☆ तुका म्हणे – काय उणे जाले… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
काय उणें जालें तुज समर्थासी /
जसा मजपाशीं कोण दोष //१//
*
जो तूं माझा न करिसिं अंगीकार/
सांगेन वेव्हार संतांमधी //२//
*
तुजविण रत आणिकाचें ठयीं /
ऐसें कोण ग्वाही दावीं मज //३//
*
तुका म्हणे काय धरुनी गुमान /
सांग उगवून पांडुरंगा //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
तुकाराम महाराज आपल्या अधीकार वाणीने आपल्या वर्तनात विषयी प्रत्यक्ष पांडुरंगालाच जाब विचारताना म्हणतात. तू पूर्ण समर्थ आहेस.
तू सर्व काही जाणतोस. माझ्या वर्तनामुळे तुला मी कोणता त्रास देतोय?. ज्या मुळे तू माझा स्वीकार करत नाहीस. ते कारण तू मला सांग. नाही तर हा तुझा माझ्या सोबत घडत असलेला व्यवहार काही योग्य नाही असे मी सगळ्या संतमंडळी समोर सांगेन. मी केवळ तुझ्याच चरणाशी लीन होवून तुझीच मनोभावे सेवा करत आहे. मी तुला सोडून दुस-या कुणाची भक्ती करत असल्यास त्याचा तू मला सबळ पुरावा दे. तो माझ्या समोर आण. या बाबतीत तू मौन पाळून गप्प बसू नकोस. तू माझा स्वीकार का करत नाहीस. हे मला आता कळायलाच हवे. या वरून तुकाराम महाराज पांडुरंगाची किती मनोभावे आणि श्रद्धापुर्वक सेवा करत होते ते कळते. त्या मुळेच ते पांडुरंगावर आपला हक्क आहे असे मानत होते. त्याला आपले मनोगत सांगत होते. पांडुरंगाचे मार्गदर्शन घेऊन आपला जीवनक्रम चालवीत होते. हेच यातून आपल्या सारख्या सामान्य माणसाला कळून येते.
—-ही ठळक जाहिरात वाचली, आणि मन एकदम शाळेत पोहोचलं. निबंधाचा प्रश्न मराठीच्या पेपरात हमखास पहिला असायचा, आणि हमखासच तो शेवटी लिहिण्यासाठी ठेवला जायचा. फार कष्ट घ्यावे लागायचे ना त्यासाठी. आणि तो पूर्ण होणारच नाही, या बेतानेच वेळ साधण्याची हुशारी केव्हाच जमलेली होती. —कारण मजकूर सुचायचाच नाही — मग लो. टिळकांवरचा निबंध, “त्यांचा मृत्यू १९२० साली झाला” या वाक्याने सुरु व्हायचा –कारण त्यांच्याबद्दल वाचलेलं ते शेवटचं वाक्य असायचं. अर्थात ‘ निबंध पूर्ण का झाला नाही ‘ या प्रश्नाला, ‘ बाकीचे सगळे प्रश्न अगदी व्यवस्थित लिहीत बसले, म्हणून पुरेसा वेळ उरला नाही’ हे उत्तर देतांना हुशारी पुन्हा उफाळून आल्याचा आनंद व्हायचा —————
“युरेका”——– स्पर्धेसाठी विषय सापडला –” हुशारीचे नाना प्रकार “. लगेच दीडशे रुपये भरून नाव नोंदवलंही.
दहा दिवसांची मुदत होती. पण पूर्वानुभवावरून शहाणं होत, लगेच लिहायला बसले.. { हेही हुशारीचे लक्षण }. सवयीने हातात मोबाईल होताच. लगेच गुगलकाकांना पाचारण केलं, कारण सगळी भिस्त त्यांच्यावरच तर होती. टाईप केलं–”हुशारीचे प्रकार”–पण १०-१५ वेळा पापणी लवली तरी स्क्रीन कोराच. -मग “प्रकार हुशारीचे”, “हुशारीचे विविध प्रकार”, “वेगवेगळ्या प्रकारची हुशारी” — असं कायकाय टाईप केलं, तरी तेच. इतकं गुगलून बघता बघता उत्साहही कमी होतोय अशी शंका वाटायला लागली. पण प्रश्न दीडशे रुपयांचा होता हो. —
“गुगलून बघण्यात “?– अरेच्चा– हा शब्द गुगलकाकांचा नक्कीच नाही. असे आगळेवेगळे वाक्प्रचार रूढ करणं ही तर जन्मजात भाषाप्रभूंच्या हुशारीची कमाल —
पुन्हा “ हुशारी”? — अचानक माझ्या अंगभूत {?} हुशारीला कोंब फुटायला लागले की काय … मी एकदम सरसावले —-” हुशारीचे नाना प्रकार “——–
‘अभ्यासातली हुशारी ‘ हा जगन्मान्य पहिला प्रकार. ज्ञानाशी त्याचा प्रत्यक्ष संबंध असावाच लागतो असे मुळीच नाही. पण याबद्दल इथे न लिहिणेच उत्तम. हुशारीचा याहून सरस प्रकार म्हणजे, खूप मन लावून अभ्यास करत असल्याचा बनाव रचण्यातली हुशारी—म्हणजे रात्री जागणे— {थर्मासात भरून ठेवलेला चहा संपेपर्यंत, किंवा बाकी सगळे गाढ झोपल्याची खात्री पटेपर्यंत-}—तरीही पहाटे लवकर उठून, कौतुक करून घेणे इ. इ. यात “ मन नक्की कुठे लागलं होतं “ हा प्रश्न निरागस पालकांना पडतच नाही. अपेक्षित मार्क मिळाले नाहीत की, “ सर कशी पार्शालिटी करतात ” हे पटवून देण्याची हुशारीही असतेच… पण हा वापरून गुळगुळीत झालेला प्रकार.
याहून परिणामकारक प्रकार, दुसऱ्याच्या वस्तूंवर डल्ला मारतांना वापरण्याचा —- भुरटी चोरी, पाकीटमारी, किंवा थेट दरोडा–. या कानाचे त्या कानाला कळू न देता चोरी करायला शिकवणारी हुशारी–डोळे मिटून दूध पिणारी— पण हा प्रकार तसा फशी पाडणाराही.
भीक मागणं हे तर अजिबातच हुशारीचं काम नाही असं कुणाला वाटत असेल तर असा समज साफ चुकीचा आहे. स्वतःची देहयष्टी लुळी पांगळी दाखवायची, की आपण आंधळा असल्याचं दाखवायचं, हे तर फार अक्कलहुशारीचं काम असावं.. ‘ सामाजिक मानसिकतेचा ‘ अभ्यास करावा लागताच असणार त्यासाठी.. सोंग बेमालूम जमावं लागतं… पण हे सगळं जमणं तुलनेनी तसं सोप्पं असावं.. आणि हिंदी चित्रपट असतात ना ट्रेनिंग द्यायला.. याची बरीच प्रॅक्टिकल्स शिकवतात ते..
आणखी एक प्रकार म्हणजे दुसऱ्याबद्दलच्या ऐकीव बातम्या तिसऱ्याला सांगतांना लागणाऱ्या हुशारीचा– त्रयस्थ वृत्तीने, केवळ दुसऱ्याच्या काळजीपोटी बोलत असल्याचे बेमालूम नाटक साधण्यासाठी हुशारी तर लागतेच. चहाड्या, काड्या, कागाळ्या, यासाठी हा प्रकार उपयोगी.. याचा उपप्रकार म्हणजे, स्वतःचा मोठेपणा इतरांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतांनाची हुशारी. पण हाही तोंडघाशी पाडणाराच प्रकार.
तुलनेने सोपी हुशारी लागते –उंटावरून शेळ्या हाकण्यासाठी– यात स्वतःला फरक पडतच नाही— “ जनहो, खादी वापरा “ — सामाजिक पातळीवर वापरण्यासाठी उत्तम प्रकार –… याहून धूर्त हुशारी लागते ती दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतांना- असो. याच पातळीवरून “ चोर तो चोर, वर शिरजोर “ असे वागतांनाही हुशारी लागते? बहुतेक नाहीच. पण काहींना मात्र तसे ठामपणे वाटते.
हुशारीचे मॉडर्न प्रकारही खूप आहेत सांगण्यासारखे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी … एक मासला म्हणून सांगायचे तर…. प्रत्यक्षात ५०-६० रुपयाच्या वस्तूची किंमत १५० रु. सांगायची आणि मग ग्राहकाने घासाघीस केल्यावर त्याच्यावर उपकार करत असल्याचे दाखवत ती १०० रु. ला द्यायची. अर्थात हे अगदीच किरकोळ उदाहरण झाले. या प्रकारची हुशारी प्रत्यक्षात फार फार वरच्या पातळीवरच्या ‘धंद्यांसाठी’ अत्यावश्यक असते.
बाप रे; हुशारीचे किती प्रकार सांगितले ना मी — गुगलकाकांच्या ज्ञानात भर घालू का?– नकोच. — जगभरातून माहिती गोळा करून, ती आपल्याच नावावर खपवण्याची हुशारी, हेच तर त्यांचं भांडवल आहे. आणि त्यांना न कळवण्यातच माझी हुशारी cum शहाणपण——
—बघा- असं होतं –” ज्ञानयुक्त शहाणपणमिश्रित हुशारी “ हा आजकाल दुर्मिळ म्हणावा असा विशेष प्रकार सांगायचाच राहिला… मला तो माहितीये. पण हा प्रकार आजकाल सर्रासपणे वापरतांना दिसत नाही ना कुणी, म्हणून नजरेआड झाला इतकंच — त्याबद्दलही नक्कीच लिहू शकते मी.. पण इथे आणखी काही नाही लिहू शकत ना हो.. स्पर्धेसाठीच्या लेखासाठी शब्द मर्यादा आहे. त्यामुळे या प्रकाराबद्दल पुन्हा कधीतरी..
– – – तर आज इतकंच —थांबायचं कुठे हे कळणं, हा तर हुशारीचा फार महत्वाचा आणि दुर्मिळ प्रकार … जो माझ्याकडे आहे… असो.
(“साहेब आम्ही गरिब माणसं. कुठून आणणार एवढे पैशे. मावशींना तर माहितेय आमचा घरचा माणूस धड कामधंदा करत नाही. वाटलं तर घेऊन जातो रिक्षा नाहीतर पत्ते खेळत बसतो. नाहितर दारु पिऊन तमाशे करतो. मीच चारपाच घरची धुणीभांडी करुन संसार चालवते”
तिनं बोलताबोलता पदर डोळ्यांना लावला.) – इथून पुढे — —
“असंय पुष्पा की ती सायकल नवीनच आहे. तरीसुध्दा तुला आम्ही निम्म्या किमतीत देतोय. तू गरीब आहे म्हणून किराणा दुकानदार तुला फुकटात किराणा देतो का?गॅसवाला फुकटात सिलिंडर देतो का?नाही ना? मग नवी सायकल फुकटात कशी मिळेल?चल ठिक आहे चार हजारात घेऊन जा. एक हजार अजून कमी केले तुझ्यासाठी ” तिची किंव येऊन मी म्हणालो
“नाही ना साहेब. चार हजार सायकलला दिले तर मी महिना कसा काढू?”
“साॅरी चार हजारापेक्षा कमी नाही होणार. फुकटात तर अजिबातच नाही मिळणार सायकल ” मी निक्षून सांगितलं तशी ती न बोलता निघून गेली. मला थोडं वाईट वाटलं. आपण एवढं कठोर व्हायला नको होतं असं वाटून गेलं. पण पै पैचा हिशोब ठेवून कुटुंबाला वर आणणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला फुकट मागू नये आणि फुकट देऊ नये या स्वभावातून बाहेर येणं शक्य नव्हतं.
असाच महिना निघून गेला. त्या दरम्यान सुरेखानं मला सायकलबद्दल काय विचार केला असं दोनदा विचारलं पण मी तिला बाहेरचं कुणी गिऱ्हाईक आलं तर चार हजारात विकून टाकू पण फुकटात सायकल द्यायची नाही असं निक्षून सांगितलं.
त्यानंतर मी माझ्या काही व्हाॅट्सअप ग्रुपवर ” नवीकोरी गियरची सायकल योग्य किंमत आल्यास विकणे आहे. कृपया संपर्क साधावा ” असा मेसेज टाकला. आसपासच्या सायकल रिपेयरच्या दुकानदारांनाही सायकलबद्दल सांगून आलो. कुणीतरी येऊन सायकल घेऊन जाईल असा मला विश्वास वाटत होता. एकदा काॅलनीत काम करणाऱ्या माळ्याला सांगितल्यावर तो सायकल पहायला आला. पण ती आधुनिक सायकल त्याला नको होती. मागे कॅरियर असलेली साधी पण दणकट सायकल त्याला हवी होती. रात्री काॅलनीत गस्य घालणाऱ्या गुरख्यालाही ती दाखवली पण त्यालाही सामान ने-आण करण्यासाठी उपयुक्त असलेली सायकल हवी होती. मग एका रविवारी ही सायकल रिपेअर करणाऱ्या पंक्चरवाल्याकडे गेलो. त्याला गिऱ्हाईकाबद्ल विचारल्यावर तो म्हणाला ” साहेब मी तुम्हांला त्याच दिवशी सांगितलं होतं की आजकाल ज्यांना डाॅक्टरांनी वजन कमी करायला सांगितलंय ते किंवा सायकलिंगचे शौकीन लोकच सायकल विकत घेतात. आणि असे लोक जुन्या सायकली सहसा घेत नाहीत. तुम्ही तुमच्या ओळखीच्या गरीब माणसाला ती ज्या किंमतीला जाईल त्या किमतीला विकून टाका. नाहितर भंगारमध्ये द्या ”
मी निराश झालो. मग मी कौस्तुभच्या मित्रांना फोन लावले. सायकलिंग असोसिएशनच्या कुणा सदस्याला सायकल हवी आहे का विचारलं. पण सध्यातरी कुणालाच सायकल नको होती. उलट त्यांनी मला ती सायकल लंडनला कौस्तुभकडे पाठवून द्यायचा सल्ला दिला. पण कौस्तुभलाही तिथं सायकल नको होती. भंगारवाल्याला विचारलं तर तो सातशे रुपये देत होता. अर्थातच मी नकार दिला.
एक दिवस संध्याकाळी सुरेखानं मला विचारलं
“मग मिळतंय का सायकलला कुणी गिऱ्हाईक?”
“अजूनतरी नाही. पण मिळेल कधी ना कधी ” मी आशेने म्हणालो
“तुम्हीही ना काही पण जिद्दीपणा करता. आणि तोही फक्त चार हजारासाठी. चार हजारात कोणती बिल्डिंग बांधणार आहे आपण?तीन महिने झाले तुमच्या या जिद्दीपणामुळे ती सायकलही धुळ खात पडलीये आणि ती पुष्पाही ताटकळत बसलीये. दर आठवड्याला ती मला सायकलबद्दल विचारते. साहेबांना समजावून सांगा म्हणते. तिला काय उत्तर द्यावं तेच मला समजेनासं झालंय ” सुरेखा चिडून म्हणाली
” तू मला जिद्दी म्हणतेय पण तुझी पुष्पा किती जिद्दीपणा करतेय हे तुला दिसत नाही. खरी गरजू असती तर थोडी घासाघीस करुन अडिच तीन हजारात सायकल घेऊन गेली असती. पण तिला तर फुकटच पाहिजे आहे ” मी रागावून म्हणालो.
” अहो पण मी म्हणते आपल्याला काय कमी आहे? मुलीचं लग्न होऊन गेलंय. मुलगा लंडनला चांगला कमवतोय. पुण्यातल्या दोन फ्लॅटचं चांगलं भाडं येतंय. तुमचा स्वतःचा तीन लाख पगार आहे. दागदागिने, एफ. डी. भरपूर आहेत. तीन प्लाॅट आहेत. रिटायर झाल्यावर तुम्हाला पेंशनही भरपूर मिळेल. अहो जे इन्कम येतंय त्यातला पाव हिस्सा सुध्दा खर्च होत नाहीये. आपल्या दोघांना मेलं लागतं तरी किती! मग त्या चार हजारासाठी तुम्ही एवढा का जीव काढताय? लोक लाखो रुपयांचं दान करतात. आपण एक साधी जुनी सायकल दान करु शकत नाही? बरं ते दानही काही वाया जाणारं नाही. ते सत्कारणीच लागणार आहे. देऊन टाका ना मेली ती सायकल “
तिचं बोलणं ऐकून मी थंडगार झालो. काय चुकीचं बोलत होती ती? मी उगीचच हटवादीपणा करतोय याची जाणीव मला झाली. तरीपण मला शरणागती पत्करावीशी वाटेना. मी शेवटचं अस्त्र वापरलं
” ठिक आहे तिला म्हणा एक टोकन म्हणून एक हजार दे आणि घेऊन जा सायकल ”
” अरे रामा! अजूनही हजार रुपयात जीव अटकलाच आहे का? अहो पुष्पाच्या जागी दुसरी बाई असती तर मी काहीच बोलले नसते. पण पुष्पा इमानदार आहे. मुख्य म्हणजे ती खाडे करत नाही, उर्मट बोलत नाही, नखरे करत नाही. कामंही किती छान आहे तिचं. नाहीतर इतर बायका किती त्रास देतात ”
” बरं बरं. सांग तिला उद्या घेऊन जा ” मी शेवटी पराभव पत्करला. तिच्या चेहऱ्यावर विजयी भाव उमटले
” हे ऐकून बिचारीला खुप आनंद होईल ” ती हसत म्हणाली.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ऑफिसातून घरी आलो तेव्हा पोर्चमध्ये सायकल दिसली नाही.
” काय झालं? नेली का सायकल?” मी सुरेखाला विचारलं
” हो. तिचा मुलगा येऊन घेऊन गेला ”
” काय म्हंटली पुष्पा? खुश झाली असेल “
” कशाची खुश! खालीपिली साहेबांनी तीन महिने बर्बाद केले म्हणे. अगोदरच दिली असती तर पोराचा पायी जायचा त्रास तरी वाचला असता असं म्हणत होती “
म्हणजे सायकल फुकटात देऊनही मीच अपराधी झालो होतो. बाईने आभार तर मानलेच नव्हते उलट मलाच दोषी ठरवलं होतं.
एक महिन्याने मला दिल्लीला ऑफिस कामानिमित्त एक आठवड्यासाठी जावं लागलं. परत आलो तर सुरेखा सिंकमध्ये भांडी घासत होती.
” काय गं पुष्पा येणार नाहीये का आज?”
” नाही. तिनं आपलं काम सोडलं ”
” सोडलं? का?”
” का म्हणजे? तिला दुसरीकडे दहा हजार पगाराचं काम मिळालं म्हणून ती तिकडे गेली ”
” दहा हजार पगार? अशी कोणती नोकरी मिळाली बुवा तिला?” मी आश्चर्याने विचारलं.
” नोकरी नाही. हेच धुणीभांडी, झाडूपोछा आणि दोन्ही वेळेच्या स्वयंपाकाचं काम आहे. मोठा बंगलाआहे म्हणे आणि तीन भावांच्या फॅमिली एकत्र रहातात. कामंही तेवढंच जास्त असणार ”
मला आठवलं माझा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एम. ई. केलेला भाचा एका कंपनीत नुकताच लागला होता. त्याला दहा हजारच पगार होता. म्हणजे तिसरी शिकलेली पुष्पा आणि लाखो रुपये खर्च करुन एम. ई. केलेला भाचा समान पातळीत आले होते. मला आजकालच्या शिक्षणातील झालेल्या घसरणीची आणि माझ्या भाचाची चांगलीच किंव आली.
” मग काय तूच धुणीभांडी करणार आहेस का?”
” तुम्हांला तर काय आनंदच होईल मी केलं तर. पैसे वाचतात ना तुमचे! मी लावून घेतलीये दुसरी बाई. उद्यापासून येणार आहे ”
मला आठवलं आमच्या लग्नाच्या वेळी मी साधा क्लार्क होतो. पगारही कमीच होता. तेव्हा माझी आई आणि सुरेखा दोघी मिळून धुणीभांडी, घराची साफसफाई, स्वयंपाक करायच्या. एवढंच नाही तर पापड, वेफर्स, कुरडया, लोणची, दिवाळीचा फराळ सगळं घरीच व्हायचं. आई गेली तरी अगदी मुलं काॅलेजला जाईपर्यंत हे सुरु होतं. सुरेखा तोपर्यंत अगदी चवळीची शेंग होती. पण घरकामाला आणि अगदी पोळ्या करायलाही बाई यायला लागली तेव्हापासून सुरेखाला चांगलाच आराम मिळू लागला. सोबत तिचं वजनही वाढू लागलं. मग हळूहळू डायबेटिस, बी. पी. , गुडघेदुखी, कंबरदुखी हे आजार तिच्या मागे लागले. मुलीचं लग्न झाल्यानंतर तर ती एकदमच परावलंबी झाली. तिच्या हातच्या भाज्या मला आवडायच्या म्हणून तेवढं सोडून प्रत्येक कामाला तिनं बाई लावून घेतली होती. आणि त्यातली एक जरी बाई कामाला आली नाही तर ती चिडचिड करायची.
मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझे ऑफिस दहाला सुरू होत असे. मी क्लार्क आणि सेवक यांचे काम दहा पासून सुरू होत असल्यामुळे आमचं लंच टाईम दुपारी दोन वाजता असे,
ज्यामुळे मुलींच्या मधल्या सुट्टीत मला त्यांच्याकडे लक्ष देणे सोयीचे जाईल. कारण त्यांची सुट्टी तीन वाजता होत असे. साधारणपणे डबा खाणा-या सगळ्या गटांमध्ये फिरून मुली डबा काय आणतात याचे मी निरीक्षण करत असे. बिस्किट, वेफर्स, चुरमुरे असे देणाऱ्या पालकांना मी पत्र देत असे किंवा बोलावून घेत असे आणि विद्यार्थिनींना पोळी भाजीचा डबा द्या असे आवर्जून सांगत असे. त्यांचे वाढीचे वय आहे तेव्हा त्यांना भरपूर आहार मिळाला पाहिजे.
या पद्धतीने मी वेगवेगळ्या गटात हिंडत असताना मग मुली आमचा एक घास घ्या ना बाई, आमचा एक घास घ्या ना, असा आग्रह करीत. त्याप्रमाणे जिच्या डब्यात अगदी साधं काही असायचं तो घास मी घेत असे.
सोलापुरात विशेषतः तेल-चटणी पोळी देण्याची पद्धत आहे. गरीब माणसांचे ते जेवण आहे. त्यामुळे बहुदा बऱ्याच वेळा मी तेल – चटणी पोळीवाला घास घेत असे.
हॉलच्या समोर एक मोठा गट बसलेला होता. पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी होत्या. आणि मी एका मुलीचा एक घास घेतला. तेव्हा मुलीने ओळखले ‘बाई तुम्ही तिची चटणी पोळी आहे म्हणून घेतलं ना, पण तिच्याजवळ अजून एक डबा आहे त्यात जिलबी आहे तो मात्र ती काही काढत नाही.
मी म्हणाले ‘चल असं कुठे असता कां?’ती म्हणाली ‘बाई तिला विचारा तिच्या मांडीखाली एक डबा आहे. आणि ती मुलगी रडायला लागली.
इतक्यात बेल झाली आणि ऑफिसमध्ये मला फोन आला म्हणून बोलावणे आले. मी ऑफिसात गेले एस. एस. सी. बोर्डाचा फोन होता त्यामुळे मी त्या कामात गर्क होते.
मधली सुट्टी झाल्यामुळे मुली वर्गात गेल्या. सगळीकडे शांतता पसरली आणि एक मुलगी माझ्या ऑफिस बाहेर हमसून हमसून रडताना मला तिचा आवाज ऐकू आला.
मी कामात बिझी होते. मी दरवाज्या वरील माझे सेवक शिवा यांना हाक दिली. म्हणाले ‘शिवा काय चाललंय, कोण रडतंय. ’
तेव्हा ते म्हणाले. ‘बाई एक मुलगी तुम्हाला भेटायचं म्हणते आणि खूप रडत आहे. ’
‘ठीक आहे पाठवा. ’ मग तीच ती मुलगी आत आली आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली ‘बाई नाही हो मी तुम्हाला मुद्दाम जिलेबी दिली नाही असं नाही.
मला खरंच वाटायला लागलं. मी म्हणलं ‘काही हरकत नाही. तुला ती जिलबी खायची होती कां?’ मी अगदी सहज म्हणाले आणि ‘अगं जे असेल डब्यात ना ते सगळ्यांनी वाटून खावं बाळा. ’
त्यावर तिने जे उत्तर दिलं ते असं होतं.
ती म्हणाली ‘बाई माझी आई एके ठिकाणी घर कामाला जाते. त्यांच्या घरी आज काही कार्य होते. त्यांनी माझ्या आईला वाढून दिलेले जे ताट होते ते आई घरी घेऊन आली आणि तो दुसरा डबा तिने मला दीड वाजता आणून दिला त्यामध्ये जिलबी होती. पण त्याला भात लागलेला होता. त्यामुळे ते खरकट्या सारखं वाटत होतं. मला वाटलं न जाणं कोणाच्या पानातील असेल तर म्हणून मी ती जिलबी कोणालाच दिली नाही. ’
आणि ती माझ्या कमरेला मिठी मारून अजूनच रडायला लागली. हे ऐकून माझे डोळे भरून आले. इतकेच काय आमचे सेवक शिवाजी कांबळे सुद्धा रडायला लागले. त्यांनी पटकन दार बंद करून पडदा सारखा केला.
मी खुर्चीवरून उठले. त्या मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले ‘बाळा या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण होय. तू खूप शिक आणि तुझ्या आईला सुखी कर. तुला शिक्षणाला जी कुठली मदत लागेल ती सेवा सदन शाळा, व्यक्तिशः मी कधीही करायला तयार आहोत. पण मन लावून अभ्यास कर आणि काही तरी बनण्याची जिद्द ठेव. ’
नंतर तिची समजत घालून मी तिला पाठवून दिले. मला जाणवले की तिला लक्षात येत होते कुणीतरी वाढून दिलेलं ताटातलं अन्न आपण खातो आहोत. एवढ्या कोवळ्या जीवाला हे कळणं फार वाईट होतं. पण परिस्थिती पुढे इलाज नव्हता.
ही गोष्ट माझ्या मनात कुठेतरी खोल रुतून बसली. त्यानंतर सोलापूर आकाशवाणी वरती ‘गाणी मनातली’ या सदरामध्ये अनेक स्त्रियांच्या मुलाखती झाल्या. त्यामध्ये एखादं गाणं लावायचं आणि ते आपल्याला का आवडले त्याच्या मागची घटना, प्रसंग हे सांगणे… असा तो कार्यक्रम होता.
त्याचे प्रसारण रात्री दहा वाजता होत असे त्या कार्यक्रमां मध्ये पाच एक गाणी मी लावली आणि ती गाणी मला कां आवडली असे प्रसंग सांगितले. त्यामध्ये मी हा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर ‘नन्हें मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्या है… ’ हे गाणं लावण्याची मी विनंती केली.
त्या घटनेचा प्रभाव लोकांवर एवढा पडला की रात्री साडे अकरापर्यंत मला लोकांचे फोन येत होते- ‘किती मनाची पकड घेणारा प्रसंग आहे, आम्ही रडलो… ’ असं लोक सांगत होते.
कार्यक्रम खूपच छान झाला होता.
त्यामध्ये साहित्यिक संपादक मा अरविंद जोशी सरांचा फोन आला. ते मला म्हणाले ‘तुम्ही शिक्षक असल्याचा मला आज हेवा वाटला. ’
आणि हे वाक्य माझ्यासाठी त्या कार्यक्रमाचे पावती ठरलं. त्यानंतर या प्रसंगावरती एखादी शॉर्ट फिल्म करावी असे माझ्या डोक्यात होते. सुमारे चौदा-पंधरा वर्षानंतर मी माझ्या एका शिक्षक मित्राला ही गोष्ट ऐकवली. त्यांनी त्याची पटकथा लिहून आणली. शिक्षणाचे महत्व पटवून देणारा एक प्रसंग त्याला जोडला आणि ‘जिलबी’ नावाचा लघु चित्रपट तयार झाला. त्यामध्ये डॉक्टर माननीय निशिगंधा ताई वाड यांनी मुख्याध्यापकाची भूमिका केली. विद्यार्थिनींच्या भूमिका इतर काही मुलींनी केल्या होत्या.
निशिगंधाताईंनी जेव्हा या चित्रपटाची पटकथा ऐकली तेव्हा त्यांचे ही डोळे भरून आले आणि तात्काळ त्यांनी या लघुपटात काम करण्यासाठी संमती दिली होती. या लघुपटाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर हा लघुपट अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये दाखल झाला. त्यात त्याला सहभाग मिळाला आणि त्याला बरीच पारितोषिके मिळाली.
त्यातल्या कथेला पारितोषक मिळालं मुख्याध्यापकाची भूमिका करण्याला निशिगंधाताईंना पारितोषिक मिळालं. विद्यार्थिनीची भूमिका करणाऱ्या मुलीला पारितोषक मिळालं. दिग्दर्शकाला पारितोषिक मिळालं आणि फिल्मला पारितोिषक मिळालं. किमान पाच-सहा ठिकाणी या फिल्मला पारितोषिके प्राप्त झाली. याशिवाय बर्लिन येथील फिल्म फेस्टिवल मध्ये या लघुपटाची निवड झाली. मेलबर्न ला या फिल्मचे स्क्रीनिंग झाले. मुलांच्या भावविश्वातली वेगळी फिल्म म्हणून त्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आले आणि सगळीकडेच या लघुपटला खूप गौरवण्यात आले. वृत्तपत्रांनी याच्यावरती भरभरून लिहिले.
अशा पद्धतीने एका छोट्या प्रसंगाचा हा एवढा मोठा चित्रपट उभा राहिला.
प्रसंग खूप घडत असतात. टिपणारा माणूस हवा. इतके खरे सेवा सदन शाळेच्या प्रांगणात घडणाऱ्या अशा अनेक घटनांनी वक्ता म्हणून माझी अनुभव समृद्धी वाढवली यात शंका नाही.
… आपली लहानपणची परिस्थिती आठवली तरी ही खूप झालं.. माणसाने पूढील आयूष्यात कितीही श्रीमंती आली तरी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवायचे असतात. परिस्थिती बदलते पण लहानपण सदैव आठवत राहात अगदी जीवनाच्या अंतापर्यंत – – –
एक उत्तम संगीतकार, कवी, गायक, विडंबनकार, लेखक, गुरू, इत्यादी विविध पैलू, विविध रंग, व्यक्तिमत्वात असलेल्या देवकाकांना 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या स्मृतिदिनानिमित्त आणि आजच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या शब्दांत मी आदरांजली वाहतेय –
“किती रे तुझे रंग किती रे तुझ्या छाया
दोनच डोळे माझे उत्सव जातो वाया (उतू जाणे)”
१९९५ च्या दरम्यान नाशिकच्या दातार परिवाराने निर्मिलेल्या माझ्या पहिल्या ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ या cd साठी जेव्हा शशी – उषा मेहता (ज्येष्ठ कवयित्री) या दाम्पत्याने काव्यनिवडीसाठी मदत केली. उत्तम दर्जेदार काव्य नि दर्जेदार संगीत असलेल्या कविता माझ्या आवडीने निवडल्या गेल्या. त्यावेळी विंदांची ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, ‘मागू नको सख्या’, ‘अर्धीच रात्र वेडी’, सुरेश भटांची ‘एवढे तरी करून जा’, ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो, ‘ शांताबाई शेळकेंची ‘प्रीती जडली तुझ्यावरी’…. अशा एक से एक सुंदर रचना निवडल्या गेल्या. गंमत म्हणजे सगळ्यांचे संगीतकार – यशवंत देवच होते.
या अलिबाबाच्या गुहेतल्या, रत्नांचा हार परिधान करायचे भाग्य मला मिळाले. वेस्टर्न आऊटडोअर सारख्या अप्रतिम स्टुडिओत ही रेकॉर्डिंग्जस व्हायची. ‘सर्वस्व तुजला वाहूनी…’ गाताना सॅक्सोफोन वादक मनोरीदा, सरोद वादक झरीनबाई दारुवाला अशा दिग्गजांचे प्रत्यक्ष भावपूर्ण सूर कानावर पडल्याने लाइव्ह गाणे गाताना गाणे ही तसेच प्रकट होत असे… प्रत्येक टेक फर्स्ट टेक असे. टेक झाल्यावर मी गाणे ऐकण्यासाठी रेकॉर्डिंग रूम मध्ये गेले… देव साहेबांच्या अश्रुधारा वहात होत्या. त्यांनी मला पाठ थोपटून शाबासकी दिली आणि डोळे पुसत ते म्हणाले, “अत्यंत सुंदर आणि हृदयापासून गायलात पद्मजाबाई! ” माझ्यासाठी हे मोठं बक्षीस होतं.
शब्दप्रधान गायकीत कुठे काय कसे गावे याचे, त्यांनी पुस्तक लिहून अगदी नवोदितांसाठी सुद्धा वस्तुपाठ रचला. गाणे प्रथम मेंदूतून व नंतर गळ्यातून गायले जाते मगच ते सहज उमटते, ही गुरुकिल्ली त्यांनी मला दिली. त्यांची भाषणे ऐकायला आम्ही उत्सुक असू. त्यांची देववाणी प्रासादिक होती. विनोदबुद्धी शेवटपर्यंत तल्लख होती. कायम ते हशा आणि टाळ्या घेत. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. शेवटी मात्र आजारपणात त्यांनी परमेश्वराला त्यांच्याच शब्दांत अशीच हाक घातली असेल…
.. दुसरं कोणी बोललं तर उत्तर मिळेल खात्री नाही… सदैव मान खाली, नजर झुकलेली, अजिबात इकडं तिकडं पाहणं नाही. डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. विनाकारण चिडणं, खेकसणं सुरु असतं…. पण सगळं तात्पुरतं… लगेच आपल्या जगात हरवतो.
याच्यापासून त्रास नाही, कारण तो काहीच करत नाही. त्याला शारीरिक कष्ट अजिबात नको असतात.
सगळा कल कामं टाळण्याकडे… एकदम आयतोबा!! सगळं बैठे बिठाये पाहिजे.
मात्र, तो आधुनिक आहे.. स्मार्ट आहे.. टेक्नॉसाव्ही आहे… तरीही सतत अस्वस्थ अन मन सैरभैर, चटकन निर्णय घेणं जमत नाही… ही या चौथ्याची खास वैशिष्ट्य.
.. लोकसंख्येप्रमाणे वाढणारी या चौथ्या माकडांची संख्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय झालाय. याच्यावरून घराघरात वादाचं प्रमाण वाढतयं. नवीन प्रॉब्लेम्स झालेत.
घरात, रस्त्यावर, गर्दीच्या, मोकळ्याच.. या ठिकाणी हे चौथं माकड दिसतं. शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं हे धोकादायक बनलंय. प्रचंड संसर्गजन्य असलेल्या याचा वावर सर्वत्र आहे.
सध्यातरी, याच्यावर हमखास उपाय नाही. मात्र त्यासाठी ठरवून प्रयत्न केले पाहिजेत.. ही काळाची गरज.
मला काय करायचं.. माझा काही संबंध नाही.. सगळी दुनिया हेच करतेय
☆ “शहाण्या माणसांचा क्लास” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
“अरे, पण गरज काय आहे याची?”
हे वाक्य ज्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीविषयी आणि योग्य व्यक्तीशी बोलताना वापरता येतं ना, ती माणसं शहाणी असतात. जपून वागतात, जपून जगतात आणि जगताना इतरांनाही जपतात.
ऊठसूठ हाॅटेलात जाऊन खाणार नाहीत, सतत बाहेरून पार्सल मागवणार नाहीत, सारखी खरेदीही करणार नाहीत. रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टॅन्डवर पहाटे साडेचार किंवा पाच वाजता एकटे उतरले तर अर्धा तास तिथंच थांबतील. भल्या पहाटे जाऊन घरच्यांच्या साखरझोपेचा विचका करणार नाहीत आणि दुप्पट-तिप्पट पैसेही खर्च करणार नाहीत. अर्धा तास थांबतील, बसेस सुरू झाल्या की शांतपणे घरी पोचतील. सकाळचा पहिला चहा घरीच घेतील, सात वाजता आलेला वर्तमानपत्राचा ताजा अंक वाचतील. अर्धा तास वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तिप्पट पैसे खर्च करणार नाहीत. पण कुटुंब असेल, लहान बाळ असेल तर असं वागणार नाहीत. रिक्षा करतील, थोडीफार घासाघीस करतील, आणि घरी जातील. हे जगण्यातलं व्यावहारिक शहाणपण पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेला एक वर्ग आपल्या समाजात आहे. अनेकजण त्यांना मिडलक्लास म्हणतात, पण माझ्या लेखी ती खरी शहाणी माणसं असतात. त्यांना ‘मजेत जगावं कसं?’ हे समजायला पुस्तक वाचावं लागत नाही, ते मजेतच जगत असतात. किंबहुना, जगण्याचा आस्वाद घेण्याची कला त्यांना जन्मजात अवगत झालेली असते.
आपलं मूल अनवाणी शाळेत जाणार नाही याची काळजी त्यांना असते. ती काळजी वूडलँड, क्राॅक्स, ली कूपर, बाटा यांनी शांत करण्याचा उद्योग ते करत बसत नाहीत. लखानी किंवा पॅरागाॅन ते आनंदानं निवडतात, आनंदानं वापरतात, गरजा पूर्ण करतात आणि मस्त राहतात.
स्वत:ची वाहनं ते स्वत: धुतात, पुसतात. सायकलला स्वत:च आॅईलिंग करतात. घरातल्या पंपानं सायकलच्या टायरमध्ये हवा भरतात. सुटी फुलं आणतील, देवाच्या पूजेचे हार स्वत: तयार करतील. बुटांना पाॅलिश स्वत:च करतील. ते रोज जमणार नसेल तर बाहेरून आल्यावर बूट काढले की, मोज्यानंच ते बूट स्वच्छ पुसतील, आत ठेवतील आणि मग मोज्यांचा जोड धुवायला टाकतील. हे काटकसरीचं जगणं नसतं, हे योग्य जगणं असतं.
ज्या खोलीत कुणी नसेल तिथले लाईट्स आणि पंखे बंद ठेवतात. गरज नसताना घरभर दिवे आणि पंखे विनाकारण चालू ठेवण्याचा शौक त्यांना नसतो. रात्री खिडक्या उघड्या ठेवून झोपतात, एसीची गरज पडत नाही. गरज नसताना ‘बाय वन गेट वन फ्री’ च्या शंभर जाहिराती पाहिल्या तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही. पण गरज असेल तेव्हा रेमण्ड, सियाराम, अरविंद मिल्स, विमल असंच कापड घेतील. रेडिमेड घेण्यापेक्षा शिवून घेतील. मस्तपैकी चार-पाच वर्षं तरी सहज वापरतील.
घरी कुणी आलं की, पोह्याचा चिवडा, भडंग, खोबऱ्याची वडी किंवा शेंगादाण्याचा-रव्याचा-बेसनाचा लाडू मनापासून देतील आणि नंतर आलं घातलेला कपभर चहा.. (हे सगळे पदार्थ घरीच स्वहस्ते केलेले असतात आणि चहापत्ती घाऊक मार्केटमधून आणलेली असली तर आलं, गवतीचहा, चिमूटभर सुंठ घालून तिला फक्कड रंगत कशी आणायची, हे तंत्र बरोब्बर समजलेलं असतं.) आल्यागेल्याचा, पै-पाहुण्यांचा पाहुणचार मस्त करतात, रिटर्न गिफ्ट म्हणून उगाचच महागड्या गोष्टी देऊन इंप्रेशन मारायला जात नाहीत.
सणावाराला घरी गोड पदार्थ तर होणारच. घरच्या तुपातला शिरा, खीर, चक्का आणून घरी केलेलं श्रीखंड (अनेकदा चक्कासुद्धा घरीच करतात) हे पदार्थ पेटंट असतात. अचानकच गोड खाण्याची हुक्की आलीच तर केळ्याचं शिकरण दोन मिनिटांत तयार..!
घरात कुणी नसेल आणि एकटाच मुलगा किंवा पुरूष जरी असेल तरी स्वत:च्या वेळेपुरती मुगाची खिचडी त्याला करून खाता येते. दुपारच्या उरलेल्या पोळ्यांची वरणफळं त्याला बरोबर जमतात. कालचा उरलेला भात फोडणी देऊन सकाळी खाता येतो. किंवा वेळप्रसंगी दहीपोहे करूनही उदरभरणाची सोय करता येते. त्यासाठी हाॅटेलची पायरी चढण्याची गरजच पडत नाही. ह्या जगण्याला लो प्रोफाईल, मिडलक्लास किंवा चिक्कूपणा म्हणणारी माणसं बिनडोक असतात. कारण,
हे परफेक्ट आत्मनिर्भर जगणं आहे.
यांच्या घरातले पुरूष दळणं आणतात, वाणसामान आणतात, भाजी आणतात, इस्त्रीचे कपडे लाॅन्ड्रीत नेऊन देतात आणि घेऊनही येतात. रद्दीवाल्याकडे स्वत:च रद्दी घेऊन जातात. स्वत: पानं घेणं आणि जेवण झाल्यानंतर स्वत:चं ताट स्वत: घासणं, फरशी पुसणं यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. पहिल्या पगारात घेतलेलं घड्याळ ते रिटायर होईपर्यंत छान वापरतात. पाच-सात वर्षं चष्म्याची फ्रेम बदलत्या नंबरनुसार काचा बदलून वापरतात. याच्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही.
मुलाचा पहिला वाढदिवस, पाचवा वाढदिवस खाजगी हाॅल किंवा पार्टी हाॅल घेऊन साजरा-बिजरा करत नाहीत. असल्या कृत्रिम आनंदाची त्यांना गरज नसते. पण मुलांच्या शिक्षणाविषयी मात्र अजिबात तडजोड नसते. अगदी निगुतीनं मुलांना शिकवतात. महागड्या ब्रॅन्डेड गोष्टी चांगल्या असतातच असं नाही, यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळं, चांगली शाळा ते बरोबर निवडतात आणि मुलांना शिक्षण देतात. मुलांना खाऊनही माजू देत नाहीत आणि टाकूनही माजू देत नाहीत. सापशिडीतल्या ९८ आकड्यावरच्या सापाला घाबरायचं नाही, हे आपल्या मुलांना शिकवायला त्यांना कुठल्याही मोटिव्हेशनल ट्रेनरची गरज भासत नाही, ते स्वत:च खंबीर असतात. आवश्यक तेवढी यथाशक्ती बचत करून, साधी सरळ भरवशाची गुंतवणूक आणि साधा जीवनविमा एवढ्यावर त्यांना सुरक्षित वाटतं. गडगंज श्रीमंत होण्याचा हव्यास ते धरत नाहीत. अनैतिक मार्गानं काहीही कमावण्याचा विचारही करत नाहीत. “जोडोनियां धन उत्तम व्यवहारें, उदास विचारें वेच करीं”
या तुकोबारायांनी सांगितलेल्या पक्क्या धारणेनं जगतात. म्हणून त्यांची वखवख होत नाही, त्यांना भस्म्या होत नाही. षड्रिपूंचा त्रास तर अजिबात नाही..
हेच तर खऱ्या अर्थानं निरामय आयुष्य आहे ना..!
घरात महागडं इंटिरिअर नसलं तरी, घरी कामाला येणाऱ्या बाईंच्या मुलांच्या वह्यापुस्तकांसाठी मात्र बरोबर पैसे दिले जातात, अगदी न चुकता. सकाळी दारी आलेल्या वासुदेवाला किंवा समर्थ संप्रदायातल्या माधुकरी मागणाऱ्यांना तांदळाचं माप मिळतंच. दरवर्षी दिवाळीला पोस्टमनला शंभराची नोट मिळते. सगळ्या रेषा कशा अगदी समांतर..
कशाचंही तंगडं कशातही अडकत नाही, कसला गुंता नाही, वैचारिक गोंधळ नाही. बेष्ट आयुष्य..!
समंजस आयुष्य..!
विनाशर्त विनातक्रार संपूर्ण स्वीकारलेलं आयुष्य..!
‘क्रेझ’ या गोष्टीशी यांचा लांबून-लांबून संबंध नसतो. म्हणून यांचे व्याप मर्यादित असतात. आयुष्याकडून फार अपेक्षा नसतात, हट्ट-दुराग्रह तर अजिबातच नाहीत. वर्षाकाठी दिवाळीसारख्या एखाद्-दुसऱ्या प्रसंगी कापड खरेदी वगैरे होते, जमल्यास गुरूपुष्यामृताच्या दिवशी एक ग्रॅम सोनं घरी येतं आणि देवघरात देवासमोर ठेवलं जातं. अट्टाहास कुठलाच नाही. ह्या जगण्याला ते
‘हा माझा मार्ग एकला’
असं म्हणू शकतात, पण
‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’
हे म्हणणं त्यांना साधलेलं असतं. ह्या जगण्याला काय म्हणाल? मिडलक्लास? नाही.
हा तर खरा वरचा क्लास.. विषमभुज त्रिकोणाला सुद्धा समभुज करण्याची अफाट विलक्षण शक्ती ज्यांच्या दृष्टीकोनात ठासून भरली आहे असा क्लास…!
मला फार आनंद आहे की, मी याच क्लासमधला आहे..
मग कुणी त्याला मिडलक्लास म्हणो किंवा मध्यमवर्गीय..
पण हाच आहे खऱ्या शहाण्या माणसांचा क्लास…
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मना सज्जना” – लेखक : श्री तुकाराम नारायण विप्र ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : मना सज्जना
लेखक : श्री तुकाराम नारायण विप्र
९६०४३६३६६०
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, कोल्हापूर.
मूल्य : रु. ३५०/-
☆ मन सज्जना… मनोबोधाचा चिंतनाविष्कार… ☆
श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनोबोध अर्थात मनाचे श्लोक माहित नाहीत असा मराठी माणूस सापडणे कठीण आहे. मनाला ‘ सज्जन ‘ असे संबोधून या मनाचे नेमके काय चुकते आहे, त्याला योग्य मार्गावर कसे आणता येईल यासाठी केलेला उपदेश म्हणजे ‘ मनाचे श्लोक ‘. या श्लोकांचा अर्थ समजावून
सांगणारे, निरुपणात्मक ग्रंथ आतापर्यंत अनेक जाणकार अभ्यासकांनी लिहीले आहेत. साधकांना ते उपयुक्तही ठरले आहेत. कोल्हापूर येथील श्री. योगिसुत अर्थात तुकाराम नारायण विप्र यांनी लिहीलेले ‘ मना सज्जना ‘ हे पुस्तकही असेच सर्व अभ्यासकांना मार्गदर्शन करणारे आहे.
ईश्वर उपासनेचा पारंपारीक ठेवा आणि संत साहित्य अभ्यासण्याची मनोवृत्ती यामुळे श्री. विप्र यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत तुकाविप्र यांचे साहित्य, तसेच ज्ञानेश्वरी, भागवत ग्रंथाचे वारंवार वाचन करुन ते आत्मसात केले आहे. समर्थांच्या मनाच्या श्लोकाविषयी सविस्तर टीका करत असताना त्यांनी या सर्व ज्ञानाचा उपयोग करुन घेतला आहे. ग्रंथाच्या सुरुवातीलाच मनोबोधाची रचना का व कशी झाली याबाबतचा मनोरंजक इतिहास त्यांनी सांगितला आहे. त्यानंतर त्यांनी प्रत्येक श्लोकाचा भावार्थ समजावून दिला आहे. ज्याठिकाणी श्लोक भावार्थात साम्य दाखवतात किंवा एकमेकांशी निगडीत वाटतात त्या ठिकाणी एका पेक्षा जास्त श्लोक एकत्र घेऊन त्यांचा अर्थ स्पष्ट केला आहे. हे सर्व करत असताना धार्मिक व पौराणिक कथा, बोधकथा, संत वचने, ओव्या, दोहे, सुभाषिते यांच्या बरोबरच आजच्या काळातील व्यावहारिक उदाहरणे, आलेले अनुभव, घडलेल्या घटना यांचा भरपूर वापर केला आहे. त्यामुळे प्रत्येक श्लोक समजून घेणे अतिशय सोपे झाले आहे. तरीही ते नम्रपणे म्हणतात, ” संत वचनातील काही छटा चिंतनाच्या माध्यमातून आपल्या हाती लागल्या तर ते चिंतन म्हणजे त्या संत वचनांचा अर्थ नव्हे. कारण संत वचने म्हणजे अमृतसरिता आहे. प्रत्येकाने आपल्या ओंजळीत मावेल तेवढे अमृत घ्यावे. संत वचनाचे हे अमृत आपण ‘ मना सज्जना ‘ ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. हे यथाशक्ती, यथामती केलेले निरुपण आहे. या वचनांचा एवढाच अर्थ आहे असा आपला दावा नाही “.
वारंवार वाचल्याशिवाय या श्लोकांचे आकलन होणार नाही हे खरे असले तरी आध्यात्मिक विषयासंबंधी असणारी भीती किंवा दडपण दूर करण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होईल हे मात्र नक्की. आपल्या जवळील ज्ञान इतरांना वाटून ते अधिक मिळवण्यासाठी वाचकांना उद्युक्त करण्यात लेखक श्री. विप्र यशस्वी झाले आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि अशाच मार्गदर्शक ग्रंथ निर्मितीची त्यांच्याकडून अपेक्षा!
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे।
इस सप्ताह से प्रस्तुत हैं “चिंतन के चौपाल” के विचारणीय मुक्तक।)
साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # १२३ – मुक्तक – चिंतन के चौपाल – २३ ☆ आचार्य भगवत दुबे