पडणे नव्हे.

खरे प्रेम म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडणे.

खरे प्रेम म्हणजे 

जैसे थेराहणे नव्हे तर ते आहे एकत्रितपणे बदलणे…

आणि 

तरीही, प्रत्येक दिवशी एकमेकांचीच निवड करणे.

मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात 

मराठी अनुवादक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दूर गेलेले भाऊ…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “दूर गेलेले भाऊ…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

एकाच आईच्या उदरातून जन्मलेली भावंडं मोठी झाल्यावर दूर का जातात…?

आणि त्याचा संपूर्ण कुटुंबावर काय परिणाम होतो…?

 

नाती अचानक तुटत नाहीत…

ती हळूहळू आतून कमकुवत होत जातात.

 

लहानपणी भाऊ-बहिणींमध्ये निरागस प्रेम असतं.

तेव्हा ना पैसा महत्त्वाचा असतो,

ना अहंकार,

ना संपत्ती.

 

एकमेकांशिवाय जेवण न करणारी भावंडं,

मोठेपणी एकमेकांचा चेहराही का पाहू इच्छित नाहीत…?

 

मनोविज्ञान सांगतं —

माणूस जसजसा मोठा होतो,

तसतसं त्याचं “मी” मोठं होत जातं.

 

स्वतःचं मत,

स्वतःचा अधिकार,

स्वतःचं अस्तित्व

यांना तो नात्यांपेक्षा जास्त महत्त्व देऊ लागतो.

 

आणि इथूनच सुरू होतो दुरावा…

 

कधी तुलना,

कधी पैसा,

कधी मालमत्ता,

कधी जोडीदारांचे हस्तक्षेप,

कधी न बोललेले गैरसमज,

तर कधी फक्त अहंकार…

 

पण खरं कारण फक्त बाहेर नसतं,

ते मनात असतं.

 

कारण नातं तुटण्याआधी संवाद तुटतो.

आदर संपतो.

समजून घेणं थांबतं.

 

आणि मग घर एकाच छताखाली असूनही,

मनं वेगवेगळ्या जगात राहू लागतात.

 

सगळ्यात मोठा आघात आईवर होतो.

 

जिने स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मुलांसाठी दिला,

तीच आई शेवटी मुलांमधला दुरावा पाहून आतून तुटत जाते.

 

आईला पैसा नको असतो,

तिला फक्त तिची मुलं एकत्र पाहायची असतात.

 

पण अनेकदा मुलं मोठी झाल्यावर आईशी वागणंही बदलतं.

तिच्या प्रेमात पक्षपात शोधला जातो,

तिच्या शब्दांमध्ये हस्तक्षेप दिसू लागतो,

आणि तिच्या भावनांकडे दुर्लक्ष होऊ लागतं.

 

आई मात्र शेवटपर्यंत घर जोडण्याचा प्रयत्न करत राहते…

स्वतःचं दुःख लपवून.

 

बहिणीची वेदना याहून वेगळी नसते.

तिच्यासाठी भाऊ म्हणजे तिचं माहेर,

तिचं बालपण,

तिची सुरक्षितता असते.

 

जेव्हा भाऊ एकमेकांपासून दूर जातात,

तेव्हा सर्वात जास्त तुटत असते ती बहीण…

 

कारण तिचं माहेर हळूहळू घर राहत नाही,

तर फक्त एक जागा बनून जातं.

 

पण या सगळ्याचा परिणाम फक्त दोन भावांपुरता मर्यादित राहत नाही…

संपूर्ण कुटुंब त्याची किंमत चुकवतं.

 

घरातील वातावरण शांत राहत नाही.

सण-उत्सव औपचारिक होतात.

एकत्र जेवणं बंद होतात.

लहान मुलं नात्यांपेक्षा वाद जास्त शिकतात.

 

पुढची पिढी प्रेम, त्याग आणि एकोप्याऐवजी

अहंकार, तुलना आणि दुरावा शिकते.

 

वृद्ध आई-वडिलांचं मानसिक आरोग्य खालावतं.

त्यांच्या आयुष्याची शेवटची वर्षं आनंदात नाही,

तर काळजीत जातात.

 

घरात पैसा असतो,

मोठं घर असतं,

सगळ्या सुखसोयी असतात…

पण मनःशांती नसते.

 

तत्त्वज्ञान सांगतं —

माणूस आयुष्यभर बाहेरचं जग जिंकण्याचा प्रयत्न करतो,

पण अनेकदा स्वतःचं घर हरवून बसतो.

 

कारण नाती टिकवण्यासाठी प्रेमापेक्षा जास्त गरज असते —

समजूतदारपणाची,

संवादाची,

आणि स्वतःचा अहंकार बाजूला ठेवण्याची.

 

शेवटी उरतो तो फक्त एक प्रश्न —

ज्यांच्यासोबत बालपण गेलं,

त्यांच्यासोबत वृद्धत्व का नाही जाऊ शकत…?

 

कारण घर भिंतींनी नाही बांधलं जात,

ते मनांनी बांधलं जातं…

आणि मनं तुटली की,

सगळं असूनही माणूस आतून एकटा पडतो.

काही नाती पुन्हा जुळतात…

काही फक्त औपचारिक राहतात…

आणि काही कायमची शांत होऊन जातात.

हे पूर्णपणे माणसांच्या मनावर अवलंबून असतं.

जर अहंकार प्रेमापेक्षा मोठा झाला,

तर दुरावा कायम राहतो.

कारण वेळ फक्त अंतर वाढवत नाही,

तर मनालाही सवय लावतो —

“त्याच्याशिवायही आपण ठीक आहोत… “

पण प्रत्येक नात्याच्या आत खोलवर एक न बोललेली ओढ कायम असते.

विशेषतः भावंडांच्या नात्यात.

मनोविज्ञान सांगतं —

रक्ताच्या नात्यांमध्ये आठवणी कधी मरत नाहीत.

त्या फक्त शांत होतात.

म्हणूनच अनेकदा —

एखाद्या आजारपणात,

आई-वडिलांच्या दुःखात,

जुन्या फोटोमध्ये,

किंवा आयुष्याच्या एखाद्या कठीण वळणावर

मन पुन्हा त्या नात्यांना शोधू लागतं.

कारण माणूस बाहेर कितीही कठोर झाला,

तरी आत कुठेतरी त्याचं बालपण जिवंत असतं.

पण एक कटू सत्यही आहे —

प्रत्येक वेळी उशीर होण्यापूर्वी लोक बदलत नाहीत.

काहींना नात्यांची किंमत

आई-वडील गेल्यावर समजते.

काहींना वृद्धत्वात एकटेपणा आल्यावर समजते.

आणि काहींना आयुष्यभर समजतच नाही.

तत्त्वज्ञान सांगतं —

वेळ प्रत्येक जखम भरत नाही,

काही जखमा फक्त जगायला शिकवतात…

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक आदिवासी दिन… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ जागतिक आदिवासी दिन ☆ संगीता कुलकर्णी ☆

९ ऑगस्ट रोजी झालेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने:

जागतिक आदिवासी दिन : निसर्गसंस्कृतीचा गौरव

ज्यांच्या पावलांनी जंगलाला वाटा मिळाल्या, ज्यांच्या श्वासांनी पर्वतांना जीवन मिळाले आणि ज्यांच्या संस्कृतीने निसर्गालाच देवत्व बहाल केले त्या आदिवासी समाजाला कृतज्ञ अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिन.

“जंगल आहे म्हणून जीवन आहे आणि जीवन आहे म्हणून संस्कृती आहे, ” ही भावना ज्या समाजाच्या जगण्याच्या प्रत्येक श्वासात दडलेली आहे तो म्हणजे आदिवासी समाज… निसर्गाशी सुसंवादी नाते, श्रमाला प्रतिष्ठा, सामूहिक जीवनपद्धती आणि सांस्कृतिक वैभव यांमुळे आदिवासी समाज मानवसंस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण घटक ठरतो… दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका समाजाचा गौरव करण्यासाठी नसून त्यांच्या परंपरा, संस्कृती, ज्ञान आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा सन्मान करण्यासाठी आहे.

भील, गोंड, वारली, संथाल, मुंडा, कोरकू, कातकरी, कोलाम, ठाकूर अशा अनेक जमाती भारताच्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालतात. प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा, लोकपरंपरा, श्रद्धा, कला, लोकनृत्य आणि जीवनपद्धती आहे. या विविधतेतून भारतीय संस्कृतीचे विशाल रूप अधिक उजळून दिसते… आदिवासी म्हणजे केवळ डोंगर-दऱ्यांत राहणारे लोक नव्हेत… ते निसर्गाचे खरे रक्षक आहेत. झाडे, नद्या, पर्वत, वन्यजीव आणि पृथ्वी यांना ते केवळ संसाधने मानत नाहीत तर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपतात. त्यांच्या लोकगीतांत निसर्गाचे सौंदर्य आहे, लोकनृत्यांत जीवनाचा उत्सव आहे आणि लोकपरंपरांत पर्यावरण संवर्धनाचा अमूल्य संदेश आहे.

आदिवासी समाजाचे जीवन निसर्गाशी एकरूप झालेले आहे. जंगल, डोंगर, नद्या आणि वनसंपत्ती हे त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे ज्ञान त्यांनी अनुभवातून आत्मसात केले आहे… आज जग पर्यावरण संवर्धनाची चर्चा करत असताना आदिवासी समाजाने ती हजारो वर्षांपूर्वीच आपल्या जीवनात उतरवली होती तसेच ही जीवनमूल्ये ही शतकानुशतके आपल्या आचार-विचारांत जपली आहेत.. त्यांनी वृक्ष तोडण्याआधी त्याची क्षमा मागितली, नदीत उतरतानाही तिचा आदर राखला आणि जंगलाचा उपयोग करतानाही त्याचे संरक्षण केले. निसर्गाशी संघर्ष नव्हे, तर सहजीवन हेच त्यांचे जीवनतत्त्व आहे. म्हणूनच त्यांच्या संस्कृतीत पृथ्वीच्या भविष्याचे मौल्यवान ज्ञान दडलेले आहे… त्यांचे पारंपरिक ज्ञान हे केवळ सांस्कृतिक नव्हे तर पर्यावरणीय दृष्टीनेही अत्यंत मौल्यवान ठरते.

आदिवासी समाज हा भारताच्या संस्कृतीच्या इंद्रधनुष्यातील एक तेजस्वी रंग आहे. त्यांच्या लोकगीतांत मातीचा सुगंध दरवळतो, लोकनृत्यांत स्वातंत्र्याचा आनंद डोलतो तर त्यांच्या चित्रकलेत निसर्गाचे स्पंदन जिवंत होते. त्यांच्या जीवनात कृत्रिमतेला स्थान नाही साधेपणा हीच त्यांची श्रीमंती आणि श्रम हीच त्यांची पूजा आहे. पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे त्यांचे जीवन निर्मळ तर उंच डोंगराप्रमाणे त्यांचा स्वाभिमान अढळ आहे… सभ्यतेच्या झगमगाटात अनेकदा विस्मरणात गेलेल्या या समाजाने निसर्गाच्या कुशीत राहून मानवाला जगण्याची खरी कला शिकवली. त्यांनी जंगलाला संपत्ती नव्हे तर आई मानले, नद्यांना केवळ पाण्याचा प्रवाह नव्हे तर जीवनाची गंगा समजले आणि पृथ्वीला उपभोगाची वस्तू नव्हे तर पूजनीय माता मानले.

भारतातील आदिवासी समाजाने देशाच्या इतिहासातही मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेक आदिवासी वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली… अनेक आदिवासी वीरांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करत स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित ठेवली… भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे योगदान उल्लेखनीय आहे… त्यांच्या संघर्षाची गाथा इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि न्याय या मूल्यांची जपणूक अधिक बळकट झाली… स्वातंत्र्यानंतरही शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी विकासाच्या प्रवाहात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तरीही विस्थापन, वनहक्क, शिक्षणातील असमानता, कुपोषण, बेरोजगारी आणि सांस्कृतिक ओळख जपण्याची समस्या आजही गंभीर स्वरूपात दिसून येते.

आज आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहात अनेक आदिवासी परंपरा आणि बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे, विस्थापन वाढत आहे आणि त्यांच्या पारंपरिक जीवनपद्धतीसमोर अनेक आव्हाने उभी राहत आहेत. तरीही त्यांनी आपल्या संस्कृतीची ओळख, परंपरेचा अभिमान आणि निसर्गाविषयीची निष्ठा जपली आहे. ही चिकाटी आणि आत्मसन्मान प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

जागतिक आदिवासी दिन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, जमीन, वनहक्क आणि सामाजिक न्याय या प्रत्येक क्षेत्रात आदिवासी समाजाला समान संधी मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा सन्मान करून आधुनिक विज्ञानाशी त्याची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. कारण निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्याची कला जगाला शिकविण्याची ताकद आदिवासी संस्कृतीत आहे.

आज आपण पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत विकास यांविषयी चर्चा करतो परंतु हे विचार आदिवासी समाज शतकानुशतके आपल्या जीवनातून जगत आला आहे म्हणूनच त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर आदराने आणि समतेच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. त्यांच्या संस्कृतीचे जतन करणे म्हणजे आपल्या देशाच्या सांस्कृतिक वैभवाचे संरक्षण करणे होय…

जागतिक आदिवासी दिन हा विविधतेतील एकतेचा, मानवतेचा आणि निसर्गप्रेमाचा उत्सव आहे… हा केवळ उत्सव नाही तर आत्मपरीक्षणाची संधी आहे. आदिवासी समाजाला विकासाचा समान अधिकार देताना त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचे संरक्षण करणे, त्यांच्या ज्ञानपरंपरेचा सन्मान करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे, हीच या दिवसाची खरी शिकवण आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन म्हणजे मानवतेच्या प्राचीन शहाणपणाचे जतन होय म्हणूनच विविधतेचा सन्मान, समानतेची जाणीव आणि निसर्गाशी सुसंवाद या मूल्यांच्या आधारे आपण अधिक न्याय्य, समृद्ध आणि संवेदनशील समाजाची उभारणी करूया… आदिवासी संस्कृतीचे अस्तित्व टिकले तरच निसर्गाचे संतुलन आणि मानवतेचे भविष्य अधिक समृद्ध, सुंदर आणि सुरक्षित राहील हाच जागतिक आदिवासी दिनाचा खरा संदेश आहे… जंगलातील प्रत्येक हिरवे पान पृथ्वीचा श्वास जपते तसेच आदिवासी समाज भारताच्या संस्कृतीचा आत्मा जपतो. त्यांच्या अस्तित्वाचा सन्मान म्हणजे निसर्गाचा सन्मान, आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग म्हणजे भारताच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग होय.

दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन हा केवळ एका समाजाचा उत्सव नाही तर मानवसंस्कृतीच्या आद्य वारशाला अर्पण केलेला सन्मानाचा मुजरा आहे.

 

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares