मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वो फिर नहीं आते” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “वो फिर नहीं आते” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी…. *वो फिर नहीं आते…. * आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात.

आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्का पलिकडे पोहोचली असतात. मोबाईलमधे त्यांचा नंबर असूनही *“मीच का? ”* या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी हिच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं…. संपर्कात रहायला हवं.

अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना? …. तो संवाद अविरत चालू रहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन… एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं.

ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियतीने दिलेला आशिर्वाद अन् प्रसाद म्हणून भरभरुन वाटलेला…

त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं ….. परत येत नाहीत हो ….. *“वो फिर नहीं आते……”* हि अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं *“मी”* पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून, पुन्हा निरखून पाहायला हवीत … त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली कि ती परत येत नाहीत हो.

गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.

*फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर*

*पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं*

*वो बहारों के आने से खिलते नहीं*

*कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं*

*वो हजारों के आने से मिलते नहीं*

*उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम*

*वो फिर नहीं आते…* 

माणसं हि अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं.

ओळख जितकी जूनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि…

ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.

*आँख धोखा है, क्या भरोसा है*

*दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है*

*अपने दिल में इसे घर बनाने न दो*

*कल तड़पना पड़े याद में जिनकी*

*रोक लो रूठ कर उनको जाने न दो*

*बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम*

*वो फिर नहीं आते…* 

आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली हि आपली माणसं … आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर…यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना…. नसेल तर…. खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल… नाही का?

आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत..

शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.

उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणार्या प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं… तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी.. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची…

 सच कहा है किसी ने…

*… वो फिर नही आते… *

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वरिष्ठता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वरिष्ठता… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

वरिष्ठता – 

 – – वयपरत्वे शांती पूजा – – 

कोणीतरी मला विचारले – 

“आपण ६०, ७०, ८०, ९० आणि १०० या वयांचा इतका मोठा उत्सव का करतो?  हे आकडे आध्यात्मिक आहेत की फक्त सांस्कृतिक परंपरा?  ”

– – याचे उत्तर आपल्याला महाभारतातील राजा ययाती यांच्या प्रभावी कथेत सापडते.

ययातीने आयुष्य मनसोक्त जगले — सत्ता, भोग, यश, सर्व काही. पण जेव्हा अचानक वृद्धत्व आले, तेव्हा तो हादरला. खोल चिंतनानंतर त्याला एक अत्यंत प्रामाणिक सत्य उमगले – – 

“ भोगाला मर्यादा आहे, पण इच्छा कधीच संपत नाही. ”

– – या एका जाणिवेने त्याचे जीवन बदलले. त्याने वृद्धत्व स्वीकारले आणि सांगितले की *आयुष्यात पाच अंतर्गत वळणे (inner turning points) असतात* — ती वयावर नाही, तर समजुतीवर आधारित असतात.

विशेष म्हणजे, ही पाच वळणे आपल्या भारतीय परंपरेतील ६०, ७०, ८०, ९० आणि १०० या टप्प्यांशी जुळतात. हे सर्व आपल्याला समजेल अशा शब्दांत पाहूया.

६० – षष्ठी (Shashti)

संचयातून समजुतीकडे मन वळते – ६० च्या आसपास काहीतरी बदलते — शरीरात नाही, तर प्राधान्यक्रमात.

“आणखी किती मिळवता येईल? ” हा प्रश्न मागे पडतो आणि

“आता खरंच महत्त्वाचे काय आहे? ” असा प्रश्न पुढे येतो.

– हळूहळू अंतर्मुखता सुरू होते. आवाज, कौतुक, टाळ्या यांची गरज उरत नाही. स्पष्टता हवी असते.

– – हे वार्धक्य नाही — महत्त्वाकांक्षेला गाठणारी प्रगल्भता आहे.

७० – भीमरथ शांती (Bheemaratha Shanthi)

शांतता सिद्ध करण्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान वाटते

– ४० आणि ५० मध्ये आपण जगाला स्वतःबद्दल सांगत असतो.

– ७० व्या वर्षी मात्र एक आश्चर्यकारक बदल होतो.

– तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही. वाद आकर्षित करत नाहीत. भांडण जिंकण्यापेक्षा नाती टिकवणे महत्त्वाचे वाटते.

– – तेव्हा उमगते —

बरोबर असण्यापेक्षा शांत असणे अधिक मोलाचे आहे.

म्हणूनच ७० व्या वर्षाचा उत्सव केला जातो.

८० – शताभिषेकम् (Sathabhishekam)

*तुमची उपस्थितीच औषध बनते. *

– – ८० व्या वर्षी लोक सल्ल्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी खोल शोधायला येतात —

ही खात्री की आयुष्य जगता येते, पचवता येते आणि समजून घेता येते.

– या वयात तुमची उपस्थितीच आशीर्वाद ठरते. जास्त बोलण्याची गरज नसते.

– तुमचे अस्तित्वच सांगते —

“सगळं ठीक होतं. आयुष्य मार्ग काढतंच. ”

– – म्हणूनच ८० हा टप्पा पवित्र मानला जातो.

९० – नवती (Navathi)

अहंकार शांतपणे निवृत्त होतो.

९० व्या वर्षी एक दुर्मिळ गोष्ट घडते.

– लोकांना दुरुस्त करावेसे वाटत नाही. मतांवर चिकटून राहावेसे वाटत नाही. गोष्टी वैयक्तिक घेतल्या जात नाहीत. लवकर दुखावले जात नाही.

– – कमकुवतपणामुळे नाही — तर आयुष्य खूप काही दाखवून गेलेले असते, म्हणून किरकोळ गोष्टींवर ऊर्जा वाया घालवावीशी वाटत नाही.

– – एक सौम्य शांतता येते.

ही नम्रताच खरी आध्यात्मिकता असते.  

१०० – शतमानम् (Shatamanam)

आयुष्य वैयक्तिक कथांपलीकडे जाते.. १०० गाठणे म्हणजे केवळ वर्षांची संख्या नाही… ते एक अशी अवस्था आहे जिथे मोठे चित्र दिसू लागते.

– ज्या गोष्टींची काळजी केली, त्या बहुतेक अनावश्यक होत्या, हे कळते.

– ज्यांना प्रेम दिले, तेच खरे महत्त्वाचे होते.

– आणि आयुष्य नेहमीच एखाद्या गूढ, दयाळू शक्तीने धरून ठेवलेले होते, याची जाणीव होते.

१०० व्या वर्षी माणूस “व्यक्ती” कमी आणि “उपस्थिती” अधिक बनतो.

सारांश (Essence)

*आपल्या ऋषींनी वय साजरे केले नाही. वयामुळे होणारे अंतर्गत परिवर्तन त्यांनी साजरे केले. *

  • ६० – प्राधान्यक्रम बदलतात
  • ७० – शांतता हीच शक्ती ठरते
  • ८० – उपस्थिती उपचारक होते
  • ९० – अहंकार शांत होतो
  • १०० – आयुष्य पूर्णत्वाला पोहोचते

– वय म्हणजे अधःपतन नाही.

– – वय म्हणजे गाळण — ज्यातून शहाणपण, कोमलता आणि कृपा शुद्ध होऊन उरते.

*आजचा विचार.. *

वय वाढणे म्हणजे आयुष्य कमी होणे नाही; तर – – 

ते अधिक शुद्ध, सुज्ञ आणि सौम्य होत जाणे आहे

– – – -ही जर अवस्था आणि कृती घडत नसेल तर तुमचं वय आकड्याने वाढले आहे, तुम्ही प्रगल्भ व परिपक्व झालेले नाहीत…

★★★

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आईचा स्पर्श…” लेखक : डॉ. सुजीत पाटील ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आईचा स्पर्श…” लेखक : डॉ. सुजीत पाटील ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

इंजेक्शन भरलेलं हातात होतं, पण मन धजावत नव्हतं…

ऑक्सिजन ८२… ८०…  मॉनिटरचा तो लाल आकडा आणि अलार्मचा कर्कश बीप बीप आवाज!

NICU मध्ये काम करताना आम्हाला या आवाजांची सवय असते, पण कालची रात्र वेगळी होती.

 

२२ दिवसांचं बाळ. फुफ्फुसात संसर्ग (Sepsis). श्वासासाठी आम्ही त्याला बबल CPAP (कृत्रिम श्वास) मशीन लावलं होतं. आमची टीम पूर्ण ताकदीने लढत होती. अँटीबायोटिक्स, सलाईन, नेब्युलायझर… सगळं सुरू होतं… पण बाळ मशीनला रिस्पॉन्सदेत नव्हतं. ते चिडचिड करत होतं, मशीनच्या नळ्यांशी झगडत होतं. ते जेवढं रडायचं, तेवढं ऑक्सिजन लेव्हल खाली पडायचं.

 

माझ्या सहकारी डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलं,

बाळ खूप रेस्टलेसआहे. सिडेटिव्ह (झोपेचं इंजेक्शन) द्यायचं का? “

इंजेक्शन देऊन त्याला शांत करणं सोपं होतं, पण ते तितकंच धोक्याचंही होतं. अशा औषधांमुळे बाळाचा स्वतःहून श्वास घेण्याचा प्रयत्न (Respiratory Drive) मंदावण्याची भीती होती. आधीच बाळ श्वासासाठी धडपडत होतं, त्यात जर श्वास आणखी मंदावला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.

 

ती रिस्क घ्यायला माझं मन धजावत नव्हतं.

मी बाहेर पाहिलं. काचेच्या पलीकडे त्याची आई उभी होती. डोळे सुजलेले, जीव कासावीस.

मी टीमला म्हणालो, “इंजेक्शन नको, आधी आईला आत घ्या. “

तिला आम्ही पूर्ण गाउन-मास्क घालून आत घेतलं. तिने थरथरत्या हाताने त्या इन्क्युबेटरमध्ये हात घातला. बाळाच्या इवल्याशा, सुया टोचलेल्या हातावर तिने आपलं बोट ठेवलं आणि कानात फक्त एकच शब्द उच्चारला…

बाळा… “

– – पुढच्या ३० सेकंदात जे झालं, ते बघून आम्ही डॉक्टर्स असूनही अवाक झालो.

 

जे बाळ औषधांनी शांत होत नव्हतं, ते आईचा स्पर्श होताच एकदम शांत झालं.

त्याच्या हृदयाची धडधड नॉर्मल झाली.

श्वास लयीत आला.

– – आणि मॉनिटर?

जे ऑक्सिजन ८० वर अडकलं होतं, ते बघता बघता ८८… ९२… ९५… ९८% वर गेलं!

हे कुठलंही मॅजिकनव्हतं. हे सायन्स होतं.

.. आईच्या स्पर्शाने बाळाच्या शरीरात ऑक्सिटोसिन‘ (Love Hormone) तयार होतं, जे जगातलं बेस्ट पेन-किलर आणि स्ट्रेस-बस्टर आहे.

– – जेव्हा बाळ रिलॅक्स होतं, तेव्हा आमची औषधं सुद्धा १००% काम करतात.

 

बाळ आता धोक्याबाहेर आहे.

जाताना ती आई हात जोडत होती. मी तिला थांबवून म्हणालो,

ताई, आभार आमचे नका मानू. आम्ही फक्त प्रयत्न केले, पण त्याला बरंतुमच्या स्पर्शाने केलंय. “

– – कधीकधी स्टेथस्कोप ला जिंकायला ‘आईच्या स्पर्शाची’ही साथ लागते.

* * * *

लेखक : डॉ. सुजित भरत पाटील

बालरोगतज्ज्ञ, पुणे

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भविष्याने शिकलेला सर्वात मोठा धडा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “भविष्याने शिकलेला सर्वात मोठा धडा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

महाभारत युद्ध संपले. योद्ध्यांचे फाटलेले कपडे, मुकुट, तुटलेली शस्त्रे, तुटलेली रथाची चाके, आणि वातावरणात एक खोल दुःख पसरले होते.

त्या उजाड भूमीत, गिधाडे, कुत्रे आणि कोल्हे यांच्या दुःखद आणि भयावह हाकांमध्ये, द्वापरचा महान योद्धा देवव्रत भीष्म, मृत्युशय्येवर झोपलेला होता, सूर्य उगवण्याची वाट पाहत होता. एकटाच… तेव्हा त्याच्या कानावर एक परिचित आवाज आला, “प्रणाम (नमस्कार) आजोबा. “

भीष्मांच्या कोरड्या ओठांवर एक मंद हास्य उमटले. तो म्हणाला, “देवकीच्या पुत्रा, ये… स्वागत आहे! मी खूप दिवसांपासून तुमचा विचार करत आहे. “

कृष्ण म्हणाला, “मी काय बोलू, आजोबा? आता मी विचारूही शकत नाही की तुम्ही कसे आहात. “

भीष्म गप्प राहिले. काही क्षणांनी तो म्हणाला, “केशव, तू तुझ्या युधिष्ठिराचा राज्याभिषेक केलास का? त्याची काळजी घे. त्याला आता तुझी सर्वात जास्त गरज आहे, आता या राजवाड्यात, कुटुंबातील वडीलधारी लोक नाहीत. “

कृष्ण गप्प राहिला.

भीष्म पुन्हा म्हणाले, “केशव, मी तुला काही विचारू शकतो का? तू खूप चांगल्या वेळी आला आहेस. कदाचित मी ही पृथ्वी सोडून जाण्यापूर्वी माझ्या अनेक शंका दूर होतील. “

कृष्ण म्हणाला, “कृपया मला सांगा, आजोबा! “

मला एक गोष्ट सांगा, प्रभू! तुम्ही देव आहात, नाही का?

कृष्णाने मध्येच सांगितले, “नाही, आजोबा! मी देव नाही. मी तुमचा नातू आहे, आजोबा, देव नाही.”

भीष्म त्याच्या तीव्र वेदनांमध्येही हसले. तो म्हणाला, “कृष्णा, मी माझ्या आयुष्याचे कधीच मूल्यांकन करू शकलो नाही, म्हणून ते चांगले होते की वाईट हे मला माहित नाही. पण आता मी ही पृथ्वी सोडून जात आहे, कन्हैया, कृपया मला फसवणे थांबवा… “

कसे तरी, कृष्ण भीष्मांच्या जवळ गेला, त्याचा हात धरला आणि म्हणाला, “कृपया मला सांगा, आजोबा! “

भीष्म म्हणाला, “मला एक गोष्ट सांग, कन्हैया! या युद्धात जे घडले ते बरोबर होते का? “

“आजोबा, कोणाच्या बाजूने? पांडवांच्या बाजूने? “

“कनहैया, आता कौरवांच्या कृतींवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, पण पांडवांच्या बाजूने जे घडले ते बरोबर होते का? आचार्य द्रोणाचा वध, दुर्योधनाच्या मांडीखाली हल्ला, दुशासनाची छाती कापणे, जयद्रथाची फसवणूक, निःशस्त्र कर्णाचा वध – हे सर्व बरोबर होते का? हे सर्व न्याय्य होते का? “

– आजोबा, मी याचे उत्तर कसे देऊ? ज्यांनी ते केले त्यांनी हे उत्तर द्यावे. दुर्योधनाचा वध करणाऱ्या भीमाला उत्तर देऊ द्या; कर्ण आणि जयद्रथाचा वध करणाऱ्या अर्जुनाला उत्तर देऊ द्या. मी या युद्धात अजिबात नव्हतो, आजोबा! “

“कृष्णा, तू मला फसवणं थांबवणार नाहीस का? जग म्हणेल की अर्जुन आणि भीमाने महाभारत जिंकला, पण मला माहिती आहे, कन्हैया, हा विजय तुझा आहे आणि फक्त तुझाच आहे. मी तुला विचारेन, कृष्णा! “

-“तर ऐका, आजोबा! काहीही वाईट घडले नाही, काहीही अनैतिक घडले नाही. जे घडले तेच घडले पाहिजे होते. “

-केशव, तू हे म्हणत आहेस का? सर्वात प्रतिष्ठित पुरुष रामाचा अवतार असलेला कृष्ण हे म्हणत आहे? ही क्रूरता कोणत्याही युगात आपल्या शाश्वत परंपरेचा भाग नव्हती, मग ते कसे न्याय्य आहे? “

-इतिहासातून शिकायला मिळते, आजोबा, पण निर्णय सध्याच्या परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. प्रत्येक युग स्वतःच्या तर्क आणि गरजांनुसार आपला नेता निवडतो. राम त्रेता युगाचा नायक होता, द्वापर युग माझे भाग्य होते. “आम्हा दोघांचा निर्णय सारखा असू शकत नाही, आजोबा. “

-मला समजले नाही, कृष्णा! कृपया समजावून सांगा…

-राम आणि कृष्णाच्या परिस्थितीत खूप फरक आहे, आजोबा! रामाच्या काळात, रावणसारखा खलनायक देखील शिवभक्त होता. रावणसारख्या नकारात्मक शक्तीच्या कुटुंबातही विभीषण आणि कुंभकर्णसारखे संत होते. बालीसारख्या खलनायकाच्या कुटुंबातही तारासारख्या विद्वान स्त्रिया आणि अंगदसारखे उदात्त पुत्र होते. त्या काळात, खलनायकांनाही धर्माचे ज्ञान होते. म्हणूनच रामाने त्यांना कधीही फसवले नाही. पण माझ्या काळात कंस, जरासंध, दुर्योधन, दुशासन, शकुनी आणि जयद्रथ सारखे गंभीर पापी पाहिले आहेत. त्यांना संपवण्यासाठी प्रत्येक फसवणूक न्याय्य आहे, आजोबा. पापाचा अंत करणे आवश्यक आहे, आजोबा, पद्धत काहीही असो.

-तर, तुमच्या या निर्णयांमुळे केशव, चुकीची परंपरा सुरू होणार नाही का? भविष्य तुमच्या फसवणुकीचे अनुसरण करणार नाही का? आणि जर तो असे करेल तर ते योग्य असेल का? “

– भविष्य आणखी नकारात्मक दिसत आहे, आजोबा. कलियुगात, हे देखील पुरेसे नाही. तिथे, मानवांना कृष्णापेक्षाही अधिक निर्दयी व्हावे लागेल, नाहीतर धर्माचा नाश होईल. जेव्हा क्रूर आणि अनैतिक शक्ती धर्म पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आक्रमण करत असतात, तेव्हा नैतिकता निरर्थक बनते, आजोबा! मग जे महत्त्वाचे आहे ते विजय आहे, फक्त विजय. भविष्याने हे शिकले पाहिजे, आजोबा. “

-“धर्माचा नाश देखील होऊ शकतो का, केशव? आणि जर धर्माचा नाश होणारच असेल, तर मानव ते थांबवू शकतो का? “

-“सर्वकाही देवाच्या दयेवर सोपवणे मूर्खपणाचे आहे, आजोबा! देव स्वतः काहीही करत नाही; मानवांना सर्व काही करावे लागते. तुम्ही मलाही देव म्हणता! तर मला सांगा, आजोबा, मी या युद्धात वैयक्तिकरित्या काही केले का? सर्व पांडवांना ते करावे लागले, बरोबर? हा निसर्गाचा नियम आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी मी अर्जुनाला हेच सांगितले होते. हेच अंतिम सत्य आहे. “

भीष्म आता समाधानी दिसत होता. त्याचे डोळे हळूहळू बंद होत होते. तो म्हणाला, “चला कृष्णा! ही माझी पृथ्वीवरील शेवटची रात्र आहे. ” उद्या मला निघून जावे लागू शकते… तुमच्या या दुर्दैवी भक्तावर दया करा, कृष्ण! ”

कृष्णाने स्वतःशी काहीतरी बडबड केली, भीष्मांना नमस्कार केला आणि मागे वळले. पण युद्धभूमीच्या त्या भयानक अंधारात, भविष्याने जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकला होता.

जेव्हा अनैतिक आणि क्रूर शक्ती धर्माचा नाश करण्यासाठी आक्रमण करत असतात, तेव्हा नैतिकतेचा धडा आत्मघातकी असतो.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘दोन डोळे आणि तीस म्हणी…’ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘दोन डोळे आणि तीस म्हणी… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

— — *पहा माय मराठीची समृद्धी* 

१. डोळा लागणे (झोप लागणे)

२. डोळा मारणे (इशारा करणे)

३. डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)

४. डोळे येणे (नेत्रविकार होणे)

५. डोळे जाणे (दृष्टी गमावणे)

६. डोळे उघडणे (सत्य उलगडणे)

७. डोळे मिटणे (मृत्यू पावणे)

८. डोळे खिळणे (एकटक पाहणे)

९. डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)

१० डोळे दिपणे (थक्क होणे)

११. डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)

१२. डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)

१३. डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)

१४. डोळे भरून येणे (रडू येणे)

१५. डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)

१६. डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)

१७. डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)

१८. डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)

१९. डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)

२०. डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)

२१. डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)

२२. डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)

२३. डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)

२४. डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)

२५. डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)

२६. डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)

२७. डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)

२८. डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)

२९. डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)

३०. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे) 

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रामाचे दर्शन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रामाचे दर्शन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

रामाचे दर्शन – – 

श्री. तुलसीदासांना एकदा एका भक्ताने विचारले की…

“महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का? “

तुलसीदास म्हणाले :- “हो”

भक्त :- मला पण दर्शन घडवाल का???

तुलसीदास :- “हो नक्की”

★ *तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं, जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेल!!!*

*तुलसीदास म्हणाले, “”अरे हे खुप सोप्पं आहे!!! तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील. “”*

*प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल. * 

त्यासाठी मी तुला एक *सुत्रश्लाेक* सांगतो.

त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सुत्र लागु होईल!!!

भक्त :-“कोणते सुत्र? “

*तुलसीदास* :- हे ते सुत्र…

||”नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण ||

|| तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम || “

वरील सुत्राप्रमाणे

★ *आता कोणाचेही नांव घ्या, त्याची अक्षरे माेजा*…

*१)त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा*.

*२)त्यात (पंचतत्व मिलन) ५ मिळवा. *

*३)त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा. *

*४)आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा. *

*””पुर्ण भाग जात नाही!!!*

*दरवेळेस बाकी २ शिल्लक राहतेच*…

*ते दोन म्हणजेच “राम” ही दोन अक्षर होय*…

 

★विश्वासच बसत नाही ना???

उदा. घेऊ…

कोणाचेही नाव निवडा, अक्षर कितीही असोत!!!

 

★ उदा… निरंजन… ४ अक्षरे

१) ४ ने गुणा ४x४=१६

२)५ मिळवा १६+५=२१

३) दुप्पट करा २१×२=४२

४)८ ने भागा ४२÷८= ५पुर्णांक, बाकी मात्र २!!!

*बाकी नेहमी दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे – “राम”!!!*

*विशेष म्हणजे सुत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे*!!!

 

★1) *चतुर्गुण* म्हणजे *४ पुरुषार्थ* :- *धर्म, अर्थ, काम, मोक्ष*!!!

 

★2) *पंचतत्व* म्हणजे *पंचमहाभौतिक* :- *पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश*!!!

 

★3) *द्विगुण प्रमाण* म्हणजे *माया व ब्रह्म* असे दोन!!!

 

★4) *अष्ट सो भागे* म्हणजे *अाठ दिशांनी* (*चार दिशा* :-पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, *चार उपदिशा* – आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, *आठ प्रकारची लक्ष्मी* (आग्घ, विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग आणि योग लक्ष्मी)

 

★आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासून पहा…

विस्मयकारक वाटेल पण बाकी नेहमी २ च येईल…

*यात तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची व अतुट रामभक्तीची ओळख पटते*!!!

*जय श्रीराम* 

कवी:अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अर्जंट पाहिजेत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ अर्जंट पाहिजेत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

अर्जंट पाहिजेत

– – –  इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा

 

एक शिंपी पाहिजे,

जो एकमेकांची तुटलेली नाती शिवु शकेल

एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,

जो एकमेकांशी न बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये

पुन्हा एकदा कनेक्शन जोडून देईल,

एक ऑप्टिशियन पाहिजे,

जो लोकांची दृष्टी आणि

दृष्टीकोन नीट करून देईल,

एक कलाकार पाहिजे,

जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित

हास्याच्या रेषा रेखाटू शकेल,

एक बांधकाम कामगार पाहिजे,

जो दोन शेजाऱ्यांमध्ये

उत्तम सेतू उभारू शकेल,

एक माळी काका पाहजे,

जो चांगल्या विचारांच

रोपण करू शकेल,

एक प्लंबर पाहिजे,

जो तुंबलेल्या मनांना

मोकळं करू शकेल,

एक शास्त्रज्ञ पाहिजे,

जो एकमेकांबद्दलची

ओढ शोधू शकेल,

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,

एक शिक्षक पाहिजे,

जो एकमेकांशी संवाद कसा

साधायचा ते शिकवू शकेल,

आज तुम्हा-आम्हा, सर्वांना

याचीच नितांत गरज आहे..!!

संपर्क :- माणसाने माणसाशी करावा.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खूप छान वाटतंय…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “खूप छान वाटतंय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

* खूप छान वाटतंय… *

*आयुष्याच्या संध्याकाळी आपली मुले जेव्हा काळजी घेतात तेव्हा* 

*खूप छान वाटतंय… *

 

बालपणी ज्यांना चिऊ काऊचे घास भरवले,

आज ते मला, आई खाऊन बघ छान आहे, म्हणून 

आपल्या घासातला घास भरवतात..

*खूप छान वाटतय.. *

 

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई,

आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात..

*खूप छान वाटतय.. *

 

ज्यांची बोटं धरुन अक्षरांशी ओळख करून दिली,

आज ते माझी नवीन टेक्नॉलॉजीशी ओळख करुन देतात..

*किती मजा वाटते आहे.. *

 

ज्यांना हात धरुन रस्ता ओलंडला,

आज ते माझा हात धरुन रस्ता ओलंडतात,

हातांची अदलाबदल कधी झाली कळलंच नाही..

*पण खूप छान वाटतय.. *

 

चालताना उड्या मारु नकोस रे पडशील, असं म्हणणारी मी..

आणि आज, आई हळू पुढे खड्डा आहे म्हणणारे ते,

एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही..

*पण खूप छान वाटतय.. *

 

रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी..

आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही..

*पण खूप छान वाटतंय.. *

 

प्रयत्न करून बघ, शिकवलंय ना मी तुला, असे म्हणणारी मी आणि आज.. सोपंय ग, एकदा शिकलीस की येईल तुला, असे सांगणारे ते..

*किती गम्मत वाटते आहे.. *

 

ज्यांचा बरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते आई हे गाणं ऐकलंस का, बीट्स आवडतील बघ तुला, असं म्हणतात तेव्हा काय सांगू काय वाटतं…

*लय भारी वाटतंय.. *

 

शाळेच्या पिकनीकला जाताना, बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बस मध्ये बसवणारे ते..

शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या

*किती मस्त वाटतय.. *

 

त्यांना काही होत असेल तर, घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर, कासावीस होणारे ते..

*किती कृतकृत्य वाटतंय.. *

 

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे, हे सांगणारी मी, आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात..

*किती अभिमान वाटतो.. *

 

मुले घरात दिसली नाहीत तर, कासावीस होणारे बाबा आणि आज, हे काय, बाबा अजून आले नाहीत म्हणणारी मुलं..

परत शब्द तेच, काळजी तीच, भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही..

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले..

*खूप छान वाटतंय.. *

 

नकळत संस्कार घडले,

नकळत भूमिका बदलल्या,

नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला..

*खूप धन्य वाटतंय.. *

★★★

लेखक : अज्ञात 

संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक मोलाचा धडा…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक मोलाचा धडा…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

एका व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतून एक प्रचंड हिरा विकत घेतला — अगदी अंड्याच्या पिवळ्या बलकाएवढा मोठा. पण त्याची निराशा झाली, कारण त्या हिऱ्यामध्ये आतून एक भेग होती.

एका कुशल ज्वेलरकडे जाऊन मार्गदर्शन मागितले त्याने. ज्वेलरने नीट निरीक्षण करून सांगितले:

“हा हिरा दोन परिपूर्ण रत्नांमध्ये विभाजित करता येईल, आणि दोन्हीची किंमत मूळ हिऱ्यापेक्षा जास्त असेल.

पण एक चुकीचा घाव बसला तर तो तुकड्यांत फुटेल आणि पूर्णपणे निरुपयोगी होईल. मी असा धोका घेणार नाही. ”

व्यापारी जगभर फिरला — अनेक देशांतील दागिनेकारांना तो हिरा दाखवला.

प्रत्येकाचं उत्तर एकच — धोका खूप मोठा.

शेवटी कोणीतरी त्याला अॅमस्टरडॅममधील एका वृद्ध ज्वेलरबद्दल सांगितले —

ज्याच्या हाताला सोनेरी स्पर्श असल्याची ख्याती होती.

तो त्याच दिवशी तेथे पोहोचला.

वृद्ध ज्वेलरने हिऱ्याकडे भिंगातून पाहिले आणि पुन्हा इशारा केला.

तेवढ्यात व्यापाऱ्याने मध्येच बोलत म्हटले:

“ही कथा मी अनेकदा ऐकली आहे.

आता मी तयार आहे. फक्त हे काम करून टाका. ”

ज्वेलरने मान हलवली, किंमत ठरवली, आणि मग शांतपणे शेजारी काम करणाऱ्या एका तरुण शिकाऊकडे वळला.

त्या मुलाने हिरा हातात घेतला, तळहातावर ठेवला, आणि एकच स्वच्छ, अचूक प्रहार केला.

हिरा सुंदरतेने दोन निर्दोष रत्नांमध्ये विभागला.

… त्याने वर बघितलेही नाही — फक्त ते रत्न परत गुरूकडे दिले.

आश्चर्यचकित व्यापाऱ्याने विचारलं:

“हा मुलगा तुमच्याकडे कित्येक वर्षे काम करत असेल? ”

वृद्ध ज्वेलर शांतपणे हसला:

“याचा कामाचा तिसरा दिवस आहे.

त्याला त्या हिऱ्याची खरी किंमत माहिती नाही…

म्हणूनच त्याचा हात थरथरला नाही. ”

✨ धडा:

कधी कधी आपण काहीतरी गमावण्याची जितकी जास्त भीती बाळगतो, तितकेच ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे, त्या करण्याची क्षमता आपल्यात कमी होते.

जीवनातील आव्हानांना तितकं जड समजू नका, त्यांना हलकं माना…

तेव्हाच तुमचा हात स्थिर राहील.

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कट्टी आणि बट्टी…- लेखक : अज्ञात ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचताना वेचलेले ?

☆ कट्टी आणि बट्टी… लेखक : अज्ञात ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

“कट्टी आणि बट्टी”, दोन साधे शब्द, पण मानसिक स्वास्थ्याच्या दोन गुरू किल्ल्या..

आपल्या सगळ्यांच्या बालपणात हे दोन शब्द* आपल्या आयुष्याचा भाग नक्की असायचे.

कट्टी म्हणजे आपलं पहिलं *emotional withdrawal*.

ना भांडण, ना आरडाओरड, ना मोठं स्पष्टीकरण…

*फक्त शांतीपूर्वक घेतलेली तात्पुरती माघार*.. …

“मला तुझ्याशी बोलायचे नाही. ”

त्याचा साधा अर्थ होता

*“मी दुखावले आहे … पण ते कसं सांगायचं कळत नाही*. ”

आणि बट्टी?

ती म्हणजे दुरुस्ती.

थोडी *awkward* असायची..

थोडी न बोलता झाली तरीपण लगेच व्हायची… *आपलं मन शांत झालं की लगेच*..

*ना माफीची गरज*

*ना कुठले स्पष्टीकरण* …

*एक चॉकलेट शेअर व्हायचे*

*एक चोरटे हसू यायचे*…

एक *“चल ना, जाऊ दे ना”*

आणि सगळं पुन्हा मस्त!

लहानपणी आपण *emotional regulation* चांगलं करायचो…

फक्त हा शब्द माहीत नव्हता.

पण *शरीराने वयाने मोठे होताना मनाचा मोठेपणा मात्र लहान होत गेला*…

आता मोठेपणी कट्टी झाली की

*Emotional distance*,

*Ghosting*,

*थंड responses*,

लांबलेला आणि अहंकाराच्या खांद्यावर बसलेला अबोला…

न वाचलेले मेसेज,

कधीकधी वरवरची नम्रता.

कोरडे बोलणे…

*आणि बट्टी..? *

ती मात्र कठीण होत गेली.. बर्‍याचदा झालीच नाही..

*निरागसपणा गेला*,

*अहंकार आला*

*आणि अबोला कायम त्याच्या खांद्यावर घर करून बसला*…

आपण *“तू दुखावलंस मला”* न म्हणता, बाहेरून

*“ठीक आहे”* म्हणायला शिकलो…

आणि *आतून मात्र त्याच्यापासून दूर चालायला लागलो*…

*आपण वस्तू दुरुस्त करायला जसे विसरलो* तसेच उसवलेल्या *फाटलेल्या मनालासुद्धा दुरुस्त करायला विसरलो*.

मनात साठवून ठेवायला लागलो…

*भावनांच्या जागी हिशेब आणि गणिते ठेवू लागलो*.. ,

आणि *डोक्याला त्रास नको म्हणून लांब रहायला लागलो*..

*लहानपणी कट्टी ही तात्पुरती असायची, *

*पण मोठेपणी ती कायमची झाली*…

आपण विसरलो —

*कट्टी म्हणजे शिक्षा नव्हती*,

*फक्त दुखावलेल्या मनाला थोडी space हवी* असायची म्हणून हक्काने घ्यायचो…

आणि *बट्टी म्हणजे जिंकणं किंवा हरणं नव्हतं, ते होतं पुन्हा आपल्या मूळ स्वभावात येणं*..

आपल्या अमूल्य अशा मैत्रीला जगणं…

भक्कम नाती ती नसतात *जिथं भांडणं होत नाहीत*,

भक्कम नाती ती असतात जिथं *“बट्टी” अबोल्याला अहंकाराच्या खांद्यावरून खाली घेते* आणि पुन्हा एकदा गप्पिष्ट बनविते…

*मोठं होणं म्हणजे कट्टीला टाळणं नाही तर बट्टीला कडेवर घ्यायचा मोठेपणा दाखवणं*..

*हेच खरं ‘कटी-बट्टी’चं सौंदर्य*

*

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares