हिन्दी साहित्य – कविता ☆ इशारा ☆ सुश्री मंजिरी “निधि” ☆

सुश्री  मंजिरी “निधि”

(बड़ोदा से सुश्री  मंजिरी “निधि” जी की गद्य एवं छंद विधा में  विशेष अभिरुचि है और वे साथ ही एक सफल  महिला उद्यमी भी हैं। आज प्रस्तुत है आपकी कविता  इशारा।)

? कविता – इशारा ☆ सुश्री  मंजिरी “निधि” ? ?

(महाश्रृंगार छंद)

?

जिंदगी बदले रंग हजार,

तभी तो पाना मुश्किल पार l

इशारा देती है हर बार,

भटकते रहते हैं लाचार ll

नजर को पढना मुश्किल यार,

सत्य ही है सबका आधार l

झूठ तो कर्ता है लाचार,

सोच लो क्या होगा उपचार ll

*

इशारा करना अब तो छोड़,

सामने आकर मन से बोल l

हृदय की धड़कन कहती देख, प

कड़ कर मुझको आँखें खोल ll

प्रेम के देखो लाखों रंग,

तभी तो होती रहती जंग l

इसे जो समझे जाता हार,

निराले होते उसके ढंग ll

*

इशारा कर्ता है जब ईश,

नहीं देता है मानव ध्यान l

बाद में रोता प्रभु को कोस,

मिले जब कर्मो से अपमान ll

करो तुम सरल शील व्यवहार,

तभी होती है जस जयकार l

बने हम प्रकृति का आधार,

दिए हो यह अनुपम उपहार ll

© सुश्री  मंजिरी “निधि”
बड़ोदा, गुजरात

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २९० – विचारगाथा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९० – विजय साहित्य ?

☆ विचारगाथा…!

माणूस नाही,धर्मा करीता

धर्म पाहिजे, माणूसकीचा

गेले सांगून‌‌, बाबासाहेब

मार्ग दावीला, विश्व शांतीचा.

*

मानव मूल्ये, हवी एकता

भाव असावा,‌ विश्व‌बंधुता

संघर्ष न्यारा, मार्ग अनोखा

नको कुणाच्या,‌मनी कटूता.

*

शिका लढा नी, संघटीत व्हा 

शिका लोकहो, सुशिक्षीत व्हा

करा स्वतःला, पदवीधर

दिली प्रेरणा, संरक्षीत व्हा.

*

शिक्षण आहे, वाघीण माया

जाईल कैसे, पोषण वाया

हक्क माणसा, मिळवायाला

स्वावलंबनी, झिजवा काया.

*

लोकशाहीची, तंत्र प्रणाली

कसे जगावे, तत्व कळाली

जबाबदारी, कर्तव्ये‌ सारी

मानवतेच्या, पदी वळाली.

*

आत्म बलाने, वावरणारी

सक्षम व्हावी समाज नारी

माया ममता, शांती करूणा

बुद्धिनिष्ठता, जगता भारी.

*

नको कुणाची, साहू गुलामी

संविधान‌ ही, घटना नामी

वैज्ञानिकता, ध्येय ठेवूनी

रहा सुखाच्या, सदैव धामी.

*

महामानवी, विचार गाथा

आठवताना, झुकतो माथा

शब्द बोलती, भीमरायाचे

नका खाऊरे,‌ जुलमी लाथा.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नित्य युद्धाचा प्रसंग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नित्य युद्धाचा प्रसंग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

छातीवरती तीर, मी

सहज झेलले होते.

प्रत्यंचा होउन धनुष्याची

ताण पेलले होते.

मी असा अद्भुत योद्धा

हरुन विजयी झालो.

युयुत्सु नसलो तरीही

युद्धास प्रत्ययी आलो.

नि:शस्त्र निहत्ता वीर

मी अहिंसेने लढलो.

झेलताझेलता वार

वीरगतीस प्राप्त झालो.

आम्हास नित्य युद्धाचा प्रसंग

उक्तीस शरण मी गेलो.

लढतालढता स्वत:शी

मग धारातिर्थी पडलो.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # अखेरचा हा तुम्हा दंडवत… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # अखेरचा हा तुम्हा दंडवत… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

बघून घे रे एकदा आम्हाला आणि सांगशिल इतरांनाही बघून घ्या म्हणावं आता आजच्या घडीला आम्हाला… उद्याचा काहीही भरवंसा देता येत नाही गड्यानों… कित्येक वर्षांपासून आमची मुळंपाळं या भूमीच्या गर्भात खोल खोल रूतून भक्कमपणे रूजली गेल्यामुळे ही डेरेदार वृक्षराजी आपल्या थंडगार सावलीची शाल या आजूबाजूच्या परिसरावर पसरून बसली होती… पावसाचं पाणी नि जमिनीतली पोषणमुल्ये यावरच कोवळ्या अंकुरापासून जी जीवनाची वाटचाल सुरू केली म्हणतोस ते आजतागायत परिपक्वतेचा वटवृक्षाचा पार होईपर्यंत… सारं काही निमुटपणाने, अबोलपणाने, अचल राहून साक्षीत्वाने वर्तमान जगत नि जागता राहीलो… माझ्या अपेक्षाचं ओझं मी माझ्याच खांद्यावर वावगत राहीलो पण त्याच वेळी तुमच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षांना मात्र भरभरून फळ देत गेलो… हीच काय ती माझी निरपेक्ष नि :स्वार्थ सेवा मी म्हणजे आम्ही तुमची करत आलो… प्रतिकूल उन्हाळ्याच्या संघर्षाचे चटक्यांनी जेव्हा तुमचे तन नि मन भाजून निघायचे तेव्हा त्या तापलेल्या देहाला नि मनाला माझ्या सावलीत थंडावा लाभायचा… गार वाऱ्याची झुळूक ताजतवानं करून जाताना पुन्हा जोष भरायची… आणि पुढे तुमची वाटचाल सुरू व्हायची… तप्त झालेली ती अवतीभवतीची जमिन देखील माझ्या सहवासात असल्याने समाधानी आनंदी राहयची.. मला तेव्हढाच तीचे अल्पांशाने का होईना पण ऋण फेडल्याचा हलकेपणा वाटून जाई… पण ते ऋण कधीही न फिटणारे आहे याची मला पूर्ण कल्पना असायची… कर्तव्यपूर्तीचं समाधान लाभत असे अश्यावेळी… जीवन रहाटचक्रानूसार आमच्यातला कुणी वयोमानानुसार वाळून जरठ होत असे तेव्हा वठलेल्या खोडाला मग वाळीत टाकलेला एकाकीपणा जाणवत जाई… तर कधी निर्सगालाच दया येऊन तो मुळासकट मग उन्मळून टाकी… तेव्हा क्षणाचं वाईट तर वाटायचं पण त्यावेळी असही वाटायचं आपल्याच सावलीच्या पदराखाली वाढीस लागणारी ती लहान मोठी झाडं यांच्या पुढच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आपण जागा करून द्यायची नाही तर मग कुणी… आणि त्या नवोदितांना स्व:ताच्या बळावर कधी फुलावे, बहरावे.. परावलंबित्व असण्यापेक्षा स्वाल़ंबी असणे अधिक गरजेचे नाही का.. असा सर्वहिताचा विचार करून आपली जागा मागच्यांना रिकामी करून देऊ लागलो… पण कर्तव्यात एव्हढी म्हणून कसर सोडली नाही.. ते तहहयात निभावत गेलो… कालानुरूप सगळ्या जगाचा चेहरामोहरा बदलत गेला… तुम्ही निरकुंश सत्ता सगळ्यावर चालवत गेलात तरीही आमच्या शिवाय तुमचं जगणं शक्य नव्हतचं… या गोड भ्रमात आम्ही गाफि़ल राहिलो आणि आणि तिथेच पहिली कुर्हाड आमच्या मुळावर तुम्ही घातलीत… का तर सुखाच्या समृद्धीचा राजमार्ग निर्वेध करण्यासाठी आमची कत्तल करण्याशिवाय तुमच्यापुढे दूसरा पर्याय नव्हता… अगदी निष्ठूरपणे नि असहिष्णुतेने आमचा गळा घोटलात… पण खरं सांगू तुम्ही आम्हाला नव्हे तर तुम्ही स्वतःलाच उध्वस्त करत गेलात… जंगल, रान झाडे झुडपे नाहीशी केलीत आणि उघडा बोडका कातळ वांझ माळरान निर्माण केलात… मैलोगणती अंतर टप्यात आले खरे पण तुमच्या हृदयातील ममतेचे अंतर मात्र दूरावत गेले… उद्या आम्हाला इथून गच्छंती करण्यात येणार आहे.. तेव्हा पुन्हा काही आम्ही असे तुमच्या कुणाच्याही दृष्टीला पडणार नाही… इतकचं काय तुमच्या भावी पिढ्यांच्या स्वप्नातही आम्ही दिसणार नाही… तेव्हा बघून घे रे एकदा आम्हाला आणि सांगशिल इतरांनाही बघून घ्या म्हणावं आता आजच्या घडीला आम्हाला… उद्याचा काहीही भरवंसा देता येत नाही गड्यानों…

अखेरचा हा तुम्हाला दंडवत.. सोडोनि जातो गाव…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १६ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १६ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

 परमेश्वराशी संवाद

गाथेतील अभंगांचे वाचन करीत असताना पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तुकाराम महाराज परमेश्वराशी अनेक वेळा अत्यंत जवळीकतेने आणि प्रेमादराने संवाद साधतात. आज आपण त्यांच्या अभंगांतून देवाशी घडलेला संवाद पाहूया.

अखंड नामस्मरण त्यांनी अंगीकारले आहेच. ते हरीला पुन्हा पुन्हा हेच सांगतात की

 हरी तुझे नाम गाईन अखंड/

 यावेळी पाखंड नेणे काही//

 अंतरी विश्वास अखंड नामाचा/

 काया मने वाचा हेची देही//

 तुका म्हणे आता देई संत संग/

 तुझे नामी रंग भरो मना//

हे देवा, माझ्या मुखात तुझेच नाव अखंड रहावे या व्यतिरिक्त मी दुसरी कोणतीच गोष्ट जाणत नाही. तुझ्या नामावरचा माझा विश्वास कायम रहावा, आणि काया, वाचा, मने करून माझ्या ओठी तुझ्या नावाशिवाय दुसरे काहीच नको. ईश्वरा जवळ ते संतांच्या संगतीची याचना करतात कारण संत हे ईश्वराचे रूप आहे.

प्रपंचात अडकलेल्या तुकाराम महाराजांची अवस्था दोलायमान झालेली आहे. ना धड प्रपंच ना परमार्थ अशा स्थितीत ते हरीलाच साद घालतात. त्याला सांगतात, हे मुरारी, माझे चित्त धनामध्ये गुंतले आहे, आणि ते मला दारोदार हिंडवीत आहे. हे मनाचे असे भरकटणे थांबतच नाही. पृथ्वीवर भटकू- नही समाधान काही मिळत नाही.

 धना गुंतले चित्त माझे मुरारी/

 मन घेऊन हिंडवी दारोदारी//

 मन हिंडता न पुरे यासी काही/

 ७मही ठेंगणी परि ते तृप्त नाही//

पुढे ते देवाला सांगतात की त्यांची बुद्धी सुद्धा शांत दिसत नाही, कारण इंद्रिय विषयांच्या भोवऱ्यात ते सापडले आहेत. या अशा भरकटलेल्या चित्तामुळे माझ्या जिवाला शांती नाही. तेव्हा या दुष्ट आणि खोड्याळ मनापासून हे परमेश्वरा तू मला वेगळे कर.

 पाहता न दिसे मज शुद्ध मती/

 पुढे पडीलो इंद्रिया थोर घाती//

 जीवा नास त्या संगती दंडबेडी/

 हरी शीघ्र या दृष्ट संघाशी तोडी//

षड्रिपुंची तुकाराम महाराजांना फार भीती वाटते. ते देवाला विनवतात,

 मोह पापिणी दुष्ट माया ममता/

 काम क्रोध ही यातना थोर करी//

 तुजवाचुनी सोडवी कोण हरी//

ही सर्व माया, ममता, मोह म्हणजे एखाद्या दुष्ट पापिणीसारखे आहेत. काम, क्रोध यामुळे मनाला फार यातना सहन कराव्या लागतात, त्यामुळे हे हरी तुझ्यापासून मी दूर जातो. ते पुढे देवाला सांगतात, निद्रा, दंभ, आळस, याची त्यांना भीती वाटते. म्हणून देवा या दुर्गुणांना माझ्या देहात थारा नसावा. मला फक्त तुझ्या एकट्याचीच हाव आहे.

 निज देखता निज हे दुरी जाये/

 निजा आळस दंभ या भीत आहे//

 तया वस्ती नको देऊ देवा/

 तुज वाचुनी नास्ती आणिक देवा//

 

 करी घातपात भय लाज थोरी/

 असे सत्य व्हाव बहु भक्ती दूरी//

 नको मोकलू दीनबंधू अनाथा/

 तुका विनवी ठेवूनी पायी माथा//

या ठिकाणी महाराजांनी देवाला दीनबंधू म्हणून संबोधले आहे. मोठ्या भावाप्रमाणे हा हरी दीनांचे, पीडितांचे रक्षण करतो. महाराजांच्या काळातही घातपात लबाडी होतीच. तर त्यापासून ते म्हणतात हे दीनबंधू तू मज अनाथाला वाचव. संशय, संकोची वृत्ती हे अवगुण फार घातक आहेत तेव्हा मला तू यापासून दूर ठेव. तुझ्या पायांवर माझी एवढी विनंती आहे.

प्रपंचातील तुकाराम महाराज स्वतःला अनाथ म्हणत आहेत, कारण एका परमेश्वराशिवाय त्यांना आजूबाजूला दुसरे कोणी दिसतच नाही.

पांडुरंगाच्या दर्शनाची उत्कट आस हा तर गाथेचा गाभा आहे. पांडुरंगाला ते माऊलीच म्हणतात. याही अभंगात त्यांची ही माऊलीच्या भेटीची उत्कटता दिसून येते. आईची आणि तिच्या अपत्याची काही कारणांमुळे ताटातूट झाली तर ते बालक सैरभैर होऊन मोठ्याने रडायला लागते, तशीच तुकाराम बुवांची अवस्था या त्यांच्या अभंगातून झालेली आपल्याला दिसते.

 बोलोनिया दाऊ का तुम्ही नेणाजी देवा/

 ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहीन//

 पांगुळले मन काही नाठवे उपाय/

 म्हणून पाय जीवी धरुनी राहिलो//

 त्याग भोग दुःख काय सांगावे मांडावे/

 ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशन का//

 तुका म्हणे माता बाळ चुकलीया वनी/

 न पवता जननी दुःख पावे विठ्ठले//

महाराज म्हणतात, ” हे देवा मला दर्शन द्या असे तुम्हाला वारंवार सांगण्याची आवश्यकता आहे का? तुम्हाला तर हे माहीतच आहे. तुम्ही मला जसे ठेवाल तसा मी राहीन. माझं मन अत्यंत दुर्बल झाल्यामुळे मी तुमच्या पायाशी आलो आहे, माझ्याकडे अन्य कोणताच उपाय नाही. मी कोणते भोग घ्यावे, कोणते दुःख सोसावे मला माहित नाही. रानामध्ये आई आणि मुलाची ताटातूट झाल्यासारखी माझी मनस्थिती झाली आहे.

विठ्ठलाच्या दारात जणू काही धरणे धरून बसल्यावर तुकाराम महाराजांना स्वतःतीलच दोष दिसतात आणि मग ते रागाने विठ्ठलाला म्हणतात,

 जळो माझे कर्म वाया केली कटकट/

 झाले तसे तंट नाही आले अनुभवा//

मी उगीचच तुमच्या दारात कटकट केली आग लागो माझ्या कर्माला. तुमची सत्कीर्ती मी जी ऐकली त्याचा मला अनुभव आला नाही.

 आता पुढे धीर काय देऊ या मना/

 ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे//

अहो नारायणा आता मी माझ्या मनाला कसा धीर देऊ ते तुम्हीच सांगा.

 गुणवंत केलो दोष जाणयासाठी/

 माझे माझे पोटी बळकट दूषण//

मला तुम्ही गुणवंत केलेत, पण मी परदोषच बघत बसलो. मी व माझे मानणे हा तर माझ्यातीलच दोष आहे.

 तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा/

 बरवा हा लळा पाळीयेला शेवटी//

शेवटी महाराज म्हणतात, ” हे केशवा, दयाळा, तुम्ही माझे खूप लाड पुरवलेत, त्याची प्रचिती आली. माझे गुणदोष समजले, हे तुमचे माझ्यावर चांगले उपकार झाले. याचाच अर्थ जेव्हा महाराजांनी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिले तेव्हा त्यांना हे ज्ञान मिळाले.

असे देवाशी कधी भांडण, कधी रुसवा कधी गोडवा दर्शविणारे अनेक अभंग गाथेत सापडतात आणि त्यावरून तुकाराम आपल्याला समजतातच परंतु परमार्थाचीही. आपल्या सामान्यांना थोडी तरी ओळख होते.

पुढील भागात आणखी काही अभंगांचा आपण विचार करू.

क्रमशः… १६

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शॉर्टकट… – भाग – ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ शॉर्टकट… – भाग – ३ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(त्या दिवशी सामान घ्यायला मी स्टोअरमध्ये गेले तर हमीदा भेटली. कोणीतरी बोलायला भेटलं म्हणून बरं वाटलं.  ॓ठहरोना हमिदा. साथ जायेंगे.॔ असं म्हणत तिला थांबवून माझं सामान घेऊन झाल्यावर आम्ही बरोबर निघाले. थकल्यासारखी दिसणारी हमीदा पावले ओढीत सावकाश चालत होती. )

इथून पुढे – – 

 ॓क्यूं हमीदा, तबीयत ठीक नही है क्या? क्या हुआ? 

या माझ्या प्रश्नावर ती म्हणाली, क्या करनेका बहन? अपना नशीबही अच्छा नही. चाचाके मर्जीनुसार कभी उनके रूममे भी जाना पडता है. पैर दबाने के बहाने से बुला लेते है और…. क्या करूं? मेरे फॅमिलीको खाली मेरा पैसा चाहिये. मेरा पासपोर्ट वगैरा सब चाचाके पास ही है. यहा दो बरस पुरे होने के बाद मुझे दो महीने की छुट्टी मिलेगी. तब तक मै वापस नही जा सकती. अभी मैने एक तरकीब सोची है. जब जब चाचा पैर दबाने के लिए बुलाते है, तो मैं पहिले उनसे कुछ अच्छा गहना मॉ॑ग लेती और मेरे बॅग में रखती. सायरा बेगमको सब पता है. लेकिन वो कुछ नही कर सकती. मेरे मेहनत का पैसा तो मेरे घरवालेही खाते है. कम से कम कुछ सोना तो मेरे पास रहेगा. तिचं घर आल्यावर,  ॓फिर मिलेंगे.॔ खुदा हाफिज.॔ म्हणून ती निघून गेली.

 पण तिचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यावर वीज पडल्यासारखं झालं. माझी अवस्था तिच्यापेक्षा फार वेगळी नव्हतीच !दिवसेंदिवस सुरेंद्रची मागणी वाढत चालली होती. त्यातच सुलेखा ताईला दिवस गेल्याचं कळलं. मी वरकरणी त्यांच्या आनंदात सहभागी असल्याचं नाटक केलं. पण एकदा सुलेखा ताईला फोनवर कुणाशी तरी बोलताना मी ऐकलं होतं की त्या होम सायन्सच्या डिप्लोमाची फी खूपच जास्त आहे. आता दोन वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपली इथून सुटका नाही हे मी मनोमन जाणलं होतं. बाळ.. बाळंतीणीचं करायचं सोडून मला कोण शिकायला पाठवेल? इतकी चांगली हक्काची मुलगी कामाला घरात असताना मला कोण एवढ्यात भारतात पाठवेल?॔ 

… आणि त्यादिवशी सुरेंद्रने ॓मोठी मागणी ॔ पुढे केली. मी सगळी काळजी घेईन. तुला काही त्रास होणार नाही असं आश्वासनही दिलं.॔ हे कधीतरी घडणारच होतं, म्हणून मीही सावध होते. मुंबईला मी रात्रीच्या ज्युनिअर कॉलेजला जात असताना माझ्याबरोबरच्या काही मैत्रिणी, त्यांनी काल कुठे कसा सेक्सचा अनुभव घेतला ते रंगवून सांगत असंत. अमक्या तमक्या त्या मोठ्या बकऱ्याकडून ठरल्यापेक्षा मी काय जास्त उकळलं, ड्रेस कॉस्मेटिक्स ज्वेलरी सेट कसं मिळवलं. याचं वर्णन करीत. मी त्यांच्या धैर्यापुढे अवाक् होई…. .॔ 

चित्रा पुन्हा रडू लागली. तिच्या पाठीवर हात फिरवत राजश्री तिला शांत राहायला सांगत होती. पण हे सगळे प्रकार ऐकून राजश्रीच एवढी हादरून गेली होती की आता तिच्याच पाठीवरून हात फिरवायला तिला सावरायला, तिचे डोळे पुसायला रमेश जवळ असता तर फार बरं झालं असतं असं तिला वाटत होतं. आणि एकीकडे हे सारं रामायण ऐकायला तो इथे नाही तेही चांगलं झालं असं वाटत होतं.

 काही मिनिटं अशीच शांततेत गेली. थोडं थांबून चित्रा म्हणाली दीदी,॓ कसं सांगू तुला? सुरेंद्रची मागणी मान्य करण्याआधी मी त्याच्यापुढे मुंबईतली महागाई, शिक्षणाचा खर्च, आमची घराची गरज असा सारा पाढा वाचला. त्यानं मला माझ्या मुंबईच्या बँक अकाउंटमध्ये पन्नास हजार रुपये जमा करण्याचं आश्वासन देऊन ते पूर्ण केलं. आणि मगच मी त्याच्या स्वाधीन झाले. मी कबूल करते की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. पुरुष सहवासाची आणि प्रत्येक वेळी बँकेत जमा होणाऱ्या पैशाची मला भुरळ पडली. पण मला आता तिथून, या साऱ्या मोहातून लवकर बाहेर पडायचं होतं. मी वेळेवर मुंबईला पोचले नाही तर इथलं शैक्षणिक वर्ष सुरू होईल. मला पुढच्या वर्षात ॲडमिशन मिळणार नाही हे मला माहीत होतं.

 दीदी, तुम्हा दोघांना माहितेय की मला पुढे शिकून कॉम्प्युटरचा एखादा कोर्स करून स्वतःच्या पायावर उभे राहायचंय.

 ॓… आणि माझं नशीब चांगलं म्हणून दुबईच्या त्या मोहमयी, सोनेरी दुनियेतून परतण्याचा ॓शॉर्टकट ॔ मला लवकरच सापडला. काही दिवसांपूर्वी सुलेखाताई,  ॓आज मी लवकर घरी येते. दोघी मिळून थोडे लाडू, शंकरपाळे करू.॔ असे सांगून शाळेत गेली. आणि अनपेक्षितपणे, सुखाला चटावलेला सुरेंद्र लवकर घरी आला. त्याला मी ॓आज ताई पण लवकर घरी येणार आहे.॔ असं अजिबात सांगितलं नाही. आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे आमच्या प्रेमाचा सिलसिला सुरू असतानाच सुलेखाताई तिच्याकडची किल्ली लावून दार उघडून आत आली. सुरेंद्रला घाईनं माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहून आणि आमच्या चेहऱ्यावरून तिनं काय ते जाणलं.

 खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तिला आमचा संशय होताच. पण आज आम्ही रंगेहाथ पकडले गेलो होतो. त्या दोघांची खूप वादावादी झाली. मलाही खूप बोलणी खावी लागली. शक्य तितक्या लवकरचं तिकीट काढून माझी मुंबईला रवानगी करण्याचा निर्णय झाला. मी ताईकडून आठवणीनं माझ्या पासपोर्टबरोबर माझं बारावीचं आणि माझी इतर सर्टिफिकेट्स मागून घेतली आणि मगच माझी बॅग भरायला घेतली. दीदी, मी तुम्हा दोघांची क्षमा मागते. माझा अपराध तुम्ही समजून घ्याल ना?॔ 

 राजश्री काहीही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती. आपण काय करायला गेलो आणि हे काय होऊन बसलं याबद्दल खंत करावी की आपण विश्वासानं दुसऱ्या देशात पाठवलेली दुसऱ्याची मुलगी सुखरूप घरी आली याबद्दल देवाचे आभार मानावे हेच तिला समजेना. डोळे पुसत, जिना उतरणाऱ्या चित्राकडे ती निःशब्द होऊन नुसती बघत उभी राहिली.

 मन मोकळं झाल्याने चित्राला आता जरा बरं वाटत होतं. राजश्रीताईकडून घरी येताना चित्राला दुबईतला आणखी एक प्रसंग आठवला…

… एकदा काही खरेदीसाठी ती सुलेखाताई आणि सुरेंद्र एका मॉलबाहेर भेटणार होते. त्या दिवशी सुरेंद्रनं आपल्याला घरी फोन करून ठरल्या वेळेपेक्षा एक तास लवकर तयार राहायला सांगितलं होतं. सुरेंद्रला आवडणारा सुंदर आकाशी रंगाचा ड्रेस घालून आपण तयार झालो. ड्रेसचं आणि आपलं सुरेंद्रनं अगदी ॓साग्रसंगीत  ॔कौतुक केलं. बाहेर पडल्यावर गाडी वेगळ्याच दिशेला निघालेली पाहून आपण सुरेंद्रला विचारलं ,॓आपल्याला ताईने तिकडच्या मॉलमध्ये बोलावलं आहे ना ?॔हो. पण त्याआधी एक सरप्राईज आहे बाईसाहेबांना. असं म्हणत सुरेंद्रने गाडी ॓गोल्डसूक ॔ जवळ उभी केली. मागे ताईंबरोबर खरेदीला गेलो होतो तेव्हा आपल्याला आवडला होता तसाच सोन्याचा सेट सुरेंद्रने आपल्यासाठी खरेदी केला. भारावून जाऊन तो सेट पर्समध्ये ठेवताना आपल्याला झालेला आनंद आपण लपवू शकलो नाही. गाडीत बसल्यावर सुरेंद्र म्हणाला,  ॓बाईसाहेब याची पुरेपूर वसुली मी करणार आहे बरं !॔आपण खोटं खोटं रागावून त्याला आणखीनच उत्तेजन दिलं होतं. मॉलमधली खरेदी आटोपून, घरी येऊन सारं आवरल्यावर रात्री आपण आपल्या खोलीचं दार लावलं. तो चमचमणारा सुंदर सेट घालून स्वतःला पुन्हा पुन्हा आरशात न्याहाळलं. मग एका जुन्या ड्रेसमध्ये तो सेट गुंडाळून अलगद बॅगेच्या तळाशी ठेवला.

… आत्ता दीदीला सगळं काही सांगताना ही गोष्ट आपल्याला आठवली नाही की हे सांगायचं आपण मुद्दामून टाळलं ?

समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वाटी…!” ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “वाटी…!” ☆ शीला पतकी 

“अरे वाटीने दिल तर पाटीने गोळा करशील. ” हे आमच्या आजीचे दातृत्वाचे माप! मोलाचा विचार !!आज आपल्यातील थोडं जे आहे त्यातलं लोकांना दिलं तर पुढे जाऊन त्या पुण्य कर्मामुळे आपल्याला खूप काही मिळतं… साधी गोष्ट पण एका ओळीत सुंदर सांगितलेली.

वाटी हे आपल्या भोजनपात्रातले सर्वात लहान भांडे वाटीचे अनेक प्रकार आहेत. नैवेद्याची वाटी, आमटीची वाटी, भाताची मुद पाडायची वाटी, तुपाची वाटी, आमरसाची वाटी, श्रीखंडाची वाटी, दह्याची वाटी, या अशा अनेक वाट्यांना त्यातल्या पदार्थ प्रमाणे मानाचे स्थान असे. त्यांचाही थाट असायचा.. काही वाट्या चांदीच्या काही पितळेच्या नंतरच्या काळात स्टीलच्या जर्मनच्या पण वाट्या असायच्या पण त्या वापरत नव्हते. जगावर राज्य करायला निघालेल्या जर्मनच्या वाटीची अवस्था फारच वाईट होती. कुत्र्या मांजराला खाऊ घालण्याचे पदार्थ त्या वाटीत ठेवले जायचे ती जरा आकाराने मोठी असायची. मला त्या धातूला जर्मन असे का म्हणतात हेच कळत नाही. त्या काळात जर्मनची भांडी हलकी म्हणून प्रसिद्ध होती पण ती घरात वापरायला कोणी तयार नसे. हमालाचं काम करतानाही जगावर राज्य करण्याची महत्त्वकांक्षा बाळगणारा क्रूर माणूस म्हणजे हिटलर… किंबहुना क्रूरतेला हिटलर हा शब्द पर्यायी म्हणून दिला आहे. असो एकूण जर्मनच्या वाट्या फारशा वापरल्या जात नव्हत्या.

नैवेद्याच्या वाटीचे नशीब जोरदार… ती चांदीची, देवापुढे रोज ठुमकत जाऊन बसण्याचा मान तिला! तिच्यामध्ये असलेले पदार्थ म्हणजे केशर काजू बदाम मिश्रित शिरा, केशर घातलेल श्रीखंड तर कधी मस्त घट्ट बासुंदी कधी बेसनाचा लाडू, डिंकाचा लाडू, साखरभात अशा भारदस्त पक्वान्नाना त्या वाटीत सामावून घेण्याचा मान मिळायचा. बाकीच्या वाट्या आमटी भाजी इत्यादीसाठी असायच्या.

आमरसाच्या वाटीचे मात्र वैशिष्ट्य.. ती खास असायची. तिला आपला हा मध्यम आकार चालायचाच नाही. हाताची बोटे पसरल्यावर जेवढा आकार होईल त्यात मावणारी ती वाटी.. ही चांदीची वापरायची. आता मात्र ती स्टीलची असते. चांदीच्या वाटीतला तो आमरसाचा रंग मोठा देखणा दिसायचा.. ते उत्तम मॅचिंग होतं. वाटी पाहिल्यानंतर माणसाच्या जिव्हेला आवर घालणे अवघड असायचे.

तसेच आमटीच्या वाटीचा आकारही थोडा मोठाच असायचा कारण त्यामध्ये कधी चिंच गुळाची आमटी, कधी शेवग्याच्या शेंगाची आमटी, कधी कांद्याची आमटी, उपवासाची शेंगाची आमटी, नवीन मसाला केल्यावर उखळ धुतल्यावर केलेल्या पाण्याची.. मसाला आमटी, वड्याची आमटी, आणि हल्ली प्रसिद्ध असलेली बाजार आमटी – – आमटीचा भुरका मारला की त्या आमटीने माणसाचा मेंदू तरतरीत होत होता.

उसनवारीचा व्यवसाय केला तो वाटीनेच… वाटीभर साखर, वाटीभर डाळीचे पीठ, वाटीभर डाळ, वाटीभर तांदूळ, वाटीभर तेल, ही सगळी उसनवारी या वाट्याच्या माध्यमातून होत असे.

लहान मुलांना तरी वाटीत काहीतरी घालून बसवले.. अगदी चुरमुरे वगैरे कि ती खात निवांत बसायची आणि आईचे काम व्हायचे.. ! शाळेतून आल्यानंतर आईने वाटीत काहीतरी खायला दिले की आनंद व्हायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत केली जाणारी भेळ वाटी वाटीतूनच वर्तमानपत्राच्या कागदावर वाटली जायची. चाळ आणि वाडे यांच्यातील घराघरामधील स्नेह वाढवण्याचे काम या वाटीनेच केले आहे. भाजी आमटी चांगली झाली की शेजाऱ्याकडे ती वाटी जायची किंवा काही खास वेगळे केले तरी वाट्यांची देवाण-घेवाण व्हायची शेजाऱ्याकडे दिलेली वाटी कधीही रिकामी परत येत नसे, आणि आतासारखे चार दाणे साखर टाकून देण्याचा जमानाही नव्हता. त्यामध्ये पुन्हा घसघशीत पदार्थ घालून ती वाटी परत केली जात असे. माझ्या शेजारी असणाऱ्या एका कुटुंबातील मुलगी माझ्या आईच्या हातच्या आमटीसाठी हट्ट धरून बसायची. तिच्या आईला संकोच वाटायचा की रोज काय त्यांच्याकडून आमटी आणायची. माझी आई म्हणायची ‘अगं नेत जा.. मला नाती सारखी आहे ती ‘. पण त्यांनी एक युक्तीच केली आमच्या घरची वाटी घेऊन जाऊन त्यात ते त्यांच्या घरची आमटी घालून ठेवत आणि मग ती आमटी बाईंनी तुला दिली आहे असे सांगितले की ती खुश व्हायची आणि आईला म्हणायची, ” बघ बाईच्या हाताची आमटी किती सुंदर होते “– ही फसवा फसवी तिच्या आईने किती तरी दिवस केली होती. अशी ही गंमत.

या वाटीने सकाळी नळावर झालेली कडाक्याची भांडणे क्षणात विसरून जाऊन बायका पुन्हा चार वाजता गप्पा मारण्यासाठी एकत्र यायच्या. हे वैशिष्ट्य चाळ आणि वाड्यातच पाहायला मिळणार. नळावरची भांडणं त्या वाटीतून कधी बादली, घागरी पर्यंत पोहोचली नाहीत. ते सगळे विचार.. नाराजी वाटीमध्ये विरून जायची !

लग्नात या वाटीचे महत्त्व फार मोठे. मधुपर्कच्या एका विधीला जावयाला चांदीची वाटी देत असत. तसेच संक्रांतीला चांदीच्या वाटीत हलवा घालून जावयाला आहेर करायची पद्धत होती. भाच्याला पहिला दात समोरचा आला तर चांदीची वाटी मामाने आणून मारायची अशी पद्धत होती.. मारायची म्हणजे त्याला आहेरच करायचा. पूर्वी चांदीच्या वाटीचा आहेर करीत असत. बारशाला वाटी चमचा असा आहेर व्हायचा.. आहेरात चांदीची वाटी देणे याला खूप महत्त्व होते. बायका हिंगाच्या डबीत पैसे साठवून एक एक चांदीची वाटी जमा करीत असत. चांदीची वाटी, चांदीचं ताट, चांदीचे ताम्हण हे त्या घराचं वैभव बायकांच्या हिंगाच्या बचतगटाच्या डबीतून आलेलं आहे. आहेरात चांदीची वाटी दिली तर देणाऱ्याचा मान वाढत असे.. “अग बाई चांदीची वाटी का दिली… ” असे कौतुकही होत असे

माणसांच्या संभाषणात सुद्धा वाटीला अनन्यसाधारण महत्त्व होतं. उदाहरण पहा… “वाटीभर रक्त आटवलं याच्यासाठी पण काही उपयोग झाला नाही” यासारख्या वाक्याने वाटीला एक साहित्यिक महत्त्व आलं आहे. तिला ताटाची जोड मिळाली ना की मग तिचं सौभाग्य फुलते. पूर्वी ताटवाटीचा आहेर करायचे – – एकूण आपल्या संस्कृतीत जोडी असणे याला खूप महत्त्व आहे… वाटीतलं ताटात सांडले तर काय बिघडतं… वाटीतलं ताटात काय आणि ताटातलं वाटीत काय… इत्यादी म्हणजे थोडक्यात आपल्या माणसासाठी हे सगळं आहे असं सांगण्याचा तो उद्देश आहे.. त्याला दिले तर काही बिघडत नाही.

– अशा अनेक साहित्यिक वाक्यांमध्ये वाटीला स्थान आहे.

सर्वांना समान वाटणी करण्याची पूर्वी पद्धत होती, म्हणजे अगदी द्राक्ष आणली तरी प्रत्येक मुलाला सहा- सहा आठ आठ अशी मोजून द्राक्ष वाट्यात घालून दिली जात असत. (पूर्वी द्राक्ष दुर्मिळ होती) वाटीत कोणाला तरी गुपचूप काढून ठेवून देणे हे त्याच्यावर असलेल्या मायेच प्रतीक होतं. सुनबाई जर सासूबाईंना म्हणाल्या, ” आई आहो तुम्ही देवळात गेला होता ना म्हणून यांनी आणलेली बर्फी मी तुमच्यासाठी वेगळी काढून वाटीत ठेवली आहे “… सासुबाई सुखावून जातात… ! गपचूप काढून ठेवलेल्या वस्तूंचे महत्त्व विरोधी गटातही प्रेम वाढवण्यासाठी उपयोगी ठरले आहे.

चांदीच्या वाट्या कपाटात असतात. पितळेच्या वाट्या आता कालबाह्य झालेल्या आहेत. स्टीलच्या वाट्यांची चलती जोरात आहे. पण त्यांनाही मागे टाकून आता प्लास्टिकच्या वाट्या येऊ लागल्यात. पण या वाट्यांना चांदीच्या आणि पितळेच्या वाट्यांचे शाहीपण नाही…

… पण सगळ्याच वाटी प्रकाराला जे बाईपण लाभलं आहे ना ते वाखाणण्याजोग आहे. बाईपण यासाठी की हा संसारातला स्नेह, समजूतदारपणा, भांडणे मिटवून टाकणं, आपल्यातलं थोडं दुसऱ्याला देणं, हे जे गुण घरातल्या बाईजवळ असतात तेच गुण या वाट्यामध्ये आहेत. वाटी हे वाडे आणि चाळीचे स्नेह वाढवणारे घटक आहेत. बंगल्यात ती देवघेव होत नाही आणि तो स्नेह ही निर्माण होत नाही.

… “एक वाटी आमटी भाजी की कीमत तुम क्या जानो बंगले वालो… ” 

आता हा लेख वाचल्यानंतर शेजारच्या पाजारच्या बंगल्यातून मला वाट्या येतील असं वाटतंय… बघूया एक छोटं भांडं – ‘वाटी‘ – यावर मी माझे विचार प्रकट केले आहेत. आवडले असले तर वाटीभर अभिप्राय द्या आणि ही वाटी पुढच्या घरी पाठवा माझे काही बंधन नाही…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “समजुतीचा घोटाळा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “समजुतीचा घोटाळा…” ☆ श्री मंगेश मधुकर

माणसांच्या विचित्र वागण्यानं समजुतीचा घोटाळा होतॊ.

झालं असं की,

सध्या उन्हाळ्याचे दिवस. रात्र लहान तर दिवस मोठा. सकाळी फार लवकर म्हणजेच साडेपाच-सहालाच जाग येते. नंतर काही केल्या झोप येत नाही. उगीच कूस बदलत लोळत पडायचा कंटाळा येतो म्हणून मग फिरायला जायला सुरवात केली. मोबाइल मुद्दाम घरातच ठेवला. प्रसन्न वातावरण, हळूहळू जागं होणारे शहर, रस्त्यावर गाड्यांची कमी आणि पायी चालणाऱ्यांची संख्या जास्त. आजकाल असलं दृश्य पहायला मिळणं तसं दुर्मिळच.. फार मस्त वाटलं. असो..

सर्वच वयोगटातील लोक बाहेर पडलेले त्यातही ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त. फुटपाथवरुन जात असताना समोरून टी-शर्ट, हाफ पॅन्ट घातलेला, तुळतुळीत टक्कल असलेला पन्नाशीचा माणूस माझ्याकडं पाहत हातवारे करत काहीतरी बोलत होता. आमच्यातलं अंतर जवळपास शंभर फुटांचे होतं. तो नक्की आपल्याकडेच पाहत हातवारे करत आहे ना याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केला पण नीटसा अंदाज आला नाही. त्याचे हातवारे अजूनही चालूच. मी हात उंचावून प्रतिसाद दिला पण शून्य प्रतिसाद.. मला आश्चर्य वाटलं आणि रागही आला. अगदी जवळ आल्यावर लक्षात आलं की तो इयर पॉड लावून फोनवर बोलत होता आणि मला वाटलं की.. , , , माझ्याकडे ढुंकुनही न पाहता शेजारून निघून गेला तेव्हा माझं मलाच हसायला आलं. नशीब बायको सोबत नव्हती नाहीतर तिला चिडवायला अजून एक कारण मिळालं असतं.

पुढे गेल्यावर असेच एकटेच बोलणारे, हातवारे करणारे अनेकजण दिसले पण यावेळेला मी अनुभवानं शहाणा झाला होतो.

काळ बदललाय हेच खरं… पूर्वी एकटाच बडबडणाऱ्या, हसणाऱ्याला वेड लागलंय किंवा डोक्यावर परिणाम झाला असं म्हणायचे. तसं पाहिलं तर आताही तीच परिस्थिती आहे. मोबाईलमुळे डोक्यावर परिणाम झालाच आहे. निसर्गानं बहाल केलेल्या सुंदर सकाळचा अनुभव घेण्याऐवजी मोबाइलला चिकटलेल्यांची खरंतर कीव वाटली.

विचारांच्या तंद्रीतच चौकातल्या बसस्टॉपवर बसलो. शेजारचा हातवारे करत, शून्यात पाहत बोलत होता मध्येच मोठ्याने हसत होता. अजून एक फोन पागल… आपल्याच तंद्रीत असलेल्या त्यानं माझी दखलही घेतली नाही. सतत बडबड चाललेली अन मी शांत बसलेलो. तितक्यात समोरून चाललेले आजोबा आमच्याकडे क्षणभर पाहत थांबले. थोडं पुढे जाऊन त्यांनी मला ‘शुक शुक’ करून बोलावलं.

“काय झालं”मी विचारलं.

“भलेतच डेरिंगबाज आहात”

“का?”

“म्हणजे तुम्हाला माहिती नाही की अजूनही लक्षात आलं नाही”आजोबांच्या प्रश्नांनी गोंधळ वाढला. माझा प्रश्नांकित चेहरा पाहून आजोबा म्हणाले..

“अहो, मिस्टर ज्याच्या शेजारी बसला होता तो वेडा आहे. भीती वाटली नाही ? ” आजोबांचं ऐकून नखशिखांत हादरलो. आजोबा मात्र माझ्याकडं कौतुकमिश्रित विचित्र नजरेनं पाहत होते.

“लोक इतके विचित्र वागतात की कोण वेडं की कोण नॉर्मल ओळखणं अवघड झालयं. ”मी म्हणालो.

“बरोब्बर”

“एवढ्या सकाळी सुद्धा बरेचजण फोनवर बिझी??. “

“ स्मार्ट फोन आल्यापासून माणसांचा बावळटपणा वाढलाय ”आजोबा मार्मिक बोलले.

“खरंय!!तुमचे मनापासून आभार!!” 

… हात जोडत आजोबांचा निरोप घेऊन निघालो बसस्टॉपवरच्या वेड्याचं बोलणं सुरूच होतं. तितक्यात समोरून काहीजण एकटेच बोलत येताना दिसल्यावर फुटपाथ सोडून रस्त्यावरून चालायला लागलो…… मनात विचार आला की एक खरंच वेडा आणि बाकीचे.????

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ६६, ६७, ६८. ६९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६६, ६७, ६८. ६९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

भक्ति सूत्रे ६६ – – 

त्रिरूपभङ्गपूर्वमकम् नित्यदास्यनित्यकान्ताभजनात्मकं प्रेम कार्य प्रेमैव कार्यम् ||६६||”

अर्थ : त्रिपुटीचा भंग म्हणजे नाश अथवा लय करून सर्वकाळ भगवतांचा दास आहे अथवा त्याची कांता आहे असा भाव धारण करून त्याच्यावर प्रेम करावे, प्रेमच करावे.

विवेचन : साधन, साधक आणि साध्य अथवा भक्त, भक्ति आणि भगवंत अशी त्रिपुटी अथवा त्रिकुट मानले जातात. अध्यात्मात या तिन्हीची गरज असते. जेव्हा भगवतांची प्राप्ती होते तेव्हा ही त्रिपुटी संपुष्टात येत असते.

आपण नदीचे उदाहरण पाहू.

नदीचा उगम सागराला जाऊन मिळण्यासाठी होतो. यात नदी, नदीचे वाहणे आणि सागर मिळून त्रिकुट अथवा त्रिपुटी होते. यातील एक जरी नसेल तरी चालणार नाही. नदी सागराला जाऊन मिळाली की तिचे अस्तित्वच संपुष्टात येते, तिचे नदीपण शिल्कच उरत नाही…

भक्त भक्ति करतो, यथावकाश त्याला भगवंताची प्राप्ती होते, मग तो भक्त म्हणून सांगायला शिल्लकच उरत नाही. इथे आपल्याला प्रश्न पडेल की मग संत कसे काय आपल्याला उपदेश करतात. त्याला एकमेव उत्तर आहे. संत कमीपणा घेऊन आपल्यासाठी *”अवतरण”* करीत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती याची अनुभूती आपण प्रत्येक संताच्या बाबतीत घेऊ शकतो.

हे सर्व लिहिणे सोपे आहे, प्रत्यक्षात आणणे महाकठीण.

त्यासाठी संपूर्ण शरणागत भाव अथवा हनुमंतासारखी दास्य भक्ति अंगिकारता आली पाहिजे.

साधकाने भगवंताला म्हटले पाहिजे की तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन… ! तुझे चरण मी काही झाले तरी सोडणार नाही. तुझ्या चरणावर डोके ठेवले आहे. आता तू तार अथवा मार. तू तारलेस किंवा मारलेस, तरी दोन्ही मध्ये माझेच कल्याण आहे. अशी दृढ श्रध्दा हवी. असे जमले की विषाचा प्याला पिताना भीती वाटतं नाही, छाटी उडाल्यावर मागचा पुढचा विचार न करता कल्याण गडाच्या तटावरून उडी मारू शकतो, कड्यावरून ढकलले, उकळत्या तेलात टाकले तरी भक्त प्रल्हादाला निश्चिंत रहात नाम घेता येते…

अशी अनेक उदा. आपल्याला सांगता येतील.

… बाळाची आई बाळावर अकारण प्रेम करते. ते बाळ दुध पिताना आईला लाथा मारते, तिच्या अंगावर शी करते, शू करते, रात्री अपरात्री जागरण करवते, तरी आई त्या बाळावर अपरंपार प्रेम करते…

… भक्त आपल्या भगवंतावर असाच प्रेम करतो, तेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती होते.

संत तुकाराम महाराज या स्थितीचे खालील अभंगात वर्णन करतात.

“हाचि नेमआतां न फिरें माघारीं । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥ 

घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥ 

बळियाचा अंगसंग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥३॥”

– – – – –

भक्ति सूत्रे ६७ – –

भक्ता एकान्तिनो मुख्याः ||६७||”

अर्थ : भगवंतांची एकनिष्ठपणे भक्ति करणारे भक्त हे मुख्य भक्त होत.

विवेचन: प्रपंचात अनेक गोष्टी मनुष्याला सांभाळाव्या लागतात, याउलट परमार्थ मार्गात मात्र एका भगवंताला आपलेसे करून घ्यायचे असते. गणिती भाषेत बोलायचे झाल्यास अनेक गणिते सोडवण्यापेक्षा एक गणित सोडवणे त्यामानाने सोपे, नाही का?

अनेक वर्षे प्रपंच करून मनुष्याला किती समाधान मिळतं हा प्रश्नच सध्याच्या काळात गैरलागू झाल्यासारखा आहे, असे म्हटले तर नवल वाटू नये… !

समर्थ म्हणतात, ” प्रपंच अवघाचि नासका”

यासाठी प्रापंचिक मनुष्याने, साधकाने दिवसातील काही वेळ एकांतात व्यतित करायला हवा. अनेक लोकांना एकांतापेक्षा एकटेपणाची जास्त भीती वाटतं असते. एकांत म्हणजे एकाचाही अंत. अंतर्यांमी वसलेल्या आत्मारामामध्ये स्वतःचा अंत करणे म्हणजे एकांत सेवन करणे. दुसऱ्या बाजूने विचार करता, आपली आणि भगवंताची इच्छा एक करणे, अर्थात त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळणे. तो जसा ठेवील तसे आनंदाने राहणे म्हणजे एकांत म्हणता येईल.

ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळून जाते तसे साधकाने भक्तीत विरघळून जावे. एक अर्थात जो आपला अभिमान आहे, अहंकार आहे, मीपणा आहे तो सर्व त्याच्याचरणी वाहून टाकावा, संपूर्ण शरणागत होऊन भगवंताशी समरस होऊन जावे… ! सर्व संतांनी हे करून दाखवले आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“लवण मेळविता जळे| काय उरले निराळे ||१|| समरस झालो `तूज माजी हरपलो ||२|| अग्निकर्पूराच्या मेळी| काय उरली काजळी ||३|| तुका म्हणे होती| तुझी माझी एक ज्योती||४||”

(संदर्भ : अभंग क्रमांक २३७९, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

या गुणातीत भक्तीमध्ये व्यवहाराचा, स्वार्थाचा लवलेश नसतो. अशा भक्ताला फक्त भगवंताचे प्रेम हवे असते, आणि त्यासाठीच तो भगवंतावर जिवापाड प्रेम करीत असतो… ! मग, एखादी मीरा म्हणून जाते आणि ते अजरामर होते,

“मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा ना कोय||”

असा भक्त सर्वांना आवडतो, अर्थात देवालाही प्रिय होतो.

– – – –

भक्ति सूत्रे ६८, ६९ – – – 

कण्ठावरोधरोमञ्चाश्रुभिः परस्परं लपमानाः पावयन्ति कुलानि पृथिवीं च ||६८||”

तीर्थीकुर्वन्ति तीर्थानि सुकर्मीकुर्वन्ति कर्माणि, सच्छास्त्रीकुर्वन्ति शास्त्राणि॥ ६९ |

अर्थ : प्रेमातिरेकामुळे कंठ दाटून येऊन शरीरावर रोमांच उभे राहिलेले असतांना आणि डोळ्यांतून अश्रू वहात असताना सिद्ध भक्त बाष्प गद्गद स्वरांनी एकमेकांशी संभाषण करताना उभय कुळे आणि पृथ्वी पावन करतात. इतकेच नव्हे तर असे भक्त (संत) तीर्थांना पावन करतात तसेच, ते जे बोलतात, त्याला वेदांत वाक्य म्हणून मान्यता मिळते.

विवेचन : भक्ति वाढत चालली की साधकाचे अष्ट सात्विक भाव जागृत होत असतात. आता अष्ट सात्विक भाव आपण पाहू.

अष्ट सात्विक भाव म्हणजे भक्तीमध्ये किंवा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये स्वाभाविकपणे प्रकट होणारी आठ प्रकारची शरीरिक-मानसिक लक्षणं. हे भाव परम भक्तीच्या अवस्थेत देवाप्रती प्रेम व एकात्मतेमुळे आपोआप उमटतात. हे “सात्विक” (शुद्ध, निर्मळ) स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना सात्विक भाव असे म्हणतात.

अष्ट सात्विक भाव :

  1. स्तंभ (स्तब्धता)

शरीर स्थिर होणे, न बोलणे, हालचाल थांबणे.

  1. स्वेद (घाम येणे)

अनोख्या आनंदाने किंवा भावानं अंगाला घाम फुटणे.

  1. रोमांच (रोमहर्ष)

अंगावर रोमांच उभे राहणे, थरथर सुटणे.

  1. स्वरभंग (गेल्यावर आवाज अडखळणे)

बोलताना गहिवर येणे, आवाज तुटक होणे.

  1. कंपन (थरथर)

शरीर थरथरणे, हातपाय हलणे.

  1. वैवर्ण (रंग बदलणे)

चेहऱ्यावर लाली, पल्लव, पांडूपणा इ. रंग बदल.

  1. अश्रू (डोळ्यांतून पाणी येणे)

आनंद, प्रेम, भक्तिभावाने डोळ्यांतून अश्रू येणे.

  1. प्रलय (संमोहनासारखी अवस्था / शून्यभाव)

शरीर व मन पूर्णपणे विश्रांतीत जाणे, समाधिस्थ अवस्था.

साधनेच्या विशिष्ट टप्प्यावर साधकाला या आठही भावांची अनुभूती येत असते. परंतु यामध्ये न गुंतता साधकाने आपली साधना, उपासना सुरू ठेवायला हवी.

जेव्हा अधिकार प्राप्त झालेले दोन भक्त भेटतात किंवा दोन संत भेटतात, तेव्हा त्यांच्यात एकतर मौनात चर्चा होते किंवा ते फक्त आपल्या गुरुबद्दल किंवा आपल्या भक्तीबद्दल चर्चा करीत असतात. तेव्हा त्यांचे अष्ट सात्विक भाव जागृत होऊ शकतात, किंवा काही वेळा झालेले अनेक साधकांनी पाहिले असेल. जिवंत साधकांच्या डोळ्यात पाणी आले यात नवल कदाचित नसेल, पण श्रीमहाराज (गोंदवलेकर महाराज) जेव्हा नैमिष्यरण्यात जायला निघाले तेव्हा थोरल्या रामाच्या डोळ्यांत पाणी आले. श्रीमहाराज त्याच्याजवळ गेले की त्याला विचारले की अरे, मी नैमिष्यरण्यात जातोय, ते तुला आवडले नाही का ? तसे असेल तर मी जाणार नाही… !

या सर्व गोष्टी परम प्रेमातूनच घडून येऊ शकतात. सर्व संतांनी भगवंतावर निरातिशय प्रेम करून त्याच्या सगुण विग्रहातून चैतन्य प्रकट करविले. चैतन्य सर्वत्र भरून राहिले असेल तर ते कोठूनही प्रगट होऊ शकते, फक्त ते प्रगट करण्याइतकी साधना, तप:श्चर्या आणि संपूर्ण शरणागती अत्यंत आवश्यक ठरते.

गंगेचे अवतरण झाले तेव्हा गंगा म्हणाली की पृथ्वीवर पापी लोकं राहतात, ते माझ्या पाण्यात स्नान करतील तेव्हा त्यांची पापे नष्ट होतील, यात बिल्कुल संदेह नाही, पण मी मैली होईन तेव्हा मला कोण शुद्ध करेल. तेव्हा भगवंताने तिला वचन दिले की संतमंडळी जेव्हा तुझ्या स्नान करतील तेव्हा त्याच्या अंतरंगी असलेल्या माझ्या अंशाने तू पुन्हा पुण्यसलीला होशील. आजपर्यंत हे वचन भगवंताने पाळले आहे.

अशा एकनिष्ठ भक्तांमुळे, संतांमुळे कुळ, मूळ आणि धरित्री पावन होत असते, नद्यांना तीर्थत्व प्राप्त होत असते… ! आणि संत जे बोलतात ते शास्त्र म्हणून मान्यता पावते. आदरणीय ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की मी पुस्तकातून जो वेदांत शिकलो तोच वेदांत श्रीमहाराज साध्या साध्या उदाहरणातून आणि स्व-आचरणातून जगाला सांगत आहेत. वेगळा वेदांत अभ्यासण्याची गरजच नाही. श्रींचे प्रत्येक वाक्य हे वेद वाक्य आहे, वेद वचन आहे.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ६६, ६७, ६८, ६९.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नजरेआड राहून गेलेले बलिदान ! ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “नजरेआड राहून गेलेले बलिदान ! ” ☆ श्री संभाजी बबन गायके

पहाटेचा दीड वाजला आहे. Central Reserve Police Force च्या एका तुकडीवर अंतर्गत भागाच्या सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या भागातील एका शाळेच्या इमारतीमध्ये तात्पुरते out post उभारण्यात आले आहे.

कारगिल युद्ध समाप्त झाल्याची घोषणा झालेली आहे. बाहेरून आत येऊन सीमेमध्ये खोलवर लपून बसलेला शत्रू आपण फार मोठी किंमत मोजून पिटाळून लावला आहे… पण आधीच देशाच्या अंतर्भागात बस्तान बसवलेले शत्रू आता आतून दगाफटका करण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सैन्याने ज्यांचा येथील कार्यकाळ संपलेला आहे, अशाही सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना इथं मुदतवाढ देऊन जबाबदारी दिली गेली आहे. त्यात अमरनाथ यात्रेच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे लागले होते! 

ही outpost तशी काश्मिरातल्या जंगलाच्या भागात, आणि तेथून पाकिस्तान सीमा फारशी दूर नाही.. आसपास बऱ्यापैकी लोकवस्ती. तेथील लोकांशी या outpost मधील सैनिकांशी बराच परिचय झालेला होता. तेथील तरुण या सैनिकांशी क्रिकेट खेळत, दूध वगैरे वस्तू आणून देत असत. एकूण मैत्रीपूर्ण आणि शांत वातावरणात सैनिक कर्तव्यावर तैनात होते!

चक नटनस नावाचे ठिकाण. दिनांक ६ ऑगस्ट, १९९९… कारगिल युद्ध समाप्तीची घोषणा होऊन केवळ दहाच दिवस झालेले होते… पाकिस्तानी अतिरेक्यांच्या आणि स्थानिक अतिरेक्यांच्या एका खूप मोठ्या गटाने या outpost वर मोठ्या आधुनिक शस्त्रांनी हल्ला चढवला! अतिरेकी या OUTPOST पासून अगदी जवळ, म्हणजे सुमारे पंचवीस तीस मीटर्सपर्यंत जवळ पोहोचले होते… व त्यांनी अक्षरश: POINT BLANK RANGE हल्ला चढवला.. त्यांच्याकडे आर. पी. जी. अर्थात ROCKET PROPELLED GRENADES होते… जे खांद्यावरील बंदुकीतून डागता येतात… पिका मशीन गन्सही होत्या… या एक हजार मीटर्सपर्यंत अचूक मारा करीत मिनिटाला सहाशे ते आठशे राउंडस डागू शकतात… अंधार एवढा की केवळ रायफल मधून सुटणाऱ्या गोळ्यांमुळे उडणाऱ्या ठिणग्या दिसाव्यात.

Outpost मध्ये सैनिकांची संख्या मर्यादित. शिवाय पहाऱ्यावरील दोन, तीन रक्षक (सेंट्री) वगळता इतरांना रात्री त्यांच्याकडील शस्त्रे शास्त्रागारात जमा करण्याचे आदेश होते! 

अचानक झालेल्या तुफानी गोळीबारात दोन पहारेकरी आणि तीन सैनिक आणि एक अधिकारी मिळून सहा शूरवीर धारातीर्थी पडले!

मदतीला येण्याचा संदेश दिला गेलाय… पण बचाव दल पोहोचायला किमान दोन तास लागतील. हल्ला अगदी पूर्वतयारी करून झाला आहे. क्रिकेट खेळायला येणाऱ्यांनी बहुदा गावाशेजारच्या जंगलात आधीपासूनच लपून बसलेल्या अतिरेक्यांना सर्व माहिती पुरवली आहे! त्यामुळे कोणत्या बाजूला किती जवान असतात, शस्त्रे कोणती आणि किती असतात याची माहिती शत्रूला होती, असे स्पष्ट होते!

४, राष्ट्रीय रायफल्स (बिहार रेजिमेंट) कुपवारा येथे कर्तव्यावर असलेले मेजर मनजीत सिंग यांची खरे तर काश्ममीरातील नेमणूक संपली होती आणि ते लवकरच त्यांच्या गावी, जालंधरला सुट्टीवर जाणार होते… पण प्राप्त परिस्थिती पाहून लष्कराने त्यांच्या सारख्या अधिकाऱ्यांना तिथेच कार्यरत राहण्याचे आदेश दिले होते.

८, माउंटन डिविजन काश्मीर खोर्‍यातून काढून तिला द्रास भागात झालेल्या घुसखोरीचा बिमोड करण्याच्या कामी धाडण्यात आले होते. त्यामुळे उत्तर काश्मीर भागात अतिरेकी विरोधी कारवाईत कार्यरत असलेल्या सैनिक, अधिकारी यांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला होता. नेमका याचाच फायदा शत्रूच्या फिदायीन अर्थात आत्मघातकी अतिरेक्यांनी उचलला होता. काश्मीरमधील भौगोलिक परिस्थिती ज्यांना माहीत आहे, अशांना यात काहीही आश्चर्य वाटणार नाही. तेथील परिस्थितीचे यथार्थ ज्ञान भारतातील इतरांना फारसे नाही.

गोळीबाराचा आवाज ऐकून मेजर मनजीत सिंग आपल्या झोपण्याच्या जागेवरून ताडकन उठले आणि बाहेर धावले. मागच्याच वर्षी त्यांनी जगरपोरा येथे झालेल्या चकमकीत एका अफगाणी अतिरेक्यास यमसदनी धाडले होते. तो अतिरेकी बी. एस. एफ. च्या बंकर वाहनावर चढून वाहनात ग्रेनेडस टाकण्याच्या अगदी बेतात असतानाच मनदीप यांनी त्याला ठोकले होते. त्यावेळच्या चकमकीत कॅप्टन तरुण कुमार (मरणोत्तर कीर्ती चक्र) आणि त्यांचे सिग्नलमन श्री. सावंत यांना वीरगती प्राप्त झाली होती. तो आणि असे अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी होते. पुढे राहून नेतृत्व करणारा हा शूर अधिकारी होता. मर्यादित शस्त्रे आणि प्रचंड संख्येने चालून आलेला शत्रू… परिस्थिती भयावह होती.

जखमी झालेल्या कनिष्ठ सैनिक अधिकाऱ्याची जागा घेण्यासाठी ते धावत असताना त्यांच्या पोटात, छातीत ग्रेनेडचे तुकडे घुसले… पण तरीही ते थांबले नाहीत. त्यांनी इतर सैनिकांना भराभर सूचना देत स्वत: गोळीबार आरंभला.

यात एक गोष्ट आपल्या बाजूची ठरली.. ती म्हणजे पहाऱ्यावर असलेल्या एका सैनिकाजवळ रणगाडा भेदी rocket launcher होता! त्या जांबाज बहादाराने त्या तेवढ्या धुमश्चक्रीत ते शस्त्र चालवले… अतिरेक्यांना त्या शस्त्राची बहुदा कल्पना नसावी. त्या तोफगोळ्याच्या आवाजानेच अतिरेकी हादरून गेले आणि त्याच्या स्फोटात पुढे आलेल्या काही अतिरेक्यांचे तुकडे झाले.

अतिरेकी पांगले. पण तीन अतिरेकी मात्र OUTPOSTच्या आतील भागापर्यंत पोहोचले. त्यातील एकाकडे दोन ग्रेनेड्स होते. पण त्यादिवशी outpost मध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडून एके ४७ रायफल जमा करण्याचे चुकून राहून गेलेले होते! 

सैन्यातील प्रत्येकाला शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. त्याचा फायदा झाला. या सफाई कर्मचाऱ्याने एके. -४७ अचूक चालवली. त्या अतिरेक्याच्या हातातील दोन्ही ग्रेनेड्स त्याच्या हातातच फुटले आणि ते तिघेही ठार झाले! 

पूर्ण शरीर रक्ताने माखलेले असताना कंपनी कमांडर कॅप्टन मनदीप यांनी रायफल चालवली. सैनिकांना मार्गदर्शन करीत राहिले. त्यांनी आणि साथीदार सैनिकांनी खूप अंधार असतानाही केवळ उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर अचूक गोळीबार केला. तब्बल २६ अतिरेकी ठार मारले! 

एका छोट्या OUTPOST वर केला गेलेला हा मोठा हल्ला होता. त्यामुळे आपल्या सैनिकांनी बलिदान आणि उत्तरही मोठेच दिले! नायब रिसालदार नरेंदर सिंग, नाईक मिथिलेश पाठक, सोवार सोहन सिंग सोलंकी यांनीही शौर्य गाजवीत वीरगती पत्करली. अतिरेक्यांच्या हल्याची ही योजना पाकिस्तानी स्पेशल सर्विस ग्रुप (एस. एस. जी. )च्या, भारतात घुसखोरी केलेल्या एका अधिकाऱ्याने आखून दिली होती असं म्हटलं जातं!

१९ मे, १९६९ रोजी जन्मलेले मनजीत सिंग ६ ऑगस्ट, १९९९ रोजी, वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी हुतात्मा ठरले! महाविद्यालयीन जीवनात ते उत्तम शरीरसौष्ठवपटू, मिस्टर पंजाब, मिस्टर जालंधर या स्पर्धांत सहभागी होते. कारगिल युद्धाच्या धामधुमीत कॅप्टन मनजीत सिंग यांचे हे बलिदान काहीसे दुर्लक्षित राहिले असल्याची शक्यता आहे. त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले! 

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares