मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग –३३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

गीतांजलीत प्रकट झालेले टागोरांचे मृत्यू विषयक विचार :-

गीतांजलीतील बहुतांश कवितांमध्ये टागोरांनी आपले मृत्यू विषयक विचार मांडलेले आहेत. ते मृत्यूचं स्वागत करतात आणि तेही अत्यंत संयतपणे व सौहार्दपूर्ण रितीने! मृत्यू अटळ आहे म्हणून तो आनंदाने स्वीकारायचा, असं नाही तर ती एक आनंददायक व हवीहवीशी वाटणारी घटना आहे असं त्यांना वाटतं व म्हणून ते मृत्यूची वाट बघतात. मृत्यू नंतर परमेश्वरासारखा जिवलग सखा भेटणार म्हणून ते आनंदित होतात. मृत्यू मधेच जीवनाची इतिकर्तव्यता आहे असं ते मानतात.

आत्म्याला सुखावणारी एकमेव गोष्ट म्हणजे मृत्यू! त्यानंतर ‘पुनरपि जननम् ‘ वाटणीला येईल की, मोक्ष मिळून परमेश्वरा बरोबर एकरूपता मिळेल हे टागोरांना महत्वाचे वाटत नाही. गीत क्र. ३४ मधे तर ते देवाला म्हणतात की, “मला मुक्ती नकोच कारण तुझ्यापासून वेगळा असेन तरच मी तुला डोळे भरून पाहू शकेन, तुझ्यावर भरभरून प्रेम करू शकेन. तुझी सेवा करण्याची संधी मला मिळेल. तू माझा आहेस हे मला सर्वांना अभिमानाने दाखविता येईल. “

पुनःपुन्हा मिळणाऱ्या जीवनासाठी टागोर कृतज्ञ आहेत. गीतांजलीतील अनेक कवितांमधून त्यांनी ‘जीवन मृत्यूच्या चक्रा’ विषयी भाष्य केलं आहे. ते म्हणतात, “जीवन व मृत्यू दोन्ही चिरंतन आहेत कारण जीवना नंतर मृत्यू आला तरी मृत्यूनंतर पुन्हा जीवन अटळ आहे. आणि जर मोक्षप्राप्ती झाली तर मृत्यूपश्चात मृत्यूचे भयच रहात नाही. ” 

एका गीतात (क्र. ९५) आईचं दूध पिणाऱ्या बालकाचे उदाहरण देऊन ते सांगतात की, “आई बाळाला उजव्या स्तनाकडून डाव्या स्तनाकडे नेते तेंव्हा ते बाळ रडू लागते. त्याला हे कळत नाही की, दुसऱ्या बाजूचे दूध त्याला मिळणारच आहे. तद्वतच माणसाला मृत्यूची भीती सतावत असते आणि मृत्यूनंतर पुन्हा जीवन मिळणारच आहे, हे तो विसरतो. “

मराठी संतांनी देवाच्या सहवासाची तुलना माहेरपणाशी केली आहे तर टागोर देवाच्या चिरंतन सहवासाची तुलना सासरी होणाऱ्या पतीच्या अखंड सहवासाशी करतात. एके ठिकाणी (गीत क्र. ९४) ते म्हणतात, “मृत्यूनंतर मी पतीगृही जाईन, तिथे ग्रह तारे माझं स्वागत करतील व पतीबरोबर एकांती भेट झाल्यानंतर, मीलन झाल्यानंतर माझं स्वतंत्र अस्तित्वच राहणार नाही. जीव शिव एकरूप होऊन जातील. “

एका कवितेत (९०) ते म्हणतात की, ” जर मृत्यू (यम) माझ्या दारात अतिथी म्हणून आला तर मी त्याला दार दडपून हाकलून देणार नाही तर त्याचं मी आदरातिथ्य करेन. माझ्या जवळच्या सर्व ऐहिक गोष्टी त्याला देईन व माझे प्राण त्याच्या स्वाधीन करीन. कारण आपल्याला सर्वात प्रिय असलेल्या गोष्टीचं दान देण्याची शिकवण मला माझ्या संस्कृतीने दिली आहे.

कधी ते देवाला आपला प्रियकर मानून (गीत क्र. ९१) त्याला सांगतात की, “तुझ्या भेटीची आस मनात बाळगूनच मी हे जीवन व्यतीत केलं आहे. तुझ्याकडे जाण्यासाठी मी इथले सगळे पाश हळूहळू तोडत आलो आहे. आता तुझी भेट हीच माझी अंतिम आस आहे. ते म्हणतात जीवनाचा संघर्ष आता मला निष्फळ वाटतो आहे. (गीत क्र. ९९) जीवनाच्या ऐलतीरावरून मृत्यूच्या पैलतीरापर्यंत ही आयुष्याची होडी वल्हवणं आता मला शक्य नाही. तेव्हा तूच मला आता पैलतीरावर घेऊन जा. अन्यथा मी हे सुकाणू सोडून देईन म्हणतो. “

एके ठिकाणी (गीत क्र. ९२) ते म्हणतात, “जीवन हे एक नाटक आहे. शेवटच्या अंकानंतर पडदा पडेल व मृत्यूनेच उजळलेलं तुझं अमर्त्य जग मला मिळेल. इथे कसलाही भेदभाव नाही, काळाचा अडसर नाही, उभ्या जन्माच्या देण्या घेण्याचा हिशेब, कामना, वासनांची लक्तरे या नश्वर जगातच टाकून देऊन तुझ्या अमर्त्य जगात मी प्रवेश करीन.

मित्र, आप्तेष्ट, सगेसोयरे सर्वांचा निरोप घेऊन (गीत क्र. ९३) ते आपल्या चुकांबद्दल क्षमा मागतात व या अंतिम प्रवासाला निघताना त्यांच्या प्रेमाची शिदोरी सोबत घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त करतात.

—–

गीत : ९७

WHEN my play was with thee I never questioned who thou wert. I knew nor shyness nor fear, my life was boisterous.

In the early morning thou wouldst call me from my sleep like my own comrade and lead 

me running from glade to glade.

On those days I never cared to know the meaning of songs thou sangest to me. Only 

my voice took up the tunes, and my heart danced in their cadence.

Now, when the playtime is over, what is this sudden sight that is come upon me? The 

world with eyes bent upon thy feet stands in awe with all its silent stars.

—–

 मराठी भावानुवाद : गीत : ९७

खेळगडी तू माझा

परि ठाऊक नसे

मज गांव तुझा,

नावही माहित नसे

तुझ्यासोबत परि

कसली भीती नसे

जीवन आनंदमय,

बुजरेपणा नसे

प्रभातीच तू यावे,

सोबत मज न्यावे

वनीरानी फिरवावे,

सुहृद सखा व्हावे

सोबतीने फिरतांना,

ऐकविसी मज गाना

अर्थ ठाऊक नसे मना

ऐकून त्या सूर ताना,

मनमोर नाचतांना

बाल्य सरे जेधवा

उमगे मज तेधवा,

नभ, धरा अन् तारे

आणि तसे जग सारे

नतमस्तक, आदरे

चरण तुझे स्पर्शत रे!

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

 गीत : ९८

 WILL deck thee with trophies, garlands of my defeat. It is never in my power to escape 

unconquered.

I surely know my pride will go to the wall, my life will burst its bonds in exceeding pain, and my empty heart will sob out in music like a hollow reed, and the stone will melt in tears.

I surely know the hundred petals of a lotus will not remain closed for ever and the secret recess of its honey will be bared.

From the blue sky an eye shall gaze upon me and summon me in silence. Nothing will 

be left for me, nothing whatever, and utter death shall I receive at thy feet.

—–

मराठी भावानुवाद : गीत : ९८

पराभूत मी असे जीवनी

अजिंक्य नसणे सत्य जाणुनि

आलो शरण पायी तुझ्या मी

स्वाभिमानास त्यागुनि॥

*
वेदनांचा विस्फोट होता

हुंदके मम हृदयी दाटता

वेळूही शोकात्म सूर दे

खडकालाही पाझर फुटता॥

*
एक आशा तेवतसे पण

मिटले कमल उमलेल तो क्षण

तुझ्या कृपेचा मधु मिळे मग

वाट पाहतो माझा कण कण॥

*

नील गगनातून कोणी

पाहतसे मज क्षणोक्षणी

पाठवील संदेश मूक तो

मुदित होईन मनोमनी॥

`*

मृत्यू विना नच कांही मागीन

अन्य कांही नकोच सांगीन

तुझिया पदांशी करित समर्पण

चिद्शांतीने तव मुख पाहीन॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

गीत : ९९

WHEN I give up the helm I know that the time has come for thee to take it. What there is to do will be instantly done. Vain is this struggle.

Then take away your hands and silently put up with your defeat, my heart, and think it your good fortune to sit perfectly still where you are placed.

These my lamps are blown out at every little puff of wind, and trying to light them I forget 

all else again and again.

But I shall be wise this time and wait in the dark, spreading my mat on the floor; and 

whenever it is thy pleasure, my lord, come silently and take thy seat here.

—–

मराठी भावानुवाद : गीत : ९९

जीवन नौका मी वल्हवितो

सोडून देईन सुकाणू म्हणतो 

*

संघर्षही आता वाटे निष्फळ 

दूर किनारा, तूच ने जवळ

*

नाही जर का हे तुज साध्य 

पराभव तुझा करी तू मान्य

*

शांत आणि मग तुझ्या मंदिरी

दगडी मूर्तीत रहा दगडापरी

*

विझवे दीपक, वार्‍याची फुंकर

पुनःपुन्हा मी लावी तो शुभंकर

*

कळले आता कशास लावू?

अंधारतचि पथारी पसरू

*

जेंव्हा तुजला वाटे येशील

मजपाशी अंधारी बसशील

– क्रमशः भाग ३३..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला आवडलेले एक व्यक्तिमत्व : डॉ. वसंतराव डोक्रस ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मला आवडलेले एक व्यक्तिमत्व : डॉ. वसंतराव डोक्रस ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

“माणूस असावा तर असा आणि एखाद्या संस्थेचा प्रमुख असावा तर असा” —

असं वाटायला लावणारी माणसं आयुष्यात फार क्वचित भेटतात. अशाच थोडक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे डॉ. वसंतराव डोक्रस. व्यक्तीचित्र म्हटलं की सहजपणे पु. ल. देशपांडे यांनी रंगवलेली अंतू बरवा, हरी तात्या, सखाराम गटणे यांसारखी अजरामर पात्रं डोळ्यांसमोर उभी राहतात. पुलंनी माणसांच्या स्वभावरेषा ज्या सूक्ष्मतेने आणि जिवंतपणे रेखाटल्या, ती उंची गाठणं अवघडच. तरीही इतर लेखकांच्या लिखाणातही अशी काही व्यक्तीचित्रं आढळतात, जी वाचकाच्या मनात कायमची घर करून राहतात.

अशाच लक्षात राहणाऱ्या व्यक्तीचित्रांपैकी एक म्हणजे डॉ. विजय देशपांडे यांनी आपल्या ‘माणूस नावाची शाळा’ या पुस्तकात रेखाटलेले डॉ. वसंतराव डोक्रस यांचे व्यक्तिचित्र. ते वाचताना क्षणोक्षणी असं वाटत जातं की नेतृत्व, विद्वत्ता आणि माणुसकी यांचा सुरेख संगम म्हणजे डॉ. डोक्रस.

डॉ. वसंतराव डोक्रस हे नागपूरच्या विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज (व्हीआरसीई) चे माजी प्राचार्य. आज हेच महाविद्यालय विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT) म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, त्यांच्याबद्दल लिहिणारे डॉ. विजय देशपांडे हेही याच संस्थेतील प्राध्यापक होते. त्यामुळे हे व्यक्तिचित्र अनुभवांच्या प्रामाणिक मातीवर उभं राहिलेलं आहे.

डॉ. डोक्रस यांच्या कर्तृत्वाचा पाया त्यांच्या विद्यार्थीदशेतच रचला गेला होता. अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजमधून सुरू झालेला त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यानंतर त्यांना प्रतिष्ठित आय. आय. एस. (IISc – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) मध्ये एम. एस्सी. साठी शिष्यवृत्ती मिळाली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी एम. एस्सी. ‘डिस्टिंक्शन’सह उत्तीर्ण करण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेमुळेच १९४० च्या दशकात त्यांना अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून एम. एस. (MS) आणि पी. एचडी. (Ph. D) साठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांचा त्या काळातील शोधनिबंध आजही गुगलवर उपलब्ध आहे, जो त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीची साक्ष देतो.

डॉ. डोक्रस मोजकंच, पण नेमकं आणि मार्मिक बोलत. एकदा ते आणि डॉ. विजय देशपांडे राष्ट्रीय प्रयोगशाळेतील एका उपसंचालकांना भेटायला गेले. पद मोठं होतं, खुर्चीही मोठी होती; पण त्या पदावर बसलेली व्यक्ती मात्र सातत्याने आपल्या अडचणींचा पाढा वाचत होती. आपल्याला अपेक्षित असलेलं काही साध्य होणार नाही, हे लक्षात येताच दोघे बाहेर पडले. तेव्हा डॉ. डोक्रस सहज म्हणाले—

“खुर्च्या मोठ्या केल्या तरी त्यात बसणारी माणसं मात्र खुजीच राहतात. ”

त्यांचे हे उद्गार म्हणजे नेतृत्वाच्या संकल्पनेवरची कठोर पण खरी आणि मार्मिक अशी टिप्पणी होती.

डॉ. डोक्रस हे शिस्तप्रिय होते, पण ती शिस्त जाचक नव्हती. एकदा व्हीआरसीईच्या विद्यार्थ्यांनी एका काश्मिरी पंडित विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली हॉस्टेलच्या जेवणावरून संप पुकारला. डॉ. डोक्रस यांनी त्यांना समजावून पाहिले, पण विद्यार्थी ठाम होते. तेव्हा त्यांनी एक अनोखा मार्ग निवडला. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले, “जर मेस बंद झाली, तर तुम्ही जेवणार कुठे? ” विद्यार्थ्यांकडे उत्तर नव्हते. अशा वेळी डॉ. डोक्रस यांनी आपल्या पत्नीला घरी स्वयंपाक करायला सांगून तो डबा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. काही दिवसांतच विद्यार्थ्यांचा रोष निवळला आणि तो विद्यार्थी नेता चक्क डॉ. डोक्रस यांच्या पत्नीचे आभार मानायला त्यांच्या घरी पोहोचला. विद्यार्थी हा त्यांचा खरा ‘वीक पॉईंट’ होता. चिडलेल्या विद्यार्थ्यांशी ते असं काही भावनिक संवाद साधत, की क्षणात वातावरण बदलून जाई.

त्यांची तत्वनिष्ठा केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही दिसून आली. १९६७ मध्ये इराणचे शहा मोहम्मद रझा पहलवी यांच्या राज्याभिषेकासाठी त्यांना खास निमंत्रण होते. त्यांचे पुत्र डॉ. उदय डोक्रस सांगतात की, हे निमंत्रण शहांच्या थेट ओळखीमुळे नव्हे, तर इराणी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षांशी असलेल्या मैत्रीमुळे होते. याच काळात इराणच्या एका मंत्र्याच्या मुलाला (जो अभ्यासात कच्चा होता) पास करण्यासाठी डॉ. डोक्रस यांच्यावर दबाव आला, पण त्यांनी त्याला कसलीही मदत केली नाही. परिणामी त्या मुलाला रिकाम्या हाती इराणला परतावे लागले. डॉ. डोक्रस हे पूर्णपणे प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त होते.

डॉ. डोक्रस हे विद्वान तर होतेच; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते एक उमदं, सकारात्मक व्यक्तिमत्त्व होते. मध्य प्रदेशात त्यांनी केलेल्या यशस्वी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची व्हीआरसीईच्या प्राचार्यपदी नेमणूक केली. त्यांनी जो मार्ग प्रशस्त केला, त्यावरून पुढे चालणं नंतरच्या प्राचार्य आणि विद्यार्थ्यांसाठी सुकर झालं.

कामाचा उरक प्रचंड होता. टेबलावर आलेली प्रत्येक फाईल निकाली काढूनच ते घरी जात. डॉ. विजय देशपांडे यांनी एकदा त्यांच्या कामाच्या पद्धतीचं रहस्य विचारलं, तेव्हा ते सहज म्हणाले—

“अरे, कसलं आलंय रहस्य! सारं काही सवयीन जमतं. सवय लावून घ्यायला थोडी बुद्धी, काम करताना लागणारं कसब आणि मुख्य म्हणजे कोणतंही काम पूर्ण करण्याची मानसिक तयारी—या तीन गोष्टी जवळ असल्या की बाकी सगळं आपोआप जमतं. ”

डॉ. उदय डोक्रस सांगतात की, वडील कायम कामात आणि प्रवासात असायचे. पण त्यांच्या लोकप्रियतेची खरी जाणीव त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झाली. नागपूरच्या धंतोली भागातील रस्ते शोकसागरात बुडालेल्या जनसमुदायाने गच्च भरले होते.

प्रत्येक माणसाला जन्म असतो, तसा शेवटही असतो. माणसाचं मोठेपण त्याच्या पदात नसतं; पदाला मोठं करणारी त्याची उंची असते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचं संस्थापक सदस्यत्व ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व—अशा अनेक सन्मानांनी त्यांचं कर्तृत्व अधोरेखित झालं. त्यांच्यातील ‘वसंत’ सदैव बहरलेलाच राहिला. ज्या ज्या निर्जीव खुर्च्यांवर ते बसले, त्या त्या खुर्च्यांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे उंची मिळत गेली.

असा हा हिमालयाएवढ्या उंचीचा माणूस!

… व्यक्तीचं जीवन कसं असावं, याचा हा एक जिवंत आदर्श.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पूर्वीचा काळ… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पूर्वीचा काळ… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

पूर्वीचा काळ बाबा,

खरंच होता चांगला,

साधे घरं, साधी माणसं,

कुठे होता बंगला?

*

 घरं जरी साधेच पण,

 माणसं होती मायाळू,

 साधी राहणी चटणी भाकरी

 देवभोळी अन श्रद्धाळू.

*

सख्खे काय चुलत काय,

सगळेच आपले वाटायचे,

सुख असो दुःख असो,

आपुलकीने भेटायचे.

*

 पाहुणा दारात दिसला की,

 खूपच आनंद व्हायचा हो,

 हसून खेळून गप्पा मारून,

 शीण निघून जायचा हो.

*

श्रीमंती जरी नसली तरी,

एकटं कधी वाटलं नाही,

खिसे फाटके असले तरीही,

कोणतंच काम रुकलं नाही.

*

 उसनं पासनं करायचे पण,

 पोटभर खाऊ घालायचे,

 पैसे आडके नव्हते तरीही,

 मन मोकळं बोलायचे.

*

कणकेच्या उपम्या सोबत,

गुळाचा शिरा हटायचा,

पत्रावळ जरी असली तरी,

पाट , तांब्या मिळायचा.

*

 लपाछपी पळापळी,

 बिन पैशाचे खेळ हो,

 कुणीच कुठे बिझी नव्हते,

 होता वेळच वेळ हो.

*

चिरेबंदी वाडेसुद्धा,

खळखळून हसायचे,

निवांत गप्पा मारीत माणसं,

ओसरीवर बसायचे.

*

 सुख शांती समाधान “ते”

 आता कुठे दिसते का ?

 पॉश पॉश घरामध्ये,

 “तशी” मैफिल सजते का ?

*

नाते गोते घट्ट होते,

किंमत होती माणसाला,

प्रेमामुळे चव होती,

अंगणातल्या फणसाला.

*

 तुम्हीच सांगा नात्यामध्ये,

 राहिला आहे का राम ?

 भावाकडे बहिणीचा हो,

 असतो का मुक्काम ?

*

सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,

कुणीच कुणाला बोलत नाही,

मृदंगाच्या तालावरती,

गाव आता का डोलत नाही.

*

 प्रेम, माया, आपुलकी हे,

 शब्द आम्हा गावतील का?

 बैठकीतल्या सतरंजीवर,

 पुन्हा पाहुणे मावतील का?

*

तुटक तुसडे वागण्यामुळे,

मजा आता कमी झाली,

श्रीकृष्णाच्या महालामधुनी,

सुदामाची सुट्टी झाली.

*

 हॉल किचन बेडमध्ये,

 प्रदर्शन असतं वस्तूंचं,

 का बरं विसर्जन झालं,

 चांगुलपणाच्या अस्थीचं?

कवी : अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘माझे कथाविश्व’ – लेखिका : जयश्री लेंभे ☆ परिचय – विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘माझे कथाविश्व’ – लेखिका : जयश्री लेंभे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक : माझे कथाविश्व 

लेखिका : जयश्री लेंभे

प्रकाशक : मुद्रिका कमर्शिअल प्रिंटर्स 

अनुभूतींच्या विविध रंगांचे रसाळ कोलाज: माझे कथाविश्व

जगण्यातील साधेपणा जेव्हा शब्दांचे बोट धरून कागदावर उतरतो, तेव्हा ‘माझे कथाविश्व’ सारखी एक नितांत सुंदर साहित्यकृती आकारास येते. श्रीमती जयश्री लेंभे लिखित आणि मुद्रिका कमर्शिअल प्रिंटर्स (शुक्रवारपेठ) तर्फे प्रकाशित झालेला हा कथासंग्रह म्हणजे केवळ कथांचा पुंजका नसून, मानवी स्वभावाच्या, नातेसंबंधांच्या आणि भावभावनांच्या विविध छटांचे एक देखणे शब्दविश्व आहे. लाभलेले सुबक मुखपृष्ठ (स्वराली लेंभे) आणि मा. किसन चौधरी सरांची पुस्तकाविषयीची उत्सुकता वाढवणारी अभ्यासपूर्ण प्रस्तावना पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालते. लेखिकेचे छोटेखानी पण प्रगल्भ मनोगत वाचकाला या विश्वात प्रवेश करण्यासाठी उद्युक्त करते.

दैनंदिन जीवनातील तत्त्वज्ञान आणि मिश्कील निरीक्षण यातून साकारलेल्या या संग्रहातील कथांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे लेखिकेची विलक्षण निरीक्षणशक्ती. ‘निर्मलाची पाककृती’ मधील खुसखुशीतपणा असो वा ‘आजीची शाळा’ मधील त्या इवल्याशा बाळाने दिलेली आर्त साद प्रत्येक गोष्ट थेट काळजाला भिडते. ‘भैरवनाथ प्रसन्न’ आणि ‘मान न मान में तेरा मेहमान’ (मांंजराच्या रूपातील पाहुणीची कथा) या कथांमधून लेखिकेचा मिश्कील आणि हसता-हसता अंतर्मुख करणारा स्वभाव दिसून येतो. ‘समज’ आणि ‘वेडी माणसं’ या कथा मानवी मनातील गैरसमज आणि स्वभावातील विक्षिप्तपणाचे अचूक पण तितकेच सहानुभूतीपूर्वक चित्रण करतात.

संस्कार, कर्तव्य आणि भावनांचा त्रिवेणी संगम

दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात घालवलेल्या आदर्श मुख्याध्यापिकेचे संस्कारक्षम पैलू ‘सत्वपरीक्षा’, ‘२५ नंबरचा विद्यार्थी’ आणि ‘चांदण्यातली चांदी’ या कथांमधून प्रकर्षाने जाणवतात. विद्यार्थ्यांबद्दलची प्रामाणिक आपुलकी आणि नातवंडांवर होणारे मूल्यांचे संस्कार वाचकाच्या मनावर गारुड करतात. कौटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन घडवणारी ‘कोटाची कोपरी’ आणि प्रत्येक गृहिणीला स्वतःचा शोध घ्यायला लावणारी मैत्रिणीची गोष्ट म्हणजे ‘रखमी’ या कथा कौटुंबिक मूल्यांची वीण घट्ट करतात.

परमेश्वरी अधिष्ठान आणि अध्यात्माची प्रचिती

लेखिकेच्या संवेदनशील मनाला लाभलेली अध्यात्माची जोड पुस्तकाला एक वेगळीच उंची देते. ‘वारी पंढरीची’, ‘अतर्क्य’ (अपघातातून आजोबांचे बरे होणे), आणि ‘विठ्ठला पांडुरंगा’ या कथांमधून विठ्ठलनामाचा गजर आणि परमेश्वरी अस्तित्वाची प्रचिती वाचकाला भारावून टाकते. ‘मेडिटेशन’ सारख्या गंभीर विषयावर स्वतःचीच गंमत सांगत लेखिकेने मांडलेले जीवन जगण्याचे मोठे तत्त्वज्ञान कौतुकास्पद आहे.

ऋतूंचे आणि आठवणींचे सोहळे

दिवाळीच्या फराळाची पंगत डोळ्यांसमोर उभी करणारी ‘फराळ’ ही काव्यात्मक कथा आणि ‘आठवणीतील दिवाळी’, ‘आठवणीतला पाऊस’ या रचना वाचकाला स्वतःच्याच बालपणात आणि भूतकाळात घेऊन जातात, जिथे वाचकही त्या आठवणींच्या पावसात चिंब भिजून निघतो. ‘आनंदाचा चष्मा’ चढवून मस्त आनंदी राहण्याचा संदेश देणाऱ्या आणि ‘येन केन प्रकारेण’ मधून संस्कृत श्लोकांचा मतितार्थ सोप्या भाषेत मांडणाऱ्या कथा संग्रहाची समृद्धी वाढवतात.

अनुभवावर आधारित सुंदर कथाविश्व!

साध्या सोप्या भाषेचे आत्मियता वाढवणारे लेखनविश्व!

वाचकांचा मूड आनंदी करणारे एक नितांत सुंदर शब्दविश्व!

वाचकांना खिळवून ठेवणारे माझे कथाविश्व!

‘माझे कथाविश्व’ हे पुस्तक वाचताना केवळ पानांवरचे शब्द वाचल्याचा भास होत नाही, तर लेखिकेसोबत एका समृद्ध प्रवासाला निघाल्याचा अनुभव येतो. साधी, ओघवती आणि मनाला भिडणारी भाषा, प्रसंगांची जिवंत गुंफण आणि सकारात्मक शेवट ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत. वाचकाचा मूड क्षणात आनंदी करण्याचे आणि त्याला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे. प्रत्येक रसिकाने संग्रही ठेवावे आणि आवर्जून वाचावे असे हे एक उत्तम ‘कथाविश्व’ आहे!

पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # १५६ – बुन्देली कविता – ”बे तौ चादर तानें सो रय ” ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

आज प्रस्तुत हैं बुन्देली कविता – बे तौ चादर तानें सो रय ।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # १५६ ☆

☆  बुन्देली कविता – बे तौ चादर तानें सो रय  ☆ आचार्य भगवत दुबे ✍

बे तौ चादर तानें सो रय

जिनकी चिन्ता में हम खो रय

 *

जिनके लाने फूल बिछाये

बेइ गैल में काँटे बो रय

 *

जाँच-परख के करौ भरोसो

अपनइ आज पराये हो रय

 *

सगे हमाये हितू रये जुन

बेइ हमाई नाव डुबो रय

 *

गैरी नदिया नाव पुरानी

उतावले चढ़बे हो रय

 *

बरन लगो घर, कुँआ खोद रय

उर अपनी किस्मत पे रो रय

 *

भगवतपोसत रये जिन्हें हम

ओइ हमाये बैरी हो रय

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ राजनीति शास्त्र / राजनैतिक शस्त्र ☆ हेमन्त बावनकर ☆

हेमन्त बावनकर

☆  राजनीति शास्त्र / राजनैतिक शस्त्र ☆ हेमन्त बावनकर ☆

(१७ जनवरी १९८२)

प्रश्न था

राजनीति शास्त्र की परिभाषा?

 

लोकतंत्र में जन्में,

राजनैतिक छात्रावास में पले

विचारशील,

क्रान्तिकारी छात्र का

उत्तर था

’राज’ नेताओं के लिये

’नीति’ जनता के लिये

और

’शास्त्र’ छात्रों के लिये।

 

अब यदि

आप पूछेंगे उससे

छात्र की परिभाषा

तब निःसन्देह  

उसका उत्तर होगा

’राजनैतिक शस्त्र’।

 

©  हेमन्त बावनकर

पुणे (महाराष्ट्र)  

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चुप्पियाँ – (३३) ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – चुप्पियाँ – (३३) ? ?

चुप्पी क्या रचते हो

मानो मेरा कोई हिस्सा

मेरे ही सामने रखते हो,

सुनो मित्र!

तुम स्वप्नवत लिखते हो,

आभार के लिए लेखनी उठाई

शब्दावली उभर आई,

भोगे हुए सत्य से

उपजती हैं चुप्पियाँ

पलकों पर ठिठकी

आशाओं की जननी हैं चुप्पियाँ,

इबारत पर दिखता है सपना

जबकि लिखी होती हैं चुप्पियाँ,

शायद सपनों का

पर्यायवाची होती हैं चुप्पियाँ।

 

?

© संजय भारद्वाज   

(2.9.2018, अपराह्न 1:05 बजे)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

गुरु साधना 19 जुलाई से बुधवार 29 जुलाई तक चलेगी। 🕉️ 

इसका मंत्र होगा-

ॐ गुं गुरुभ्यो नम:

(उच्चारण- ओम गुम गुरुभ्यो नमह)

💥 आप अपने गुरु / मानस गुरु / मार्गदर्शक / माता /पिता / प्रेरक व्यक्तित्व आदि जिस किसी में भी आपकी श्रद्धा हो, को स्मरण कर इस मंत्र का पाठ कर सकते हैं। यदि ऐसा कोई व्यक्तित्व आपके जीवन में नहीं है तो भी अपनी सैद्धांतिक / वैचारिक प्रतिबद्धता को यह मंत्र समर्पित कर सकते हैं। सनातन ठहराव नहीं बहाव है। अतः प्रवाह की दिशा स्वयं तय करें। 💥

इसके साथ नीचे दिए श्लोक का भी अपनी सुविधा के अनुसार 11 /21 /31 /51 बार पाठ करें। 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ दान और चंदा का दुरुपयोग: चुनौतियाँ एवं समाधान ☆ डाॅ राकेश सक्सेना ☆

डाॅ राकेश सक्सेना

(डाॅ राकेश सक्सेना जी पूर्व सदस्य हिंदी सलाहकार समिति, खान मंत्रालय, भारत सरकार, जेएलएन पी०जी० काॅलेज, एटा से हिंदी विभागाध्यक्ष पद से सेवानिवृत्त हैं। कनाडा, भूटान, नेपाल, श्रीलंका, ताशकंद आदि देशों की विदेश यात्राएँ। 07 मौलिक कृतियां, 20 सम्पादित, अनगिनत पत्र-पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित.  आज प्रस्तुत है आपका एक विचारणीय आलेख  – दान और चंदा का दुरुपयोग: चुनौतियाँ एवं समाधान ।)

☆ आलेख – दान और चंदा का दुरुपयोग: चुनौतियाँ एवं समाधान ☆ डाॅ राकेश सक्सेना ✍

भारतीय संस्कृति दान और चंदा को धर्म, करुणा, परोपकार और लोकमंगल की भावना का मूर्तरूप माना गया है। दान का तात्पर्य केवल धन देना नहीं बल्कि किसी योग्य व्यक्ति या संस्था को निष्काम भाव से संसाधन, ज्ञान, समय अथवा सेवा प्रदान करना है। अन्नदान, विद्यादान, ज्ञानदान, जलदान, भूमिदान, वस्त्रदान, औषधिदान, रक्तदान, अंगदान, समय व श्रमदान को सात्विक सर्वोत्तम दान माना गया है, इसी के साथ आर्थिक सहयोग सार्वजनिक उद्देश्य की पूर्ति हेतु लिया जाता है। वेद,उपनिषद, रामायण, महाभारत में दान को मनुष्य के श्रेष्ठतम गुणों में स्थान दिया गया है। श्रीमद्भागवत के अनुसार ‘त्यागेनैके अमृतत्वमानशु:’ अर्थात् त्याग और दान के माध्यम से ही अमरत्व की प्राप्ति सम्भव है। इसी प्रकार चंदा भी सामाजिक सहयोग का एक सशक्त माध्यम है, जिसके द्वारा समाज सामूहिक रूप से धार्मिक, शैक्षिक, सांस्कृतिक तथा मानवीय कार्यों को सम्पन्न करता है। आधुनिक समय में जिस प्रकार दान और चंदे की राशि में वृद्धि हुई है,उसी अनुपात में उसके दुरुपयोग की घटनाएँ भी सामने आईं हैं। कई बार तो फर्जी संस्थाओं,अनधिकृत व्यक्तियों, अपारदर्शी प्रबंधन,निजी स्वार्थ,राजनीतिक लाभ अथवा आर्थिक अनियमितताओं के कारण दान और चंदा अपने वास्तविक उद्देश्य से भटक जाता है। इससे न केवल दानदाता का विश्वास कमजोर होता है बल्कि वास्तविक जरूरतमंदों तक सहायता भी नहीं पहुँच पाती।

समय के साथ दान और चंदे के स्वरूप में व्यापक परिवर्तन आया है। ऑनलाइन, यूपीआई, बैंक ट्रांसफर आदि तकनीकी विकास ने दान को सरल बनाया है। दान और चंदा सामाजिक असमानता को कम करते हैं,प्राकृतिक आपदाओं में त्वरित राहत उपलब्ध कराते हैं,सामाजिक उत्तरदायित्व की भावना विकसित करते हैं,शिक्षा और स्वास्थ्य सेवाओं का विस्तार करते हैं। इस कारण दान और चंदा दोनों को ही सभ्य समाज की नैतिक पूँजी माना जाता है किन्तु अनेक बार इनका दुरुपयोग फर्जी संस्थाओं द्वारा धनसंग्रह, एकत्रित राशि का निजी उपयोग,लेखा-जोखा में पारदर्शिता का अभाव, धार्मिक या सामाजिक भावनाओं का अनुचित दोहन, आपदा के नाम पर धोखाधड़ी,नकली ऑनलाइन,दान खर्च का सार्वजनिक विवरण न देना आदि अनेक चुनौतियाँ हैं जिनके कारण समाज में दान और चंदे के प्रति अविश्वास बढ़ने लगता है। कुछ संस्थाएँ तो कागज पर विद्यालय,अस्पताल,अनाथालय,गौशाला चलाने का दावा करतीं हैं जबकि वास्तविकता में ऐसा कुछ नहीं होता। धार्मिक आयोजनों में रसीद प्रणाली, लेखा परीक्षण न होने से भी दुरुपयोग की सम्भावनाएँ बढ़ जाती हैं।

दान और चंदा विश्वास पर आधारित व्यवस्था है। जब दुरुपयोग सामने आता है तो लोग सहायता देने से हिचकते हैं। सबसे अधिक हानि उन लोगों को होती है जो गरीब, रोगग्रस्त,अनाथ,दिव्यांग, आपदा पीड़ित हैं। जब दान का दुरुपयोग होता है तो लोगों में यह धारणा बनने लगती है कि दान देने से कोई लाभ नहीं। यह सोच समाज की सेवा- संस्कृति को कमजोर कर देती है। यद्यपि हमारे देश में इण्डियन ट्रस्ट एक्ट 1882, सोसाइटी रजिस्ट्रेशन एक्ट 1860,आयकर अधिनियम आदि व्यवस्थाएँ उपलब्ध हैं तथापि पारदर्शिता होने से दानदाताओं का विश्वास बढ़ता है। यदि कोई संस्था फर्जी चंदा जुटाती है, दान का दुरुपयोग करती है, झूठे दस्तावेज प्रस्तुत करती है तो उसके विरुद्ध त्वरित निष्पक्ष कार्यवाही होनी चाहिए। जनजागरूकता अभियान से लोगों को जानकारी दी जानी चाहिए कि केवल पंजीकृत संस्थाओं को दान दें,विवेकपूर्ण दान ही प्रभावी दान है। प्रत्येक संस्था को ईमानदारी अपनानी चाहिए, जनहित को सर्वोच्च रखना चाहिए,समय पर लेखा प्रस्तुत करना चाहिए। जब दान श्रद्धा से और चंदा उत्तरदायित्व के साथ संचालित होगा, तभी वह समाज में विश्वास, न्याय और समावेशी विकास का सशक्त माध्यम बन सकेगा।

 

©  डाॅ राकेश सक्सेना

पूर्व हिंदी विभागाध्यक्ष, 68, शान्तीनगर, एटा ( उ०प्र० ) 207001

मोबाइल: 94122 82235

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # २२८ – सजल – चोरों के मन चोरी भाई… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “सजल – चोरों के मन चोरी भाई…। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # २२८ ☆

☆  सजल – चोरों के मन चोरी भाई…  श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

चोरों के मन चोरी भाई।

अवसर मिलते करी सफाई।।

*

रामलला मंदिर के भीतर।

देख रहे उनकी चतुराई।।

*

फूट गया जब भाँडा उनका।

जेल गए जग हुई हँसाई।।

*

ऋद्धा जिनके रग-रग में थी।

भक्ति भाव की दौलत पाई।।

*

राजनीति के थके खिलाड़ी।

मिलकर सबने धूम मचाई।।

*

नहीं कभी विश्वास धर्म पर।

उनने भी किस्मत अजमाई।।

*

आस्था पर जब चोट लगी तो।

नेताओं में छिड़ी लड़ाई।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # २१० ☆ “परिपाटी (कहानियां)” – लेखिका : जनक कुमारी सिंह बघेल ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हमप्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’  जी के आभारी हैं जो  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक के माध्यम से हमें अविराम पुस्तक चर्चा प्रकाशनार्थ साझा कर रहे हैं । श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका दैनंदिन जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है सुश्री जनक कुमारी सिंह बघेल जी द्वारा लिखित  “संपरिपाटी (कहानियां)पर चर्चा।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा#  २१० ☆

☆ “परिपाटी (कहानियां)” – लेखिका : जनक कुमारी सिंह बघेल ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

पुस्तक : परिपाटी (कहानियां)

लेखिका : जनक कुमारी सिंह बघेल

प्रकाशक : बोधि प्रकाशन, जयपुर

समाहित कहानियाँ : 21

☆ समय की संवेदनाओं का दस्तावेज़ : परिपाटी – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

(पारिवारिक संबंध, सामाजिक सरोकार, मानवीय संवेदनाएँ और जीवन-मूल्य की कहानियों का संग्रह)

हिन्दी कहानी का वर्तमान परिदृश्य अनेक दिशाओं में विकसित हो रहा है। एक ओर प्रयोगधर्मी लेखन है तो दूसरी ओर जीवन के साधारण अनुभवों से असाधारण अर्थ खोजने वाली पारंपरिक कहानियाँ भी लिखी जा रही हैं। जनक कुमारी सिंह बघेल का कहानी-संग्रह परिपाटी इसी दूसरी धारा का प्रतिनिधित्व करता है। संग्रह की इक्कीस कहानियाँ किसी बड़े वैचारिक विमर्श का शोर नहीं मचातीं, बल्कि परिवार और समाज के भीतर घटित होने वाले उन सूक्ष्म परिवर्तनों को दर्ज करती हैं, जिनसे आज का मनुष्य प्रतिदिन गुजर रहा है। यही कारण है कि इन कहानियों का संसार पाठक को अपरिचित नहीं लगता। वह स्वयं को इन कहानियों के पात्रों और परिस्थितियों के बीच खड़ा पाता है।

संग्रह की सबसे बड़ी विशेषता इसकी विषय विविधता है। यहाँ बुज़ुर्गों की उपेक्षा है, रिश्तों में आती औपचारिकता है, स्त्री की मौन पीड़ा है, बच्चों का मनोविज्ञान है, सामाजिक रूढ़ियों से टकराती मानवीय संवेदना है और बदलती जीवन-शैली से उत्पन्न अकेलापन भी नजर आता है। लेखिका इन विषयों को किसी आंदोलनकारी मुद्रा में नहीं, बल्कि जीवन के स्वाभाविक प्रसंगों के माध्यम से प्रस्तुत करती हैं। उनकी दृष्टि आरोपित नहीं करती वह अनुभवजन्य लेखन है। इसलिए कथाएँ सहज विश्वसनीय बन पड़ी हैं।

संग्रह की शीर्षक कहानी ‘परिपाटी’ की वैचारिक धुरी कही जा सकती है। कहानी उस त्रासद सामाजिक सत्य को उद्घाटित करती है कि परिवारों में बुज़ुर्गों के प्रति अपनाई गई उपेक्षा धीरे धीरे एक परंपरा बनती जा रही है। आज जो व्यवहार हम अपनी पूर्व पीढ़ी के साथ करते हैं, वही कल अगली पीढ़ी हमारे साथ दोहराती है। कहानी का शीर्षक इसी विरासत में मिलती अमानवीयता की ओर संकेत करता है। बिना किसी भाषण या नाटकीयता के यह कहानी पाठक के भीतर यह गहरा नैतिक प्रश्न उठाती है।

‘अनकहे जज़्बात’ संग्रह की भिन्न और स्मरणीय कहानियों में है। इसमें पुस्तकों को मानवीय संवेदनाओं का रूप देकर लेखिका ने अत्यंत मौलिक शिल्प अपनाया है। अलमारी में सजी पुस्तकें  अपने पाठकों की प्रतीक्षा करती,  चेतन पात्र बन जाती हैं। यह कहानी केवल पुस्तकों के उपेक्षित होने की नहीं, बल्कि उस सांस्कृतिक स्मृति के क्षीण होते जाने की कथा है जो किसी भी समाज की आत्मा होती है। पुस्तक-प्रेमियों के लिए यह कहानी विशेष आत्मीयता और कसक उत्पन्न करती है। प्रयोग नवाचारी है।

अन्य कहानियाँ भी अपने-अपने स्तर पर सामाजिक यथार्थ को विविध आयाम देती हैं। कहीं पुनर्विवाह के प्रश्न के माध्यम से जीवन को दूसरा अवसर देने की बात है, कहीं आत्मग्लानि से उपजे प्रायश्चित का भाव है। कुछ कहानियाँ यह विश्वास जगाती हैं कि मनुष्य के भीतर करुणा  समाप्त नहीं हुई है, तो कुछ कथानक आधुनिक जीवन की विडंबनाओं को उजागर करते हैं ,जहाँ सुविधाएँ बढ़ी हैं, पर आत्मीयता सिकुड़ती चली गई है।

रिश्तों की ऊष्मा, विश्वास, संवाद और नैतिक उत्तरदायित्व इन कहानियों में बार-बार लौटने वाले मूल्य हैं।

भाषा की दृष्टि से लेखिका का लेखन सरल, संप्रेषणीय और प्रवाहपूर्ण है। वे अनावश्यक अलंकरण या भाषिक चमत्कार से बचती हैं। उनकी कलम में सहज भाव संप्रेषण की कला है, वे सामर्थ्यवान लेखिका हैं।संवाद पात्रों के स्वभाव के अनुरूप हैं और कथानक बिना कृत्रिमता  के आगे बढ़ते हैं। यह सादगी ही उनकी शक्ति है, क्योंकि पाठक का ध्यान भाषा की सजावट पर नहीं, कथा के भाव पर केंद्रित रहता है। कहीं-कहीं भावुकता का पुट अवश्य मिलता है, किंतु वह कथ्य की संवेदनात्मक प्रकृति से स्वाभाविक रूप से जुड़ा हुआ है।

आलोचनात्मक दृष्टि से देखें तो संग्रह की कुछ कहानियाँ अपने अंत को और अधिक खुला तथा बहुअर्थी बन सकती थीं। कई स्थानों पर आदर्शवादी समाधान यथार्थ की जटिलताओं को अपेक्षाकृत सरल बना देते हैं। फिर भी यह कमी संग्रह की मूल संवेदनात्मक शक्ति को कम नहीं करती। इन कहानियों का उद्देश्य पाठक को चमत्कृत करना नहीं, बल्कि उसके भीतर सोई हुई मानवीय संवेदना को स्पर्श करना है, और इस उद्देश्य में वे पर्याप्त सफल हैं।

आज जब साहित्य का बड़ा हिस्सा बाज़ार, उपभोक्तावाद और तात्कालिक सनसनी के दबावों से जूझ रहा है, किसी न किसी “वाद” का लबादा ओढ़कर प्रस्तुत हो रहा है।परिपाटी जैसे कहानी संग्रह यह विश्वास दिलाते हैं कि मनुष्य और उसके संबंध अभी भी हिन्दी कहानी के केंद्र में हैं। यह संग्रह पाठक को अपने परिवार, अपने व्यवहार और अपने सामाजिक दायित्वों पर पुनर्विचार करने के लिए प्रेरित करता है। इसकी यही विशेषता इसे केवल कहानी-संग्रह नहीं, बल्कि समकालीन सामाजिक जीवन की संवेदनात्मक दस्तावेज़ के रूप में प्रतिष्ठित करती है।

परिपाटी ऐसी पुस्तक है जिसे केवल पढ़ा नहीं जाता, बल्कि पढ़ने के बाद देर तक महसूस किया जाता है। रिश्तों की ऊष्मा, मानवीय करुणा और नैतिक चेतना में विश्वास रखने वाले प्रत्येक पाठक के लिए संग्रह की लगभग हर कहानी एक सार्थक और पठनीय कृति है।

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

समीक्षक, लेखक, व्यंगयकार

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३, मो ७०००३७५७९८

readerswriteback@gmail.कॉम, apniabhivyakti@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares