जेव्हा केसांत चांदणं उतरू लागतं, गुडघ्यांच्या हालचालीत संगीताची मैफल भरते आणि चष्म्याशिवाय जग ‘धुसर’ भासू लागतं…
नेमक्या त्याच वळणावर एक निष्ठवान नायिका खंबीरपणे हात धरते.
तिचं नाव – ‘पेन्शन‘!
अढळ निष्ठा
पगार ही केवळ तारुण्यातील एक ‘चंचल प्रेयसी’ होती, पण पेन्शन मात्र उत्तरार्धातील खरी ‘हक्काची अर्धांगिनी’ आहे.
विनाअट साथ
ना तिला नखरे ठाऊक आहेत, ना रुसवा-फुगवा. ती कधी तारीख चुकवत नाही की कधी ‘ब्रेकअप’चा विचारही करत नाही.
सुखद सोबत
संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहाच्या सोबतीने ती दर महिन्याला कानात सांगते – “घाबरू नकोस हिरो, चित्रपट संपेपर्यंत मी तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी आहे!”
आयुष्याचा हा प्रवास ‘हनीमून’सारखा गोड आणि निश्चिंत ठेवणाऱ्या या लाडक्या महबूबेसाठी, दर नोव्हेंबरला आपल्याला फक्त एकाच गोष्टीची साक्ष द्यावी लागते…
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
दुर्जन निंदा – (२) ~पाखंडी लोक
मागील भागात तुकाराम महाराजांनी किती बीभत्स शब्दांत दुर्जनांची त्यांच्या अभंगातून निर्भत्सना केली आहे, हे आपण पाहिले. याही भागात आणखी काही अभंगांद्वारे तुकारामांचे अशा लोकांविषयीचे मत जाणून घेऊया, कारण दुर्जन निरनिराळ्या प्रकारचे असू शकतात. पाखंडी, म्हणजे वरवर दाखवायला सज्जन, भक्तीचे उपासक परंतु मनाने अत्यंत नीच अशा लोकांचा तुकाराम महाराजांना फार संताप आहे. त्यांच्याविषयी तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण आज त्यांच्या अभंगांतून पाहूया…
भक्तीचे सोंग करणाऱ्या ढोंगी माणसांविषयी या अभंगात महाराज म्हणतात,
न ये नेत्रा जळ/ नाही अंतरी कळवळ/
तो हे चावटीचे बोल/ जन रंजवणे फोल//
न फळे उत्तर/ नाही स्वामी जो सादर/
तुका म्हणे भेटी/ जंव नाही दृष्टादृष्टी//
ज्याच्या डोळ्यात भावभक्तीच्या पाण्याचा टिपूस नाही, आणि जोपर्यंत अंतरंगात हरी विषयी कळवळा नाही, तोपर्यंत त्याच्या भक्ती विषयी भारलेल्या सर्व गप्पा पोकळ आणि फक्त करमणूक करणाऱ्या असतील. स्वामींची कृपा असल्याशिवाय ते अभक्ताला कधीही भेटणार नाहीत. वरवरची प्रार्थना केवळ पोकळ आहे.
ढोंगी भक्तांविषयी या अभंगात महाराजांनी उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले आहे.
टिळे माळा मैद मुद्रा लावी अंगी/
देखो नेदी जगी फासे जैसे//
धीवर या मत्स्या/ चारा घाली जैसा/
भीतरील फासा /कळो नेदी //
खाटीक हा स्नेह वादे पशु पाळी /
कापावया नळी तयासाठी//
तुका म्हणे तैसा भला मी लोकात/
परी तू कृपावंत पांडुरंग//
जो बहुरूपी असतो तो त्याचे वरचे सोंग पालटतो आणि मासा पकडण्यासाठी बगळ्यासारखा ध्यानस्थ बसतो. त्याचप्रमाणे मैद म्हणजे ढोंगी लोक स्वतःला भक्त म्हणविणारे, कपाळावर सतरा टिळे लावतो, गळ्यात कसल्या कसल्या माळा घालतो, नामाच्या मुद्रा कोरून लावतो आणि जगाला लुटण्याचे त्याचे आतील बेत कळू देत नाही. या लोकांची जात जशी काही फासेपारध्यांसारखीच असते. गळाला काहीसे आमीष लावून मासे अडकविण्याचा हा प्रकार आहे. खाटीक बोकड पाळून त्याला धष्टपुष्ट करतो आणि नंतर त्यास कापतो. अभक्त मंडळी याहून वेगळी नसतात, असे तुकारामांचे स्पष्ट मत आहे.
पाखंडी लोकांना महाराज सतत सांगत आहेत की तुम्ही अनुभवावाचून बडबड करणे थांबवा. ही तुमची बडबड म्हणजे बाळंत न होता बाळंतीणीप्रमाणे स्वतःवर सर्व सोपस्कार करून घेणे आहे.
व्याल्याविण करी शोभून तातडी/
चार ते गधडी करीतसे//
अशा लोकांना ते गधडी म्हणतात. (बिनडोक)
काही नित्यनेमाविण/ अन्न खाय तो श्वान/
वाया मनुष्यपण/ भार वाहे तो वृषभ//
त्याचा होय भूमी भार/ नेणे जातीचा आचार//*
जाला दावेदार/ भोगवी अघोर पितरासी//
अखंड अशुभवाणी / खरे नच बोले स्वप्नी//
पापी तयाहुनी नाही/ आणिक दुसरा//
पोट पोसी एकला/ भूती दया नाही ज्याला/
पाठी लागे आल्या/ अतिताचे द्वारेशी//
काही संतांचे पूजन/ न घडे तीर्थाचे भ्रमण//
यमाचा आंदण/ सीण थोर पावेल//
तुका म्हणे त्यांणी/ मनुष्यपणा केली हाणी//
देवा विसरूनी/ गेली म्हणती मी माझे//
वरील अभंगात तुकाराम महाराजांनी अभक्त लोकांचे वर्णन केले आहे. भोजनाआधी देवपूजा करणे, गीता, विष्णुसहस्त्रनाम किंवा जप जाप्य करणे असा काही नियम जो पाळत नाही, तो मनुष्य कुत्र्यासमान आहे. मनुष्यपणाचा तो व्यर्थ भार वाहतो. खरंतर तो बैलच म्हणावा. अशा माणसाचा भूमीला केवळ भार आहे. आपल्या पितरांचा तो केवळ दावेदार आहे, कारण तो त्याच्या कुकर्माने त्यांना नरक भोगवितो. त्याची वाणी अशुभ आहे, स्वप्नातही त्याला खरे बोलता येत नाही. फक्त स्वतःपुरता विचार करून दारी आलेल्या अतिथीला तो हाकलून देतो. कधी संतांचे पूजन करीत नाही, की तीर्थाटन करीत नाही. असे लोक म्हणजे मनुष्यपणाची केवळ हानीच आहेत.
तुकाराम महाराजांना पाखंडी, (स्वतःला हरीचे दास म्हणणारे, ज्ञानी समजणारे) लोकांचा अनुभव फार जवळून मिळाला. अशा लोकांविषयी त्यांचे एक ठाम मत बनले, ते या अभंगातून आपण पाहूया.
अतिवादी लावी/ एका बोट सोंग दावी/
त्याचा बहुरूपी नट/ नव्हे वैष्णव तो चाट//
प्रतिपादी वाळी/ एका पूजी एका छळी/
तुका म्हणे नाही/ भूतदया ज्याचे ठायी //
एक मनुष्य कपाळाला काळी रेघ लावून आपण वैष्णव आहोत असे सांगत सुटतो. वादविवादही करतो, परंतु तो खरा वैष्णव नव्हे. तो वेशधारी बहुरूपी आणि खोटा आहे. तो एकाची स्तुती करतो तर दुसऱ्याचा धिक्कार करतो, आणि एकाला पूजनीय मानतो व दुसऱ्याला छळतो. खरे वैष्णव तर सर्वांशी समान वागतात. ते भूतदयेने परिपूर्ण असतात. या पाखंडी लोकांच्या ठायी भूतदया जराही नसते.
ढोंगी लोकांना तुकाराम महाराज रोखठोक बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत, त्याचे उदाहरण म्हणजे हा खालील अभंग…
जाऊनिया तीर्थ/ काय तुवा केले/
चर्म प्रक्षाळीले/ वरी वरी//
अंतरीचे शुद्ध कासयाने झाले/
भूषण ते केले आपणया//
वृंदावन फळ घोळले साकरा/
भीतरील थारा मोडेची ना//
तुका म्हणे नाही शांती क्षमा दया/
तोवरी कासया फुंदा तुम्ही //
ते म्हणतात, ” अरे ढोंगी माणसा, तू तीर्थास जाऊन केलेस काय? तर तुझ्या चामड्याचे प्रक्षा लन केलेस, तुझे कातडे फक्त पाण्यात भिजवलेस. तुझ्या अंतराचे काय? कडू वृंदावन फळ साखरेत किती घोळले तरी त्याचा उपजत कडूपणा जात नाही, तुझे तसेच आहे. तीर्थ स्नान करून तुझ्या मनाचे मालीन्य कसे जाणार? जोपर्यंत तुझ्या ठिकाणी दया, क्षमा, शांती या भावना नाहीत तोपर्यंत तुम्ही हरीचे दास म्हणून गर्वाने फुलून जाऊ नका. “
तुकाराम महाराजांना खऱ्या भक्तीचा अर्थ म्हणजे मानवता, भूतदया, अंतःकरणाची शुद्धता हेच सामान्यांना सांगायचे आहे असे मला वाटते. तो खरा हरीचा दास आहे, त्यालाच माऊली आपल्या चरणी आश्रय देते.
रिटायर्ड कर्नल सुभाष म्हणजे ग्रेट, शौकीन, हंसी मजाक माणूस. बंदुकीच्या गोळ्या निधड्या छातीवर झेलल्या त्यांनी. अनेक ठिकाणी जखमा झाल्या त्यांना पण त्या जखमांचे व्रण ते कुरवाळत नाही बसले, उलट अभिमानाने ते सांगतात ही माझी गर्वाने मिरवावी अशी प्रशस्तीपत्रकेच आहेत.
सकारात्मक दृष्टिकोनातला हा राजा माणूस मला फार आवडतो माणसांचा संग्रह त्यांच्या जवळ आहेच पण विविध देशातली नाणी, तिकिटे, प्रत्येक देशाची प्रतीके, निशाणे सर्वधर्म एक आहे हा समन्वय साधून त्यांनी संग्रह केला आहे. मी एकेक वस्तू न्याहाळत होतो एका काचेच्या कपाटात व्यवस्थित टांगलेले प्लॅस्टर बघून मी चमकलो आणि तिथेच थबकलो. बँडेज? प्लॅस्टर?आणि इतकं कसं जपून ठेवलेय आणि ते कां बरं? हा कोणता आनंदी छंदाचा प्रकार?
माझ्या चेहऱ्यावरच्या गोंधळ पहात ते गडगडाटी हंसत म्हणाले, “नवल वाटलं ना हा शोपीस बघून? प्लॅस्टर काढण्यासाठी लोकं कासावीस होतात. काढल्यावर ते फेकून देतात. मी तर ते मौल्यवानपणे जपलय म्हणून, गोंधळालास ना तू? अरे या प्लॅस्टरमुळेच मला संकटात धावून येणारी माणसे भेटली आणि प्रसंगाने माणसांची परीक्षा झाली त्यांच्या सेवाभावाची खूण, मला पटली. त्यांची आठवण म्हणूनच मी हे जपलंय नजरेसमोर ठेवलय.
माझं कुतूहल जागं होऊन मी म्हणालो, ” नक्कीच ह्या मागे काहीतरी इतिहास असणार आहे, होना कर्नल साहेब?
“बरोब्बर ओळखलंस वेळ असेल तर ते गुढरहस्य ऐकवतो तुला. ऐकायचंय?
“हे काय बोलणं झालं का साहेब! तुमच्याकडच्या गुण गौरवकथा ऐकायला आम्ही नेहमीच अग्रेसर असतो. मी त्यांच्या सोफ्यावर मांड ठोकून प्लॅस्टर रहस्य ऐकण्यासाठी उत्साहाने खाली बसलो.
हळूवारपणे एखादं कोडं उलगडावं तसे ते सांगू लागले,
“आयष्यात सुख आले, ते मी अनुभवले दुःखही झेलले यश आल्यावर त्यावर स्वार झालो पण स्वदेशीयांकडून अपयश आल्यावर मात्र मी खचलो, अस्थिर झालो. देशासाठी देशबंधूंसाठी आम्ही आमचं आयुष्य पणाला लावतो पण तेच देशबंधू आमच्याशी गद्दारीने वागले तर मात्र आम्ही उद्विग्न होतो. “
मला रहावलं नाही म्हणून मी विचारले, “परतून मायदेशी आल्यावर काही अनुभवलंत का तुम्ही? काय घडलं असं?”
“काय घडलं?अरे दगडाच्या काळजाची माणसं भेटली मला, पण हो! हो! त्यातही एक माणुसकीचा झरा पण होता. “
कर्नल साहेब तुमचा अनुभव ऐकायला मला आवडेल. सांगा ना काय घडलं असं? माझी उत्सुकता बघून गोष्टीवेल्हाळ कर्नल सांगू लागले, “आतापर्यंत तू माझ्या लढाईवरच्या कथा ऐकल्यास पण त्या घटनेमुळे मात्र माझ्या एकाकी आयुष्याला कलाटणी मिळाली. पाकिटातला फोटो मला दाखवत ते पुढे म्हणाले “त्याआधी हा बंड गुंडाचा, माझ्या नातवाचा फोटो बघ. ”
फोटोतलं गोडुल, गोबरं गोजिरवाणं पोरगं हंसत होतं. बाजूला गोरीघारी त्याची आई आणि शेजारी बाबा उभे होते. प्रत्येकाच्या फोटोवर बोट ठेवून ते सांगू लागले, ” हा माझा राजबिंडा लेक आनंद, हीमाझी गोरी परी म्हणजे माझी सून आणि हा बघ, हा राजपुत्र माझा नातू आहे. ”
त्यांना मध्येच आडवत मी म्हणालो, “पण तुम्ही तर.. “
“हो हो खरंय बिनापाश अविवाहीत, ना घरका ना घाटका असा मी सडाफटिंग माजी सैनिक आहे मग मी आजोबा कसा झालो असंचं म्हणायचंय नां तुला?पण मित्रा इथे मात्र मी गुंतत गेलो. माझ्या आईने मला लहानपणी कान मंत्र दिला आहे माणसं जोड. जोडलेल्यांना कधीही तोडू नकोस. तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे, तेव्हा ही जोडलेली गांठ कायम पक्कीच राहू दे. “
“साहेब तुमच्या आईचं प्रत्येक वाक्यनवाक्य मोलाचे आहे म्हणूनच तुम्ही जगमित्र आहात. पण सांगा ना तो प्रसंग. काय घडलं असं?
“अरे नेहमीप्रमाणे मी मस्तीत एका पायाने गाडी चालवत होतो तुला माहीतच आहे एक पाय मी रणांगणावर सोडून आलोय ते !तर काय सांगत होतो वाटेत कुत्र्याचं पिल्लू आलं. त्याला वाचवायला म्हणून मी करकचून ब्रेक दाबला ते पिटुकलं वाचलं रे! पण मागच्या कारवाल्यांनी मला उडवलं. माझा फुटबॉल झाला आणि फुटपाथवर मी आदळलो. मला सांवरायला जवळ यायच्या ऐवजी माझे हे देशबंधू लांब पळाले. मला उठवायला कुणाचाही हात पुढे येईना, रक्तस्राव झाला नव्हता पण कमरेचं हाड कटकन मोडल होतं लढाईत निधड्या छातीने गोळ्या झेलणारा मी इथे मात्र हरलो. कारवाला तर केव्हाच पळाला होता. “
बापरे फारच अवघड प्रसंग. “अहो!ज्यांच्यासाठी अहोरात्र तुम्ही रणांगणावर तळहातावर शीर घेऊन लढलात ती माणसंच माणुसकी विसरली. ही कृतघ्नता आहे”.
“हो ना! पण त्या पळून जाणाऱ्या लोकांतही एक जण देवदूता सारखा थांबला. पेपर विकणारा छोकरा होता तो. त्या छोकऱ्याचा छोटा हात माझ्या मदतीला पुढे झाला. वर्तमानपत्राचा गठ्ठा आणि सायकल मित्राच्या स्वाधीन करून तो माझ्याकडे धावला होता. मी वेदनेने तडफडत होतो कुणीतरी मला सोडलं होतं पण कुणीतरी माझ्या मदतीला धावलं होतं. तब्बल पंधरा दिवस मी हॉस्पिटलला होतो भानावर आलो तेव्हा मला कळलं माझ्या एका पायाला प्लॅस्टर घातलय. ”
“पण मग कर्नलसाहेब तुमचा हॉस्पिटलचा ऑपरेशनचा खर्च, जेवण खाणं कसं आणि कुणी ?
“अरे तो देवदूत छोकरा म्हणजे आजचा माझा मानसपुत्र आनंद आहे आणि त्याची आई कांताबेन माझी मानस भगिनी आहे. आनंदचे वडील परलोकवासी झाले पण जातांना त्यांनी आठवण म्हणून त्यांच्या नावाचं पदक असलेली चेन कांताबेनच्या गळ्यात घातली होती. तो तिचा अमूल्य ठेवा होता. माझा पहिल्या दिवसापासूनचा खर्च भागवण्यासाठी माऊलीने चेन गहाण ठेवली. मला कुणीच नाही असं कळल्यावर ती माझी धर्माची बहीण झाली. नवऱ्याच्या आठवणीचं पदक काळ्या दोऱ्यात ओऊन गळ्यात बांधलं. मला फारशी दुखापत झाली नव्हती पण पाय फ्रॅक्चर मध्ये होता मी बँडेजचे ओझं वाहात होतो तर खर्चाचा भार त्या मायलेकानी माझ्यासाठी, मागील जन्माचे ऋणानुबंध असल्यासारखा उचलला होता. तुला सांगतो मित्रा त्या काळात डॉ. वैशंपायन, सिस्टर फरीदा, इतर नोकर, सफाई वर्ग अहो रात्र माझ्या सेवेला तत्पर होता. आपल्या देशासाठी सीमेवर लढणारा देशप्रेमी हीच भावना माझ्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात होती आणि तो सेवक वर्ग सेवेला तत्परतेने पुढे झाला. अरे! सख्खे नातेवाईक काय ठेवतील इतकी माझी बडदास्त त्यांनी ठेवली. त्या सेवेची खूण त्या काळातली निस्वार्थी माणुसकी ती सेवाभावी माणसं त्यांच्यामुळेच तर मी लवकर बरा झालो आणि एका पायावर उभा राह्यलो. बंदुकीच्या गोळ्यांच्या खाणाखुणा मी शरीरावर वागवल्या. त्या बघून माझ्या देश प्रेमाच्या आठवणी उफाळून येतात. तशीच आठवण या माझ्या जोडलेल्या माणसांची मनात कायम राहावी त्यांच्या प्रेमाचं प्रतीक माझ्या डोळ्यासमोर रहावं म्हणून मी हे प्लॅस्टर काचेच्या कप्प्यात आणि मनाच्या कोपऱ्यात जतन करून ठेवलं आहे. मी बरा झालो तेव्हा कांताबेनची चेन सोडवून आणली तिने जपून ठेवलेल्या आनंदच्या वडिलांच्या प्रेमाचं प्रतीक असलेला बदामी फोटो चेनमध्ये घालून मी तिला वचन दिलं, आज पासून तू माझी वडील बहिण आहेस आणि आनंद माझा मानसपुत्र आहे कांताबेननी ते नातं मानलं आणि शेवटपर्यंत निभावलं. ”
“आनंद मुळातच हुशार होता परिस्थितीमुळे त्याचं अडलेलं शिकायचं स्वप्न मी पूर्ण करण्याचं वचन बेनला दीलं. आज आनंद परदेशात मोठ्या हुद्द्यावर आहे जेनी सारखी गोड सून आणि नातू त्याच्यामुळे मला आणि कांता बेनला मिळालाय. मागच्या जन्मीच्या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत ह्या. दुसऱ्या नातवाची चाहूल आम्हाला लागलीय. तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लवकरच आम्ही अमेरिकेला जाणार आहोत. आणि बरं का मित्रा सामानाच्या पॅकिंग मध्ये हे प्लॅस्टर असणार आहे. तिथे ते मिरवून सगळ्यांना ही प्लॅस्टर कथा मी ऐकवणार आहे कारण अरे, त्याच्यामुळेच तर माझ्यासारख्या भटक्या माणसाला बहिण मिळाली पुत्र, सून, नातू मिळाला आहे ना!आता सांग आहे की नाही माझं संग्रहालय प्रेक्षणीय?”
कर्नल साहेबांची प्लॅस्टर प्रेम कहाणी ऐकून मी अवाक झालो म्हणालो, “मानलं मानलं कर्नल तुम्हाला!असं म्हणत मी त्यांना आणि त्यांच्या प्लॅस्टरला कडक सॅल्यूट ठोकला.
आजच मी आईला मातृदिनानिमित्त हा दगड भेट म्हणून दिला.
वास्तविक पेपरवेट आणि शोपीस याव्यतिरिक्त तसा काही याचा फारसा उपयोग नाही. पण या एका छोट्याशा भेटीने माझी एका गरजू आईला मदत होणार होती.
****
काही महिन्यापूर्वी मी एका आदिवासींनी भरवलेल्या प्रदर्शनाला भेट दिली तीही प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी, प्रदर्शन संपायच्या फक्त काही मिनिटे आधी. जवळजवळ 25 एक तरी स्टॉल होते आदिवासींचे.
– – त्यात एका स्टॉल वर मला हा दगड सापडला बहुतेक माझ्याच नशिबात होता तो.
स्टॉल वर एक आई आणि तिचा मुलगा होता. स्टॉल जवळ जवळ रिकामाच होता.
एक अगदी अशिक्षित बाई होती स्टॉलवर पण खरोखरच तिच्या अंगात कला होती. तिच्याबरोबर तिचा मुलगाही होता कारण आता तो मोकळा होता त्याला दिवाळीची सुट्टी लागली होती.
या स्टॉल मधून मिळणाऱ्या पैशातून त्याच्या शिक्षणाचा खर्च करायचा होता तिला.
आत्तापर्यंत तिने रंगवलेल्या दगडांचे फोटो होते त्या मुलाच्या मोबाईल मध्ये. लोकांचा पत्ता लिहून घेणे त्यांच्याकडून पैसे घेणे त्याचा हिशोब ठेवणे वगैरे काम चोख पणे करीत होता तो.
तिने रंगविलेल्या दगडांवर काही देवांची नावे होती शहरांची होती. अगदी आपण ऑर्डर दिली, सांगितले तर तुमच्या मित्रांचे देखील नाव रंगवून द्यायला तयार होती ती आई.
आणि त्यातला शेवटला न विकला गेलेला असा दगड जो बहुतेक माझ्याच नशिबात होता तो मी विकत घेतला.
आपल्याला देखील बागेत, रस्त्यात येता जाताना, प्रवासात, असे अनेक आकाराचे दगड दिसतात पण त्याला व्यवस्थितपणे रंगवून ते विकणे… वा खूपच कौतुकास्पद.
दगडांमधून अर्थार्जन… किती सुंदर कल्पना.
कल्पना आणि कला यांना योग्य रीतीने स्कोप/दिशा मिळणे गरजेचे आहे हेच खरे.
अर्थ : सर्वकाळी सर्व शक्तिनिशी प्रेमभावाने कोणतीही चिंता न करता एक भगवंत भक्ति करण्यास योग्य आहे असे समजून त्याची भक्ती करावी.
विवेचन : एखाद्याने साधकाने साधना करायला सुरवात केली. सकाळी अमुक अमुक वेळ अमुक उपासना आणि संध्याकाळी अमुक वेळ अमुक उपासना. बाकीचा वेळ माझा भगवंताशी संबंध नाही, असे म्हणून किंवा अशी कृती करून चालणार नाही. त्याचे अनुसंधान सतत टिकले पाहिजे, त्यासाठी त्याने सतत विविध मार्ग शोधून भगवतांच्या चिंतनात राहिले पाहिजे. त्यासाठी अनेक मार्ग सर्व संतांनी सांगितले आहेत. त्यातील एक मार्ग आपल्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना सांगून करणे.
भक्ती ही केवळ काही वेळापुरती, उत्सवापुरती किंवा गरजेपुरती नसावी. ती सतत असावी. जेव्हा मन, वाणी आणि कृती या तिन्हींतून भगवंताचे स्मरण होते, तेव्हाच खरी भक्ती घडते.
भगवंताची भक्ती ही केवळ आनंद किंवा दुःखाच्या प्रसंगीच न करता, सर्व भावनांनी (जसे की प्रेम, भक्ती, करुणा, नम्रता, लोभ नसलेली तृष्णा, वियोग इ.) करावी. भक्त भगवंताशी प्रत्येक मनोभावाने जोडलेला असतो. समर्थ म्हणतात,
आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥ संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥ वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥”
(संदर्भ : दासबोध दशक ४ समास ३)
ज्याप्रमाणात भक्ति वाढत जाते त्याप्रमाणात साधक निश्चिंत होऊ लागतो. कारण त्याच्या पाठीशी उपासनेची शक्ति उभी असते. एकदा देवाला, सद्गुरूंना साधक शरण गेला की त्याची सर्वोतोपरी काळजी सद्गुरू घेत असतात. असा सर्व संतांचा अनुभव आहे.
सर्व संतांमध्ये एक साम्य नक्की अनुभवायला मिळते, ते म्हणजे त्यांच्या अंतरी असलेले समाधान. त्यासाठी साधकाने आपल्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून, आपली साधना अखंड करावी. सद्गुरू त्याला कायम सांभाळतात.
अर्थ : भगवंताचे कीर्तन किंवा नामस्मरण केले जाते, तेव्हा तो भगवंत फार लवकर प्रकट होतो आणि आपल्या भक्तांना आपले अस्तित्व जाणवून देतो.
विवेचन: समारोपाला चाललेल्या या लेखमालेच्या या सूत्रांत आपण भक्तीची फलश्रुती पहात आहोत.
या सूत्रात नारद मुनी आपल्याला भक्तीची एक अमूल्य अनुभूती सांगत आहेत. भक्त जेव्हा भक्तिभावाने भगवंताचे नामस्मरण, कीर्तन करतात, त्याचे नानाविध प्रकारे गुणगान करतात, तेव्हा भगवंत दूर नसतो. तो तत्क्षणी, शीघ्रतेने, त्या भक्तांच्या रक्षणासाठी, त्याला दर्शन देण्यासाठी प्रगट होत असतो.
सर्व संतांची चरित्रे अभ्यासली तर आपल्या ही सहज लक्षात येईल. कोणत्याही भक्ताचे चरित्र अभ्यासा. त्या त्या भक्तासाठी भगवंत धावत आलेले आहेत. मग तो गजेंद्र असो की द्रौपदी असो, भक्त प्रल्हाद असो की ध्रुव बाळ असो. भगवंत भक्ताच्या आवश्यकतेनुसार तो सखुबाईचे दळण दळतो, कबिराचे शेले विणतो, कुंभाराच्या घरी मडकी भाजतो, पाणक्या बनतो… ! किती सांगावे…
माझ्या सारख्या सामान्य मनुष्यानं भगवंताचे यथार्थ वर्णन करणे निव्वळ अशक्य!!
भक्ताने भगवंताला बोलविले की तो येतो. हे सूत्र भगवंताच्या प्रेमळ आणि कृपामय स्वभावाचे वर्णन करते. तो आपल्या भक्तांना दूर ठेवत नाही, तर त्यांच्या प्रेमाच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देतो. या सूत्रातून हे शिकायला मिळते की, भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जटिल साधने आवश्यक नाहीत. प्रेमाने, भक्तिभावाने, नामस्मरणाने त्याचं आवाहन केलं की तो तत्काळ हजेरी लावतो. त्यामुळे भक्ती ही सहज, सुलभ, आणि सर्वोच्च साधना आहे. “कीर्तनातून भगवंताचा अनुभव मिळतो – हा भक्तीचा परमोच्च प्रभाव आहे. “
अर्थ : सत्य वचन, सत्य आचरण आणि सत्य संकल्प ही तीन सत्य वचने आहेत, पण त्यापेक्षा परम सत्याची भक्ति श्रेष्ठ आहे. केवळ भक्ति श्रेष्ठ आहे.
विवेचन :कोणताही काळ ज्याप्रमाणे नीतिमत्ता श्रेष्ठ मानली जाते, त्याप्रमाणे सत्य श्रेष्ठ मानले जाते. प्रामुख्याने सत्याचे तीन प्रकार सांगता येतील.
सत्य वचन (वाणीने सत्य बोलणे)
सत्य आचरण (कर्माने सत्य आचरण करणे)
सत्य संकल्प (मनाने सत्य व संकल्पशुद्ध असणे)
नारदमुनी या सूत्रात स्पष्ट सांगतात की, जरी एखादी व्यक्ती त्रिसत्य अर्थात वाणी, आचरण आणि संकल्प पूर्णपणे सत्यनिष्ठतेनी करणारी असली, तरीसुद्धा भक्तीच त्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
एखादा मनुष्य खरे बोलणारा आहे पण त्याचे आचरण शुद्ध नाही. एखाद्याचे आचरण अतिशय शुद्ध आहे, पण त्याचा संकल्प शुद्ध नाही असे अनेक दोष मनुष्यामध्ये असू शकतात. काही लोकं प्रकांड पंडित असतात, पण त्यांचा अभिमान पण तितकाच मोठा असतो, अशा लोकांना देवाची भेट दुष्करचं असते, उलट एखादा मनुष्य पंडित नसेल, त्याला लिहिता वाचताही येत नसेल, पण त्याचा भाव शुद्ध असेल, त्याच्या मनात भक्तीचा अंकुर उगवला असेल, तर अशा मनुष्यावर देव प्रसन्न होण्याची शक्यता जास्त असते.
“मनी नाही भाव आणि देवा मला पाव”
अशाने देव पावत नसतो. तर ज्याचा भाव शुद्ध झाला, त्याला देव खात्रीने दर्शन देत असतो, असा अनुभव सर्व संतांनी घेतलेला दिसून येतो. अनेक संत लौकिक अर्थाने निरक्षर होते, पण आज त्यांच्या अभंगावर लोकं विद्या वाचस्पती ची पदवी घेत आहेत, त्यांच्यावर शोध प्रबंध प्रकाशित करीत आहेत, त्यांचे अभंग पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जात आहेत.
आपल्याकडे नुसते सत्याचे महत्त्व नाही, तर सत्याचरण करणाऱ्याने त्याला भक्तीची जोड दिली, तीच साधना पूर्ण करणारी ठरते. केवळ नैतिकता, सत्यतेचे पालन हे अध्यात्मासाठी पुरेसे नाही, तर त्याला भावपूर्ण भक्तीची जोड आवश्यक आहे.
मनुष्य भक्ति करू लागला की त्याचे भाडोत्री असलेले अवगुण त्याला सोडून जाऊ लागतात. ही भक्तीची किमया आहे. जिथे भक्ती आहे, तिथे सर्व सद्गुण आपोआप येतात. म्हणूनच नारदांनी दोनदा “भक्तिरेव गरीयसी” असे म्हणत भक्तीच्या श्रेष्ठतेवर जोर दिला आहे.
सत्य, नैतिकता, शुद्ध आचरण हेसुद्धा तेव्हाच सर्वोच्च ठरतात, जेव्हा त्यामध्ये भगवंतावरची भक्ती मिसळलेली असते. म्हणून भक्ती ही साध्यही आहे आणि साधनही. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतो. श्रीमहाराज एकदा नैमिष्यारण्यात जायला निघाले. त्यावेळी थोरल्या रामाच्या मंदिरातील रामाच्या मूर्तीतून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीमहाराज स्वतः आले आणि त्यांनी रामाचे डोळे पुसले, तेव्हा अश्रुपात थांबला. ही भक्तीची शक्ति आहे. अशी भक्ति असेल तर भगवंत खांबातूनही प्रगटतो. ही भक्तीच्या महानतेची काही उदाहरणे.
इथे श्रीगोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधील एक उतारा देत आहे – –
– – “खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान् लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : एक, देहाने साधूची संगत; दुसरी, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. “
(संदर्भ : श्री गोंदवलेकर महाराज प्रवचने दिनांक २७ जून)
☆ “आधुनिक संताजीराव… धनाजीराव…” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके☆
कश्यप साहेब आणि कौशलेन्द्र साहेब
२१, स्पेशल फोर्सेसची दोन वाघनखं !
युद्ध कथा रम्य असतात, हे खरेच आहे. पूर्वीची युद्धं आणि आधुनिक जगातील युद्धं यांत जमीन-आस्मानाचा फरक आहे, हेही तेवढंच खरे आहे. राजे-रजवाड्यांच्या काळात सैन्य एकमेकांवर चालून जाई, मोकळ्या मैदानात जणू एखादा खेळ खेळावा, तशी युद्धं लढली जात. पुढे दोन देशांमधील युद्ध म्हणजे एका देशाने दुस-या देशाची सीमा ओलांडून तो देश काबीज करणे. विमानांच्या वापराने ही आक्रमणे अधिक खोलवर आणि धारदार होत गेली. भारत-पाकिस्तान यांच्यात झालेली युद्धंही याला अपवाद ठरली नाहीत. परंतू १९८० च्या दशकापासून भारताचे अभिन्न अंग असलेल्या जम्मू-काश्मीर राज्यात भारतीय सैन्याला पाकिस्तानी, अफगाणिस्तानी घुसखोर भाडोत्री सैनिक आणि स्थानिक अतिरेकी यांचा सामना खूप मोठ्या प्रमाणात करावा लागला… आणि आजही हीच परिस्थिती आहे. अर्थातच हे पारंपारिक युद्ध नाही. त्यामुळे आपले सैनिक या भागांत नेमक्या कोणत्या परिस्थितीला सामोरं जात आहेत, हे जनतेला माहीत असणे गरजेचे होते. पण जनतेला ही माहिती होण्याचे मोजकेच स्रोत होते. एक चित्रपट आणि दुसरा स्रोत म्हणजे पुस्तके… जी बहुतेक वेळा इंग्रजी भाषेत लिहिलेली असतात. या स्रोतांच्या मर्यादांमुळे नेमके चित्र उभे राहत होतेच असे नाही.
पण विडीओ मुलाखती, खाजगी वाहिन्या यांमुळे प्रत्यक्ष संबंधित व्यक्तींच्या तोंडून युद्धाची वर्णने ऐकून परिस्थिती ब-यापैकी स्पष्टपणे समजून घेता येते आहे.
युद्धकथा समाजाला आवडतात. त्यामुळे हल्ली त्या मोठ्या प्रमाणावर सांगितल्या जात आहेत. यांतून तरुणांना प्रेरणा मिळते, ही चांगली गोष्ट आहे. पण याचे व्यापारीकरणही मोठ्या प्रमाणावर झालेले दिसते. पण त्याला इलाज नाही. मुलाखती घेणारे या क्षेत्राशी संबंधित असण्याचे प्रमाणही पूर्वी कमी होते. त्यामुळे अनेकवेळा हास्यापद प्रश्न विचारले जात. पण प्रत्यक्ष युद्धात, मोहिमांमध्ये सहभागी होऊन शौर्य गाजवलेले काही लोक या क्षेत्रात आलेले आहेत, हे खूप छान होते आहे. यांत भारतीय सैन्यातील काही सेवानिवृत्त अधिकारी आहेत. यांत सर्वांत प्रभावी काम दिसते आहे ते The Monks And The Warriors हे podcast चालवणा-या दोघां तरुण, शूर आणि अनुभवी निवृत्त लष्करी अधिका-यांचे!
यातील एक आहेत कर्नल कौशल कश्यप (निवृत्त), शौर्य चक्र विजेता आणि दुसरे आहेत लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) सेना मेडल विजेते. कर्नल कौशल कश्यप साहेबांनी मणिपूरमध्ये अनेक अतिरेकी ठार मारले… त्यासाठी त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. तर लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग यांनी सहा सहा दिवस जंगलातून पायी प्रवास करीत अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. हे दोघेही MARATHA LIGHT INFANTRY मधून निर्माण केल्या गेलेल्या 21, PARA SPECIAL FORCES या सैन्यविभागाचे मोठे शूर अधिकारी. यांनी निवृत्तीनंतर सेनेतील अधिकारी, सैनिक यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्या PODCASTच्या माध्यामातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य सुरु केले आहे.
नुकतीच या जोडगोळीने ब्रिगेडीअर सुनील भानोत (सेवानिवृत्त) साहेबांची अतिशय रोमांचक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या आरंभी त्यांनी एक विशेष कृती करून त्यांच्यातल्या जिवंत सैनिकांची जणू ओळखच करून दिली.
२१, स्पेशल फोर्सेस वाघनख दलाचे आराध्य दैवत म्हणजे आपल्या सर्वांचे भाग्यविधाते छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेब. शिवरायांनी अफझल खानास मातीत घालण्यासाठी वापरलेलं वाघनख हे हत्यार या दलाचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले आहे. हे चिन्ह स्वीकारले जावे यासाठी कर्नल व्ही. बी. शिंदे (निवृत्त) साहेबांनी अतोनात कष्ट घेतले आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे शिवरायांचा अश्वारूढ पण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आसाममध्ये स्थापित झाला आहे. हा पूर्णाकृती पुतळा पुण्यातील श्री. विराज खटावकर (शिल्पकार) यांनी बनवून दिला आहे. आणि पुण्यातून आसामपर्यंत या पुतळ्याचा गौरवशाली प्रवासही प्रसिद्ध झाला आहे.
कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांनी MARATHA LIGHT INFANTRY तून २१ स्पेशल फोर्सेसची निर्मिती करताना देशासाठी मोठे योगदान दिले. या स्पेशल सैनिकांनी मणिपूर आणि संबंधित राज्यांत खूप मोलाची कामगिरी बजावली आहे. पण देशाला याबाबत फारशी माहिती आहे, असे दिसत नाही. कारण जम्मू-कश्मीर, चीन सीमा यांबाबत जास्त लिहिले, बोलले जाते. असो.
कर्नल कौशल कश्यप (निवृत्त), शौर्य चक्र विजेता आणि लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) सेना मेडल विजेते यांनी त्यांच्या स्टुडीओमध्ये ठेवण्यासाठी शिवरायांची एक प्रतिमा खास बनवून घेतली आहे. या PODCAST ची सुरुवात करताना भानोत साहेबांसारख्या वीर अधिका-याच्या हस्ते महाराजांच्या या अर्धाकृती पुतळ्याचे साधेसे, औपचारिक अनावारण करून घेतले व महाराजांना पुष्पे अर्पण केली. त्यांची ही कृती आपल्यासाठीही खूप अभिमानास्पद ठरावी. याप्रसंगी त्यांनी थोडक्यात शिवरायांची महती सांगितली जी ऐकण्यासारखीच आहे. महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असलेल्या आसाममध्ये कार्यरत सैनिकांनी आपल्या महाराजांच्या शिकवणुकीचा अंगीकार करीत देशाच्या शत्रूला नामोहरम केले… गनिमी कावा वापरीत मोठा पराक्रम गाजवला… हे किती विशेष आहे.
अतिशयोक्तीचा दोष स्वीकारून असे म्हणावेसे वाटते की, कश्यप साहेब आणि कौशलेन्द्र साहेब हे दोघे अधिकारी जणू स्वराज्याचे संताजीराव-धनाजीराव म्हणूनच कार्य आहेत. हे कार्य सैनिकांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आहे. हे दोघे ज्यांना सैन्यात भरती व्हायचे आहे, त्यांना मार्गदर्शनही करतात. अत्यंत उत्तम व्यक्तिमत्व लाभलेले हे अधिकारी इतरांच्या मुलाखती घेताना स्वत:च्या अनुभवाच्या जोरावर नेमके प्रश्न विचारत वक्त्यांना बोलते करतात, त्यांचा योग्य तो सन्मान राखतात. हे काम अतिशय महत्त्वाचे आणि अभिनंदनीय असेच आहे. तरुणांनी THE MONKS AND WARRIORS VIDEO PODCST जो YOUTUBE वर दिसतो, तो जरूर पहावा… प्रेरणादायी आहे.
खरं तर भारतीय सैन्यदलाने स्वत:ची अशी खास PODCASTS केली पाहिजेत. यासाठी या दोघा अधिका-यांची मदत घेता येईल. कारण सैन्याची बाजूही जनतेला प्रभावीरीत्या समजली पाहिजे.
मी यांच्यापासून प्रेरणा आणि माहिती घेऊन सैन्यकथा दर रविवारी लिहिण्याचा उपक्रम सुरु केला आहे. मराठीत सुद्धा असे PODCAST होणे गरजेचे आहे… फक्त व्यावसायिकीकारण टाळले गेले पाहिजे. महाराष्ट्रात तर सैन्यकथांची अजिबात वानवा नाही.
धन्यवाद, कश्यप साहेब, धन्यवाद कौशलेन्द्र साहेब! बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! २१, स्पेशल फोर्सेसची दोन वाघनखं!
(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ “जय प्रकाश के नवगीत ” के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “इंतज़ार” ।)
जय प्रकाश के नवगीत # १४४ ☆ इंतज़ार ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆