मराठी साहित्य – विविधा ☆ निर्माल्य! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

निर्माल्य! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

बाजारात अनेक फुले होती. मोगरा होता, गुलाब होता, जाई होती, जुई होती, सोनचाफा होता. शेवंती होती, झेंडू होता, सायली होती, मखमल होती,अनेक फुलं होती. सर्व लोकं ही फुले घेण्यास उत्सुक होती. प्रत्येक फुलाची ऐट वेगळीच. प्रत्येकाचे मूल्य वेगवेगळे आणि सुगंधाप्रमाणे वाढत जाणारे.

मी तगर!! कुठेही सापडणारे, सहज उपलब्ध असलेले नि त्यामानाने ‘नगण्य’ मूल्य असलेले सामान्य फुल. मला मनमोहक ‘गंध’ नाही, रूप नाही, रंग ही सामान्य (पांढरा). मला कोण देवाच्या पायी वाहणार ? परमेश्वराच्या मंगल आणि पावन चरणांना स्पर्श करण्याचे भाग्य मला कसे लाभणार ?

मनात असलेली, ध्यास लागलेली गोष्ट यथावकाश घडतेच असे म्हटले जाते. मलाही त्याची अनुभूती आली. भगवंताच्या रूपाने एक साधू महाराज आले, त्यांनी मला ‘खुडून’ घेतले आणि भगवंताच्या चरणावर अर्पण केले. माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली. मला मूल्य नाही मिळाले, किंमत मिळाली नाही, सुगंध मिळाला नाही, पण एक गोष्ट मिळाली की ज्यामुळे मी कृतकृत्य झालो. कोमेजताना निर्माल्य होण्याचे भाग्य मला मिळाले यापेक्षा पुण्य काय असू शकते ? भगवंताच्या सहवासात माझे ‘निर्माल्य’ झाले. निर्माल्य!

मनुष्याचे जीवन फुलासारखे तर असते. नाना तऱ्हेची फुले तशी नाना तऱ्हेची माणसे. फक्त निर्माल्य होणे गरजेचे. किमान तसा प्रयत्न आपण करायला हवा.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भैरूची गोष्ट… लेखक – श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ भैरुची गोष्ट !… लेखक – श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

पहाट झाली. भैरू उठला. 

बैल सोडले. औत जोडले. 

शेतात गेला. शेत नांगरले. 

दुपार झाली. औत सोडले. 

बैलांना वैरण घातली. जवळ ओढा होता. बैलांना पाणी पाजले. आपली भाकरी सोडली. 

चटणी, भाकरी, कैरीचे लोणचे. 

झाडाखाली बसला. आवडीने जेवला.

पन्नासेक वर्षांपूर्वी शाळेच्या पाठ्यपुस्तकातून भेटणारा हा जुना भैरू. काळाच्या ओघात तो भेटेनासा झाला. त्याची जागा आता नव्या भैरूनं घेतली. तो भैरू शेतकरी होता. हा भैरू कुठल्यातरी ऑफिसमधील सेवानिवृत्त कारकून आहे. हा भैरूही त्या भैरू सारखाच पहाटे उठतो…

पहाट झाली. भैरू उठला…

नाईटलॅम्पच्या अंधुक उजेडात उशापाशी ठेवलेला चष्मा त्याने चाचपडत शोधला आणि मोबाईल हातात घेतला – “गुड मॉर्निंग … सुप्रभात” चे मेसेजेस पाठवायला. कॅलेंडरकडे नजर टाकून त्याने वार बघितला. “आज शनिवार, म्हणजे “जय हनुमान, जय बजरंगबली” चे मेसेजेस टाकायला हवेत, भैरूच्या मनात आलं. शाळा-कॉलेजमधल्या मित्रांचे ग्रुप्स, सोसायटीचा ग्रुप, बँकेतल्या रिटायर्ड मंडळींचा ग्रुप, नातेवाईकांचे ग्रुप्स, सगळीकडे “गुड मॉर्निंग…सुप्रभात” चे मेसेजेस टाकल्यावर एक काम हातावेगळं केल्याचं समाधान भैरूला वाटलं. “आता या सगळ्यांची मॉर्निंग गुड जावो की बॅड, आपल्याला काय त्याचं” या भावनेनं तो पुन्हा बेडवर आडवा झाला. आता तास-दीड तासाने उठल्यावर तो पुढच्या कामाला लागणार होता.

चहा-नाश्ता संपवून भैरूनं मोबाईल पुन्हा हातात घेतला. या ग्रुप मधले मेसेजेस त्या ग्रुपमध्ये टाकायचं काम आता त्याला करायचं होतं. इकडची “बाबाजींची प्रवचनं” तिकडे, तिकडचं “रोज सकाळी एक गाणे” इकडे, अमुक ग्रुप मधलं “दिनविशेष” तमुक ग्रुप मध्ये, तमुक ग्रुपमधल्या “हेल्थ टिप्स” अमुक ग्रुपमध्ये… एक तासानंतर इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करून झाल्यावर एक मोठं काम झाल्याचा सुस्कारा भैरूनं सोडला. “हे सगळं आपण स्वतः वाचत बसत नाही हे किती बरंय”, आंघोळीला जाताजाता भैरुच्या मनात आलं.

आंघोळ, त्यानंतर देवपूजा घाईघाईनं उरकून त्याहूनही अधिक घाईघाईनं भैरूनं पुन्हा मोबाईल हातात घेतला. बँकेच्या ग्रुपमध्ये कुणाचातरी वाढदिवस होता. या बर्थडे बॉयशी आपली तोंडओळखही नाही, भैरुच्या लक्षात आलं आणि पाठोपाठ “आपण विश केलं नाही तर बरं दिसणार नाही. लोक काय म्हणतील” असं मनात आलं. लगोलग त्यानं त्याच्या स्टॉकमधल्या केकचा फोटो टाकून त्याला शुभेच्छा दिल्या आणि पाठोपाठ दुसऱ्या एका ग्रुपमध्ये कुणीतरी गचकल्याच्या पोस्टवर RIP लिहून गेलेल्याच्या आत्म्याला शांतीही मिळवून दिली. मोबाईल खाली ठेवायच्या आधी भैरूनं सकाळपासून आलेल्या सगळ्या गाण्यांना, अभंगांना “वा छान”, “मस्तच” अशी दाद देऊन टाकली आणि मग ती गाणी, ते अभंग डिलीटही करून टाकले. “दाद देण्यासाठी हे सगळं ऐकलंच पाहिजे असं अजिबात नाही” असं भैरूचं मत होतं.

कुणाची वामकुक्षी संपलेली असो वा नसो, आपण आपलं काम उरकून मोकळं व्हावं या भावनेनं दुपारी दोनच्या सुमारासच भैरूनं झाडून साऱ्या ग्रुप्सना, व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्सना चहा-बिस्किटांचे फोटो असलेले “गुड आफ्टरनून” चे मेसेजेस टाकून दिले. मग सोसायटीच्या ग्रुपमध्ये एका मेंबरने “सोसायटीची रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करावी” अशी पोस्ट टाकली होती त्याला सहमतीचा अंगठा दाखवला आणि त्याच्याच खाली चार पोस्ट नंतर आलेल्या, “रिडेव्हलपमेंटची तूर्तास गरज नाही’ या पोस्टलाही पाठिंबा दर्शवणारा अंगठा दाखवला. “सर्व-पोस्ट-समभाव” आपल्या अंगी आहे याचा अभिमान भैरूला पुन्हा एकदा वाटला. भैरूनं मग काही ग्रुप्समध्ये “युती”च्या बाजूने आलेली पोस्ट फॉरवर्ड केली तर काही ग्रुप्समध्ये “आघाडी” च्या बाजूनं आलेली. “कुणी का येईना सत्तेवर, आपलं काम पोस्ट्स फॉरवर्ड करायचं,” भैरुच्या मनात आलं.

“डॉलरच्या तुलनेत रुपया” या सकाळीच फॉरवर्ड केलेल्या पोस्टवर एका ग्रुपमध्ये दोन-चार जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या तर दुसऱ्या एका ग्रुपमध्ये एक-दोन जणांनी प्रतिप्रश्न केले होते. “आपल्याला यातलं XX काही समजत नाही” हे पक्कं माहीत असल्याने “पुढचे दोन दिवस या दोन्ही ग्रुप्सवर फिरकायचं नाही अशी खूणगाठ बांधत भैरू एका तिसऱ्याच ग्रुपकडे वळला तर तिथे त्यानं फॉरवर्ड केलेल्या “ऐका मालकंसची गाणी” वर हा “मालकंस नाही, कलावती आहे” अशी टिप्पणी कुणीतरी केली होती. त्यावर शेक्सपिअरच्या थाटात “नांवात काय आहे?” असं उत्तर देऊन भैरूनं विषय संपवला. 

“काय मागवू रे तुझ्यासाठी – पिझ्झा की बर्गर?” या सौ च्या प्रश्नाला, “दोन्ही” असं थोडक्यात उत्तर देऊन भैरू “जंकफूड – एक शाप” ही पोस्ट फॉरवर्ड करण्यात बिझी झाला. 

रात्रीचे नऊ वाजल्याचे बघून भैरूनं त्याच्या पोतडीतून चंद्र-चांदण्यांची चित्र असलेले “गुड नाईट – शुभरात्री” चे मेसेजेस बाहेर काढले, पाठवलेही. आता मोबाईल बंद करणार तोच त्याच्या शाळासोबत्यानं पाठवलेलं “मालवून टाक दीप….” गाणं त्याच्या व्हॉट्सअपवर दिसू लागलं. “मालवून टाक दीप….” चे पुढचे शब्द “चेतवून अंग-अंग! राजसा किती दिसांत लाभला निवांत संग!” हे आहेत हे ध्यानीमनीही नसलेल्या भैरूनं ते “गुड नाईट… स्वीट ड्रीम्स” अशी जोड देत शेजारच्या आजोबांना तत्परतेनं फॉरवर्ड केलं आणि मोबाईल बंद करून तो झोपायच्या तयारीला लागला…. उद्या पहाटे त्याला उठायचं होतं… उद्या रविवार म्हणजे “सूर्याचे फोटो असलेले गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवायचे होते… मग प्रवचनं, गाणी… इकडचं तिकडे अन् तिकडचं इकडे. 

तो भैरू पहाटे उठून कष्ट करून शेतमळा फुलवत असे. हा भैरू पहाटे उठून बिनकष्टाचा वायफळाचा मळा फुलवतो.

लिहिलेलं बायकोला वाचून दाखवल्यावर, “मी ओळखते बरं का या भैरूला” असं ती आपल्याकडे बघत डोळे मिचकावत मिश्किलपणे का म्हणाली हे न उमगल्यानं बुचकळ्यात पडलेला मिलिंद.

— समाप्त —

लेखक :  मिलिंद पाध्ये, ठाणे 

प्रस्तुती : सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डिटॅचमेंट… भाग – 1 ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ डिटॅचमेंट… भाग – 1 ☆ डॉ. शैलजा करोडे 

रोजचाच दिवस, रोजचीच सकाळ,  तीच धावपळ, तोच दिनक्रम . पण माझ्यासाठी आजचा दिवस वेगळाच होता . अडोतीस वर्षांपूर्वीही तो दिवस खास होता . पण तो  माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा आरंभ होता .जीवनाची खर्‍या अर्थानं सुरूवात होती ..माझ्या शिक्षणाचं , मी केलेल्या कष्टांचं जणू ते फळ होतं . रोज उठून रोजगाराच्या जाहिराती पाहणं , अर्ज करणं व प्रतिसादाची वाट पाहाणं हा प्रवास आजच्या दिवशी संपला होता . अर्ज , लेखी परीक्षा नंतरचे मुलाखतीचे सोपस्कर आटोपल्यावर आजच्या दिवशी अडोतीस वर्षापूर्वी बँकिंग सर्व्हीस रिक्रूटमेंट बोर्डाकडून ( BSRB ) मला अपाइंटमेंट लेटर मिळून एका राष्ट्रीयकृत बँकेत मला हजर व्हायचे होते

स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आनंद काही वेगळाचं असतो , तो आनंद मला मिळाला होता .बँकेत लेटर घेऊन जाणे , अधिकार्‍यांनी सगळ्या पूर्तता झाल्यावर  कामावर रूजू करवून घेऊन मला काम सोपविणे , सगळं अद्भूत होतं माझ्यासाठी . आणि आज इतकी वर्षे इमाने इतबारे सर्व्हिस केल्यावर सेवानिवृत्तीचा दिवस आला होता .

इतकी वर्षे या इन्स्टिस्टूटशी जोडलेली मी डिटॅच होणार होते .

आज रोजच्याप्रमाणे मी आॅफीसला जायला निघाले पण मनात एक वेगळीच हुरहुर होती . उद्यापासून हा दिनक्रम थांबणार होता . रोज घड्याळाच्या तालावर नाचणार्‍या मला एकदम रितेपण जाणवणार होतं .दिवसातील दहा दहा तास कामाच्या चक्रात फिरणारी मी आता या वेळेत काय करणार , या वेळेचं नियोजन कसं करणार .? या प्रश्नांनी वेढली होते .

“मॅडम आता कोठे घेऊ गाडी, मला रस्ता सांगा ” मी तंद्रीतून बाहेर आले . “उजवीकडे घ्या ” . रोज नवनवीन आव्हानांना सामोरी जाणारी मी , आजही नवीन आव्हान समोर आलं . आँटोरिक्षा , टॅक्सीवाल्याँचा आज संप होता . बँकेत वेळेवर पोहोचणं , डे बेगीन करणं , कॅश व सुरक्षा जमा कक्ष उघडणं , वेळेवर होणं गरजेचं होतं . रस्त्यावरून जाणार्‍या एका फोर व्हीलरला थांबवून त्या व्यक्तिला मी विनंती केली व त्याने मला इच्छितस्थळी पोहोचविले .

सेवानिवृत्ती नंतर मनसोक्त झोपायचं , आरामात उठायचं , वर्तमान पेपर वाचतांना चहाचा एकएक घोट घ्यायचा . आरामात आंघोळीला जायचं . किती किती छोटी स्वप्न असतात आपली नाही का ?. पण रोजच्या धावपळीत , दगदगीत ती सुद्धा पूर्ण होत नाही . सेवानिवृत्तीनंतर आपण हे सगळं करूया , मी मनाशी खूणगांठ बांधलेली .आज ती वेळ आली होती , पण हे काय ? पक्ष्यांच्या चिवचिवाटासोबत मी पण उठून बसले , ते ही नेहमीपेक्षा लवकर . वर्तुळात फिरण्याची इतक्या वर्षांची सवय. हातही भराभर कामे करू लागलीत .स्वयंपाक आटोपला आणि सवयीने डबा भरायला घेतला , ” अगं काय करतेस ? डबा काय भरतेस ? रिटायर झालीस ना तू काल ” यांच्या बोलण्याने मी भानावर आले . डब्यातलं अन्न पुन्हा पातेल्यांमध्ये काढलं . ” इतकी वर्ष सोबत निभावलीस . माझ्यासोबत तू ही रिटायर झालास . तू ही अलिप्त झालास . डिटॅच झालास ” मी हातातील डबा न्याहाळत होते .डबा सिंकमध्ये ठेवला आणि मी गॅलरीत आले .तुळशी चांगली बहरली होती . असं निवांतपणे मी तुळशीला कधी न्याहाळलंच नव्हतं . तुळशीने मंजिर्‍या खूप धरल्या होत्या . ” मंजिरी वाढली म्हणजे तुळशीचं लाईफ कमी होतं . म्हणून मंजिर्‍या वरचेवर खुडाव्यात , तुळशी पुन्हा बहरायला मदत होते ” आईचे बोल आठवले व मी तुळशीच्या मंजिर्‍या खुडू लागले .देवघरात जाऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीवर मंजिर्‍या वाहिल्या .

दुपारचा एक वाजला आणि आॅफीसमधील लंचब्रेक मला आठवला .आज मला हे काय होतंय .? सेवानिवृत्तीपूर्वी माझी तीन महिने शिल्लक असलेली रजा मी एंजाॅय करत होते , तेव्हा मला अशी हुरहुर कधीच वाटली नाही . हो त्याला कारणंही तसंच होतं म्हणा , मी अजून त्यांच्याशी जोडलेली होते .

हा काय पहिला बदल होता का आयुष्यातला ? नाही ना . प्रत्येक वेळी जुळवलंच ना आपण . प्राथमिक शिक्षण झालं आणि हायस्कूलला प्रवेश घेतला . जुनी शाळा , मैत्रिणी , शिक्षकवर्ग सगळ्यांचा निरोप घेतांना डोळ्यात अश्रूंनी दाटी केलेली .आम्ही मैत्रिणी एकमेकींना भेटवस्तू देत , पुनःपुन्हा भेटीचं आश्वासन देत डिटॅच झालो .पण नवीन शाळा , नवीन मैत्रिणी आणि पुढे शिकण्याची जिद्द , यांनी नवऊर्जा दिलीच की .

हाच परीपाठ हायस्कूल सोडतांना , पुढे महाविद्यालय सोडतांना , मनाला हुरहुर लावणारा घडत गेला . एकीकडे डिटॅच होतांना दुसरीकडे अँटचही होत गेलेलो आम्ही . पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही शिकत होतो . नवी उमेद , नवी आशा आणि जुन्याने दिलेल्या असंख्य आठवणींचा खजिना सोबतीला घेऊन मार्गक्रमण होतंच राहिलं .

आठवणींच्या या चलचित्रात मला आठवलं माझं सगळ्यात मोठं डिटॅचमेंट . माझं लग्न . ज्या घरात माझा जन्म झाला , मी लहानाची शहाणी झाले . आई वडिलांच्या छायेत वावरले , भावंडांच्या सोबतीने खेळले , कधी भांडले , रूसवे फुगवे धरले , यांना सगळ्यांना सोडून नव्या घरी , नवीन माणसांसोबत राहाणं , तेथील रितीरिवाज , घरातील प्रत्येकांचे स्वभावदोष जाणून त्यांच्याशी जुळवून घेत , त्यांची मर्जी राखणं , सासूचा तोरा , दीर जावांचा हेवादावा ,नणंदेचे टोमणे सहन करत संसारगाडी हाकायची , अजबच होतं . माहेर सुटलं , अगदी ”

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अण्णासाहेब किर्लोस्कर ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ अण्णासाहेब किर्लोस्कर ☆ श्री प्रसाद जोग

अण्णासाहेब किर्लोस्कर

( जन्मदिन ३१ मार्च,१८४३ — स्मृतीदिन २ नोव्हेंबर,१८८५ ) 

मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम, खर्‍या अर्थाने रुजवण्याचे श्रेय  बलवंत पांडुरंग अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांकडेच जाते.

१८७३ साली अण्णासाहेबांनी ‘शांकरदिग्विजय’ या नावाचे एक गद्य नाटक प्रसिद्ध केले. १८८० साली पुणे मुक्कामी किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी एका बैठकीत  ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला.

१३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘शाकुंतला’च्या पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.

भारतीय नाट्यशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं.

भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत – ती वाद्यांवर वाजवली जात.जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. त्यालाच आपण आज नांदी म्हणतो .

नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार ‘संगीत शाकुंतल’ नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. ‘पंचतुंड नररुंडमालधर’ ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्‍यास तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत अचानकपणे बदलून गेला.

संगीत, नृत्य, नाट्य यांच्या अपूर्व संगमातून निर्माण झालेली संस्कृती म्हणजे रंगभूमी. याच रंगभूमीचं तेजस्वी रुप म्हणजे आपली मराठी संगीत नाट्य परंपरा. रंगमंदिरातील निःशब्द शांतता, भारावून टाकणारं वातावरण, मंद होत जाणारे दिवे, मखमली पडदा, धुपाचा गंध आणि ऑर्गनच्या साथीनं येणारे नांदीचे सूर. सगळच भव्यदिव्य.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाद्वारे ही देदीप्यमान परंपरा सुरू केली.

पंचतुंड नररुंडमाल घर, पार्वतीश आधी नमितो।

विघ्नवर्ग नग भग्न कराया,विघ्नेश्वर गणपती मग तो॥

 

कालिदास कवी काव्य रचित हे गानी शाकुंतल रचितो I

जाणूनिया अवसान नसोनी हे महत्कृत्यभर शिरी घेतो II

 

ईशवराचा लेश मिळे तरी  मूढयत्न शेवटी जातो I

या न्याय बलत्कवि निज वाकपुष्पी रसिकार्चन करितो II

नांदी आणि नाटकातील इतरही पदे निरनिराळ्या राग-रागिण्यांवर आधारित असत. यमन, भूप, ललत, जोगिया, पिलू, आसावरी, भैरवी यांसारखे प्रचलित आणि लोकप्रिय राग तर वापरले गेले.

शाकुंतल नाटकांमधील पदे आजही आवडीने ऐकली जातात त्या पैकी थोडी

१)मना तळमळसी ,

२)लाविली थंड उटी

संगीत सौभद्र मधल्या पदांची यादी फारच मोठी आहे म्हणून नमुन्या दाखल काही गाणी .

१) नच सुंदरी करू कोपा

२) नभ मेघांनी आक्रमिले

३) पाण्डुनृपती जनक जया

४) राधाधर मधू मिलिंद

५) लग्नाला जातो मी

६) प्रिये पहा ( पूर्वीच्या काळी ह्या गाण्याच्या वेळी खरोखर पहाट होत असे)

१५० वर्षांपूर्वी लोकरंजन करण्यासाठी पाऊल उचलणाऱ्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या स्मृतीला  विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘शिवथर घळ’ … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शिवथर घळ’ … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. राहायला नेहेमी मिळते तशी मोफत खोली मिळाली… आज फारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजून कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून राहावयास पाठविले. एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले ! “हाय ! मी भोपळे !” ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता… इतक्यात त्यांनी पँटच्या खिशातून खचाखच भरलेल्या  काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली… माझी उत्कंठा ताणली गेली.. “हे काय आहे ?” “ही जीपीएस मशीन्स आहेत … डू यू नो व्हॉट जीपीएस इज ?” 

माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला ! “येस, आय नो… पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता ?” हसत हसत ते म्हणाले “मी जीपीएस व्हेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे ” असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहर्‍यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले – “हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला दाखविणार आहे याचे मी बाहेर किमान ५-५० हजार रुपये घेतो ! पण तुम्ही समर्थ भक्त आहात म्हणून तुम्हाला हे ज्ञान मोफत !” असे म्हणत त्यांनी सुमारे एक तास अतिशय सखोलपणे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएसची इत्थंभूत माहिती मला सांगितली … ज्ञानात चांगलीच भर पडली ! आता तुम्ही म्हणाल याचा आणि शिवथर घळीचा काय संबंध ? मलाही तोच प्रश्न पडला ! पण खरी गंमत तर पुढे आहे ! वाचत रहा !

भोपळे म्हणाले “चलो यंग मॅन, आता थियरी खूप झाली, आता थोडे प्रॅक्टिकल करूयात…” असे म्हणत ती सर्व यंत्रे घेऊन आम्ही बाहेर आलो… उघड्या आकाशाखाली…  कारण जीपीएसला ओपन स्काय अर्थात खुले आकाश लागते ! त्या आकाशातील उपग्रह या आपल्या हातातील यंत्राला त्याची पोझिशन, स्थान सांगत असतात ! आता माझी परीक्षा सुरु झाली !

भोपळे : बरं, वर पहा, किती डिग्री आकाश खुले आहे ?

मी : “९० तरी असेल.”

भोपळे : “गुड.. मग मला सांगा आता या स्पेस मध्ये साधारण किती सॅटेलाईट्स असतील ?”

मी : “तुम्ही मघाशी सांगितलेत त्याप्रमाणे ३० एक तरी असावेत.”

भोपळे: “करेक्ट! लेट्स व्हेरीफाय !”

असे म्हणत त्यांनी जमिनीवर मांडलेली सर्व यंत्रे एक एक करत सुरू केली. कुणी २० उपग्रह पकडले (उपग्रहांची रेंज पकडली), कुणी २४, कुणी २८… नियमानुसार २४ उपग्रह असतील तर एक मीटरपर्यंत अचूक स्थान सांगता येते तसे त्या यंत्रांनी सांगितलेही !

भोपळे :” मी जगभरातील अनेक देश फिरलोय… सगळीकडे या यंत्रांचे असेच बिहेवियर असते”. आता मात्र मला रहावेना. मी म्हणालो – “भोपळे सर, आपण इतके उच्चशिक्षित आणि शास्त्रसंपन्न आहात तर या इथे खबदाडात, खनाळात कसे काय वाट चुकलात ?”

“तीच तर गंमत आहे!” भोपळे हसत हसत म्हणाले – “इथे रायगड पोलीस स्टेशनच्या वायरलेसचे काम करायला आलो होतो. म्हणजे सर्वेक्षणच होते .. आणि अचानक एक चमत्कार गवसला !”

मी अति उत्सुकतेने ऐकत होतो !

“डू यू वाँट टू विटनेस इट ? या माझ्या सोबत !” असे म्हणत ते मला शिवथर घळीच्या तोंडापाशी घेऊन गेले. 

भोपळे : “वर पहा, किती आकाश आहे ?”

मी :” ७० अंश तरी आहेच आहे.”

भोपळे :” मग किती उपग्रह दिसावेत ?”

मी : निदान २०-२५ ?

भोपळे : “करेक्ट, नाऊ लेट्स चेक…” असे म्हणत त्यांनी पुन्हा सर्व यंत्रे खुल्या आकाशाखाली मांडून सुरू केली … आणि काय आश्चर्य ! जर्मन, चायनीज, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची रेंज येईना ! चमत्कारच हा ! उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते ! पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते. म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते जे उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सीज खाली पोहोचूच देत नव्हते !

भोपळे म्हणाले “पूर्ण जग फिरलो परंतु absolutely frequency less अशी केवळ हीच एक जागा पाहिली !” …. आणि मग मला समर्थांच्या शिवथर घळीचे वर्णन करणा-या ओळी झर्रकन स्मरल्या !

…. ‘ विश्रांती वाटते येथे। यावया पुण्य पाहिजे !! ‘                                      

विश्रांती ! शांतता ! कंपनरहित अवस्था ! निर्विचार स्थिती ! अशा स्थितीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकू येणार ! त्यात भेसळ होणे नाही ! आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार ! …. म्हणूनच हा ग्रंथ शुद्ध समर्थांचाच आहे !

अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या… भोपळेंचे मनापासून आभार मानत घळीत पाय ठेवला… समर्थांच्या पायावर लोटांगण घातले… आज तिथे भासणारी शांतता अधिक खोल होती… अधिक गंभीर होती… अधिक शांत होती ! भ्रांत मनास विश्रांती खरोखरीच वाटत होती !

आधुनिक विज्ञानास जे गवसले ते माझ्या या माऊलीला ४०० वर्षांपूर्वीच केवळ अंतःस्थ जाणीवेने समजले होते !

दासबोधाचे जन्मस्थान म्हणजे रायगडाजवळील शिवथरची घळ हे समीकरण आता सर्वांनाच माहिती आहे ! परंतु ही अद्भुत घळ आपण प्रत्यक्षात पाहिली आहे का हो ? नसेल … तर अगदी अवश्य पहा ! आणि सर्वांना सांगा !

!! जय जय रघुवीर समर्थ !! 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिला विचारलं नाही… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

तिला विचारलं नाही… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

ज्या क्षणी पाहिले तिला

होकार गृहीतच धरला

मी तुला आवडलो का?

तिला विचारलंच नाही

 

सप्तपदी चालताना

घुटमळली पाऊले तिची

हुरहुर कसली होती?

तिला विचारलंच नाही

 

माप ओलांडताना उंबरठ्याचं

मी आलो सहज आत

तुलाही यावंसं वाटतंय का?

तिला विचारलंच नाही

 

झाली पहिली भेट

किती आतुर होतो मी

ओढ तुलाही आहे का?

तिला विचारलंच नाही

 

वंशाला दिवाच हवा

सांगून मोकळा झालो

पण आई व्हायचंय का?

तिला विचारलंच नाही

 

संगोपन करतांना मुलांचं

कसरत होत होती तिची

गरज माझीही लागेल का?

तिला विचारलंच नाही

 

आयुष्यभर दिली साथ

झाली सुख दु:खाची सोबती

कधी मन तिचं दुखलं का?

तिला विचारलंच नाही

 

न मागताच तिच्याकडून

घेतलं मी सारं काही

तुलाही काही हवं का?

तिला विचारलंच नाही

 

खरंच किती स्वार्थी झालो

गृहीतच धरलं मत तिचं

तिचं मन काय म्हणतं?

तिला विचारलंच नाही

 

आत्ता विचारलं तिला

सांग काय हवंय तुला?

वय तिचं केव्हा झालं?

समजलेच नाही समजलेच नाही

 

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 50 – पास से, जब तू गुजर जाता है… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – पास से, जब तू गुजर जाता है।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 50 – पास से, जब तू गुजर जाता है… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

पास से, जब तू गुजर जाता है 

पाँव तब मेरा बहक जाता है

*

तुम जो झूठे ही रूठ जाते हो

मेरा दम सच में निकल जाता है

*

मेरी मंजिल करीब है लेकिन 

फासला और भी बढ़ जाता है

*

उसके आने से फूल खिलते हैं 

फिर भी आने से वह लजाता है

*

इत्र जब तुम वहाँ लगाते हो

गाँव खुशबू से महक जाता है

*

मेरा मंदिर, यहीं-कहीं होगा 

रास्ता, तेरे ही घर जाता है

 

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 126 – पीर थक कर सो गई है… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “पीर थक कर सो गई है…। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 126 – पीर थक कर सो गई है… ☆

 पीर थक कर सो गई है,

प्रिय उसे तुम मत जगाओ।

हो सके तो थपकियाँ दे,

प्रेम की लोरी सुनाओ।।

 *

वेदनाओं की तरफ से,

अब नहीं आता निमंत्रण।

द्वार से ही लौट जाता,

हो गया दिल पर नियंत्रण।।

 *

अब नहीं संधान करता,

फिर न उसको तुम बुलाओ।

पीर थककर सो गई है,

प्रिय उसे तुम मत जगाओ।।

 *

वक्त कितना था बिताया,

उन मुफलिसी के दौर में,

झूलता ही रह गया था।

तब स्वप्नदर्शी जाल में,

 *

फिर मुझे उस पालने में।

अब नहीं किंचित झुलाओ।

पीर थक कर सो गई है।

प्रिय उसे तुम मत जगाओ ।।

 *

सुख सदा शापित रहा है,

द्वार पर आई न आहट।

आ गया था संकुचित मन

धर अधर पर मुस्कुराहट।

 *

जो विदा लेकर गया फिर,

उस खिन्नता को मत बुलाओ।

पीर थक कर सो गई है।

प्रिय उसे तुम मत जगाओ ।।

 *

पीर होती है घनेरी,

भावनाओं के सफर में।

वर्जनाएँ खुद लजातीं,

अश्रु धारा की डगर में।।

 *

देखने दो पल सुनहरे,

अब दृगों को मत रुलाओ।

पीर थककर सो गई है।

प्रिय उसे तुम मत जगाओ।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – विश्व पृथ्वी दिवस विशेष – हरी-भरी🌱 ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजीवनी लाकर मूर्च्छा को चेतना में बदलने वाले प्रभु हनुमान को प्रणाम। श्री हनुमान प्राकट्योत्सव की हार्दिक बधाई। ?

? संजय दृष्टि – विश्व पृथ्वी दिवस विशेष – हरी-भरी🌱? ?

🌳 माटी से मानुष तक इस हरियाली की रक्षा करें। विश्व पृथ्वी दिवस की शुभकामनाएँ 🌳

🌳

मैं निरंतर रोपता रहा पौधे,

उगाता रहा बीज उनके लिए,

वे चुपचाप, दबे पाँव

चुराते रहे मुझसे मेरी धरती..,

भूल गए वे, पौधा केवल

मिट्टी के बूते नहीं पनपता,

उसे चाहिए-

हवा, पानी, रोशनी, खाद

और ढेर सारी ममता भी,

अब बंजर मिट्टी और

जड़, पत्तों के कंकाल लिए,

हाथ पर हाथ धरे

बैठे हैं सारे शेखचिल्ली,

आशा से मुझे तकते हैं,

मुझ बावरे में जाने क्यों

उपजती नहीं

प्रतिशोध की भावना,

मैं फिर जुटाता हूँ

तोला भर धूप,

अंजुरी भर पानी,

थोड़ी- सी खाद

और उगते अंकुरों को

पिता बन निहारता हूँ,

हरे शृंगार से

सजती-धजती है,

सच कहूँ, धरती ;

प्रसूता ही अच्छी लगती है!

🌳

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 श्री हनुमान साधना – अवधि- मंगलवार दि. 23 अप्रैल से गुरुवार 23 मई तक 💥

🕉️ श्री हनुमान साधना में हनुमान चालीसा के पाठ होंगे। संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही। मंगल भव 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मेरी डायरी के पन्ने से # 7 – संस्मरण#1 – ☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार।आज प्रस्तुत है आपकी डायरी के पन्ने से … संस्मरण)

? मेरी डायरी के पन्ने से # 7 – संस्मरण ?

कुछ घटनाएँ, कुछ दृश्य और कुछ पढ़ी -सुनी बातें चिर स्मरणीय होती हैं। उस पर समय की कई परतें चढ़ जाती हैं और वह मन-मस्तिष्क के किसी कोने में सुप्त पड़ी रहती हैं। फिर कुछ घटनाएँ घटती हैं तो सुप्त स्मृतियाँ झंकृत हो उठती हैं।

कल अपनी एक सखी के घर भोजन करते समय बचपन की एक ऐसी ही घटना स्मरण हो आई जो सुप्त रूप से मानसपटल पर कुंडली मारकर बैठी थी।

घटना 1965 की है। हमें पुणे आकर तीन ही महीने हुए थे। हम चतुर्शृंगी मंदिर के पास रहते थे और यहाँ निवास करनेवाले सभी ब्राह्मण थे। हमारी सहेलियाँ भी उन्हीं परिवारों की ही थीं। सबका रहन -सहन अत्यंत साधारण ही था। यह बंगलों की कॉलोनी है। आज तीसरी पीढ़ी उन्हीं घरों में रहती है। सभी घर पत्थर के बने हुए हैं। यह सब कुछ हमारे लिए नया-नया ही था।

गणपति के उत्सव के दौरान एक दिन गौरी गणपति की स्थापना होती है और गणपति की दोनों पत्नियों की पूजा की जाती है। देवस्थान को खूब सजाते हैं, गौरी की मूर्ति का शृंगार करते हैं सुंदर सिल्क की साड़ी पहनाते हैं। गजरा और फूलों से मूर्तियाँ सजाई जाती हैं।

हमारी सहेली विद्या और संजीवनी के घर पर हम लड़कियों को दस बजे के समय भोजन के लिए आमंत्रित किया गया था। हमारी माताएँ शाम को हल्दी कुमकुम के लिए आमंत्रित थीं।

रसोईघर में अंग्रेज़ी के L के आकार में दरी बिछाई गई थी। सामने चौकियाँ थीं उस पर बड़ा – सा एक थाल रखा हुआ था, बाईं ओर लोटा और पेला पानी से भरकर रखा गया था।

(उन दिनों गिलास से पानी पीने की प्रथा महाराष्ट्रीय ब्राह्मण या ज़मीदार परिवारों में नहीं थी।) चौकी के हर पैर के नीचे रंगोली सजाई गई थी। हम सात सहेलियाँ ही आमंत्रित थीं। हमें अभी मासिक धर्म न होने के कारण हम कन्या पूजा की श्रेणी में थीं। घर में घुसते ही हमें मोगरे के गजरे दिए गए।

भोजन परोसना प्रारंभ हुआ। अब सारी तस्वीरें मानसपटल पर स्पष्ट उभर रही हैं मानो कल की ही बात हो। दाईं ओर से परोसना प्रारंभ हुआ।

पहले थोड़ा सा नमक रखा गया, फिर एक नींबू का आठवाँ टुकड़ा, फिर धनियापत्ती की चटनी, थोड़ा सा आम का अचार, फिर चूरा किया गया कुरडी -पापड़, थोड़ी सी कोशिंबिर फिर अरबी के पत्ते से बनी आडू वडी वह भी एक, फिर उबले आलू की सूखी सब्ज़ी, एक चम्मच भर, कटोरी में भरवे छोटे बैंगन की सब्ज़ी, और फिर एक तरी वाली सब्ज़ी- आज स्मरण नहीं किस चीज़ की सब्ज़ी थी पर उसके ऊपर तरलता तेल आज भी आँखों में बसा है।

फिर आया एक छोटी सी कटोरी में दबाकर भरा सुगंधित गोल – गोल चावल का भात, (जिसे अंबेमोर कहते हैं। उन दिनों उच्च स्तरीय महाराष्ट्रीय यही खाते थे।) उस पर आया बिना छौंक की दाल जिसे मराठी में वरण कहते हैं और उस पर आया चम्मच भर घी ! संजीवनी -विद्या की माँ ने जिन्हें हम काकू पुकारते थे, हम सबके पैरों पर थोड़ा पानी डाला, अपने आँचल से पोंछा और हमें प्रणाम किया।

हम दोनों बहनें हतप्रभ सी थीं। कल तक हम ही झुक – झुककर हर अपने से बड़े को प्रणाम करती आ रही थीं आज कोई हमारी पूजा कर रहा है? आठ – नौ वर्ष की उम्र में हमारे लिए सब कुछ नया था। हम दिल्ली से आए थे जहाँ की संस्कृति भिन्न थी और बँगालियों की और भी अलग रीति -रिवाज़ हैं। (मैं बँगला भाषी हूँ)

हम दोनों बहनें आपस में बँगला में चर्चा करने लगीं कि कहाँ से शुरू करें, मैं तो थी ही बदमाश मैंने उससे कहा था -पक्षी के बीट की तरह इतनी – इतनी सी चीज़ें दीं। क्या कंजूस है काकू। छोड़दी (बँगला भाषा में छोटी दीदी) ने मेरी जाँघ पर चिमटी ली थी और बोली -चुप करके खा। फिर जैसे सबने खाया हमने भी खाया। फिर बारी आई रोटी की। रोटियाँ तोड़कर उसके चार टुकड़े किए गए और एक चौथाई टुकड़ा हमारी थाली पर डाली गईं। हम दोनों बहनों ने किसी तरह खाना खाया और दौड़कर रोते हुए घर आए।

छोटे थे, भाषा नहीं आती थी, माँ ने दोनों को बाहों में भर लिया। हम रो-रोकर जब सिसकियाँ भरने लगीं तो माँ ने पूछा क्या हुआ?

छोड़दी का मन बड़ा साफ़ था उसने हमारे चरण धोने, की बात पहले बताई। पर मुझे तो जल्दी थी अपनी कथा सुनाने की। सिसकियों से बँधी आवाज़ में मैंने कहना शुरू किया। वह कुछ बोलने गई तो मैंने अपनी बाईं हथेली से उसका मुँह बंद कर दिया और माँ से कहा- चिड़िया की बीट की तरह इतनी सी चटनी अचार दिए, नींबू का बहुत छोटा टुकड़ा थाली में रखा। जानती हो माँ पापड़ भी चूरा करके दिया और रोटियाँ फाड़कर टुकड़े में दिए। हम क्या भिखारी हैं या कुत्ते हैं जो इस तरह हमें खाना परोसा?  हम खूब रोए और सो गए।

उन दिनों महाराष्ट्र में लोग नाश्ता नहीं करते थे। दस बजे पूरा भोजन लेने की प्रथा थी। इसलिए शायद मराठी स्कूल ग्यारह या बारह बजे प्रारंभ होते थे।

बाबा दफ़्तर से भोजन के लिए घर आते थे। माँ ने हमारी व्यथा कथा सुनाई और साथ में कहा कि बच्चियाँ बहुत अपमानित महसूस कर गईं आप बात कीजिए।

शाम को बाबा ने महाराष्ट्र की भौगोलिक स्थिति पर प्रकाश डाला, समझाया कि यह पठारी इलाका है, यहाँ के लोगों का भोजन हमसे अलग है। उनकी रोटियाँ बहुत बड़ी और पतली होती है, इसे वे घडी ची पोळी कहते हैं। तुम लोग एक रोटी न खा पाते इसलिए तोड़कर दी है। आज यहाँ के लोग गेहूँ की चपाती खा रहै हैं पर उनका मूल भोजन बाजरी और ज्वारी की रोटी है। जो पतली नर्म और बड़ी -बड़ी होती है। स्नेह और सम्मान के साथ इन बड़ी रोटियों के चार टुकड़े कर वे परोसी जाती हैं।

और कुरडई तोड़कर दिया क्योंकि पूरा पकड़कर खाने पर सब तरफ टुकड़े गिरते, बरबाद होता। उन्होंने तो तुम दोनों का सम्मान किया, स्नेह से भोजन कराया। जो और माँगते तो काकू फिर देतीं।

छोड़दी तुरंत बोली -हाँ हाँ काकू बार – बार वाढ़ू का, वाढ़ू का बोल रही थीं पर हम नहीं समझे।

इस घटना के बाद शाम को माँ के साथ हम फिर उनके घर गए। माँ ने हमारी गलत फ़हमी की बात काकू से कही। काकू ने हमें गले लगाया प्यार किया और हमने उन्हें झुककर प्रणाम किया। शायद सॉरी कहने की उन दिनों यही प्रथा रही थी।

किसी भी स्थान के भोजन के तौर -तरीकों से पहले उसकी जानकारी ले लेना आवश्यक है यह हमने अपने अनुभव से सीखा।

हम छोटे थे, नए -नए पुणे आए थे यहाँ की भाषा, लोग, पहनावा (महिलाएँ नौवारी साड़ी पहना करती थीं।) प्रथाएँ, त्योहार, इतिहास सबसे अपरिचित थे।

आज हमें 58 वर्ष हो गए यहाँ आकर। यहाँ का भोजन, भाषा, साहित्य पूजापाठ की परिपाटी से हम न केवल परिचित हुए बल्कि आज हमारी बेटियाँ गणपति जी का दस दिन घर में पूजा करती हैं। गौरी लाई जाती हैं हल्दी कुमकुम का आयोजन होता है।

कोशिंबिर, कुरडई हमारे भोजन की थाली का अंश है। हम वरण, आमटी, पोरण पोळी भी बनाकर चाव से खाते हैं। यहाँ तक कि हमारी तीसरी पीढ़ी आज मराठी भाषा ही बोलती है।

आज हम फिर एक बार पंगत में बैठकर वाढ़ू का सुनने की प्रतीक्षा करते हैं। अब तो वह संस्कृति और प्रचलन समाज से बाहर ही हो गए। प्रथा ही खत्म हो गई। उसमें आतिथ्य का भाव हुआ करता था। भोजन बर्बाद होने की संभावना कम रहती थी।

© सुश्री ऋता सिंह

22/5/23

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print