मराठी साहित्य – विविधा ☆ – अंतः अस्ति प्रारंभः… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – अंतः अस्ति प्रारंभः… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

“शेवट हीच सुरुवात आहे” किती गहन विचार आहे जो जीवनातील प्रत्येक समाप्तीतून नवीन संधी, शिकवण आणि बदलाची नवी दिशा कशी मिळते हे सांगत असतो ज्यात संकट, पराभव, अपयश किंवा एखादी गोष्ट संपल्यावर नवीन प्रवास सुरू होतो, हा विचार जीवनचक्राचे चक्र आणि सकारात्मक दृष्टिकोन दर्शवतो.. निसर्गातील अशा कित्येक उदाहरणांमधून अंतः अस्ती प्रारंभः ह्याच दर्शन घडत असत.. एखाद वठलेलं झाड, पान गळतीने निष्पर्ण झालेला बगीचा मनात उदासीनतेचे भाव आणत असतो तोच बगीचा चैत्र पालवीने सोनेरी रंगात जेंव्हा बहरून फुलतो तेंव्हा मनाला सुखावत असतो.. इथे पान गळती हा शेवट आणि चैत्र पालवी ही सुरुवात असते पुन्हा नव चैतन्य फुलविण्याची.. एखाद अपयश एखाद संकट आपल्याला दुःखी करत संपल आता सगळं अस वाटत असताना एक नवी संधी चालून येते एक नवा मार्ग सापडतो तेंव्हा अपयशाकडे पाहण्याचा ही दृष्टिकोन बदलतो.. आपण नेहमी आपल्यासाठी योग्य तेच निवडतो आहोत अस वाटत असत आपल्याला पण त्या विधात्याचे खेळ काही निराळे असतात आपल्यासाठी आपण निवडलेल्या पर्याय शिवाय त्याचे पर्याय जास्त योग्य असतात.. तो जेंव्हा एखाद संकट देतो तेंव्हाच त्याचा शेवट ही त्याने ठरविलेला असतोच.. पण आपला नकारात्मक दृष्टिकोन मात्र आपल्याला दुःखी करत असतो.. जर शेवट ठरलेला आहे तर नवी सुरुवात ही निश्चित असते पण त्यासाठी गरजेचा असतो तो संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन.. पण आपण नेहमी उलटाच विचार करत असतो हे अस माझ्याच बाबतीत का होत नेहमी वाईटच होत हा दृष्टिकोन आपल्या प्रगतीतील मोठा अडथळा ठरतो.. कोणतीच गोष्ट चिरकालीन नसते प्रत्येकाचा शेवट हा ठरलेलाच असतो आणि जिथे शेवट असतो तिथे नवी सुरुवात ही असतेच.. हा विश्वास मात्र आपल्या मनाशी पक्का हवा.. एखादी गोष्ट जर अचानक बदलत असेल नव वळण घेत असेल तर येणाऱ्या प्रत्येक वळणावर एक नवी दिशा एक नवी संधी किंवा एक नवी सुरुवात असतेच हा सकारात्मक दृष्टिकोन मनात असेल तर कोणताच पराभव संकट किंवा आयुष्यात येणारे अवघड वळण ही सोप्पे होते.. आयुष्याच्या प्रवासात अनेक अशी वळणं येतात जिथे आपण मानसिक रित्या पूर्णपणे कोसळून जातो.. कुठे जिवलग नात्यांचा शेवट असतो कुठे समाजाने दिलेले धोके असतात कुठे आलेली अनेक संकटे आव्हाने असतात तर कुठे सतत होणारा पराभव असतो अशावेळी स्वाभाविकच आपण कोलमडतो, दुःखी होतो पण अशा वेळी हा शेवट सकारात्मकतेने स्वीकारून त्यातून येणाऱ्या नव्या संधी कडे वाटचाल करत ध्येय ठरवाव लागत आणि हे जेंव्हा आपण स्वीकारतो तेंव्हा तिथे आयुष्याला एक नवी कलाटणी मिळते एक नवी सुरुवात आपली वाट बघत असते.. गरज असते ती आपल्या संयमाची आणि चिकाटीने चालत राहण्याची.. जिथे एक गोष्ट संपते, तिथूनच दुसऱ्याची सुरुवात होते.

हा विचार जीवनातील बदल आणि निरंतरतेचे प्रतीक आहे, प्रत्येक शेवट नवीन संधींना जन्म देतो. अपयश किंवा संकट हे नवीन कौशल्ये शिकण्याची आणि अनुभवांची संधी असते. हा विचार खचलेल्या व्यक्तीला नवी उभारी देतो आणि जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास शिकवतो.

‘अंतः अस्ति प्रारंभः’ हे जीवनाचे सार आहे. हे तत्त्व आपल्याला अपयशातून शिकायला, नवीन मार्ग शोधायला आणि आव्हानांना संधी म्हणून बघायला शिकवते. त्यामुळे, आयुष्यात जेव्हा गोष्टी संपल्यासारखे वाटतात, तेव्हा निराश न होता नवीन प्रवासाची तयारी करणे महत्त्वाचे आहे.

थोडक्यात, ‘अंतः अस्ति प्रारंभः’ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. हा विचार आपल्याला प्रत्येक शेवटाकडे एका नव्या सुरुवातीच्या आशेने पाहण्यास शिकवतो, ज्यामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सकारात्मक बनते.

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आग – भाग २ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ आग – भाग २ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(गरम वाळू माझ्या शरीराला खोलवर टोचत होती. मला हेच तर हवे होते. एकाच वेळी जितकी जमेल तितकी उष्णता देऊन टाक म्हणावं. उष्णतेला तोंड देण्यासाठी समुद्राचे जलसिंचन तयार होतेच. पाण्यात डुबकी मारून झाल्यावर ते सुकवण्यासाठी फिरून गरम उन्हात सूर्यस्नान. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा पाठशिवणीचा खेळ!) इथून पुढे – – 

तेजस्वी सूर्याच्या दाहकतेमुळे आगीचे धूम्रवलय जरा आक्रसलेले वाटत होते. सायंकालीन प्रहराचे रंग गडद होता होता धुराने आकाशाला पुन्हा एकवार कवेत घेतले. रेतीवर पहुडलेल्या उन्हात लोक मनसोक्त लोळत होते. कित्येक महिन्यांच्या निष्ठुर हवामानाला वैतागलेले ते सर्वजण आता सूर्यस्नानाचा मनमुराद उपभोग घेत होते. समुद्र आणि त्याच्याच किनारी तप्त रेती! जळी आणि स्थळी पृथ्वीचीच दोन्ही रूपे दृष्टीस पडत होती.

सागरतीरावर सूर्यस्नान करणारे हे लोक त्याच्या अपार आनंदाचा अनुभव घेण्यात खरंच इतके दंग झाले होते कां की वाळूवर चालताना त्यांचे पाय देखील पोळत नव्हते?  निरभ्र आकाशातून सूर्यदेवाने सर्वदूर फेकलेल्या रवीकिरणांच्या जळजळीत जाळीत अडकून त्यांच्या चेहेऱ्याची गोरीपान त्वचा लालबुंद झाली होती. त्यांच्या पाठी आणि कडा देखील तितक्याच लालेलाल झाल्या होत्या. समुद्रचौपाटीवरील वाळूने व्यापलेली जमीन खडबडीत होती आणि त्यामुळे त्यांच्या अनवाणी पायांना चांगलीच टोचत होती. मात्र त्याची तमा न बाळगता वाळूच्या कणांना आपल्या पायांना मुक्तपणे चिकटण्याची मुभा देण्यासाठी प्रत्येकजण पादत्राणे काढून टाकीत मस्तीत पळत होता.

काही तरुणांनी दोन लाकडांच्या मदतीने नेट लावले होते. तिथे लहान व मोठे सर्वजण एकत्र बॅडमिंटन खेळत होते. दुसरीकडे बास्केटबॉलचा खेळ जोरात सुरू होता. जवळच कुठे तरी काही मुले डिस्क फेकत होती. दोन- चार पाळीव कुत्रे त्यांच्या मालकांसह पाण्यात आणि वाळूमध्ये धमाल मस्ती करीत होते. इतक्या गर्मीत सगळ्यांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. माणसे एकमेकांच्या जवळ आली की त्या घामाचा तीव्र वास एखाद्या पक्ष्यासारखा एका शरीरापासून दुसऱ्या शरीरापर्यंत मुक्त संचार करीत होता. या दर्पाद्वारे एका नाकापासून दुसऱ्या नाकापर्यंतचे अंतर आरामात मोजल्या जात होते.

जेव्हा एखादी व्यक्ती एकाकी पडते तेव्हाच तिचे इतरांकडे लक्ष जाते. तिथल्या प्रचंड गर्दीत देखील मी एकटा होतो. संपूर्णतः एकटा. माझ्यासमोर जलाने तुडुंब भरलेला सागर होता तर माझ्या डोळ्यांतही अश्रूंचा महासागर उसळला होता, राहून राहून त्याला भरती येत होती. मला ओलेत्या डोळ्यांचा पूर्ण तिरस्कार आहे. त्यांच्यासारखा अत्याचारी कोणी नसेल! ते सकळ शरीराचा भार आपल्या नाजूक खांद्यांवर उचलत फिरत असतात. जेव्हां शरीराचे अंगप्रत्यंग जळत असते तेव्हां हेच डोळे ओले होतात. जसजसे डोळे अश्रूंचे सिंचन करतात तसतसे त्या व्यक्तीचे शरीर शीतल होत जाते. किमान समुद्रासमोर तरी माझ्या डोळ्यांत पाणी येऊ नये असे मला वाटत होते, पण नाही, वेगाने बरसणाऱ्या अश्रूंच्या धारा माझी पीडा थेंबाथेंबाने कमी करण्याचा प्रयत्न करत होत्या.

माझ्यासमोरचा समुद्र जणू काही मला समजावत होता, “अरे! डोळ्यात अश्रूंचे दोन थेंब आले की तू दुःखी होतोस. माझ्याकडे बघ, मी तर नेहमीच अंतर्बाह्य पाण्याने काठोकाठ भरलेला असतो. “

निसर्गाशी संवाद साधणे हा देखील माझा एकाकीपणा थोड्या प्रमाणात कमी करण्याचा जणू प्रयत्न होता. मात्र या रम्य निसर्गाच्या सानिध्यातही जन्मजात मानवी स्वभाव निसर्गावर आपले वर्चस्व स्थापित करण्यात गुंग होता. झाले असे की, कोणीतरी कोणा एका स्त्रीचे पाकीट चोरले होते. त्या पाकिटात त्या बिचाऱ्या महिलेचे सर्व क्रेडिट कार्ड आणि रोख रक्कम होती. ती निराश होऊन आपले पाकीट मिळते का हे वाळूत चाचपडून शोधत होती. क्रेडिट कार्ड रद्द होतीलही, पण हरवलेल्या नगदी पैशाचे काय?  ती तर मौजमजा लुटायला सहलीला आली होती, मात्र आता तिचे पाकीट लुटल्या गेले होती. आता जातांना ती रिकाम्या हाताने पण चिंताग्रत मस्तक सोबत घेऊन जाणार होती.

दुसऱ्या बाजूला, एक लहान मूल सतत रडत होते. त्याच्यासाठी, घर आणि घराबाहेर या दोहोंमध्ये कांहीच फरक नव्हता. त्याच्या घराची शीतल छाया किंवा बाहेरील तापलेले ऊन या दोहोंशी त्याला कुठलेच सोयरसुतक नव्हते. इतकंच नव्हे तर त्याला लगटून वाहणारा प्रबळ प्रवाह त्याच्या असहमती दर्शवणाऱ्या रडण्यात आपला सूर मिसळीत होता.

रेतीत अर्धवट पहुडलेल्या अल्पवस्त्रांकित लोकांची तुफान गर्दी. नजर पोहोचेल तिथवर अर्धनग्न लोकांचे जणू जंगल राज, पुरुष आणि स्त्रियांचे! आरामखुर्च्यांवर अस्ताव्यस्त पसरून ते मदमस्त अवस्थेत तप्त रवीकिरणांना जमेल तितके अंगावर झेलत होते. कित्येक महिन्यांच्या बर्फाळ थंडीने आक्रसलेल्या कॅनडासारख्या शीतल देशांमध्ये सूर्यकिरणांचे असे जंगी स्वागत होत असे. लज्जारक्षणापुरती वस्त्रे घातलेले बहुतेक तरुण पुरुष आणि स्त्रियांच्या झुंडीच्या झुंडी सूर्यस्नानामुळे स्वतःच्या शरीराची बदलती लालेलाल त्वचा कौतुकाने न्याहाळत मजा करीत होते, जणू कांही पिकलेल्या फळाचा आस्वाद घेण्याआधी ते त्याचा मधुर सुवास नाकात भरून घेत होते.

जर दुसरा वेळवखत असता तर मी त्या सर्वांना अनिमिष नेत्रांनी बघत राहिलो असतो. मनातल्या वखवखत्या आदिम इच्छा जागृत झाल्या असत्या. एरवी निषिद्ध असलेली वासनापुष्पे माझ्या मनात नकळत फुलण्याचा प्रयत्न करत असती. लख्ख सूर्यप्रकाशाचा झगमगाट आणि त्याची उष्ण धग अचानक मायाविनी वाटत असती. स्वतःच्या बेफाम कामनांवर अंकुश ठेवणे तर अशक्यच झाले असते. पण नाही! त्या वेदनादायक क्षणांमध्ये आयुष्याचे सकल गुलजार रंग हरवले होते. उरली होती ती ती फक्त निशाचरांचे साम्राज्य असलेली कधीही न संपणारी निराशेने ग्रस्त काळीकुट्ट रात्र. वर्षानुवर्षांपासून जपलेल्या अलवार नात्यांची आता उरली होती उसवलेली वीण. काळजाला आरपार छेदणारी असह्य वेदनेची कट्यार, क्षणोक्षणी विलाप करणारे विरहग्रस्त मन! हृदय पिळवटून टाकणारे एका पित्याचे दुःख कसे काय कमी होणार होते?  कायद्याच्या कर्तव्यकठोर साखळ्यांत जखडलेले माझे अपत्यप्रेम! मला किती भयानक शिक्षा मिळाली होती आपल्याच मुलापासून वेगळे राहण्याची.

जवळच एक युगुल होते. बहुदा घरी भांडण केल्यावर इथे आले असावेत. या सुंदर सागरतीरी देखील कलहाचा अध्याय सुरुच होता. विरुद्ध दिशांना तोंडे फिरवून फुरंगटून बसले होते दोघेही! मला अशा सर्व प्रकारच्या वादविवादापासून कायमची मुक्ती मिळालेली होती. निसर्गशोभेत रममाण होण्याकरिता मी एकटाच आलो होतो, घरच्या ताणतणावाने कातावलेल्या त्या खोलीपासून खूप दूर. पण इथे येऊन बघितल्यावर जाणवले की या लाटांच्या तडाख्यांना झुंज देणारा मी एकटाच नव्हतो. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या त्याच्या स्वतंत्र समस्या होत्या.

हळूहळू संध्याकाळच्या लांबसडक सावल्या पडायला सुरुवात झाली. घरी जाण्याची वेळ जवळ जवळ येत चालली होती, मी मात्र त्याच घरकुलापासून दूर पळत होतो. आता कुठले घर?  कोणे एके काळी माझे असलेले ते उबदार घरटे आता माझे राहिले नव्हते. मी संबंधविच्छेद झाल्या क्षणी अनिकेत झालो होतो. आता मला एक नवीन घर शोधावे लागणार होते. आधीच्या माझ्या मालकीच्या घरावर माझा कोणताही अधिकार नव्हता. आतल्या आणि बाहेरच्या उष्णतेची प्रखर झळ एकत्रित होत एका भीषण ज्वालामुखीच्या निर्मितीत गुंतली होती.

विचार करत असतांनाच माझा डोळा लागला. एकाएकी माझ्या माथ्यावर एका कोवळ्या तळहाताचा मृदुल अलवार स्पर्श जाणवला.

मी दचकलो. माझा मुलगा तर माझ्यापासून दूर गेला होता. आता माझ्या कपाळावर कोणाचा कोमल हात होता बरे?  तोच तर आहे हा! कदाचित माझ्या आठवणीने नकळत त्याला माझ्यापर्यंत इथवर खेचून आणले असावे. मी घाबरून डोळे उघडले. वाळूने नखशिखांत माखलेला एक लहानगा मुलगा गुडघ्यावर रांगत माझ्या पर्यंत पोचला होता आणि माझ्या डोक्यापाशी बसला होता व माझ्या माथ्याला कोमल स्पर्श करत होता. तो माझ्या बिट्टूसारखा तर दिसत होता, पण… तो माझा बिट्टू नव्हताच. त्यावेळी मी त्याच्याकडे नीटसे पाहिलेही नव्हते, तोच त्याची आई तडक तिथे आली आणि ‘माफ करा’ असे म्हणत त्याला घेऊन देखील गेली!

किती नाजूक रेशमी स्पर्श होता तो! नाजूक, वत्सल, मुलायम!

मी हतप्रभ झालो, आत्ता कुठे आला होता अन लगेच गेला सुद्धा! अरेरे! त्याचा मृदुल हात माझ्या कपाळावर आणखीन थोडा काळ राहिला असता तर किती बरं झालं असतं. माझ्या अंतर्यामी धगधगणारी आग काही प्रमाणात शांत तरी झाली असती! तो अनोळखी बच्चू गोड आठवणी जाग्या करून गेला. मला क्षणभरासाठी असे वाटले की मी बिट्टूसोबत लपंडावाचा खेळ खेळतोय. तो बिलंदरपणे कुठेही लपून बसायचा. मी शोध शोध शोधायचो तरी बेटा मला गवसायचा नाहीच. मी जेव्हा जेव्हा त्याच्या जवळून जायचो तेव्हां विजयी मुद्रेने तो टाळ्या पिटत खळखळून हसायचा. या उलट मी जेव्हां लपायचो तेव्हा तो मला लगेचच हुडकून काढायचा. तो अजून बोलायला शिकला नव्हता, पण त्याच्या बोलक्या डोळ्यांनी तो माझ्याशी अखंड बोलत असायचा.

या मुलाचे डोळे देखील माझ्या बिट्टूसारखेच बोलके आणि भावस्पर्शी होते. काय हा नियतीचा डाव! कालपर्यंत माझा मुलगा माझ्या निकट होता, पण आज मी इतका असहाय झालो आहे की, एका परक्या बालकात माझ्या स्वतःच्या मुलाचे प्रतिबिंब शोधतोय. मी त्याला माझ्यासोबत ठेवू इच्छित होतो. पण मी काय करू शकत होतो?  महिनोन्महिने अन्यमनस्क होऊन जगलेल्या निरुद्देश आयुष्याचे कमजोर धागे काल पूर्णपणे तुटले. इथे सागरतीरी येऊन माझ्या अस्वस्थ मनाला थोडाफार विरंगुळा देऊ इच्छित होतो. म्हणूनच समुद्रकिनाऱ्यावरही मी माझ्या आयुष्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करीत चक्रीवादळ निर्माण करणाऱ्या लाटा मोजत बसलो होतो.

न्यायालयाने आमचा घटस्फोट मंजूर केला होता आणि अधिकृतपणे मला तात्काळ घर सोडण्याचा आदेश दिला होता. माझ्या नशिबाने नोकरी सुरक्षित होती. आर्थिक अडचणी नव्हत्या. परंतु बायको आणि मुलापासून दूर राहण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कोर्टाने एक नाही तर अनेक बाबींचे काटेकोरपणे पालन करणे माझ्यासाठी सक्तीचे केले होते.

“तुम्ही आपल्या पत्नीशी अर्थात लिलीशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेऊ नका. “

“मुलगा वयस्क होईपर्यंत तुम्ही त्याला महिन्यातून फक्त दोन तासांसाठी त्याला भेटू शकता”

“अशा भेटी फक्त त्याच्या आईच्या उपस्थितीतच व्हायला हव्यात. ” 

“त्याच्याभोवती कधीही घोटाळत राहण्याचा प्रयत्न करू नका. “

जणू काही मी एक पिता नसून एखादा गुन्हेगार होतो, जो त्याला हानी पोहोचवू शकत होता. मी कल्पनेतही कधी कोणताच गुन्हा केला नव्हता. असे शक्य तरी होते कां की प्रत्यक्ष माझ्या प्रिय मुलाला मी कोणत्याही प्रकारे दुखापत करू शकेन?  

– क्रमशः भाग दुसरा

हिन्दी कथालेखिका : डॉ. हंसा दीप 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘अवघा रंग एक झाला…’  लेखिका : उषा फेणाणी पाठक ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘अवघा रंग एक झाला…’  लेखिका : उषा फेणाणी पाठक ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर 

” अवघा रंग एक झाला…! “

बाहेर माध्यान्हीचं रखरखीत ऊन… घरात प्रवेश केल्यावर मात्र शीतल चंद्रकिरणांचा शिडकावाच झाला जणू… ‘गानतपस्विनी’ मोगूबाईंच्या दर्शनानं!

… एक ‘सौम्य’ तरीही तितकंच करारी व्यक्तिमत्त्व! शुभ्र फुलांची ज्वाळाच जणू काही! त्यांना प्रणाम करून मी समोरच्या भिंतीवरचं त्यांचं तैलचित्र न्याहाळू लागले. तेवढ्यात, मागून किशोरीताई आल्या.

“ही माई! ” तैलचित्राकडे निर्देश करत त्या म्हणाल्या. मी मानेनेच होकार देत ताईंना अभिवादन केलं. “तू खूप चांगलं पोर्ट्रेट करतेस असं ऐकलंय”… ताईंच्या चेहर्‍यावर कौतुक होतं.

मग मिष्किलपणे हसत त्या म्हणाल्या, “तुला एक सांगू?  मला वाटतं, मला चित्रात पकडणं मात्र तितकंसं सोपं नाही हं! आणि म्हटलं तर कठीणही नसावं कदाचित! कारण माझं पोर्ट्रेट करायचं, म्हणजे माझ्या आत जगणाऱ्या गाण्याला, त्यातल्या सुरांना चित्रात बंदिस्त करायला हवं! बाकी… नाकाच्या बाबतीत म्हणशील तर, आम्ही अगदी शिवाजी महाराजांच्या वंशातले बरं का…! ” असं म्हणत किशोरीताई खळखळून हसल्या.

… ‘पोर्ट्रेट’ रंगवायचं तर केवळ बाह्यरूपच नव्हे तर ‘अंतरंग’ चितारायला हवं, हे ताईंनी किती अचूक हेरलं होतं!

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये होणार्‍या त्यांच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांच्या घरी मुलाखतीसाठी आले होते. गप्पांच्या ओघात या विदुषीच्या प्रज्ञा कोषातली एक एक पाकळी हलकेच उमलत गेली, मला विस्मयचकित करीत! कृष्णमय मीरेविषयी बोलताना अचानक ताईंची स्वरसमाधी लागली. काय अलौकिक सूर तो! त्या दैवी सुरांचं सामर्थ्य, माझ्या समक्ष, आत्मा आणि देहाचं अद्वैत साधून एक तेजोशलाका उजळवून गेलं!

माझ्या अंतरंगाच्या तारा हळूवार छेडीत मग ताईंच्या सहवासात, पुढल्या तीन चार तास चाललेल्या सूर-संवादांच्या बंदिशरुपी मैफिलीत माझे किशोरीताईंशी जे सूर जुळले ते कायमचेच!

मुलाखत संपल्यावर मी घरी निघतेवेळी त्यांनी मला अगदी हक्काने बजावलं… “हे बघ, कार्यक्रमाच्या ठिकाणी तू मला तुझ्या गाडीतून घेऊन जायचंस आणि परत आणायचंस. तू माझ्यासोबत असायला हवीस. ” माझ्यासाठी खरंतर हा एक अतुल्य आनंदाचा योग होता. पण… विधिलिखित वेगळंच होतं.

कार्यक्रमाच्या केवळ काही दिवस आधी मला Renal colic चा जबरदस्त अटॅक आला. तीव्र वेदनेनं मी हैराण झाले. ताईंना तसं कळवलं. तशा त्या खूप अस्वस्थ झाल्या. हे समजताच मला राहवेना आणि माझ्या त्याही अवस्थेत मी ताईंना माझ्याबरोबर घेऊन जायचा निर्णय घेतला. सोबत ताई, त्यांचे तानपुरे आणि दोन शिष्य यांना दाटीवाटीने माझ्या गाडीत घेऊन मी कॉलेजच्या प्रांगणात पोहोचले.

ताई खूप खुशीत होत्या. त्यांनी मला आज्ञा केली… “माझ्या समोर बैस! ” 

मैफिल ऐन रंगात आली होती… आणि अचानक मला पुन्हा वेदना जाणवू लागल्या. मैफिलीची सांगता होईस्तोवर तिथं थांबणं शक्य होईल, असं मला वाटेना. पुन्हा ताईंना सोबत घेऊन जायचीही जबाबदारी होती. ताईंचा हिरमोड होईल ही चिंता ग्रासून राहिली. मन दृढ करूनही माझा धीर खचत चालला.

अखेर डोळे मिटून ताई ध्यानमग्न गाताहेत, ही संधी साधून मी एकटीच कशीबशी घरी परतले. माझं मन खूप अपराधी झालं!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे थोड्याच वेळानंतर, ताईंचा घरी फोन आला काळजीपोटी. त्यांच्या चाणाक्ष नजरेला मी समोर नसल्याचं लक्षात आलं होतं.

 ”तू आता ठीक आहेस ऐकून बरं वाटलं. का कुणास ठाऊक, पण मध्यंतरानंतर आज मैफिल काही मनासारखी जमली नाही, रंगली नाही. “.. ताईंचा सूर नाराजीचा होता.

मला गलबलून आलं.

माझी अपराधीपणाची भावना लक्षात येताच मला समजावत त्या म्हणाल्या,

“तू का उदास होतेस?  यात तुझा काही दोष नाही! मला आत्मिक समाधान मिळालं नाही म्हणून, मीच मग आयोजकांना पुन्हा कार्यक्रम करीन, म्हणून आश्वासन दिलंय. तू का काळजी करतेस? आता लवकर बरी हो. ” 

त्यांच्या स्वरात, प्रेम, जिव्हाळा होता. आईचं ममत्त्व होतं.

आता मात्र माझ्या डोळ्यांना धारा लागल्या.

‘का बरं एवढा जीव लावावा या असामान्य, अलौकिक कर्तृत्त्वाच्या कलावंताने, माझ्यासारख्या वयाने, मानाने छोट्या कलाकारावर? ‘ ही ऋणानुबंधाची किमया म्हणावी काय?  

ताईंनी आयोजकांना दिलेला शब्द पाळला आणि काही दिवसातच एक अभूतपूर्व मैफिल रसिकांना अनुभवता आली. सर जे. जे. च्या वास्तूतलीही ती एक चिरस्मरणीय मैफिल ठरली!

याच दरम्यान चित्र प्रदर्शनासाठी मी लंडनला प्रयाण केलं. दोन वर्षांनी मुंबईत परतल्यावर ताईंना वचन दिल्याप्रमाणे, त्यांच्या आवडीचं अत्तर घेऊन मी त्यांच्या भेटीला गेले. ताई खूप आनंदल्या. माझ्या लंडन वास्तव्याचा वृत्तांत आणि सांगितिक, अशा खूप गप्पा रंगल्या आमच्या. ताई मला खूप excited वाटल्या. काही दिवसांनी मला अचानक त्यांचा फोन आला. म्हणाल्या, “भेटायला ये, आणि हो, पद्मजाला माझ्याकडे गाणं शिकायला पाठव. ” मी चमकलेच!

संगीत क्षेत्रातले दोन महान शिरोमणी! एकीकडे गानसरस्वती किशोरीताई तर दुसरीकडे संगीत मार्तंड (तेजोनिधी संगीतसूर्य) पंडित जसराजजी… दोघांनीही आपणहून पद्मजाला स्वतःच्या शिष्येचा मान द्यावा हे पद्मजाचं परमभाग्यच!

संगीतातल्या या दोन्ही अद्भुत किमयागारांच्या सुरमयी सहवासात संमोहित झालेले कितीतरी तृप्त क्षण माझ्या परदेशातल्या वास्तव्यात मला सदैव साथ करत राहिले.

कित्येकदा एखादी बंदिश ऐकताना किशोरीताईंच्या स्वरमंदिरातल्या मंजुळ घंटेच्या आवर्तनांचा नाद, मनाच्या गाभाऱ्यात हळूवार आंदोलत राही अन् त्याच्या घुमार्‍यातून त्यांचं एक वलयांकित सतेज रूप मन उजळवून जाई.

तसं पाहिलं तर किशोरीताईंच्या सहवासाचा योग हा केवळ काही काळापुरताच, पण आमच्यातल्या स्नेहबंधाला जणू ‘अवघा रंग एक झाला! ‘… हेच रूप आलं.

मध्यंतरी बराच काळ मी परदेशात असल्याने ताईंशी माझा संपर्क तुटला. मी पुन्हा भारतात आल्यावेळी त्यांना फोन केला. वाटलं, ताईंना जगभरात माझ्यासारखे त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे हजारो भक्त, चाहते, स्नेही असणार. मला कदाचित त्या आत्तापर्यंत विसरल्याही असतील! मी तसं त्याना विचारलंही!

तशा त्या हसत हसत म्हणाल्या, “विसरेन बरी मी तुला! तू प्रेमानं भेट दिलेलं अत्तर देतंय ना मला तुझी आठवण करून नेहमी! ” 

मला ठाऊक होतं, अत्तर हे केवळ ‘निमित्त! ‘

किशोरीताई जेंव्हा एखाद्याला आपलं म्हणतात, तेव्हां त्या त्याच्यावर जिवापाड प्रेम करतात. मी खरंच त्या भाग्यवंतांपैकीच एक!

‘त्या’ अत्तराच्या कुपीतलं अत्तर उडून भलेही ती कुपी कधीचीच रिती झाली असेल… पण किशोरीताईंसोबतचं माझं ‘सखीपण’ प्रेमभरे मिरवताना, आजही त्या आठवणींचा मदमत्त गंध, माझं चित्त ‘हर्षधुंद’ करत राहतो!

लेखिका : उषा फेणाणी पाठक 

प्रस्तुती : पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सैनिकांना जगवणारे सैनिक-धन्वंतरी!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सैनिकांना जगवणारे सैनिक-धन्वंतरी!” ☆ श्री संभाजी बबन गायके

लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू.

(भारतीय सैन्याच्या The Army Medical Corpsचा स्थापना दिन ३ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला! त्यानिमित्ताने विशेष लेख)

जेंव्हा दोन देश एकमेकांचे शत्रू म्हणून समोरासमोर उभे ठाकतात… तेंव्हा केवळ दोन सैन्यदलं लढत नाहीत… तर दोन व्यवस्था, दोन मनोवृत्ती युद्धभूमीत दोन हात करीत असतात… आणि जिंकते तेच सैन्य ज्याच्यातील प्रत्येक घटक देशप्रेमाने ओतप्रोत भरून गेलेला असतो… आणि हिंदुस्तान असाच एक देश आहे!

आपल्यासाठी तळहातांवर प्राण घेऊन लढणा-या सैनिकांच्या पाठीशी अनेक यंत्रणा कार्यरत असतात… त्यात अगदी रणभूमीवर स्वत:चे प्राण संकटात टाकून उभे असतात ते डॉक्टर्स, नर्सिंग असिस्टंटस… हे जणू स्टेथोस्कोपधारी सैनिकच!

वर्ष १९९९. १९८९ मध्ये पुण्याच्या The Armed Forces Medical College मधून एम. बी. बी. एस. चे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून देशाच्या विविध सीमांवर intern म्हणून अनुभव घेतल्या नंतर लखनौ येथील Officers’ Training College मध्ये the Medical Officers’ Basic Course हा एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधीत लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. या प्रशिक्षणात पी. टी. , संचलन, लष्करी कायदे, लष्करी जीवनपद्धती, शस्त्र चालवणे इत्यादी सर्व शिकावे लागते… एखाद्या सैनिकासारखे. कारण सेनेत फिल्ड हॉस्पिटल्स अर्थात प्रत्यक्ष युद्धभूमीवर तात्पुरत्या उभारल्या गेलेल्या रुग्णालयांमध्ये तैनात डॉक्टर्स सैनिकांच्या सदैव जवळपास असतात… हे परिपूर्ण सैनिकी डॉक्टर्स असतात!

१९९९ वर्ष सुरु होते. लेफ्टनंट डॉक्टर अरूप यांना काश्मिरात कारगिल भागातल्या एका छोट्या गावात स्थित असलेल्या एका सैनिकी फिल्ड हॉस्पिटलमध्ये रुजू होण्याचा आदेश प्राप्त झाला होता. इथले सर्जन काही महिन्यांच्या रजेवर जात होते, त्यांच्या जागी अनुभवी सर्जनची आवश्यकता होती. डॉक्टरसाहेब सर्जरीमध्ये तज्ज्ञ होते… या छोट्या हॉस्पिटलमध्ये आपल्या कर्तृत्वाला कितीसा वाव मिळेल?  अशी त्यांना शंका होती. ते रुजू झाले मात्र कंटाळून गेले. तिथे अन्य काही डॉक्टर्स, नर्सिंग असिस्टंस होतेच, पण सर्जन असे ते एकमेवच होते. शिवाय इथं आधुनिक असं फारसं काही नव्हतं. आपले इतर सहाध्यायी शहरांमध्ये, अत्याधुनिक रुग्णालयांच्या सुसज्ज शस्त्रक्रियागृहांत सर्जरी करीत असतील आणि इथं आपण या दुर्गम भागात आपले सर्जरीमधले कौशल्य सराव नसल्याने गमावून बसू की काय असं डॉक्टर बसू यांना वाटणं स्वाभाविकच होतं! शिवाय काश्मीर पुस्तकातील वर्णनात अगदी सुंदर, छान, आल्हाददायक असले तरी सीमेवर प्रचंड थंडी असते, रस्ते धोकादायक आणि वातावरण तसे नीरस… शिवाय अतिरेक्यांचा धोका तर चोवीस तास!

काहीही कितीही कारणे सांगितली तरी भारताच्या डोळ्यांत माती उधळीत पाकिस्तान भारताच्या सीमेत अगदी खोलवर घुसून बसला आहे, हे संरक्षण यंत्रणेच्या लवकर लक्षात आलं नाही! आणि याची किंमत जीवाच्या आकडेवारीच्या संख्येत सांगायची झाल्यास ५२७ मृत आणि १३६३ जायबंदी एवढी प्रचंड आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आर्थिक नुकसान मोठे असणार यात शंका नाही!

पाकिस्तानने ताब्यात घेतलेली सैन्यठिकाणे, सैन्यचौक्या परत मिळवायला सैनिकांना उंच पर्वत चढत जायला लागले… आणि पाकिस्तानी सैन्य नेम धरून गोळीबार करायला मोकळे होते… मोक्याच्या जागी सज्ज होते!

लेफ्ट. डॉक्टर बसूंच्या रुग्णालयात आता थंडी-तापाचे रुग्ण येत नव्हते… तर शरीरात गोळ्या घुसलेले, रक्तबंबाळ आणि मृत्यूच्या मुखात जाण्याच्या बेतात असलेले रुग्ण येऊ लागले! सुरुवातीला रोज रात्री दोन, चार नंतर नंतर तीस-चाळीस. पंधरा-वीस खाटांचे ते रुग्णालय. गोळीच्या जखमा म्हणजे शस्त्रक्रिया अत्यावश्यक. उपलब्ध यंत्रसामग्री आवश्यकतेच्या मानाने तोकडी!

सैनिक दिवसा उजेडी पहाड चढत होते, लढत होते… जखमी होत होते! त्यांना दिवसाउजेडी खाली आणणे म्हणजे खाली आणणा-या लोकांच्या जीवाला मोठा धोका. कारण पाकिस्तानी गोळीबार दिवसा तर अगदीच अचूक होणार! मग आपल्या सैन्याच्या बहुतांश मोहिमा रात्रीच्या अंधाराचा आडोसा घेत सुरु झाल्या. आता जखमी सैनिक रात्रीच्या वेळीच रुग्णालयात आणले जाऊ लागले. सैनिक रात्री जखमी झाला, आणि त्याला खाली रुग्णालयात हलवताना दिवस उजाडला की रात्रीचा अंधार पडेपर्यंत काहीही हालचाल करता येणे शक्य नसे… कारण तेच… पाकिस्तानी गोळीबार!

डॉक्टर साहेब आणि त्यांचे सहकारी संपूर्ण रात्र या जखमी सैनिकांवर उपचार करण्यात घालवीत… संख्या वाढत चालली होती म्हणजे… युद्धात आपली अजून सरशी होत नव्हती! प्रत्यक्ष समोरासमोर लढण्यापूर्वीच आपले सैनिक शत्रूने लपून केलेल्या हल्ल्यात जायबंदी होऊन खाली परतत होते… सैनिक मनातून हताश होते आरंभी! भारतीय वायुसेना युद्धात उतरली आणि भारतीय सैनिक वेगाने पुढे जाऊ लागले… पण युद्धभूमी अजूनही शत्रूवरच मेहरबान होती!

२९ मे, १९९९. स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा साहेबांचा देह अशाच एका रात्री रुग्णालयात आणण्यात आला! आहुजा साहेबांना पाकिस्तान्यांनी अनन्वित छळ करून मारले होते… उत्तरीय तपासणीत सारं स्पष्ट होतं! … युद्ध पुढं सुरूच होतं… रात्री जखमी सैनिक रुग्णालयात आणले जात होते… डॉक्टर आणि इतर सेवेकरी अपु-या साधनांच्या सहाय्याने पूर्ण प्रयत्न करून त्यांना अत्यावश्यक उपचार देत होते… आणि त्यांना हेलिकॉप्टरमधून पुढे उपचारार्थ नेले जात होते… प्राणांतिक जखमांवर आरंभीच्या Golden Hour मध्ये उपचार मिळणे गरजेचे असते… ते डॉक्टर बसू आणि त्यांचे सहकारी महत्प्रयासाने देत होते.

डॉक्टर साहेब जखमी सैनिकांशी संवादही साधत होते. त्यांनी सांगितलेले अनुभव वहीत टिपूनही ठेवत होते… अशा अनेक गोष्टी ज्या कुठेही नोंदवल्या गेलेल्या नव्हत्या. कित्येक दिवस उपाशी राहिलेले सैनिक, केवळ बर्फ चघळत जिवंत राहून सातव्या, आठव्या दिवशी रूग्णालयापर्यंत पोहोचू शकलेले सैनिक, युद्धातील प्रचंड संहार पाहून मानसिक संतुलन गमावलेले सैनिक… प्रत्येकाची कहाणी वेगळी!

इथल्या रुग्णालयात सर्जरी करण्याची संधी मिळणार नाही म्हणून निराश झालेले डॉक्टर बसू आता रोज चार, पाच सर्जरी करीत होते… मात्र यात त्यांना आनंद नव्हता… तरुण सैनिक असे घायाळ झालेले त्यांना पाहवत नव्हते…! पण काळजावर दगड ठेवीत तहान-भूक विसरून काम सुरु होते!

रुग्णांना रुग्णालयात हलवण्यासाठी तयार केलेल्या Helipad पर्यंत शत्रूचे तोफगोळे येऊन आदळत होते… त्याही स्थितीत पायलट उड्डाणे करीत होते! डॉक्टर्स रुग्णावर उपचार करीत आहेत आणि त्यांच्या पासून केवळ काही मीटर्सवर गोळा आदळतो आहे… अशीही स्थिती होत होती… रुग्नालां सोडून पळून दूर जाताही येत नव्हतं. सैनिक म्हणत होते… ”डॉक्टर साहेब, आमच्यावर गोळा पडला आणि आम्ही जखमी झालो तर आमचा जीव वाचवायला इथं तुम्हीच आहात… तुमच्यावर गोळा पडला आणि तुम्हीच जखमी झालात तर आमचं कसं होईल? ” सैनिकांचं बरोबर होतं… पण त्याला काही इलाज नव्हता. रुग्णालयाच्या छतावर तोफगोळ्यांचे तुकडे आदळत असताना डॉक्टर बसू आणि सहकारी डॉक्टर्स सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या मोठ्या कौशल्याने बाहेर काढीत त्यांच्या जखमा शिवत होते… त्यांना मृत्यूमुखातून बाहेर आणीत होते. यांपैकी काही तर पुन्हा लढायला निघूनही गेले… this is Indian Army!

९ जून, १९९९. कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या साथीदार सैनिकांचे मृतदेह रुग्णालयात आणले गेले… उत्तरीय तपासणीसाठी! नृशंस शब्दाला जर समानार्थी शब्द द्यायचा झाल्यास या हुतात्म्यांचे देह दाखवावेत अशी परिस्थिती! हे देह पाहून, त्यांच्यावरच्या जखमा पाहून रुग्णालयात जखमी होऊन पडलेले जातिवंत सैनिक म्हणत होते… ”आम्हांला लवकर बरे करा… आम्हांला परत लढायला धाडा… आता आम्ही शत्रूच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय परतणार नाही! ” पेटून उठलेल्या सैनिकांनी पुढे इतिहास घडवला. भारतीय वाघांनी अंगावर आलेल्या कोल्हया-कुत्र्यांच्या नखांचे ओरखडे सहन करीत त्यांची नरडी फोडली!

वाघ रक्तबंबाळ झाले, काही कामी आले… पण सरशी झाली ती वाघांचीच. ज्याला लोक सशस्त्र संघर्ष म्हणतात ते युद्ध त्यात लढलेल्या सैनिकांसाठी महायुद्धच होतं… अत्यंत विपरीत परिस्थितीत लढावं लागणं म्हणजे महायुद्धच. यात कामी आलेले सैनिक कोवळ्या वयातले, तरणेबांड होते… शेकडो मातांनी त्यांचे एकुलते एक मुलगे गमावले. वीरपत्नी सुद्धा संख्येने भरपूर झाल्या… फार मोठी किंमत म्हणजे हीच! ज्यांची मुले, ज्यांची सौभाग्ये गमावली गेली… त्यांच्यासाठी जग बुडाले!

ऑपरेशन विजय त्यावेळेपुरते संपले! डॉक्टर साहेबांची सर्जिकल ऑपरेशन्ससुद्धा संपली तात्पुरती. ३०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्या त्या ५६ दिवसांत. वरिष्ठ डॉक्टर्स लोकांनी डॉक्टर बसू यांचे नामकरण केले… The Kargil Surgeon! यातील दोन सैनिकांना डॉक्टर वाचवू शकले नाहीत… कारण त्यांच्या जखमाच जीवघेण्या होत्या… आणि दिवसा त्यांना रुग्णालयात आणता आले नव्हते… उशीर झाला होता!

हे सारे अनुभव लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू यांनी पुढे शब्दबद्ध केलेत… The Kargil War Surgeon’s Testimony हे या पुस्तकाचे शीर्षक असून ते मी विकत घेतले आहे. याचे भाषांतर करायला मिळाले तर भारी होईल. असो.

या पुस्तकात आकडेवारी, लष्करी व्यूहरचना यात नाहीत… यात अनेक प्रश्न आहेत… ज्याची उत्तरे कुणाकडेही नसतील! पण देश युद्ध कुणाच्या रक्ताच्या बलिदानाने जिंकतो हे मात्र समजू शकते. रणांगणात आपल्या देशाचा ध्वज रोवल्याशिवाय आपण युद्ध जिंकले आहे असे होत नाही… आणि हे करणारा पायदळाचा साधा सैनिकच असतो! असं डॉक्टर बसू म्हणतात!

प्रत्यक्ष युद्धभूमीवर सैनिकांच्या मागे सावलीसारखे राहून, प्रसंगी जीवाचे बलिदान देत भारतीय सैन्याचे वैद्यकीय कर्मचारी एक प्रकारचे युद्धच लढत असतात, हे खरेच. Army Medical Corps च्या स्थापनादिनाचे औचित्य साधून त्या सर्वांना अभिवादन करूयात. महाराष्ट्राच्या कन्या लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर साहेबा यांनी या दलात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांनी तर कारगिल युद्धात प्रत्यक्ष पहाडांवर जाऊन जखमी सैनिकांचे जीव वाचवले आहेत… स्वत: शत्रूवर गोळ्या झाडलेल्या आहेत. भारतीय सैन्यात अशा मराठी सैनिक-धन्वंतरींची संख्याही मोठी आहे!

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पिंकीचं इंग्लिश…” – कवी : श्री. मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले 

? वाचताना वेचलेले ?

☆ “पिंकीचं इंग्लिश…” – कवी : श्री. मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

पिंकी इंग्लिश शाळेत जाते,

मी तिला फार भितो…

ती वॉटर ड्रिंक करते,

मी आपला पाणी पितो…

जाडे- जाडे इंग्लिश शब्द,

तिच्या तोंडात उठ- सूट,

माझ्या पायात साधी चप्पल,

तिच्या पायात छान बूट…

 *

ती म्हणाली, केक या शब्दाला,

मराठी शब्द कुठला..?

आता गप्प बसलास ना,

बघ तुला घाम फुटला…

 *

मराठीच्या प्रेमामुळे,

मला गप्प बसवे ना…

इंग्रजीची तिची ऐट,

मला मुळीच ऐकवेना…

 *

मी तिला ताडकन म्हणालो,

वरण- भात आणि पिठले,

यांना तुझ्या इंग्रजीत,

सांग बरं शब्द कुठले..?

 *

हे ऐकून, पिंकी गप्प,

तिला काही सुचेना…

इंग्रजीत पिठले खाईल,

असा शब्द मिळेना…

 *

आता पिंकी घरी गुपचूप,

मराठीत पिठले खाते…

आणि वरण- भातावर,

मराठीतच लिंबू पिळते..!

कवी : श्री मंगेश पाडगावकर

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आयुष्याच्या संध्याकाळी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आयुष्याच्या संध्याकाळी... ? श्री आशिष  बिवलकर ☆

आयुष्याच्या संध्याकाळी,

ही भिंत फक्त आड आहे |

सरले कित्येक ऊन पावसाळे,

तुझी माझी मैत्री जीवापाड आहे |

*
दोन घरात, दोन अंगणात,

या भिंतीची आडवी रेष आहे |

गात्र जरी थकलीत आपली,

एकमेकांच्या ओढीचा आवेश आहे |

*

उभ्या असलेल्या भिंती पलीकडे,

तुझ्या मैत्रीचा तो विरंगुळा आहे |

हितगुज करतानाचा तुझा माझा,

आठवणींत रमण्याचा नाद खुळा आहे |

*

अवघाची संसार हा केला,

सुखी समाधानी परिवार आहे |

भरल्या ताटावर जरी बसलोत,

खेळीमेळीचे उरले दिवस चार आहे |

*

डोळे जरी पैलतिरी लागलेत,

समवयस्क म्हणून आधार आहे |

पिकलं पान कधी पण गळेल,

हा समज तुझ्यामुळे निराधार आहे |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ समाधान ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? समाधान ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

कोवळी किरणे उन्हाची

पडती पिल्लांच्या अंगावरी,

अंग जणू शेकत बसली 

“दोस्ती मधल्या” कट्ट्यावरी!

*

मधेच थांबवून शेपटीसवे

त्यांचे खेळण्याचे चाळे,

पाहती टकामका मजकडे 

मोठे करून घारे डोळे!

*

बहुदा गेली असेल आई 

भक्ष शोधण्या दारोदारी,

वाट पहात तिची बसली 

खेटून एकमेकां शेजारी!

*

पोज मज दिली छानशी 

विषय मिळाला कवितेला,

लिहिता त्यावर चार ओळी 

झाले समाधान मनाला!

झाले समाधान मनाला!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # २८१ – संकल्पित रहो…१ ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता – संकल्पित रहो…।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # २८१ – संकल्पित रहो – १ ✍

दोस्तो!

मैं महापुरुष नहीं साधारण व्यक्ति हूँ।

मेरे मन में भी उपजते हैं। हर्ष और विषाद

मुझे भी घेरती है निराशा

मैं भी बोलता हूँ/ दिग्भ्रमित अर्जुन की भाषा

पीड़ित होता हूँ अन्याय और अत्याचार से

विह्वल हो उठता हूँ। द्रौपदी जैसी पुकार से।

फिर होता है एहसास

कि मुझे जकड़े है- विवशता का पाश!

सोचता हूँ

जाने अनजाने इसी नागपाश में बँधे हैं

सब लोग

सब में व्याप गया है

निर्बलता का राजरोग,

शायद

निर्बलता शब्द न हो बिल्कुल ठीक

निर्बलता की जगह शायद

निर्वीयता होगा सही सटीक,

यह निर्वीयता नहीं तो क्या है

कि फटी आँखें देखती हैं

जलती बस्तियाँ।

देखती हैं- सद्भाव की डूबती कश्तियाँ।

प्रेम को मूर्खता

और करुणा को समझा जाता है

लिजलिजा विचार

अखबारों में रोज छपते हैं समाचार

क्रमशः…

स्व डॉ. राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # २८० “बाहर हाँफ रही गौरैया…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत बाहर हाँफ रही गौरैया...”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # २८० ☆।। अभिनव गीत ।। ☆

चित्र – श्री राघवेंद्र तिवारी (2004)

☆ “बाहर हाँफ रही गौरैया...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी 

एक सकोरा पानी-दाना

रक्खा करती माँ ।

औरों की खातिर चिड़ियों सी

 उड़ती रहती माँ ॥

 

छाती में दुनिया-जहान की

लेकर पीड़ायें ।

आँचल भर उसको सारी

जैसे हों क्रीड़ायें ।

 

आगे खिडकी में आँखों के

चित्र कई टाँगे ।

पीड़ा को कितनी आँखों से

देखा करती माँ ॥

 

बाहर हाँफ रही गौरैया

उस मुँडेर तोती ।

जहाँ उभरती   दिखे

सभी को आशा की जोती ।

 

गर्मी गले-गले तक आकर

जैसे सूख गई ।

इंतजार में हरी-भरी सी

दिखती रहती माँ ॥

 

लम्बे-चौड़े टीम-टाम है

बस अनुशासन के ।

जहाँ टैंकर खाली दिखते

नगर प्रशासन के ।

 

वहीं दिखाई देती सबकी

सजल खुली आँखें ।

इन्हीं सभी में भरे कलश

सी छलका करती माँ ॥

©  श्री राघवेन्द्र तिवारी

17-04-2022

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – समानांतर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – समानांतर ? ?

…….???

…..???

…???

पढ़ सके?

फिर पढ़ो..!

नहीं…?

सुनो मित्र,

साथ न सही

मेरे समानांतर चलो,

फिर मेरा लिखो पढ़ो..!

?

© संजय भारद्वाज  

(दोपहर 3:10 बजे, 15.6.2016)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 2 अप्रैल से  एक माह की हनुमान साधना वैशाख पूर्णिमा तदनुसार 1 मई 2026 को संपन्न होगी। 🕉️

💥 इसमें हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमानाष्टक के पाठ किए जाएँगे। हनुमान चालीसा के 21 या अधिक पाठ करने वाले विशेष साधक तथा 51 या अधिक पाठ करने वाले महा साधक कहलाएँगे। 101 या अधिक पाठ करने वाले परम साधक कहलाएँगे। आत्म परिष्कार और मौन साधना साथ चलेंगे।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares