(ई-अभिव्यक्ति में श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’ जी का स्वागत। पूर्व शिक्षिका – नेवी चिल्ड्रन स्कूल। वर्तमान में स्वतंत्र लेखन। विधा – गीत,कविता, लघु कथाएं, कहानी, संस्मरण, आलेख, संवाद, नाटक, निबंध आदि। भाषा ज्ञान – हिंदी,अंग्रेजी, संस्कृत। साहित्यिक सेवा हेतु। कई प्रादेशिक एवं राष्ट्रीय स्तर की साहित्यिक एवं सामाजिक संस्थाओं द्वारा अलंकृत / सम्मानित। ई-पत्रिका/ साझा संकलन/विभिन्न अखबारों /पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। पुस्तक – (1)उमा की काव्यांजली (काव्य संग्रह) (2) उड़ान (लघुकथा संग्रह), आहुति (ई पत्रिका)। शहर समता अखबार प्रयागराज की महिला विचार मंच की मध्य प्रदेश अध्यक्ष। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा – दिखावा।)
डी जे की धुन पर कुछ लोग नाच गा रहे थे और कुछ लोग कुछ लजीज व्यंजनों का आनंद ले रहे थे।
नवरात्रि का पहला दिन था, पास में माता का पंडाल भी लगा हुआ था। अचानक बहुत सारे लोग उसे पंडाल में आ गए और डांस फ्लोर पर डांस करने वालों की संख्या इतनी बढ़ गई कि ज्यादातर लोग नीचे ही थिरकने लगे। एक तरफ पटाखे चलने लगे।
वहाँ काम करने वाले दो किशोरवय लड़के आपस में बात करने लगे।
एक ने कहा “नए साल के आने पर इतनी खुशी की क्या बात है? मां दुर्गा की मूर्ति स्थापित की है। नया साल हो या नवरात्रि, हमें तो रोज यही साफ सफाई का काम करना है। अच्छा है, हमें काम मिल जाता है।”
दूसरे लड़के ने जवाब दिया- “बड़ी पार्टी है, इनका शहर में बहुत बड़ा शोरूम है, देर तक काम करेंगे, तो मालिक से कुछ पैसे ज्यादा मांग लेंगे, हमारे लिए तो यही खुशी की बात हो जाएगी।”
तभी अचानक पटाखे की आवाज से पास खड़ी एक बुजुर्ग महिला के हाथ से एक कांच का ग्लास टूट जाता है। डांस करते हुए सभी लोग एक दूसरे के ऊपर गिर जाते हैं कुछ को कांच लग जाते हैं, भाग दौड़ मच जाती है, लोग इधर-उधर भागने लगते हैं।
वे दोनों लड़के कहते हैं चलो मित्र तुम सब्जी उठा लो और मैं पूड़ी यह दोनों बड़े पतीले उठा कर घर चलते हैं पैसे तो नहीं मिलेंगे।
हम दोनों के परिवार के लोग मिलकर नव वर्ष मनाएंगे।
घर चलकर आरती करके माँ दुर्गा की आराधना करेंगे।
बड़े लोग ऐसे ही नव वर्ष मनाते हैं इसीलिए यह हुआ है?
दूसरे ने कहा दोस्त ठीक बोल रहे हो सच्चे दिल से मन की प्रार्थना करनी चाहिए दिखावे में यही हाल होता है।
☆ “यशामागे काही रहस्य वगैरे नसते…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
काल खूप दिवसांनी सागर भेटला. मला आवडतो तो मुलगा. खूप positive एकदम शांत. मी त्याला गुरुजीच म्हणते कारण तो माझे मोबाईल चे सर्व doubts शांतपणे clear करतो. नेहमी प्रोत्साहन देतो.
काकू येईल तुम्हाला, असं म्हंटल की माझा पण उत्साह वाढतो.
एका कंपनीचा मालक आहे तो. त्याचे चांगले दिवस खूप कष्टानंतर आले आहेत. स्पष्ट ध्येय, कष्ट, धैर्य, clear thought process व घरच्यांचा सहयोग, हीच यशाची गुरुकिल्ली आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
चांगली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वतः चा व्यवसाय सुरू करणे, ही धमक आजकाल नवीन मुलांमधे दिसते. त्या प्रवासात येणारे चढ- उतार calculated risk लक्षात घेतलेली असतेच. तरीही सर्व आपण विचार केल्याप्रमाणेच होते असे नसते ना. दुसरे, म्हणजे स्थिरस्थावर व्हायला किती वेळ लागेल?? हे निश्चित नाही. आयुष्याची तरुणाईची महत्वाची वर्षें तीच, कामाची तीच, परिवाराची मजा करायची वेळ पण तीच. म्हणजे संकल्प, त्याग, घरच्यांचे सहकार्य तर हवेच. बरोबर आयुष्याच्या गणिताकडे पण लक्ष द्यायचे आहे. सर्व गोष्टींचा balance सांभाळुन काम करायचे. कुठे थांबायचे ?? कुठे रेघ ओढायची ???हे समजले पाहिजे. व तसे वागताही आले पाहिजे. कुठे लक्ष द्यायचे ??व कुठे दुर्लक्ष करायचे ??हे ही ठरविता आले पाहिजे. पडलो तर उठून उभा राहिन ही धमक व आत्मविश्वास पाहिजे. व अशा वेळेस घरच्यांचा विश्वास व आधार हवाच. .
काही लोकांना सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करून त्यांची क्रमवार मांडणी करता येते. तीच यशाची पहिली पायरी असते असं नाही की ते खूप हुशार असतात. पण त्यांना हे नक्की माहित असतं. केंव्हा काय करायचे.
विचार स्पष्ट असले व स्वतः वर विश्वास असला तरच ते करता येते. दुसरं म्हणजे यश आणि अपयशाकडे बघायचा त्यांचा योग्य दृष्टिकोन असतो. यशाची कारणे व अपयशाचे बरोबर विश्लेषण करता येते त्यांना. अशी माणसे blame game खेळत नाही. सर्व जबाबदारी स्वतः वर घ्यायची हिम्मत ठेवतात. लहान सहान गोष्टींवर लक्ष देत नाही. व घाबरत तर त्याहून नाही. कोणाचे ऐकायचे व कोणाचे नाही हे त्यांना छान जमते.
यशस्वी माणसे खूप चतुर असतात. ते focussed असतात. शिस्तप्रिय असतात. कोणत्याही कामात मदत लागतेच, तेंव्हा योग्य लोकांची निवड करणे हे महत्त्वाचे, कारण आयुष्याला चांगले वळण मिळायला चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या माणसांची गरज असते.
टीम management, योग्य कार्य पध्दती, कर्मचाऱ्यांचे आपापसातील संबंध, थोडक्यात आपल्या टीम ला एक मोठा परिवार समजून ज्याला काम करणे जमते, तो अर्धी लढाई तर तेथेच जिंकतो.
रोज रात्री दुसऱ्या दिवशी चे planning व दिवस संपला की त्याचे विश्लेषण ही सवय असली, तर वेळ वाया जात नाही. व योग्य दिशेने प्रवास होतो. विचारांना योग्य दिशा देता येते. सर्वात सुक्ष्म पण ताकदवर काही असेल तर ते आपले विचार असतात. परिवर्तन आणण्याची अफाट शक्ती असते त्यांच्यात. संधी चालून येत नसते. ती शोधायची असते व मिळताच त्याचे सोने करता आले पाहिजे.
सर्व सामान्य माणसांची परिस्थिती साधारण सारखीच असते. झेप घेण्याची तयारी, मेहनत करण्याची प्रबळ इच्छा असली तर कदाचित वेळ लागेल पण यश नक्कीच. मिळते.
गीतेतही सांगितले आहेच जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल.
आजचा दिवस चांगला जाणार या विचाराने जर दिवसाची सुरवात केली तर कठिण प्रसंगाचा सामना करायचे बळ आपल्या विचारांतच मिळते.
आज सागर बरोबर गप्पा मारताना चर्चेत बऱ्याच गोष्टी कळल्या. ‘ Positivity ‘ खऱ्याखुऱ्या अर्थाने समजली नवीन पिढी बद्दलचा माझा आदर अजूनच वाढला.
नवीन पिढी हुषार आहे. त्यांचे विचार, risk घेण्याची तयारी, आपल्या कामाचे ज्ञान व अभ्यास खरच कौतुकास्पद आहे.
बदलत्या जगाबरोबर धावणे जमते त्यांना. आपला मार्ग ते स्वतः आखतात. अनुभवाने श्रीमंत होतात. अशी मुले रोज नव्याने आयुष्य जगतात.
सागर सारखी मुले सध्या चालू असलेल्या ‘आत्मनिर्भर भारत ‘ या मोहिमेत आपले योगदान देत आहेत.
“जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी ही थांबवू शकत नाही.”
म्हणतात ना
“यशामागे काही रहस्य वगैरे नसते. प्रचंड कष्ट व योग्य नियोजन आणि अपयशातून जिंकायची वृत्ती त्यातुन हे साध्य करता येते.”
शब्दांची जाणीव झाली आणि ग्लानीमध्ये तिच्या डोळ्यावर आलेली झापड अंमळ ओसरल्यासारखी झाली.
‘कोण बोलले हे?’ तिच्या तोंडून शब्दफुटणे तर शक्यच नव्हते; मनातच विचार आला अन् होता होईल तितके डोळे किलकिले करून तिने आजूबाजूला पाहायचा प्रयत्न केला.
तिच्या देखभालीसाठी ठेवलेली रुग्णसेविका खोलीतल्याच दुसऱ्या शेजेवर शांत झोपली होती. तिथे दुसरे कोणी नव्हतेच. मुलगी देखील शेजारच्या खोलीत झोपली असणार! खोलीत अगदीच अंधार नको, थोडातरी उजेड असावा म्हणून लावलेला मिणमिणता दिवा खोलीत जी काही जाग ठेवत होता तेवढीच! बाकी खोली अगदीच सुमसाम होती.
‘मग कोण बोलले हे?’ पुन्हा तिच्या मनातील विचारांनी जीभेपर्यंत जायचा केविलवाणा प्रयत्न केला; पण आता या अवस्थेत तिची सगळीच इंद्रिये काहीही कार्य करण्याच्या पार पलीकडे गेली होती. तो विचार तिच्या मनातल्या मनातच रुंजी घालू लागला.
‘मीच ग; विसरलीस मला?’ आणि तिला जाणवले की हे शब्द नाहीत, विचार आहेत.
‘तू?’ तिच्या विचारांना आता काहीतरी दिशा सापडली; पण दिसत तर काहीच नव्हते. आता तर डोळे किलकिले करणे देखील शक्य होत नव्हते. ‘तुला जाऊन तर…… ’
‘काही वर्षे झाली, असंच ना?’
पुन्हा तिच्या अंतर्मनाला जाणीव झाली.
‘हो!’
‘पण मला नाही जाववत तुला सोडून. ’
‘कुठे आहेस तू?’ विचार जाणवले आणि त्या बेभान अवस्थेतही ती अंतर्यामी हादरली. ‘मला दिसत कसा नाहीस?’
‘दिसेन कसा ग वेडे? मला आता देह कुठे आहे?
‘मग?’ तिच्या मनातील गोंधळ वाढतच होता.
‘अशी गोंधळून जाऊ नकोस; आणि तुझ्या डोळ्यांनी मला पाहायचा निष्फळ प्रयत्नही करू नकोस. तुझ्या समोरच्याच भिंतीवर चार फुट वरती तुझे आज्ञाचक्र केंद्रित कर. ’
‘पण कसे?’ ती आणखीनच बुचकळ्यात पडली. ‘मला तर जागेवर देखील हलता येत नाही. ’
‘तू अजिबात हळू नकोस; अन् ते तुला शक्यही होणार नाही. तू फक्त तुझे लक्ष्य मी सांगितले तिथे केंद्रित कर. ’
आता तिच्या लक्ष्यात आले, हे शब्द नाहीत, विचार आहेत. आपल्या मनातले विचार त्याला समजतायत. म्हणजे हे केवळ विचारसंक्रमण!
क्षणार्धात तिने आपले ध्यान समोरच्या भिंतीवर लावले; अन् तिला तिथे जाणवले एक केशरी तेजाचे वलय.
‘आता तरी ओळखलंस?’ विचार त्या तेजोवलयापासूनच येत आहेत याची तिला जाणीव झाली.
‘तुला कसं रे विसरेन मी?! तू तर माझं आयुष्य होतास, सर्वस्व होतास – अजूनही आहेस!’ अचानक तिच्या विचारात देखील भावनांचे कढ भरून आले.
‘हो ग राणी, मला कल्पना आहे त्याची, ’ त्या तेजोवालयात किंचीतशी नारिंगी छटा तिला जाणवली. ‘पण आता काही वर्षे झाली………… ‘
‘तरीही अजूनही तूच आहेस माझ्या अंतर्यामी, ’ हळूहळू आपण तरंगतोय असे तिला जाणवायला लागले; अन् क्षणार्धात आपण त्या तेजोवालायाच्या अगदी समीप पोहोचल्याची जाणीव तिला झाली. नकळतच तिने खाटेकडे लक्ष नेले. तिचा देह तिच्या खाटेवर निपचित पडला होता; मोठ्या कष्टाने जी काय श्वासोच्छवासासाठी छातीची हालचाल होत होती तेवढीच!
अन् तिला जाणवले की आपल्या सूक्ष्म देहाने आपण जडदेहातून बाहेर पडून त्याच्या सूक्ष्म देहाजवळ आलो आहोत. मात्र तिला त्या जडदेहाकडे अधिक वेळ बघवेना. तिने आपले अंतर्चक्षु त्याच्या सूक्ष्मदेहाकडे वळवले.
‘अजून मोहापासून मुक्ती मिळत नाही ना?’ त्याचे विचार पुन्हा तिला जाणवले. ‘जरा तुझ्या देहाकडे पहा; तुझा रजतरज्जू किती क्षीण झालाय पहा. बहुतेक सगळा काळाच पडलाय; जेमतेम एखाददुसराच धागा तग धरून आहे आता. ’
‘कळतय मला ते सगळ; आता किती काळ राहिलंय या देहाचा भोग देव जाणे!’
‘पण मोह सुटत नाही ना?!’
‘कसला मोह?’
‘या देहाचा, जगण्याचा, मुलांचा, घराचा, सगळ्या सगळ्याचा, ‘ त्याने त्याच्या प्रश्नात अधिक सुस्पष्टता आणली.
‘खर सांगते, विश्वास ठेव माझ्यावर; तू आम्हाला सोडून गेलास तेव्हापासून कशातच मन रमत नाही माझं, ’ तिच्या विचारातील कातरता त्याच्या सूक्ष्मदेहाला जाणवायला लागली. ‘तुझ्या पाठोपाठ खरतर लगेचच मला ही यायचे होते. पण तू काही जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवून गेला होतास ना; माझ्याकडून मृत्युशय्येवर असतांना वचन घेतले होतेस की त्या जबाबदाऱ्या पूर्ण करेपर्यंत तग धरून राहशील म्हणून. ’
‘काय करणार ग मी तरी? अचानकच काळाने माझा घास घेतला, ’ त्याचे विचार पुनश्च भूतकाळात गेले. ‘मुलाला नोकरी लागायची होती. तरी त्याने माझ्या कडे पाहून लग्न तरी केले. अजून नातवंड घरात यायची होती. मुलीलाही उजवायाचे होते. ही सगळी माझी कर्मे होती. पण काळापुढे कोणाचे काय चालते! मग हे सगळे तुझ्याखेरीज दुसऱ्या कोणाला सांगू शकणार होतो मी हक्काने?’
‘कल्पना होती मला साऱ्याची, ’ त्याच्या सूक्ष्म देहाला ग्रासू पाहणारी जांभळट छटा तिला जाणवू लागली. ‘ती सगळी कर्तव्ये मी पूर्ण केली. आता का असा निराश होतोस?’
‘निराश नाही ग, ’ जांभळटपण जाऊन त्याचा सूक्ष्मदेह पुनरपि नारिंगी झाला. ‘घराच्या जबाबदाऱ्यांबरोबरच तू जे काही समाजकार्य करत होतीस त्याने मी अभिमानाने फुलून येत होतो. तू निवृत्त झाली होतीस तरी देखील तुझ्या ज्ञानाचा तू समाजाला अविरत फायदा करून देत होतीस. ’
‘ज्ञान हे देण्यासाठीच असते ना!’ तिच्या विचारात देखील संतृप्तता जाणवत होती. ‘गेली काही वर्षे मला विविध संस्थांच्या बैठकींना जाणे प्रकृतीमुळे जमले नाही; पण त्यांच्या शब्दाचा मान ठेवून मी कॉम्प्यूटरवरून त्यांच्या मिटींग्स मध्ये सहभागी होत होते. पण चार महिन्यांपूर्वी मिटिंग चालू असतांना मी घरातच खुर्चीवरून खाली पडले अन् मग मात्र मी अगदी मनाविरुद्ध त्यातून देखील निवृत्त व्हायचा निर्णयघेतला. ’
‘त्या सगळ्यांना तुझ्या सहकाराची जाणीव अजूनही आहे पण, ’ त्याच्या विचारात देखील तिच्याविषयीचा अभिमान तिला जाणवला; ती मोहरून आली. ‘म्हणून तर तू मृत्युशय्येवर असून देखील ते तुला भेटायला वरचेवर येत असतात. ’
‘ते काम आता मी करू शकत नाही याचे वैषम्य मात्र अजूनही आहे, ’ आपल्या कामावरची श्रद्धा तिच्या तेजोवलयात जाणवली.
‘अखेर प्रत्येकाचा कर्मयोग केव्हातरी संपणारच असतो. भगवान श्रीकृष्ण काय किवा प्रभू रामचंद्र काय; अगदी अलीकडच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज काय, त्यांचा कर्मयोग संपल्यावर त्यांना आपापल्या देहाचा निरोप घ्यायला लागलाच ना! संपूर्ण कौरवांना एकट्याने हरविणारा, भगवान शंकरांशी देखील तुल्यबळ युद्ध करणारा अद्वितीय योद्धा अर्जुन त्याचा कर्मयोग संपल्यावर काही गुराख्यांच्याकडून युद्धात हरलाच ना!’
‘हो ना! कर्मयोग तर संपलाय, ’ आता तिच्या सूक्ष्मदेहावर अंमळ मरगळ जाणवू लागली. ‘आता असं किती दिवस पडून राहायचंय देव जाणे. ’
‘ते तुझ्यावरच अवलंबून आहे, ’ तो पुन्हा पूर्वपदावर आला. ‘म्हणून तर विचारले अजून मोह सुटत नाही का?’
‘मोह? तो तर केव्हाच संपलाय! केव्हापासून तुझ्याकडे यायला मन आसुसलय. पण काय करणार दिवस तर भरायला हवेत! योग आहेत तोंवर देह सोडून तर चालणार नव्हते, ’ ती आपली बाजू त्याला समजावून सांगू लागली. ‘नाही तर केवळ उरलेले दिवस भरून काढण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायचा आणि बालवयातच आपल्या मात-पित्याला अपत्यवियोगाचे दुःख देऊन जगाचा निरोप घ्यायचा! म्हणजे पुन्हा पुढच्या जन्माची बेगमी! नाही; या जन्माचे जे भोग आणि योग आहेत ते याच जन्मात भोगून संपवायला हवेत. ’
‘आता तू सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून मोकळी झाली आहेस. सामाजिक जबाबदाऱ्या काय कधीच संपत नाहीत. पण आता तुझ्याच्याने नाही होणार काही, अगदी मनात असले तरी देखील, ’ त्याने तिला परिस्थितीची संमिश्र जाणीव करून दिली. ‘जरा तुझ्या रजतरज्जूकडे पहा; किती खंगलाय तो. ’
तिचे लक्ष पुन्हा एकदा रजतरज्जूकडे गेले आणि ती शहारलीच! जेमतेम एखाददुसरा धागा सोडला तर संपूर्ण रजतरज्जू निस्तेजला होता, काळवंडला होता. तिच्यातून पुन्हा एक मोठा थरकाप उठला. आणि तो थरकाप तिच्या जडदेहापर्यंत पसरला.
अंथरुणावर निपचित पडलेल्या तिच्या देहाला अचानक काय झाले? त्या अशा थरथर का कापत आहेत?
शेजारीच पहुडलेली रुग्णसेविका हडबडून उठली. रुग्णाकडे नजर टाकल्यावर तिला काही चिन्ह बरी वाटेनात. घाईघाईने तिने रुग्णाच्या मुलीला शेजारच्याच खोलीतून बोलावून आणले. मुलीला देखील आता आपली आई काही क्षणांचीच सोबतीण आहे हे जाणवले. मोठ्या त्वरेने तिने आपल्या भावाला आणि वाहिनीला बोलावले आणि देवघरातील गंगाजलाचा कलश घेऊन ती आपल्या आईपाशी आली.
‘आता देहत्याग करायलाच हवा; नाही सोसवत आता हे जिणे, ’ तिचे विचार त्याच्या सूक्ष्मदेहाला जाणवू लागले. ‘मोह तर केव्हाच सुटलाय; पण तरीही आता शेवटचे कर्तव्य म्हणून गंगाजलाचे दोन घोट तोंडात घेते, एकदाच अखेरचे सगळ्यांकडे चर्मचक्षुंनी नजर टाकते आणि येतेच. ’
मोठ्या कष्टाने रजतरज्जू सांभाळत सांभाळत तिच्या सूक्ष्मदेहाने आपल्या जडदेहात प्रवेश केला. बाजेवरच्या देहातला फरक तिच्या मुलीला देखील जाणवला. इतका वेळ अगदी निपचित पडलेल्या देहात थोडीशी धुगधुगी तिला जाणवू लागली.
‘आई, ’ अगदी हलक्या अस्फुट स्वरात मुलीची हाक तिच्या कानावर आली. ‘तोंड उघडतेस?’
नकळतच तिने आपले दोन्ही ओठ अंमळ विलग केले. मुलीने त्यात ओतलेले गंगाजलाचे थेंब तिच्या तोंडात गेले. तरीही ते थेंब घशातून गिळायचे त्राण काही तिच्यात शिल्लक नव्हते. आता आपल्या या देहाच्याने झाली तर केवळ एखादीच हालचाल होऊ शकेल याची कल्पना तिला आली.
बहिणाबाईंनी मानवीमन अचूक ओळखलं आहे. मन असंख्य कल्पना सतत करत असतं. मनात विचार येणं नैसर्गिक आहे. त्या विचारांच्या दिशेने कृती केली जाते ऐच्छिक कर्माचे एक वैशिष्ट्य आहे, कर्म करावे वाटते, त्यानुसार कर्म करावेही वाटते पण सहेतुक ! काहीतरी मनात विशिष्ट विचार ठेवूनच कृती केली जाते त्यामुळे त्या कृतीचा परिणाम ही आवश्यक असतो व तो मिळतो ही! प्रश्न असा आहे की आलेला परिणाम मनाला कधी आवडतो कधी आवडत नाही. आवडणारा परिणाम त्या व्यक्तीचा अहंभाव पुष्ट करतो व नावडता परिणाम त्याला दुखावतो. विचार व कर्माची ही शृंखला अव्याहतपणे सुरू असते सोबतच सुख व दुःखही मिळत रहातात. थोडासा जरी विचार केला तर हे सुख असो की दुःख काहीच टिकाऊ नाही. सुखामागे दुःख व दु:खामागे सुख सुरुच असते त्यामुळे समाधान मात्र दूर रहाते. विचार व कृती ही धावपळ घडवतात त्यामुळे समाधान मिळत नाही. मनाचा गुणच संकल्प विकल्पाचा आहे. म्हणूनच बहिणाबाईंनी मनाला ओढाळ म्हंटले आहे. कुठेही न थांबता केलेले विचार व त्यानुसार कृती दमछाक करवतात व व्यक्ती थकून जातो.
सत्याचा शोध घेतल्याशिवाय ही दमछाक थांबणार नाही असे सांगत समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिलेत. ज्यात मनाला आधीच सज्जन संबोधून त्याच्यावर समाधान मिळवण्याची जबाबदारी टाकली. द्वाड म्हणून हेटाळणी न करता सज्जन म्हणून सन्माआन केला व त्या सन्मानाला पात्र होण्यासाठी काय करावे हा समुपदेश केला. ओढाळ मनाला शांत प्रशांत प्रसन्न करण्यासाठी ज्ञान दिले स्वतः चेच!मी कोण आहे हे कळणे प्राथमिकता ठरवली. देव कोण आहे हे सांगत आपलाच विस्तार सांगितला. आपण त्याचे अंश आहोत हे जर जाणवले तर त्याचे गुण अंगिकारणे परम कर्तव्य आहे फक्त त्यामुळेच सुख दुःखाचे हे दुष्टचक्र थांबू शकते अन्यथा पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं ही मालिका सुरूच राहील व आपला मूळ स्वभाव आनंदी आहे हे कळणारच नाही.
मनाचा उपयोग समाधान मिळवण्यासाठी करायचा असेल तर हदयाची विशालता त्याला समजावी लागेल तरच स्वतः ची मर्यादा मन ओळखू शकेल व शाश्वत समाधानासाठी स्वतः चे विचार व त्यानुसार कृती थांबवेल. मनाचा गोंधळ थांबल्याशिवाय हृदयातील शांती मिळणार नाही हे पटले की काम झाले!
मनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे त्याला जर एखादी गोष्ट पटली की मग त्याला काहीही करताना त्रास वाटत नाही. वाटणेच तर घात करते किंवा समाधान देते त्यामुळे ओढाळ मनाला तू मर्यादित नसून अमर्याद आहे असे पटले की अमर्यादाची म्हणजेच देवाची तळमळ लागते. अमर्याद कृती त्याच्याकडून विनासायास घडतात त्याही अपेक्षा विरहित व “इदं न मम”म्हणत!
आधीच सज्जन म्हणून सज्जनासारखी कृती करवून घेणारे स्वामी म्हणूनच समर्थ आहेत.
समर्थ भेटण्यासाठी आपली तशी ओढ आवश्यक आहे. जशी तळमळ असेल तसेच सद्गुरू करवून घेतात यावर ठाम निष्ठा असणे मात्र आपले काम आहे जे मनाद्वारे केले जाते. म्हणून मनावर लक्ष ठेवणे हा समाधानाचा पाया आहे.
ती आणि तो रेल्वेने बडोद्याहून मुंबईला परत चालले होते. त्याने नुकतेच भरूचचे खारे शेंगदाणे विकत घेतले होते, शेंगदाणे खात गप्पा चालू होत्या आणि बोलताबोलता चर्चा “सुख” आणि “समाधान” या विषयाकडे आली.
“दोन्ही एकच आहेत की, ” तो सांगत होता.
ती हळूच हसली, आणि म्हणाली, “नाही, फरक आहे. आज ज्या गोष्टीचे सुख वाटते, उद्या त्याच गोष्टीने दुःख वाटू शकते की.
गेल्या आठवड्यापर्यंत आपल्या शेजारणीला तिच्या ४३ इंची टीव्हीबद्दल अभिमान वाटत होता, असा मोठ्ठा टीव्ही आपल्याकडे असल्यामुळे तिला आपण सुखी आहोत असे वाटत होते. पण तेच काल रमेशभाईंकडचा ५५ इंची टीव्ही पाहिल्यावर तिला दुःख झाले, ” ती सांगत होती.
“सुख – दुःख या अस्थिर कल्पना आहेत, त्या नेहमी तुलनात्मक असतात. सुख हे तात्पुरते असते, आपल्या मनासारखं अमुक अमुक घडलं, की आपल्याला सुख मिळते.
याउलट, समाधान ही आंतरिक भावना आहे, समाधानासाठी आपण बाह्य घटनेवर अवलंबून नसतो. ” ती बोलत होती, पण त्याचे तिच्याकडे लक्षच नव्हते.
मगाशी १२० रुपयाचे शेंगदाणे १०० रुपयाला मिळाल्याबद्दल ते जाम खुश होता, आपल्याला भरुचचे प्रख्यात दाणे स्वस्तात मिळाले ही कल्पना त्याला सुखी करून गेली होती, पण आता तोच शेंगदाणेवाला, तेच शेंगदाणे १०० रुपयांना दोन पाकिटे या दरात विकत होता, आणि आपण मगाशी, घाई करून ते शेंगदाणे १०० रुपयांना घ्यायला नको होते असं आता त्याला वाटत होतं.
सुख आणि समाधान यातला फरक त्याला चांगलाच समजला होता.
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
पद्मविभूषण श्री दत्तात्रेय उर्फ काकासाहेब कालेलकर यांनी कविवर्य ‘ऋग्वेदी’ यांच्या ‘अभंग गीतांजली’ (टागोर यांच्या ‘गीतांजली’चा मराठी भावानुवाद) साठी लिहिलेल्या प्रस्तावनेतील वेचक भाग आपल्या माहितीसाठी आज प्रस्तुत करीत आहे.
श्री काकासाहेब कालेलकर हे थोर स्वातंत्र्यसेनानी, म. गांधींचे अनुयायी व सहकारी, थोर समाजसेवक, मराठी, गुजराती, हिंदी व इंग्रजी भाषांतील साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, अनेकविद्यापीठांचे कुलगुरू असले तरी तेकविवर्य ‘ऋग्वेदी’ यांचे एके काळचे विद्यार्थी होते व रविंद्रनाथ टागोरांबरोबर शांतिनिकेतन मध्ये राहिले असल्यामुळे त्यांच्यामधील माणूस व कवी यांना जवळून ओळखणारे होते; याच कारणांमुळे त्यांनी ‘ऋग्वेदी’ यांच्या ‘अभंग गीतांजली’स प्रस्तावना लिहिण्याचे मान्य केले असावे.
कालेलकर लिहितात, “गीतांजली मध्ये टागोरांनी परमात्म्याला हृदयापासून साद घातली आहे. आपल्या हृदय सागरात भरती /ओहोटी, लहान मोठ्या लाटांचा महोत्सव अखंड चालूच असतो आणि जोपर्यंत असे आहे तोपर्यंत गीतांजली सारख्या हृदय काव्याची आवश्यकता मनुष्याला असणारच. गीतांजली वाचत असताना आपण काव्यसुख घेत आहोत असा अनुभव येत नाही तर हृदयाला दिव्य आहार मिळत आहे, पौष्टिक रसायन पोहोचत आहे, असे वाटते. म्हणूनच गीतांजली हा ग्रंथ जगाच्या धार्मिक साहित्यात कायमचे स्थान मिळवणार आहे याविषयी शंका नाही. ”
“रवींद्रनाथांनी मानसशास्त्र आणि समाज शास्त्र यामध्ये खूप खोल उतरून कवित्वाचा एक नवाच आणि कष्टसाध्य असा आदर्श आपल्यापुढे ठेवला आहे. या कवीने भारतीय संस्कृतीच्या अंगप्रत्यंगाचे आकलन केलेले असले पाहिजे. प्रेम भावना आणि धर्म भावना यांचे रहस्य त्याला अवगत असले पाहिजे. कोणत्याही कवी मध्ये अद्भुत वशीकरण विद्या असते. तो परिचित आणि अपरिचित सर्वच लोकांचे हृदय काबीज करतो. आणि जणू कांही त्याची ही मोहिनी विद्या पाहूनच सरस्वती देवी त्याला वाचाशक्तीचे वरदान देते. जो भाव व्यक्त करावयाचा असेल त्याला अनुरूप असे शब्द जणू कांही आपोआप न बोलावता येऊन उभे राहतात. एकही शब्द प्रयत्नपूर्वक आणून बसवला असेल अशी शंका देखील मनात येत नाही. तद्वतच या विभुतीने मनुष्य जीवनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच त्यांच्या वाणीमध्ये आत्मविश्वास, सामर्थ्य आणि व्यापकता आली आहे. टागोरांनी कवित्वाचा एक महान आदर्श जगापुढे मांडला आहे. “
“रवींद्रनाथांची प्रतिभा जितकी स्वतंत्र आहे तितकीच ती आर्य संस्कृतीचे परिपक्व फळ आहे. त्यांच्या लेखात, भाषणात, कवितेत आणि नाटकात हिंदुस्थानातील साहित्याच्या उत्तमांशाची छाप स्पष्ट दिसते. भास, कालिदास यांचा हा कवी वारस आहे, हे ओळखावयास फारसे परिश्रम पडत नाहीत. हिंदुस्थानच्या संत कवींच्या साहित्याचे त्यांनी आकंठ पान केले आहे; याची गीतांजलीतील कोणतेही पद्य साक्ष देऊ शकेल. उपनिषदे, बौद्ध वाङ्मय, वैष्णव संप्रदायाचे साधुसंत आणि महर्षी देवेंद्रनाथ अशा अनेक तत्वज्ञांची छाप रवींद्रनाथांच्या काव्यावर पडलेली दिसते. “
“गीतांजलीत सर्वत्र आर्य भावनाच दिसून येते. गीतांजली ही एक कवी वृत्ती नसून एक सबंध संस्कृतीच आहे. येथून तेथून सर्वत्र ईश्वरभक्ती, ईश्वरनिष्ठा आणि मांगल्याचीच उपासना या कवितांमधून दिसून येते. “
शांतिनिकेतन मध्ये असताना एके दिवशी काकासाहेब त्यांना म्हणाले, ” गुरुदेव, आपल्याकडून काही बोध ऐकावा अशी माझी इच्छा आहे. ” तेव्हा टागोर म्हणाले, “मी कवी आहे. कवीची वृत्ती हीच माझी साधना! मी कोणाचा गुरु होऊ शकत नाही. “
अशा यानिरभिमानी, निरलस, व निरुपाधिक महाकवीस सादर प्रणाम!
—–
☆ गीत : ४९ ☆
YOU came down from your throne and stood at my cottage door.
I was singing all alone in a corner, and the melody caught your ear. You came down
and stood at my cottage door.
Masters are many in your hall, and songs are sung there at all hours. But the simple carol of this novice struck at your love. One plaintive little strain mingled with the great music of the world, and with a flower for a prize you came down and stopped at my cottage door.
I HAD gone a-begging from door to door in the village path, when thy golden chariot
appeared in the distance like a gorgeous dream and I wondered who was this King of all kings!
My hopes rose high and me thought my evil days were at an end, and I stood waiting for
alms to be given unasked and for wealth scattered on all sides in the dust.
The chariot stopped where I stood. Thy glance fell on me and thou earnest down with a smile. I felt that the luck of my life had come at last. Then of a sudden thou didst hold out thy right hand and say “What hast thou to give to me?”
Ah, what a kingly jest was it to open thy palm to a beggar to beg! I was confused and
stood undecided, and then from my wallet I slowly took out the least little grain of corn and gave it to thee.
But how great my surprise when at the day’s end I emptied my bag on the floor to find a least little grain of gold among the poor heap. I bitterly wept and wished that I had had the heart to give thee my all.
THE night darkened. Our day’s works had been done. We thought that the last guest
had arrived for the night and the doors in the village were all shut. Only some said, The king was to come. We laughed and said “No, it cannot be!”
It seemed there were knocks at the door and we said it was nothing but the wind. We put out the lamps and lay down to sleep. Only some said, “It is the messenger!” We
laughed and said “No, it must be the wind!”
There came a sound in the dead of the night. We sleepily thought it was the distant
thunder. The earth shook, the walls rocked, and it troubled us in our sleep. Only some said, it was the sound of wheels. We said in a drowsy murmur, “No, it must be the rumbling of clouds!”
The night was still dark when the drum sounded. The voice came “Wake up! Delay not! “We pressed our hands on our hearts and shuddered with fear. Some said, “Lo, there is the king’s flag!” We stood up on our feet and cried “There is no time for delay!”
The king has come but where are lights, where are wreaths? Where is the throne to seat him? Oh, shame! Oh utter shame! Where is the hall, the decorations? Some one has said, “Vain is this cry! Greet him with empty hands, lead him into thy rooms all bare!”
Open the doors, let the conch-shells be sounded! In the depth of the night has come the king of our dark, dreary house. The thunder roars in the sky. The darkness shudders with lightning. Bring out thy tattered piece of mat and spread it in the courtyard. With the storm has come of a sudden our king of the fearful night.
अवैज्ञानिक मते लादू पाहणाऱ्या धर्ममार्तंडांच्या विरोधात उभा राहिलेला पहिला वैज्ञानिक गॅलिलिओ यांची ३००वी पुण्यतिथी ठरलेला ८ जानेवारी १९४२ हा स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस आणि १४ मार्च आधुनिक विज्ञानेश्वर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन हा हॉकिंग यांचा मृत्यूदिन.
हॉकिंग यांना ‘का’ या प्रश्नाने आयुष्यभर पछाडले. खरे तर सामान्यही अनेकदा या ‘का’ प्रश्नास सामोरे गेलेले असतात. परंतु सर्वसामान्यांना आणि हॉकिंग यांना पडणाऱ्या ‘का’ या प्रश्नातील फरक असा की जनसामान्य आयुष्याच्या रेटय़ात या ‘का’ प्रश्नाला शरण जातात. तर हॉकिंगसारखा प्रज्ञावंत त्या ‘का’स पुरून उरतो. पृथ्वीचा जन्म मुळात झालाच का? झाला असेल तर तो कशामुळे झाला? ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ असतो. मग या पृथ्वीलाही मृत्यू आहे का? असल्यास तो कधी असेल? आणि मुख्य म्हणजे तो कशाने असेल? अशा अन्य काही पृथ्वीही आहेत का? त्यांना शोधायचे कसे? या आणि अशा प्रश्नांचा, काळाचा शोध घेणे हे हॉकिंग यांच्या जन्माचे श्रेयस आणि प्रेयसही होते.
अत्यंत खडतर आयुष्य जगावे लागत असताना कोणत्याही टप्प्यांवर त्यांची विज्ञाननिष्ठा कमी झाली नाही की अन्य कोणा परमेश्वर नावाच्या ताकदीची आस त्यांना लागली नाही. *‘‘इतकी वर्षे पृथ्वीचा उगम आणि विश्वाचे संशोधन केल्यावर माझी खात्री झाली आहे की परमेश्वर अस्तित्वातच नाही. या विश्वाचा, आपला कोणी निर्माता नाही की भाग्यविधाता नाही. म्हणूनच स्वर्ग नाही आणि नरकही नाही. या विश्वाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी हाती असलेला क्षण तेवढा आपला आहे आणि तो मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे, ’’* असे हॉकिंग म्हणत.
याच अर्थाने ते धर्म या संकल्पनेचे टीकाकार होते. ‘‘धर्म हा अधिकारकेंद्रित आहे, तर विज्ञानाच्या केंद्रस्थानी असतात ते निरीक्षण व तर्क. या दोघांच्या संघर्षांत अंतिम विजय हा विज्ञानाचा असेल, कारण ते जिवंत आणि प्रवाही आहे, ’’ हे त्यांचे मत विचारी माणसाला मान्य होण्यासारखेच आहे.
☆ मुलगा काय करतो? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆
☆
लग्नाच्या ठरवून केलेल्या भेटीत, मुलगी पाहायला गेल्यावर एक प्रश्न जवळजवळ हमखास विचारला जातो: “मुलगा काय करतो?”
भुराचे कुटुंब त्याच्यासाठी मुलगी पाहायला गेले. चहा-नाश्ता आणि थोड्या गप्पा झाल्यावर, मुलीच्या वडिलांनी हळूच मुख्य विषय काढला: “तर, तुमचा मुलगा सध्या काय काम करतो?”
भुराच्या वडिलांनी चष्मा नीट केला, घसा खाकरला आणि अगदी कॉर्पोरेट स्टाईलमध्ये बोलायला सुरुवात केली: “पहा, आमचा भुरा सध्या एक agro-based Direct-to-Consumer स्टार्टअपचा Founder आणि Managing Director आहे. आम्ही organic health आणि wellness सेक्टरमध्ये काम करतो. ”
हे ऐकून मुलीचे वडील अर्धे प्रभावित झालेच. “वा! मग नेमकं तुमचं प्रॉडक्ट काय आहे?”
भुराचे वडील आत्मविश्वासाने पुढे म्हणाले: “आमच्या मुख्य पोर्टफोलिओमध्ये high-protein roasted legumes आणि traditional caramelized sweets आहेत. आम्ही कच्चा माल थेट wholesale supply chain मधून घेतो, आणि मग तो आमच्या स्वतःच्या thermal processing unit मध्ये dry-roast करतो. आणि सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आमचं packaging 100% eco-friendly आणि biodegradable आहे!”
हे सगळं ऐकून मुलीचं कुटुंब थक्क झालं. एखाद्या मोठ्या multinational कंपनीसारखं वाटत होतं!
मुलीच्या काकांना राहवलं नाही, त्यांनी विचारलं: “तुमच्या कंपनीचं मुख्य ऑफिस कुठे आहे? आणि किती कर्मचारी आहेत?”
अजिबात न घाबरता भुराचे वडील म्हणाले: “पहा, हा modern lean startup चा काळ आहे, त्यामुळे आम्ही दुकानाचं भाडं आणि वीज यांसारख्या अनावश्यक खर्चांना टाळतो. आमच्याकडे एक mobile retail outlet आहे, जो रोज traffic आणि लोकांच्या गर्दीनुसार जागा बदलतो. आणि सगळं काम माझा मुलगा एकटाच पाहतो — तो एक solopreneur आहे!”
आता मात्र मुलीचे वडील पूर्णपणे गोंधळले. ही इंग्रजी त्यांना काही समजेनाशी झाली. ते म्हणाले: “मला ही marketing language नीट समजली नाही. साध्या भाषेत सांगाल का, मुलगा नेमकं काय करतो?”
तेवढ्यात कोपऱ्यात बसलेला मुलाचा मित्र हळू आवाजात म्हणाला: “काका, याचा अर्थ असा आहे की आपला भाऊ हायवेवर गाडी लावून शेंगदाणे, भाजलेले हरभरे आणि रेवडी विकतो! तो कढईत वाळूत हरभरे भाजतो आणि वर्तमानपत्राच्या घड्या करून ग्राहकांना देतो — ज्याला हे लोक biodegradable packaging म्हणतायत!”
हे ऐकून मुलीच्या वडिलांच्या हातातील चहाचा कप पडायचीच वेळ आली!
म्हणून मित्रांनो, marketing शब्दांची जादू फार मोठी असते. तुमची presentation जोरदार असेल, तर शेंगदाण्याची गाडी सुद्धा corporate startup वाटू शकते!