मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पाहू,आस्वादक होऊ ☆ श्री ओंकार कुंभार ☆

?  विविधा ?

☆ निसर्ग पाहू,आस्वादक होऊ ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

सजगतेने निसर्ग पाहू.

निसर्गाचे आस्वादक होऊ.

एका बाजूला उन्हाळ्याचा दाह वाढत आहे आणि दुसरीकडे याच कालावधीत निसर्गात सुंदर अशी फुले फुलली आहेत. आपण आपल्या माना वर करून सजगतेने इकडे तिकडे पहायला हवे बस्स.

सुरुवातीला दिसू लागला तो निलमोहोर . सुंदर गडद निळसर असे झुबके संपूर्ण झाडावर पसरलेले आपणाला पहायला मिळतात. निलमोहराची मोहिनीच आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. पाहातच रहावे असे वाटते.

त्यानंतर दिसू लागला तो पळस . आहाहा…

हाताची बोटे एकत्र करून वरती केल्याप्रमाणे याचा आकार. तशी जाडसर पाने असलेली भरपूर फुले. पानच नसतं या कालावधीत पळसाला. इतरवेळी उघडा बोडका वाटणारा पळस उन्हाळ्याची चाहूल लागताच आग लागावी तसा बहरतो. जंगलात पळसाची अगदीच कुठेकुठे झाडे असतील तर संपूर्ण झाडाला आग लागल्यासारखा भास होतो. म्हणून याला Flame of the Forest संबोधले जाते. पळसात पण विविधता आढळते. पळसाला पाने तीनच. असे म्हंटले जाते. पळसाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळ्या केल्या जातात. काही ठिकाणी पळस गर्द लाल चुटुक, तर काही अबोली, फिकट लालसर, तर पिवळाही काही ठिकाणी. पळस फुलल्यावर पक्ष्यांना एक छान मेजवानीच असते. पळसावर विविध प्रकारचे पक्षी मधुपानासाठी आलेली आपणाला पहायला मिळतात. त्यातल्या त्यात सूर्यपक्षी, साळुंखी,मैना आणि बुलबुल जास्तीत जास्त काळ पळसाचा आस्वाद घेताना आढळतात. पळसही दिसायला देखणा दिसतो. झाडाखाली पळस फुलांचा सडा पडलेला पहायला मिळतो.

याच कालावधीत काटेसावर ही फुलते. पळसासारखेच इतर मोसमात रुक्ष असणारे हे झाड उन्हाळा जवळ येताच सुंदर फिकट लाल वा गुलाबी वा केशरी फुलांनी बहरते. याला कमी पण सुंदर फुले लागतात. हाताची बोटे वर करून पसरल्याप्रमाणे याचा आकार असतो. यातही विविधता आढळते. ही फुलेही सुंदर, डोळ्यांना आनंद देणारी वाटतात. काटेसावर फुलांच्या मकरंदाचा आस्वादही अनेक पक्षी घेतात.

यानंतर वर्षातून दोनवेळा बहरणारा सोनमोहोर ही आपले लक्ष वेधून घेतोच. याचे झाड मात्र मोठे असते आणि भरपूर पिवळाई या कालावधीत या झाडाला आलेली असते. या कालावधीत झाडाखाली पिवळा सडाच पडलेला असतो. हेही झाड रखरखत्या उन्हात डोळ्याना छान आनंद देणारे असते.

जरा उशिरा फुलणारा गुलमोहर . यातही विविध प्रकार पहायला मिळतात. काही गुलमोहोर लालभडक, तर काही फिकट लालसर, तर काही फिकट गुलाबी. तर काही अबोलीच्या जवळ जाणारी रंगसंगती असते. काही गुलमोहर वर्षभर उघडे बोडके असतात, काही वर्षभर हिरवळ धारण करतात. पण जसा उन्हाळा जवळ येईल तसे झाडाला शेंगा लागायला सुरुवात होते. नंतर हळूहळू शेंगा फुटून लाल फुलांचा बहर झाडभर पसरतो. काही पूर्ण झाडे लाल भडक दिसायला लागतात, तर काहींवर थोडी हिरवी पालवी आणि गुलमोहराची लालिमा पसरलेली दिसते. खरच विविध प्रकारचा गुलमोहोर अबालवृद्धांचे मन मोहून टाकतो.

याच कालावधीत उशीरा फुलणारे आणखी एक सुंदर झाड म्हणजे बहावा ( गोल्डन शाँवर ). याही झाडाला कुसुमसंभार येण्यापूर्वी लांबुळक्या शेंगा लागतात आणि काही कालावधी नंतर शुभ्र पिवळी फुले लागायला सुरुवात होते. पाहतापाहता काही दिवसातच शुभ्र पिवळ्या फुलांनी संपूर्ण झाड लगडते. याचे गोल्डन शाँवर हे नाव समर्पक आहे. कारण, झाडभर शुभ्र पिवळे झुबके लोंबत असतात. या झाडावरही भरपूर पक्षी मधुपानासाठी येतात. विशेषकरून भरपूर प्रमाणात विविध प्रकारचे भुंगे मधुपानाचा आस्वाद घेताना दिसतात. काय अप्रतिम नजारा असतो. आहाहा…

पाहतच रहावे असे वाटते.

रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करायला बाहेर पडावे आणि कोठूनतरी रातराणी चा सुगंध दरवळावा. सुगंध नाकात शिरताच एक क्षणभर समाधीच लागते. काय तो मोहक मंद सुगंध.     वाSSह.

 

© ओंकार कुंभार

📱9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समर्थ रामदासांचे कार्य…. ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

डाॅ.व्यंकटेश जंबगी

 

?  विविधा ?

☆ समर्थ रामदासांचे कार्य…. ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

“समर्थाचिया सेवका वक्र पाहे

असा सर्व भूमंडळी कोण आहे

जयाची लीला वर्णिति लोक तिन्ही

नुपेक्षी कदा रामदासाभिमानि”

समर्थांच्या कार्याची ओळख करून देण्यास पुरेसा आहे.वास्तविक “समर्थ”हे विशेषण रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामांना दिले आहे.परंतु स्वामींचे कार्य पाहून लोकांनीच त्यांना समर्थ ही उपाधि दिली.

शक्ती आणि भक्ती दोन्ही समर्थांच्या ठिकाणी होते. छत्रपति शिवाजी महाराज हे स्वामींचे समकालीन होते.त्या काळात रयतेवर,महिलांवर अन्याय होत होता.हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे राजे आणि स्वामी दोघांचे कार्य समकक्ष होते.दिशा समांतर होत्या.राजे युद्ध, स्वारी,तह, राजकारण यात व्यस्त असत,पण त्यांनी ठिकठिकाणी योद्धे सिद्ध केले होते.समर्थांनी श्रीरामावर श्रद्धा ठेवून युवकांना बलोपासना शिकविली.अनेक मारूती मंदिरांची स्थापना शक्तिची देवता म्हणून स्थापन केली.समर्थ अनेक पातळ्यांवर एकाच वेळी यशस्वी होत होते.त्यांनी महाराष्ट्रभर रामदासी सिद्ध केले होते. समर्थ निर्भय, निर्भीड,स्पष्ट होते.ब्रम्हांडापलिकडे रामकथा गेली पाहिजे असे ते म्हणत.. ते सांस्कृतिक अधिकारी होते.. लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन करण्याची त्यांची क्षमता होती… छत्रपती शिवाजी महाराज यांचेशी समर्थांची राजकारणाबरोबर तत्वज्ञानावरही होत असे.दोघांचे मार्ग वेगळे पण लक्ष्य एकच…..

हिंदवी स्वराज्य स्थापन करणे !

दोघांनी एकमेकांच्या क्षमतेची जाण होती…आदर होता… विश्वास होता…”.रामदास स्वामी नावाचा कोणी साधू महाराष्ट्रात आहे,त्यांचा दरारा राज्यात आहे”असे पोर्तुगीज लेखक कास्पोर्दि गार्डा याने लिहिले आहे.

“संत” या कक्षात समर्थ बसणारे नव्हते.संत म्हणजे सहिष्णु,नम्र, क्षमाशील, सोशिक…..पण समर्थ तसे नव्हते ते जिथे आवश्यक तिथे शांत,पण तेवढेच आक्रमक होते:-

“सुभटासि व्हावे सुभट

ठकासि व्हावे महाठक”

असे त्यांनी सांगितले. छत्रपति शिवाजी महाराजांच्या मध्ये आणि समर्थांमध्ये हे विलक्षण साम्य होते ईश्वरभक्तांनी उगीच मिळमिळीत राहू नये,नेटका प्रपंच करावा,संपन्न जीवन जगून ही भक्ती करता येते.असे त्यांचे मत होते.भक्तांनी लाचारी, गयावया का करावी ?, प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वास कसा असावा? सज्जन भक्तांचे रक्षण आणि शत्रूंचा बीमोड त्यांनी करून दाखविला: –

“सामर्थ्य आहे चळवळीचे,

जो जो करील तयाचे

परंतु तेथे भगवंताचे

अधिष्ठान पाहिजे”

हा महान संदेश महाराष्ट्र संकटात असताना त्यांनी दिला.

समर्थांचा शिष्यगण आणि भक्तगण प्रचंड होता.मठ ऐश्वर्यवान होते..त्या ऐश्वर्याचा विनियोग त्यांनी स्वराज्यासाठी केला.ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो म्हणतो,”समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तत्वज्ञानी आणि राज्यकर्ता असा पूरक संयोग होता.

स्वामी एकांतप्रिय आणि अनेकांतप्रियही होते.म्हणून दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके हे लोकप्रिय झाले.शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती शंभूराजेंना

लिहीलेल्या पत्रात समर्थ प्रारंभी लिहितात :-

“शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप

भू मंडळी…”

अशा अनेक उपदेशाने छत्रपती संभाजी महाराज यांना समर्थांनी धीर तर दिलाच,पण कर्तव्याची जाणीव करून दिली.

यापेक्षा मोठे कार्य काय असेल ?

लिहीण्यासारखे अनंत आहे पण लेखनसीमेचा आदर करून इथेच थांबतो.

! !जय जय रघुवीर समर्थ!!

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्केच – भाग दुसरा ☆ श्री शरद दिवेकर

श्री शरद दिवेकर

?  विविधा ?

☆ स्केच – भाग दुसरा ☆ श्री शरद दिवेकर ☆

मी पॅन्टच्या खिशातून रूमाल काढला आणि घाम पुसायला सुरूवात केली. मला काय करावं हेच सुचत नव्हतं. सीटवर बसून रहावं, की सीट सोडून उठून उभं रहावं, की डोंबिवलीला उतरून जावं ! यक्षप्रश्नच उभा ठाकला होता माझ्यासमोर. उठून उभा राहिलो तर किंवा डोंबिवलीला उतरतो म्हंटलं तर मित्रांना काय सांगणार होतो मी ? त्या सगळ्यांनी वेड्यातच काढलं असतं मला. शेजारी बसलेल्या प्रकाशने मला तेवढ्यातच विचारलं “अरे, बरं वाटत नाही आहे का तुला ? केवढा घाम आला आहे तुला !” मी म्हंटलं “नाही रे. बरा आहे की मी.” तोपर्यंत ट्रेनने डोंबिवली सोडलं होतं आणि ती खुपच वेगात धावत होती. मी अखेरीस मनाशी निश्चय केला की आता काही इलाज नाही. जे होईल ते होईल.

मी समोर पाहिलं. त्या माणसाची पेन्सिल आता त्याच्या वहीत झरझर फिरत होती आणि माझ्या काळजावर जणू काही सुरी फिरवल्यासारखं वाटायला लागलं आणि काळजाचे ठोके देखील वाढायला लागले. मनात म्हंटलं ‘बच्चमजी, संपलं सगळं. आता केवळ काही तासच उरलेत तुमचे’. मनात भिती आणखी वाढू नये म्हणून मी डोळे मिटून बसायचं ठरवलं आणि मी डोळे मिटले व मनातल्या मनात रामरक्षा म्हणू लागलो.

थोडा वेळ गेला आणि कानावर शब्द पडले ‘अगला स्टेशन, घाटकोपर’ आणि मी डोळे उघडले व घाईघाईने माझ्या सीटवरून उठून उभा राहिलो. शेजारी बसलेला प्रकाश अजुनही सीटवरून उठला नव्हता. तो मला म्हणाला “अरे, अजून विक्रोळी यायचं आहे. तु आज लवकर उभा राहिलास आणि तुला झोप लागली होती आज”. त्यावर मी म्हंटलं “कधी झोप लागली ते कळलंच नाही आणि झोपेत असल्याने कळलंच नाही की अजून घाटकोपर आलं नाही ते”. माझं लक्ष समोरच्या सीटवर गेलं. त्याच वेळेस त्या  माणसाने त्याच्या हातातील वही बंद केली आणि ती वही व पेन्सिल त्याने त्याच्या पिशवीत भरली. कुर्ला येण्यापुर्वी तो नेहमीप्रमाणे सीटवरून उठला व दाराकडे जाऊ लागला.

तो माणूस दिसेनासा झाल्यावर थोडंसं हायसं  वाटलं. पण चित्त काही था-यावर नव्हतं माझं. पाय थरथरत होते. काऊंटडाऊन सुरू झालं होतं. माझ्या मित्रांच्या गप्पा सुरूच होत्या. पण मी त्यात नव्हतोच मनाने. हो ला हो करत होतो नुसता. अखेरीस ट्रेन सीएसटीला पोहोचली आणि आम्ही सगळे ट्रेनमधून उतरून आपापल्या ऑफिसेसकडे रवाना झालो.

कसाबसा ऑफिसला पोहोचलो. दरम्यान ऑफिसजवळचा रस्ता क्रॉस करताना मी माझ्या दिशेने जोरात येणारी कार न पहाताच रस्ता क्रॉस करत होतो आणि त्या कारच्या ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबले आणि कार माझ्या पावलांपासून काही सेंटिमीटरवरच थांबली असावी. त्या ड्रायव्हरने कचकचून शिव्या घातल्या मला. मृत्यू समोर दिसत होता. कधी आणि कसा हाच प्रश्न केवळ उरलेला होता. रोड अॅक्सिडन्टमधून तरी वाचलो होतो म्हणायचं.

ऑफिसमध्ये माझ्या केबिनमध्ये शिरून खुर्चीत बसलो आणि बेल वाजवली. तेवढ्यात प्युनने काॅफी आणून टेबलवर ठेवली आणि तो बाहेर गेला. अगोदर मी टेबलवरील पाण्याने भरलेला ग्लास ओठांना लावला व घटाघटा पाणी पिऊन तो रिकामा केला व टेबलवर ठेवला. नंतर मी काॅफी पण संपवली. काॅफी प्यायल्यावर थोडं बरं वाटू लागलं. मनावरचा ताण वाढत चालला होता. पण ऑफिसच्या कामात लक्ष घालणं देखील तेवढंच महत्वाचं होतं. म्हणून कम्प्युटर सुरू केला आणि कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न करू लागलो. माझी नेहमीची खासियत म्हणजे ऑफिसला लवकर पोहोचायचं आणि लगेचच काम सुरू करून लंच टाईम पर्यंत म्हणजे दीड दोन वाजेपर्यंत सत्तर पंचाहत्तर टक्के काम संपवून टाकायचं, अगदी टी 20 मॅचमधील पाॅवरप्लेसारखं. पण आज तसं काही घडत नव्हतं. की बोर्डवर बोटं चालतच नव्हती माझी. तेवढ्यात इंटरकॉम वाजला. एम.डी. नी डिस्कशनसाठी बोलावलं होतं. विचलित मनःस्थितीतच  त्यांच्या केबिनमध्ये शिरलो. ते काय बोलत होते आणि मी काय ऐकत होतो ते काहीच मेंदुपर्यंत पोहोचत नव्हतं. बधिर होत चाललो होतो मी. एम. डी. नी एक दोनदा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं देखील. पण मध्येच त्यांना महत्त्वाचा काॅल आल्याने त्यांनी मला खुणेनेच जाण्यास सांगितलं व माझी सुटका झाली.

केबिनमध्ये आल्यावर घड्याळाकडे बघत बसलो. घड्याळाचे काटे रोजच्यापेक्षा फारच संथगतीने चालत आहेत असं भासत होतं. लंच टाईमला एक कलीग रोजच्याप्रमाणे माझ्या केबिनमध्ये आला. त्यानंतर आम्ही दोघं कॅन्टीनमध्ये गेलो, जेवलो आणि परत आलो केबीनमध्ये. साडेतीन वाजता प्युनने रोजच्याप्रमाणे काॅफी आणून ठेवली. ती प्यायलो आणि पुन्हा घड्याळाकडे बघत बसलो. घड्याळाचे काटे कासवाला देखील लाज वाटेल इतक्या संथपणे धावत होते.

अखेरीस सहा वाजले आणि मी यंत्रवत कम्प्युटर शट डाऊन केला. नंतर सॅक पाठीला लटकवली आणि लिफ्टने खाली आलो. सस्पेन्स अजुनही कायम होता. कधीही घडेल असं वाटणारं अजुनही घडलं नव्हतं. नक्की काय घडणार आहे आणि कधी घडणार आहे याची टांगती तलवार अजून मनावर कायम होतीच. पण एवढे तास उलटल्याने सकाळपेक्षा थोडा सावरलो होतो. सीएसटीला पोहोचलो आणि ट्रेनमध्ये बसलो. नेमकी विंडो सीटच मिळाली. विंडो सीटची भितीच बसली होती मनात. ट्रेन धाडधाड धावायला लागली. पण तिच्यापेक्षा जास्त वेगाने  मन धावत होतं भूतकाळात, विशेषतः गेल्या दोन महिन्यांच्या घटनाक्रमांत. थोड्या वेळाने मी भानावर आलो तो कसला तरी कोलाहल कानांवर पडला म्हणून. माणसांचा कोलाहल सुरू होता. ट्रेन ठाकुर्ली आणि कल्याणच्या मध्येच थांबली होती आणि माणसं खाली उड्या मारुन ट्रॅकवरून चालत कल्याणच्या दिशेने निघाली होती. काहीतरी मोठा लोचा झाला होता. मी देखील ट्रेनमधून उडी मारली आणि ट्रॅकमधून चालत निघालो कल्याण स्टेशन गाठण्यासाठी. मन था-यावर नव्हतंच.

कुठून चाललो आहे याचं भानही नव्हतं. विचारांच्या तंद्रीत मी एक नंबर ट्रॅकवर आलो होतो. मागून वेगात ट्रेन येत होती आणि तिचा मोटरमन जोरजोरात हाॅर्न वाजवत होता. बाजुच्या ट्रॅकवरून चालणारी माणसं बोंब मारत होती. पण माझ्या मेंदुपर्यंत काहीच पोहोचत नव्हतं. अगदी अखेरच्या क्षणी मला जाणीव झाली आणि दोन नंबरच्या ट्रॅकमध्ये आलो. पुन्हा एकदा थोडक्यात बचावलो होतो मी. माझ्या कानांवर पडत होत्या त्याच ट्रॅकवरून चालणाऱ्या माणसांच्या शिव्या. त्या ऐकत आणि त्यांच्या नजरा चुकवत मी अखेरीस कल्याण स्टेशनात पोहोचलो. पार्किंग लॉटमध्ये आलो, बाईकचा ताबा घेतला आणि निघालो माझ्या घराकडे.

घरी पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. मी जवळपास जिंकलो होतो. पण अजुनही तीन तास बाकी होते. फ्रेश झालो आणि जेवायला बसलो. आज बायकोने माझ्या आवडीचा बेत केला होता. मन बरंचसं था-यावर आल्याने चार घास जास्तच जेवलो. मनात थोडी खळबळ बाकी होतीच तरीही. पण ती बायकोला जाणवू दिली नाही.

जेवण झाल्यावर ड्राॅईंग रूममध्ये आलो. टीव्ही सुरू होता. टीव्ही बघता बघता मुलाला झोप लागली होती. बायको देखील आवराआवर करून ड्राॅईंगरूममध्ये आली. दमल्यासारखी वाटली मला. तेवढ्यात तिने जांभई दिली. त्याचाच फायदा घेऊन मी तिला म्हंटलं “दमलेली दिसतेस तु. तु झोप. मला थोडं अर्जंट काम करायचं आहे ऑफिसचं”. असं म्हणून मी तिला बेडरूममधे पिटाळलं. ती देखील पडत्या फळाची आज्ञा मानून मुलाला घेऊन बेडरूममधे गेली. खरं तर मला कसलंही काम नव्हतं. पण मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. अखेरचे दोन तास उरले होते आणि या शांत वेळी माझ्या मनातली खळबळ बायकोने नक्कीच ओळखली असती. त्यामुळे मी दोन तास ड्राॅईंगरूममध्ये टीव्हीसमोर बसून काढायचे असंच ठरवलं होतं. टीव्हीवर जे सुरू होतं ते बघत बसलो. लक्ष मात्र घड्याळाकडेच होते. अखेरीस बाराचे ठोके पडले आणि मी सुटकेचा निश्वास सोडला.

दुस-या दिवशी सकाळी उठायला उशीर झाला. पण मी खुशीत होतो. मी मृत्यूला हुलकावणी दिली होती बहुदा. पटापट आवरलं आणि ऑफिसला जायला निघालो. स्टेशन गाठलं, ट्रेन पकडली आणि मित्रांच्या संगतीत प्रवास सुरू झाला. प्रकाशला काहीतरी वेगळं जाणवलं असावं. कारण तो म्हणाला “खुशीत दिसतो आहेस अगदी आज”. त्याला माझ्या खुशीचं काय कारण सांगणार होतो मी ?

आजही मला विंडो सीट मिळाली होती. क्षणभर मनात पाल चुकचुकली. म्हणून समोर पाहिलं. आज तो माणूस डाऊन आला नव्हता. समोरची सीट रिकामी होती. तरीही एक प्रश्न मनात सारखा येत होता. खरं तर काल रात्री झोपतानाच हा प्रश्न पडला होता. तो काही पाठ सोडत नव्हता. ‘मी वाचलो कसा’ ? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मनाला शांतता लाभणार नव्हती. अचानक समोरच्या सीटवर नुकताच येऊन बसलेल्या माणसाकडे नजर गेली आणि एक विचार मनात तरळून गेला. माझं मन एकदम थरारलं. तो माणूस आणि सुरेश व रमेश यांच्यात एक साम्य होतं. ते साम्य म्हणजे तिघांनी विराट कोहलीसारखी ठेवलेली दाढी. मी दाढी ठेवलेली नव्हती. दाढी काय ? मला मिशी देखील नाही आहे अजिबात. माझ्या मनाने कौल दिला. या कारणामुळेच मी वाचलो.

काही दिवसांनी पुन्हा अमावास्या आली. मी ऑफिसला जायला निघालो. माझं मन शांत होतं. आता तो माणूस काहीच करू शकणार नव्हता. कारण मला दाढी, मिशा नाहीत आणि माझ्या बाकी तिन्ही मित्रांनाही. स्टेशनवर आलो. ट्रेन यायची होती. ट्रेन आल्यावर धावती ट्रेन पकडली आणि नेहमीच्या चौकोनात आलो आणि माझा हिरमोड झाला. डाऊन आलेल्या एका दाढीधारी माणसाने विंडो सीट अगोदरच काबीज केली होती. नाईलाजाने त्याच्या शेजारची सीट पकडली. समोर पाहिलं मात्र ! समोरच्या सीटवर तोच माणूस डाऊन आलेला होता आणि तो त्याच्या पिशवीतून तीच वही आणि पेन्सिल काढत होता.

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

मो 70457 30570, ईमेल – sharaddivekar784@gmail.com

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुंफण नात्यांची – भाग 4 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ गुंफण नात्यांची – भाग 4 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने, वर्षा मागून दोन-तीन वर्ष ही सरली. हिचं आपलं ‘एकला चलो रे’ सुरुच होतं. एकटी रहात असली तरी आनंदात होती. अडल्यानडल्या ना मदत करीत होती. बिनधास्त राहत होती. पण कुणाच्यात अडकत नव्हती. कुणावर जीव लावत नव्हती. दर शनिवार रविवार येऊन आमची काळजी घेत होती. मी माझी काळजी यांना बोलून दाखवत होते. हे मनातल्या मनात कुढत होते. अन तशातच पुन्हा एकदा हिनं तो स्फोट घडवला. म्हणजे स्फोटासारखी बातमी दिली आणि त्यांना हृदय विकाराचा जोराचा झटका आला. काही केल्या त्यांना ती बातमी सहन झाली नाही आणि मला एकटीला टाकून माझी जबाबदारी हिच्यावर टाकून गेले.

..शनिवारची ती रात्र मला अजून आठवते. जेवण करून आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तिच्या लग्नाचा, जोडीदाराचा विषय आम्ही आता काढत नव्हतो. तिनंच आणलेलं आईस्क्रीम खात आम्ही बोलत होतो  अन तिनं ती बातमी सांगितली. “आई बाबा, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुम्ही दोघं आजी आजोबा होणार आहात. मी आई होणार आहे. अंहं, मी लग्न केलेलं नाही करणार सुद्धा नाही हं. पण मी आधुनिक तंत्रज्ञानानं गर्भधारणा करून घेतली आहे. तो आनंद, आई व्हायचा आनंद मला हवा आहे. तुम्ही आता माझ्याबरोबरच राहायचंऽ!

हीच सांगणं अजून पूर्ण होतंय एवढ्यात त्यांच्या छातीत जोरात कळ आली आणि घामाघूम झाले. ताबडतोब डॉक्टरांना बोलावले. अँब्युलन्स आली, अॅडमिट केलं.. पण रविवारची सकाळ काही माझ्यासाठी चांगली उगवली नाही. त्यानंतर मात्र मला एकटीला तिथे राहणं शक्य नव्हतं. मनात नव्हतं तरीही इकडे आले आणि या तन्वी बाळासाठी इथे राहिले. याच मुद्द्यावरून आम्हा मायलेकींचा अधून मधून वाद होत राहतो. पण पडती बाजू मलाच घ्यावी लागते. तन्वी कडे बघून गप्प बसते. “चला, आता ट्रीप तर ट्रिप. तिच्या तालावर नाचतोच आहोत. हाही त्यातलाच एक भाग. विचार करता करता कधीतरी डोळा लागला.”

” आजी आज ना मी आमच्या क्लासमधल्या नंदन च्या घरी गेले होते. त्याच्याकडे आपल्या घराच्या अगदी कॉन्ट्रास्ट कंडिशन आहे. म्हणजे त्याच्याकडे तो, त्याचे डॅड आणि ग्रॅन्डपा राहतात.”

” तन्वी कशाला गं कारण नसताना मुलांच्या घरी जायचं?”

” आजी, अगं उगीच गेले नव्हते मी. अगं मला ‘आताची कुटुंबव्यवस्था’ या विषयावर प्रोजेक्ट करायचाय. त्यासाठी कमीत कमी दहा घरांना भेटी द्यायच्या आहेत. ऑलरेडी मी चार मैत्रिणी आणि दोन मित्रांकडे जाऊन आली आहे. नंदन कडे जायचं राहिलं होतं. त्याचे डॅड सुद्धा भेटले. कालच रात्री ऑफिस टूर संपवून जपान वरून ते आले होते. नंदन म्हणतो, डॅड भेटणं म्हणजे त्याला क्वचितच; इतके ते जगभर फिरत असतात. पण आजी, घरी डॅडी असणं छान वाटतं गं. घर कसं भरल्यासारखं वाटतं. आजी, तुला माहित आहे का गं? माझे डॅडी कसे आहेत? कुठे असतात? सांग ना गं आजी.”

आता काय सांगू मी हिला? बाई ग त्यासाठीच तर तुझ्या आई बरोबर वाद चालतो माझा. सारखं सांगत होते मी तिला. कधी ना कधी हा प्रश्न तू विचारणारच..”

“हे बघ तन्वी, कशाला त्या गोष्टीचा विचार करायचा? माॅमला तुझा राग येतो माहित आहे ना तुला? याच विषयावर आमचे खटके उडतात. आपल्याला जे हवं असतं ते उत्तर तुझ्या माॅम कडून मिळत नाही. उगाच आपल्या घरातलं वातावरण मात्र बिघडतं. जाऊ दे. आता परीक्षा जवळ आली ना तुझी. मन लावून अभ्यास कर. ट्रीपला जायचंय ना?”

” हो ग आजी, पण.. तुला माहितीये? त्या समोरच्या नवीन फ्लॅटमध्ये आलेत ना! त्यांच्याकडे आई-बाबा आणि एक भाऊ बहीण असे सगळे एकत्र राहतात. तो मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि त्याची बहीण बी फार्म करते. किती छान ना? त्यांचे आई-बाबा दोघे त्यांच्या जवळ राहतात. मी ओळख करून घेतली आहे सगळ्यांशी. मला ना त्यांच्या घरात जाऊन रहावसं वाटतं.”

क्रमशः….

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिंदी आणि मी— भाग दुसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ हिंदी आणि मी— भाग दुसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(आपल्या विचारांवर नव्हे तर उत्तरावर मी खूष झाले होते.) इथून पुढे —–

घराचं कुलूप काढत होते तेवढ्यात समोरच्या श्रीवास्तवभाभी ने टोकले .(श्रीवास्तव हे त्यांचे आडनाव मी नेमप्लेटवर वाचलेले होते.) “कहाँ होके आई?”- “घर मालिक के यहाँ.!”  माझ्या उत्तरावर ती खुदुखुदू हसू लागली. म्हणाली, “घरमालिक मतलब तुम्हारा हजबंड ! मकान मालिक कहो.”

अशा तऱ्हेने माझ्या बोलण्यातील गमती जमती दोन-तीन महिने तरी इतरांचे मनोरंजन करीत राहिल्या…. आणि मला कळलं की माझी ‘हिंदी’ पुस्तकी आहे… शब्द संख्या खूप मर्यादित आहे… त्यामुळे मला हिंदीवर खूप अभ्यास करावा लागेल.

हिंदीतलं वर्तमानपत्र (अखबार )वाचायला सुरुवात केली. मासिकं ,साप्ताहिकं यांचं वाचन सुरू झालं. पण खूपसे शब्द डोक्यावरूनच जायचे. बोलीभाषा तर मला चक्रावून टाकायची. एकदा तर जमादारनी (सफाई कर्मचारी) तिचा काहीतरी गैरसमज झाल्यानं माझ्याशी दबंगाई करून,  खेडवळ हिंदीत भांडू लागली. शेजारीपाजारी कोणीच दिसले नाही .भांडण आणि तेसुद्धा हिंदीतनं…बापरे मला काहीच सुचेना .बावीस वर्षाचं लहान वय. कधी अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागलं नव्हतं… मी घाबरून रडायलाच सुरुवात केली. नवऱ्याला साफ सांगून टाकलं.”इथं नाही राहणार मी. ह्या हिंदी लोकांपुढे माझा नाही टिकाव लागणार.”

हे शक्य नाही हे मलाही माहीत होतं. त्यामुळे मी हिंदीवर थोडं वर्चस्व मिळवायचा प्रयत्न करु लागले…आणि दोन महिन्यानंतर जेव्हा आमचा मुंबईला जाण्याचा योग आला, तेव्हा मी हिंदीतून मराठी आणि मराठीतून हिंदी असे शब्दकोष विकत घेतले. (ते अजूनही माझ्याकडे आहेत.)

माझं हिंदी वाचन जोरात सुरू झालं. दिल्ली पब्लिक लायब्ररीत नाव घातलं अन् तूर्तास नोकरी करणार नसल्याने मी घरची पी.आर्.ओ. व्हायचं ठरवलं ….आणि ओळखी-पाळखी वाढवायला सुरुवात केली. (रिझर्व रहाणं तसंही मला आवडायचं नाही.) शेजारीपाजारी , पार्कमध्ये, वाचनालयात सगळीकडेच. व मग संक्रांतीच्या हळदी कुंकवा साठी खूप जणींना बोलावून घेतलं … त्यामुळे हळूहळू सगळ्यांशी माझ्या गप्पा -शप्पा सुरू झाल्या. आणि मी ‘पुस्तकी’ हिंदी वरून ‘बोलचाल की हिन्दी’ वर पोहोचले. अन् मला हळूहळू पंजाबी, हरियाणवी ,राजस्थानी, बिहारी हिंदी सुद्धा समजू लागली. स्वतःला हम आणि समोरच्याला (आप नही) तुम म्हणत बोलणाऱ्या यूपीवाल्यांचा नखरा पण समजला.

त्या ‘आप’वरून एक मजेदार प्रसंगच घडला. वरच्या मजल्यावर राहणारी मिसेस कपूर मला तिच्या घराची किल्ली देऊन गेली होती. अर्ध्या तासात तिचा नवरा आल्यावर त्याला ती द्यायची होती. त्याप्रमाणे मिस्टर कपूर आले. “मिसेज़ गॅडरे, चाबी.” ते म्हणाले. मी किल्ली त्यांना दिली. आणि त्यांच्याशी हिंदीत थोडं बोलले. परत जायला निघालेले ते एकदम थांबले.

” एक बात बताऊ..” असं म्हणत ते एकदम नाराजीच्या स्वरात बोलू लागले,” मैं आपसे इतना बडा हूँ, फिर भी आप से आप कहके बात कर रहा हूँ… और आप हैं कि मुझे ‘तुम’ कह रही है.” बापरे… म्हणजे झालीच पुन्हा चूक!  मग मी माझी बाजू सावरून घेतली. ” सॉरी… थोडा लैंग्वेज प्रोब्लेम…. बुरा मत मानना….अंग्रेजी में जैसे you–तू , तुम, आप सब कव्हर करता है, वैसे थोडासा मराठी में भी है. तुम्ही में तुम और आप दोनो आते है..” आणखी पण असंच काहीसं सांगितलं. मग जेव्हा त्यांची समजूत पटली, तेव्हा लगेहात मी त्यांना हेही सांगायला विसरले नाही, “भाईसाब नॉट गॅडरे…गद्रे है हमारा सरनेम… लैंग्वेज प्रॉब्लेम… आपके साथ  भी…”. ते हसले आणि निघून गेले. पण त्यानंतर मी तुम आणि आप च्या बाबतीत खूप सजग झाले.

हिंदी उच्चारांची पद्धत पण मी आत्मसात केली. मैं, है, ऐसा, वैसा, औरत, और म्हणताना मॅ, हॅ, ॲसा, वॅसा, ऑरत, ऑर–आणि बरीच वेगळी उच्चार पद्धती मला जमू लागली. अन् मग सगळे सोपे झाले. हिंदीभाषिकांकडून  “आपकी हिंदी बहूत अच्छी है” असे अभिप्राय जेव्हा मला मिळू लागले तेव्हा मला एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.

क्रमशः—-

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ जानेवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ८ जानेवारी –  संपादकीय  ?

नारायण भिकाजी  तथा नानासाहेब परूळेकर:

महाराष्ट्रातील एक प्रमुख दैनिक सकाळ चे संस्थापक संपादक ना.भि.परूळेकर यांचा आज स्मृतीदिन.

अमेरिकेतील आपले शिक्षण संपवून नानासाहेब 1929 मध्ये भारतात परत आले.अमेरिकेत असताना त्यांनी फ्रेंच,जर्मन व अमेरिकन वृत्तपत्रांसाठी वार्तांकन केले.हे अनुभव घेत असतानाच भारतात परतल्यावर वृत्तपत्र काढण्याचा विचार त्यांच्या मनात पक्का होत होता.इथे आल्यावर त्यांनी त्यावेळच्या मराठी दैनिकांचा अभ्यास केला. व्यावसायिकता सांभाळून समाजाभिमुख वृत्तपत्र काढण्याचा त्यांचा विचार पक्का झाला आणि 1 जानेवारी 1932 ला ‘ सकाळ’ या दैनिकाचा पहिला अंक निघाला. त्यानंतर 1936 मध्ये त्यांनी ‘स्वराज्य’ हे दैनिक सुरू केले. नंतर त्याचे साप्ताहिकात रूपांतर झाले. तेज नावाचे कमी किंमतीचे मासिकही सुरू केले. कालांतराने स्वराज्य व तेज बंद होऊन फक्त सकाळ चालू ठेवले.

चालक,मालक,संपादक,व्यवस्थापक अशा सर्व भूमिका बजावून व्यावसायिकता सांभाळून त्यांनी अखेरपर्यंत दैनिक सकाळ यशस्वीपणे चालू ठेवले.

‘निरोप घेता’ हे त्यांचे आत्मचरित्र  त्यांच्या  कारकिर्दीचे चित्र मांडणारे आहे.

आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या पत्रकारितेला सलाम.

☆☆☆☆☆

 श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 9 (1-5)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #9 (1-5) ॥ ☆

रघुवंश सर्ग – 9

 

संयम नियम पालक आत्मजित में, महारानी दशरथ अग्रगामी

पिता से पा उत्तर कोशल राज्य, शासक हुआ उसका योग्य स्वामी ॥ 1॥

 

संप्राप्त उस राज्य को कुलाचिंत रीति से नगर के साथ ऐसा सँभाला

कि क्रोंच पर्वत विर्दीण कर्ता कुमार सा हुआ वह कीर्तिवाला ॥ 2॥

 

बल दैत्य नाशक सुरेन्द्र मनुवंश के दण्ड धारी दशरथ नृपति को

विद्वान कहते समान धर्मा जल अर्थ से सींचते हैं जो श्रम को ॥ 3॥

 

परम पराक्रमी पर श्शांत अजपुत्र के राज्य में रोग कोई घुस न पाये

फिर शत्रुओं की तो क्या भला बात धरती ने धन धान्य सभी डगाये ॥ 4॥

 

दिग्विजयी रघु से धरा का वैभव बढ़ा  और अज से हुई धान्य पूर्णा

तथैव दशरथ पराक्रमी से न हुई हो समृद्ध, ऐसा हुआ ना ॥ 5॥

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घन तमी शुक्र बघ राज्य करी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ घन तमी शुक्र बघ राज्य करी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

भा. रा. तांबे

भास्कर रामचंद्र तांबे

घन तमी शुक्र बघ राज्य करी

सध्या झी मराठी चॅनेलवर सारेगमप लिटिल चॅम्पस् ही गाण्याची स्पर्धा चालू आहे. मध्यंतरी एका चिमुरडीने,

‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा

            ताई आणखी कोणाला? चल रे दादा चहाटळा’

हे गाणं सादर केलं. त्या गाण्याने माझं बोट धरलं आणि मला थेट शाळेत घेऊन गेलं. ६वी-७वीचा वर्ग असेल. ऑफ तास असला की गाण्याच्या भेंड्या खेळायच्या  हे अगदी नक्की  ठरलेलं. मग, सुरुवातीलाच काही काही अक्षरांची गाणी आठवून ठेवायची. ‘त’अक्षर आलं की पहिल्यांदाच म्हंटलं जाई, ‘तुझ्या गळा माझ्या गळा …’ सुरुवात कोणी का करेना, दोन्ही गट गाणं म्हणायला लागत.  यात आपोआपच मुलांचा गट, दादाच्या ओळी म्हणे आणि मुलींचा गट ताईच्या ओळी. हे गाणं खरं तर हळुवारपणे ताईची गोड चेष्टा करणारं. पण ते एकमेकांकडे बघून हावभाव करत म्हणताना, कव्वालीच्या जुगलबंदीचं त्याला रूप येई. पुन्हा ‘त’ आलं की ‘तिनिसांजा सखे मिळाल्या हे ठरलेलं. ‘ड’ आलं की पहिलं गाणं असे, ‘डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये. शंख फुंकीत ये… येई रुद्रा.. येई रुद्रा.’ सुरुवात कुणी तरी करे आणि मग सर्व वर्गच त्याला साथ देई. गाणं कोरसमध्ये ‘खणखणत येणार्यां शूलाप्रमाणे’ खणखणित आवाजात गायलं जाई. इतक्या खणखणित आवाजात की शेजारच्या वर्गातून कुणी तरी सांगत येई, ‘डमरू जरा हळू वाजू दे आमच्या वर्गात सरांनी बोलेलेलं आम्हाला ऐकू येत नाही. आमचे आवाज थोडे खालच्या पट्टीत यायचे.  ‘र’ येताच पुन्हा कोरस सुरू व्हायचा.,

‘रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी

ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली.  इथे झाशीच्या राणीचं स्मरणही खणखणत शूल ये, याच जातकुळीतलं करायचं. 

ही भा.रा. तांबे यांची गीतं अगदी दुसरीपासून पाठ्यपुस्तकात असलेली आणि आम्ही अभ्यासलेली आठवताहेत. इयत्ता दुसरीत, ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहूणीया दूर ‘ अशी निखळ निसर्ग  वर्णनाची कविता होती, तर चौथीमधे ‘या बाळांनो यारे या. लवकर भरभर सारे या.’

६वी किंवा ७ वीत ‘रे हिंदबांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी ‘ ही कविता होती. पुढे बहुतेक ९ वीत ‘मधु मागासी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे पडती घरी ‘ ही रूपकात्मक कविता. आता नवीन लिहिण्याची शक्ती नाही, असे सांगणारी’ (मधू पिळण्या परी रे बळ न करी’ आणि ११वीत होती ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ही शाश्वत सत्य उलगडून दाखवणारी कविता॰ अशा कविता आभ्यासल्या होत्या. त्यांच्या कविता सहज पाठ होत. मुद्दाम त्यासाठी पुस्तक डोळ्यासमोर धरून पाठ करायची जरूर नसे. या सगळ्या कवितांची गीतं झाली होती आणि ती ऐकून ऐकून पाठ होतच होती.  

पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर ‘मराठी कवितेचा इतिहास’ अभ्यासताना भा. रा. तांबे अर्थात भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता अभ्यासली.  १९३५ साली राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि पुढे याच्या अनेक आवृत्या निघाल्या. ग्वाल्हेर संस्थानचे ते राजकवी होते. वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतले होते. याशिवाय हिन्दी कविता, उर्दू नज्म , गझल याविषयी त्यांचा अभ्यास होता. या दोन्हीचे संस्कार घेऊन ताब्यांनी कविता लिहिल्या. त्यांची कविता साधी, सहज, सुलभ होती. कवितांचा अर्थ सहज समजे. त्यांच्या लेखनाने आनंददायी कवितेची वाट प्रशस्त झाली.त्यांच्या कवितांची गीतरूपे  आकाशवाणीवरून  प्रसारित झाली॰ अजूनही होत आहेत..  आकाशवाणीवर वाजताहेत. कार्यक्रमात गायली जाताहेत..  त्यांच्या शब्दांना स्वरसाजाचे  लखलखीत सुवर्ण कोंदण लाभले आणि त्या कोंदणात त्यांची कविता हिर्या्सारखी झळाळून उठली. त्यांना गीतकाव्याचे प्रवर्तक असं सार्थपणे म्हंटलं जातं. त्यांचं एक गीत आहे, ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी..’ मनाची खिन्नता घालवण्यासाठी ते सांगताहेत, ‘ अंधार घनदाट असला, तरी वर शुक्रतार्या्कडे बघ! बघ. तो कसा अंधारातही तेजाळतो आहे ते! त्या शुक्राप्रमाणेच त्यांची गीते जनमानसावर गारुड करतात. त्यांना आनंद देतात. 

कॉलेजमध्ये असताना आम्हाला त्यांच्या

 ‘तिनिसांजा सखे मिळाल्या देई वचन तुला

आजपासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला’, ‘नववधू प्रिया मी बावरते’ झालंच तर ‘ डोळे हे जुलमी गडे’, कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी’,  या सारख्या अनेक गीतांनी मोहवलं होतं.

आज मात्र त्यांच्या शाश्वत सत्य सांगणार्याै ‘मावळत्या दिनकरा’, मधू मागसी माझ्या, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय ‘ सारख्या कविता अधीक जवळिकीच्या वाटू लागल्या आहेत.

आपल्या कवितांनी दैनंदिन जीवनातील दु:खे विसरायला लावणार्याट भा. रा. तांबे यांच्या स्मृतीला नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुगरण — ” बिघडलं ? घडलं.” ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ सुगरण — ” बिघडलं ? घडलं.” ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

आमचा दूधवाला  त्याच्याकडची म्हैस व्याली की आम्हाला चीक आणून देतो. ‘पहिल्या दिवसाचा पाहिजे हं.’ त्याला सांगितलेलं आहे. एक दिवस त्याने असाच चीक आणून दिला. चिकाएव्हढं दूध, गूळ, वेलदोड्याची पूड असं  सगळं घालून मी लगेच नेहेमीसारखा खरवस शिजायला ठेवला. पण काय झालं कोण जाणे, वीस मिनिटांनी बघितलं तर चोथा पाणी– बापरे ! आता हा खरवस कोण  खाणार ? सगळ्यांना  वेलदोड्याची तीट लावलेल्या शुभ्र वड्या आवडतात. ‘ मग आता काय करायचं याचं ?’ असा विचार करताकरता  एक युक्ती सुचली. खरवस रवीने चांगला घुसळला. डब्यात भाजलेला रवा होता. अंदाजाने दोन वाट्या, तो भाजलेला रवा त्या घुसळलेल्या खरवसात घातला. नि कुकरमध्ये ठेवला. शिटी न लावता.—-पंधरा मिनिटांनी कुकरचं झाकण उघडलं. आणि –आहा—” मिशन सक्सेसफुल “ — सोनेरी रंगाचा सुंदर सांजा तयार. पूर्वी आपण गुळाचा सांजा करायचो ना तसा. सगळ्यांना बशीतून खायला दिला. उरला तर सांज्याच्या पोळ्या करू असं ठरवलं होतं, पण उरलाच नाही. सर्वांनी आणखी आणखी मागून घेतला. मुलांनी  विचारलं ,     

“आई पुन्हा असा सांजा कधी करणार? ” मी म्हटलं– “खरवस बिघडल्यावर.”

लेखिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070, 9561582372.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा: सर्वोपरि ☆ सुश्री मीरा जैन

सुश्री मीरा जैन 

(सुप्रसिद्ध हिंदी साहित्यकार सुश्री मीरा जैन जी  की अब तक 9 पुस्तकें प्रकाशित – चार लघुकथा संग्रह , तीन लेख संग्रह एक कविता संग्रह ,एक व्यंग्य संग्रह, १००० से अधिक रचनाएँ देश की प्रतिष्ठित पत्र-पत्रिकाओं में प्रकाशित। आकाशवाणी एवं दूरदर्शन से व्यंग्य, लघुकथा व अन्य रचनाओं का प्रसारण। वर्ष २०११ में  ‘मीरा जैन की सौ लघुकथाएं’पुस्तक पर विक्रम विश्वविद्यालय (उज्जैन) द्वारा शोध कार्य करवाया जा चुका है।  अनेक भाषाओं में रचनाओं का अनुवाद प्रकाशित। कई अंतर्राष्ट्रीय, राष्ट्रीय तथा राज्य स्तरीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत। २०१९ में भारत सरकार के विद्वान लेखकों की सूची में आपका नाम दर्ज । प्रथम श्रेणी न्यायिक मजिस्ट्रेट के पद पर पांच वर्ष तक बाल कल्याण समिति के सदस्य के रूप में अपनी सेवाएं उज्जैन जिले में प्रदत्त। बालिका-महिला सुरक्षा, उनका विकास, कन्या भ्रूण हत्या एवं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ आदि कई सामाजिक अभियानों में भी सतत संलग्न। पूर्व में आपकी लघुकथाओं का मराठी अनुवाद ई -अभिव्यक्ति (मराठी ) में प्रकाशित। 

हम समय-समय पर आपकी लघुकथाओं को अपने प्रबुद्ध पाठकों से साझा करने का प्रयास करेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा सर्वोपरि। )

☆ कथा-कहानी : लघुकथ – सर्वोपरि ☆ सुश्री मीरा जैन ☆

शाम सात बजने को है    महत्वपूर्ण पूजा का समय  किंतु अब तक चंदना का मंदिर न पहुँचना उपस्थित महिलाओं के मन को अत्यंत विचलित कर रहा था। वैसे कोई बंधन नहीं सभी स्वेच्छा से नियत समय पर पहुँचती और एक साथ  पूजा करती। इनमें भी विधि विधान मे चंदना सबसे आगे। अंततः एक महिला ने चंदना को मोबाइल पर फोन किया।

वार्तालाप के दौरान कथित महिला का स्वर अचानक तीक्ष्ण हो गया-

‘ ये कोई बात हुई हम सभी यहाँ तुम्हारा इंतजार कर रहें है और तुम आराम से सांस्कृतिक कार्यक्रम का लुफ्त उठा रही हो  —-?’

इसके साथ ही महिला ने चंदना का दो मुँहा चरित्र सबको सुनाने हेतु अपने मोबाइल का स्पीकर ऑन कर बातें करने लगी।  महिला ने बिना रुके चंदना को उपदेश का एक लम्बा भाषण दे डाला। अंत मे चंदना ने मात्र कुछ ही शब्दो मे अपनी मंशा जाहिर कर वार्ता की इतिश्री कर दी जिसे सुन अन्य महिलाएं भी चंदना के पक्ष मे खड़ी नजर आयी-

चंदना – ‘ देखिये दीदी ! धर्म पर मेरी पूर्ण आस्था है लेकिन मेरी बिटिया ने यहाँ एक अति महत्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम हिस्सा लिया है उसे लौटने मे देर हो सकती है इसलिए मै उसके साथ आई हूँ , मेरे लिए बेटी की सुरक्षा सर्वोपरि है ‘.

© मीरा जैन

संपर्क –  516, साँईनाथ कालोनी, सेठी नगर, उज्जैन, मध्यप्रदेश

फोन .09425918116

jainmeeera02@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares