मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“माणिक, हा बंगला तुझ्या नावावर आहे. तू माझ्यानंतर इथेच रहा. कुठे सह्या करू नको आणि मंगेशला अजिबात देऊ नको घर. आपण मृत्युपत्र करु आणि मग आपल्या पश्चात देऊ त्यालाच. ”त्यांनी माणिकला सांगून ठेवलं. आज त्यांची आठवण येऊन माणिकला अगदी असहाय वाटलं. कशी का होईना, त्यांची सोबत होती तिला.) 

इथून पुढे – – – 

काळ कोणासाठी थांबतो का?

सहा महिने झाले वामनरावना जाऊन. माणिकच्या मैत्रिणी येत तिला फिरायला नेत. तिचे मन रमवत. मोठा आधार होता तिला या सगळ्या सख्यांचा.

असे आठ महिने झाले आणि एक दिवस मंगेश म्हणाला, ”आई, मी आणि देविका वेगळा फ्लॅट घेऊन रहाणार आहोत. सध्या भाड्यानेच घेतलाय. जवळच बघितला आहे म्हणजे सोयीचे होईल आपल्याला. ” 

माणिकला हा मोठा शॉकच होता. मटकन सोफ्यावर बसत तिने विचारलं “अरे पण का? मंगेश, अरे एकदम असं काय घडलं की तुम्हाला माझ्यापासून वेगळं व्हावंसं वाटलं? काय कमी केलं मी आणि कुठे चुकलं माझं? अरे, बाबा जाऊन अजून वर्ष पण नाही झालं आणि खुशाल एवढ्या मोठ्या बंगल्यात मला एकटीला सोडून तुम्ही भाड्याच्या फ्लॅटमध्ये जाताय? हे किती चूक आहे रे. ”, माणिक कळवळून म्हणाली.

मंगेश मख्खपणे उभा होता. न बोलता तो आपल्या खोलीत निघूनच गेला. देविकाशी बोलायची तर सोयच नव्हती.

पुढच्या आठवड्यात एक ट्रक आला. आपले बेडस् काही सामान, गोदरेजचे कपाट असं घेऊन मंगेश निघून गेला.

माणिकला किंचाळून विचारावसं वाटलं अरे मीच खर्च करून घेतलेले हे डबल बेड या गाद्या, हे कपाट हे सगळं सामान कसं नेतो आहेस उचलून?

पण माणिक काहीच बोलली नाही. नमस्कारसुद्धा न करता दोघेही ट्रक मध्ये बसून निघून गेले. आता घरात उरली फक्त माणिक.

त्या रिकाम्या घरात ती भुतासारखी सगळ्या खोल्यातून वणावणा हिंडली. रडत रडत स्वतःलाच विचारत राहिली, माझं काय चुकलं?

तिने न राहवून तिच्या जिवलग मैत्रिणीला फोन केला. नीला तिची जवळची मैत्रीण. नीला दहा मिनिटातच माणिकच्या घरी आली. तिला मिठी मारून रडत माणिक म्हणाली, आता मी एकटी कशी राहू इथे? का गेला असेल ग माझा मुलगा मला सोडून? ”

नीलाने तिला शांत होऊ दिलं.

“हे बघ माणिक, हे सत्य आहे आणि तुला ते स्वीकारायला हवंच. वाटेल काही दिवस वाईट. पण होईल तुला सवय. आम्ही आहोत ना?

रोज कोण येणार तुझ्या घरी तुला सोबत म्हणून झोपायला?

आजपासूनच सवय कर. घट्ट कर मन आता. आपलं स्वतःचं घर आहे, त्यात कसली ग भीति? आणि वामनराव कायमआहेत तुझ्यासोबत इथं. ”

नीलाने तिला घरून आणलेला डबा खायला लावला.

म्हणाली “अजिबात कोणाकडे रात्री झोपायला जायचं नाही. आपली नीरा कितीतरी वर्ष एकटी रहातेय. तिला तर मूलबाळ पण नाहीये..

किती आनंदात रहाते ना ती? होईल तुलाही सवय. ”नीला निघून गेली.

माणिकने रात्र तळमळून काढली.

दुसरा दिवस उजाडला. माणिकने चहा करून घेतला.

आज मंगेश देविका नव्हते की नव्हते त्यांचे ब्रेकफास्ट आणि डबे.

कामवाली कलाबाई आली नऊ वाजता. तिला सगळं सांगताना माणिकला पुन्हा रडू कोसळलं. कलाबाई म्हणाली “रडू नका वहिनी.

असलीच पोरं तुमची हल्लीची. गेली तर जाऊद्यात की. आम्ही आहोत की तुम्हाला. उलट त्रास वाचला म्हणा. डबे नकोत करायला त्यांचे आणि स्वयंपाक पण नको रोज करायला त्यांच्या आवडीचा.

होतं ते चांगल्यासाठी. चला.

डोळे पुसा. मी पोहे करते आपल्या साठी. कलाने पोहे केले माणिकला खायला लावले.

त्या दिवशी माणिकला रिकामपण जाणवलं. पण काहीच काम उरलं नव्हतं. तिने घर आवरलं. सगळं पसारा आवरून टाकला.

मैत्रिणीचे फोन आले. गप्पा मारताना माणिक मोकळी होत गेली. आता आपण कायम एकट्या असणार हे हळूहळू मान्य करायचं ठरवलं तिनं.

चार दिवसांनी स्नेहाचा फोनआला.

”माणिक, मला पंचवीसइडलीचटणी करून देशील का प्लीज?

मला उसण भरलीय ग आणि नेमके पाहुणे यायचे आहेत ब्रेकफास्टला.

माझा ड्रायव्हर येऊन घेऊन जाईल. हं. ”

माणिकने स्नेहाला इडलीचटणी पाठवली. ड्रायव्हर बरोबरच स्नेहाने भरपूर पैसे पाठवले होते. आणि चिठ्ठी…हे घ्यायचे मुकाट्याने. नाही म्हणू नकोस. थँक्स माणिक.

माणिकला फार मस्त वाटलं.

कलाबाई म्हणाली” लै भारी की हो ताई. आता घ्यायला लागा अशा ऑर्डरी. मी आहे की. सगळी मदत करीन तुम्हाला. आणि हसत म्हणाली “मग वेगळे पैसे द्या बरं का या कामाचे. ”माणिक हसून, हो ग कला. नक्की देणार तर. म्हणाली. तो दिवस किती छान गेला आपला असं वाटलं माणिकला.

मग बहुतेक स्नेहाने हे ग्रुपमध्ये सांगितलं असणार. तिच्या मैत्रिणीची पावभाजीची ऑर्डर आली. माणिक सुगरण तर होतीच. आणि सढळ हाताने भरपूर द्यायची सवय होती तिला. मैत्रिणीला पावभाजी खूप आवडली.

घरबसल्या माणिकला आता अशा छोट्या ऑर्डर यायला लागल्या.

माणिक अगदी रमून गेली या आवडीच्या कामात.

आणि पैसे खुळखुळू लागले हातात. ऑर्डर आली की कलाबाई मदतीला थांबायची. जास्त ऑर्डर असेल तर कलाची मुलगी यायची मदतीला. त्यांनाही पैसे मिळायला लागले.

आईचा खूप दिवसात फोन आला नाही म्हणून मंगेश जवळजवळ सहा महिन्यांनी घरी आला.

बघतो तर आई खुशीत पेपर वाचत आणि चहा पीत बसलेली.

य म्हणतोस मंगेश? ठीकचाललंय ना सगळं? घे रे चहा. माणिकने विचारलं. तिने मंगेशला विचारलेही नाही की सहा महिन्यांनी आईची आठवण झाली का?

मंगेश म्हणाला”, आई. रहायला येतेस का माझ्याकडे? देविकाला दिवस गेलेत. तिची आई जमणार नाही यायला म्हणाली. तू ये ना. ” देविकाला खूप त्रास होतोय.

माणिकने शांतपणे त्याच्याकडे बघितलं”. छे रे. मलाही अजिबात जमणार नाही यायला. बघितलंस ना, माझा केटरिंगचा व्याप आता खूप वाढलाय. मला उठून तुझ्याकडे यायला जमणार नाही.

फार तर मी डबा देऊ शकेन तुला. न्यावा मात्र लागेल तुला इथून”

चिडून मंगेश म्हणाला, कशाला ग असले भिकार स्वयंपाकीण बाईचे धंदे करतेस? शी. ऐकलं आहे मी लोकांकडून. तुझी आई केटरिंग करते असं.

बंद करून टाक हे सगळं. शोभत नाही माझ्या प्रतिष्ठेला. ”

माणिक आता मात्र संतापली. ”. हो का? कोणती तुझी प्रतिष्ठा? हे तू बोलत नाहीयेस मंगेश. देविका बोलतेय तुझ्या तोंडून. मूर्ख मुलगा. खुशाल एका दिवसात निघून गेलास मला सोडून, तेव्हा नाही लोक काय म्हणतील असं वाटलं रे तुला? तेव्हा लोकांनी कौतुकच केलं असेल ना तुझं.? एकट्या आईला सोडून निघून गेलात म्हणून… हे बघ. हे माझं आयुष्य आहे आणि ते कसं जगायचं ते मी ठरवणार.

तुमच्या गरजेला उभं रहायला नक्की आवडलं असतं मला. मला आनंदच आहे तुला मूल होणार म्हणून. पूर्वीची मी भाबडी माणिक असते तर धावत आलेहीअसते. पण आता मी बदलले. तू मला बदलायला भाग पाडलंस मंगेश… ज्या पद्धतीने तू वागलास ते मला नाही, कोणालाच आवडण्यासारखं नाही मंगेश.

देविकाचं सोड. , ती परकीच मुलगी आहे पण तू तर माझा पोटचा मुलगा आहेस ना? जराही वाईट वाटलं नाही का आईला एका दिवसात सोडूनजाताना? देविकाच्या माहेरी जाताना मिठाया घेऊन जाता आणि दिवाळीला आईच्या घरी यावंसं सुद्धा वाटलं नाही? असा काय गुन्हा केला मी?

… उलट आता मला मोकळीकच मिळाली असं वाटतं हल्ली. तुला काय आवडेल देविकाला काय वाटेल हा धाकच राहिला नाही आता. तुमचे डबे करा, भाज्या आणा, तुम्ही केलेले पसारे निमूट आवरा, हे कमी झालं एकदम. आता मी मस्त एकटी रहाते. माझ्या प्रिय मैत्रिणींबरोबर ट्रिप्स करते, फार्म हाऊसवर जाते. आता आम्ही परदेशी ट्रीपला जाणार आहोत. पटाया बँकॉकला. जे तुम्ही असताना मला जमलं नसतं कधी… ते जाऊदे.

… काय रे, इतक्या महिन्यात एकदा तरी बोलावलंत का मला? नवीन घर बघायला तरी? निदान जेवायला तरी? हे बघ… मला गोष्टी समजत नाहीत असं वाटलं का? तिच्या माहेरची माणसं खुशाल राहिलेली चालतात का? मग आता का येत नाहीये तिची आई लेकीच्या मदतीला?

… सॉरी मंगेश. मी येणार नाही. मला माहीत आहे, माझा तू एकुलता एक मुलगा आहेस. माझे हातपाय थकल्यावर तूच येशील मदतीला….. पण मला आता तोही भरवसा उरला नाही तुमचा.

बघू पुढचे पुढे. मी इतका विचारच करत नाही हल्ली. आहेत खूप वृद्धाश्रम. जाईन तिकडे. ”

… माणिकच्या डोळ्यात अश्रू आले.

… मंगेश मान खाली घालून निघून गेला.

 शांतपणे माणिकने डोळे पुसले आणि आलेली ऑर्डर पुरी करायला ती किचन मध्ये निघून गेली.

समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम भी चलो… हम भी चले… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘तुम भी चलो… हम भी चले…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

तुम भी चलो, हम भी चले ••• 

आज वर्ष झालं. तो एक धाडसी निर्णयच होता. थोडा वेगळा समजायला, पचायलाही. खर तर तारेवरची कसरतच होती सर्वांची. ते एक जगावेगळ आव्हानच होत. अगदी शिवधनुष्य पेलण्याएवढे कठीण.

खरच या निर्णयात निर्णय घेणारे आणि त्या निर्णयाला संमती देणारे, कोणा कोणाचे कौतुक करावे कळतच नाही. सर्वांचेच कौतुक.

यात एकच गोष्ट कॉमन होती ती म्हणजे सर्वांनी एकमेकांचा विचार केला, मुख्य म्हणजे मुलांचा विचार केला. शेवटी आई वडीलच ते. जेथे मुलांचा प्रश्न येतो तेथे सहज तडजोड करण जमत त्यांना. अनेक न पटणारे विचार सहज पटतात. आपला कम्फर्ट झोन सोडून या वयातही * adjust * करायला तयार होणे, म्हणजे कौतुकच आहे. नाही का?

आज देशमुखांकडे *celebration* आहे. अजय अनिता अनय खास अमेरिकेहून आले आहेत.

अनय खूप खुश आहे. दोन आजी, आजोबा सर्व एकत्र भेटले, म्हणून आनंदात आहे. दिवसभर दोन्ही आजींबरोबर *पाच तीन दोन* पत्त्यांचा खेळ सुरू आहे.

अजय अनिता बाबांबरोबर बसून घरात काही चेंन्जेस करण्यात बिझी आहेत.

उद्या सर्वांना अष्ट विनायक दर्शनाला जायचे आहे. त्याआधी काही काम उरकरायची आहेत.

हीच ती तारीख १ जानेवारी २०२३ 

माझ्या चांगली लक्षात आहे.

ताईचा फोन आला होता, आणि तिने अजय अनिताच्या प्रस्तावाबाबत सांगितले होते.

ताईने जे सांगितले होते, ते असे••• ती म्हणाली••••

आज सकाळी सकाळी अजयचा फोन आला.

फोन घेता घेता आत्ता अमेरिकेत किती वाजले असतील? हा हिशेब नेहमी प्रमाणेच मनातल्या मनात झाला.

अजय म्हणाला, ••••

आई!! बाबा आहेत ना. मग फोन स्पीकर वर टाक. तसेही आम्ही नेहमीच फोन स्पीकर वर टाकतोच. कारण मुलाचा, सूनेचा आणि त्याहून महत्वाचा म्हणजे नातवाचा आवाज ऐकायचा असतो. अर्धवट मराठी, इंग्रजी एक्सेंट मधील मराठी ऐकायचे असते. हा एनर्जी डोज मिळाला की आमचा दिवस मजेत जातो.

बरे असो,

मी म्हटलं, ••• काय रे काही विशेष? सर्व ठीक आहे ना.

अनिता म्हणाली, ••• 

आई बाबा!! सर्व ठीक आहे. एका महत्वाच्या विषयावर तुमच्या बरोबर बोलायचे आहे. मागच्या दोन महिन्यांपासून आम्ही विचार करतोय. आज विषय काढायचाच, अस ठरवलंय.

आता ही मुलं काय बोलणार आहेत?

आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघीतल.

बाबा म्हणाले, ••••

अग!! बोल बेटा. बिनधास्त सांगा / विचारा.

काय बोलायचे आहे?

अनिता म्हणाली, ••••

बाबा! माझ्या आईचा प्रश्न आहे हो. आता वर्ष झालं माझ्या बाबांना जाऊन, पण आई अजूनही सावरलेली नाही. अबोल स्वभावामुळे मैत्रीणी नाही. एकटेपणा जाणवतोय तिला. सारख काही तरी सुरूच असत. बरं! येथे यायला तयार नाही. आम्ही सारखं तेथे येऊ शकत नाही.

आम्हाला तुमच्या दोघांची, आईची काळजी असते. आमच्या समोर आमचा वर्तमान, भविष्य आणि तुम्ही सर्व, अशा तीन प्रकारच्या गोष्टी नेहमीच महत्वाच्या असतात. आमची जबाबदारीच आहे ती.

आज आम्ही पैसा भरपूर कमवतोय, पण तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. याचा खेद आहे.

अजय ही खूपदा अस्वस्थ होतो. पण आता या middle of the phase मध्ये काय धरावं?? आणि काय सोडावं?? कळत नाहिये.

खूप दिवसांपासून आमच्या मनात एक विचार येतोय, की तेथे म्हणजे भारतात एक मोठे घर घ्यावे. तेथे तुम्ही दोघे आणि माझी आई, तुम्ही सर्व एकत्र राहाल, तर आमची काळजी कमी होईल.

आम्ही तशी एक सोसायटी शोधली आहे, जेथे ज्येष्ठांच्या वयाप्रमाणे, गरजेप्रमाणे सर्व सोई उपलब्ध आहेत. Residential doctor आहे. इतर चांगल्या दवाखान्यां बरोबर त्यांचं टाय अप ही आहे. सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. ज्येष्ठांच्या अनेक activities पण तेथे आहेत.

तुम्ही दोघे *आनंदवन * ही सोसायटी बघून याल का??

आज आम्ही तुमच्या बरोबर हा विषय बोलतोय, उद्या परवा आई बरोबर बोलू. तुमच्या सर्वांचे मत महत्वाचे आहे. तुम्हाला आणि आईला पटलं तर तसं करता येईल. तुम्ही दोघांनी विचार करावा.

ताई भाऊजी विचारात मग्न झाले. ते मधून मधून अनिताच्या आईला भेटायला जातात. त्या एकट्याच असतात, म्हणून त्यांची काळजी सर्वांनाच असते. एकदा ताई अनिताला म्हणाली ही होती, •••

अग!! आम्ही सारखं जाऊ शकत नाही. तेंव्हा एखादा फ्लॅट येथेच आमच्या सोसायटीत तुझ्या आईसाठी घेतला तर बरे होईल.

आता एकदम एकत्र रहायचा प्रस्ताव??

आता किती तरी वर्षांपासून आम्ही दोघेच आहोत. खरं सांगू का?

कोणाकडे दोन दिवस राहणे किंवा कोणी दोन दिवस घरी रहायला आले, तरी सर्व रूटीन गडबड होत. केंव्हा एकदा आपल्या घरी जातो असं वाटतं.

आणि येथे तर नातं आहे. तेही नाजूक. दूर राहून विचार पूस करणं वेगळं पण एकत्र राहण. जमेल का? चोवीस तास एकत्र राहण सोपं नक्कीच नाही. कोणाबरोबर ही नाही. या वयात प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत सेट झालेली असते. ती बदलणे जमेल का?

हा प्रश्न मंगलाताईंनाही पडेलच. नाही का?

भाऊजी म्हणाले, •••

मुलांच्या दृष्टीने त्यांनी सुचवलेला निर्णय तसा बरोबर आहे. आता आपली काळजी त्यांना आहेच.

अग!! तू आजूबाजूला बघतेस ना, परिस्थिती कशी बिकट आहे ते?

आपली मुलं आपल्याला विचारतायेत. हे कमी आहे का? विचार करूया.

खरंय, ••••

*घरात जिवंत माणसाबरोबर नीट बोलायला मुलांना वेळ नसतो. आणि मेलेल्या माणसाला हलवून हलवून विचारतात तू बोलत का नाहीस म्हणून?? मेल्यानंतर दान धर्म पण भरपूर करतात. **

समाजातील हे एक कटू सत्य तर आहेच.

बरे असो,

बघूया मंगला ताई काय म्हणतात ते??

पूढच्याच आठवड्यात सर्वांची एकत्र video conference झाली. आपापसात चर्चा झाली. एकत्र राहण्याचे प्लस माइनस पोइंट डिस्कस झाले.

मुलांच्या दृष्टीने, त्यांच्या सोईसाठी, ताई भाऊजी, मंगलाताई सर्वांनी होकार दिला.

लगेचच येथे चार बेडरूम चां मोठा फ्लॅट घेतला. सर्व सोयी केल्या, स्वयंपाकाला मावशी, इतर कामांना मावशी, एका ड्रायव्हरची सोय झाली. सर्वांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. सर्व सुख सोयींनी सज्ज घर अजय अनिताने ताईच्या हातात दिले.

काही झालं तरी अनिताच्या आईकडे लक्ष देणे गरजेचे आहेच.

म्हणतात ना, •••

**Communicating is one thing but your tone and your way while communicating is everything. ** 

हे सर्व व्यवस्थित पार पडल‌, कारण अजय अनिताने योग्य पद्धतीने हा प्रश्न हाताळला. योग्य शब्दात सद्य परिस्थिती, प्रश्न व त्या प्रश्नाचे समाधान सांगीतले. परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वांच्या दृष्टीने हा निर्णय कसा बरोबर आहे, हे समजावून सांगितले.

तसंही म्हणतात ना, •••

Every one goes through bad days/difficult phase in life. Don’t give up. Pause, Rest, Rethink, Reset and Restart. Always choose the best option and move on.

It is your decision not condition which shape your life.

तसेही आपण सर्व नेहमीच तडजोड करत असतोच. घरी, बाहेर, नोकरीत सर्व ठिकाणी. त्याशिवाय आपण समाजात आनंदाने जगूच शकत नाही. आयुष्याचे गणित सोडवताना आपण असे बरेच निर्णय घेतो, ज्याचे side effects आपल्याला नंतर फेस करावेच लागतात.

आज उच्च शिक्षित अजय आपल्या बुद्धी, शिक्षणाच्या जोरावर अमेरिकेत नोकरी करातोय. जेंव्हा अजय अमेरिकेत गेला, तेंव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला होता ताईला. एका मध्यम वर्गीय कुटुंबासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तर त्याच आनंदाचा side effect ताई भाउजींना आज दिसतोय.

माझ्या म्हातारपणी माझी मुलं माझ्या जवळच असावी, हा विचार आपल्या स्वार्थासाठी कोणतेही आईवडील कधी करतील का‌??

भारतात नोकरी करणारी मुलं तरी नेहमीच आईवडिलांच्या सेवेला हजर असतात का? कसं शक्य आहे ते?

अशी अपेक्षा करणे बरोबर आहे का?

तेंव्हा आज अजय अनिताने आपल्या आईवडिलाना जो alternate option दिला तो सर्वांनी सहर्ष स्वीकार केला.

खूपदा *वेळ/ काळ / वय * आपली परीक्षा घेत असत.

आता पूढे काय? या प्रश्नाने आपल्यापैकी अनेकांचे आयुष्य, अनेक ज्येष्ठांचे जीवन चिंताग्रस्त करून ठेवले आहे.

मग हा निर्णय बरोबरच आहे.

अस म्हणता येईल का? निर्णय धाडसी आहे. पण सर्वांच्या प्रश्नाचे समाधान होत असेल तर काय हरकत आहे?

भाऊजी म्हणजे एक Balanced व्यक्तिमत्व सद्य परिस्थितीला ओळखून, दुसऱ्यांना समजून, समजावून योग्य निर्णय घेणार.

आज त्याच धाडसी निर्णयाचे *success Celebration* आहे.

*आत्मविश्वास *तडजोड * माझ्या बरोबर तुम्ही पण आनंदी रहाव. * 

*तुम भी चलो हम भी चले. चलती रहे जिंदगी।**

 हा विचार कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. समाधान शोधू शकतो.

This Positive approach/ attitude and confidence can solve any problem.

शेवटी असंच म्हणावस वाटत, •••

**ए वक्त तू कितना भी परेशान करले हमें, पर याद रख••• किसी मोड़ पे तुझे भी बदल देंगे हम। **

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक क्र. १ आणि २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक क्र. १ आणि २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’ – 

– – श्लोक पहिला 

मनाच्या श्लोकांतील पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. कोणत्याही महान कार्याचा प्रारंभ मंगलभावनेने होणे ही भारतीय परंपरा आहे. समर्थ रामदासांनीही मनाच्या या महाग्रंथाची सुरुवात गणेश व शारदा यांच्या वंदनाने केली आहे.

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा |

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |

नमू शारदा मूळ चत्वार वाचा |

गमू पंथ अनंत या राघवाचा ||

अर्थ : जो गणांचा अधिपती आहे, जो सर्व गुणांचा स्वामी आहे आणि निर्गुण परब्रह्माचा मुळारंभ आहे, अशा श्रीगणेशाला वंदन. तसेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणींचे मूलस्रोत असलेल्या देवी शारदेला नमस्कार करून आपण राघवाच्या—ईश्वराच्या—अनंत मार्गावर वाटचाल सुरू करूया.

कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी ईश्वरकृपेची आवश्यकता असते. म्हणूनच प्रत्येक शुभकार्याचा प्रारंभ श्रीगणेशाच्या मंगलस्तवनाने केला जातो. समर्थांनीही मनाच्या श्लोकांचा प्रारंभ श्रीगणेशाच्या नमनाने केला आहे. श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे—तो अडथळे दूर करतो, मार्ग सुकर करतो आणि साधकाचे रक्षण करतो.

समर्थ श्रीगणेशाला “सर्वा गुणांचा ईश” म्हणतात. येथे केवळ सत्त्व, रज, तम हे त्रिगुण अभिप्रेत नाहीत, तर चांगले–वाईट, त्याज्य–ग्राह्य असे सर्व गुण येतात. मुळात सृष्टीत कोणतीही गोष्ट स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते; तिचा उपयोग आपण कसा करतो, यावर तिचे स्वरूप ठरते. अग्नी स्वयंपाकासाठीही उपयोगी पडतो आणि जाळण्यासाठीही. शस्त्र एखाद्याला जखमी करू शकते, तसेच शस्त्रक्रियेतून प्राण वाचवूही शकते. दैनंदिन व्यवहारात त्याज्य मानले जाणारे विष अनेक रोगांमध्ये औषध ठरते. सृष्टीत शुद्ध तत्त्वच विराजमान आहे आणि त्या तत्त्वांचा अधिपती गणपती आहे.

गणेशवंदनेनंतर समर्थ विद्येची देवता असलेल्या शारदेचे—सरस्वतीचे—स्मरण करतात. “नमू” हा शब्द गणेश आणि शारदा या दोघांनाही उद्देशून आहे. दैनंदिन जीवनात असो वा अध्यात्ममार्गावर, प्रगतीसाठी ज्ञान अत्यावश्यक आहे; आणि ज्ञानाची अधिष्ठात्री देवता म्हणजे शारदा. तिच्या कृपेअभावी कोणतेही ज्ञान संपादन शक्य नाही.

शब्दाचे मूळ स्फुरण परा, त्याचा भावार्थ पश्यंती, त्याचा नाद मध्यमा आणि प्रत्यक्ष उच्चार वैखरी—या चारही वाणींचे मूलस्थान शारदा आहे. कोणत्याही वाङ्मयाची, विचारांची किंवा अभिव्यक्तीची निर्मिती तिच्याशिवाय शक्य नाही. म्हणूनच समर्थांनी या मनोपनिषदाच्या प्रारंभी शारदेला वंदन केले आहे. शारदाच आदिमाया, आदिशक्ती आहे.

या वंदनाचा हेतू स्पष्ट आहे—आपली ही वाटचाल निर्विघ्नपणे पार पडावी. आपल्याला ज्या मार्गावर चालायचे आहे, तो मार्ग म्हणजे श्रीरामांचा मार्ग. येथे श्रीराम म्हणजे केवळ दशरथपुत्र नव्हे, तर परमात्मस्वरूप. हा मार्ग अनंत आहे, न संपणारा आहे. या मार्गावर स्वयं भगवान शंकरही चालत आहेत; तेही अखंड रामनामाचा जप करत आहेत.

समर्थांचे दैवतच श्रीराम आहे. ते स्वतःला रामदास म्हणतात—रामाचे दास. श्रीराम जणू त्यांना प्रत्यक्ष समोर उभे दिसतात. म्हणूनच ते म्हणतात, “गमू पंथ अनंत या राघवाचा. ” या अनंत मार्गावर चालण्यासाठी समर्थ श्रीगणेश आणि शारदेचे आशीर्वाद मागतात—आणि ते आशीर्वाद आपल्यासाठीही आहेत.

आपणही भक्तिभावाने त्यांना वंदन करून, या राघवाच्या अनंत मार्गावर चालण्यासाठी सज्ज होऊ या.

आत्मचिंतनासाठी – – – 

  • कोणत्याही कार्याची सुरुवात करताना माझ्या मनात मंगलभाव आहे का, की केवळ घाई?
  • माझ्यातील गुणांचा उपयोग मी साधनेसाठी करतो की बंधनांसाठी?
  • शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यामागील भाव आणि अर्थ समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो का?
  • श्रीरामांचा “अनंत मार्ग” हा माझ्यासाठी बाहेरचा आहे की अंतर्मनातून सुरू होणारा?

– – –

– – श्लोक दुसरा

मना सज्जना भक्तीपंथेची जावे |

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे |

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे |

जनी वंद्य ते सर्वभावे करावे ||

अर्थ : हे सज्जन मना, तू भक्तीमार्गानेच वाटचाल कर. त्या मार्गावर चालल्यास तुला निश्चयाने परमेश्वराची प्राप्ती होईल. समाजासाठी घातक ठरणाऱ्या गोष्टींचा त्याग कर आणि समाजहिताची, कल्याणकारी कर्मे पूर्ण भावाने आचर.

या श्लोकात समर्थ रामदासांनी मनाला “सज्जन” असे संबोधले आहे, हे अत्यंत अर्थपूर्ण आहे. एखाद्याला सज्जन म्हटले, की त्याच्याकडून सज्जनासारखेच वर्तन अपेक्षित धरले जाते. कदाचित म्हणूनच समर्थांनी मनाला सज्जन म्हटले असावे—मनावर विश्वास ठेवत, पण त्याचबरोबर त्याला जबाबदारीची जाणीव करून देत.

मन स्वभावत: चंचल आहे. त्याच्या असंख्य वाटा आहेत. परंतु त्या सर्व वाटांमधून अंतिमतः हितकारक ठरणारी वाट म्हणजे भक्तीमार्ग—हे समर्थ येथे ठामपणे सांगतात.

ईश्वरप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग असे तीन मार्ग सांगितले जातात. त्यापैकी सर्वसामान्य माणसाला सहज आचरता येणारा, जीवनाशी सलग राहणारा आणि व्यवहारात उतरवता येणारा मार्ग म्हणजे भक्तीमार्ग. म्हणूनच सर्व संतांनी एकमुखाने भक्तीमार्गाचे महत्त्व प्रतिपादित केले आहे. समर्थही येथे तेच सांगतात—भक्तीमार्ग हा सरळ, सोपा आणि थेट ईश्वराकडे नेणारा आहे.

खरं तर जीव हे परमेश्वराचेच स्वरूप आहे; पण अज्ञानामुळे तो त्या परमेश्वरापासून दूर गेलेला असतो. जेव्हा जीव भक्तीमार्गावर चालू लागतो, तेव्हा ईश्वर त्याच्यासमोर उभा राहतो—ईश्वर संमुख होतो. आणि एकदा का ईश्वर संमुख झाला, की त्याच्या चरणांपर्यंतची वाटचाल आपोआप सुरू होते. म्हणूनच समर्थ येथे “भक्तीपंथ” हा शब्द वापरतात. हा केवळ विचारांचा नव्हे, तर प्रत्यक्ष चालण्याचा—आचरणाचा—मार्ग आहे.

या श्लोकातील तिसरी आणि चौथी ओळ विशेष अर्थपूर्ण आहे—

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे |

जनी वंद्य ते सर्वभावे करावे”

येथे ‘जनी’ म्हणजे केवळ सामान्य लोक असा अर्थ अभिप्रेत नाही. जनी म्हणजे समाजातील सज्जन, विचारवंत, ऋषितुल्य व्यक्ती—ज्यांच्या विवेकावर आणि आचरणावर समाज उभा राहतो. अशा सज्जनांना जी गोष्ट निंद्य वाटते, ती आपण टाळावी; आणि जी गोष्ट त्यांना वंद्य, म्हणजेच आदरणीय वाटते, ती पूर्ण भावाने आचरावी—हा या ओळींचा गाभा आहे.

आजच्या समाजजीवनात अनेक गोष्टी रूढ झालेल्या दिसतात. काही प्रथा, सवयी किंवा उत्सव साजरे करण्याच्या पद्धती काळानुसार बदलल्या आहेत. त्या सर्वच चुकीच्या आहेत असे नाही; पण त्या आपल्या संस्कृतीला, सामाजिक भानाला आणि संवेदनशीलतेला पूरक आहेत का, याचा विचार करणे आवश्यक आहे. लग्नसमारंभात आणि इतर वेळी डीजेचा वापर करणे, फटाके फोडणे, वाढदिवस प्रसंगी केक कापणे आणि दिवे विझवणे इ. सज्जन आणि विचारवंतांच्या दृष्टीने ज्या गोष्टी योग्य वाटतात, ज्या समाजात सुसंस्कार वाढवतात, अशाच गोष्टींचा अंगीकार करणे—आणि ज्यामुळे समाजात विकृती, उथळपणा किंवा अनावश्यक अतिरेक वाढतो, अशा गोष्टी टाळणे—हेच समर्थ येथे सूचित करतात.

आपण इतरांनी केले म्हणून काही करायचे नसते. ज्या गोष्टी इतरांनी केल्या तर आपल्याला अस्वस्थ वाटते, त्या आपणही करू नयेत. आणि ज्या कृतींमुळे इतरांच्या मनात आनंद, समाधान किंवा प्रेरणा निर्माण होते, अशा कृती आपण कराव्यात. आधी स्वतः आचरणात आणले, मग सांगितले—हेच खरे नैतिक बळ आहे.

परमेश्वरप्राप्तीसाठी समर्थ ज्या भक्तीमार्गाचा उपदेश करतात, त्या मार्गावर चालण्यासाठी मन आणि आचरण शुद्ध असणे अत्यावश्यक आहे. मन शुद्ध नसेल आणि आचरण स्वच्छ नसेल, तर भक्ती केवळ बाह्य स्वरूपाची राहते. म्हणूनच संतांनी आणि सज्जनांनी ज्या गोष्टी त्याज्य ठरवल्या आहेत त्या टाळणे, आणि ज्या गोष्टी आचरणात आणायला सांगितल्या आहेत त्यांचा स्वीकार करणे—हे भक्तीमार्गावरील यशस्वी वाटचालीचे खरे गमक आहे.

आत्मचिंतनासाठी – – 

समर्थ मला “सज्जन मना” म्हणतात—मी स्वतःकडून तशी अपेक्षा ठेवतो का?

.. माझ्या दैनंदिन जीवनात भक्ती ही केवळ भावना आहे, की आचरणाचा मार्ग?

.. सज्जनांना निंद्य वाटणाऱ्या कोणत्या गोष्टी मी अजूनही सवयीने करत आहे का?

.. माझ्या कृतींमुळे समाजात सुसंस्कार वाढतात की केवळ गोंधळ?

 – क्रमशः – श्लोक १ आणि २.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ती ‘आत्महत्या ‘ नव्हती – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ ती ‘आत्महत्या ‘ नव्हती – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

… ती ‘आत्महत्या ‘ नव्हती… तो तुमच्या-आमच्या घरातल्या ‘मोबाईल’ने केलेला ‘मर्डर’ होता!

धप्प… धप्प… धप्प!

रात्रीचे २:३० वाजले होते.

गाझियाबादच्या एका सोसायटीतल्या ९ व्या मजल्यावरून तीन कोवळे देह खाली कोसळले.

– आणि त्यानंतर… सगळं संपलं.

– खाली रक्ताचा सडा आणि वर फक्त एक भयानक, जीवघेणी शांतता.

– – त्या रिकाम्या झालेल्या घरातल्या बेडवर आता फक्त तीन बाहुल्या पडल्या आहेत… पण त्या बाहुल्यांशी खेळणाऱ्या त्या १६, १४ आणि १२ वर्षांच्या चिमुरड्या हातांनी मात्र कायमची exit घेतली.

त्यांनी का जीव दिला?

गरिबीमुळे? .. नाही.

त्रास होता म्हणून? .. नाही.

– – त्यांना मारलं तुमच्या-आमच्या घरातल्या एका लाडक्या ‘पाहुण्याने’… ज्याचं नाव आहे ‘मोबाईल’!

टीव्ही ९ मराठीची बातमी वाचली आणि डोकं सुन्न झालं.

– – पोलिसांनी जे सांगितलंय, ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल.

– त्या मुली ‘व्हर्च्युअल गेम’ च्या जाळ्यात अशा अडकल्या होत्या की, त्यांना वास्तवातले – रक्ताचे आई-बाबा ‘दुश्मन’ वाटू लागले होते.

– – पालकांनो, हा फक्त ‘गेम’ नाही, हा ‘डिजिटल मर्डर’ आहे!

तुम्हाला वाटतंय, “माझं पोरगं हा गेम खेळत नाही, मी सेफ आहे? “

– गैरसमज काढून टाका डोक्यातून! हा गेम तर फक्त एक निमित्त आहे.

– – तुमच्या मुलाच्या हातातला ‘इन्स्टा रील्स’, ‘स्नॅपचॅट’ आणि ‘फ्री फायर’ हे सुद्धा त्यापेक्षा कमी नाहीत.

तुमच्या घरातली मुलं ‘जिवंत’ आहेत की ‘झोम्बी’ झालीत? बघा हे ३ सीन ओळखीचे वाटतात का :: 

१. “आई, तू गप्प बस ना! ” (लाज वाटणे):

– – जरा बघा मुलांकडे…

– तुमच्या मुलाला आता आईच्या हातचं साधं ‘वरण-भात’ किंवा ‘पोळी-भाजी’ नकोशी वाटते… आणि बाहेरचं ‘पिझ्झा-बर्गर’ किंवा ‘चायनीज’ भारी वाटतं?

– त्याला सणावाराला भारतीय कपडे घालायची किंवा तुमच्यासोबत बाहेर यायची लाज वाटते?

… सावधान! ते मूल शरीराने तुमच्या घरात आहे, पण मनाने ‘परदेशात’ गुलाम झालंय. त्याला स्वतःच्या रक्ताचाच तिरस्कार वाटू लागलाय.

२. डोळ्यात जीव नाही (The Zombie Stare):

– – तुम्ही मुलाला हाक मारता… एकदा, दोनदा, तीनदा. पण ते मान वर करत नाही. त्याचे डोळे स्क्रीनवर असे चिकटलेले असतात की, जगात काय चाललंय याचं भान नसतं.

– ते बाळ तुमच्यासमोर बसलंय, पण ते तिथे नाहीच आहे!

– त्याची नजर जिवंत माणसासारखी नाही, तर एखाद्या ‘झोम्बी’ सारखी झालीय.

– हे बघून तुमचं काळीज तुटत नाही का?

३. जेवणाचं टेबल की ‘स्मशान शांतता’?

– – घरातला हा सीन बघा, डोळ्यात पाणी येईल:

ताटात जेवण वाढलेलं आहे. पण जोपर्यंत आई युट्यूबवर व्हिडिओ लावून मोबाईल हातात देत नाही, तोपर्यंत पोरगं अन्नाचा घासही गिळत नाही.

आई आपल्या जगात, पोरगं मोबाईलच्या जगात.

एकाच छताखाली राहून आपण एकमेकांसाठी ‘अदृश्य’ झालोय.

घरात वाय-फाय फुल्ल आहे, पण संवाद ‘झिरो’ आहे.

– – जबाबदार कोण?

त्या तीन निष्पाप मुली? अजिबात नाही.

– – जबाबदार आपण आहोत!

– आपण आपल्या कष्टाचा स्मार्ट फोन त्यांच्या हातात दिला, पण बोलायला ५ मिनिटं वेळ दिला नाही.

– आपण त्यांना ‘अनलिमिटेड डेटा’ दिला, पण संस्कार मात्र ‘लिमिटेड’ दिले.

– आपणच आपल्या हाताने त्यांच्या बालपणाचा ‘सौदा’ केलाय.

उद्याची बातमी आपल्या शहरातली नको असेल तर…

– जेवताना स्क्रीन बंद: नियम म्हणजे नियम. अन्नाचा मान राखा, नात्याचा मान राखा. घास भरवताना आईचा स्पर्श हवा, स्क्रीन नको.

– मातीशी जोडा: त्यांना सांगा की इन्स्टावरचं जग खोटं आहे. मैदानातला घाम आणि घरातली माणसं खरी आहेत.

– मित्र बना: मुलांच्या जगात ‘पोलीस’ म्हणून नाही, तर ‘मित्र’ म्हणून शिरकाव करा. “तुला यात काय आवडतं? मला पण शिकव, ” हे प्रेमाने विचारा.

गाझियाबादच्या त्या तीन चिमुकल्या जीवांनी स्वतःचा बळी देऊन आपल्याला एक धडा दिलाय.

आज रात्री एक गोष्ट नक्की करा: 

जेव्हा तुमची मुलं गाढ झोपली असतील, तेव्हा त्यांच्या खोलीत जा.

त्यांच्या कपाळावर हळूच हात ठेवा आणि बघा…

हे तेच डोकं आहे का ज्याला आपण मांडीवर घेऊन थोपटायचो? की हे डोकं आता कोण्या ‘गेम’ने हायजॅक केलंय?

… त्यांना जवळ घ्या. त्यांना तुमची गरज आहे… मोबाईलची नाही.

वेळ जाण्याआधी सावध व्हा… 

ही पोस्ट आताच Save (Collection) मध्ये टाकून ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मुलांचं मोबाईलचं वेड हाताबाहेर जातंय, तेव्हा हे पुन्हा वाचा. तुम्हाला ‘नाही’ म्हणायची ताकद मिळेल.

एक कळकळीची विनंती: ही पोस्ट फक्त वाचू नका. तुमच्या वॉलवर फॉरवर्ड करा किंवा तुमच्या जोडीदाराला (नवरा/बायको) खाली टॅग करा. एका शेअरमुळे एखाद्या घरातला हरवलेला संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो.

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Empathy… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ Empathy… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

एका दुकानदाराने आपल्या दुकानाच्या बाहेर पाटी लावली होती –

“कुत्र्याची पिल्ले विकणे आहेत. “

लहान मुलांना अशा पाट्या लगेच आकर्षित करतात.

थोड्याच वेळात एक लहान मुलगा दुकानात आला आणि विचारले,

“काका, या पिल्लांची किंमत काय आहे…? “

दुकानदार म्हणाला,

“बाळा, ही पिल्ले खूप चांगल्या जातीची आहेत. साधारण ३००० ते ५००० रुपयांपर्यंत आहेत. “

त्या लहान मुलाने खिशात हात घातला,

काही चिल्लर नाणी बाहेर काढली आणि मोजली.

तो हिरमुसला होऊन म्हणाला,

“काका, माझ्याकडे फक्त ५० रुपये आहेत. पण… पण मी फक्त ती पिल्ले बघू शकतो का…? “

दुकानदार हसला आणि त्याने शीळ घातली.

दुकानाच्या आतल्या खोलीतून एक कुत्री बाहेर आली आणि तिच्या मागे पाच गोंडस,

कापसाच्या गोळ्यासारखी पिल्ले धावत बाहेर आली.

ती पिल्ले एकमेकांशी खेळत होती,

उड्या मारत होती.

पण…

त्या मुलाचे लक्ष त्या धावणाऱ्या पाच पिल्लांकडे नव्हते.

त्याचे लक्ष मागे हळूहळू,

लंगडत चालत येणाऱ्या सहाव्या पिल्लाकडे गेले.

ते पिल्लू इतर पिल्लांच्या वेगाने धावू शकत नव्हते,

ते फरफटत चालले होते.

मुलाने उत्साहाने विचारले,

“काका, त्या छोट्या पिल्लाला काय झालंय…?

ते का लंगडतंय…? “

दुकानदार म्हणाला,

 “अरे, ते जन्मतःच तसं आहे.

डॉक्टरांनी सांगितलंय की त्याच्या पायाचं हाड नीट नाहीये.

ते कधीच नीट चालू शकणार नाही.

ते आयुष्यभर असंच लंगडत राहणार. “

 

हे ऐकून तो मुलगा आनंदाने ओरडला,

“काका, मला तेच पिल्लू हवंय…!

मी तेच विकत घेणार…! “

दुकानदार आश्चर्यचकित झाला.

तो म्हणाला,

“बाळा, तू वेडा झाला आहेस का…?

जर तुला तेच पिल्लू हवं असेल,

तर मी तुला ते फुकट देईन.

कारण त्या लंगड्या पिल्लाची काहीच किंमत नाही.

ते कोणालाच नको असतं. “

हे ऐकताच तो लहान मुलगा एकदम शांत झाला.

त्याचा चेहरा रागाने लाल झाला.

त्याने दुकानदाराच्या डोळ्यात बघून बोट दाखवत ठामपणे सांगितले,

“तुम्ही मला ते पिल्लू फुकट देऊ नका.

त्या पिल्लाची किंमत तितकीच आहे,

जेवढी त्या इतर चांगल्या पिल्लांची आहे.

आणि मी तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे देईन.

आता ५० रुपये घ्या,

आणि उरलेले पैसे मी तुम्हाला रोज थोडे-थोडे जमा करून आणून देईन. “

दुकानदार म्हणाला,

“पण बाळा, तुला हेच लंगडं पिल्लू का हवंय…?

ते तुझ्यासोबत धावू शकणार नाही,

खेळू शकणार नाही… “

 

त्यावर त्या मुलाने काहीच उत्तर दिले नाही.

त्याने फक्त हळूच आपली पॅन्ट वर केली.

त्याचा एक पाय पूर्णपणे वाकडा होता आणि त्याला ‘स्टीलचा सपोर्ट’ (कॅलिपर) लावलेला होता.

त्याला स्वतःलाही नीट चालता येत नव्हते.

 

मुलाने मान वर केली आणि दुकानदाराला म्हणाला,

“काका, मलासुद्धा कुठे नीट धावता येतं…?

आणि त्या पिल्लाला अशा कोणाची तरी गरज आहे…

जो त्याची वेदना समजून घेईल…! “

दुकानदार निःशब्द झाला.

त्याच्या डोळ्यात पाणी आले.

त्याने काउंटरवरून उतरून त्या मुलाला मिठी मारली.

जगाला अशा लोकांची गरज नाही, जे एकमेकांची ‘लायकी’ किंवा ‘किंमत’ ठरवतात.

जगाला अशा लोकांची गरज आहे,

जे दुसऱ्याचं दुःख स्वतःचं समजून स्वीकारतात.

सहानुभूती (Empathy) ही सर्वात मोठी शक्ती आहे.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “फिनिक्स” – लेखिका – सौ. गौरी गाडेकर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

“फिनिक्स” – लेखिका – सौ. गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

पुस्तक : फिनिक्स

लेखिका – गौरी गाडेकर

प्रकाशक – नीता बुक एजन्सी

पृष्ठे –२२२ 

मूल्य – ४०० रु.

सौ. गौरी गाडेकर

गौरी गाडेकर या एक प्रथितयश कथालेखिका आहेत. त्यांचा कथालेख संख्यात्मकदृष्ट्या जसा चढता वाढता आहे, तसाच तो गुणात्मकदृष्टयाही चढता वाढता आहे. मोजकंच परंतु दर्जेदार कथालेखन त्यांनी केलं आहे.

त्यांच्या कथा प्रामुख्याने घटनाप्रधान आहेत आणि बहुसंख्य कथा मध्यवर्गीय जीवनावर आधारलेल्या आहेत, पण

त्या साचेबंद नाहीत. एक वेगळं अनुभविश्व, वेगळा आशय आणि व्यक्तिरेखांचं वेगळेपण त्यांच्या कथांमधून आपल्याला दिसतं. त्यांच्या नातं या अगदी पहिल्या संग्रहापासून त्यांच्या कथांचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. त्यांच्या कथा आधी मासिकात प्रकाशित झाल्या आणि नंतर पुस्तक रूपाने वाचकांच्या भेटीला आल्या. नातं,

आऊटसायडर, सहज व इतर; तिसरं पुस्तक, हनिमून आजी आजोबांचा आणि यानंतर प्रसिद्ध झालेलं पुस्तक म्हणजे फिनिक्स. या शिवाय वादळातील दीपस्तंभ, मृत्यूवर मात, लिंकन ऑन लीडरशिपही ही त्यांची अनुवादित पुस्तके आहेत.

इथे मी विचार करणार आहे, तो ‘फिनिक्स’ या कथासंग्रहाचा. ‘फिनिक्स’ हे मिथक आहे. आपल्याच राखेतून ‘फिनिक्स’ पक्षी पुन्हा भरारी घेतो, असा लोकसमज आहे. इथे हे रूपकही आहे. जीवनातील निराशा, वैफल्य, औदासिन्य यांची राख बाजूला सारून पुन्हा उभारी घेणं, जीवनेच्छा बलवती होणं, आशा, उमेद वर्धिष्णू होणं, हेही ‘फिनिक्स’ पक्षाने राखेतून भरारी घेण्यासारखं आहे, नाही का? संग्रहातील काही कथांमध्ये असे दिसते.

संग्रहातील पहिलीच कथा ‘फिनिक्स’. त्यावरूनच संग्रहाचे नाव दिले गेले आहे,

‘फिनिक्स’. लेखिकेने, बर्‍याच दिवसांपूर्वी ‘फिनिक्स’ नावाची कविता लिहिली होती. नामसाम्यामुळे ती कविता, लेखिकेने सुरूवातीला दिली आहे. अतिशय सुरेख पण दुर्बोध अशी ही कविता आहे. विविध रगांच्या विविध स्वभावाच्या, विविध वर्तनाच्या व्यक्तिमत्वांनी त्यांचं कथाविश्व गजबजलेलं आहे.

यातील पहिलीच कथा ‘फिनिक्स ‘ अभय तिचा नायक. शाळेत यशस्वी नावाचा मुलगा त्याच्या वर्गात येतो आणि नाटकात अभयची राजा होण्याची संधी हुकते. टिपटॉप रहाणारा यशस्वी. अभ्यासात पुढे. परीक्षेत जास्त मार्क.

तो कधी मुद्दाम अभयला त्रास देत नाही. पण त्याच्या अस्तित्वाचं दडपण अभयवर येते. त्याचा आत्मविश्वास हरवतो. त्याच्यात न्यूनगंड निर्माण होतो. त्यात पुढे दोन वेळा त्याचं लग्नं मोडतं. इंद्राणीशी साखरपुडा होतो. ती तो मोडून चार दिवसात यशस्वीशी लग्न करते. मग अभय लग्नच करत नाही. बँकेत नोकरीला लागतो. बँकेत

कॉम्प्युटर येणार, कळल्यावर आपल्याला जमणार नाही, म्हणून व्ही. आर. एस. घेतो. त्याच्या चुलत बहिणीच्या सांगण्यावरून एका निवांत गावच्या एका रिझॉर्टमध्ये तो येतो. तिथलं शांत, निवांत वातावरण त्याला आवडतं. एकदा फिरून येताना तो तिथल्या एका वृद्धाश्रमाजवळ येतो. तिथे त्याला यशस्वी आणि त्याचा मुलगा भांडत

सलेले दिसतात. त्याची बायको नुकतीच पाच-सात दिवसांपूर्वी गेलेली असते. मुलगा त्याचं रहातं घर विकून टाकतो. त्याला वृद्धाश्रमात राहायचं नाहीये, पण मुलगा सक्ती करतोय. अभयच्या लक्षात येतं, ‘बायको गेली. मुलगा, सून, नात असूनही तो एकटा आहे. ना राहायला हक्काचे घर, ना स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. अभयला वाटतं, यशस्वी हरला, आपण जिंकलो. ही जाणीव त्याला आंतरिक उभारी देते. परतताना त्याला कॉम्प्युटर इंस्टिट्यूट लागते आणि त्याला वाटतं, आत जाऊन बघूयात तरी. ज्या कॉम्प्युटरच्या धास्तीने त्याने बँकेतील नोकरी सोडलेली असते, ती गोष्ट त्याला करून बघविशी वाटते. इथे त्याच्या मनाने उभारी घेतलेली असते, गेलेला आत्मविश्वास परत येतो, म्हणून कथेचं नाव ‘फिनिक्स’.

‘हक्काचे घर’ ही कथासुद्धा कथानायकाने प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या भरारीने ‘फिनिक्स’च्या कल्पनेशी जवळीक जोडते. प्रमोद त्याचा दादा आणि वाहिनी चाळीतल्या एका खोलीत रहात असतात. फ्लॅटमध्ये राहायचे वाहिनीचे स्वप्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ते काही शक्य नाही. तेव्हा वाहिनी ठरवते, जो फ्लॅट देईल,

त्याच्या मुलीशीच दिराचे लग्न करायचे. अर्थात प्रमोदला हे मान्य नाही. गावची मुलगी सांगून येते, तेव्हा, तो पळून जाऊन तिच्याशी लग्न करतो. तिथे सासरच्या घरी दोन खोल्या भाड्याने घेऊन रहातो. सासर्‍याच्या दुकानात काम करतो. गावच्या लोकांचा गरजेच्या वेगवेगळ्या वस्तू दुकानात ठेवतो. दुकानाची भरभराट त्याच्यामुळे होते. पुढे तो स्वत:चे स्वतंत्र दुकान काढतो. संधी मिळताच एक जुना बंगला विकत घेतो. त्याला थोडी डागडुजी, रंगारंगोटी करतो. बंगला नवा होतो. वास्तुशांतीला दादा- वहिनींना आणतो. सहा खोल्यांचा बंगला पाहून दोघेही खुश होतात. थाटात वास्तुशांत होते. दादा आजारी असतो. रात्री तो जातो. बंगल्यात राहण्याचे नाही, पण स्वत:च्या हक्काच्या घरात मरण्याचे त्याचे स्वप्न पुरे होते. प्रमोद म्हणतो, ‘डोक्यावर छप्पर मिळालं, पण नियतीने डोक्यावरचं छत्रच काढून घेतलं. ’

विविध प्रकारच्या आणि नमुन्याच्या व्यक्ती या संग्रहात आपल्याला भेटतात. सासूच्या (कुसुमच्या) कथा आपल्या नावावर देणारी सून (प्रिया) इथे आहे. (गुपीत) तुझा खोटेपणा मी जगासमोर आणीन, असं कुसुम म्हणताच ती उपहासाने म्हणते, ‘कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर? मी सांगीन माझंच हस्तलिखित यांनी चोरलं. ’ मी आता कथा लिहिणारच नाही, असं कुसुम म्हणते, तेव्हा प्रिया उद्दामपणे म्हणते, जोपर्यंत तुम्ही माझ्या उपयोगाच्या असाल, तोपर्यंतच इथे मुलाजवळ, नातींजवळ राहू शकाल, नाही तर तुमची गावी रवानगी होईल. शेवटी कुसुमला नावापेक्षा, मुला-नातींचा सहवास महत्वाचा वाटतो आणि ती म्हणते, ‘हे गुपीत गुपीत ठेवण्यातच सगळ्यांचं हित आहे.’

कुणाच्या खांद्यावर’ मधील नायिका ज्योती आपल्या प्रियकराच्या मुलांचं सांभाळ करायचं ओझं आपल्या खांद्यावर घेते. त्यांची आई होऊन त्यांना वाढवते. मोठं करते. प्रकाश आणि ज्योती लग्न करणार असतात, पण त्याची अम्मी आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रकाशचं लग्न, गावातल्या चित्राशी करतात. पुढे त्यांना दोन मुले होतात. एका अपघातात प्रकाश आणि चित्रा दगावतात. मग प्रकाशची आई ज्योतीला बोलावते. तिच्यावर अन्याय झाला म्हणून तिची क्षमा मागते आणि प्रकाशच्या मुलांना सांभाळ म्हणून सांगते. अन्यथा आपल्याला या वयात ही जबाबदारी पेलणार नाही. मुलांना अनाथाश्रमात ठेवावं लागेल, असं म्हणते. आपल्या प्रकाशची मुले अनाथाश्रमात

वाढणार, हा विचार ज्योतीला सहन होत नाही आणि ती मुलांची आई होते. दीपिकाचे लग्न होते. नीरव प्रणालीशी लग्न ठरवतो. मग ती प्रणालीला सगळी हकिकत सांगते. प्रणालीही सासूसारखी जगावेगळीच. ती नीरवला सुचवते, ‘त्यांच्यावर असलेली तुमची जबाबदारी आता संपलीय, आता तरी त्यांना स्वत:चं आयुष्य जगू दे. आपण त्यांच्यासाठी योग्य जोडिदार शोधू या. ’

‘सेवाव्रती’ ही आल्हाद आणि प्रसाद या भावांची गोष्ट. प्रसाद आदिवासींसाठी कार्य करतोय. त्याला ‘सेवाव्रती’ पुरस्कार मिळालाय, पण खरा ‘सेवाव्रती’ आल्हाद्च कसा आहे, हे लेखिकेने कथेत रंगवलय. कथेच्या शेवटी आल्हादच्या सोडून गेलेल्या बायकोचा अपर्णाचा फोन येतो, ती म्हणते, ‘ प्रसादला पुरस्कार मिळाला… आनंद झाला. पण मला वाटतं, सेवाव्रती… खरे सेवाव्रती तुम्ही आहात. खूप चांगले आहात तुम्ही… सामान्य माणसांना पेलवणार नाही, एवढे चांगले… म्हणूनच मलाही… ’

लोळा-गोळा झालेल्या मुलाला त्याचे कपडे काढून, उन्हात-पावसात त्याला सार्वजनिक ठिकाणी झोपवून स्वत: निवांत सावलीत बसणारा, त्याच्या जिवावर पैसे गोळा करणारा स्वार्थी बाप इथे आहे. (गोळा). कडक शिस्तीची, कर्तव्य कठोर, तत्ववेत्ती प्राध्यापिका इथे आहे. एका क्षणी तिला जाणीव होते, ‘आपण ज्याला विजय समजत

होतो, ती प्रत्यक्षात शिक्षा होती एकांतवासाची. नातलगांपासून दूर, भाव-भावनांच्या, प्रेमस्नेहाच्या खिडक्या नसलेल्या एका अंधार कोठडीत कैद होतो आपण’ ही जाणीव तिला होते. आपल्या नातवाचंही भविष्य असं घडू नये, या विचाराने ती बदलते.

‘स्त्रीणाम् भाग्यम्’ मध्ये आरतीच्या दोन मैत्रिणींच्या कथा आहेत. दोघींचा जीवन प्रवास परस्पर विरुद्ध दिशेने होतो. दोघी तिच्या चौथीच्या वर्गातल्या मैत्रिणी.. तज्ज्ञा देखणी, हुशार,, टिपटॉप रहाणारी, श्रीमंत. तर सुभद्रा गरीब. बावळट, आजागळ. तज्ज्ञाला बारावीत मार्क कमी मिळतात. ती डॉक्टर होण्याचे वडलांचे स्वप्न भंग होते.

मग ती तिला सहानुभूती दाखवणार्‍या मुलाशी लग्न करते. तेव्हा गरिबी तिच्या गळ्यात माळ घालते. आरतीला ती अनेक वर्षांनी भेटते, तेव्हा ती अगदीच बावळट, आजागळ अशी दिसते. याउलट वर्गात बावळट, आजागळ दिसणारी सुभद्रा, संधी मिळताच फिनिक्सप्रमाणे भरारी घेते. आपलं व्यक्तिमत्व सुधारते. शिकते. पुढे चटपटीत

एअर होस्टेस होते. दोघींचा दोन दिशांना होणारा प्रवास लेखिकेने छान रंगवलाय.

पत्नी अपघातात गेल्यानांतर, तिच्या डायर्‍या वाचल्यावर आपण तिच्या मनाचा, इच्छांचा विचार केला नाही, तिला सतत गृहीत धरले, यामुळे पश्चत्तापदग्ध झालेला पती ‘तू बोललीच नाहीस’मधे भेटतो, तर ‘एकुलती’ मध्ये सतत स्वत:च्या मनाप्रमाणे वागणारी केतकी किरकोळ कारणावरून कार्तिकला घटस्फोट द्यायचं ठरवते, अन

वडलांच्या आजारपणात कार्तिकने केलेली धावपळ, त्यांची सेवा-सुश्रुषा यामुळे तिचं मतपरिवर्तन होतं.

– – अशा अनेक विविध रंगांच्या, स्वभावाच्या, विविध वर्तन करणार्‍या व्यक्ती यातील कथांमधून भेटतात.

कथासंग्रहातील कथांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की यातील संवाद चटपटीत आहेत. हे संवाद आणि घटना-प्रसंगांचं यथार्थ वर्णन, यामुळे त्या त्या व्यक्ती आणि ते ते प्रसंग साक्षात डोळ्यापुढे उभे रहातात.

पुस्तक अतिशय वाचनीय आहे. सर्वांनी वाचून यातील कथांचा आनंद घ्यावा.

परिचय : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #३१० ☆ मैं शब्द : तुम अर्थ… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख मैं शब्द : तुम अर्थ। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # ३१० ☆

☆ मैं शब्द : तुम अर्थ… ☆

एक नन्ही सी परिभाषा है, जीवन साथी की ‘मैं शब्द तुम अर्थ/ तुम बिन मैं व्यर्थ,’परंतु आधुनिक युग में यह कल्पनातीत है। आजकल तो जीवन- साथी की परिभाषा ही बदल गई है…’जब तक आप एक-दूसरे की आकांक्षाओं पर खरा उतर सकें; भावनात्मक संबंध बने रहें व मौज-मस्ती से रह सकें’ उचित है, अन्यथा संबंध-निर्वहन की आवश्यकता नहीं, क्योंकि जीवन खुशी व आनंद से जीने का नाम है; ज़िन्दगी को ढोने अथवा तिल-तिल कर मरने का नाम नहीं। सो! इस परिस्थिति में तुरंत संबंध-विच्छेद के लिए कदम बढ़ाना ही बेहतर है, सार्थक व सर्वश्रेष्ठ विकल्प है, क्योंकि आजकल ‘तू नहीं और सही’ का सर्वाधिक प्रचलन है।

प्राचीन काल में विवाह को पति-पत्नी का सात जन्मों तक चलने वाला संबंध स्वीकारा जाता था। परंतु आजकल इसके मायने ही नहीं रहे। वैसे तो आधुनिक युग में युवा-पीढ़ी विवाह रूपी संस्था को नकार कर, ‘लिव-इन’ में रहना अधिक पसंद करती है। जब तक मन चाहे साथ रहो और जब मन भर जाए; अलग हो जाओ। आजकल लोग भरपूर ज़िंदगी जीने में विश्वास रखते हैं। ‘खाओ पीओ, मौज उड़ाओ’ उनके जीवन का मूलमंत्र है। चारवॉक दर्शन में उनकी आस्था है और वे प्रतिबंधों में जीना पसंद नहीं करते।

शब्द ब्रह्म है; सृष्टि का सार है। शब्द और अर्थ का शाश्वत व चिरंतन संबंध है, क्योंकि शब्द में ही उसका अर्थ निहित होता है। ‘मैं शब्द, तुम अर्थ/ तुम बिन मैं व्यर्थ’ का जीवन में विशेष महत्व है। जिस प्रकार शब्द को अर्थ से अलग नहीं किया जा सकता; उसी प्रकार प्राचीन काल में पति-पत्नी को भी एक-दूसरे से अलग करने की कल्पना बेमानी थी, जिसका प्रमाण पत्नी का पति के साथ चिता के समय जौहर के रूप में देखा जा सकता था। परंतु समय के साथ सती-प्रथा का अंत हुआ, क्योंकि पत्नी को ज़िंदा जला देने को सामाजिक बुराई अर्थात् अपराध के रूप में स्वीकारा गया।

परंतु समय ने तेज़ी से करवट ली और संबंधों के रूपाकार में अप्रत्याशित परिवर्तन हुआ; लोग संबंधों को वस्त्रों की भांति बदलने लगे। वे अनचाहे संबंध-निर्वाह को कैंसर के रोग की भांति स्वीकारने लगे। जिस प्रकार एक अंग के कैंसर-पीड़ित होने पर, उस अंग को शरीर से निकाल कर बाहर फेंक दिया जाता है, ताकि उसका विष पूरे शरीर को दूषित न कर दे। उसी प्रकार यदि जीवन-साथी से विचार-वैषम्य हो, तो उसे जीवन से अलग कर देने को ही कारग़र उपाय समझा जाता है। यदि अपने शरीक़े-हयात से संबंध अच्छे नहीं हैं, तो उन संबंधों को ज़बरदस्ती निभाने का क्या औचित्य है? तुरंत संबंध-विच्छेद ही उसका सर्वोत्तम उपाय है; इसका प्रत्यक्ष प्रमाण है… तलाक़ की संख्या में निरंतर इज़ाफा होना। पहले पति-पत्नी एक-दूसरे के बिना जीवन की कल्पना नहीं कर सकते थे। एक के अभाव में अर्थात् न रहने पर दूसरे को अपना जीवन निष्प्रयोजन अथवा निष्फल लगता था, क्योंकि वे एक-दूसरे की ज़रूरत बन चुके होते थे। परंंतु आजकल यदि पति-पत्नी में विचार-वैषम्य होता है; वे तुरंत अलग हो जाने को श्रेष्ठ उपाय स्वीकारते हैं।

आधुनिक युग में अहंनिष्ठ मानव आत्मविश्लेषण करना अर्थात् अपने अंतर्मन में झांकना व गुण-दोषों का विश्लेषण करना ही नहीं चाहता; उससे स्वीकारने की उम्मीद रखना, तो बहुत दूर की बात है। उसके हृदय में यह बात घर कर जाती है कि वह तो कदापि कोई ग़लती कर ही नहीं सकता, क्योंकि वह तो गुणों की खान है। सारे दोष तो दूसरे व्यक्ति अर्थात् सामने वाले में हैं। इसलिए वह स्वयं में नहीं, प्रतिपक्ष को अपने भीतर सुधार लाने की आवश्यकता पर बल देता है। यदि वह समर्पण कर देता है, तो समस्या स्वतः समाप्त हो जाती है। यदि पत्नी, पति के अनुकूल आचरण करने लगती है; कठपुतली की भांति उसके इशारों पर नाचने लगती है, तो दाम्पत्य संबंध सुचारू रूप से क़ायम रह सकता है, अन्यथा अंजाम आपके समक्ष है।

ज़िंदगी एक फिल्म की तरह है, जिसमें इंटरवल अर्थात् मध्यांतर नहीं होता; पता नहीं कब एंड अर्थात् समाप्त हो जाए। आजकल संबंध भी ऐसे ही हैं… कौन जानता है, कब अलगाव की स्थिति उत्पन्न हो जाए। मुझे स्मरण हो रही है ऐसी ही एक घटना, जब विवाहोपरांत चंद घंटों में पति-पत्नी में संबंध-विच्छेद हो गया और पत्नी अपना ससुराल छोड़कर मायके चली गई। यदि आप कारण के बारे में जानेंगे, तो अचंभित रह जाएंगे। प्रथम रात्रि को बार-बार फोन आने पर, पति का पत्नी से यह कहना कि ‘बहुत फोन आते हैं तुम्हारे’ और पत्नी का इसी बात पर तुनक कर पति से झगड़ा करना; उस पर संकीर्ण मानसिकता का आरोप लगा, सदैव के लिए उसे छोड़कर चले जाना … हृदय को उद्वेलित कर सोचने को विवश करता है, ‘क्या वास्तव में संबंध कांच की भांति नाज़ुक नहीं हैं, जो ज़रा-सी ठोकर लगते दरक़ जाते हैं?’ परंतु यहां तो निर्दोष पति को अपना पक्ष रखने का अवसर भी प्रदान नहीं किया गया। बरसों से महिलाएं भी यह सब सहन कर रही थीं। उन्हें कहां प्राप्त है…अपना पक्ष रखने का अधिकार? पत्नी को तो किसी भी पल जीवन से बेदखल करने का अधिकार पति को प्राप्त था। महात्मा बुद्ध का यह कथन कि ‘संसार में जैसा व्यवहार आप दूसरों के साथ करते हैं, वही लौट कर आपके पास आता है।’ इसलिए सबसे सदैव अच्छा, उत्तम व शालीन व्यवहार कीजिए।

सो! आधुनिक युग में संविधान द्वारा महिलाओं को समानाधिकार प्राप्त हुए हैं, जो कागज़ की फाइलों में बंद हैं। परंतु कुछ महिलाएं इनका दुरुपयोग कर रही हैं, जिसका अनुमान आप तलाक़ के बढ़ते प्रचलन को देखकर लगा सकते हैं। आजकल ज़िंदगी लघु फिल्मों की भांति होकर रह गयी है, जो सीधे चरम सीमा पर पहुंचती हैं; जहां समझौते अथवा विकल्प की लेशमात्र भी संभावना नहीं होती।

कुछ लोग किस्मत की तरह होते हैं, जो दुआ से मिलते हैं और कुछ लोग दुआ की तरह होते हैं, जो किस्मत ही बदल देते हैं। इसलिए अच्छे दोस्तों को संभाल कर रखना चाहिए। वे आपकी अनुपस्थिति में भी आपके पक्षधर होते हैं तथा सदैव ढाल बनकर खड़े रहते हैं। वे आप पर विश्वास करते हैं; कभी आपकी निंदा नहीं करते और न ही आपके विरुद्ध आक्षेप सुनते हैं, क्योंकि वे केवल आंखिन-देखी पर विश्वास करते हैं, कानों-सुनी पर नहीं।

चाणक्य का यह कथन ‘ रिश्ते तोड़ने नहीं चाहिएं, परंतु जहां खबर न हो; निभाने भी नहीं चाहिएं ‘ बहुत सार्थक संदेश देता है। वे संबंध- निर्वहन पर बल देते हुए कहते हैं कि संबंध- विच्छेद कारग़र नहीं है। परंतु जहां संबंधों की अहमियत व स्वीकार्यता ही न हो; उन्हें ढोने का क्या लाभ…उनसे मुक्ति पाना ही हितकर है, श्रेयस्कर है। जहां ‘ताल्लुक़ बोझ बन जाए, तो उसको तोड़ना अच्छा,’ क्योंकि वह आपको मानसिक रूप से तो विचलित करता ही है;  आकस्मिक आपदा में भी डाल सकता है। वैसे भी आजकल सहनशीलता तो मानव जीवन से नदारद है। कोई भी दूसरे की भावनाओं को अहमियत नहीं देना चाहता; केवल स्वयं को सर्वश्रेष्ठ व सर्वोत्तम समझता है। सो! समन्वय व सामंजस्यता की कल्पना भी कैसे की जा सकती है? जहां समझौता नहीं होगा; वहां साहचर्य व संबंध-निर्वहन कैसे संभव है? आजकल हमारा विश्वास भगवान पर रहा ही नहीं। ‘यदि भरोसा प्रभु पर है, तो जो तक़दीर में लिखा है– वही पाओगे। यदि भरोसा ख़ुद पर है, तो वही पाओगे, जो चाहोगे।’ आजकल मानव स्वयं को भगवान से भी बड़ा समझता है तथा मनचाहा पाना चाहता है। इसलिए वह ‘तू नहीं, और सही’ में विश्वास कर आगे बढ़ता जाता है और जीवन में एक पल भी सुक़ून से नहीं गुज़ार पाता। सो! उसे सदैव घोर निराशा का सामना करना पड़ता है।

असंतोष अथवा और अधिक पाने की चाहना व लालसा अहंनिष्ठ व्यक्ति के जीवन की पूंजी बन जाती है और भौतिक संपदा प्राप्त करना उसके जीवन का एकमात्र प्रयोजन। धन से मानव सुख- सुविधाएं खरीद सकता है, जो केवल क्षणिक सुख प्रदान करती हैं। भले ही उस स्थिति में सब उसकी वाहवाही करते हैं, परंतु वह आंतरिक सुख-शांति व सुक़ून से कोसों दूर रहता है। इसलिए मानव को शाश्वत संबंध-निर्वाह करने की शिक्षा दी गई है। अरस्तु के शब्दों में ‘श्रेष्ठ व्यक्ति वही बन सकता है, जो दु:ख और चुनौतियों को ईश्वर की आज्ञा मानकर आगे बढ़ता है।’ सो! जीवन में विपत्तियों को ईश्वर की रज़ा स्वीकार, निरंतर आगे बढ़ते रहिए और पराजय को कभी मत स्वीकारिए। साहस व धैर्य से उनका सामना कीजिए, क्योंकि समय ठहरता नहीं; निरंतर चलता रहता है। इसलिए आप भी अनवरत आगे बढ़ते रहिए। वैसे आजकल ‘रिश्ते पहाड़ियों की तरह खामोश हैं। जब तक न पुकारें, उधर से आवाज़ ही नहीं आती’ दर्शाता है कि रिश्तों में स्वार्थ के संबंध तेज़ी से व्याप रहे हैं और अजनबीपन के अहसास के कारण चहुंओर मौन व गहरा सन्नाटा तेज़ी से बढ़ रहा है। सो! इस संवेदनहीन समाज में ‘ मैं शब्द, तुम अर्थ ‘ की कल्पना करना बेमानी है, कल्पनातीत है।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆ डोरीलाल की चिन्ता – जेबकतरा ☆ श्री हिमांशु राय ☆

श्री हिमांशु राय 

(ई-अभिव्यक्ति  के पाठकों के साथ समय समय अपने अनुभव और साहित्य को साझा करने के लिए  संस्कारधानी  जबलपुर के वरिष्ठ  नाट्यकर्मी एवं साहित्यकार श्री हिमांशु राय जी   का हृदय से आभार। आप  इप्टवार्ता के संपादक एवं  विवेचना थियेटर ग्रुप के सचिव भी हैं। आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम व्यंग्य  – डोरीलाल की चिन्ता – जेबकतरा)

✍  व्यंग्य – डोरीलाल की चिन्ता – जेबकतरा – श्री हिमांशु राय ✍

डोरीलाल से एक व्यक्ति मिला। वो बहुत प्रसन्न था। उसने बताया कि अभी अभी उसकी जेब कट गई है। इसलिए बहुत खुश है। उसने बताया कि उसकी रोज जेब कटती है। आज सुबह से नहीं कटी थी तो वह बहुत चिन्तित था मगर दोपहर तक कट गई तो अब उसने चैन की सांस ली है। उसने बताया कि पिछले कई वर्षों से उसे जेब कटवाने की आदत पड़ गई है और जिस दिन जेब नहीं कटती वो बैचेन हो उठता है। उसके अच्छे स्वास्थ्य और खुश रहने का राज है रोज जेब कटवाना। उसकी जेबकतरे से लगन लग गई है।

डोरीलाल को भरोसा नहीं हुआ। मैंने पूछा कि ये क्या बात हुई ? ऐसा कैसे हो सकता है। जिस बात पर तुम्हें गुस्सा आना चाहिए, उस पर तुम खुश हो रहे हो ? उसने कहा शास्त्रों में कहा गया है कि क्रोध पाप का मूल है और पाप मूल अभिमान। तो मुझे किसी बात पर गुस्सा नहीं आता। अब वैसे भी मेरी चिन्ता जीवन जीना नहीं है। जीवन से पीछा छुड़ाना है। मुझे मोक्ष चाहिए। मुझे मुक्ति चाहिए। मैं ऐसी जगह जाना चाहता हूं जहां कोई जेबकतरा न हो।

मैंने कहा कि तुमने अपने रोग की पहचान में गलती की है। तुम अपने को दोषी मान रहे हो जबकि तुम्हारी इस हालत का जिम्मेदार तो जेबकतरा है। तुम जेबकतरे की गर्दन नापने के बजाए अपनी गर्दन नापने की सोच रहे हो। ये ठीक नहीं है। क्या तुम जेबकतरे को पहचानते हो ?

उसने कहा – बिल्कुल पहचानता हूं। मैं ही क्या हर कोई उसे पहचानता है। वो खुद भी अपनी पहचान बताने में कभी संकोच नहीं करता। उसकी फोटो हर जरूरी और गैर जरूरी जगह पर लगी है। उसने खुद लगवाई है। उसे बड़ा शौक है। अपनी फोटो लगवाने का।

मैं समझ गया कि यह आदमी भगवान से खार खाये बैठा है। इसलिए सर्वशक्तिमान परम पिता परमेश्वर की बात इस तरह से कर रहा है। मैंने कहा देखो भाई ईश्वर के मामले में इस तरह की बातें उचित नहीं हैं। धार्मिक मामला अलग है। भगवान की फोटो श्रद्धावश लोग जहां तहां लगा देते हैं। जेबकटी के मामले में भगवान को बीच में लाने की जरूरत नहीं है। आज देश में कई लोग जेब कतरने जैसे छोटे छोटे उद्योग व्यवसाय में लगे हैं। वे प्रभावशाली हैं। उनमें से कोई तुम्हारी भी जेब काट रहा है। तुम्हारी शिकायत वाजिब है। मगर डोरीलाल को ये बिल्कुल बर्दाश्त नहीं होगा कि तुम इस छिछोरे जेबकतरे की बराबरी ईश्वर से करो।

अब उसे गुस्सा आया। उसने कहा मि. डोरीलाल मैं भी यही कह रहा हूं कि भगवान और उस जेबकतरे को एक न समझो। वो कोई भगवान नहीं है। वो छिछोरा जेबकतरा ही है। मैं भी जानता हूं और मेरे जैसे सारे लोग जानते हैं। जैसे नशेबाज को नशे में कोई बुराई नहीं दिखती। जैसे शराबी को शराब में कोई बुराई नहीं दिखती वैसे ही रोज हमारी जेबकटती है मगर हमें जेबकतरे में कोई बुराई नहीं दिखती। हम जेब कतरे के भक्त हो गए हैं। अब बात काफी आगे बढ़ गई है। अब तो हमें जेब कटवाने में तरह तरह के फायदे दिखाई देने लगे हैं।

जेब कटवाना अब एक सामाजिक राजनैतिक प्रतिष्ठा का प्रश्न है। बड़े बड़े वकील, जज, डाक्टर, इंजीनियर, प्रोफेसर, अधिकारी, व्यापारी सब कूद कूद कर जेब कटवाते हैं। जो खुद दूसरों की जेब काटते हैं वो भी उस जेबकतरे से जेब कटवाते हैं। जिसकी नहीं कटती वो अपने को कमतर समझने लगता है। उसे लगता है कि कल तक वो निपट जाएगा। वो दौड़कर जेबकतरे के पास जाकर गिड़गिड़ाता है मेरी जेब काट लो। जब तक कट नहीं जाती पैरों से लिपटा रहता है।

जेबकतरा परेशान है। आज देश में हर कोई जेब कटवाने के लिए तैयार खड़ा है। जेब न कटे तो लड़ाईयां हो जाती हैं। कटवाने की ऐसी होड़ लगी है कोई छूटना नहीं चाहता। सब चाहते हैं जेब कट जाए। इसीलिए गांव गांव शहर शहर महानगर चंहुओर विराट सामूहिक जेबकट सम्मेलन आयोजित होते हैं। उसमें हजारों लाखों लोग जाकर अपनी जेब कटवाते हैं। गांव गांव में पुड़ी भाजी के पैकेट के साथ मुफ्त बसों में भरकर जेब कटवाने वालों को सम्मेलन में लाया जाता है। जेब कटने के बाद सब लोग खुशी खुशी फोटो वाला झोला लेकर अपने अपने घरों को जाते हैं। इस अद्भुत दृश्य को देखकर देवगण ऊपर से ईर्ष्या के फूल बरसाते हैं। उन्होंने जिस सृष्टि का सृजन किया उसमें जेबकतरे के प्रति अगाध श्रद्धा देखकर देवगण जलभुनकर राख हो जाते हैं। बहुत सारे छुटभैइये जेबकतरे गुरूपूर्णिमा के अवसर पर अपने आराध्य जेबकतरे का पूजन करते हैं और अपनी ’मेहनत’ की कमाई का अंश उन्हें गुरू दक्षिणा के रूप में श्रद्धापूर्वक चढ़ाते हैं।

डोरीलाल ने पूछा कि जेबकतरे को पहचान लेने के बाद भी जेब कटवाते रहते हो, रोज कटवाते हो, तुम आदमी हो या कीट पतंगा ? तुम्हारी मेहनत की कमाई कोई लूट रहा है और तुम मजे कर रहे हो ? तुम विरोध क्यों नहीं करते ? इंकार कर दो हम नहीं कटवायेंगे जेब। कोई जबरदस्ती है ?

डोरीलाल जी, हम लोग छोटे लोग हैं। हम क्या विरोध करेंगे। जेबकतरे के पास पुलिस, अदालत, वकील, जज, बड़े बड़े अधिकारी व्यापारी हैं। हमारे लिए बोलने वाला कौन है ? जो लोग बोल सकते हैं वो खुद लपक लपक कर जेब कटवा रहे हैं। हम इसी लायक हैं कि ठगे जाएं। जेब कटवाना ही हमारा भाग्य है। कम से कम हमें इस लायक तो समझा गया है कि हमारी जेब काटी जाए। उल्टे हमें तो डर लगा रहता है कि जेबकतरा कहीं गुस्सा होकर हमारी जेब काटना बंद न कर दे। हम तो कहीं के न रहेंगे।

हमारे पास कोई काम नहीं है। बचा है तो केवल एक काम – जेब कटवाना।

डोरीलाल ’जेबकतरा प्रेमी’

© श्री हिमांशु राय

जबलपुर, मध्यप्रदेश

14 02 2026

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – औरत कभी बूढ़ी नहीं होती ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – औरत कभी बूढ़ी नहीं होती ? ?

छुटपन से

पानी पकड़ाना,

चाय बनाना,

खाना पकाना,

खाना खिलाना,

बरतना माँजना,

चूल्हा-चौका

साफ-सफाई

झाड़ू-पोछा

कपड़े धुलाई,

सुबह आँख खुलने से

रात आँख लगने तक,

उम्र के हर मोड़ पर

अविराम और हमेशा

खटती रहती है औरत..,

 

खेल-पढ़ाई

मस्ती-हाथापाई

नौकरी-कमाई

लड़कपन

पुरुष में बदलता है

दाम्पत्य से

बुढ़ापे तक

यात्रा करता है,

निरंतर अविराम

थकता और थकता है..,

 

साठ के बाद

पुरुष के भीतर का

बचपना लौटता है

पर बचपन से

समझदार हुई

औरत का दिन-रात

जस का तस

बना रहता है..,

 

पति के काँधे

जाए न जाए

ढलती उम्र के बावज़ूद

उसी ढर्रे पर चलता रहता है..,

 

रिटायर होता है पुरुष

औरत रिटायर नहीं होती

बूढ़ा होता जाता है पुरुष

औरत कभी बूढ़ी नहीं होती..!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 21 दिवसीय आशुतोष साधना रविवार दि. 8 फरवरी से शनिवार 28 फरवरी तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में ॐ नमः शिवाय का मालाजप होगा। साथ ही शिव पंचाक्षर स्तोत्र का पाठ भी करेंगे 💥

॥ श्रीशिवपञ्चाक्षरस्तोत्रम् ॥

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय,
भस्माङ्गरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय,
तस्मै न काराय नमः शिवाय ॥१॥

मन्दाकिनी सलिलचन्दन चर्चिताय,
नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय ।
मन्दारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय,
तस्मै म काराय नमः शिवाय ॥२॥

शिवाय गौरीवदनाब्जवृन्द,
सूर्याय दक्षाध्वरनाशकाय ।
श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय,
तस्मै शि काराय नमः शिवाय ॥३॥

वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य,
मुनीन्द्रदेवार्चितशेखराय।
चन्द्रार्क वैश्वानरलोचनाय,
तस्मै व काराय नमः शिवाय ॥४॥

यक्षस्वरूपाय जटाधराय,
पिनाकहस्ताय सनातनाय ।
दिव्याय देवाय दिगम्बराय,
तस्मै य काराय नमः शिवाय ॥५॥

पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छिवसन्निधौ ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ॥

💥 मालाजप शिव पंचाक्षर स्तोत्र के साथ आत्मपरिष्कार एवं मौन-साधना भी नियमित रूप से चलेंगे 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रचना संसार #८२ – नवगीत – श्याम पधारो… ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ☆

सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(संस्कारधानी जबलपुर की सुप्रसिद्ध साहित्यकार सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ ‘जी सेवा निवृत्त जिला एवं सत्र न्यायाधीश, डिविजनल विजिलेंस कमेटी जबलपुर की पूर्व चेअर पर्सन हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में पंचतंत्र में नारी, पंख पसारे पंछी, निहिरा (गीत संग्रह) एहसास के मोती, ख़याल -ए-मीना (ग़ज़ल संग्रह), मीना के सवैया (सवैया संग्रह) नैनिका (कुण्डलिया संग्रह) हैं। आप कई साहित्यिक संस्थाओं द्वारा पुरस्कृत एवं सम्मानित हैं। आप प्रत्येक शुक्रवार सुश्री मीना भट्ट सिद्धार्थ जी की अप्रतिम रचनाओं को उनके साप्ताहिक स्तम्भ – रचना संसार के अंतर्गत आत्मसात कर सकेंगे। आज इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम गीतश्याम पधारो

? रचना संसार # ८२ – गीत – श्याम पधारो…  ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ? ?

रक्षक बनकर श्याम पधारो,

ले लो  फिर अवतार।

पावन भारत की धरती पर,

अब जन्मो करतार।।

*

घोर निराशा मन में छाई,

मानव है कमजोर।

काम क्रोध मद मोह हृदय में,

थामो जीवन डोर।।

शरण तुम्हारी कान्हा आए,

तिमिर बढ़ा घनघोर।

अब भी चीर दुशासन हरते,

दुष्टों का है जोर।।

सतपथ में बाधक बनते हैं,

बढ़ते अत्याचार।

*

गीता का भी पाठ पढ़ा दो,

व्याकुल होते लाल।

नैतिकता की दे दो शिक्षा,

बन कर सबकी ढाल।।

आनंदित इस जग को कर दो,

चमकें सबके भाल।

धर्म सनातन हो आभूषण,

बदले टेढ़ी चाल।।

राग छोड़कर पश्चिम का हम,

रखें पूर्व संस्कार।

*

त्याग समर्पण पाथ चलें नित,

हमको दो वरदान।

शील सादगी को अपनाकर ,

नित्य करें उत्थान।

सत्य निष्ठ गंम्भीर बनें हम,

दे दो जीवन दान।

जीवन सार्थक कर लें अपना,

कृपा करो भगवान।।

मर्यादा के रक्षक प्रभु तुम,

जग के पालनहार।

© सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(सेवा निवृत्त जिला न्यायाधीश)

संपर्क –1308 कृष्णा हाइट्स, ग्वारीघाट रोड़, जबलपुर (म:प्र:) पिन – 482008 मो नं – 9424669722, वाट्सएप – 7974160268

ई मेल नं- meenabhatt18547@gmail.com, mbhatt.judge@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares