मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थ्रिलर… भाग – २ ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ थ्रिलर… भाग – २ ☆ तृप्ती देव ☆

(तेवढ्यात माझं गृहिणीचं मन जागं झालं. ते म्हणालं, “अगं बाई! विष मिसळलेलं दूध तो पिणार नाही आणि ते दूध वाया जाईल. आजकाल दुधाचे आणि चहाच्या पावडरचे भाव किती वाढलेत माहिती आहे ना? एवढी नासाडी कशाला? ” मी कपाळावर हात मारला. विष प्रयोग रद्द! _

इथून पुढे  

त्यानंतर मी विचार केला की, झोपेत असताना उशी तोंडावर दाबून गुदमरवून मारावं. यात रक्ताचा थेंबही सांडणार नाही आणि काही वायाही जाणार नाही. मी लिहिलं, “तो सावलीसारखा बेडजवळ गेला आणि त्याने सुती उशी त्या पात्राच्या तोंडावर जोरात दाबली… ” पण लगेच माझ्या मनात विचार आला, “अरेरे! ती उशी आणि त्याचं कव्हर तर अगदी नवीन आहे. माणूस वाचण्यासाठी हातपाय मारेल, तडफडेल, त्याने ते कव्हर फाटून जाईल किंवा खराब होईल. नको नको, उशी नको. ” उशीचा प्लॅनही फ्लॉप झाला. शेवटी मी ठरवलं की आपण स्वतः काही करायला नको, निसर्गावर किंवा नशिबावर सोडून देऊ. ‘अपघात’ दाखवू या. मी लिहिलं, “खुन्याने रात्रीच्या अंधारात त्याच्या कारचे ब्रेक निकामी केले. दुसऱ्या दिवशी तो कार घेऊन घाटातून जात असताना… ” पण लगेच माझ्या मनात पाझर फुटला, “अरे, पण घाटात गाडी चालवताना कारमध्ये त्याच्यासोबत त्याची बायको लहान मुलं किंवा एखादा निरपराध मित्र असेल तर? एकाच्या पापात बाकीच्या निष्पाप जीवांचा बळी का? कार दरीत कोसळली तर संपूर्ण कुटुंब संपून जाईल. ” माझ्या संवेदनशील मनाने कारचे ब्रेक पुन्हा जागेवर दुरुस्त केले. कथा पुन्हा शून्यावर आली!

दोन दिवस झाले होते. माझ्या वहीत खाडाखोड करून फक्त चार ओळ्या उरल्या होत्या, पण माझ्या डोक्यात मात्र चाळीस जिवंत माणसं इकडून तिकडे फिरत होती. मला रात्री झोपेतही तेच विचार यायचे. दोन दिवस सतत विचार करून माझं डोकं जाम झालं होतं. शेवटी मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला, जी साहित्याची जाणकार होती. मी तिला माझी अडचण सांगितली, “अगं, तूच सांग, तुझ्या कथेत मर्डर कसा करतात ग लोक? मला जमतच नाहीये. ” ती फोनवर शांतपणे म्हणाली, “वेडी आहेस का तू? अगं, तो खून खराखुरा नसतो. ती फक्त एक काल्पनिक कथा असते. पात्रं काल्पनिक असतात. ” मी हताश होऊन म्हणाले, “मला माहिती आहे गं ते काल्पनिक असतं. पण जेव्हा मी लिहायला घेते, तेव्हा माझं मन त्या पात्रांना जिवंत समजतं. मला वाटतं मी खरोखरच कोणाचा तरी जीव घेतेय. ” माझं हे भाबडेपण ऐकून ती फोनवर पोट धरून हसायला लागली.

त्या रात्री मन हलकं करण्यासाठी मी टीव्ही चालू केला. एका वाहिनीवर गुन्हेगारीवर आधारित मालिका सुरू होती. त्यात एका माणसाने क्षणात खिशातून बंदूक काढली आणि समोरच्यावर गोळी झाडली. समोरचा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला. मी दचकून रिमोटने टीव्ही लगेच बंद केला. मनात एकच प्रश्न आला, “हे पडद्यावर किंवा पुस्तकात इतकं सहज कसं दाखवतात? माणसाचा जीव घेणं इतकं सोपं असतं का? ” दुसऱ्या दिवशी सकाळी मी वर्तमानपत्र उघडलं. पहिल्याच पानावर मोठी बातमी होती, “जमिनीच्या किरकोळ वादातून सख्या भावाने केला भावाचा खून. ” पान उलटलं, तर दुसऱ्या पानावर बातमी होती, “मोबाईल गेमवरून झालेल्या भांडणातून मित्राने मित्राचा जीव घेतला. ” मी काही क्षण स्तब्ध झाले. वर्तमानपत्र हातातून गळून पडलं. कालपर्यंत ज्या विषयावर मी घरात विनोद करत होते, पती आणि मुलासोबत हसत होते, ते वास्तव किती भयानक, क्रूर आणि वेदनादायी आहे याची मला जाणीव झाली. समाजात माणसाच्या जीवाची किंमत एवढी स्वस्त झाली आहे? किती सहजतेने हत्या आणि मर्डर होते.. मी तर माझ्या पायाखाली मुंगी पण मारू शकणार नाही.

आणि धडा धड दररोज मर्डर होतात आहे.

मी पुन्हा माझ्या अभ्यासाच्या खोलीत गेले आणि वही उघडली. या क्षणी माझ्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. मी ठरवलं, मी मर्डर मिस्ट्री लिहिणारच नाही. माझ्याकडून कोणाचा खून होणार नाही— अगदी कागदावरसुद्धा नाही! त्याऐवजी, मी पेन उचललं आणि एका वेगळ्याच कथेला सुरुवात केली. मी एका अशा लेखिकेची कथा लिहायला घेतली, जिला स्पर्धेसाठी मर्डर मिस्ट्री लिहायची असते, पण अत्यंत संवेदनशील मनामुळे हजार प्रयत्न करूनही तिच्याकडून कथेत कोणाचा खून होत नाही. ती कशी पात्रांना वाचवत राहते, याची ती एक हलकीफुलकी पण अंतर्मुख करणारी कथा होती.

स्पर्धेचा दिवस आला, मी माझी ती ‘वेगळी’ कथा पाठवून दिली. काही दिवसांनी स्पर्धेचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे माझ्या कथेला पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळाला नाही. कारण कथेच्या मुख्य अटीनुसार त्यात ‘मर्डर’ किंवा ‘रहस्य’ नव्हतंच. पण निकालपत्राच्या शेवटी परीक्षकांनी माझ्या कथेबद्दल विशेष नोंद म्हणून एक ओळ लिहिली होती. ती ओळ वाचून माझे डोळे भरून आले. तिथे लिहिलं होतं, “ही कथा कोणत्याही गुन्ह्याची किंवा रक्ताची नाही; तर ही एका अत्यंत संवेदनशील आणि जिवंत मनाची कथा आहे. लेखिकेचे विचार कौतुकास्पद आहेत. ” तो कागद हातात धरून मी बराच वेळ शांत बसून राहिले. तो पुरस्कारापेक्षाही मोठा सन्मान होता.

संध्याकाळी चहा पिताना नवरा हसत हसत म्हणाला, “चल काही हरकत नाही. यंदा नंबर नाही आला तर काय झालं? पुढच्या वर्षी नक्कीच प्रेमकथेची किंवा कौटुंबिक विषयावरची स्पर्धा असेल. तेव्हा बघू. ” मी चहाचा घोट घेतला आणि हसून म्हणाले, “हो… ते माझ्याकडून नक्कीच होईल. त्यात मी अव्वल येईन. ” त्याने डोळे मिचकावत पुन्हा विचारलं, “आणि मर्डर मिस्ट्री? ” मीही तितक्याच आत्मविश्वासाने आणि हसून उत्तर दिलं, “माझ्याकडून कागदावरसुद्धा मर्डर होत नाही आणि प्रत्यक्ष आयुष्यात तर प्रश्नच उद्भवत नाही! “

त्या दिवशी मला जगण्याचं आणि लेखनाचं एक खूप मोठं सत्य कळलं होतं. लेखक तो मोठा नाही, जो आपल्या लेखणीच्या बळावर सहज एखादं पात्र मारून टाकतो आणि क्रूरता निर्माण करतो. खरा लेखक तर तो असतो, ज्याच्या मनात आणि लेखणीत पात्रांना जिवंत ठेवण्याची ताकद असते, जे पात्र वाचकांच्या मनात घर करून राहतं. काही लोकांच्या हातात शस्त्र असतं, तर काही लोकांच्या हातात पेन असतं. शस्त्र माणसाचा जीव घेऊ शकतं, समाजात भीती पसरवू शकतं. पण एक पेन… ते माणसाची मेलेली मनं आणि संवेदना जिवंत ठेवू शकतं. आणि कदाचित म्हणूनच, मला सार्थ अभिमान आहे की आजपर्यंत माझ्याकडून कागदावर का होईना, पण एकही “मर्डर” झाला नाही आणि माझी लेखणी नेहमीच माणुसकी जपणारी राहिली!

धन्यवाद 

– समाप्त – 

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ऋतू बरवा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ऋतू हिरवा… ऋतू बरवा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो,

जीवघेण्या ग्रीष्म वृत्तीची काहिली पृथ्वीचे अंग प्रत्यंग जाळतेय. जागोजागी भेगा पडून विच्छिन्न झालेली ही वसुंधरा जणू भग्न मूर्तीसारखी भकास बघतेय एकटक आसमंताकडे! या कोमलांगी प्रेयसीला समीराचे उष्ण श्वास अंतर्बाह्य पोळत आहेत, त्यावर ‘चंदनाची चोळी’ देखील शीतलता प्रदान करायला असमर्थ आहे! नजरेत प्राण एकवटून तिच्या अंतरीची आस वाट बघतेय, कुठं दिसतोय का ‘शामलवर्णीय मेघदूत’ अन त्याची चंचल खट्याळ सखी विद्युल्लता! कारण या दूताने ग्वाही दिल्याशिवाय तिचा प्रियतम अवतरतच नाही. अन एक दिवस या जीवघेण्या प्रतीक्षेचा अंत होतो. श्यामवर्णी मेघांच्या सेनेची अति जलद गरुडभरारी आसमंतात दृष्टिपथास येते! एका बाजूने आक्रमण करीत करीत संपूर्ण नीलाकाशाला व्यापून टाकीत युद्ध जिंकल्याच्या आनंदात त्यांचे गडगडाटी हास्य पृथ्वीला तिच्या प्रियकराची चाहूलच वाटते. मेघाच्या संगती त्याची प्रेयसी विद्युलता आपले चपलांगी हास्य करीत मेघांना रुपेरी रंगाने सजवते. हा जामानिमा तयार झाला की येतो पाऊस. आपल्या प्रेयसी वसुंधरेला कोवळ्या नाजूक सरींच्या स्पर्शाने हलकेच गोंजारून मग मात्र आवेगाने तिचे अंग अंग आपल्या सहस्रबाहू जलधारांनी कवेत घेत बरसतो! या प्रणयाचे साक्षीदार असतात वृक्षलता, आनंदाने आपला पिसारा फुलवून नर्तन करणारे मयूर आणि पावसाच्या एका थेंबानेच तृप्त होणारा चातक!

मंडळी, पाऊस म्हटला की सामान्यजनांना सय येते ती वाफाळलेल्या अदरक घातलेल्या कडक मीठी चाय अथवा जायफळ घातलेल्या धुंद वाफेने गंधाळलेल्या कॉफीची, सोबतीला गरमागरम कांद्याची किंवा तत्सम भजी असली तर ब्रम्हानंदी टाळी लागलीच म्हणून समजा आमची! पण या ‘कवी’ नामक फुलपाखरी गिरकी घेत पावसाचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींची जातकुळीच वेगळी हो! आपण त्यांच्या शब्दभ्रमाच्या भुलभुलैयात मस्तपैकी जाणून बुजून बंदिस्त होऊन मज्जा मज्जा करीत ‘अंगे भिजली जलधारांनी’ असा अनुभव घ्यायचा!

या मनोहर हिरवाईने लगडलेल्या, रंगीबेरंगी सुमनांच्या ताटव्याने बहरलेल्या वर्षाऋतूचा देखणा नायक असतो ‘पाऊस’! मराठी माणसाच्या मनांमनांत रुजलेले हिरवेजर्द काव्य म्हणजे बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांचे ‘बालभारती’ त प्रस्थापित…

‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे । 

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।’ 

… ही आद्य पाऊस कविता! कितीही वेळा वाचा, हिची सर्वकालीन हिरवीकंच हिरवाई कधीच कोमेजत नाही.

या बहुप्रसवी भूमीचे सृजन याच पावसाने फुलते. उन्हाने त्रासलेल्या मानवाला तर हा पाऊस म्हणजे आनंदच नव्हे तर नवसंजीवनी देणारा ठरतो. म्हणून तर पावसाळा हा ‘ऋतू हिरवा ऋतू बरवा’ (कवयित्री-शांताबाई शेळके) आहे.

‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा,

पाचूचा वनी रुजवा

युगविरही हृदयावर,

सरसरतो मधूशिरवा’

लहान मुलांची (त्यांच्या लहानपणापासूनच) अन पावसाची गट्टी अश्शी घनदाट असते, की…

‘ये रे ये रे पावसा रुसलास का 

माझ्याशी गट्टीफू केलीस का’ 

(कवयित्री – वंदना विटणकर) 

.. असे ती त्यालाच विचारतात. उत्तर मिळाले नाही तर मग ही मुले पाऊसदादाला सरळ एका ढब्बू पैशाचे आमिष द्यायलाही कमी करत नाहीत. म्हणून तर अखिल बालक मंडळी पहिल्या पावसाची एंट्री व्हावी म्हणून ‘ये रे येरे पावसा तुला देतो पैसा’, असे घोकत असतात. गोड छकुल्याने असा पैसा दिला की, गहिवरलेला आज्ञाधारक पाऊस लगेच हजर झालाच म्हणून समजा!

आता बाळ थोडं मोठं झालं की त्याला अवचितच शाळा नामक खलनायिका भेटते. मग काय आता कवितेचा रागरंगच बदलतो.

 ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय,

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? ‘ 

(कवी-मंगेश पाडगावकर) 

… असे म्हणत शाळेला वैतागलेली पोरं मग डायरेक्टली भोळ्या शंकरालाच साकडे घालतात.

बघा कशी गंमत आहे, धो धो पाऊस अंगणात अन रानावनात कोसळतोय बघा पोरगं पावसाच्या सरी झेलायला, अन गम्माडी गंमत करायला, दोस्तांबरोबर फेर धरत गाणी हवीच- 

‘पिरपिर पिरपिर पावसाची,

त्रेधा तिरपिट सगळ्यांची’ 

(परत वंदनाताईच हो) 

… किंवा झालंच तर ‘अग्गोबाई अन ही आई नावाची बाई मुलाला घरात कोंडून ठेवतेय! किती हा हिचा जाच! मग तिची विनवणी अन लांगूल चालन करावे लागणारच ना.

‘ए आई मला पावसात जाऊ दे,

एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे’

(आमच्या अति लाडक्या कवयित्री-वंदना विटणकर) 

.. अन एकदाचं बाहेर पडलं की धुमशान पळतंय कसं 

अग्गो बाई, ढग्गोबाई, लागली कळ । 

ढगाला उन्हाची केवढी झळ । 

थोडी न् थोडकी लागली फार । 

डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।’ 

(कवी- संदीप खरे)

मैत्रांनो, आता जाऊ या तिथं, जिथं राधा अधीर होऊन म्हणतेय 

‘रिमझिम पाऊस पडे सारखा,

यमुनेलाही पूर चढे,

पाणिच पाणी चहूकडे 

ग बाई गेला मोहन कुणीकडे? ‘ 

(जनकवी पी. सावळाराम) 

निसर्ग कवी बा. भ. बोरकरांची ‘सरींवर सरी आल्या ग’ ही सदा प्रफुल्लित कविता आठवते कां? गोकुळात बरसणारा पाऊस, हिरवेगार कदंब वृक्ष, यौवनाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या वेली, मेघांची गर्जना, विजेची पैंजणे आणि कृष्णधुन आळवणारी त्याची वेणू, यांच्या तालासोबत मनमोहक रंगांनी सजलेले आपले पिसारे फुलवीत मिरवणारे मयूर! त्यांच्यासोबत दुग्धधारांसारख्या भासणाऱ्या धवल जलधारांत सचैल न्हालेल्या गोपींचे कृष्णाशी एकरूप होण्याचे वर्णन बोरकरांनीच करावे!

(ही समग्र कविता ऐकावी यू ट्यूब वर पु. ल. आणि सुनीताबाई देशपांडेंच्या स्वरात! )

सरींवर सरी: सरीवर सरी…

*

सरींवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग

गोपी झाल्या भिजून-चिंब, थरथर कापती निंब-कदंब

घनांमनांतुन टाळ-मृदंग, तनूंत वाजवी चाळ अनंग

पाने पिटिती टाळ्या ग, सरिंवर सरी आल्या ग

मल्हाराची जळांत धून, वीज नाचते अधुनमधून

वनांत गेला मोर भिजून, गोपी खिळल्या पदी थिजून

घुमतो पावा सांग कुठून? कृष्ण कसा न उमटे अजून?

वेली ऋतुमति झाल्या ग, सरिंवर सरी आल्या ग

हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग

दुधात गोकुळ जाय बुडून, अजून आहे कृष्ण दडून

मी-तू-पण सारे विसरून, आपणही जाऊ मिसळून

सरींवर सरी आल्या ग, दुधात न्हाणुनि धाल्या ग

सरींवर सरी: सरीवर सरी…

कवी ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो’ ही कविता मेघांनी आच्छादलेल्या आकाशासारखी गूढरम्य आहे. जणू विरहाचे दुःख डोळ्यांच्या पापण्यांतच थिजल्यासारखे वाटते!

‘पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने’

मंडळी या निसर्गराजाच्या वर्षाऋतूत भावानुरागी कवीचे मन बरसणाऱ्या जललहरीं सोबत थुई थुई नाचत असते. या पावसाचे नखरेल रुप विविधरंगी आणि बहुढंगी! कधी कोमल हलकेच थेंबाथेंबाने अंगण भिजवणारा रोमांचकारक शिडकावा जणू स्मितहास्याची हळुवार लकेर, वा मंद शीतल समीरची झुळुकच, अथवा रसरंगात दंग असलेल्या मैत्रिणींच्या अंगांवर शिंपडलेले तजेलदार गुलाबपाणी समजा! या पावसाचा मूड पण वेगवेगळा असतो बरं कां! एखाद्या मैफिलीत जाणत्या शास्त्रीय गायकासारखा इंद्रधनुष्याच्या किनारीने नटलेली निलाकाशी शाल पांघरून कधी द्रुत तर कधी विलंबित तालात तो गायनी कला दर्शवतो तर कधी हाच पाऊस नद्या, नाले, तडाग इत्यादींची तृष्णा एकाच वेळी भागवण्याकरता रसरसून अतिवेगाने अविरत बरसत असतो.

ग्रीष्म ऋतूच्या गर्मीत तिष्ठत असलेल्या विराणी धरेला पहिल्याच भेटीत हळुवारपणे कवेत घेत तिच्यावर मृदगंधाची पखरण करणारा हा पहिला पाऊस तर कवीला अतिप्रिय, त्याच्या प्रणयिनीची आठवण करून देणारा! मंगेश पाडगावकर यांच्या प्रणयधुंद कवितेतील या ओळी पहिल्या ओलेत्या भेटीचे अत्तर शिंपीत येतात.

‘भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।

धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।

ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।

श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।’

मैत्रांनो, या रमणीय वर्षा ऋतूचा अनुभव घेतल्यानंतर आता लेखाच्या अंती याच पावसाचे रौद्ररूप देखील स्मरण्याची वेळ आलीय! आकाश भयावह काळ्याकभिन्न राक्षससदृश मेघांनी संपूर्णपणे आच्छादलेले, त्यातच मध्ये मध्ये आपली समग्र शक्ती एकवटत सुरु असलेले विजेचे भीषण तांडव, नदी नाल्यांचा जीवानिशी मांडलेला आकांत ऐकणारे कुणीच नाही.

‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ 

(कवी- ग. दि. माडगूळकर) 

… असा प्रलयंकारी घनघोर पाऊस वेड्यासारखा मुसळधार कोसळतोय. इतके दिवस पेरणी करून आकाशात डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी थिजले. अन आता त्याच पिकाची नासाडी करीत त्याच्या कमकुवत खोपट्याकडे तुच्छ नजरेने पाहणाऱ्या मस्तवाल पावसाला शेतकऱ्याची कारभारीण शिवी घालतेय,

‘आरं गाभ्रीच्या पावसा! ’ (कवी – स्वप्निल प्रीत)

‘आरं गाभ्रीच्या पावसा! आता कशी दया आली

कवतिक नाही तुजं, जवा तहान आटली ।।धृ।।

ओली ठिगळाची चोळी, वर छप्पर गळते

कागदाच्या होडीवानी माजं खोपटं बुडते ।।१।।

आला पडशाचा ताप, कशी जाऊ मी कामाले

तुझा नाचणारा मोर, घास देतो का पोटाले ।।२।।

रित्या पोटी बाप ग्येला, डोळं होतं आभायाला

फक्त आईच्या डोयांत, तवा पाऊस पाह्यला ।।३।।

त्याच दुष्काळात माझं, सारं सपान सुकलं

आता नको तुझी माया, मन तुले उबगलं ।।४।।

प्रिय वाचकांनो, या बहुतेक कविता गेय आहेत. तुम्हाला भावणारी पावसाची नटरंगी रूपे एन्जॉय करतांना वाफाळत्या ‘चाय गरम’ बरोबर यू ट्यूबवर या कवितांचा आशयघन आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका बरं कां!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९५ आणि ९६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९५ आणि ९६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ९५ – – – 

अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।

तया मुक्ति नारायणाचेनि नामे ।

शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।

मुखे बोलता ख्याति झाली पुराणी ।।९५।।

अर्थ : दुराचारी असलेल्या अजामेळाने अंतकाळी आपल्या नारायण पुत्राचे नाव घेतले. त्या मुलाचे सतत नाम घेतल्याने त्याला मुक्ती मिळाली. एका गणिकेने ‘ राम राम ‘ हे आपल्या पोपटाचे नाम सतत घेतल्याने तिचा देखील उद्धार झाला. आपल्या अंतकाळी भगवंताचे नाम घेणाऱ्या व्यक्तींच्या या कथा पुराणात प्रसिद्ध झाल्या.

(शुक – पोपट, कुंटणी – गणिका/वेश्या)

विवेचन : भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ या श्लोकात पुराणातील दोन वेगळी उदाहरणे आपल्या देतात. अजामेळ ब्राह्मणाची कथा भागवतात आली आहे. अजामेळ हा दुराचारी होता. आपल्या आयुष्यात त्याने कधी भगवंताचे नाम घेतले नाही. आपला अंतकाळ जेव्हा जवळ आला तेव्हा त्याला आपल्या लाडक्या नारायण या पुत्राची आठवण होऊन तो त्याच्या नावाचा जप करू लागला. तेव्हा विष्णुदूतांनी येऊन त्याला मुक्ती दिली अशी कथा आहे. दुसरी कथा आहे पिंगला या गणिकेची. तिने देखील आपल्या संपूर्ण आयुष्यात परमेश्वराची भक्ती केली नाही. परमेश्वराबद्दल तिला एक प्रकारचा तिरस्कार होता असे म्हटले तरी चालेल. त्याच भावनेतून तिने आपल्या आवडत्या पोपटाचे नाव ‘राम ‘ असे ठेवले. अजाणतेपणी का होईना पण त्यानिमित्ताने ती रामनाम घेत गेली. त्यामुळे तिचा उद्धार झाला. खरी गोष्ट अशी आहे या सगळ्यांना मृत्यूसमयी आपल्या चुकीचा पश्चाताप होऊन त्यांनी भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात केली. पुढे त्यातूनच त्यांचा उद्धार झाला.

तर्कशास्त्राच्या कसोटीवर या कथा आजच्या काळात टिकणाऱ्या नाहीत. नास्तिक आणि बुद्धिवादी लोक तर या पुराणातील भाकडकथा आहेत म्हणून सहज उडवून लावतील. पण समर्थांच्या काळात या कथा प्रचलित होत्या. लोकांनी परमेश्वराचे नाम कोणत्याही प्रकारे का होईना पण घ्यावे आणि त्यांना रामनामाचे महत्व पटावे एवढाच समर्थांचा या कथा सांगण्यामागील उद्देश असावा. आपणही तो उद्देश लक्षात घेऊ या. आपल्यासाठी त्या कथांपेक्षा समर्थांचा संदेश महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपण धान्य निवडताना आपण फोलपट टाकून देऊन सार आपल्याकडे ठेवतो त्याप्रमाणे बाकी निरुपयोगी फोलपट टाकून सार तेवढे ग्रहण करू या. रामनाम हेच सार आहे. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.

स्वसंवाद ::

१. पुराणातील कथांमधील चमत्कारिक गोष्टींवर तर्क लढवत बसण्यापेक्षा, त्यामागे संतांनी दिलेला ‘नामस्मरणाचा’ मूळ संदेश (सार) मी स्वीकारू शकतो का?

२. “अजाणतेपणी किंवा मुलाच्या ओढीने घेतलेले नाम जर अजामेळाला तारू शकते, ” तर मग मी जाणीवपूर्वक आणि मनापासून नाम घेतले तर माझ्या आयुष्यात किती सकारात्मक बदल घडू शकेल?

३. संसाराच्या वेगवेगळ्या विवंचनेत अडकलेला असतानाही, मी माझ्या रोजच्या बोलण्यात किंवा व्यवहारात भगवंताच्या नामाचे अधिष्ठान ठेवतो का?

४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, “रामनाम हेच अंतिम सार आहे” हे स्वीकारून मी मनातील निरर्थक शंकांचे ‘फोलपट’ टाकून द्यायला तयार आहे का?

=====

श्लोक क्र. ९६ – – – 

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।

जपे रामनामावळी नित्यकाळी ।

पिता पापरूपी तया देखवेना ।

जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ।।९६।।

अर्थ : भगवंताचा महान भक्त असलेला प्रल्हाद याचा जन्म दैत्यकुळात झाला. परंतु तो नित्य भगवंताच्या नामाचा जप करीत असे. अत्यंत पापी असलेला त्याचा पिता हिरण्यकश्यपू याला ते पाहवेना. त्याने आपल्या आयुष्यात कधीही नामस्मरण केले नाही.

विवेचन : 

भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ आपल्याला प्रत्येक श्लोकात वेगवेगळी उदाहरणे देत आहेत. एखाद्या कुशल शिक्षकाने ज्याप्रमाणे विविध उदाहरणे देऊन आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगावे तसे समर्थ आपल्याला सांगत आहेत. या अर्थाने समर्थ हे लोकशिक्षक आहेत. जन उद्धाराची तळमळ त्यांना आहे. ‘बुडते हे जन न देखवे डोळा ‘ या भावनेतून ते आपल्याला रामनामाचे महत्व सांगत आहेत.

प्रल्हाद हा विष्णूचा महान भक्त होता. पण त्याचा जन्म एका दैत्यकुळात झाला होता. दैत्यकुळातील मंडळी म्हणजे साधारणपणे भगवंताला विरोध करणारी किंवा त्याला आपला शत्रू मानणारी होती. अशा प्रतिकूल ठिकाणी प्रल्हादाचा जन्म झाला. पण भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादाला गर्भातूनच मिळाले होते. त्याची आई कयाधू ही गर्भारपणी महर्षी नारदांच्या आश्रमात राहिली होती. तिथेच भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादावर झाले.

प्रल्हादाला आपल्या घरातील परिस्थिती भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी अनुकूल नव्हती. पण भगवंताचा खरा भक्त होण्यासाठी जे गुण लागतात, त्या गुणांनी तो परिपूर्ण होता. त्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड येत असे. ‘ ओम नमो भगवते वासुदेवाय ‘ या मंत्राचा नित्य जप तो करीत असे. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रल्हाद नारायणाचे म्हणजे विष्णूचे नाम जपत होता. पण वरील श्लोकात समर्थांनी ‘ जपे रामनामावळी ‘ असे म्हटले आहे. नारायण असो की राम, तो सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला दाखवून देतात. त्यामुळे आपण देखील भगवंताच्या नामात भेदभाव करणे योग्य नाही.

परमेश्वराला आपला शत्रू मानणाऱ्या हिरण्यकश्यपूला अर्थातच हे आवडणे शक्य नव्हते. हिरण्यकश्यपू हा भगवान शंकराचा भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शंकरांकडून असा वर मागून घेतला होता की ज्या वरामुळे त्याला सहजासहजी कोणी मारू शकत नव्हते. त्यामुळे तो स्वतःला अमर समजू लागला. आणखीनच उन्मत्त झाला. प्रजेवर आणि भगवंताच्या भक्तांवर जुलूम करू लागला. पण आपला स्वतःचाच मुलगा आपले ऐकत नाही असे पाहिल्यावर त्याने प्रल्हादाला मारण्यासाठी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. पण प्रल्हादाची भगवंतावर अविचल श्रद्धा होती. भगवंताने हर प्रकारे त्याचे सर्व संकटातून रक्षण केले. हिरण्यकश्यपू पापी असला तरी प्रल्हादासारखे भगवंतावर अविचल निष्ठा असणारे पुत्ररत्न त्याच्या उदरी जन्मले हे त्याचे केवढे भाग्य! त्यामुळेच आपल्या अंत्यसमयी हिरण्यकश्यपूला नरसिंहरूपाने भगवंताचे दर्शन झाले आणि त्याला मुक्ती मिळाली.

प्रल्हादाचा जन्म जरी दैत्यकुळात झाला तरी इच्छा असली तरी विपरीत परिस्थितीत देखील भगवंताचे नाम घेऊन तरून जाता येते हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात. आपणही प्रल्हादाप्रमाणे भगवंताचे नाम घेऊन या भवसागरातुन तरून आपला उद्धार करून घेऊ शकतो. तो आपल्याला सर्व संकटातून सोडवेल.

स्वसंवाद ::

१. माझ्या सभोवतालची परिस्थिती किंवा घरचे वातावरण परमार्थ साधण्यासाठी अनुकूल नाही, असे रडत न बसता मी प्रल्हादासारखा ‘अविचल’ राहून नामस्मरण करू शकतो का?

२. राम, कृष्ण, विष्णू किंवा शिव यांच्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून मी माझ्या मनाची ऊर्जा वाया घालवतो आहे, की सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हे सत्य स्वीकारतो?

३. हिरण्यकश्यपूप्रमाणे मीही उन्मत्त होऊन माझ्या जवळच्या माणसांवर किंवा सत्प्रवृत्तींवर अन्याय तर करत नाहीये ना?

– क्रमशः श्लोक ९५ आणि ९६

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक वैदिक राष्ट्रीय प्रार्थना ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ एक वैदिक राष्ट्रीय प्रार्थना ☆ श्री दिवाकर बुरसे

ओम् आ ब्रह्मन् ब्राम्हणो ब्रम्हवर्चसी जायताम्।

sस्मिन् राष्ट्रे राजन्य इषव्यः।

शूरो महारथो जायताम्।

दोग्ध्री धेनुर्वोढाsनङ्वानाशुः सप्तिः।

पुरान्धिर्योषा जिष्णू रथेष्ठाः।

सभेयो युवाsस्य यजमानस्य वीरो जायताम्।

निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु, फलिन्यो न औषधयः पचन्ता योगक्षेमो नः कल्पताम्।।

समानि व आकूतिः समाना ह्रदयानि वः।

समानवस्तु वो मनो यथा वः सुसहासति।

सर्वेsत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पष्यंतु मा कश्चित दुखःमाप्नुयात्।

*

ओम् शान्तिः शान्तिः शान्तिः।।


मराठी भावानुवाद

हे जगदीशा, या राष्ट्राला ब्रह्म जाणते ब्राह्मण दे

शूर, धीर, गंभीर, प्रतापी महारथी लढवैय्येे दे।।१।।

*

दुभत्या गायी, पुष्ट पशुधने, समीरस्पर्धी हयदळ दे

सुंदर, सात्विक, सुबुद्ध, सुदृढ माता, वनिता, दुहिता दे।।२।।

*

युवासंघ बलशाली आणि सभेस सभ्य सभासद दे

पाउस पडु दे सुयोग्य समयी, रसरशीतसे वनधन दे।।३।।

*

स्वप्ने, ध्येये, मने आमुची एक असू दे सदाकदा

सुखी, निरोगी, मंगल जीवन सकला दे रे भगवंता।।४।।

ओम् शांतिः शांतिः शांतिः।

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वेळ आणि ऊर्जा व्यवस्थापन…” – लेखिका: शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वेळ आणि ऊर्जा व्यवस्थापन…” – लेखिका: शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

आयुष्याच्या एका वळणावर खूपच तीव्रतेने हे जाणवतं की आपला वेळ आणि ऊर्जा महत्वाची आणि मुख्य म्हणजे मर्यादित आहे. त्यामुळे अनावश्यक वादा-वादी, बिनमहत्त्वाची संभाषणे, आपल्या आयुष्यात ज्यांचं फार महत्त्व कधीही नव्हतं अशा केवळ जुन्या म्हणून जोपासलेल्या ओळखी, नाती, माणसं ह्यांच्यावर आपला वेळ आणि ऊर्जा खर्चणं हे नकोसंच नव्हे तर क्रिमिनल वाटायला लागतं.

खरं तर ही उपरती यायला वयाच्या पस्तिशीतच सुरुवात झालेली असते, पण हे स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल करायला अजून काही काळ जावा लागतो, आणि ते तसं कबूल केल्यानंतरही आहे हे असं आहे ह्याचा कुठलाही अपराध भाव न ठेवता स्वीकार करायला आणि मुख्य म्हणजे कोणाचीही भीड मुर्वत न बाळगता त्याप्रमाणे वागायला अजून काही महिने/वर्षे जावी लागतात.

ही जाणीव अचानक येत नाही. ती एखाद्या नदीसारखी आपल्या मनाच्या दरीत हळूहळू आपला मार्ग कोरत जाते. इंटरनेटवरच्या एखाद्या निरर्थक भांडणानंतर जाणवणारा मानसिक थकवा, अर्धा तास स्क्रोल केल्यानंतर जाणवणारं रिकामपण, एखाद्या जुजबी ओळखीच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून झाल्यावर आतून जाणवणारा कंटाळा, ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर होणारी चिडचिड, आणि त्या चिडचिडीची त्याच क्षणी जाणवणारी व्यर्थता, हे सगळे खरं तर लहान लहान इशारे असतात. आपण ते वर्षानुवर्षे दुर्लक्षित करतो, कारण नात्यांना जपणं, माणसं सांभाळणं, आपला मुद्दा कसंही करून लोकांना पटवून देणं हे सगळंच आपल्या रक्तात भिनलेलं असतं. पण एक दिवस असा येतो की शरीर आणि मन दोन्ही एकाच वेळी स्पष्ट सांगतात की आता बास झालं. हा दिवस एका नव्या स्पष्ट, टोकदार जाणिवेच्या कोंभासारखा असतो, जो आपल्या मनाची जमीन फाडून जन्म घेत असतो.

इथून पुढचा प्रवास सोपा नसतो, पण तो खरा असतो. सुरुवातीला अपराधीपणाची एक सावली सतत मागे मागे येत राहते. जमणार नसलेल्या कोणाच्यातरी कसल्यातरी कामाच्या विनंतीला स्पष्टपणे नाही म्हटलं की मन स्वतःलाच कुरतडत राहतं. कधी मनात नसूनसुद्धा जुन्या सवयीने वाद घातले जातात, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे माहिती असताना देखील. नुसत्याच जुन्या ओळखीच्या म्हणून मंद आचेवर ठेवलेल्या नात्याचा बर्नर आपण ऑफ करतो तेव्हा कुठल्यातरी कोपऱ्यातून जुन्या संस्कारांचा आवाज कानात घुमतो. पण नंतर हळूहळू लक्षात येतं की हा अपराधभाव आपला स्वतःचा नाही, तो आपल्याकडे भरपूर वेळ आहे ह्या भ्रामक जाणिवेतून जन्मलेला आहे. एकदा ते समजलं की मग त्या विचारांच्या विळख्यातून स्वतःला बाहेर काढणं सहज शक्य होतं.

आपल्या वेळेकडे आणि ऊर्जेकडे पैशासारखं बघायला शिकावं लागतं. जसं आपण महिन्याचं बजेट आखतो, तसंच आपल्या दिवसाचं, आठवड्याचं, महिन्याचं, वर्षाचं भावनिक बजेट आखता यायला हवं. कोणत्या व्यक्तींसोबत घालवलेला वेळ आपल्याला नवी ऊर्जा देतो आणि कोणाबरोबर घालवलेला वेळ आपल्याला ड्रेन करतो, हे एकदा स्पष्ट कळायला लागलं की निवड करणं सोपं होतं.

दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायला शिकणं. हा एकच छोटा शब्द, नुसता उच्चारायला सोपा वाटणारा, पण अंगी बाणवायला सर्वात कठीण. एखाद्या आमंत्रणाला, एखाद्या मागणीला, एखाद्या संभाषणाला नाही म्हणताना खरंतर कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. तरीही आपण मोघम बोलतो, एखादी गोष्ट मनातून करायची नसली तरी, ‘हो, बघू, जमलं तर करतो/करते’, असं काहीतरी बोलून आपण वेळ मारून नेतो. पुढच्या व्यक्तीच्या अपेक्षा वाढतात आणि नंतर नाही म्हणणं अधिकच कठीण होऊन बसतं. त्यापेक्षा आधीच जे जमणार नाही/जमलं तरी करावंसं वाटत नाही त्याला स्पष्टपणे नकार द्यायला शिकलं पाहिजे.

तिसरी गोष्ट, जुन्या ओळखींकडे, जुन्या नात्यांकडे कृतज्ञतेने बघावं, पण केवळ जुन्या ओळखी आहेत म्हणून त्या टिकवण्याची सक्ती स्वतःवर लादू नये. एकतर्फी सक्ती तर स्वतःवर कधीच करू नये. एखादं नातं भूतकाळात कधीतरी महत्त्वाचं होतं म्हणून ते आताही तितकंच महत्त्वाचं असलं पाहिजे हा काही नियम नाही. काही नाती द्यायचं ते देऊन आयुष्याच्या प्रवाहाबरोबर पुढे जातात. त्यांना तिथेच समंजसपणे निरोप देणं हा त्या नात्याचा अपमान नसतो, ती त्या नात्याचा दिलेली योग्य तिलांजली असते.

चौथी गोष्ट, तुमचं समाज माध्यमांवरचं किंवा व्यावसायिक जीवनातलं वर्तुळ कितीही विस्तृत असो. आपल्या भोवतीचं खऱ्या आयुष्यातल्या मोलाच्या माणसांचं वर्तुळ नेहमी लहान आणि निवडकच ठेवावं. ज्यांच्याशी बोलल्यावर मन हलकं होतं, ज्यांच्यासमोर मुखवटा घालावा लागत नाही, तुम्ही जसे आहेत तसे तुम्हाला स्वीकारणारी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच असतात, आणि तितकीच पुरेशी असतात. पण ती नाती मात्र जपली-जोपासली गेलीच पाहिजेत. आपल्या भोवती पाच हजार लोकांची गर्दी जमवणं हे यश नाही, रात्री तीन वाजता देखील एका हाकेवर धावून येतील अशी पाच माणसं आयुष्यात असणं हे यश आहे.

पाचवी गोष्ट, रोजच्या दिवसात थोडा वेळ केवळ स्वतःसाठी राखून ठेवणं. पहाटेची शांत वेळ, एक कप चहा, थोडं वाचन, थोडं चालणं, ध्यान, थोडा व्यायाम, संगीत, नृत्य, एखादी हस्तकला, ह्यातलं काहीही करा पण तो वेळ इतर कोणाशीही वाटून घेण्याची गरज नाही. हा केवळ स्वतःसाठी राखून ठेवलेला वेळ आपल्याला उरलेल्या दिवसासाठी स्थिर ठेवतो. ह्या एकांतात सोबतीला कुठलाही मोबाईल, कुठलीही स्क्रीन नसावी, कारण खरं एकटेपण आणि स्क्रीनसमोरचं एकटेपण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिलं आपल्याला भरभरून देतं, दुसरं आपल्याला रितं करतं.

सहावी गोष्ट, आपल्या शरीराचं ऐकायला शिकावं. झोप पुरेशी झाली नाही की मन कमकुवत होतं आणि मग नकोसे संवाद, नकोसे विचार आपल्यावर सहज स्वार होतात. वेळेवर घेतलेलं, साधं, सकस, घरी बनवलेलं जेवण, पुरेशी झोप, रोजचा थोडा, पण नियमित व्यायाम, स्वतःसाठी शिल्लक ठेवलेला थोडा वेळ, ह्या वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टीच भावनिक स्पष्टतेचा पायाच असतात. शरीर थकलेलं असताना मनाने घेतलेले निर्णयही बहुधा चुकीचेच ठरतात, म्हणून आधी शरीराला विश्रांती द्यावी, मग मनाला निर्णय घेऊ द्यावा.

सातवी गोष्ट, सणासुदीला, कौटुंबिक प्रसंगांना उपस्थित राहायचं की नाही हे ठरवताना जिथं मनापासून जावंसं वाटतं तिथे जावं, भरपूर वेळ तिथे घालवावा. जिथे केवळ कर्तव्य म्हणून जावं लागतं तिथेही जरूर जावं, पण आवश्यक तितकं अंतरही ठेवावं. असं करणं म्हणजे परंपरेचा अनादर नाही, तर स्वतःच्या मर्यादांचा आदर आहे.

आठवी आणि कदाचित सर्वात महत्वाची गोष्ट, हे सगळं करताना स्वतःला दोष न देणं. आपला वेळ आणि ऊर्जा ह्यांना प्राथमिकता देणं हा स्वार्थ नाही. अनावश्यक बोजा खाली ठेवून जे हात आपण रिकामे केले, ते नंतर खऱ्या अर्थाने आपल्याला महत्त्वाच्या असणाऱ्या कामांसाठी, माणसांसाठी, ध्येयपूर्तीसाठी मोकळे राहतात. जुन्या झाडाची वाळत आलेली, निरुपयोगी फांदी छाटली की तिथेच नवीन अंकुर फुटतात. झाड अधिक जोमाने वाढतं, तसंच आपलं आयुष्यही ह्या छाटणीनंतर अधिक सशक्त होतं. एकदा हे सत्य उमगलं की पुढचा रस्ता आधीपेक्षा जास्त उजळ, जास्त हलका आणि जास्त आपला वाटायला लागतो.

लेखिका:शेफाली वैद्य

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
2

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अंधाराच्या पारंब्या” – लेखक : श्री जयवंत दळवी ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆

श्री प्रसाद साळुंखे  

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अंधाराच्या पारंब्या” – लेखक : श्री जयवंत दळवी ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆

पुस्तक : अंधाराच्या पारंब्या

लेखक : जयवंत दळवी 

मुंबईहून पुण्यात एका ऑफिसच्या मीटिंगला जात होतो. तेव्हा चहा नाश्ता करण्यासाठी म्हणून एका फूडमॉलमध्ये थांबलो. तिकडे पहिल्या मजल्यावर एका पुस्तकांच्या दुकानात काही नवी जुनी पुस्तकं चाळली. म्हणजे वरवरच पहिली आणि खात्रीशीर लेखक किंवा दर्जेदार प्रकाशनं पाहून काही जुनी पुस्तकं विकत घेतली. त्यात ही सोनं सापडलं. जुनं म्हणून नव्हे, तर कुठल्याही काळात सोनं हे सोनंच. ही कादंबरीही अगदी तशीच कालातीत कलाकृती.

१९७२ साली जयवंत दळवी यांची अंधाराच्या पारंब्या ही कादंबरी पहिल्यांदा ‘ अनुराधा ‘ या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाली. पुढे १६ सप्टेंबर १९९५ साली या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली.

या कादंबरीवर आधारित ‘ बॅरिस्टर ‘ हे नाटकही अमाप लोकप्रिय झालं. पण माझी आठवण आहे साधारण २००३ च्या सुमारासची. तेव्हा अल्फा (आताचं झी) मराठीवर ‘ पिंपळपान ‘ नावाची एक दर्जेदार मालिका लागायची. ही मालिका मला अफाट आवडायची. विशेषतः अतुल कुलकर्णी यांनी साकारलेली ‘ बॅरिस्टर ‘ ही भूमिका. कादंबरी वाचताना वाटलं की मधली वर्षे झरझर सरत चाललीत, आणि अगदी तसाच अस्वस्थतेकडून अस्वस्थतेचा प्रवास आपण अनुभवतोय.

यात दाखवलेला काळ साधारण इ. स. १९२० च्या सुमारासचा. तत्कालीन महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजाच्या काही जुनाट रूढींचा मागोवा या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो. त्याकाळी सभोवताल हळूहळू बदलायला सुरुवात झाली होती. म्हणजे बॅरिस्टर सारखी सुशिक्षित, विलायतेतून शिक्षण घेऊन आलेली मंडळी त्यांची सौंदर्यदृष्टी, जीवन समरसून जगण्याची स्वच्छंदता, कौतुक करायची, वैचारिक विरोध दर्शवायची स्पष्टवक्तत्ता एकीकडे. आणि भाऊरावांचा देवभोळेपणा, निरागसता, रूढींना धर्माला चिकटून राहण्याची वृत्ती, बॅरिस्टरांबद्दल आदरयुक्त भिती, बॅरिस्टरातल्या स्वभावात दडलेल्या लहान मुलावर जीवापाड माया हा लटका संघर्ष वाचायला रंजक वाटतो, क्वचित प्रसंगी अस्वस्थ करून सोडतो.

यातली एकेक पात्र जयवंत दळवी यांनी खरोखर लाजवाब रंगवली आहेत. बॅरिस्टरांच्या स्वच्छंद पण संवेदनशील स्वभावाचे पैलू, भाऊरावांच्या रूढी परंपरा बाबतच्या ठाम भूमिका आणि त्यातूनही दुसऱ्या वैचारिक प्रवाहाला दिलेला आदर, राधाक्कातल्या नववधूची स्वप्न, मानवी हेतूंची चाचपणी आणि एक अबोल घालमेल, विशेष कौतुक वाटतं ते मावशीबाईंचं, दैवाने लहानपणी दिलेल्या वैधव्याचा आणि समाजाने त्याचवेळी दिलेला कुरूपतेचा शाप भोगून, दिवसभर जीव कामात गुंतवणं आणि हसतमुख रहाणं, ही अन्यायाची मूक स्वीकृती, शरणागती आपल्याला अंतर्मुख करते. म्हणूनच मावशीबाईंचा लहानपणीच्या आठवणीतला विधवा केशवपनाचा प्रसंग राधाक्कासोबतच आपल्यालाही मूळातून उन्मळून टाकतो.

दुसरीकडे तितकाच सतावतो, कादंबरीभर गूढ कायम ठेवतो तो वाड्याला लागलेला खुर्चीत बसायचा शाप. घरातल्या धडधाकट कर्त्या पुरुषानं अचानक एक दिवशी डोळ्यात थंड वेडसर झाक घेऊन एकटक जमिनीकडे पहात बसणं, ही कल्पनाच श्वास कोंडण्याइतपत, जीवाची घालमेल होण्याइतपत अंगावर येते.

भाऊराव आणि त्यांची नववधू राधाक्का या वाड्याला चार सुखाचे क्षण देऊन क्षणभराचं घरपण देतात. म्हणजे बघा मालक घर बांधतो पण भाडोत्री घरपण देतात. पैशांनी वाडा बांधता येतो पण घरपण भावनेच्या नात्यांनीच तयार होतं. अर्थात भाऊराव आणि बॅरिस्टर यांचं नातं भाडोत्री आणि मालक या सदरातलं टिपिकल व्यवहारी कधीच नव्हतं. तर दुसऱ्या बाजूला बॅरिस्टर आणि राधाक्का यांच्यातलं नातंही अस्फूट, सौम्य आणि मर्यादांच भान ठेवून उमलू पहात होतं. नात्यांचा हा सारा प्रवास खरोखर वाचण्याजोगा आहे.

बऱ्यापैकी लोकांनी ही कादंबरी वाचली असेलच. प्रेमाची परिणीती कशात होते? याला कधी कधी काहीच अर्थ नसतो, कारण शेवटी तो प्राक्तनाचा भाग असतो. पण त्या आठवणींचा ताळेबंद आयुष्यभर जोखत बसणं हेही त्या प्रेमाचं यशच नाही का? असेच अनेक तिमिरपंथी प्रश्न घेऊन आपल्यातल्या माणसाला चाचपडतात या ‘अंधाराच्या पारंब्या’

परिचय : श्री प्रसाद साळुंखे

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9664027127

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – कथा-कहानी ☆ औरत – भाग – १ – गुजराती लेखिका – सुश्री गिरिमा घारेखान ☆ हिन्दी भावानुवाद – श्री राजेन्द्र निगम ☆

श्री राजेन्द्र निगम

(ई-अभिव्यक्ति में श्री राजेंद्र निगम जी का स्वागत। आपने बैंक ऑफ महाराष्ट्र में प्रबंधक के रूप में सेवाएँ देकर अगस्त 2002 में  स्वैच्छिक सेवा निवृत्ति ली। उसके बाद लेखन के अतिरिक्त गुजराती से हिंदी व अँग्रेजी से हिन्दी के अनुवाद कार्य में प्रवृत्त हैं। विभिन्न लेखकों व विषयों का आपके द्वारा अनूदित 14  पुस्तकें प्रकाशित हैं। गुजराती से हिंदी में आपके द्वारा कई कहानियाँ देश की विभिन्न पत्र-पत्रिकाओं में प्रकाशित हुई हैं। आपके लेखों का गुजराती व उड़िया में अनुवाद हुआ है। आज प्रस्तुत है आपके द्वारा गिरिमा घारेखान जी की कथा का हिन्दी भावानुवाद “औरत”।)

☆  कथा-कहानी – औरत – भाग – १ – गुजराती लेखिका – सुश्री गिरिमा घारेखान ☆ हिन्दी भावानुवाद – श्री राजेन्द्र निगम ☆

कुछ घरघराहट. मंद हो रही रोशनी… और विमान उड़ने लगा | समीरा धीमे-धीमे छोटे  होते जा रहे घरों को वह खिड़की से देखती रही | इनमें मेरा भी घर दिखाई देता होगा ? एक दूसरे से सटे अनगिनत घरों में उसका भी था एक घर | कहाँ से दिखाई देगा ? उसे याद आ गया… उसका बचपन… जब उड़ते विमान की हल्की-सी आवाज सुनते ही मोहल्ले के सभी बालक दौड़ कर बाहर आ जाते और वे तब तक देखते रहते, जब तक कि कि वह विमान छोटा होते-होते अदृश्य नहीं हो जाता | आज ठीक उल्टा है | वह विमान में बैठी है और घरों को छोटे होते हुए देख रही है |

सुश्री गिरिमा घारेखान

कुछ देर में विमान बादलों में आ गया और समीरा पानी में पड़ने वाले प्रतिबिंब की तरह कुछ दिन पहले के उस नज़ारे को तादृश्य होते हुए देखती रही |

‘नहीं मम्मी, मुझे शादी कर इतनी दूर नहीं जाना है |’

‘अरे पगली, मस्कत कहाँ इतनी दूर है ? विमान से तो सिर्फ दो-तीन घंटे में वहाँ पहुँच जाते हैं | इससे अधिक वक्त तो ट्रेन से कोचीन पहुँचने में लगता है |’

परवीन ने बेटी को समजाते हुए कहा l

समीरा को तो परदेश के नाम से ही पेट में चकरी जैसी घूमने लगती थी |

‘लेकिन अम्मी, बिल्कुल अनजान देश और अनजान लोग | मैं वहाँ कैसे रहूँगी ?’

परवीन ने समीरा को अपनी खाला की लड़की की बात बताकर समजाने की कोशिश की l   | वह कई वर्षों से दुबई में थी | महल जैसे घर में रहती थी | अधिक आना तो उसका संभव नहीं होता था. परंतु ईद-त्यौहार पर सबके लिए ढेरों कपड़े, इत्र, खजूर, सूखा मेवा और चाकलेट भेजती रहती थी | लेकिन फिर भी समीरा का मन नहीं मान रहा था | बरसात के दिनों में उसके घर की छत से गिरते पानी की तरह अम्मी की आँखों से भी पानी का बहना शुरू हो गया था |

समीरा उसके घर की हालत जानती थी | उसे मालूम था कि उसके अब्बा पूरे दिन साँस फुलाते हैं, तब कहीं घर के छह व्यक्तियों के शरीर को उनकी ऑक्सीजन मिलती थी | पगार के बाद के दस दिन ईद की तरह लगते थे और फिर धीरे- धीरे रोजों की शुरुआत हो जाती थी | दूर के एक रिश्तेदार की मार्फ़त, बीस वर्ष की समीरा के लिए, मस्कत में रह रहे एक अरब के लिए माँग आई | इस रिश्तेदार ने पहले भी कई लड़कियों की शादी खाड़ी के देशों में कराई थी, इसलिए अविश्वास की तो कोई बात नहीं थी | अतः यदि बगैर दहेज़ दिए लड़की को उसका ठिकाना मिल रहा हो, तो समीरा की अम्मी को अविश्वास करने का विचार भी नहीं आ रहा था |

इसलिए उस दिन जब तक समीरा मान नहीं गई, तब तक परवीन उसे समझाती रही | माँ-बेटी की आँसुओं की धार एक जैसी ही थी, सिर्फ कारण अलग थे | समीरा सोच रही थी कि एक बिल्कुल अनजाने देश में, एक अजनबी के साथ उसकी जिंदगी कैसे गुजरेगी ? फिर अरब देशों के लिए तो उसने कैसी-कैसी बातें सुनी थीं- वहाँ बुर्के में रहो, घर के बाहर बहुत अधिक नहीं निकलो और ऐसी ही बहुत-सी बातें | यहाँ चाहे पैसों की कमी हो, लेकिन वह आजादी से घूम सकती थी ! सरकार द्वारा लड़कियों को दी जानेवाली सहुलियत के कारण उसने बारहवीं तक पढ़ाई की थी | लड़कों के साथ एक ही कक्षा में बैठ कर व मॉनिटर बन कर रोब जमाया था| स्कूल में हेड-गर्ल बन कर भाषण दिए थे और सहेलियों की एक्टिवा पर बैठ कर बाजारों में घूमी थी | उसके अब्बा-अम्मी ने यह सब करने के लिए कभी इंकार नहीं किया था |  मस्कत में बुर्के के अलावा और कितनी बंधन होते होंगे ? क्या वह साँस ले सकेगी ?

फिर भी समीरा अम्मी के मजबूरी के शब्दों और लाचारी के आँसुओं के सामने झुक   गई | उसने जब अम्मी की ओर देखतें हुए स्वीकार में सिर हिलाया, तब अम्मी इतनी खुश हो गई, मानो झुकी हुई गर्दन में उसे ईद का चाँद दिखाई दिया हो |  समीरा का कपाल चूमते हुए उसने कहा था, ‘मेरी सयानी बेटी, चल, अपनी चाँद जैसी सूरत को सँवार ले | करीम चाचा उस अरब को ले कर आनेवाले हैं | राशिद – राशिद नाम है उनका |’

और आज वह राशिद की बीबी बन कर उसके साथ मस्कत जा रही थी | पहली मुलाकात में तो समीरा की पलकों पर पहाड़ छा गया था, लेकिन दूसरी मुलाक़ात में उसे लगा कि राशिद में आपत्तिजनक कुछ भी नहीं था | ऊँचा, गेहूँवर्ण और चुस्त शरीर | दूसरी मुलाक़ात में उसने समीरा को कहा था, ‘उस दिन तो आपकी पलकें उठ ही नहीं रही थीं और मेरी आँखें थीं कि आपकी सूरत से हट ही नहीं रही थीं | मैं तो हिंदुस्तान आया था, लड़की से निकाह करने और मुझे तो नूरजहाँ मिल गईं | मेरी तो बिना रोजे के ही इफ्तारी हो गई | हमदुल्ला |’

तब समीरा के हृदय में एक कोपल फूट गई थी | निकाह के बाद राशिद, किसी नवाब का हो वैसा साटिन का,  दूध जैसा सफ़ेद, जिसे वे ‘कंदोरा’ कहते थे, उस कुर्ते पर दिल को महकानेवाला परफ्यूम जब छांटता, तब समीरा उसकी उम्र के अंतर को भूल जाती | उसकी कमर के ऊपर लटकनेवाले चाँदी के खंजर और उसके साथ बंधे चाँदी के पट्टे ने तो मानो समीरा के मन को पूर्ण रूप से बाँध लिया था | हिंदुस्तान के सँस्कारों वाला और अब तक कुँवारा रहा समीरा का मन कब उस परदेशी के साथ ओतप्रोत हो गया, उसे महसूस ही न हुआ | वह अजनबी शख्स “शौहर” का इल्काब प्राप्त करने के साथ ही उसका सर्वस्व बन गया था |

एयर होस्टेस ठंडा पेय लेकर आई और राशिद ने समीरा को बादलों में से बाहर खींचा|

‘कैसा लगता है, यूँ बादलों में पहली बार उड़ना ?’

‘आपके साथ बैठ कर लगता है, मानो विमान सातवें आसमान में उड़ रहा है |’ समीरा ने राशिद की ओर कुछ नजदीक खिसकते हुए कहा |

निकाह के बाद तुरंत उसे साथ ले जाने की कार्यवाही में व्यस्त हुए राशिद से समीरा का बहुत कुछ पूछना बाक़ी रह गया था | उसने वह पूछना अब शुरू किया |

‘मस्कत कैसा शहर है? आपका घर कैसा है ? घर में कौन- कौन हैं ?’

राशिद ने हँसते हुए कहा, ‘मस्कत तो बहुत ही सुंदर शहर है | लेकिन हमें तो सोहार में रहना है |’

‘सोहार !’`

‘हाँ, वह मस्कत से कुछ छोटा शहर है और वहाँ मेरा घर है, फार्म हाउस- गार्डनवाला घर है | फार्म में घर में, बहुत नौकर- नौकरानी हैं | वहाँ तुम्हें बिल्कुल अकेला नहीं लगेगा |’

‘फ़ार्म !’ समीरा को लगा कि खुदा ने सच में उस पर मेहरबानी की है |

‘’बहुत बड़ा फ़ार्म है; खजूर के पेड़ हैं | उन्हें अब तुम्हें ही तो सँभालना है | हिंदुस्तान की लड़कियाँ बहुत होशियार होती हैं |’ समीरा के गाल पर हल्की-सी चपत लगाते हुए राशिद ने कहा|

समीरा आश्चर्य से सब कुछ सुनती रही | उसके चौकन्ने दिमाग में तुरंत एक प्रश्न उठा, ‘राशिद ऐसा क्यों कह रहा था कि तुम्हें अकेला नहीं लगेगा ? अकेले उसे क्या संभालना था और क्यों ?’ उसके दिमाग में यह सब एक साथ समा नहीं रहा था |  बहुत कम समाया में उसकी जिंदगी विमान की तरह उड़ती-उड़ती उसकी विचार-शक्ति से भी आगे बढ़ गई थी | इस समय तो मानो एक विकसित पौधे को उसकी जड़ों के साथ उखाड़कर किसी अन्य जगह पर रोपने के लिए ले जाया जा रहा था |

फिल्मों में देखे किसी हवाई-अड्डे से अधिक भव्य मस्कत हवाई-अड्डे को देख कर न केवल समीरा की आँखें, बल्कि मस्तिष्क भी चौंधिया गया | एयरपोर्ट के बाहर राशिद का ड्रायवर एक बड़ी गाड़ी के साथ खड़ा था | कोमल, चमकीले गाड़ी के पहिए किसी अफ्रीकन सुंदरी के गाल जैसे रास्ते को चूमकर आगे दौड़ रहे थे | लगभग एक सौ पच्चीस किलोमीटर के रास्ते पर समीरा मार्ग के दोनों ओर लटक रही खजूरी और किसी रंगोली की तरह बिखरे फूलों को अपनी नजर से निहारती रही | सोहांर में उसने जब अपने विशाल बँगले में प्रवेश किया, तब उसे लगा कि उससे पहले जन्नत यहाँ रहने के लिए आ चुकी है |

राशिद के प्रेम में डूबी समीरा अपने कुटुंब, देश, समय व दिनों की गणना भूल गई | वह बँगला उनके हनीमून की रोमांचक घड़ी को देखता हुआ रंगबिरंगा प्रकाश फैलाता रहा | बाहर खड़े खजूर के वृक्ष उनकी पीली खजूर में अधिक मिठास भरते रहे | एक दिन सवेरे राशिद की परफ्यूम की तीव्र गंध से समीरा की नींद खुल गई |

‘इतनी सुबह किस ओर ?’

‘मस्कत जा रहा हूँ | अब काम तो करना पड़ेगा न ?’

‘मतलब ?’ आघात से समीरा के मुँह से शब्द फूटे | वह चौड़ी आँखों से राशिद को ताकती रही | उसकी नींद अब पूरी तरह काफूर हो चुकी थी |

अपने कंदोरे पर चाँदी के पट्टे को पहनते-पहनते राशिद बोला. ‘जानेमन, मेरा मुख्य बिजनेस तो मस्कत में है | सप्ताह में पाँच दिन वहाँ रहूँगा | जुम्मे से पहले अपनी मलिका के पास उसका शहनशाह हाजिर |’

‘लेकिन…’

‘अरे पाँच दिन तो ऐसे ही बीत जाएँगे |’ हाथ से चुटकी बजाते हुए राशिद बोला. ‘तुम यह महल ठीक से देखोगी और तब तक बंदा वापिस |

आलिंगनबद्ध समीरा को नजाकत से दूर कर, वह उस आघात से बाहर आए, उसके पहले राशिद चला गया | यह बात राशिद ने उसे पहले क्यों नहीं बताई, इस प्रश्न का जवाब जानने की उसने बहुत कोशिश की, लेकिन नहीं जान सकी | परंतु जैसे जंगल में निकल पड़ी किसी बालिका का समय पहले डालियों पर झूलने में, नीचे गिरे फलों को उठाने में, पक्षियों के पीछे दौड़ने में और फूलों के साथ बात करने में बीतता है, वैसा ही कुछ समीरा के साथ हुआ | वह घर में बिछे मखमली गलीचों पर तितली की तरह बैठती, बाथरूम में सुगंधित पानी से भरे टब में झाग के साथ एकरस हो जाती,  बगीचे में नाच रहे फव्वारे के जल के छिड़काव से वह इन्द्रधनुष हो जाती… कई बार नक्काशीदार बड़े दर्पण के सामने बैठ कर आभूषणों को बदलती और सोचती रहती कि राशिद जब आएगा, तब वह क्या पहनेगी | वह किसी चातक की तरह गुरुवार की प्रतीक्षा करती | राशिद गुरुवार की सुबह हाजिर हो जाता और समीरा अपने इस फ़रिश्ते के साथ जन्नत के अंदर की जन्नत का आनंद लेती रहती |

राशिद धीरे-धीरे खजूर के कारोबार के बारे में समीरा को बताता गया और चतुर समीरा कुछ ही समय में सब काम सीख गई | पीली हो गई खजूर को पेड़ों से नीचे लाना, वजन कराने के बाद पैक कराना, लेबल लगाना और बड़े-बड़े खोखों में मस्कत भेजना | यह सब काम वह अपने लोगों से बहुत अच्छे ढंग से कराती | वहाँ इन सब का मैनेजर केरल से आया सईद था, जो अब उसका सीधा हाथ जैसा हो गया था | अपने ही मुल्क की इस मालकिन का उस पर जो विश्वास था, उससे सईद मगरूर था | गहरे रंग के दुपट्टे से बालों को ढंक कर अपने लोगों पर हुक्म चलानेवाली समीरा के गाल पर जब उसके सुनहरी बाल आ जाते, तब वह उन्हें एकटक देखता रहता | इस सुरमई आँखोंवाली मालकिन उसे उसके गाँव में बैठी एक प्रियजन की याद दिला देती |

♦ ♦ ♦ ♦

मूल गुजराती कहानीकार – गिरिमा घारेखान

संपर्क – 10, ईशान बंगलोज, सुरधारा- सत्ताधार मार्ग, थलतेज, अहमदाबाद- 380054 मो. 8980205909.

हिंदी भावानुवाद  – श्री राजेन्द्र निगम,

संपर्क – 10-11 श्री नारायण पैलेस, शेल पेट्रोल पंप के पास, झायडस हास्पिटल रोड, थलतेज, अहमदाबाद -380059 मो. 9374978556

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #३३५ ☆ मी टू : अंतहीन सिलसिला… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख मी टू : अंतहीन सिलसिला। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

(डॉ मुक्ता जी द्वारा रचित एक भजन – यह किराये का मकान है / स्वर- रुखसार, सौजन्य – तरूनम चैनल)

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # ३३५ ☆

☆ मी टू : अंतहीन सिलसिला… ☆ डॉ. मुक्ता ☆

‘मी टू’– एक सार्थक प्रयास, तथाकथित शोषित महिलाओं को न्याय दिलाने की मुहिम; वर्षों से नासूर बन रिसते ज़ख्मों से निज़ात पाने की अचूक मरहम …एक अंतहीन सिलसिला है। शायद यह वर्षों से सीने में दफ़न चिंगारी, ज्वालामुखी पर्वत के लावे की भांति सहसा फूट निकलती है; जो दूसरों के शांत-सुखद जीवन को तहस-नहस करने का उपादान बन; अपनी विजय-श्री का उत्सव मना रही होती है; विजय-पताका फहरा रही होती है… वहीं उसकी अभिव्यक्ति से समाज में व्याप्त संतुलन, समन्वय व सामंजस्य व समरसता का अंत भी संभाव्य है, निश्चित है।

भारतीय लोकतंत्र के चौथे स्तंभ ने आधी आबादी को समानाधिकारों के प्रति सजग करते हुए, अन्याय के विरुद्ध आवाज़ उठाने का साहस जगाया है… श्लाघनीय है। गीता में भी ‘अन्याय व ज़ुल्म सहने वाले को, ज़ुल्म करने वाले से अधिक दोषी व अपराधी स्वीकारा गया है।’ वैसे औरतों की ‘मी टू’ में सक्रिय प्रतिभागिता होने पर, समाज के हर वर्ग के रसूखदार सदमे में हैं; उनके हृदय में खलबली मची है। वास्तव में वे भयाक्रांत हैं, क्योंकि किसी भी पल किसी पर भी अंगुली उठ सकती है और वे निरपराधी होने पर भी हाशिए पर आ सकते हैं।

वैसे तो हर औरत जीवन में ऐसे हादसों की शिकार होती है। बचपन से लेकर वृद्धावस्था तक कदम- कदम पर वह निकटतम परिजनों द्वारा प्रताड़ित होती है। घर हो या कार्य-स्थल…वह कहीं भी सुरक्षित नहीं है; हर चौराहे पर दुर्योधन व दु:शासन उसकी अस्मत से खिलवाड़ करने को आतुर दिखाई पड़ते हैं। चंद माह की मासूम हो या वृद्धा, वह उनकी पल भर की शारीरिक क्षुधा को मिटाने का साधन बनती है। इतना ही नहीं, उस निर्दोष पर इल्ज़ाम लगा कर कटघरे में भी खड़ा कर दिया जाता है, जो अपराध उसने किया ही नहीं। सो! इन विषम परिस्थितियों में समझौता करना, उसकी विवशता बन जाती है और मुंह बंद कर के रहना– उसे ज़िंदा रहने की कीमत के रूप में चुकानी पड़ती है ताकि परिवार का रूतबा समाज में कायम रह  सके। परंतु उस झूठी मान-मर्यादा को बरक़रार रखने के लिए उसे आजीवन तिल-तिल कर मरना पड़ता है।

आइए! ज़रा दृष्टिपात करें, इसके स्याह पक्ष पर…  बहुत सी महिलाएं अपना स्वार्थ साधने हेतु सम्पन्न व सज्जन पुरुषों पर निशाना दाग़ने से भी नहीं चूकतीं। वे धन-ऐश्वर्य पाने, झूठी पद-प्रतिष्ठा बटोरने व अधिकाधिक सुख-सुविधा जुटाने के निमित्त; लोक- मर्यादा की परवाह न करते हुए; हर सीमा का अतिक्रमण कर गुज़रती हैं। उदाहरणत: 498 ए के अंतर्गत दहेज मांगने के इल्ज़ाम में, पति व ससुराल पक्ष के लोगों को कटघरे खड़ा करना; जेल की सीखचों के पीछे पहुंचाना या दुष्कर्म व घरेलू हिंसा के झूठे आरोप लगाने का दम्भ भरना; अपनी कारस्तानियों को सबके सम्मुख सीना तानकर बखान करना… सोचने पर विवश करता है कि आखिर इक्कीसवीं सदी की पथ-विचलित नारी किस घने अंधकार में खो गयी है? परंतु ममता की सागर, सीने में अथाह प्यार, असीम वफ़ा व त्याग के भाव संजोए– नि:स्वार्थ, संवेदनशील, प्रसाद की दैवीय गुणों से सम्पन्न श्रद्धेय नारी की तलाश आज भी जारी है। इसके विपरीत आधुनिक समाज में ‘मी टू’ अथवा दुष्कर्म के झूठे आरोप लगाकर प्रतिशोध लेने व नीचा दिखाने का प्रचलन भी बदस्तूर जारी है; जिसके परिणाम-स्वरूप आत्महत्या के मामले भी निरंतर सामने आ रहे हैं, जो समाज के लिए घातक हैं; मानव-जाति पर कलंक हैं। सो! समाज के लिए यह स्थिति अत्यंत शोचनीय हैं, चिन्तनीय हैं, निन्दनीय हैं।

एक प्रश्न मन में अक्सर कुलबुलाता है…आखिर इतने वर्षों के पश्चात्  दमित भावनाओं का प्राकट्य क्यों… यह दोषारोपण तुरन्त क्यों नहीं? सो! इसके पीछे उनकी मंशा व प्रयोजन जानने की आवश्यकता है, जिसका ज़िक्र पहले ही किया जा चुका है। इस संदर्भ में उन महिलाओं की चुप्पी के कारणों को उजागर करने की अत्यंत आवश्यकता है…आखिर  सुप्रीम कोर्ट का निर्णय आने के पश्चात् सहसा यह विस्फोट क्यों? पच्चीस वर्ष तक हृदय में दफ़न दर्द के दावानल में विस्फोट क्यों?

प्रश्न उठता है— क्या ‘मी टू’ वास्तव में विरेचन है… उन चिरदमित भावनाओं का, अहसासों का, जज़्बातों का, जो कुंठाओं के रूप में लम्बे समय से उनके हृदय में सुप्तावस्था में दबी पड़ीं थीं और अवसर पाते वे जाग्रत हो गयी हैं? सो! उनका प्रदर्शन होने के पश्चात् दोनों पक्षों का व्यवहार सामान्य कैसे रह सकता है? शायद,! ‘मी टू’ शराफ़त का नकाब ओढ़े; समाज में ऊंचे-ऊंचे पदों पर काबिज़ लोगों की हक़ीक़त को उजागर करने का माध्यम हैं; उनके जीवन के कटु यथार्थ को प्रकट करने का मात्र साधन है या महिलाओं को न्याय दिलाने का उपादान भी है?

सो! इस विषय की प्रासंगिकता के साथ-साथ सकारात्मक व नकारात्मक पहलुओं पर चर्चा करना अत्यंत आवश्यक है। क्या यह दोनों पक्षों के हित में है… शायद नहीं। वास्तव में आरोपी पक्ष पर इल्ज़ाम लगाने से, कीचड़ के छींटे हमारे उजले दामन को भी मलिन करते हैं और इससे केवल दोनों परिवारों की इज़्ज़त ही दांव पर नहीं लगती, उनके घरों का सुख-चैन, शांति व सुक़ून भी नदारद हो जाता है। सो! सुप्रीम कोर्ट के मी-टू के साथ-साथ लिव-इन व विवाहेतर संबंधों पर भी  पुन: चिंतन करने की आवश्यकता का विचार मन में सहसा कौंधा, क्योंकि इससे मानसिक आघात व हंसते- खेलते परिवारों में ग्रहण लगने की अधिक संभावना है। सो! हमें अपनी संस्कृति की धरोहर को संजोए रखने का भरसक प्रयास करना चाहिए और मानव-मूल्यों के विघटन के  कारणों व समाधान के उपायों-कारकों को भी तलाशना चाहिए। शेष निर्णय व दायित्व आप पर।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रचना संसार # १०८ – गीत – उजड़ा कुंज… ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ☆

सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(संस्कारधानी जबलपुर की सुप्रसिद्ध साहित्यकार सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ ‘जी सेवा निवृत्त जिला एवं सत्र न्यायाधीश, डिविजनल विजिलेंस कमेटी जबलपुर की पूर्व चेअर पर्सन हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में पंचतंत्र में नारी, पंख पसारे पंछी, निहिरा (गीत संग्रह) एहसास के मोती, ख़याल -ए-मीना (ग़ज़ल संग्रह), मीना के सवैया (सवैया संग्रह) नैनिका (कुण्डलिया संग्रह) हैं। आप कई साहित्यिक संस्थाओं द्वारा पुरस्कृत एवं सम्मानित हैं। आप प्रत्येक शुक्रवार सुश्री मीना भट्ट सिद्धार्थ जी की अप्रतिम रचनाओं को उनके साप्ताहिक स्तम्भ – रचना संसार के अंतर्गत आत्मसात कर सकेंगे। आज इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम गीतउजड़ा कुंज

? रचना संसार # १०८ ?

☆ गीत – उजड़ा कुंज…  ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ?

कुंज मनोहर ऐसा उजड़ा,

रोती बैठी हीर।

छलक रहा नयनों का निर्झर,

कैसे रखते धीर।।

**

चुभते है भँवरों की गुन-गुन,

बौराई सी प्रीत।

विकल बहुत बागों की बुलबुल ,

रूठे पावस गीत।

*

चाल चलें कितनी मायावी,

विश्वासों को चीर।।

**

मंजरियाँ सब मुरझाईं सी,

काँपे कोमल गात।

रंग बदलती गिरगिट जैसी,

चादर ताने रात ।

*

छले चंद्रमा छलिया बनकर,

नयन-कोर नम नीर।।

**

प्रेम सार सुर ढाई आखर,

चोटिल हर पल साँस।

मन मयूर करता है क्रंदन,

टूटी जीवन आस।

*

बंजारन पागल सी घूमे,

बढ़ती अंतस पीर।।

© सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(सेवा निवृत्त जिला न्यायाधीश)

संपर्क –1308 कृष्णा हाइट्स, ग्वारीघाट रोड़, जबलपुर (म:प्र:) पिन – 482008 मो नं – 9424669722, वाट्सएप – 7974160268

ई मेल नं- meenabhatt18547@gmail.com, mbhatt.judge@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – प्रकृति ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – प्रकृति? ?

प्रकृति ने चितेरे थे चित्र चहुँ ओर

मनुष्य ने कुछ चित्र मिटाए,

अपने बसेरे बसाए।

 

प्रकृति बनाती रही चित्र निरंतर,

मनुष्य ने गेरू-चूने से

वही चित्र दीवारों पर लगाए।

 

प्रकृति ने येन केन प्रकारेण

जारी रखा चित्र बनाना

मनुष्य ने पशुचर्म, नख, दंत सजाए।

 

निर्वासन भोगती रही

सिमटती रही, मिटती रही,

विसंगतियों में यथासंभव

चित्र बनाती रही प्रकृति।

 

प्रकृति को उकेरनेवाला,

प्रकृति के ख़ात्मे पर तुला,

मनुष्य की कृति में

अब नहीं बची प्रकृति।

 

मनुष्य अब खींचने लगा है

मनुष्य के चित्र..,

मैं आशंकित हूँ,

बेहद आशंकित हूँ..!

?

© संजय भारद्वाज   

(प्रातः 10:21 बजे, 21.7.2019)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️  श्रावण साधना गुरुवार दि. 30 जुलाई से आरंभ होकर शनिवार 28 अगस्त (रक्षाबंधन) तक चलेगी 🕉️

  💥 

इस साधना में-

ॐ नमः शिवाय का मालाजप होगा।

गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ करेंगे।

इस बार हम आदि शंकराचार्य के निर्वाण षटकम् / वैराग्य षटकम् का भी प्रतिदिन कम से कम एक पाठ अवश्य करेंगे।

मालाजप, रुद्राष्टकम्, निर्वाण षटकम् के साथ आत्मपरिष्कार व ध्यानसाधना भी नियमित रूप से चलेंगे।

हमारा प्रयास है कि महत्वपूर्ण स्तोत्रों का अधिकाधिक प्रसार हो।

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares