(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं “भावना के दोहे”। )
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. 1982 से आप डाक विभाग में कार्यरत हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत है “संतोष के दोहे”। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
संस्थापक /अध्यक्ष – १) नव महाराष्ट्र काव्य, साहित्य, कला संस्कृती, परिवार पिंपरी पुणे ४१११७ (रजि.नं.महा.१७२५/२००२) २) निर्मोही प्रकाशन पिंपरी
इतर संस्था सहभाग व कार्य – १) विशेष कार्यकारी अधिकारी पिंपरी २) मा.उपाध्यक्ष म.सा.प.साहित्य परिषद शाखा पिंपरी चिंचवड ३) खजिनदार पुणे शहर ज्येष्ठ ना.संघ शिवाजीनगर पुणे ३०
२) गझल संग्रह – १) निर्मोही (२०००) २) हे गोफ रेशमाचे (२००५) ३ )रुजुवात (२००७) ४) तुकाराम पाटील यांच्या निवडक गझला (२००९)
३) कथा संग्रह – १) इगत(१९८६) २) माणसातली ओमाणसं (१९९३) ३) मंथरलेलं दान (२००७) ४) पाऊल वाटा (२००७) ५) दीड पाय (२००८) ६) संस्कार (२००८) ७) हेडम्या (२००८) ८) वादळवारे (२००९)
४) कादंबरी – १) तुझ्याच साठी (२००५) २) तू आणि मी (२००७) ३) आम्ही असेच(२००८) ४) कलंदर (२००८)
५)नाटके/एकांकिका – १) पतिता (१९८५) २)प्रतिभा मिळे प्रतिमेला(१९८८) ३) आम्ही सारे नटच (२००१) ४) कथा जानकीची (२००७) ५) खेळ डोंबा-याचा(२००६) ६)फुरं झालं आता (२००७) ७) धरती माता(२००९)
बाल आणि प्रौढ साक्षरता साहित्य- १) सुंदर बन (कथा) २) वाडा झपाटलेला (कथा) ३) बाल कविता व गाणी ४)बालकांचे कर्मवीर (चरित्र) ५) छ. संभाजी (चरित्र) ६) संत तुकाराम (चरित्र)
इतर स्फूट लेखन / शिक्षण महर्षी कर्मवीर
शोध निबंध – मिरज तालुका पूर्वभाग स्थिती आणि गती / वृत्तपत्रीय लेखन * विहीर बागायत शेती समस्या व उपाय अहवाल *दंडोबा डोंगर परिसर प्रदेश वर्णन *भिलवडीतील शाहिरी वाडःमय परंपरा *ग्रामीण साहित्यिक म.भा.भोसले * अनेक कविता संग्रहाची परिक्षणे *कथा, कविता, संग्रहाना प्रस्तावना
आकाशवाणी पुणे, सांगली श्रुतिका लेखन/सांगली – रंग उगवतीचे, गोष्टी गावाकडच्या, काव्यवाचन, कथाकथन पुणे / चालू जमाना, शेजारी, आपण सारे, आमची माती आमची माणसं, श्रमिक जगत, अैलतीर पैल तीर, कथा,काव्य, गझल वाचन.
☆ कवितेचा उत्सव : आधार ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
☆ जीवनरंग : लघुकथा : डाकू, व्यवहार – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆
☆ डाकू ☆
एका गावांत दरोडा पडला. दरोडेखोरांनी गावांतील कित्येक घरांत घुसून लोकांना जबर मारहाण केली आणि घरांत जो कांही मौल्यवान ऐवज सापडला तो घेऊन पसार झाले. दुसर्या दिवसांपासून गावांत पोलीसांचा अहोरात्र बंदोबस्त सुरु झाला.
पोलीस बंदोबस्त सुरु होऊन अवघे चार दिवस सुद्धा झाले नाही तोच गावकर्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांकडे मागणी केली की पोलीस बंदोबस्त तात्काळ काढून घेण्यांत यावा. डाकूंचे काय ते आम्ही स्वत; बघुन घेऊ.
मोर्चा काढणार्यांमधे गावांत कोंबड्या पोसणारे आणि गावांतील तरुण लेकी-सुनांचे पालक यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
☆ व्यवहार ☆
‘काय हो, तुमचे चोरी गेलेले सामान सापडले काय?’
‘होय, नव्वद टक्के सामान हाती आले.’
‘अरे वा, बरेच हाती आले म्हणायचे. आमचेकडे चोरी झाली होती तेव्हां तर प्रयत्नांची पराकाष्टा करुन ही जेमतेम पन्नास टक्केच सामान हाती आले होते. उरलेले सर्व चोर आणि पोलीस यांच्यातच लंपास झाले.’
‘म्हणूनच तर…आम्ही जरा व्यावहारिक मार्ग पत्करला. पोलिसांमार्फत प्रयत्न करण्याऐवजी सरळ चोरांशीच संपर्क साधला.’
उगवतीला पीतवसनाची आभा अलगद पसरत जाते अन् सृष्टी जागी होऊ लागते… दशदिशांत सामावलेला, अवघं चराचर व्यापून उरलेला अनंत रूपांतला कान्हुला आपल्या अंत:चक्षूंना जाणवू लागतो… पक्षांची किलबिल, झरे-नद्यांच्या प्रवाहांना बहाल करतो तो आपल्या बासरीतले सूर… नुकतेच भुईतून उगवलेले मौजेत डुलणारे कोंब, इवलुशी रोपटुली म्हणजे त्याच्यातल्या बाळलीलांना आलेलं उधाण… झाडांच्या पालवीतल्या कोवळेपणात, अनेक हिरव्या रंगछटांच्या पानांच्या सळसळीत, फुलांच्या मनमोहक सुगंधात, त्यांच्याभोवती रुंजी घालणाऱ्या फुलपाखरांच्या बागडण्यात ओसंडत राहातं त्याच्यातलं सळसळतं चैतन्य… गुरा-वासरांच्या डोळ्यांतल्या मायाळूपणातही तोच वसलेला…
विशाल पर्वत-डोंगररांगांतून फैलावते त्याच्यातली भव्यता… अथांग, शांत सागराच्या सखोलतेत विसावतो त्याच्यातला तत्ववेत्ता, खळाळत्या लाटांतून बहरणारा ‘तो’ म्हणजे रासलीलेतला आवेगी शृंगार अन् ओहोटीतल्या लाटांतून शांतावत जाणारा ‘तो’ म्हणजे त्याला अंतरी जपून ठेवणाऱ्या राधेच्या मनातलं त्याचं चिरंतन… ऋतूबदलात सामावलेली त्याच्या भावनांची आंदोलनं… झरणाऱ्या मेघसरींनी वसुंधरेला उल्हसित करणारा तो… प्रखर उन्हाच्या झळांतून ओसंडणारा त्याचा क्रोध आणि तो निमाल्यानंतर सुखावणारं शारदचांदणं घेऊन येणाराही तोच…
अस्ताचलाच्या भावविभोर क्षणांत मावळतीला आभाळभर सांडलेले रंग त्यानं मस्तकी धारण केलेल्या मोरपिसाचं नभदर्पणातलं प्रतिबिंब तर नव्हे!? असं वाटू लागतं आणि भूल पडत जाते ते निरखण्यात हरवून जाण्याची… हळूहळू ती रंगभूल साकार करत जाते यमुनेचा किनारा, रंगक्षणांत माखलेला घननीळ आणि त्याला डोळ्यांत साठवणारं अवघं गोकुळ… शृंगाराचं ते अद्भुत लेणं मनात अवतरत असताना भान हरपून जातं… अचानक त्याक्षणी तिथलेच होऊन जाताना यमुनेच्या तीरी चाललेल्या लगबगीत मन सामील होऊन जातं…
साक्षात मनभावन मनमोहन आपल्याला सामोरा आणि त्याच्या रंगांचं गारूड अनुभवण्यासाठीचं आपल्या जिवाचं आतुरलेपण, तो बिलोरी पीतवसन नवोन्मेष रोमारोमांत साठवून ठेवण्याची ओढ, त्या खट्याळ नजरेतले नाजूक सोनसळी संकेत टिपताना नुरलेपणातलं बेभानफूल माळण्याची अधीरता, त्याच्या ओठांवर रेंगाळणारी सानिका होण्याचा मोह आणि एका क्षणी अवघं तनमन कृष्ण झाल्याची जाणीव!…
अंतर्बाह्य व्यापणारा झंकार चैतन्यरंगाची उधळण करणारा आणि मनाच्या तारा छेडत राहून सौख्यधून अनुभवायला देणारा… तीच चाहूल त्यानं वेढून घेतल्याची, तीच खूण त्यानं त्याच्या रंगात माखून टाकल्याची आणि देहभान हरपवून त्याच्यात सामावून घेतल्याची!… तिथून पुढं बाकी रंगांचे रंग फिके पडत जात सावळरंगाचं देखणेपण अवतीभवती पसरत जातं… काळजाला चांदणभास देणारी शीतलता जाणवू लागते आणि अख्खं आभाळ नीरव शांततेत न्हात सावळरंग पांघरतं…!
त्या नीरवतेच्या कुशीत पहुडले असताना चेहरामोहरा नसलेलं कुणी काळजाचा ठाव घेत गालावर मोरपीस फिरल्याचे भास होऊ लागतात… आजूबाजूला एक धून विहरत असल्याची जाणीव होते… स्वत्व विरून जात मन त्या क्षणाच्या स्वाधीन होतं आणि आपल्यातल्याच त्याची नव्यानं ओळख पटते..
☆ मनमंजुषेतून : माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆
माझ्या खिडकीतून दिसतात
रात्री नक्षत्रे नि तारे
आणि दिवसा वाहत असतात
झुळूझुळू मंजुळ वारे ….
खरंच् …खिडकी…! कित्ती अर्थ आहेत हो ह्या शब्दाचे…मनाची खिडकी, जगाची खिडकी घराची खिडकी ,हृदयाची खिडकी … वा…वा..वा….! एकूणच खिडकी फार महत्वाची असते . खिडकी नव्हे ? खिडक्या नसतील तर…घराला अर्थच राहणार नाही, किंबहुना घराला घरपणच राहणार नाही…घर कसे कोंदट, उबट होऊन जाईल . दूषित वायु बाहेरच पडणार नाही .प्रणवायू मिळणार नाही , जीव गुदमरून जाईल .. खिडकी नसेल तर बाहेरचे जगच दिसत नाही. माणूस उठसूठ दारात जात नाही .. तो खिडकीत बसतो.तासं न् तास .. कोणाच्या बापाची भीती नाही !माझी खिडकी आहे…! वा….!
काय काय दिसते ह्या खिडकी तून..? अहो, अख्खे जग दिसते. नुसते खिडकीत बसले तरी अख्ख्या गल्लीची माहिती मिळते.कोण आले, कोण गेले ,कोण चालले , कुठे चालले, परत केंव्हा आले .. बाप रे….! रोज किती वाजता येतात ..जातात..एव्हढी माहिती फक्त खिडकीत बसून ….?
माझ्या घराच्या खिडकीत बसले की मला जग जिंकल्यासारखे वाटते….! पृथ्वी प्रदक्षिणा केल्यसारखे वाटते …. , घर बसल्या माझे मनोरंजन तर होतेच …व माझ्या हातून टेबला- वरील कागदांवर चांगले काही लिहूनही होते… बघा खिडकी किती महत्वाची आहे…!अख्ख्या घराचा कंट्रोल मी खिडकीतून बसल्या जागी करते ..वॅाच ही ठेवते..! बसल्या जागेवरून… कळले का मंडळी खिडकीचे महत्व ? म्हणून मी माझ्या रूम मध्ये मोठ्या मोठ्या खिडक्या ठेवल्या आहेत …. शुद्ध हवा ,प्रकाश , मनोरंजन,लेखन ,वाचन, गाणी ऐकणे, पेपर वाचणे ,अऽऽऽऽऽऽऽबबबब !
खिडकी कित्ती कामाची
मनोरंजन करण्याची
येणारे नि जाणारे …
हसून त्यांना बघण्याची…..!
ह्या खिडकी मुळे माझ्या मनाची खिडकी सदैव उघडी ताजीतवानी असते.भरभरून उत्साह ही खिडकी मला देते….कसा…?
उठल्या बरोबर बघावे तर …छान दाट धुके ,शुभ्र धुके .. प्रसन्न धुके ,दुधा नि पारदर्शक धुके जणू माझी वाट पाहत असते….कधी खिडकीची काच बाजूला होईल नि मॅडम आम्हाला बघतील …असे जणू धुक्याला वाटते.. आणि मग …? मी बघताच धुके प्रसन्न हसते.
आळस पळतो . अनिमिष नेत्रंनी मी धुक्याकडे पाहत राहते … न जाणे दृष्टी आड झाले तर ….!
हरवले तर ..?त्याला मनसोक्त पाहून घ्यावे ,मनात साठवावे हो … अदृश्य झाले तर… म्हणून मग मी तिथेच झोपाळ्यावर ठाणं मांडत झुलत मनसोक्त त्याचा आस्वाद घेते.हळू हळू मनावरील पडदा दूर व्हावा तसे ते धुके अलगद हळू हळू काढता पाय घेते …विरत जाते…
नि मग …डोळे मिचकावत किरणांची स्वारी दंवबिंदूंना चिडवत ,चकाकत अळवावरच्या पानांवरून ओघळणाऱ्या दवांत चमकत मिश्किलपणे हसत माझ्या खिडकीत समोरच्या टेकडीवर झाडांवर शेंड्यांवर वेलींवर किरणे अवखळ पणे खेळू लागतात. पाने हसतात, फुले हसतात ,दंव हसते , गवत पाती डुलतात, वेली पुढे झुकतात, हलतात ,अंग घासतात नि किरणे हळूहळू बालकाने लोळावे तशी पहुडतात , स्थिरावतात.
हे सारे दो नयनांनी तृप्त होत मी अनिमिष नेत्रांनी बघत असते. वा …! किती सुंदर सुंदर देणग्यांचा वर्षाव निसर्ग करतो आपल्यावर..!
धुके ,किरणे,पाने ,फुले ,फुलपांखरे ,पक्षी,सारे समोर झाडांवर ,चराचरांवर आपल्या स्वागतासाठी हजर असतात . ..हसत असतात, डुलत असतात, ओसांडत असतात …आनंद घ्या म्हणत असतात…केवढी कृपा ! असीम…!
रात्री तर माझ्या खिडकीत चांदणीच अवतरते तिच्या साऱ्या गोतावळ्याला घेऊन… समोर टेकडीव नि:शब्द शांतता असते… झाडे काळोखात बुडून गुडूप शांत झोपी जातात, वारे स्वस्थ शांत होतात , पाने अंग मिटून स्तब्ध होतात ,पक्षी गप्पा मारून झोपी जातात….खिडकीतल्या चिकूवर मात्र वटवाघळे नि पाकोळ्या घिरट्या घालतात . वटवाघळे उलटी लटकून मुटूमुटू चिकू खातात , गर खातात …सालं खाली पडतात . सकाळी झाडाखाली मला ती दिसतात … समोर टेकडीवर मात्र डोळे फाडून पाहिले तरी काही दिसत नाही….
मला वाटते , दिवसभर माझी करमणूक करून सारी मंडळी थकली वाटतं .आता त्यांना विश्रांतीची गरज आहे.मग मी शहाण्या मुलीसारखी कुरकुर न करता आपल्या लेखन कार्यात रमून जाते ते थेट बारा साडेबारा पर्यंत ….. मला मुळी कंटाळाच येत नाही माझ्या भोवताली असलेल्या या साऱ्या मंडळींमुळे…. कारण आता एवढ्या रात्री सुद्धा मी ….. हो .. खिडकीतच असते ना? हसूआलं ना ?
अहो … आहेच माझी खिडकी गुणी ? जगाची खिडकी किती ही मोठी असो ..कुणीही असो मला त्याच्याशी देणे घेणे नसते .मी माझ्या खिडकीवर एकदम खूष आहे…हो … माझी …खिडकी ….
कंटाळा न येऊ देणारी
साऱ्या जगाची खबर देणारी ..
कोण आलं कोण गेलं सांगणारी
माझ्याशी गप्पा मारणारी
मला आनंदात ठेवणारी…..
मला खूप काही देणारी…
अशी माझी खिडकी आपल्याला बघाविशी
वाटली तर …जरूर ….या …
खिडकी तुमची वाट पाहते आहे…
तिचा पत्ता…. सारंग बंगला वाघ गुरूजी शाळेसमोर नाशिक १३
हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
दैवासुर संपद्विभाग योग
(शास्त्रविपरीत आचरणों को त्यागने और शास्त्रानुकूल आचरणों के लिए प्रेरणा)
एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्।।22।।
इन द्वारो से दूर नर करता निज कल्याण
योग्य आचरण करके ही पाता शुभ वरदान ।।22।।
भावार्थ : हे अर्जुन! इन तीनों नरक के द्वारों से मुक्त पुरुष अपने कल्याण का आचरण करता है (अपने उद्धार के लिए भगवदाज्ञानुसार बरतना ही ‘अपने कल्याण का आचरण करना’ है), इससे वह परमगति को जाता है अर्थात् मुझको प्राप्त हो जाता है।।22।।
A man who is liberated from these three gates to darkness, O Arjuna, practises what is good for him and thus goes to the Supreme goal!।।22।।
प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनकी स्त्री विमर्श पर आधारित लघुकथा विडंबना। स्त्री जीवन के कटु सत्य को बेहद संजीदगी से डॉ ऋचा जी ने शब्दों में उतार दिया है। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को जीवन के कटु सत्य को दर्शाती लघुकथा रचने के लिए सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # 41 ☆
☆ लघुकथा – विडंबना☆
’बहू ! गैस तेज करो, तेज आँच पर ही पूरियाँ फूलती हैं’ यह कहकर सास ने गैस का बटन फुल के चिन्ह की ओर घुमा दिया। तेल में से धुआँ निकल रहा था। पूरियाँ तेजी से फूलकर सुनहरी हो रही थी और घरवाले खाकर। कढ़ाई से निकलता धुआँ पूरियाँ को सुनहरा बना रहा था और मुझे जला रहा था। मेरी छुट्टियाँ पूरी-कचौड़ी बनाने में खाक हो रही थीं। बहुत दिन बाद एक हफ्ते की छुट्टी मिली थी। मेरे अपने कई काम दिमाग में थे, सोचा था छुट्टियों में निबटा लूंगी। एक-एक कर सातों दिन नाश्ते- खाने में हवा हो गए। दिमाग में बसे मेरे काम कागजों पर उतर ही नहीं पाए। सच कहूँ तो मुझे उसका मौका ही नहीं मिला। पति का आदेश- ‘तुम्हारी छुट्टी है अम्मा को थोड़ा आराम दो अब, बाबूजी की पसंद का खाना बनाओ’। बच्चों की फरमाइश अलग- ‘मम्मी ! छुट्टी में तो आप मेरे प्रोजेक्ट में भी मदद कर सकती हैं ना ?’
बस, बाकी सबके कामकाज चलते रहे, मेरे कामों की फाइलें बंद हो गई थीं। कॉलेज में परीक्षाएँ समाप्त हुई थीं और जाँचने के लिए कॉपियों का ढेर मेरी मेज पर पड़ा था। बंडल बंधा ही रह गया। सोचा था इस छुट्टी में किसी एक शोध छात्र की थीसिस का एक अध्याय तो देख ही लूंगी लेकिन सब धरा रह गया। घर भर मेरी छुट्टी को एन्जॉय करता रहा। ‘बहू की छुट्टी है’ का भाव सासू जी को मुक्त कर देता है। मेरे घर पर ना रहने पर पति जो काम खुद कर लेते थे अब उन छोटे-मोटे कामों के लिए भी वे मुझे आवाज लगाते। बच्चे वे तो बच्चे ही हैं।
छुट्टी खत्म होने को आई थी , छुट्टी के पहले जो थकान थी, वह छुट्टी खत्म होने तक और बढ़ गई थी। कल सुबह से फिर वही रुटीन-सुबह की भागम-भाग, सवा सात बजे कॉलेज पहुँचना है। मन में झुंझलाहट हो रही थी , इसी तरह काम करते-करते जीवन किसी दिन खत्म हो जाएगा। यह सब बैठी सोच ही रही थी कि पति ने बड़ी सहजता से मेरी पीठ पर हाथ मारते हुए कहा- बड़ी बोर हो यार तुम? कभी तो खुश रहा करो? छुट्टियों में भी रोनी सूरत बनाए बैठी रहती हो। आराम से सोफे पर लेट कर क्रिकेट मैच देखते हुए उन्होंने अपनी बात पूरी की- एन्जॉय करो लाइफ को यार ! मैं अवाक् देखती रह गई।
(Ms. Neelam Saxena Chandra ji is a well-known author. She has been honoured with many international/national/ regional level awards. We are extremely thankful to Ms. Neelam ji for permitting us to share her excellent poems with our readers. We will be sharing her poems on every Thursday. Ms. Neelam Saxena Chandra ji is an Additional Divisional Railway Manager, Indian Railways, Pune Division. Her beloved genre is poetry. Today we present her poem “Karna”. )
☆ Weekly column ☆ Poetic World of Ms. Neelam Saxena Chandra # 48 ☆
(All rights reserved. No part of this document may be reproduced or transmitted in any form or by any means, or stored in any retrieval system of any nature without prior written permission of the author.)