हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी #16 ☆ बीती हुई दिवाली की यादें ☆ श्री श्याम खापर्डे

श्री श्याम खापर्डे 

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं । सेवारत साहित्यकारों के साथ अक्सर यही होता है, मन लिखने का होता है और कार्य का दबाव सर चढ़ कर बोलता है।  सेवानिवृत्ति के बाद ऐसा लगता हैऔर यह होना भी चाहिए । सेवा में रह कर जिन क्षणों का उपयोग  स्वयं एवं अपने परिवार के लिए नहीं कर पाए उन्हें जी भर कर सेवानिवृत्ति के बाद करना चाहिए। आखिर मैं भी तो वही कर रहा हूँ। आज से हम प्रत्येक सोमवार आपका साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी प्रारम्भ कर रहे हैं। आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर, अर्थपूर्ण एवं भावप्रवण  कविता “बीती हुई दिवाली की यादें ”। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 16 ☆ 

☆ बीती हुई दिवाली की यादें ☆ 

 

दिवाली के दीप

जब जगमगाते हैं

बीते हुए दिन

याद आते हैं

अब भी-

हर लौ में

तुम मुस्कुराती हो

तुमसे रोशन

घर बार हो जाते है

वो तुम्हारे हाथ में थी फुलझड़ी

वो मेरे हाथ में थी

पटाखों की लड़ी

वो गगन में उड़ते हुए

आकाशदीप

वो मेरे पास थी

तुम्हारी दो आंखें बड़ी-बड़ी

जब तुम छुपकर

छत पे आयी थी।

कितनी छत पर

छाई रोशनाई थी

जैसे अंधेरी रात में

चाँद निकला था

अपनी रात दीपों से

जगमगाई थी।

कितनी स्वादिष्ट

वो मिठाई थी।

जो छुपाकर

तुम लाई थी।

कितने प्यार से

तुमने खिलाई थी।

हम दोनों ने

मिलकर खाई थी।

वो तुम्हारा नया नया परिधान

वो तुम्हारी आन और शान

वो अधखुली आंखों से

तुम्हारे व्यंग बाण

वो तुम्हारा मुझको

करना परेशान

यह बातें जब भी

याद आती है

शान्त लहरों मे

तूफान लाती है

बेमजा हुई

इस जिंदगी में

कुछ पल रंगीनियां

झिलमिलाती है

अब यह सब व्यर्थ है

इन सबका ना कोई अर्थ है

ना जाने तुम कहाँ

और हम कहाँ

आज यह जमाना

दीपोत्सव में गर्क है

 

© श्याम खापर्डे 

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 23 ☆ सरी वर सरी… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 23 ☆ 

☆ सरी वर सरी… ☆

 (अंत्य-ओळ काव्य)

उन्हाळा हिवाळा पावसाळा

अनमोल दातृत्व निसर्गाचे

उन्हाळा संपता संपता

आगमन ते पर्जन्याचे…०१

 

आगमन ते पर्जन्याचे

सरी सर सर येती

सरी वर सर पडतांना

तुषार पाण्याचे उडती…०२

 

तुषार पाण्याचे उडती

इंद्रधनू सुरेख खुले

पाठशिवणीचा खेळ

ऊन सावलीचा चाले…०३

 

ऊन सावलीचा चाले

खेळ हा जन्मोजन्मीचा

निसर्गाच्या करामती

जन्म तोकडा माणसाचा…०४

 

जन्म तोकडा माणसाचा

क्षणभंगुर आयुमान हे

नावालाच ती शंभर वर्षे

स्वप्न जन्म-जन्मांचे पाहे…०५

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हरवलेली कविता ☆ श्री राजेंद्र परांजपे

 ☆ कवितेचा उत्सव ? हरवलेली कविता ? श्री राजेंद्र परांजपे ☆ 

मधुघट पडले कोरडे अन् काव्य झाले सूने !

कवितेस माझिया माझेच घर भासतसे नवे !

 

ना शब्दांची आस ती ना अर्थाचा जिव्हाळा !

कुठे हरवली मम प्रतिभा, पडे प्रश्न मनाला !

 

बहु दिसात न झरले, उतरले काही मनीचे !

नकळे का असे हे जीवघेणे रुसणे शब्दांचे !

 

सांडले ते विषयही अवघे दूर अन् कोठेतरी !

सोडीली साथ माझी, का रुद्ध माझ्यावरी?

 

पाहतो वाट मी, पुन्हा कधी ती प्रसववेदना !

कधी पुन्हा माझ्यावरी होईल प्रसन्न शारदा !

 

अंतर्यामी हरवले जे, ते पुन्हा गवसेल का?

हृदयातली कविता हृदयातूनी प्रसवेल का?

 

© श्री राजेंद्र परांजपे

०७ सप्टेंबर २०२०

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 53 – घडू दे दर्शन ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 54 – घडू दे दर्शन ☆

तुच द्रौपदी, आहिल्या,

सीता, तारा, मंदोदरी।

किती युगे पालटली

कसोटीच्या त्याच परी।

 

इथे लागते  पणाला

रोज द्रौपदी नव्याने ।

कान्हा विसरला आज

धावा ऐकून  धावणे।

 

किती शापीत आहिल्या

शीलारुप गावोगावी।

तया उध्दारीना कोणी

आज रामाच्या अभावी।

 

दिला शब्द पाळणारा

हरिश्चंद्र ना जगती।

रोज लिलाव मांडण्या

हवी त्यास तारामती।

 

लाखो रावण मातले

पेटविल्या सीता किती।

हातबल राम आज

विसरला बाण भाती।

 

ज्ञानी योद्ध्या रावणास

उमजेना मंदोदरी।

पातिव्रत्य दानवाचे

सांभाळते घरोघरी.।

 

सत्व परीक्षा सोडून

करी असूर मर्दन।

काली दुर्गा भवानीचे

पुन्हा घडू दे दर्शन।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ केव्हा तरी पहाटे ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ कवितेचा उत्सव ☆ केव्हा तरी पहाटे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(परीक्षेच्या वेळी लवकर उठून अभ्यास करायला कधीच जमले नाही)

केव्हातरी पहाटे,

उठवून माय गेली.

मिटले तरी मी डोळे

वरडून माय गेली.

पाहू तरी कसे मी,

प्रश्नांचे उत्तर सोपे

घेऊन गाईड माझे

फसवून शांती गेली.

ऐकतो आता कानात

आवाज थपडेचे.

डस्टर मास्तरांनी

फेकून बात केली.

स्मरल्या मलाच तेव्हा

माझ्या टुकार पंक्ती

मग शाल अंगावरची

उडवून माय गेली.

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

मैफिल ग्रुप सदस्य

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अगतिक-भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 1☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

रोजच्या जागी फळांची हात गाडी घेऊन विजयउभा होता. आज गाड्यावर ‘बिटका’ भरला होता. हापूस आंबाच, पण फळ बारीक म्हणून बिटका.

इब्राहिम चाचानं सल्ला दिला होता,”काय आहे ,या वर्षी बाजारात आंबा खूप आलाय. पण हापूस म्हणजे हापुस! त्याची टेस्ट दुसऱ्या कोणत्याही आंब्याला नाही. बिबट्या चा रेट कमी, त्यामुळे गरिबांना पण परवडतो. त्यामुळे विक्री चांगली होईल बघ.”

“खरंच,चाचा किती करतोय आमच्यासाठी.”विजय विचार करीत होता.

चाचा नेहमीच म्हणायचा,”सदा भैया चे फार एहसान आहेत माझ्यावर. अरे, गावातच राहिलो असतो तर चोऱ्यामाऱ्या,आवारागर्दी करत राहिलो असतो. जिंदगी बरबाद झाली असती. पण भैया मला इथं शहरात घेऊन आला. मला भाजी ची गाडी घेऊन दिली. भाजी कशी व्यवस्थित सांभाळायची, विकायची….. धंद्यातले पेच कसे सोडवायचे… या सगळ्या खाचाखोचा समजावल्या. त्यामुळेच आज मी इज्जतची रोटी खातोय. बायको, मुलं आणि मी त्याचे फार शुक्रगुजार आहोत बघ.”

हातगाडी घेऊन विजय उभा राहिला होता खरा, पण त्याचं आज लक्षच लागत नव्हतं. मनात येत होता मागच्या वर्षी चा हाच दिवस…‌ सगळ्यांचा आयुष्य बदलून टाकणारा…. परकेपणाचा दुःख मागे टाकायला लावून जबाबदारीची जाणीव करून देणारा. आजच बाबांचं श्राद्ध झालं. आठवणीनं डोळ्यात आसवांनी दाटी केली. अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. डोळे पुसत पुसत त्यानं  गाडी कडेला लावली…. आणि फुटपाथवर बसकणच मारली.

तो फळांचा गाडा आसवांच्या पडद्याआड नाहीसा झाला. त्याला दिसू लागला हातात बॅट घेतलेला विजय… आठवलं मागचं वर्ष… नुकतीच दहावीची परीक्षा आटोपल्यामुळे मित्रांबरोबरचं खेळणं, दंगा मस्ती! पण हा आनंद जास्त काळ नाही मिळाला.’त्या’ दिवशी सकाळी सकाळीच लवकर आंघोळ करून तो सज्ज झाला होता. एवढ्यात बाबांची हाक ऐकू आली. विजयनं दरवाजा उघडला. भल्या पहाटेच सदानंद फळ मंडईत गेला होता आणि तो आत्ता परतला होता.

“बघ कित्ती मोठं फळ आहे ते. अस्सल हापूसच्या पेट्या आहेत. देवगड हापूस!”

बॉक्सेस कडे बोट दाखवत… त्यातलं एक फळ काढून विजयला दाखवत, त्याच्या हातात देत सदानंद मोठ्या अभिमानाने म्हणत होता,”पुऱ्या मंडईत कुणी इतका महाग माल उचलायला तयार नव्हता. पण मी मोठे धाडस करून उचललाय…. हा सीझन चांगला गेला ना, तर आपला मंडईतील गाळा पक्का. मग असं गल्लोगल्ली गाडा घेऊन फळं नाही विकावी लागणार .”

सदानंद मनातल्या मनात तरंगत होता.

“मी येऊ मदतीला?” विजयनं  विचारलं.

“नको रे बाळा, अजून खाण्या खेळण्याचे दिवस आहेत तुझे. चांगली सुट्टी लागली आहे…. मजा कर.”त्याच्या पाठीवर थाप मारून सदानंद म्हणाला होता.

बापलेकाचा चहा पोळीचा नाश्ता सुरु झाला.

“पोट भरून खा रे… खेळाच्या नादात तुझं खाण्या जेवणाकडं लक्षच कुठं असतं!”आई-सुशीला त्याच्याकडं कौतुकानं पहात म्हणाली …. आणि अज्या,संज्या नाश्ता झाला की तुम्ही दोघं लागा अभ्यासाला. परीक्षा व्हायच्यातअजून तुमच्या.”ती गमतीनं दटावत धाकट्या दोघांना म्हणाली.

“करतात गंअभ्यास… ती पण हुशार आहेत.”सदानंद खुश होऊन बोलत होता.”या तिन्ही मुलांमुळे मला खूप हुरुप येतो. कसला क्लास नाही अन् कुठल्याही विषयाची शिकवणी नाही. त्यांना स्कॉलरशिप मिळतेय, बक्षिसं मिळताहेत, हीच मोठी समाधानाची बाब आहे. हवं तितकं शिकू देत. नंतर एखादा धंदा किंवा चांगली नोकरी!”सदानंद ला आज काय बोलू आणि काय नको असं झालं होतं.

“सदा भैया”जोरात हाक ऐकू आली.

इब्राहिम बाहेर उभा होता. त्याचं हे एक वैशिष्ट्य होतं की घराचा उंबरठा ओलांडून तो कधीही आत यायचा नाही. गाडीवर जरुरी पुरता माल भरून झाला तशी ती दोघं बाहेर पडली.

विजय पण सायकल घेऊन बाहेर पडला. आज दूरच्या टेकडीवरच्या मारुतीच्या मंदिरा पर्यंत सायकल रेस होणार होती. रेस झाली अन सपाटून भूक लागली. घरी आला,… जेवला… आणि लगेचच बॅट घेऊन बाहेर पडला.

“आई ऽऽ… संध्याकाळी मला उशीर होईल गं… आज आमची क्रिकेट मॅच आहे.”अंगणातूनच ओरडून त्यांनं सांगितलं.

बिचारे अजू, संजू मोठ्या असू येनं विजय कडे पहात अभ्यास करत होते.

क्रमशः … भाग- 2

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नातं – आईची आई ☆ सौ.दीपा पुजारी

☆ विविधा ☆ नातं – आईची आई ☆ सौ.दीपा पुजारी 

एकावर एक दोन ड्रेस चढवून वर स्वेटर, त्यावर ओव्हरकोट, डोक्याला माकडटोपी, हॅंडग्लोव्हज, मोजे, बूट अशी जय्यत तयारी करून मी तयार झाले. तेव्हढ्यात हातात गरम चहाचा कप घेऊन माझी लेक समोर ऊभी. सरणारा ऑगस्ट महिना. डब्लिन मधील एक पहाट. डब्लिनवासियांसाठी प्लेझंट पण आमच्यामते गारठलेली पहाट. मुलीने हट्टाने एक दिवसाची Galway-Belfast-Gaints Causeway ची खास आमच्या साठी ठरवलेली ट्रीप. थोड्या नाईलाजानेच मी ऊबदार, मऊ दुलईतून बाहेरआले व स्वत:ची तयारी करू लागले. हे तर केंव्हाच तयार होऊन बसलेले.

हसतमुखपणे गुडमॉर्निंग म्हणून तिने कप मला दिला व ती पुन्हा लगबगीने किचनकडे वळली.काल रात्रीच तिने  आलू पराठे करून ठेवले होते . सोबत शिरा व इतरही किरकोळ खाऊ होता. छानशा पिशवीत सगळे पॅक करून तयार होतेच. “चला चला ,इथे बस  वेळेवर सुटते हं. बाबा, आई आवरा लवकर.” ती हातात लॅच की घेऊन ऊभी.

तिने आम्हांला बाहेर काढलेच. रस्यातून जाताना तिच्या सूचना सुरु होत्याच. काय बघायचे ? कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या? बस कुठे थांबेल? गाईड कशी माहिती सांगेल? इथले नियम कसे कडक असतात. वगैरे….वगैरे….

“आई, २० मि. दिली असतील एखाद्या स्पाॅटला तर १५. मि. बस कडे ये हं. २० मि. म्हणजे अर्धा पाऊण तास नाही हं. वेळ लागला तर ओरडून घेशील मग मूड जाईल तुझा.”

“बाबा,एखाद्या ठिकाणी खूप चालावे लागले पण दमलात तर बसून रहा बाजूच्या बाकावर . नाही चालावे वाटले तर राहू दे.” असे म्हणत तिने स्वत:चे एक कार्ड बाबांच्या हातात ठेवले. बरोबर थोडे युरोही होते. “आई बाबा चहा काॅफी घ्या. काही खावेसे वाटले तर खा. आणी खरेदी ही करा हं.”

मी बसच्या खिडकीतून बाहेर पाहिले. ती हसत हसत हात हलवून निरोप देत होती. ही एव्हढी मोठी कधी झाली? माझ्या नजरेसमोर तर अजून ऊड्या मारत स्कूल युनिफॉर्म मधलीच आहे. शाळेच्या सहलीला जाताना तिची बस दिसेनाशी होईपर्यंत गेटजवळ मी ऊभी असायची हात हलवत. तिचा ऊल्हासित चेहरा, मैत्रिणींच्या बरोबर चाललेल्या गप्पा, टाळ्या, आणी इतक्या मुलींमधूनही एव्हढ्या किलबिलाटात ही ओळखता येणारी तिची हास्य लहर!! तिचा तो अवखळपणा, अल्लडपणा, निरागसपणा जाऊन हा बदल कधी झाला? दुसर्‍या ईयत्तेत असताना एकदा वर्गात रडत होती. बाईंनी कारण विचारले तर आईची आठवण आली म्हणाली. एव्हढ्या लांब परक्या जगात,परक्या वातावरणात कसा निभाव लागणार हिचा? कधी काही बोलली नाही. आज जग फिरुन अनेक अनुभव घेऊन अधिकच समंजस झालीय. आणी आज तर हिने नात्यांचीच अदलाबदल केली.

ही तर माझीच आई झाली. सुजाण, सुशिक्षित, कर्तबगार तरीही आपल्याच आई बाबांची छोटी आई!! मला वाटले हा दिवस लवकर संपावा व घरी जाऊन या ‘आईचीच आई झालेल्या आईच्या’ मांडीवर डोके ठेऊन शांत झोपावे. पिकनिक हून आल्यावर ती दमून शिरायची तसे……अगदी तसेच…….

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :deepapujari57@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आत्मकथ्य – “इंद्रधनुष्य” – श्रीमती माया महाजन – श्रीमती उज्ज्वला केळकर सोबत

श्रीमती माया महाजन

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ आत्मकथ्य – “इंद्रधनुष्य” – श्रीमती माया महाजन – श्रीमती उज्ज्वला केळकर सोबत ☆

(सुश्री नरेंद्र कौर छाबडा या हिंदीतील नामवंत लेखिका. त्यांच्या निवडक लघुतम कथांच्या अनुवादीत कथांचे पुस्तक ‘इंद्रधनुष्य’ नागपूर येथील चंद्रकांत प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.)

इंद्रधनुष्य  : भावनांचे  रंगीबेरंगी आविष्कार

जे मला आवडते ते इतरांनाही सांगावे अशी माझी तीव्र इच्छा असते. म्हणूनच उत्तम दर्जाचे लिखाण वाचले की जो आनंद मिळतो तो इतरांनाही मिळावा या हेतूने, या इच्छेनेच मला अनुवाद क्षेत्राविषयी जवळीक वाटते.

माझी मैत्रीण नरेंद्रकौर छाबड़ा हयांच्या लघु कथा माझ्या वाचनत आल्या आणि त्या उत्तम कथा तुम्हालाही सांगाव्याशा वाटल्या. छाबड़ाजीना ही कल्पना आवडली आणि मी अनुवाद केला . जसजशी मी एकेक काथेचा अनुवाद करीत गेले  तसतशी मी स्तिमित होत गेले. नरेन्द्रकौरजींची दृष्टी केवळ सामान्य गृहिणीची नाही. पाहिलेल्या – अनुभवलेल्या घटनेचे बरे-वाईट प्रतिसाद त्यांच्या मनात उमटतात आणि त्यांच्यातील लेखिका अस्वस्थ होते . मग ते प्रतिसाद शब्दरूप धारण करून अवतरतात आणि वाचकालाही त्यात सामील करून  घेतात . प्रत्येक घटनेचा  विचार मात्र त्या समाज-कल्याणाच्या दृष्टीतून करताना दिसतात . त्या श्रध्द्धाळू देखील आहेत हे त्यांच्या समर्पण पत्रिकेवरूनच जाणवते . परमेश्वराच्या कृपादृष्टीवर त्यांचा नितांत  विश्वास आहे. अशा श्रद्धाळू आणि समाजहितैषी मनाच्या व्यक्तिच्या लेखणीतून तितक्याच भावगंभीर कथा जन्म घेतात – हेच नरेंद्रजिंच्या बाबतीत म्हणता येईल.मुळात मनुष्यजात ही गोष्टीवेल्हाळ आहे . काय घडले हे जाणण्याची उत्सुकता माणसाला ऐकायला, सांगायला आणि वाचायला भाग पाडते. मग हे पद्धतशीर  लिहिणे सांगणे कथेचे रूप घेते.

कथा हा साहित्य-प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय आहे. कथेचे स्वरूप दीर्घ, मोठे, सर्व-साधारण , लघु आणि अतिलघु असे आपोआपच होते. त्याचेच आपण कादंबरी, दीर्घकथा, कथा, लघुकथा  आणि अतिलघुकथा  (अलक) असे वर्गीकरण करतो. माझ्या मते लघुकथा आणि त्यात अलक लिहिणे हे सर्वात आव्हानात्मक काम आहे. लेखनाची सर्व वैशिष्ट्ये-भाषा सौन्दर्य, घटनेची मांडणी, पात्रांचे मनोव्यापार, संवाद  आणि वाचकांना खिळवून ठेवण्याची कला – ह्या सर्वाचा वापर कादंबरी वगैरे प्रकारात सहजपणे केला जाऊ शकतो आणि लघुकथा लेखकाचा इथेच कस लागतो. उत्तम आणि प्रभावी लघुकथा तीच असते जिच्यात हे सर्व गुण आढलतात.  नरेन्द्रकौर जींची कथा या निकषावर यशस्वी ठरते – म्हणूनच ती  वाचनीय झाली आहे. लघुकथेतील आशय नेमकेपणाने पण थोडक्यात मांडला गेला तरच ती प्रभावी ठरते.

नरेद्रकौरजींच्या काही वेचक कथांचा परामर्श इथे उदाहरणदाखल घेणे इष्ट ठरेल.

समाजातील काही  अनिष्ट चालीरीतींना नरेंद्रकौरजीनी आपल्या कथेत असे काही मांडले आहे की वाचक अंतर्मुख होऊन त्या सोडून देण्याच्या निर्णयाप्रत येऊन पोहोचतो. या कथा आहेत – भोज, समाजरीत, अपशकुनी, फालतू, चपराक  वगैरे.

बाई, पान, तिचा आनंद, महिला दिवस , युक्ति  या कथा स्त्रीत्वाची घुसमट साकारतात.  लेखिकेच्या मते  केवळ शिकल्याने  महिला स्वतंत्र होत  नाही तर शिक्षनाने तिच्यात  चूक गोष्टीना ‘नाही‘ म्हणण्याची हिंमत आली पाहिजे. उदा. ‘दुहेरी मानसिकता’ मधे लेक व सून यांच्याशी वागताना बाई कशी फरक करते ते रंगविले आहे; तर ‘पान‘ मधे स्त्रीवर पतिचा प्रभाव किती पराकोटीचा असू शकतो हे दाखविले आहे.’चपराक’ मधे मात्र स्त्री स्वतःच कशी सामाजिक चालीरितींना बळी पड़ते याचे प्रभावी चित्रण आहे. ’महिला दिवस’ या दिवसाची महिलेलाच किती व कशी किमत मोजावी लागते हे एक ज्वलंत वास्तवाचे चित्रण केले आहे ‘महिला दिवस’ या कथेत .

माणूसकी हे सभ्यतेचे दूसरे रूप आहे. नरेन्द्रकौर  यांच्या कथा माणूसकीचे दर्शन घडवताना  थेट आपल्या विचारांचाच कब्जा घेतात. यामधे ‘माणूसकी’  आणि ‘शिक्षा’ या दोन कथा तर जबरदस्त  धक्का देणार्‍या आहेत.’ माणूसकी ‘मधील आतंकवादी  स्वत:च रक्षक होतो तर  ‘शिक्षा‘ मधे एका मुलीची किन्नर कशी सुटका करतात – हे अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.

काही सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न काही कथामधे लेखिकेने केलेला दिसतो. उदा. परिणाम, युक्ति, महिला दिवस, आधुनिकता, फैसला, नात  वगैरे.

माणूस परिस्थितीने लाचार होतो याचे हृदयद्रावक चित्रण आहे ‘मजबूरी, भोज, तडजोड़’ वगैरे कथांमधे.

एकंदरित नरेंद्रकौरजींच्या कथेचे विषय  सर्वत्र संचार करणारे आहेत ;त्याबरोबरच त्यांचे भाषाप्रभुत्वदेखील तितकेच प्रभावी आणि सफाईदार आहे . आजच्या धावपळीच्या दुनियेत लोकाना चटपट मनोरंजन हवे असते – ही जनमानसाची नस त्यानी अलकमधून बरोबर पकडली  आहे. पण ते केवळ मनोरंजन नसून जनजागृतिचे , लोक कल्याण विचारात घेणारे, आणि समाजहितैषी विचार मांडणारे आहे. म्हणूनच मलाही त्यांच्या कथांचा अनुवाद करावासा वाटला. अपेक्षा करते की मी त्याना पूर्ण न्याय दिला आहे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटला, ते पुस्तक वाचून मला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत   – माया महाजन

©   सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

अध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता ☆ पद्यानुवाद – अष्टदशोऽध्याय: अध्याय (43) ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

अध्याय 18  

(सन्यास   योग)

(फल सहित वर्ण धर्म का विषय)

 

शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम्‌।

दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्‌॥

 

शौर्य, तेज, धृति, निपुणता, युद्ध में दृढता , दान

शासन पटुता क्षत्रियों , की स्वभाव पहचान ।।43।।

भावार्थ :  शूरवीरता, तेज, धैर्य, चतुरता और युद्ध में न भागना, दान देना और स्वामिभाव- ये सब-के-सब ही क्षत्रिय के स्वाभाविक कर्म हैं॥43॥

Prowess, splendour, firmness, dexterity and also not fleeing from battle, generosity and lordliness are the duties of Kshatriyas, born of (their own) nature.

 

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’  

ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८

vivek1959@yahoo.co.in मो ७०००३७५७९८

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 72 ☆ हास्य कथा – इन्तकाल के बाद ☆ डॉ कुंदन सिंह परिहार

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे  आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं। आज  प्रस्तुत है एक  अतिसुन्दर हास्य कथा   ‘इन्तकाल के बाद’।  इस हास्य कथा के लिए डॉ परिहार जी के सेन्स ऑफ़ ह्यूमर और लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 72 ☆

☆ हास्य कथा – इन्तकाल के बाद

(‘पैनी चीज़ें पीड़ा देती हैं, नदियाँ गीली हैं, तेज़ाब दाग छोड़ते हैं, और दवाओं से जकड़न होती है। बन्दूकें कानूनी नहीं हैं, फन्दे खुल जाते हैं, गैस भयानक गंध छोड़ती है। बेहतर है कि ज़िन्दा ही रहा जाए।’ – डोरोथी पार्कर)

चौधरी गप्पूलाल पुरुषार्थी व्यक्ति हैं। तीस साल के सुखी वैवाहिक जीवन में उन्होंने आठ संतानें पैदा कीं—पाँच बेटे और तीन बेटियाँ। इसके बाद उन्हें भारत देश का खयाल आ गया। वैसे ही देश जनसंख्या समस्या से त्रस्त है, अब और पुरुषार्थ ठीक नहीं।

एक शाम गप्पूलाल जी घर लौटे। लौटकर पलंग पर पसरकर उन्होंने बड़े बेटे को आवाज़ दी, ‘भुल्लन ज़रा सुनना।’

भुल्लन आज्ञाकारी भाव से हाज़िर हुए। बोले, ‘क्या आदेश है, बाउजी?’

गप्पूलाल जी बोले, ‘आज प्रसिद्ध ज्योतसी अटकलनाथ से मिलने गया। उन्होंने बताया कि मेरी जीवन रेखा संकट में चल रही है। जीवन का कोई ठिकाना नहीं। पता नहीं कब रवाना होना पड़े। इसलिए तैयारी कर लेना चाहिए।’

उनकी पत्नी गोमती देवी कुछ दूर बैठीं पोते के लिए स्वेटर बुन रही थीं। बात को आधा समझकर बोलीं, ‘कहाँ जा रहे हो? खा पी कर जाना। बता देना तो पराठा सब्जी बना दूँगी।’

गप्पूलाल चिढ़ कर बोले, ‘जहाँ हमें जाना है वहाँ पराठा सब्जी नहीं, पाप पुन्न काम आते हैं। हम ऊपर जाने की बात कर रहे हैं। ज्योतसी ने कहा है कि हमारा समय गड़बड़ चल रहा है।’

गोमती देवी शान्ति से बोलीं, ‘जोतखी ने कहा है तो ठीक ही कहा होगा। अपनी सब बीमा पालिसियाँ हमें दे देना। एकाध दिन में चलकर वह दफ्तर भी दिखा देना जहाँ पेमेंट मिलता है। बाद में हम कहाँ भटकते फिरेंगे?’

गप्पूलाल यह सुनकर गोमती देवी को मारने लपके, लेकिन बेटे ने बाँह पकड़कर रोक लिया।

इसी बीच किसी ने भीतर खबर फैला दी कि बाबूजी जायदाद का बँटवारा कर रहे हैं। तत्काल चारों छोटे बेटे बड़ी उम्मीद लिये आकर खड़े हो गये। उनके पीछे, थोड़ा ओट में, बहुएँ भी डट गयीं। बड़ी बहू भी आकर एक खंभे की ओट में खड़ी हो गयी।

गप्पूलाल ने उनकी तरफ देखा, पूछा, ‘तुम लोग किस लिए आये हो?’

दूसरे नंबर का बेटा बोला, ‘कोई कह रहा था कि आपने सब को बुलाया है। ‘

गप्पूलाल गुस्से में बोले, ‘हमें पता है तुम लोग सूँघते हुए आये हो। जहाँ हम ऊपर जाने की बात करते हैं, तुम लोग आसपास मंडराने लगते हो। भागो यहाँ से। तुम्हारी उम्मीद इतनी जल्दी नहीं पूरी होने वाली।’

बेटे और बहुएँ निराशा में मुँह लटकाये, अपने अपने कमरों में चले गये।

गप्पूलाल ने बड़े बेटे से कहा, ‘ज्योतसी ने कहा है तो कुछ ध्यान जरूर देना चाहिए। जायदाद वायदाद तो हमें अपने जीते जी किसी को नहीं देनी, लेकिन कुछ और बातें हैं जिनकी चर्चा करनी है। पहली बात यह है कि अपने धरम में मरने के बाद जो आदमी को जला देते हैं वह अपने को जमता नहीं। आदमी को जरा सी आग छू जाए तो घंटा भर तक कल्लाता है, और यहाँ तो पूरा का पूरा शरीर आग में झोंक देते हैं। किसी को क्या पता कि मुर्दे को क्या तकलीफ होती है। एक बार जाकर कोई लौट कर तो आता नहीं कि कुछ बताये।’

भुल्लन विनम्रता से बोले, ‘बाउजी, मरने के बाद ही जलाते हैं। मरे आदमी को आग का क्या बोध!’

गप्पूलाल हाथ उठाकर बोले, ‘हमें न सिखाओ। हमने एक अखबार में पढ़ा था कि एक साँप ऐसा होता है जो मरने के एक घंटे बाद तक काट सकता है। तो हम तो आदमी हैं, हमारी जान कहाँ और कितनी देर तक अटकी रहती है, किसी को क्या पता।’

भुल्लन बोले, ‘तो फिर क्या हुकुम है बाउजी?’

गप्पूलाल बोले, ‘हुकुम यही है कि हमें आग में मत जलाना। हमें आग बिलकुल बर्दाश्त नहीं होती।’

भुल्लन बोले, ‘आपने बड़े संकट में डाल दिया, बाउजी। अगर आपको आग में जलना पसन्द नहीं तो क्या आप दफनाया जाना पसन्द करेंगे? बता दीजिए तो हम बिरादरी वालों को समझा लेंगे।’

गप्पूलाल दोनों हाथ उठाकर बोले, ‘पागल है क्या? यह भी कोई बात हुई कि आदमी को गढ्ढा खोदकर गाड़ दिया और ऊपर से मिट्टी पत्थर से तोप दिया। मान लो किसी के भीतर साँस बाकी हो और वह साँस लेना चाहे, तो वह तो गया काम से। आदमी अधमरा हो तो मरने का पुख्ता इन्तजाम हो जाता है। नहीं भैया, अपन को यह सिस्टम भी मंजूर नहीं।’

भुल्लन परेशान होकर बोले, ‘तो बाउजी, क्या आपको पारसियों का सिस्टम पसन्द है? वे लोग शरीर को ऊपर टावर पर रख देते हैं और गीध आकर उसे अपना भोजन बना लेते हैं।’

गप्पूलाल गुस्से में बोले, ‘तू मेरा दुश्मन है क्या?तू चाहता है कि मरने के बाद गीध मुझे नोचें? मुझे तकलीफ नहीं होगी क्या?’

भुल्लन हारकर बोले, ‘बाउजी, मेरे खयाल से तो सबसे बढ़िया यह है कि शरीर को नदी में प्रवाहित कर दिया जाए। पवित्र जल में भले भले बह जाए।’

गप्पूलाल बोले, ‘बकवास मत करो। हमें तैरना नहीं आता। तुम हमें नदी में छोड़ोगे और हम सीधे नीचे चले जाएंगे। साँस वाँस सब बन्द हो जाएगी। मछलियाँ चीथेंगीं सो अलग। ना भैया, यह तरीका भी अपने को नहीं जमता।’

इस बीच गप्पूलाल का भतीजा आकर बैठ गया था। मुँहलगा और विनोदी प्रकृति का था। चाचा की बातें सुनकर बोला, ‘चच्चा, सबसे बढ़िया हम आपके शरीर पर मसाला लगवा कर हमेशा के लिए सुरक्षित करवा देंगे और एक कमरे में रख देंगे। जैसे रूस में लेनिन का शरीर रखा रहा ऐसे ही आप भी सालोंसाल आराम फरमाना।’

गप्पूलाल प्रसन्न होकर बोले, ‘आइडिया अच्छा है। इसमें फायदा ये है कि कभी साँस वापस आ गयी तो कम से कम फिर से साबुत खड़े तो हो सकेंगे। देख लेना, अगर तुम लोग खरचा बर्दाश्त कर सको तो ऐसा कर लेना, लेकिन इसमें गड़बड़ यह है कि घर का एक कमरा इसमें फँस जाएगा।’

फिर बोले, ‘फिलहाल ये बातें छोड़ो। ज्योतसी कुछ भी कहे, अभी आठ दस साल हम इस धरती से नहीं हिलने वाले। कभी फुरसत से सोचेंगे कि अपन को कौन सा सिस्टम ‘सूट’ करेगा।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares