मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॲटिट्यूड – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

?जीवनरंग ?

☆ ॲटिट्यूड – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

“तुझी लायकी नाहीये इथं बसायची, चल मागे जा!” लग्नमंडपात सासूने माझ्या आई-वडिलांना उठवलं… पण जेव्हा मी हातात माईक घेतला, तेव्हा नवऱ्याच्या अख्ख्या खानदानाला सिक्युरिटी गार्डने धक्के मारून बाहेर काढलं!

माझं नाव ‘स्वराली’. मी पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत ‘फायनान्शिअल ॲडव्हायझर’ म्हणून मोठ्या पदावर काम करते. माझे बाबा, ‘माधवराव’ हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते आणि नुकतेच निवृत्त झाले होते. माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्याची ३५ वर्षांची पुंजी, म्हणजे जवळपास ४० लाख रुपये, माझ्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवले होते.

माझे लग्न ‘समीर’ नावाच्या एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाशी ठरले होते. समीरचे कुटुंब अत्यंत श्रीमंत होते. लग्नाआधीच समीरच्या आईने (माझ्या होणाऱ्या सासूने) एक अट ठेवली होती- “आम्हाला हुंडा नकोय, पण आमच्या स्टेटसप्रमाणे लग्न लोणावळ्याच्या ‘फाईव्ह स्टार रिसॉर्टमध्येच’ झाले पाहिजे. ” मुलीच्या सुखासाठी माझ्या बाबांनी हसत हसत स्वतःचा सर्व ‘पीएफ’ (PF) आणि रिटायरमेंट फंड मोडून त्या ५-स्टार लग्नाचा सर्व खर्च उचलला.

*तो अपमानाचा प्रसंग आणि माझ्या बापाचे डोळे:*

लोणावळ्याच्या त्या आलिशान रिसॉर्टमध्ये लग्नाचा दिवस उजाडला. हॉल फुलांनी सजला होता. मी नवरीच्या वेशात स्टेजवर बसले होते आणि समीर माझ्या बाजूला होता. ५०० पाहुणे आले होते. स्टेजच्या अगदी समोर पहिल्या रांगेत ‘व्हीआयपी (VIP) सोफे’ लावले होते. माझे बाबा आणि आई तिथे जाऊन बसले, जेणेकरून त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीचे ‘लग्न आणि फेरे’ जवळून बघता येतील.

तितक्यात समीरची आई (सासूबाई) त्यांच्या श्रीमंत मैत्रिणींना घेऊन तिथे आल्या. त्यांनी माझ्या बाबांना बघितले आणि अत्यंत तुच्छतेने व मोठ्या आवाजात म्हणाल्या,

“अहो माधवराव, हे ‘व्हीआयपी’ लोकांसाठी आणि आमच्या खास पाहुण्यांसाठी सोफे आहेत. तुम्ही मुलीवाले आहात, त्यात तुमचे हे साधे कपडे या सोफ्यांना मॅच होत नाहीत. जा, तुम्ही तिथे मागच्या रांगेत जेवणाच्या काऊंटर जवळ जाऊन बसा!”

माझ्या काळजात धस्स झालं. ज्या बापाने या लग्नासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, त्या बापाला स्टेजसमोरून कुत्र्यासारखं हाकललं जात होतं! माझ्या बाबांनी कोणताही तमाशा केला नाही… त्यांनी मान खाली घातली, हात जोडले आणि ते शांतपणे आईला घेऊन एकदम शेवटच्या रांगेत एका कोपऱ्यात जाऊन बसले.

माझ्या डोळ्यांतून पाणी आलं. मी समीरला म्हणाले, “समीर, बघ तुझ्या आईने माझ्या बाबांचा किती मोठा अपमान केलाय. त्यांना पुढे बोलाव. “

पण समीर अत्यंत निर्लज्जपणे हसून म्हणाला, “अगं स्वराली, रिलॅक्स! आईला स्टेटस मेंटेन करावं लागतं यार. तुझे बाबा जुन्या विचारांचे आणि गरीब दिसतात, ते तिथे मागेच ठीक आहेत. तू फक्त स्माईल कर, फोटोग्राफर बघतोय!”

*तो संतापाचा स्फोट आणि माझा ‘भयंकर’ निर्णय:*

समीरचं ते वाक्य ऐकलं आणि माझ्या डोळ्यांतले अश्रू अचानक आटले. तिथे प्रचंड संतापाची आग पेटली. जो नवरा माझ्या बापाच्या स्वाभिमानाची किंमत करत नाही, तो आयुष्यभर माझी काय इज्जत करणार?

मी एक सेकंदही विचार केला नाही. मी नवरीचा तो जड शालू सावरला आणि स्टेजवरून थेट खाली उतरले. संपूर्ण मंडपात शांतता पसरली. मी चालत थेट डीजे (DJ) च्या माणसाकडे गेले आणि त्याच्या हातातला *’माईक’ (Mic)* खेचून घेतला!

“सगळ्यांनी लक्ष द्या!” माझा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला.

मी माईकवर अत्यंत करड्या आवाजात म्हणाले, “समीर आणि त्याच्या घरच्यांना वाटतंय की ते खूप उच्च दर्जाचे लोक आहेत आणि माझे बाबा भिकारी आहेत. बरोबर ना सासूबाई? तुम्ही माझ्या बाबांना या पहिल्या रांगेतून उठवून मागे पाठवलं… कारण त्यांची ‘लायकी’ नाहीये. तर आता सर्वांनी कान उघडे ठेवून ऐका…

हा जो ५-स्टार रिसॉर्ट आहे, हे जे ५०० लोकांचे ५६ भोग ताटात वाढले आहेत आणि ज्या व्हीआयपी सोफ्यांवर तुम्ही तुमचा ‘माज’ घेऊन बसला आहात… त्या सगळ्याचे ‘४० लाख रुपये’ माझ्या याच गरीब बापाने भरले आहेत! तुम्ही मुलावाले म्हणून एक रुपयाचाही खर्च केला नाहीये. माझ्या बापाच्या पैशांवर फुकटची मज्जा मारायला आलात आणि माझ्याच बापाला लायकी काढताय?”

हे ऐकताच समीरच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला! समीर धावत खाली आला. “स्वराली, काय वेडेपणा लावलाय हा? माईक खाली ठेव, आमची इज्जत जातेय!” तो ओरडला.

मी थेट समीरच्या श्रीमुखात अशी एक सणसणीत चपराक मारली की त्याचा माईकवर मोठा आवाज आला!

“तुझी इज्जत? भिकाऱ्यांची कसली आलीये इज्जत?” मी गरजले. “तू आणि तुझी आई माझ्या पैशावर विकले गेलेले भिकारी आहात! आणि मी माझ्या बापाच्या पैशातून तुमच्यासारखा ‘कचरा’ विकत घेणार नाहीये. मी हे लग्न आत्ता याच क्षणी मोडत आहे!”

*पायाखालची जमीन सरकवणारा तो ‘मास्टरस्ट्रोक’:*

समीरचे वडील रागाने पुढे आले आणि म्हणाले, “तुझी एवढी हिंमत? आता बघ आम्ही काय करतो. एकदा नवरी मंडपातून परत गेली ना, की कोणताच मुलगा तुझ्याशी लग्न करणार नाही! तू आयुष्यभर कुंवारी राहशील आणि हे ४० लाख पाण्यात जातील. “

मी एक अत्यंत भेदक स्माईल दिली. मी रिसॉर्टच्या जनरल मॅनेजरला हाक मारली.

“मॅनेजर साहेब, या रिसॉर्टचे पूर्ण बुकिंग कुणाच्या नावावर आहे आणि पेमेंट कोणी केलंय?” मॅनेजरने माईकवर सांगितले, “मॅडम, सर्व ४० लाखांचे बुकिंग तुमच्या (स्वरालीच्या) अकाउंटमधून आणि तुमच्या नावावर झाले आहे. “

मी समीरच्या बापाकडे बघून हसले आणि म्हणाले,

“ऐकलंत सासरेबुवा? या रिसॉर्टची मालकीण आजच्या दिवसापुरती ‘मी’ आहे! मॅनेजर साहेब… हे समीर आणि त्याचे नातेवाईक आता माझे पाहुणे नाहीत, ते ‘घुसखोर’ (Trespassers) आहेत. तुमच्या सिक्युरिटी गार्ड्सना बोलवा आणि या समीरच्या खानदानाला पुढच्या १० मिनिटांत गेटच्या बाहेर काढा! यांच्या ताटातलं जेवणही काढून घ्या!”

पुढच्या ५ मिनिटांत जे घडलं, ते बघून सगळ्या पाहुण्यांचे डोळे विस्फारले! रिसॉर्टच्या ८-१० बाऊन्सर आणि सिक्युरिटी गार्ड्सनी समीरच्या आई-वडिलांना आणि त्यांच्या त्या गर्विष्ठ नातेवाईकांना अक्षरशः धक्के मारत, त्यांचे सामान अंगावर फेकत त्यांना रिसॉर्टच्या बाहेर हाकलून दिले! जो माज ते दाखवत होते, तो माज रस्त्यावरच्या धुळीत मिळाला होता!

तो सुवर्णक्षण आणि बापाचा सन्मान:**

मी धावत गेले आणि माझ्या बाबांना घट्ट मिठी मारली. ते ढसाढसा रडत होते. मी आई-बाबांचा हात पकडला, त्यांना अत्यंत सन्मानाने घेऊन आले आणि स्टेजवरच्या त्या दोन राजेशाही खुर्च्यांवर बसवले.

मी माईकवरून माझ्या घरच्या आणि ऑफिसच्या पाहुण्यांना म्हणाले,

“हे ४० लाख रुपये पाण्यात गेले नाहीत! आजपासून हे माझे लग्न नाहीये… तर आज माझ्या बाबांच्या *’निवृत्तीचा (Retirement) भव्य सत्कार समारंभ’* आहे! ज्या बापाने माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, आज हा पूर्ण उत्सव फक्त त्यांच्या सन्मानासाठी आहे! तुम्ही सर्वांनी पोटभर जेवण करा आणि माझ्या आई-बाबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्या!”*

पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा असा काही कडकडाट झाला की त्याच्या आवाजाने रिसॉर्टच्या बाहेर उभ्या असलेल्या समीर आणि त्याच्या कुटुंबाचे कान फाटले असतील!

जेव्हा एखादी मुलगी रडत बसण्यापेक्षा किंवा समाजाला घाबरून अपमान सहन करण्यापेक्षा, आपल्या आई-वडिलांसाठी ‘रणचंडी’ बनते… तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाला एक ‘कडक’ मेसेज जातो. आज मी कुंवारी असले, तरी मी अभिमानाने जगतेय… कारण मी एक नवरा गमावला, पण माझ्या बापाचा ‘स्वाभिमान’ जिंकला होता! खोट्या प्रतिष्ठेसाठी झुकण्यापेक्षा, मुलीने दाखवलेला हा ‘कडक ॲटिट्यूड’ आणि आई-वडिलांचा केलेला सन्मान तुम्हाला कसा वाटला?

*

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पण मी नाही दिलं तर..?” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पण मी नाही दिलं तर..?☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

 नमस्कार. मी आमच्या भिक मागणाऱ्या वृद्ध आजी-आजोबांबरोबर रोज बसतो, उठतो बसतो जेवतो खातो… त्यांचं काही बीनसलं तर त्या मला शिव्या, (प्रेमाच्या… एक आई आपल्या मुलाला बोलेल तसं) देतात…

मी चिडलो तर मग मी पण काहीतरी त्यांना बोलतो…

मग त्या रुसून बसतात… मग मी त्यांना म्हातारे म्हणत, लाडीगोडी लावून चिडवत मनवतो…

ती तरी राग किती वेळ मनात ठेवणार…? 

गालावरून हात फिरवून ती गालाचा मुका घेते… डोक्यावरून हात फिरवते… हात हातात घेते…

मगाशी आलेला राग कुठल्या कुठे पळून जातो तिचाही आणि माझाही…

मग तिच्याकडे साठलेला खाऊ ती मला देते… ! 

– – हे मी रोजच गणित सांगितलं… असं रोज अर्धा पोतं मला खायला मिळतं… (त्यासाठी रोज एक रिकामी पिशवी मी घेऊन जातो)

– दुसऱ्या दिवशी मी ते गरजूंना वाटून टाकतो पण त्यातला एखादा घास प्रसाद म्हणून नक्की खातो… ! 

 

अशीच एक आजी आहे.. ती आजी घरात राहते, घरात राहते म्हणजे फक्त शरीराने…

सुनेला आजी (सासू)अजिबात आवडत नाही, म्हणून ती तिला दिवसभरातून कोणतेही जेवण किंवा नाश्ता देत नाही… बायकोचा रोष नको म्हणून मुलगा तिला कोणत्याही खर्चाला पैसे देत नाही…

मग या आजीनं जगायचं कसं…?… म्हणून ती एका परिसरात भीक मारायला येते…

(राहायला घर आहे, मुलगा आहे, सून आहे, नातवंडं आहेत.. परंतु जपत नाहीत, हिच्या नावावरील सर्व प्रॉपर्टी आणि इतर गोष्टी मुलाने आणि सुनेने स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत, हिला मात्र जगण्यासाठी भीक मागावी लागते)

तर… या आजीची आणि माझी काही कारणावरून, या सोमवारी म्हणजे 18 मे ला घनघोर लढाई झाली…

.. अर्थातच माझा पराभव झाला, हे सांगणे नकोच… ! पराभूत योद्धाप्रमाणे मी मान खाली घालून निघालो, “बचेंगे तो और भी लढेंगे”… अशी शाळेतल्या धड्यात वाचलेली वाक्य मनात घोळवत मी निघालो…

… तेवढ्यात ही आजी पाठी मागून आली, मी असेपर्यंत जेवढी काही भीक म्हणून अन्न मिळालं असेल ती ते पदराची ओटी करून घेऊन माझ्याकडे येत होती…

आजीचं वय असेल 70 – 75 वर्ष…

जे काही भिकेत मिळालं असेल ते ती माझ्या बॅगेत भरत होती गुपचूप… तिने या वस्तू बॅगेत भरेपर्यंत मी साळसुदाप्रमाणे चूप राहिलो… तिने या सर्व वस्तू भरल्यानंतर मी तिला खोट्या खोट्या रागाने म्हणालो, “आजपासून मी तुझं काहीही खाणार नाही…”

ती म्हणाली, “ माझ्या हातचं तर माझा मुलगा आणि सून सुद्धा खात नाही.. तू तर लांबचा… तू कसा खाशील…? “.. असं म्हणून ती तोंड पाडून निघाली… ! 

मला वाईट वाटलं, पाठमोऱ्या जाणाऱ्या आजीचा पदर मी ओढला आणि म्हणालो “ मी तुला खरच लांबचा वाटतो…???”

“ न्हाय रं बाळा तूच तर माझा मुलगा हायस… “ असं म्हणत तिने माझ्या डोक्यावरून हात ठेवून बोट कडाकडा मोडली…

– – युद्ध तिथंच संपलं…

मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं, “ म्हातारे सगळेच जर मला दिलंस तर तू खाशील काय? तुझी सून आणि मुलगा तर तुला खायला काहीच देत नाहीत. ,.. ”

ती हसत परंतु रडवेला चेहरा करत म्हणाली, “ बाळा माझं पोट केवढं? माझ्या पोटापुरतं मी माझ्यापुरतं काढून घेतलं आणि बाकी सर्व तुला देतेय… पण मी नाही दिलं तर तुला कोण देणार बाळा, खा माज्या सोन्या… !!! “

“पण मी नाही दिलं तर तुला कोण देणार बाळा…?”

… तिच्या या वाक्यावर मला खरोखर रडू कोसळलं… ती मला खरोखर भिक्षेकरी समजत होती, याहून अभीची जीत कोणती असेल…???

मी त्यांच्यातलाच एक आहे हे मी समजतो, ते वेगळं…

परंतु त्यांच्यातलाच मी एक आहे हे ते सुद्धा समजतात.. यात खूप फरक आहे…

स्वतःला लागेल तेव्हढंच ठेवून बाकी सर्व तिने मला दिलं होतं…

काय म्हणू या दातृत्वाला…????

– – एरवी शे 200 किलो डोक्यावर अंगावर खांद्यावर घेऊन नाचत फिरत असतो मी…

… पण आजीने दिलेला खाऊ मात्र मला उचलता येईना… तिच्या या दातृत्वामुळे बॅग जड झाली होती…

बॅग उचलता उचलता ती म्हणाली, ‘ तू हे माझ्यासमोर खा… ‘ मग तिने दिलेल्या गोष्टी मी तिच्या समोरच खाल्ल्या… ती भरून पावली…

… देवीने आज प्रत्यक्ष हातात प्रसाद दिला म्हणून मी सुद्धा भरून पावलो…

मला नेहमी असं वाटतं, देव देवी अल्ला ईश्वर येशु हे आता मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा मध्ये राहत नाहीत, ते वेषांतर करून बाहेर पडले आहेत.. माणूस, माणूसच आहे का हे पाहायला.. ,? 

.. ही आजी तीच देवी तर नसेल…? वेषांतर केलेली…? मी कोण आहे हे पाहायला आलेली…?

… माहित नाही.. ,.

आजी समोर खाल्लेला एक घास… ! आता माझी बॅग कापसासारखी हलकी झाली… कशी कोण जाणे…? 

 मी ती हलकी बॅग खांद्यावर घेतली… तिने दिलेला प्रसाद माझ्या तोंडी होता… आजीही गालातल्या गालात हसत होती…

खांद्यावरची बॅग इतकी हलकी कशी झाली याचा विचार करत मी पुढे निघालो…

… सहज मागं वळून पाहिलं… सुरकुतलेल्या चेहऱ्यातून आजी अजूनही हसतच होती…

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगळ्या वाटेने चालणारी बंडखोर, बेडर साहित्ययात्री! ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगळ्या वाटेने चालणारी बंडखोर, बेडर साहित्ययात्री! ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर

 नीलम माणगावे 

नीलम माणगावे या लक्षवेधी साहित्यिका म्हणून प्रसिद्ध आहेत. कथा, कविता, ललित, वैचारिक, माहितीपर, समीक्षणात्मक, संशोधनात्मक लेख, कादंबरी, संकीर्ण, बालसाहित्य इ. विविध प्रकारचे विपुल लेखन त्यांनी केलय. आत्तापर्यंत त्यांची 69 पुस्तके प्रकाशित झालीत. केवळ ‘ विपुल ‘ एवढेच विशेषण त्यांच्या लेखनासाठी पुरेसे नाही. कारण त्यासाठी त्यांनी निवडलेले विषय आणि त्यातील आशय यातील वेगळेपणामुळे त्यांचं लेखन ‘ लक्ष्यवेधी ‘ ही ठरत गेलं. त्यांनी लिहीलेल्या प्रत्येक पुस्तकाला.. मग तो कविता संग्रह असो, कथासंग्रह असो, कादंबरी असो.. कुठला ना कुठला पुरस्कार मिळालेलाच आहे.

नुकताच त्यांना २००५ मधील कसदार बालवाङ्मयाच्या लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘शांताबाई आणि बाबुराव शिरोळे’ पुरस्कार प्राप्त झाला. तूच आमचा हीरो, चिंगळी, आक्कुबाईचं तळं यासारखे त्यांचे कथासंग्रह मुलांना खूप आवडतील, असे आहेत. त्याशिवाय, बिलोरी कवडसे, आणि माठ हसला, पळ सोने पळ यासारखे त्यांचे ५ विज्ञान कथासंग्रह आहेत. बालवाङ्मयातील एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक म्हणजे ‘गाथा उत्क्रांतीची’.. हे सचित्र दीर्घ काव्य आहे. तिची प्रयोगशील वृत्ती यातून दिसून येते. याशिवाय, ‘परीराणी आणि छान छान गाणी’, ‘अंगणगाणी आणि रिंगण गाणी’, ‘गड्डम् गड्डम् गाणम् बडबडम्’ यासखे अनेक कविता संग्रह त्यांचे मुलांना आवडतील असे आहेत. नीलमताई शाळाशाळातून आणि वेगवेगळ्या संमेलनातून कथाकथन आणि कवितावाचन करतात म्हणजे आणि थेट मुलांशी संवाद साधतात.

नीलमताईंच्या साहित्याचा अभ्यासक्रमात, पाठयक्रमातही समावेश झालेला आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड इ. ५वी (लोअर मराठी) ‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेचा समावेश. याच कवितेचा कर्नाटक राज्यच्या ८ वीच्या पाठ्यपुस्तकात, (थर्ड लँग्वेज) समावेश आहे.

शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूरच्या एम. ए. – भाग १ पार्ट १मध्ये ‘पळ सोने पळ’ या बालकथेचा अमावेश झाला आहे.

लवाङ्मयाच्या त्यांच्या एका वेगळ्या प्रकारच्या पुस्तकाचा उल्लेख करायचा झाला तर, ‘डॉलीची धमाल’या कादंबरिकेचा उल्लेख करायला हवा. ‘डॉली समवयस्क मुलांशी खेळणारी एक मुलगी. सर्वांना ती हवीहवीशी वाटते. एकदा ती सर्वांचा निरोप घेते. कादंबरीच्या शेवटी रहस्य उलगडते. ‘डॉली हे मुळी मुलगीच नसते. ती असते रोबोट॰ आता तिची बॅटरी संपत आलेली असते. नवीन तंत्रज्ञानाचा किती सुरेख वापर करून घेतला आहे इथे. या बालकादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

म. सा. प. चा नीलमताईंना मिळालेला हा पहिला पुरस्कार नाही. त्यापूर्वी त्यांना एकंदर कविता लेखनासाठी ‘ना. घ. देशपांडे’ पुरस्कार मिळाला होता.

विषय-वैविध्याबरोबर आशयातील वेगळेपणा, नाविन्य, कल्पकता, प्रयोगशीलता ही त्यांच्या कवितांची काही ठळक वैशिट्ये सांगता येतील. त्यांच्या ‘खचू लागली भुई ‘ या कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

‘पैंजण’ ही नीलमताईंची अतिशय गाजलेली कविता. कविता चार पिढ्यातील ‘स्त्री’च्या स्थिती-गतीचा, मन-विचारांचा वेध घेते. पैंजणाच्या प्रतिकातून अतिशय संवेदनशीलतेने आणि कलात्मकतेने, पिढी-दर-पिढी, भावना-विचारात झालेले परिवर्तन यात दाखवले आहे…

… आजी जड, वजनदार पैंजण घालून आपल्या साम्राज्यात मिरवायची. तिचे साम्राज्य तरी केवढे? स्वैपाकघर, माजघर एवढेच. पण त्यात ती साम्राज्ञीच्या रुबाबात वावरायची. पैंजण पायाच्या घोट्याशी घासले जायचे. पाय दुखायचे. कळ यायची. जखम व्हायची. पैंजण जसे घोट्याशी जखडलेले, तसे मन संसाराशी, परंपरेने आलेल्या संस्काराशी जखडलेले. त्यामुळे दुखलं, खुपलं, तरी ती संस्काराची पट्टी बांधून जखमेला ऊब द्यायची. मनाची समजूत घालायची. आपल्या या राज्यात ती खूश असायची.

… आईने जड, वजनदार पैंजण वापरणं सोडून दिलं. त्याऐवजी ती नाजूक तोरड्या वापरू लागली. परंपरेचं थोडसं जोखड तिने कमी केलं. आपल्या आईपेक्षा ती थोडी मोकळी झाली. तिचा वावर ओसरी, अंगण, गच्ची असा होऊ लागला. तरी पण कधी कधी तोरडीचा हूक अडकायचा. साडीचा जरीचा काठ फाटायचा. दोरे लोंबायचे. जरतारी संसारात थोडं विसंवादाचं फाटकंपण अनुभवाला यायचं, पण तरीही ती आपलं घर, अंगण, गच्ची यात खुशीनं भिरभिरायची.

… तिसर्‍या पिढीतली ‘मी’ घराच्या फाटकातून बाहेर पडले. भोवतालाचं जग विस्तारलं. मोकळा श्वास घेता येऊ लागला. टोचणं, बोचणं, दुखणं, खुपणं, जखमा नकोत, म्हणून मी पैंजण, तोरड्या दोन्ही टाकून दिल्या. नाजूक, हलके, सॅंडल्स, चपला, बूट ‘मी’ वापरू लागले. तरीही कधी चपला टोचायच्या. बूट चावायचे. पण बाहेर मिळणार्‍या स्वातंत्र्यासाठी, मुक्त श्वासासाठी ’मी’ हे सगळं सहन केलं.

… आता चौथ्या पिढीतली ‘माझी मुलगी’ म्हणते, ‘आई पैंजण, तोरड्या, सॅंडल्स, चपला काहीच नको. पायच होऊ देत कणखर, पोलादी, काटेकुटे तुडवणारे, जखमा सहन करणारे, निदान पुढलं शतक येण्यापूर्वी… ’ मुलीला आत्मभान आलय. बाहेर येणार्‍या संकटांचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर व्हायला हवं, अशी तिची आकांक्षा आहे.

– – स्वैपाकघर, माजघरात मिरवणारी आजी, अंगण-गच्चीपर्यंत भिरभिरणारी आई, सॅंडलल्स घालून घराबाहेर पडणारी कवितेतली मी आणि, पैंजण, तोरड्या चप्पल, बूट, सॅंडल काही नको. पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी ’ असं म्हणणारी माझी मुलगी सगळ्या जणी कशा लख्खपणे डोळ्यापुढे उभ्या राहतात.

 – – ही कविता मुक्तछंदात आहे. प्रत्येक कडव्यात समानार्थी प्रासयुक्त आलेले शब्द कवितेला एक वेगळंच नादसौंदर्य प्राप्त करून देतात. उदा. सांगायचं तर, आजीचे ‘पाय भरून यायचे, दुखायचे, खूपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. किंवा जखम व्हायची, चिघळायची… ’ किंवा नाजूक तोरड्या घालायला सुरुवत करताना आई म्हणते, ‘ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं, ’ तर तोरड्याही नको, म्हणताना ‘मी’ म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको… ’ असे शब्द वाचताना वाटतं, ‘शब्दांनो मागुते या’ असं कवायत्रीला म्हणावंच लागलं नसणार. शब्द आपोआपच तिच्या लेखणीच्या मागे मागे आले, नव्हे. तसं नव्हेच ! आपोआप लेखणीतून उतरत गेले असणार.

… २०व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ही कविता. स्त्रीमुक्तीचा प्रवास अगदी सहज-साधेपणाने अधोरेखित करते. कुठेही आक्रोशी स्वर नाही. कमीत कमी शब्दातून अतिशय कलात्मकतेने ही वाटचाल कवयत्रीने आपल्यापुढे मांडली आहे… महाराष्ट्र राज्यशिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी साठी मराठी भाषेचे जे पाठपुस्तक तयार केले आहे, त्या ‘युवा भारतीत’ नीलम माणगावे यांच्या ‘पैंजण‘ या कवितेचा समावेश आहे.

नीलमताईंचं, ‘जसं घडलं तसं’ हे आत्मकथन मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. च्या भाग १ साठी पाठ्यपुस्तक म्हणून लावण्यात आले आहे. त्यांच्या एकूण कवितांवर एक प्राध्यापक एम. फील. करत आहेत. तर, दुसरे प्राध्यापक त्यांच्या एकूण कथांवर एम. फील. करत आहेत.

नीलमताईंच्या अनेक कवितांना प्रयोगशीलतेचा स्पर्श आहे. उदा. सरोगेट मदरवरील कविता ‘भांडवली ज्ञान’,

 – – पण तिची अलीकडे प्रकाशीत झालेली ‘बापूजी तुम्ही ग्रेटच!’ आणि ‘सूर्याला कोंडता येत नाही. ’ ही दोन पुस्तके म्हणजे तिच्या प्रयोगशीलतेचा आगळा-वेगळा आविष्कार म्हणावी लागतील. मुक्तछंदात लिहिलेले काव्यात्म संवाद यात आहेत. ‘बापूजी तुम्ही ग्रेटच!’ मध्ये बापूजी आणि त्यांचा चरखा यातील काव्यात्म संवाद आहे. तर, ‘सूर्याला कोंडता येत नाही. ’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बोधीवृक्ष यांच्यातील संवाद आहे. सध्याची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती याच्या अनुषंगाने हे संवाद आहेत. संवादांच्या विषयात साम्य आहे, पण दोन्हीतील आशय वेगवेगळा आहे.

लेखिकेच्या प्रयोगशीलतेचे आणखी एक उदाहरण सांगायचं, तर तिने ‘खेळखंडोबा’ नावाची एक लघु कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत तिने हत्तींच्या माध्यमातून अनेक महत्वाचे प्रश्न, विशेषत: धर्माबद्दलचे प्रश्न उपस्थित केलेत.

नीलमताईंच्या आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाचा इथे उल्लेख करावासा वाटतो. ‘निर्भया अजून लढते आहे. ’ हा त्यांचा दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला कथासंग्रह. या संग्रहातील सर्वच कथांचे ‘बलात्कार’ हे सूत्र आहे. यात बलात्काराचे वर्णन कुठेच नाही. त्यामागची कारणमीमांसा, मानसिकता, तशी मानसिकता निर्माण होण्यामागची विशिष्ट परिस्थिती याचे दर्शन या कथांमधून लेखिकेने घडवले आहे. वृत्तपत्रातून आपण बलात्काराच्या बातम्या वाचतो, टी. व्ही. वरून ऐकतो. क्षणभर हळहळतो. मग सोडून देतो. लेखिकेने ती बीजे आपले विचार, मनन-चिंतन यांचे खत-पाणी घालून जोपासली. आपल्या कल्पक रचना कौशल्याच्या निगराणीने, त्यातून सशक्त झाडे निर्माण केली. जोपासली.

– या संग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला.

नीलमताई एक प्रतिभासंपन्न, यशस्वी लेखिका आहेत, तशाच त्या बंडखोरही आहेत. सत्य, शिव, सुंदर या मूल्यांवर त्यांचा विश्वास आणि निष्ठा आहे. त्यांची जिथे पायमल्ली होताना दिसते, तिथे त्यांची बंडखोर वृत्ती उफाळून येते.

नीलमताई स्वत: जैन धर्मीय. तरीही जैन धर्मातील चुकीचे रीतिरिवाज, वा परंपरा, वाईट चाली-रीती, काही अनुयायांचे बेताल वर्तन, भ्रष्टाचार यावर त्यांनी आपल्या लेखनातून टीका केली. ही त्यांची मोठीच बंडखोरी म्हणायला हवी… कधी लेखाच्या, कधी कवितेच्या, कधी कथेच्या माध्यमातून. उदा. ‘शांते तू जिंकलीस. ’ ही कथा. इथे शांता मंदिरासाठी पट्टी द्यायला नकार देते. म्हणून गाव तिच्यावर बहिष्कार टाकतो. तिला वाळीत टाकतो. पुढे तिच्या मुलाचा मृत्यू होतो. त्याचे अंत्यसंस्कार करायला कुणीच येत नाही. तेव्हा ती आणि तिची सासू चादरीची झोळी करून त्यातून त्याला स्मशानाकडे नेऊ लागतात. नंतर ते पाहून हळूहळू गाव त्यात सामील होतो. – – याच शीर्षकाच्या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला.

नीलमताईंच्या या धर्मावर टीका करणार्‍या लेखनाने समाजातील अनेकांची अस्मिता दुखावली. आपल्याच धर्माविरुद्ध ती असं कसं लिहू शकते? समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी तिने यापुढे असं लेखन करायचे थांबवावे, असा तिला समज दिला. इतकेच नाही, तर असं काही यापुढे लिहिलं, तर तुमच्या घरावर आम्ही दगडफेक करू, अशी त्यांना धमकीही देण्यात आली. पण त्या आपल्या जागी अढळ राहिल्या. जे मनाला पटेल, योग्य वाटेल, ते अव्याहतपणे लिहीत गेल्या. या सर्व प्रकरणात त्यांचे जोडीदार भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मुळात ते स्वत: अं. नि. स. चे कार्यकर्ते. वैचारिकदृष्ट्या ते त्यांच्याशी सहमत होते.

नीलमताईंच्या प्रतिभेचे नवनवोन्मेष नित्यश: बहरत, फुलत, दरवळत राहोत. त्याने वाचकांना आनंद मिळो. त्यांचे भोवतालचे भान जागृत करो, संवेदनशीलता निर्माण करो… या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अनारसा शिळा का मानत नाहीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ अनारसा शिळा का मानत नाहीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

अनारसा शिळा का मानत नाहीत?

 — परंपरा आणि Food Science 

अधिक महिन्यात अनारसाचे दान करण्याची जुनी परंपरा आहे.

शास्त्रात अनारसाला “अपूप” म्हटले जाते आणि विशेष म्हणजे —

अनारसा हा शिळा मानला जात नाही! 

पूर्वीच्या लोकांनी हे फक्त श्रद्धेपोटी सांगितले नव्हते… त्यामागे खूप सुंदर Food Science दडलं आहे.

साधारण भात, पोळी, भाजी यामध्ये moisture जास्त असतो. त्यामुळे त्यामध्ये सूक्ष्मजंतू लवकर वाढतात आणि अन्न लवकर खराब होते.

– – पण अनारसा वेगळा आहे..

१) Deep Frying Science

अनारसा तुपात / तेलात व्यवस्थित तळला जातो.

तळताना : त्यातील बराच moisture कमी होतो. बाहेरचा भाग crisp होतो. high temperature मुळे बरेच microorganisms नष्ट होतात, म्हणून तो जास्त टिकतो.

२) गूळ आणि साखरेची कमाल

अनारसामध्ये गूळ आणि साखर भरपूर असते.

हे दोन्ही :

✔️ नैसर्गिक preservative सारखे काम करतात

✔️ moisture bind करून ठेवतात

✔️ खराब होण्याची प्रक्रिया मंदावतात

म्हणून अनारसा पटकन आंबत नाही.

३) Fermentation चा फायदा

अनारसाचे पीठ मुरवले जाते. या fermentation मुळे texture सुधारते, shelf life वाढते, पचनास मदत होते… पूर्वी refrigerator नसतानाही लोकांना अनुभवाने हे माहिती होते.

४) Low Moisture = जास्त टिकाऊ

अनारसामध्ये पाणी फार कमी उरते.

Food Science मध्ये एक नियम आहे —“जितका कमी moisture तितके अन्न जास्त टिकते. ”

म्हणूनच चिवडा, शेव, पापड, अनारसा

हे पदार्थ जास्त दिवस टिकतात.

५) म्हणूनच दानासाठी योग्य 

पूर्वी प्रवास, दानधर्म, व्रतवैकल्य यासाठी टिकणारे पदार्थ महत्वाचे होते.

– – अनारसा : पौष्टिक, टिकाऊ पोटभर ऊर्जा देणारा आहे.

म्हणून अधिक महिन्यात “अपूप दान” करण्याची परंपरा निर्माण झाली.

खरंतर आपल्या जुन्या पदार्थांमध्ये फक्त चव नाही तर अनुभव, ऋतुचक्र, आरोग्य आणि अप्रतिम Food Science दडलेले आहे.

आज विज्ञान जे सांगतंय…ते आपल्या आजीला अनुभवाने आधीपासून माहिती होतं

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- २ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

✈️ मी प्रवासी ✈️

☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- २ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

निसर्ग हा माझा आवडता विषय. निसर्ग कोणाला आवडत नाही? प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. म्हणून वेळ मिळेल तेव्हा निसर्गाच्या सहवासात आपण जात असतो. जोडून सुट्या आल्या की एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपण जातो. कोणी गिर्यारोहण करतं, कोणी ट्रेकिंग, कोणी किल्ल्यांची भ्रमंती तर कोणी वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देतं. या सगळ्यातून निसर्गच नानाविध रूपांनी आपल्यासमोर येत असतो. यापूर्वी अनेकदा मी वेगवेगळ्या कारणाने आणि वेगवेगळ्या लेखातून निसर्गाबद्दलची माझी आवड व्यक्त केली आहेच. या सहलीत तर निसर्गाचा अगदी जवळून सहवास मला लाभला. एखादा जिवलग मित्र खूप दिवसांनी भेटावा आणि मग त्याबद्दलचा आनंद कसा व्यक्त करावा असा प्रश्न पडतो. तसेच काहीसे माझेही झाले. माझ्या निसर्गमित्राला मी डोळे भरून हृदयात साठवून घेत होतो.

आधीच्या लेखात भीमतालच्या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन मी केले आहे. ताल म्हणजे तलाव किंवा सरोवर. महाभारतातील भीमाच्या नावावरून या तळ्याला भीमताल असं नाव मिळालं आहे. पांडव वनवासात असताना त्यांना कोठे पाण्याचा स्रोत आढळत नव्हता. सगळे तहानलेले होते. अशा वेळी भीमाने आपल्या गदेचा प्रहार या भूमीवर केला. मोठा खड्डा निर्माण होऊन या ठिकाणी पाणी उत्पन्न झाले. म्हणूनच हा भीमताल ! भीमताल हे ठिकाण नैनितालपेक्षाही प्राचीन मानले जाते. या परिसरातील हा सगळ्यात मोठा जलाशय. सकाळी लवकर उठलो. साडेपाचलाच छान उजाडलं होतं. सूर्यदेव आपल्या रथावर स्वार होऊन अवघ्या परिसराला आपल्या सहस्त्र किरणांनी सुवर्णस्नान घालीत होते. उगवतीच्या रंगांनी साऱ्या दिशा उजळल्या होत्या. भीमतालचा परिसर आणि अवघी सृष्टी जागी झाली होती. विविध रंगी फुले फुलली होती. पक्षी गाऊन आपला आनंद व्यक्त करीत होते. इथं शहरातील गर्दी नाही, हॉर्नचे आवाज नाहीत. इथे निसर्गच तुमच्याशी संवाद साधतो. तुम्ही मात्र त्यासाठी तयार असायला हवं. एकदा इथं आलं की इथून निघण्याची इच्छाच होऊ नये असं हे ठिकाण ! नैनिताल तर प्रसिद्धच आहे. पण त्यापेक्षा कमी गर्दीचं हे ठिकाण. इथे खाण्यापिण्याचेही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. भीमतालच्या तलावात आपल्याला जलविहार करता येतो. आपल्याकडे वेळ असेल तर इथून जवळच असलेल्या नौकुचियाताल, विक्टोरिया बांध, आणि भीमेश्वर महादेव मंदिर आदी ठिकाणांना आपण भेट देऊ शकतो.

इथल्या हॉटेलमध्ये आमचा भरपेट नाश्ता झाला. भरपेट म्हणण्याचे कारण म्हणजे येथे नाश्त्यासाठी देखील विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. फळे, फळांचे ज्यूस, पोहे, उपमा, इडली सांबार, वडा सांबार, ब्रेड, चहा कॉफी. ज्याला जे आणि जेवढे हवे ते घ्या. प्रत्येक पदार्थाची नुसती चव घ्यायचे म्हटले तरी पोट भरून जाते. आता आमची बस नैनितालला जाण्यासाठी सज्ज होती. नाश्ता झाल्यावर सगळेजण आपापल्या जागी बसमध्ये जाऊन बसले. आता निसर्गरम्य डोंगर रांगातून आमची बस वाटचाल करीत होती. रस्ते चांगले पण अरुंद होते. सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी झालेली दिसत होती.

नैनिताल इथे जाताना वाटेत कैंची धाम म्हणून एक ठिकाण आहे. या ठिकाणी संत निम करोली बाबा यांचा आश्रम आहे. नीम करोली बाबा २० व्या शतकातील एक महान संत होऊन गेले. त्यांचे वागणे बोलणे अतिशय साधे होते. उत्तर प्रदेशातील नीम करोली या गावी त्यांनी तपश्चर्या केली. म्हणून त्यांना नीम करोली बाबा या नावाने ओळखले जाते. त्यांना कंबलीवाले बाबा म्हणूनही ओळखले जाते कारण त्यांच्या अंगावर कायम पांढऱ्या रंगाची घोंगडी असे. ते हनुमंताचे परमभक्त होते. लोक त्यांना हनुमानाचा अवतार म्हणूनच ओळखत. ते लोकांना रामनामाचा उपदेश देत असत. ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी देखील त्यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन घेतले होते असे सांगितले जाते. कैंची धामला दरवर्षी बाबांचे लाखो भक्त भेट देतात. आश्रमात श्रीराम आणि हनुमानजी यांच्या सुंदर मूर्ती आहेत. बाबांबद्दल अनेक चमत्कारिक आणि अद्भुत कथा सांगितल्या जातात. या ठिकाणी थांबून आम्ही दर्शन घेतले. हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

तेथील दर्शन आटोपून आम्ही नैनितालच्या दिशेने निघालो. तिथे थेटपर्यंत बस जात नाही. त्यामुळे साधारण तीन किमी अलिकडे बस उभी करून स्थानिक जीपच्या साहाय्याने तिथे जावे लागते. एका जीपमध्ये साधारण सहा माणसे बसतात. केवळ पंधरा मिनिटांचा प्रवास करून आम्ही नैनिताल शहरात प्रवेश केला.

पौराणिक कथेनुसार भगवान शंकर सतीचे म्हणजे पार्वती मातेचे शव कैलासावर घेऊन जात असताना तिचे काही अवयव विविध ठिकाणी पडले. त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे निर्माण झाली. सतीचे डोळे या ठिकाणी पडले म्हणून या ठिकाणी नैना देवीचं मंदिर निर्माण झालं. भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. भाविकांसाठी हे एक पवित्र आणि जागृत ठिकाण आहे. नयना देवीचे मंदिर असल्याने या ठिकाणाला नैनिताल असं म्हटलं जातं. येथील तळ्याला नैनी असं म्हटलं जातं.

अतिशय सुंदर आणि विशाल असा हा तलाव आहे. याच्या जवळपास इतरही अनेक तलाव आहेत. पण याचे सौंदर्य आपल्याला आकर्षित करते. म्हणूनच कदाचित ‘ तालोमें ताल नैनिताल ‘ असे म्हटले जात असावे. या ठिकाणी पर्यटक बोटिंगचा आनंद घेतात. या तलावाच्या उत्तर दिशेला नैना देवीचं सुंदर मंदिर आहे. इथे उंच असं हिमालयातील नैनी शिखर आहे. मल्लीताल इथून या ठिकाणी जाण्यासाठी रोपवेची सोय आहे. रोपवेतून आपण निसर्गाचा आनंद घेत या पर्वतशिखरावर पोहोचतो. इथे फिरण्यासाठी साधारण एक तास दिला जातो. आपल्याला परत रोपवेने खाली यावे लागते.

इथं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे पाळण्याचा किंवा मेरी गो राउंड सारख्या चक्राचा. त्यासाठी वेगळे पैसे भरून आपल्याला त्याचा आनंद घेता येतो. एका खांबाभोवती एक विशाल चक्र आहे. त्यात उभे राहायचे. हे चक्र हळूहळू आकाशाच्या दिशेने वर जाते. अनेक फूट उंचावर जाताना एक वेगळाच थरार अनुभवास येतो. वर जाताना अप्रतिम निसर्ग तर दिसतोच पण वर गेल्यानंतर आणखी एक जादू घडते. हे चक्र हळूहळू ३६० अंशात फिरते. आजूबाजूचा सगळा परिसर आपल्या दृष्टीपथात येतो. जणू बर्ड आय व्ह्यू आपल्याला प्राप्त होतो. आम्ही हाही आनंद घेतला. इथून हिमालयाच्या रांगा, शहरातील वस्ती, तळे, तळ्यातील बोटिंग या साऱ्या गोष्टी दिसत होत्या. या ठिकाणी लंडन आय व्हीलची आठवण झाली. लंडन आय मधूनही असेच सुंदर दृश्य दिसते.

उन्हाळ्यात इथलं वातावरण आल्हाददायक असतं. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करतात. इथे देखील खाण्यापिण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. इथला मॉल रोड शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. तसेच टिफिन पॉईंट, चायना पॉईंट, स्नो व्ह्यू पॉईंट यासारखी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. आपल्याला वेळ असेल तर ही ठिकाणे पाहता येतात. नैना लेकमध्ये जलविहाराचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या भीमताल या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. 

– क्रमशः भाग दुसरा

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दिखाव्याचा ‘मदर्स डे’ आणि एकाकी ‘आई…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “दिखाव्याचा ‘मदर्स डे’ आणि एकाकी ‘आई…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

मे महिन्याचा दुसरा रविवार उजाडतो आणि अचानक संपूर्ण आभासी जग (Social Media) भावूक होतं. मोबाईलच्या स्क्रीनवर ‘Happy Mother’s Day’ चे स्टेटस झळकू लागतात. कुणी फुलांचा गुच्छ देतं, कुणी केक कापतं, तर कुणी आईसोबतचं एखादं जुनं कृष्णधवल छायाचित्र शेअर करतं. दिवस संपतो, त्या फोटोंवरचे ‘लाईक्स’ मोजून आपण सुखावून जातो आणि पुन्हा आपल्या दिनचर्येत व्यस्त होतो. पण या उत्सवाच्या झगमगाटात एक जळजळीत प्रश्न उभा राहतो — मदर्स डे म्हणजे कॅलेंडरने दिलेला केवळ २४ तासांचा तुकडा आहे, की तो आपल्या बोथट होत चाललेल्या संवेदनांना आरसा दाखवणारा एक क्षण?

भारतीय संस्कृतीने आपल्याला ‘मातृदेवो भव’ हा मंत्र दिला. तैत्तिरीय उपनिषदातील हा विचार केवळ भिंतीवर टांगण्यासाठी किंवा भाषणात वापरण्यासाठी नव्हता, तर ते एक मूलभूत जीवनमूल्य होतं. घराच्या देव्हाऱ्यात देव असतोच, पण एका बालकाच्या जगात देवाची पहिली सगुण प्रतिमा ही आईच्या रूपातच उभी राहते. देव निराकार असतो, पण आई साकार असते—स्पर्शात, शब्दात आणि नजरेत. मात्र, आज हेच ‘दैवत’ अनेक ठिकाणी वृद्धाश्रमांच्या उंबरठ्यावर का दिसते? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. आपण भक्तीचा उच्चार तर मोठमोठ्याने करतो, पण व्यवहारात मात्र स्वतःची ‘सोय’ बघतो. आईच्या अथांग कष्टांच्या पायावर आपल्या आयुष्याची देखणी इमारत उभी राहिली; पण तिच्या वार्धक्यात तिला पेलताना आपल्याला ‘जागा नाही’, ‘वेळ नाही’ किंवा ‘परिस्थिती नाही’ या सबबी आठवू लागतात. आईने मात्र आपल्याला वाढवताना कधीही ‘परिस्थिती’ची अट घातली नव्हती, हे आपण सोयीस्करपणे विसरतो.

आजच्या आधुनिक आणि तथाकथित प्रगत जगात काही जण केवळ बुद्धीची कसरत करत असं मांडतात की, “आपण आईच्या उदरातून आलो, म्हणून तिचा आपल्यावर मालकी हक्क नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि जन्म घेणं हा केवळ एक जैविक ‘इन्सिडन्ट’ (योगायोग) आहे.” तत्त्वज्ञान म्हणून हे ऐकायला आकर्षक वाटतं, कारण ते जबाबदारीतून मुक्त करतं. मान्य आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि नातं म्हणजे गुलामगिरी नव्हे. पण नातं हे केवळ जैविक नसतं, ते ‘ऋणाचं’ असतं. आणि ऋण म्हणजे ओझं नव्हे, तर ते कृतज्ञतेचं भान असतं. आपल्या पहिल्या भीतीला जिने कुशीत घेतलं, आपल्या पहिल्या पडण्यावर जिने मायेची फुंकर मारली आणि आपल्या पहिल्या यशात जिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले, त्या नात्याला केवळ ‘योगायोग’ म्हणणं ही हृदयाशी केलेली प्रतारणा आहे. बुद्धीला ते पटू शकतं, पण हृदयाला ते कधीच शिवणार नाही.

आई ही कोणी परिपूर्ण ‘देवी’ नाही. ती एक हाडामांसाची माणूस आहे. तिलाही अपेक्षा असतात, तिच्याही मर्यादा असतात आणि तिच्याकडूनही चुका होऊ शकतात. म्हणूनच ती आपल्याला अधिक जवळची वाटते. आपण तिला देव्हाऱ्यात बसवतो आणि तिच्याकडून ‘त्याग’ आणि ‘सहनशक्ती’ची अपेक्षा करतो. पण तिला देव्हाऱ्यापेक्षा तुमच्या सोफ्यावर बसून तुमच्याशी दोन शब्द बोलायचे असतात. म्हणूनच मदर्स डे हा केवळ उत्सवाचा क्षण नसावा, तर तो आत्मपरीक्षणाचा क्षण असावा. आपण शेवटचं आईशी निवांत कधी बोललो? तिच्या आरोग्याची मनापासून विचारपूस कधी केली? तिला एखादं महागडं गिफ्ट देणं सोपं असतं, पण तिला आपला ‘वेळ’ देणं कठीण असतं. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट टाकणं सोपं असतं, पण तिच्या वाढत्या वयातील हट्टासमोर संयम बाळगणं कठीण असतं.

आईचा खरा सन्मान म्हणजे तिच्या वार्धक्यात तिच्या थरथरत्या हाताला आधार देणं. तिच्या एकटेपणाला आपली जिवंत उपस्थिती देणं आणि तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी तिला ‘ओझं’ नव्हे तर ‘आपलं’ असल्याची जाणीव करून देणं. ‘मातृदेवो भव’ हा मंत्र उच्चारण्यासाठी नसून तो जगण्यासाठी आहे. भावना व्यक्त करणं सोपं असतं, पण जबाबदारी उचलणं कठीण असतं. ही जबाबदारी म्हणजे केवळ आर्थिक तरतूद नव्हे, तर तिला आदराचं स्थान देणं होय.

कॅलेंडरवर ‘मदर्स डे’ दरवर्षी येईल आणि जाईल. पण आईचा वरदहस्त आपल्या डोक्यावर किती काळ राहील, याची कोणतीही शाश्वती नाही. फुले देण्यापेक्षा तिला मानसिक आधार द्या. पोस्ट टाकण्यापेक्षा तिच्या शेजारी बसून तिचं ऐकून घ्या. ज्या दिवशी घरातील आई खऱ्या अर्थाने आनंदी आणि समाधानी असेल, तो प्रत्येक दिवस ‘मदर्स डे’ ठरेल. कारण आईची सावली असेपर्यंतच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित असतं.

तिच्या सुरकुतलेल्या कपाळावर, तुझ्या सुखाचा इतिहास आहे,

तिच्या थरथरत्या हातांमध्येच, जीवनाचा विश्वास आहे…

 

तिची सोबत आहे तोवर  तिचं हसणं कमावून घे,

मदर्स डे च्या स्टेटस पेक्षा, तिचं मन कुरवाळून घे!

 

वेळ निघून गेल्यावर रडून, काहीच साध्य होणार नाही,

आई नावाचं विद्यापीठ, पुन्हा पुन्हा मिळणार नाही…

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पुन्हा पुन्हा तेच ते… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पुन्हा पुन्हा तेच ते... ? श्री आशिष  बिवलकर ☆

पुन्हा पुन्हा घाला | छान पायघड्या |

कमळात उड्या | भ्रमरांच्या ||१||

*

तुतारी फुंकून | वाजता वाजेना |

नाही करमेना | सत्तेविना ||२||

*

टोपे-तानपूरे | नवे आयाराम |

करावा सलाम | वाकूनिया ||३||

*

गूळ तिथे असे | मुंगळ्यांचा वास |

संधीसाधू खास | राजकीय ||४||

*

दुधात पाणी की | पाण्यामध्ये दूध |

गेली सुधबुध | वैचारिक ||५||

*

निष्ठावंत भाळी | सतरंजी सेवा |

पळवती मेवा | आयाराम ||६||

*

पतीव्रते धोंडा | वेश्ये मणीहार |

करे व्यवहार | पद्म श्रेष्ठी ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # २८६ – चिन्ताकुल…२ ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता – चिन्ताकुल…२।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # २८६ – चिन्ताकुल…२ ✍

ये बाढ़ / अनोखी है / अजब है

अछोर महत्वाकाँक्षाओं की

क्षुद्र स्वार्थी और

सर्वनाशी बाढ़

में

मनुष्य और प्रकृति

दोनों घिर गये हैं

गिर गये हैं

इरादे

आदमी के ।

हम / ढो रहे हैं

आजादी का दंभ

और आम आदमी

आज भी बेबस है, मजबूर है

चन्द्रमा भले पास आ गया हो

रोटी अभी भी दूर है

जाने कितने शिशुमन

दफन हो जाते है

किसी नदी के तट पर

या किसी स्कूल के अहाते में

बहुत कम जगह है

सुविधा के छाते में।

है

मेरे खाते में

जमा है

कुछ 

घुटने चलती यादें

और कुछ असफल फरियादें

क्या करेंगें आप

और क्या करूँगा मैं

संकटों / यादों और फरियादों का

सिलसिला

अशेष है, असमाप्त है,

कविता अमर है

कविता समाप्त

है।

✍

स्व डॉ. राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # २८५ – “मर्यादा को लाँघे था…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “मर्यादा को लाँघे था...”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # २८५ ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “मर्यादा को लाँघे था...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी 

कम्बल एक चार लोगों

को जिसे ओढ़ सोना।

तिस पर हैं आश्वस्त एक

मिल जायेगा कोना ।।

 

रही पूस की रात और

मावठ  का भी गिरना।

तिस पर टपरे के कोने

से पानी का रिसना।

 

मर्यादा को लाँघे था

दुख, ब्यालू नहीं मिली।

चाट-चाट खा गये

प्रसादी में पाया दोना ।।

 

इधर कभी बेटी खींचे

तो पुत्र उघडता था ।

उधर खींच लेती मुनरी

तो बिरजू चिढ़ता था।

 

और कर्ज के सख्त तकाजे

सी थी शीत  लहर ।

हिला-हिला जाती

बिरजू को जो आधा- पौना।।

 

बोरा फटा बचा सकता

था थोड़ा बहुत इन्हें ।

गीला किया मावठे ने

संकट में डाल उन्हे ।।

 

सहने की क्षमता से

बाहर हुई ठण्ड बेहद।

सिसके माँ,ठिठुरे बापू

तय बच्चों का रोना।।

©  श्री राघवेन्द्र तिवारी

15-04-2022

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चुप्पियाँ – (१०) ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – चुप्पियाँ – (१०) ? ?

पूर्ण से

पूर्ण जाने पर भी

पूर्ण ही शेष रहता है..,

चैनलों पर सुनता हूँ

प्रायोजित प्रवचन

चुप हो जाता हूँ..,

सारी चुप्पियाँ

समाप्त होने के बाद भी

बची रहती है चुप्पी,

पूर्णमदः ……

……..पूर्णमेवावशिष्यते!

?

© संजय भारद्वाज  

(2.9.2018, प्रातः 7:49 बजे)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ १७ मई से ज्येष्ठ अधिकमास आरंभ हुआ है। इसी दिन से नारायण साधना आरंभ होगी।  इसका मंत्र है – ॐ नारायणाय नम:। 🕉️

💥 इसके साथ मौन साधना एवं आत्म परिष्कार भी चलेंगे। अपनी हर निर्बलता पर विजय पाने का साधन है आत्म परिष्कार। इसका नियमित अभ्यास रखे💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares