मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तृप्तता… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तृप्तता☆ श्री अनिल वामोरकर ☆

आज एकांतात

हलकेच ध्यान लागले

अन् अंग प्रत्यंग

उर्जेत न्हाले…

 

श्वासही मंदावला

भोवतीचे कळेना

एका वेगळ्या विश्वात

मी मलाच पाहीले…

 

होता कुट्ट अंधार

पण तोही वाटे हवासा,

नव्हती भीती, होते कुतूहल

अंधारातही दिसू लागले…

 

हळूहळू अंधार

धूसर झाला

हलक्या प्रकाशात

मज सद्गुरू दिसले…

 

मंद स्मित

तेजोमय वदन,

सुवर्ण किरणांनी वलयांकित,

कृपांकीत केले…

 

मौनात मी

मौनातच त्या

कृपाकटाक्षे मज

उद्धरीले…

 

पून्हा तोच काळोख,

हवाहवासा,

शाश्वत तृप्ततेने

मन माझे मोहरले…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गणपती होता टिळकांशी भांडत…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “गणपती होता टिळकांशी भांडत…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

काल रात्री गणपती बाप्पा

होता टिळकांशी भांडत,

आपल्या अडचणींची कैफियत

होता पोटतिडकीने मांडत ||

देवघरातून तू मला

बाहेर का आणलंस?

तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक

कशाला चार-चौघात मांडलंस?

 *

गायलास तू सुरुवातीला

ताल-सुरात आरत्या,

केलीस साधी फुलांची आरास

भोवती रंगीत बत्त्या.

 *

खूप मस्त छान असायचं

आनंद वाटायचा येण्यात,

सुख-शांती-समाधान मिळे

चैतन्य तुला देण्यात.

 *

दहा दिवस उत्सवाचे म्हणजे

असे, दिव्यत्वाची रंगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

पूर्वी प्रवचन, कीर्तन, गायनाने

मंगलमयी वाटायचे,

प्रबोधक, उद्बोधक भाषणांनी

विचार उंची गाठायचे

 *

आत्ता सारखा हिडीसपणा

मुळीच नव्हता तेव्हा,

शांताबाईच्याच नावाचा

आता अखंड धावा.

 *

पीतांबर, शेला, मुकुट

हे माझे खरे रुप,

शर्ट, पँट, टोपी, पागोटे

धिंगाण्याला फक्त हुरूप.

 *

शाडूची माती… नैसर्गिक रंग

गायब आता झाले कुठे?

लायटिंग केलेल्या देखाव्याने

मला दरदरून घाम फुटे!

 *

श्रध्दा, भक्तीभाव, आदर मनीचा

गेला ना रे सांडत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

माणसां-माणसांनी एकत्र यावे

एकमेकांना समजुन घ्यावे,

देव-घेव विचारांची करतांना

सारे कसे एक व्हावे.

 *

जातीभेद नसावा…

बंधुभाव असावा,

सहिष्णुतेच्या विचारांनी

नवा गाव वसावा.

 *

मनातला विचार तुझ्या

खरंच होता मोठा,

पण, आज मात्र खऱ्या विचारांनाच

बघ मिळालाय फाटा. ओळख

 *

पूर्वी विचारांबरोबर असायची

खाण्यापिण्याचीही रेलचेल,

आता मात्र देखाव्यांमागे

दडलेला असतो काळा खेळ.

 *

पूर्वी बदल म्हणून असायचे

पोहे-चिवडा-चहा-काॅफी…

साग्रसंगीत जेवणा सोबत

लाडू-मोदक-पेढे-बर्फी.

 *

आता, रात्री भरले जातात

पडद्यामागे, मद्याचे पेले

डी. जे. वर नाचत असतात

माजलेले दादांचे चेले.

 *

नको पडूस तू असल्या फंदात

तेव्हाच मी होतो सांगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होते, टिळकांशी भांडत ||

 *

कशासाठी उत्सव असा

सांग ना रे बांधलास?

देवघरातून गल्लोगल्ली

डाव माझा मांडलास!

 *

दहा दिवस कानठळ्यांनी

होतो मला आजार,

व्यवहारी दुनिया इथली,

इथे चालतो लाखोंचा बाजार.

 *

रितीरिवाज, आदर-सत्कार,

मांगल्याचा नाही पत्ता,

देवघरा ऐवजी माझा

रस्त्यावरती सजतो कट्टा.

 *

जुगार-दारु-सट्टा-मट्टा –

अनैतिकतेला येतो ऊत,

देवाऐवजी दैत्याचेच मग

मानेवरती चढते भूत.

 *

सामाजिक बाजू सोडून सुटतो

राजकारणालाच इथे पेव,

गौरी-गणपती सण म्हणजे –

गैरव्यवहाराची ठेव-रेव.

 *

नको रे बाबा, नको मला हा

मोठेपणाचा तुझा उत्सव,

मला आपले तू माझ्या जागी

परत एकदा नेऊन बसव.

 *

कर बाबा कर माझी सुटका

नको मला ह्यांची संगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

आपल्या अडचणींची कैफियत

होता पोटतिडकीने मांडत,

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती: शशी नाडकर्णी -नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ युगंधर! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? युगंधर! ? श्री आशिष  बिवलकर ☆

कारागृही जन्म | विष्णू अवतार |

जगाचा उद्धार | कृष्ण कृष्ण ||१||

*

देवकीनंदन | गोकुळी वाढला |

लिलांत रमला | बालपणी ||२||

*

पुतना संहार | कालियामर्दन |

ऋषी सांदीपन | गुरुथोर ||३||

*

सुदर्शन चक्र | युद्धात निशस्त्र |

रक्षे धर्मशास्त्र | युगंधर ||४||

*

गीतेतून ज्ञान | बोध पुरुषार्थ |

रणांगणी पार्थ | शस्त्रसिद्ध ||५||

*

षोडश सहस्त्र | कन्यांचे रक्षण |

नीती सुलक्षण | नारायण ||६||

*

अवतार कार्य | जीवन नश्वर |

लागताच शर | मोक्षत्वासी ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणेश स्तवन… ☆ ज्योती कुळकर्णी ☆

ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ गणेश स्तवन☆ ज्योती कुळकर्णी ☆  

(वृत्त:पादाकुलक)

नमन करोनी तुला गणेशा

पहिली पूजा तुझी करावी

विघ्ने हरतो बाप्पा म्हणुनी

परंपरा ही सदा जपावी ||||

चमकत असती दोन हिरे या

नेत्री तुजला छान शोभले

नाभी मधली प्रभा हिऱ्याची

तुला पाहुनी भक्त हरखले ||||

 *

चौसष्ट कला ज्ञाता पण्डित

नृत्य नि गायन कला तज्ञही

बुद्धीची ही तुझी प्रभावळ

प्रभा पडू दे भक्तांवरही ||||

 *

काव्य नाटके तुझी पैंजणे

रूणझुण करती आशय सुंदर

वेद पुराणे रत्न अलंकृत

शब्द कोंदणे तत्त्व निरंतर ||||

 *

तव लघु नयनी अवघे हे जग

सांगावे मज कसे मावले

विनायका तू दर्शन दिधले

मस्तक चरणी तुझ्या ठेवले ||||

©  ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३४० ☆ देशभक्तिचे वेड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४० ?

☆ देशभक्तिचे वेड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

देशभक्तिचे वेड लागले पुजतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

युद्ध खेळणे केवळ नाही काम एवढे

कुठल्याही कामाचे नसते इथे वावडे

पूर वादळा सोबतसुद्धा झटतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

पालन नियमांचे करण्याची सक्ती आहे

देशावरती नितांत कायम भक्ती आहे

म्हणून आम्ही धारातीर्थी पडतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

डोंगर सोडा हिमालयावर चढतो आम्ही

कण वाळूचे तप्त जाळती जळतो आम्ही

देशासाठी आनंदाने भिजतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

या पायांना हिरवळ सांगा कोठे दिसते

ढग युद्धाचे नसतानाही पळपळ असते

ओझे असते पाठीवरती पळतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

विझण्यासाठी आम्ही पेटुन उठतो येथे

देशासाठी बाधा ठरती काही नेते

विचार त्यांचा मनास अमुच्या छळतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सरता श्रावण… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ सरता श्रावण… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आला सरता श्रावण

मना लागे हुरहुर

वर्षेची ती रिमझिम

अंगणात भुरभुर..

*

जाई पावसाची सर

 भिजवीत अंगणाला

दिसे नभाच्या प्रांगणी

 इंद्रधनुष्याची माला..

*

हिरवीगार ही सृष्टी

 लोभवते क्षणोक्षणी

 किमयाही निसर्गाची

 भूल घाली मनोमनी..

*

सृष्टी गीत गाता गाता

 जाई श्रावण पाऊल..

 स्वागताला आतुरलो

 लागता गणेश चाहूल…

© उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ आवाज हा, आवाज हा… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? कवितेच्या उत्सव ?

☆ आवाज हा, आवाज हा… ☆ श्री अमोल अनंत केळकर☆

(अवधूत गुप्ते यांनी विद्यानंद बापट याच्यावर एक गाणे चित्रित केले आहे. त्यापासून स्फूर्ती घेऊन म्हणलं आपण पण एक ढोल बडवावा 😬)

 (गाण्याची चाल: आभास हा, छळतो मला.  चित्रपट : यंदा कर्तव्य आहे)

कधी दूरदूर कधी हे समोर, कान ठणकतो आज का

का हे कसे, होते असे, हा प्रश्न पडे जीवा

कसा सावरू मी आवरू सणाला

होई कंप का हा झोपताना ही मला

आवाज हा, आवाज हा

छळतो तुला छळतो मला 🎷

क्षणात आले स्पीकर सारे, भिंतीच बनूनी जाती

कधी मर्यादा तुटून गेली, काहीच उरे ना हाती

मी असाच उठतो उगाच पाहतो वेळ पुन्हा आठवते

मग मिटून डोळे, कुशी बदलून नको नको से होते

तू वाजताना, झोपण्याचा खेळ हा

दिसे स्वप्न का हे जागताना ही मला

आवाज हा, आवाज हा

छळतो तुला छळतो मला 🥁

 

मनात माझ्या हजार शंका (विद्या) आनंद शोधू कसा रे

तो इथेच आहे, तिथेच नाही आहे खरा कसा रे

नवे ध्वनी सारे,

नको वाटे ही हवा

ले -जहर झाले

 ऐकताना वृंद नवा

 

आवाज हा, आवाज हा

छळतो तुला छळतो मला 🎺 

#माझी_फुसकुंडी 📝

© श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुरलीच्या स्वरांतला कृष्ण… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ मुरलीच्या स्वरांतला कृष्ण ☆ संगीता कुलकर्णी ☆

नभाच्या निळाईहून गहिरे तुझे नयन नीलकमल

अमावस्येच्या कुशीत जणू उमलले शशिकिरण निर्मल

कुंतलांच्या काळ्या मेघांत मोरपिसांची इंद्रधनू-रेष

तुझ्या एका स्मितात दडले सृष्टीचे सगळे अविनाश गूढविशेष

*

यमुनेच्या यौवनलाटांवर चांदण्यांची चंदेरी पाल

कदंबाच्या कुशीत विसावला तो सावळा नंदलाल

मुरलीच्या अधरामृताने निशेची झाली नादमयी

स्वरांच्या त्या सरींत विरघळली राधेची अंतरीची तृषामयी

*

तुझी मुरली की विरहिणीच्या हृदयाची हाक होती?

की अनंताच्या ओंजळीतील प्रेमाची पहिली चाहूल होती?

एक स्वर तुझा पडता कानावर काळही थबकून राहिला

आणि जीवाचा प्रत्येक कण श्यामरंगात न्हाऊन निघाला

*

गोपींच्या नयनी चंद्र उगवले अधरी थरथरले गान

पैंजणांच्या प्रत्येक नादात धुंद झाले वृंदावन

प्रेमाला जेव्हा शब्द उरले नाहीत तेव्हा  तू मुरली झालास

आणि मौनाच्या मंदिरामध्ये स्वतःच परमेश्वर झालास

*

राधा म्हणजे तुझ्या प्रेमाची निःशब्द लिहिलेली गाथा

तिच्या एका अश्रूबिंदूत सामावली युगांची व्यथा

भेट झाली क्षणभराची तरी जन्मोजन्मींचा सुगंध

दोन देहांच्या पलीकडले ते एकात्मतेचे चिरंतन छंद

*

पण रणांगणी जेव्हा अर्जुनाच्या हातून गांडीव गळाले

तेव्हा तुझ्या अधरांवरचे हास्य गीतेत रूपांतरले

कर्म तुझ्या ओठी आले अन्, मोहाचे मेघ विरले

अज्ञानाच्या अंधःकारातून आत्मज्ञानाचे सूर्य उगवले

*

सारथी तू तरी विश्वाचा नियंता तुझ्या मुठीत

रथाच्या चक्रांमधुनी जणू फिरती युगांची गती

विश्वरूपाच्या एका दर्शनात दिशा झाल्या दीपमाळा

अणुरेणूत अनंत दिसले विराट झाला नंदलाला

*

कधी गोकुळचा माखनचोर कधी करुणेचा सागर

कधी सखा कधी योगेश्वर कधी प्रेमाचा अमृतझर

तुझ्या लीलांना सीमा नाही तुझ्या रूपांना अंत नाही

तूच प्रश्न आणि तूच उत्तर तुझ्यावाचून सत्यच नाही

*

आजही मनाच्या मंदिरात तुझी पाऊले ऐकू येतात

विरक्त झालेल्या भावनांना तुझे स्वर पुन्हा जागवतात

जगण्याच्या या रणभूमीवर जेव्हा मी हरवून जातो

तेव्हा अंतरीचा सारथी होऊन तूच मला पुन्हा सावरतोस

*

म्हणून नको वैकुंठ मला नको मुक्तीचा मान

नको स्वर्गीय सुखांची माळ नको मोक्षाचे दान

फक्त एवढीच कृपा कर श्वासात तुझा स्वर राहू दे

हृदयाच्या प्रत्येक ठोक्यालाश्याम म्हणण्याची ओढ राहू दे

*

माझ्या अश्रूंना यमुना कर माझ्या भावांना भक्ती

माझ्या शब्दांना मुरली कर माझ्या मौनाला शक्ती

जीवनाच्या अंतिम संध्येला जेव्हा सारे रंग विरतील

तेव्हा माझ्या मिटलेल्या नयनांत फक्त तुझेच सावळे आकाश उरेल…

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०५ आणि १०६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०५ आणि १०६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. १०५ – – – 

विवेके क्रिया आपुली पालटावी ।

अति आदरे शुध क्रिया धरावी ।

जनीं बोलण्यासारिखे चाल बापा ।

मना कल्पना सोडी संसार तापा ।।१०५।।

अर्थ : विवेकाच्या साहाय्याने आपल्या वागणुकीत बदल करावा. चांगले आचरण जाणीवपूर्वक आणि आदरपूर्वक करावे. आपले वागणे आणि बोलणे यात एकवाक्यता असावी. हा संसार जरी दुःखमय असला तरी त्याविषयी उगीचच नको त्या कल्पना करणे सोडून द्यावे.

(विवेक- सारासार विचार, पालटावी – बदल घडवून आणावा, शुध – चांगले/उत्तम आचरण, संसार तापा – संसारातील दुःख)

विवेचन : साधकाने कसे वागावे हे समर्थ मागील श्लोकाप्रमाणे याही श्लोकात सांगत आहेत. आयुष्यात आणि परमार्थ मार्गावर वाटचाल करताना देखील विवेक अतिशय महत्वाचा. विवेकबुद्धी म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी. काय चांगले आहे, काय वाईट आहे हे समजून त्याप्रमाणे वागणे म्हणजे विवेक. दुर्योधन एकदा श्रीकृष्णाला म्हणाला होता की मला चांगले काय आहे हे समजते. मी वागतो ते वाईट आहे हेही मला समजते. पण मला चांगले वागण्याची बुद्धीच होत नाही. इथे दुर्योधनाच्या वागण्यात विवेक बुद्धीचा अभाव आढळतो. चांगले आणि वाईट म्हणजे श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे आपल्या अंतिम हिताची जी गोष्ट आहे त्याची निवड करणे. प्रेयस गोष्ट सुरुवातीला आकर्षक वाटत असली तरी अंतिमतः आपली हानी करणारी असते. नियमित व्यायाम करणे अंतिमतः माझ्या हिताचे आहे. पण आळसामुळे मला झोप प्रिय वाटते. इथे मी श्रेयसची निवड न करता प्रेयस निवडतो. ते अंतिमतः हानिकारक आहे.

वाईट सवयींचे वळण लागण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. पण चांगल्या गोष्टींची सवय जाणीवपूर्वक लावावी लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात की ‘ शुध क्रिया धरावी ‘ म्हणजे जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टींचे आचरण करावे. चांगल्या गोष्टींच्या आचरणासाठी समर्थ जाणीवपूर्वक ‘शुद्ध’ हा सुंदर शब्द वापरतात. खरोखरच जे चांगले आहे ते शुद्ध आणि ज्यामध्ये काही दोष आहे किंवा वाईट आहे ते अशुद्ध! विवेकाच्या साहाय्याने आपल्या वागण्याबोलण्यात योग्य तो बदल घडवावा. तो सुद्धा कसा? तर समर्थ म्हणतात, ‘ अति आदरे. ‘ त्या गोष्टींबद्दल म्हणजेच चांगल्या गोष्टींबद्दल मनात आदर बाळगून आदरपूर्वक त्यांचे आचरण करावे. आपल्या वागण्याने सज्जनांना आनंद होईल अशा प्रकारे वागावे. ‘ सदाचार हा थोर सांडू नये तो ‘ असे समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात सांगितले आहेच. पण चांगल्या गोष्टी या पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात.

बऱ्याच वेळा आपले बोलणे आणि वागणे यात अंतर पडते. आपण बोलतो काही आणि करतो काही. म्हणजेच आपल्या ‘ कथनी और करनी ‘ यात फरक असतो. एखादी व्यक्ती वारंवार अशा पद्धतीने वागू लागली की समाज अशा लोकांवर विश्वास ठेवत नाही. त्यांच्या शब्दाला काडीचीही किंमत लोक देत नाहीत. म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण जसे बोलतो तसे वागावे. आपले आचार, विचार आणि उच्चार यात एकवाक्यता असावी.

हा संसार दुःखमय आहे हे मान्य. त्यात पूर्णपणे सुखी आहे अशी कोणीच व्यक्ती नाही. पण म्हणून आपल्या भविष्याविषयी उगीच चिंता करीत बसू नये. कोणी भविष्यात आपले कसे होईल याच्या कल्पना करीत बसतात तर कोणी नको त्या कल्पनेच्या मनोराज्यात रमतात. कल्पनेनेच आपण स्वतःला दुःखी करून घेतो किंवा काल्पनिक गोष्टींमध्ये सुख मानत बसतो. संसार दुःखमय आहेच त्यात आणखी भर अशा कल्पना करून कशाला टाकायची? कल्पनाच करायची झाली तर ती चांगल्या गोष्टींची करावी. ज्या गोष्टींची कास आपल्याला धरायची आहे त्याबद्दल कल्पना करायला हरकत नाही. कारण त्यातूनच त्या चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा आपण करू शकू.

स्वसंवाद 

१. दुर्योधनाप्रमाणे मलाही एखादी गोष्ट ‘चुकीची आहे’ हे माहीत असूनही, मी केवळ तात्कालिक सुखासाठी (प्रेयससाठी) विवेकाचा बळी देऊन त्याच मार्गावर चालत राहतो का?

२. चांगल्या सवयी आणि आचरण अंगी बाणवण्यासाठी मी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक आणि ‘अति आदराने’ (मनापासून) प्रयत्न करतो, की आळसाला शरण जातो?

३. चार लोकांमध्ये आदर्श विचार मांडताना, प्रत्यक्षात माझ्या कुटुंबात आणि व्यवहारात माझे बोलणे आणि वागणे यात थोडी तरी एकवाक्यता (प्रामाणिकपणा) असते का?

४. संसारातील चालू घडामोडींना सामोरे जाण्याऐवजी, मी भविष्यातील काल्पनिक संकटांचे ‘मनोराज्य’ उभे करून स्वतःचा ‘संसार ताप’ (चिंता) तर विनाकारण वाढवत नाही ना?

—–

श्लोक क्र. १०६ — — 

बरी स्नानसंध्या करी येकनिष्ठा ।

विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ।

दया सर्व भूतीं जया मानवाला ।

सदा प्रेमळु भक्तिभावे निवाला ।।१०६।।

अर्थ : आपले जे स्नानसंध्या आदी नित्यनैमित्तिक कर्म असेल ते निष्ठापूर्वक करावे. भरकटणाऱ्या म्हणजेच स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला विवेकाच्या साहाय्याने आवर घालावा. सर्व प्राणिमात्रांबद्दल मनात दयाभाव किंवा करुणा असावी. अशी प्रेमळ व्यक्ती भगवंताबद्दल मनात असलेल्या भक्तिभावाने समाधान पावते.

(येकनिष्ठा – संपूर्ण श्रद्धेने, स्थानभ्रष्ट – भरकटणारे, निवाला – तृप्त झाला/समाधान पावला)

विवेचन : साधकाच्या अंगी कोणते गुण असावेत किंवा हे गुण त्याने कसे विकसित करावेत हे समर्थ या श्लोकात आपल्याला सांगताहेत. आपल्याला आपल्या धर्मात किंवा घरात परंपरेने चालत आलेले जे स्नानसंध्यादि कर्म आहे, ते निष्ठापूर्वक म्हणजेच संपूर्ण श्रद्धेने करायला हवे. त्याचप्रमाणे सद्गुरूंनी नामस्मरण आदी गोष्टींचा जो उपदेश आपल्याला दिलेला असेल, त्याचेही नियमितपणे पालन करणे आवश्यक आहे. स्नानाने आपल्या शरीराला स्नान घडते तर संध्या आपल्या मनाला स्नान घालते. अलीकडे या गोष्टींची कर्मकांड म्हणून जी हेटाळणी केली जाते, ती परमार्थ मार्गात बाधक ठरते. या गोष्टी नियमितपणे करण्याचे वळणच मनाला आणि शरीराला लावून घ्यायला हवे. घरात जर थोडे कर्मठ वातावरण असेल तर त्याचा फायदा असे वळण लागण्यासाठी फार उपयोगी पडतो. घरातूनच असे संस्कार मुलांवर होतात.

आज मोबाईल, टीव्ही यांच्यासारखी अनेक मनोरंजनाची साधने सर्वांना उपलब्ध झाली आहेत. समाजमाध्यमे आहेत. यातून बऱ्याचदा चांगले कमी आणि वाईट गोष्टीच जास्त डोळ्यासमोर येतात. ते सगळे पाहून आणि समाजातील लोकांचे नको ते आचरण पाहून आपले मन भरकटण्याचा म्हणजेच समर्थांच्या शब्दात स्थानभ्रष्ट होण्याचा मोठा धोका असतो. आजकाल समाजात वाटेल ते खाणे, वाटेल त्या वेळी खाणे, मन मानेल तसे वागणे याबद्दल लोक विधिनिषेध बाळगताना दिसत नाहीत. तात्पर्य, स्थानभ्रष्टता मोठ्या प्रमाणावर बोकाळली आहे. तिला आवर घालायचा असेल तर विवेक हवा. विवेक म्हणजे योग्यायोग्यतेची जाणीव होऊन योग्य गोष्टी करणे, अयोग्य गोष्टी कितीही आकर्षक वाटल्या तरी त्या करायचे टाळणे. यासाठी मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय करावी लागते. एखादी गोष्ट वारंवार केली तर तिची सवय लागते. वाईट गोष्टींची सवय लागायला वेळ लागत नाही. चांगल्या गोष्टींची सवय मात्र जाणीवपूर्वक लावावी लागते.

ज्याला साधनामार्गावर वाटचाल करायची आहे अशा व्यक्तीच्या मनात केवळ मनुष्यच नव्हे तर सर्व प्राणिमात्रांबद्दल दया किंवा करुणाभाव हवा. आपल्याप्रमाणेच त्यांच्यातही परमेश्वराचा अंश आहे, याची जाणीव हवी. संत एकनाथांनी तृषार्त गाढवाला दुरून आणलेल्या गंगेच्या कावडीतील पाणी पाजले होते. सर्व प्राणिमात्रांबद्दलचा हा समत्वभाव संतांमध्ये आपल्याला विशेष करून दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, ‘ दया तिचे नाव, सर्व भुतांचे पाळण आणिक निर्दालन कंटकांचे. ‘ हाच ‘ धर्म नीतीचा व्यवहार ‘आहे. सर्वांबद्दल प्रेम असणाऱ्या माणसाच्या मनातच ईश्वराबद्दल भक्तिभाव उत्पन्न होतो. आपल्या आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, ” मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. ‘ ज्या चित्तात अशी मृदुता, प्रेमळपणा असेल आणि ईश्वराबद्दल भक्तिभाव असेल, असे चित्त समाधानी असते. तेच समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात.

स्वसंवाद 

१. रोजच्या धावपळीत शरीराच्या स्वच्छतेसोबतच, माझे मन शुद्ध आणि शांत ठेवण्यासाठी मी संतांनी सांगितलेल्या ‘संध्या’ किंवा नामस्मरणाचा आश्रय नित्यनेमाने घेतो का?

२. मोबाईल, इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे माझे मन संसाराच्या नको त्या आकर्षणात ‘स्थानभ्रष्ट’ (भरकटत) होत असताना, मी त्याला विवेकाने आवर घालण्याचा प्रयत्न करतो का?

३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे माझे चित्त लोण्यासारखे ‘मृदू सबाह्य नवनीत’ आहे का? माझ्या मनात घरातील माणसांबद्दल, प्राणिमात्रांबद्दल आणि हाताखालील लोकांबद्दल खरी दया आणि करुणा आहे का?

४. बाह्य जगात आनंद आणि समाधान शोधण्याऐवजी, मी कधी आंतरिक ‘भक्तिभावाने’ मनाची तृप्ती किंवा समाधान अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे का?

– क्रमशः श्लोक १०५ आणि १०६

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रवास… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ प्रवास नीलांबरी शिर्के 

बीज कुशीत पडलं की

घ्यावंच लागतं भुईला

पोषण त्याचे करण्या

धडपडावे लागे आईला!!

*

बीज अंकुरित होता क्षणी

आहारासाठी धडपडत

जिकडून मिळेल पोषण

तिकडे ते वाढत जात!!

*

मिळाल नाही लगेच अन्न

पायरी पायरी उतरलं 

भुईचा आधार मिळता

रोप वरती मोहरत गेलं!!

*

मुळाच्या पर्यंतचा प्रवास

आपसुक रेखाटला गेलाय

चित्र माध्यमातून तोच

तुमच्यापुढे सादर केलाय!!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares